(आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी सर्व पालख्या पंढरपूरच्या अलीकडील गावी वाखरीला पोहचतात. तिथे पालखीतील शेवटचे उभे रिंगण होते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पालख्या पंढरपूरला येतात. त्या आदल्या दिवसाचे वर्णन करण्याचा प्रयत्न या अभंगामध्ये केला आहे.)
|| वाखरीला आलो ||
☆
विठ्ठल विठ्ठल| एकची गजर|
लागली नजर| वेशीवरी|
*
वाखरीला आलो| भरून पावलो|
भक्तीरसा न्हालो| रिंगणात||
*
अवघ्या पालख्या| भेटी जणू सख्या|
प्रेमाची ही व्याख्या| काय सांगू||
*
शिजे परी दम| निवे परी नाही|
वाट आता पाही| पहाटेची||
*
पंढरी येऊन| माथा टेकवून|
दर्शन घेऊन| सुखी होई||
☆
कवी : म. ना. देशपांडे
(होरापंडीत मयुरेश देशपांडे)
+९१ ८९७५३ १२०५९
https://www.facebook.com/majhyaoli/
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(राजा छत्रसाल यांनी महाराजांकडे कर्जाची मागणी केली होती आणि महाराजांनी त्यांना दान दिले आणि त्यांची अवस्था सुधारली अशी कथा आहे )
मी पावसावरील कविता लिहिताना त्यात प्रयोग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा त्यात कशा दिसतात हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अशा 12 प्रसंगांवर मी कविता लिहिल्या आहेत. त्यातील एका प्रसंगावरील ही कविता….