मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ झाले कसे निखारे ?… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ झाले कसे निखारे ?… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

गालावर तव ओघळला ,

दव वेलीच्या फुलांचा.

मी चकोर अधीर टिपण्या ,

कणकण साैंदर्याचा.

सुखदुःखाच्या लाटांची,

तू कालप्रवाही सरिता .

मी हरवल्या काठाची,

निर्बंध मूक कविता.

साक्षात काैमुदी तू,

तू चाँद पूनवेचा.

मी नाममात्र उरलो,

ऋतू शरद चांदण्याचा.

झाले कसे निखारे,

ओंजळीतल्या फुलांचे.

अरण्यरुदन ठरले,

अप्राप्य चांदण्याचे.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ दावा परमार्थ… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – श्री श्रीकांत पुंडलिक ☆

डॉ निशिकांत श्रोत्री

? काव्यानंद ?

☆ दावा परमार्थ… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – श्री श्रीकांत पुंडलिक ☆

☆ दावा परमार्थ… डॉ निशिकांत श्रोत्री ☆

तुमच्या पायी आलो मजला दावा परमार्थ

जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ   ||ध्रु||

 

जीवन सारे व्यतीत केले मानव सेवेत

नव्हती कसली जाण काय आहे अध्यात्म

परउपकार न मजला ठावे अथवा ना स्वार्थ

जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ    ||१||

 

दारी आले त्यांच्या ठायी तुम्हांस देखियले

नाही आले त्यांच्यातुनिया तुम्हांस जाणीले

तुम्हाविना ना काहीच भासे जीवनात अर्थ

जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ    ||२||

 

जाणीव आता पैलतिराची शिरी असो हात

नाही कसली आंस असो द्या तुमचीच साथ

कृपा असावी उजळावे हो जीवन न हो व्यर्थ

जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ    ॥३॥

©️ डॉ. निशिकांत श्रोत्री, ९८९०११७७५४

☆ दावा परमार्थ – डाॅ. निशिकान्त श्रोत्री यांच्या कवितेचा रसास्वाद – श्री श्रीकांत पुंडलिक ☆

कविवर्य डॉ निशिकांत यांची ही एक भावपूर्ण कविता आहे. ही कविता म्हणजे कविवर्यानी आपल्या आयुष्याकडे वळून बघताना केलेले आत्मपरीक्षण आहे.जणू काही आयुष्याचा लेखाजोखाच मांडला आहे.

माणसाचं जीवनच प्रश्नमय आहे. जन्मल्याबरोबर माणसाला प्रश्न पडतो, “कोsहं?” या प्रश्नापासून सुरू झालेलं आयुष्य ‘”सोहं” या उत्तराप्रत येईपर्यंत अनेक प्रश्नांनी भारलेलं असतं. आणि माणूस त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. या जीवन प्रवासात पुष्कळ वेळा आत्मकेंद्री बनत जातो आणि तो फक्त स्वतःपुरता जगायला लागतो. मी, माझं कुटुंब, माझा उदरनिर्वाह, माझी समृद्धी याचा विचार करताना स्वार्थ काय परमार्थ काय या संबंधी तो विचार देखील करत नाही. पण जो ज्ञानी मनुष्य असतो तो मात्र या सर्व क्रियाकलापापासून अलिप्त होत स्वार्थ, परमार्थ, जीवन याचा, साकल्याने विचार करितो. प्रस्तुत  कविता म्हणजे याच विचाराचं भावपूर्ण प्रकटीकरण आहे.

कविवर्य आपल्या कवितेच्या पहिल्या कडव्यात अतिशय नम्रपणे, त्याच्या जीवनाचं अधिष्ठान असलेल्या सद्गुरू स्वामी समर्थाच्या चरणी लीन होतात आणि त्यांना आपल्या आयुष्यात केलेल्या जीवन प्रवासाची माहिती देतात.

कविवर्य स्वतः आयुःशल्य विज्ञान  स्नातक आहेत. त्यांना शारीरिक व्याधी आणि त्यातून सुटकेचा मार्ग माहिती आहे. या ज्ञानाच्या आधारे त्यांनी अनेकांना व्याधीमुक्त केलेलं आहे. त्यात त्यानी कुठलाही स्वार्थ जोपासला नाही. त्यामुळे स्वतच्याही नकळत कविवर्य अध्यात्मच जगले आहेत.

दुसऱ्या  कडव्यामध्ये कवींनी आपल्या कामागची प्रेरणा स्पष्ट केली आहे. कवींचा व्यवसाय जरी वैद्यकीचा असला तरी त्यामागची प्रेरणा मात्र, “शिव भावे जीव सेवा” हीच होती.  जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये कवींनी आपल्या आराध्य देवतेलाच पाहिले. व्यवसाय आणि जीवनातील यशाचं श्रेय मात्र विनम्रपणे कवी  स्वामी समर्थाना देतात.

मी कर्ता म्हणशी तेणे तू कष्टी होसी।

परा कर्ता म्हणस। तेणे तू पावसी। यश कीर्ती प्रताप॥”

ही समर्थ रासमदास स्वामी याची उक्ती कवी आचरणात आणतात. स्वामी समर्थाविना जीवन निरर्थक आहे हीच भावना या कडव्यात कवींनी मांडली आहे.

तिसऱ्या कडव्यात मात्र कविवर्याची भावना मात्र व्याकुळ झाली आहे. “संध्या छाया भिवविती हृदया” अशी भावना या कडव्यातून व्यक्त होते आहे. व्यासाच्या या वळणावर फक्त स्वामी समर्थाची साथ असावी आणि जीवन उजळून निघावे हीच भावना प्रकट होते आहे. आयुष्य हेच स्वामी समर्थाची पूजा, आणि आता उत्तरपूजा सुरू झाली आहे

न्यूनं संपुर्णतांयाती सद्यो वंदेतमच्युतं

ही कविता वाचत असताना शब्दांचा साधेपणा, प्रासादिकता, यामुळे कवितेमध्ये अंगभूत नादमाधुर्य निर्माण झाले आहे. कवितेतील आर्तता थेट  जगद्गुरू संत तुकारामाच्या, “तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता” या भावनेशी नाते सांगणारी आहे.

© श्री श्रीकांत पुंडलिक

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तुळस… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? विविधा ?

☆ तुळस… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

तुलसी श्रीसखी शिवे । पापहारिणी पुण्यदे |

नमो नारायणप्रिये ! नमस्ते नारदनुते ! नमो नारायणप्रिये ||

प्रत्यक्ष श्रीकृष्णांची सखी असणाऱ्या, पवित्र, पापांचे हरण करणाऱ्या, पुण्य प्रदान करणाऱ्या, नारदाकडून स्तुती केल्या गेलेल्या, नारायणाला प्रिय असलेल्या तुळशीला प्रणाम असो—- सकाळी स्नानानंतर तुळशीला पाणी देऊन प्रदक्षिणा घालण्याचे वेळी हा श्लोक म्हणण्याची प्रथा आहे. तुळशीत असलेल्या अनेक गुणांमुळे तिच्या सानिध्यात राहण्याने मिळणाऱ्या फायद्यामध्येच या प्रथेचे मूळ असावे.

तुलसी यस्य भवने प्रत्यहं परिपूज्यते | तद् गृहं नोपसर्पंति कदाचित् यमकिंकरा: ||

—-स्कंद पुराणात असा श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे की ज्या घरात नेहमी तुळशीची पूजा केली जाते त्या घरातील सदस्य कमी आजारी पडतात. तुळशीची पाने आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतात. तिच्या मंजिरी विष्णूला अर्पण केल्या तर मोक्ष मिळतो.

….. एका कीर्तनकाराने तिची कथा सांगितली होती ती अशी…… 

….. एका गावात तुळशी नावाची एक काळी सावळी मुलगी रहात होती. तिची आई लहानपणीच वारली. सावत्र आई तिला खूप त्रास द्यायची. म्हणायची, ” तू इतकी काळी. तुझे लग्नच होणार नाही.” तुळशी मोठी झाली आणि तिने एक दिवस आईला उत्तर दिले ,” पंढरपूरचा विठुराया माझ्यापेक्षा काळा आहे. तो करेल माझ्याशी लग्न.” 

आई म्हणाली, ” जा मग त्याच्याकडेच. नाहीतरी तू भूमीला भार आणि खायला कहार आहेस.” तुळशी देखील रागारागाने घराच्या बाहेर पडली. पंढरपूरला आली. तिथल्या बायका तिला चिडवू लागल्या. ” अग, त्याचे रुक्मिणीशी लग्न झाले आहे, तो तुझ्याशी कसा लग्न करेल? नुसता भुईला भार आहेस.” तुळशी रात्रंदिवस विठ्ठलाचे नामस्मरण करत राहिली. तिने अन्न पाणी सोडले. विठुराया काही तिच्याकडे आला नाही. तिने भूमातेला वंदन केले व आर्त विनवणी केली. ” आता माझ्याने सहन होत नाही. तू मला तुझ्या उदरात घे.” आणि खरोखरच भूमाता दुभंगली. तुळशी विठ्ठल विठ्ठल करत गडप होऊ लागली. इकडे विठुरायाला ते समजले. तो धावत धावत त्या  ठिकाणी आला. पण उशीर झाला होता. तुळशी गडप व्हायला लागली होती. त्याने तिचे फक्त केस दिसले तेवढे घट्ट धरून ठेवले. पण  तुळशी गडप झाली. आणि विठोबाच्या हातात फक्त तिचे केस राहिले. त्याने मूठ उघडली आणि त्याच्या डोळ्यांतले अश्रू त्या केसांवर पडले. त्याच्या मंजिऱ्या झाल्या. विठोबाने त्या आपल्या हृदयाशी धरल्या आणि तेथील जमिनीवर पेरल्या. तिथे एक झाड उगवले .त्याला सगळे तुळशी म्हणून लागले. रखुमाईला ते समजले. इकडे विठोबा सारखे तुळशी तुळशी म्हणून उदास होत होता. रखुमाईला राग आला. ती म्हणाली सारखं तुळशी तुळशी करताय. घ्या तिला गळ्यात बांधून. आणि विठोबाने देखील तुळशीचा हार तयार केला आणि आपल्या गळ्यात घातला. तेव्हापासून ती त्याच्या हृदयापाशी रहात आहे…

तुळस अंगणात लावल्यावर दुष्ट शक्ती घरात येत नाहीत. तिच्या बुंध्याभोवतीची काळी माती विषारी माशी, किडा वगैरे चावल्यावर लावली तर उपयोग होतो. मधमाशीने दंश केल्यास त्या जागी तुळशीतील माती लावतात. आराम पडतो. किडा, मुंगी, डास चावल्यास पानांचा रस दंशाचे जागी लावतात. आग थांबते. तिचे खोड, मूळ, फुले आणि मंजिरी अँटिबायोटिक म्हणून वापरतात. ताप आला, घसा खवखवू लागला तर तिची पाने चघळावी. चेहऱ्यावर डाग असतील तर तुळशीचा लेप लावावा. पाण्यात तुळशीची पाने टाकली तर पाणी आपोआप शुद्ध होते. फुफ्फुसे हृदय व रक्ताभिसरणाशी संबंधित असलेली अनेक औषधे तुळशीचा रस व मधाच्या अनुपानासोबत देतात. तुळशीचा रस मधाबरोबर दिला तर सर्दी पडसे नाहीसे होते. तिच्या पानांचा रस लहान मुलांना दिला तर त्यांचा खोकला बरा होतो व टॉनिकप्रमाणे उपयोग होतो. नायटा झाल्यास तिच्या पानांचा रस लावतात. तिचे बी पाण्यात पाच-सहा तास भिजवून, दूध साखर घालून खाल्ल्यास अंगातली उष्णता कमी होते.

….. देवाला वाहिलेल्या फुलांचे निर्माल्य होते. पण देवाला वाहिलेल्या तुळशीचे निर्माल्य होत नाही. तिची पाने, फांद्या झाडापासून तोडल्या तरी तिच्यातील प्राणशक्ती जिवंत असते. तुळशीमध्ये वनस्पतीज सोने असते. धातू रूपातील सुवर्णापेक्षा वनस्पतीज सोने जास्त प्रभावी असते.

….. तुळशीला इंग्रजीत बासिल म्हणतात. हिंदीत विश्व पूजिता ,विश्व पावन, भारवी, पावनी, त्रिदशमंजिरी, पत्रपुष्पा, अमृता, श्रीमंजरी, बहुमंजरी, वृंदा ,वैष्णवी, अशी अनेक नावे आहेत. विठोबाच्या गळ्यातील तुळशीला वैजयंती म्हणतात.

….. तुळशीवरून काही वाक्प्रचार देखील आपण वापरत असतो.

१) तुळशी उचलणे म्हणजे शपथ घेणे.

२) तुळशी उपटून भांग लावणे म्हणजे चांगल्या माणसाला काढून वाईट माणसाची संगत धरणे

३) तुळशीच्या मुळात कांदा लावावा लागणे म्हणजे चांगले हेतू साध्य करण्यासाठी वाईट साधनांचा  उपयोग करण्याविषयीची सबब सांगणे.

४) तुळशीत भांग उगवणे म्हणजे चांगल्या माणसांच्या समुदायात चुकून एखादा वाईट माणूस आढळणे.

५) तुळशीत भांग व भांगेत तुळस उगवणे म्हणजे चांगल्या आणि वाईट गोष्टी एकाच ठिकाणी असणे.

६) तुळशीपत्र कानात घालून बसणे म्हणजे ऐकले न ऐकलेसे करून स्वस्थ बसणे.

७) घरादारावर तुळशीपत्र ठेवणे म्हणजे घरादाराचा त्याग करणे.

—–तिचा विवाह केल्यास कन्यादानाचे महत्त्व प्राप्त होते. विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होतात. तुळस हे लक्ष्मीचे रूप आहे. 

महाप्रसाद जननी

सर्व सौभाग्यवर्धिनी

आधिव्याधी हरा नित्यं

तुलसी त्वं नमोऽस्तुते ||

 

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘हद्द…’ – भाग – 5 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘हद्द…’ – भाग – 5 ☆  श्री आनंदहरी  ☆ 

बसून घोटभर पाणी प्याल्यावर त्यांना जरा बरं वाटलं. काहीतरी आठवताच तात्या झटकन उभाच राहिले. ते अचानक उभा राहिल्याने त्यांच्याकडे आश्चर्याने आणि घाबरून पाहणारी बायको त्यांना काहीतरी विचारणार तोच ते बॅटरी घेत म्हणाले,

“जरा त्याच्याकडे बघ. आलोच मी. “

” अहो पण…”

” आलोच..”

बायकोला पुढं काही बोलू न देता तात्या बॅटरी घेऊन बाहेर पडले आणि पुन्हा शेजारी आले. सावकाश कानोसा घेत साऱ्या ढिगाऱ्यावरून, तुळयांजवळून दोन तीनदा फिरले. कुठंच कण्हण्याचा आवाज येत नव्हता. त्यांना वाटत होतं जसा तो सापडला तशीच त्याची आईसुद्धा सापडेल. मनात आशा होती काहीच मागमूस लागत नाही म्हणल्यावर त्या दगड-मातीच्या मलब्यात गाडल्या गेल्या असणार.. आता जिवंत असण्याची तिळमात्र शक्यता नव्हती. ते निराश झाले, दुःखी-कष्टीही झाले. तात्या उदास मनाने घरी परतले. तात्यांची बायको त्याच्याजवळ बसली होती. तिने त्याचा चेहरा पुसून काढला होता.. जखम दिसेल तिथं हळद भरलो होती. रक्तस्त्राव थांबला होता. तो बेशुद्ध होता.

तात्यांना आल्याचे पाहताच त्यांच्या बायकोने त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तात्यांनी नकारात्मक मान हलवली तेंव्हा त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. आत येताच तात्यांनी चिंब भिजून निथळत असलेले त्यांचे कपडे बदलले. पाऊस मंदावला होता पण होताच.

” गावात पोलीसपाटलांकडे जाऊन येतो. “

हातात बॅटरी आणि छत्री घेत तात्या म्हणाले तसे त्यांच्या बायकोने हातानेच त्यांना थांबायची खूण केली. आत जाऊन चहा करून आणून तात्यांच्या हातात देत त्या म्हणाल्या,

” रात्रभर भिजलाय, चहा घ्या न् जावा. “

चहा पिता पिता त्यांची नजर  तात्यांच्या सालटे निघालेल्या पायाकडे गेली.

” अहो, हे काय लागलंय ?”

” काही नाही गं.. याला बाहेर काढताना जरासे खरचटलंय..”

” अहो, सांगायचंत तरी ..? “” अगं, वेळ कुठली ? अन् त्यात सांगण्यासारखं काय आहे  ? “

त्यांनी आतून हळद आणली. तात्यांच्या पायाला खरचल्याजागी लावली.

” जावा पण काळजी घ्या.. आणि आता फटफटायला लागलंय.”

” वेळेचं काही भानच राहिलं नाही बघ. “

बॅटरी फडताळात ठेवत तात्या म्हणले आणि छत्री  घेऊन बाहेर पडले.

गावात जाऊन तात्यांनी पोलीस पाटलांना सगळं सांगितले. गावात बऱ्याच ठिकाणी पडझड झाली होती पण ती किरकोळ होती. जीवघेणी पडझड त्याच्या घराचीच झाली होती.. सारे घरच भुईसपाट झाले होते. थोड्याच वेळात बातमी साऱ्या गावात पसरली.पडत्या पावसातही सारं गाव गोळा होऊन त्याच्या घराकडे धावले. तुळया बाजूला झाल्या, दगड माती बाजूला झाली. स्वयंपाकघराची भिंत आतल्या बाजूला त्याच्या आईच्या अंगावर पडली होती. बिचारी झोपल्या जागीच, झोपेतच गेली असावी.

गावातील डॉक्टरही धावून आले होते. तो बेशुद्धच होता. डॉक्टरनी त्याला तपासून औषधेही दिली होती. तात्या, त्यांची बायको त्याची काळजी घेत होते. त्या दोघांनाही त्याच्याबद्दल वाईट वाटत होते.. काही महिन्यांपूर्वी त्याचे वडील गेले होते.. अगदी अचानक आणि आत्ता आई गेली होती. तो पोरका झाला होता. डॉक्टरांच्या उपचाराने  तो दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आला. शुद्धीवर येताच त्याने सभोवती नजर फिरवली. तो तात्यांच्या घरात होता. तात्या आणि त्यांची बायको समोर काळजीभरल्या डोळ्यांनी त्याच्याकडेच पाहत होते.

त्याला घराची भिंत पडल्याचे आठवले.. आपण आईकडे माजघराकडे जात असतानाच अंगावर भिंत कोसळून पडल्याचे आठवले.

” आई ss ! “

तो ओरडला तसे तात्यांची बायको त्याच्याजवळ आली आणि त्यांनी त्याला जवळ घेतले. तात्याही जवळ आले. त्या दोघांचेही वाहू लागलेले डोळे पाहून तो समजायचे ते समजला आणि ‘ आईss !’  म्हणून त्याने हंबरडा फोडला. तात्यां त्याच्या पाठीवरून हात फिरवत होते.

तात्यांचा, त्यांच्या बायकोचा तो मायेचा, आधाराचा स्पर्श जाणवला तेंव्हा त्याला तात्यांशी असणारे त्याचे वागणे, बोलणे आठवले. आपण त्यांच्याशी तसे वागूनही ते सारे विसरून संकटात तात्या धावून आले होते. त्यांनी तसल्या परिस्थितीतही प्रयत्नांची शिकस्त करून त्याला वाचवले होते. त्याला अपराधी वाटू लागले होते. तो क्षमायाचना करणारे काहीतरी बोलणार तितक्यात  जवळ घेत तात्या त्याला म्हणाले,

” काही बोलू नकोस पोरा. जशी ती दोन माझी मुलं तसा तू तिसरा…”

आणि त्याच्या, तात्यांच्या डोळ्यांतून घळाघळा आसवे वाहू लागली होती. त्या आसवांच्या पुरात त्यांच्या मनातील ‘हद्द ‘ ही पार विरून गेली होती, वाहून गेली होती.

समाप्त

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दोन चित्रे – लेखक -अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ दोन चित्रे – लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

आईने तिच्यासाठी शब्दकोडे, चित्रकोडे यांचे पुस्तक आणले होते. आधी ती हरखून गेली. तिनं मग ते पुस्तक उघडले. पहिलाच खेळ होता– मांजराला माश्याकडे मार्ग दाखवा. तिनं पेन्सिलीने रेघांची वेटोळी ओलांडून क्षणात ते कोडं ओलांडलं. पुढचा खेळ होता योग्य जोड्या जुळवा– तिनं क्षणार्धात मोची आणि चप्पल, शिंपी आणि सदरा, डॉक्टर आणि औषध, सुतार आणि कपाट, असं सगळं जुळवलं. 

आई कौतुकाने ते बघत होती. पुढ़च्या शब्दखेळाला ती थबकली – थोडीशी हिरमुसली. तिनं ते पुस्तक बाजूला ठेवले. आई ते बघत होती. 

” काय झालं बाळा, तुला नाही आवडलं का पुस्तक.” 

“तसं नाही आई, मला तो पुढला चित्रखेळ नाही आवडला. ‘ दोन चित्रातील फरक ओळखा.’ –आई मला दोन चित्रातला फरक नाही ओळखता येत.”

आई म्हणाली, “अगं सोपाय. बघ ह्या चित्रात चेंडू लाल रंगाचा आहे, त्या चित्रात हिरवा. ह्या झाडावर पक्षी बसलेला आहे, त्या झाडावर नाहीये.” 

“आई मला फरक ओळखायला नाही आवडत. उलट दोन्ही चित्रात साम्य किती आहेत. ह्या मुलाकडाची बॅट आणि त्या मुलाकडची बॅट सारखी आहे. दोघांची टोपी सारखी आहे. दोन्ही मैदानावर गवत आहे, सुंदर हिरवे गार. दोन्ही चित्रात खूप खूप सुंदर, सारखी झाडं आहेत. दोन्हीकडे सूर्य सारखाच हसतोय. दोन्ही ढग सारखेच सुंदर आहेत. दोन्ही चित्रात इतकी अधिक साम्य असतांना, आपण जे थोडेसे फरक आहेत ते का शोधत बसतो.” 

आई एकदम चमकली— किती सहज सोपं तत्वज्ञान आहे हे. आपण आपला पूर्ण वेळ चित्रातला फरक शोधण्यात  घालवतो, पण हे करतांना आपण दोन चित्रातली साम्य– जी चित्रातल्या फरकांपेक्षा अधिक आहेत, ती लक्षात घेत नाही.

मुलांच्या बाबतीत सुद्धा अगदी हेच करतो. ‘ ती समोरची मुलगी आपल्या मुलीपेक्षा अधिक उंच आहे. वर्गातल्या बाजूचा मुलगा गणितात अधिक हुशार आहे, ती दुसरी मुलगी माझ्या मुलीपेक्षा छान गाते.’ —- आपण केवळ आणि केवळ फरकच शोधत बसतो आणि साम्यस्थळे अगदी आणि अगदी विसरून जातो.

आईने तो चित्रखेळ पुन्हा उघडला. त्यावर ‘ दोन चित्रातील फरक ओळखा ‘ मधील ‘फरक’ हा शब्द खोडून त्या जागी ‘साम्य’ हा शब्द लिहिला. आता तो खेळ ‘ दोन चित्रातील साम्य ओळखा ‘ असा गोमटा झाला होता. मुलीने हसुन तो खेळ सोडवायला घेतला. आईने मुलीला जवळ घेतले. 

दोन्ही चित्रे आता एक होऊन त्यातील फरक मिटला होता. आता त्यात राहिले होते ते फक्त आणि फक्त साम्य—आणि अमर्याद पॉझिटिव्हिटी.

लेखक – अनामिक.

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिवाळी : एक आठवण ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

परिचय

शिक्षण- एम.ए.,एम.एस.डब्ल्यू.,डी.एल.एल.अॅन्ड एल.डब्ल्यू, एम.फिल ,पी.एच.डी.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातून प्राध्यापक पदावरून सेवानिवृत्त . कार्यकाळात अध्यापन, संशोधन व क्षेत्रकार्य केले.

प्रकाशित लेखन-

– कवितासंग्रह- हिरवी चाहूल, प्राजक्त, प्राजक्ताची चाहूल.

– पुस्तके- असंघटित कामगार, राजाज्ञा(छ.रा.शाहू महाराजांचे आदेश, आज्ञापत्रे इ.) ,साक्षरता खेळ,जोतीसंवाद, केल्याने होत आहे रे,महान महात्मा फुले.

इतर- क्रांतिरत्न

क्रांतिरत्न (इंग्रजी आवृत्तीत लेखन- आगामी),सूर्याच्या लेकी महाग्रंथात लेखन (आगामी).

याशिवाय विविध वृत्तपत्रे, नियतकालिकांतून, दिवाळी अंकातून सतत लेखन. आकाशवाणी,दूरदर्शन व विविध वाहिन्यांवरून मुलाखती आणि विविध विषयांवर कार्यक्रम.

शैक्षणिक कार्याबरोबरच अध्यासनाच्या वेबसाईटची निर्मिती केली.

विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागात(पूर्वीचा प्रौढ, निरंतर शिक्षण आणि विस्तार विभाग) पुढील डाॅक्युमेटरीजचे संहितालेखन केले –

– विस्कळीत, disrupted, यशोगाथा प्रौढ शिक्षणाची,हा धन्य महात्मा झाला.

अनेक वृत्तपत्रे, नियतकालिकांतून विविध विषयांवर सतत लेखन.

सदस्यत्व-

– Indian Adult Education Association, New Delhi.

– Indian University Association for Continuing Education, New Delhi.

– Asian Network for Comparative Adult Education.

– Pune University Teachers Association,

Savitribai Phule Pune University, Pune.

-Dr.Babasheb Ambedkear Teachers Organization, University of Pune, Pune.

– Paragon (Organization of Teachers) .

– Vishwa Marathi Parishad,Pune.

– Mahatma Phule Samta Pratishthan .

– Kavyanand Pratishthan, Pune .

बाली व माॅरिशस येथे आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदांत सहभाग व पेपर सादरीकरण.

विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांत सतत सहभाग.

??

☆ दिवाळी : एक आठवण ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

पुणे विद्यापीठात प्रौढ शिक्षण प्रकल्प अधिकारी म्हणून मी नोकरीला लागलो. तेव्हा पुणे,अहमदनगर, नाशिक,  जळगाव आणि धुळे जिल्ह्य़ातील  काॅलेजं विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात होती. ऑफिसबरोबरच भरपूर फिल्ड वर्कचं आमचं काम होतं. महिन्यातून दहा- पंधरा दिवस आम्ही बाहेरगावी जात असू. काॅलेजमध्ये गेल्यावर विद्यार्थ्यांपुढे भाषण, प्राध्यापकांशी चर्चा, प्रौढ शिक्षणातील संघटनांबरोबर बैठक, असा दिवसभरातील व्यग्र कार्यक्रम. नंतर 

दुपारचं जेवण. थोडीशी विश्रांती झाल्यावर दूरवर कुठंतरी  गावात प्रौढ शिक्षण केंद्र पहायला जायचा कार्यक्रम असायचा.

असाच एकदा एका काॅलेजला गेलो होतो. नुकतीच दिवाळी संपली होती. हवेत गारठा होता. सायंकाळी काॅलेजच्या प्रौढ शिक्षण कार्यक्रम अधिकारी प्राध्यापकांसोबत दूरवरच्या खेड्यातल्या एका प्रौढ शिक्षण केंद्रावर आम्ही पोहोचलो. ते महिलांचे प्रौढ शिक्षण केंद्र होते.घरातील जेवणं, भांडी धुण्याची कामं आटोपून केंद्रात महिला यायला वेळ होता. तोपर्यंत  प्राध्यापकांबरोबर गप्पा मारत बसलो. महिला आल्यावर प्राध्यापकाने माझी ओळख करून देऊन माझे स्वागत केले. 

“ पुण्याहून आलेले  हे साहेब तुम्हाला आता मार्गदर्शन करतील “– असं सांगून ते बसले. हाताची घडी घालून महिला 

मी काय बोलतो हे कान देऊन ऐकू लागल्या. ” मार्गदर्शन वगैरे नाही.आपण सगळेजण गप्पा मारू ” असं सांगून मी  ते टेन्स वातावरण हलकं केलं.

” हे बघा,नुकतीच दिवाळी संपली आहे.कुणी कुणी काय काय केलं हे सांगा. सगळ्यांनी बोलायचं बरं का “.

” आम्ही लाडू,करंज्या, शंकरपाळया केल्या, मुलांनी फटाके वाजवले,आकाशकंदील लावले इ.इ.” हे असं सगळं मला अपेक्षित होतं.—–पण महिलांनी दिलेली उत्तरं ऐकून मी बधिर झालो. काय काय म्हणाल्या महिला ?—-

” सायेब, आम्ही गावातल्या आमक्या तमक्याच्या वावरात कामाला गेलो वतो. पोरांना शाळेच्या सुट्ट्या होत्या. त्यांना

  पन घिवून गेलो वतो .”

” आवं सायेब,  आमाला कुनीच नौतं बोलौलं. घरीच वतो या दिवाळीला “.

”  पोरांचा आजा कवापासून आजारीच हाये. वरल्या आळीतल्या रामू पवाराकडून गंडा बांदून घेत्ला या दिवाळीत.     पण नौरात्राच्या चौथ्या माळेला म्हतारा ग्याला “.

खरं तर मी यांना मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा होती. मात्र झालं उलटंच. या महिलांनीच मला स्वतंत्र भारतातील करूण वास्तव शिकवलं. कुठल्याच पुस्तकात मी हे वाचलं नव्हतं.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ.

ईमेल- [email protected]
मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रिय वास्तू पुरुषास ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रिय वास्तू पुरुषास ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे  ☆

साष्टांग नमस्कार विनंती विशेष.

झालं असं की, एकजण घरी आले होते. ते बोलता बोलता म्हणाले ” वास्तू प्रसन्न आहे हं तुमची ” – आणि तुझी प्रथमच प्रकर्षाने आठवण झाली. तुझी वास्तुशांती करून, काही वस्तु जमिनीत पुरून, जेवणावळी केल्या, की तुला विसरूनच जातो रे आम्ही… मग उरतं ते फक्त  घर… तुझ्या खंबीर पाठिंब्याकडे अगदी पूर्ण कानाडोळा केला जातो !!—-  अगदी अपराधी वाटलं… मग काय तुझ्याशी पत्र संवाद करण्याचं ठरवलं..‌. म्हणून आज हे पत्र !

तुझ्याविषयी विचार करताना कितीतरी गोष्टी प्रथमच लक्षात आल्या… जिथे तू प्रसन्नपणे वावरतोस ते घरकुल खरंच सोडवत नाही…

घरात बसून कंटाळा येतो म्हणून प्रवासाला म्हणजे पर्यटनाला गेलो, तर चार दिवस मजेत जातात. पण नव्याची नवलाई संपते आणि घराची ओढ लागते…

आजारपणात डॉक्टर म्हणतात–” आराम पडावा म्हणून ऍडमिट करा “– पण तुझ्या कुशीत परतल्याशिवाय कोणाच्याही प्रकृतीला आराम पडत नाही हेच खरं… !

तुझ्या निवाऱ्यातच अपरिमित सुख आहे —

अंगणातील छोटीशी रांगोळी स्वागत करते, 

दारावरचं तोरण हसतमुखाने सामोरं येतं, 

तर उंबरा म्हणतो ‘ थांब लिंबलोण उतरू दे…’

 बैठकीत विश्वास मिळतो, तर माजघरात आपुलकी !

स्वयंपाकघरातील प्रेम तर दुधाच्या मायेनं ऊतू जातं !

तुझ्या आतल्या देव्हाऱ्यात बसलेली मूर्ती मनातील भीती पळवून लावते,

—–खरंच वास्तुदेवते या सगळ्यामुळे तुझी ओढ लागते.

तुझी शिकवण तरी किती बहुअंगी —

खिडकी म्हणते ‘ दूरवर बघायला शिक,’ 

दार म्हणतं ‘ येणाऱ्याचं खुल्या मनाने स्वागत कर,’

भिंती म्हणतात ‘ मलाही कान आहेत परनिंदा करू नकोस,’ 

छत म्हणतं ‘ माझ्यासारखा उंचीवर येऊन विचार कर,’ 

जमीन म्हणते ‘ कितीही मोठा झालास तरी पाय माझ्यावरच असू देत ‘ 

तर बाहेरचं  कौलारू छप्पर सांगतं ‘ स्नेहाच्या पंखाखाली सगळ्यांना असं काही शाकारून घे, की बाहेरची शोभा आतून दिसेल आणि कुणालाही ऊन, वारा, पाऊस लागणार नाही ! ‘

इतकंच नाही तर तू घरातील मुंग्या, झुरळं, पाली, कोळी,  यांचाही आश्रयदाता आहेस. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्थाही तूच तर बघतोस आणि निसर्गाच्या अन्नसाखळीला हातभार लावतोस… 

— इतकं मोठं मन आमचंही व्हावं असा आशीर्वाद आम्हाला दे…

तुझ्या वाटणीसाठी दोन भाऊ कोर्टात जातात आणि वकिलांची घरं उभी रहातात याचं खरंच वाईट वाटतं…

एकत्र कुटुंब पद्धतीकडून एकल कुटुंब पद्धतीकडे वेगाने निघालोय आम्ही…….  पण तरीही शेवटी ‘ घर देता का कोणी घर ‘ ही नटसम्राटाची घरघर काही संपली नाही रे ! कारण जिथे तुझ्या प्रसन्नतेच्या खाणाखुणा नाहीत ते घर नसतं… ते बांधकाम असतं रे… विटा-मातीचं.

वास्तू देवते, पूर्वी आई-आजी सांगायची…’ नेहमी शुभ बोलावं म्हणजे आपल्या बोलण्याला वास्तूपुरूष नेहमी तथास्तु म्हणत असतो ‘ —– मग आज इतकंच म्हणतो की —

” तुला वस्तू समजून विकायचा अट्टहास कमी होऊन, तुझ्या वास्तूत वर्षातून काही क्षण तरी सगळी भावंडं, मित्रमैत्रिणी, सगेसोयरे, आप्तेष्टं एकत्र वास्तव्यास येऊ दे…”

—” आणि या माझ्या मागण्याला तू तथास्तु असं म्हणच… हा माझा आग्रह आहे.” 

 ll वास्तूदेवताभ्यो नम: ll 

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ च म त्का र ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? 💓 च म त्का र ! 💃 ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक 

☆ 

गोड गुलाबी दोन जीवांचा

मूक संवाद नजरेत भरला

पाहून प्रेमाची मुग्ध भाषा

मम हृदयी पीळ तो पडला

बघता निरखून प्रेमिकांना

  ठोका काळजाचा चुकला

अनोख्या फुलांचा चमत्कार

निसर्गाने होता घडवला

छायाचित्र  – मोहन कारगांवकर, ठाणे.

© प्रमोद वामन वर्तक

ठाणे.

०६-११-२०२२

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आतिश का तरकश #165 – 51 – “मिटा दे अपनी हस्ती ग़र…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी  ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं ।प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकशआज प्रस्तुत है आपकी ग़ज़ल “मिटा दे अपनी हस्ती ग़र …”)

? ग़ज़ल # 51 – “मिटा दे अपनी हस्ती ग़र …” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ?

अदब की महफ़िल में यार तू शायरी कर,

मत यूँ ही अल्फाज़ की तू जादूगरी कर।

क्यों लागलपेट की बात करता तू उठते बैठते,

कर जुमलों दरकिनार एक बात तो खरी कर।

क़ीमतों की मार से बेबस को राहत तो मिले,

शहंशाह है बीमार की कुछ तो चारागरी कर।

अदब-तहजीब को धंधा बनाये कुछ सुख़नवर,

अय कलम ईमान भूलों की मत चाकरी कर।

फ़िरक़ा परस्ती मिट जाए लोगों के दिलों से,

यार सोच समझ कर कुछ तो सौदागरी कर।

मिटा दे अपनी हस्ती ग़र कोई मर्तबा चाहे है,

मुल्क को ख़ुशनुमा खुद को ख़ुदी से बरी कर।

दिल में कुछ ईमान रखकर ज़ाया कर मंदिर,

मुफ़्त में वोटों के लिए मत तू यायावरी कर।

दिल मे हैं तामीर उसके मंदिर ओ’ मस्जिद,

रियाया को मिले धंधा ऐसी तू बाज़ीगरी कर।

शौक़ हुकूमत का पाल बख़ूबी तू सियासत कर,

मुल्क में अमन वास्ते ‘आतिश’ कारीगरी कर।

© श्री सुरेश पटवा ‘आतिश’

भोपाल, मध्य प्रदेश

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ “श्री हंस” साहित्य # 42 ☆ मुक्तक ।। वरिष्ठ नागरिक, जिंदगी की शाम नहीं, इक नया सवेरा है ।।☆ श्री एस के कपूर “श्री हंस”☆

श्री एस के कपूर “श्री हंस”

(बहुमुखी प्रतिभा के धनी  श्री एस के कपूर “श्री हंस” जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त अधिकारी हैं। आप कई राष्ट्रीय पुरस्कारों से पुरस्कृत/अलंकृत हैं। साहित्य एवं सामाजिक सेवाओं में आपका विशेष योगदान हैं।  आप प्रत्येक शनिवार श्री एस के कपूर जी की रचना आत्मसात कर सकते हैं। आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण मुक्तक ।।वरिष्ठ नागरिक, जिंदगी की शाम नहीं, इक नया सवेरा है।।)

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ “श्री हंस” साहित्य # 41 ☆

☆ मुक्तक  ☆ ।। वरिष्ठ नागरिक, जिंदगी की शाम नहीं, इक नया सवेरा है ।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस” ☆ 

[1]

जिंदगी की शाम नहीं इक नया सबेरा है।

यह तो जीवन की दूजी पारी का फेरा है।।

अनुभव और दुनियादारी का है अवसर।

हर पल हो उपयोग कि चार दिन का डेरा है।।

[2]

बदलते समय से अपना नाता जोड़ना है।

नई पीढ़ी को सही दिशा में मोड़ना है।।

अनुभव संपन्न विनम्र और संयमशील उम्र यह।

भूले बिसरे शौकों का हर पत्ता अब तोड़ना है।।

[3]

दुनियादारी का हर कर्ज लौटाने का वक्त है।

रिश्ते नाते का हर फर्ज निभाने का वक्त है।।

इस सफर ने जाने अंजाने सिखाया बहुत कुछ।

किस्से कहानी की हर तर्ज सुनाने का वक्त है।।

[4]

निराशा असंतोष को जीवन में पाना नहीं है।

अवसाद अकेलापन जीवन में लाना नहीं है।।

बुढ़ापा नहीं  वरिष्ठता को हमें है अपनाना।

अपने  अनमोल दोस्तों को छोड़ जाना नही है।

[5]

हर लम्हा जिंदगी जीने का अरमान जगाना है।

छोटी छोटी खुशी का भी जश्न मनाना है।।

उम्र हमारी सोच पर हावी ना होने पाए।

एक ही मिली जिंदगी कि यादगार बनाना है।।

© एस के कपूर “श्री हंस”

बरेली

ईमेल – Skkapoor5067@ gmail.com

मोब  – 9897071046, 8218685464

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares
image_print