मराठी साहित्य – विविधा ☆ दिपज्योती नमोस्तुते ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

दिपज्योती नमोस्तुते ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

दीप हे अग्नीचे व तेजाचे प्रतिक आहे तर ज्योती हे ज्ञानाचे व बुद्धीचे प्रतिक आहे. मानवी  जीवनात दिव्याला फार महत्व आहे. कारण दिवसा तळपणारा सूर्य असतो पण रात्री अंधार नष्ट करण्यासाठी मानव निर्मित दिव्याची गरज असते.

पूर्वी प्रकाशासाठी व कुठेही नेण्याला सोपे असे कंदील, चिमणी वापरली जायची. देवळात काचेच्या हंड्यातील दिवे असायचे तर बाहेर दीपमाळ असते आणि गाभाऱ्यात नंदादीप अखंड तेवणारा!श्रीमंतांच्या दिवाणखान्यात हंड्या, झुंबरे असत. त्यांचा वापर मेणबत्या लावून व्हायचा. समूहासाठी आधी मशाली मग बत्त्या, नंतर पेट्रोमॅक्स चे दिवे आले. कंदील कालबाह्य झाले तसं घरोघरी विजेवर चालणारे दिवे आले. त्यांच्या अनिश्चिततेमुळे emergency दिवे, मेणबत्या आल्या. आता तर सोलर दिवे वापरात आले आहेत.पूर्वी सजावटीसाठी आधी तेलाच्या पणत्या, मग मेणाच्या पणत्या, अलिकडे विविध प्रकारच्या, विविध रंगांच्या, विविध आकारातल्या लाईट च्या, LED च्या माळा असतात.

अर्थात दिव्यांचे प्रकार, नमुने, त्यांचं सौंदर्य यात विविधता असली तरी त्यांची गरज बदलली नाही व आपली संस्कृतीही बदलली नाही.आजही तिन्हीसांजेला ‘दीपज्योती नमोस्तुते ‘ म्हणत देवघरात समई लावली जाते, तुळशीसमोर दिवा ठेवला जातो. कांहीही म्हणा पण तेल, तूप यात तेवणारी मंद ज्योत जी प्रसन्नता, मंगलता, सात्विकता, शुभकारकता यांची अनुभूती देते ती दुसरी कोणतीही ज्योत देऊ शकत नाही.आपण नकळत तिच्यासमोर नतमस्तक होतो.

आपल्या संस्कृतीत दीप प्रज्वलनाला फार महत्व आहे. दिवा तमनाशक असल्याने तो प्रकाशाची आस जागवणारा, ऊर्जा देणारा, शुभकारक!म्हणून कोणत्याही कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलनाने करतात. कोणतीही पूजा पूर्ण होईपर्यंत तेलाचा व तुपाचा दिवा तेवत ठेवलेला असतो. षोडशोपचारे पूजा करताना शंख, घंटा, कलश याबरोबर दिव्याची ही पूजा करतात. नवरात्रासारख्या कुळाचाराच्या वेळी किंवा अनुष्ठानाच्यावेळी अखंड दीप, नंदादीप ठेवला जातो. आषाढ अमावस्या दिव्याची अवस म्हणून साजरी केली जाते. दीपावली सारखा दिव्याचा सण साजरा करतो. दीप- आवली, म्हणजे दिव्यांची ओळ! कार्तिक पौर्णिमेला पाण्यात दिवे सोडले जातात.

तसं पाहिलं तर हिंदू संस्कृतीत अग्निलाच खूप महत्व आहे. तो अग्नेय दिशेचा रक्षक असून पंचमहाभूतांपैकी एक आहे. इंद्राखालोखाल महत्वाचा देव अग्नि आहे. हिंदू संस्कारात नामकरणापासून मृत्यूपर्यंत सगळे संस्कार अग्निच्या साक्षीने होतात. फक्त नामकरणादिवशी होम नसतो पण तेलाचे दिवे लावले जातात. अग्नि ही उर्जा असल्याने निर्मिती, पोषण, नाश सर्वांना कारणीभूत आहे. म्हणून अग्नि हा परिवर्तनशील मानतात. गर्भ निर्मिती करतो, पोषणाने त्याचे बाल्यात, मग शैशवात , तारुण्यात , गृहस्थात परिवर्तन करतो आणि  शेवटी देहाचा नाश करून मुक्त आत्म्याला  दुसऱ्या देहात परिवर्तीत करतो. कांही घरात संध्याकाळी अग्निहोत्र करतात. अग्निद्वारे होमातील आहुती देवांपर्यंत पोचविल्या जातात. होळीदिवशी अग्नीची पूजा केली जाते.

दिव्याचा एक प्रकार रोजच्या वापरातला म्हणजे निरांजन!निरांजन हा शब्दच किती शांत, मृदू, नि वत्सल आहे.मूळ शब्द निरंजन, निः + अंजन, पवित्र, निष्कपट, काजळी न धरणारे, शुभकारक, सकारात्मक उर्जेच्या स्पंदनांचे वहन करणारे!

आपल्याकडे ज्या ओवाळण्याच्या पद्धती आहेत त्या थोड्या सविस्तर सांगणार आहे कारण सिरीयल मधलं ओवाळणं पाहून हीच खरी पद्धत आहे असं वाटायला लागलंय.आपण

देवाला ओवाळतो त्याला देवाची आरती म्हणतात. आरतीसाठी ताम्हनात दोन निरंजने ठेवावी, त्यात तुपाच्या दोन दोन फुलवाती(फुलासारख्या दिसणाऱ्या कापसाच्या तयार केलेल्या )घालव्यात. कापूर घालून कापुरारती ठेवावी व अक्षता ठेवाव्या. आपण आरतीतून देवाची स्तुती करतो व त्याच्याकडे आशीर्वाद मागतो. त्यामुळे आरती करताना ज्या देवाची आरती करणार असू त्या देवावर अक्षता टाकायच्या व ओवळायचं. आरती झाली कि ज्योतीत जे तेज येतं किंवा देवाचा आशीर्वाद येतो, तो उपस्थित सर्वांना मिळावा यासाठी आरतीचं ताट फिरवतात. सगळे ओंजळीने ते तेज घेऊन मस्तकावरून तो हात फिरवतात. आरतीचं ताम्हन परत देवासमोर ठेवताना ताम्हनाखाली अक्षता ठेवतात. बऱ्याचवेळा आरती नंतर मंत्रपुष्प म्हणतात त्यावेळी उपस्थितांना फूल व अक्षता किंवा नुसत्या अक्षता देतात. उजव्या हातात अक्षता ठेवून त्यावर डावा हात झाकावा. म्हणजे त्या अभिमंत्रित होतात अशी कल्पना. मंत्रपुष्प झाल्यावर त्या अभिमंत्रित अक्षता देवावर वाहून नमस्कार करावा. कधी कधी निरंजना ऐवजी पुरणाचे पाच दिवे करून त्यात तुपाच्या पाच वाती लावून देवाची आरती करतात. नंतर कांही लोकांच्यात त्या पुरणाच्या आरतीने घरातल्या मुलांना ओवाळतात.ज्योतीमधील देवाचा आशिर्वाद मुलांना मिळावा यासाठी, (इथे सुपारी फिरवत नाहीत ) कारण हे ओवाळणे बहुधा श्रावण शुक्रवारी करतात त्यावेळी  आपण ज्या जीवतीच्या कागदाची पूजा व आरती करतो ती लहान मुलांचं रक्षण करणारी आहे.

अक्षताही पवित्र व सकारात्मकता वाहणाऱ्या मानतो. मूळ शब्द अक्षत, म्हणजे छिद्र किंवा जाळी नसलेला, म्हणून अक्षता करण्यासाठी अखंड तांदूळ घेऊन त्याला तेलाचा हात लावून कुंकवाने लाल करतात. तसेच फक्त देवाची पूजा, आरती करताना तूप व फुलवाती लागतात. एरवी केंव्हाही निरांजन किंवा दिवा, समई लावताना तेल व वळलेल्या वाती लागतात.

जेंव्हा आपण माणसांना ओवाळतो त्याला औक्षण म्हणतात. औक्षण म्हणजे आशिर्वाद देणे, दृष्ट काढणे.उदा. वाढदिवस, यासाठी ताम्हनात दोन निरांजने घ्यावीत, त्यात वळलेल्या वाती, प्रत्येक निरांजनात दोन दोन च्या दोन, अशा एकूण आठ वाती व तेल घालतात. ताम्हनात अक्षता व सुपारी ठेवावी. सोन्याची अंगठी प्रत्येक घरात असेलच असे नाही त्यामुळे ती हौस म्हणून असेल तर घ्यावी. महत्व सुपारीला आहे.ज्याचं औक्षण करायचं त्याला उभं किंवा गोल (मुलगा, मुलगी याप्रमाणे )कुंकू लावावे.हे मात्र कुठल्याही प्रसंगी ओवाळताना लावावे.मुलाला उभे कुंकू लावणे यालाच नाम ओढणे म्हणतात. मग डोक्यावर अक्षता टाकून एकदा ताम्हन गोल फिरवावे,हातात सुपारी घेऊन ओवाळणाऱ्याने आपल्या डाव्याबाजूने उजवीकडे अर्धगोलात सुपारी फिरवावी व ताम्हनात टेकवावी, मग उजवीकडून डावीकडे ताम्हनात टेकवावी व शेवटी आणखी एकदा डावीकडून उजवीकडे आणून ताम्हनात ठेवावी. त्यापूर्वी कांही ठिकाणी सुपारी व अंगठी कपाळाला लावतात. हे औक्षण आशीर्वादाचे असल्यामुळे मोठ्यानी छोट्याना ओवाळायचे असते. याशिवाय गणपती, गौर आणणाऱ्यालाही पायावर दूध पाणी घालून दारातून आत आल्यावर ओवाळतो. तेंव्हा आशिर्वाद द्यायचा नसल्याने सुपारी फिरवत नाहीत फक्त दोनदा अक्षदा टाकून ताम्हन फिरवतात. कदाचित ते फक्त देवाचं स्वागत असावं. असं ओवाळून स्वागत, जिंकून आलेल्या व्यक्तीचं दारात करतात.

भाऊबीज, रक्षाबंधन, पाडवा हे नाजूक बंध असणाऱ्या नात्यासाठीचे सण असतात. त्यावेळी ओवाळणी घालणं असल्यामुळे  वयाचा विचार केला जात नाही. ओवाळताना सुपारी फिरवली जात नाही. ज्याला ओवाळतो त्याच्या हातात सुपारी द्यायची व त्याने ती ओवाळणीसह ताम्हनात ठेवायची. ओवाळणी म्हणून एक रुपायचं नाणं सुद्धा चालतं, एकमेकांतलं प्रेम ओवाळणी पेक्षा महत्वाचं असतं.नेहमीप्रमाणे दोनदा अक्षता टाकून ताम्हन फिरवायचं.

मोठ्यांच्या 61,75,81,100 अशा महोत्सवाच्या वेळी वयाएवढ्या वातीनी ओवाळतात, त्यावेळी ओवाळणारे बहुधा त्या व्यक्तीपेक्षा लहानच असतात त्यामुळे फक्त वातींचे ताट फिरवतात.

अर्थात यांसगळ्या गोष्टी श्रद्धेच्याच आहेत. हे असंच का याला तर्कशुद्ध उत्तर देता येणार नाही. कदाचित कुटुंबातील सर्वांना एकमेकांशी प्रेम भावनेने जोडून ठेवावं, प्रत्येकाला कुटुंबात कांही विशिष्ट स्थान असावं, कर्तव्याची, जबाबदारीची जाणीव असावी, घर आनंदी असावं. आपलं कुटुंब कोणत्याही संकटापासून दूरअसावं, एवढाच निर्मळ विश्वास किंवा आशावाद असावा.श्रद्धेचा पाया असला कि नात्यांची इमारत सहज कोसळत नाही. आणि असंच करावं, अशी पद्धत घालून दिली कि आत्मियतेने गोष्टी केल्या जातात.ऊरका पाडून प्रसंगाचं, सणाचं महत्व कमी होऊ नये यासाठीही!

दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसः तेज उत्तमम् l

गृहाणं मत्कृतां पूजा, सर्वकाम प्रदो भवः॥

हे दीपदेवा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामधे उत्तम तेज आहेस, माझ्या पूजेचा स्विकार कर. माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अक्षय तृतीया…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “अक्षय तृतीया…” ☆ सौ राधिका भांडारकर 

अक्षय तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो.  यावर्षी अक्षय तृतीया १० मे ला साजरी होत आहे.  हा सण गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेशसह संपूर्ण उत्तर भारतात साजरा केला जातो.

अक्षय याचा अर्थ ज्याचा क्षय होत नाही ते.  या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असा संकेत आहे.  या दिवशी आपण दान केले तर विपुल प्रमाणात ज्या वस्तूंचे दान केले त्या पुन्हा आपल्याजवळ प्राप्त होतात अशी भावना आहे.

अक्षय तृतीया सणाच्या संदर्भात अनेक पौराणिक कथा आहेत.  भारतीय संस्कृतीचा इतिहास आणि काही पौराणिक कथानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत.

याच दिवशी भगवान गणेशांना वेदमहर्षी व्यासांनी महाभारताचे काव्य सांगण्यास सुरुवात केली होती. 

अक्षय तृतीया म्हणजे भगवान विष्णूचा सहावा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुराम यांचा जन्मदिवस आहे.

अक्षय तृतीयेच्या दिवशी नरनारायण आणि हयग्रीव यांचाही जन्म झाला होता.

अक्षय तृतीयेला सत्ययुग संपून त्रेता युगाचा प्रारंभ झाला असं म्हणतात.

हा दिवस म्हणजे  माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस आहे.  त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णेची आराधना केल्यास आयुष्यभर घरात सुखसमृद्धी नांदते.

याच  दिवशी  श्रीकृष्णाने मित्र सुदाम्याचे दारिद्र्य संपवले.

वनवासी असलेल्या पांडवांसाठी श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षयपात्र भेट दिले होते ज्याचा उल्लेख ‘द्रौपदीची थाळी’ असा केला जातो ज्यामुळे वनवासातही पांडवांना कधीही उपासमार घडली नाही.

अक्षय तृतीयेलाच पृथ्वीवर गंगा अवतरली होती.

भगवान कुबेराने श्री लक्ष्मी मातेची आराधना केली ज्यामुळे कुबेराला देवांचा खजिनदार म्हणून नेमण्यात आले.

जैन बांधव हा दिवस भगवान आदिनाथ यांच्या स्मरणार्थ साजरा करतात.

जगन्नाथ पुरी येथे याच दिवसापासून रथयात्रेला सुरुवात होते असा हा साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला एक मंगल पवित्र दिन!

अक्षय तृतीयेचा हा सण खानदेशात मात्र अगदी दिवाळी सारखाच साजरा केला जातो.  तिकडे या सणास आखाजी असे म्हणतात.

आखाजी हा जसा सासुरवाशिणींचा सण तसेच तो पितरांचाही सण मानला जातो. खरं म्हणजे हा शेतकरी बांधवांचा सण. मातीशी अतूट नातं सांगणारा सण. या दिवशी शेतमजुरांना सुट्टी असते.  सालगडी (सालदार) यांची नवी कामेही ठरविली जातात.  खानदेशातील आगळीवेगळी अक्षय तृतीया परंपरा आजही तितक्याच, भक्तीभावाने,  उत्साहाने पाळली जाते.  या सणाला अक्षय घट म्हणजे पाण्याची घागर भरली जाते.

वसंत ऋतू संपून ग्रीष्माची चाहूल लागते. घागर हे त्याचं प्रतीक आहे.  या घागरीवर छोटे मातीचे भांडे ठेवले जाते त्यावर खरबूज,  सांजोऱ्या,  आंबे ठेवले जातात. यातील छोटे भांडे हे पितरांसाठी असते.  आधी ह्या पितरांना पाण्याचा घट दिला जातो त्यानंतरच नवीन माठ आणून घरात वापरला जातो.

पाटावर धान्य पसरून सभोवती रांगोळी घालून त्यावर या घटाची पूजा केली जाते.  या पूजेला ‘घागर भरणे’ असेही म्हटले जाते.  पितरांचे श्राद्ध किंवा तर्पणविधी या दिवशी केला जातो.  घरातल्या उंबरठ्याचे औक्षण करून आपल्या पूर्वजांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले जाते.  एकेका पूर्वजांची नावे घेऊन त्यांना आमंत्रण दिले जाते व चुलीवर पितरांना घास अर्पण केला जातो.  या दिवशी घरोघरी पुरणपोळी, आमरस, कटाची आमटी,(रश्शी) कुरडया, पापड,  भजी असा साग्रसंगीत नैवेद्य दाखवला जातो.

अक्षय तृतीया— आखाजी हा श्रमण संस्कृती दर्शविणारा  कृषी उत्सव आहे.याच दिवसापासून शेती  कामाला सुरुवात होते.  हलोत्सव, वप्पमंगल अशी वेगवेगळी नावे या सणाला आहेत.

आखाजी म्हणजे माहेराचा  विसाव्याचा आरामाचा सण. सासरी कामाच्या घबाडग्यातून मुक्त होऊन माहेरी लाडकोड, कौतुक करवून घेण्याचा सण.

घरोघरी उंच झाडाला झुले बांधले जातात. खानदेशात सासुरवाशिण लेकीला गौराई म्हणतात आणि जावयाला शंकर.

“ वैशाखाच उन्हं

 खडक तापून लाल झाले वं माय”

 

“झुयझुय पानी व्हाय तठे कसाना बाजार वं

 माय माले बांगड्या ली ठेवजो ली ठेवजो

बंधूंना हातमा दी ठेवजो दी ठेवजो

बन्धु  मना सोन्याना सोन्याना

पलंग पाडू मोत्याना मोत्याना”

 

“ गडगड रथ चाले रामाचा

नि बहुत लावण्याचा

सोला साखल्या रथाला

नि बावन खिडक्या त्याला”..

अशी गोड बोली भाषेतील अहिराणी गाणी सख्या झुल्यावर झुलताना आनंदाने गातात, अक्षय तृतीयेच्या निमित्ताने जपलेली ही लोकपरंपरा अतिशय लोभस आहे.

ऋतुचक्र फिरत असते.  एका मागून एक ऋतू बदलतो. वसंत सरतो ग्रीष्म येतो. आपले सारेच भारतीय सण नव्या ऋतुच्या स्वागतासाठी पारंपरिक आणि शास्त्रयुक्त पद्धतीने साजरे केले जातात. त्यातलाच हा अक्षय तृतीयेचा सण.  पाण्याची घागर भरून उन्हाळ्याचे स्वागत करणारा सुंदर सण!!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अक्षय्य तृतीया मुहूर्त खास…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

🌸 विविधा  🌸

☆ अक्षय्य तृतीया मुहूर्त खास…सौ. रेणुका धनंजय मार्डीकर 

विशाखा नक्षत्र येई पौर्णिमा

आला पहा वैशाख मास हा

साडेतीन मुहूर्तातील एक

अक्षय्य तृतीया मुहूर्त खास हा

अक्षय्य तृतीया, पितृ, देव व शुभ तिथी, वसंतोत्सव, दोलोत्सव चंदन यात्रा दिन, अखतारी, आखिती व आख्यातरी (गुजरात) अशा अनेक नावाने परिचित असलेला हा सण भारतातील प्रत्येक घरात संपन्न केला जातो.

या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात. या दिवशी आपण ज्या वस्तूंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात म्हणून अक्षय तृतीयेचे विशेष महत्त्व समजले जाते. वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय्य तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या प्राचीन संस्कृती, परंपरांमध्ये साडेतीन मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत. त्यापैकी एक अक्षय्य तृतीया असल्यामुळे यालाही अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही म्हणून ही तिथी अक्षय मानली गेली आहे. हे सांगताना श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अक्षय्य तृतीयेचे व्रत सांगितले.

शाकल नावाच्या नगरात ‘सुनिर्मल’ वाण्याने हे व्रत केल्याने दुसऱ्या जन्मात तो ‘कुशावती’ नगरीचा राजा झाला अशी एक कथा आहे. ‘नाभी’ व ‘मरुदेव’ यांचे पुत्र ऋषभदेव हे भगवान विष्णूचे अवतार होते. त्यांची परीक्षा पाहण्यासाठी इंद्राने धरतीवर पाऊस पाडला नाही. तेव्हा ऋषभदेवाने आत्मसामर्थ्याने पाऊस पाडून धरती सुजलाम-सुफलाम केली. तेव्हा प्रभावित होऊन इंद्राने आपली कन्या ‘जयंती’ हिचा ऋषभदेवांबरोबर विवाह लावून दिला. ऋषभदेवांना शंभर मुले झाली. गंगा, यमुनेच्या मधल्या भूमीचा राजा व ऋषभदेवांचा मुलगा ‘ब्रह्मावर्त’ याला त्यांनी जो आध्यात्मिक उपदेश केला तो विश्व प्रसिद्ध आहे. ज्येष्ठ पुत्र ‘भरत’ याच्या स्वाधीन राज्यसत्ता देऊन त्यांनी विदेही अवस्थेत कोंक, कुटक, कर्नाटक या दक्षिणेकडील प्रदेशात बराच प्रवास केला. एकदा ते अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हस्तिनापूरचा राजा ‘श्रेवांस’ याच्या घरी गेले. तेव्हा राजाने त्यांना ऊसाचा रस पिण्यास दिला त्यामुळे त्यांच्या भोजनशाळेतील अन्नदेवता व हस्तिनापूरचे ऐश्वर्य अक्षय्य टिकले म्हणून आजही हस्तिनापूर उर्फ दिल्ली शहर संपन्न राजधानीचे ठिकाण आहे.

देव आणि पूर्वज यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य (अविनाशी) होते. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो सर्व पापांतून मुक्त होतो, अशी मान्यता आहे. या दिवशी विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते.

अक्षय्य तृतीयेपासून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला, असे मानले जाते. अक्षय्य तृतीयेपासून चारधाम मानल्या गेलेल्या बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीची द्वारे खुली केली जातात. याच दिवशी नर-नारायण यांचे अवतरण झाले होते अशी मान्यता आहे. त्रेतायुगातच महाभारत घडले होते. याच युगात जगत्कल्याणासाठी भगवान विष्णू श्रीकृष्ण अवतारात प्रगट झाले आणि कालातीत असलेल्या भगवद्गीतेची अमृतवाणी संसाराला प्राप्त झाली. त्याचप्रमाणे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हयग्रीव आणि बसवेश्वर यांचा जन्म झाला होता.

विविध राज्यांमध्ये अक्षय्य तृतीया वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. या दिवशी ओरिसा व बंगाल प्रांतात परस्परांना चंदनाचे तेल लावून तीन आठवडे चालणाऱ्या ‘चंदनयात्रा’ या उत्सवाची सांगता करतात. जगन्नाथ पुरीला मदनमोहनाच्या मूर्तीला चंदनाचे तेल लावून शोभायात्रेने नरेंद्र तलावात नौकाविहार करतात. गुजरातमध्ये द्वितीयेला गावाबाहेर धान्य, कापूस व साखर या वस्तुंचे एक नगर तयार करतात. त्यामध्ये एक तांब्याचे नाणे ठेवून त्याला ‘राजा’ व त्याच्याजवळ एक सुपारी ठेवून तिला ‘दिवाण’ असे म्हणतात. गावातील सर्व लोक हे नगर पाहण्यासाठी जातात. या नगरीतील जे धान्य मुंग्यांनी वाहून नेले असेल ते धान्य महागणार किंवा त्याचे पीक चांगले येणार नाही असे भाकीत केले जाते व ज्या दिशेला मुंग्या कापूस घेऊन जातात त्या दिशेला कापसाची निर्यात करतात.

राजस्थानातील शहरी आणि ग्रामीण भागात या दिवशी विवाह करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रातील खान्देश मध्ये अक्षय तृतीयेच्या सणाला ‘आखाजी’ म्हणून ओळखले जाते. खान्देशात आखाजीचा हा सण दीपावली इतकाच महत्त्वाचा गणला जातो.

अक्षय्य तृतीया सागर भरती

नौकाविहारा कोणी न जाती

उसळो ना सागर, रहावी शांती

सागरोत्सव अक्षय्य संपन्न करती

अक्षय्यतृतीया ते श्रावण पौर्णिमेपर्यंत समुद्र खवळलेला असतो म्हणून या महिन्यात समुद्रपर्यटनाला कोणीही जाऊ नये. या काळात सागराने त्रास देऊ नये म्हणून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गुजरातमध्ये सागराची पूजा करण्यासाठी ‘सागरोत्सव’ संपन्न केला जातो.

कोकणात कुमारीकांना घरी आमंत्रित करून त्यांच्या अंगाला चंदनाचे उटणे लावून शिरा असलेला शंख फिरवितात व पाद्यपूजा करून कैरीचे किंवा दाह कमी करून पचनशक्ती वाढविणारे कोकमचे सरबत पिण्यास देऊन गुलकंद व मोरावळा खाण्यास देतात. या दिवशी शेतीच्या कामाला प्रारंभ केला जातो.

साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी व्यवसायास प्रारंभ करतात. आपल्या पूर्वजांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला पूर्वजांच्या स्मरणार्थ पूजा करून, त्यांना प्रथम आमरसाचे जेवण देऊन मगच आंब्याचा रस सेवन केला जातो अशी प्रथा, परंपरा आहे.

अक्षय तृतीया दिन भाग्याचा

अक्षय घट तो भरू पाण्याचा

पलाशपत्रे रास गव्हाची

आंबे ठेवून पूजा त्यांची

कुंभार वाड्यातून मातीचा कलश आणून पळसाच्या पत्रावळीवर गव्हाची रास घालून त्यावर कलश ठेवून त्यात पाणी भरावे व आपल्या पूर्वजांसाठी तीळ तर्पणविधी करून ते कलश आमंत्रित केलेल्या व्यक्तिला दक्षिणेसहित दान देऊन आंब्याच्या रसाचे जेवण घालावे.आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ देह, नेत्र, रक्त, वस्त्र, धन, जमीन, विद्या, पायातील जोडा, छत्री, जलकुंभ, पंखा, विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य दान करावे. अक्षय तृतीयेला सत्य, कृत व त्रेता या युगांचा प्रारंभ झाला असून नर-नारायण, हयग्रीव व परशुराम यांचे जयंती उत्सव संपन्न करून, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाने चैत्रगौरी उत्सवाच्या सांगतेबरोबर अक्षय्य तृतीया हा सण संपन्न करतात.

वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या निमित्याने मातीचे माठ किंवा रांजण दान करावे. मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम असते, तसेच फळांचा राजा आंबा प्रामुख्याने अक्षय तृतीयेपासून खाण्यास सुरुवात होते. अक्षय्य तृतीयेला केलेले नामस्मरण किंवा मंत्र पठण अखंड टिकून राहते अशा मान्यता आहेत. याशिवाय अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवी प्रकट झाली होती, असेही सांगितले जाते.

कृतज्ञता पितरांच्या प्रती

आशीर्वच भरभरून देती

कृपाच त्यांची मिळण्या यशप्राप्ती

अक्षय अखंड अक्षय्य तृतीया ती

*

पूर्वज सांगून गेले आम्हा

परंपरा साऱ्या येतील कामा

पाऊलखुणांवर आम्ही चालतो

अक्षय्यदिनी या पूर्वजास स्मरतो

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ७ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र – देवावरची आम्हा मुलांच्या मनातली श्रद्धाही त्यांच्यासारखीच पूर्णत: निखळ रहाणं आणि आमच्या मनात अंधश्रद्धेचे तण कधीच रुजू न देणं ही आमच्या आईबाबांनी आम्हा भावंडांना दिलेली अतिशय मोलाची देनच होती!)

जवळजवळ साठ एक वर्षांनंतरही या सगळ्याच आठवणी आजही माझ्या मनात अतिशय ताज्या आहेत. आमच्या अंगणातलं ते छोटं बैठं देऊळ, त्या प्रसादपादुका, तरारून वर झेपावलेला औदुंबर, बाबांना प्राप्त झालेली वाचासिध्दी हे सगळं कुणालाही चमत्कार वाटेल असंच असलं तरी माझ्या बाबांपुरतं सांगायचं तर ती फक्त त्यांनाच उमजलेली अशी अंतर्ज्ञानाची एक खूण होती फक्त!

बाबांना प्राप्त झालेली वाचासिद्धी त्या पोरवयात माझ्यासाठीही अतिशय औत्सुक्याचा विषय होती. पण बाबांनी मात्र ते अगदी सहजपणे स्वीकारलेलं होतं.अतिशय खडतर आणि प्रतिकूल वाटाव्या अशा आपल्या संपूर्ण आयुष्यांतही त्यांच्यातलं हे वेगळेपण त्यांनी स्वतःचे पाय जमिनीवरच घट्ट ठेवून आतल्याआत जपलं होतं.त्यांना प्राप्त झालेला हा परमेश्वराचा आशीर्वाद कुठल्याही प्रकारचं अवडंबर न माजवता, स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच त्याचा वापर न करता, इतक्या निगुतीने त्यांनी कसा जपला  असेल याचे आज आश्चर्य वाटते एवढे खरे!

त्यांच्यावरील श्रद्धेपोटी मनातले प्रश्न घेऊन आजूबाजूची परिचितांपैकी अनेकजणं बाबांना सहज म्हणून भेटायला यायची आणि मनातली रुखरुख व्यक्त करून त्यांच्यासमोर आपलं मन मोकळं करायची.बाबा मोजक्या शब्दात त्यांची समजूत घालून त्यांना मार्गदर्शन करायचे.’सगळं व्यवस्थित होईल,काळजी नका करू’ हे त्यांचे शब्द आधारासारखे सोबत घेऊन आलेली माणसं परत जायची. एकदा तिथे जवळच बसलेल्या मी मनातल्या औत्सुक्यापोटी बाबा एकटे आहेत असं पाहून ‘तुम्हाला हे सगळं कसं समजतं?’ असं त्यांना विचारलं तेव्हा माझी चेष्टा केल्यासारखे ते खळखळून हसले.म्हणाले,”अरे मला सगळं कुठून काही समजायला?इथं माझं मला झालंय पुरे. पण ही माणसं येतात,मन मोकळं करतात. परिस्थितीने कातावलेली असतात बिचारी. त्यांना झिडकारून नाही ना चालणार? त्यांचं दडपण कमी करावं, त्यांनी स्वस्थचित्तानं विचार करून स्वतःच त्यातून मार्ग शोधण्यास प्रवृत्त व्हावं म्हणून त्यांना बरं वाटेल अशा चार अनुभवाच्या गोष्टी सांगतो झालं. बाकी कांही नाही अरे.खरं सांगू का? मी बोलेन,सांगेन ते, ही सगळी माणसं म्हणतात तसं खरंच खरं ठरत असेल तर त्याचा कर्ताकरवता ‘तो’!..’मी’ नाही..” बाबा गंभीर होत म्हणाले होते. असं असलं तरी बाबांनी त्या माणसांना सांगितलेल्या गोष्टींची प्रचिती प्रत्येकाला यायचीच आणि नंतर ते कृतज्ञता व्यक्त करायला बाबांना आवर्जून भेटायलाही यायचे. या सगळ्या मागचं रहस्य शोधायचा प्रयत्न बाबांनी कधीच केल्याचं मला आठवत नाही. त्यांच्या मनातली श्रद्धा, वेळोवेळी त्यांना आलेले अनुभव यांनी भारावून न जाता प्रतिकूल परिस्थितीतही ते शांत,हसतमुख रहायचे.या पार्श्वभूमीवर याच संदर्भात एक दिवस अचानक आश्चर्य वाटावं असा एक थरारक प्रसंग घडला!

किर्लोस्करवाडी हे वरिष्ठांचे बंगले सोडले तर फारफार तर दीड दोनशे उंबऱ्यांचं एक काॅलनीत वसलेलं गाव.बॅंक आणि पोस्ट या कंपनीसाठी अत्यावश्यक सेवा असल्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठीही काॅलनीतली घरे राखून ठेवलेली असायची. त्यामुळेच अतिशय शांत,आनंदी, संस्कारपूर्ण अशा वातावरणातलं समृध्द बालपण मला अनुभवता आलं.

प्रत्येक घराच्या पुढेमागे असणारी फळाफुलांची भरपूर झाडं आणि प्रशस्त अंगण हे तिथल्या जवळजवळ दशकभराच्या वास्तव्यात आम्ही अनुभवलेलं खरं ऐश्वर्य ! अंगणातला जांभळाचा मोठा वृक्ष हे इतर घरांच्या तुलनेतलं आमच्या घराचं एक खास वेगळं वैशिष्ट्य होतं. त्या प्रशस्त वृक्षाच्या चोहोबाजूंनी पसरलेल्या प्रत्येक फांदीला पिकलेल्या टपोऱ्या जांभळांचे घोसच्याघोस लगडलेले असायचे. ते पाहूनच आम्हा मुलांच्या तोंडाला पाणी सुटायचं. पण आम्हाला झाडावर चढून जांभळं काढायची बाबांनी मनाई केलेली होती. जांभळाचं लाकूड अतिशय ठिसूळ असतं, आम्ही पडू, आम्हाला इजा होईल या काळजीपोटी ते स्वतः रोज एकदा झाडावर चढून स्वत:चार जीव धोक्यात घालून आम्हाला भरपूर जांभळं काढून द्यायचे. ते ऑफिसला गेले की आम्ही गुपचूप झाडावर चढून आपापली जांभळं काढून खायचा बालसुलभ आनंद मिळवायचो पण तेही आईला नकळतच.

काॅलनी छोटी असल्यामुळे कॉलनीतील सर्वांचाच घरोबा असे. कुणाच्याच मनात आपपर भाव नसे.

तोच हक्क गृहित धरून, पलीकडच्या गल्लीत रहाणारे श्री. रामभाऊ सुतार एक दिवस हातात  रिकामी पिशवी घेऊन आमच्या घरी आले. बरोबर त्यांची बायकोही होती. तो रविवार असल्याने बाबा घरीच होते.

“दादा,थोडी जांभळं काढावी म्हणतो.”रामभाऊ म्हणाले.

बाबांनी क्षणभर विचार केला. त्यांना ‘आत या,बसा’ म्हणाले.बाबांनी स्वतःच झाडावर चढून सकाळी मोठ्ठं पातेलं भरून पिकलेली टपोरी जांभळं काढून आत ठेवली होती.ते पातेलं त्यांनी बाहेर आणलं.

“ही जांभळं नुकतीच काढलीत.ती पिशवीत भरुन घेऊन जा” ते म्हणाले.

“नको दादा.यात स्वत: झाडावर चढून जांभळं काढायची मजा कुठून येणार? ती

तुमची तुम्ही ठेवा आत. माझी मी काढून घेतो.” रामभाऊ म्हणाले आणि उठून बाहेर गेले.

बाबांना काय करावं सुचेना. ते एकाएकी गंभीर झाले. झपकन् उठून बाहेर आले.

“रामभाऊ, ऐका माझं. जांभळाचं लाकूड खूप नाजूक असतं. या झाडाखाली मोठे दगड आहेत. फांदी तुटून पडलात तर जीवावर बेतेल. झाडावर चढू नकाss”

रामभाऊ खिल्ली उडवल्यासारखे मजेत हसले.

“दादा, अहो मला असा तसा समजलात की काय? असली छप्पन झाडं मी    बघितलीत. नका काळजी करू.”

“काळजी मी नाही, तुम्ही स्वतःची घ्यायला हवी. सांगतोय ते  ऐका. तुम्ही अशी छप्पन्न झाडं पाहिली असतील, पण हे सत्तावनावं झाड कायम लक्षात रहाणारं ठरणाराय लक्षात ठेवाs ऐका माझं. झाडावर.. चढू .. नकाss”

बाबांचं न ऐकता, त्यांच्याकडं पहात रामभाऊ चिडवल्यासारखं हसले आणि हातातली पिशवी सावरत झाडावर चढू लागले.

त्या क्षणीचा बाबांचा चिंताग्रस्त चेहरा मला आजही आठवतोय. काय करावं ते न सुचून बाबा आत आले. अस्वस्थपणे येरझारा घालत राहिले. पाच एक मिनिटे त्याच अस्वस्थतेत गेली. तोवर टपोऱ्या जांभळांच्या घोसांनी भरत आलेली पिशवी जवळच्याच एका फांदीला अडकवून, त्याच फांदीवर सायकलवर बसतात तशी टांग टाकून रामभाऊ बसले होते. ते खाली उतरायचा विचार करीत असतानाच,समोर दिसणाऱ्या जांभळांच्या भलामोठ्या घोसाच्या ते मोहात पडले.पण थोडं पुढं वाकून हात लांब करुनही तो घोस हाताला लागेना,तसं जिद्द (कि हव्यास?)न सोडता रामभाऊ आणखी थोडं पुढं वाकले न् त्याच क्षणी……?

फांदी मोडत असल्याचा कडकड आवाज ऐकू आला आणि आत अस्वस्थतेने येरझारा घालणारे बाबा धास्तावून थिजल्यासारखे उभे राहिले. स्वतःला सावरत कसेबसे ते बाहेर धावले तोवरच्या क्षणार्धात रामभाऊ मोडकी फांदी आणि जांभळांनी भरलेली पिशवी यांच्यासकट खाली कोसळले. बाबा झरकन् पुढं धावले तसं अंगणात उभे असलेले इतरही एकदोघे मदतीला पुढे आले.रामभाऊंची बायको तर भेदरुन थरथरत उभी होती!

खालच्या दगडांचा मार लागून झालेल्या पायाच्या रक्ताळलेल्या जखमा आणि मुक्या माराच्या वेदना आतल्याआत सहन करत कसनुसं हसत रामभाऊ उठायचा प्रयत्न करत होते त्यांना सर्वांनी कसंबसं सावरलं.

रामभाऊ न जुमानता झाडावर चढलेले पाहून घाबरलेले,अस्वस्थतेने येरझारा घालणारे बाबा मला आठवतात तेव्हा घडलेली घटना कावळा बसताच फांदी मोडायला निमित्त होणाऱ्या योगायोगासारखी निश्चितच नव्हती याची मनोमन खात्री पटते. बाबांना मिळणाऱ्या अगम्य अशा भविष्यसूचक संकेतांच्या वाचासिद्धीसदृश इतर सकारात्मक प्रचितींच्या तुलनेतला हा काळजाचा ठोका चुकवणारा एक अपवादात्मक अनुभव मनात बाबांच्या आठवणींना चिकटून बसलाय..!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अखेरची आस…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ “अखेरची आस” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आयुष्याची संध्याकाळ झालेली आहे. वय उताराकडे चाललेले आहे. अशावेळी आपलं पुढच आयुष्य कसं जगायचं?…

याचा विचार करता करता आपल्या मृत्यूनंतर चा विचारही मनात यायला लागलेला आहे. मृत्यू अटळ आहे… आजारी पडलो तर.. बोलणेच बंद झाले तर…

मग ठरवलं..

यावर आपल्या मनात जे विचार आहेत ते लिहून ठेवायचे. म्हणजे मुलांना सोपं होईल.

व्हेंटिलेटर वर ठेवायची वेळ आली तर तो किती दिवस ठेवायचा?

कारण व्हेंटिलेटर” काढा “असं कोणी कसं म्हणायचं…. हा मोठा प्रश्न असतो…

एकदम आठवण आली भाचे सुनेच्या वडिलांची. वय वर्ष 85…

दवाखान्यात ठेवल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर लावायची वेळ आली. ते बोलू शकत होते. त्यांनी दोन दिवसांनी व्हेंटिलेटर काढायला स्वतःच सांगितले. त्यानंतर ते अनेक जणांशी बोलले त्यांना लोक भेटायला आले.

चार दिवसांनी शांतपणे त्यांची जीवन यात्रा संपली.

हे खरं तर अवघड आहे पण करायचं म्हटलं तर शक्य पण आहे.

देहदान… नेत्रदान करायचं मनात आहे अस आपण म्हणतो. पण त्यासाठी आधी तयारी करावी लागते.

नलू ताई म्हणजे माझी नणंद. यांनी देहदानाचा फॉर्म भरला होता. त्यांचा मृत्यू मध्यरात्री झाला. पुढे काय करायचे ?हे आम्हाला कोणालाच माहिती नव्हते. फारच गोंधळ सुरू झाला.

बहिणीचा मुलगा डॉक्टर श्रीपाद पुजारी हा दीनानाथ हॉस्पिटलमध्ये आहे. त्यांनी सर्व मदत केली म्हणून नलू ताईंची अंतिम देहदानआणि नेत्रदानाची इच्छा पूर्ण करता आली.

काही लोक यासाठी काम करत आहेत. त्यांचे फोन नंबर आपण घेऊन ठेवले पाहिजेत.

पुण्यात श्रीयुत खाडीलकर हे यासाठी काम करत आहेत. कोणाला त्यांचा फोन नंबर हवा असेल तर मी जरूर देईन.

माझी मैत्रीण हेमा. तिच्या वडिलांनी तीस वर्षांपूर्वी सांगितले होते की मी गेल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवसापासून तुमच्या उद्योगाला लागा. असेही आदर्श आपल्यासमोर आहेत.

घरात कोणाचा मृत्यू झाला की मन भावुक, हळवे आणि कातर झालेले असते.

त्यात लोक काय म्हणतील ही ही भीती असते. त्यामुळे काही लोक कर्ज काढून दहावा बारावा करतात. मोठ्या जेवणावळी घालतात.

प्रसादाला आलेले लोक टॉवेल, टोपी, शर्टपीस असा आहेर घेऊन येतात.

पाठीवर टॉवेल घालण्यापेक्षा मी तुझ्या पाठीशी आहे. काही लागलं तर मला सांग.. मी मदत करीन अस पाठीवर हात ठेवून म्हटलं आणि तसं वागलं तर ते योग्य ठरेल.

एखाद्या सवाष्ण स्त्रीचे निधन झालं तर लोक पाच जणींना साडी, चोळी सौभाग्य अलंकार देतात. भरमसाठ खर्च करतात. ऐपत नसेल तर कर्ज काढतात. आधीच घरातली स्त्री गेली असेल तर घराची घडी विस्कटलेली असते. त्यात हा अमाप खर्च…

घरातले दुःखी कष्टी असतात. त्यावेळेस एखादी बाई किंवा पुरुष ही सूत्र हातात घेतात. हे केल पाहिजे, ते आणलं पाहिजे… अस म्हणतात. त्यावेळेस त्यांना विरोध करता येत नाही.

हे कितपत योग्य आहे ?

याचाही विचार करा. काहीजणांना मनात नसतानाही हा खर्च करावा लागतो.

शिवाय आपण हे केल नाही तर काय होईल ही भीती असतेच….

मृत्यूनंतर भाषण देण्यापेक्षा ती व्यक्ती जिवंत असताना बोलून घ्या. भेटून घ्या. तिचं कौतुक करा.

काळानुरूप आपण आपले विचार, रूढी, परंपरा यात बदल करायला हवा आहे. आणि तो आपणच करायचा आहे.

अर्थातच हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे ज्याला जे वाटेल ते त्यांनी करावे.

आता शांतपणे लिहायला बसले की असे काही काही विषय सुचतात. खरंतर अशा विषयांवर कोणी स्पष्टपणे बोलत नाही.

पण ठरवलं…

लेखणीतून तुमच्याशी बोलावं.

त्यातून तुम्ही काही सांगता.. सूचना करता…. मलाच नाही तर इतरांनाही त्याची मदत होते. माहिती समजते.

वाचता वाचता आज फार गंभीर झालात का ?

असू दे एखादा दिवस असा…

पण खरंच…

अंध माणसांकडे एकदा बघा..

तुम्ही नेत्रदान केले तर दोन जणांना दृष्टी येणार आहे याचाही विचार करा.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हाच चहा… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☕☕ हाच चहा ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

बालपणी फुगडी खेळताना, “चहा बाई चहा, गवती चहा, आम्हा मैत्रिणींची फुगडी पाहा” या गाण्याने झालेला चहाचा परिचय. ज्या वयात चहाची चवही माहीत नव्हती. पण गाण्यातून मात्र परिचय होता. त्या वेळी घरात स्टोव्ह वर चहा मोठ्या पातेल्यात ठेवला जायचा त्या काळी म्हणजे मी लहान असताना एकत्र कुटुंब पद्धती होती. एकत्र म्हणजे आई,वडील आणि मुलं नव्हे तर सगळे काका,त्यांची मुले असे मोठे कुटुंब असायचे. आत्या किंवा काकू चहा ठेवायची आणि चहाला बुडबुडे आलेत का? हे बघायला कोणीतरी सांगायचे. आणि ते छोटे मोठे कसे आलेत हे हात, गाल याच्या मदतीने सांगितले जायचे. आणि त्या हावभावा वरुन चहा किती उकळला आहे  ओळखायच्या. मग त्यात दूध घालून झाकण ठेवून थोडा वेळ मुरवायचा. मग दुसऱ्या पातेल्यात गाळून एकेकाला दिला जायचा.

असा चहाचा परिचय! पण प्यायला मात्र बंदी.चहा पिऊन काळी पडशील अशी भीती दाखवली जायची. अजूनही हे कळले नाही,चहा न पिता रंग मात्र चहा सारखा झाला कसा?

मोठे झाल्यावर कळले, इतक्या लहानपणी ज्याचा परिचय झाला तो चहा आपला नाहीच! कोणी एक शेन नुंग नामक चिनी शासक उकळते पाणी घेऊन झाडाखाली बसले होते.आणि अचानक झाडाचे पान त्यात पडले आणि त्या पाण्याचा रंग व चव बदलली हाच तो पहिला चहा. नंतर असेही वाचले, काही बौद्ध भिख्खू ध्यानाला बसताना विशिष्ठ झाडाची पाने खायचे, त्यामुळे त्यांना झोप येत नसे. हाच तो चहा व त्याची पाने. नंतर त्यात साखर,दूध घालून आपला चहा तयार झाला. आणि विविध नावांनी ओळखला जाऊ लागला. आसाम,दार्जिलिंग,निलगिरी अशी नावे घेऊन आला. पण आम्हाला हे काहीच माहिती नसायचे. आम्ही पुण्यातल्या जगप्रसिद्ध महाराष्ट्र टी डेपो समोर रांगेत उभे राहून फॅमिली मिक्सचर मिळाला की धन्यता मानणार. हाच आमचा चहा!

काही मंडळी तर अशी आहेत की त्यांना कोकिळच्या “कुहू कुहू” मध्ये सुध्दा “चहा चहा” ऐकू येते. आणि  “चहाला वेळ नसते,पण चहा वेळेवर लागतो”. “सवाष्णीने कुंकवाला आणि पुरुषाने चहाला नाही म्हणू नये”. अशी सुभाषिते सांगून केव्हाही चहा पिणारे चहाबाज आहेतच की. यांना केव्हाही चहा घेणार का? विचारले की उपकार केल्या प्रमाणे “घेऊ अर्धा” म्हणणारे पण असतातच. विशेष म्हणजे रात्री साडेआठ वाजता रोज चहा घेणारे आणि ती वेळ चुकली तर रात्री दहा वाजता घेऊन चहाशी प्रामाणिक राहणारी मंडळी पण आहेतच.

दिवसेंदिवस त्यात विविध पदार्थ मिक्स होऊन विविध उपयोगाचे ऋतू नुसार स्वरूप बदलणारे विविध चवीचे चहा तयार झाले. आणि आता तर फारच विविधता घेऊन विविध नावांनी चहा येत आहेत. ती नावे व त्या सोबत असलेली चित्रे, विविध नक्षी आणि त्या दुकानांची सजावट पाहून कोणालाही चहाचा मोह न होईल तरच नवल. आणि त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत याची पुरेपूर काळजी घेऊन चहाचे कप आकाराने लहान होत चालले आहेत. अगदी पोलिओ डोस घेतल्या प्रमाणे वाटते.

हे असे मसाला,

गवती,आले, विलायची

चहा घेता घेता एक दिवस

आईस टी समोर आला. आणि गरम, कडक चहाच्या कल्पनेला पुन्हा धक्का बसला. आणि आता तर आपली चहा पावडरच चहातून गायब झाली. आणि याला चहा कसे म्हणावे? हा माझ्या बाल बुध्दीला प्रश्न पडला. मग धाव घेतली गुगल बाबांच्या कडे! त्यांनी सांगितले चहा/टी म्हणजे कोणतीही पाने उकळली की झाला टी आणि आताचे टी बघून गरगरलेच! कारण काही चहा मध्ये पाने पण नाही तर चक्क फुले,बीया काहित झाडाच्या खोडाची साल असे वापरलेले असते.आणि नेहेमीचा रंग टाकून पिवळा,हिरवा,निळा असे इंद्रधनुष्यी रंग पण धारण केलेले चहा समोर येतात.

असे चहाचे अवतार बघता बघता आपल्या चहाचे अस्तित्व धोक्यात आले की काय अशी भीती वाटू लागली आहे. आणि मग चहा,पोहे कार्यक्रमात काय दिले जाणार? आणि चाय पे बुलाया है या ऐवजी कोणते पेय येणार? आणि हाच चहा कोणत्या स्वरूपात मिळणार? आणि चहाच्या टपरीवर गप्पा मारत काय प्यायचे? घरी आलेल्या पाहुण्यांना काय द्यायचे? गाडी चालवताना दर तासाला चहा घेऊन पुढचा प्रवास करणाऱ्यांचे कसे होणार?

असे बरेच प्रश्न मनात आहेत. पण सध्या तरी याची काळजी नाही. अजून तरी हाच चहा प्रचलित आहे. आणि चहाला भेटू या! हे आमंत्रण अजून तरी कायम आहे. तर चला आपणही एकेक चहा घेऊ या.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ १ मे महाराष्ट्र दिन ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

🌸 विविधा 🌸

भीष्माचार्य भालजी ☆ श्री प्रसाद जोग

(भालजी पेंढारकर जन्मदिन दि. २  मे १८९९ निमित्त)

मराठी चित्रसृष्टीतले भीष्माचार्य, कोल्हापूरची शान वाढवणारे “जयप्रभा स्टुडिओ”चे मालक, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कवी, नव्या कलाकारांना घडवणारे मूर्तिकार अशी असंख्य बिरुदे ज्यांना लावता येईल त्या भालजी पेंढारकर यांचा आज स्मृतीदिन

भालजी पेंढारकरांनी कोल्हापूर हे मराठी चित्रपट बनवण्याचे प्रमुख केंद्र बनवले. त्यांच्या जयप्रभा स्टुडिओ मधून एकाहून एक उत्तम चित्रपट निर्मिले गेले. भालजींचे चित्रपट किंवा त्यांची निर्मिती संस्था म्हणजे कलाकार व तंत्रज्ञ घडवणारी एक मोठी कार्यशाळाच होती. तसेच त्यांचा संच म्हणजे कुटुंबच होते. शिस्तबद्धता, वेळापत्रकानुसार काम, कामांचे नेटके वाटप, स्तोत्रपठण, प्रार्थना, रेखीव दिनक्रम, वगैरे…

चित्रपटाच्या माध्यमातून भालजींनी सुलोचनादीदी, चंद्रकांत मांडरे, सूर्यकांत मांडरे, जयश्री गडकर असे असंख्य कलाकार घडवले. शिवाजीराजांचा चा काळ आणि त्या काळातील व्यक्तिरेखा व प्रसंग ही भालजींच्या चित्रपटांची प्रमुख वैशिष्ट्ये होती. त्यांच्या युगप्रवर्तक अशा कारकिर्दीमुळे भालजींना यथार्थतेने चित्रतपस्वी असे म्हटले जाते.

१९४८ मध्ये गांधीजींची हत्या झाल्यानंतरच्या दंगलीमध्ये भालजींचा कोल्हापूर येथील जयप्रभा स्टुडिओ जाळला गेला. नुकताच तयार झालेला मीठभाकर व बाळ गजबरांचा “मेरे लाल” हे चित्रपट आगीत भक्षस्थानी पडले. दीडशे ते दोनशे कामगार बेकार झाले. भालजींनी पुन्हा लाखो रुपये खर्चून जयप्रभास परत उभे केले. जिद्दीतून मीठभाकर व मेरे लाल ची पुनर्निर्मिती केली. मीठभाकरने चांगला व्यवसाय केला. भालजींनी कोल्हापुरात मराठी चित्रनिर्मितीस पुन्हा एकदा वेग मिळवून दिला.

भालजींचे चित्रपट

आकाशवाणी, कान्होपात्रा, कालियामर्दन, गनिमी कावा, गोरखनाथ, छत्रपती शिवाजी, नेताजी पालकर, बहिर्जी नाईक, भक्त दामाजी, मराठा तितुका मेळवावा, महारथी कर्ण, मीठभाकर, मोहित्यांची मंजुळा, राजा गोपीचंद, वाल्मिकी, साधी माणसं, सावित्री, सुवर्णभूमी

भालजींनी योगेश या नावाने गाणी लिहिली ती गाणी देखील लोकप्रिय आहेत.

१) अखेरचा हा तुला दंडवत

२) अरे नंदनंदना

३) डौल मोराच्या मानच्या र

४) तुझी माझी प्रीत जमली नदीकाठी

५) माझ्या कोंबड्याची शान

६) माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जात

७) राजाच्या रंगमहाली

९) वाट पाहुनी जीव शिणला

१०) चल चल जाऊ शिणुमाला.

सिनेसृष्टीतला दादासाहेब फाळके हा अत्युच्च  पुरस्कार त्यांना १९९१ साली प्रदान केला गेला.

भारत सरकारने  त्यांच्या  सन्मानार्थ टपाल तिकीट काढले होते.

भालजी पेंढारकर यांना विनम्र अभिवादन

© श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “घेई छंद…” ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? विविधा ?

☆ “घेई छंद…” ☆ श्री सुनील शिरवाडकर

“घेई छंद…. “

नागपुरातील धंतोली्वर त्या रात्री एक सुरांची अविस्मरणीय मैफिल जमली होती. तसं म्हटलं तर ती सगळी तरुण मुलंच होती. समोर श्रोत्यांमध्ये मात्र नागपुरातील जाणकार, बुजुर्ग संगीतप्रेमी होते. सुरांची ती अचाट मैफिल संपल्यानंतर समोर बसलेल्या, मैफीलीत रत असलेल्या श्रोत्यांना दाद देण्याचेही भान राहिले नव्हते. काहीतरी अलौकिक घडल्यानंतर, अनुभवल्यानंतर वातावरणात भिनलेली ती धुंद शांतता… ती अनुभवणारा तो गायक… त्याचे साथीदार…

आणि अचानक श्रोत्यांमधील एक बुजुर्ग, म्हातारा विचारता झाला…

“काहो देशपांडे… आपले घराणे कुठले ?

“आमच्यापासून सुरू होणार आहे आमचं घराणं…. ” त्या गायकाने ताडकन उत्तर दिले… आणि

दिवाणखान्यात बसलेल्या रसिक नागपुरकरांनी आता मात्र टाळ्यांचा कडकडाट केला.

तिशीच्या आसपास असलेला तो गायक होता… वसंतराव देशपांडे.. तबल्यावर मधु ठाणेदार… आणि पेटीच्या साथीला साक्षात पु. ल. देशपांडे.

कोणत्याही एकच घराण्याची शागिर्दी न पत्करता वसंतरावांनी अनेकांकडे सुरांची माधुकरी मागितली. आणि ती त्यांना मिळालीही. नागपुरात असलेल्या शंकरराव सप्रे गुरुजींकडे वसंतरावांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. सप्रे गुरुजींच्या त्या गायनशाळेत त्यावेळी वसंतरावांबरोबर अजून एक शिष्य गायनाचे धडे गिरवत होता. दोघेही पुढे जाऊन आपल्यागुरुचे नाव त्रिखंडात गाजवतील याची सप्रे गुरुजींना कल्पनाही नसेल. त्यावेळी वसंतरावांबरोबर शिकणारा त्यांचा जोडीदार होता… राम चितळकर…. म्हणजेच सी. रामचंद्र.

नागपुरातील सप्रे गुरुजींनी गायकीचे प्राथमिक धडे तर दिले… पण आता पुढे काय?

नेमके त्याच वेळेला वसंतरावांचे मामा नागपुरात आले होते. ते रेल्वेत नोकरीला होते. लाहोरला. मामाने त्यांना आपल्याबरोबर लाहोरला नेले. त्याकाळी लाहोरला मोठमोठ्या गवयांचे वास्तव होते. अनेक मुसलमान गवयांची मामाची ओळख होती.

कुठूनतरी वसंतरावांना समजले. रावी नदीच्या पलिकडे एक कबर आहे. तेथील विहिरी जवळ काही फकीर बसतात. ते उत्तम गवयी आहेत. वसंतराव तेथे जाऊ लागले. गाणे ऐकू लागले. मामाने पण सांगितले… त्यातील मुख्य फकीर जो आहे… असद अली खां, त्याची क्रुपा झाली तर ती तुला आयुष्यभर कामाला येईल.

खांसाहेबांकडुन गाणे शिकायचे होते. त्यासाठी त्यांना राजी करणे महत्त्वाचे. मामाने सांगितले… टोपलीभर गुलाबाची फुले आणि मिठाई घेऊन खांसाहेबांकडे जा. सोबतीला थोडा चरस असेल तर उत्तम. त्यांचे पाय धर. विनंती कर. हट्ट कर. मग तुला ते गायन शिकवतील.

मामाने सांगितल्याप्रमाणे वसंतरावांनी फुले, मिठाई, आणि हो…. कुठुनतरी चरसही आणला. सर्व वस्तू खांसाहेबाना अर्पण केल्या. विनंती केली. खांसाहेबाना राजी केले.

खासाहेबांनी जवळ असलेल्या विहिरीकडे त्यांना नेले. दोघेही काठावर बसले. संध्याकाळची वेळ होती. वसंतरावांच्या हातात त्यांनी गंडा बांधला. गंडा बांधणे म्हणजे शिष्य या नात्याने गुरुशी नाते जोडणे. गंडा बांधून झाला. मग त्यांनी वसंतरावांना अर्धेकच्चे चणे खायला दिले. हाही एक त्या विधीचा भाग. असले चणे खाताना, चावताना त्रास होतो. कडकडा चावून खावे लागतात. विद्या मिळवण्याचा मार्ग कसा खडतर आहे हे कदाचित त्यातून सुचवायचे असेल. चणे खाऊन झाल्यावर एक लहानसा गुळाचा खडा तोंडात घातला. कानात कुठल्यातरी रागाचे सुर सांगितले.

तालमीला सुरुवात झाली. खांसाहेबांनी जवळच्या एका फकिराला इशारा करताच त्याने ‘मारवा’ आळवायला सुरुवात केली.

वसंतराव सांगतात, “विहीरीवर बसून गाण्यातली गोम अशी होती की काठावर गायलेला सुर विहिरीत घुमुन वर येत असे आणि तंबोर्याचा सुर मिळावा तसा सुर विहीरीतुन मिळत असे “.

सतत तीन महिने खांसाहेबांनी मारवा हा एकच राग शिकवला. वसंतराव म्हणतात की तो त्यांनी असा काही शिकवला की त्या एका रागातून सगळ्या रागांचे मला दर्शन झाले.

मारवा गळ्यात पक्का बसला. आता बाकी रागांचे काय? तशी त्यांनी विचारणाही केली. त्यावर खांसाहेब म्हणाले,

” जा. तु आता गवयी झालास. एक राग तुला आला… तुला सगळे संगीत आले”.

आणि शेवटी म्हणाले….

“एक साधे तो सब साधे…

सब साधे तो कुछ नही साधे “

वसंतराव देशपांडे शास्त्रीय संगीतातील उत्कृष्ट गायक आहेत पण ते उत्तम अभिनेते पण आहेत हे सर्वांना समजले केंव्हा? तर  ‘कट्यार काळजात घुसली ‘हे नाटक रंगमंचावर आले तेव्हा. यातील ‘खांसाहेब’त्यांनी अजरामर केला. वास्तविक त्यापुर्वी त्यांनी पु. लं. च्या ‘तुका म्हणे आता’, ‘दूधभात’ या चित्रपटांतून कामे केली होती. पण ‘कट्यार… ‘मधील खांसाहेब ने त्यांना प्रसिध्दीच्या शिखरावर नेले.

या महान गायकाने उदरनिर्वाहासाठी, प्रपंच चालवण्यासाठी आयुष्यातील भर उमेदीची २४ वर्षे चक्क कारकुनी केली. रात्र रात्र मैफिली गाजवणारे वसंतराव सकाळ झाली की सायकलवर टांग टाकून मिलीटरी ऑफिसमध्ये खर्डेघाशी करायला जात. सदाशिव पेठेत असलेल्या एका खोलीत संसार. एक दोन नाही…. पंचवीस तीस वर्षं. त्यावेळी एका ज्योतीषाला त्यांनी कुंडली दाखवली होती. तो ज्योतिषी वसंतरावांना म्हणाला….

“वसंतराव.. मोठी खट्याळ कुंडली आहे तुमची. तुम्हाला आयुष्यात धन, पैसा, प्रतिष्ठा, सन्मान सर्व काही लाभणार आहे. खडिसाखरेचे ढीग तुमच्या पुढे पडणार आहे. पण अश्यावेळी की त्याचा आस्वाद घ्यायला तुमच्या मुखात दात नसतील”.

त्या ज्योतीष्याकडे पहात मिस्कील स्वरात वसंतराव म्हणाले…

“ठिक आहे. दात नसले तरी हरकत नाही. आम्ही ती खडीसाखर चघळून चघळून खाऊ”.

आयुष्यभर स्वरांचे वैभव मोत्यांसारखे उधळले वसंतरावांनी. सुबत्ता, मानसन्मान, पुरस्कार आयुष्याच्या उत्तरार्धात मिळु लागले. पण फार काळ नाही. निव्रुत्त होण्यासाठी थोडे दिवस राहिले असतानाच संरक्षण खात्याने त्यांची बदली ईशान्येकडील नेफाच्या जंगलात केली. जंगलातील तंबूत त्यांचे वास्तव्य. पाऊस पाणी, रोग राई, जीवजंतू याचा विपरीत परिणाम त्यांच्या प्रक्रुतिवर झाला. तेथून ते परतले. निव्रुत्त झाले. पण तेथे जडलेली पोटाची व्यथा त्यांना त्रास देऊ लागली.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात त्यांचा एकसष्ठीचा सत्कार झाला. त्यानंतर पुढच्याच वर्षी वयाच्या… बासष्ठाव्या वर्षी अकोला येथे झालेल्या बासष्ठाव्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. आणि वर्षभरातच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

आज २ मे. वसंतरावांचा  जन्मदिवस. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नात्यांमधील वैविध्यपूर्ण सुंदरता… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ नात्यांमधील वैविध्यपूर्ण सुंदरता… ☆ सौ कल्याणी केळकर बापट

आपली भारतीय संस्कृती ही अतिशय वैविध्यपूर्ण असल्याने ती मनामध्ये रुजून बसते. ह्या विविधतेमध्ये सणसमारंभ, राहणीमान, नात्यांमधील गोडवा हा तर जास्त मोहवून टाकतो.

भारतीय व्यक्ती ही मुळात कुटुंबप्रिय, माणसांची आवड असणारी, मनापासून माणसं जपणारी आणि रक्ताच्या नात्याइतकच मनाच्या नात्यालाही तोलून धरणारी असते. जवळपास प्रत्येक व्यक्ती ही आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर निरनिराळ्या नात्यांमध्ये समरस होत असते. जन्मापासून मिळतात ती रक्ताची नाती, विवाह नंतर जुळतात ती जरी रक्ताची नाती नसली तरी घट्ट धरून ठेवावी अशी नाती आणि ह्या नातेसंबंधाना जोडून ठेवणारा भक्कम पिलरचे काम करणारी मध्यस्थ व्यक्ती आणि जीवनाच्या प्रवाहात अगदीं लहानपणापासून ते वयाचे कुठलेही बंधन नसलेले मैत्रीचे आणि मनापासून मनाने जोडलेली अनमोल नाती.

पाश्चिमात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृती ह्यामध्ये प्रामुख्याने फरक भारतीय संस्कृतीत हमखास असणाऱ्या नाते संबंध आणि त्यासाठीच्या जपणुकीसाठी असोशीने केल्या जाणाऱ्या प्रयत्ना मध्ये असतो. पाश्चिमात्य संस्कृतीत सगळी नाती ही जवळपास एकाच साच्यात असतात. आपल्या सारखी विविधता तेथे नसते, आपली मंडळी ही आपल्याशी कुणी काकाकाकू, मामामामी, मावशी, आत्या आणि त्याचप्रमाणे ह्या नात्यातून निर्माण झालेली वेगवेगळ्या प्रकारची भावंडं आयुष्यात लज्जत आणतात नाही तर पाश्चिमात्य संस्कृती मध्ये मात्र “सब घोडे बारा टके” ह्या म्हणी नुसार सगळी नाती सरसकट आण्टी, अंकल मध्ये घुसळलेली.

आपल्या पिढीला सगळी नाती माहीत झाली, अनुभवायला मिळाली मात्र आजकाल काळानुरूप घेतल्या जाणाऱ्या “हम दो हमारा एक” ह्या म्हणीनुसार काही नाती ह्या हल्लीच्या मुलांना अनुभवायला मिळतच नाही, असो पण आपण अनुभवलेल्या नात्यांमध्ये खूप जास्त वेगवेगळा आनंद देणारी निरनिराळी नाती होती, आत्या ,मामा, मावशी,  काका, काकू, ह्या अनुषंगाने मैत्र जुळलेली भावंडं ह्यामुळे आपण समृध्द होतो, पश्चिमात्य संस्कृती सारखे आंटी अंकल ह्या एकाच बासनात गुंडाळलेली नाती नव्हती. शिवाय छान लेक जावई, मुलगा सून ही अत्यानंद देणारी नाती आपण कधीच ” इन लॉ” च्या चौकटीत बंदिस्त करत नाही.

खरंच प्रत्येक नात्याची जागा वेगळी, स्थान वेगळं, लज्जत, गोडी आणि खुमारीच वेगळी. परवा अनुभवलेला एक प्रसंग सांगून पोस्ट लांबण न लावता जरा आवरती घेते. परवा एका परिचित कौटुंबिक स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाला जायचा योग आला. तेव्हा तेथील एक स्त्री एका तरुण नवविवाहित तरुणीची ही “माझी लेक” असं म्हणून ओळख करुन देत होती. माझ्या माहिती प्रमाणे त्या स्त्री ला एकुलता एक मुलगा होता, नंतर कळले ती सुनेला मुलीसारखी मानून तिची लेक म्हणून ओळख करुन देत होती. ह्याकडे मी जरा वेगळ्या नजरेने बघितल्यावर मला प्रकर्षाने जाणवले, प्रत्येक नात्याचे स्थान, ते नात, त्यातील लज्जत ही वेगवेगळी असते, शिवाय सासू सुनेचे नाते हे सुध्दा एक खूप सुंदर असं नातं असतं, आजकाल तर आपल्या परिचित लोकांकडे सासुरवास हा शब्द औषधाला सुद्धा सापडत नाही, मग हे सुंदर नविन निर्माण झालेले अलवार नाते फुलवण्यासाठी त्याला लेकीची भूमिका देऊन ती सगळ्यांना सांगत सुटणं, खरंच आवश्यक असतं काय ?

सासुसूनेचे नाते हे सुध्धा मायलेकीच्या नात्या प्रमाणेच एक सुंदर नात असतं फक्त त्याचा प्रकार वेगळा असतो हे मी आता माझ्या आणि आमच्या आईंच्या सलग बत्तीस वर्ष एकत्र घालविण्यानंतर ठामपणें सांगू शकते आणि तेच नात माझ्या नविन आलेल्या सूनेबरोबरही तयार होईलच ह्याची खात्री पण नक्कीच देऊ शकते.

त्यामुळे हा नात्यांचा विषय मांडताना मला हे प्रकर्षाने जाणवलं की प्रत्येक नात्याला आपल्या त्याच्या मुळ जागी ठेऊन त्याच्यातील सौंदर्य टीपाव आणि त्याचा आस्वाद ही घ्यावा. कुठल्याही नात्याला त्याचा ओरिजनल स्वाद घालवून मोल्ड करणे कितपत बरोबर, शिवाय हे मोल्डेड नाते पत शेवटपर्यंत बदललेल्या रुपात टीकेलच ह्याची पण काय निश्चिती ?,अर्थात हे माझे वैयक्तिक मत बर का.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दे डाय रिच ! – लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

☆ दे डाय रिच ! – लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ श्री सुनील देशपांडे 

(नकोशा मालमत्ता)…

एकीकडे तरुण पिढी स्थावर मालमत्तांपासून दूर चालली आहे, तर दुसरीकडे ज्येष्ठ अजूनही स्थावर मालमत्तामध्ये मनाने गुंतून पडलेले आहेत.

फक्त स्वत:साठीच राहायला घर नव्हे, तर आपल्या मुलांसाठीसुद्धा घरे ज्येष्ठांनी घेऊन ठेवली आहेत.

ज्यांची पुढची पिढी महाराष्ट्राच्याही बाहेर नव्हे तर परराष्ट्रात आहे, अशांसाठीसुद्धा पालकांनी आपल्या आयुष्यातील पै-पै जमवून घरे घेतली आहेत.

त्यांच्यापुढील पिढय़ांना या घरांमध्ये काडीचाही रस नाही. या मालमत्तांकडे बघण्यासाठी वेळ नाही. पुढची पिढी खूप व्यवहारी आहे.

माझे एक अशील वयाच्या पंचाऐंशीव्या वर्षी वारले. पत्नीचे आधीच निधन झाले होते. एक मुलगा लंडनमध्ये आणि दुसरा न्यूझीलंडमध्ये रहातो. त्यांचे त्या देशाचे राष्ट्रीयत्व आहे. दोघांनाही वडिलांनी घेतलेल्या घरामध्ये स्वारस्य नव्हते. वडिलांनी इच्छापत्रानुसार सर्व मालमत्ता दोन्ही मुलांत समप्रमाणात देण्याचे लिहून ठेवले होते. मी इच्छापत्रानुसार व्यवस्थापक होतो. दोन्ही मुलांना सर्व मालमत्ता आपल्या नावावर करून घेण्यास, नंतर विकण्यास वेळ नव्हता. दोघांनी माझ्या नावाने कुलमुखत्यार पत्र (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी) बनवून दिले. सर्व मालमत्ता विकून येणारे पैसे विशिष्ट खात्यात जमा करून त्यांच्या देशात पाठवण्यास सांगितले.

ज्येष्ठ नागरिक आपल्या वास्तूंमध्ये भावनात्मकदृष्टय़ा गुंतलेले असतात, तशी तरुण पिढी नसते.

एका क्लाएंटने त्यांच्या निवृत्तीपश्चात राहण्यासाठी कोकणात घर बांधले होते. आई-वडिलांच्या पश्चात त्या मालमत्तेच्या सात/बारा उताऱ्यावर नावे लावण्यास मुलांना वेळ नव्हता. खेडय़ात जाऊन सरकारी अधिकाऱ्यांबरोबर कागदपत्रांची पूर्तता करणे कटकटीचे वाटत होते. हे सोपस्कार करून मिळणाऱ्या पशांमध्ये रस नव्हता. कारण त्यांचे उत्पन्न भरपूर होते. म्हणून वडिलांनाच त्यांच्या पश्चात, कोठे आड जागी घर बांधले म्हणून दूषणे देत होते.

आपली पारंपरिक दुसरी गुंतवणूक सोने-नाणे आणि चांदीच्या वस्तूंमध्ये असते. आणि ती सांभाळणे जोखमीचे असल्याने ती बँकेच्या लॉकरमध्ये ठेवली जाते. बँकेत ठेवल्याने त्याचा वापर संपतो आणि लॉकरचे भाडे व लॉकरसाठी द्यावी लागणारी ठेव रक्कम यांनी आपण बँकेला श्रीमंत करत असतो.

आमच्या लहानपणी सोन्याचा भाव अमुक होता. आज तो इतका वाढला, असे आपण म्हणतो. आपण मधली वर्षे मोजत नाही. सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये दीर्घ मुदतीत परतावा फक्त सात टक्के असतो. वस्तू घडणावळ आणि वस्तू मोडताना होणारी घट विचारात घेतल्यास तो अजून कमी होतो.

तसेच होणाऱ्या नफ्यावर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो तो वेगळाच.

सोन्या-चांदीतली गुंतवणूक ही खूपदा भावनात्मक जास्त असते. त्याचा व्यावहारिक विचार केला जात नाही.

मग सोने घेताना शुद्ध सोने घेऊन ठेवण्याऐवजी मुली-सुनांसाठी दागिने किंवा नातवंडांसाठी दागिने या स्वरूपात केली जाते.

खूपदा जुन्या पद्धतीचे दागिने नवीन पिढीस आवडत नाहीत. मग ते मोडून नवीन डिझाइनचे बनविले जातात. यात पुन्हा घट आणि घडणावळ जाते.

आज बाजारांत फेरफटका मारल्यास सर्वात जास्त दुकाने मोबाइलची नंतर सोने-चांदी, कपडेलत्ते, ओषधे, खाण्याचे पदार्थ यांची असतात. त्या तुलनेत वाणसामानाची फार कमी असतात. ज्यात नफा प्रचंड ती दुकाने जास्त. स्वाभाविकपणे त्यात ग्राहकाचा फायदा कमीच होणार.

नवीन पिढी जोखीम नको म्हणून खरे दागिने घालण्यापेक्षा खोटे घालणे पसंत करते. शेवटी खोटे जास्तच चकाकते. 😀

सोन्याची मागणी चीन आणि भारत देशात सर्वात जास्त आहे. इतर देशांत सोने दागिन्यांच्या स्वरूपात फार थोडय़ा प्रमाणात खरेदी केले जाते.

गुंतवणूक म्हणून इतर देशांत सोने शुद्ध स्वरूपात बाळगले जाते. बाजारातील सोन्याच्या भावातील चढ उतारानुसार त्याची खरेदी-विक्री केली जाते.

गुंतवणुकीच्या संकल्पना बदलत चालल्या आहेत. जुन्या योजनांचा परतावा पुढील काळात अजून कमी होण्याची शक्यता आहे. तो वेळीच समजून घ्या व पर्यायी गुंतवणूक योजना निवडणे क्रमप्राप्त ठरेल.

तिसरी भावनात्मक गुंतवणूक मुलांचे उच्चशिक्षण.

मुलांच्या उच्चशिक्षणासाठी आपल्या हौस-मौजेवर काट मारून प्रसंगी कर्ज काढतात. मुलं नोकरीला लागली की ते कर्ज फेडतात. मुलं परदेशात असतील तर हे कर्ज खूपदा आई-वडीलच फेडतात. याच्या पुढे जाऊन काही ज्येष्ठ आपल्या नातवंडांसाठी शिक्षणाची सोय म्हणून आयुर्वमिा पॉलिसी किंवा इतर गुंतवणूक करत असतात.

असेच एका ज्येष्ठ क्लाएंटला गुंतवणूक करताना विचारले,

‘‘काका, मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढले. आता नातवासाठी गुंतवणूक का करता?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस खूप वाढतोय. तेवढीच नातवाच्या शिक्षणासाठी माझी थोडीशी मदत.’’

मी त्यांना म्हटले, ‘‘नातवाच्या शिक्षणासाठी गरज किती रकमेची असेल, याचा अंदाज आहे का? आणि तुमच्या मुलाने नातवाच्या शिक्षणासाठी यापूर्वीच ‘एसआयपी’ गुंतवणूक सुरू केली आहे. ती रक्कम त्याच्या शिक्षणासाठी भरपूर होईल.

नातवाच्या नावाने लाखभर रुपये ठेवण्यापेक्षा तुम्ही दोघे चांगल्या पर्यटनाला जाऊन या.’’

त्यावर ते म्हणाले, ‘‘ही रक्कम नातवाच्या वाढदिवसाची भेट म्हणून आता तरी गुंतवा. नंतरच्या वेळचे नंतर पाहू.’’

आपली मानसिकता कशी आहे. आपल्याला मुलांकडून पसे घ्यायला त्यातसुद्धा लग्न झालेल्या मुलीकडून पसे घ्यायला कमीपणा वाटतो. पण नातवंडांची सोय पाहणे जबाबदारीचे वाटते.

आयुष्यभर मुलांचा विचार केला आणि म्हातारपणी नातवंडांचा विचार करता.

आपले आयुर्मान वाढते आहे. आपले खर्च वाढते आहेत. याचा विचार करा. कायम दुसऱ्यांचा विचार करण्यात स्वत:ची हौस-मौज विसरू नका. आयुष्य स्वत:साठी जगा.

असे म्हणतात की *भारतीय लोक आयुष्यभर गरिबीत (कष्टांत) राहतात आणि पुढल्या पिढीला श्रीमंत करतात..

दे डाय रीच!*

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print