(श्री राकेश कुमार जी भारतीय स्टेट बैंक से 37 वर्ष सेवा के उपरांत वरिष्ठ अधिकारी के पद पर मुंबई से 2016 में सेवानिवृत। बैंक की सेवा में मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, राजस्थान के विभिन्न शहरों और वहाँ की संस्कृति को करीब से देखने का अवसर मिला। उनके आत्मकथ्य स्वरुप – “संभवतः मेरी रचनाएँ मेरी स्मृतियों और अनुभवों का लेखा जोखा है।” आज प्रस्तुत है आलेख की शृंखला – “देश -परदेश ” की अगली कड़ी।)
☆ आलेख # 32 ☆ देश-परदेश – शहीद स्मारक ☆ श्री राकेश कुमार ☆
हमारे देश में युद्ध में सर्वोच्च बलिदान देने वालों की याद में अनेक स्मारक बने हुए हैं। कई कस्बों और शहरों में शहीदों के नाम की पट्टियां और मूर्तियां लगाकर उनका सम्मान भी किया जाता है। शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यही बाक़ी निशा होगा”
विश्व युद्ध प्रथम, द्वितीय, शत्रु देश चीन, पाकिस्तान इत्यादि के साथ हुए युद्धों में अपने प्राण निछावर करने वाले देश के सपूतों की स्मृति को चिरस्थाई बनाए रखने और जन साधारण को प्रेरणा देने के लिए ये मील के पत्थर का कार्य करते हैं।
यहां विदेश में भी अनेक तिराहों, चौराहों आदि पर इसी प्रकार की नाम पट्टी लगी हुई मिली। वर्तमान निवास के पास एक तिराहे पर पैदल चलने वालों के लिए विश्राम स्थल बना हुआ है। वहां पर विश्व युद्ध प्रथम, द्वितीय और वियतनाम में अपनी जान देने वाले अमरीकी जो इस क्षेत्र के निवासी थे, उनके नाम और विभिन्न वीरता सम्मान प्राप्त सुरक्षा प्रहरियों के नाम में एक भारतीय मूल का नाम अंकित है। स्वर्गीय माईकल वी भाटिया (हो सकता है, अमेरिका में रहते हुए उन्होंने सुविधा के लिए अपने मूल नाम को माईकल कर लिया होगा) जिनको” मेडल ऑफ लिबर्टी” के सम्मान से नवजा गया है, इस बात का गवाह है। हमारे देश के लोगों ने जब भी मौका मिला उन्होंने बिना अपनी जान की परवाह किए, कर्तव्य को प्राथमिकता दी है। इस प्रकार का जज़्बा हम भारतीयों के खून में ही है।
(संस्कारधानी जबलपुर की श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’ जी की लघुकथाओं, कविता /गीत का अपना संसार है। साप्ताहिक स्तम्भ – श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य शृंखला में आज प्रस्तुत है मज़दूर दिवस पर आधारित एक हृदयस्पर्शी लघुकथा “मजदूर दिवस”।)
☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य # 156 ☆
☆ लघुकथा 🚩मजदूर दिवस🚩☆
प्रति वर्ष की भांति आज फिर एक नेता जी के बंगले के सामने एक बहुत बड़े बैनर पोस्टर पर लिखा था आज मजदूर दिवस के उपलक्ष में कोई भी मजदूर अपना कार्ड दिखाकर पेट भर भोजन कर सकता है। पूरे आसपास चर्चा का विषय बन गया। सभी मजदूर यहां-वहां भागने लगे। एक दूसरे को बताने लगे कि आज खाना भरपेट मिलेगा। क्यों? ना ठेकेदार से आज की छुट्टी लेकर लाइन में लगकर भोजन किया जाए।
इधर उधर से सभी मजदूर वहां पहुंचने लगे। दुखिया भी अपना फावड़ा हाथ में लिए वहां पहुंच गया। दोनों हाथ पर भरे भरे छाले थे। पेट चिपका, बाल बिखरे लगातार काम और खाना नहीं मिलने की वजह से वह काफी बीमार लग रहा था।
बंगले के मालिक ने दुखिया के साथ फोटो खिंचवाई। खाना खाने के बाद दुखिया बाहर निकल रहा था। चार कदम भी नहीं चल पाया, बेहोश होकर गिर पड़ा। अफरा तफरी मच गई सभी मजदूर भागने दौड़ने लगे।
चीखने चिल्लाने लगे किसी ने कहा… जल्दी से अस्पताल ले जाओ। दुखिया को उठाकर अस्पताल ले जाया गया। हालत बिगड़ती चली गई दुखिया के साथ आए हुए कुछ उसके साथियों ने देखा पलभर में ही दुखिया दुनिया को छोड चला गया।
पोस्टमार्टम रिपोर्ट आया डाक्टरों ने बताया… दुखिया कई दिनों से भूखा था, उसकी पेट की नसें सूख चुकी थी। आज उसे जब भरपूर खाना मिला। वह जरूरत से ज्यादा खा लिया। आंतों ने इसे स्वीकार नहीं किया और दुखिया खाना खाने की खुशी को सहन नहीं कर पाया। दिमागी संतुलन भी खो चुका।
बात हवा की तरह फैल गई बंगले के बाहर दुखिया के मृत शरीर को रखकर सभी मजदूर चिल्ला चिल्ला कर मजदूर दिवस जिंदाबाद मजदूर, एकता जिंदाबाद के नारे लगा रहे थे।
तभी किसी मजदूर ने धीरे से कहा… एक सप्ताह पहले दुखिया इसी बंगले पर कुछ खाने को मांगने आया था। बदले में वह कुछ काम कर दूंगा ऐसा कह रहा था। परंतु नेताजी ने चौकीदार से कह कर उसे बाहर से ही भगा दिया था और आज वह खाना खाकर मर गया।
उसके इतना कहते ही उसे घसीटते हुए भीड़ में न जाने कहां ले जाया गया पता नहीं चला। पुलिस और नेताओं की भीड़ बंगले के सामने लगे पोस्टर के साथ हाथ जोड़ती नजर आ रही थी और पोस्टर के सामने खड़े होकर सभी फोटो खिंचवा रहे थे।
पोस्टर पर लिखा मजदूर दिवस उड़कर उड़कर मजदूरों की कहानी बता रहा था।
एक मे. हा दिवस प्रत्येक कामगारासाठी आणि प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्ती साठी खास आनंदाचा,सोनियाचा दिवस. कामगार दिनाबद्दल बोलायचं तर ह्या दिवशी कामगारांसाठी फायद्याची आणि फायदा होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कायद्याची रुपरेषा आखली गेली. आधी कामगार वर्गावर जी आपबिती होती नं ती नुसती कळूनही किंवा वाचूनही हळहळ वाटत होती.कामगारांचा आधी अक्षरशः कोणीही वाली नव्हता. पिळवणूक म्हणजे कशी असेल हे जेव्हा आम्ही लोकं आठ तास काम करुन माना टाकतो नं तेव्हा पूर्वी हा कामगार वर्ग पंधरा पंधरा तास नाँनस्टाँप काम करीत होता नं तेव्हा खरी जाणीव होते. आजच्या सुधारणांमुळे आम्ही काम करु त्या प्रमाणात, वाढत्या महागाई नुसार आम्हाला त्या कामाचा मोबदला मिळतोयं पण खरचं पूर्वी जी वेठबिगारी होती नं ती फार भयानक होती हे आधीच्या कामगार मंडळींकडूनच समजतं आणि त्यांनी सहन केलेल्या आणि जिद्दीने तोंड दिलेल्या संकटाची कल्पना येते आणि तशी जाणीवही होते. बरं ह्या रुपरेषेत अनेक नानाविध मुद्द्यांमध्ये बदल फायदेशीर बदल करण्यात आले. ह्या मुद्द्यांमध्ये प्रामुख्याने बालकामगारांवर बंदी, महिला कामगारांच्या कामावर मर्यादा, तसेच रात्रीच्या व धोक्याच्या कामासाठी वेगळे नियम, कायद्याने साप्ताहिक सुट्टी, कामाचा मोबदला वस्तू रुपात न मिळता तो नगदी स्वरूपात मिळणे, समान काम तर समान वेतनं इत्यादी नियम अंतर्भूत केल्या गेलेत.भारतात कामगार दिनाची सुरवात 1 मे 1923 पासून झाली.
महाराष्ट्र दिन म्हंटला की ह्या बद्दलच्या आठवणींची सुरुवात शालेय जीवनापासून होते.
ह्या दिवशी शाळेत सकाळी झेंडावंदन व्हायचे. एक मे नंतर मग दोन तीन तारखेकडे निकाल लागून मग उन्हाळी सुट्ट्यांची सुरूवात व्हायची
1 मे ह्या दिवशी खास ऐकू येणारी गीतं म्हणजे श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचं”बहु असोत सुंदर संपन्न की महा,प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा”, आणि दुसरं गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी ह्यांच “प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा”.
अन्याय, पिळवणूक ह्यांची सुट्टी होऊन कामगारांना स्वावलंबनाने रोजीरोटी मिळवून देणारा हा कामगार दिवस व महाराष्ट्रातील जनतेला आपलं असं वेगळं अस्तित्व, जागा मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र दिन चिरायू होवो.
(अगदी साधेसुधे लोक दिसले ते. पण बोलायला चांगल्या होत्या तिच्या आई. म्हणाल्या, “ मी खरे सांगू का?”) इथून पुढे —-
“जरी आम्ही इतके वर्ष इकडे राहिलो, तरी आम्ही बेताच्या परिस्थितीतच रहातोय. यांना सतत भारतात, पैसे पाठवावे लागतात. आमच्या मुलाने लग्न झाल्याबरोबर वेगळे घर घेतले, आणि तो आमच्याशी अजिबात सम्पर्क ठेवत नाहीये. यांची एक अगदी साधी नोकरी आहे, आणि मीही बेबी-सिटिंगचे काम करते. इकडे राहणीमान खूपच महाग आहे हो. आमच्याकडून आपण खूप मानपान, आणि इतरही कसली अपेक्षा ठेवू नका प्लीज… म्हणजे आम्ही हे करूच शकणार नाही. एक दिवसाचा लग्नाचा खर्च करूआम्ही. . एक छोटे गळ्यातले तेवढे तिच्यासाठी करून ठेवले आहे मी. माझी मुलगी चांगली शिकलेली आहे, पगारही चांगला आहे तिला. आणि हे लग्न त्यांचे त्यांनीच ठरवलंय तर आपण एकमेकांच्या समजुतीने घेऊया. आम्ही तुमच्या तुलनेत खूप कमीच आहोत हे अगदीच मान्य आहे आम्हाला. “
गीता घरी आली. समीरला आईची नाराजी समजली. तो म्हणाला, “ कोणत्या काळात रहातेस आई? मोना आणि तिचे आईवडील खरोखर सज्जन आहेत. आणि आपल्याला काही कमी आहे का? मोना मिळवती मुलगी आहे. माझी आणि तिची वर्षभराची ओळख आहे. मला खात्री आहे, ती आणि मी नक्की सुखी राहू. मी सायलीशीही बोललोय परवा. तिलाही लग्नाला येता येणार नाहीये. पण तू मात्र ते करतील ते गोड मानून घे. मग भारतात गेलीस, की घे हवे ते. मी देईन की तुम्हाला भरपूर पैसे. ”. . . . समीर आपल्या आईला ओळखून होता.
ठरलेल्या दिवशी हिंदू टेम्पलमध्ये, अगदी साध्या पद्धतीने लग्न झाले. ना कोणते दिखाऊ समारंभ, ना मानपान. . . . . दोन तासात मंडळी घरी आलीसुद्धा. मोनाच्या आईवडिलांनी छान जेवण ठेवले होते. लग्नाला मोजकीच माणसे, ऑफिसचे मित्र, असे लोक होते. गीताने सगळे दागिने, भरजरी साडी मोनाला दिली. मोनाने हौसेने नेसली, आणि सगळे दागिनेही घातले. छान दिसत होती दोघांची जोडी.
राहून राहून गीताला मात्र वाटत होते, की काय हे लग्न. . . यापेक्षा गेट टुगेदर सुद्धा जास्त भपकेदार होते आपले. . . पण बोलणार कोण? आता आपल्या मैत्रिणी असले फोटो बघून काय म्हणतील? केवढे कौतुक सांगितले होते मी. . . . परदेशातले लग्न खूप सुंदर असते. . . यव आणि त्यव. . . . . आणि इथे २ तासात घरी. . . ना काही समारंभ, ना काही. . . एक साडी ठेवली माझ्या हातात ओटी भरून. . . आणि यांना साधासा कुर्ता आणि टी शर्ट. . . जाऊ द्या झालं.
दोन्ही मुलांनी आपल्या आपल्या लग्नात, मला न विचारता सगळे करून टाकले. वर दोन्हीही असले बेताचे व्याही मिळाले. . . अतिशय नाराज होती गीता. गीताने विचारले, “ कुठे जाणार नाही का हनिमूनला? “
मोना म्हणाली, “ ममा, जाऊ ना !पण तुम्ही आहात ना, तोपर्यंत नाही. ”
मोना दुसऱ्या दिवशी पट्कन उठून कामाला लागली. गीताच्या लक्षात आले, ही मुलगी सराईतासारखी वावरतेय स्वयंपाकघरात, म्हणजे ही इथे येऊन, राहून गेली असणार.
मोना म्हणाली, “ ममा तुम्ही खरच आराम करा. मला समीरचे सगळे किचन ओळखीचे आहे. मी कितीतरी वेळा येऊन करूनही गेलेय त्याच्यासाठी स्वयंपाक. ”. . . . मोनाने खरोखरच तासाभरात उत्तम स्वयंपाक केला. म्हणाली, “ ममा, पोळ्या मात्र बाहेरून आणल्यात हं. त्या करायला येत नाहीत मला, आणि वेळही नसतो. ”
गीता, रवी, समीर, सगळे अगदी मनापासून जेवले. रवीने मोनाची मनापासून स्तुती केली.
गीता म्हणाली, “ वावा !मोना, मस्त केलंस ग सगळं. आवडलं मला सगळं हं. आता समीरची काळजीच नाही मला. ”
मोना रात्री गीता आणि रवीच्या रूम मध्ये आली. म्हणाली, “ ममा, मला माहीत आहे, तुम्ही नाराज आहात. आम्ही तुमच्या बरोबरीचे नाही, माझे मॉम डॅड गरीब आहेत. पण ते खरोखर चांगले आहेत. मला, माझ्या भावाला, किती कष्ट घेऊन शिकवलंय त्यांनी. पण भाऊ निघूनच गेला अमेरिकेला. आज मी एवढा पगार, माझ्या आईवडिलांनी दिलेल्या शिक्षणानेच तर मिळवतेय. तुम्हाला आणखी एक सांगणार आहे,. . त्या दोघांना काहीही मदत लागली तर मी करणार आहे. त्यांची सम्पूर्ण जबाबदारी मी घेईन. अर्थात ते दोघे इतके मानी आहेत, की कधीही माझ्यावर अवलंबून राहणारच नाहीत. समीरला होकार देताना, मी हे आधीच सांगितलं आहे. त्याची काहीही हरकत नाही, आणि तुमचीही नसावी. ममा, नाती पारदर्शक असावीत ना. मी त्यांच्याशी, आणि समीरचे आईवडील म्हणून तुमच्याशीही, कायमच आदरानेच वागेन. मला तुम्ही समजून घ्या. लग्नात दिलेले दागिने छान आहेत, पण असले इतके भारी दागिने मी कधी वापरू? ते लहान मंगळसूत्र मात्र ठेवून घेते. . आणि फक्त २ साड्या मला पुरे आहेत. बाकी प्लीज घेऊन जा. मला खरोखर कसलाच सोस नाही हो. फक्त तुमचे प्रेम आणि आशीर्वाद द्या. “
गीता थक्क झाली. तिला आपल्या मैत्रिणींच्या सुना मुली आठवल्या. ’ मला लग्नात हेच हवे हं आई, आणि सासूलाही एखादा भारी दागिना तुम्ही द्यायला हवात, ’ हे बजावणारी सोनलची मुलगी आठवली.
मुलीला हिऱ्याचे मंगळसूत्र घेतले नाही, म्हणून लग्नात तमाशा करणारी प्रीतीची विहीण आठवली.
कोमलने लग्नात नुसतेच गुलाबजाम काय केले, आणखी काही स्वीट नाही का, म्हणून नाके मुरडणारी लता आठवली.
या सगळ्या मैत्रिणी, त्यांच्या मुलीसुना, तिला आठवल्याच एकदम. इतके मोठे खर्च करूनसुद्धा, न टिकलेली लग्नंही गीताला आठवली. . . एकाच वर्षात पल्लवीची सूनबाई निघून गेली होती. . . वर्षाची अत्यंत लाडावलेली मुलगी, सासरी सासूसासरे आणि नवऱ्याशीही पटत नाही म्हणून परत आली होती.
— हा सगळा चित्रपट गीताच्या डोळ्यासमोरून सरकला.
परदेशी जन्मलेली, पण संस्कार भारतीय असलेल्या या मुलीबद्दल एकदम माया दाटून आली गीताच्या पोटात. किती खरी वाटते ही मुलगी !
गीता उठली, आणि तिने मोनाला पोटाशी धरले. म्हणाली, “ मोना, मला आता माझ्या समीरची मुळीच काळजी नाही ग. फार छान निवड आहे त्याची. माझाच चष्मा बदलायला झाला होता. . . काय आहे ना समीर मोना, मी सामान्य आयुष्य कधी जगलेच नाही. सतत समाजातल्या श्रीमंत आणि उथळ मैत्रिणींसाठीच जगत आले. पार्ट्या, भिशी, सतत फार्महाऊसवर जाऊन मजा करणे, हेच आमचे आयुष्य !! पण खरं सांगू, अलीकडे उबग यायला लागला होता ग या दिखाऊ जगण्याचा. आता मात्र मी त्या ग्रुपमध्ये फिरकणार सुद्धा नाही. मोना, समीर, छान आहेत तुमचे विचार. सायलीसुद्धा मला हेच सांगत होती जीव तोडून. पण तेव्हा नाही पटलं. “
गीताच्या डोळ्यात पाणी आलं. रवीने तिला जवळ घेतले, आणि म्हणाला, “ मीही हेच सांगून शेवटी नाद सोडून दिला. पण गीता, मुळात तू खूप सरळ आणि भाबडी आहेस. चल, आता कबूल कर, आपल्या घरात, बाहेरची दोन्ही मुले लाख मोलाची आली आहेत … जावई आणि सून. ”
गीताने मान हलवली, आणि म्हणाली, “ हो रवी. कधीतरी येते अशी डोळे उघडणारी वेळ. आता भारतात गेले की सगळे ग्रुप सोडून देणार. मी msw आहे, हेही मी कित्येक वर्षे विसरूनच गेलेय रे रवी ! माझी मैत्रीण माया, मला केव्हाची अंध शाळेत काम करायला बोलावतेय. सारखी म्हणत असते, ‘ गीता, तुझा टॅलेंट वाया घालवत आहेस तू या दांभिक उथळ बायकांच्यात. एकदा येऊन बघ समाजातली दुःखे. . . विसरून गेली आहेस का ग. . आपण msw आहोत ते?’. . . तिकडे नक्की जाईन म्हणते. ”
अचानक झालेले हे परिवर्तन बघून, रवि आणि समीरने एकमेकांना टाळ्या दिल्या, आणि डोळे पुसत मोनाने गीताला मिठी मारली.
अतिशय समाधानाने, भरल्या मनाने, आणि डोळ्यांनी, गीता आणि रवी भारतात परतले.
खूप दिवसांपूर्वीची गोष्ट. दिवस कुठले, वर्षे लोटली. म्हणजे वीस – पंचवीस वर्षे सहज. आणि गोष्ट म्हणजे काय, तर हकीकत. त्यावेळी मी डी. एड. कॉलेज सांगलीमधे अध्यापन करत होते. मला शिकवायला आवडायचं आणि मुलींमध्ये रमायलाही. तेवढंच तरुण झाल्यासारखं वाटायचं. म्हणजे जॉब सटिस्फॅक्शन वगैरे म्हणतात न, ते होतं, पण तरीही दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीचे वेध लागायचेच. तेव्हा सुट्टी लागली, की मी यंव करीन अन् त्यव करीन असे मांडे मनात भाजत आणि खात रहायची. त्यातले काही मांडे असे —
पहाटे लवकर उठून व्यायाम आणि प्राणायाम करणे. सकाळी फिरायला जाणे. हे अगदी मस्टच, मी ठरवलं. सुट्टी असल्यामुळे सगळं आही आरामात आवरायचं, दुपारी पंख्याखाली अडवारायचं आणि मनसोक्त दिवाळी अंक किंवा पुस्तकं वाचायची. संध्याकाळी शेजारणी, सख्या- मैत्रिणी यांच्याकडे जाऊन गप्पांचे फड उठवणे, हाही आखलेला बेत असे. एरवी कॉलेजमधून घरी येताना नजरेच्या टप्प्यात जेवढ्या येतील, त्यांना ‘काय कसं काय?’ विचारणं आणि ‘ठीकय. ’ ऐकणं, या पलीकडे संवादाची मजल जात नसे.
पहाटे उठण्यासाठी गजर लागे. आधी घड्याळाचा, नंतरच्या काळात मोबाईलचा. गजर झाला की मनात येई, लवकर उठणं नि नंतरची लगबग नेहमीचीच आहे मेली. आज आरामात पांघरूणात गुरफटून पडून राहण्याचं सुख अनुभवू या. उद्यापासून सुरुवात करू. पण तो उद्या कधी उजाडत नसे. तो ‘आज’ होऊनच उगवे. व्यायाम, प्राणायाम, पक्ष्यांची किलबिल हे सगळं राहूनच जायचं. नाही तरी किलबिल ऐकायला आता शहरात पक्षी राहिलेतच कुठे, मी मनाशी म्हणे. मला आणि मुलांना सुट्टी असे, पण यांना ऑफीस असल्यामुळे यांचा डबा साडे नऊला तयार असणं गरजेचं असे. त्यामुळे सकाळची कामाची धांदल नेहमीसाराखीच करावी लागे, सुट्टी असूनसुद्धा. माझ्याप्रमाणे मुलांनीही सुट्टीचे कार्यक्रम ठरवलेले असायचे. पोर्चमध्ये उभे राहून गप्पा, किंवा मोबाईलवर चॅटिंग, यू ट्यूबवरचे सिनेमे बघणे, घरात पसारे करणे, त्यांच्या सवडीने जेवायला येणे, आई घरात आहे, म्हंटल्यावर आईनेच जेवायला वाढणे, अपेक्षित. त्यातून बाहेर पडले की माझे लक्ष, कपड्यांनी, भांड्यांनी, पुस्तकांनी ओसंडून वहाणार्या कपाटांकडे जाई॰ दिवाळीसारखा महत्वाचा सण. घर स्वच्छ, नीटनेटकं नको, असं मला आणि मलाच फक्त वाटे. घरातल्या इतर कुणाला नाही. ही आवरा-सावर होईपर्यंत दिवाळीचे पदार्थ करायचीच वेळ येई. पणत्या, वाती, उटणं, नवा साबण किती म्हणून तयारी करावी लागायची. दिवाळीच्या दिवसात रोज एक नवीन पक्वान्न हवंच. ‘तुझं गोड नको बाई, काही तरी चमचमीत कर’, अशी मुलांची मागणी. मागणी तसा पुरवठा करायलाच हवा ना, शेवटी आपलीच मुलं. जेवणं- मागचं आवरणं. दुपारचे सहज तीन वाजून जात. मग एखादा दिवाळी अंक घेऊन फॅनखाली पडावं, तर डोळे मिटू मिटू होत. मासिकातील अक्षरे पुसट होत जात आणि मासिक हातातून कधी गळून पडे, कळतच नसे. नाही म्हणायला, संध्याकाळी शेजारणी, सख्या- मैत्रिणी यांच्याकडे जाऊन गप्पांचे फड उठवणे, हा आखलेला बेत बराचसा तडीला जाई.
दिवाळी येई-जाई. कॉलेज पुन्हा सुरू होई. दिवस- महिने संपत. मार्च उगवे. पोर्शन शिकवून संपलेला असे आणि आता पुन्हा मोठ्या सुट्टीचे वेध लागत. आता मांडे मनात नाही, ताटात घेऊन खायचे, मी नक्की ठरवते. वाटतं, सुट्टीत कुठेतरी फिरून यावं. नवा प्रदेश पहावा. निसर्गाच्या सहवासात काही काळ घालवावा. ताजंतवान होऊन, नवी ऊर्जा घेऊन परत यावं आणि नव्या दमाने, नव्या उत्साहाने नेहमीच्या दिनचर्येला सुरुवात करावी. पण या महिन्यातल्या क्लासचे, परीक्षांचे मुलांचे वेळापत्रक, कधी कुणाचे आजारपण, घरातली, जवळच्या नात्यातील लग्ने या गोष्टी अॅडजेस्ट करता करता ट्रीपचं वेळापत्रक कोलमडून जाई. दिवाळी काय किंवा उन्हाळी सुट्टी काय, दरवर्षी थोड्या-फार फरकाने असंच काही-बाही होत राहिलं.
दिवस- महिने- वर्षे सरत आली. माझ्यासाठी कॉलेजची शेवटची घंटा वाजण्याची वेळ आली. एकीकडे कासावीस होत असतानाच मी मनाला समजावू लागले,
आता मला सुट्टी मिळणार मिळणार
खूप खूप मज्जा मी करणार करणार.
आता मला खरंच सुट्टी मिळाली आहे. आता आरामात उठायला हरकत नाही. आता साडे नऊच्या डब्याची घाई नाही. मुलांची जबाबदारी पण आता उरलेली नाही. ती आपापल्या नोकरीच्या गावी, आपआपल्या संसारात, मुलाबाळात रमली आहेत. सकाळी आता उशिरा, आरामात उठायचं. मी निश्चय करते. पण काय करू? जागच लवकार येते आणि एकदा जाग आल्यावर नुसतंच आंथरूणावर पडून रहावत नाही. पूर्वी पाहिलेली स्वप्ने आता आळोखे- पिळोखे देत जागी होऊ लागली.
आता सकाळी जाग आल्यावर उहून फिरायला जायचं मी ठरवलं. उत्साहाने जिना उतरू लागले, तर गुढगे आणि कंबर म्हणाली, ‘बाई ग, आता आमचा छळ थांबव!’ कमरेला चुचकारत नवा महागडा कंबरपट्टा आणून तिला नटवलं. गुढग्यांवरही छान उबदार वेष्टण चढवलं. पण त्यांचं तोंड वाकडंच. ते काही बेटे सहकार्य करेनात. शेवटी डॉक्टरांशी बोलले. डॉक्टरांनी क्ष-किरण फोटो काढला. फोटो बघत ते म्हणाले, ‘ आता या गुढग्यांना निरोप द्या काकू! आता नवे गुढगे आणा!’ तसे केले. नवे गुढगे घेऊन आले पण चालताना, इतकंच काय, बसताना, झोपतानाही पायाला वेदना होऊ लागल्या. पुन्हा डॉक्टर. पुन्हा क्ष-किरण फोटो. डॉक्टर म्हणाले, ‘ पाठीच्या कण्याच्या चौथ्या – पाचव्या मणक्यांनी गळामिठी घातलीय, ती सोडवायला हवी. ती सोडवली. मग मात्र माझे पाय वेदनारहित झाले. हळू हळू फिरणं वगैरे जमू लागलं. पण डॉक्टरांनी बजावलं, ‘आता चालताना हातात काठी घ्या. ’ आणि एक लोढणं गळ्यात नव्हे हातात आलं.
आता टी. व्ही. बाघायला वेळच वेळ होता. पण हळू हळू लक्षात येत गेलं, आपल्याला सिरियल्समधले संवाद नीट ऐकू येत नाहीयेत. टी. व्ही. च्या जरी जवळ बसलं, तरी फारसा उपयोग होत नाहीये. कानांकडे तशी तक्रार केली, तर ते म्हणाले, ‘आम्हाला गळामिठी घालायला एक सखा आण. त्याचे लाड-कोड पुरवले. पण त्यांचा हा सखा इतका नाठाळ निघाला, सगळा गलकाच ऐकवू लागला. नको ते आवाज मोठ्या प्रमाणात घुमवू लागला. हवे ते दडवून ठेवू लागला. थोडक्यात, हा कांनांचा सखा, असून अडचण अन नसून खोळंबा झाला. शेवटी मूकपट पाहून नाही का आपण आनंद घेत, तसाच टी. व्ही. बाघायचा, असं ठरवून टाकलं.
आता वाचायला खूप वेळ होता. चांगली पुस्तकेही हाताशी होती. पण—-
इथेही पण आलाच. निवृत्तीपूर्वीच डोळ्यांवर डोळे चढवून झाले होते. ते साथही चांगली देत होते. पण बालहट्टाप्रमाणे त्याचे काही हट्ट पुरवावे लागायचे. बसून वाचायाचं. झोपून वाचायाचं नाही. तसं वाचलंच तर उताणं झोपायचं कुशीवर नाही. हे हट्ट पुरवल्यावर त्याची काही तक्रार नसायची. पण तो डोळयांवरचा डोळा जरी चांगलं काम करत असला, तरी मूळ डोळा अधून मधून म्हणायला लागला, ‘आता मी शिणलो. आता पुरे कर तुझं वाचन!’ मी नाहीच ऐकलं, तर तो सारखी उघड –मीट करत स्वत:ला मिटूनच घ्यायचा.
तर असं हे माझं सुट्टीपुराण. . . . . जेव्हा दात होते, तेव्हा चणे नव्हते. आता भरपूर चणे आहेत, तर खायला दातच नाहीत.
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया। वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – जोड़ लिया है कैसा नाता…।)
साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 137 – जोड़ लिया है कैसा नाता…