हरियाणा लेखक मंच’ का प्रथम वार्षिक सम्मेलन 27 नवम्बर को करनाल में
हरियाणा लेखक मंच’ का प्रथम वार्षिक सम्मेलन 27 नवम्बर को करनाल में
‘हरियाणा लेखक मंच‘ का प्रथम वार्षिक सम्मेलन दिनांक 27 नवंबर, 2022, दिन रविवार को गुरु नानक खालसा कॉलेज, रेलवे रोड, करनाल (हरियाणा) में सुबह 10:00 बजे से शाम 04:00 बजे तक आयोजित किया जा रहा है।
दो सत्रों में होने वाले इस कार्यक्रम में सुप्रसिद्ध लेखक एवं ग़ज़लकार श्री ज्ञानप्रकाश विवेक ‘समकालीन परिदृश्य एवं कहानी’ और सुप्रसिद्ध लेखक एवं कवि श्री हरभगवान चावला ‘समकालीन परिदृश्य एवं कविता’ पर अपनी बात रखेंगे।
पुस्तक विमोचन एवं पुस्तक प्रदर्शनी का कार्यक्रम भी रखा गया है।
वरिष्ठ साहित्यकार श्री कमलेश भारतीय, हिसार एवं श्री अशोक भाटिया, करनाल के नेतृत्व में और इस मंच के फाउंडर मेंबर्स डॉ राधेश्याम भारतीय, करनाल, श्री अजय सिंह राणा, चंडीगढ़, श्री ब्रह्म दत्त शर्मा, यमुनानगर और श्री पंकज शर्मा, अम्बाला के सहयोग से यह आयोजन किया जा रहा है, जिसमें हरियाणा एवं अन्य प्रदेशों के अनेक वरिष्ठ एवं युवा साहित्यकार भाग लेंगे।
साभार – श्री विजय कुमार, सह-संपादक ‘शुभ तारिका’ (मासिक पत्रिका)
संपर्क – # 103-सी, अशोक नगर, नज़दीक शिव मंदिर, अम्बाला छावनी- 133001 (हरियाणा), ई मेल- [email protected] मोबाइल : 9813130512
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…2 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆
सीता
रामायण हा आपल्या संस्कृतीतील एक आदर्श ग्रंथ मानला जातो. आदर्श माता- पती- पत्नी- पिता अशी अनेक नाती येथे आदर्श म्हणून बघितली जातात. आपल्यासमोर सीता म्हणजे केवळ एक आदर्श पत्नी, सून अशाच रुपात उभी केली गेली आहे. पण रामायण आणि संस्कृत साहित्याचा बारकाईने अभ्यास केला तर असे लक्षात येते की सीता तेवढीच कणखर आणि निश्चयी स्त्री होती.
रावणाचा पराभव करून जेव्हा राम सीतेला सोडवतो आणि तिच्यापुढे अग्निदिव्य करण्याचा प्रस्ताव मांडतो त्यावेळी सीता तो प्रस्ताव स्वीकारते पण रामाला सुनावते,“ प्रभू, माझ्यात जे स्त्रीत्व म्हणजे निर्बलत्व आहे त्यावर तुम्ही एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे संशय घेत आहात. पण माझ्यातील सशक्त अशा पत्नीत्वावर तुमचा विश्वास नाही. माझा स्वभाव आणि हृदय नेहमीच स्थिर आहे आणि तिथे फक्त तुम्हालाच स्थान आहे. भलेही रावणाने मला स्पर्श करण्याचा प्रयत्न जरी केला असता तरी माझी तुमच्यावरची भक्ती आणि प्रेम यत्किंचितही कमी झाले नसते. त्यामुळे मनाने मी नेहमीच पवित्र आहे.”
आज समाजामध्ये विनयभंगाची अनेक उदाहरणे दिसत असताना केवळ शारीरिक पवित्र्यावर स्त्रीचे चारित्र्य ठरवले जाते. अशावेळी हजारो वर्षांपूर्वी जन्माला आलेली ही स्त्री सहजपणे एक शाश्वत सत्य सांगून जाते.
अयोध्येत परत आल्यावर काही काळ सुखात घालवल्यावर केवळ एका सामान्य नागरिकाच्या बोलण्यामुळे राम सीतेचा त्याग करतो. आणि तेही अशावेळी जेव्हा तिच्या पोटात त्याचा अंश वाढत असतो. अरण्यात पोहोचेपर्यंत सीतेला याची कल्पनाही नसते. जेव्हा तिला ते समजते त्यावेळी अपमानाने क्रोधीत झालेली सीता तत्क्षणी लक्ष्मणाला विचारते,“ माझ्या अशा अवस्थेत माझा त्याग करणे योग्य आहे? हीच का तुमच्या इक्ष्वाकु वंशाची परंपरा?” त्यानंतर शांत झाल्यावर “हेच आपले प्राक्तन आहे. कदाचित गेल्या जन्मीचे पाप मी या जन्मी फेडत असेन ” असे स्वतःच्या मनाला समजावत ती आलेल्या परिस्थितीला खंबीर मनाने सामोरी जाते.
यातली अन्यायाला विरोध करणारी सीता पदोपदी प्रत्ययास येतेच. पण त्याचबरोबरच समोर आलेल्या संकटाला तितक्याच सक्षमतेने तोंड देणारी सीता तितकीच सामर्थ्यवान वाटते.
सर्वात शेवटी जेव्हा रामाची आणि लव-कुश- सीतेची गाठ पडते आणि राम तिला पुन्हा अयोध्येस नेण्यास उत्सुक असतो तेव्हा ती येण्यास नकार देते. ज्या ठिकाणी ती राणी म्हणून मानाने वावरलेली असते. ज्या प्रजेवर तिने मनापासून प्रेम केलेले असते. तिच प्रजा तिच्यावर अन्याय होत असताना तिच्या बाजूने उभी रहात नाही. ज्या पतीसाठी, त्याच्यावरील प्रेमासाठी तिनेही चौदा वर्षे वनवासात घालवली त्यानेही तिची उपेक्षाच केली ही खंत कुठेतरी तिच्या मनात असतेच. जिथे तिच्या आत्मसन्मानाला डावलले गेले तिथे ती पुन्हा पाऊल ठेवत नाही. त्यातून तिचा स्वाभिमान दिसून येतो.
अशाप्रकारे आदर्श सून, आदर्श पत्नी, आदर्श माता असणारी सीता तितकीच निग्रही, स्वाभिमानी आणि अन्यायाविरुद्ध लढणारी सशक्त स्त्री होती.
तात्यांच्या ‘ बाहेर जाऊन बघण्याच्या..’ विचाराने आणखी घाबरून जात त्यांची बायको म्हणाली.
“अगं ,नको काय ? मागे गुरं आहेत गोठ्यात.. बघायला हवं.”
तात्या बॅटरी घेऊन मागचे दार उघडून मागील बाजूस आले. त्यांनी गोठ्यात बॅटरीचा झोत टाकला. गोठा आणि गुरं सुरक्षित होती.. पण झालेल्या आवाजाने बुजून दाव्यांतून मोकळे होण्यासाठी धडपडत होती..
” गंगे ss ! “
तात्यांनी गोठ्याजवळ जात गाईला हाक मारली तशी त्यांच्या आवाजाने सारी जनावरे आश्वस्थ झाल्यासारखी शांत झाली. तात्यांच्या आवाजाने त्यांना आधार वाटला असावा. त्यांनी गोठ्यात जाऊन सर्वत्र बॅटरीचा प्रकाशझोत टाकला आणि प्रत्येक जनावराच्या पाठीवर थाप मारत बाहेर आले. ‘जवळपास कुठंतरी झाड पडले असेल, बघू सकाळी.’ असे घराच्या मागच्या दारात उभ्या असलेल्या बायकोला म्हणत आत जाणार तितक्यात परत काहीतरी कोसळल्यासारखा आवाज झाला. त्यांनी पाऊल मागे घेत आवाजाच्या दिशेने सभोवार बॅटरीचा झोत टाकला. काहीच दिसेना. ते दोन पावले पुढे निघाले तोच भिऊन दाराशी थिजलेल्या त्यांच्या बायकोने ओरडून सांगितले,
” अहो, फार पुढं जाऊ नका… एखादे झाड नाहीतर झाडाची फांदी तुटून पडायची..”
ते क्षणभर थबकले. एक दोन पावले मागेही आले पण पुन्हा काहीसा विचार करून, बायकोच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पावसात भिजतच बॅटरीचा झोत सभोवार टाकत पुढं गेले.
बॅटरीच्या झोतात समोर दिसले ते पाहून त्यांची वाचाच गेल्यासारखे झाले. जणू पावले जमिनीला चिकटल्यासारखे ते निमिषभर खिळून राहिले. दारात ऊभा राहिलेल्या त्यांच्या बायकोला अंधारात ते दिसत नसले तरी बॅटरीच्या झोतामुळे त्यांचे अस्तित्व जाणवत होते. सभोवार फिरत पुढे सरकणारा बॅटरीचा झोत स्थिरावल्याचे पाहून भीती बरोबर तात्यांची काळजीही मनात दाटून आली आणि त्यांनी जरा जास्तच मोठ्या आवाजात विचारले,
” अहो, काय झाले? तुम्ही ठीक आहात ना ? “
बायकोच्या ओरडण्याने भानावर आलेले तात्या ओरडून म्हणाले,
” बाप रे ! अगं ss शेजारच्या वहिनींचे घर कोसळलंय.. “
ते झटकन परत आले. असल्या पावसातही त्यांना दरदरून घाम आला होता. त्यांनी ओरडून बायकोला सांगितले असले तरी तिला व्यवस्थित ऐकू आले नसणार याची जाणीव होऊन ते पुन्हा म्हणाले,
” आता इथं आपल्या रानातल्या वस्तीच्य जवळपास कुणाचं घर तरी आहे का हाकेच्या अंतरावर ? चल पटकन..”
कंदील लावताच तसल्या पावसात दोघेही कंदील आणि बॅटरी घेऊन शेजारी गेले. सारं घर पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं होतं. बॅटरीचा झोत पायाजवळ टाकून ते एक एक पाऊल पुढं टाकत होते. सावधपणे कानोसा घेत, स्वतःला सावरत ते दगड-विटा मातीच्या मलब्यावर चढून पुढे जात होते. भल्या मोठ्या तुळया कोसळल्या होत्या सर्वात शेवटी मागची भिंत कोसळली असणार.. तिच्या दगड-विटा, माती तुळ्यावर पुढच्या बाजूला घरंगळली होती. ते कोसळलेल्या दगडांचा, तुळयांचा आधार घेत पुढे सरकत, कानोसा घेत होते. त्यांना कण्हण्याचा आवाज आल्यासारखे वाटले.
☆ ‘नमस्कार मित्रांनो —- TMT’ – डॉ. स्मिता दातार ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
नवरात्रात माझ्या वहिनीकडे गेले होते. तिच्याकडे घटस्थापना झाली होती. दरवर्षी देवीचं नवरात्र निगुतीने करणार्या माझ्या वहिनीला एका आठवड्यापूर्वी रिक्षाचा अपघात होऊन तिचा पाय दुखावला होता. तिच्या सचिनचं सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. नव्या सुनेचं हे पहिलं नवरात्र होतं. दरवर्षी नवरात्रीत सवाष्णपूजन , कन्यापूजन करणारी , साग्रसंगीत स्वयंपाक– हो अगदी ‘स्वयं’ पाकसिद्धी करणारी वहिनी .. आता या वर्षी काय करेल ,याची मला काळजी वाटली. काळजीपेक्षा परंपरांच्या बाबतीत आग्रही मतं असणार्या वहिनीच्या नव्या सुनेची मला जास्त काळजी वाटली. जरा धास्तावूनच जरीच्या साडीचा घोळ सावरत मी वहिनीच्या घरी पोचले. वहिनीच्या सुनेनं हसून माझं स्वागत केलं. रंगवलेल्या सोनेरी ब्लॉन्ड केसांचा सैलसर बुचडा, आधुनिक फॅशनच्या स्लीव्हलेस ब्लाऊज, वर चापून चोपून नेसलेली नऊवारी साडी आणि साडीच्या सोग्याजवळ खणाच्या पर्समध्ये अडकवलेला मोबाईल फोन—-स्मार्ट आणि आत्मविश्वासपूर्ण आधुनिक तरुणीचं रुप. ती अध्येमध्ये फोनवरून तिच्या स्टाफला सूचना देत होती. तिने नुकतीच एक स्टार्टअप कंपनी सुरु केली होती. जुन्या नव्याची सांगड जणू तिने पेहरावातच घातली होती. तिने जमलेल्या आम्हा नातेवाईक बायकांची चौकशी केली. ‘आईंना बोलवते हं .’. असं सांगून ती तिच्या सासूबाईंना बोलवायला आत गेली.
वहिनी चार पायांची स्टीलची काठी टेकत बाहेर आली. सगळ्या बायकांच्या नजरा गरकन वहिनीच्या दिशेनं वळल्या. वहिनीने चक्क गुडघ्याखाली येईल असा खणाच्या कापडाचा फ्रॉक घातला होता. तिच्या पायाला अजून बॅंडेज होतं. वहिनी अवघडलेली मुळीच दिसत नव्हती. उलट कौतुकाने सगळ्यांना सांगत होती, अपघात झाला तरी सुनेनं कार्यक्रम करुया म्हटलं. तिच्या सुनेनं हौसेनं दोन पदार्थ रांधले होते. वहिनीनं बसल्या बसल्या कोशिंबीर केली होती. बाकीचे पदार्थ बाहेरून मागवले होते. वहिनी उत्साहानं सांगत होती. प्रधानांच्या घरात क्रांतीच झाली म्हणायची, माझ्या मनात आलंच. देवीची आरती झाली. सवाष्णींच्या ओट्या सूनबाईनं छान पॅक केलेल्या होत्या. देणारीला आणि घेणारीलाही सुटसुटीत . सांडलवंड नाही की काही राहिलं- विसरलं नाही. छान गप्पा चालू होत्या. मध्येच अर्धा तास वहिनीची सून लॅपटॉपवरुन एक ऑनलाईन मीटिंग करायला आतल्या खोलीत गेली.
सूनबाई आत गेलीये, हे पाहून न राहवून बायकांनी विषय काढलाच. “ सुमनताई ,रूढीपरंपरांच्या बाबतीत तुम्ही एवढ्या आग्रही असता. तुम्ही एवढ्या कश्या बदललात ?”
वहिनी हसून म्हणाली , “ मला एक मंत्र मिळालाय. मला या मंत्राचे खूप फायदे जाणवले. लेकाचं लग्न झाल्यापासून मी या मंत्राचा जप करते.”
“ कुठला मंत्र ?” बायका उत्सुक होत्या.
वहिनी म्हणाली , “ मन:शांतीचा मंत्र.”
“ कुठल्या आध्यात्मिक गुरूकडे जायला लागलात की काय ? “ शेजारच्या काकींनी विचारलं .
“ नाही हो .. स्वत:च स्वत:चा गुरु झाले आणि जवळच्यांना गुरु मानलं.” वहिनी अजूनही सस्पेन्स राखून होत्या.
“— कसंय नं .. आपल्यासाठी घर खूप महत्वाचं असतं. मुलं आणि आपण सोयीसाठी वेगवेगळ्या घरात राहिलो तरी मनानं सगळ्यांनी एकत्र येणं, एकमेकांना सोबत देणं गरजेचं असतं. मात्र नवीन सून आली की सासूचा मानसिक गोंधळ सुरु होतो. घराची सत्ता, मुलावरचा अधिकार आणि माझ्यावाचून अडलं पाहिजे.. हा अहंकार— यामुळे आपल्या जवळच्या प्रिय माणसांशीच वाद सुरु होतात. मीसुद्धा यातून जायला लागले होते. पण थोड्याच वेळात भानावर आले. घर आणि घरपण अबाधित ठेवायचं असेल तर बदलायला हवं होतं. अनेक वर्ष साचलेलं पाणी स्वच्छ होण्यासाठी त्याखालचे नैसर्गिक झरे पुन्हा वाहते करावे लागतात, हा तर निसर्गनियम आहे . घरातल्या कर्त्या बाईने आणि पुरुषाने देखील सत्तेचं सिंहासन वेळीच मोकळं केलं तर पुढच्या पिढीला जबाबदारी लवकर कळते. म्हणून माझा मीच मंत्र ठरवला … TMT .. ‘ तू म्हणशील तसं ‘
“TMT? तू म्हणशील तसं … किती छान आहे हा मंत्र . “ पस्तीशीची कनका उत्साहाने म्हणाली.
“ छान काय ? मला नाही पटत .. सुनेनं आधी तिचा वकूब सिद्ध करायला नको का ? उगीच आधीच डोक्यावर घेऊन नाचलं तर उद्या या आपल्याच डोक्यावर मिरी वाटायच्या. त्यातून या आजकालच्या मुली .. “ वहिनींची जाऊ करवादली .
“ जाऊबाई , नात्यांना आधीच चुकीची लेबलं का लावायची . आणि वकूब सिद्ध करायला, सुनेला संधी तर दिली पाहिजे ना . उलट ‘ तू म्हणशील तसं ‘ म्हटलं की नवी पिढी आपल्याशी चर्चा करायला येते, असा माझा अनुभव आहे. आता आधुनिकता म्हटलं, तर प्रत्येक बाबतीत त्यांचं चुकतं असंही नसतं हो . या पिढीला परंपरांमधलं विज्ञान समजावून सांगितलं तर त्यांना ते नक्की पटतं. आपणही काही चुकीच्या गोष्टी आंधळेपणी पुढे चालवत असू तर आपल्यालाही त्यातल्या चुका उमगतात. माझी सूनबाई देव देव करणारी नाही. पण तिला माणसं आवडतात, नवीन नाती जोडायला आणि जपायला आवडतात. माणसातच देव शोधावा, असं म्हणते ती. आता हेच बघा ना, माझा पाय जायबंदी झालाय, साडी पायात येऊन मी पडू नये, म्हणून सूनबाईनेच हा खणाचा ड्रेस माझ्यासाठी शिवून घेतला. माझा संकोच दूर केला . आजचा कार्यक्रम आणि मेन्यू ठरवताना ही मी हाच मंत्र ओठांवर ठेवला होता तू म्हणशील तसं— पण त्यामुळे आमच्यात छान चर्चा झाली. अनावश्यक गोष्टींना मी ही फाटा दिला . थोडा तुम चलो, थोडा हम चले .. “
“ वहिनी , खरच छान आहे हे.. TMT.. “ मी भलतीच इम्प्रेस झाले होते.
“ आणि बरं का ..सूनबाई आता येऊन कानात सांगून गेली, की तिला देवीची आरती करायला खूप आवडलं . मेडिटेशन झालं म्हणाली. तुम्ही सगळे आलात, सगळ्यांशी ओळख झाली म्हणून देखील खूश आहे स्वारी. कुणास ठाऊक, आपल्या पूर्वजांनी नाती दृढ करण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठीच या आरत्या , श्लोक म्हणायला आणि सण साजरे करायला सांगितलं असेल . “
वहिनी काठी टेकत स्वयंपाकघरात गेली. तिच्या सूनबाईंची मीटिंग संपली होती. “ आई , पानं आधी घेऊया की आधी फन गेम्स घेऊ,” असं सूनबाई वहिनीला विचारत होती.
वहिनी म्हणाली , “ बायका भुकेजल्या असतील तर आधी वाढूया , मग खेळ घे. तरी तू म्हणशील तसं करूया.”
“ ओके . मी आधी वाढायलाच घेते. सचिन आज वर्क फ्रॉम होम आहे, त्याला हाक मारते. तो करेल मदत . तुम्ही बसा बरं .. पायावर प्रेशर येईल. “
त्यांच्या मदतीला आत आलेल्या माझ्या कानावर पुन्हा एकदा TMT मंत्र पडला आणि मला खुद्कन हसू आलं. लेकाच्या लग्नाचं घोडामैदान जवळंच आलय. त्याआधीच एक छान मंत्र मला सापडला होता. TMT—
लेखिका : डॉ. स्मिता दातार
संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पाश्चिमात्य संशोधकांनी उलगडले की संस्कृत मंत्र लक्षात ठेवणारी मुले मोठी झाल्यावर अति हुशार का होतात ?
कठोरपणे लक्षात ठेवणे मेंदूला किती मदत करू शकते हे न्यूरोसायन्स दाखवते. ‘संस्कृत इफेक्ट’ ही संज्ञा न्यूरोसायंटिस्ट जेम्स हार्टझेल यांनी तयार केली होती, ज्यांनी व्यावसायिक पात्रता असलेल्या २१ संस्कृत पंडितांचा अभ्यास केला होता. त्यांनी शोधून काढले की वैदिक मंत्रांचे स्मरण केल्याने अल्प आणि दीर्घकालीन स्मृतीसह संज्ञानात्मक कार्याशी संबंधित मेंदूच्या क्षेत्रांचा आकार वाढतो. हा शोध भारतीय परंपरेच्या श्रद्धेला पुष्टी देतो, ज्यामध्ये असे मानले जाते की मंत्रांचे स्मरण करणे आणि पाठ करणे स्मरणशक्ती आणि विचार वाढवते.
डॉ. हार्टझेलच्या अलिकडील अभ्यासात असा प्रश्न निर्माण झाला आहे की अशाप्रकारच्या प्राचीन ग्रंथांचे स्मरण अल्झायमर आणि इतर स्मरणशक्तीवर परिणाम करणाऱ्या रोगांचे विनाशकारी आजार कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते का? वरवर पाहता, भारतातील आयुर्वेदिक डॉक्टर असे सुचवतात, आणि संस्कृतमध्ये अधिक संशोधनासह भविष्यातील अभ्यास नक्कीच केले जातील.
आपल्या सर्वांना सजगता आणि ध्यान पद्धतींचे फायदे माहित असताना, डॉ हार्टझेलचे निष्कर्ष खरोखरच नाट्यमय आहेत. कमी होत चाललेल्या लक्षांच्या जगात, जिथे आपल्याला दररोज माहितीचा पूर येतो आणि मुले लक्ष वेधून घेणारे अनेक विकार दाखवतात, तिथे प्राचीन भारतीय शहाणपणामध्ये पश्चिमेला (आणि पूर्वेकडील त्यांच्या ‘आधुनिक’ बौद्धिक सेवकांना) शिकवण्यासारखे बरेच काही आहे.
गायत्री मंत्रासारख्या सामान्य संस्कृत मंत्रांचे थोडय़ा प्रमाणात जप आणि पठण करूनही आपल्या सर्व मेंदूवर आश्चर्यकारक परिणाम होऊ शकतो.
(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में अवश्य मिली है किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है एक विचारणीय एवं भावप्रवण कविता ‘बेटी ! मत बन मेरी जैसी’। डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को इस लघुकथा रचने के लिए सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद # 105 ☆
☆ कविता – बेटी ! मत बन मेरी जैसी — ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆
(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जीद्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना “फॉलो अनफॉलो का चक्कर ”। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन।
आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं # 125 ☆
☆ फॉलो अनफॉलो का चक्कर ☆
एक दूसरे को देखकर बहुत कुछ सीखा जा सकता है। सोशल मीडिया ने लगभग सभी को रील / शार्ट वीडियो बनाना सिखा दिया है। बस उसमें प्रचलित ऑडियो को सेट करें और वायरल का हैस्टैग करते हुए सब जगह फैला दीजिए। ये सब देखते हुए विचार आया कि इसे तकनीकी यात्रा का नाम दिया जाए तो कैसा रहेगा। वैसे भी यात्राएँ रुचिकर होती हैं। पुस्तकों में भी यात्रा वृतांत पढ़ने में आता है।
एक शहर से दूसरे शहर जाना अर्थात कुछ बदलना। ये बदलाव हमारे अवलोकन को बढ़ाता है। जगह – जगह का खान- पान, रहन-सहन, वेश- भूषा सब कुछ अलग होता है। चारों धाम की यात्रा यही सोच कर सदियों से की जा रही है। जब हम यात्रा संस्मरण पढ़ते हैं तो ऐसा लगता है कि इस पुस्तक के माध्यम से हमने भी यात्रा कर ली। रास्ता नापने के मुहावरा शायद यही सोचकर बनाया गया होगा। आजकल सड़कें भी बायपास हो गयीं हैं। बिना धक्के का रास्ता आनन्द के साथ- साथ रुचिकर भी होने लगा है। तेजी से बढ़ते कदम मंजिल की ओर जब जाते हों तो लक्ष्य मिलने में देरी नहीं लगती। आस- पास हरियाली हो, वन वे ट्रैफिक हो, बस और क्या चाहिए।
यात्राएँ हमें जोड़ने का कार्य बखूबी करतीं हैं। बहुत बार हम किसी विशेष स्थान से प्रभावित होकर वहीं बसने का फैसला कर लेते हैं। हम तो ठहरे तकनीकी युग के सो सारा समय फेसबुक, इंस्टा, व्हाट्सएप व ट्विटर पर बिताते हैं। जब मामला अटकता है तो गूगल बाबा या यू ट्यूब की शरण में पहुँच कर वहाँ से हर प्रश्नों के उत्तर ले आते हैं। ये सब कुछ बिना टिकट के घर बैठे हो रहा है। पहले तो किसी से कुछ पूछो तो काम की बात वो बाद में करता था अनावश्यक का ज्ञान मुफ्त में बाँट देता था। चलो अच्छा हुआ इक्कीसवीं सदी में कम से कम इससे तो पीछा छूट गया है।
ये सब मिलेगा बस अच्छी पोस्ट को फॉलो और खराब को अनफॉलो करने की कला आपको आनी चाहिए। पहले अवलोकन करें जाँचे- परखे और सीखते- सिखाते हुए सबके साथ आगे बढ़ते रहें।