मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आर्यनची नौका – एक विज्ञान कथा…भाग 3 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? जीवनरंग ?

☆ आर्यनची नौका – एक विज्ञान कथा…भाग 3 ☆ श्री राजीव ग पुजारी 

( तसेही पूर्ण ग्रहाभोवती एखाद्या पदार्थाचे आवरण घालणे व्यवहार्य वाटत नाही. त्यामुळे आपणास दुसरा उपाय शोधावा लागेल.) इथून पुढे —- 

वातावरणाचे पुनरुज्जीवन केल्यानंतर पुढची पायरी म्हणजे, मंगळाच्या वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण वाढविणे, जेणेकरून मनुष्याला विनाऑक्सिजन सिलिंडर व मास्क मंगळावर वावरता येईल. यासाठी एक उपाय म्हणजे, सध्या प्रायोगिक स्वरूपात असणाऱ्या ‘मॉक्सि’ उपकरणासारखी, पण त्यापेक्षा जास्त क्षमतेची उपकरणे मंगळावर वेगवेगळ्या ठिकाणी बसविणे, त्यामुळे वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइडचे विघटन होऊन श्वसनयोग्य असा प्राणवायू पूर्ण मंगळभर उपलब्ध होईल. पण मंगळाचे क्षेत्रफळ पाहता हा उपाय व्यवहार्य वाटत नाही. दुसरा उपाय म्हणजे सूर्यप्रकाश व पाणी यांच्या उपस्थितीत प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे कार्बन डाय ऑक्साइड घेऊन ऑक्सिजन बाहेर सोडणारे ‘सायनोबॅक्टेरिया’ जीवाणूंचे कंटेनर्स मंगळावर नेऊन हेलिकॉप्टरद्वारे वेगवेगळ्या पाणथळ भागांमध्ये  पसरणे. यामुळे वातावरणातील प्राणवायूची उपलब्धता वाढेल. काही सुधारणांसह हा उपाय योग्य वाटतो.

प्राथमिक अहवाल तयार करतांना सौ. मधुरा जोशी यांनी प्रत्येक गटाला मार्गदर्शन करण्याचे व सर्व गटांमध्ये समन्वयाचे काम उत्तमरित्या केले.

सर्व गटांनी श्री.आर्यन जोशी यांचेसमोर प्राथमिक अहवालाचे सादरीकरण केले. आर्यनने प्राथमिक अहवाल वेळेत सादर केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले. त्यानंतर त्यांनी तीनही गटांना मंगळाच्या चुंबकीय क्षेत्राचे पुनरुज्जीवन, मंगळावरील तापमान वाढवून मंगळाच्या वातावरणाची घनता वाढविणे आणि मंगळावरील प्राणवायूचे प्रमाण श्वसनयोग्य करणे, यासाठीचे अंतिम शास्त्रीय व व्यावहारिक उपाय आणि त्यांना येणारा खर्च यांचा अहवाल तयार करण्यास सांगितले. त्यासाठी मुदत ठरली एक वर्ष.

तीनही गट झडझडून कामाला लागले. संगणकीय सिम्युलेशन्स, वेगवेगळ्या संकल्पनांप्रमाणे प्रतिकृती (प्रोटोटाईप) तयार करून त्यांच्या चाचण्या घेणे, यांत तीनही गट मग्न झाले. सौ. मधुरा जोशी यांनी तर अक्षरशः रात्रीचा दिवस केला. श्री.आर्यन जोशींचे सर्व कामावर बारीक लक्ष होते. एक वर्षानंतर तीनही गटांची बैठक श्री आर्यन जोशी यांच्या उपस्थितीत झाली. तिन्ही गटांनी आपापली सादरीकरणे केली. सौ. मधुरा जोशी यांनी तीनही गटप्रमुखांना सादरीकरणाची संधी दिली.

पहिल्या गटातर्फे श्री अश्विन मल्होत्रा यांनी मंगळाचे चुंबकीय क्षेत्र कसे पुनःस्थापित करावे याविषयी सादरीकरण केले. ते म्हणाले, “आपण प्राथमिक अहवालाच्या चर्चेमध्ये म्हटलेच होते की, मंगळाचे चुंबकीय क्षेत्र पुनःस्थापित करण्यासाठी मंगळाचा गाभा वितळविणे किंवा पूर्ण मंगळाभोवती विद्युतचुंबकीय आवरण बसविणे या दोन्ही गोष्टी व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहेत. त्याऐवजी एक डायपोल चुंबक मंगळ व सूर्याच्या L1 बिंदूत स्थापित करणे शक्य आहे. हा ‘डायपोल’ चुंबक असा असेल जो मंगळाभोवती एक ते दोन टेस्ला ताकतीचे चुंबकीय क्षेत्र निर्माण करेल. याला आपण चुंबकावरण (मॅग्नेटोस्फिअर) म्हणूया. हे चुंबकावरण अंतरिक्ष प्रारणे व सौर वादळांना परतवून लावेल. (L1म्हणजे लॅगरेज बिंदू क्रमांक एक. अंतराळातील दोन मोठया गोलकांमध्ये असे काही बिंदू असतात, जेथे त्या मोठया गोलकांचे गुरुत्वाकर्षण व केंद्रापसारक शक्ती (सेंट्रिफ्युगल फोर्स) एकमेकांना तोलून धरतात. मंगळ व सूर्य यांच्यातील L1 बिंदू हा मंगळभूपृष्ठापासून १०,००,००० कि. मी. अंतरावर आहे.)  सौर वादळांना परतवून लावल्यामुळे मंगळावरील वातावरणाचा ऱ्हास होणार नाही. डायपोल चुंबक एका उपग्रहावर बसवलेला असेल. अशा प्रकारचा उपग्रह व डायपोल मॅग्नेट बनविण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागेल व खर्च आठशे कोटी रुपये येईल.”

मंगळावरील तापमान कसे वाढवता येईल, याविषयी के. नागप्पा यांनी सादरीकरण केले. ते म्हणाले, “आपण सर्वांनी प्राथमिक अहवालात पाहिलेच आहे की , मंगळाचे तापमान वाढविण्यासाठी मंगळाजवळ अणुस्फोट घडविणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. तसेच पूर्ण मंगळाभोवती ऐरोजेलचे आवरण बसविणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. त्याऐवजी मंगळाच्या भूस्थिर कक्षेत त्याच्या ध्रुवाजवळ १२५ कि. मी. त्रिज्येची ऍल्यूमिनिमचा पातळ थर दिलेली ‘PET’ (पॉलिइथिलीन टेरेफ्थालेट) फिल्म प्रस्थापित केली, तर ती आरशासारखे काम करेल व सूर्याकडून येणारी ऊर्जा मंगळाकडे परावर्तित करेल. त्यामुळे मंगळाचे तापमान वाढण्यास थेट मदत मिळेल. यामुळे ध्रुव प्रदेशातील गोठलेल्या कार्बन डाय ऑक्साईडचे वायूत रूपांतर होईल. त्यामुळे हरितगृह परिणाम होऊन मंगळाच्या भूपृष्ठावरील तसेच वातावरणातील उष्णता अंतराळात उत्सर्जित केली जाणार नाही. तसेच ध्रुव प्रदेशातील, जमिनीखालील व खडकांच्या भेगांतील गोठलेले पाणी द्रवरूप होऊन नद्या, नाले, तलाव दुथडी भरून वाहतील. उष्णतेमुळे नद्यांतील पाण्याची वाफ होऊन ती वातावरणात उंच जाईल व थंड हवेने  द्रवरूप होऊन पावसाच्या रूपाने ती खाली येईल व ऋतूचक्र सुरु होईल. सुरुवातीला ही PET फिल्म घडी केलेल्या स्थितीत एका उपग्रहावर बसवलेली असेल. मंगळाच्या भूस्थिर कक्षेत उपग्रह स्थापन झाल्यावर ती उलगडेल. ही फिल्म व उपग्रह बनविण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागेल व खर्च एक हजार कोटी रुपये येईल.”

मंगळावर ऑक्सिजनचे प्रमाण कसे वाढवता येईल याचे सादरीकरण श्री अँथोनी डिसोझा यांनी केले. ते म्हणाले, 

“प्राथमिक अहवालात म्हटल्याप्रमाणे मंगळावर सायनोबॅक्टेरिया जीवाणूंचे रोपण पाणथळ जागांवर करून हवेतील प्राणवायूचे प्रमाण वाढविण्याचे आम्ही ठरविले आहे. पण आम्ही एक गोष्ट करणार आहोत, ती म्हणजे या जीवाणूंचा जीवनकाल जेनेटीक सायन्सच्या मदतीने आम्ही वाढविणार आहोत. तसेच त्यांचा विभाजनाचा कालावधी आम्ही कमी करणार आहोत. आणखी एक गोष्ट आम्ही करणार आहोत ती म्हणजे, प्रकाश संश्लेषण करून प्राणवायू उत्सर्जित करण्याची त्यांची क्षमता आम्ही अनेक पटीने वाढविणार आहोत. म्हणजेच कार्बन डाय ऑक्साईडचे रूपांतर प्राणवायूत करण्यास लागणारा वेळ आम्ही कमी करणार आहोत. आपले यान मंगळावर उतरल्यानंतर एक वर्षाने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने हे जिवाणू पाणथळ जागांवर पसरवण्यात येतील. डायपोल मॅग्नेट उपग्रह L1 कक्षेत प्रस्थापित केल्यानंतरसुद्धा पूर्वीची सौर वादळे व अंतरिक्ष प्रारणांचा परिणाम कमी होण्यासाठी, तसेच मंगळाच्या भूस्थिर कक्षेत PET फिल्मवजा आरसा बसवून मंगळाचे सरासरी तापमान ५° सेंटीग्रेड होण्यासाठी व मंगळावरील गोठलेले पाणी द्रवरूप होण्यासाठीही एक वर्षाचा कालावधी लागेल,असे मधुरा जोशी मॅडमच्या संगणक प्रारूपावरून सिद्ध झालं आहे. त्यामुळेच सायनोबॅक्टेरिया जीवाणूंचा वापर आम्ही यान मंगळावर उतरल्यानंतर एक वर्षाने करणार आहोत. जिवाणूंमध्ये जनुकीय बदल करण्यासाठी दोन वर्षे लागतील व दोनशे कोटी रुपये खर्च येईल.”

तिन्ही अहवालांचा गोषवारा आणि समारोप सौ. मधुरा जोशी यांनी केला. त्या म्हणाल्या, ” डायपोल मॅग्नेट L1 कक्षेत बसवल्यावर चुंबकावरण तयार होईल. त्यामुळे सौर वादळे व अंतरिक्ष प्रारणे मंगळापर्यंत पोहोचणार नाहीत. पण पूर्वीची सौर वादळे व अंतरिक्ष प्रारणांमुळे दूषित झालेले वातावरण सामान्य होण्यासाठी साधारण एक वर्ष लागेल. PET फिल्म मंगळाच्या भूस्थिर कक्षेत बसविल्यानंतर मंगळाचे सरासरी तापमान ५° सेंटीग्रेड होण्यासाठी सुद्धा तेव्हढाच कालावधी लागेल. या सर्वांत ब्रेक थ्रू असे संशोधन आपणास करायचे आहे, ते म्हणजे सायनोबॅक्टेरिया जिवाणूंची प्रकाश संश्लेषण करण्याची क्षमता अनेक पटींनी वाढविणे. म्हणजेच कार्बन डाय ऑक्साइड वायू घेऊन प्राणवायू बाहेर सोडण्यास लागणारा वेळ अनेक पटीने कमी करणे, जेणेकरून मंगळावरील हवेतील प्राणवायूचे प्रमाण पुढील दहा वर्षांत २१% होईल. आम्ही त्यादृष्टीने थोडे प्रयोग सुरु केले आहेत.”

श्री.आर्यन जोशी यांनी तीनही गटांचे व सौ. मधुरा जोशी यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर ते म्हणाले, ” तुम्ही सर्वांनी अथक प्रयत्न करून जे अहवाल सादर केले आहेत ते तांत्रिकदृष्ट्या बरोबर, व्यवहार्य आणि आर्थिक दृष्टीनेही अत्यंत योग्य आहेत. मी हे तीनही अहवाल एकत्र करून आपल्या माननीय चेअरमन साहेबांना सादर करीन. त्यानंतर ते सदरचा अंतिम अहवाल केंद्र सरकारच्या अंतरिक्ष विभागाकडे पाठवतील. त्यांच्याकडून निधी मंजूर झाल्यानंतर आपण कामास सुरुवात करू.”

श्री बी. सिवाप्पा यांनी अंतिम अहवाल केंद्र सरकारच्या अंतरिक्ष विभागाकडे पाठवला. पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घातल्याने आठ दिवसांतच अहवालास मंजुरी मिळून निधी मंजूर सुद्धा झाला.

श्री.आर्यन जोशी यांनी सर्व कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली. श्री जोशी म्हणाले, ” मित्रहो, आपण पाठविलेला अहवाल केंद्रीय अंतरिक्ष विभागाने मंजूर केला आहे, व त्यासाठी लागणाऱ्या निधीला विशेष बाब म्हणून अर्थमंत्रालयाने मंजूरी दिली आहे. आता आपण कामाला लागले पाहिजे. या विश्वातील मानवाच्या अस्तित्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. आपल्या देशाला हजारो वर्षांचा वैज्ञानिक वारसा आहे. तोच आपण मंगळावरही पुढे चालवायचा आहे.”

क्रमशः भाग तिसरा …

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भीमाबाईचं पुस्तक प्रेम… प्राची उन्मेष ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ भीमाबाईचं पुस्तक प्रेम… प्राची उन्मेष ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल वाघ यांची ‘ बैल ’, कवी शंकर बोराडे यांची ‘ गांधी ’, लक्ष्मण महाडिक यांची ‘ माती ’,लता पवार यांची ‘आपली मैत्रीण ’, प्रा.व.ना.आंधळे यांची ‘ आई,मला जन्म घेऊ दे ’, असे कवी आणि त्यांच्या कवितांमध्ये हरवून जायचं असेल तर तुम्हाला नाशिक-आग्रा महामार्गावरील दहाव्या मैलावरील ‘ रिलॅक्स कॉर्नर ’ हे उपहारगृह गाठावं लागेल. भीमाबाई जोंधळे या सत्तर वर्षाच्या तरुण आजी हे उपहारगृह चालवत असून त्यांचं अनोखं पुस्तकप्रेम बघून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. त्यांच्या या उपहारगृहामध्ये पोटाच्या भुकेबरोबर वाचनाची भूक भागविण्यासाठी हजारो मराठी पुस्तके आहेत. 

पुस्तकं चाळता चाळता न्याहारी घेण्याची अनोखी शक्कल भीमाबाईंनी चालवली आहे. वय झालं म्हणून भीमाबाई हात बांधून बसल्या नाहीत. त्यांच्या हाताने बनलेली मिसळ आणि झुणका भाकर खाण्यासाठी खवय्यांची गर्दी होत असते. केवळ चौथीपर्यंतचं शिक्षण घेतलेल्या या आजी सकाळी चार वाजता उठतात. गेल्या बावीस वर्षांपासून त्या पेपर एजन्सी चालवत असून मोहाडी, जानोरी, सय्यद पिंप्री आदी ठिकाणी वृत्तपत्र वाटपाचे काम करतात. सकाळी गठ्ठे बांधून त्या विक्रेत्यांना देत असतात. हे काम करता करताच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाल्याचे त्या सांगतात. त्यांचं शिक्षण खतवड शाळेत झालं. मोहाडीच्या देशमुख आणि धनगर गुरुजींचे संस्कार त्यांना मिळाले. शाळेत अण्णासाहेब कवडे यांच्या हाताने मिळालेल्या पाच रुपयांच्या आरश्याचे बक्षीस जीवनाला वेगळीच दिशा देऊन गेल्याचे त्या सांगतात. 

लग्न झाल्यावर अवघ्या दोन एकर जमिनीत त्या स्वतः पिके घेत असत. सहा रुपये रोजाने देखील त्या काम करीत असत. महामार्गावर बारा वर्षापूर्वी एक छोटी टपरी टाकून त्यांनी हॉटेल सुरु केलं. तेव्हाच वृत्तपत्र टाकण्याचे काम देखील सुरु झालं. मराठी वाचन माणसाला सुसंस्कृत बनवत असते याचा अनुभव आल्याचे सांगत, दोन तीन कविता देखील त्या म्हणून दाखवतात. कवी दत्ता पाटील यांनी देखील त्यांना वेळोवेळी सहकार्य केलं. विशेष म्हणजे टपरीतून एका छोट्या हॉटेलपर्यंत त्यांचा प्रवास बघावयास झाला आहे. भीमाताईंनी नोटाबंदीच्या काळात अनेक भुकेलेल्यांना मोफत जेवण दिलं होतं. भीक मागणाऱ्यांना पैसे न देता खाऊ घालण्याची संस्कृती त्यांनी आजही जपून ठेवली आहे. त्यांच्या उपहारगृहामध्ये प्रत्येक टेबलावर दोन पुस्तके ठेवलेली असतात. बाळा नांदगावकर,भाई जगताप,अरुण म्हात्रे, अतुल बावडे,बाबासाहेब सौदागर अश्या ज्येष्ठ, नामांकित साहित्यिक, कवींनी या हॉटेलला भेट देऊन आजींच्या कार्याचा गौरव केला आहे. हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकाचा वाढदिवस असेल तर त्याला एक पुस्तक आजी भेट देतात. मुलांनी मोबाईलपासून दूर राहावे आणि पुस्तकाच्या दुनियेत हरवून जावे या उद्देशाने त्या पुस्तक वाचन चळवळ चालवत आहे. आता मुलगा प्रवीण हा आईच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करत आहे. त्याने आज पर्यंत तब्बल ७२ पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांची सून प्रीती यादेखील त्यांना या कामात मदत करीत असतात. 

पुस्तकांसोबत या हॉटेलमध्ये पारंपरिक वस्तू देखील बघायला मिळतात. पाटा, वरवंटा आदी वस्तू मुलांना दाखवून त्या कशा वापरायच्या याचं प्रात्यक्षिकही त्या देत असतात. मराठी पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी रिलॅक्स कॉर्नरला भेट द्यायला हवी.

भीमाबाई सांगतात, “ मी गेली बावीस वर्ष वृत्तपत्र वाटपाचा व्यवसाय करते आहे. घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे हॉटेल व्यवसाय सुरु केला. सध्या मोबाईलमुळे वाचन संस्कृती कमी होत चालल्याचं दिसतं. त्यातूनच मला ही कल्पना सुचली. आज आमच्याकडे शेकडो पुस्तके आहेत. त्याचे वाचन करण्यासाठी नाशिकमधून नागरिक येतात याचं समाधान वाटतं. ही पुस्तक चळवळ व्यापक व्हावी हीच अपेक्षा आहे.

– प्राची उन्मेष, नाशिक

संग्राहक : सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दाद देणे…. सुश्री संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ दाद देणे…. सुश्री संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

कधी ही दाद ‘ अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती..’ अशी खानदानी असते. कधी ‘असा बालगंधर्व आता न होणे..’ अशी काव्यात्म असते ,कधी ‘ आपके पाँव देखे, बहुत हसीन हैं , इन्हें जमींपर मत उतारिए,मैले हो जाएंगे,’ अशी रूमानी असते, तर कधी ‘ इक रात में दो-दो चाँद खिले’ अशी अस्मानी असते.

परवा अमेरिकेत एका मॉलमध्ये लिफ्टची वाट पाहात  थांबलो होतो. लेकीने व मी छान रंगसंगतीचा भारतीय पेहराव केला होता. लिफ्ट उघडली,आतून तीन चार अमेरिकन महिला बाहेर आल्या,एकजण व्हीलचेअर ढकलत होती. एक सुंदर, गोरीपान ,अशक्त मुलगी व्हीलचेअरमध्ये बसली होती. ‘बिच्चारी,’ अशी करुणा माझ्या मनात जागी व्हायच्या आतच, लिफ्टबाहेर पडताना अचानक माझ्याकडे व सोनलकडे पाहात तिने म्हटले,”Your attire is so beautiful!! I like it! ” मला अशी चकित, आनंदित, सुगंधित करून ती दूर निघूनही गेली. पण माझे काही तास खास  करून गेली.

मला आठवतंय सिंगापूरच्या एका मत्स्यालयात गेलो होतो आम्ही.तिथल्या स्वच्छतागृहात जात असताना माझ्याबरोबर एक अत्यंत सुंदर वृद्धा आत जाताना मी पाहिली. ‘कुदरत ने बनाया होगा,फुरसत से तुम्हें मेरी जान’ असंच  म्हणावंसं वाटावं अशी सुंदर गुलाबी कांती, आटोपशीर बांधा,पांढराशुभ्र ,चमकदारदाट बॉबकट आणि      

चेह-यावरचा समाधानी,प्रेमळ,गोड स्मितभाव!  बाहेर आल्यावर मी तिची वाट पाहात थांबले आणि ती आल्यावर तिला सामोरी होत म्हटलं,”Excuse me,but I must say you look so gorgeous, just like queen Elizabeth. ” तिने माझ्याकडे निमिषभर अतीव आश्चर्याने पाहिले आणि मग ढगाबाहेर येऊन सूर्य उजळावा तसा तिचा चेहरा उजळला. सुंदरसे स्मित करत तिने माझे दोन्ही हात हातात धरले आणि  मला म्हणाली,” good gratius! You are so beautifuly sensitive! Thank you dear,Thank you so much! Be like this for ever!!” आणि दिवसभर मलाच सुंदर झाल्यासारखे वाटत राहिलं तिला सुंदर म्हटल्यामुळे!!

त्या दिवशी कोल्हापूरच्या ‘ ओपेल’ होटेलमध्ये जेवायला गेलो तेव्हा दिवस मावळला होता. भुकेपेक्षा दमल्याची जाणीव सगळ्यांनाच अधिक प्रकर्षाने होत होती.टेबलावरच्या मेन्यूकार्डमध्ये ‘दहीबुत्ती’ हा पदार्थ वाचून मोगँबो एकदम खुशच हुआ. काही मिनिटातच समोर आलेली, मस्त हिरवीगार  कोथिंबीर पेरलेली,कढीपत्ता,लाल मिरची,जि-याचा तड़का ( वापरावेत कधीकधी अमराठी शब्द,पर्यायच नसतो त्या शब्दाच्या flavor ला  🙂 )मारलेली, दह्याचा अदबशीर आंबटपणा असलेली पांढरीशुभ्र दहीबुत्ती समोर आली आणि क्षुधेचा सुप्त राक्षसच जागा झाल्यासारखा ताव मारला. अहाहा!! अशी दहीबुत्ती मी ताउम्र चाखली नव्हती.अन्नदात्यासाठी पोटातून आलेली दाद ओठापर्यंत आली होती. पण त्याच्यापर्यंत पोहचवणार कशी? वेटरला विचारून पाहिले पण तो म्हणाला की शेफ सर आता फार बिझी आहेत म्हणून! मग काय करावे? त्याने दिलेल्या बिलाच्या पाठीमागेच लिहिले- ‘शेफसाहेब, तुम्ही बनवलेली चविष्ट दहीबुत्ती कोणत्याही पक्वान्नांना लाजवेल अशी! ‘तेरे हात मुझे  दे दे ठाकुर!’ असे म्हणावेसे वाटत आहे. धन्यवाद! ‘ टेबलावरचेच गुलाबाचे फूल आणि चिठ्ठी वेटरच्या हातात दिली नि म्हटले,”कृपया तुमच्या शेफसाहेबांना द्याल का? तो मान हलवून निघून गेल्यावर माझा लेक मला म्हणाला,” तो खरंच त्यांना देईल तुझी चिठ्ठी असं वाटतंय तुला?” मी म्हटलं,” त्याचा विचार मी करतच नाही, मी दाद दिली ,संपलं. पण ती दिली नसती तर मात्र त्या पाककलेवर अन्याय केल्यासारखं वाटत राहिलं असतं.त्या भावनेतून मुक्त झाले.मला छान वाटलं, बस्स्!”

माझ्या क्लासच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका वाटून झाल्या तेव्हा समोर बसलेल्या वैष्णवी पाटीलचा ( तब्बल २० वर्षानंतरही तिचे नाव लक्षात आहे माझ्या,तिच्या असेल का?) पेपर मुलांना दाखवत तिला म्हटलं, “वैष्णवी,असा पेपर तुझ्याएवढी असताना मला लिहिता आला असेल, असं नाही वाटत मला.” वैष्णवी डोळे मोठ्ठे करून बघत राहिली माझ्याकडे,

मला हसूच आलं. क्लास संपला,मी घरात आले आणि फोनची बेल वाजली. डॉ॰ विद्युत पटेल यांचा मुलगा माझा विद्यार्थी होता. त्याच्या आईचा फोन होता. काही तक्रार असेल का, अशा विचारात फोन घेतला. त्या म्हणाल्या, “मॅडम आज क्लासमधून माझा मुलगा घरी आला आणि त्याने मला घडलेली गोष्ट सांगितली,

वैष्णवीला तुम्ही जे बोललात ते सांगितलं आणि म्हणाला,” एक टीचर असं कसं काय बोलू शकते? स्वतःकडे कमीपणा घेऊन? मी असं कधीच ऎकलं नाही.” त्या पुढे म्हणाल्या,” मॅडम ,तुम्ही चांगल्या बिया पेरताय. मुलांची झाडे मजबूत होतील.” मी चकित! वैष्णवीच्या आईचा फोन असता तर मी एकवेळ समजू शकले असते,पण….! मग बरं वाटलं की जाता जाता घातलेलं पाणीही मुळाशी पोचतंय!

बी.एड. चा पहिला दिवस! एकेक तास होत होता,नव्या नव्या प्राध्यापिकांची तोंड ओळख होत होती. मी वाट पाहात होते माझ्या आवडत्या मानसशास्त्राच्या तासाची.

कोण प्राध्यापिका असतील,कशा   शिकवणा-या असतील अशा विचारात असतानाच एक प्राध्यापिका व्यासपीठावर येऊन उभ्या राहिल्या आणि स्वत:ची ओळख करून देत म्हणाल्या, “मी—. मी तुम्हाला मानस शास्त्र हा विषय शिकवणार आहे.”

माझा एकदम मूडच गेला. बुटक्याश्या,विरळ केसांचे पोनिटेल बांधलेल्या, खरबरीत चेह-याच्या या बाईंकडे माझा आवडता विषय असणार होता. नाराजीनेच मी थोडीशी मागे टेकून बसले. आणि हळूहळू पहाटेचा लालिमा पसरत पसरत सूर्याचं बिंब उजळत जावं तसा त्यांनी आपला विषय रंगवत नेला. तास संपला तेव्हा मनावर दाट पसरली होती ती त्यांच्या अनुपम अध्यापनकौशल्याची मोहिनी! भारावल्यासारखी मी बाकाजवळून उठले आणि धावतच, बाहेर पडणा-या त्यांच्याजवळ गेले. माझा गळा भरून आला होता. पश्चात्तापाने की हृदयातल्या अननुभूत आनंदाने? मी लहानग्या मुलीसारखं हरखून म्हटलं,” बाई,तुम्ही किती छान शिकवलंत…” आणि मला पुढे बोलवेच ना !  माझ्या भावना कळल्यासारख्या त्या छानशा हसल्या आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून निघून गेल्या. मी परत वर्गात आले. आपल्याला इतका आनंद कशाचा झाला आहे याचा विचार करीत…!!

लेखिका : सुश्री संजीवनी बोकील

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आतिश का तरकश #162 – 48 – “अक्सर देखा है राह में…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी  ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं ।प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकशआज प्रस्तुत है आपकी ग़ज़ल “अक्सर देखा है राह में …”)

? ग़ज़ल # 48 – “अक्सर देखा है राह में …” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ?

अरमानों के बाज़ार में दुकान पर बैठी लाचारी,

हम दुखों की हाट में ढूँढते सुखिया राजकुमारी।

इस ज़िंदगी में ख़ूब बनते हैं रिश्ते निभाने को,

लेनदेन का फलता फूलता कारोबार है रिश्तेदारी।

जवानी में चढ़ता है ज़िंदगी का नशा खींचकर

बुढ़ापे के पायदान पर उतरती नशे की ख़ुमारी।

अक्सर देखा है राह में क़ालीन बिछाते उनको,

चलती है अगर कोई चीज़ साथ वो है ख़ुद्दारी।

चीजों को इकट्ठा कर रोप रहे दुखों की पौध,

बाग़ में रविश-रविश खिलेगी ग़मों की क्यारी।

दुनिया में आया है तू एक तड़पते दर्द के साथ

तेरे आने के साथ जुड़ी है माँ की पीर दुलारी।

पी रहा हूँ ग़म के प्याले भरकर हर सुबहो शाम,

हर ज़ाम पर निखरती जाए शक्लो सूरत न्यारी।

‘आतिश’ गमगीं है तो क्या ग़मगीं दुनिया सारी,

तेरी न मेरी हम सबकी साझा जागीर है प्यारी।

© श्री सुरेश पटवा ‘आतिश’

भोपाल, मध्य प्रदेश

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

ज्योतिष साहित्य ☆ धन्वंतरी जयंती या धन त्रयोदशी ☆ ज्योतिषाचार्य पं अनिल कुमार पाण्डेय ☆

ज्योतिषाचार्य पं अनिल कुमार पाण्डेय

विज्ञान की अन्य विधाओं में भारतीय ज्योतिष शास्त्र का अपना विशेष स्थान है। हम अक्सर शुभ कार्यों के लिए शुभ मुहूर्त, शुभ विवाह के लिए सर्वोत्तम कुंडली मिलान आदि करते हैं। साथ ही हम इसकी स्वीकार्यता सुहृदय पाठकों के विवेक पर छोड़ते हैं। हमें प्रसन्नता है कि ज्योतिषाचार्य पं अनिल पाण्डेय जी ने ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के विशेष अनुरोध पर साप्ताहिक राशिफल प्रत्येक शनिवार को साझा करना स्वीकार किया है। इसके लिए हम सभी आपके हृदयतल से आभारी हैं। साथ ही हम अपने पाठकों से भी जानना चाहेंगे कि इस स्तम्भ के बारे में उनकी क्या राय है ? 

☆ ज्योतिष साहित्य ☆ धन्वंतरी जयंती या धन त्रयोदशी ☆ ज्योतिषाचार्य पं अनिल कुमार पाण्डेय ☆

भारतीय परंपरा का पावन त्यौहार धन्वंतरी जयंती या धन त्रयोदशी निकट है । आज मैं आप सभी को इसके महत्व के बारे में बताऊंगा।

दीपावली पांच पर्वों का समूह है जोकि धनतेरस  से प्रारंभ होता है ।

धनतेरस को धनत्रयोदशी धन्वंतरि जयंती या यम त्रयोदशी के नाम से भी जाना जाता है । 

धनतेरस को मनाने के लिए के बारे में दो अलग-अलग कथाएं हैं ।

पहली कथा के अनुसार इसी दिन समुंद्र मंथन के दौरान भगवान धन्वंतरि अमृत लेकर प्रकट हुए थे । अर्थात इस दिन मानव जाति को अमृत रूपी  औषध प्राप्त हुई थी । इस औषध की एक बूंद ही व्यक्ति के मुख में जाने से  व्यक्ति की कभी भी मृत्यु नहीं होती है । अगर हम आज के संदर्भ में बात करें एक ऐसी वैक्सीन की खोज हुई थी जिसके एक बूंद में  मात्र से व्यक्ति को कभी कोई रोग नहीं हो सकता है ।

दूसरी कथा के अनुसार यमदेव ने एक चर्चा के दौरान बताया है कि कार्तिक कृष्ण पक्ष की त्रयोदशी को रात्रि के समय  पूजन एवं दीपदान को विधि पूर्वक पूर्ण करने से अकाल मृत्यु से छुटकारा मिलता है । इसमें दीपक और पूजन का महत्व बताया गया है । अगर हम वैज्ञानिक दृष्टिकोण से देखें तो यम देव ने संभवत एक ऐसे तेल का आविष्कार किया था जिसका दीप बनाकर प्रयोग करने  से उस दीप की लौ से निकलने वाले गैस को ग्रहण करने से अकाल मृत्यु से व्यक्ति को छुटकारा मिलता था ।  अगर हम ध्यान दें तो इन दोनों कथाओं का संबंध व्यक्ति के स्वास्थ्य से है ।

अगर हम इस त्योहार को सामान्य दृष्टिकोण से देखें तो हम पाते हैं कि कार्तिक कृष्ण पक्ष की त्रयोदशी तक वर्षा ऋतु समापन पर आ जाती है और इस दिन भी प्रकार की पूजा पाठ करने से तथा दीपक जलाने से विभिन्न प्रकार के कीट पतंगों का जो कि हमारे स्वास्थ्य के लिए नुकसानदायक हैं नष्ट करने में हमें मदद मिलती है।

जैन आगम में धनतेरस को ‘धन्य तेरस’ या ‘ध्यान तेरस’ भी कहते हैं। भगवान महावीर इस दिन तीसरे और चौथे ध्यान में जाने के लिये योग निरोध के लिये चले गये थे। तीन दिन के ध्यान के बाद योग निरोध करते हुये दीपावली के दिन निर्वाण को प्राप्त हुये। तभी से यह दिन धन्य तेरस के नाम से प्रसिद्ध हुआ।

 धन्वन्तरि जब प्रकट हुए थे तो उनके हाथो में अमृत से भरा कलश था। भगवान धन्वन्तरि चूँकि कलश लेकर प्रकट हुए थे इसलिए ही इस अवसर पर बर्तन खरीदने की परम्परा है। कहीं कहीं लोकमान्यता के अनुसार यह भी कहा जाता है कि इस दिन धन (वस्तु) खरीदने से उसमें तेरह गुणा वृद्धि होती है। इस अवसर पर लोग धनियाँ के बीज खरीद कर भी घर में रखते हैं। दीपावली के बाद इन बीजों को लोग अपने बाग-बगीचों में या खेतों में बोते हैं। धनतेरस के दिन चाँदी खरीदने की भी प्रथा है । लोग इस दिन ही दीपावली की रात लक्ष्मी, गणेश की पूजा हेतु मूर्ति भी खरीदते हैं।

आप सभी को यह जानकर प्रसन्नता होगी की धनतेरस को भारत सरकार ने राष्ट्रीय आयुर्वेद दिवस के रूप में मान्यता दी है।

धनत्रयोदशी रात्रि का त्यौहार है इस वर्ष जबलपुर के भुवन विजय पंचांग के अनुसार त्रयोदशी 22 अक्टूबर को सायंकाल 4:04 से प्रारंभ हो रही है और अगले दिन अर्थात 23 तारीख को दिन के 4:35 तक रहेगी । इससे यह स्पष्ट है दीपदान हेतु समय 22 अक्टूबर को सायंकाल 4:04 के बाद ही प्रारंभ होगा । उज्जैन के पुष्पांजलि पंचांग के अनुसार त्रयोदशी 22 तारीख को सायंकाल 5:56 से प्रारंभ हो रही है जो अगले दिन 23 तारीख को सायंकाल 5:58 तक रहेगी । जबलपुर के समय के अनुसार 23 तारीख को 4:30 से 4: 33 रात्रि अंत तक भद्रा रहेगी । 22 तारीख को सायंकाल का मुहूर्त ही उपयुक्त है । धनतेरस की खरीदारी 22 तारीख को सायंकाल उज्जैन के समय के अनुसार सायंकाल 5:56 से 7:29 तक तथा इसके उपरांत रात्रि 9:03 से रात्रि के 25:46  अर्थात रात्रि 1:46 तक  की जा सकती है।

पूजन मुहूर्त की गणना निर्णय सिंधु ग्रंथ के अनुसार की गई है।

मां शारदा से प्रार्थना है कि आप सभी को सुख समृद्धि और वैभव प्राप्त हो। जय मां शारदा।

निवेदक:-

ज्योतिषाचार्य पं अनिल कुमार पाण्डेय

(प्रश्न कुंडली विशेषज्ञ और वास्तु शास्त्री)

सेवानिवृत्त मुख्य अभियंता, मध्यप्रदेश विद्युत् मंडल 

संपर्क – साकेत धाम कॉलोनी, मकरोनिया, सागर- 470004 मध्यप्रदेश 

मो – 8959594400

ईमेल – 

यूट्यूब चैनल >> आसरा ज्योतिष 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – धनतेरस ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ श्रीमहालक्ष्मी साधना 🌻

दीपावली निमित्त श्रीमहालक्ष्मी साधना, कल शनिवार 15 अक्टूबर को आरम्भ होकर धन त्रयोदशी तदनुसार शनिवार 22 अक्टूबर तक चलेगी।इस साधना का मंत्र होगा-

ॐ श्री महालक्ष्म्यै नमः।

आपसे विनम्र अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

? संजय दृष्टि – लघुकथा – धनतेरस ??

इस बार भी धनतेरस पर चाँदी का सिक्का खरीदने से अधिक का बजट नहीं बचा था उसके पास। ट्रैफिक के चलते सिटी बस ने उसके घर से बाजार की 20 मिनट की दूरी 45 मिनट में पूरी की। बाजार में इतनी भीड़ कि पैर रखने को भी जगह नहीं। अलबत्ता भारतीय समाज की विशेषता है कि पैर रखने की जगह न बची होने पर भी हरेक को पैर टिकाना मयस्सर हो ही जाता है।

भीड़ की रेलमपेल ऐसी कि दुकान, सड़क और फुटपाथ में कोई अंतर नहीं बचा था। चौपहिया, दुपहिया, दोपाये, चौपाये सभी भीड़ का हिस्सा। साधक, अध्यात्म में वर्णित आरंभ और अंत का प्रत्यक्ष सम्मिलन यहाँ देख सकते थे।

….उसके विचार और व्यवहार का सम्मिलन कब होगा? हर वर्ष सोचता कुछ और…और खरीदता वही चाँदी का सिक्का। कब बदलेगा समय? विचारों में मग्न चला जा रहा था कि सामने फुटपाथ की रेलिंग को सटकर बैठी भिखारिन और उसके दो बच्चों की कातर आँखों ने रोक लिया। …खाना खिलाय दो बाबूजी। बच्चन भूखे हैं।..गौर से देखा तो उसका पति भी पास ही हाथ से खींचे जानेवाली एक पटरे को साथ लिए पड़ा था। पैर नहीं थे उसके। माज़रा समझ में आ गया। भिखारिन अपने आदमी को पटरे पर बैठाकर उसे खींचते हुए दर-दर रोटी जुटाती होगी। आज भीड़ में फँसी पड़ी है। अपना चलना ही मुश्किल है तो पटरे के लिए कहाँ जगह बनेगी?

…खाना खिलाय दो बाबूजी। बच्चन भूखे हैं।…स्वर की कातरता बढ़ गई थी।..पर उसके पास तो केवल सिक्का खरीदने भर का पैसा है। धनतेरस जैसा त्योहार सूना थोड़े ही छोड़ा जा सकता है।…वह चल पड़ा। दो-चार कदम ही उठा पाया क्योंकि भिखारिन की दुर्दशा, बच्चों की टकटकी लगी उम्मीद और स्वर में समाई याचना ने उसके पैरों में लोहे की मोटी सांकल बाँध दी थी। आदमी दुनिया से लोहा ले लेता है पर खुदका प्रतिरोध नहीं कर पाता।

पास के होटल से उसने चार लोगों के लिए भोजन पैक कराया और ले जाकर पैकेट भिखारिन के आगे धर दिया।

अब जेब खाली था। चाँदी का सिक्का लिए बिना घर लौटा। अगली सुबह पत्नी ने बताया कि बीती रात सपने में उसे चाँदी की लक्ष्मी जी दिखीं।

🙏 शुभ धन त्रयोदशी। 🙏

प्रात: 4:56 बजे, 25.10.2019 (धनतेरस)

© संजय भारद्वाज

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ “श्री हंस” साहित्य # 39 ☆ गजल ।। आँखें ।।☆ श्री एस के कपूर “श्री हंस”☆

श्री एस के कपूर “श्री हंस”

(बहुमुखी प्रतिभा के धनी  श्री एस के कपूर “श्री हंस” जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त अधिकारी हैं। आप कई राष्ट्रीय पुरस्कारों से पुरस्कृत/अलंकृत हैं। साहित्य एवं सामाजिक सेवाओं में आपका विशेष योगदान हैं।  आप प्रत्येक शनिवार श्री एस के कपूर जी की रचना आत्मसात कर सकते हैं। आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण गजल ।।आँखें।।)

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ “श्री हंस” साहित्य # 39 ☆

☆ गजल ☆ ।। आँखें ।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस” ☆ 

[1]

खुशी गम हर बात का ऐलान  हैं आंखें।

दिल का दिखाती पूरा जहान  हैं आंखें।।

[2]

मन की हालत दिल की   सूरत  छिपी हुई।

हमारे जज्बातों का जमींआसमान हैं आंखें।।

[3]

कभी हंसती बोलती  बताती बहुत कुछ।

कभी कभी हैरत से बहुत हैरान हैं आंखें।।

[4]

कभी नरम गरम तो कभी आंसू मुस्कान।

बन जाती शोला शबनम तूफान हैं आंखें।।

[5]

आंखों में भरी होती इबादत   शरारत भी।

मानो कि कोई बोलती सी जुबान हैं आंखें।।

[6]

दिखाती बताती जैसे हर बात आदमी की।

आदमी की शख्सियत का निशान हैं आंखें।।

[7]

हंस ऊपरवाले ने बख्शी ह मको दो आंखें।

सच कहें तो यह आईने- इंसान हैं आंखें।।

© एस के कपूर “श्री हंस”

बरेली

ईमेल – Skkapoor5067@ gmail.com

मोब  – 9897071046, 8218685464

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ काव्य धारा # 105 ☆ ’’मां लक्ष्मी…” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध

(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी  द्वारा श्री गणेश चतुर्थी पर्व पर रचित एक कविता  – ’’मां लक्ष्मी…” …”। हमारे प्रबुद्ध पाठकगण  प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी  काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे।) 

☆ काव्य धारा #104 ☆  ’’मां लक्ष्मी…” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

 

कल्याण दायिनी , धनप्रदे , माँ लक्ष्मी कमलासने

संसार को सुखप्रद बनाया , है तुम्हारे वास ने

 

निर्धन को भी निर्भय किया ,माँ तुम्ही के प्रकाश ने

जग को दिया आलोक हरदम , तुम्हारे विश्वास ने

 

चलती नहीं माँ जिंदगी , संसार में धन के बिना

जैसे कि आत्मा अमर होते हुये भी , तन कर बिना

 

हर एक मन में है तुम्हारी ,कृपा की मधु कामना

आशा लिये कर सक रहा , कठिनाईयों का सामना

 

संगीत सा आनन्द है , धन की मधुर खनकार में

संसार का व्यवहार सब , केंन्द्रित धन के प्यार में

 

सबके खुले हैं द्वार स्वागत में , तुम्हें सन्मानने

माँ जगह हमको भी दो ,अपने चरण के पास में

 

मन सदा करता रहा , मन से तुम्हारी साधना

सजी है पूजा की थाली , करने तेरी आराधना

 

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

ए २३३ , ओल्ड मीनाल रेजीडेंसी  भोपाल ४६२०२३

मो. 9425484452

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

ज्योतिष साहित्य ☆ साप्ताहिक राशिफल (24 अक्टूबर से 30 अक्टूबर 2022) ☆ ज्योतिषाचार्य पं अनिल कुमार पाण्डेय ☆

ज्योतिषाचार्य पं अनिल कुमार पाण्डेय

विज्ञान की अन्य विधाओं में भारतीय ज्योतिष शास्त्र का अपना विशेष स्थान है। हम अक्सर शुभ कार्यों के लिए शुभ मुहूर्त, शुभ विवाह के लिए सर्वोत्तम कुंडली मिलान आदि करते हैं। साथ ही हम इसकी स्वीकार्यता सुहृदय पाठकों के विवेक पर छोड़ते हैं। हमें प्रसन्नता है कि ज्योतिषाचार्य पं अनिल पाण्डेय जी ने ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के विशेष अनुरोध पर साप्ताहिक राशिफल प्रत्येक शनिवार को साझा करना स्वीकार किया है। इसके लिए हम सभी आपके हृदयतल से आभारी हैं। साथ ही हम अपने पाठकों से भी जानना चाहेंगे कि इस स्तम्भ के बारे में उनकी क्या राय है ? 

☆ ज्योतिष साहित्य ☆ साप्ताहिक राशिफल (24 अक्टूबर से 30 अक्टूबर 2022) ☆ ज्योतिषाचार्य पं अनिल कुमार पाण्डेय ☆

सर्वप्रथम आप सभी को दीपावली धनतेरस भाई दूज गोवर्धन पूजा नरक चतुर्दशी त्योहारों की बधाई ।

कहा गया है कि-

सौभाग्य न सब दिन सोता है ,दुर्भाग्य न सब दिन होता है।

तुम तो पथिक हो ,चलते चलो राहों में।

पंडित अनिल पाण्डेय का आप सभी को नमस्कार । मैं आपको 24 अक्टूबर से 30 अक्टूबर 2022 अर्थात विक्रम संवत 2079 ई ,शक संवत 1944 के कार्तिक कृष्ण पक्ष की अमावस्या से कार्तिक शुक्ल पक्ष की पंचमी तक के सप्ताह में घटित होने वाले सौभाग्य और दुर्भाग्य के बारे में आपको बताऊंगा।

इस सप्ताह चंद्रमा प्रारंभ में कन्या राशि में रहेगा तथा तुला और वृश्चिक से गोचर करता हुआ दिनांक 29 को 11:37 दिन से धनु राशि में प्रवेश करेगा । इस पूरे सप्ताह सूर्य और शुक्र तुला राशि में रहेंगे । मंगल मिथुन राशि में ,राहु मेष राशि में,गुरु वक्री होकर मीन राशि में,शनि मकर राशि में रहेगा । बुध ग्रह प्रारंभ में कन्या राशि में रहेंगे तथा 26 तारीख को 1:48 दिन से तुला राशि में प्रवेश करेंगे।

आइए अब हम प्रत्येक राशि के राशिफल की चर्चा करते हैं ।

मेष राशि

इस सप्ताह आपको व्यापार में काफी लाभ मिलेगा । आपके व्यापार में उन्नति होगी । लंबी यात्रा का भी योग है । अगर आप अविवाहित हैं तो विवाह के सुंदर प्रस्ताव आएंगे भाग्य आपका साथ देगा कार्यालय में आपके प्रतिष्ठा में वृद्धि होगी शत्रुओं को आप पराजित कर सकेंगे इस सप्ताह आपके लिए 25 और 26 अक्टूबर लाभदायक है । 24 , 27 और 28 अक्टूबर को आपको सावधानी पूर्वक कार्य करना चाहिए। आपको चाहिए कि आप इस सप्ताह आदित्य हृदय स्त्रोत का पाठ करें सप्ताह का शुभ दिन मंगलवार है।

वृष राशि

इस सप्ताह आपको अपने भाग्य से एकाएक कुछ प्राप्ति हो सकती है आपके संतान को कष्ट हो सकता है दुर्घटनाओं में आप बचेंगे । मुकदमे में आपकी विजय होगी । अगर आप प्रयास करें तो आप शत्रु को पराजित कर सकते हैं । इस सप्ताह आपको 27 और 28 को कुछ परेशानी हो सकती है । सप्ताह के बाकी दिन सामान्य हैं। आपको चाहिए कि आप इस सप्ताह भगवान शिव का अभिषेक करें सप्ताह का शुभ दिन बुधवार है।

मिथुन राशि

इस सप्ताह आपके संतान को लाभ प्राप्त हो सकता है । छात्रों की पढ़ाई उत्तम चलेगी । परीक्षा में सफलता प्राप्त होगी । धन आने का उत्तम योग है । आपका स्वास्थ्य थोड़ा खराब हो सकता है । इस सप्ताह आपके लिए 29 और 30 अक्टूबर अत्यंत शुभ है । आप द्वारा 29 और 30 अक्टूबर को किए गए सभी कार्य सफल होंगे । 27 और 28 अक्टूबर को आपके शत्रु आप से पराजित हो जाएंगे । आपको चाहिए कि आप इस सप्ताह गुरुवार का व्रत करें और राम रक्षा स्त्रोत का जाप करें। सप्ताह का शुभ दिन रविवार है।

कर्क राशि

इस सप्ताह आपके सुख में अद्भुत रूप से वृद्धि की संभावना है । कार्यालय में आपकी मान प्रतिष्ठा बढ़ेगी । आपके सभी शत्रु आप से पराजित हो सकते हैं । आपका व्यापार उत्तम चलेगा । दूर देश में गमन का भी योग है । भाग्य से थोड़ी रूकावट हो सकती है । इस सप्ताह आपके लिए 25 और 26 अक्टूबर उत्तम है । 29 और 30 अक्टूबर को आपको सावधान रहने की आवश्यकता है । इस सप्ताह आपको चाहिए कि आप गणेश अथर्वशीर्ष का पाठ करें । सप्ताह का शुभ दिन बुधवार है।

सिंह राशि

इस सप्ताह आपके क्रोध में थोड़ी वृद्धि हो सकती है । भाइयों और बहनों से उत्तम संबंध रहेगा । नए शत्रु बनेंगे । पुराने शत्रु आपके प्रयासों से समाप्त हो सकते हैं । भाग्य आपका साथ देगा आपका स्वास्थ्य उत्तम रहेगा । जीवन साथी से प्रेम बढ़ेगा । प्रेम संबंधों में वृद्धि हो सकती है । इस सप्ताह के सभी दिन आपके लिए सामान्य हैं । आपको चाहिए कि आप इस सप्ताह काले कुत्ते को रोटी खिलाएं । सप्ताह का शुभ दिन सोमवार है ।

कन्या राशि

इस सप्ताह धन आने का उत्तम योग है । व्यापार में वृद्धि होगी । कार्यालय में थोड़ी परेशानी हो सकती है । आपका स्वास्थ्य थोड़ा नरम गरम रहेगा । आप के संतान की उन्नति होगी । आपके सुख में वृद्धि होगी । सुख संबंधी कोई नई सामग्री आप क्रय कर सकते हैं । इस सप्ताह आपके लिए 24 , 29 और 30 अक्टूबर सुख और लाभप्रद है । इन 3 दिनों में आप अधिकांश कार्यों में सफल होंगे । सफलता का उत्तम योग है । आपको चाहिए कि आप इस सप्ताह मंगलवार का व्रत रहें और मंगलवार को हनुमान जी के मंदिर में जाकर पूजा करें । सप्ताह का शुभ दिन रविवार है।

तुला राशि

इस सप्ताह आपका स्वास्थ्य उत्तम रहेगा । आपके जीवन साथी का भी स्वास्थ्य उत्तम रहेगा । आपके सुख में वृद्धि होगी । जनता में आपका यश फैलेगा । कचहरी के कार्यों में आपको नुकसान हो सकता है । भाइयों के साथ संबंध ठीक रहेंगे । यात्रा का योग है । इस सप्ताह आपके लिए 25 और 26 अक्टूबर उत्तम है । 27 और 28 को धन हानि हो सकती है । 24 अक्टूबर को आप कई कार्यों में असफल हो सकते हैं । आपको चाहिए कि आप इस सप्ताह रुद्राष्टक का पाठ करें । सप्ताह का शुभ दिन बुधवार है।

वृश्चिक राशि

कचहरी में के कार्यों में सफलता का बहुत अच्छा योग है । आपके अंदर क्रोध की मात्रा बढ़ सकती है । भाइयों से संबंध अच्छे रहेंगे धन की सीमित मात्रा में प्राप्ति होगी । शत्रुओं से संघर्ष होगा । संतान को थोड़ा कष्ट हो सकता है। इस सप्ताह आपको सावधान रहना चाहिए। आपको चाहिए कि आप इस सप्ताह भगवान शिव का प्रतिदिन अभिषेक करें । इसके अलावा घर की बनी पहली रोटी गौमाता को दें । सप्ताह का शुभ दिन सोमवार है।

धनु राशि

इस सप्ताह आपको धन की अच्छी प्राप्ति होगी । आपका व्यापार तेजी से बढ़ेगा । आपका स्वास्थ्य उत्तम रहेगा । जीवन साथी के स्वास्थ्य में थोड़ी समस्या आ सकती है । गलत रास्ते से भी धन आने का योग है । इस सप्ताह आपके लिए 24, 29 और 30 अक्टूबर उत्तम फलदायक हैं । कार्यों में सफलता का अच्छा योग है । 27 और 28 अक्टूबर को भी आपको सफलताएं मिलेंगी । इस सप्ताह आपको चाहिए कि आप प्रतिदिन गाय को हरा चारा खिलाएं । सप्ताह का शुभ दिन रविवार है।

मकर राशि

इस सप्ताह आपका स्वास्थ्य उत्तम रहेगा । आपके भाइयों को कष्ट होगा । कार्यालय में आपकी मान प्रतिष्ठा में वृद्धि होगी । शासन से आपकी सभी कार्य संपन्न होंगे । भाग्य कम साथ देगा। आपको चाहिए कि आप इस सप्ताह विष्णु सहस्त्रनाम का जाप करें जिससे भाग्य अच्छा साथ दें ।। इस सप्ताह आपके लिए 25 और 26 अक्टूबर फलदायक है । 29 और 30 अक्टूबर को आपको सावधान रहना चाहिए । सप्ताह का शुभ दिन बुधवार है।

कुंभ राशि

इस सप्ताह आपका भाग्य प्रबल है । भाग्य के कारण आपके कई कार्य आराम से होंगे । आप कोई बड़ी योजना बना सकते हैं । आपका स्वास्थ्य ठीक रहेगा । मुकदमे बाजी में सफलता मिलेगी । धन आने का योग है । यात्रा का योग है । इस सप्ताह 24 अक्टूबर को आपको सावधान रहना चाहिए । इस सप्ताह आपको चाहिए कि आप मंगलवार और शनिवार को हनुमान मंदिर में जाकर कम से कम 3 बार हनुमान चालीसा का जाप करें । सप्ताह का शुभ दिन शनिवार है।

मीन राशि

कार्यालय में आपकी प्रतिष्ठा इस सप्ताह बढ़ेगी। अधिकारियों एवं साथियों का आपको साथ मिलेगा । धन आने का अच्छा योग है । भाग्य आपका साथ देगा । छोटी मोटी दुर्घटना हो सकती है । कृपया सावधान रहें । आपका और आपके जीवन साथी का स्वास्थ्य थोड़ा खराब हो सकता है । इस सप्ताह आपके लिए 24 ,29 और 30 अक्टूबर बहुत अच्छे हैं । सफलता दायक हैं । 27 या 28 को भाग्य की वजह से आपके कई कार्य हो सकते हैं । 25 और 26 अक्टूबर को आपको सावधान रहना चाहिए । आपको चाहिए कि आप इस सप्ताह काले कुत्ते को रोटी खिलाएं। सप्ताह का शुभ दिन सोमवार है ।

मां शारदा से प्रार्थना है कि आप सभी को सुख समृद्धि और वैभव प्राप्त हो। जय मां शारदा।

राशि चिन्ह साभार – List Of Zodiac Signs In Marathi | बारा राशी नावे व चिन्हे (lovequotesking.com)

निवेदक:-

ज्योतिषाचार्य पं अनिल कुमार पाण्डेय

(प्रश्न कुंडली विशेषज्ञ और वास्तु शास्त्री)

सेवानिवृत्त मुख्य अभियंता, मध्यप्रदेश विद्युत् मंडल 

संपर्क – साकेत धाम कॉलोनी, मकरोनिया, सागर- 470004 मध्यप्रदेश 

मो – 8959594400

ईमेल – 

यूट्यूब चैनल >> आसरा ज्योतिष 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 125 – भाकरी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 125 – भाकरी ☆

दिसरात राबतिया

माझी माय ही बावरी।

तरी तिला मिळेना हो

चार घास ती भाकरी।।

 

बाप ठेऊनिया गेला

उभा कर्जाचा डोंगर।

उभी हयात राबून

गळा फासाचा हो दोर।

 

मार्ग सारेच खुंटले

भर दिसा अंधारले।

दोन्ही पिलांना पाहून

बळ अंगी संचारले ।

 

शेण पाणी झाडलोट

धुणी भांडी ही घासते।

अधाशीही मालकीण

पाने तोंडाला पुसते।

 

हाता तोंडाचं भांडण

काही सरता सरेना।

किती राबते तरीही

पोट सार्‍यांची भरेना

 

कशी शिकवावी लेक

कसे करावे संस्कार ।

निराधार योजनेला

घूस खोरीचा आधार।

 

कथा दारिद्रय रेषेची

असे फारच आगळी।

लाभार्थीच्या यादीला हो

दिसे दिग्गज मंडळी।

 

माय म्हणे बापा बरी

अर्धी कष्टाची भाकरी।

लाचारीच्या जिण्यापरी

लाख मोलाची चाकरी

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print