मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कुणा थांग लागे कवीच्या मनाचा…? ☆ सुश्री अर्चना देवधर ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ कुणा थांग लागे कवीच्या मनाचा…? ☆ सुश्री अर्चना देवधर ☆

(वृत्त-भुजंगप्रयात, लगागा लगागा लगागा लगागा, अक्षरे-१२,मात्रा-२०)

कुणा थांग लागे कवीच्या मनाचा?

तिथे खेळ रंगे नव्या कल्पनांचा

जशी माउली भोगते जन्मवेणा

कवी सोसतो निर्मितीच्या कळांना

 

जसे लाभती गर्भसंस्कार बाळा

 तसा बुद्धिला भावनांचा उमाळा

कधी शब्दगंगा खळाळून वाहे

परीक्षा कधी ती कवीचीच पाहे

 

निसर्गातली मोहवी दिव्य शोभा

कधी चन्द्र सूर्यातली तेज आभा

कधी रंगतो मंदिरी वा शिवारी

कवी मुक्त व्योमात घेई भरारी

 

कधी दुःखितांच्या व्यथांनी दुखावे

सुखाच्या कधी जाणिवांनी सुखावे

कधी शब्दशस्त्रे खुबीने उगारी

कधी वेदनेच्या झळांना झुगारी

 

कधी वृत्तबंधात बांधून घेतो

कवी मुक्तछंदातही मग्न होतो

कधी श्रावणी धुंद धारात न्हातो

तसा चांदण्याच्या प्रवाहात गातो

 

कवीला मिळे लेखणीचीच दीक्षा

कधी भोगतो हा स्तुती वा उपेक्षा

कवी शारदेचा खरा दास आहे

स्वयंनिर्मितीचा तया ध्यास राहे

 

© सुश्री अर्चना देवधर 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ – बदललेली नाती…– ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

?  विविधा ?

☆ – बदललेली नाती…– ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

#बदललेली नाती…नात्यांचं नवं स्वरूप…

खरं तर मानवाची जसजशी प्रगती होत गेली तशी मनुष्य प्राणी समाजप्रिय प्राणी म्हणून ओळखला जाऊ लागला.. समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्था, नाती गोती हे मनुष्य जीवनाचे अविभाज्य घटक बनले.. रानावनात भटकणारा माणूस वस्ती करून राहू लागला.. वाड्या, वस्त्या, मग गावं, शहरं बनत गेली.. आई वडील, बहिण भाऊ, नवरा बायको अशी कित्येक नाती जोडली गेली.. पण पूर्वी असलेली नाती प्रगती बरोबरच बदलत गेली.. पितृसत्ताक पद्धती मध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान मिळत होत पण आज स्त्रियांनी स्वतःला अस सिद्ध केलंय की नात्यांच्या परिभाषा ही आपोआप बदलल्या..पूर्वी घरी वडिलधारी माणसं किंवा बाबा, काका ह्यांना घरात एक वेगळाच दर्जा होता.. त्यांचा धाक कुटुंबावर होता..घरात बाबांचे पाऊल पडताच अख्खं घर शांत होत होत.. अर्थात ती आदरयुक्त भिती होती अस म्हणू शकतो आपण.. हळू हळू कुटुंब व्यवस्था विभक्त होत गेली आणि हे चित्र बदललं..स्त्रिया ही बाहेर पडू लागल्या..मोकळा श्वास घेऊ लागल्या.. जीवनशैली बदलली..डोक्यावरचा पदर खांद्यावर आला,.. आणि पुन्हा एकदा नात्यांची परिभाषा बदलली.. नवऱ्याला हाक मारताना अहो.. जाऊन अरे आलं.. नावाने हाक मारण्याची पद्धत सुरू झाली..अहो बाबा चा अरे बाबा झाला.. नात्यांमधील भिती जाऊन ती जागा मोकळीक आणि स्वतंत्र विचारांनी घेतली.. जिथे तिथे मैत्री चा मुलामा लावून नवीन नाती बहरू लागली.. सासू सुनेचे नातं बदललं.. सूना लेकी झाल्या,.. नणंद भावजय मैत्रिणी.. दिर भाऊ.. जाऊ -बहिण.. अशी नाती जरी तीच असली तरी बघण्याचा दृष्टिकोन बदलला… अर्थात प्रत्येक नात्याचा आधार असतो तो म्हणजे विश्वास.. हा विश्वास डळमळीत झाला की नाती विद्रूप रूप घेतात.. विकृत बनतात..नात कसं असावं तर धरणी च आणि अवकाशाचे आहे तस.. मातीच पावसाशी आहे तस.. निसर्ग आणि जीव सृष्टीच नात.. ज्यात फक्त देणं आहे.. त्याग आहे समर्पण आहे.. नात कसं असावं तर राधेचं कृष्णाचं होत तसं.. प्रेम, त्याग, समर्पण आणि दृढ विश्वास असलेलं.. नात मिरा माधव सारखं.. ज्यात फक्त त्याग आहे तरी ही प्रेमाने जोडलेलं बंध आहेत.. नातं राम लक्ष्मण सारखं असावं.. एकाने रडलं तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी आणणारं.. नात भरत आणि रामा सारखं असावं जिथे बंधुप्रेम तर आहेच पण त्याग आणि समर्पण जास्त आहे..कुंती पुत्र कर्णा सारखं असावं..ज्यात फक्त हाल अपेष्टा, उपेक्षा असूनही निस्सीम प्रेम आणि त्यागाच प्रतीक असणारं.. नात्यांमध्ये प्रेम, विश्वास, मायेचा ओलावा, एकमेकांची काळजी घेण्याची वृत्ती, त्याग, समर्पण, निस्वार्थ असेल तर अशी नाती अजरामर बनतात.. हल्ली मात्र हे चित्र बदलत चाललं आहे.. सोशल मीडियाचा अती वापर.. प्रगतीच्या नावाखाली चाललेले अनेक घोटाळे.. ह्या सगळ्यात बाजी लागते आहे ती नात्यांची.. एकमेकांमध्ये स्पर्धा येणं.. आदर कमी होणं आणि जे नात आहे त्यापेक्षा दुसऱ्याची अपेक्षा लोभ मनात ठेवणं ह्याने नात्यांचं स्वरूपच बदलत  चाललं आहे .. सोशल मीडिया, इंटरनेट ह्या गोष्टींचा अती वापर आणि नात्यांमध्ये येणारा दुरावा  काळजी करण्यासरखा झाला आहे.. काही नाती फक्त समाजासाठी असतात.. फोटो पुरते किंवा असं म्हणू की व्हॉटसअप स्टेटस पुरती मर्यादित राहिलेली असतात.. त्या नात्यांमधल प्रेम विश्वास ह्याला कधीच सुरुंग लागलेला असतो… आणि ही परिस्थिती खरच विचार करायला लावणारी आहे.. शेवटी एवढच म्हणावंस वाटतं की कुठलं ही नातं असुदे ते नात समोरच्या व्यक्तीवर लादलेलं नसावं.. त्याच ओझ नसावं.. नात्यांमध्ये स्वतंत्र विचार.. एकमेकांबद्दल आदर.. मायेचा ओलावा.. प्रेम.. आणि समोरच्याच्या चेहऱ्यावर सतत आनंद ठेवण्यासाठी चाललेली धडपड असेल तर कुठलेच नातं संपुष्टात येणार नाही.. कुठल्याच नात्याला तडा जाणार नाही… विश्वास हा नात्यांमधला मुख्य दुवा आहे.. आणि जिथे विश्वास, त्याग, समर्पणाची भावना आहे तिथे प्रत्येक नातं म्हणजे शरदाच चांदणं.. मोग्र्याचा बहर.. आणि मृद्गंधाचा सुगंधा सारखं निर्मळ आणि मोहक आहे ह्यात शंका नाही.. 

 नात्यांचे रेशीम बंध असावेत..

  बंधन, ओझ नसावं..

गुंतलीच कधी गाठ तर पटकन सैल होणारी असावी..

नात्यांचा बहर हा सिझनल नको..

तर बारमाही फुलणारा असावा…

नुसतच घेण्यात काय मिळवावं..

थोड कधी द्यायला ही शिकावं..

विश्वास आणि त्याग समर्पण

प्रत्येक नात्याच एक सुंदर दर्पण..

एकमेकांना दिलेला वेळ ही अमूल्य भेट आहे..

आदर आणि मायेने फुलणारं नात ग्रेट आहे..

नात्यात बसल्या जरी गाठी..

त्या सोडवण्याची कला ही असावी..

कधी नमत घेऊन तर कधी नमवण्याची ताकत ही असावी..

नातं जपणं एक फॉर्म्यालिटी नसावी..

हृदयातून हृदयापर्यंत पोचणारी मायेची हाक असावी..

नातं नको स्टेटस पुरतं जपलेलं..

नातं असुदे मनातून मनापर्यंत पोहचलेले…

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन लघुकथा ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ दोन लघुकथा ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

(1) पुरस्कार : एक असेही घेणे (2) मुलगी झाली हो 

(1) पुरस्कार : एक असेही घेणे

‘अहो.. शुक… शुक … इकडे… इकडे … सुधाताई.. इकडे…’

‘ कोण तुम्ही? मी ओळखलं नाही….’

‘बरोबर आहे. मला कशाला तुम्ही ओळखाल? आम्ही साध्यासुध्या बायका… तुम्ही सुमन ताईंना ओळखाल. त्या स्टार लाईट नं! आम्ही एक पणती …. मिणमिणती….’

तसं नाही हो… मास्क आहे नं चेहर्‍यावर, म्हणून ओळखलं नाही….’

‘घ्या! हा काढला मास्क.’

‘अरे, सरलाताई होय. …खरंच मास्कमुळे मी तुम्हाला ओळखलं नाही. काय म्हणताहात?’

‘मी कुठे काय म्हणतीय? तुमची ती सरली म्हणतीय  काही- बाही . पुरस्कार मिळालाय ना तिला!’

‘पुरस्कार…. कसला पुरस्कार?’

‘जसं काही माहीतच नाही तुम्हाला ?’

‘नाही… खरंच माहीत नाही.’

‘अहो, गावभर सांगत सुटलीय ती… आणि तुम्हाला कसं नाही सांगितलं ? एवढी खास मैत्रीण तुमची’

‘आहो, एवढी खास मैत्रीण तुमची…’

‘खरं सांगू का, गेल्या महिन्याभरात भेट नाही झाली आमची. पण पुरस्कार कसला मिळालाय तिला? ‘

‘आदर्श समाज सेविकेचा पुरस्कार मिळालाय तिला!’

‘कुठल्या संस्थेने वगैरे दिलाय?‘.

‘नाही हो…’

‘मग नगरपालिकेचा आहे?’

‘नाही… नाही…

‘मग जिल्हा परिषदेचा असेल?’

‘बघा एवढीच लायकी आहे नं तिची? पण तिला राज्य पुरस्कार मिळालाय. ’

‘अरे वा! आता घरी गेल्यावर पहिल्यांदा तिला फोन करते.’

‘असतील तिचे कुणी काके-मामे वर!’

‘वर?;

‘वरच्या खुर्चीवर हो! जर माझे कुणी नातेवाईक असते वर…’

‘अं…’

‘वरच्या खुर्चीवर हो! जर माझे कुणी नातेवाईक असते, तर मलाही हा पुरस्कार मिळाला असता, होय की नाही?’

‘पण तिचे कुणी काके-मामे वर नाहीत.’

‘या फक्त बोलायच्या गोष्टी!’

‘पण तिचा काम खरोखरच पुरस्कार मिळण्याइतकं आहे!’

‘पण माझा कामही तिच्याइतकंच आहे. किंबहुना जरा जास्तच आहे, होय की नाही? काय? ‘

‘हं!

‘आहे ना! मग सांग…. सांगच … मला पुरस्कार मिळण्यात काय अडचण होती?’

‘नाही… कहीच अडचण नव्हती. मिळेल ना… पुढल्या वर्षी मिळेल. ‘

‘तुम्ही मला आश्वासन का देताय?

‘मग काय खात्रीने सांगू? सांगते … पुढल्या वर्षी तुम्हाला पुरस्कार मिळेल.’

‘तुम्ही निवड समितीच्या सभासद आहात का?’

‘मग खात्रीने कशा सांगू शकता?’

‘‘मग काय करू?’

‘कामाला लागा!’

‘कसलं काम?’

‘मंत्रालायावर मोर्चा घेऊन जा.’

‘कोण मी?’

‘नाही तर दुसरं कोण?’ मला पुरस्कार मिळावा, म्हणून मीच मोर्चा घेऊन गेले, तर कसं दिसेल?’

‘हं! बरोबर बोललात तुम्ही…आणी?’

‘घोषणा द्या. आवाज उठवा…’’कोणत्या घोषणा?’

‘बंद करा. बंद करा. पुरस्कार निवडीची पद्धत बंद करा. पुरस्कार निवडीची ही पद्धत बंद करा. नवे निकष तयार करा. हाय!हाय!… निवड समिती हाय!हाय!… आपल्या नातेवाईकांना पुरस्कार देणारी निवड समिती तयार करणारे सरकार हाय… हाय…’

‘पण असं कुठे झालय?’

‘असंच झालय. तुम्हाला काय माहिती?

‘तुम्हाला तरी काय माहिती?’

‘मला पुरस्कार मिळालानाही, याचाच अर्थ तो’

‘मला नाही तसं वाटत…’

‘’पण तुम्हाला घोषणा देण्यात काय अडचण आहे?’

‘अं… म्हणजे… अडाचण अशी नाही.पण…’

‘आता तुमचं पण…परंतु पुरे. घोषणा द्या. ‘बंद करा… बंद करा… पुरस्कारासाठी निवड करायची ही पद्धत बंद करा… ही पद्धत चुकीची आहे. नवीन निकष तयार करा. हाय… हाय… निवड समिती हाय… हाय… निवड समिती नियुक्त करणारं सरकार हाय… हाय…आपले लोक , नातेवाईक यांची निवड करून त्यांना पुरस्कार देणारं सरकार हाय… हाय…’

‘पण असं कुठे घडले?’

‘पण तुला घोषणा द्यायला काय होतय? घोषणा खर्‍या असल्या पाहिजेत, असं थोडंच आहे? आणखीही घोषणा देता येतील’

‘आणखीही? त्या कोणत्या? ‘

 ‘ चालणार नाही. ‘चालणार नाही. शिफारसबाजी चालणार नाही.’

‘ चालणार नाही. … चालणार नाही. घोषणाबाजी चालणार नाही.’

‘आहो, घोषणाबाजी नव्हे, शिफारसबाजी चालणार नाही.’

‘ही घोषणाबाजी कुठे करायची आहे?’

‘कुठे म्हणजे…. मोर्चात’’

‘पण मोर्चा कुणाविरुद्ध काढायचाय ?’

‘घ्या! बारा वर्ष रामायण वाचलं, रामाची सीता कोण ?’

‘कोण होती?’

बहीण. रामाची नाही माझी.सीतेवर रामाने अन्याय केला आणि सरारणे माझ्यावर! म्हणजे सरकारच्या निवड समितीने माझ्यावर. यासाठीच तर मोर्चा मोर्चा मंत्रालयावर घेऊन जायचे. नाही चालणार… नाही चालणार… पुरस्कार घोषित करण्यात शिफारसबाजी नाही चालणार… रद्द करा….रद्द करा… घोषित पुरस्कार रद्द करा…मला पुरस्कार मिळालाच पाहिजे. ‘

‘मिळाला पाहिजे… मिळालाच पाहिजे…’

‘मला पुरस्कार मिळालाच पाहिजे. ‘  

‘…. रद्द करा….रद्द करा… घोषित पुरस्कार रद्द करा…’

‘घोषित करा…. घोषित करा… नवीन पुरस्कार घोषित करा…’

‘पण हे सगळं कोण करणार?’

‘कोण म्हणजे?तुम्ही…’

‘मी?’

‘तुम्ही एकट्या नाही हो… तुम्ही माझ्या सगळ्या मैत्रिणी…ज्यांना माझ्याबद्दल आत्मीयता आहे, त्या सगळ्यांनी.’

‘ मोर्चा काढायचा, घोषणा द्यायच्या, मला वाटतं, हे सगळं जरा जास्तच होईल.’

‘ जास्त नाही अन् कमी नाही. तुम्हाला मोर्चा काढायचाय. मंत्रालयात जाऊन पदाधिकार्‍यांना निवेदन द्यायचय. विरोधी पक्ष कदाचीत् याचा इशू करेल. सरकार बरखास्त करण्याची मागणी करेल. सरकार बरखास्त करण्याची मागणी करेल. सरकार बरखास्त होईल.नवीन सरकार येळ. नवी निवड समीती बनेल. ‘

‘मग?’

‘त्यात माझे कुणी काके-मामे आतील.कुणी माझ्या ओळखीचा त्या निवड समितीत असेल. माझ्यावर श्रद्धा असलेले कुणी तरी त्यात असेल. ‘

‘नाही… नाही… असं काहीही होणार नाही. कुठली गोष्ट कुठे नेलीत आपण!’

‘का नाही होणार? तुम्ही स्वत:ला माझी मैत्रीण म्हणवता नं? मैत्रीणीसाथठी आपण एवढं करू शकत नाही? मग ही मैत्री काय कामाची?’

‘आमचं सगळ्यांचं आपल्याला मूक समर्थन असेल, पण मोर्चा वगैरे…. नाही बाबा नाही’

मशनात जाओ तुमचं मूक समर्थन! असल्या मैत्रीणी कसल्या कामाच्या? दगाबाज कुठल्या! तुम्ही सगळ्या तिची मिठाई खाऊन बसल्या असाल.  मिठाईशी ईमान ठेवायलाच हवं! मला असा पुरस्कार मिळाला असता, तर पार्टी दिली असती, अगदी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये. पार्टी घ्यायलासुद्धा नशीब लागतं!’

हे मात्र तुम्ही अगदी बरोबर बोललात. आपल्याकडून पार्टी घ्यायला नशीब लागतं!’

(२)  मुलगी झाली हो –

अंसाक्काच्या घरी आज सकाळपासून गडबड सुरू झाली होती. तिच्या सुनेचे दिवस भरत आले होते. आज सकाळपासून तिला कळा सुरू झाल्या होत्या. अंसाक्काने लगबगीने कडकडीत पाणी केले. सुनेला न्हाऊ घातले. सदाशिव बायकोला घेऊन दवाखान्यात गेला.

अंसाक्का घरातली कामं अवरता आवरता दवाखान्यातून येणार्‍या निरोपाची वाट पाहू लागली. तिला खात्री होती, ‘आपल्याला नातूच होणार. आपल्या घराण्याची रीतच हाय तशी. आपल्या सासूला पैला मुलगा झाला. तोच आपला नवरा. आपल्याला बी पैला सदाशिव झालेला. दिराचा सोमू पैला. सोमूचा समीर पैला. आपली मुलगी सुरेखाला पैला मुलगाच. सदाशिवाला बी पैला मुलगाच व्हनार. सुमाचं पोट बी पुढे हुतं. डव्हाळे कडक. सारखी थकल्यावानी मलूल असायची. समदी मुलाचीच लक्षणं की.’

बारा वाजता सदाशिव सांगत आला. ‘सुमी बाळंत झाली. बाळ-बाळंतीण खुशाल हायती. आई, तुला नात झाली.’

‘काय?’ तिच्यावर जसा निराशेचा डोंगर कोसळला. तिला नातू हवा होता. नात नव्हे. डॉक्टरांनी संध्याकाळचं घरी सोडलं. अंसाक्का फुरंगटून बसलेली. तिने ना भाकर तुकडा घेतला. ना नव्या जिवावरून ओवाळून टाकला. शेवटी शेजारणीने भाकर तुकडा घेतला. ओवाळून बाळ-बाळंतिणीला घरात घेतले. अंसाक्का तशीच रुसून बसलेली. ‘अशी कशी मुलगी झाली? पैला मुलगा व्हायाची आपल्या घराण्याची रीत हाय. नातूच हवाय आपल्याला. ही रांड कशी तडफडली मधेच!’ असेच काही-बाही विचार अंसाक्काच्या मनात येऊ लागले.

आसपासच्या आया-बाया बाळाला पाहायला आल्या.

‘आजी, बघा तरी किती गोड, देखणी हाय तुमची नात. ‘ कुणीसं म्हंटलं. अंसाक्काचं हूं नाही की चूं नाही. ती आपली रूसलेली. जागची हललीसुद्धा नाही. अशी कशी मुलगी झाली, याच विचारात गुंतलेली. एवढ्यात कमळाबाईचं बोलणं तिला ऐकू आलं,

‘अगदी आजीसारखी दिसतीय नाही?’

‘व्हय! अगदी दुसरी अंसाक्काच!’

अंसाक्काचं कुतूहल चाळवलं. ती सुनेच्या दिशेने बघू लागली. अग, जवळ ये बघ. कशी तुज्यावाणी दिसतेय. नाक, डोळं, फुगरे गाल समदं तुझंच!’ आता अंसाक्काला राहवेना. ती उठून बाळाजवळ गेली. अगदी अंसाक्कासारखंच रंगरूप. ‘लहानपणी आपण अशाच दिसत असणार.’ अंसाक्काला वाटलं. तिने नातीला उचललं. छातीशी धरलं आणि तिचे पटापट मुके घेऊ लागली.

☆ ☆ ☆ ☆ ☆

© सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एका सैनिकाच्या पत्नीची वटपौर्णिमा ! ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ एका सैनिकाच्या पत्नीची वटपौर्णिमा ! ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

(शहीद विक्रांत सबनीस यांच्या सुविद्य पत्नीने २-३ वर्षापूर्वी एका  Blog वर लिहिलेला भावूक लेख)

प्रिय विक्रांत,

कसा आहेस?

मी ठीक. 

सॉरी, काल लिहू शकले नाही. 

काल आपल्या पियुची शाळा सुरु झाली. मागच्या आठवड्यात जमलं नाही, म्हणून काल रात्री तिच्या वह्या पुस्तकांना कव्हर्स घालण्याचा ‘सोहळा’ पार पडला. 

‘सोहळा’च तो! कोऱ्या करकरीत पुस्तकांच्या सुवासाचं अत्तर शिंपडून पार पडणारा ! 

थोडक्यात…म्हणून काल लिहिणं जमलं नाही. 

आज वटपौर्णिमा होती. तू ‘गेल्या’ नंतरची पहिली…. 

काल लोकलच्या डब्यात कुणीतरी विषय काढला.

मी गप्पांमधून अंग काढत ट्रेनच्या खिडकीतून दिसणाऱ्या काळोखात बघत बसले. 

आपल्या लग्नापूर्वी तू सांगितलेला जोक आठवला – वटपौर्णिमेला बायका वडाजवळ काय मागतात ? – ‘वडा-पाव’ ! 

तुझ्या तोंडून प्रथम ऐकला तेव्हा केव्हढी हसले होते मी ! आठवतंय नं ?

आणखी एक प्रसंग आठवला. 

आपलं नुकतंच लग्न झालं होतं. माझ्या एकंदरीत ‘उत्साहावरून’ सासुबाईंनी माझं मन ओळखलं असावं. माझा हात धरून मला सोसायटीतल्या वडाजवळ घेऊन गेल्या. मला म्हणाल्या उद्या सकाळी आपल्याला इथे येऊन पूजा करायची आहे. मी म्हटलं ‘माझा विश्वास नाही’.

तर म्हणाल्या,’या निमित्ताने वडाला नमस्कार करायचा. इतकी वर्ष इथे उभा राहून तो आपल्याला सावली देतोय त्याबद्दल त्याचे आभार मानायचे.

परंपरेपेक्षा मला ही कृतज्ञतेची भावना जास्त भावली.

मी सासूबाईंबरोबर दर वर्षी पूजा करू लागले. 

आज सकाळी पुजेची थाळी घेऊन वडाजवळ गेले. सोबत सासूबाई होत्या. 

वडाजवळ उभी राहिले. बराच वेळ निःशब्द !

अचानक काय वाटलं माहित नाही –

भरल्या डोळ्यांनी आणि थरथरत्या हातांनी वडाला एक salute ठोकला !

Afterall, तू मेजर होतास, विक्रांत !

सासूबाई मला सावरायला म्हणून आल्या होत्या, पण आता त्यांचाच बांध फुटला. 

आधीच सोसायटीतल्या बायकांनी मी तिथे गेल्यामुळे भुवया उंचावल्या होत्या. 

आता तर मला ऐकू जाईल अशी कुजबुज सुरु झाली. 

‘हिला आणायचं का इथे ? सबनीस काकींना तरी कळायला हवं होतं!’

गर्दीतून कोणीतरी हळूच म्हणालं.

माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या त्या बायकांशी मला हुज्जत घालायची नव्हती, कारण मी काय करत होते याबद्दल मला विश्वास होता. 

विक्रांत, 

आपण या जन्मात भेटलो खरे –

पण तू ‘मला असा’ किती मिळालास? 

पुढचे सात जन्मच काय- सगळे जन्म तू मला हवा आहेस… 

हे, खरं तर, घरी बसून देखील मागता आलं असतं. 

पण का कोणास ठाऊक, मला वडाजवळ जावसं वाटलं. 

घरातल्या एखाद्या आजोबांसारखा असलेला तो वड माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेईल असं वाटलं.

त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं की परंपरा-रूढी, प्रतीकं तुम्ही माना किंवा मानू नका ,

पण तुमच्या एकूण ‘असण्याला’च या सगळ्या गोष्टी चिकटलेल्या असतात. 

तू असतास तर मला वेड्यात काढलं असतंस कारण तुझा या कशावर विश्वास नव्हता. 

पण एक सांगू ? विश्वास-अविश्वास या सगळ्याच्या पलीकडे एक प्रांत असतो.

मी त्याला ‘instinct’ म्हणते. 

भिकाऱ्याला कधीही भीक न देणारे आपण एखादवेळी पट्कन कुणालातरी भीक देऊन मोकळे का होतो, 

याला जसं लॉजिक नसतं तसंच काहीसं. 

अशावेळी आपण फक्त आपल्या ‘instinct’ ने दिलेली आज्ञा पाळत असतो. 

सोळा डिसेंबरच्या रात्री बॉर्डरवर शत्रूशी चकमक झाली. फारशी कुमक जवळ नसताना तू कोणाच्या आज्ञेने लढलास आणि शहीद झालास? 

Vikrant, you just followed your instinct!

वटपौर्णिमेला मला वडाजवळ पूजा करताना पाहून शेरे मारणाऱ्या समाजाबद्दल मला राग नाही, पण गंमत वाटते. 

सो कॉल्ड प्रगतीच्या नावाखाली स्त्रियांच्या हातात सिगरेट आणि दारूचा ग्लास खपवून घेणारा समाज विधवा स्त्रीचा वड पुजण्याचा हक्क नाकारतो. 

आपल्या मुलीबाळी गणेशोत्सवात ‘शीला की जवानी’ म्हणत नाचलेल्या चालतात, पण पिरियड्स चालू असलेल्या स्त्रीला देवघरात यायचा मज्जाव असतो ! 

हा paradox मला मान्य करावा लागतो

तुम्ही ढीग शिका, पदव्या मिळवा, जग जिंका –

माझ्यासारख्या एकट्या बाईला समाजात राहायचं असेल तर जगण्यातल्या या विसंगतीला पर्याय नाही. 

आर्मीत गेल्यानंतर तू आम्हा सिविलीयन्सना नेहमी नावं ठेवायचास. ‘तुम्हाला जगण्याची शिस्त नाही’ म्हणायचास.

नसेल आम्हाला शिस्त. पण इथेही कुठलीही गोष्ट लढूनच मिळवावी लागते.

मी ही रोज लढते….

भ्रष्टाचाराने पोखरलेल्या देशाचं रक्षण करण्यासाठी. माझ्या नवऱ्याने रक्त सांडलं या जाणीवेसह जगत राहण्याबद्दल कुठलं शौर्यचक्र मिळणार नाही हे माहित असून लढते.

पियु, सासूबाई आणि बाबांसमोर कणखर राहण्याचा जो मी ‘अभिनय’ करते त्याबद्दल कुठलंही award मिळणार नाही हे माहित असून लढते. 

आपल्या पियुच्या न संपणाऱ्या प्रश्नांना न कंटाळता उत्तरं देण्याबद्दल कुणी पाठ थोपटणार नाही हे माहित असून लढते.

I am a soldier, I fight where I am told, and I win where I fight!

तूच म्हणायचास ना? 

थांबते. पियुला गोष्ट सांगायची वेळ झाली. 

उद्या भेटू. 

बाय!

लेखिका : (शहीद विक्रांत सबनीस यांच्या सुविद्य पत्नीने २-३ वर्षापूर्वी एका  blog वर लिहिलेला भावूक लेख) 

संग्राहिका आणि प्रस्तुती –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माझ्याकडे देव माझा पाहतो आहे… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? इंद्रधनुष्य ?

माझ्याकडे देव माझा पाहतो आहे… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

एके दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तेव्हा पाहिले कि एक आकर्षक बांद्याची व्यक्ती सस्मित समोर उभी होती. मी म्हटले, बोला! काय काम आहे?

ते म्हणाले, ठीक आहे भाऊ, तुम्ही रोज माझ्यासमोर प्रार्थना करत होता म्हणून म्हटले आज भेटूनच घेऊ. 

मी म्हटले, “माफ करा मी तुम्हाला ओळखले नाही.”

तेव्हा ते म्हणाले, “बंधू! मी भगवान आहे. तू रोज प्रार्थना करत होतास, म्हणून मी आज पूर्ण दिवस तुझ्या बरोबर राहणार आहे.”

मी चिडत म्हटलं, “ही काय मस्करी आहे?”  “ओह ही मस्करी नाही सत्य आहे. फक्त तूच मला पाहू शकतोस.  तुझ्या शिवाय मला कुणीही पाहू किंवा ऐकू शकणार नाही!

काही बोलणार इतक्यात मागून आई आली. एकटा काय उभा आहेस, इथं काय करतोस? चल आत, चहा तयार आहे आत येऊन चहा पी. आई ला काही तो दिसला नाही.

आईच्या या बोलण्या मुळे आता या आगंतुकच्या बोलण्यावर थोडा विश्वास होऊ लागला. माझ्या मनात थोडी भीती होती. चहाचा पहिला घोट घेतल्या बरोबर मी रागाने ओरडलो. 

अग आई, चहा मध्ये इतकी साखर रोज रोज का घालतेस? एवढे बोलल्या नंतर मनात विचार आला कि, जर  आगंतुक खरोखर भगवान असेल तर त्याला आई वर रागावलेलं आवडणार नाही. मी मनाला शांत केले आणि समजावले कि, अरे बाबा, आज तू नजरेत आहेस. थोडे लक्ष दे… 

“बस् मी जिथं असेंन, प्रत्येक ठिकाणी ते माझ्या आले… थोड्या वेळाने मी आंघोळीसाठी निघालो, तर ते सुद्धा, माझ्या पुढे…..

मी म्हटले ” प्रभू , इथे तरी एकट्याला जाऊदे.”

आंघोळ करून, तयार होऊन मी देव पूजेला बसलो. पहिल्यांदा मी परमेश्वराची मना पासून प्रार्थना केली. कारण आज मला, माझा प्रामाणिक पणा सिद्ध करायचा होता. 

ऑफसला जाण्यास निघालो. प्रवासात एक फोन आला. फोन उचलणार, इतक्यात आठवले, आज माझ्यावर प्रभू ची नजर आहे, गाडी बाजूला थांबवली. फोन वर बोललो आणि बोलत असताना, म्हणणार होतो की, या कामाचे पैसे लागतील, पण का कोण जाणे, तसे न बोलता म्हटले तू ये! तुझे काम होईल आज”

ऑफिस मध्ये पोचल्यावर मी माझे काम करत राहिलो. स्टाफ वर रागावलो नाही किंवा कुठल्याही कर्मचऱ्या बरोबर वादविवाद केला नाही. रोज माझ्या कडून विना कारण अपशब्द बोलले जायचे.  पण त्या दिवशी तसे काहीं न बोलता काही हरकत नाही, ठीक आहे, होऊन जाईल काम, असे म्हणत सहज पणे सर्व कामे केली.

आयुष्यातील हा पहिला दिवस होता. ज्या दिवशी माझया दिनचर्येत राग, लोभ, अभिमान, दृष्टता, अपशब्द, अप्रमाणिकपणा, खोटेपणा कुठे ही नव्हता.

संध्याकाळी ऑफिस मधून निघून घरी जायला निघालो. कार मध्ये बसलो आणि बाजूला बसलेल्या प्रभूंना म्हणालो,

“भगवान, सीटबेल्ट बांधा. तुम्ही पण नियमांचे पालन करा.” प्रभू हसले. माझ्या आणि त्यांच्या चेऱ्यावर समाधान होते. 

घरी पोचलो. 

रात्रीच्या भोजनाची तयारी झाली. मी जेवायला बसलो. प्रभू! प्रथम तुम्ही घास घ्या. मी असे बोलून गेलो. त्यांनीही हसून घास घेतला. 

जेवण झाल्यानंतर आई म्हणाली,” आज पहिल्यांदा तू जेवणाला नावे न ठेवता, काही दोष न काढता जेवलास! काय झाले? आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय?

मी म्हटले, “आई, आज माझ्या मनात सूर्योदय झाला आहे. रोज मी फक्त अन्नच खात होतो. आज प्रसाद घेतला.  माता आणि प्रसादात कधी काही उणीव नसते!”

थोडा वेळ शतपावली केल्यानंतर, मी माझ्या खोलीत गेलो आणि निश्चिन्त व शांत मनाने उशीवर डोके टेकवले… झोपी जाण्यासाठी… प्रभू नि माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, म्हणाले,”आज तुला झोप येण्यासाठी, संगीत किंवा औषध किंवा पुस्तकाची गरज भासणार नाही.”  

खरोखर, मला गाढ झोप लागली.

ज्या दिवशी आपणास कळेल की,  ‘तो’ पहात आहे, आपल्या हातून सर्व काही चांगले घडेल.

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ लग्नविधीमध्ये दडलंय काय? ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ लग्नविधीमध्ये दडलंय काय? ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?

१) लग्नात मांडव कशासाठी ???

= मातेनं माझ्या मुलीचं मनही मांडवासारखं मोठं आहे, हे सांगण्यासाठी !!!

२) विहिणबाईला आणि नवरदेवाला स्वागतास पायघड्या कशासाठी?

= माझ्या मुलीला तुम्ही असचं अलगद सांभाळा, हे सांगण्यासाठी !

३) नवरदेवाची कानपिळी वधूच्या भावानेचं पिळायची,हे कशासाठी?

=माझ्या बहिणीला तुमच्या जीवनात नीट आणि चांगलं वागवा, हे सांगण्यासाठी !

४) मुलीच्या मागं मामाच उभा राहतो,हे कशासाठी?

= मुलीला सांगण्यासाठी की मी तुझ्या आईच्या पाठीशी भक्कम उभा आहे, हे सांगण्यासाठी !

५) लग्नात वधु-वरांनी एकमेकास घास द्यायचा,हे कशासाठी?

= प्रेमाचं हे प्रतिक आहे। तुझ्या- माझ्यात काही अंतर राहिलेलं नाही, राहणार नाही व राहू नये हे सांगण्यासाठी !

६) लग्नात सप्तपदी माहीत आहे का कशासाठी???

= तुमच्या सुख-दु:खात मी आता सोबत आहे. सात पावलं ही केवळ मर्यादा आहे, हे सांगण्यासाठी !

७) लग्नात तांदळाची अक्षता उधळण कशासाठी?

= तांदळाची अक्षता याच्या साठी की तांदळाचे बीज लावताना आपण एका जागी लावतो.ते थोडे मोठे झाले की मग त्याची लावणी वेगळ्या जागी करतो. तसेच मुलींचे बालपण माहेरी असते, त्या जिथे मोठ्या होतात तिथून त्यांना दुसऱ्या जागी जावे लागते. तिथेच त्यांचा वंश वाढतो, याची आठवण रहावी म्हणून लग्नात तांदळाच्या अक्षता टाकतात *

पण हे शास्त्र बऱ्याच लोकांना माहीत नाही.

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार #202 ☆ कथा-कहानी – ‘दरवाज़ा’ ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कथा ‘दरवाज़ा’। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 202 ☆

☆ कथा-कहानी ☆ ‘दरवाज़ा’

देवेन्द्र जी पत्नी के साथ ससुराल के गाँव के मोड़ पर बस से उतर गये। यात्रा से शरीर हिल गया था। सामने कच्ची सड़क पेड़ों और खेतों के बीच लहराती हुई दूर तक चली गई थी। अब सूटकेस उठाये एक किलोमीटर कौन जाए? पत्नी के लिए वैसे भी घुटनों के दर्द के कारण चलना मुहाल था।

सन्देश दो दिन पहले आया था। एक रिश्तेदार ने सूचना दी थी कि देवेन्द्र जी के एकमात्र साले और तीन बहनों के एकमात्र बड़े भाई सुखपाल दादा अचानक चल बसे थे। देवेन्द्र जी की पत्नी गीता को खासा आघात लगा क्योंकि बहनों में सबसे बड़ी होने के कारण उसका मायके से लगाव ज़्यादा था और उसमें ज़िम्मेदारी-बोध भी कुछ ज़्यादा था।

दूसरी बात यह कि सुखपाल दादा को कोई तकलीफ नहीं थी। अभी डेढ़ माह पहले वे गीता के घर आये थे। तब उनके पैर में पट्टी ज़रूर बँधी थी। बताया कि घाव हो गया है जो दो-तीन महीने गुज़र जाने के बाद भी ठीक नहीं हो रहा है। देवेन्द्र जी ने सलाह दी थी कि मामले को गंभीरता से लिया जाए और ब्लड-शुगर की जाँच करा ली जाए, लेकिन आम देहातियों की तरह सुखपाल दादा ने बात को हँसी में उड़ा दिया था। देवेन्द्र जी ने भी फिर जाँच के लिए ज़ोर नहीं दिया। अब ज़रूर उन्हें थोड़ा अपराध-बोध हुआ कि जाँच करा देते तो शायद कुछ पता लग जाता, लेकिन इस विचार को उन्होंने ज़्यादा टिकने नहीं दिया।

मृत्यु का संदेश मिलने के बाद ससुराल पहुँचने में देवेन्द्र जी को दो दिन लग गये थे क्योंकि शहर में घर छोड़कर अचानक चल पड़ना नहीं हो सकता। घर की सुरक्षा का इंतज़ाम करना पड़ता है। एक बेटा बाहर है। दूसरा बेटा और बेटी कॉलेज में पढ़ते हैं। पड़ोसियों पर ज़्यादा निर्भर नहीं रहा जा सकता। अंततः सारी मुसीबत खुद ही झेलनी पड़ती है। देवेन्द्र जी को झुँझलाहट भी लगी कि अचानक यह झंझट कहाँ से आ गयी।

सुखपाल दादा की स्थिति कभी अच्छी हुआ करती थी। पिता की छोड़ी काफी ज़मीन थी और गाँव में खासा रौब और रसूख था। लेकिन आय का दूसरा साधन न होने के कारण बहनों की शादी में काफी ज़मीन निकल गयी और सुखपाल दादा के पास इतनी ही बची कि साल भर छाती मारने के बाद किसी तरह गुज़र-बसर हो सके। इकलौते पुत्र होने और शिक्षा की कमी के कारण वे कहीं बाहर भी नहीं निकल सके। कुछ दिन बाद वे समझ गये कि वे ऐसे दुष्चक्र में फँस गये हैं जिस से बाहर निकलना मुश्किल था। गाँव का वातावरण, अशिक्षा और फिर खेती में चौबीस घंटे की ड्यूटी— विपत्ति का सारा इंतज़ाम था। इतनी आमदनी नहीं थी कि बच्चों को बाहर भेजकर शहर वालों जैसा सक्षम बनाया जा सके।

सुखपाल दादा की चार संतानें थीं— दो बेटे और दो बेटियाँ। बड़े बेटे और बड़ी बेटी की शादी हो गयी थी। बड़ा बेटा खेती में ही रेत में से तेल निकालने में लगा था। छोटा किसी प्रकार परीक्षाओं में प्राइवेट बैठकर पढ़ाई की खानापूरी कर रहा था। उसे बार-बार पूरक परीक्षाओं में बैठना पड़ता था। छोटी बेटी बारहवीं तक पढ़ कर घर में बैठ गयी थी।

बड़ी बेटी की शादी सुखपाल दादा ने किसी प्रकार गिरते-मरते निपटायी। हालत यह हुई कि पलंग तो आया लेकिन गद्दा गायब। बैंड पास के गाँव का। बजाने वालों की ड्रेस और हाथ-पाँव गन्दे, केश और दाढ़ी बढ़ी। बाकी इंतज़ाम भी बेतरतीब। वर पक्ष के लोग भले थे, सो लड़की को लेकर बिना हल्ला-गुल्ला किये चले गये। लेकिन सुखपाल दादा के दोनों छोटे बहनोइयों का मुँह बहुत दिन तक फूला रहा। उन्हें लगा कि इस ‘लो स्टैंडर्ड’ शादी से उनकी शान में बट्टा लग गया। उनकी देखा-देखी उनकी पत्नियाँ भी बहुत दिन तक भाई से भकुरी रहीं।

ऐसा नहीं था कि सुखपाल दादा ने अपने दुष्चक्र से निकलने के लिए हाथ-पाँव न मारे हों। उन्होंने बहनों से अनुरोध किया था कि उनके बच्चों को अपने पास रख लें ताकि वे भी शहरी भाषा में ‘आदमी’ बन जाएँ। उन्होंने आश्वासन दिया था कि उन पर होने वाले खर्चे की भरपाई वे करेंगे, लेकिन तीनों बहनोइयों ने उनके अनुरोध को सिरे से खारिज कर दिया। बड़ी बहन गीता के मन में भाई के बच्चों के लिए करुणा थी, लेकिन देवेन्द्र जी ने घुटना अड़ा दिया। तर्जनी उठाकर कहा, ‘बिलकुल नहीं। दूसरे के बच्चों को रखने से अपने बच्चों पर होने वाले खर्चों में हमें क्या कटौती करनी पड़ेगी, यह हम अभी नहीं समझ पाएँगे। यह सेंटीमेंट की बात नहीं है। दूसरे बच्चे हमारे फैमिली सेट-अप पर क्या असर डालेंगे आपको अभी से क्या पता। बाद में आप दूसरे के बच्चे को भगा तो नहीं सकते।’

मँझली बहन कविता के साथ दूसरी समस्या थी। उसकी ससुराल वाले अपेक्षाकृत संपन्न थे, इसलिए वह सारे समय अपने मायके की दरिद्रता छिपाने और अपनी इज़्ज़त बचाने में लगी रहती थी। मायके से किसी के आने की खबर मिलते ही वह हिदायतों की फेहरिस्त भेज देती थी। उसके घर पहुँचने पर मायके के सदस्य और उसके सामान का बाकायदा मुआयना होता था और जो भी कोर-कसर हो उसे तत्काल दुरुस्त करने का निर्देश दिया जाता था। इसीलिए मायके के लोग उसके घर तभी जाते थे जब निकल भागने के सभी रास्ते बन्द हो जाएँ।

तीसरी बहन रेखा के साथ मनोवैज्ञानिक समस्या थी। सामान्य घर से शहर की चकाचौंध में आने के बाद उसे चीज़ों को इकट्ठा करने का ज़बरदस्त शौक लग गया था। उसके पतिदेव भी वैसी ही तबियत के थे। ग़ैरज़रूरी चीज़ें इकट्ठी करते-करते उनका घर कबाड़खाना बन गया था। वहाँ आदमी के अँटने की गुंजाइश कम रह गयी थी। किसी चीज़ के ज़रा भी इधर-उधर होने पर पति-पत्नी का पारा चढ़ जाता था। बच्चों को चीज़ें शत्रु लगने लगी थीं। ऐसे घर में और बच्चों के लिए कोई गुंजाइश नहीं थी।

बहनोइयों के इस रुख़ के कारण सुखपाल दादा के अपने बच्चों की तरक्की के मंसूबे भ्रूणावस्था में ही दम तोड़ गये और उनके बेटे धरतीपुत्र ही बने रह गये। एक बार अपनी मजबूरी उघाड़ने के बाद सुखपाल दादा ने स्थितियों से समझौता कर लिया और बहनों के सामने दुखड़ा रोना बन्द कर दिया।

अब गाँव की ओर बढ़ते हुए वे सब बातें  याद कर के गीता को दुख हो रहा था। शायद बच्चों के जीवन का संतोषप्रद न होना ही दादा की अचानक मृत्यु का कारण बना हो। गाँव की वही सड़क जो कभी उस के मन को हुलास से भर देती थी अब उसे व्यथित कर रही थी। सूटकेस उन्होंने मोड़ की चाय की दूकान में छोड़ दिया। बता दिया कि बड़ा भतीजा हरपाल या छोटा श्रीपाल आकर ले जाएगा।

धीरे धीरे चलते हुए वे आधे घंटे में सुखपाल दादा के घर पहुँच गये। खपरैल के छप्पर वाला लंबा सा घर था। सामने कच्चे चबूतरे के बीच में बड़ा सा नीम का पेड़। एक तरफ चरई पर पाँच छः मवेशी खड़े थे। हरपाल बाहर ही मिल गया। पच्चीस छब्बीस साल का होगा। लंबा और स्वस्थ। घुटा हुआ सिर और छोटी सी चोटी। गीता उससे लिपट कर रोने लगी। हरपाल आँखें पोंछता चुप खड़ा रहा।

भीतर घुसते ही भाभी, छोटे भतीजे और दोनों भतीजियों से भेंट हुई। थोड़ी देर को कोहराम मचा, फिर सब संयत हुए। पता चला सुखपाल दादा घर के बाहर काम करते अचानक ही मूर्छित हो गये थे। ट्रैक्टर पर दूसरे गाँव ले जाकर डॉक्टर को दिखाया तो मालूम हुआ कुछ शेष नहीं है। बीमारी का पता नहीं चला। जहाँ जाँच-पड़ताल और इलाज की सुविधाएँ न हों वहाँ बीमारी का कारण जानना संभव भी नहीं होता। ऐसी स्थिति में दुर्घटना को होनी मानकर स्वीकार कर लेने के अलावा कोई उपाय नहीं होता।

मृत्यु का आक्रमण घर पर असर डालता है। हँसी-खुशी से भरा घर कुछ वक्त के लिए मनहूस बन जाता है। शाम होने पर यह मनहूसियत और गाढ़ी हो गयी। घर में बिजली थी, लेकिन उसके आने जाने का कोई ठिकाना नहीं था। चौबीस घंटे में छः सात घंटे ही बिजली मेहरबान रहती।

दूसरे दिन दोनों शेष बहनें अपने पतियों के साथ आ गयीं तो देवेन्द्र जी को कुछ राहत मिली। सुखपाल दादा के जाने के बाद घर में कोई ऐसा बचा नहीं था जिससे इत्मीनान से कुछ बात की जा सके। साढ़ुओं के आने से बातचीत का ज़रिया बन गया और मनहूसी कुछ कम हुई।

घर में अतिथियों के सत्कार में कोई कसर नहीं थी। गरम पानी, दो तीन बार चाय और सुविधानुसार भोजन। भतीजे, भतीजियाँ सेवा में हाज़िर थे। देवेन्द्र जी ने सुखपाल दादा के पीछे पड़कर कुछ समय पहले एक फ्लश वाला टायलेट बनवा लिया था, लेकिन उसके ऊपर छप्पर इतना नीचा था कि खड़े होते वक्त सिर पर ठोका खाने की पूरी संभावना बनी रहती थी।

सारी सुविधाओं के बावजूद बिजली की अनुपस्थिति से खासी परेशानी थी। ए.सी. और कूलर के आदी शहरवासियों के लिए यह बड़ा संत्रास था। बहनोइयों का सारा वक्त करवटें बदलते और बाँस का पंखा झलते गुज़रता था। रात को ज़रूर बाहर चबूतरे पर नीम के नीचे सुकून मिलता था।

दोनों छोटी बहनों के पति एक दिन रुक कर उन्हें छोड़ कर चले गये थे। तेरहीं पर आकर ले जाएँगे। देवेन्द्र जी रुके रहे क्योंकि वे नौकरी से रिटायर हो चुके थे। दूसरे, पत्नी को ले जाने के लिए दुबारा कष्टप्रद यात्रा करने की ज़हमत वे उठाना नहीं चाहते थे।

दस ग्यारह दिन देवेन्द्र जी और तीनों बहनें वहाँ बनी रहीं। तीनों बहनें अपनी भाभी के पास बैठकर उनके मन को कुरेदने की कोशिश करतीं, उनकी परेशानियों, समस्याओं को जानने की कोशिश करतीं। खास तौर से गीता उनके मन तक पहुँचने की कोशिश करती। लेकिन घर के सदस्य उनके सामने कोई लाचारी प्रकट नहीं करना चाहते थे। बात चलते चलते जहाँ आर्थिक परेशानी पर पहुँचती, भाभी और उनके बच्चे बात को दूसरी तरफ मोड़ देते। लगता था जैसे कोई कपाट है जो तीनों बहनों के सामने आ जाता है। उसके पार उनका प्रवेश निषिध्द है। गीता दुखी हो जाती कि भाभी अपने दुख में उसे सहभागी नहीं बनाती। ज़्यादा दबाव पड़ने पर भाभी बात को ख़त्म करने के लिए कह देती, ‘हरपाल सयाने हो गये हैं। सब सँभाल लेंगे। चिन्ता करने से क्या होगा?’

भाभी से अनुकूल उत्तर न मिलने पर गीता हरपाल से टोह लेने की कोशिश करती। कुछ पता चले कि पैसे-टके का क्या इंतज़ाम है। ज़्यादा परेशानी तो नहीं है। लेकिन वहाँ से भी वही उत्तर मिलता— ‘सब ठीक है बुआजी। कोई परेशानी नहीं है।’

रोज़ के खर्च की बात माँ-बेटे के बीच ही दबे स्वर में हो जाती। किसी दूसरे को भनक न लगती कि स्थिति क्या है।

लाचार गीता ने दस हज़ार रुपये ज़बरदस्ती भाभी के पास रख दिये। कहा, ‘रखे रहो। न लगे तो वापस कर देना। ज़रूरत पड़े तो खर्च कर लेना।’

तेरहीं ठीक-ठाक हो गयी। सब धार्मिक कृत्य ठीक से निपट गये। फिर भोज में सब रिश्तेदार-व्यवहारी जुट आये। दोनों बहनोई तेरहीं पर फिर हाज़िर हो गये थे। खूब चहल-पहल हो गयी। दोपहर से शुरू हुआ भोजन का सिलसिला रात तक चलता रहा।

अब रुकने का कोई काम नहीं था। दूसरे दिन बहनोइयों ने रवानगी की तैयारी की। एक बार फिर बहनें दिवंगत भाई को याद करके रोयीं। भाई के जाने से मायके की सूरत बदल गयी थी। अब मायके से संबंध क्षीण ही होने हैं।

दोनों भाई हरपाल और श्रीपाल उन्हें छोड़ने रोड तक आये। बस के इंतज़ार के बीच में हरपाल ने एक पैकेट बड़ी बुआ को पकड़ा दिया, कहा, ‘अम्माँ ने आपके पैसे भेजे हैं। कहा खर्च करने की जरूरत नहीं पड़ी।’

गीता को दुख हुआ, कहा, ‘इतना तो खर्च हुआ। रखे रहतीं तो क्या बिगड़ जाता? कहीं तो काम आते।’

हरपाल ने जवाब दिया, ‘बिना जरूरत रख कर क्या करते? इंतजाम हो गया था। आप लोग आ गये यही बहुत है।’

इतने में बस आ गयी और मेहमान उसमें सवार हो गये। बस के रवाना होते  ही मायके के दृश्य और भतीजों के चेहरे दूर होने लगे और कुछ क्षणों में सब धुँधला कर आँख से ओझल हो गया।

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 201 – ऋणानुबंध ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली कड़ी। ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)

☆ संजय उवाच # 201 ऋणानुबंध ?

प्रातः भ्रमण से लौट रहा हूँ। देखता हूँ कि एक दुकानदार अपनी दुकान के सामने कौओं को चुग्गा दे रहा है। चुग्गे के लिए कौओं की भीड़ लगी हुई है। कौए निरंतर काँव-काँव कर रहे हैं। सड़क पर एकत्रित कौओं की तरफ कुछ चुग्गा उसने फेंक दिया है। वे एक दाना उठाते हैं, फिर अपनी बड़ी-सी चोंच खोलकर काँव-काँव करने लगते हैं।

दुकानदार का मुँहलगा एक कौआ दुकान के बाहर लगे खंभे पर लटका हुआ है। उसकी और दुकानदार की केमिस्ट्री भी खूब है। खंभे पर लटककर वह नीचे की ओर मुँह कर दुकानदार को देखता है और कहता है, ‘काँव।’ दुकानदार निशाना साधकर चुग्गा उसकी और उछालता है, कौवा हवा में ही उसे मुँह में लपक लेता है। वर्तमान में जब मनुष्य का प्रकृति के अधिकांश जीवों के साथ संघर्ष का नाता है, ऐसा कोई दृश्य अनन्य ही कहलाएगा।

सत्य तो यह है कि मनुष्य और प्रकृति के अन्य सभी घटक सहजीवी हैं। हमारी कठिनाई यह है कि हमने सहजीवी होने का भाव छोड़ दिया है। ईश्वर ने मनुष्य को बुद्धि का मुकुट दिया है। बुद्धि का मुकुट देने का अर्थ है कि उसे प्रकृति का साम्राज्य दिया है। सम्राट बुद्धिमान हो, शौर्यवान हो, यह तो अपेक्षित है लेकिन साथ ही सम्राट के मन में अपनी प्रजा के लिए करुणा का सागर भी होना चाहिए।

हमारा मत है कि यदि केवल भारत का हर एक नागरिक किसी एक पक्षी या प्राणी का पेट पालने की ज़िम्मेदारी ले ले तो कम से कम डेढ़ सौ करोड़ प्राणियों को तो जीवनदान मिल ही सकेगा। हर कोई यह कर सकता है क्योंकि ग़रीब से ग़रीब को भी एक चिड़िया का पेट भरने जितनी अमीरी तो ईश्वर ने दी ही है।

पक्षियों-प्राणियों को भोजन उपलब्ध कराने की भावना पर अनेक बार प्रश्न उठाया जाता है कि ऐसा करके उनकी भोजन जुटाने की प्राकृतिक क्षमता को नष्ट नहीं करना चाहिए। मनुष्य भी एक समय पैदल ही चला करता था। फिर पशुओं पर सवारी करते हुए हवाई जहाज़ और अंतरिक्ष यान तक आ पहुँचा। आदिमानव संभवत: भोजन संग्रह करना भी न जानता हो। आज के मनुष्य के पास कई सालों के लिए अनाज संग्रहित है। कहने का तात्पर्य है कि परिवर्तन संसार का एकमात्र नियम है जो कभी परिवर्तित नहीं होता। मनुष्य द्वारा प्रकृति के निरंतर दोहन के चलते सहज जीवन से विस्थापित होते सभी घटकों के प्रति मनुष्य का ऋणानुबंध है। मनुष्य का कर्तव्य है कि वह इन घटकों का पोषण करे।

श्रीमद्भागवत कहता है,

खं वायुमग्निं सलिलं महीं च ज्योतींषि सत्त्वानि दिशो द्रुमादीन्।
सरित्समुद्रांश्च हरेः शरीरं यत्किंच भूतं प्रणमेदनन्यः॥

(11/2/41)

अर्थात आकाश, वायु, अग्नि, जल, पृथ्वी, नक्षत्र, प्राणी, दिशाएँ, वृक्ष-वनस्पति, नदियाँ, समुद्र आदि जो कुछ भूत सृष्टि है, वह सब हरिरूप है, ईश्वर का विराट स्वरूप है। यह समझकर ( भक्त) प्रेमभाव से इन्हें प्रणाम करते हैं।

श्रावण चल रहा है। एक पौधा लगाएँ, एक प्राणी का पेट भरने का ज़िम्मा उठाएँ। एक समय था, जब हमारे घरों में पहली रोटी गाय के लिए और अंतिम श्वान के लिए बनती थी। हमारे पूर्वजों ने अपने दायित्व का निर्वहन प्रामाणिकता से किया था। उनके कारण हमें हरी-भरी और भरी-पूरी प्रकृति मिली थी। अब हमारी बारी है कि हम आनेवाली पीढ़ी को हरा संसार दें।

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ महादेव साधना- यह साधना मंगलवार दि. 4 जुलाई आरम्भ होकर रक्षाबंधन तदनुसार बुधवार 30 अगस्त तक चलेगी 🕉️

💥 इस साधना में इस बार इस मंत्र का जप करना है – 🕉️ ॐ नमः शिवाय 🕉️ साथ ही गोस्वामी तुलसीदास रचित रुद्राष्टकम् का पाठ  🕉️💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
image_print

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Anonymous litterateur of Social Media # 149 ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

? Anonymous Litterateur of Social Media # 149 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 149) ?

Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc. Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi.  He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper.  The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.

हिंदी साहित्य – आलेख ☆ अंतर्राष्ट्रीय हिंदी सम्मेलन ☆ कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम्

In his naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Award and C-in-C Commendation.

Captain Pravin Raghuvanshi is also an IIM Ahmedabad alumnus. His latest quest involves social media, which is filled with rich anonymous literature of nameless writers, shared on different platforms, like, WhatsApp / Facebook / Twitter / Your quotes / Instagram etc. in Hindi and Urdu, he has taken the mantle of translating them as a mission for the enjoyment of the global readers. Enjoy some of the Urdu poetry couplets as translated by him.

हम ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए आदरणीय कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी के “कविता पाठ” का लिंक साझा कर रहे हैं। कृपया आत्मसात करें।

फेसबुक पेज लिंक  >>कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी का “कविता पाठ” 

? English translation of Urdu poetry couplets of Anonymous litterateur of Social Media # 149 ?

☆☆☆☆☆

Obsession… ☆

☆☆

वही जिद वही हसरत,

न दर्दे दिल की कमी हुई…

अजीब है मुहब्बत हमारी

न मिल सके न खत्म हुई…!

☆☆

Same madness, same desire

No lessening of pain in heart…

Strange is our love, neither could

we meet, nor did our love finish…!

☆☆☆☆☆

 ☆ Attitude… ☆

☆☆

हमने तो फ़क़त आईना

ही दिखाया था उन्हें…

वो तो हमें सख़्त तेवर

ही दिखने लगे…!

☆☆

I had just shown

them the mirror…

They started showing

me their attitude…!

☆☆☆☆☆

 ☆ Someone… ☆

☆☆

न थाम सके हाथ

न पकड़ सके दमन,

बड़े क़रीब से उठकर

यूंही चला गया कोई…

☆☆

Couldn’t just clasp the hands

couldn’t even gras the stole

Someone just got up from

so close and went away…!

☆☆☆☆☆

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

image_print

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ The Grey Lights# 08 – “Immortal…” ☆ Shri Ashish Mulay ☆

Shri Ashish Mulay

? The Grey Lights# 08 ?

☆ – “Immortal…” – ☆ Shri Ashish Mulay 

If you can stand up

on the first ray of sun

when you are destroyed

on the last ray of light

 

If you can stand up

as a flowering tree

when you are knocked

down by the flowers

 

If you can gather up

all your courage

blown away by the

harsh winds of reality

 

If you can find

the will to move on

when you see

no road to go on

 

If you can manage

to live on the ground

when your body

is rotting deep underground.

 

Then you will become

one with the many

and be blessed…

blessed with ‘Immortality’.

 

© Shri Ashish Mulay

Sangli 

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

image_print

Please share your Post !

Shares