मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रामाचं नाम… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ रामाचं नाम… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

कोणीही भेटलं की तो “श्रीराम” म्हणायचा. सोसायटीच्या वॉचमनपासून कंपनीच्या मालकापर्यंत सगळ्यांनाच हे ठाऊक होतं, आणि आताशा तर तो दिसला की आपसूकच तेही त्याच्या निमित्ताने रामनाम घेत असत. साधना वगैरे नाही, पण रोज एक माळ रामनाम तो घ्यायचा. त्याच्या मित्राला काही हे आवडायचं नाही, पटायचं नाही. “का करायचं असं ? याने तुला काय फायदा होतो ? तू हे कशासाठी करतोस ?” वगैरे प्रश्नांची तो मित्र याच्यावर सरबत्ती करायचा. 

तो एरवी त्या मित्राच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा, हसून सोडून द्यायचा. पण एके दिवशी मित्र खनपटीलाच बसला, “तुला काय मिळतं हे सारखं राम राम करून ? तुला काय तो राम दर्शन देतो का असं केल्याने ?”

“काही मिळण्यासाठी कशाला रामाचं नाव घ्यायचं ?” तो शांतपणे म्हणाला. “आणि दर्शन होण्याचंच म्हणशील तर अजून काही ते दर्शन झालं नाही, हे खरंच आहे. पण ते राहू दे. सुट्ट्यांमध्ये फिरायला जायचं आहे. कुठे जाऊ ? मदुराई छान आहे का रे ?”

हा एकदम पर्यटनात कुठे घुसला, मित्राला बोध झाला नाही. पण मदुराई छान आहे हे त्याने ऐकलं होतं, त्यामुळे त्याने उत्साहाने या ठिकाणाला अनुमोदन दिलं. 

“गाडी घेऊनच जाईन म्हणतो. Long drive पण होईल. पण जायचं कसं ? रस्ता तर माहित नाहीये.”

“कसा रे तू असा भोटम् ? गुगल मॅप आहे की तुझ्या फोनमध्ये. ती बाई सांगेल तसा जात जा की.” मित्र कीव करत म्हणाला. 

“तू गेला आहेस का रे मदुराईला ?” त्याची पृच्छा.

“नाही बुवा. मला तो आपला हा म्हणाला होता – छान आहे मदुराई – म्हणून मी तुला सांगितलं.” मित्राची कबूली. 

“एक्झॅक्टली. तू मदुराईला गेलेला नाहीस, पण तो अमका अमका गेला आहे, त्याने तुला सांगितलं, म्हणून त्याच्या अनुभवावर विश्वास ठेवून तू ते मला सांगितलंस. तुला मदुराईचा रस्ता ठाऊक नाही, पण ज्या गुगल मॅपने हजारो जणांना योग्य मार्ग दाखवला त्या गुगल मॅपवर तुला विश्वास आहे. मलाही प्रत्यक्ष देव दिसला नाही, पण आमच्या गुरूंना नक्की देव दिसला आहे, त्यांनी सांगितलं आहे – ज्या गुरू परंपरेनं हजारो लाखोंना मार्गदर्शन केलं, त्या गुरू परंपरेने छातीठोकपणे सांगितलं आहे – नामस्मरण करा, तुम्हाला देवदर्शन होईल. विश्वास ठेवायला एवढं कारण पुरेसं आहे, नाही का ?”

या युक्तीवादाची यथार्थता पटल्याने मित्र निरुत्तर झाला. पण तरी त्याला अजून प्रश्न होतेच.  

“अरे, पण तू असे किती दिवस अजून राम राम करत राहणार ? इतकी वर्षे झाली तरी तुला जे हवंय ते अजून का मिळालं नाही ? आणि इतकी वर्षे झाली, तरी अजून फक्त राम राम वरच गाडी अडकली आहे तुझी ? इतकी वर्षं झाल्यावर काही वेगळं, काही नवीन, काही आणखी advanced करावं, असं नाही वाटत ? आणि तुला जर माहितीच नाही, तुला नक्की काय हवंय ते तर मग तुला समजणार तरी कसं की तुला जे हवंय ते तुला मिळालं म्हणून?” तो मित्र काही पिच्छा सोडत नव्हता. त्याची टकळी थांबतच नाही म्हटल्यावर त्याच्या सगळ्याच प्रश्नांची फायनल उत्तरं द्यायला त्याने सुरुवात केली. 

“तुला पुष्कर लेले माहित आहे ना ? शास्त्रीय संगीत – नाट्यसंगीत गायक ? ऑलरेडी त्यांचं बऱ्यापैकी नाव झाल्यानंतर, सवाई गंधर्व यांच्या गायकीचे बारकावे शिकण्यासाठी ते पुन्हा एका गुरूंकडे गेले – बहुतेक पंडित सत्यशील देशपांडे यांच्याकडे. तर नवीन काही शिकवण्याऐवजी, गुरुजींनी या ख्यातनाम गायकाला पुनश्च हरि ओम म्हणत, मूलभूत षड्ज लावायचा अभ्यास करायला सांगितलं. पुष्कर आश्चर्यचकित झाले. त्यांच्यासारख्या प्रथितयश गायकाला परत “सा” लावायला शिकायला सांगणं म्हणजे चार्टर्ड अकाऊंटंटला पहिल्यापासून बेरजा वजाबाक्या शिकायला सांगण्यासारखं होतं. पण गुरूंवर श्रद्धा ठेवून त्यांनी तो अभ्यास करायला सुरुवात केली. रोजचा रियाझ संपला की ते प्रश्नार्थक मुद्रेने गुरूंकडे पहायचे – काही सल्ला, सूचना किंवा कदाचित कौतुक ऐकू येईल या अपेक्षेने – पण दर वेळी गुरू स्थितप्रज्ञतेने सांगत – अभ्यास चालू ठेवा. 

तीन चार महिने असेच निघून गेले, आणि एक दिवस तो “सा” लागला – सापडला. गुरूंनी काही सांगायची गरजच लागली नाही. तो अनुभव, ती अनुभूती पुष्करना मिळाली – जाणवली. ते शहारले. त्यांनी गुरूंकडे पाहिले. मंद हसत गुरूंनी सांगितले – “ये बात ! अब इस षड्जको पकड कर रख्खो.

त्यामुळे जे मिळायला हवे आहे, ते मिळालं आपसूकच कळेल. कोणी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आता प्रश्न राहतो की जे हवं आहे ते अजून का गवसलं नाही.

“ तुझं असं होतं का रे ? टीव्हीवर जाहिरात चालली असते – अवघ्या पाच दहा सेकंदांचा खेळ – पण आपण तल्लीन होतो, त्या जाहिरातीने हसतो वा टचकन डोळ्यात पाणी येतं. ती तल्लीनता येणं महत्त्वाचं. आपण अजून पोटतिडीकीने राम राम म्हणत नाही रे. खच्चून भूक लागल्यावर लेकरू ज्या विश्वासाने आईला पुकारते, वस्त्रहरण होताना द्रौपदी ज्या आर्ततेने कृष्णाचा धावा करते, ते अजून होत नाही. इतकी वर्षे ती आर्तता, तो विश्वास माझ्या हाकेत आणायचा प्रयत्न करतोय, एवढंच.” तो म्हणाला, त्या मित्राला राम राम घातला, आणि आपल्या कामाला निघून गेला. 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘जागतिक सायकल दिन’-३ जून २०२३ (पूर्वार्ध) ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ ‘जागतिक सायकल दिन’-३ जून २०२३ (पूर्वार्ध) ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार मैत्रांनो,

आज ३ जून २०२३, म्हणजेच ‘जागतिक सायकल दिन’ आहे. त्या निमित्याने आमच्या संकुलात गेल्या एप्रिल महिन्यात पार पडलेल्या एका उपक्रमाची आठवण झाली. त्याविषयी सांगेनच, पण आधी जाणून घेऊ या खास दिवसाबद्दल. सायकल चालवणे हा व्यायामाचा एक स्वस्त आणि मस्त प्रकार आहे. एप्रिल २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने ३ जून हा जागतिक सायकल दिवस (वर्ल्ड बायसिकल डे) म्हणून घोषित केला.

आता सायकल चालवण्याचे मुख्य फायदे बघू या.

  • नियमित सायकल चालवल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती निर्माण तर होतेच पण वयानुसार कमी झालेली ही शक्ती वृद्धिंगत होते. कोरोना व्हायरससारख्या साथीच्या आजारात रोगांविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती फार महत्वाची असते.
  • सायकलिंग वजन कमी होण्यास मदत करते. चयापचय सुधारणे, स्नायू मजबूत करणे याशिवाय चरबी जाळणे, या सर्वांतून प्रति तास सुमारे ३०० कॅलरीज जाळल्या जातात.
  • सायकलिंगमुळे हृदयाची तंदुरुस्ती वाढते. नियमित सायकल चालवल्याने आपल्या हृदयाची कार्यक्षमता सुधारते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी होतो. दररोज नियमितरित्या फक्त 30 मिनिटे सायकल चालवल्याने हृदयविकाराचा धोका ५० टक्के कमी होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
  • सायकलिंग शरीराची लवचिकता आणि स्नायू तसेच सांधे यांची संयुक्त गतिशीलता सुधारते. संधिवात असलेल्या लोकांसाठी हा व्यायामाचा अत्युत्तम प्रकार आहे.
  • सायकलिंगमुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच, आपले मानसिक आरोग्य सुधारण्यात सायकल चालवण्याचा हातभार लागतो. व्यायामामुळे एंडोर्फिन (Endorphin) नामक संप्रेरक (hormone) शरीरात निर्माण होतात, यामुळे मानसिक ताणतणाव कमी होतात. यासोबत निसर्गाचा आनंद लुटतांना, रोजच्या कंटाळवाण्या कामातून ब्रेक घेतांना आपला मूड छान असतो आणि चिंता अन नैराश्य हे दूर जातात. मंडळी, असे निरोगी शरीर अन निरोगी मन असेल तर सायकल एकटयाने काय किंवा ग्रुप मध्ये काय चालवण्याची मजा न्यारीच!
  • सायकलिंगमुळे आपले जीवाश्म ईंधनावर, अर्थात fossil fuel (उदा. पेट्रोल) खर्च होणारे पैसे वाचतात. तसेच पेट्रोल, डिझेल आणि वायूचा वापर करणाऱ्या वाहनांमधून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डाय-ऑक्साईडमुळे होणारे वायू प्रदूषण लक्षणीयरित्या कमी होते. यात विजेचीही बचत होऊ शकते. आजकाल विजेवर चालणारी वाहने अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत, म्हणून हा मुद्दा महत्त्वाचा आहे. 

सायकल चालवा अभियान

कांही देश तर आपल्या नागरिकांनी सायकल चालवावी म्हणून विशेष अभियान राबवत आहेत. नेदरलँड या देशाने खूप आधीपासून ‘सायकलिंग हॉटबेड’ म्हणून ख्याती मिळवली आहे, बघा ना, सध्या बाईक (सायकल) ची संख्या २३ दशलक्ष) आणि रहिवासी १७ दशलक्ष! अर्थातच सायकल चालवणाऱ्या व्यक्तींमध्ये हा देश नंबर एक आहे. इथे सायकल चालवणाऱ्या नागरिकांना चक्क पैसे दिल्या जातात. २००६ पासून इथल्या कांही व्यावसायिकांनी बाइक चालवणाऱ्या प्रवाशांना प्रति किलोमीटर (किमी) कांही युरो देण्याची योजना सुरु केली आहे. यामुळे कंपन्या आणि कर्मचारी दोघेही आनंदी आहेत. या योजनेप्रमाणे जर तुम्ही आठवड्यातून पाच दिवस दररोज १० किमी सायकल चालवली, तर तुम्ही योजनेतून वर्षाला सुमारे ४५० युरो कमवू शकता (आता हे आकडे नक्कीच वाढले असतील). या व्यतिरिक्त जर अजून जास्त प्रमाणात सायकल चालवली तर पुरस्कार देण्यात येतात. 

येथील डच सरकारने २०१८ ते २०२१ पर्यंत लोकांना सायकल चालवण्यासाठी आणि कामावर जाण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या प्रयत्नात सायकलिंगच्या पायाभूत सुविधांवर सुमारे ४०० दशलक्ष युरो खर्च करण्याचे ठरवले होते. मैत्रांनो, यासाठी १५ मार्ग केवळ सायकलस्वारांसाठी ‘सायकलस्वार फ्रीवे’ बनवणे आणि सायकलसाठी २५००० आणखी पार्किंगसाठी स्थानके निर्माण करणे या सुविधा देण्याचे उद्दिष्ट होते. वरील सर्व आकडे कोरोना काळाच्या आधीचे (२०१८) आहेत) हे वर्णन यासाठी केले की कुठल्याही योजनेत सरकार, खाजगी व्यावसायिक कंपन्या आणि नागरिक यांचा सहभाग असेल तर ती योजना नक्कीच यशस्वी ठरते. 

या बाबतीत नेदरलँड सर्वात पुढे असले तरी इटली, फ्रांस आणि बेल्जियम या इतर युरोपियन देशांमध्ये हे कार्य सुरु झाले आहे. न्यूझीलंडमध्ये देखील या उपक्रमाला प्रोत्साहन दिल्या जात आहे. जपानमध्ये देखील सायकल अतिशय प्रचलित वाहन आहे. मैत्रांनो आपल्या देशात सुद्धा सायकलिंगला उत्तेजन देणाऱ्या संस्था आहेत. यात अग्रगण्य नांव आहे Cyclop. तसेच या संबंधी कांही ऍप्स देखील प्रचलित आहेत. या संस्था आणि ऍप विषयी संबंधितांनी अधिक माहिती नेटवरून जाणून घेणे आणि त्यांत सहभागी होणे हिताचे ठरेल. आपल्या माहितीनुसार आपल्या शहरात मोफत सायकल स्टॅन्ड असतील, सरकारतर्फे सायकली पुरवल्या जात असतील किंवा सायकल ट्रॅक असतील तर त्याची माहिती समाजमाध्यमांवर टाकल्यास लोक त्या सोयीचा वापर करतील.

रुणवाल गार्डन सिटीचा ‘साइक्लोफन-अर्थ डे २०२३

शरीरमाद्यं खलु धर्म साधनम्’ म्हणजेच सर्व कर्तव्ये पार पाडण्यासाठी शरीर हे एकमेव साधन आहे. म्हणूनच शरीर निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, कारण सर्व कर्तव्ये आणि कार्ये या शरीराद्वारेच पार पाडावी लागतात. त्यामुळे या मौल्यवान देहाचे रक्षण करणे व त्याचे आरोग्य राखणे हे मानवाचे प्रथम कर्तव्य आहे. हाच विचार करून रुणवाल गार्डन सिटी मध्ये मागील वर्षी प्रथमच सायक्लोफन-२०२२ हा उपक्रम कार्यान्वित केला होता. मागील वर्षी आमच्या पहिल्या सायक्लोफनच्या सांगतेच्या दिवशी, ठाण्याचे प्रसिद्ध बायसिकल मेयर, .श्री चिराग शहा यांनी प्रमुख अतिथि या नात्याने उपस्थित राहून आम्हा सर्वांनाच खूप प्रेरणा दिली होती. त्याच प्रेरणेचे फलित म्हणजे या वर्षी देखील हा उपक्रम राबवल्या गेला.

या आयोजनाचे हे दुसरे वर्ष होते. गेल्या २२ ते ३० एप्रिलच्या अवधीत (कुठल्याही ७ दिवसात) सायकलिंग करणाऱ्यांना दररोज ५ किमी प्रमाणे किमान ३५ किमी असे अंतर, किंवा याच अवधी मध्ये दररोज ३ किमी पायी चालत, किमान २१ किमी असे अंतर पूर्ण करायचे होते. हा माफक चॅलेंज होता. परंतू चालणे, सायकल चालवणे किंवा तत्सम कुठलाही व्यायाम न करणाऱ्यांसाठी हा चॅलेंज तसा भारीच होता. मुलांच्या नुकत्याच सुट्ट्या होऊ घातलेल्या आणि बहुतेकांचे मे महिन्यात बाहेरगावी जाणे असल्याने ‘विश्व वसुंधरा दिवसाचे’   (World Earth Day) निमित्य साधत २२ एप्रिल पासून हा इव्हेंट सुरु झाला. अपेक्षेप्रमाणे मुलांचा सायकल चालवण्यात सहभाग अतिशय कौतुकास्पद होता. दिलेल्या अवधीत जास्तीतजास्त किमी पार करणाऱ्या सायकलस्वाराला आणि पायी चालणाऱ्याला बक्षीस होते. संपूर्ण कुटुंबाने भाग घेतल्यास वेगळे बक्षीस होते.

आमचे कुटुंब यात दर वर्षीप्रमाणे सहभागी होतेच. माझे कुटुंबीय सायकल चालवीत होते. मी मात्र चालण्यात समाधान मानले. रामप्रहरी चालल्यास ऊन आणि घामापासून सुटका असायची. यात कांही लोकांना (मी यात होते) सकाळी उठोनि चालायची खंडित झालेली सवय मात्र परत लागली. यात सहभाग घेणाऱ्यास STRAVA किंवा इतर कुठलेही ऍप वापरून सायकल चालवण्याचे किंवा पायी चालण्याचे किमी रेकॉर्ड करून त्यांचा “पुरावा” आयोजकांना देणे क्रमप्राप्त होते. तसेच निसर्गरम्य स्थानांचे आणि सेल्फी, या सर्व फोटोंचे ‘CycloFUN-2023’ या व्हॅट्सऍप ग्रुप मध्ये स्वागतच असायचे. यात गंमत म्हणजे तुम्ही नोंदणी करतांना तुमचा किंवा तुमची जोडीदार असणे आवश्यक होते. शक्य असल्यास जोडीदाराबरोबर सायकल चालवणे किंवा पायी चालणे, सोबत सेल्फी काढणे वगैरे कार्यक्रम आपसूकच झाले.

या विषयाच्या उत्तरार्धात ‘सायक्लोफन-२०२३’ चे आमचे अनुभव आणि ३० एप्रिल २०२३ ला झालेल्या या उपक्रमाच्या सांगतेचा वृत्तांत सादर करीन. अगदी लवकरच भेटू या. 

धन्यवाद ! 🌹

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

टीप :

  • या लेखासाठी इंटरनेटवर उपलब्ध माहितीचा उपयोग केला आहे.
  • या लेखासोबत दिलेल्या भित्तिचित्रांचे (wall painting) किंवा अन्य फोटो वैयक्तिक आहेत. ही सुंदर भित्तिचित्रे आमच्या संकुलाच्या जवळपासच्या परिसरातील आहेत.
  • हा लेख माझे नाव आणि फोन नंबर यासकट अग्रेषित करावा.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆– रक्तामध्ये ओढ मातीची…– कवयित्री : श्रीमती इंदिरा संत ☆ संग्रहिका : सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

 वाचताना वेचलेले 

☆ – रक्तामध्ये ओढ मातीची– कवयित्री : श्रीमती इंदिरा संत ☆ संग्रहिका : सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

(काल साजऱ्या झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने ..कवयित्री इंदिरा संत यांची एक सुंदर कविता. सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी या कवितेला सुरेख स्वरसाज चढवून ती सादर केलेली आहे)

५ जून, जागतिक पर्यावरण दिन…… आपला सभोवताल नयनरम्य करणार्‍या पर्यावरणातून आपण अनेक गोष्टी शिकतो, मनमुराद आनंद घेतो, आणि त्यावर मनापासून प्रेमही करतो….या पर्यावरणाशिवाय आपलं अस्तित्त्व नाही.. 

याच पर्यावरणाबद्दल वाटणारी कृतज्ञता जेष्ठ कवयित्री इंदिरा संत यांनी त्यांच्या खालील कवितेतून व्यक्त केली आहे… त्या मातीचा एक भाग आपणही आहोत, याचं भान आपल्याला सतत असायला हवं आणि म्हणून पर्यावरणाचं संवर्धन आपण करायला हवं, हो ना !

रक्तामध्ये ओढ मातीची, 

मनास मातीचें ताजेपण,

मातींतुन मी आलें वरती, 

मातीचे मम अधुरें जीवन…..  

कोसळतांना वर्षा अविरत, 

स्नान समाधीमधे डुबावें; 

दंवात भिजल्या प्राजक्तापरी

ओल्या शरदामधि निथळावें; ….. 

हेमंताचा ओढुन शेला 

हळूच ओलें अंग टिपावें;

वसंतातले फुलाफुलांचें, 

छापिल उंची पातळ ल्यावें;….. 

ग्रीष्माची नाजूक टोपली,

उदवावा कचभार तिच्यावर;

जर्द विजेचा मत्त केवडा

तिरकस माळावा वेणीवर; ….. 

आणिक तुझिया लाख स्मृतींचे

खेळवीत पदरांत काजवे, 

उभें राहुनी असें अधांतरिं

तुजला ध्यावें, तुजला ध्यावें….

कवयित्री : श्रीमती इंदिरा संत

संग्रहिका : पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कूर्मजयंती निमित्त —… ☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ कूर्मजयंती निमित्त — ☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆

कासव म्हणजे श्रीविष्णूचा साक्षात कूर्म अवतार आहे. – मंदिराच्या बाहेर कासव असण्याचे महत्त्व —

कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. कासवाला श्री विष्णूकडून तसे वरदान ‍मिळाले आहे. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असते. कासवाला सत्त्वगुणामुळे ज्ञान प्राप्‍त झाले आहे. कासव हे श्रीविष्‍णूला शरण आले होते. यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे लक्ष नेहमी देवतेच्या चरणांकडे असते.

काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली दिसते. मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे. श्रीविष्‍णूच्या आशीर्वादाने कासवाची कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे. आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरात कायमस्वरूपी रहाते.

कासवाचे गुण

१) कासवाला ६ पाय असतात, तसेच माणसाला ६ शत्रू असतात.

काम ,क्रोध ,मोह ,लोभ ,मोह आणि मत्सर 

कासव हे सर्व सोडून नतमस्तक होते.  त्याप्रमाणे भक्ताने पण हे सर्व सोडून मंदिरात यावे 

२) कासव हे आपल्या पिलाना डोळ्यातून प्रेम देवून वाढवते. त्याच प्रमाणे देवाने आपल्यावर कृपा दृष्टी ठेवावी ही भावना आहे. 

३) कासव आपल्या अष्ट अंगांनी नमस्कार करते.  त्याप्रमाणे आपण पण करावा यांकरीता कासव मंदिरात असते.

४) कासव ज्याप्रमाणे त्याची सर्व इंद्रिये त्याच्या इच्छेने संकोचून घेवू शकते, त्याप्रमाणे मंदिरात देवासमोर जाताना भक्ताचा इंद्रियनिग्रह, इंद्रियांवर ताबा असणे महत्त्वाचे आहे. इंद्रिये मोकाट सोडून परमेश्वराची भक्ती होवू शकत नाही, हे कासव आपल्याला शिकवते.

कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा भावार्थ

कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ ‘ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्‍वराचे खरे दर्शन घडते ‘, असा आहे.

आपणास माहिती आहे का की कासव (मादी) ही आपल्या पिल्यांना कधीच दूध पाजत नसते.  तिने आपल्या पिल्लाच्या डोळ्यात वात्सल्य भावनेतून पाहिले की पिल्लाचे पोट भरते

— त्या प्रमाणे आपण मंदिरात देवाच्या दर्शनाला गेलो असता देवाने आपल्याकडे वात्सल्य भावनेने पाहावे, ज्यामुळे न मागता आपल्या सर्व इच्छा पुर्ण व्हाव्या, या उद्देशाने कासव मंदिरात देवाच्या समोर असते.

कासव म्हणजे श्रीविष्णूचा साक्षात कूर्म अवतार आहेत. श्रीविष्णूच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव असते.

– इदं न मम

संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – कुष्ठरोग नाही भोग…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– कुष्ठरोग नाही भोग…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

कुष्ठरोग्याचे जीवन,

समाजाकडून सारखी उपेक्षा !

झडलेल्या हातांनाही असते,

मेहंदीने रंगण्याची अपेक्षा !

कोणी हिणवे तयास,

झालाय देवाचा कोप !

कोणी म्हणे गतजन्माच्या 

पापाचे आले आहे रोप !

समाजात जगताना,

पदोपदी भोगतात यातना !

हद्दपारीचे जीवन नशिबी,

वाळीत टाकल्याची भावना !

कोणी एक महात्मा येई ,

तयांच्या उद्धारासाठी !

बाबा आमटेंचे महात्म्य,

अधोरेखित या जगजेठी !

आनंदवनात चालू आहे,

अविरत सेवेचे महान कार्य !

पाहून जुळती कर दोन्हीही,

माणसातल्या देवाचे औदार्य !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 142 – कहने दो बस कहने दो… ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – कहने दो बस कहने दो।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 142 – कहने दो बस कहने दो…  ✍

सम्बोधन की डोर न बाँधो, मुझे मुक्त ही रहने दो।

जो कुछ मन में उमड़ रहा है, कहने दो बस कहने दो।

 

अनायास मिल गये सफर में

जैसे कथा कहानी

भूली बिसरी यादें उभरी

जैसे बहता पानी

मत तोड़ो तुम नींदे मेरी, अभी खुमारी रहने दो।

 

बात बात में हँसी तुम्हारी

झलके रूप शिवाला

अलकें ऐसी लगतीं जैसे

पाया देश निकाला

रूप तुम्हारा जलती लौ सा, अभी और कुछ दहने दो।

 

कहाँ रूप पाया है रूपसि

करता जो मदमाता

कितना गहरा हृदय तुम्हारा

कोई थाह न पाता

अभी न बाँधों सम्बन्धों में, स्वप्न नदी में बहने दो।

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 141 – “द्युति की यह अनिंद्या…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है।  आज प्रस्तुत है  आपका एक अभिनव गीत  द्युति की यह अनिंद्या)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 141 ☆।। अभिनव गीत ।। ☆

द्युति की यह अनिंद्या 

मत सहेजो

स्मृतिपट की

सलवटें

आओ तो

सुलझा सका गर

मुख पटल बिखरी

लटें

 

ग्रीष्म के

श्रृंगार पर

बहता पसीना

आयु पर भारी

रहा किंचित महीना

 

जून का,

आतप

कुँआरी देह पर

कुछ

तप रहा

अपनत्व का

कोई नगीना

 

नाभि तट पर

आ रुके रोमांच को

मत समेटो

अब

हार्दिक होती हुई

यह द्वितीया की

प्रियंका

करवटें

 

उक्ति होती हुई

द्युति की यह अनिंद्या

शांत सुरभित

छुईमुई सी

शुभासंध्या

 

पाटवस्त्रों में

सम्हाले

लग रही हो क्षीण सी

उत्कला, विंध्या

 

विद्ध क्षण से

उभरते

इस समय के मुख

मत उकेरो

स्वयं को

वनस्पतियाँ लख

तुम्हें न

मर मिटें

©  श्री राघवेन्द्र तिवारी

05-06-2023

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – टिटहरी ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – टिटहरी ??

भीषण सूखे में भी

पल्लवित होने के प्रयास में

जस- तस अंकुर दर्शाती

अपने होने का भास कराती

आशाओं को, अंगुली थाम

नदी किनारे छोड़ आता हूँ।

 

आशाओं को

अब मिल पायेगा

पर्याप्त जल और

उपजाऊ जमीन।

 

ईमानदारी से मानता हूँ

नहीं है मेरा सामर्थ्य

नदी को खींचकर

अपनी सूखी जमीन तक लाने का,

न कोई अलौकिक बल

बंजर सूखे को

नदी किनारे बसाने का।

 

वर्तमान का असहाय सैनिक सही

भविष्य का परास्त योद्धा नहीं हूँ,

ये पिद्दी-सी आशाएँ

ये ठेंगु-से सपने

पलेंगे, बढ़ेंगे,

भविष्य में बनेंगे

सशक्त, समर्थ यथार्थ,

एक दिन रंग लायेगा

मेरा टिटहरी प्रयास।

 

जड़ों के माध्यम से

आशाओं के वृक्ष

सोखेंगे जल, खनिज

और उर्वरापन..,

अंकुरों की नई फसल उगेगी

पेड़ दर पेड़ बढ़ते जाएँगे,

लक्ष्य की दिशा में

यात्रा करते जाएँगे।

 

मैं तो नहीं रहूँगा

पर देखना तुम,

नदी बहा ले जाएगी

सारा नपुंसक सूखा,

नदी कुलाँचें भरेगी

मेरी जमीन पर,

सुदूर बंजर में

जन्मते अंकुर

शरण लेंगे

मेरी जमीन पर,

और हाँ..,

पनपेंगे घने जंगल

मेरी जमीन पर..!

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ श्री हनुमान साधना संपन्न हुई साथ ही आपदां अपहर्तारं के तीन वर्ष पूर्ण हुए 🕉️

💥 अगली साधना की जानकारी शीघ्र ही आपको दी जाएगी💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 61 ⇒ क्रोध और अपमान… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “क्रोध और अपमान।)  

? अभी अभी # 61 ⇒ क्रोध और अपमान? श्री प्रदीप शर्मा  ? 

क्रोध और अपमान एक ही थाली के चट्टे बट्टे हैं। क्या कभी ऐसा हुआ है कि किसी ने आपका सम्मान किया हो, और आपको क्रोध आया हो। क्रोध को पीकर किसी का सम्मान भी नहीं किया जा सकता। इंसान और पशु पक्षियों की तरह, शब्द भी अपनी जोड़ी बना लेते हैं। खुदा जब हुस्न देता है, तो नज़ाकत आ ही जाती है। बांसुरी कृष्ण के मुंह लग जाती है और गांडीव अर्जुन के कंधे पर ही शोभायमान होता है। हुस्नलाल के साथ भगतराम ही क्यों ! शंकर प्यारेलाल की जोड़ी नहीं बनी, लक्ष्मीकांत जयकिशन के लिए नहीं बने। जहां कल्याणजी हैं, वहां आनंदजी ही होंगे, नंदाजी अथवा भेरा जी नहीं। धर्मेंद्र हेमा की जोड़ी भी रब ने क्या बनाई है। शब्दों की ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे।

करेला और नीम चढ़ा ! भाई तुम आम के पेड़ पर भी चढ़ सकते थे। अगर आपका सार्वजनिक सम्मान हो रहा हो तो आपके मन में लड्डू ही फूटेंगे, आप अपमान के घूंट थोड़े ही पिएंगे। हंसी के साथ खुशी है, वार के साथ त्योहार, आदर के साथ अगर सत्कार है तो नौकरी के साथ धंधा। आसमान में अगर खुदा है तो ज़मीन पर बंदा है। धंदा जो कभी तेज रहा करता था, आजकल मंदा है। सूरज है तो किरन है, चंदा है तो चांदनी है।।

शब्दों में आपस में दोस्ती भी है और दुश्मनी भी। जब दुश्मनी की बात आएगी तो सांप – नेवले, भारत – पाकिस्तान और भारत – चीन का जिक्र होगा। कांग्रेस मोदीजी को फूटी आंखों नहीं सुहाएगी और कंगना कभी शिव सेना को माफ नहीं कर पाएगी। देव – असुर कभी एक थाली में बैठकर खाना नहीं खाएंगे, मोदीजी अब कभी चाय पीने लाहौर नहीं जाएंगे। न नौ मन तेल होगा, न राधा नाचेगी।

जिस तरह बर्फ कभी जमती और कभी पिघलती है, शब्द भी कभी कभी जमते और पिघलते रहते है। ये ही शब्द कभी शोले बन जाते हैं तो कभी शब्दों को सांप सूंघ जाता है। शब्दों की मार से ही कभी किसी को सदमा होता है तो किसी को दमा। शब्द कानों में शहद भी घोल सकते हैं और ज़हर भी। कभी शब्द आंसू बनकर बह निकलते हैं तो कभी आग उगलने लगते हैं।।

शब्द ही भ्रम भी है और ब्रह्म भी। शब्दों का भ्रम जाल ही माया जाल है। शब्द ही जीव है, शब्द ही ब्रह्म। कभी नाम है तो कभी बदनाम। सस्ता शब्द अगर मूंगफली है तो महंगा शब्द बादाम। राम तेरे कितने नाम।

क्या कोई ऐसी रामबाण दवा है इस संसार में कि दुर्वासा को कभी क्रोध न आवे, चित्त की ऐसी स्थिति बन जावे कि मान अपमान दोनों उसमें जगह न पावे। शब्द मार करने के पहले ही पिघल जावे, तो शायद हमें क्रोध ही न आवे। शकर आसानी से पानी में घुल जाती है, सभी रंग मिलकर एक हो जाते। हमारा चित्त बड़ा विचित्र। यहां शब्द ही नहीं पिघल पाते। काश क्रोध और अपमान भी आसानी से द्रवित हो जावे। कितना अच्छा हो यह चित्त, बाल मन हो जावे, सब कुछ अच्छा बुरा, बहुत जल्द भूल जावे। लाख डांटे – डपटे, मारे मां, बच्चा मां से ही बार बार जाकर लिपट जावे।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ “विश्व पर्यावरण दिन-५ जून २०२३…” ☆ डॉक्टर मीना श्रीवास्तव ☆

डॉक्टर मीना श्रीवास्तव

☆ ♻️ “विश्व पर्यावरण दिन-५ जून २०२३…” 🌻 ☆ डॉक्टर मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार पाठकों,

संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (यूएनईपी) के नेतृत्व में १९७३ से हर साल ५ जून को विश्व पर्यावरण दिवस मनाया जाता है। विश्व पर्यावरण दिवस २०२३ की थीम है ‘Beat Plastic Pollution’ अर्थात, ‘प्लास्टिक पॉल्यूशन पर काबू पाओ’, क्योंकि बढ़ता प्लास्टिक प्रदूषण पर्यावरण प्रदूषण का एक प्रमुख कारण पाया गया है। हर साल ४०० मिलियन टन से अधिक प्लास्टिक का उत्पादन होता है, जिसमें से आधे को केवल एक बार उपयोग करने के लिए डिजाइन किया गया है (एकल उपयोग प्लास्टिक अर्थात सिंगल यूज प्लास्टिक)| आज की तारीख में अत्यावश्यक होने के कारण २०२३ की थीम के अंतर्गत प्लास्टिक प्रदूषण पर काबू पाने के लिए सार्वजनिक और निजी क्षेत्रों के साथ-साथ नागरिकों की भागीदारी के साथ वैश्विक पहल लागू की जाएगी।

प्लास्टिक प्रदूषण के कारण

प्लास्टिक का उत्पादन जीवाश्म ईंधन का उपयोग करता है, जो ग्रीनहाउस गैस (कार्बन डाइऑक्साइड) को बाहर फेंकता है और वैश्विक तापमान में वृद्धि करता है। एकल उपयोग प्लास्टिक, मुख्य रूप से प्लास्टिक बैग, स्ट्रॉ और पानी की बोतलों का अत्यधिक उपयोग, बढ़ते प्लास्टिक प्रदूषण का एक प्रमुख कारण है। प्लास्टिक का गलत प्रबंधन (मुख्य रूप से कचरे का गैर-पृथक्करण) और प्लास्टिक कचरा कूड़ेदान या अन्य जगहों पर फेंकने से जलमार्गों और महासागरों में प्रवेश करते हुए समुद्री जीवन और पर्यावरण को नुकसान पहुँचा सकता है। इस प्लास्टिक के विघटित होने में १००० वर्ष से अधिक समय लगता है और ये विघटित प्लास्टिक जहरीले रसायनों के रूप में पर्यावरण को प्रदूषित करते रहते हैं। प्लास्टिक प्रदूषण से समुद्री जीवन प्रभावित होता है। महासागरों में कछुओं, मछलियों और अन्य जलीय जीवों की मृत्यु होती है। जलमार्ग भी प्रभावित होते हैं। नदियाँ और नाले प्लास्टिक कचरे से भर सकते हैं, जिससे बाढ़ और प्रदूषण हो सकता है। यह हमारे पीने के पानी को भी प्रदूषित करता है। इसके कारण जैव विविधता (biodiversity) कम हो रही है। प्लास्टिक में मौजूद जहरीले रसायन मानव स्वास्थ्य पर बुरा प्रभाव डालते हैं।

प्लास्टिक प्रदूषण को मात देने के तरीके

प्लास्टिक प्रदूषण पर काबू पाने के लिए रिड्यूस, रीयूज और रीसायकल ये तीन आवश्यक R अर्थात उपाय हैं। एकल उपयोग प्लास्टिक का उपयोग कम करें और टिकाऊ विकल्प यानि, प्राकृतिक सामग्री का उपयोग करें। इस लड़ाई में जन जागरूकता जरूरी है। सामाजिक जागरूकता अभियान के साथ-साथ समाज प्रबोधन के लिए सोशल मीडिया बहुत प्रभावी है। एकल उपयोग प्लास्टिक के उत्पादन और उपयोग को सीमित करने वाली सरकारी नीतियों और नियमों का सख्त पालन आवश्यक है। हम प्लास्टिक प्रदूषण को दूर करने के लिए समुद्र तटों, बगीचों, अन्य सार्वजनिक स्थानों और परिसरों में स्वच्छता अभियान चलाकर प्लास्टिक कचरे का नियोजन कर सकते हैं।

‘स्वच्छ रुणवाल’ अभियान

हम न केवल प्लास्टिक का उपयोग करते हैं, बल्कि उसे अपने घरों के बाहर, परिसर में, सड़कों पर और यहां तक कि कूड़ेदान होते हुए भी उसके बाहर फेंकते हैं। यह कचरे का योग्य नियोजित नहीं है। इस संबंध में, रुणवाल गार्डन सिटी, ठाणे पश्चिम के हमारे परिसर में जनवरी २०१७ से ‘स्वच्छ रुणवाल’ नामक उपक्रम चल रहा है। स्वच्छ रुणवाल परियोजना बिसलेरी-बॉटल फॉर चेंज, एंटी प्लास्टिक ब्रिगेड चैरिटेबल ट्रस्ट, परिसर भगिनी विकास संघ, ऊर्जा फाउंडेशन और ठाणे महानगर निगम के सहयोग से कार्यान्वित की जा रही है। आज तक हम २७००० किलो से अधिक प्लास्टिक को पुनर्चक्रण के लिए दान कर चुके हैं, इसपर अभियान में शामिल निवासी और स्वयंसेवक (मैं भी एक स्वयंसेवक हूं) बहुत गर्व महसूस कर रहे हैं। इसी उपक्रम द्वारा इलेक्ट्रॉनिक कचरे और थर्मोकोल को भी रिसाइकिल करते हैं। वृक्षारोपण अभियान के माध्यम से हरियाली और स्वच्छता को बढ़ावा दिया जाता है। हमारे कुछ स्वयंसेवकों ने ठाणे के पास समुद्र तट सफाई के सरकारी अभियान में योगदान दिया है।

हमने जनवरी २०१७ में प्लास्टिक संग्रह शुरू किया। एकत्रित प्लास्टिक कचरे को स्वयंसेवक अपने वाहनों में पुनर्चक्रण के लिए ऊर्जा फाउंडेशन केंद्रों तक पहुँचाते थे| कॉम्प्लेक्स का योगदान बढते गया, इसलिए हमने ‘बॉटल फॉर चेंज’ और ‘एंटी प्लास्टिक ब्रिगेड चैरिटेबल ट्रस्ट’ के साथ करार किया। अगस्त २०१९ से इसमें तेजी आई है। अब रुनवाल गार्डन सिटी के निवासी हर हफ्ते के आड़े शनिवार को इमारतों के कुछ स्थानों पर प्लास्टिक कचरे को जमा करके प्लास्टिक रीसाइक्लिंग अभियान जारी रखते हैं।हमारा परिसर ‘बॉटल्स फॉर चेंज’ परियोजना के तहत पंजीकृत है। यह संस्था आपकी सोसायटी से प्लास्टिक कलेक्ट करने के लिए आपके घर तक अपनी गाड़ी भेजती है और उनके एप के जरिए ऐसा करना बेहद आसान है| यह एप हमारे परिसर द्वारा एकत्र किए गए प्लास्टिक कचरे का सही वजन बताता है।

प्लॉगिंग

प्रिय पाठकों, हमारे परिसर में ‘प्लॉगिंग’ (यानि जॉगिंग या अन्य व्यायाम करते करते प्लास्टिक का कचरा इकठ्ठा करना तथा उसका योग्य नियोजन करना) भी किया जाता है| हर रविवार को हमारे इस अभियान के सदस्य तथा बच्चे इस बिखरे प्लास्टिक को चुनकर, तो कभी खोद निकालकर सफाई कर्मचारियों के भांति वह जमा करते रहते हैं| इसके अलावा कुछ खास दिनों में (उदा. होली के रंगोत्सव का दूसरा दिन-८ मार्च २०२३ और विश्व वसुंधरा दिवस-२२ अप्रैल २०२३) इनका काम जोर शोर से किया जाता है|

जनजागरण

ये स्वयंसेवक जन जागरूकता पैदा करने का कोई अवसर नहीं छोड़ते हैं। इस परिसर के हर सार्वजनिक कार्यक्रम में इनकी अपील होती है! कभी सोशल मीडिया संदेश, वीडियो (मुख्यतः व्हाट्सएप और फेसबुक), कभी भाषण, कभी सुंदर नुक्कड़ नाटक, कभी पोस्टर, पेंटिंग प्रतियोगिताएं! इन सबके बीच यह काम निरन्तर जारी है। सबसे आशाजनक और आनन्ददायक बात यह है, कि इस गतिविधि में छोटे और बड़े बच्चे बहुत उत्साह और चाव के साथ सहभागी होते हैं।

पुरस्कार

इस अभियान को कई पुरस्कार और प्रमाण पत्र प्राप्त हुए हैं। वर्ष २०२३ के बारे में कहूं तो ८ मार्च को आयोजित ‘अंतर्राष्ट्रीय महिला दिवस’ के अवसर पर संजय भोईर फाउंडेशन द्वारा ‘उषा सखी सम्मान’ इस कार्यक्रम में माननीय श्री संजय भोईर एवं श्रीमती उषा भोईर द्वारा प्रमाण पत्र देकर रुणवाल के इस प्रोजेक्ट में कार्यरत महिलाओं को सम्मानित किया गया| ११ अप्रैल २०२३ को रुणवाल गार्डन सिटी, ठाणे को गोदरेज और बॉयस के सहयोग से ‘द बेटर इंडिया’ द्वारा प्रस्तुत ‘बेस्ट हाउसिंग इंस्टीट्यूशन अवार्ड’ (स्वच्छ पहल श्रेणी में विजेता) प्राप्त हुआ। यह शहरों को रहने योग्य बेहतर स्थान बनाने और समाज के सभी वर्गों के बीच इसके कार्यान्वित करने और जागरूकता निर्माण में एकत्रित कार्य करने के लिए प्राप्त किया हुआ राष्ट्रीय पुरस्कार है।

मित्रों, कोई भी सामाजिक उद्यम, चाहे सरकारी हो या निजी, नागरिकों की भागीदारी के बिना सफल नहीं हो सकता। कोई भी गतिविधि स्वयं से ही शुरू होती है। हम सब को एकल उपयोग प्लास्टिक बैग, पानी की बोतल, प्लेटें, डिब्बे, बर्तन, चम्मच, स्ट्रॉ, कप आदि का उपयोग बंद करना चाहिए। वैकल्पिक सामग्री (जैसे कि, कपडे के थैले, स्टील की पानी की बोतलें, केले के छिलके से बनी प्लेटें, कटोरे आदि) से बनी चीजों का उपयोग करके कई टन प्लास्टिक के उपयोग को रोका जा सकता है। शासन स्तर पर हर परिसर में कूड़ा निस्तारण व अलग से प्लास्टिक के संग्रह की योजना शुरू हो चुकी है, इसे सफल बनाना निवासियों का सामाजिक कर्तव्य है। मेरा मानना है कि, ‘मेरा प्लास्टिक कचरा, मेरी जिम्मेदारी’ इस मंत्र को ध्यान में रखते हुए हम जितना हो सके योगदान दें उतना अच्छा! मित्रों, याद रहे, आप जो भी प्लास्टिक रीसायकल करने के लिए देते हैं, वह हरीभरी वसुंधरा की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है!

धन्यवाद! 🌹

डॉक्टर मीना श्रीवास्तव

फोन नंबर: ९९२०१६७२११

टिप्पणी –

ऊपर बताए उपक्रम से सम्बन्धित विडिओ की लिंक लेख के अन्त में दी है। इस लेख के लिए इंटरनेट पर उपलब्ध जानकारी का उपयोग किया है।

कृपया यह प्रतिक्रिया अग्रेषित करनी हो तो, साथ में मेरा नाम तथा फोन नंबर उसमें रहने दें!

https://m. facebook. com/story. php?story_fbid=6801541356538935&id=100000494153962&mibextid=Nif5oz

https://photos. app. goo. gl/Gtgj1jNfVn139nTJ6

https://fb. watch/kM4CvBc5Jo/?mibextid=RUbZ1f

Instagram: https://www. instagram. com/reel/Cq7Uvs1rT98/?igshid=YmMyMTA2M2Y=

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares