मराठी साहित्य – विविधा ☆ गौरी विसर्जन… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ गौरी विसर्जन… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सोमवारी संध्याकाळी गौरीगणपतींच विसर्जन झालं घरं अगदी सुनंसुनं झालं. ह्या  विसर्जनाच्या दिवशी सकाळपासूनच एक  हूरहूर लागलेली असते. वास्तविक पहाता माहित असतं बरं का हे गौरीगणपती आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेयं. तरीही त्यांच्या विसर्जनानंतर चैन पडत नाही ही पण गोष्ट खरीच. त्यांच्या आगमनाने आपले मनं तसचं घरचं वातावरण खूप उत्साहवर्धक झालेल असतं. घर कसं भरल्याभरल्यासारखं वाटतं.

ह्या सणावरांच्या निमीत्त्याने का होईना आम्ही नोकरदार बायका देवासमोर चार घटका जरा शांत बसतो.नैवेद्य कुळाचार ह्या निमित्ताने चार निरनिराळे साग्रसंगीत पदार्थ करतो, ह्या निमीत्त्यानेच आपल्या कडून रितीरिवाज, नेमधर्म पाळल्या जातात. चार माणसे,नातलग आपले नेहमीचे रुटीन बदलवून गौरीगणपतीच्या निमीत्त्याने एकत्र येतात.ही एकमेकांची मनं जुळण्यासाठी, एकमेकांचा सहवास लाभण्यासाठीच जणू ह्या सणावारांच नियोजन असतं. परस्परांशी एकोप्याने वागणे आणि जमेल तितकी मदत करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.

आपण गौरीगणपतींना निरोप देतो खरा पण निरोप देतांनाच पुढील वर्षी ह्याच मुहूर्तावर परत इतक्याच ओढीनं येण्याची कमीटमेंट घेतो. जणू पुढील वर्षी परतण्याच्या बोलीवरच आपण ह्यांना निरोप देतो.

जरी गौरीगणपतींना निरोप देणं अवघडं जातं असलं तरी ते एक संतुलित आखीवरेखीव ऋतूचक्र आहे हे पण विसरून चालणार नाही. गौरी म्हणजे माहेरवाशिणींचे प्रतिक आणि गणपती म्हणजे घरचा खंदा दिपकच जणू, ज्याला कर्तव्यपूर्ती साठी एकाच जागी स्थिर राहताच येणार नाही. ज्याप्रमाणे माहेरवाशीण  एकदा माहेरी चक्कर मारून येऊन,तेथील सगळं क्षेमकुशल आहे ह्याची खात्री पटली की मग तिला आपल्या स्वतःच्या घराची ओढ लागते, त्याप्रमाणे गौरी ह्या सुद्धा  माहेरची आठवण सतत मनात पिंगा घालणारच किंवा मधून मधून माहेराची ओढ वाटणारच त्याप्रमाणेच गौरी ह्याही माहेरवाशिणी त्या औटघटकाच येणार,पण त्या अल्पकालावधीत पुरेपूर सौख्याचा आनंदचा शिडकावा करुन जाणार,प्रेमाची मायेची पखरण करुन जाणार.त्यामुळेच मन त्यांच्या विरहानं जरा झाकोळलं असलं तरी आपल्याला गरज असतांना ह्या मदतीला धावून येणारच ही मनात खात्री विश्वास पण तेवढाच असतो.जरी बाप्पा चे विसर्जन झाले तरी त्याच्या पूजेचा मान हा प्रथमच त्यामुळे बाप्पाचंही अस्तित्व कायम मनात ठायी ठायी जाणवतं असतं बघा.

आपण गौरीगणपतींना निरोप देतांना शिदोरी म्हणून दहीपोहे किंवा दहीभात व मुरडकानवला देतो.मुरडकानवला म्हणजे हलक्या हाताने सारण भरून केलेली करंजी आणि त्याला हाताने घातलेली नाजूक एकसारखी मुरड. मुरडकानवला दिल्यानंतर देव किंवा व्यक्ती मुरडून म्हणजेच वळून परत आपल्याकडे येतेच असा समज आहे.

सहज करता येण्यासारख्या गोष्टी,जुन्या प्रथा ज्या केल्याने आपले नुकसान तर काहीच होत नाही झालाच तर फायदाच होतो त्या प्रथा करण्याचा प्रयत्न करावा, अर्थात हे माझे मतं. म्हणून सौ.आईने शिकविलेल्या  गोष्टी उदाहरणार्थ प्रवासाला, परीक्षेला महत्वाच्या कामाला निघालेल्या आपल्या माणसांच्या हातावर दही देणे  तसेच कामानिमित्त प्रवासास बाहेरगावी जातांना देवाजवळ  पैसासुपारी ठेवणे अशा सहज गोष्टी ज्या माझी आई अजूनही कटाक्षाने पाळते,त्या मनोमन  पटतात.खरचं ह्या प्रथा पूर्ण विश्वासाने केल्या तर अर्थपूर्ण असतात.

परत एकदा गौरीगणपतींना कायम आमच्यावर कृपादृष्टी असू द्या ह्या हक्काच्या विनंतीने आजच्या पोस्ट ची सांगता करते.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कायमस्वरूपी… – सुश्री मीरा जैन ☆ (भावानुवाद) सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ कायमस्वरूपी… – सुश्री मीरा जैन ☆ (भावानुवाद) सौ. उज्ज्वला केळकर

सुश्री मीरा जैन

टेबलावर बदलीसाठी ठेवलेला मनोजचा अर्ज बघून मी. रतन गुप्ता आश्चर्यचकित झाले. कारण अलिकडेच त्याने नवीन बंगला बांधला होता आणि तो अतिशय खूश होता. आपली बदली होऊ नये, असं त्याला अगदी आतून आतून वाटायचं. जर कधी झालीच, तर तो एकटाच जाईल. त्याचं कुटुंब मुलांच्या शाळेच्या दृष्टीने कायम स्वरूपी इथेच राहील.

पण आज अचानक त्याचा बदलीसाठी अर्ज? गुप्तांनी त्याला आपल्या चेंबरमध्ये बोलावले.तो आत आल्या आल्या त्यांनी विचारलं, `कालपर्यंत तर तू बदली होऊ नये म्हणून विनवण्या करत होतास. बदली न झाली तर बरं, असं म्हणत होतास. नशिबाने जर झाली,  तर कुटुंब इथेच ठेवीन, असंही म्हणाला होतास. मग आज असं काय संकट आलं की तुला बदली हवीशी झाली. खरं खरं सांग!’

प्रथम मनोजला संकोच वाटला,  मग धैर्यपूर्वक त्याने आपली व्यथा सांगितली, `गावाकडे राहणार्या  आई-वडलांना जेव्हा कळलं की आता मी माझं घर बांधलय आणि मी आता कायमस्वरूपी इथेच राहणार आहे, तेव्हा तेही आपली गाठोडी-पासोडी,  बॅगा – वळकटी  घेऊन कायमचं राहण्यासाठी इथे येत आहेत.

मूळ हिन्दी कथा – स्थायी – मूळ लेखिका – सुश्री मीरा जैन

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाप्पाला निरोप… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ बाप्पाला निरोप… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

गेली दोन वर्ष कोरोनामुळे सगळ्या सार्वजनिक उत्सव आणि कार्यक्रमाला मर्यादा आल्या होत्या. ढोल, ताशा, डॉल्बी यांचे आवाज घुमत नव्हते. मिरवणुका काढल्या जात नव्हत्या.  नकळत सगळ्या कार्यक्रमांना निराशेची झालर लागली होती. पण यंदा मात्र गणपती उत्सव धूम धडाक्यात चालू आहे.  माणूस हा उत्सव प्रिय आहे. त्यातून महाराष्ट्रात तर सार्वजनिक गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या विरोधात समाजाला एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणरायाला वंदन केले जाते. बुद्धीदाता गणेश आणि शक्ती- स्फूर्तीदायी शिवाजी महाराज या दोन्हींचा जयजयकार महाराष्ट्रात होतो. या दोन्ही उत्सवांचा उद्देश समाजात स्फूर्ती रहावी, जिवंतपणा रहावा, समरसता यावी असाच आहे.

पण अलीकडच्या काळात या सर्वांना थोडी वाईट गोष्टींची साथ येऊ लागली होती. कित्येक तास चालणाऱ्या मिरवणुका, सजावटीमधील अतिरिक्त स्पर्धा, तसेच गुंडगिरी, दारू पिऊन नाचणे यासारख्या अनेक गोष्टी गणेशोत्सवादरम्यान होऊ लागल्या. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की तिथे परमेश्वर हस्तक्षेप करतो असं मला मनापासून वाटते. कोरोनामुळे मोठ्या मिरवणुकांना बंदी आली. काही अनिष्ट गोष्टी आपोआपच कमी झाल्या. वैयक्तिक पातळीवर घराघरातून गणपती बसवले गेले. परंतु सार्वजनिक कार्यक्रम दोन वर्षे बंद होते. यंदा पुन्हा नव्या जोमाने गणेशोत्सव साजरा केला गेला. आता महानगरपालिका विविध ठिकाणी विसर्जनासाठी हौद, निर्माल्यासाठी कुंड, यासारख्या गोष्टींची व्यवस्था करते. त्यामुळे आपोआपच एक प्रकारची शिस्त लोकांना लागली आहे. पुण्याचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. देश, परदेशातही पुण्याच्या गणपतीचे महत्त्व फार आहे.

यंदा दोन वर्षानंतर गणपती उत्सव पुन्हा एकदा उत्साहात साजरा होत आहे. वैयक्तिक पातळीवर गणेशाचा उत्सव हा घराघरात साजरा होतोच. त्यानिमित्ताने कुटुंब एकत्र येते. एकमेकांबद्दलचे राग, द्वेष, मतभेद यांचे गणपती बरोबरच विसर्जन झाले पाहिजे. आणि चांगल्या भावना दुर्वांप्रमाणेच वाढीला लावल्या पाहिजेत. दुर्वा जशा जमिनीला चिकटून वाढत वाढत जातात, विस्तारत असतात, तसेच कुटुंबाने एकमेकांशी चांगले संबंध ठेवून समाजजीवनाचा विस्तार केला पाहिजे. शाडूच्या मातीचा गणपती आपण पाण्यात विसर्जन करतो. त्या गणपतीची माती विरघळून तळाशी एकत्र येते- पुन्हा पुढच्या वर्षी नवीन निर्मितीसाठी ! तशी आपली वृत्ती अधिकाधिक एकत्र येण्याची, चांगले समाजमन निर्माण करण्याची राहिली पाहिजे. इतर देवतांपेक्षा गणपती आपल्याला जवळचा वाटतो. प्राणप्रतिष्ठा करून आपण त्याला सजीव रूप देतो. तो गणराया दहा दिवसात आपल्याला कितीतरी गोष्टी शिकवून जातो. घरातील लहान मुलाबाळांपासून सर्वांनाच गणपतीचे आकर्षण असते. गणपती दुकानात ठरवण्यापासून ते विसर्जनापर्यंत सर्व घर गणपतीमय झालेले असते. अलीकडे तर शाळातूनही शाडूची गणेशमूर्ती करायला शिकवतात. तसेच बऱ्याच घरी स्वतः केलेल्या मूर्ती बसवल्या जातात. असा हा गणपती बाप्पा ! त्याचे विसर्जन करायचे दिवस आले की सर्वांनाच फार वाईट वाटते ! कोणाकडे दीड दिवस, तर कोणाकडे पाच दिवस गणपती असतो.  काहींच्याकडे गौरीबरोबर गणपतीचे विसर्जन होते. अनंत चतुर्दशीला सर्वच गणपतींचे विसर्जन होत असते. या काळात पाऊस कमी झालेला असतो, परंतु काही वेळा बरेच दिवस पाऊस असतोही !. तरीही लोक उत्साहाने सार्वजनिक गणपती आणि त्यांचे देखावे बघायला जातात. एकूणच गणपतीचे हे दिवस उत्साहाचे असतात.

नुकताच मोबाईलवर एक व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये एक लहान मूल गणपती बाप्पाच्या विसर्जनाला तयार नसते आणि अक्षरशः रडत असते. त्यावरून मला महादेव शास्त्री जोशांची “मोर भट” नावाची कथा आठवली.त्या गोष्टीतील मोर भटजी गणपतीचे इतके भक्त होते की, गणपती विसर्जनासाठी पाण्यात सोडला की त्यांना अक्षरशः रडू येत असे. आणि तो रिकामा पाट घरी घेऊन येताना त्यांचे मन इतके विषण्ण होई की घरी येऊन त्या रिकाम्या मखरासमोर ते दुःखी चेहऱ्याने बसत असत. खरोखरच बाप्पाला निरोप देताना मन भारावून जाते आणि अंतरीचा उमाळा भरभरून वाहू लागतो आणि आपण पुन्हा पुन्हा म्हणतो –” गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..”

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ !! ब्रह्मचैतन्य रुग्णालय !! ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ !! ब्रह्मचैतन्य रुग्णालय !! ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

 हे रुग्णालय की राम मंदिर – तुम्हीच ठरवा !

दवाखाना म्हणजे सवर्त्र औषधांचा गंध, चहूकडे गंभीर वातावरण असं चित्र डोळ्यासमोर येतं.

आणि मंदिर ? – उदबत्तीचा सुगंध, कुठेकुठे सुविचार, श्लोक लिहिलेले…असं काहीसं.

जर एका दवाखान्यात असंच मंगल वातावरण आहे – हे सांगितलं तर खरं वाटेल का?

पण हे खरंय…अहमदनगरचं “ब्रह्मचैतन्य रुग्णालय” अगदी एखाद्या मंदिरासारखं आहे.

डॉ. कुलकर्णी दाम्पत्याचं मूळ “चिंतामणी हॉस्पिटल”, ब्रह्मचैतन्य महाराजांच्या भक्तीरसाने भारावून जाऊन “ ब्रह्मचैतन्य रुग्णालय “ झालंय. ह्या हॉस्पिटलच्या मागेच एक प्रशस्त ३ मजली मंदिर देखील आहे.

नाममात्र शुल्क (रू ३० फक्त !) आकारून ह्या रुग्णालयात रुग्णांची तपासणी होते .

OPD मधे रुग्णांचं स्वागतच मोठ्या प्रेमाने होतं :

प्रवेश केल्या केल्या मनाचे श्लोक दृष्टीस पडतात !

डॉक्टरांना भेटण्यासाठी आपल्या नंबरची वाट बघणारे रुग्ण “ रिकामे ” बसत नाहीत…! तिथे ब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचनं व इतर आध्यात्मिक पुस्तकं वाचनासाठी उपलब्ध आहेत.

डॉक्टर कुलकर्णींचं केबिन तर एखाद्या देवघरासारखं भक्तीरसाने परिपूर्ण आहे…

वरच्या मजल्यावर admit झालेल्या रुग्णांसाठी जप-माळ आणि प्रवचनांचं पुस्तक ठेवलंय…! रुग्णावस्थेत ह्याने खूप मनःशांती मिळते.

एवढंच नाही, प्रत्येक ward ला, खोलीला संतांचीच नावं दिली गेली आहेत…

“ ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर ” महाराजांचे निस्सीम भक्त असलेल्या डॉ. कुलकर्णी दाम्पत्याच्या भक्तीरसाने त्यांचं हॉस्पिटल न्हाऊन निघालं आहे.

चहूकडे देवळांचा धंदा चालू असताना आपल्या व्यवसायालाच देऊळ बनवणाऱ्या ह्या “वैद्य” दाम्पत्याची भक्ती अतुलनीयच !

वंदन…!   

संग्राहक :– सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सत्य… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ सत्य… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

कालिदासांना ही जाणीव झाली होती की ते खूप मोठे ज्ञानी झालेत. एकदा प्रवासात त्यांना तहान लागली, त्यांनी पाहिलं की जवळच एक वृद्ध स्त्री विहिरीवर पाणी भरत आहे. कालिदास म्हणाले, “ माते मला पाणी देशील तर तुला खूप पुण्य मिळेल.” वृद्ध स्त्री म्हणाली, “ बाळा मी तुला ओळखलं नाही, कृपया तू तुझा परिचय दे, मग मी तुला पाणी देते.” 

 मग कालिदासाने परिचय देण्यास सुरवात केली—

कालिदास म्हणाले “ मी प्रवासी आहे. “

वृद्ध स्त्री म्हणाली, “  प्रवासी तर फक्त दोनच आहेत– एक चंद्र आणि दुसरा सूर्य– जे दिवस रात्र चालतच असतात.” 

कालिदास म्हणाले, “ मी अतिथी आहे. पाणी मिळेल ?”

वृद्ध स्त्री म्हणाली, “ अरे अतिथी तर फक्त दोनच आहेत– एक धन आणि दुसरं तारुण्य– ते निघून जातात. खरं सांग तू कोण आहेस ?” 

कालिदास म्हणाले, “ मी सहनशील आहे. आता तरी पाणी मिळेल ? “

वृद्ध स्त्री म्हणाली, “ अरे सहनशील तर तर फक्त दोनच आहेत ! एक धरती आणि दुसरं झाडं–धरती जी पुण्यवान लोकांच्या बरोबर पापी लोकांचं देखील ओझं घेऊन आहे. आणि झाडं ज्यांना दगड मारला तरी ती मधुर फळच देतात.” 

कालिदास आता हतबल झाले. आणि ते म्हणाले “ मी हट्टी आहे.”  

वृद्ध स्त्री म्हणाली, “  नाही तू हट्टी कसा असशील ?  हट्टी तर फक्त दोनच आहेत– एक नख आणि दुसरे केस– कितीही कापले तरी परत वाढतातच. “

कालिदास आता कंटाळले,आणि म्हणाले, “ मी मूर्ख आहे.”

वृद्ध स्त्री म्हणाली, “ मूर्ख तर फक्त दोनच आहेत– एक राजा, ज्याची योग्यता नसताना तो सर्वांच्यावर राज्य करतो,  आणि दुसरा दरबारातील पंडित, जो त्या राजाला रिझवण्यासाठी चुकीच्या गोष्टीला खरं सिद्ध करण्याची चेष्टा करतो.”  

कालिदास आता काहीही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते. ते त्या स्त्रीच्या पायावर डोकं ठेऊन पाण्यासाठी विनवणी करू लागले. 

वृद्ध स्त्री म्हणाली, “ ऊठ बाळा,”- आवाज एकून कालिदासांनी वर पाहिलं, तर त्या स्त्रीच्या जागी साक्षात सरस्वती देवी उभी होती, कालिदास आता नतमस्तक झाले. 

सरस्वती देवी कालिदासांना म्हणाली, “ शिक्षणाने ज्ञान येते, अहंकार नाही. शिक्षणाच्या बळावर मिळालेला मान, सन्मान आणि प्रतिष्ठा यालाच तू सर्वस्व समजलास आणि त्याचा तुला अहंकार आला. तुझे डोळे उघडणे आवश्यक होते.” कालिदासांना त्यांची चूक समजली, ते भरपूर पाणी पिऊन पुढील प्रवासाला निघाले. 

तात्पर्य: विद्वत्तेवर कधीच गर्व करू नका. 

          ८४ लाख जीवांमध्ये फक्त  माणूस पैसे कमावतो. पण इतर कुठलाच जीव उपाशी रहात नाही….  

          आणि माणूस—पॆसे कमवूनसुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही !

संग्राहक – अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ निळासावळा सखा ☆ सुश्री निलिमा ताटके ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? निळासावळा सखा ? ☆ सुश्री निलिमा ताटके ☆ 

उत्तररात्र नि पहाट,

यामधील गाफील वेळ.

गाव सारे झोपलेले,

मनात सल,अन् उरात, कळ.

कृष्णसख्याच्या भेटीची,

एकच एक तळमळ.

मुरलीचा घुमे नाद

माझ्या घराभोवताली.

निळासावळा सखा ग,

वाजवतो मंजूळ पावरी.

भान हरपुनी मी धावते.

घराबाहेर टाकिते पाय.

चंदनतुळशीचा सुगंध नि

मोरपिस अंधारी चमकून जाय.

माझ्यासाठी, माझ्याचसाठी,

आला होता तो वनमाळी

मंजुळ सूर नि अनुपम सुगंध

सोडून गेला माझ्यासाठी.

छायाचित्र  – सुश्री निलिमा ताटके.

© निलिमा ताटके

ठाणे.

मोबाईल 9870048458

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आतिश का तरकश #156 – ग़ज़ल-42 – “कैसा नफ़रती निज़ाम बनाया…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी  ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं ।प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकशआज प्रस्तुत है आपकी ग़ज़ल “कैसा नफ़रती निज़ाम बनाया …”)

? ग़ज़ल # 42 – “कैसा नफ़रती निज़ाम बनाया …” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ?

ज़िंदगी दबे पाँव आती है मिलन की आस लिए,

हर आदमी तन्हा होता है मिलन की आस लिए।

यार लोगों से मिला-जुला करो तर्कों के झुरमुट में,

तन्हाई में जीते हैं हम सब मिलन की आस लिए।

हर शख़्स नाउम्मीदी में गुमसुम खोया है ऐ दोस्त,

निकल जा खुली सड़क पर उम्मीद की आस लिए।

लोग बाज़ारों में समेटें माल-ओ-असबाब-ए-फ़ैशन,

दिल खोल निकला करो आवारगी की आस लिए।

कैसा नफ़रती निज़ाम बनाया सियासतदाँ लोगों ने,

‘आतिश’ तरसता नज़र-ए-मुहब्बत की आस लिए।

© श्री सुरेश पटवा ‘आतिश’

भोपाल, मध्य प्रदेश

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ “श्री हंस” साहित्य # 33 ☆ मुक्तक ।। यहीं इसी धरती को हमें, स्वर्ग बनाना है ।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस”☆

श्री एस के कपूर “श्री हंस”

(बहुमुखी प्रतिभा के धनी  श्री एस के कपूर “श्री हंस” जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त अधिकारी हैं। आप कई राष्ट्रीय पुरस्कारों से पुरस्कृत/अलंकृत हैं। साहित्य एवं सामाजिक सेवाओं में आपका विशेष योगदान हैं।  आप प्रत्येक शनिवार श्री एस के कपूर जी की रचना आत्मसात कर सकते हैं। आज प्रस्तुत है आपका स्वतंत्रता दिवस के उपलक्ष में एक भावप्रवण मुक्तक ।। यहीं इसी धरती को हमें, स्वर्ग बनाना है।। )

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ “श्री हंस” साहित्य # 33 ☆

☆ मुक्तक ☆ ।। यहीं इसी धरती को हमें, स्वर्ग बनाना है ।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस”☆ 

[1]

हो विरोध कटुता फिर बात प्यार की नहीं होती।

हो मतभेद मनभेद तो बात इकरार की नहीं होती।।

जब दिल का कोना कोना नफरत में लिपटता है।

तो कोई बात आपस में सरोकार की नहीं होती।।

[2]

हम भूल जाते कोई अमर नहीं एक दिन जाना है।

जाकर प्रभु से कर्मों का खाता जंचवाना है।।

ऊपर जाकर स्वर्ग नरक चिंता मत करो अभी।

हो तेरी कोशिश हर क्षण यहीं स्वर्ग बनाना है।।

[3]

एक ही मिला जीवन कि बर्बाद नहीं करना है।

मन में नकारात्मकता भाव आबाद नहीं करना है।।

चाहें सब के लिए सुख तो हम सुख ही पायेंगे।

भूल से किसी के लिए गलत फरियाद नहीं करना है।।

© एस के कपूर “श्री हंस”

बरेली

ईमेल – Skkapoor5067@ gmail.com

मोब  – 9897071046, 8218685464

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈
image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – वर्जनाएँ ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ आपदां अपहर्तारं ☆

आज की साधना

श्रीगणेश साधना कल सम्पन्न हुई। अगली साधना के लिए समय पूर्व आपको जानकारी प्रदान की जवेगी।  

आपसे विनम्र अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

? संजय दृष्टि – वर्जनाएँ  ??

इस रचना की दृष्टश्रव्य प्रस्तुति >> वर्जनाएँ द्वार बंद करती रहीं शब्द- संजय भारद्वाज  स्वर- सतीश कुमार

ऊहापोह में बीत गया समय,

पाप-पुण्य की परिभाषाएँ,

जीवन भर मन मथती रहीं,

वर्जनाएँ द्वार बंद करती रहीं…

 

इक पग की दूरी पर था जो,

आजीवन पा न सके वो,

पग-पग साँकल कसती रही,

वर्जनाएँ द्वार बंद करती रहीं…

 

जाने कितनी उत्कंठाएँ,

जाने कितनी जिज्ञासाएँ,

अबूझ जन्मीं, अबूझ मरती रहीं,

वर्जनाएँ द्वार बंद करती रहीं…

 

सीमित जीवन, असीम इच्छाएँ,

पूर्वजन्म, पुनर्जन्म की गाथाएँ,

पल-पल जीवन हरती रहीं,

वर्जनाएँ द्वार बंद करती रहीं…

 

साँसों पर है जीवन टिका,

हर साँस में इक जीवन बसा,

साँस-साँस पर घुटती रही,

वर्जनाएँ द्वार बंद करती रहीं…

 

अवांछित ठुकरा कर देखो,

अपनी तरह जीकर देखो,

चकमक में आग छुपी रही,

वर्जनाएँ द्वार बंद करती रहीं.!

© संजय भारद्वाज

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ काव्य धारा # 99 ☆ ’’हे नाथ तुम्हीं जग के स्वामी…” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध

(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी  द्वारा श्री गणेश चतुर्थी पर्व पर रचित एक कविता  “कल्पना का संसार…”। हमारे प्रबुद्ध पाठकगण  प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी  काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे। ) 

☆ काव्य धारा 99 ☆ गज़ल – कल्पना का संसार” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

मनुज मन को हमेशा कल्पना से प्यार होता है

बसा उसके नयन में एक सरस संसार होता है।

जिसे वह खुद बनाता है, जिसे वह खुद सजाता है

कि जिसका वास्तविकता से अलग आकार होता है।

जहाँ हरयालियां होती, जहाँ फुलवारियां होती

जहाँ रंगीनियों से नित नया अभिसार होता है।

जहाँ कलियां उमगतीं है जहाँ पर फूल खिलते हैं

बहारों से जहाँ मौसम सदा गुलजार होता है।

जहाँ पर पालतू बिल्ली सी खुशियां लोटती पग पै

जहाँ पर रेशमी किरणों का वन्दनवार होता है।

अनोखी होती है दुनियां सभी की कल्पनाओं की

जहाँ संसार पै मन का मधुर अधिकार होता है।

जहाँ सब होते भी सच में कहीं कुछ भी नहीं होता

मगर सपनों में बस सुख का सुखद संचार होता है।      

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

ए २३३ , ओल्ड मीनाल रेजीडेंसी  भोपाल ४६२०२३

मो. 9425484452

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

image_print

Please share your Post !

Shares