मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #143 ☆ आठवण…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 143 – विजय साहित्य ?

☆ आठवण…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

आठवण येता तुझी

शहारते तन मन

अलबेली वर्षा सर

वेचितसे क्षण क्षण…! १

 

आठवण येता तुझी

होते कलिकेचे फूल

आसवांची आठवांना

बघ लागते चाहूल….! २

 

आठवण येता तुझी

भावनांच्या पायघड्या

येती सुसाट धावत

शब्द रेशमाच्या लड्या…!३

 

आठवण येता तुझी

ऋतूराज रेंगाळतो

संसाराचा सारीपाट

कोण त्वरे गुंडाळतो…!४

 

आठवण येता तुझी

मन राहिना मनांत

विरहाच्या एकांतात

साद तुझी अंतरात…!५

 

आठवण येता तुझी

डोळे बोलके होतात

गात्र गात्र थकलेली

तुझी वाट पाहतात…!६

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सेल्फी फोटो… ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆

? विविधा ? 

☆ सेल्फी फोटो… ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆ 

तीसेक वर्षांपूर्वी नुकतेच मोबाईल फोन आले होते. पण आजच्या सारखे ज्याच्या त्याच्या हातात, खिशात मोबाईल नव्हते. ती काही लोकांचीच मक्तेदारी होती. इतरांना तो परवडायचाही नाही. मग त्यावर फोटो काढण्याची सोय झाली. निरनिराळ्या अॅप्स मधून, फीचर्समधून खूप झटपट सुधारणा झाल्या. आणि नंतर सेल्फीचा जमाना आला. पंधरा वर्षांपूर्वी पासून सेल्फी काढणे हे प्रेस्टिजचे लक्षण मानले जाऊ लागले. नंतरच्या काळात तर सेल्फींचा सुळसुळाट झाला.

विज्ञान तंत्रज्ञानांची प्रगती मानवाला सुखकारक ठरली. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून इतर कुठल्याही ठिकाणी संपर्क करणे सोपे झाले. तसेच फोटो पाठवणेही सोपे झाले. परदेशात असलेल्या जिवलगांचा दिनक्रमही त्यातून समजणे, प्रत्यक्ष पाहणे ही नित्याची गोष्ट झाली. याचे मुख्य कारण म्हणजे सेल्फी हेच होय.

सेल्फी स्टिक जवळ बाळगणे हेही कित्येकांना आवश्यक वाटू लागले. सहलीच्या वेळी आपल्याला हव्या त्या कोनातून फोटो सहज काढता येऊ लागले.  एवढ्या सगळ्या तंत्रज्ञान प्रगतीमध्ये ज्याने सेल्फीचा शोध लावला , त्याला खरोखरच सलाम !  बऱ्याच अंशी माणसाला त्याचा फायदाच जास्त होऊ लागला आहे. मलाही होतो. मी माझ्या परदेशात राहणाऱ्या मुलांना इतर कुटुंबीयांना सेल्फी द्वारा भेटू शकत नसले तरी भेटीचा आनंद आम्ही नक्कीच घेऊ शकतो.

पण जेव्हा एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो तेव्हा मात्र हे सेल्फी प्रकरण प्रसंगी जिवावर बेतू शकते. विशेषतः खोल पाण्यात, समुद्रात, धबधब्याखाली किंवा उंच डोंगरांवर, कठडे नसलेल्या गच्चीवर सेल्फी काढताना आजूबाजूचे भान बाळगणे अपरिहार्य असते. तसे ते न बाळगले तर सेल्फीच्या अट्टाहासाने अनेक लोक अपघातात बळी पडतात . पाण्यात बुडून, दगडावर आपटून, उंच कड्यावरून पाय घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.त्यात तरूण मुले मुली ही जीव गमावून बसले आहेत.

जेव्हा प्रगती होते तेव्हा माणूस अशा दुर्घटनांची कधीच अपेक्षा करीत नसतो.किंबहुना विचारही करीत नसतो. पण आपल्याच क्षणैक सुखाच्या आभासी धुंदीत आपला मौल्यवान जीव गमावण्याची वेळ कुणावर येऊ नये. आपले आनंदाचे क्षण आपण आता क्षणोक्षणी सेल्फी घेऊन कायमचे स्मरणात ठेवू शकतो. फुरसतीच्या वेळी त्या क्षणांच्या पुनर्प्रत्ययाचा आनंद घेऊ शकतो. त्यातही ते सेल्फी  इतरांना पाठवले तर त्यांना आनंद होऊन आपला आनंदही द्विगुणित होतो. त्यावर खूप लाईक्स, स्माईली, थंब्ज 👍 आले की आपला इगो सुखावतो 😀.

यामुळे आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते की कॅमेरा घेऊनच फोटो काढणे, ते फोटो स्टुडिओ हे सगळं या सेल्फीमुळे कालबाह्य झाले आहे. फोटोग्राफर लोकांची गरज यामुळे संपली आहे. त्यांना वेगळे व्यवसाय मिळाले असतील. पण आता नव्या युगात कुणीही फोटो, सेल्फी सहज क्लिक करू शकतो.

सेल्फी घेणे, इतरांना पाठवणे, पुन: पुन्हा पाहून आनंद लुटणे, कायम स्मरणात ठेवणे यात काहीच गैर नाही. ही जगरहाटी झाली आहे. मीही काढते सेल्फी . सर्वांना पाठवते.  पण खबरदारी घेऊनच!! ज्यांना पाठवायचा सेल्फी ,त्यांनाही त्यातून आनंदच मिळावा. त्याला आपला सेल्फी पहायचा नसेल तर ते लक्षात आले की नका पाठवू!

काही ठिकाणी जेव्हा अजिबात खबरदारी घेतली जात नाही तेव्हा कधी कधी तिथल्या निसर्गाचे, पर्यावरणाचेही नुकसान होते निसर्ग चुरगळला जातो याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे. तरूण वर्गामध्ये सेल्फी अधिक लोकप्रिय आहे. असू दे! पण त्याचवेळी इतर कर्तव्ये, जबाबदारी, खबरदारी विसरू नये. एकदा तर सेल्फीच्या नादात जलाशयात एक बोट बुडाली. त्यात बुडून मृत्युमुखी पडलेले लोक डॉक्टर होते. अशी एक बातमी होती. समाजातील या महत्त्वाच्या घटक असलेल्या सुशिक्षितांनी तरी यांचे भान ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणी सेल्फीचा आनंद जरूर घ्यावा ,पण जबाबदारी आणि खबरदारी पाळावी हेच खरे !!!!

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पुनर्जन्म – भाग ३ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ पुनर्जन्म –  भाग ३  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

(‘‘हो गं. किती वाईट अवस्था झाली होती तुझी… जगतेस का मरतेस अशी… पण वाचलीस बाई.”) इथून पुढे —

‘‘ कशाला वाचले असं झालंय मला ताई. त्या बाळाबरोबर माझाही जीव गेला असता तर फार बरं झालं असतं.”

‘‘ असं बोलू नको बेबी. अगं नव्याने जन्म झालाय तुझा असं समज. तुला तुझं बाळ गेल्याचं किती दु:ख होत असेल, ते मी समजू शकते…”

‘‘ छे,छे… त्याचं दु:ख आजिबात होत नाहीये मला…” डॉ.स्नेहलला मध्येच थांबवत ती अगदी तिरीमिरीने म्हणाली. यावर स्नेहल काही बोलणार इतक्यात बेबीच पुन्हा बोलायला लागली…जरा जास्तच ठामपणाने —-

‘‘ अहो अशा बिनबापाच्या… शेंडा ना बुडखा म्हणावं अशा मुलांचं जगणं, म्हणजे जिवंत राहून रोज मरणंच असतं हो… मी स्वत: तशीच तर जगत आलेय् इतकी वर्षं… प्रचंड अगतिक होऊन… माझी आईही तशीच… बहीणही तशीच… आणि मीही… मेलेल्या माणसाचं जिवंत उदाहरण आहे मी… माझ्यानंतर त्या बाळीचा याच लाईनीत नंबर लागला असता की हो, त्यापेक्षा जन्मत:च सुटली … भाग्यवानच म्हणायची …” असं म्हणता म्हणता बेबी रडायला लागली… अगदी घळाघळ अश्रूंचे पाट वहायला लागले. इतके दिवस… नव्हे इतकी वर्ष मनात कोंडलेलं दु:ख, यातना, निराधारपणाची नकोशी आणि अतिशय वेदनादायक जाणीव, असहाय्यतेचा मनावर बाळगलेला प्रचंड दबाव…काय काय सांगत होते ते अश्रू… डॉ.स्नेहलने तिला थांबवलं नाही. नुसतीच तिच्या खांद्यावर…पाठीवर थोपटत राहिली. खरं तर तिला सुचतंच नव्हतं बेबीला काय आणि कसं समजवायचं… कसं शांत करायचं… पण ब-याच वेळाने बेबी आपणहूनच शांत झाली. स्नेहलने तिला पाणी प्यायला लावलं, आणि तिच्यासाठी कॉफी मागवली. आता तिचा चेहरा वेगळाच दिसायला लागला होता… ती हात जोडत स्नेहलला म्हणाली… ‘‘ ताई तुम्हाला एक विनंती करू का?…”

‘‘ अगं बोल ना… काही सांगायचंय् का? ”

‘‘ हो, तुम्ही ना, मला उद्याच इथून जायची परवानगी द्या… म्हणजे मनातल्या मनात द्या… मी इथून गुपचुप पळून जायचं ठरवलंय्…” 

‘‘ पण कुठे जाणार आहेस? ” — बेबीच्या या विचारापासून तिला ताबडतोब परावृत्त करावं असं स्नेहलला त्याक्षणी का वाटलं नाही, हे तिलाही कळत नव्हतं.   

‘‘ कुठेही जाईन… पण पुन्हा त्या ताईजीच्या नजरेलाही पडणार नाही, अशा कुठल्या तरी जागी. मला कल्पना आहे की तिची माणसं कधी ना कधी मला शोधून काढतील… सहजासहजी पैसे मिळवण्याचा मी एक मार्ग आहे ना तिच्यासाठी…”

‘‘ तुला कळतंय का बेबी, त्यांच्या हाती सापडलीस तर तुझे किती हाल करेल ती बाई, आणि तिची माणसं… असला काही वेडेपणा करू नको.”

‘‘ म्हणजे तुम्हालाही असंच वाटतंय का की मी पुन्हा त्या खाईत जाऊन रोज मरत रहावं… त्यापेक्षा मीच एका क्षणात माझा जीव देईन… माझ्या बहिणीसारखा…” बेबीचा आवाज नकळत चढला आणि डॉ.स्नेहल एकदम चपापली. बेबीला तिचाच संशय यायला लागल्याचं तिला जाणवलं. आता तिला कसं समजवावं हे स्नेहलला कळत नव्हतं. बेबी एकदम तिथून उठून तिरीमिरीने खोलीबाहेर पडली, आणि स्नेहल कमालीची घाबरून गेली. तिने पटकन् बाहेर जाऊन बेबीचा हात घट्ट पकडून तिला पुन्हा कॉटवर आणून बसवलं. ती खूपच अस्वस्थ झाल्याचं स्पष्ट जाणवत होतं… स्नेहलची पाठ वळताच ती झटक्यात हॉस्पिटलमधून पळ काढणार, याची स्नेहलला खात्री वाटायला लागली होती…

… आणि क्षणार्धात वीज चमकावी तसा स्नेहलच्या मनात एक विचार चमकून गेला, आणि तितक्याच लगेच त्याचं रूपांतर निर्णयात झालं… बेबीच्या अगदी समोर बसून तिने तिचा हात हातात घेतला, आणि शांतपणे तिला विचारलं… ‘‘ बेबी तुला खरंच त्या नरकातून सुटका हवी आहे ना?” बेबीने मनापासून मान डोलावली. ‘‘ अगं मग त्यासाठी जीव देण्याची काय गरज आहे ? ” 

‘‘ मग दुसरं काय करू शकणार आहे मी, ज्यामुळे माझी तिथून सुटका होईल? ” 

‘‘ माझ्याकडे एक मार्ग आहे. शांतपणे ऐकणार असशील … विचार करणार असशील तर सांगते…” बेबीने आशेने तिच्याकडे पाहिलं… 

‘‘ हे बघ, मी आजच तुला इथून डिस्जार्च देते. पण माझी ड्यूटी संपेपर्यंत तू इथेच थांब. संध्याकाळी माझ्याबरोबर माझ्या घरी चल. मी आणि माझी आई, आम्ही दोघीच असतो घरी. आईला काय सांगायचं ते मी पाहीन. आणि तीही सगळं नक्कीच समजून घेईल, याची मला खात्री आहे. १५-२० दिवस तू माझ्या घरी पूर्ण विश्रांती घे. तोपर्यंत पुढच्या गोष्टींचा नीट विचार करता येईल आपल्याला. आणि एक सांगते… तू आमच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवायला हरकत नाही. तू आयुष्यभर सुरक्षित रहाशील, आणि जुनं आयुष्य पूर्णपणे विसरून, एक नवं… वेगळं… ताणमुक्त आणि शांत, समाधानी आयुष्य जगू शकशील, अशी तुझी सोय करण्याची पूर्ण जबाबदारी माझी. तशी सोय नाहीच झाली, तर तू तुला वाटेल तितके दिवस… अगदी कायमचीही आमच्या घरी राहू शकतेस. पण पुन्हा जीव देण्याचा विचार मात्र कधीही मनातसुद्धा आणायचा  नाहीस.”

‘‘ ताई अहो कशाला माझं लोढणं आपणहून गळ्यात बांधून घेताय? माझा काय उपयोग होणार आहे कुणाला?”

‘‘ का नाही होणार उपयोग? माझ्या आईला, मला जमेल तशी मदत कर… जमेल तेवढ्या गोष्टी शिकून घे… अगदी लिहायला, वाचायलाही शीक…आई शिकवेल तुला. आहेस ना यासाठी तयार? पुढच्या आयुष्याचा नीट विचार कर ” बेबीने लहान मुलासारखी मान हलवली…

‘‘ मग झालं तर… चल, आता स्वच्छ आवरून तयार हो. माझी निघायची वेळ झाली की गुपचुप चलायचंस माझ्याबरोबर… आणि हो, इथल्या कुणालाही याबद्दल काहीही सांगायचं नाही… कळलं ? ”… डॉ.स्नेहल शांतपणे खोलीबाहेर पडली .. .. एका अनामिक समाधानाने.  

आणि बेबी … …

बेबीने पाठमो-या स्नेहलकडे बघत हात जोडले… ‘‘ देवा, मला कळत नाहीये की या ताईच्या रूपाने तू अचानक कसा काय प्रसन्न झालास माझ्यावर?.. तेही माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच… तुझे हे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही, आणि फेडू तर मुळीच शकणार नाही.”… आताही तिच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या, पण त्या होत्या कृतज्ञतेच्या–मन शांत, आश्वस्त आणि  नितळ झाल्याचं द्योतक असल्यासारख्या … आणि नमस्कार करून वर झालेला चेहराही आधीच्या बेबीपेक्षा वेगळाच वाटत होता… एका वेगळ्याच, आत्तापर्यंत कधीच न अनुभवलेल्या आनंदाने, अनोळखी आशेने चमकणारा… जणू पुनर्जन्म झालेल्या बेबीचा. 

— समाप्त —

© मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आई कल्पतरू… ☆ सौ. कल्पना मंगेश कुंभार ☆

सौ. कल्पना मंगेश कुंभार

? कवितेचा उत्सव ?

☆ आई कल्पतरू… ☆ सौ. कल्पना मंगेश कुंभार ☆

आई– नुसता शब्द जरी उच्चारला तरी रोम रोम शहारते..उत्साहाची एक वेगळीच लहर संपूर्ण शरीरात तयार होते..निर्मात्याने जेव्हा ही जीवसृष्टी निर्माण केली तेव्हा प्रत्येक जीवाची काळजी घेणं त्याला शक्य नव्हतं, म्हणूनच की काय…त्याने प्रत्येक प्राणीमात्रासाठी आई निर्माण केली..जी  नवीन जीवाला फक्त जन्म देत नाही तर स्वतः च्या जीवाची पर्वा न करता त्याचे रक्षण करते..पालन करते..त्याला सुसंस्कारित करते..

मागे एकदा माझी लेक डिस्कव्हरी चॅनल पहात होती..सिंह शिकार करत होता अन् जिराफ आपल्या पिल्लाचं रक्षण करण्यासाठी त्या सिंहाचा प्रतिकार करत होते..ते पाहून लेक  मला म्हणाली, ” जिराफाला समजत नसेल का? सिंहापुढे आपलं काय चालणार नाही..निदान स्वतः चा तर जीव वाचवायचा..” मी फक्त एव्हढंच म्हणाले,” बाळा, आता ती फक्त आई आहे..जिला आपल्या पिल्लाला वाचवायचं आहे..” 

आई..मग ती कोणाचीही असो..जेव्हा तिच्या बाळावर एखादं संकट येतं तेव्हा ती सर्व शक्ती एकवटून प्रतिकार करते..फक्त आपल्या बाळासाठी..आई..ही शेवटच्या श्वासापर्यंत  आईच रहाते..पिल्लू मात्र आपल्या भूमिका बदलत जाते..माझी आईही अगदी अशीच आणि मीही भाग्यवान आहे आज मीही एक आई आहे..”आई म्हणायचीच, जेव्हा तू आई होशील ना तेव्हा समजेल आई काय असते “. खरंच …आईपण मिळणं हे भाग्यच..

माझ्या प्रत्येक कणावर—आयुष्यातील प्रत्येक क्षणावर— जिच्या संस्काराचा पगडा .. ती माझी आई..माझी सगळ्यात जवळची मैत्रीण..जिच्यामुळे मी आज माणूस  म्हणून आपल्या मातीशी एकरूप झाले आहे..ती माझी आई…विजया.

नावाप्रमाणेच आयुष्यातील प्रत्येक संकटाशी झगडत..त्या त्या क्षणी न डगमगता प्रत्येक संकटावर ती मात करत गेली अन् माणूस म्हणून आम्हाला घडवत गेली. मला अन् दादाला वाढवताना रोज कळतनकळत कधी गोष्टीतून तर कधी स्वतः च्या कामातून..कधी घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण करून..कधी इतिहासातून…  तिने आमच्यावर जे संस्कार केले..त्यामुळेच आज मी व माझा दादा जीवनाचा आनंद घेत आयुष्य कसे जगायचे? ..माणसं कशी जोडायची?..पैशापेक्षा माणूस का महत्वाचा?..हे शिकलो..आज माझा दादा उत्तम डॉक्टर आहे..मी प्राथमिक शिक्षिका आहे केवळ आईवडिलांच्यामुळे..

आजही जेव्हा वयाच्या ६६व्या वर्षीही तिच्यातील उत्साह..चैतन्य पाहिलं की वाटतं..कुठून येते तिच्यात ही एनर्जी ?? आणि खळखळून हसणाऱ्या तिला पाहिलं की वाटतं..तिच्यातील आत्मविश्वास..सकारात्मकता .. जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन..यामुळेच ती वेगळी आहे… अगदी वेगळी .. आयुष्यात इतकी संकटे आली..कित्येक वेळा अगदी एकटी पडली, पण तिच्यातला आत्मविश्वास व सकारात्मकता यामुळेच ती प्रत्येक संकटावर मात करू शकली ..फक्त तिचा चेहरा पाहिला तरी आजही मन प्रफुल्लित होतं..सगळी नकारात्मक भावना दूर पळते अन् मन तिच्या हास्यात आजही गुंतून जातं..आजही आठवतं भाकरी थापताना तिचं अभंग किंवा श्लोक म्हणणं.. स्वयंपाक करताकरता नकळत त्या  रुचकर जेवणात अमृत पेरणं  ..नवीन काही शिकवून जाणं..

माझी आई माध्यमिक शिक्षिका..गणित विषयात तिचा हातखंडा..पण लग्नानंतर शिक्षण घेताना एम .ए .ला इतिहास विषय ठेवल्यामुळे साहजिकच इतिहास विषय शिकवावा लागला..पण तरीही जे असेल ते अतिशय अभ्यासपूर्ण व मनापासून करणं हे तिचं तत्व, जे तिनं निवृत्त होईपर्यंत निभावलं..आज अभिमान वाटतो तिचा जेव्हा तिचे विद्यार्थी अगदी चाळीस /पन्नास वय असलेले, रस्त्यात वाकून नमस्कार करतात..तिची चौकशी करतात..आयुष्यात आणि दुसरं काय हवं..

आज मलाही या लेखातून  तिला सांगायचं आहे ..आज मी जी काही आहे ती फक्त तिच्यामुळेच …तिने दिलेल्या प्रत्येक क्षणासाठी मी कृतज्ञ आहे……. 

आई म्हणजे चैतन्याने सजलेलं अंगण..

आई म्हणजे देवापुढे शांत तेवणारं निरांजन..

आई असतो घराचा श्वास..

तिच्यामुळेच सगळीकडे देवत्वाचा भास..

लेकरासाठी हळवी,मायाळू, प्रसंगी चंडिकाही बनते ती..

घराला सावरताना कित्येक वार झेलते ती..

चुका पोटात घालून पडता पडता सावरते..

बाळासाठी कितीदा तरी दुःखाचे कढ आवरते..

आई …… आत्मारुपी ईश्वर..

तो ज्याला लाभला….. त्याचे जीवन अमृतमय निरंतर…… 

© सौ. कल्पना मंगेश कुंभार

शाळा : हुतात्मा बाबू गेनू विद्यामंदिर क्र 28, इचलकरंजी

मोबाईल : 9822038378

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रामाणिकपणे काम हेच सर्वोत्तम काम… ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ प्रामाणिकपणे काम हेच सर्वोत्तम काम…  ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

निवृत्त होईपर्यंत प्रामाणिकपणे काम करणे, हेच सर्वोत्तम….

एक सुतार काम करणारा ६० वर्षांचा माणूस होता. तो आत्ता ज्या मालकाकडे काम करत होता तिथे त्याला ४० वर्षे झाले होते. ह्या ४० वर्षाच्या काळात त्याने हजारो घरे बनवली होती. पण आता त्याला संसाराला वेळ द्यायचा होता.

तो त्याच्या मालकाकडे जाऊन म्हणतो, मालक ४० वर्षे मी तुमच्याकडे इमाने इतबारे काम केले. पण आता मला माझ्या संसाराला वेळ द्यायचा आहे. माझ्या मुलांबरोबर, माझ्या मुलांच्या मुलांबरोबर वेळ घालवायचा आहे. मला निवृत्त व्हायचे आहे—- आता मालक तर मालक असतात, जाताजातासुद्धा आपल्या कामगारांकडून अजून थोडं काम कसं करून घ्यायचं हे त्यांना चांगलेच माहिती असते…

तेव्हा मालक त्या सुताराला म्हणतो, “ ठीक आहे. तुला निवृत्त व्हायचंय तर तू होऊ शकतोस. पण एक शेवटचे तीन महिन्यांचे काम आले आहे ते फक्त करून जा. ते काम झाल्यानंतर तुझा छानपैकी निरोप समारंभ करू आणि एकदम उत्साहात तुला निरोप देऊ.”  एवढे वर्ष मालकाने आपल्याला सांभाळून घेतलं, आपल्याला आधार दिला, हा विचार करून त्या सुताराने ते काम करायला होकार दिला.

पण आता त्याच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आला होता. त्याने विचार केला होता की मस्त घरी बसून आराम करेन, पण अजून ३ महिने काम करावे लागणार होते. आतापर्यंत प्रत्येक काम मन लावून केले होते, पण आता कसेतरी करायचे म्हणून तो काम करत होता. ज्या सुताराने आपल्या पूर्ण आयुष्यात सगळ्यात सर्वोत्तम घरे बनवली, पण आता शेवटचे घर बनवताना त्याचे अजिबात मन लागत नव्हते. कसेतरी लाकडे कापायची, कसेतरी खिळे ठोकायचे, कसेतरी पॉलिशिंग करायचे असे करत करत तो घर बनवत होता. कसंबसं त्याने ते अर्धवट मनाने का होईना पण ३ महिन्यात घर पूर्ण केले. घर पूर्ण झाल्यानंतर तो सुटकेचा निश्वास सोडतो. झालं बाबा कसंतरी असा तो विचार करतो. तो मालकाला जाऊन सांगतो, मालक घर पूर्ण झालं आहे. तेव्हा मालक त्याच्याबरोबर घर बघायला निघतो. 

घर एकदम जवळ आलेले असताना तो मालक थांबतो, त्या सुताराचा हात पकडतो आणि त्याच्या हातात त्या घराच्या चाव्या देत म्हणतो, “ हे जे घर तू बनवलं आहेस ते तुला मी माझ्यातर्फे भेट म्हणून देत आहे. गेली ४० वर्षे तू माझ्याकडे जी मेहनत केलीस त्याचे फळ म्हणून हे घर मी तुला देत आहे. हे तुझे स्वतःचे घर होते जे तू बनवत होता.”

मित्रांनो विचार करा काय वाटले असेल त्या सुताराला…?? काय चालले असेल त्याच्या मनात…??—-

‘मला कोणी सांगितले असते की हे माझे घर आहे तर माझ्या आयुष्यातले सगळ्यात वाईट घर बनवण्याऐवजी मी सर्वोत्तम घर बनवले असते. अरे ! कोणी मला सांगितले का नाही की हे माझे घर आहे. सांगितले असते तर एक एक खिळा, एक एक लाकूड पॉलिश करताना मी हजार वेळा विचार केला असता आणि एक सर्वोत्तम घर बनवले असते. मी आता परत मागे सुद्धा जाऊ शकत नाही. का मी असे केले…?? ‘ 

“नोकरीचे असो नाहीतर इतर कुठलेही काम आपण स्वतःसाठीच करतोय असे समजून करा….. त्यामुळे 

आपल्यावर पश्चातापाची वेळ कधीच येणार नाही…आणि चांगले काम केल्याचा आनंद आपल्याला कायमचा मिळेल…!! “

सुंदर आहे ना कल्पना…!!  कुठेही काम करा प्रामाणिकपणे करा आणि चांगले काम करा. चांगले काम केल्याचे फळ नेहमीच चांगले मिळते.                  

लेखक …अज्ञात…

संग्राहक : श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संवाद # 101 ☆ ये पब्लिक है —☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

डॉ. ऋचा शर्मा

(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में  अवश्य मिली है  किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में  प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है एक विचारणीय लघुकथा ‘ये पब्लिक है —’।  डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को इस लघुकथा रचने  के लिए सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद  # 101 ☆

☆ लघुकथा – ये पब्लिक है — ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

राजा का दरबार सजा  था। सभी विभागों के मंत्री अपनी – अपनी गद्दी पर आसीन थे। ‘अच्छे दिन आएंगे एक दिन– ’की मीठी धुन पार्श्वसंगीत की तरह बज रही थी। राजा एक – एककर मंत्रियों से देश के राजकाज के बारे में पूछ रहा था। मंत्रीगण भी बड़े जोश में थे। गृह मंत्री बोले –‘ सुशासन है, भाईचारा है महाराज ! भ्रष्टाचार,घूसखोरी खत्म कर दी हमने। रिश्वत ना लेंगे, ना देंगे। सब कुछ व्यवस्थित चल रहा है देश में।‘ मंत्री जी ने गरीबी, बेरोजगारी जैसी अनेक समस्याओं को अपने  बटुए में चुपके से डाल डोरी बाँध दी। राजा मंद – मंद मुस्कुरा रहा था।

वित्त मंत्री खड़े हुए – महाराज! गरीबों को गैस सिलेंडर मुफ्त बाँटे जा रहे हैं। किसानों को कम ब्याज पर कर्ज दिया जा रहा है। गरीबों के लिए ‘तुरंत धन योजना’  शुरू की है और भी बहुत कुछ। किसानों की आत्महत्याओं, महंगाई के मुद्दे को उन्होंने जल्दी से अपने बटुए  में खिसका दिया। धुन बज उठी – ‘अच्छे दिन आएंगे एक दिन — -’। राजा मंद – मंद मुस्कुरा रहा था।

रक्षा मंत्री की बारी आई, रोब-दाब के साथ राजा को खड़े होकर सैल्यूट मारा और बोले – हमारी सेनाएं चौकस हैं। सीमाएं सुरक्षित हैं। कहीं कोई डर नहीं। नक्सलवाद, आतंकवादी हमले, शहीद सैनिकों की खबरें, सब बड़े करीने से इनके बटुए  में दफन हो गईं। राजा मुस्कुराते हुए ताली बजा रहा था।

अब शिक्षा मंत्री तमाम शिष्टाचार निभाते हुए सामने आए – शिक्षा के क्षेत्र में तो आमूल-चूल परिवर्तन किए गए हैं महाराज! नूतन शिक्षा नीति लागू हो रही है, फिर देखिएगा —। गरीबों को मुफ्त शिक्षा दी जा रही है। शिक्षकों के  भर्ती  घोटाले, महाविद्यालयों में पाँच – सात हजार पर काम करते शिक्षक जैसे ना जाने कितने मुद्दे इनके भी बटुए में  चले ही गए।

राजा – मंत्री सब एक सुर  में बोल रहे थे और ‘अच्छे दिन आएंगे एक दिन’ की ताल पर मगन मन थिरक रहे थे।

राजा के दरबार के एक कोने में ‘अच्छे दिन’ की आस में अदृश्य जनता खड़ी थी। राजा उसे नहीं, पर वह सब देख – सुन और समझ रही थी। ये पब्लिक है,सब जानती है —

©डॉ. ऋचा शर्मा

अध्यक्ष – हिंदी विभाग, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर. – 414001

संपर्क – 122/1 अ, सुखकर्ता कॉलोनी, (रेलवे ब्रिज के पास) कायनेटिक चौक, अहमदनगर (महा.) – 414005

e-mail – [email protected]  मोबाईल – 09370288414.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ व्यंग्य से सीखें और सिखाएँ # 118 ☆ जागिए – जगाइए ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं।  आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना जागिए – जगाइए । इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन।

आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – व्यंग्य से सीखें और सिखाएं # 118 ☆

जागिए – जगाइए  

जरा सी आहट में नींद टूट जाती है, वैसे भी अधूरी नींद के कारण ही आज इस उच्च पद पर विराजित हैं। बस अंतर इतना है कि पहले पढ़ने के लिए ब्लैक कॉफी पीकर जागते थे। अब कैसे ब्लैक मनी को व्हाइट करे इस चिंतन में रहते हैं। अब तो कॉफी से काम नहीं चलता अब  शराब चाहिए गम गलत करने के लिए।

भ्रष्टाचार की पालिश जब दिमाग में चढ़ जाती है तो व्यक्ति गरीब से भी बदतर हो जाता है। सोते-जागते बस उसे एक ही जुनून रहता है कि कैसे अपनी आमदनी को बढ़ाया जाए। उम्मीद की डोर थामें व्यक्ति इसके लिए क्या- क्या कारगुजारियाँ नहीं करता।

वक्त के साथ- साथ लालच बढ़ता जाता है, एक ओर उम्र साथ छोड़ने लगती है तो वहीं दूसरी ओर व्यक्ति रिटायरमेंट के करीब आ जाता है। अब सारे रुतबे छूटने के डर से उसे पसीना छूट जाता है। ऐसे में पता चलता है कि हार्ट की बीमारी ने आ घेरा। बढ़ा हुआ ब्लड प्रेशर दवाइयों से भी काबू नहीं आ रहा। ऐसे में उतार- चढ़ाव भरी जिंदगी भगवान का नाम भी नहीं ले पा रही है। समय रहते जो काम करने चाहिए थे वो किए नहीं। बस निन्यानवे का चक्कर वो भी गलत रास्ते थे। बच्चों को विदेश भेजकर  पढ़ाया वो भी वहीं सेटल हो गए। इतने बड़े घर में बस दो प्राणी के अलावा पालतू कुत्ते दिखते। जीवन में वफादारी के नाम पर कुत्तों से ही स्नेह मिलता। अपनी अकड़ के चलते पड़ोसियों से कभी नाता जोड़ा नहीं। वैसे भी धन कुबेर बनने की ललक हमें दूर करती जाती है।

जीवन के अंतिम चरण में बैठा हुआ व्यक्ति यही सोचता है ये झूठी कमाई किस काम की, जिस रास्ते से आया उसी रास्ते में जा रहा है। काला धन विदेशी बैंकों में जमा करने से भला क्या मिलेगा। देश से गद्दारी करके अपने साथ-साथ व्यक्ति सबकी नजरों में भी गिर जाता है। सदाचार की परंपरा का पालन करने वाले देश में भ्रष्टाचार क्या शोभा देता है। सारी समस्याओं की जड़ यही है। आत्मा की आवाज सुनने की कला जब तक हमारे मनोमस्तिष्क में उतपन्न नहीं होगी तब तक ऐसे ही उथल-पुथल भरी जीवन शैली का शिकार हम सब होते रहेंगे।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – खेल ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ आपदां अपहर्तारं ☆

आज की साधना

समूह को कुछ दिनों का अवकाश रहेगा।

आपसे विनम्र अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

? संजय दृष्टि – खेल ??

शब्द पहेली,

सुडोकू,

अल्फाबेटिक क्विज,

बिल्ट योअर वोकेबुलरी,

अक्षर से खेलना;

शब्द से खेलना;

ब्रह्म से खेलना,

कौन कहता है;

केवल ब्रह्म ही

मनुष्य से खेलता है?

© संजय भारद्वाज

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक की पुस्तक चर्चा # 123 – “व्यंग्य राग” – श्री कुमार सुरेश ☆ चर्चाकार – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’’☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

(हम प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’जी के आभारी हैं जो  साप्ताहिक स्तम्भ – “विवेक की पुस्तक चर्चा” शीर्षक के माध्यम से हमें अविराम पुस्तक चर्चा प्रकाशनार्थ साझा कर रहे हैं । श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी, जबलपुर ) पद से सेवानिवृत्त हुए हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। उनका दैनंदिन जीवन एवं साहित्य में अद्भुत सामंजस्य अनुकरणीय है। इस स्तम्भ के अंतर्गत हम उनके द्वारा की गई पुस्तक समीक्षाएं/पुस्तक चर्चा आप तक पहुंचाने का प्रयास  करते हैं।

आज प्रस्तुत है श्री कुमार सुरेश जी द्वारा लिखी कृति  “व्यंग्य राग” पर चर्चा।

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक की पुस्तक चर्चा# 123 ☆

☆ “व्यंग्य राग” – श्री कुमार सुरेश ☆ चर्चाकार – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’’ ☆

कृति : व्यंग्य राग

लेखक : कुमार सुरेश

प्रकाशक: सरोकार प्रकाशन, भोपाल (मप्र),

मूल्य: 200 रुपये, संस्करण वर्ष २०२०

चर्चाकार… विवेक रंजन श्रीवास्तव, भोपाल

कुमार सुरेश की पुस्तकें “व्यंग्य राग” व्यंग्य संकलन, व्यंग्य उपन्यास तंत्र कथा, शब्द तुम कहो, एवं भाषा सांस लेती है प्रकाशित हो चुकी हैं. स्पष्ट है कि वे बहुविध रचनाकार हैं. कविता की तरह नपे तुले शब्दों में गहरी अभिव्यक्ति इस संग्रह के छोटे छोटे व्यंग्य लेखों में पढ़ने मिली. जरा धीरे धीरे उड़ो मेरे साजना शीर्षक के साथ वे स्वप्न लोक में उड़ जाते हैं, लोग चिल्लाते हुये उनका पीछा करते हैं ” तेरी हिम्मत कैसे हुई उड़ने की, हम जमीन पर खड़े हैं और तू उड़ने लगा “, नींद खुलती है तो पत्नी सुनाती है ” क्या उड़ना उड़ना बक रहे थे, उड़ने की कोशिश भी मत करना ” मैंने उनका यह व्यंग्य उनके मुंह से सुना हुआ है. ” मुझे पता लगा कि ऊचाई के साथ दूसरों को नुकसान पहुंचाने की ताकत भी होनी चाहिये तभी लोग सफलता को स्वीकार करते हैं ” जैसे गहरे कटाक्षों से लबरेज व्यंग्य में उन्होंने अच्छे तरीके से  भाषाई ट्रीटमेंट के साथ कथ्य को निभाते हुये अपनी बात रखी है.

नदी किनारे क्षण भर मुर्गा में वे भाषा चातुर्य के साथ बैंक के लोन वसूली अभियान की बात करते हैं, किसान को नया लोन देकर, क्षण भर के लिये बैंक की कागजों पर पुराने लोन की वसूली बता, किसान को क्षण भर कर्ज मुक्त बता दिया गया, नदी के किनारे को भी अंग्रेजी में बैंक कहते हैं,  नदी किनारे किसान मुर्गा बन गया,  किसान की पीड़ा में अपना उल्लू सीधा करते वसूली कर्मचारियों पर बुनी गई हास्य व्यंग्य कथा है.

इसी शैली में सोशल मीडीया श्रमिक, पीछा छुड़ा लो जी इस नाक से, उड़ जायेगा हंस अकेला, छेड़ना हो तो सुर छेड़िये, एक इंडियन की भारतीयों से अपील, गठबंधन, ठग बंधन और लठ बंधन, ब्यूटी पार्लर और साहित्य, इनका उनका राजनैतिक कैरियर, नेता नीति नेति नेति, घोड़े कहाँ बिकते हैं भैया आदि छोटे छोटे राजनैतिक, सामाजिक विषयों पर व्यंग्य लेख पुस्तक में संकलित हैं. ये लेख वर्ष १९८७ से २०२० की लम्बी अवधि में विभिन्न समाचार पत्रों यथा नईदुनिया, राज एक्सप्रेस, विजय दर्पण टाईम्स, आदि  में प्रकाशित हुये हैं, जिसका उल्लेख फुट नोट में किया गया है.वर्तमान में  व्यंग्य, पाठक, संपादक, लेखक सभी की प्रिय विधा है. व्यंग्य को यह स्वरूप देने में श्रीलाल शुक्ल, परसाई,  शरद जोशी, रवीन्द्रनाथ त्यागी, नरेंद्र कोहली, शंकर पुणतांबेकर, सुशील सिद्धार्थ, की राह पर बढ़ते प्रेम जनमेजय, हरीश नवल, ज्ञान चतुर्वेदी,  गिरीश पंकज, सुभाष चन्दर, सुरेश कांत जैसे अनेकानेक व्यंग्यकारों का सतत लेखन है. कुमार सुरेश भी इसी राह के अनथक यात्री हैं. वे व्यंग्य उपन्यास से व्यंग्य कविता तक के विस्तृत विधा आयाम के व्यंग्यकार हैं. एक एक्टिविस्ट से बातचीत  प्रश्न उत्तर शैली में रचा गया व्यंग्य है. साहित्य पुरस्कार योजना में हास्य कटाक्ष से भरी बिन्दु रूप नियमावली में व्यंग्य अभिव्यक्ति है. यथा नियमावली में एक नियम है कि पुरस्कार लेन देन योजना के अंतर्गत उस रचनाकार को प्रदाय किया जायेगा जो खुद किसी पुरस्कार का कर्ता धर्ता होगा, उसे अलिखित समझौता करना होगा कि “वह मेरी किताब को पुरस्कृत करेगा और मैं उसकी “. साहित्यकारों का नार्को टेस्ट, एक आभार पत्र जैसे व्यंग्य लेखो में थोड़ा डिफरेंट तरीके से मस्ती में वे व्यंग्य रस प्रवाहित करते मिले.

ओम वर्मा ने किताब की भूमिका लिखी है, उन्होंने संग्रह के व्यंग्य लेखों में सार्थकता और जीवंतता महसूस की है. पुस्तक  त्रुटि रहित मुद्रण के संग,  स्तरीय प्रस्तुति है. कुमार सुरेश से पाठको को बहुत कुछ निरंतर मिल रहा है, बस उन्हें सोशल मीडीया पर फालो कीजीये अखबार, पत्र पत्रिकाओ में उन्हें पढ़ते रहिये.

चर्चाकार… विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, ४६२०२३

मो ७०००३७५७९८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ साप्ताहिक स्तम्भ – श्री ओमप्रकाश जी का साहित्य #119 – लघुकथा – “राम जाने” ☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ ☆

श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश”

(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश” जी का  हिन्दी बाल -साहित्य  एवं  हिन्दी साहित्य  की अन्य विधाओं में विशिष्ट योगदान हैं। साप्ताहिक स्तम्भ “श्री ओमप्रकाश जी का साहित्य”  के अंतर्गत उनकी मानवीय दृष्टिकोण से परिपूर्ण लघुकथाएं आप प्रत्येक गुरुवार को पढ़ सकते हैं।  आज प्रस्तुत है एक ज्ञानवर्धक एवं विचारणीय लघुकथा – “राम जाने।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – श्री ओमप्रकाश जी का साहित्य # 119 ☆

☆ लघुकथा – राम जाने ☆ 

बाबूजी का स्वभाव बहुत बदल गया था। इस कारण बच्चे चिंतित थे। उसी को जानने के लिए उनका मित्र घनश्याम पास में बैठा था, “यार! एक बात बता, आजकल तुझे अपनी छोटी बेटी की कोई फिक्र नहीं है?”

बाबू जी कुछ देर चुप रहे।

“क्या होगा फिक्र व चिंता करने से?” उन्होंने अपने मित्र घनश्याम से कहा, “मेरे बड़े पुत्र को में इंजीनियर बनाना चाहता था। उसके लिए मैंने बहुत कोशिश की। मगर क्या हुआ?”

“तू ही बता?” घनश्याम ने कहा तो बाबूजी बोले, “इंजीनियर बनने के बाद उसने व्यवसाय किया, आज एक सफल व्यवसाई है।”

“हां, यह बात तो सही है।”

“दूसरे बेटे को मैं डॉक्टर बनाना चाहता था,” बाबू जी बोले, “मगर उसे लिखने-पढ़ने का शौक था। वह डॉक्टर बन कर भी बहुत बड़ा साहित्यकार बन चुका है।”

“तो क्या हुआ?” घनश्याम ने कहा, “चिंता इस बात की नहीं है। तेरा स्वभाव बदल गया है, इस बात की है। ना अब तू किसी को रोकता-टोकता है न किसी की चिंता करता है। तेरे बेटा-बेटी सोच रहे हैं कहीं तू बीमार तो नहीं हो गया है?”

“नहीं यार!”

“फिर क्या बात है? आजकल बिल्कुल शांत रहता है।”

“हां यार घनश्याम,” बाबूजी ने एक लंबी सांस लेकर अपने दोस्त को कहा, “देख- मेरी बेटी वही करेगी जो उसे करना है। आखिर वह अपने भाइयों के नक्शे-कदम पर चलेगी। फिर मेरा अनुभव भी यही कहता है। वही होगा जो होना है। वह अच्छा ही होगा। तब उसे चुपचाप देखने और स्वीकार करने में हर्ज ही क्या है,” कहते हुए बाबूजी ने प्रश्नवाचक मुद्रा में आंखों से इशारा करके घनश्याम से पूछा- मैं सही कह रहा हूं ना?

और घनश्याम केवल स्वीकृति में गर्दन हिला कर चुप हो गया।

© ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश”

07/02/2018

पोस्ट ऑफिस के पास, रतनगढ़-४५८२२६ (नीमच) म प्र

ईमेल  – [email protected]

मोबाइल – 9424079675

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

image_print

Please share your Post !

Shares