(डॉ भावना शुक्ल जी (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान किया है। हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत है “भावना के दोहे…श्री राम”।)
(आदरणीय श्री संतोष नेमा जी कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं. “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है “एक पूर्णिका – अहसास का रिश्ता ”। आप श्री संतोष नेमा जी की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)
☆ साहित्यिक स्तम्भ – इंद्रधनुष # 141 ☆
☆ एक पूर्णिका – अहसास का रिश्ता ☆ श्री संतोष नेमा ☆
(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ” में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है।आज प्रस्तुत है आपकी विदेश यात्रा के संस्मरणों पर आधारित एक विचारणीय आलेख – ”न्यू जर्सी से डायरी…”।)
यात्रा संस्मरण ☆ न्यू जर्सी से डायरी… 19 ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’
अमेरिकन ज्वाइन टु हेल्प
ठंड बहुत होती है। कुछ को कपड़ो की जरूरत होती है। बदलते फैशन की ग्लैमर से चकाचौंध की इस दुनियां में कइयों के वार्डरोब बिना पहने ही बदल जाते हैं । जींस जैसे कपड़े फाड़े नहीं फटते । फिर इन दिनों तो फटे जींस ज्यादा ही फैशनेबल हैं । हवाई जहाज में सीमित वजन का सामान ही ले जाया जा सकता है। दुबई एयरपोर्ट पर तो बाकायदा बड़े बड़े बाक्सेज लगे हैं, जिनमें आप अपना अतिरिक्त वजन का सामान डाल सकते हैं , लोग पहले खरीद लाते हैं बेहिसाब खजूर, चाकलेट इत्यादि फिर जब गेट पर लगेज का वजन घटाना चाहते हैं तो छोड़ना पड़ता है इन डिब्बों में, दुनियां में भी न कोई कुछ लेकर आता है और न लेकर जा सकता है, सिवाय नेकी के ।
तो नेकी के लिए “अमेरिकन ज्वाइन टु हेल्प” की गाडियां घूमती मिल जाती हैं, वीक एंड पर सोशल वर्कर्स कम्यूनीटी में पहुंच कर क्लाथ कलेक्ट कर सकते हैं, बस उन्हें सूचना दे दी जाए ।
पर हित सरिस धरम नहीं भाई, हिट है।
भारत में भी दीपावली पर सभी घरों की सफाई करते हैं, अनुपयोगी सामान मिट्टी मोल कबाड़ी को बेचने के बनिस्पत किसी जरूरत मंद तक पहुंच जाए इस हेतु कुछ संस्थाएं सक्रिय भी हैं, उदार मन से जुड़ने की भावना विकसित हो यह आवश्यकता है ।
विवेक रंजन श्रीवास्तव, न्यूजर्सी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
☆ ओवीबद्ध रामायण – खंड सीता स्वयंवर ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(काव्य प्रकार – साडेतीन चरणी ओवी)
रामचरणांची ख्याती, पसरली सर्व दूर
कौतुकाचा एक सूर, मिथिलेत….!
राजा मिथिलापतीचे, विश्वामित्रा निमंत्रण
धर्मकार्या आमंत्रण, जनकाचे…..!
अलौकिक विहंगम, परिसर रमणीय
सौंदर्य ते स्पृहणीय, मिथिलेचे….!
धर्मनिती परायण, यज्ञकार्यी योगदान
शिवधनुष्याचा मान, जनकास….!
पवित्र ते शिवधनू, पुजनीय जनकाला
दिगंतश्या प्रतापाला, तोड नाही…!
दाशरथी युवराज, विश्वामित्र मुनिजन
मिथिलेत राममन, विसावले….!
राजनंदिनी सीतेच्या, स्वयंवराचा सोहळा
जमलासे गोतावळा, नृपादिक….!
भव्य दिव्य राजवाडे, गुढ्या तोरणे पताका
दुजी अयोध्या शलाका, भासतसे….!
मिथिलेत सौख्य पूर, सुवर्णाची छत्रछाया
दरवळे गंधमाया, कस्तुरीची….!
स्वयंवराची तयारी, मिथिलेत उत्साहात
प्रवेशले नगरात, रघुनाथ…!
सीता जनकनंदिनी, स्वयंवर रचियले
शिवधनू ठेवियले, पणासाठी…!
सीता जगतजननी, स्वयंवराचा हा घाट
पहा किती थाट माट, मिथिलेत…!
आदिनाथ रामरूप, सीता दर्शनात दंग
आदिशक्ती भवबंध, एकरूप….!
भरलासे दरबार, शिवधनुष्य भेदन
झालें गर्वाचे छेदन, राजधामी….!
लक्ष गजबल खर्ची, शिवधनू आणविले
स्वयंवरे आरंभले, जनकाने….!
शिवधनुष्याचे धूड, पेलवोनी पेलवेना
जिंकण्यास उचलेना, दिव्य धनू…..!
उचलेना शिवधनू, असफल ठरे शौर्य
अपमाने जागे कौर्य, नृपनेत्री….!
एक एक नृप येई, लावी सारे आत्मबल
सारे नृप हतबल, पणापाई….!
अवघड ठरे पण, चिंतातूर राणीवसा
आसवांनी भरे पसा, आशंकेने…!
सुकुमार जानकीस, मिळणार कोण वर
उंचावला चिंतास्वर, मंडपात….!
कुठे गेले क्षात्रतेज, कुठे गेले नृप वीर
झुकले का नरवीर, धनूपुढे…..!
गुरूआज्ञा घेऊनीया, रघुनाथ पुढे आले
जन चिंताक्रांत झाले, सभागृही…!
विनम्र त्या, सेवाभावे, धनू लिलया पेलले
लाखो नेत्र विस्फारले, रामशौर्यी…..!
कडाडत्या वज्राघाती, रामे प्रत्यंचा लावली
टणत्कारे थरारली, वसुंधरा…!
बलशाली त्या धनुचे, दोन तुकडे करुन
पण घेतला जिंकून, रामचंद्रे….!
अचंबित प्रजाजन, हादरले नृपवर
राम जिंके स्वयंवर , अकस्मात…!
राजगृही शंखनाद, झाला आनंदी आनंद
लज्जा कमलाचे कंद, सीतानेत्री…!
अधोवदनी सीतेचे, मोहरले तनमन
आला सौभाग्याचा क्षण, स्वयंवरे…!
घेऊनीया हाती माला, सीता घाली वरमाला
राम जानकीचा झाला, भाग्यक्षण…!
याचं लग्न मंडपात, श्रृतकीर्ती भगिनीचे
उर्मिला नी मांडवीचे, लग्न झाले.
स्वयंवर जानकीचे, रामचंद्र जिंके पण
अलौकिक दिव्य क्षण, अंतर्यामी….!
(एक अलौकिक साहित्य निर्मिती आज खुली करीत आहे. ओवीबद्ध रामायण या खंडकाव्य लवकरच प्रकाशित होईल. आपले अभिप्राय अपेक्षित आहे. काही चुक असेल तरी मोकळेपणाने सांगा. संपूर्ण रामायण दीड हजार ओव्यांचे आहे. त्यांतील सीता स्वयंवर प्रसंग प्रस्तुत आहे.)
☆ सावधानता… भाग १ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
डार्विनचा उत्क्रांती वादाचा सिद्धांत, “Survival of the fittest “(जगण्यास जे लायक असतील तेच जगतील .) याचा विचार करता माणूस हा पथ्वितलावर उत्क्रांत झालेला शेवटचा प्राणी. निसर्गाने मानवाला बुद्धीचा नजराणा बहाल केला आहे. आणि त्याच्या जिवावर तो जमिनी पासून आकाशातच काय, अवकाशापर्यंतचे क्षेत्र आपल्या कवेत घ्यायला लागला आहे. तरीसुद्धा जिद्न्यासा आणि कुतूहलाने प्राणी, पक्षी त्यांचे वर्तन याचा अभ्यास व संशोधन करावेसे वाटायला लागले आहे. कारण त्यांच्या संवेदना माणसापेक्षा कितीतरी पटीनी अधिक असल्याचे लक्षात आले आहे.
‘सावधपणा’ म्हणजे दक्ष असणे, सावध असणे वगैरे. प्रत्येक जीवाला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी दक्ष व सावध रहावे लागते. सजीव कसे सावध असतात ,याचा विचार करायचा तर अगदी झाडे, वेली, एकपेशीय जीवापासून कीटक, माशा, मुंग्या,जलचर, पक्षी, प्राणी, जंगली प्राणी यांचा विचार करावा लागेल.
अँमिबासारख्या एकपेशीय प्राण्याला स्पर्शेंद्रिय नसते. पण त्याला स्पर्श केल्यास सावध होऊन तो आपले अंग आक्रसून घेतो. युग्लिना या एककोषिक प्राण्यालाही स्पर्शेंद्रिय नसते. पण प्रकाशाची जाणीव करुन देणारे अतिसूक्ष्म इंद्रिय असते.त्यानुसार त्याला सजगता येते.व तो सावध होतो.
अगदी लहान कीटक वाळवी, मुंग्या, झुरळ, यांच्यामध्येसुद्धा सावधपणा असतो.त्यांचे वर्तन वेगवेगळे असते.त्यांची एक भाषा असते. कामकरी वाळवी किंवा मुंग्या रांगेतून जाताना येताना आपल्या भूमिकांशी स्पर्श करीत चालतात. चालताना त्यांच्या अंगातून एक प्रकारच्या वासाचा द्रव पाझरतो.त्या वासामुळे त्या न चुकता आपापल्या वारुळात परततात. मुंग्या जर चुकून दुसऱ्या समुहात गेल्या दुसऱ्या मुंग्या त्यांना सामावून घेत नाहीत. हुसकावून लावतात. किंवा मारतात. कित्येकदा हवेच्या बदलातला धोका कळल्याने मुंग्या तोंडात अंडी घेऊन जाताना आपण पहातो.हा सावधपणाच ना?नाकतोडा, टोळासारख्या कीटकांच्या पोटावर पातळ असलेले द्न्यानेंद्रिय ध्वनी ग्रहण करतो. व त्याद्वारे तो सावध राहू शकतो.काही कीटकात कामकरी असतात ते घरे बांधतात.अन्न गोळा करून संततीची काळजी घेतात.सैनिक असतात ते घर आणि संततीचे रक्षण करतात.मादी कीटक प्रजोत्पादन करते.प्रत्येक जण आपापले काम दक्ष राहून करत असतो. मधमाश्यांबद्दल सांगायचे तर कामकरी माशा मधाचे ठिकाण सापडल्यावर मोहोळावर येऊन विशिष्ट तर्हेने गोलाकार 8 आकड्याप्रमाणे फिरुन दोन्ही बाजूला हालचाल करतात. आणि मध मिळविण्याची माहिती इतरांना देतात. निरिक्षणाने सिद्ध झालेले आहे की मधमाशीला उत्तम स्मरणशक्ती , हुशारी व वेळेचेही भान असते. कुंभारीण तोंडाने मातीचा चिखल करुन सुंदर घर बनवते. व त्यामध्ये अंडी घालते.त्यांच्या वर्तनाबद्दल खरोखरच आश्चर्य वाटते.
(त्यानीं गांवच्या शिपायांमार्फत पिकलेली भाजी प्रत्येक घरांत पोहचविली.कांही कुटूंबाकडे भाकड म्हशी होत्या.त्यांच्या लहान मुलानां त्यामूळे दुध मिळत नव्हतं. त्यानां लहान मुलांसाठी दुध पोहोच केलं.) इथून पुढे वाचा….
आज गावक-यांत विश्वास निर्माण झाला होता. दोनवेळचं पोटभर मिळू लागलं होतं. ही सारी दुशाआजीची करामत होती.
दुशाआजीच्या कामाची दखल वरपर्यंत जावू लागली.नर्स दोन-तीनदा हे पाहून गेली.तिनं तिथल्या प्रमुख डॅाक्टर नां सांगितलं.डॅाक्टर हे ऐकून अचंबित झाले.
दुस-या च आठवड्यात ते गावांत आले.त्यानीं सारं गांव फिरून पाहीलं.त्यानां आश्चर्याचा धक्का बसला.त्यानीं गावच्या प्रमुखानां व दुशाआजीला बोलावलं.पुढच्या आठवड्यात गावांत कॅम्प घेवूया असं त्यानीं सांगितलं.
पुढच्या आठवड्यातच गावातील शाळेत कॅम्प घेतला.लहान मुलानां डॅाक्टरानीं टॅानिकच्या गोळ्या,दुधपावडरचं वाटप केलं.फार मोठा साठा नव्हता,परंतू त्यानीं बाजूच्या केंद्राकडीलही थोडाफार साठा जमा करून आणला होता.गावक-यानां त्यानीं तपासलं.गरजेपुरती औषध दिली.त्यानीं बायकांत बसलेल्या दुशाआजीला जवळ बोलवाय सांगितलं.
दुशाआजी आली.त्यानीं डॅाक्टरनां नमस्कार केला.
“आजी कशी आहे तब्ब्येत?”
“मला रं बाबा काय होतयं? मला नकोत तुझी औषध.या माझ्या बायानां पोरानां दे”
डॅाक्टर हसतच ऊटले. त्यानीं दुशा आजीचा हात धरला.एका खुर्चीवर बसवलं.
सूर्य डोंगराकडे चालला होता.आख्खा गांव शाळेत जमा झाला होता.डॅाक्टरनीं आणलेला हार दुशाआजीच्या गळ्यात घातला.सर्व गावक-यानीं टाळ्यांचा गजर केला.डॅाक्टर खुर्चीवरून ऊटले.गावक-यानां उद्देशून ते म्हणाले,
“माझ्या सर्व बांधवानो व भगिनीनों,या आजीनं जी गावाला जगण्याची उमेद दिली,दिशा दिली ती एक प्रकारची करामतच आहे असे मला वाटते.खरं तर यातलं कांहीच मला माहित नव्हतं.पण तूमच्या गावांत काम करणा-या नर्सनं मला हे सारं सांगितलं.त्यामूळे मला तुमचं गांव पहाण्याची इच्छा झाली.दुशाआजीच्या कामानं खरंच मला ओढत आणलं,असं म्हंटलं तरी काय वावगं होणार नाही.त्याचबरोबर दुशाआजीनं सांगितलेल्या स्वावलंबनाची कामे प्रामाणिकपणे व कष्ट करून तुंम्ही सर्वानीं ऊभी केलीत.ज्यामूळे तुंम्हाला दोन वेळची भाकर खायला मिळाली.त्यामूळे तुंम्हा सर्वानां धन्यवाद दिले पाहिजेत.अशी काम करणारी दुशाआजी जर प्रत्येक गावाला मिळाली तर निश्चितच त्या त्या गांवचा दोनवेळचा भूकेचा प्रश्न मिटेल.तुंम्ही सर्व लोकानीं दुशाआजीनं सांगितलेल्या बाबी आचरणांत आणून सलोख्यानं रहाव.तसेच वैयक्तिक माझ्याकडून जे काय सहकार्य करता येईल ते मी करेन.खरं तर गावाला दुशाआजीच्या रूपानं एक देवच मदत करतो आहे.त्यामूळे दूशाआजीला उदंड आयुष्य लाभो,त्यानां या कामात भरपूर यश मिळो अशी ईश्वराजवळ प्रार्थनां करून मी थांबतो.”
त्यानीं वाकून दुशाआजीच्या पायानां स्पर्श केला व खुर्चीवर बसले.
बराचवेळ टाळ्यांचा गजर चालू होता.सारं गांव आनंदात व ऊत्साहात टाळ्या पिटत होतं.
हे सारं पाहून दुशाआजीच्या डोळ्यांत पाणी तरळलं.तिचं काळीज भरून आलं.
देशात काय चाललय याची जराशीही कल्पनां गावाला नव्हती. ती करण्याची त्यानां गरजच ऊरलेली नव्हती.
मात्र गावातल्या लोकांच्या भूकेला समर्थ पर्याय दुशाआजीनं शोधला होता हे ही तेव्हढंच खरं होतं….!!!
☆ गीत ऋग्वेद – प्रस्तावना आणि सूक्त (१ : १) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
प्रस्तावना आणि सूक्त ( १ : १ )
सनातन धर्माचे तत्वज्ञान ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांमध्ये सांगितलेले आहे. विद् या धातूपासून वेद या शब्दाची व्युत्पत्ती झाली आहे. विद् या धातूचे जाणणे, असणे, लाभ होणे आणि विचार करणे, ज्ञान देणे असे विविध अर्थ आहेत.
वेद हे अपौरुषेय ज्ञान आहे. संपूर्ण ब्रह्मांडात जे काही आहे, त्या सर्वांचे जे काही गुणधर्म आहेत ते सर्व असप्रज्ञात आत्मसाक्षात्काराने जाणून घेतल्याने वेदांची निर्मिती झाली. हे सर्व ज्ञान मूलतः ज्ञानी ऋषींच्या अनुभूतिजन्य प्रज्ञेत साठविलेले होते आणि ते केवळ मौखिकरित्या त्यांच्या शिष्याला दिले जात असे. पुढे श्रीगणेशाने देवनागरी लिपी निर्माण केल्यानंतर केव्हा तरी ते ग्रंथ स्वरुपात उपलब्ध झाले असावेत. वेद जुन्या संस्कृत भाषेत किंवा गीर्वाण भाषेत आहेत.
यातील ऋग्वेद मराठी गीतरुपात मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ऋग्वेदातील अनेक खंडांना मंडळ अशी संज्ञा असून त्यातील प्रत्येक अध्यायाला सूक्त म्हणतात. काही श्लोकांनी म्हणजेच ऋचांनी प्रत्येक सूक्त बनते. वेगवेगळ्या ऋषींनी वेगवेगळ्या छंदांत या ऋचा रचलेल्या आहेत. मूळ ऋचा दीड ते दोन चरणांच्या आहेत. सुलभ आकलनासाठी आणि गेयता प्राप्त होण्यासाठी मी त्यांचा मराठीत भावानुवाद केलेला आहे. गीतऋग्वेदाचा भावानुवाद येथे मी क्रमशः प्रसिद्ध करणार आहे.
ही गीते सुश्राव्य गीतात गायली गेलेली असून त्यांचे व्हीडीओ युट्यूबवर प्रसारित झालेली आहेत. या व्हिडीओत गीतांबरोबरच त्या त्या सुक्तात आवाहन केल्या गेलेल्या देवतांची रेखाचित्रे देखील उपलब्ध आहेत. प्रत्येक गीताच्या तळाशी मी आपल्या सोयीसाठी मुद्दाम त्या गीताच्या व्हिडिओची लिंक प्रसारित करीत आहे. सर्वांनी मुद्दाम त्या स्थळी भेट देऊन या व्हिडिओचा आस्वाद लुटावा.
डॉ. निशिकांत श्रोत्री, एम. डी., डी. जी. ओ.
——————————————————————————————————————————-
ऋग्वेद अग्निसुक्त १.१
देवता : अग्नि
ऋषी : मधुछन्दस वैश्वामित्र
मराठी भावानुवादित गीत : डॉ. निशिकांत श्रोत्री
अ॒ग्निमी॑ळे पु॒रोहि॑तं य॒ज्ञस्य॑ दे॒वमृ॒त्विज॑म् । होता॑रं रत्न॒धात॑मम् ॥ १ ॥
☆
अग्निदेवा तूचि ऋत्विज यज्ञपुरोहिता
होऊनिया आचार्य अर्पिशी हविर्भाग देवता
अनुपम रत्नांचा स्वामी तू निधीसंचय करितो
स्तवन तुला हे अग्निदेवते भक्तीने भजतो ||१||
☆
अ॒ग्निः पूर्वे॑भि॒र्ऋषि॑भि॒रीड्यो॒ नूत॑नैरु॒त । स दे॒वाँ एह व॑क्षति ॥ २ ॥
☆
धन्य जाहले प्राचीन ऋषींना अग्निस्तुती करण्या
अर्वाचीन ऋषी उचित मानिती अग्नीला स्तवण्या
याग मांडिला विनम्र होऊनी अग्नीला पुजिण्या
सिद्ध जाहला अग्नीदेव देवतांसि आणण्या ||३||
☆
अ॒ग्निना॑ र॒यिम॑श्नव॒त्पोष॑मे॒व दि॒वेदि॑वे । य॒शसं॑ वी॒रव॑त्तमम् ॥ ३ ॥
☆
भक्तांसाठी प्रसन्न होता तू वैभवदाता
वृद्धिंगत हो शुक्लेंदूवत हरण करी चिंता
यशोवंत हो पुत्रप्राप्ती तुझ्या कृपे वीरता
कृपादान हो सर्व सुखांचे अग्निदेव भक्ता ||३||
☆
अग्ने॒ यं य॒ज्ञम॑ध्व॒रं वि॒श्वतः॑ परि॒भूरसि॑ । स इद्दे॒वेषु॑ गच्छति ॥ ४ ॥
☆
कृपादृष्टी तव चहूबाजूंनी ज्या यज्ञावरती
तया होतसे वरदाने तव पवित्रता प्राप्ती
प्रसन्न होती देवदेवता पावन यज्ञाने
स्वीकारुनिया त्या यागाला तुष्ट तयांची मने ||४||
☆
अ॒ग्निर्होता॑ क॒विक्र॑तुः स॒त्यश्चि॒त्रश्र॑वस्तमः । दे॒वो दे॒वेभि॒राऽग॑मत् ॥ ५ ॥
एक दिवस एक उच्चशिक्षित नवरा आपल्या बायकोला भाषण देत होता, “पैसे कमव आणि मग तुला कळेल की पैसा कसा खर्च करावा.मी तुला आज एक दिवस देतो. घराच्या बाहेर पड आणि बघ किती स्पर्धा चालू आहे. काहीतरी प्रयत्न कर काम शोधण्यासाठी”…..आणि तीही एक शिक्षित बायको, एक आई आणि एक सून होती.
ती बाहेर निघाली आणि दिवसभर फिरत राहिली.. इकडे जा, तिकडे जा आणि मग तिच्या लक्षात आले, ‘अरे हो. खरंच की. आपण ही पैसा कमावू शकतो. मग का आपण शिक्षित असूनही इतके दिवस घालवले?’
घरी आली. नेहमीप्रमाणे सासू सासऱ्यांना वेळेवर नाश्ता, जेवण, मुलांचा डबा, वेळेवर शाळेत पाठवणे , नवऱ्याला डबा, त्याचा आवडीचा नाश्ता, जेवण बनवले आणि खोलीत गेली.
नवरा आला आणि म्हणाला, ” काय मग? कळाले असेल आज, मार्केटमध्ये किती स्पर्धा चालू आहे आणि तू फक्त घरात बसलीयस.”
तिने काही न बोलता त्याला एक लिस्ट दिली. त्यात तिने घरात घालवलेली अनेक व्यर्थ वर्षे व मार्केट मध्ये त्या कामांसाठी मोजावी लागणारी किंमत यांची यादी होती.
तिने सुरुवात त्याच्याच आई-वडिलांपासून केली होती. ज्यावेळेस त्याने वाचायला सुरुवात केली, त्याला एकदम घाम फुटला.
सासू-सासऱ्यांची सेवा, ज्याला मार्केटमध्ये केअरटेकर म्हणतात. पगार – ₹20,000
मुलांचा सांभाळ आणि त्यांना संस्कार लावणे ज्याला मार्केटमध्ये बेबीसीटिंग म्हणतात. पगार ₹15000
घरातील पसारा जागेवर ठेवणे आणि घर काम करणे ज्याला मार्केटमध्ये मेड म्हणतात.पगार ₹5000
आणि त्याच बरोबर सर्वांची आवडनिवड बघून सकाळ संध्याकाळ केलेला स्वयंपाक,ज्याला मार्केटमध्ये कूक म्हणतात.पगार ₹10000
घरात आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार ज्याला मार्केटमध्ये पाहुण्यांचे आदरातिथ्य करणारा होस्ट म्हणतात. पगार ₹5000 अशा प्रकारे तिने नवऱ्याकडे महिन्याच्या ₹55000 पगाराची मागणी केलेली होती.
मग त्याच्या डोळ्यातून हळू हळू अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ज्या व्यक्तीने स्वतःचा कणभरही विचार न करता माझ्या घराला वेळ दिला, तिची किंमत मार्केटमध्ये शोधूनही न मिळणारी होती.
तात्पर्य एवढेच की ज्यावेळेस एक शिक्षित स्त्री घरात बसते त्यावेळेस ती खूप विचार करुन सगळं काही करत असते. एक आईच मुलांवर चांगले संस्कार करू शकते. त्यांच्याकडे चांगले लक्ष देऊ शकते.
गृहीत धरलेली प्रत्येक बायको ही एक जबाबदार सून, आई आणि बायको ह्यांचं कर्तव्य निस्वार्थपणे निभावत असते. त्यांना कमी लेखू नका.
लेखिका: सुमन नासागवकर, अमळनेर.
संग्राहिका :मंजुषा सुनीत मुळे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जीद्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना “टीम बड़ी या नेतृत्व”। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन।
आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं # 121 ☆
☆ टीम बड़ी या नेतृत्व ☆
बहुत से लोग अपनी सशक्त टीम के बल पर शीर्ष पर पहुँचते हैं। बस यहीं से टीम टूटने लगती है उसके सदस्यों को लगता है कि यहाँ तक उन्होंने पहुँचाया है जबकि स्थिति इससे उलट होती है। सबसे महत्वपूर्ण कार्य विजन का होता है जो कि टीम लीडर ने किया है। उसके बाद लक्ष्य तय करना, योजना बनाना, उसे पूरा करने की सीमा तय करना, सदस्यों का चयन उनकी उपयोगिता के आधार पर, उनसे कार्य करवाना, दिशा निर्देशन देना। यहाँ तक कि हर छोटे- बड़े फैसले भी खुद लेना।
अब तक के कार्यों को देखें तो इसमें टीम ने क्या किया है ? दरसल ये सदस्य किसी एक कार्य के लिए चुने जाते हैं उसके पूरा होते ही इनका टूट कर बिखरना पहले से ही तय रहता है। जब टीम के सदस्य कार्य करते हैं तो उन्हें प्रोत्साहित करने हेतु कहा जाता है कि आप ने यह कार्य बहुत अच्छे से किया, ऐसा कोई कर नहीं सकता। बस यहीं से वो भ्रमित होकर अपने को सर्वे सर्वा समझने लगते हैं और खुद अलग होकर स्वतंत्र कम्पनी स्थापना कर बैठते हैं। अगर ध्यान से देखिए तो पता चलेगा कि टीम के सदस्यों ने केवल वही कार्य किया जो लीडर ने निर्धारित किया था। इनसे जो पहले से बनता था उतना आज भी बन रहा है। बस इनको ये भ्रम हो गया था कि इनके दम पर ये लीडर बना है।
ऐसा जीवन के हर क्षेत्र में हो रहा है, हम बिना स्वमूल्यांकन के अनजाने क्षेत्रों में कूद पड़ते हैं और बाद में हताश होकर अधूरे कार्यों के साथ दोषारोपण करते हैं। जरा सोचिए कि अलग- अलग होकर बिना मतलब का कार्य करने से कहीं अधिक अच्छा होता कि एक जुटता के साथ किसी बड़े लक्ष्य पर कार्य करते।
इस संदर्भ में एक प्रसंग याद आ रहा है कि एक संस्था प्रमुख ने अपने जन्मोत्सव को मनाने के लिए सभी साहित्यकारों को इकट्ठा किया और अपने अनुसार पूरे सात दिनों तक गुणगान करवाया। समय पास करने हेतु लोग मिल जाते हैं सो उन्हें भी मिल गए। खूब माला पहनी व पहनायी। अंत में भोजन की व्यवस्था भी थी सो हास- परिहास के साथ सब कुछ सम्पन्न हो गया।
जरा सोचिए कि जब बुद्धिजीवी वर्ग ऐसे कार्यक्रमों में शामिल होकर अपने को जाया करेगा तो हम विश्व स्तर पर कैसे पहुँचेंगे, जब हमारा लक्ष्य ही आत्म केंद्रित हो जाएगा तो हिंदी का परचम अंतर्राष्ट्रीय स्तर पर कैसे फहरा पायेंगे।
बात वहीं पर आकर ठहरती है कि जिस नेतृत्व में आप कार्य कर रहें उसे योग्य, दूरदर्शी व सबको साथ लेकर चलने वाला है या नही।
खैर कुछ भी करें पर करते रहिए। सार्थक कार्य आपको कभी न कभी शीर्ष पर विराजित करेगा किन्तु आलस्य सामान्य सदस्य भी बना रहने देगा या नहीं ये कहा नहीं जा सकता है।
(हिंदी साहित्य के सशक्त हस्ताक्षर डॉ. राकेश ‘चक्र’ जी की अब तक 122 पुस्तकें प्रकाशित हो चुकी हैं। जिनमें 7 दर्जन के आसपास बाल साहित्य की पुस्तकें हैं। कई कृतियां पंजाबी, उड़िया, तेलुगु, अंग्रेजी आदि भाषाओँ में अनूदित । कई सम्मान/पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत। इनमें प्रमुख हैं ‘बाल साहित्य श्री सम्मान 2018′ (भारत सरकार के दिल्ली पब्लिक लाइब्रेरी बोर्ड, संस्कृति मंत्रालय द्वारा डेढ़ लाख के पुरस्कार सहित ) एवं उत्तर प्रदेश हिन्दी संस्थान द्वारा ‘अमृतलाल नागर बालकथा सम्मान 2019’। उत्तर प्रदेश हिंदी संस्थान द्वारा राष्ट्रीय स्तर पर बाल साहित्य की दीर्घकालीन सेवाओं के लिए दिया जाना सर्वोच्च सम्मान ‘बाल साहित्य भारती’(धनराशि ढाई लाख सहित)। आदरणीय डॉ राकेश चक्र जी के बारे में विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें संक्षिप्त परिचय – डॉ. राकेश ‘चक्र’ जी।
आप “साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र” के माध्यम से उनका साहित्य आत्मसात कर सकेंगे।)