डॉ मीना श्रीवास्तव
पुस्तकावर बोलू काही
☆ ‘मनातलं...’ – लेखिका - सुश्री मोहिनी हेडाऊ ☆ परिचय – डॉ मीना श्रीवास्तव ☆
पुस्तक- ‘मनातलं’
लेखिका- मोहिनी हेडाऊ
प्रकाशक- लोकव्रत प्रकाशन
पृष्ठसंख्या- १६६
किंमत- २०० रुपये
पुस्तक परीक्षण- डॉ. मीना श्रीवास्तव, ठाणे
मोहिनी हेडाऊ यांनी लिहिलेलं 'मनातलं' हे पुस्तक नुकतंच वाचलं! नुसते वाचून बाजूला सारण्यासारखे हे पुस्तक नाही हे पहिला लेख वाचल्यावरच लक्षात आले. मोहिनीयांचा जनसंपर्क खूप अफाट आणि अनुभवाचा आवाक्या त्याहून अवाढव्य. हे या पुस्तकातील विविधरंगी, विविधविषयी लेख वाचल्यावर लगेच कळते. इतके लेख लिहूनही या चिरंतन शाश्वत विश्वाची, अनोख्या अंतराळाची, असंख्य पुस्तकांची अन अमोप आत्मचिंतनाची त्यांची तृष्णा वाढता वाढता वाढे असे वाटते. पुस्तकातील लेखांची संख्या ६५! एखादा कॅलिडोस्कोप (बहुरूपदर्शक) फिरवतांना उमटणारे बहुरंगी भूमितीय आकार बघून जसे डोळे दिपतात आणि निवतात तसे हे पुस्तक वाचल्यावर झाले. डिझाइनर साडीसारखे एक डिझाईन एकदाच दिसते, एक आकार एक रंग आणि एक गंध परत येत नाही, तसेच त्यांच्या लेखांचे कुठलेही विषय रिपीट होत नाहीत. त्यांना इंद्रधनुषी रंग म्हणता येणार नाहीत कारण त्याच्या सप्तरंगाला सीमा असते! मात्र या पुस्तकाचे लेखनरंग अनवट मिश्रण घेऊन येतात.
पुस्तकाचा बाह्यरंगी प्रारंभच मनाला...
सौ. उज्ज्वला केळकर
पुस्तकावर बोलू काही
☆ “सीतायन – विद्रोह आणि वेदनेचे रसायन” – डॉ. तारा भवाळकर ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆
सीतायन
डॉ. तारा भवाळकर
मनोविकास प्रकाशन
पृष्ठे – 188, मूल्य- २५०रु.
नुकतेच डॉ. तारा भावाळकर लिखित ‘सीतायन’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केले. लहानपणापासूनच सीतेच्या व्यक्तिमत्वाने लेखिकेच्या मनाचा ठाव घेतला. आणि त्यांच्या मनात सजले ते सीतयन रामायण नव्हे. त्या लिहितात, ‘रामाविषयी,त्याच्या त्यागाविषयी, मातृ-पितृ- गुरू भ्क्तीविषयी, शौर्य- धैर्याविषयी लोकमानसात विलक्षण कौतुक, आदर आहे. पण त्याच वेळी सीतेविषयी विलक्षण सहानुभूती,, कळवळा, आदर, गरोदरपणी तिचा त्याग करणार्या रामाविषयी निषेध, अनादर, धि:कार दिसून येतो. ‘ विशेषत: स्त्रियांच्या लोकगीतात ही गोष्ट प्रकर्षाने दिसून येते. त्यांनी म्हंटलय,
राम म्हणू राम नाही सीतेच्या तोलाचा
हिरकणी सीतामाई राम हलक्या दिलाचा
‘रामायण ‘ हे भारतीय परंपरेतील अत्यंत प्रभावी असे मिथक (पुराणकथा) आहे. ही कथा अभिजनांच्या ग्रंथातून प्रवाहित होत आपल्यापर्यंत आली. तशीच मौखिक अशा लोकपरंपरेतूनही प्रवाहित झाली. लोक परंपरेतील विविध रामायणांचा, विविध भाषी रामायणांचा अभ्यास करून तारा भावाळकर यांनी ‘सीतयन’ हे पुस्तक सिद्ध केले. त्या लिहितात,’ गाव-गाड्यातील कामकरी- कष्टकरी स्त्रियांनी आपले कष्टाची कामे करताना सीतेविषयी भरभरून लिहिलय....
सुश्री मंजिरी येडूरकर
पुस्तकावर बोलू काही
☆ “समर्थशिष्य कल्याण” – लेखिका : श्रीमती अनुराधा फाटक ☆ परिचय – सौ. मंजिरी येडूरकर ☆
पुस्तक – समर्थशिष्य कल्याण (लघु कादंबरी)
लेखिका – सुश्री अनुराधा फाटक
प्रकाशक – रावा प्रकाशन
पृष्ठ संख्या – 108
किंमत – 210 रु
परिचय – मंजिरी येडूरकर.
अनुराधा फाटक यांचं एक नवीन पुस्तक 'समर्थ शिष्य कल्याण'. ही लघु कादंबरी रावा प्रकाशनने प्रकाशित केली आहे. मुखपृष्ठ प्रतिकात्मक असून सुद्धा आपण काय वाचणार आहोत, हे सांगण्यास समर्थ आहे. हा एक अभ्यासपूर्ण ग्रंथ आहे. ग्रंथ म्हणण्याइतका मोठ्ठा नसला तरी त्याचं साहित्यिक मूल्य ग्रंथाइतकंच आहे.
श्रीमती अनुराधा फाटक
आपल्याला कल्याणस्वामी हे समर्थांचे शिष्य एवढंच माहीत आहे. समर्थांच्या बरोबर असताना त्यांचं एवढं अफाट साहित्य लिहून देण्याचं, त्याच्या प्रती काढण्याचं काम त्यांच्या या शिष्याने केले आहे. गुरूचा लाडका शिष्य होणे किती अवघड आहे, किती खडतर तपस्या आहे याची जाणीव होते. समर्थांच्या पश्चात कल्याणस्वामींनी त्यांचं कार्य सुरू ठेवलं, मोठ्ठा शिष्यवर्ग निर्माण केला. ब्रह्मप्राप्ती, आत्मानंद, सोलीव सुख या सर्व स्थितींचा अनुभव कल्याणस्वामींनी घेतला. त्यांचं स्वतःचं साहित्य सुद्धा इतकं समृद्ध आहे की वाचणारा थक्क होऊन जातो. आणि वाईट...
सौ. अलका ओमप्रकाश माळी
पुस्तकावर बोलू काही
☆ “सूर्य गिळणारी मी” – लेखिका – सुश्री अरुणा सबाने ☆ परिचय – सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆
पुस्तकाचे नाव... सूर्य गिळणारी मी
लेखिका... सुश्री अरुणा सबाने
मनोविकास प्रकाशन
पृष्ठ संख्या...496
आपण वाचतो आपल्याला आवडेल आपल्याला रुचेल, पचतील अशी पुस्तकं आपण वाचनासाठी निवडतो.. पण काही वेळा काही पुस्तकं आपल्याला सतत खुणावत राहतात, आकर्षित करत राहतात अशाच काही पुस्तकांमधील एक पुस्तकं एक आत्मचरित्र म्हणजे अरुणा सबाने ह्याचं सूर्य गिळणारी मी हे पुस्तकं.. काही महिन्यांपूर्वी लोकसत्ता मध्ये ह्या पुस्तकाविषयी वाचलं होतं आणि तेंव्हा पासूनच हे पुस्तकं मला खुणावत होतं.. आणि योगायोग असा की काहीच दिवसात भावार्थ व्हॅन मध्ये मला हे पुस्तकं दिसलं मग काय लगेचच घेतलं आणि आज त्या पुस्तकाविषयी लिहिण्याच धाडस करते आहे..
सूर्य गिळणारी मी वाचायला घेतलं आणि एका सुशिक्षित, हुशार, आत्मविश्वास ही लाजेल अशा एका कर्तबगार स्त्रिच्या जीवनाचे पैलू वाचताना अनेकदा डोळे पाणावले, नकळत कधी सुखावले, कधी लग्न टिकविण्यासाठी धडपडणाऱ्या अरुणाचा राग ही आला.. पण तरीही ह्या पुस्तकातील अरुणाची जिद्द, आत्मविश्वास आपल्याला पुस्तकं खाली ठेवू देत नाही.. आता ह्या पुस्तकाची थोडक्यात...
सौ राधिका भांडारकर
पुस्तकावर बोलू काही
☆ “समाजभूषण २” – लेखिका – सौ. रश्मी उल्हास हेडे ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆
समाजभूषण २ (व्यक्ती परिचय)
लेखिका :सौ. रश्मी उल्हास हेडे
प्रकाशक: सौ. अलका देवेंद्र भुजबळ(न्यूज स्टोरी टुडे)
पृष्ठे:१६८
सामान्यातलं असामान्यत्व म्हणजे काय असतं याची प्रचिती मला समाजभूषण २ हे सौ.रश्मी हेडे यांचे पुस्तक वाचताना आली. समाजभूषण १ हे पुस्तक मी वाचलेले होते. त्यावर लिहिलेही होते. त्यामुळे अर्थातच समाजभूषण २ हाही लेखसंग्रह वाचण्याची खूपच उत्सुकता होती. प्रकाशक सौ. अलका देवेंद्र भुजबळ( न्यूज स्टोरी टुडे) यांनी हे पुस्तक प्रकाशित करून खरोखरच समाजापुढे यशाची व्याख्या, यशाचे मार्ग आणि यश मिळवण्यासाठी असावी लागणारी मानसिकता याचा एक सुंदर वस्तू पाठच सादर केला आहे.
या पुस्तकात ३७ जणांच्या जीवनकथा आहेत. प्रत्येक व्यक्तीची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन रश्मी हेडे यांनी त्यांच्या जीवनातले नेमके मर्म ओळखून हा लेखन प्रपंच केलेला आहे. आणि तोही एक निश्चित सकारात्मक दृष्टिकोन ठेवून.
कासार समाजाला भूषण ठरलेली ही सर्वच मंडळी म्हणजे तेजोमय रत्नासारखीच आहेत. प्रत्येक व्यक्तीचा जीवन प्रवास जरी वेगवेगळा असला तरी या सर्व व्यक्तींमध्ये गुणात्मक साम्य आहे. साधारणपणे ४० ते ६० वयोगटातल्या या व्यक्ती आहेत. एखाद दुसरा अपवाद सोडल्यास याच वयोगटातली ही उल्लेखनीय...
सुश्री विभावरी कुलकर्णी
पुस्तकावर बोलू काही
☆ 'अष्टदीप’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
पुस्तक - ‘अष्टदीप’
लेखक- श्री विश्वास देशपांडे, चाळीसगाव
प्रकाशक - विश्वकर्मा पब्लिकेशन्स
पृष्ठसंख्या - ३०० पाने
पुस्तकाचे मूल्य - ४२५ रुपये
पुस्तक परीक्षण- सुश्री विभावरी कुलकर्णी
अष्टदीप पुस्तकाविषयी
या पुस्तकात भारतरत्न मिळालेल्या आठ व्यक्तींची चरित्रे लेखकाने रेखाटली आहेत. महर्षी कर्वे, जे आर डी टाटा, सर विश्वेश्वरय्या, लता मंगेशकर, लाल बहादूर शास्त्री, अटल बिहारी वाजपेयी, सरदार पटेल आणि ए पी जे अब्दुल कलाम. या सर्वांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग आणि त्यांचे कर्तृत्व रसाळ आणि सोप्या भाषेत वर्णन केले आहे. दीपस्तंभाप्रमाणेच ' अष्टदीप ' हे पुस्तक तरुणाईसाठी प्रेरणास्रोत ठरेल यात शंका नाही.यातील व्यक्ती भिन्न परिस्थितीतून असलेल्या आहेत.पण सर्वांनी काम मात्र देशासाठीच केले.आणि त्या साठी या सर्वांच्या नावा आधी असलेली विशेषणे त्यांचे कार्य सांगून जातात.या सर्वांनीच अतिशय खडतर प्रवास केला आहे.आणि तोच या पुस्तकात वाचायला मिळतो.
निश्चयाचा महामेरू महर्षी धोंडो केशव कर्वे
नाव वाचताच लक्षात येते खूप प्रतिकूल परिस्थितीत अचल महामेरू प्रमाणे ठाम ध्येय डोळ्या समोर ठेवून निश्चयाने काम केले आहे.त्यांचे विधवांचे पुनरुत्थान आणि स्त्री शिक्षण...
सौ. सुनंदा शिवाजी कदम
परिचय
मिस्टरांना बिझनेस मध्ये मदत करते.
वाचन लिखाणाची आवड. वाचनाच्या आवडी पोटी आम्ही मैत्रीणींनी मिळून चालू केले वाचनप्रेमी वाचनालय. वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी दर रविवारी मुलांसाठी वाचन कट्टा घेते.
पुस्तकावर बोलू काही
☆ “मागे वळून पाहताना” – डॉ. पी. डी. सोनवणे ☆ परिचय – सौ. सुनंदा शिवाजी कदम ☆
पुस्तकाचे नाव_ मागे वळून पाहताना
लेखक_ डॉ. पी. डी. सोनवणे
प्रकाशन_ शिवस्पर्श प्रकाशन
पृष्ठसंख्या_ 407
मूल्य_ 500/
पुस्तक अभिप्राय...
आयुष्यात कुठेतरी थांबावं लागतं. लेखक आयुष्याच्या एका वळणावर आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून थांबायचे ठरवतात. तेव्हा आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहताना, त्यांनी अनुभवलेल्या आठवणी कागदावर उतरतात, आणि जन्म होतो ...मागे वळून पाहताना...या पुस्तकाचा.. त्यांनी स्वतः लिहिलेल्या त्यांच्या आत्मचरित्राचा..
लेखकाचा जन्म खेड्यातला, पण सधन कुटुंबातला. आजोबांची इच्छा नातवाने डॉक्टर होण्याची. फक्त इच्छा नाही तर त्यांच्या प्रयत्नांनाही सलाम करावासा वाटतो. चौथीपर्यंत लेखकांना त्यांचे आजोबा खांद्यावरून शाळेत सोडत. अभ्यासात गोडी लागण्यासाठी शिक्षकांना स्वतःच बक्षीस देत व उत्तर बरोबर आले कि ते आपल्या नातवाला देण्यास सांगत.
आजोबांच्या कष्टाचे चीज करत, लेखक नेहमी वर्गात पहिले येत असत. एकेक पायरी पुढे चढत पुण्याला मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळतो. मेडिकल मध्ये असतानाच,...
सौ राधिका भांडारकर
पुस्तकावर बोलू काही
☆ "प्रेम रंगे, ऋतूसंगे" - कवी - श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆
प्रेम रंगे, ऋतू संगे
कवी: सुहास रघुनाथ पंडित
प्रकाशक: अक्षरदीप प्रकाशन आणि वितरण
प्रथम आवृत्ती:१ मे २०२३
श्री सुहास रघुनाथ पंडित यांचा दुसरा काव्यसंग्रह प्रेम रंगे ऋतूसंगे हा नुकताच प्रकाशित झाला. या संग्रहातल्या कविता वाचताना प्रेम या सुंदर भावनेचा एक विस्तृत, नैसर्गिक आणि शिवाय अतिशय सुंदर शब्दात व्यक्त झालेला भाव अनुभवायला मिळाला.
श्री सुहास रघुनाथ पंडित
पुस्तक हातात घेतल्यानंतर माझं पहिलं लक्ष गेलं ते अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण अशा मुखपृष्ठावर. हिरव्या धरणीच्या पार्श्वभूमीवर सुंदर बहरलेला लाल गुलमोहर आणि एक मानवी हात ज्यावरचे तर्जनी आणि अंगठा यातलं अंतर हे फारच बोलकं आहे. कुठलाही चित्रकार जेव्हा समोरच्या दृश्याचं चित्र कागदावर रेखाटतो तेव्हा रेखाटण्यापूर्वी तर्जनी आणि अंगठा उघडून त्या अंतरातून एक माप घेत असतो. ते समोरचं दृश्य त्याला त्या तेवढ्या स्केलमध्ये चितारायचं असतं. कवी हा ही चित्रकारच असतो नाही का? फक्त त्याच्यासाठी रंग, रेषा हे शब्दांच्या रूपात असतात आणि जे जे अवतीभवती घडत असते, दिसत असते ते सारे तो मनाच्या एका स्केलमध्ये टिपत...
सौ. रेखा दयानंद हिरेमठ
पुस्तकावर बोलू काही
☆ ‘एक उलट एक सुलट’ – लेखिका - सुश्री अमृता सुभाष ☆ परिचय – सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆
पुस्तकाचे नाव - एक उलट एक सुलट
लेखिका - अमृता सुभाष
प्रकाशन - राजहंस प्रकाशन
पृष्ठसंख्या - 178
किंमत - 225
वाचनालयात पुस्तके चाळताना माझी नजर एका पुस्तकावर गेली. त्यावर अमृता सुभाष चा फोटो होता आणि लेखिका देखिल अमृता सुभाषच.
पटकन हे पुस्तक मी निवडलं.हे पुस्तक निवडण्याचे मुळ कारण म्हणजे अमृता सुभाषचं खूप वर्षापूर्वी ती फुलराणी नाटक पाहीले होते. तेव्हा पासून तिने माझ्या मनावर अधिराज्य केले. तिचं ते "तुला शिकवीन चांगलाच धडा "काही केल्या डोळ्यासमोरून हटत नाही.त्यामुळे हे पुस्तक वाचायची प्रबळ इच्छा झाली.
सुरवातीपासूनच हे पुस्तक खिळवून ठेवतं आणि तिच्या प्रेमात पडायला लावतं. लोकसत्ता चतुरंग पुरवणीतील लेखिकेच्या एकत्रित लेखांचाच हा लेखसंग्रह आहे.
प्रस्तावनेपासूनच लेखिकेच्या लेखनाचे अक्षरशः गारुड पडते. प्रस्तावनेमध्ये तिने तिच्या नातेवाईकांचा आणि लिखाणाचा परस्पर संबंध कसा आहे यावर भाष्य केलेले आहे.
पहिला लेख तिने तिचे "अमृता सुभाष " हे पडद्यावरिल नाव कसे ठरविले याबाबत उहापोह केला आहे. तिने जाणून बुजून स्वतःचं आडनाव लावले नाही कारण...
सौ.मनिषा विजय चव्हाण
अल्प स्वपरिचय
मी सौ.मनिषा विजय चव्हाण फार्मासिस्ट म्हणून मेडिकल मध्ये रूजू आहे. वाचनाची आवड आहे,पुस्तके वाचून अभिप्राय लिहिते. कविता लिहिते.
पुस्तकावर बोलू काही
☆ ‘अस्तित्व’ – सुश्री सुधा मूर्ती - अनुवाद - प्रा ए आर यार्दी ☆ संवादिनी - सौ. मनिषा विजय चव्हाण ☆
पुस्तक - अस्तित्व
लेखिका - सुश्री सुधा मूर्ती
अनुवाद - प्रा ए आर यार्दी
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे
पृष्ठसंख्या - १०४ पाने
पुस्तकाचे मूल्य - ११0 रुपये
संवादिनी - सौ. मनिषा विजय चव्हाण
मुकेश उर्फ मुन्ना याच्या जिवनपटावर आधारीत कादंबरी 'अस्तित्व'.स्वतःचे अस्तित्व किती महत्वाचे आहे.अस्तित्व असणे ,ते जपणे म्हणजे जणू लढाईच.स्वतःचे अस्तित्व हरविलेल्या माणसाची अवस्था अतिशय दयनीय होते .
हिच गोष्ट आपणास 'अस्तित्व' कादंबरी वाचल्यावर कळते.
मुन्नाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो.
मग माझी आई कोण?तिने मला का टाकले? तिच्यावर अशी कोणती वेळ आली कि तिने मला दुस-याच्या स्वाधीन केले? हे शोधण्यासाठीचा त्याचा प्रवास,त्याने केलेला संपत्तीचा त्याग.आईवडिलांवरील त्याची श्रद्धा,प्रेम,त्याच्या स्वभावातील खरेपणा.सत्य स्विकारण्याची त्याची मानसिकता.सर्व काही ह्रदयाला भिडते.
स्त्रीचे परमपावन स्वरूप म्हणजे 'आई'.
त्या आईची तीन रूपे यात अनुभवायला मिळतात.
जन्म देणारी आई, दूध पाजणारी आई.
पाळणारी, घडवणारी,संस्कारक्षम पूर्ण माणूस बनवणारी आई.
महान अश्या थोर मनाच्या...