मराठी साहित्य – मराठी कविता – ? पिटुनिया ? – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

? पिटुनिया ?

 

बागेतल्या बहराचे, चित्र मनाशी रंगवले,

ईवल्या ईवल्या पिटुनियाला वाफ्यामध्ये रोवले ।

 

बघता बघता जिवांची , जवळीक की हो वाढली ,

खेळता बागडता , डहाळीत डहाळी गुंतली ।

 

गुंतल्या डहाळीचे डोहाळे, साऱ्यांनीच जपले

तृप्त सृजनाचे कौतुक सोहळे  नजरेने टिपले ।

 

रंगांचे हे बंदिस्त जग ,झाले खुले सर्वांसाठी ,

फुलपाखरांचे थवे लोटती , रंगोत्सवी या रंगण्यासाठी ।

 

विस्मित होई मन हे बघून, विविध छटा रंगांच्या ,

नकळत जोडले जाती कर अगाध लीलेस ईश्वराच्या ।

 

मनमोहक रंगीत साज ल्यालेला

देखणा कोपरा बागेतला ,

मनी रंगवलेला बहर प्रत्यक्षात उतरलेला ।

 

©  सौ. ज्योति हसबनीस

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ माझी आज्जी . . . . !☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ माझी आज्जी . . . . !☆

(प्रस्तुत है  कविराज विजय यशवंत सातपुते जी  द्वारा  रचित माझी आज्जी . . . . ! भावप्रवण कविता में   निःसन्देह कविराज  जी  की स्मृतियों  में  उनकी आजी की स्मृतियाँ झलकती हैं। किन्तु, वे बरबस हमें हमारी दादी/नानी की स्मृतियों की याद दिलाती हैं। ।) 

माझी आज्जी डोकावते
भावनांच्या गोकुळात.
यशवंत, गुणवंत
लेक तिच्या काळजात .. . . . !

संस्कारांचा पारिजात

माझी आज्जी दुवा एक.
दोन पिढ्या सांधणारा
नात्यातला सेतू नेक.. . . . . !
रितभात शिकविली
मोठ्या मायेने आईला.
सदा मानूनी आपली
लेक मानली सुनेला  . . . . !
आजी माहेराची ओढ
सासरला हेलावते.
नातवांचे बालहट्ट
निगुतीने सांभाळते.. . . . . !
आजोबांच्या माघारीही
आज्जी आधाराचा हात
बोलवूनी बोलवेना
तिच्या आसवांची बात. . . . !
माझी आज्जी झंझावात
इंदिरेचे एक रूप
परंपरा सांभाळूनी
दिला जगण्या हुरूप. . . . . !
माझी आज्जी रानजाई
सुख दुःख,  दरवळ
तिच्या  आठवात आहे
बकुळीचा परीमल.. . . . . !
विजय यशवंत सातपुते, पुणे.

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ? दवाचा मोती ? – –श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 ☆ दवाचा मोती ☆
(प्रस्तुत है श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी की एक बेहतरीन गजल। एक वरिष्ठ मराठी साहित्यकार की कलम से लिखी गई गमगीन गजल से निःशब्द हूँ।)
दीप लावू मी कशाला
सूर्य माझ्या सोबतीला
मी वडाचे झाड झालो
थांब माझ्या सावलीला
या रुपेरी तारकांचे
गुच्छ येती अंबराला
चांदण्यांची बाग माझी
मी भुलावे पौर्णिमेला
तू रुपेरी वस्त्र ल्याली
वर्ख जैसा लावलेला
बोलते भू या तरूला
जन्म द्यावा अंकुराला
या दवाचा मोती व्हावा
वाटते हे शिंपल्याला
© अशोक भांबुरे, धनकवडी
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ? थरार ? – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

? थरार ?

 

उजाडती किलबिलती रम्य सकाळ,

बागेतला हिरवा चैतन्य खळाळ

 

लाल साज ल्यालेली गोजिरी लीली

कृष्णकमळ लेवून वेल बहरलेली

 

नाजुकशी साद अचानक कानी पडली

भिरभिरती नजर त्या दिशेने रोखली

 

पानांआड दिसत होता झुपकेदार शेपटा

क्षणांत दृष्टीस पडला खारूताईचा मुखडा

 

वाकून खाली बघत तिचा चालू होता सतत ओरडा

वाळक्या काटकीला घट्ट बिलगला होता तिचा काळजाचा तुकडा

 

पाळीवर त्या माऊलीची सैरावैरा धावपळ सुरू झाली ,

पिल्लाला वाचविण्याची अखंड धडपड तिची सुरू झाली

 

करावी का मदत आपण विचार आला मनी

पण विपरित काही घडलं तर… याची भीती होती मनी

 

लोंबकळून, कसरत करून पिल्लाचा धीर खचला

तोल सावरता सावरता काटकी भवतालचा विळखाच सुटला

 

असे काही घडेल ह्याची कल्पना  होतीच

पण माऊलीच्या धडपडीला यश येईल ह्याचीही खात्री होतीच

 

काळजात धस्स झाले हो पाहता पडतांना छोटूलीला

पण कोण आनंद झाला म्हणून सांगू , बघून तिला कुमुदिनीवर अलगद विसावतांना

 

सुर्रकन् उतरून आली खाली खारूताई

कुंडापाशी डोकावून शोधू लागली पिल्लांस आई

 

बघून पिल्लांस सुखरूप माऊलीचा जीव तो निवला

अलगद पकडून लहानग्यास भर्रकन् झाडाच्या दिशेने पळाला

 

आईची माया अजोड आहे मनोमन साक्ष पटली

वात्सल्याला तोड नाही खुणगाठ पक्की बांधली

 

देव तारी त्याला कोण मारी प्रचिती याची आली

सकाळच्या त्या थरार नाट्याने सुरूवात रोमांचक झाली

 

©  सौ. ज्योति हसबनीस

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता / गीत ? निरोप (विरहगीत) ? श्यामला(ज्योत्स्ना)जोशी

श्यामला (ज्योत्स्ना) जोशी

? निरोप (विरहगीत) ?

(प्रसिद्ध मराठी गीतकार, संगीतकार एवं गायिका श्यामला(ज्योत्स्ना)जोशी जी का विरह वेदना पर आधारित  यह गीत, एक  भावप्रवण एवं अनुपम उदाहरण है।  

 

सोडूनी तू जातांना मजला

सांग मी राहू कशी ?

दूर दूर जातांना तुजला

सांग मी पाहू कशी..? //धृ//

 

भोगलेल्या त्या सुखांना

सांग मी विसरू कशी ?

ओघळणार्या आसवांना

सांग मी अडवू कशी..? //१//

 

पोळलेल्या भावनांना

सांग मी विजवू कशी ?

रंगविलेल्या त्या स्वप्नांना

सांग मी पुसू कशी..? //२//

 

या हृदयाच्या यातनांना

सांग मी दावू कशी ?

प्रेम सागर अमर अपुला

सांग बांध घालू कशी..? //३//

 

तू दिलेल्या त्या गीताला

सांग सूर लावू कशी ?

कंठ माझा दाटून आला

सांग मी गाऊ कशी..? //४//

 

संशयी नज़रा त्या लोकांच्या

सांग मी टाळू कशी ?

अडखळली पाऊले ही

सांग मी जाऊ कशी..? //५//

 

निरोप देतांना विरह वेदना

सांग मी लपवू कशी ?

तूच माझा जीवनसाथी

सांग मी पटवू कशी..? //६//

 

®©- *श्यामला(ज्योत्स्ना)जोशी. पुणे*

*गीतकार-संगीतकार-गायिका*

मो.नं
9823250197
7378327402

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ? गुलमोहर ? – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

 

? गुलमोहर ?

 

(सुश्री ज्योति हसबनीस जी का पुष्पों एवं प्रकृति के प्रति अपार स्नेह की साक्षी है यह सामयिक कविता। गुलमोहर,  ग्रीष्म ऋतु, पक्षी, पेड़ और पथ; कुछ भी तो नहीं छूटा।  इसके पूर्व हमने सुश्री ज्योति जी की कदंब के फूल पर एक कविता प्रकाशित की थी जिसे पाठको का अपार स्नेह प्राप्त हुआ था। )

 

ऐन ग्रीष्मातील वैशाख वणवा,

तप्त ऊन्हातील दग्ध जाणीवा ।

ओसाड निर्जन रस्ते सारे ,

घरट्यात व्याकुळ पक्षी बिचारे ।

 

अशाच उजाड वळणावरती ,

केशरी छत्र उभारून धरतीवरती ,

होरपळ मिरवीत अंगावरती ,

गुलमोहर उभा निःशब्द एकांती।

 

 

केशर तांबडी पखरण याची ,

करी भलावण सकल पक्ष्यांची ।

गर्द ,विस्तृत छाया त्याची ,

करी शीतल काया पांथस्थांची ।

 

छायेत केशरी या छत्राच्या ,

फुलती मनोरम  प्रीतीचे मळे ,

संगतीत तांबट फुलांच्या ,

रंगून जाती जीव खुळे ।

 

बघूनी दिमाख गुलमोहराचा ,

वैशाख वणवा विझून जाई ।

ऐन ग्रीष्मातील रुबाब त्याचा ,

प्रीतीची मोहोर ऊमटवून जाई ।

 

©  सौ. ज्योति हसबनीस

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ? पळस ? – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

 

? पळस ?

 

अग्नीशिखा ही भुईवरची

निसर्गाने सफाईने रोवली

रेखीव रचना किमयागाराची

आसमंत चितारून गेली

 

केशरी लावण्याचा

दिमाख ऐन बहरातला

मखमली सौंदर्याचा

रूबाब निळ्या छत्रातला

 

पेटती मशाल ही रानातली

की रंगभूल ही मनातली

प्रणयातूर ऊर्मि जणू ही

उत्सुक तप्त श्वासांतली

 

धगधगता अंगार क्रोधाचा

जणू आसमंती झेपावला

विखार अंतरीचा

जणू अणूरेणूतून पेटला

 

जणू निखारे अस्तनीचे

बाळगले विधात्याने

आणि छत्र निळाईचे

केले बहाल ममत्वाने

 

वाटेवरचा पळस

खुप काही सांगून गेला

ईश्वरी अगाधतेचा

अमीट ठसा उमटवून गेला

 

©  सौ. ज्योति हसबनीस

 

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ सुवास ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे
* सुवास *
(प्रस्तुत है श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी की एक  भावप्रवण कविता। मनोभावों  की अद्भुत एवं मोहक अभिव्यक्ति ।

 

तुझा भावला स्पर्श श्वासातला

जपू छान ठेवा प्रवासातला

 

तुझ्या प्रीतिचा परिघ मोठा जरी

दिसेना कुठे टिंब व्यासातला

 

मरूही सुखाने मला देइना

तुझा रेशमी दोर फासातला

 

खरी गोष्ट का ही तुला पाहिले ?

पुन्हा चेहरा तोच भासातला

 

फुलातील गंधात न्हातेस तू

कळे अर्थ आता सुवासातला

 

© अशोक भांबुरे, धनकवडी, पुणे.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

[email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता – ? किळस ?- श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? किळस ?

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं। मैं विस्मित हूँ उनकी इस रचना को पढ़ कर। आज कितने ऐसे कवि या साहित्यकार हैं जिन्होने समाज के उस अंग के लिए लिखा है जिसे घृणा (किळस) की दृष्टि से देखा जाता है। उस अंग के लिए जिनका जीवन ही श्राप समान है। श्रीमती रंजना जी की कविता अनायास ही बाबा आमटे जी की याद दिला देता है जिनका सारा जीवन ही कुष्ठ रोगियों  की सेवा में व्यतीत हो गया। ऐसे विषय पर इस अभूतपूर्व भावुक एवं मार्मिक रचना के लिए श्रीमती रंजना जी आपको एवं आपकी लेखनी को नमन।)

 

नाही किळस वाटली त्यांना अंगावरच्या जखमांची.

आणि झडलेल्या बोटांची….

पांढरपेशी सुशिक्षित आणि स्वतःला….

सर्जनशील सुसंस्कृत समजणाऱ्या समाजाने बहिष्कृत केलेल्या कुष्ठरोग्यांची ….

धुतल्या जखमा केली मलमपट्टी घातली पाखरं मायेची….

अंधकारात बुडलेल्या जीवांना दिली उमेद  जगण्याची …..

पाहून सारा अधम दुराचार असह्य झाली पीडा अंतःकरणाची ..!

हजारोच्या संख्येने जमली जणू फौजच ही दुखीतांची.,

रक्ताच्या नात्यांनाही नाकारले

तीच गत समाजाची . …

कुत्र्याचीही नसावी…. इतकी ! लाही लाही… झाली जीवाची.

दुखी झाली माई बाबा ऐकून  आमच्या कहानी कर्माची …..

पोटच्या मुलांनाही लाजवेल .,…!

अशी सेवा केली सर्वांची…..

माणसं जोडली….. सरकारानेही दिली साथ मदतीची …..

स्वप्नातीत भाग्य लाभले…

आणि उमेद आली जगण्याची.

आमच्यासाठी आनंदवन उभारले .. अन्

माणसं मिळाली हक्काची……

आता अंधारच धुसर झाला …..

प्रभात झाली जीवनाची . …

देवालाही लाजवेल अशीच

करणी माई आणि बाबांची .,…..

खरंतर आम्हालाच किळस येते

आता तुमच्या कुजट विचारांची….

तुमच्या कुजट विचारांची….

तुमच्या कुजट  विचारांची

 

©  रंजना मधुकर लसणे✍

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ? सूर्यास्त ? – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

 

? सूर्यास्त ?

 

का भिडतो हा अस्त जिवाला

नित्य पडते कोडे मनाला

का घ्यावा अस्ताचा ध्यास

अन का रूजवावा मनी ऊर्जेचा -हास

 

सतत तळपत्या सूर्यालाही

का बघावे होतांना म्लान

क्षितिजाआड दडणा-या बिंबाचे

का ऐकावे मूक गान

 

मूक  गहिरी रंगछटा

व्यापी भूतल, चराचरास

आसमंती अन् जळी घुमती

भैरवीचे सूर उदास

 

चैतन्याच्या ह्या सम्राटाचे

घायाळ करी अस्तास जाणे

सांजसावल्यांसवे कातरवेळीचे

मंदमंद पदरव हे जीवघेणे

 

उदयास्ताची मैफल

अनोख्या रंगात रंगलेली

जन्ममृत्युच्या अटळतेची

कहाणी क्षितिजावर कोरलेली

 

©  सौ. ज्योति हसबनीस

Please share your Post !

Shares
image_print