हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 105 ☆ # मैंने अपनी कलम तोड़ दिया है… # ☆ श्री श्याम खापर्डे ☆

श्री श्याम खापर्डे

(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है दीप पर्व पर आपकी एक भावप्रवण कविता “#मैंने अपनी कलम तोड़ दिया है…#”

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 105 ☆

☆ # मैंने अपनी कलम तोड़ दिया है… # ☆ 

जब मैंने कलम उठाई

तो सोचा

बस सच ही लिखूंगा

चारण और भाटों सा नहीं बिकूंगा

कुछ अलग होगी छवि मेरी

सिद्धांतों से कभी नहीं डिगूंगा

 

मेरे शब्द जब उनको चुभने लगे

अपने अहंकार में जब वो डूबने लगे

खतरे में पड़ा जब उनका अस्तित्व

वो हर गली चौराहे पर मुझे ढूंढने लगे

 

मेरे कलम का बहिष्कार कर दिया

मेरे खिलाफ दिलों में नफ़रत भर दिया

जो उसे पढ़ेगा वो विद्रोही कहलायेगा

मुझे कवि मानने से ही इनकार कर दिया

 

मेरे साथ आज कोई खड़ा नहीं है

मेरे हक के लिए कोई लड़ा नहीं है

गुमनाम सा जी रहा हूं अपने ही शहर में

मेरा वजूद जिंदा है, अभी मरा नहीं है

 

ऐसे समाज में मैं लिख के क्या करूं?

किसके लिए जीऊँ, किसके लिए मरूं

पत्थर से हो गये हैं जीते जी यहां

किस किसके सीने में जान फूंकता फिरूँ

 

आज मैंने अपनी कलम तोड़ दिया है

आज से मैंने लिखना छोड़ दिया है

अंधों, गूँगों, बहरों की नगरी में

पत्थरों पर सर फोड़ना छोड़ दिया है /

© श्याम खापर्डे

फ्लेट न – 402, मैत्री अपार्टमेंट, फेज – बी, रिसाली, दुर्ग ( छत्तीसगढ़) मो  9425592588

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

? श्री सुहास रघुनाथ पंडित – अभिनंदन ?

💐 संपादकीय निवेदन 💐

आपल्या ई-अभिव्यक्ती साहित्य मंचाचे ज्येष्ठ संपादक श्री सुहास रघुनाथ पंडित यांना, त्यांच्या “शिक्षा“ या कथेसाठी, ज्येष्ठ साहित्यिक श्री अरुण सावळेकर प्रस्तुत, ‘आरती‘ मासिक आयोजित कथा-लेखन स्पर्धेत (सन २०२२ ) प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

श्री. पंडित यांचे आपल्या संपूर्ण ई-अभिव्यक्ती परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि अशा दर्जेदार विपुल लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा ?

आजच्या अंकात वाचूया त्यांची “ शिक्षा “ ही पुरस्कृत कथा. 

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ !! सूर्य !! ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ !! सूर्य !! ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

आला दिनकर पूर्वेस

सुवर्ण रश्मी घेऊन हजार

आला आसमंत उजळत

रंग आकाशी पसरे चौफेर

 

आरक्त लाली क्षितीजावर

जाहली सुरू पक्षांची किलबिल

करती कलरव कलकल

दशदिशा करती पुकार

 

सूर्याच्या किरणांनी

जाग पापण्यांना आणली

किमया त्या किरणांची

ओल्या दवांनी जाणली

 

ललना घेऊनी घट कमरेवरी

शिंपती जल अंगणी

रेखूनी सडा- रांगोळी

सजविती अंगणी…!!

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 106 ☆ कुठे हरवली प्रीत… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 106 ? 

☆ कुठे हरवली प्रीत… ☆

(दश अक्षरी) 

कुठे हरवली प्रीत सांगा

तुटला कसा प्रेमाचा धागा…०१

 

स्नेह कसे आटले विटले

तिरस्काराचे बाण रुतले…०२

 

अशी कशी ही बात घडली

संयमाची घडी विस्कटली…०३

 

मधु बोलणे लोप पावले

जसे अंगीचे रक्त नासले…०४

 

तिटकारा हा एकमेकांचा

नायनाट ऋणानुबंधाचा…०५

 

अंधःकार भासतो सर्वदूर

लेकीचे तुटलेच माहेर…०६

 

भावास बहीण जड झाली

पैश्याची तिजोरी, का रुसली…०७

 

कोडे पडले मना-मनाला

गूढ उकलेना, ते देवाला…०८

 

माणूस मी कसा घडवला

होता छान, कसा बिघडला…०९

 

राज विषद, मन मोकळे

सु-संस्कार, सोनेचं पिवळे…१०

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग – ४३ – आशिया ते अमेरिका प्रवास ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग – ४३ – आशिया ते अमेरिका प्रवास ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

परिव्राजक म्हणून स्वामी विवेकानंद या आधी भारतात हवे तसे फिरले होते. पण हा प्रवास तसा नव्हता, आजही ते परिव्राजक होते, पण ही भ्रमंती ठरल्याप्रमाणेच, ठरलेल्या दिशेने आणि एका शिस्तीनेच करायची होती. तेरा हजार किलोमीटर अंतरावर जायचे होते.भारत भ्रमणात दरवेळी फिरताना त्यांच्याकडे सामान नसे. आता मात्र समान होते आणि पैसेही होते गरज म्हणून. सोय म्हणून. विवेकानंदांना याची सवय नव्हती. जहाजाचा प्रवास, सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण, वागण्या बोलण्यातले शिष्टाचार पाळणे याला ते हळूहळू सरावले.

त्यांच्या या पी अँड ओ कपंनीच्या पेनिन्शूलर जहाजातून याच वेळी मुंबईचे शेठ छबिलदास जपानला आणि भारतातील औद्योगिक युगाचे प्रवर्तक मानले जाणारे सर जमशेटजी टाटा शिकागोसाठीच प्रवास करत होते. एक आठवड्याने पहिला पडाव झाला एक दिवसाचा, सिलोन म्हणजे श्रीलंकेतील कोलंबो इथं.विवेकानंद शहरातून फिरून आले, नंतर जहाज पेनांगला थोडा वेळ थांबून, हाँगकाँगला आले. सिंगापूर, मलाया सुमात्रा यांचे दर्शन जहाजावरूनच झाले होते. हाँगकाँगला त्यांना खलाशी, कामगार, तिथले लोक यांचा व्यवहार पाहून तिथल्या दारीद्र्याची कल्पना आली. स्त्रियांची स्थिति समजली .अनेक गोष्टींची निरीक्षणे त्यांनी केली. चीनी मंदिरे आणि भारतीय मंदिरे पाहिली. कॅन्टनमध्ये चीनमधला पहिला बुद्धधर्मीय सम्राट आणि त्याचे पाचशे शिष्य यांच्या स्मरणार्थ उभे केलेले सर्वात मोठे बुद्धमंदिर पहिले. पण इथला बौद्ध मठ कसा असतो याची त्यांना उत्सुकता होती,

इथे एक मजेदार घटना घडली. गाईडने बुद्ध मठाजवळ विवेकानंदांना नेलं, पण कुणाला आत प्रवेश नव्हता. विवेकानंदांनी कसेबसे त्याला मनवून आत प्रवेश केला तेव्हाढ्यात आतून दंडुके घेऊन काही लोक आले. बरोबरचे प्रवासी बाहेर पाळले, पण विवेकानंद यांनी त्या माणसाचा हात धरून ठेवला आणि त्याला म्हटले, चीनी भाषेत ‘भारतीय योगी’ याला काय शब्द आहे? त्याने शब्द सांगितला. विवेकानंद जागचे हलले नाहीत. ठामपणे उभे राहिले आणि धावत येणार्‍या लोकांना त्या शब्दात आपण भारतीय योगी आहोत हे मोठयाने सांगितले. तसे चमत्कार झाला, सर्वांनी दंडुके खाली घेतले आणि सर्वजण नम्रपणे उभे राहिले.त्या मठवासी लोकांनी विवेकानंदांना हात जोडून विनंती केले की,भुते खेते आणि पिशाच्च यांची बाधा होऊ नये म्हणून तुम्ही ताईत द्यावेत . विवेकानंदांचा यावर अजिबात विश्वास नव्हता. पण हा विचार करण्याची ही वेळ नव्हती. त्यांचे समाधान करणे भाग होते. विवेकानंदांनी जवळचा कागद काढला, दोन तुकडे केले, त्यावर आडव्या उभ्या रेघा मारल्या, मधोमध ओम अक्षर लिहिले. आणि त्यांना दिले. त्याबरोबर त्यांनी आदराने तो घेतला आणि कपाळाला लावला. हे त्यांचे अज्ञान बघून विवेकानंदांना खूप कीव आली. याच जोडीला त्यांचे दारिद्र्य, अस्वच्छता हेही दिसले. नंतर त्या लोकांनी मठाच्या आतील भागात नेले तिथे, जुन्या हस्तलिखित पोथ्या ठेवल्या होत्या.त्या संस्कृतमध्ये होत्या आणि लिपी बंगाली होती. याचं त्यांना फार आश्चर्य वाटलं. तिथे बुद्ध मंदिरात पाचशे अनुयायांपैकी काहींचे चेहरे विवेकानंदांना बंगाली वाटले होते. मग त्यांच्या लक्षात आले की, बुद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी भारतातून जे भिक्षू गेले होते त्यापैकी अनेक बंगाल मधून गेले असले पाहिजेत. 

हाँगकाँग सोडल्यानंतर जहाज नागासकी बंदरात थांबले होते. जपान मध्ये शिरताच त्यांना चीन आणि जपान यातला प्रचंड फरक जाणवला होता. त्यांना जपान मध्ये दिसलं होतं, स्वच्छता, नीटनेटकेपणा, प्रत्येक बाबतीतली सौंदर्य दृष्टी, आधुनिक विज्ञानाचा केलेला स्वीकार, याचा त्यांच्या मनावर प्रभाव पडला होता.सरळ आणि रुंद रस्ते, शहराची नीटशी रचना, घराभोवती बगीचे, अशा शिकण्यासारख्या अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. त्यांना मनोमन वाटलं की जास्तीत जास्त भारतीय तरुणांनी जपानला एकदा तरी भेट दिली पाहिजे, इथेही त्यांना जपानी मंदिरांमध्ये भिंतीवर जुन्या बंगाली लिपीत संस्कृत मंत्र लिहिलेले आढळले. चीन आणि जपान हे दोन्ही देश भारताशी नातं सांगणारे दिसले. भारताकडे आदराने पहाणारे दिसले. पण भारताची आजची स्थिति विवेकानंदांनी पाहिली होती. याची तुलना त्यांनी लगेच केली. त्यांनी इथूनच लगेच शिष्यांना एक पत्र लिहिलं आणि परखडपणे म्हटलं की,  “जरा इकडे या, हे लोक पहा आणि शरमेने आपली तोंडे झाकून घ्या. पण परंपरेने गुलाम असलेले तुम्ही इकडे कसे येणार?तुम्ही जरा बाहेर पडलात की लगेच आपली जात गमावून बसाल. गेली कित्येक शतके आपण काय करीत आलो आहोत?. ”               

आशियामधून अजून जहाज बाहेर पडायचे होते, नव्या जगात पोहोचायला साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास अजून बाकी होता, पॅसिफिक महासागर पार व्हायचा होता. तोवरच विवेकानंदांनी मनातली ही व्यथा आपल्या शिष्यांना पत्रातून कळवली होती.

चौदा जुलैला योकोहामाला जहाज बदलून ‘एम्प्रेस ऑफ इंडिया’ या जहाजात ते बसले. आशिया खंडाला मागे टाकून, पॅसिफिक महासागरातून नव्या दिशेकडे जहाज मार्गस्थ होत होते. भारतातून निघताना त्यांची तयारी अनुयायांनी छान करून दिली होती. पण त्यात गरम कपडे नव्हते. त्यामुळे हा थंडीतला प्रवास खूप त्रासदायक ठरला.

पंचवीस जुलै १८९३ला संध्याकाळी जहाज व्हंकुव्हरला पोहोचले. इथून रेल्वेने दुसर्‍या दिवशी शिकागोला जायचे होते. इथे पहिल्यांदा विवेकानंदांनी अमेरिकेच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवले.

अमेरिकेचा भूप्रदेश, उंच उंच पर्वत, खोल दर्‍या, पांढर्‍या शुभ्र हिमनदया, घनदाट अरण्ये, अशी निसर्गाची अनेक रुपे बघून त्यांचे मन प्रसन्न झाले. शिकागोकडे जाणार्‍या, या गाडीत अनेक देशांचे प्रवासी बसले होते. त्यात केट सॅनबोर्न ही पन्नाशीची बुद्धिवंत लेखिका होती, तिच्याशी विवेकानंद यांचा संवाद झाला. त्यांचा पत्ता घेतला. ओळख झाली. त्यांनी घरी येण्याचं निमंत्रण पण दिलं. ते पुढच्या मुक्कामात कामी आले.

तीस जुलैला विवेकानंद शिकागोला उतरले. इथल्या बारा दिवसांच्या सुरुवातीच्या वास्तव्यात एकामागून एक त्यांना धक्के बसले. पहिलं म्हणजे प्रचंड महागाई, रोज पाच डॉलर खर्च, दुसर म्हणजे सर्वधर्म परिषद सुरू होण्यास अजून पाच आठवडे बाकी आहेत, तिसरं म्हणजे या परिषदेला प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहायचे असेल तर, कोणत्या तरी संस्थेचे अधिकार पत्र आवश्यक आहे, चौथं म्हणजे प्रतिनिधी म्हणून नाव नोंदविण्याची मुदतच संपली आहे. आता कोणालाही प्रतिनिधी म्हणून प्रवेश मिळणार नाही. आता पुढे काय? हे मोठे प्रश्न चिन्ह उभे होते.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पुरस्कृत कथा – “शिक्षा” ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? जीवनरंग ❤️

☆ पुरस्कृत कथा – “शिक्षा” ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

स्टाफरुममध्ये कमालीची शांतता. सर्व स्टाफ माना खाली घालून बसलेला. प्रत्येकाची चोरटी नजर मात्र दुस-याच्या चेह-याकडे. दुस-याने बोलावे आणि ही शांतता भंग पावावी अशीच प्रत्येकाची इच्छा. पण बोलायला कोणीच तयार नाही. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न ‘‘सरांनी असा कसा निर्णय घेतला?” 

शाळेचे मुख्याध्यापक श्री.देशमुख सर शिस्तीसाठी प्रसिद्ध. कठोर शिस्त आणि उत्तम अध्यापन यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्यात ते जितके प्रिय होते तितकेच अप्रियही. त्यांचं शिकवणं प्रत्येकालाच आवडायचं. वर्ग कसा तल्लीन होऊन ऐकत बसायचा. तासाची घंटा वाजली तरी कुणी जागेवरून हलायला तयार नसायचं. पण जर का त्यांच्या शिस्तीच्या बाहेर गेलात तर मात्र शिक्षा ही होणारच हे सगळ्यांनाच ठाऊक होतं. त्यामुळे एकीकडे दरारा तर दुसरीकडे आदर असा संमिश्र भाव सगळ्यांच्याच मनात असायचा. 

पण मग असं काय झालं की सरांनी असा निर्णय घ्यावा? कुणाच्याही दडपणाला बळी न पडणारा हा माणूस आज असा वाकला कसा? 

झालं ते असं… राहूल आठवीच्या वर्गातील एक हुशार विद्यार्थी. कधी पहिला नंबर तर कधी दुसरा. त्याच्याखाली तो कधी गेलाच नाही. नुकतीच वार्षिक परीक्षा संपलेली. त्याला सगळे पेपर सोपे जाणार यात कुणालाच शंका नव्हती. पण एका पेपरला त्यानं केलेलं वर्तन आणि त्यानंतर श्री.देशमुख सरांनी घेतलेला निर्णय हा सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारा होता. पेपर होता चित्रकलेचा. कला शिक्षक वर्गावर लक्ष ठेवून होतेच. वर्गातून येरझा-या घालताना त्यांच्या नजरेला एक वेगळाच प्रकार दिसला. क्षणभर त्यांनाही वाटले की असे नसेल, भास असावा. ते भिंतीजवळ उभे राहून मुद्दम लांबून, पण आपले लक्ष नाही असे भासवून बारकाईने पाहू लागले. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला पण नाईलाज होता. ते बाकापाशी आले आणि राहूलला त्यांनी हातोहात पकडले. चित्रे काढण्यासाठी जे विषय दिले होते त्यातील एक विषय होता ‘वन्य प्राणी’. वन्यप्राण्याचे चित्र काढणे राहूलला अशक्य नव्हते. पण त्याने सिंहाच्या चित्राचा एक छाप आणला होता आणि त्यावरून तो उत्तरपत्रिकेत आऊटलाईन काढून घेत होता. हे कला शिक्षकांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी त्याची रवानगी थेट हेड सर देशमुखांच्या केबिनमध्ये केली. झाला प्रकार त्यांना सांगितला आणि पुढील निर्णय सरांच्या हाती सोपवून ते निघून गेले. 

चित्रकलेचा पेपर शेवटचा होता. देशमुख सरांनी राहूलला आपल्या केबिनमध्ये बसवून घेतले. पेपरची वेळ संपली. बघता बघता शाळा रिकामी झाली. थोड्या वेळानंतर सरांनी राहूलला घरी जाण्यास सांगितले. या मधल्या काळात त्यांचे काय बोलणे झाले आणि निर्णय काय झाला हे कुणालाच समजले नाही. दुस-या दिवसापासून सुट्ट्या सुरू झाल्यामुळे राहूलचे मित्र किंवा इतर शिक्षक यापैकी कुणाचीच भेट झाली नाही. आज निकालाच्या दिवशी शाळा परत एकदा गजबजून गेली होती. सर्वांची निकालपत्रे देऊन झाली होती. आठवीच्या क्लासटिचर कडून एव्हाना राहूलच्या चित्रकलेच्या पेपेरविषयी सर्वांना समजले होते. त्यामुळे राहूलच्या निकालाचे काय झाले याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. पण राहूल आठवीतून नववीत गेला होता. मात्र त्याचा नंबर ‘सातवा’ आला होता. राहूल नापास झाला नव्हता. कॉपी करूनही त्याला शिक्षा झाली नव्हती आणि याचंच सर्व स्टाफला आश्चर्य वाटत होतं. देशमुख सरांनी अशी ढिलाई का दाखवावी हेच कुणाच्या लक्षात येत नव्हतं. शेवटी देशमुख सरही चारचौघांसारखेच निघाले, तोंड बघून निर्णय घेतला या निष्कर्षापर्यंत सगळेजण येऊन पोचले. 

तिकडे स्टाफरुममध्ये काय चाललं असेल, काय कमेंटस् चालू असतील याची देशमुख सरांना कल्पना होतीच. त्यांनी शिपायाला बोलावून घेतले आणि लिहून झालेली नोटीस स्टाफरुममध्ये सर्वांना दाखवायला सांगितली. 

पाच मिनिटातच सर स्टाफरुममध्ये हजर झाले. स्टाफ मिटींगला त्यांनी सुरुवातच केली. शाळेच्या वार्षिक परिक्षेचा चांगला लागलेला निकाल, सहकारी शिक्षक-शिक्षिकांनी वर्षभर घेतलेले कष्ट, विविध स्पर्धातील यश या सर्वांचा उल्लेख करून सर्वांचे कौतुक केले आणि ते समारोपाकडे वळले, 

‘‘माझ्या सहकारी बंधू भगिनींनो, आता मी निरोपाकडे वळत आहे. पण मगापासून असलेली शांतता आणि तुमच्या चेह-यावर असणारी नाराजी याकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही. मला माहीत आहे की तुमच्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे, ‘‘सर, असं कसं वागू शकतात?” स्वत:ला शिस्तप्रिय म्हणवून घेणा-या सरांची शिस्त आता कुठे गेली? बरोबर ना? नाही, मी तुम्हाला अजिबात दोष देणार नाही. तुमच्या जागी मी असतो तर माझ्याही मनात हेच प्रश्न आले असते. मग मी असा का वागलो? मला माहीत आहे की, आठवीतल्या राहूलने चित्रकलेच्या पेपरला केलेला प्रकार एव्हाना तुम्हाला सर्वांना समजलेला आहे. त्यामुळे त्याला मी सैल का सोडले असं तुम्हाला वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण त्याचं स्पष्टीकरण देण्यापूर्वी मी तुम्हाला एक लहानशी गोष्ट सांगणार आहे. 

तुम्हा सर्वांना माहीत आहेच की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. इथे काहीसं तसंच घडलं आहे. एका मध्यम आकाराच्या शहरामध्ये एक अतिशय उत्तम हायस्कूल होतं. त्या शाळेचा दबदबा अख्ख्या तालुक्यात होता. त्याचं कारण म्हणजे त्या शाळेचे शिस्तप्रिय मुख्याध्यापक! शिस्त आणि अध्यापन या बाबतीत त्यांचा हात धरणारा जिल्ह्यात तरी दुसरा कुणी नव्हता. त्यांच्याच शाळेत असा एक प्रकार घडला की जो आपल्या शाळेत यावर्षी राहूलच्या बाबतीत घडला. त्यांच्या शाळेतील अशाच एका हुशार विद्यार्थ्याने चित्रकलेच्या पेपरमधील वर्तुळातील नक्षी काढण्यासाठी एका साधनाचा वापर केला होता की जे परिक्षेत वापरता येत नाही. त्यावेळेला त्याच्या शिक्षकांनी त्याला हातोहात पकडून त्याच्या हेडसरांपुढे उभे केले होते. आपलं आता काय होणार या विचाराने तो हुशार विद्यार्थी घामाने डबडबला होता. प्रगती पुस्तकावरील ‘नापास’ चा शेरा त्याला डोळ्यासमोर दिसू लागला होता. ‘कॉपी करणारा मुलगा’ हे वाक्य त्याच्या कानात घुमू लागले होते. 

हेडमास्तरांनाही आश्चर्य वाटले. अशा हुशार विद्यार्थ्याकडून कॉपी आणि ते ही चित्रकलेत? त्यांना खरंच वाटेना. खरं तर त्यांचा क्रोध अनावर होत होता. पण पुढे घामाने डबडबलेला आणि कुठल्याही क्षणी डोळ्यातून पाणी ओघळू लागेल अशा अवस्थेतला तो विद्यार्थी पाहून त्यांनी राग आवरता घेतला आणि त्याला खरं काय घडलं ते सांगायला सांगितलं. त्यानं जे सांगितलं ते अगदी खरं होतं. तो म्हणाला होता की, काही मुलांनी त्याला सांगितलं होतं की असा थोडासा वापर केला तर चालतं. त्याला ‘कॉपी’ म्हणत नाहीत. आम्हीपण करणार आहोत. त्याला ते खरं वाटलं आणि त्याने त्या साधनाचा वापर केला की ज्याला परवानगी नव्हती. तो पकडला गेला. त्याच्या सरांनी काही वेळ विचार केला आणि त्याला काही गोष्टी सांगून जायला सांगितले. मी ही तेच केलं. मी ही राहूलला काही गोष्टी समजावून सांगितल्या आणि त्याला घरी जायला सांगितलं.”

सर क्षणभर थांबले, हसले आणि म्हणाले, ‘‘नाही पटत माझं स्पष्टीकरण? माहीत आहे मला. पण एकच सांगतो, त्या गोष्टीतला मुलगाच तुम्हाला हे सगळं सांगतोय. यावर विश्वास ठेवा मित्रांनो, होय माझ्या आयुष्यात घडलेला हा प्रसंग आहे. अगदी तसाच राहुलच्याही आयुष्यात घडावा याचंच मला आश्चर्य वाटलतंय. माझ्या सरांनी मला त्यावेळी जे सांगितलं आणि जी वागणूक दिली तेच मी राहूलच्या बाबतीत केलं. राहूलचे वडील एक सरकारी अधिकारी आहेत म्हणून मी त्याला शिक्षा केली नाही असं तुम्हाला वाटत असेल पण तसं नाही. मी फक्त माझ्या सरांचा कित्ता गिरवला. मला त्यावेळी सरांनी नापास केलं असतं तर ते त्यांच्या शिस्तीला धरूनच झालं असतं. पण त्यांनी तसं केलं नाही. कारण त्यांना खात्री होती की एवढा हुशार विद्यार्थी कॉपी आणि तेही चित्रकलेच्या पेपरात करणे शक्यच नाही. मित्रांच्या चेष्टेला आणि थापांना तो बळी पडला आहे हे त्यांनी ओळखलं. उलट त्याला शिक्षा म्हणून नापास केलं किंवा पालकांना जाऊन सांगितलं तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतील कारण तो विद्यार्थी सरळमार्गी, निरुपद्रवी आणि हुशार होता. त्याच्यावर कायमचा ‘नापास’ चा शिक्का बसला असता. एवढंच नव्हे तर त्यातून तो चुकीच्या मार्गानेही गेला असता. मित्रांनो, शिस्त लावायची म्हणजे फक्त शिक्षाच करायची असा अर्थ होत नाही. शिक्षा हा शेवटचा उपाय असतो. गुन्हा करणारा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे काय हे ही बघायला नको का? मी मित्रांच्या सल्ल्याला बळी पडलो तसा राहूलही पडला आणि फसला तो!

त्याला समजुतीचे शब्द सांगितले आहेत मी आणि गोड शब्दात दमही भरला आहे. एवढेच नव्हे तर चित्रकलेच्या पेपरला जास्त गुण पडत असूनही त्याला पास होण्यापुरते पस्तीसच गुण द्यायला सांगितले आहेत. शिवाय इतर सर्व विषयात त्याचे पाच पाच गुण माझ्या अधिकारात मी कमी केले आहेत. त्याचा परिणाम काय झाला? त्याला मिळायची ती शिक्षा मिळाली आहे. कधीही नंबर न सोडणारा राहूल आज सातव्या क्रमांकावर आहे. त्याच्यासारख्या हुशार आणि सच्च्या विद्यार्थ्याला ही शिक्षा पुरेशी आहे असं मला वाटतं. माझा निर्णय चुकत असेल तर खुल्या मनाने सांगा. त्या चुकीची शिक्षा भोगायला मी तयार आहे.” 

सर्व स्टाफ विचारमग्न दिसत होता. चूक की बरोबर? पण चेह-यावर दिसणारा मगाचा राग मात्र आता कुणाच्याच चेह-यावर दिसत नव्हता. इतक्यात कला शिक्षक पुढे आले आणि सरांकडे वळून म्हणाले, ‘‘सर, आम्ही कला शिकवतो. कलाकार, चित्रकार निर्माण व्हावेत म्हणून प्रयत्न करत असतो. पण विद्यार्थी कसा घडवावा म्हणजे त्यातून माणूस कसा घडेल हे मात्र आज तुमच्यामुळे समजले. तुम्ही तुमच्या सरांच्या विश्वासाला पात्र ठरला आहात, राहूलही आपल्या सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरेल. कारण तुम्हीच आत्ता म्हणालात की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते.” 

सर थांबले. टाळ्यांचा होणारा कडकडाट सांगत होता, हेडसरांचा निर्णय अगदी योग्य होता.  

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अजूनही वेळ गेलेली नाही… लेखक – डॉ. नानासाहेब थोरात ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ अजूनही वेळ गेलेली नाही… लेखक – डॉ. नानासाहेब थोरात ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

इंग्लंडमध्ये काही वर्षांपूर्वी एका साडेतीन वर्षाच्या मुलीच्यासमोर तिची गरोदर आई घरातील जिन्यावरून पडली आणि बेशुद्ध झाली. — या तीन वर्षांच्या कोवळ्या जिवाने क्षणाचाही विलंब न करता ऍम्ब्युलन्सला फोन केला, 

आणि तिच्या या फोनमुळे फक्त आईचाच नाही तर पोटातील बाळाचाही जीव वाचला—- ऍम्ब्युलन्सला फोन करून ती मुलगी अनेक मिनिटे त्यांच्याबरोबर बोलत होती. तिचे बोलणे संपते न संपते तोपर्यंत ऍम्ब्युलन्स दारात हजर झाली होती—–जगातील अतिशय गर्दीचे शहर असलेल्या लंडनमध्येसुद्धा एखाद्या अपघातानंतर सरासरी आठव्या मिनिटाला ऍम्ब्युलन्स हजर होते. 

संपूर्ण ब्रिटनमध्ये या मुलीच्या प्रसंगावधनाचे आणि धाडसाचे कौतुक झाले आणि या एका फोनकॉलमुळे ब्रिटन सरकारने आपल्या शिक्षणपद्धतीत अनेक सुधारणा केल्या—–

—–प्रश्न हा नाही की त्या मुलीला ऍम्ब्युलन्स ऑपरेटरबरोबर बोलता कसे आले. तर प्रश्न हा आहे की त्या एवढ्या छोट्या मुलीला आपली आई पडल्यावर ऍम्ब्युलन्सला फोन करायचा असतो हे कसे समजले? ऍम्ब्युलन्सचा नंबर कुठून मिळाला?——- या प्रश्नाचे उत्तर दडले आहे गृहपाठात…..!!!  

ब्रिटनमध्ये मूल तीन वर्षाचे झाले की त्याला शाळेत प्रवेश मिळतो. आई वडील दोन्ही नोकरीला असतील तर सहा तास रोज मूल शाळेत थांबू शकते. या तीन वर्षाच्या मुलांना ना पाढे शिकवतात, ना ABCD शिकवतात, ना अभ्यासाचे ओझे देतात. याउलट या कोवळ्या जीवांना मोठ्यांशी कसे बोलायचे, रस्त्यावरून जाताना सिग्नलचे नियम कसे पाळायचे, गाडीमध्ये बसल्यावर सीटबेल्ट कसा लावायचा, आपली रूम कशी नीटनेटकी ठेवायची, खोटे बोलायचे नाही, अश्या अनेक दैनंदिन जीवनातील गोष्टी शिकवतात. आणि दररोज मुलांना शाळेत काय शिकवले जातेय ते पालकांना सांगितले जाते—-  फक्त सांगितलेच जात नाही तर संध्याकाळी घरी एकत्र जेवण करत असताना यावर चर्चा पण करायला प्रोत्साहित करतात, ज्यामुळे मुलांना शाळेत शिकवलेले व्यवस्थित लक्षात राहील. आणि हाच या मुलांचा गृहपाठ असतो. फक्त नियमच नाही, तर आपल्या रोजच्या जीवनात घरामध्ये प्लंबर, एलेक्टरिशियन, क्लीनर किंवा कचरा गोळा करणारे लोक, हॉस्पिटलमधील डॉक्टर, ऍम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, अगदी गॅरेजमध्ये जे लोक काम करतात, त्यांचा आपल्या रोजच्या जीवनात काय उपयोग असतो याचे प्रात्यक्षिक सुद्धा देतात. वर्षातील काही दिवस या लोकांना शाळेत बोलवून मुलांसमोर प्रात्यक्षिक दाखवतात. 

असेच एके दिवशी या मुलीच्या शाळेतसुद्धा ऍम्ब्युलन्सचे प्रात्यक्षिक होते. त्या बालमनांना त्यादिवशी जे काही वर्गात सांगितले आणि दाखवले त्याची चर्चा त्यांनी त्या रात्री जेवताना आपल्या आईवडिलांबरोबर गृहपाठ म्हणून केली. 

आणि तोच गृहपाठ त्या मुलीने लक्षात ठेवून आपल्या आईचा आणि तिच्या गर्भातील बाळाचा जीव वाचवला. 

पुढे जाऊन संपूर्ण ब्रिटनभर त्याची चर्चा झाली आणि ब्रिटन सरकारने आपल्या शिक्षणपद्धतीत अजून सुधारणा करून ते अधिकाधिक प्रात्यक्षिक आणि निरीक्षण आधारित केले—- यामुळेच ब्रिटनमधील सर्वच शाळांमध्ये वर्षातील काही दिवस गॅरेज मेकॅनिकपासून, ते शेतकरी आणि त्यांची जनावरे इथपासून, ते हेलिकॉप्टर ऍम्ब्युलन्स डॉक्टरपर्यंत सर्वाना शाळेत बोलावून त्यांच्याकडून मुलांना प्रात्यक्षिक आधारित शिक्षण दिले जाते आणि त्याचा गृहपाठ रात्रीच्या जेवणावेळी पालकांकडून पक्का करून घेतला जातो. 

“आम्ही कुठेय….? “ हा प्रश्न आम्हाला कधी पडतो का? 

मुलांवर ओझे अपेक्षांचे—- 

गेले दोन दशके पाठीवरच्या दप्तराचे ओझे कमी करण्याची चर्चा करत राहिलोय —- पण या बालकांच्या मनावरील ओझ्याचे काय?—- फक्त शाळाच या मुलांना दप्तराच्या आणि गृहपाठाच्या ओझ्यात दडपून ठेवतायत का? —-

याला पालकपण जबाबदार नाहीत का? 

माझ्या मुलाला शाळेत गेले की आकडे वाचायला आणि लिहायला आलेच पाहिजेत. मुलांना ABCD आलीच पाहिजे, सर्व खेळ आलेच पाहिजेत. याहूनही पुढे जाऊन त्यांना गाणे गायला आले पाहिजे, एखादे वाद्य वाजवायला आले पाहिजे— असा सगळा अट्टाहास का? 

ज्या बालवयात मुलांनी मातीत खेळले पाहिजे, झाडावर चढले पाहिजे, नदी-विहिरीत पोहले पाहिजे, रात्री आई वडिलांबरोबर शाळेतील गमती जमतीच्या गोष्टी केल्या पाहिजेत, त्या वयात इतरांच्या मुलांसारखे स्टेजवर नाचायला लावतोय, त्याची इच्छा नसताना शाळेचा नियम म्हणून गॅदरिंगमध्ये गाणी म्हणायला लावतोय, नाटकात भाग घ्यायला सांगतोय, हार्मोनियम, गिटार, तबल्याच्या क्लासला पण पाठवतोय, गणिताच्या- इंग्लिशच्या क्लासला पण जबरदस्तीने बसवतोय —–

—–आणि यातून काही शिल्लक असेल तर सर्रास सर्व शाळा त्या कोवळ्या जीवांवर नवनवीन प्रोजेक्टचा मारा करत आहेत. आज पर्यावरणाचा– उद्या चित्रकलेचा– परवा कॉम्पुटरचा– असे रोज नवनवीन प्रोजेक्ट त्या बालबुद्धीत अक्षरशः इंजेक्शनसारखे घुसवले जात आहेत—– त्या कोवळ्या जीवाला त्याचा त्रास होतोय हे पालकांना आणि शिक्षकांना का समजत नाही ? सात वर्षाचे मूल सकाळी सातला घरातून निघतेय ते रात्री सातला घरी येतेय. 

मनाने आणि शरीराने थकलेला तो जीव पुन्हा गृहपाठाच्या ओझ्याने आणि सकाळी पुन्हा लवकर उठण्याच्या चिंतने झोपी जातोय —– 

—-आमचे गृहपाठ नेहमी अवघड इंग्लिशचे आणि किचकट गणितांचेच का असतात? हे दोनच विषय आयुष्यात सर्व काही शिकवतात का? युरोप-अमेरिकेच्या सगळ्याच मुलांना कुठे चांगले गणित येते, जपान-जर्मनीच्या मुलांना कुठे फाडफाड इंग्लिश बोलता येते, आफ्रिकेतील सगळ्याच मुलांना कुठे वयाच्या दहा बारा वर्षात कॉम्पुटरचे कोडिंग काय असते हे माहित होते. 

—-स्पर्धांची खरंच गरज आहे का ? 

—-मग आमच्याच मुलांना हे सगळे लहान वयातच यायला हवे हा अट्टाहास का?

—-गृहपाठ नेहमी लेखनाचा आणि घोकंपट्टीचाच का असतो?—  तो आई वडिलांबरोबर, आज्जी आजोबांबरोबर चर्चा करायचा का नसतो? 

—-वर्गातील चार मुलांना एखाद्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाले तर शाळेच्या मुख्याध्यापकांना त्याचे का टेन्शन येते? 

ते का पालकांना बोलावून मुलांची तक्रार करतात? 

—-माझ्या शाळेची मुलं सगळ्याच विषयात, सगळ्याच खेळात, सगळ्याच अभ्यासेतर उपक्रमात इतर शाळांमधील मुलांच्या पुढे असलीच पाहिजेत हा शाळांचा पण अट्टाहास का? आणि या अट्टहासातूनच बालमनावर गृहपाठाचे ओझे थोपवले जात आहे. 

याला शाळा जेवढ्या जबाबदार आहेत तेव्हढेच आजचे स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे पालक पण आहेत. 

शाळा आणि पालक या दोन्हीच्या संगनमताने हा गृहपाठाचा गुन्हा दररोज मुलांच्या माथी मारला जात आहे. 

एक दिवस गृहपाठ दिला नाही तर पालक अस्वस्थ होतायत, आसपासच्या दहा लोकांना विचारून खात्री करून घेतायत की खरंच आज गृहपाठ नाही ना.—- आम्ही शालेय अभ्यासक्रमात नवनवीन प्रयोग करतोय, नवीन पॉलिसीज घेऊन येतोय, पण स्पर्धेचे काय? —- खरंच  या बालमानांना एवढ्या लहान वयात या सगळ्या स्पर्धेची गरज आहे? 

माझे मूल सर्वच विषयात– सर्वच खेळात – सर्वच कलेत सर्वगुणसंपन्न असले पाहिजे हा पालकांचा अट्टाहास, आणि आमच्या शाळेची मुलं सर्वच क्षेत्रात यशस्वी झाली पाहिजेत हा शाळांचा अतिमहत्वाकांक्षीपणा, दोन्ही या कोवळ्या बालमनांना जीवघेण्या स्पर्धेत ढकलत आहेत. 

अजूनही वेळ गेली नाही, मूलभूत स्पर्धाविरहित सुधारणा करण्यासाठी ….. 

लेखक :  डॉ. नानासाहेब थोरात, वरिष्ठ शास्त्रज्ञ,  मेडिकल सायन्स डिव्हिजन, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंड

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ||•• क्रिकेटचे असेही भक्त ••|| … श्री द्वारकानाथ संझगिरी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

||•• क्रिकेटचे असेही भक्त ••|| श्री द्वारकानाथ संझगिरी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆

क्रिकेटचे असे भक्त अनेक आहेत. दहा, बारा वर्षांपूर्वी मी एक समारंभ आयोजित केला  होता, तो समारंभ होता सुनील गावस्कर आणि विश्वनाथ यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्ताने. त्यांचा सत्कार अमिताभ बच्चन ह्यांनी केला होता .. त्यावेळी अमिताभ बच्चन आल्यानंतर काही क्रिकेटपटू आणि अमिताभ बच्चन ह्यांना मी एका हॉलमध्ये नेऊन बसवलं होतं. तिथे चंदू बोर्डे आणि चंदू पाटणकर हे दोन क्रिकेटपटू सुद्धा होते. बोर्डे आणि पाटणकरांनी पाहिलं की समोर अमिताभ बच्चन आहे. त्यांची इच्छा झाली की अमिताभ बच्चनला जाऊन भेटावं. म्हणून हे दोघंजण गेले आणि चंदू बोर्डेनी अमिताभ बच्चनला हात पुढे करून सांगितलं, ‘ नमस्ते ..!! मी चंदू बोर्डे ..!! ‘ 

अमिताभ बच्चन दिलखुलास हसले, आणि चंदू बोर्डेना म्हणाले की, ‘ तुम्ही तुमचं नाव कशाला सांगता ..?? मी तुम्हाला तुमचीच एक आठवण सांगतो. तुम्हाला आठवतं का की, तुम्ही १९५८ साली दिल्लीला वेस्टीइंडिज विरुद्ध  शतक ठोकलं होतं ..?? ‘ 

बोर्डे म्हणाले की, ‘ हो. मला चांगलंच आठवतंय ..!!’ 

अमिताभ पुढे म्हणाला .. ‘ तुम्हाला हे ही आठवतंय का, की त्यावेळेला काही मंडळींनी तुम्हाला खांद्यावरून उचलून पॅव्हेलियनमध्ये नेलं होतं ..?? ‘ 

बोर्डे म्हणाले .. ‘ हो. आठवतं ..! !’ 

आणि मग अमिताभ बच्चनने त्यांना सांगितलं की, ‘ त्यातला एक खांदा माझा होता ..!! ‘ 

अमिताभने हे म्हटल्यावर चंदू पाटणकर, मी, बोर्डे, खरं तर आम्ही तिथे जे होतो, ते सर्वच शहारलो ..!! 

नंतर आणखीन एक गोष्ट आम्हाला कळली की, चंदू बोर्डेना उचलणारा तिथे आणखी एक तरुण होता, जो गोरा गोमटा होता. जो अमिताभ बच्चनचा मित्र होता. त्याचं नाव होतं राजीव गांधी ..!! 

गंमत पहा या दोन मित्रांपैकी एक ‘ वन मॅन फिल्म इंडस्ट्री ‘ झाला, आणि दुसरा देशाचा पंतप्रधान ..!! 

चंदू बोर्डे ह्यांनी १९६४ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध दसऱ्याला भारताला एका छोट्या पण अफलातून खेळीने जिंकून दिलं. अत्यंत मोक्याच्या वेळेला त्यांनी अप्रतिम अशी आक्रमक फलंदाजी केली. त्यावेळेला स्टेडियममधली अनेक मंडळी स्तिमित झाली. त्यांना हर्षवायू झाला. आणि त्या आनंदाच्या भरात चंदू बोर्डेना खांद्यावरून पॅव्हेलियनमध्ये कोणी नेलं असेल ..?? 

त्या माणसाचं नाव होतं राज कपूर ..!! 

लेखक : – श्री द्वारकानाथ संझगिरी

संग्राहक : श्री सुनीत मुळे . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 37 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 37 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

५७.

प्रकाश, माझा प्रकाश,

विश्व भरून राहिलेला प्रकाश

नयनाला स्पर्श करून

ऱ्हदयाला आनंद देणारा प्रकाश

 

हे जीवलगा, माझ्या जीवनात

आनंद नाचून राहिला आहे

माझ्या प्रेमाच्या तारा प्रकाशात झंकारल्या आहेत.

प्रकाशामुळेच आकाश विस्तारते,

वारा बेफाट वाहतो, भूमीवर सर्वत्र हास्य पसरते.

 

फुलपाखरं आपल्या नौका

प्रकाशसमुद्रात सोडतात,

लिली आणि जास्मिनची फुलं फुलतात

ती प्रकाशाच्या लाटांवर!

 

हे प्राणसख्या, प्रत्येक ढगाच्या

सोनेरी छटेवर प्रकाश आहे

मुक्तपणे मोत्यांची उधळण करतो आहे.

 

पानांपानांतून अमर्याद

आनंदाची उधळण तो करतो.

स्वर्गनदी दुथडी भरून वाहते आहे.

सर्वत्र आनंद भरून राहिला आहे.

५८.

अल्लड गवत पात्याच्या तालावर

आनंदात जे सर्व पृथ्वी फुलवतं,

 

जन्म- मृत्यू या जुळ्या भावंडांना

जगभर ते नाचवत ठेवतं,

 

हसत हसत सर्व जीवन वादळीवाऱ्यातही

ते डोलवतं आणि जागं ठेवतं.

 

फुललेल्या लाल कमळाच्या पाकळीवर

आसूभरल्या नयनांनी ते विसावतं,

 

आपल्याकडं असलेलं सर्वस्व

मूकपणं जे धुळीत उधळतं,

 

त्या माझ्या आनंदगीताच्या सुरावटीत

सर्वानंदाचे स्वर मिळावेत.

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार #168 ☆ व्यंग्य ☆ साहित्यिक पीड़ा के क्षण ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज  प्रस्तुत है समसामयिक विषय पर आधारित आपका एक विचारणीय व्यंग्य ‘साहित्यिक पीड़ा के क्षण’। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 168 ☆

☆ व्यंग्य ☆ साहित्यिक पीड़ा के क्षण

डेढ़ सौ कविताओं और सौ से ऊपर कहानियों का लेखक शहर में कई दिन से पड़ा है। लेकिन शहर है कि कहीं खुदबुद भी नहीं होती, एक बुलबुला नहीं उठता। एकदम मुर्दा शहर है, ‘डैड’। लेखक बहुत दुखी है। उनके शहर में आने की खबर भी कुल जमा एक अखबार ने छापी, वह भी तब जब उनके मेज़बान दुबे जी ने भागदौड़ की। अखबारों में भी एकदम ठस लोग बैठ गये हैं। इतने बड़े लेखक का नाम सुनकर भी चौंकते नहीं, आँखें मिचमिचाते कहते हैं, ‘ये कौन शार्दूल जी हैं? नाम सुना सा तो लगता है। अभी तो बहुत मैटर पड़ा है। देखिए एक-दो दिन में छाप देंगे।’

शहर के साहित्यकार भी कम नहीं। कुल जमा एक गोष्ठी हुई, उसके बाद सन्नाटा। गोष्ठी की खबर भी आधे अखबारों ने नहीं छापी। किसी ने रिपोर्ट छापी तो फोटो नहीं छापी। एक ने उनका नाम बिगाड़ कर ‘गर्दूल जी’ छाप दिया। रपट छपना, न  छपना बराबर हो गया। जैसे दाँत के नीचे रेत आ गयी। मन बड़ा दुखी है। वश चले तो उस अखबार के दफ्तर में आग लगा दें।

दो-तीन दिन तक कुछ साहित्यप्रेमी दुबे जी के घर आते रहे। शार्दूल जी अधलेटे, मुँह ऊपर करके सिगरेट के कश खींचते, उन्हें प्रवचन देते रहे। अच्छी रचना के गुण समझाते रहे और अपनी रचनाओं से उद्धरण देते रहे। दूसरे लेखकों की बखिया उधेड़ते रहे। फिर साहित्यप्रेमी उन्हें भूलकर अपनी दाल-रोटी की फिक्र में लग गये। अब शार्दूल जी अपनी दाढ़ी के बाल नोचते बिस्तर पर पड़े रहते हैं। आठ दस कप चाय पी लेते हैं, तीन-चार दिन में नहा लेते हैं। शहर पर खीझते हैं। इस शहर में कोई संभावना नहीं है। शहर में क्या, देश में कोई संभावना नहीं है। ‘द कंट्री इज गोइंग टू डॉग्स’। ऊबकर शाल ओढ़े सड़क पर निकल आते हैं। बाज़ार के बीच में से चलते हैं। दोनों तरफ देखते हैं कि कोई ‘नोटिस’ ले रहा है या नहीं। उन्हें देखकर किसी की आँखें फैलती हैं या नहीं। लेकिन देखते हैं कि सब भाड़ झोंकने में लगे हैं। किसी की नज़र उन पर ठहरती नहीं। कितनी बार तो पत्रिकाओं में उनकी फोटो छपी— हाथ में कलम, शून्य में टँगी दृष्टि, आँखों में युगबोध। लेकिन यहाँ किसी की आँखों में चमक नहीं दिखती। सब व्यर्थ, लेखन व्यर्थ, जीवन व्यर्थ। पत्थरों का शहर है यह।

एक चाय की दूकान पर बैठ जाते हैं। चाय का आदेश देते हैं। मैले कपड़े पहने आठ- दस साल का एक लड़का खट से चाय का गिलास रख जाता है। ‘खट’ की आवाज़ से शार्दूल जी की संवेदना को चोट लगती है, ध्यान भंग होता है। खून का घूँट पीकर वह चाय ‘सिप’ करने लगते हैं। सड़क पर आते जाते लोगों को देखते हैं। उन्हें सब के सब व्यापारी किस्म के, बेजान दिखते हैं।      

चाय खत्म हो जाती है और लड़का वैसे ही झटके से गिलास उठाता है। गिलास उसके हाथ से फिसल कर ज़मीन पर गिर जाता है और काँच के टुकड़े सब दिशाओं में प्रक्षेपित होते हैं। दूकान का मालिक लड़के का गला थाम लेता है और सात-आठ करारे थप्पड़ लगाता है। लड़का बिसूरने लगता है।

शार्दूल जी के मन में बवंडर उठता है। मुट्ठियाँ कस जाती हैं। साला हिटलर। हज़ारों साल से चली आ रही शोषण की परंपरा का नुमाइंदा। समाज का दुश्मन। नाली का कीड़ा। ज़ोरों से गुस्से का उफान उठता है, लेकिन शार्दूल जी मजबूरी में उसे काबू में रखते हैं। पराया शहर है यह। यहाँ उलझना ठीक नहीं। कोई पहचानता नहीं कि लिहाज करे। दूकान मालिक की नज़र में इतना बड़ा लेखक बस मामूली ग्राहक है। हमीं पर हाथ उठा दे तो इज़्ज़त तो गयी न। और फिर हमारे विद्रोह को समझने वाला, उसका मूल्यांकन करने वाला कौन है यहाँ? न अखबार वाले, न फोटोग्राफर, न साहित्यकार-मित्र। ऐसा विद्रोह व्यर्थ है, खासी मूर्खता।

शार्दूल जी एक निश्चय के साथ उठते हैं। विरोध तो नहीं किया, लेकिन दूकान-मालिक को छोड़ना नहीं है। कविता लिखना है, जलती हुई कविता। कविता में इस जल्लाद को बार-बार पटकना है और लड़के को न्याय दिलाना है। बढ़िया विषय मिला है। धुँधला होने से पहले इसे कलमबंद कर लेना है। धधकती कविता, लावे सी खौलती कविता।
दूकान-मालिक पर आग्नेय दृष्टि डालकर शार्दूल जी झटके में उठते हैं और बदन को गुस्से से अकड़ाये हुए दुबे जी के घर की तरफ बढ़ जाते हैं। अब दूकान-मालिक की खैर तभी तक है जब तक शार्दूल जी घर नहीं पहुँच जाते। उसके बाद कविता में इस खलनायक के परखचे उड़ेंगे।

शार्दूल जी चलते-चलते मुड़कर दूकान की तरफ दया की दृष्टि डालते हैं। पाँच दस मिनट और मौज कर ले बेटा, फिर तुझे रुई की तरह धुनकर भावी पीढ़ी के लाभार्थ सौंप दिया जाएगा।

शार्दूल जी की गति तेज़ है। वे जल्दी अपने मित्र के घर पहुँचना चाहते हैं। एक सामाजिक दायित्व है जो पूरा करना है और जल्दी पूरा करना है। एक कविता जन्म पाने के लिए छटपटा रही है— ऐसी कविता जो बहुत से कवियों को ढेर कर देगी और शार्दूल जी को स्थापित करने के लिए बड़ा धमाका साबित होगी।

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈