(हिंदी साहित्य के सशक्त हस्ताक्षर डॉ. राकेश ‘चक्र’ जी की अब तक 122 पुस्तकें प्रकाशित हो चुकी हैं। जिनमें 7 दर्जन के आसपास बाल साहित्य की पुस्तकें हैं। कई कृतियां पंजाबी, उड़िया, तेलुगु, अंग्रेजी आदि भाषाओँ में अनूदित । कई सम्मान/पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत। इनमें प्रमुख हैं ‘बाल साहित्य श्री सम्मान 2018′ (भारत सरकार के दिल्ली पब्लिक लाइब्रेरी बोर्ड, संस्कृति मंत्रालय द्वारा डेढ़ लाख के पुरस्कार सहित ) एवं उत्तर प्रदेश हिन्दी संस्थान द्वारा ‘अमृतलाल नागर बालकथा सम्मान 2019’। उत्तर प्रदेश हिंदी संस्थान द्वारा राष्ट्रीय स्तर पर बाल साहित्य की दीर्घकालीन सेवाओं के लिए दिया जाना सर्वोच्च सम्मान ‘बाल साहित्य भारती’(धनराशि ढाई लाख सहित)। आदरणीय डॉ राकेश चक्र जी के बारे में विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें संक्षिप्त परिचय – डॉ. राकेश ‘चक्र’ जी।
आप “साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र” के माध्यम से उनका साहित्य आत्मसात कर सकेंगे।)
शब्द हे भाषेचे अलंकार असतात.शब्द सूचक असतात.मार्गदर्शक असतात.ते अर्थपूर्णही असतात आणि कधीकधी फसवेही.शब्दांची अशी असंख्य रुपे असतात. शब्दांच्या या सगळ्या भाऊगर्दीत असा एक शब्द आहे जो त्याच्या वेगळेपणामुळे उठून दिसतो.तो ज्यांना हवं असेल त्यांना नेहमीच भरभरुन देतो आणि देताना गरीब-श्रीमंत, लहान-मोठा, स्त्री-पुरुष, खेडवळ-शहरी असा कोणताही भेदभाव करीत नाही. त्याला आपलंसं करणाऱ्या कोणत्याही व्यक्तिमत्त्वाला तो आदर्शवत बनवू शकतो. या अर्थाने खूप वेगळा आणि म्हणूनच मला मोलाचा वाटणारा हा शब्द म्हणजे ‘बिनचूक’!
बिनचूक हा शब्द ऐकताच तो फक्त प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांच्याशी संबंधित आहे असेच वाटते. विद्यार्थीदशेत कोणत्याही प्रश्नाचे उत्तर बिनचूकच लिहिता यायला हवे या दडपणाखाली वाहिलेल्या अभ्यासाच्या ओझ्यामुळे तो अभ्यास,त्या परीक्षा, प्रश्नपत्रिका,आणि या सर्वांच्या धास्तीमुळे निर्माण झालेली अस्वस्थ घुसमट हे सगळं ‘बिनचूक’ या शब्दाला इतकं घट्ट चिकटून बसलेलं आहे की हा शब्द फक्त प्रश्नोत्तरांशीच संबंधित आहे असंच कुणालाही वाटतं. पण ते तसं नाहीय.’बिनचूक’हा शब्द फक्त चूक आणि बरोबर या टीचभर परिघासाठी आकाराला आलेलाच नाहीय. त्याची नाळ थेट एकाग्रता, नीटनेटकेपणा, निर्णयक्षमता या सगळ्यांशीच अतिशय घट्ट जुळलेली आहे.
बिनचूक म्हणजे जसं असायला हवं तसंच.अचूक. अतिशय काटेकोर.नीट. व्यवस्थित.नि:संदिग्ध ! बिनचूक या शब्दाचे खात्रीचा,विश्वसनीय, भरवंशाचा.. असेही अर्थ आहेत. या सर्व अर्थछटांमधील सूक्ष्मतर धाग्यांची परस्परांमधील घट्ट वीणच एखाद्या व्यक्तीमत्त्वाचा गुणविशेष ठरणारा बिनचूक हा शब्द आकाराला आणते. यातील ‘खात्रीचा’,’विश्वसनीय’, ‘भरवंशाचा’ ही सगळी वैशिष्ट्ये त्या व्यक्तीची अचूक निर्णय घेण्याची क्षमता,कार्यपद्धतीतील पारदर्शकता,त्याची सर्वसमावेशक वृत्ती यामुळे सभोवतालच्या लोकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रतिमांची प्रतिबिंबेच म्हणता येतील. याउलट सतत चूका करणारी एखादी धांदरट व्यक्ती कुणालाच खात्रीची, भरवंशाची वाटत नाही. ती बेभरवंशाचीच वाटते. एखादे महत्त्वाचे अवघड काम एखाद्यावर तातडीने सोपवायची वेळ आली तर अशी धांदरट व्यक्ती ते काम बिनचूक पूर्ण करू शकेल याबद्दल कोणालाही विश्वास वाटणे शक्यच नसते. त्यामुळेच ती व्यक्ती जबाबदारीच्या, महत्त्वपूर्ण कामांसाठी अविश्वसनीयच ठरते.
अशा धांदरट व्यक्तींकडून होणाऱ्या चूका आणि कामचुकार माणसाने केलेल्या चूका यात अवगुणात्मक फरक नक्कीच आहे. धांदरट व्यक्ती आत्मविश्वासाच्या अभावी बिनचूकपणा पूर्णतः अंगी बाणवू शकणारही नाही कदाचित,पण आपल्यामुळे होणाऱ्या त्रासाची त्याला जाणीव असते. त्यामुळे स्वतःमधे सुधारणा घडवून आणण्यासाठी अशी व्यक्ती त्याच्यापरीने प्रयत्नशीलही असते. आळशी आणि कामचुकार व्यक्तींचं तसं नसतं. त्या वेड पांघरून पेडगावला निघालेले प्रवासीच असतात. कामं टाळायच्या वृत्तीमुळे आपल्या अंगाला तोशीस लावून घ्यायची त्यांची मुळात तयारीच नसते. येनकेन प्रकारेन त्यांचा कामे टाळण्याकडेच कल असतो.
अशा कामचुकार व्यक्तींना बिनचूकपणा अंगी बाणवणे हे अशक्यप्रायच वाटत असते. त्यामुळे ‘मी आहे हा असा आहे’ असं म्हणत स्वतःच लटकं समर्थन करीत रहाण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे एकतर ते खऱ्या अर्थाने समाधानी नसतात आणि ते आयुष्याच्या परीक्षेतसुध्दा काठावरही पास होऊ शकत नाहीत.
याउलट बिनचूकपणा अंगी बाणवणे हे ज्यांच्यासाठी जाणीवपूर्वक ठरवलेले ‘साध्य’ असते ते आवश्यक कष्ट, स्वयंशिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्न याद्वारे प्रत्येक काम अचूक, दोषरहित व्हावे यासाठी प्रयत्नशील असतात.त्यांच्यासाठी ही एक साधनाच असते.अर्थात ही साधना ते स्वखुशीने मनापासूनच करीत असल्याने त्यांच्यासाठी ती कधीच कष्टप्रद, त्रासदायक नसते तर हळूहळू अतिशय नैसर्गिकपणे ती त्यांच्या अंगवळणी पडत जाते. अशी माणसे कधीच चूका करीत नसतात असं नाही. त्यांच्या हातूनही अनवधानाने क्वचित कधी चूका होतातही. पण ते अशा चुकांमधून काही ना काही शिकत जातात. एकदा झालेल्या चुकीची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सजग रहातात. स्वतःची चूक मान्य करण्यात कधीही कमीपणा मानत नाहीत. आपली चूक मनापासून स्वीकारतात आणि नेमकं काय आणि कसं चुकलंय हे समजूनही घेतात.’बिनचूकपणा’ हे साध्य प्राप्त करण्यासाठीची ही त्यांची साधनाच असते !
हे सगळे कष्ट घ्यायची तयारी नसलेलेच कामचुकारपणा करायला प्रवृत्त होत असतात. त्याना परिपूर्णतेची आस कधी नसतेच.अशा लोकांसाठी बिनचूकपणा हा कोल्ह्याला आंबट वाटणाऱ्या द्राक्षांसारखाच असतो.अन्यथा बिनचूकपणा किंवा नीटनेटकं काम त्यांना अशक्यप्राय वाटलंच नसतं. याउलट परिपूर्णतेचा ध्यास घेतलेली माणसं साधी साधी कामेही मन लावून करतात. त्यातच त्यांचा आनंद आणि समाधान लपलेलं असतं. अनवधानाने झालेली चूकही त्यांना अस्वस्थ करीत असते आणि मग त्या चूकांमधून ते स्वतःत सुधारणा घडवून आणायला प्रवृत्त होतात. स्वतःच्या शिस्तप्रियतेमुळे अंगी बाणलेला हा बिनचूकपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वविकासासाठी प्रमुख घटक ठरत असतो.
परिपूर्णतेचा,अचूकतेचा असा ध्यास घेणाऱ्या व्यक्तींचेही दोन प्रकार असतात. जी माणसे कामात अगदी शिस्तशीर,बिनचूक असतात त्यातील कांहीना त्याबद्दल वाटणाऱ्या अभिमानाचे रुपांतर कधीकधी अहंकारात होत जाते. त्यामुळे त्यांच्या वागण्याला एक काटेरी धार येऊ लागते जी इतरांना जातायेता सहज ओरखडे काढत जाते. त्यामुळे इतरांना त्यांच्या कामाबद्दल किंवा परफेक्शनबद्दल एरवी कितीही आदर वाटला तरी ते त्यांच्याजवळ जायला घाबरतात. त्यांच्यापासून थोडं अंतर राखूनच वागतात. हा दोष अर्थातच त्या व्यक्तींच्या अहंकाराचा.त्यांच्या बिनचूकपणाचा नव्हे. अशा अहंकारी व्यक्ती इतरांपेक्षा आपण कोणीतरी वेगळे,श्रेष्ठ आहोत या कल्पनेत सतत तरंगत असतात. आणि स्वतःचा जगण्यातला आनंद मात्र हरवून बसतात.
या उलट यातल्या दुसऱ्या प्रकारच्या व्यक्तींना त्यांच्या बिनचूकपणाचा कधीच दुराभिमान नसतो. सर्वांना सामावून घेण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे ते सगळ्यांना सोबत घेतात,त्यांना नेहमीच आपुलकीने समजावून सांगत स्वतःच्या कृतीने त्यांना कार्यप्रवृत्त करतात.जगणं असं कृतार्थ होण्यासाठी बिनचूक पणाचा अट्टाहास नव्हे तर असोशी आवश्यक असते!
विद्यार्थीदशेतील प्रत्येकाचीच वाटचाल ‘चूक की बरोबर?’ या प्रश्नाशीच बांधलेली असते. तिथे परीक्षेत येऊ शकणारे ‘अपेक्षित प्रश्न’ जसे सहज उपलब्ध होऊ शकतात, तशीच त्या प्रश्नांची बिनचूक उत्तरे इन्स्टंट पुरवणारी गाईडसही. आयुष्यातल्या जगण्याच्या वाटचालीत मात्र निर्माण होणारे असंख्य प्रश्न बऱ्याचदा अनपेक्षित असतात. त्या प्रश्नांचे नेमके आकलन आणि आपण शोधलेल्या त्या प्रश्नांच्या उत्तरांचा होऊ शकणारा दीर्घकालीन परिणाम याचा सारासार विचार करूनच त्या प्रश्नांची उत्तरे ठरवावी लागतात. अर्थातच ही उत्तरे निर्णयप्रक्रियेतूनच तयार होत असल्याने त्या उत्तरांची बिनचूकता हे ज्याच्या त्याच्या निर्णयक्षमतेच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. म्हणजेच बिनचूक निर्णय घेणे हेही कामातील बिनचूकपणा आणि प्रश्नांची बिनचूक उत्तरे देण्याइतकेच महत्त्वाचे असते. अचूक निर्णय घेण्याची निर्णयक्षमतासुध्दा ‘बिनचूक’ या शब्दाने अशी गृहित धरलेली आहे. निर्णयक्षमता वृद्धिंगत होण्यासाठी स्वयंशिस्त, परिस्थितीचे अचूक आकलन आणि प्रत्येक प्रश्नाकडे पहाण्याचा ति-हाईत दृष्टीकोन हे घटक महत्त्वाचे ठरतात.
प्रत्येकाच्या आयुष्यात पदोपदी या ना त्या कारणाने निर्णय घ्यायची वेळ येतच असते. अशा प्रत्येकवेळी दुसऱ्यावर अवलंबून न रहाता ते निर्णय ज्याचे त्यालाच घ्यावे लागतात. तत्काळ निर्णय घ्यायची अशी कसोटी पहाणारी वेळ अचानक पुढे येऊन ठेपण्याची शक्यता अपवादात्मक नसतेच. अशावेळी कोणताही निर्णय घेताना मनात चलबिचल असेल तर ती निर्णय प्रक्रियेसाठी घातक ठरु शकते. काहीवेळा सखोल विचार न करता आतयायीपणाने निर्णय घेतले जातात. असे निर्णय चुकीचे तर ठरतातच शिवाय ते नवे प्रश्न निर्माण करायला निमित्तही ठरत असतात.त्यासाठीच अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीचे नेमके आकलन आणि सारासार विचार हे घटक महत्त्वाचे ठरतात. कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य प्रयत्नपूर्वक सरावाने प्राप्त करणे मग फारसे अशक्य रहात नाही.
आपल्या आयुष्यात निर्माण होणारं दु:ख असो किंवा असमाधान हा बऱ्याचदा आपण स्वतःच त्या त्या वेळी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचाच परिपाक असतो.त्यामुळे अचूक निर्णयक्षमतेचं महत्त्व वेगळं सांगण्याची गरज नाही.
सारांश हाच की बिनचूकपणा अंगी बाणवणे हे मनापासून स्विकारलेले साध्य आणि त्यासाठी कष्ट, स्वयंशिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्न ही साधना जगणं आनंदी आणि कृतार्थ होण्यासाठी अपरिहार्यच ठरते !!
(‘‘डॉ. मी तुम्हाला ताई म्हणू का?”… तिने अगदी अनपेक्षितपणे विचारलं, आणि डॉ.स्नेहललाही का कोण जाणे, पण लगेच ‘हो’ म्हणावंसं वाटलं.) इथून पुढे —
‘‘ ताई, ती ताईजी मला इथे सोडायला आली होती. पण नंतर परत आलीच नाहीये अजून. ताईजी म्हणजे आम्ही जिथे रहातो, त्या घराची मालकीण. त्या घराला कोठा म्हणतात… मला आठवतंय् तेव्हापासून आम्ही दोघी बहिणी तिथेच रहातो. कारण माझे आईवडील… आमचं घर… यातलं काहीच मी आजपर्यंत पाहिलेलं नाही. या ताईजीच्या कोठ्यात २-३ पुरूष माणसं सोडली, तर सगळ्या बायकाच बायका… सगळ्या आपल्याच तो-यात. तिथे एक म्हातारी बाई आहे… मावशी म्हणतात तिला… ती सगळ्यांचं जेवण बनवते. या मावशीचाच काय तो थोडा आधार असायचा आम्हाला… ती रोज आमची आंघोळ उरकायची आणि दोन वेळा मोजकंच् जेवायला द्यायची. बास्. मी थोडी मोठी झाल्यावर त्या कोठ्याच्या लहानशा खिडकीतून बाहेर बघत बसायची… तासन् तास… कारण दुसरं काय करणार ना ?… ना बोलायला कुणी, ना काही शिकवायला, ना खेळायला. शाळेत जाणा-या मुलांकडे मी रोज बघत रहायची. आपणही शाळेत जावं असं वाटायचं मला. एकदा मी ताईजीला तसं बोलूनही दाखवलं होतं… तर तिने मला कसली तरी शिवी दिली आणि इतकी जोरात थोबाडित मारली, की मी हेलपाटत खाली पडले. मग मला तिची जास्तच भिती वाटायला लागली. लहान होते तेव्हा निदान बहीण तरी माझ्याशी काही-बाही बोलायची, माझ्याजवळच झोपायची. पण ती जशी मोठी झाली, तसं तिचं वागणं खूप बदललं. तिथल्या इतर बायकांसारखं नटावं-थटावं असं बहुतेक तिला वाटायला लागलंय्, असं मला वाटायचं. आणि आता ती साडीही नेसायला लागली होती. पण हळूहळू तिचं वागणं विचित्र झालं– जास्तच बदलत गेलं. संध्याकाळ झाली की खूप घाबरल्यासारखी वाटायची. मग तिचं रात्री माझ्यासोबत झोपणं बंद झालं. त्यावेळी ती कुठे जायची, कुठे झोपायची, ते मला कळलंच् नाही तेव्हा. असंच एखाद-दीड वर्ष गेलं असेल… आणि अचानक ती आजारी पडली… सारख्या उलट्या व्हायच्या… जेवण जायचं नाही… पडूनच असायची सारखी. मग ती ताईजी इतकी दुष्टपणे वागायला लागली तिच्याशी… संध्याकाळ झाली की अक्षरश: फरपटत खोलीतून न्यायची तिला बाहेर… आणि मी घाबरून रात्रभर त्या खोलीच्या कोप-यात बसून रहायची. आणि अचानक एक दिवस सकाळी ताईजीने मला बोलावून थंडपणे सांगितलं, की ‘‘ तुझी बहीण ढगात गेली… आता तू तरी नीट वाग… मी सांगेन तसंच. नाहीतर…” – बहीण ढगात गेली म्हणजे आता ती मला कधीच दिसणारही नाही याचं दु:ख जास्त वाटत होतं, की त्या ताईजीची भिती जास्त वाटत होती हे माझं मलाच कळत नव्हतं…”
एव्हाना बेबीचे डोळे पाझरायला लागले होते. डॉ.स्नेहल तर हे सगळं ऐकून फारच हादरून गेली होती. पण कसंतरी स्वत:ला सावरत तिने बेबीला विचारलं… ‘‘ मग बहीण गेल्यावरही तू तिथेच रहातेस का अजून?”
‘‘ हो… जायचं म्हटलं तरी जाणार कुठे? पळून जायचा प्रयत्न केला होता एकदा… कारण मीही आता थोडी मोठी झाले होते. तो कोठा म्हणजे घर नाही आणि तिथे माझं म्हणावं असं एकही माणूस नाही हे माझ्या लक्षात यायला लागलं होतं. मरण्याआधीची बहिणीची अवस्था आठवत होती. आई कशाने मेली तेही कानावर पडलं होतं…”
‘‘ काय झालं होतं त्यांना? ”…
‘‘ एडस् का काय ते… आणि त्याच भीतीने बहिणीने जीव दिल्याचंही नंतर कधी तरी कळलं होतं. म्हणून तिथून पळ काढायचा होता मला. पण खाली दारावर चौकीदार बसलेलाच होता. म्हणजे नेहेमीच असायचा. त्याने अडवलं, आणि थेट ताईजीच्या समोर नेऊन उभं केलं. आता आपली अजिबात खैर नाही, आणि इथून सुटकाही नाही हे माझ्या चांगलंच् लक्षात आलं. त्या दुष्ट बाईने चार दिवस मला उपाशीपोटी कोंडून ठेवलं, मी रडरड रडले. पण तिथल्या भिंतींना कुठे कान होते? पाचव्या दिवशी खोलीचं दार उघडून ती मावशी आली. मी तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. पण ती त्या ताईजीचीच बहीण. तिने मला ढकलूनच दूर सारलं. अर्धा कप गारढोण चहा माझ्यासमोर आदळला, आणि निघून गेली. असेच दिवस चालले होते. काही दिवसांनी मीही वयात आले, आणि ताईजी अचानक माझ्याशी चांगलं वागायला लागली. त्याचं कारण जेव्हा मला कळलं तेव्हा मी फार घाबरून गेले. जीव द्यावासा वाटत होता. पण माझ्या बहिणीएवढी मी धीट नव्हते. माझ्या हातात एकच गोष्ट आहे, हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा माझ्या मनाचा दगड झाला जणू… मी थंडपणे संध्याकाळी नटून बसायला लागले… रोज नव्याने मरायला लागले. आणि अचानक एक दिवस मला दिवस गेल्याचं माझ्या लक्षात आलं.”
‘‘ अरे बापरे… मग काय केलं त्या ताईजीने? ” आता डॉ.स्नेहल फारच अस्वस्थ झाली होती…
‘‘ अहो तिला हे कळलं असतं तर तिने काहीतरी केलं असतं ना? ”
‘‘ म्हणजे?”
‘‘ ताई, अहो एव्हाना मीही जरा शहाणी झाले होते. मी आपणहून कुणालाच काही सांगितलं नाही. आणि सुदैवाने मला फारसा त्रासही होत नव्हता. त्यात मी अशी हडकुळी… अशक्त… सहा महिने होईपर्यंत पोटच दिसत नव्हतं… कुणाला शंकाही आली नव्हती. संध्याकाळी नटून बसणंही मी मुद्दामच थांबवलं नाही. कारण मीही अशी मरतुकडी… फारसं कुणी बघायचंही नाही माझ्याकडे… कमी पैसे मोजू शकणारे जेमतेम तिघे-चौघेच आले असतील माझ्याजवळ… आणि त्यावरूनही ताईजीची मी कितीतरी बोलणी खात होते. पण आता तीच गोष्ट माझ्या पथ्यावर पडते आहे, अशी मी स्वत:ची समजूत घालत होते. सातवा महिना लागला आणि मग मात्र मला काही ना काही त्रास व्हायला लागला. सगळ्यांना खरं काय ते कळलं. ताईजीची धुसफूस-चिडचिड सुरू झाली. मला डॉक्टरकडे नेलं. पण आता मूल पाडता येणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं, आणि ताईजीचा नाईलाज झाला. आता नऊ महिने भरेपर्यंत तरी, माझी संध्याकाळ फक्त माझी असेल म्हणून मला आनंद वाटत होता— आणि ताईजी कितीही चडफडली तरी माझ्याबाबतीत नाईलाजाने का होईना पण तिला गप्प बसावं लागत होतं, याचा तर फारच जास्त आनंद झाला होता. पण बघा ना… नशीबच फुटकं… सातवासंपायच्या आतच इथे यावं लागलं…पुढचं तर तुम्हाला माहितीच आहे.”
‘‘हो गं. किती वाईट अवस्था झाली होती तुझी… जगतेस का मरतेस अशी… पण वाचलीस बाई.”
☆ अनमोल भाग्य…लेखक – श्री मिलिंद जोशी ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆
माझ्या वडिलांचे वय आता ८० च्या जवळपास आहे. त्यांना पार्किन्सनचा आजार आहे. त्यामुळे त्यांचे बोलणेही तोंडातल्या तोंडात येते. चालताना ही वॉकर लागतो. अनेकदा वळताना त्यांचा तोल जातो. कधी कधी ते वॉकर विसरून जातात आणि हळूहळू भिंतीच्या आधाराने चालतात. तोल गेला की पडतात. थोडेफार लागते. मग पुढील दोन तीन तास त्यांना धीर द्यावा लागतो. या गोष्टी खूप सामान्य आहेत हे त्यांच्या मनावर ठसवावे लागते. मनातील भीती कमी झाली की परत पूर्ववत होतात. पण यामुळे आम्हाला कायम त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागते. बरे आपल्याला कायम घरात राहणे शक्य नसते. त्यामुळे कधी कधी नाईलाजास्तव त्यांना घरात ठेवून बाहेरून कुलूप लावून दीड दोन तासांसाठी बाहेर जावे लागते. त्यावेळी त्यांना सगळे जवळ द्यायचे आणि आपण आपल्या कामाला जाऊन यायचे.
काका ( मी वडिलांना ‘काका’ म्हणतो ) दुपारी टीव्ही लावतात आणि बसल्या बसल्या झोपून घेतात. त्यामुळे त्यांना रात्री लवकर झोप येत नाही. मग त्यावेळी आपण काम करताना एकीकडे जुने गाणे लावले की ते खुश. कधी कधी त्यांचे जुने किस्से सांगत बसतात. अनेकदा तर त्यांचे बोलणे आपल्याला समजत नाही. मग आपण फक्त होकार द्यायचा. आपल्या चेहऱ्यावरून त्यांना लगेच समजते, आपल्याला त्यांचे बोलणे काहीच कळलेले नाही. मग त्यांच्या चेहऱ्यावर हसू येते.
त्यांचा एक गुण मात्र घेण्यासारखा आहे. अजूनही ते त्यांना ज्या ज्या गोष्टी शक्य होतील ते सगळे काम करतात. रात्रीचे जेवण झाल्यावर ओट्यावर जितके कप असतील ते विसळून ठेवतात. काही निवडायचे असेल तर निवडत बसतात. ओटा आवरून घेतात. आम्ही त्यांना कितीही सांगितले तरी त्यांना त्याशिवाय होत नाही. आम्हीही मग ‘जे करायचे ते करा’ म्हणून मोकळे होतो. कारण ज्यावेळी ते काही काम करतात त्यावेळी खुश असतात. काहींना पटणार नाही पण अनेकदा घरातील वयस्कर व्यक्तींना आपण काम करू दिले नाही तर ते जास्त चिडचिड करतात असा माझा अनुभव आहे. कारण अनेकदा त्यांना असे वाटते की, त्यांचे घरातले महत्व कमी झाल्यामुळेच आपण त्यांना काम करू देत नाही.
मध्यंतरी काकांना acidity चा त्रास होत होता. डॉक्टरांनी त्यासाठी गोळ्या दिल्या. इतक्या गोळ्या कशा घ्यायच्या म्हणून त्यांनी दोन दिवस पार्किन्सनच्या गोळ्या घेतल्या नाहीत. परिणाम असा झाला की त्यांना वेगवेगळे भास होऊ लागले. त्यांना कुणी बसलेले दिसायचे. किंवा खालून कुणी खिडकीवर दगड मारताहेत असे वाटायचे. ते दोन दिवस आम्ही जाम घाबरलो होतो. एक दिवस वैतागून मी त्यांना काहीतरी चिडून बोललो. मग काय… फुल झापून काढला त्यांनी मला. संध्याकाळी तायडीचा व्हिडिओ कॉल आला. त्यांनी लगेच तिलाही सांगितले, ‘मिलिंद आज माझ्यावर चिडला होता.’ मग काय विचारता, तायडीनेही हसत हसत मला कानपिचक्या दिल्या आणि काका खुश.
एक मात्र अगदी खरे आहे, त्यांच्यासाठी जरी आम्हाला कुणाला तरी कायम घरात राहावे लागते, तरीही ते कधीच आम्हाला ‘जबाबदारी’ वाटत नाहीत. उलट आम्हाला त्यांचा “आधार”च वाटतो. याचे सगळे श्रेय फक्त आणि फक्त काकांनाच आहे. कारण त्यांनी त्यांचे आजारपण आणि त्यानंतरचे त्रास स्वीकारले आहेत. एकदा का माणसाने समोर येणाऱ्या घटनांचा स्वीकार केला की त्याला फारसा मानसिक त्रास होत नाही. ना त्यांची आमच्या बद्दल काही तक्रार आहे, ना जीवनाबद्दल. अनेकदा आम्ही एकमेकांची चेष्टा मस्करी करतो त्यावेळी शेजारच्यांना वाटते, माझे वडील भाग्यवान आहेत. पण मला वाटते, आम्ही मुलं जास्त भाग्यवान आहोत की आम्हाला असे आईवडील मिळाले, जे प्रत्येक गोष्ट समजून घेतात. जो पर्यंत आई होती, तिने कायम आम्हाला वागणुकीचे धडे दिले. आणि वडील अजूनही त्यांच्या वागण्यातून ‘सकारात्मक जीवन कसे जगावे’ याचे धडे देत आहेत. मला वाटते, भलेही आपल्याकडे पुरेशा सुविधा नसल्या तरी आपल्याला समजून घेणारे पालक आपल्या सोबत असतील तर त्यासारखे दुसरे भाग्य नाही.
लेखिका : श्री मिलिंद जोशी, नाशिक
प्रस्तुती – श्री माधव केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) ची स्थापना – संकलन मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) स्थापना : १५ ऑगस्ट १९६९
‘इसरो’— (Indian Space Research Organization (ISRO)) या संस्थेची स्थापना १५ ऑगस्ट १९६९ रोजी करण्यात आली. याचे मुख्यालय बंगळुरू येथे आहे. “ मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान “ हे या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. येथे मुख्यत: कृत्रिम उपग्रह तयार करण्यासाठी व त्यांचे प्रक्षेपण करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित केले जाते.
आजपर्यंत इस्रोने अनेक उपग्रहांचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले आहे. स्वतंत्र भारताच्या यशस्वी कार्यक्रमांमध्ये इस्रोचे कार्य अग्रगण्य आहे.
भारताने अंतराळशास्त्रात केलेल्या प्रगतीचे राष्ट्रीय व सामाजिक विकासात मोठे योगदान आहे. दूरसंचार, दूरचित्रवाणी प्रसारण आणि हवामानशास्त्र सेवा, यासाठी INSAT व GSAT उपग्रह मालिका कार्यरत आहे. यामुळेच देशात सर्वत्र दूरचित्रवाणी, दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा उपलब्ध होऊ शकली. याच मालिकेतील EDUSAT उपग्रह तर फक्त शिक्षणक्षेत्रासाठी वापरला जातो.
देशातील नैसर्गिक संसाधनांचे नियंत्रण आणि व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी IRS उपग्रह मालिका कार्यरत आहे.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
संदर्भ : फेसबुक
संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा “रात का चौकीदार” महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है आपकी विचारणीय लघुकथा “हिंदी और बदलती सोच…”।)
☆ तन्मय साहित्य # 150 ☆
☆राजभाषा मास विशेष – लघुकथा – हिंदी और बदलती सोच…☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆
लघुकथा
.
घर पर आए मेहमान का स्वागत करते हुए अपने दस वर्षीय पोते विनोद को विद्यासागरजी ने उन्हें प्रणाम करने का संकेत किया।
“नमस्ते अंकल जी” कहते हुए विनोद ने मेहमान के घुटनों को एक हाथ से छूते हुए प्रणाम करने की रश्म निभाई।
“कौन सी कक्षा में पढ़ते हो बेटे?”
“क्लास सिक्स्थ में “
“कौन सी स्कूल में”
“अंकल, डी पी एस- देहली पब्लिक स्कूल”
“अरे वाह! वहाँ तो पूरे अंग्रेजी माध्यम से पढ़ाई होती है ना?”
“हाँ भाई सा.! ए – टू जेड इंग्लिश मीडियम में, बीच में ही विद्यासागर जी सगर्व भाव से बोल पड़े। और तो और वहाँ आपस में भी हिंदी में बात करना एलोड नहीं है, साथ में बहुत सारी अदर एक्टिविटीज भी सिखाते हैं।”
“सिखाने की बात से याद आया, भाई जी, अब तो ये छुटकू इंग्लिश शब्दों में मेरी भी गलतियाँ निकालने लगा है, कल ही मार्केट जाते समय मैंने कहा कि बेटू – ट्राफिक बहुत बढ़ गया है आजकल।”
तो कहने लगा “दादूजी आप गलत बोल रहे हो, ट्राफिक नहीं ट्रैफिक या ट्रॉफिक बोलते हैं।”
यह बताते हुए विद्यासागर जी का चेहरा पुनः गर्व से दीप्त हो उठा।
“ये तो बहुत अच्छी बात है। अच्छा विद्यासागर जी, वहाँ हिंदी भी तो एक विषय होगा ना?”
“अब क्या बताएँ भाई जी, है तो हिंदी विषय सिलेबस में, पर कहाँ पढ़ पाते हैं ये आज के बच्चे, अब इसे ही देखो हिंदी वर्णमाला और हिंदी की गिनती भी ठीक से नहीं आती जब कि इंग्लिश में फर्राटे से सब कुछ बता देगा ये, फिर एक विजयी मुस्कान तैर गयी चेहरे पर।”
“तो आप क्यों नहीं पढ़ाते इन्हें घर पर हिंदी ?”
“आप भी तो जानते हैं अब आज के समय में कहाँ बखत रह गयी हिंदी की भाई जी!”
“इसलिए समय के साथ जो चल रहा है वही ठीक है।”
ज्ञातव्य हो कि कईं सम्मान-अलंकरणों से सम्मानित विद्यासागर जी हिंदी के एक सुविख्यात वरिष्ठ साहित्यकार है।
(डा. सलमा जमाल जी का ई-अभिव्यक्ति में हार्दिक स्वागत है। रानी दुर्गावती विश्विद्यालय जबलपुर से एम. ए. (हिन्दी, इतिहास, समाज शास्त्र), बी.एड., पी एच डी (मानद), डी लिट (मानद), एल. एल.बी. की शिक्षा प्राप्त । 15 वर्षों का शिक्षण कार्य का अनुभव एवं विगत 25 वर्षों से समाज सेवारत ।आकाशवाणी छतरपुर/जबलपुर एवं दूरदर्शन भोपाल में काव्यांजलि में लगभग प्रतिवर्ष रचनाओं का प्रसारण। कवि सम्मेलनों, साहित्यिक एवं सांस्कृतिक संस्थाओं में सक्रिय भागीदारी । विभिन्न पत्र पत्रिकाओं जिनमें भारत सरकार की पत्रिका “पर्यावरण” दिल्ली प्रमुख हैं में रचनाएँ सतत प्रकाशित।अब तक 125 से अधिक राष्ट्रीयएवं अंतर्राष्ट्रीय पुरस्कार/अलंकरण। वर्तमान में अध्यक्ष, अखिल भारतीय हिंदी सेवा समिति, पाँच संस्थाओं की संरक्षिका एवं विभिन्न संस्थाओं में महत्वपूर्ण पदों पर आसीन।
आपके द्वारा रचित अमृत का सागर (गीता-चिन्तन) और बुन्देली हनुमान चालीसा (आल्हा शैली) हमारी साँझा विरासत के प्रतीक है।
आप प्रत्येक बुधवार को आपका साप्ताहिक स्तम्भ ‘सलमा की कलम से’ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है एक भावप्रवण गीत “जीवन के सपने… ”।