मुलींच्या शाळेत ‘ सारेगमप ‘ स्पर्धा होती. नमिताची व ईशाची 30 मुलींमधून निवड झाली. इतर मुलीही होत्या. आठवडाभर प्रॅक्टीस आणि रविवारी स्पर्धा असे दोन महिने चाललं होतं. शेवटी फक्त दोनच स्पर्धक राहिले. नमिता आणि ईशा. दोघीही अतिशय तयारी करून आल्या होत्या. अंतिम टप्पा गाठला. दोघींचीही चार चार गाणी झाली आणि निकालाचा क्षण आला. मंचावर दोन स्पर्धक – दोघी मैत्रिणी होत्या. उत्सुकता, बावरलेपण, धडधडणारी छाती, दोघींही आतुरतेने वाट पाहत होत्या. एकमेकींचे हात घट्ट पकडून उभ्या होत्या. निकाल घोषित झाला. नमिता जिंकली होती. दोघीही एकमेकींना घट्ट मिठी मारून रडायला लागल्या. किती समजावले तरी थांबेनात. शेवटी मुख्याध्यापिका मंचावर गेल्या. त्यांनी दोघींना सावरले. त्यांनी नमिताला विचारले, “नमिता, तू का रडते आहेस? तू Winner आहेस ना?” नमिता रडतच बोलली, ” मॅडम, ईशा जिंकली नाही म्हणून मला वाईट वाटलं ” तर ईशा म्हणाली, ” नमिता Winner झाली म्हणून मला खूप आनंद झालाय, इतका कि मला रडू आलं ” .
अश्रू चं इतकं निरागस, सुंदर रूप दुसरं कुठलं असू शकेल?
नमिता, ईशा एकमेकींसाठी रडल्या. आपल्या यशापेक्षा जिवलग मैत्रिणीचं अपयश मनाला लागणं, आणि मैत्रिणी च्या यशात आपलं अपयश विसरून जाणं, हा मैत्रीचा आणि यश अपयश या दोन्ही ला योग्य प्रकारे सामोरे जाण्याचा धडा दोघींनी घालून दिला.
जर त्या भावना आवरून रडल्या नसत्या तर मैत्रीची, प्रेमाची जागा असूया, ईर्ष्या , हेवा यांनी घेतली असती. किती धोकादायक होतं ते! म्हणून त्या रडल्या ते योग्यच होतं ना!
☆ नवी नवरी नि जुनी नवरी – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री नीलेश कामथे☆
कालच ओळखीत एका ठिकाणी भेटायला गेले होते. नुकतंच लग्न झालं होतं त्यांच्या मुलाचं. साधारण महिना झाला असेल, लग्नानंतरचे सगळे सोपस्कार होऊन रुटीन लाईफ सुरू झाले होते.
सहजच विचारलं ‘ सून बाई कुठायत?’ तेवढ्यात ती आलीच ऑफिसमधून. एक छानसं स्माईल देऊन आलेच सांगून आत पळाली.. मनात म्हंटलं, ही कशाची येते आता, दोन गोष्टी करून निघूयाआपणच. त्यांना म्हणत होते मी “आता तुम्हीच या श्रमपरिहाराला माझ्याकडे.”
सून कपडे बदलून आलीसुद्धा बाहेर. थेट आमच्यात येऊन बसली. म्हणाली, “ हो नक्की येतील, पण तुम्ही बसा आता. मस्त पोहे खाऊन जा, आणि पुढल्या वेळी ठरवून जेवायलाच या.”
मला आश्चर्य वाटलं. मीही सुखावले, दिलखुलास दाद दिली, तिचं माझ्या स्टाईलने कौतुकही केलं. तीही खुलली, म्हणाली, “ तुम्ही बसा बोलत. मी पोहे घेऊन येतेच.” मी त्यांच्याकडे वळून म्हंटलं, “ वाह काय लकी आहात हो, काय गोड आहे सून तुमची.”
त्या म्हणाल्या, “ अगं हो तुझाच पॅटर्न युज करतेय, “प्रेम द्या अन् प्रेम घ्या.” “ अरे वा, मस्त परिणाम साधलात की, नक्की काय केलंत ?”
त्या म्हणाल्या, “ विशेष काही नाही गं. ती हनिमूनवरुन आल्यावर तिला पूर्ण आराम दिला. म्हंटलं तू सात दिवस पूर्ण आराम कर. सगळी कामाची पद्धत, वेळा, बारीक बारीक लक्ष देऊन फक्त बघ. करू ही नको नी बोलू ही नको, जे आवडेल ते आवडलं या काॅलममध्ये, जे नाही आवडलं ते नाही आवडलं या काॅलममध्ये, मात्र कारणासहित लिही आणि सात दिवस कमी वाटले तर सांग.आपण जास्ती दिवस ठेवू, ती नको म्हणत होती, पण मी ऐकलेच नाही.”
“अगदी त्याच सात दिवसात तिनी मला कोणत्या नी कशा प्रकारे मदत करावी अशी माझी अपेक्षा आहे हे मी लिहून ठेवलं. झालं– सात दिवस अगदी मजेत घालवले. मी काम करत असतांना ती माझ्या अवतीभवती राहिली आणि मला कळले, हिला माणसे आवडतात. मी काम करताना कधीच बेडरूममध्ये जाऊन बसली नाही. मग मीही तिच्याशी बोलता बोलता तिच्या सवयी, आवडीनिवडी जाणून घेतल्या. आपल्या घरच्या पद्धती, रीती रिवाज, आला गेला, कामाच्या वेळा कशा सांभाळायच्या, हे, ती बोअर होणार नाही इतपतं तिला समजेल असं ऐकवलं.”
“तीही आवडीने ऐकत होती, टिपण करत होती, घर आवरताना मध्येमध्ये तिच्याही आवडीनिवडी सांगत होती. एकंदर ती उत्साहात होती. मग मीही खुष होते. सात दिवस अगदी मजेत गेले. तिला माझं एकूण एक काम आवडलं गं, आमची गट्टी तिथेच जमली. आम्ही एकमेकींची टिपणं वाचली नि मुख्य म्हणजे तीच लक्षात ठेवून वागतोय. तिला स्वयंपाकात खूप इंटरेस्ट होता पण अजिबात सवय नव्हती. तेव्हा ती म्हणत होती, तुम्ही शिकवलंत तर मीही तयार होइन. तुम्ही सकाळी करा नि संध्याकाळी मला सगळं शिकवा. पुन्हा दुसऱ्या दिवशीची तयारी माझ्याकडून करून घ्या म्हणजे तुम्हालाही बरे नि मी ही शिकीन. आणि हे असं सगळं १५ -२० दिवस झाले चाललंय, पण मस्त चाललंय आमचं.”
ऐकूनही खूप छान वाटलं. इतक्यात गरमागरम पोहे आलेच. तिच्या लाघवी, खेळकर हास्यविनोदाने पोहे आणखी रुचकर लागले. खूप बरं वाटलं,पाहून ऐकून.
हल्ली होतंय काय, सासू सुना एकमेकींशी अशा दिलखुलास बोलताना दिसत नाहीत. वाटतं, दोघांनीही एकमेकींना समजून घ्या. एकमेकींची मतं जाणून ऐकून घ्या. एकमेकींना आधार वाटेल अशा वागा. एकमेकींचे दोष पटकन दाखवून भांडत बसण्यापेक्षा छोट्या छोट्या गुणांचीही दखल घ्या- ती ही मनापासून. आपापली मते एकमेकींवर लादू नका, सकारात्मकतेने, नीट प्रेमाने, आपलेपणाने सांगा, एकमेकींच्या चुका नीट समज देऊन पदरात घ्या. सर्वात महत्वाचे म्हणजे एकमेकींचा आदर करा. घर कामाची वाटणी आपला वेळ आपल्या क्षमता बघून नीट समजून उमजून केलीत तर खटके उडणारच नाहीत.
सासूनेही येता जाता स्वपुराण न लावता, टोमणे न मारता, माझं अच्छ नि माझं तच्छं. हे सांगत बसण्यापेक्षा दोघी मिळून सुवर्णमध्य साधून सुनेशी जवळीक निर्माण होईल असेच पाहावे. सगळी कामं एकदम न लादता टप्याटप्याने सांगावीत. नवीन घरात रुळतांना तिलाही वेळ द्यावाच लागेल. संयम आणि प्रेम असेल तर अपेक्षित यश मिळेलच, पण थोडा काळ जाऊ द्यावाच लागेल.
सुनेने सुद्धा वागता-बोलताना नीट विचार करावा. सतत माहेरच्या कौतुकाचे टुमणे लावण्यापेक्षा सासरीही आपुलकीने राहावे. अगदी एखादा पाहुणा आल्यावर जसे आपले त्याच्याकडे सगळे लक्ष असते, अगदी तसेच किंबहुना त्यापेक्षा जास्त लक्ष सुनेकडे सगळ्यांचेच– म्हणजे धुणी भांडी, केरलादी करणाऱ्या बायकांपासून ते थेट शेजारीपाजारी नि आला गेलाही निरखून बघत असतात सुनेकडे. हीच तर खरी कसोटीची वेळ असते. याच वेळी नीट जबाबदारी नि मर्यादा ओळखून वागावे. एखादे काम जास्तीचे पडले तर कुरकुर न करता आनंदाने करावे. घरातले वातावरण आपल्यामुळे बिघडणार नाही किंवा आपल्या वागण्याबोलण्याने कुणी दुखावणार नाही आणि कुठला सीनही क्रिएट होणार नाही याची दक्षता घ्यावी. हसून खेळून सगळ्यांशी प्रेमळ संवाद साधण्याचा प्रयत्न करावा. मने जिंकून घ्यावी.
कित्येक सासवांना काही करावे लागत नाही. तरी सुनेशी सूर जुळतच नाही. कधी त्या सुनेशी प्रेमाने वार्तालाप करीतच नाहीत. सून सगळं करत्येय, तर चार शब्द तिच्याशी प्रेमाने आपलेपणानी बोला, जवळीक साधा, तिच्या आवडीनिवडीची कदर करून तिच्यासाठी एखादी अगदी क्षुल्लक गोष्ट केलीत तरी खूप सुखावेल ती, नि दोघिंमध्ये एक घट्ट वीण तयार होईल प्रेमाची. सासू-सून या एकमेव कारणाने वेगळी चूल मांडण्याचा साधा विचारही मनात येणार नाही. परिवार एकसंघ नि एकछती राहील, (अर्थात मनाने- नाहीतर लोक म्हणतात आम्ही एकत्र राहतो पण खरं म्हणजे मनं कधीच दूर गेलेली असतात,) आणि या मायलेकी नाही, सासुसूना आहेत असं सांगावं लागेल लोकांना. सासू- सून या नाजूक नात्याला रेशीमगाठी म्हणायचे असेल, तर दोघींच्याही वागण्यात रेशीमता हवी. म्हणजे नवी नवरी आली तर तिचे स्वागतच होइल आणि जुनी नवरी सुद्धा अज्जिबात दुखावणार नाही. “रिश्ता वही सोच नई” शेवटी दोघीनीही एकच लक्षात ठेवायचं, नाती जोडण्यासाठी, जुळवण्यासाठी आपली या पदावर पोस्टिंग झालीय, तेव्हा नाती जोडत, जुळवत सासू-सुनेच्या जोडगोळीत गोडी ठेवा…
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : निलेश कामथे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
नेमेची येतो मग पावसाळा, या उक्तीप्रमाणे दरवर्षी जाणारी मी, जवळजवळ तीन वर्षांनी अमेरिकेला लेकीकडे गेले. कोरोना संकटामुळे 3वर्षे जाऊ शकले नव्हते. यावेळी बरेच बदल घडलेले दिसले. तिकडे नेहमी गेल्यामुळे,तिकडे कायम राहणाऱ्या,समवयस्क मैत्रिणीही झाल्या होत्या माझ्या.
जरा स्थिरस्थावर झाल्यावर विचारले, “रमाला करू का फोन? बरी आहे ना ती?”
मुलगी म्हणाली, “अग, त्या आता आमच्या शहरात राहत नाहीत.”
रमा म्हणजे बडे प्रस्थ होते इथले. तिचे यजमान नामांकित भूलतज्ञ होते इथे. मग भाग्याला काय उणे हो? अतिशय आलिशान, लेकसाइड, भव्यदिव्य १५-१६ खोल्यांचे घर, स्वतःची बोट, मोठा डेक असे फार सुरेख घर होते रमाचे. माझ्या मुलीशी त्यांची दोस्ती होती. खरेतर ते माझ्या वयाचे, पण गाणे,याकारणाने त्यांची अदितीशी, आणि पर्यायाने माझ्याशीही खूप छान दोस्ती झाली.
माणसांचा खूप लोभ त्यांना. मुलगे दुसऱ्या गावात स्थायिक झालेले आणि सुना दोघीही अमेरिकन. त्यामुळे एकत्र राहण्याचा प्रश्न संभवत नाही. दोघेही अतिशय रसिक, त्यामुळे इकडे नाटक घेऊन भारतातले लोक आले, की रमाकडेच त्यांचे रहाणे, पाहुणचार, हे ठरलेलेच.
डॉक्टर रिटायर झाले आणि एवढ्या मोठ्या घरात खूप वर्षे दोघेही राहिले — माणसे बोलवत, मैफिली जमवत.!! मुले मात्र खूप दूरच्या शहरात नोकऱ्या करत होती. आता संध्याछाया दिसू लागल्या. रमाची दोन्ही गुडघ्याची ऑपरेशन्स झाली. मुले आली नाहीत ,त्यांना रजा नव्हत्या. दोघांनीच ते निभावले. हळूहळू इतर तक्रारीही सुरू झाल्या. आता मात्र हे घर विकून टाकून, लहान घर घ्यावे आणि मुलाच्याजवळच घर बघावे, हा निर्णय रमाआणि माधवने घेतला. हा मुलगा त्यातल्या त्यात त्यांच्याजवळ होता–. म्हणजे 2 तास ड्राईव्हवर.
अतिशय दुःखाने रमा-माधवने आपले टोलेजंगी घर विकले, आणि जरा लहान घरात ते गेले. आपले इतके वर्ष साथ देत राहिलेले शहर, मित्र मंडळ सोडून. आता त्यांना भेटायला जाणे मला शक्य नव्हते .फोनवरच बोललो आम्ही. रमाला अतिशय वाईट वाटत होते.
मला म्हणाली, “,काय करणार ग? कोण येणार आमच्या मदतीला सारखे? त्यापेक्षा म्हटले,जवळच्या मुलाच्या घराजवळ घर घ्यावे. त्यालाही बरे पडेल,आणि त्याच्या लहान मुलांनाही आमचा उपयोग होईल. ही अमेरिका आहे बरं. म्हातारपणी असेच डाउन सायझिंग करावे लागते. आपला पसारा आवरून लहान घरात आणि तिकडून मग old age होम, हाच पर्याय उरतो इकडे.त्यालाही आमची मानसिक तयारी झाली आहे. बघ,जमले तर ये भेटायला,आणि नवीन घर बघायला. निराशा होईल तुझी.हे घर काहीच नाहीये आमच्या पूर्वीच्या घराच्या तुलनेत.”
रमाने फोन खाली ठेवला. तिचा downsizing शब्द मात्र मनात रुतलाच. मी विचार करू लागले, आपणही आता म्हातारे व्हायला लागलोय, नव्हे झालोच आहोत. मी माझे घर डोळ्यासमोर आणले. एकतर मोठ्ठे घर आणि भयंकर हौस !!. निरनिराळे सामान, वस्तू, सुंदर क्रोकरी, बेडशीट्स, कपडे – भांडी जमवायची. —बाप रे. हौसेहौसेने मी जमवलेले क्रोकरी सेट्स आले डोळ्यासमोर. शिवाय खूप पूर्वी आईने दिलेले म्हणून जपून ठेवलेले ‘स्टीलची १२ ताटे, १२ वाट्या ‘असे सेट्स—माझ्याकडे आता कोण येणार आहेत बारा आणि पंधरा लोक ? हल्ली आम्ही घरी शक्यतो पार्ट्या करतच नाही, आणि इतके लोक तर नसतातच ना. मग बाहेरच जमतो सगळे एखाद्या छानशा हॉटेलमध्ये.
पूर्वीची गोष्ट वेगळी होती. पैसा कमी असायचा. बाहेर हॉटेलात जायची पद्धतही नव्हती. सगळेघरी करण्याकडे गृहिणीचा कलअसायचा, हाताशी वेळही भरपूर असायचा. आता काळ किती बदलला, आम्हीही बदललोच की. मी जरी अतिशय व्यस्त होते माझ्या व्यवसायात, तरी सगळे घरीच करायची. त्यासाठीही जमवलेली भांडीकुंडी आता कशाला लागणार आहेत ?
मध्यंतरी, बहिणीच्या कोकणातल्या गावात, रामाच्या देवळात उत्सवअसतो, त्यासाठी देऊन टाकली सगळी ताटे वाट्या भांडी. कामवाल्या वंदनाला दिली धडअसलेली पण मला कंटाळाआला म्हणून नको असलेली बेडशीट्स. कपाट आवरायला काढले तर नको असलेल्या नावडत्या ड्रेसचे ढीग काम करणाऱ्या सुरेखाच्या मुलीला देऊन टाकले, आणि एक कप्पा रिकामा झाला. हल्ली मी फार क्वचितच साड्या नेसते. बघितले तर साड्यांची उतरंड लागलेली गोदरेजच्या कपाटात. भावजय साडीच नेसते, तिला म्हटले,घेऊन जा ग तुला हव्या त्या साड्या.—-तरी अजून सगळ्या देऊन टाकायला मन होत नाही ते वेगळे. ”एवढी आध्यत्मिक पातळी गाठली नाहीअजूनआईने,” असे उपहासाने मुली म्हणाल्याच– दुष्ट कुठल्या– असो.
असे करत, बरंच आवरत आणलंय सध्या. आता कसं सुटसुटीत वाटतंय घराला आणि मलासुद्धा. मध्ये एकदा कामवाली म्हणाली, “ताई ब्याग द्याकी एखादी जुनी. कपडे ठेवायला बरी पडेल .” माझ्याकडच्या असंख्य मोठ्या बॅग्सपैकी एक बॅग तिला आनंदाने दिली. तिच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद मला किती समाधान देऊन गेला म्हणून सांगू.
आता मी परदेशात गेले की तिकडून येताना हावऱ्यासारखी खरेदी करत नाही. नुसते बघते सगळे पण घेत मात्र काही नाही. मन भरून तृप्त झाले माझे आता. पूर्वीसारख्या बॅग्स दाबून भरत नाही. आता नकोच वाटतो हा पसारा आणि हव्यास. मुलगी म्हणाली, ”हे काय? यावेळी काहीच नाही का खरेदी करायची?” म्हटले, “ वा ग वा. नाही कशी?माझ्या प्रियजनांना भरपूर चॉकलेट्स नेणार,बदाम पिस्ते नेणार तर. आणि माझ्या वंदना, स्वाती,संगीता या घर काम करणाऱ्या माझ्या सहकारी बायकाना कुठे नेलपॉलिश, कुठे छानशी किसणी, कुठे नॉनस्टिक तवा, अशा त्यांना वाटणाऱ्या अपूर्वाईच्या गोष्टीच फक्त नेणार. बाकी लोकांकडेअसते सगळे. त्यांना नाही कसली अपूर्वाई.” मुलगी हसली आणि म्हणाली, ‘रोज व्हाट्सअपवर येणाऱ्या अध्यात्मिक मेसेजचा परिणाम झालेला दिसतोय आईवर.” म्हटले, “नाही ग बाई, उलट रमापासून धडा घेतलाय की अमेरिकेसारखे आता पुण्यात पण आम्ही डाउन सायझिंगकरायला शिकले पाहिजे. नकोच तो वस्तूंचा हव्यास, आणि व्याप तितका ताप. यावेळी खरंच येताना दोन्ही बॅग्स अगदी कमी भरल्या वजनाने. आता घरी कोणतीही वस्तू घेताना मनाला दहावेळा विचारीन,की ही खरंच हवीय का.
रमाकडून शिकलेला हा अनमोल… पसारा आवरण्याचा धडा ,गिरवायला सुरवात केली आहे हे नक्की ! रमाने नाईलाजाने केले डाउनसायझिंग, पण मी मात्रअगदी समाधानानेआणि न कुरकुरता सुरवात केलीय.
— तर मग मैत्रिणींनो करा सुरवातआवरायला, —आणि घराचे आणि मनाचेही डाउनसायझिंग करायला—
रशियातून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या या बाईंमुळे जागतिक महिला दिन साजरा होतो.. वाचा त्यांचं कार्य काय आहे….. थेरेसा सर्बर माल्कल!
हे नाव तुम्ही पूर्वी कधी ऐकलं आहे का? नाही? आज आपण जो जागतिक महिला दिन साजरा करत आहोत त्याचा आणि या नावाचा घनिष्ठ संबंध आहे. कसा तो आम्ही सांगतो…
मंडळी, एखादा दिवस साजरा करण्यामागे नेमके काय कारण आहे, त्याचा इतिहास काय आहे, हा पायंडा कुणी पाडला हे जाणून घेणे महत्वाचे असते. जर ही माहिती तुम्हाला असेल तर तो दिवस साजरा करण्याचा आनंद द्विगुणित होतो. आता आजच्या जागतिक महिला दिनाचेच उदाहरण घ्या ना.. सर्वांना माहीत आहे की आज महिला दिन आहे, पण याची सुरुवात थेरेसा सर्बर माल्कल या महिलेने केली हे कुणालाच माहीत नाही. दुर्दैवाने थेरेसा आज विस्मृतीत गेल्या आहेत. चला तर मग आजच्या दिवसाचे निमित्त साधून आपण त्यांची ओळख करून घेऊया…
थेरेसा यांचा जन्म १ मे १८७४ ला रशियातल्या बार नावाच्या शहरात एका ज्यू परिवारात झाला. जन्मापासूनच ज्यू विरोधी वातावरणात वाढलेल्या थेरेसा यांना आणि त्यांच्या परिवाराला रशियाच्या त्झार राजवटीत प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यामुळं अनेक कुटुंबे तिथून स्थलांतर करून अमेरिकेत गेली. त्यात थेरेसा यांचेही कुटुंब होते. १८९१ साली अमेरिकेत दाखल झाल्यावर थेरेसा यांनी इतर ज्यू लोकांप्रमाणे चरितार्थासाठी मिळेल ते काम केले. प्रथम एका बेकरीमध्ये, नंतर एका कपड्यांच्या कारखान्यात त्यांना काम मिळाले. त्यांचा मूळ स्वभाव चळवळ्या आणि बंडखोर असल्याने त्यांचे लक्ष कामगार स्त्रियांच्या प्रश्नांकडे वेधले गेले. थेरेसा फक्त प्रश्न बघून गप्प बसणाऱ्या महिला नव्हत्या… त्या प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल याचा विचार करू लागल्या आणि त्यातूनच कामगार स्त्रियांच्या संघटनेची निर्मिती त्यांनी केली. या स्त्री संघटनेतून स्थलांतरित कामगार स्त्रियांचा आवाज उठवण्याचे काम त्या करू लागल्या.
लवकरच त्यांच्या असे लक्षात आले की, फक्त संघटना चालवून भागणार नाही. महिलांना पुरुषांच्या समान हक्क हवे असतील तर राजकारणात उतरण्याशिवाय पर्याय नाही हे त्यांनी ओळखले. आता त्यांनी कामगार स्त्रियांच्या प्रश्नांसोबतच एकंदरीत स्त्री-पुरुष समानतेवरही लक्ष केंद्रित केले. सोशालिस्ट पार्टीमध्ये प्रवेश करून त्यांनी राजकारणात शिरकाव करून घेतला. त्यावेळी सोशालिस्ट पार्टी ही एकमेव अशी पार्टी होती ज्यात महिलांना प्रवेश मिळत असे. आम्ही स्त्री-पुरुष भेदभाव करत नाही असा त्यांचं ब्रीदवाक्य होतं. यामुळेच थेरेसा सोशालिस्ट पार्टीकडे आकर्षित झाल्या होत्या. परंतु दुर्दैवाने लवकरच त्यांना सत्य समजले की पार्टीचा नारा फक्त दिखाऊ स्वरूपाचा होता. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत महिलांना नगण्य स्थान मिळत असे. थेरेसा यांनी यामुळे निराश न होता असे ठरवले की, पार्टी न सोडता आपली समांतर विचारधारा चालवून आपले ध्येय साध्य करायला हवे. त्यांनी सोशालिस्ट महिलांची एक वेगळी चळवळ सुरू केली आणि महिलांसाठी राजकारणात एक वेगळे स्वतंत्र व्यासपीठ असायला हवे असे जोरदार मत मांडले.
शेवटी सोशालिस्ट पार्टीने त्यांचे म्हणणे मान्य केले आणि अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच महिलांसाठी वेगळे डिपार्टमेंट बनवण्यात आले. त्याच्या अध्यक्षपदी थेरेसा विराजमान झाल्या. मंडळी, त्या काळी ही गोष्ट अजिबात सोपी नव्हती! एक तर महिला, त्यात अमेरिकेबाहेरील स्थलांतरित कामगार… ही एका नव्या पर्वाची सुरुवात होती!
या पदावर बसून थेरेसा यांनी महिलांच्या हक्कासाठी लढा दिला. त्यातलाच एक हक्क म्हणजे महिलांना मतदानाचा अधिकार! तोपर्यंत अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. तो मिळायलाच हवा हा मुद्दा थेरेसा यांनी सर्वांसमोर मांडला आणि बरेच प्रयत्न करून त्यासाठी समर्थन मिळवले. या सोबतच महिलांचे अनेक प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले. महिलांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण केली.
थेरेसा यांनी जगाचे लक्ष महिलांच्या समस्यांकडे वेधले जावे म्हणून एक कल्पना मांडली. वर्षातला एक दिवस ‘महिला दिन’ म्हणून साजरा व्हावा हीच ती कल्पना… सोशालिस्ट पार्टीने त्यांना याबाबतीत साथ दिली आणि अमेरिकेत पहिला ‘राष्ट्रीय महिला दिन’ १९०९ साली २८ फेब्रुवारी रोजी साजरा झाला. ही कल्पना नंतर युरोपियन देशांमध्ये सुद्धा पसरली आणि नंतर जगभरात लोकप्रिय झाली. आज सर्वानुमते जगभरात एकाच दिवशी म्हणजे ८ मार्च रोजी ‘जागतिक महिला दिन’ साजरा होतोय, या मागे मूळ कारण थेरेसा सर्बर माल्कल या आहेत.
थेरेसा माल्कल यांचे १७ नोव्हेंबर १९४९ मध्ये निधन झाले. एक स्थलांतर होऊन अमेरिकेत आलेली मुलगी ते अमेरिकेच्या राजकारणातील बलशाली महिला असा त्यांचा थक्क करणारा प्रवास होता. त्यांचे निधन झाल्यावर हळू हळू लोक त्यांना विसरले. आज आपण महिला दिन साजरा करतो पण थेरेसा यांचा उल्लेख कुठेही होत नाही हे दुर्दैवी सत्य आहे.
संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया। वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपके खोज रही है तुम्हें निगाहें…।)
साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 103 – खोज रही है तुम्हें निगाहें…
व्याकुल मन है, आकुल बाँहें खोज रही है तुम्हें निगाहें।
(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार, मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘जहाँ दरक कर गिरा समय भी’ ( 2014) कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है एक भावप्रवण अभिनवगीत – “ऊपर से उड़-उड़ जाती है…”।)
(आदरणीय अग्रज एवं वरिष्ठ व्यंग्यकार श्री शांतिलाल जैन जी विगत दो दशक से भी अधिक समय से व्यंग्य विधा के सशक्त हस्ताक्षर हैं। आपकी पुस्तक ‘न जाना इस देश’ को साहित्य अकादमी के राजेंद्र अनुरागी पुरस्कार से नवाजा गया है। इसके अतिरिक्त आप कई ख्यातिनाम पुरस्कारों से अलंकृत किए गए हैं। इनमें हरिकृष्ण तेलंग स्मृति सम्मान एवं डॉ ज्ञान चतुर्वेदी पुरस्कार प्रमुख हैं। श्री शांतिलाल जैन जी के स्थायी स्तम्भ – शेष कुशल में आज प्रस्तुत है उनका एक विचारणीय व्यंग्य “नये भारत की एक तस्वीर यह भी!!!”।)
☆ शेष कुशल # 30☆
☆ व्यंग्य – “नये भारत की एक तस्वीर यह भी!!!”– शांतिलाल जैन ☆
(इस स्तम्भ के माध्यम से हम आपसे व्यंग्यकार के सर्वोत्कृष्ट व्यंग्य साझा करने का प्रयास करते रहते हैं । व्यंग्य में वर्णित सारी घटनाएं और सभी पात्र काल्पनिक हैं ।यदि किसी व्यक्ति या घटना से इसकी समानता होती है, तो उसे मात्र एक संयोग कहा जाएगा। हमारा विनम्र अनुरोध है कि प्रत्येक व्यंग्य को हिंदी साहित्य की व्यंग्य विधा की गंभीरता को समझते हुए सकारात्मक दृष्टिकोण से आत्मसात करें।)
हार में गुंथे एक फूल ने दूसरे से कहा – ‘मैं मर जाना चाहता हूँ.’
दूसरे ने कहा – ‘चौबीस-छत्तीस घंटे की ही तो लाईफ और बची है, कल तक सूख-साख जाओगे, फिर तो मिट्टी में मिलना तय है.’
‘चौबीस घंटे एक लंबा वक्त है दोस्त, मैं चौबीस सेकण्ड्स भी जीना नहीं चाहता. विधाता ने हम फूलों में जान तो डाल दी मगर हाराकीरी कर पाने के साधन नहीं दिए वरना अभी तक तुम मेरी मिट्टी देख रहे होते. मादक खूशबू, खूबसूरत पंखुड़ियाँ, ये चटख रंग एक झटके में सब के सब बदरंग हो गए हैं. अब मैं और जीना नहीं चाहता.’
‘कुछ देर पहले तक तो ठीक-ठाक थे अचानक ऐसा क्या हो गया है ?’
‘देख नहीं रहे! सम्मान करने के परपज से जिस गले में हमें डाला गया है वो नृशंस हत्या और बलात्कार कांड के सजायाफ़्ता मुजरिम का गला है. वह उस गुलबदन को मसल देने का अपराधी है जिसके गर्भ में एक पाँच माह की कली पनप रही थी. उसी की टहनी से फूटी नन्ही नाजुक सी ट्यूलिप को पत्थर पर पटक पटककर जिन्होने कुचल दिया उनकी सज़ा माफ कर दी गई है. गला इनका है और दम मेरा घुट रहा है. जो शख्स कैक्टस का हार पहनाए जाने की पात्रता नहीं रखते उसके गले को गुलों-गुलाबों से सजाया गया है !!, उफ़्फ़…. घिन आने लगी है दोस्त अब और जीने का मन नहीं है.”
फिर उसने हार में से कुछ तिरछा होकर आसमान की ओर देखा और कहा – ‘आगे से अंटार्कटिका में उगा देना प्रभु मगर आर्यावर्त में नहीं. मैं टहनियों में उगे कांटो के बीच रह लूँगा मगर नए दौर के आकाओं के निमित्त निर्मित मालाओं, गुलदस्तों में तो बिलकुल नहीं भगवान. कभी हम देवताओं के हाथों बरसाए जाने के काम आते रहे, आज अपराधियों के संरक्षकों के हाथों बरसाए जा रहे हैं. हमारी प्रजाति में जूही, चम्पा, चमेली किसी रेपिस्ट के रिहा होने पर तिलक नहीं लगातीं, आरती नहीं उतारतीं. आर्यावर्त में जुर्म, सजा, इंसाफ अपराध की प्रकृति देखकर नहीं, अपराधी का संप्रदाय और रिश्ते देखकर तय होने लगे हैं. हम आवाज़ नहीं कर पाते मगर समझते सब हैं. आर्यावर्त में बगीचे के माली फूलों को उनका धरम देखकर सींचते हैं. विधर्मी फूल सहम उठते हैं, कब कौन मसल दिया जाएगा कौन कह सकता है. कभी संगीन अपराधों पर सन्नाटा पसर जाया करता था अब ढ़ोल-ताशे बजते हैं. बजते रहें, इल्तिजा बस इतनी सी है प्रभु सहरा के रेगिस्तान में उग लें, साईबेरिया की बर्फ में उग लें, सागर की गहराईयों उग लें – आर्यावर्त में नहीं मालिक.’
‘मैं समझ सकता हूँ दोस्त, अब दद्दा माखनलाल चतुर्वेदी भी नहीं रहे कि तुम्हारी निराशा को स्वर दें सकें.’
‘पता है मुझे. कोई बात नहीं अगर वनमाली उस पथ पर न फेंक पाए जिस पर शीश चढ़ाने वीर अनेक जा रहें हों, कम से कम बलात्कारियों के पथ पर तो न डालें. सुरबाला के गहनों में गूँथ दें, चलेगा. प्रेमी-माला में बिंध दें – इट्स ऑलराईट. सम्राटों के शव पर अपने को सहन कर लूँगा. देवों के सिर पर चढ़ा दे तब भी कोई बात नहीं, हत्यारों बलात्कारियों के गर्दन-गले की शोभा तो न बनाएँ मुझे.’ उसने फिर साथी फूल से मुखातिब होकर कहा – ‘ये मिठाई, ये अबीर गुलाल और ये आतिशबाज़ी! इन्हे मामूली स्वागत समारोह की तरह मत देखना दोस्त – ये आनेवाले कल के आर्यावर्त का ट्रैलर है. फूलों की आनेवाली जनरेशन को इससे कठिन समय देखना बाकी है.’
‘डोंट वरी, हमें बहुत नहीं सहना पड़ेगा. जमाना आर्टिफ़िशियल फ्लावर का है. न उनमें जान होगी न तुम्हारी तरह जान देने की जिद. और लीडरान ? वे तो आर्टिफ़िशियल रहेंगे ही, अन्तश्चेतना से शून्य.’
सजा-माफ बलात्कार वीर समूह माला पहने-पहने तस्वीर खिंचवा रहा है. तस्वीर कल सुबह अखबार के कवर पेज पर नुमायाँ होगी. नये भारत की एक तस्वीर यह भी!!!
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
☆ आपदां अपहर्तारं ☆
आज की साधना
माधव साधना सम्पन्न हुई। दो दिन समूह को अवकाश रहेगा। बुधवार 31 अगस्त से विनायक साधना आरम्भ होगी।
आपसे विनम्र अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
(श्री जयप्रकाश पाण्डेय जी की पहचान भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी के अतिरिक्त एक वरिष्ठ साहित्यकार की है। वे साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। उनके व्यंग्य रचनाओं पर स्व. हरीशंकर परसाईं जी के साहित्य का असर देखने को मिलता है। परसाईं जी का सानिध्य उनके जीवन के अविस्मरणीय अनमोल क्षणों में से हैं, जिन्हें उन्होने अपने हृदय एवं साहित्य में सँजो रखा है।आज प्रस्तुत है आपका एक मजेदार व्यंग्य – “बांध और बाढ़ का खेल”।)
☆ व्यंग्य # 152 ☆ “बांध और बाढ़ का खेल” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆
(इस स्तम्भ के माध्यम से हम आपसे व्यंग्यकार के सर्वोत्कृष्ट व्यंग्य साझा करने का प्रयास करते रहते हैं । व्यंग्य में वर्णित सारी घटनाएं और सभी पात्र काल्पनिक हैं ।यदि किसी व्यक्ति या घटना से इसकी समानता होती है, तो उसे मात्र एक संयोग कहा जाएगा। हमारा विनम्र अनुरोध है कि प्रत्येक व्यंग्य को हिंदी साहित्य की व्यंग्य विधा की गंभीरता को समझते हुए सकारात्मक दृष्टिकोण से आत्मसात करें।)
एक अभियंता की दया से बांध बनाने का ठेका मिल गया, बांध बियाबान जंगल के बीच पिछड़े आदिवासी इलाके में बनना था, बीबी गर्व से फूली नहीं समा रही थी कहने लगी – अर्थ वर्क भ्रष्टाचार के रास्ते खोलता है और अमीर बनाने के खूब मौके देता है कमा लो जितना चाहो…। दो बड़े पहाड़ों को एक बड़ी मेंड़ बनाकर जोड़ने का काम था ताकि बहती नदी के पानी को रोका जा सके। इधर शहर में साहब का बंगला बनाने का नक्शा भी पास हो गया था। “बांध के साथ शहर में इंजीनियर साहब का बंगला भी बनता रहेगा” साहब के इसी इशारे में काम दिया गया था। सीमेंट, गिट्टी, लोहा शहर से खरीदा जाता बांध के लिए। पर पहली खेप बंगले बनने वाली जमीन पर उतार दी जाती। फिर बांध के नाम का बिल तुरंत पास हो जाता।
बांध का काम चलता रहा और साहब का बंगला तैयार…। उधर साहब कभी कभी बांध के पास बनी कुटिया में शराब, शबाब और कबाब में डूबे रहते और शहर के बंगले के बेडरूम में उनकी मेडम फिनिशिंग का काम कराती रहती। बरसात आयी खूब पानी गिरा, लीपापोती के चक्कर में साहब ने बांध बह जाने की रिपोर्ट ऊपर भेज दी। साहब का बंगला रहने के लिए तैयार और साहब ने पैसे देकर ट्रांसफर करा लिया।
अब जो नया साब आया उसे बड़े टाइप के बांधों में घोटाला करने का अच्छा अनुभव था… नाम सलूजा साब। एक दिन शराब के नशे में सलूजा जी ने बड़े बांधों में घपले के किस्से सुनाए – बांध बनने से बहुत से गांव डूब जाते हैं, बड़ी आबादी विस्थापित होती है, सोना-चांदी उगलतीं फसलें तबाह होतीं हैं गरीब बेसहारा हो जाते हैं और बांध बनाने वाले अधिकारी और ठेकेदारों की चांदी हो जाती है, बंगले और मंहगी गाड़ियों में ईजाफा हो जाता है।
अभी एक खबर सुनी, ये भी आदिवासी जिले के 305 करोड़ लागत के बांध के घपले की खबर थी। खबर सुनकर बड़बड़ाना स्वाभाविक है कि हम लगातार बांधों का निर्माण तो करते जा रहे हैं लेकिन भ्रष्टाचार में लिप्त होकर बांध प्रबंधन का सलीका नहीं सीख पाए हैं। यदि बांध से बाढ़ को रोका जा सकता है तो पूरा देश बाढ़ की चपेट में आकर क्यों बर्बाद हो रहा है। बांध बनते जा रहे हैं और बाढ़ से तबाही भी बढ़ती जा रही है। बाढ़ देखने के हवाई दौरे भी बढ़ रहे हैं। बांध और बाढ़ की चर्चा पर करोड़ों रुपये फूंके जा रहे हैं, और बांध बाढ़ से दोस्ती करके हाहाकार मचवाये हुए हैं। नेता लोग बांध घूम कर बाढ़ का मजा लेते हैं और बाढ़ में गरीब लोग मरते हैं। बिहार में 47 साल से बन रहा 380 करोड़ रुपये का बांध उदघाटन होने के एक दिन पहले ही बह गया था। बांध भी मुख्यमंत्रियों से डरता है। आरोप लगे कि बांध को दलित चूहों ने कुतर दिया इसलिए बांध बह गया। गंगा मैया सागर से मिलने उतावली है और उसे बांध में बांध दोगे तो क्या अच्छी बात है गंगा मैया नाराज नहीं होगी क्या? उदघाटन के पहले मुख्यमंत्री को गंगा मैया में नहा-धोकर पाप कटवा लेना चाहिए था, तो हो सकता है कि बिहार का बांध बच जाता।
दूरदराज और जंगल के बीच बने छोटे छोटे बांध आंकड़ों में चोरी हो जाते हैं अक्सर। असली क्या है कि हमारा देश कृषि प्रधान देश है न, इसलिए बांध और बाढ़ की जरूरत पड़ती होगी देश पूरी तरह खेती पर आश्रित है और इन्द्र महराज पानी देने में पालिटिक्स कर देते हैं तो सिंचाई के लिए बांध और नहरों की जरूरत पड़ती है। बांध बनाने के पहले विरोध होता है फिर बांध बनते समय विरोध होता है और बांध बन जाने के बाद विरोध होता है क्योंकि विरोध करना हमारी संस्कृति है।
सबको मालूम है कि जब बड़े बांध बनते हैं तो हजारों गांव खेती की जमीन पशु, पक्षी, पेड़, पौधे सब डूब जाते हैं विस्थापितों के पुनर्वास में लाखों करोड़ों रुपये के भ्रष्टाचार के मामले सामने आते हैं फर्जी भू-रजिस्टरी का कारोबार पकड़ में आता है।
गंगू बांध और बाढ़ की दोस्ती से परेशान है, बिहार वाले नेपाल के बाधों से परेशान हैं और किसान हर तरफ से परेशान है। दुख इस बात का है कि इस बार आदिवासी क्षेत्र के इस 305 करोड़ रुपए लागत के बांध के फूटने की खबर ने हजारों किसानों को रक्षाबंधन और आजादी का अमृत महोत्सव चैन से नहीं मनाने दिया।