असं म्हटलं जातं की सावरकर स्वातंत्र्य चळवळीत गुंतले नसते तर नक्कीच महाकवी झाले असते. पण मला हे समजत नाही की, ‘कमला’ व ‘गोमंतक (पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग)’ ही महाकाव्ये, ‘सप्तर्षी’, ‘मूर्ती दुजी ती’, ‘मरणोन्मुख शय्येवर’, ‘आकांक्षा’, ‘चांदोबा चांदोबा, भागलास कां?’, ‘सायंघंटा’ ही सहा दीर्घकाव्ये, व अनेक (शंभरहून अधिक) प्रकाशित तसेच अप्रकाशित काव्यें रचणाऱ्या कवीला महाकवी का म्हणू नये? याव्यतिरिक्त संकल्पित पण अपूर्ण अशा त्यांच्या अनेक रचना उपलब्ध आहेत. असेच ‘पानपत’ हे संकल्पित पण अपूर्ण महाकाव्य. या काव्याचा ‘विरहोच्छ्वास’ हा एक सर्ग त्यांनी पूर्ण केला होता. यात चाळीस उच्छ्वास (कविता) आहेत. त्यापैकी पाच ‘सावरकरांच्या कविता’ या पुस्तकात समाविष्ट आहेत. त्यांचा रसास्वाद आज आपण चाखणार आहोत.
मुकुल नावाचा एक वीर युवक हिंदुपदपातशाहीसाठी लढत असतांना शत्रुच्या हाती सापडतो. मृत्यूदंडाची अपेक्षा करीत कोठडीत काळ कंठीत असतांना त्याने जे भावनापूर्ण सुस्कारे टाकले, ते यात गोंवलेले आहेत.
सावरकरांच्या प्रासंगिक कविता, पौराणिक तसेच ऐतिहासिक संदर्भ असलेल्या कविता, स्वातंत्र्यलढा, तुरुंगवास, अस्पृश्यता निर्मूलन, हिंदुएकता अशा ध्येयाने प्रेरित कविता यांच्या भाऊगर्दीत शृंगाररसयुक्त कविता मागे पडतात. पण अशा कविता वाचल्यानंतर पटतं की सावरकर हे परिपूर्ण कवी होते. या कवितेतले, हल्लीच्या भाषेत म्हणायचं तर कांही बोल्ड किंवा सावरकरांच्या समाजमनातील प्रतिमेशी न जुळणारे शब्द वाचतांना आपल्याला पण अडखळायला होतं. कविता नेहमीप्रमाणेच गेय आहे.त्यांच्यातला शब्दप्रभू/भाषाप्रभू ठिकठिकाणी डोकावतोच. उदा. अनंतापासून निर्मित आनंत्य, आलिंगनापासून आलिंग्य व चुंबनापासून चुंब्य असे अनवट शब्द. थोडंसं या अर्थाने ‘लव’, क्षणोक्षणी साठी ‘अनुक्षण’, बोलावणे साठी ‘बाहणे व त्यापासून बाहू’ (तुज बाहू कुठे अजि सखये), घासासाठी ‘कवल’ असे गोऽड शब्द. ‘संगसुखासव’ यासारखा अपरिचित शब्द. (संगसुखाला आसव हे सफिक्स किंवा अनुप्रत्यय जोडावा ही कल्पनाच अनोखी आहे.) फिरफिरूनि, बघबघुनि, झुरझुरुनि, सारसारुनि, हुंदहुंदुनि असे त्या कृतीला अधोरेखित करणारे नादमय शब्द.
अनेक ठिकाणी कवीने
शब्दांचे खेळ करून काव्यातील आकर्षकता वाढवलेली
दिसून येते. उदाहरणार्थ वाक्यातील कर्ता, कर्म यांची अदलाबदल करून नवीन अर्थपूर्ण वाक्य बनवून, ती दोन वाक्यं पाठोपाठ येतील अशी रचना करणे.
याला क्लृप्ती किंवा इंग्रजीत गिमिक म्हणता येईल. जसे की,
“जरि अंताला अम्हि …. विसरलो, तरी अंत अम्हां विसरेना”, किंवा
“ये विजना त्रासुनि जनी मी आणि त्रासुनि जनां मी विजनी”, तसेच “विरहाग्नीने पुष्ट अश्रू हे आणि विरहाग्नी पुष्ट अश्रूंनी”.
श्लेष अलंकाराचं उदाहरण म्हणून “मी समयांच्या सारसारुनि वाती” ही ओळ उद्धृत करता येईल. ‘समयांच्या’ या शब्दाचे तीन अर्थ होऊ शकतात, पहिला समईचं अनेकवचन समया, दुसरा समय म्हणजे काळ व तिसरा समय म्हणजे करार (इथे नायक व सखी यांच्यातला अलिखित करार) व हे तीनही अर्थ इथे चपखल बसतात. तसेच ‘जपी’ हा शब्द प्रथम क्रियापद म्हणून व पाठोपाठच नाम म्हणून वापरला आहे. असे लीलया केलेले शब्दांचे खेळ पाहून अचंबित व्हायला होतं.
रसग्रहण लांबत चालल्यामुळे आज आपण कवितेच्या अर्थाविषयी फारशी चर्चा करणार नाही. शिवाय अर्थ सोपा आहे. फक्त शेवटच्या कडव्याच्या संदर्भाविषयी थोडं स्पष्टीकरण आवश्यक आहे. नायक आपल्या हृदयस्थ सखीला विचारतो की, शिळेच्या वा धातूच्या मूर्तीची आराधना करीत, त्या त्या प्रतिकांशी मानवी नाती जोडून, मीराबाई, नामदेव, तुकाराम, चैतन्य महाप्रभू या संतांप्रमाणे उत्कट प्रेम केलं तर अंती देवाचं प्रत्यक्ष दर्शन होतं असं म्हणतात, मग तुझ्या सजीव मूर्तीवर मी (देवाचे प्रतीक समजून) उत्कट प्रेम करीत असूनही मला तुझी प्रत्यक्ष भेट का होत नाही?
☆ आज्जीचा राम vs. नाऊ ट्रेण्डींग राम – लेखिका : सुश्री सुखदा भावे-केळकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆
राम मला माहीत झाला तो जयश्री आजीमुळे… राम तिचा सखा होता. आजी होती तेव्हा मी लहान होते त्यामुळे- “काहीही झालं, अडलं तरी ‘ राम‘ म्हणायचं आणि पुढे जायचं” म्हणजे काय हे तेव्हा मला समजायचं नाही. मोठी होत गेले तशी आजीचं हे वाक्य समजत गेलं की राम म्हणजे विश्वास ठेवण्याची कुवत, अडलो थकलो तर विश्रांती घेण्याची पण प्रयत्न न थांबवण्याची नियत, राम नाम म्हणजे थेरपी… प्रॉब्लेम वरून लक्ष डायवर्ट करून सोल्युशन वर केंद्रित करण्यासाठीची!
खरंच आजीचा तरुणपणीचा काळ पहिला तर…
तिचे वडील शिक्षक असल्याने आजीला पुरेशी स्वप्न त्यांनी दिली… शिकण्याची, स्वाभिमानाची… पण मुलीच्या स्वप्नांना पूर्ण करणं त्याकाळी प्रायोरिटी वर नसायचं…चार मुलीत मोठी असलेल्या तीचं काळानुरूप लग्न झालं. सगळी माणसं, मुलं,घर सांभाळण्यात कितीदा तिच्या इच्छा आकांक्षा ना दुय्यम राखलं गेलं असणार. त्याकाळी इंटरनेट द्वारा जग खुलं झालेलं नव्हतं मात्र लायब्ररीत जाऊन पुस्तक आणून ते सवडीनं वाचावं अशी तिची इच्छाही कितीदा पूर्ण करायची राहून जायची. अशा सगळ्या खटाटोपात तिला पोझिटिव ठेवणारा तिचा राम होता. त्या काळी नवरा नवराच असे मित्र नसायचा! कौन्सेलिंग नव्हतं, मंडला आर्ट नव्हती, ऑनलाईन योगा झुंबा क्लास नव्हते, म्यानियाक शॉपर्स साठी मॉल्स नव्हते, किटि पार्टीज साठी खेळते पैसे नव्हते, फेमिनिझम चे वारे नव्हते. अशा वेळी जीवनातलं मळभ हटवून प्रकाशाकडे नेणारा तिचा सखा “राम” होता.
आपल्याकडे लहान मुलांना आपण खंबीर होण्याऐवजी घाबरायलाच शिकवतो लहानपणापासून… अभ्यास केला नाहीस तर काहीच मिळणार नाही पुढे, मस्ती केलीस तर बुवा येईल! पण “जा ग सोने… तुला वाटतंय ना हे करावं? तू सातत्याने प्रयत्न करत रहा, राम आहेच बरोबर”असं सांगणारी माझी आजी होती. त्यामुळे घाबरायपेक्षा हिमतीनं पुढे जायला शिकले. तिनी माझ्यात राम बिंबवला. माझ्या मनात राम मंदिर बांधलं तिनं!
22 जानेवारीला राम मंदिर सोहळा आहे. सध्या राम खरंच सगळीकडे ट्रेण्डींग आहे! रामाच्या अक्षता, रामाचा शेला, राम मंदिराची घरी ठेवण्यासाठी प्रतिकृती!! पॉलिटिकल इंटरेस्ट आणि काहींच्या वेस्टेड इंटरेस्ट च्या दृष्टीनं हे बरोबर आहे. एखादी गोष्ट, काम सांघिक भावनेने पुढे नेणे आणि त्याचा सोहळा करणेही गैर काहीच नाही! पण राम साजरा करणे म्हणजे फक्त लाईटींग आणि दिवे लाऊन स्वतःच घर उजळणे नाही… तर स्वतः मधला प्रकाश जागृत ठेवून ज्याच्या कडे कमी उजेड आहे त्याच्यासाठी ज्योत होणे.
माझा राम, ट्रेण्ड बदलला की आउटडेटेड होणारा नाही… तर पुढच्या काळासाठी मला सतत अपडेट करणारा आहे! मला अशी आजी मिळाली की जिने मला खरा राम समजावला… तोच मला तुमच्याही लक्षात आणून द्यावा वाटतोय…
राम म्हणजे संकल्प, राम म्हणजे मनोनिग्रह. निगेटिव्ह वर पॅाझिटिवची मात म्हणजे राम. अगदी आळस झटकून साधं छोटं पाहिलं पाऊल उचलणं म्हणजे राम. तो मनी ठेवूया.. कायमसाठी! अन्यथा आल्या ट्रेण्ड नुसार एक दिवस स्टेटस वा रील लावणं ह्यात काही ‘ राम‘ नाही बरं!!
लेखिका : सुश्री सुखदा भावे- केळकर
प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(मागील भागात आपण पाहिले – आपली दुकाने विविध मिलची कापडे, रेडिमेड कपडे, नको नको. तिच्या लक्षात आले, हे कुसुमाग्रज, वसंत बापट, कवी ग्रेस हे सर्व आपल्याला आवडतयं, जवळचं वाटतंय… आता इथून पुढे )
गाडी मुंबईच्या दिशेने धावत होती. ज्योती कवितेत रमली होती. तिला शाळेत म्हटलेल्या कविता आठवू लागल्या. एका सुरात सुलभा, यमुनासह म्हटलेल्या.
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश…’
मोठ्या वर्गात गेल्यानंतर बालकवींची कविता –
‘ऐल तटावर, पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून…
चार घरांचे गाव चिमुकले, पैल टेकडीकडे…
शेतमळ्याची दाट लागली, हिरवी गर्दी पुढे…’
बालकवींची ही कविता कित्येक वर्षानंतर तोंडात आली. कसे झाले हे ? राजापूरच्या गंगेचे झरे अचानक उसळतात म्हणे, तशा कविता उसळल्या का आपल्या मनातून ? ज्योती मुंबईत पोहोचली. रात्रीच्या जगदंबा ट्रॅव्हल्सने वेंगुर्ल्याला यायला निघाली. इकडे आई येणार म्हणून आशु आणि प्राजक्ता दहा दिवसांचा हिशोब घेऊन तयार होती. आई आली की दहा दिवसांतील रोजची विक्री, आलेला माल, संपलेला माल, बँकेचे पासबुक, नोकरवर्गाची हजेरी गैरहजेरी आई सर्व पटापटा विचारणार यात काही हयगय झालेली तिला चालत नाही. प्राजक्ता आलेला माल पुन्हा पुन्हा तपासत होती. आईच्या नजरेतून जरा काही सुटायचे नाही. आलेला माल कोणत्या मिलचा हे ती बरोबर ओळखेल. पंचवीस वर्षे या व्यवसायात काढली तिने. आईने सही करुन दिलेले चेकबुक आशु तपासत होता. यातील किती चेक वापरले किती नाही हे पुन्हा पुन्हा बघत होता.
गाडी वेंगुर्ल्यात आली. आशु स्कुटर घेऊन तयार होता. गाडी जवळ जाऊन आईचे सामान उतरुन घेतले. सर्व सामान खांद्याला लावून स्कुटरवर ठेवले. आता स्कुटर सुटली की आई धंद्याच्या एक एक गोष्टी विचारणार हे त्याला माहित होते. पण आश्चर्य घर येई पर्यंत आईने त्याला पारकर एंटरप्रायझेसची एकही गोष्टी किंवा हिशेब विचारला नाही. आशु मनातल्या मनात म्हणाला आता घरी पोहोचलो की आई विचारेल. घरी गेल्यावर त्याने सर्व सामान तिच्या खोलीत ठेवले. त्याने पाहिले जाताना आईच्या दोन बॅगा होत्या. आणखी भरलेली बॅग नवीन दिसते. काय आणले असेल एवढे ? त्याला वाटले घरात आणि दुकानच्या सर्व स्टाफसाठी खाऊ आणला असेल. आता प्रâेश होईल, चहा घेईल आणि आणलेला खाऊ दाखवेल. प्राजक्ताने चहा आणून दिला. ज्योतीने चहा घेतला आणि नवीन बॅग उघडून त्यातील कवितेची पुस्तके कौतुकाने आशु आणि प्राजक्ताला दाखवू लागली. टुरमध्ये प्रविण अत्रे नावाचे कवी कसे भेटले, त्यांच्या कविता ऐकल्या आणि त्यांच्यासोबत जाऊन पुण्यात एवढी कवितेची पुस्तके खरेदी केली.
आशुला आपली आई कोणी वेगळीच वाटली. एवढी वर्षे पारकर एंटरप्रायझेस हे तिचे आयुष्य होते. त्याच्यापासून एक सेकंद ती लांब राहत नव्हती. आणि आता येऊन दोन तास झाले तरी एकदाही पारकर एंटरप्रायझेसचे नाव नाही. आल्यापासून तिची कवितेची पुस्तके आणि कविता यांचेच कौतुक. रात्रौ प्राजक्ताने जेवण वाढले तेव्हा आशुने दहा दिवसातील पारकर एंटरप्रायझेस मधील एक एक गोष्टी आईला सांगायला सुरुवात केली. सुरवातीला फक्त हु हु करणारी ज्योती आशुला म्हणाला, ‘‘आशु, पुरे कर तो हिशोब. आता यापुढे सर्व व्यवसाय तुम्ही दोघांनी बघायचा आहे. मी आता त्यातून अंग काढून घेणार. खरं म्हणजे मी याआधीच त्यातून बाहेर पडायला हवे होते. पण माझ्या मनाचा आनंद कोठे आहे हे लक्षात येत नव्हतं. या टुर दरम्यान लक्षात आले की माझी प्रिय सखी कोठे आहे? शाळेत असताना मराठे बाई सांगायच्या – ‘‘ज्योती, तू अत्यंत तन्मीयतने कविता म्हणतेस, तुझी आवड कवितेत आहे. कविता तुझी सखी आहे तिला जप.’’ पण आयुष्यात पायावर स्थिर होण्यासाठी धडपडले आणि सखीला विसरले. पण आशु आणि प्राजक्ता माझ्या आयुष्याचा पुढचा काळ ह्या सखी समवेत घालवणार. तुम्ही दोघे पारकर एंटरप्रायझेस सांभाळा. कधी कळी अडचण आली तर मी आहेच.’’ आशु आणि प्राजक्ताने मान हलवली.
दुसर्या दिवशी ज्योतीने बॅगेतील पुस्तके बाहेर काढली. कवी ग्रेस, शांता शेळके, इंदिरा संत, पाडगांवकर ते नव्या पिढीतले सौमित्र, निलश पाटील, महेश केळुसकर, संदिप खरे तिच्या अवतीभवती जमले. इंदिरा संतांचे पुस्तक तिने उघडले.
किती वाटा, चुकल्यामुळे चुकलेल्या…
चुकल्यामुळे न भेटलेल्या… राहूनच गेलेल्या…
किती योगायोग… हुकलेले आणि न आलेले…
येऊनही न उमजलेले… धुक्यात किती राहून गेलेले…
ठरवलेले न ठरवलेले….
मग कवी ग्रेस –
‘भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी जातो, तु मला शिकविलेले देते
भय इथले संपत नाही…’
मग सुधीर मोघे यांचे पक्ष्यांचे ठसे मधील –
‘माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले…
माझे प्राण तुझे प्राण, उरलेल्या वेगळाले…’
पुन्हा सुधीर मोघे यांची दुसरी कविता –
‘काही वाटा आयुष्यात उगीचका येतात ?
चार घटका सोबत करुन कुठे निघून जातात ?
एक वाट येते मिरवीत चिमणी पाऊल ठसे
शंख शिंपल्यानी भरुन वाहतात
काही वाटा आयुष्यात उगीच का येतात ?’
ज्योतीला वाटले, शब्दांशी खेळण्यात किती गंमत आहे? प्रत्येक वेळी प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळाच लागतो. ज्योतीने कित्येक कविता तोंडपाठ केल्या. दिवाळी अंकात येणार्या नवनवीन कविता ती वाचू लागली. नवकविता पण समजून घेता यायला हवे. वेंगुर्ल्यातील ‘‘आनंदयात्री’’ म्हणून एक साहित्य ग्रुप होता तिथे आठवड्यातून एकदा कथा, कविता याबाबत चर्चा होत. खर्डेकर कॉलेजमधील प्रोफेसर्स, आजुबाजूचे शिक्षक, नवोदित लेखक, कवी या ग्रुपमध्ये असत. ज्योती या ग्रुपमध्ये जॉईन झाली. तिथे ती कवितेबद्दल चर्चा करु लागली. वेंगुर्ले कुडाळ भागात अनेक काव्या कार्यक्रम होत. ती कार्यक्रमात हजर असायची. ही मंडळी कविता कशा वाचतात, कुठल्या शब्दावर जोर देतात यावर तिचे बारीक लक्ष होते. सहा महिन्यानंतर ज्योतीला आत्मविश्वास वाटू लागला की, मी आता कविता करु शकेन. तिने पेपर समोर ओढला –
जेव्हा जेव्हा तुम्हाला हताश वाटेल,
किंवा उदास वाटेल
तेव्हा,
तुम्ही तुमच्यातल्याच दुसर्याला आवर्जुन भेटा
शेवटी तो तुमच्यातलाच दुसरा आहे, तुम्ही नाही…
१५ जुलै हा ज्योतीचा वाढदिवस. आशुचे लक्षात आले. या १५ जुलैला आई साठ वर्षे पूरी करणार. आशु प्राजक्ताने ठरविले. आईची एकशष्ठी साजरी करायची. आशुने आईला विचारले. काय काय करायचे तुझ्या एकशष्ठीला? ज्योती म्हणाली – माझ्या एकशष्ठीला कोणतेही धार्मिक विधी नकोत. फक्त काव्य वाचन ठेवायचं, ते पण
एकाचचं. आशु म्हणाला, कुणाचं काव्य वाचन ठेऊया? ज्योती म्हणाली, प्रविण अत्रेचं. ज्यांच्या प्रेरणेने मी कविता करु लागले, म्हणू लागले. त्यांना वेंगुर्ल्यात बोलवुया.
त्यांच्या कविता मी कित्येक वर्षात ऐकल्या नाहीत.
माऊली ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमधून आशुने प्रविण अत्रेंचा फोन मिळविला. दुसर्याच दिवशी आशुने फोन लावला.
आशु – हॅलो ! प्रविण अत्रे का ?
प्रविण – हो, हां, बोलतोय, कोण आपण ?
आशु – मी आशुतोष पारकर, वेंगुर्ल्याहून बोलतोय. माझी आई ज्योती पारकर, चार वर्षापूर्वी माऊली टूर्सच्या सहलीत गेली होती. त्यावेळी तुम्हीपण त्या सहलीत होता. तुमच्या कविता तीला फार आवडायच्या. तुम्ही तिला पुण्यात कवितेंची पुस्तके घेऊन दिलात.
प्रविण – हो, हो, आठवलं. मग ती कविता वाचते का?
आशु – अहो त्यापासून तिचे आयुष्य बददले. तिने आमच्या घरच्या व्यवसायातून निवृत्ती घेतली. आता ती फक्त कवितेच्या विश्वात असते. आता ती कविता करते. थोड्याफार तिच्या कविता छापून पण येतात.
☆ आठवांच्या हिंदोळ्यातून… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆
आमची आत्या जाऊन पंधरा दिवस होऊन गेले. आत्या ही फक्त नावापुरतीच आत्या होती , ती आम्हा भावंडांसाठी माहेरात असणारी जणू दुसरी आईच. तिच्या लग्नानंतर एका वर्षातच नवर्याने मांडलेल्या छळामुळे आमचे चुलते (आबा )यांनी तिला परत आमच्या घरी आणले. पुन्हा तिला परत सासरी नांदायला पाठविलेच नाही. आणि आत्याने पण कधी नांदयला जायची इच्छा व्यक्त केली नाही. तेंव्हा पासून ती माहेरात राहिली. आपल्या तीन भावांचे संसार आणि त्यांची मुले संभाळण्यात ती रमली. तिने पंचवीस माणसांचे कुटुंब घट्ट मायेच्या मिठीत बांधून ठेवले. नात्यांचे सर्व मोती प्रेमाने एकाच मजबूत धाग्यात गुंफून, त्याची गाठही तितक्याच ओढीने घट्ट आवळली. आज आम्हा भावंडांमध्ये एकमेकांबद्दल जिव्हाळा , प्रेम, आपुलकी आहे ती सर्व माझ्या आत्यानी केलेल्या संस्कारांमुळे आहेत. आत्या जितकी प्रेमळ होती तितकीच रागीट सुध्दा होती. शाळेत गणिताचे गुरूजी आणि घरात आत्या यांचा मार खाऊनच आम्ही घडलो.
आत्याला तिच्या स्वतःच्या संसाराचा अनुभव नव्हता. तरीही तिने अनेकांचे संसार उभे केले आणि चांगल्या रितीने संसार कसा करायचा याची शिकवणसुध्दा दिली. आत्या जणू अनुभवांचे एक पुस्तक होती. चाली-रीती, संस्कार यांची ती वारसदार होती. ती अशिक्षित होती. संस्कृतीची जपणूक उत्तम करत होती. आमच्या कुटुंबातच नव्हे तर गावात तसेच पै-पाहुण्यांच्यात कोणतेही मंगलकार्य असले की आत्या तिथे हजर. तिच्या हातूनच सर्व कार्यक्रम पार पडायचे. तिला स्वतःला सुध्दा अशा दगदगीत वाहून द्यायला आवडायचे.
आत्याच्या स्वतःच्या संसाराची वाताहात झाली पण भावांच्या संसारात येणारे चढउतार याचा तिने कधीच त्रागा केला नाही. तिने कधी कोणतेच नाते तुटण्याइतपत ताणले नाही. पंचवीस माणसाच्या कुटुंबात कधीच तिने नात्या-नात्यात दुरावा येऊ दिला नाही. मग जावा-जावा असोत अथवा भाऊ-भाऊ असोत. कधी एकत्र कुटुंबात भांड्याला भांडे लागलेच तर तिच्या काळजाचा थरकाप व्हायचा. तिची चिंता वाढायची. तिने प्रयत्न केले ते पडलेल्या फटींना सांधायचे. मायेचे मलम लावून तिने नात्यांना उभारी दिली. आत्याचे संपुर्ण आयुष्य हे फक्त रांदणे आणि सांधणे यातच गेले.
आत्याने आम्हां बहिणींना तिच्या सगळ्या चांगल्या सवयी लावल्या. तिचेच संस्कार घेऊन आम्ही सासरी नांदायला गेलो. म्हणून मी आज अभिमानानी सांगते, “माझ्यात जे काही चांगले आहे ती आत्याची माझ्याकडे ठेव आहे. “
आत्याच्या बाबतीत विशेष वाटते ते हे की, स्वतःचे अपत्य नसताना दुसऱ्याच्या लेकरांवर अतोनात प्रेम करणे ,त्यांचे भविष्य चांगले घडावे याकरता सतत प्रयत्न करणे. दुसर्ऱ्याचे संसार सजविण्यात, सावरण्यात स्वतःचे आयुष्य झिजविणे. आत्या, हे सारं तूच करू जाणे! गावात येणारे ग्रामसेवक, तलाठी, शाळेतील शिक्षक, माल विकायला येणारे फिरस्ते यांना कधी आत्यानी उपाशीपोटी जाऊ दिले नाही. हे सगळेजण आत्याला त्यांची मोठी बहीण मानायचे.
आपले सर्व आयुष्य तिने एकाकी घालविले पण धुतल्या तांदळाप्रमाणे तिचे चारित्र्य आणि मन होते.
अशी आत्या आज आमच्यात नाही पण तिच्या आठवणी रोज मनास खोलवर हेलावून टाकतात. नकळत डोळे भरून येतात आणि डोळ्यांतून ओघळते ते एका थोर पुण्यवती आईचेच वात्सल्य. “आत्या तू आमच्यात होती म्हणून पंचवीस माणसाचे कुटुंब चाळीस वर्ष एकत्र होते “
☆ भारतरत्न किताबाचे उपेक्षित मानकरी – भाग-2 – लेखक : श्री सुभाषचंद्र सोनार☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
भारतरत्न किताबाचे उपेक्षित मानकरी :…. नाना जगन्नाथ शंकरशेठ.
“आपण एतद्देशीय लोक जगन्नाथ शंकरशेठ यांचे अत्यंत ऋणी आहोत. कारण ज्ञानाचे बीज पेरण्यात ते अग्रेसर होते; इतकेच नव्हे तर सध्या त्याची जी जोमाने वाढ झाली आहे त्याचे सर्व श्रेय त्यांनाच आहे.“
– दादाभाई नौरोजी
अन्य क्षेत्रातली नानांची कामगिरीही थक्क करणारी आहे. ‘ग्रेट ईस्टर्न स्पिनिंग अँड विव्हिंग’ या मुंबई त सुरू झालेल्या पहिल्यावाहिल्या कापड गिरणीचे नाना प्रवर्तक डायरेक्टर होते. गुजरात व सिंधशी दळणवळणासाठी, सन १८४५ मध्ये त्यानी, ‘बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी’ स्थापन केली. ‘याग्रो हार्टिकल्चरल सोसायटी अॉफ वेस्टर्न इंडिया’, ‘जिअॉग्राफिकल सोसायटी’ आणि धान्य व्यापार्यांच्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी ‘जॉईंट स्टॉक ग्रेन कंपनी’ या महत्वपूर्ण संस्थांच्या स्थापनेतही, त्यांचाच पुढाकार होता. तसेच १८४२ मध्ये स्थापन झालेल्या ‘बँक अॉफ वेस्टर्न इंडिया’चे ते प्रवर्तक संचालक होते. तर १८५७ मध्ये मुंबईत पहिले नाट्यगृहही बांधले ते नानांनीच.
नानांच्या कार्याची यादी इथेच संपत नाही. मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी विहार लेकची निर्मिती तर त्यांनी केलीच, शिवाय पाणीटंचाईच्या काळात रेल्वेच्या डब्यांमधून पाणी आणून, ते विहीरी व तळ्यांमध्ये ओतण्याची व्यवस्थाही त्यांनी करविली.
मुंबईच्या रस्त्यांवर खोबरेल तेलाचे दिवे लावले जात. पण त्यांच्या अपु-या प्रकाशामुळे लोकांची गैरसोय होई, नि चोरचिलट्यांचं फावत असे. इंग्लंडमध्ये रस्त्यांवर ग्यासचे दिवे लावले जातात, ही गोष्ट कानावर येताच नानांनी, तशा प्रकारच्या दिवाबत्तीच्या सोयीसाठी, चिंचपोकळीला ग्यास कंपनी सुरू केली.मॉरिशसहून ऊसाचं बेणं आणून त्यांनी आपल्या बागेत त्याची लागवड केली.
अशा सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधांचं जाळं नानांनी मुंबईत विणलं. त्यामुळेच आज मुंबईला आर्थिक राजधानीचा व आंतरराष्ट्रीय शहराचा दर्जा प्राप्त झाला आहे. या महात्म्यामुळेच मुंबई ही प्रत्येक मराठी माणसाची स्वप्ननगरी बनली. आयुष्यात एकदा तरी या स्वप्ननगरीला भेट दिल्याशिवाय, त्याला आपलं जीवन असार्थक वाटू लागलं. त्यातूनच ‘जीवाची मुंबई करणे’ हा वाक्प्रचार रुढ झाला. मुंबईवर कवणं रचली गेली. अण्णाभाऊ साठेंनी मुंबईची लावणी लिहीली. तर हिंदी चित्रपटातही मुंबईवर अनेक गीतं लिहीली गेली. ती गाजली, लोकप्रिय झाली.
आज आम्ही ‘आमची मुंबई, आमची मुंबई’ असं अभिमानाने म्हणतो. पण त्यातून मंबईविषयीचं प्रेम कमी, आणि प्रांतिक अस्मिताच अधिक डोकावते. डोकवे का ना, पण मग मुंबईच्या विकासातही आमचा सहभाग असला पाहिजे, तरच आमची मुंबई म्हणण्याला अर्थ आहे. ज्या निर्जन मुंबईत एकेकाळी लोकांना यायची भीती वाटायची, त्या मुंबईचं नानांनी आपल्या परिसस्पर्शाने सोनं केलं. त्या सोन्याच्या मुंबईची आम्ही बकाल मुंबई करुन टाकली आहे.
सतीप्रथाबंदीसाठी राजा राममोहन राय यांच्यासोबत पुढाकार घेऊन नानांनी, नऊ वर्षे लढा दिला व सतीप्रथा प्रतिबंधक कायदा करवून घेतला. सतीबंदीसाठीच्या त्यांच्या कार्याची गव्हर्नर जॉन माल्कम यांनी मुक्त कंठाने स्तुती केली. नानांच्या लोकप्रियतेने प्रभावित झालेल्या सर फ्रेडरिक लिओपोल्ड यांनी आपल्या मुलाचं नाव ‘लिओनार्ड रॉबर्ट शंकरशेठ’ असं ठेवलं होतं.
सरकार दरबारी नानांच्या उत्तरोत्तर वाढत्या प्रभावामुळे, पोटशूळ उठलेल्या नानांच्या हितशत्रूंनी, नानांवर १८५७ च्या उठावकर्त्यांना अर्थसहाय्य केल्याचे व आपल्या धर्मशाळेत त्यांना आश्रय दिल्याची बालंटं आणून, नानांच्या नावे पकडवॉरंट जारी करायला सरकारला भाग पाडले होते. पण हितशत्रुंचे हे कट नानांनी उधळून लावले.
ज्या काळात भारताच्या राजकिय, सामाजिक व औद्योगिक क्षितिजावर समस्त राष्ट्रीय नेत्यांचा, संस्था-संघटनांचा, उद्योजकांचा उदयही झाला नव्हता, त्या घनतमी, नाना जगन्नाथ शंकरशेठ हा शुक्रतारा, आपल्या तेजाने तळपत होता. म्हणूनच त्यांचे एक चरित्रलेखक डॉ. माधव पोतदार हे नानांना, ‘आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रपुरुष’ संबोधतात, तर नानांच्या जीवनावर “प्रारंभ” ही कादंबरी लिहीणारे सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक व अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ, नानांचा ‘आधुनिक भारताचा आद्य शिल्पकार’ असा सार्थ गौरव करतात. व्यक्तिगत पातळीवर नानांच्या कार्याचं महत्त्व जाणणारे अनेक आहेत. परंतु शासकीय पातळीवर मात्र नानांचं ऋण जाणणारा नि त्यातून उतराई होणारा कोणी नाही.
ज्यांचा शासनाने ‘भारतरत्न’ किताबाने गौरव केला पाहिजे, असे नाना जगन्नाथ शंकरशेठ उपेक्षेचे धनी ठरले आहेत. कारण नानांच्यामागे ना मतपेटीवर प्रभाव टाकू शकणारं ‘सामाजिक पाठबळ’ आहे, ना पुरस्कारासाठी आराडाओरडा करणारी ‘शाऊटिंग बटालियन’ आहे. परिणामी मुंबईवर जीवापाड प्रेम करणारा हा मुंबईचा अनभिषिक्त सम्राट, मुंबईतही उपेक्षित आहे. मुंबईच्या विकासासाठी जातीनिरपेक्ष भावनेने, सढळ हातांनी आर्थिक मदत व भूमीदान करणा-या नानांच्या स्मारकासाठी मात्र मुंबईत जागा नाही, एवढी मुंबई कृपण नि कृतघ्न झाली आहे. हे पाहून नानांच्या आत्म्याला काय वाटत असेल…..
डूबे हुओं को हमने बिठाया था,अपनी कश्ती में यारों।
और फिर कश्ती का बोझ कहकर, हमें ही उतारा गया॥
हल्लीचे नेते राजकीय लाभाच्या शक्यतेखेरीज, कुणाचीच तळी उचलत नाहीत. आणि त्यांच्या राजकीय लाभाच्या गणितात, नाना मात्र नापास आहेत. शासनाची ही उदासिनता आणि ज्या दैवज्ञ सोनार जातीत नाना जन्माला आले, त्या ज्ञातीबांधवांची आत्ममग्नता खरोखर वेदनादायी आहे.
सध्या विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स करण्याचा धंदा जोरात सुरु आहे. ही मंडळी मुलांसमोर देशीविदेशी उद्योजकांचे आदर्श उभे करते, पण त्यांच्या आदर्शांच्या दोनशे वर्षं आधी, नाना जगन्नाथ शंकरशेट नामक, ‘फर्स्ट इंडियन आयकॉन’ होऊन गेला, हे त्यांच्या गावीही नाही. तर शालेय पाठ्यपुस्तक मंडळालाही त्याचं विस्मरण झालं आहे. इतकी प्रचंड अनास्था या युगपुरुषाच्या वाट्याला आली आहे. याला काय म्हणायचं.! वैचारिक दिवाळखोरी की भावी महासत्तेची मस्ती..! अपूज्यांची पूजा नि पूज्यांची अवहेलना करुन, भारत महासत्ता बनेल असं कुणाला वाटत असेल, तर तो त्यांचा ‘बनेलपणा’आहे, माझं अस्वस्थ मन मात्र म्हणते आहे.
या दिल की सूनो दुनियावालो,
या मुझको अभी चूप रहने दो।
मैं ग़म को खुशी कैसे कह दूं,
जो कहते हैं उनको कहने दो॥
– समाप्त –
लेखक : -सुभाषचंद्र सोनार, राजगुरुनगर.
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खाऊचे डबे सगळे रिकामे झाले.इतके दिवस मुलांसाठी,घरातील वयस्कर लोकांसाठी करतो, ही मनातली तीव्र भावना.पण मुलांची आपापल्या दिशेने पांगापांग होऊन ही आता दोन चार वर्षे लोटलीत.वयस्कर मंडळी सगळ्याच्या पल्याड गेलेली आहेत.
तरीही..ठरावीक वेळेत डबे रिकामे होण्याचा क्रम काही चुकला नाही.मनात दबलेलं हसू हळूच ओठांवर आलं.मुलानांच कशाला,आपल्यालाही लागतंच की काहीतरी येताजाता तोंडात टाकायला.फक्त इतके दिवस मुलांच्या नावाखाली लपत होतं.आता उघड उघड मान्य करावं झालं. आपलेसुद्धा,डबे खाऊने भरुन ठेवण्यात अनेक स्व-अर्थ दडलेले असतात.शेवटी एकच खरं…
स्वान्त सुखाय…!
चिवडा फोडणीस टाकायला घेतलाच.
सकाळचा माँर्निग वाँक घेऊन सोसायटीतल्या डॉक्टर काकू घरावरुन जात होत्या.मला किचन खिडकीत बघून त्यांनी हाक मारली, “बाहेर ये.बघ मी काय केलंय.तुला दाखवायचंय.” हँड एब्राँडयरी केलेला कॉटन कुर्ता त्यांनी मला उलगडून दाखवला.”व्वा! किती सुंदर वर्क, काकू!”मी त्या एंब्रॉयडरीवरून हात फिरवत म्हणाले.”आवडलं ना?छान झालंय ना ग?”
अर्थातच काकू. “किती नाजूक काम आहे हे.फार सुरेख.कलर काँंबिनेशनही परफेक्ट!”माझ्या नकळत…पावती देऊनही झाली.
“मैत्रिणीसाठी करतेय.तिला सरप्राईज देणार आहे.आणि ती जेव्हा बघेल तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मी अनुभवणार आहे.शरीराने दुसऱ्यासाठी करत असतो गं आपण.पण त्यातला खरा आनंद आपणच घेत असतो.हो ना?”
मी म्हटलं, ” हो.स्वांत सुखाय…!”
“काकू, मुलगा झाला मला.तुम्ही आठवणीने गरम गरम तूप-मोदक आणून खाऊ घातलेत मला प्रेग्नसीत!आठवतंय काकू?”माझ्यासमोर लहानाची मोठी झालेली जयू आनंदाने सांगत होती.गणपती बाप्पाच आलेत!तिच्या आवाजातला आनंद मला सुखावून गेला.
माझं हे करणं म्हणजे तरी काय, मोदक करून खाऊ घालण्यातला आनंद मीच अनुभवणं.म्हणजेच तर
स्वान्त सुखाय!
नव्वदी पार केलेले आजोबा.मंदिर परिसर नित्यनेमाने स्वच्छ झाडत असतात.क्षीण झालेली त्यांची क्रयशक्ती .मीच एकदा त्यांना म्हटलं, “कशाला, आजोबा, या वयात झाडता?” “मला आनंद मिळतो बाळा. उगाच का कोण करेल?
माणूस फार लबाड, स्वतःच्या सुखासाठी करत राहतो,पण आव मात्र दुसऱ्याला आनंद दिल्याचा आणतो.
त्यापेक्षा सरळ मान्य करावं,
स्वान्त सुखाय..
मला आजकाल हा स्वान्त सुखाय चा मंत्र फार पटला,रुचला आणि पचनीदेखील पडला.
जिथे आपल्या क्षुल्लक अस्तित्वाने जगतकार्यात तसूभरदेखील फरक पडणार नाही,तिथे माझं कर्म कुणासाठी का असणार?ते फक्त आणि फक्त मला हवं असतं.त्यात माझा आनंद, सुख समाविष्ट झालेलं असतं.म्हणून आपण करत असतो.अहंकाराचे, अट्टाहासाचे कवच इतके जाड असते की,त्या कर्मातून मिळालेला आनंद आपल्यापर्यंत पोहचतच नाही.’मी केल्याचा’ काटा,ते सुख,तो आनंद आपल्याला उपभोगू देत नाही. राग,अपेक्षाभंग, वैताग,दंभ या खाली सुखाच्या आनंदाच्या जाणिवाच बोथट होऊन जातात.
परवा आईला आंघोळ घालताना मी तिच्याभोवती पाणी ओवाळत तिला म्हटलं,”झाली बरं ग तुझी चिमणीची आंघोळ.चला आता.पावडर गंध लावायचं ना तुला?” आजाराने शिणलेला तिचा चेहरा खुदुकन हसला. आणि ती म्हणाली, “तुम्हां पोरींचे लहानपण आठवलं ग!”
मी म्हटलं, “आता तू लहान झालीस.होय ना?”
तिचा ओला हात माझ्या चेहऱ्यावरून फिरला.
तिचं हसणं, तिचा तो ओला स्पर्श!
सुखाची भाषा याहून काय वेगळी असणार!
स्वान्त सुखाय चा हा किती देखणा आविष्कार!
माऊली म्हणतात-सत् चित आनंद.म्हणजे आत्म्याचे मूळ स्वरूप चिरंतन सुख आहे.तो सदैव सुख असतो.विकार जडलेले आहेत ते देह इंद्रियांना! परमेश्वरापासून सुखापर्यंत सारं सारं आपल्यातच तर आहे.बस्स्! आपण थोडा बहिर्मुख ते अंतर्मुख प्रवास करायला हवाय.इतकंच तर!
लेखिका:सौ. विदुला जोगळेकर
संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एका व्यक्तीची गडद सावली सारखी आकृती. तिच्या हातात मुळापासून उखडलेले झाड आणि झाडावर जाणवणारी फडफड.
किती गूढ चित्र आहे हे••• मग शिर्षकावर नजर गेली, प्रश्न टांगले आभाळाला. आणि त्यातून त्या व्यक्तीच्या मनात येणारे पुष्कळ प्रश्न विचारांच्या झाडाला टांगून ठेवलेले असावेत आणि हे विचारांचे झाड मुळापासून कोणीतरी उपटावे आणि क्षणार्धात ते प्रश्न आभाळाला जाऊन भिडावे असे त्या व्यक्तीच्या मनात आहे का असे वाटले.
खरोखर कुतुहल जागे झाले आणि त्या चित्राभोवती मन पिंगा घालू लागले. अशा गूढ चित्राचे वेगवेगळे अर्थ लावू लागले.
०१) नीट पाहिले तर ती व्यक्ती धरती मातेचे रूप वाटली . या जमीनीच्या आत अर्थात भूगर्भात कितीतरी हालचालींच्या जाणिवा होत असताना त्याच्याशी निगडीत असलेले झाडच जर मुळासकट तोडले नव्हे तर उखडले••• तर या काळ्या आईला किती वेदना होतील? ते झाड उखडले तरी वेदनांनी वाकलेली आई आपल्या या लेकराला आपल्या हातात झेलते. पण त्याचा जीव वाचवणे आता आपल्या हातात नाही म्हणून त्या झाडाची फडफड, तडफड तिच्या काळजाला पुन्हा पुन्हा जाणवते आणि मग हे असे का असा येणारा प्रश्न, हे माझ्याच बाबतीत का? असा प्रश्न, कधी थांबणार अन्यायाचा कल्लोळ हे सगळे प्रश्न आकाशा एवढे मोठे होऊन आभाळाला भिडतात.
०२) ती आकृती स्त्रीची मानली तर स्त्रीभृणहत्येचे झालेले आकाशा एवढे विराट रूप इतर अनेक समस्यांचे झाड होऊन त्या झाडाला तरी कसे नष्ट करणार असे प्रश्न जणू आभाळाला भिडले आहेत.
०३) ही आकृती एका मानवाची मानले तर त्याच्या मनातले समस्यांचे झाड मुळापासून उपटले तरी ते त्याच्याही नकळत त्याने आपल्याच हातात झेलले आहे. आता या समस्यांच्या झाडाला असलेले अनेक प्रश्न मग मोठे होऊन त्या भाराने त्या प्रश्नांच्या दबावाने हा मानव वाकला आहे.
०४) थोडे बारकाईने बघितले तर वृक्षतोडीने सिमेंट जंगल वाढताना या वृक्षतोडीमुळे निर्माण झालेले पक्ष्यांच्या घरट्यांचे प्रश्न, जमीनीच्या धूपेचा प्रश्न, स्थलांतर न होऊ शकणार्या गोष्टींचा प्रश्न अशा अनेक जाणिवांचे प्रश्न फार मोठे आहेत हे सुचवायचे आहे.
०५) थोडी दृष्टी विचार केली तर पृथ्वीचा अर्धा गोल वाटतो . म्हणजेच मानवाच्या मनातील प्रश्न हे वैयक्तिक , सामाजिक न रहाता वैश्विक प्रश्न आहेत हे सुचवून त्यातील महानता आभाळ शब्दात व्यक्त होते.
०६) उखडून फेकून द्याव्याशा वाटणार्या असंख्य प्रश्नांची लक्तरे होऊन ती आभाळाला भेडसावू लागली आहेत.
०७) अंतरंगात डोकावले तर कळते नितीन देशमुख यांचा हा गझलसंग्रह आहे. त्यातून अनेक समस्यांकडे पाहून निर्माण झालेले शेर आहेत. अनेक जाणिवांतून उठलेले वादळ आहे, अनेक तरणोपाय नसलेल्या प्रश्नांवरचे मंथन आहे.म्हणून त्या अनुषंगाने आलेले नाव आणि त्याला साजेसे असे हे चित्र आहे.
०८) अन्वयार्थाने विचारांची जमीन असलेला उला आणि उच्च खयालांची उकल असलेला सानी या दोन्ही मिसर्यामधे होणारी मनाची खळबळ या चित्रात सांगायचा प्रयत्न केला आहे.
असे अनेक मतितार्थ , अन्वयार्थ ,भावार्थ असलेले मुखपृष्ठ प्रतिमा पब्लिकेशन्सच्या दीपक आणि अस्मिता चांदणे यांनी निवडले आणि श्री नितीन देशमुख यांनी स्विकारले त्याबद्दल त्यांना मन:पूर्वक धन्यवाद !!
(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय डॉ कुन्दन सिंह परिहार जी का साहित्य विशेषकर व्यंग्य एवं लघुकथाएं ई-अभिव्यक्ति के माध्यम से काफी पढ़ी एवं सराही जाती रही हैं। हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहते हैं। डॉ कुंदन सिंह परिहार जी की रचनाओं के पात्र हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं। उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है एक सार्थक व्यंग्य – ‘नये तौर की समीक्षा‘। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार # 225 ☆
☆ व्यंग्य – नये तौर की समीक्षा ☆
भाई छेदीलाल इस वक्त समीक्षक के रूप में साहित्य के आकाश में छाये हुए हैं। शेक्सपियर ने लिखा है कि कुछ लोग जन्म से महान होते हैं, कुछ महानता अर्जित कर लेते हैं और कुछ के ऊपर महानता लाद दी जाती है। भाई छेदीलाल इस वर्गीकरण में तीसरी श्रेणी के महान कहे जा सकते हैं।
हुआ यूँ कि उनके आदरणीय जीजा रामभरोसे ‘मायूस’ ने एक गज़ल-संग्रह छपवाया। शीर्षक दिया ‘ज़ुल्फों के असीर’। फिर उन्होंने साहित्यिक वातावरण की नब्ज़ टटोल कर अपने अज़ीज़ साले छेदीलाल से कहा कि, ‘हे भाई, साहित्य में आजकल दूसरों से समीक्षा कराना निरापद नहीं है। लोग जाने कहाँ-कहाँ का बदला निकालने लगते हैं। आप हमारी अर्धांगिनी के भाई होने के नाते भरोसे के आदमी हैं। आप मेरे गज़ल संग्रह की समीक्षा करें। छपाने की ज़िम्मेदारी मेरी। आजकल अखबारों-पत्रिकाओं में लेख की क्वालिटी नहीं, लेखक-संपादक संबंध काम आते हैं। मुझे भरोसा है कि आप अपनी समीक्षा में मेरी और अपनी बहन की प्रतिष्ठा की पूरी रक्षा करेंगे। मदद के लिए मैं ज़रूरी किताबें और शब्दकोश उपलब्ध करा दूँगा।’
जीजा जी साले साहब के पास ज़रूरी किताबें पटक गये और साले साहब ने अपनी वफादारी का सबूत देते हुए शब्दकोश से ‘अद्भुत’, ‘अद्वितीय’, ‘अतुलनीय’, ‘अकल्पनीय’, ‘विरल’, ‘स्तब्धकारी’, ‘नायाब’, ‘बेमिसाल’, ‘रोमांचक’ जैसे ‘सुपरलेटिव’ विशेषणों का उत्खनन कर जीजाजी की किताब को झाड़ पर चढ़ा दिया। बदले में उन्हें जीजा जी और जीजी का भरपूर आशीर्वाद प्राप्त हुआ।
तब से भाई छेदीलाल समीक्षक के रूप में प्रकाश में आये और फिर उनके पास धड़ाधड़ समीक्षा के लिए आतुर लेखकों की किताबें आने लगीं। भाई छेदीलाल अपने बनाये फार्मूले के हिसाब से फटाफट किताबों को निपटा देते थे। चार छः पन्ने पढ़कर काम लायक सामग्री निकाल लेते थे।
जीजा जी की किताब मिलने पर भाई छेदीलाल ने उनसे ‘असीर’ का मतलब पूछा था। ‘असीर’ का मतलब ‘कैदी’ या ‘बन्दी’ जानने के बाद उन्होंने अपनी शंका पेश की थी कि ‘ज़ुल्फों के असीर’ से उनका मकसद उन जीव-जन्तुओं से तो नहीं है जो अक्सर ज़ुल्फों में बसेरा करते हैं। तब ज्ञानी जीजा जी ने उन्हें समझाया था कि ‘ज़ुल्फों के असीर’ से उनका मतलब उन आशिकों से है जो महबूबा की ज़ुल्फों में पनाह लेते हैं और वहीं पड़े शैंपू, हेयर लोशन, हेयर कंडीशनर वगैरः की खुशबू लेते रहते हैं। उन्होंने साले साहब को एक फिल्मी गाने की दुख भरी लाइन भी सुनायी— ‘तेरी जुल्फों से जुदाई तो नहीं माँगी थी, कैद माँगी थी रिहाई तो नहीं माँगी थी।’
मुख़्तसर यह कि भाई छेदीलाल समीक्षक के रूप में स्थापित हो गये और अनेक लेखकों के लिए ‘आदरणीय’ और ‘फादरणीय’ हो गये।
ताज़ा किस्सा यह है कि भाई छेदीलाल ने एक कथाकार ‘निर्मोही’ जी के संग्रह की समीक्षा लिखी है जो उनकी समीक्षा के मयार को दर्शाती है। समीक्षा इस तरह है— ‘मेरे सामने श्री गिरधारी लाल ‘निर्मोही’ का कथा-संग्रह ‘बुझा बुझा मन’ है। संग्रह में बीस कहानियाँ हैं जिनके शीर्षक उत्सुकता जगाते हैं।
‘पहले बात किताब के आवरण की की जाए। आवरण सुन्दर बन पड़ा है। लगता है कश्मीर के पहलगाम का दृश्य है। नदी अठखेलियाँ कर रही है और नदी के पार ढाल पर लंबे-लंबे वृक्ष दिखाई पड़ रहे हैं जो आश्चर्यचकित करते हैं। बहुत से लोग जो शायद पर्यटक होंगे, पानी के बीच में चट्टानों पर बैठे हैं या मोबाइल पर फोटो ले रहे हैं। लहरों का फेन साफ दिखाई पड़ता है। कुल मिलाकर आवरण मनमोहक बन पड़ा है जो पुस्तक की तरफ पाठक का ध्यान खींचने में सहायक है।
‘पुस्तक के आरंभ में दो भूमिकाएँ हैं जो दो विद्वानों के द्वारा लिखी गयी हैं। एक लखनऊ के विद्वान डा. रामनिहोर हैं और दूसरे पटना के पन्नालाल ‘बेचैन’। ये दोनों समीक्षक लेखकों में बहुत लोकप्रिय हैं क्योंकि ये लेखकों को दुखी करना पाप मानते हैं। डा. रामनिहोर ने संग्रह की कहानियों के बारे में लिखा है— जाने-माने कथाकार ‘निर्मोही’ जी के नये संग्रह ‘बुझा बुझा मन’ से रूबरू हूँ। संग्रह की कहानियों के बारे में क्या कहूँ? कहानियों को पढ़कर लेखक का ज्ञान और जीवन की उनकी समझ चमत्कृत करती है। गाँवों का ऐसा चित्रण है कि एक-एक फ्रेम नुमायाँ हो जाता है। चरित्रों का चित्रण भी अद्भुत है। एक-एक चरित्र जीवन्त हो जाता है। कई चरित्र ऐसे यादगार बन पड़े हैं जैसे अंग्रेज़ उपन्यासकार चार्ल्स डिकेंस के चरित्र। जो पढ़ेगा उसके लिए उन्हें भूलना कठिन होगा।मैंने संग्रह की आधी कहानियाँ पढ़ी हैं और उसके आधार पर मैं विश्वासपूर्वक कह सकता हूँ कि यह संग्रह लेखक के लिए बहुत मान-सम्मान अर्जित करेगा।
‘श्री पन्नालाल ‘बेचैन’ ने लिखा है— इस संग्रह की कहानियाँ पढ़ने वाले को दूसरे ही धरातल पर ले जाती हैं जहांँ अपनी जानी पहचानी दुनिया को समझने के लिए एक नई दृष्टि अनावृत्त होती है। लेखक हमारी परिचित दुनिया को एक नयी समझ के साथ हमारे सामने प्रस्तुत करता है। मैंने संग्रह की बीस कहानियों में से आठ कहानियों को पढ़ा है और इन आठ कहानियों ने ही मुझे लेखक की क्षमता से पूरी तरह परिचित करा दिया। इन्हें पढ़कर मैं पूरे विश्वास के साथ कह सकता हूँ कि लेखक का भविष्य बहुत उज्ज्वल है।
‘पुस्तक में रचना-क्रम पर नज़र डालें तो वह दोषहीन है। छपाई में कोई प्रूफ की गलती पकड़ में नहीं आती। रचनाओं की क्रम संख्या और पृष्ठ संख्या बिल्कुल सही है। ‘जहाँ तक मेरी बात है, मैंने संग्रह की दो कहानियाँ पढ़ ली हैं। इनमें से पहली कहानी ‘रिसते ज़ख्म’ है जिसने मुझे बहुत प्रभावित किया है। कहानी के नायक राकेश और उसकी पत्नी सुमन के बीच गलतफहमियों और फिर उनके बीच सुलह का लेखक ने बहुत खूबसूरत चित्रण किया है। कहानी का अन्त पाठक को झकझोर देता है। दूसरी कहानी ‘उलझे धागे’ भी बहुत प्रभावशाली है। इसमें नायिका की परिवार और नौकरी के बीच खींचतान को बहुत बारीकी से चित्रित किया गया है। कहानियों की भाषा दोषहीन है और वह लेखक की अध्ययनशीलता को प्रमाणित करती है। शीघ्र ही मैं बाकी कहानियाँ पढ़कर अपनी राय जाहिर करूंगा। मुझे पूरा भरोसा है कि लेखक साहित्य में ऊँचा मुकाम हासिल करेगा। मेरी शुभकामनाएँ लेखक के साथ हैं।’