श्री दयानंद घोटकर

? कवितेचा उत्सव ?

☆ दोहे… ☆ श्री दयानंद घोटकर

(दोहे (प्रेरणा कबीर))

अडीच अक्षरी प्रेम शब्द

यात जीवनाचे सार आहे

पोथी, पूजा, कर्मकांडे सारी

हे सारे व्यर्थ आहे…

*

मुखी भाषा हवी,स्वच्छ

फक्त निर्मळ प्रेमाची

प्राण्यांनाही कळते भाषा

प्रेमळ स्पर्शाची…

*

सततच्या नामस्मरणात

दंग राहिल्याने काय होते

सुख दुःखा पलिकडचे

समाधान ते मिळते…

*

तिळ,मोहरी,शेंगदाणे

यामधे तेल असते

प्रत्येकाच्या हृदयात

तसेच प्रेम असते…

*

मन शांत असेल

हृदय क्षमाशील असेल

तर शत्रुच उरणार नाही

तो ही तुमच्यावर प्रेम करेल..

*

प्रेम करणे म्हणजे

भक्ती करण्यासारखेच आहे

मन आणि ध्यान,चिंतन

दोन्हीकडे आहे…

*

मंदिरात न जाताही

पूजा करता येते

गुरुकृपा होताच

जीवन धन्य होते…

*

हवा, पाणी ऊन

सारे असले तरी

ऋतु बदलल्यावरच

फुले, फळे येतात खरी….

*

कावळा आवडत नाही

पण कोकीळ आवडतो

हा आवाजाचा,परिणाम

नम्र माणूस सर्वांनाच हवासा

वाटतो….

*

श्रद्धा, पूजा-अर्चा ठिक आहे

जो मी पणाचा त्याग करुन

गुरुला शरण जातो

तोच खरा भक्त होऊ शकतो..

© श्री दयानंद घोटकर

संपर्क – तावरे काॅलनी.सातारा रोड.पुणे

मो 9822207068

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments