मराठी साहित्य – विविधा ☆ ‘माझी सुट्टी…’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ ‘माझी सुट्टी’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

खूप दिवसांपूर्वीची गोष्ट. दिवस कुठले, वर्षे लोटली. म्हणजे वीस – पंचवीस वर्षे सहज.  आणि गोष्ट म्हणजे काय, तर हकीकत म्हणा, किंवा अनुभव म्हणा.  त्यावेळी मी डी.एड.कॉलेज सांगलीमधे अध्यापन करत होते. मला शिकवायला आवडायचं आणि मुलींमध्ये रामायलाही. तेवढंच तरुण झाल्यासारखं वाटायचं. म्हणजे जॉब सटिस्फॅक्शन वगैरे म्हणतात नं, ते होतं, पण तरीही दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीचे वेध लागायचेच. तेव्हा सुट्टी लागली, की मी यंव करीन अन् त्यव करीन असे मांडे मनात भाजत आणि खात रहायची. त्यातले काही मांडे असे —

पहाटे लवकर उठून व्यायाम आणि प्राणायाम करणे. सकाळी फिरायला जाणे. हे अगदी मस्टच, मी ठरवलं. सुट्टी असल्यामुळे सगळं आही आरामात आवरायचं, दुपारी पंख्याखाली अडवारायचं आणि मनसोक्त दिवाळी अंक किंवा पुस्तकं वाचायची. संध्याकाळी शेजारणी, सख्या- मैत्रिणी यांच्याकडे जाऊन गप्पांचे फड उठवणे , हाही आखलेला बेत असे. एरवी कॉलेजमधून घरी येताना नजरेच्या टप्प्यात जेवढ्या येतील, त्यांना ‘काय कसं काय?’ विचारणं आणि ‘ठीकय.’ ऐकणं, या पलीकडे संवादाची मजल जात नसे.

पहाटे उठण्यासाठी गजर लागे. आधी घड्याळाचा, नंतरच्या काळात मोबाईलचा. गजर झाला की मनात येई, लवकर उठणं नि नंतरची लगबग नेहमीचीच आहे मेली. आज आरामात पांघरूणात गुरफटून पडून राहण्याचं सुख अनुभवू या. उद्यापासून सुरुवात करू. पण तो उद्या कधी उजाडत नसे. तो ‘आज’ होऊनच उगवे. व्यायाम, प्राणायाम, पक्ष्यांची किलबिल हे सगळं राहूनच जायचं. नाही तरी किलबिल ऐकायला आता शहरात पक्षी राहिलेतच कुठे, मी मनाशी म्हणे. मला आणि मुलांना सुट्टी असे, पण यांना ऑफीस असल्यामुळे यांचा डबा साडे नऊला तयार असणं गरजेचं असे. त्यामुळे सकाळची कामाची धांदल नेहमीसाराखीच करावी लागे, सुट्टी असूनसुद्धा. माझ्याप्रमाणे मुलांनीही सुट्टीचे कार्यक्रम ठरवलेले असायचे. पोर्चमध्ये उभे राहून गप्पा, किंवा मोबाईलवर चॅटिंग, यू ट्यूबवरचे सिनेमे बघणे, घरात पसारे करणे, त्यांच्या सवडीने जेवायला येणे, आई घरात आहे, म्हंटल्यावर आईनेच जेवायला वाढणे, अपेक्षित. त्यातून बाहेर पडले की माझे लक्ष, कपड्यांनी, भांड्यांनी, पुस्तकांनी ओसंडून वहाणार्‍या कपाटांकडे जाई॰ दिवाळीसारखा महत्वाचा सण. घर स्वच्छ, नीटनेटकं नको, असं मला आणि मलाच फक्त वाटे. घरातल्या इतर कुणाला नाही. ही आवारा-सावर होईपर्यंत दिवाळीचे पदार्थ करायचीचे वेळ येई. पणत्या, वाती, उटणं, नवा साबण किती म्हणून तयारी करावी लागायची. दिवाळीच्या दिवसात रोज एक नवीन पक्वान्न हवंच. ‘तुझं गोड नको बाई, काही तरी चमचमीत कर’, अशी मुलांची मागणी. मागणी तसा पुरवठा करायलाच हवा ना, शेवटी आपलीच मुलं. जेवणं- मागचं आवरणं. दुपारचे सहज तीन वाजून जात.  मग एखादा दिवाळी अंक घेऊन फॅनखाली पडावं, तर डोळे मिटू मिटू होत. मासिकातील अक्षरे पुसट होत जात आणि मासिक हातातून कधी गळून पडे, कळतच नसे. नाही म्हणायला, संध्याकाळी शेजारणी, सख्या- मैत्रिणी यांच्याकडे जाऊन गप्पांचे फड उठवणे, हा आखलेला बेत बराचसा तडीला जाई.

दिवाळी येई-जाई. कॉलेज पुन्हा सुरू होई. दिवस- महिने संपत. मार्च उगवे. पोर्शन शिकवून संपलेला असे आणि आता पुन्हा मोठ्या सुट्टीचे वेध लागत. आता मांडे मनात नाही, ताटात घेऊन खायचे, मी नक्की ठरवते. वाटतं, सुट्टीत कुठे तरी फिरून यावं. नवा प्रदेश पहावा. निसर्गाच्या सहवासात काही काळ घालवावा. ताजंतवान होऊन, नवी ऊर्जा घेऊन परत यावं आणि नव्या दमाने, नव्या उत्साहाने नेहमीच्या दिनचर्येला सुरुवात करावी. पण या महिन्यातल्या क्लासचे, परीक्षांचे मुलांचे वेळापत्रक, कधी कुणाचे आजारपण, घरातली, जवळच्या नात्यातील लग्ने या गोष्टी अ‍ॅडजेस्ट करता करता ट्रीपचं वेळापत्रक कोलमडून जाई. दिवाळी काय किंवा उन्हाळी सुट्टी काय, दरवर्षी थोड्या-फार फरकाने असंच काही-बाही होत राहिलं.

दिवस- महिने- वर्षे सरत आली. माझ्यासाठी कॉलेजची शेवटची घंटा वाजण्याची वेळ आली. एकीकडे कासावीस होत असतानाच मी मनाला समजावू लागले,

आता मला सुट्टी मिळणार मिळणार

खूप खूप मज्जा मी करणार करणार.

आता मला खरंच सुट्टी मिळाली आहे. आता आरामात उठायला हरकत नाही. आता साडे नऊच्या डब्याची घाई नाही. मुलांची जबाबदारी पण आता उरलेली नाही. ती आपापल्या नोकरीच्या गावी, आपआपल्या संसारात, मुलाबाळात रमली आहेत. सकाळी आता उशिरा, आरामात उठायचं. मी निश्चय करते. पण काय करू? जागच लवकार येते आणि एकदा जाग आल्यावार नुसतच आंथरूणावर पडून रहावत नाही. पूर्वी पाहिलेली स्वप्ने आता आळोखे- पिळोखे देत जागी होऊ लागली.

आता सकाळी जाग आल्यावर उहून फिरायला जायचं मी ठरवलं.  उत्साहाने जिना उतरू लागले, तर गुढगे आणि कंबर म्हणाली, ‘बाई ग, आता आमचा छळ थांबव!’ कमरेला चुचकारत नवा महागडा कंबरपट्टा आणून तिला नटवलं. गुढग्यांवरही छान उबदार वेष्टण चढवलं. पण त्यांचं तोंड वाकडंच. ते काही बेटे सहकार्य करेनात. शेवटी डॉक्टरांशी बोलले. डॉक्टरांनी क्ष-किरण फोटो काढला. फोटो बघत ते म्हणाले, ‘ आता या गुढग्यांना निरोप द्या काकू! आता नवे गुढगे आणा!’ तसे केले. नवे गुढगे घेऊन आले पण चालताना, इतकंच काय, बसताना, झोपतानाही पायाला वेदना होऊ लागल्या. पुन्हा डॉक्टर. पुन्हा क्ष-किरण फोटो. डॉक्टर म्हणाले, ‘ पाठीच्या कण्याच्या चौथ्या – पाचव्या मणक्यांनी गळामिठी घातलीय, ती सोडवायला हवी. ती सोडवली. मग मात्र माझे पाय वेदनारहित झाले. हळू हळू फिरणं वगैरे जमू लागलं. पण डॉक्टरांनी बजावलं, ‘आता चालताना हातात काठी घ्या.’ आणि एक लोढणं गळ्यात नव्हे हातात आलं.

आता टी.व्ही. बाघायला वेळच वेळ होता. पण हळू हळू लक्षात येत गेलं, आपल्याला सिरियल्समधले संवाद नीट ऐकू येत नाहीयेत. टी.व्ही.च्या जरी जवळ बसलं, तरी फारसा उपयोग होत नाहीये. कानांकडे तशी तक्रार केली, तर ते म्हणाले, ‘आम्हाला गळामिठी घालायला एक सखा आण. त्याचे लाड-कोड पुरवले. पण त्यांचा हा सखा इतका नाठाळ निघाला, सगळा गलकाच ऐकवू लागला. नको ते आवाज मोठ्या प्रमाणात घुमवू लागला. हवे ते दडवून ठेवू लागला. थोडक्यात, हा कांनांचा सखा, असून अडचण अन नसून खोळंबा झाला.   शेवटी मूकपट पाहून नाही का आपण आनंद घेत, तसाच टी.व्ही. बाघायचा, असं ठरवून टाकलं.

आता वाचायला खूप वेळ होता. चांगली पुस्तकेही हाताशी होती. पण—-

इथेही पण आलाच. निवृत्तीपूर्वीच डोळ्यांवर डोळे चढवून झाले होते. ते साथही चांगली देत होते. पण बालहट्टाप्रमाणे त्याचे काही हट्ट पुरवावे लागायचे. बसून वाचायाचं. झोपून वाचायाचं नाही. तसं वाचलंच तर उताणं झोपायचं कुशीवर नाही. हे हट्ट पुरवल्यावर त्याची काही तक्रार नसायची. पण तो डोळयांवरचा डोळा जरी चांगलं काम करत असला, तरी मूळ डोळा अधून मधून म्हणायला लागला, ‘आता मी शिणलो. आता पुरे कर तुझं वाचन!’  मी नाहीच ऐकलं, तर तो सारखी उघड –मीट करत स्वत:ला मीटूनच घ्यायचा.

तर असं हे माझं सुट्टीपुराण. जेव्हा दात होते, तेव्हा चणे नव्हते. आता भरपूर चणे आहेत, तर खायला दातच नाहीत.

© सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ जेव्हा शेतात नागीण सळसळली… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ जेव्हा शेतात नागीण सळसळली… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

डांबरी रस्त्याची सडक  जेव्हा गावत नवी नवी आली.. वाटलं काळी नागीणच सळसळ करत चालली…जसा बळीराजाच्या गळ्यात बांधलेला काळा गोफाचा गंडा…तसा गावाच्या गळसरीला चकचकीत काळ्या नागिणीचा कंडा..दोन्ही कडेच्या उभ्या पिकांनी थरथर भीतीने आपली अंग आकसून घेतली.. आणि जी पिकं, तृणपाती नागीणीला मधेच आडवी आली त्यांना आपला फणा उभारून क्षणात आडवे करून गेली… उरलेली लव्हाळी जरळी माना मोडून शरणागती पत्करून भुईसपाट झाली…आडमार्गाचा गाव आला हमरस्ताशी हातमिळवणी करायला… कधीतरी दिवसभरातून एकदा येणारी एस. टी.च्या लागल्या ना चकरा वाढायला… फटफट ती पोलीस पाटलाची नि तलाठ्याची मिजाशीत पळायची तेव्हा.. आता  घराघरातली डौलाने दुडदूडू धावत असते हिरोहोंडावरची नवयौवना…बाजारहाट आठवड्याचा तालुका भरायचा तोच आता ऑनलाईन ऑर्डर करा   माल येईल तुमच्या घरा असं सांगू लागला… शाळा कालेज शिक्षणाची वणवण संपली…घराघरात पदव्यांची प्रमाणपत्रांची तसबिरी लटकली…निशाणी डावा अंगठा निळ्या शाईत साक्षर झाला.. गावाचा विकासाचा सूर्य आता अस्ताला जाण्याचा विसरला…जग आले जवळ किती मुठीत सामावले प्रत्येक हाती… विज्ञानाने साधली प्रगती. .. गावा गावाने आता कात टाकली…आधुनिक वैचारिकतेचे उदंड वारे चोहोबाजूंनी वाहू लागले… सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे…एकदा येणारी संधी आता दारातच ठाण मांडून बसली…यशाच्या पहिल्याच पायरीने अपयशाच्या पायरीला पायतळीच गाडली… यशा सारखे यशच त्याला नाही क्षिती कुणाची… माध्यान्हीचा सूर्य तळपता तळपता पश्चिम दिशेला झुकू लागला…

हळूहळू हळूहळू यशाची धुंदी मनामनावर गारूड करत गेली… अधिक प्रगतीचा सूर्य दुसऱ्या देशात दिसू लागला… आणि आपल्या कतृत्वाचा हिथला वावच संपला…  विमानं डोई  भरभरून उडून गेली परदेशात… ओस पडत गेले गाव आणि डोळ्यातले  दु:खाश्रु माईना  घरा घरात.. विकासाची रोपं पिवळी पडत सुकत गेली कोळपून भुईवर पडली…कधीतरी येतो आंब्याचा मोहर घेऊन वसंताचा ऋतु…अन सारा गाव लोटतो त्याला समजून घालण्यास अरं बाबा ईथं  थांबशील तरी तू… विकास झालाय पोरका तुमच्या शिवाय त्याला कोण विचारणारं तरी आहे का…आता सुखाला चटावलेली मन माघारी फिरणारी असतात का… आणि गावातलं जुनं हाडं गावाची नाळ कापून घ्यायला तयार नसते… अखेरची कुडी या मातीत मिसळून जावी हिच एक इच्छा मनात तिची असते… मागचं सारं सारं एकेक आठवतयं.. पाऊलवाटा, माळरान, मारूतीचं देऊळ, शेताचा बांध, पांदणं…नि आपुलकीची घट्ट माती… जोवर हे सगळं अबाधित होतं  तेव्हा तेव्हा   अन आता डांबरी रस्त्याची सडक  जेव्हा गावत नवी नवी आली तर तर… एखादा चुकार अश्रूचा टिपूस ओघळून जातो…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “गोड बोलून…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “गोड बोलून…” ☆ श्री मंगेश मधुकर 

“कदम,जरा केबिनमध्ये या”साहेबांचा फोन.सकाळीच बोलावणं म्हणजे महत्वाचं काम असणार म्हणून कदम लगबगीनं केबिनमध्ये गेले. समोर बसलेल्या तिशीतल्या तरुणीशी साहेब बोलत होते. 

“हियर ही इज,अवर बेस्ट अँड मोस्ट एक्सपिरीयन्स स्टाफ.ज्यांच्याविषयी सांगत होतो तेच आमचे कदम,गेली २० वर्षे एक्सलंट काम करत आहेत.”साहेबांनी अचानक केलेल्या कौतुकानं कदम संकोचले. 

“तुमचा पाठिंबा आणि मार्गदर्शन यामुळेच हे शक्य झालं.यू आर ग्रेट लीडर.” कदमांकडून स्तुती ऐकून साहेब सुखावले. 

“मला बोलावलं होतं”कदमांनी विचारलं.

“ओ येस,ही सारिका,माझ्या मैत्रिणीची मुलगी,आपल्याकडे जॉइन होतेय.एमबीए आहे.तुमच्या हाताखाली ट्रेन करा.”

“मॅडम,वेलकम टू फॅमिली” 

“कदम सर,फक्त सारिका म्हणा.तुमच्यापेक्षा ज्ञानानं,अनुभवानं,वयानं खूप लहान आहे”

“ओके”कदमांनी मान डोलावली.कदमांच्या मार्गदर्शनाखाली सारिकाचं ट्रेनिंग सुरू झालं.कामातले छोटे छोटे बारकावे समजून घेत वर्षभरात सारिका तयार झाली.सोबत वेळोवेळी साहेबांचं मार्गदर्शन होतचं.

प्रोजेक्टविषयी चर्चा सुरू असताना अचानक साहेब म्हणाले “दोन महिन्यांनी देशपांडे रिटायर होतायेत.चांगला माणूस कमी होतोय.एक बरयं की तुम्ही अजून दहा-पंधरा वर्ष आहात म्हणून काळजी नाही.” 

“मीपण तीन वर्षानी रिटायर होतोय.”

“काय सांगता.तुमच्याकडे बघून वाटत नाही.चांगलं मेंटेन केलेय.अजूनही कामाचा झपाटा जबरदस्त आहे.सारिकाविषयी काय वाटतं”साहेब 

“हुशार,मेहनती आणि प्रामाणिक आहे.”

“आता तिला मोठ्या जबाबदाऱ्या द्याव्यात का?”

“नक्कीच”

“कदम,इतकी वर्षे कंपनीच्या अनेक जबाबदाऱ्या उत्तमरीतीने पार पाडत आहात.हॅट्स ऑफ टू यूवर डेडीकेशन.”कदमांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली कारण साहेबांकडून कौतुक म्हणजे काहीतरी वेगळं घडणार याची पूर्वसूचना. 

“तुमच्यावर कामाचा खूप लोड आहे.जर हरकत नसेल तर त्यातला थोडा भार कमी करुयात”. 

“नो प्रॉब्लेम”कदमांना नाईलजानं परवानगी द्यावीच लागली.पर्याय नव्हता.निर्णय झाला होता फक्त तोंडदेखलं विचारण्याचं नाटक साहेब करत होते.काही दिवसातच कंपनीच्या महत्वाच्या विभागाची जबाबदारी कदमांच्या ऐवजी सारिकाकडं देण्यात आली.अनेकांना हा बदल आवडला नाही.तीव्र पडसाद उमटले.कदमांनासुद्धा हा धक्का होता.त्यानंतर साहेब कदमांशी चर्चेचे नाटक करून एकेक जबाबदाऱ्या देत सारिकाचं कंपनीतलं महत्व वाढवत होते.’खुर्चीपुढं गरजवंत हतबल असतो’ या न्यायानं कदम शांत होते.  

—   

दरवर्षीप्रमाणं कंपनीमध्ये अॅन्युअल डेला प्रमोशन जाहीर होणार होती.प्रचंड उत्सुकता होती.एकेक प्रमोशन जाहीर होऊ लागली तसा जल्लोष वाढत होता.अभिनंदनाचा वर्षाव,हसणं,गप्पांचा गदारोळ सुरू होता.सिनॅरिटीप्रमाणं कदम सर ‘मॅनेजर’ होणार याविषयी सर्वांना खात्री होती.आपल्या माणसाचं यश साजरं करण्यासाठी म्हणून खास तयारी केली होती.काही वेळानं साहेबांनी “मॅनेजर”चं प्रमोशन जाहीर केल्यावर एकदम शांतता पसरली.सारिकाची मॅनेजर म्हणून झालेली निवड धक्कादायक होती.उघडपणं बोललं नाही परंतु सर्वांच्या चेहऱ्यावर नाराजी होती. पार्टीचा मूड बदलला.साहेबांनी टाळ्या वाजवून सारिकाचं अभिनंदन केलं तेव्हा कोणीच प्रतिसाद दिला नाही.पुढे येऊन कदमांनी अभिनंदन केलं तेव्हा सारिकानं नजरेला नजर देणं टाळलं.

“कदमसर,तुम्हांला राग आला नाही”एकानं विचारल्यावर कदमांनी नकारार्थी मान डोलावली. 

“आला तरी ते नेहमीप्रमाणे दाखवणार नाहीत”

“कदम सर,आज तरी बोला की तुम्हांला सहन करण्याची सवय झालीय.”

“जे व्हायचं ते होऊन गेलंय.आता यावर बोलून काय उपयोग?”जेवणाची प्लेट घेऊन कदम कोपऱ्यात जाऊन बसले.

“कदम,लेका आज तरी मनात ठेवू नकोस.मन मोकळ कर.”देशपांडे शेजारी बसत म्हणाले.

“जाऊ दे”

“का’?”

“तू रिटायर होतोयेस.मला अजून कंपनीत तीन वर्षे काढायचीयेत”

“साहेबांनी चुकीची निवड केलीय.मी त्यांच्याशी बोलतो”

“उपयोग नाही.आपण साहेबांच्या मर्जीतले नाही.ती आहे.” 

“म्हणून असले अन्याय सहन करायचे.”

“कसला अन्याय,काय बोलतोयेस”

“कालची पोरगी मॅनेजर आणि तू इतकी वर्ष कंपनीत काय xx xxxx..प्रामाणिकपणे काम करून काय मिळालं”

“जाऊ दे ना.उगीच नको त्या विषयावर चर्चा नको.”

“मॅनेजर कोण होणार याची माहिती होती”देशपांडेनी विचारल्यावर कदम फक्त सूचक हसले. 

“बोल ना.साहेबांनी सांगितलं होतं”

“नाही पण काल संध्याकाळी बोलावलं तेव्हा अंदाज आला.”

“कशावरून”

“साहेबांची गोड बोलण्याची स्टाईल!!काल एकदम माझ्या कामाचा,प्रामाणिकपणाचा,मेहनतीचा,

कंपनीसाठी दिलेल्या योगदानाचा पाढा पुन्हा एकदा वाचायला सुरवात केली.कंपनीसाठी मी किती महत्वाचा आहे हे पटवून सांगायला सुरवात झाली.त्याचवेळी वारंवार माझ्या वाढत्या वयाचा आणि जबाबदाऱ्याचा उल्लेख करत होते.”

“मग!!”

“आपण मॅनेजर होणार नाही हे लगेच लक्षात आलं”

“कसं काय?”

“साहेब विनाकारण कधीच गोड बोलत नाही.सगळी साखर पेरणी सारिकासाठी होती. साहेबांच्या खास मर्जीतली असल्यानं तिला जॉइन मोठी पोस्ट आणि स्पेशल फेव्हर मिळणार याचा अंदाज होता परंतु माझ्याकरवी ट्रेनिंग देऊन मॅनेजर करून माझाच पत्ता कापला जाईल.असं वाटलं नव्हतं.”

“याविरुद्ध आवाज उठवायला हवा.गप्प बसू नकोस.कानामागून आली अन ….”

“आतापर्यंत कधीच कोणासमोर हात पसरले नाहीत.पद मिळवण्यासाठी तर नाहीच नाही.चमचेगिरी जमत नाही.साहेबांना,त्यांच्या हुकुमावर नाचणारा,हो ला हो करणारा,स्वतःचं डोकं न चालवणारा मॅनेजर हवा होता.तिथंच माझी अडचण झाली.”

“तुला डावललं याचं सगळ्यांना  खूप वाईट वाटतंय.”

“माझ्यापेक्षा जास्त तुम्ही दु:खी झालात.अरे,इतका आपलेपणा रक्ताच्या नात्यातले पण दाखवत नाहीत.हीच तर माझी खरी कमाई.”

“हा आदर  आपल्या प्रेमळ वागण्यानं तू मिळवला आहेस तरीपण चांगल्या लोकांची कदर होत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं”

“ जेव्हा जेव्हा वशिला आणि प्रामाणिकपणा एका पारड्यात मोजला जातो तेव्हा नेहमीच वशिल्याचं पारडं जड ठरतं. हाच इतिहास आहे,हेच वर्तमान आणि हेच भविष्य आहे.तसंही नोकरी म्हणजे मनाविरुद्ध केलेली तडजोड.आतापर्यंत इतक्या केल्यात त्यात अजून एक तडजोड.वाईट एवढंच वाटतं की साहेबांनी असला खेळ खेळण्यापेक्षा स्पष्ट सांगितलं असतं तर एवढा त्रास झाला नसता.राजकारण करून बाजूला सारलं हे मनाला खूप लागलं रे….” डोळे पुसण्यासाठी कदमांनी मान फिरवली.

“थोडक्यात केसानं गळा कापून काटा काढला.”

“अं हं,*गोड बोलून…….*” नेहमीच्या शांतपणे कदम म्हणाले 

 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मातृवंदना… ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ☆ मनमंजुषेतून ☆ मातृ वंदना☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

तारखेने 14 जानेवारी, संक्रांत हा माझ्या आईचा जन्मदिन! यावर्षी संक्रांत 15 जानेवारीला आहे म्हणून आज तिचे स्मरण करून वंदन करत आहे…

माझी आई 92 वर्षापर्यंत छान जगली. तिला कोणताही मोठा आजार नव्हता. दोन वर्षांपूर्वी वृद्धापकाळाने तिचे निधन झाले- जसे झाडावरून पिकलेले पान गळून पडावे तसे- आत्ता होती, म्हणेपर्यंत ती शांतपणाने गेली… नाही औषध, नाही हॉस्पिटल, काही नाही… ज्या घरात ती 40 वर्षे राहत होती, ज्या कॉटवर झोपत होती, तिथेच तिने शेवटचा श्वास घेतला.. त्याही गोष्टीला आता दोन वर्षे होऊन गेली!

संक्रांत आणि आईचा वाढदिवस! या दोन्ही गोष्टी लहानपणापासूनच अपूर्वाईच्या वाटायच्या! मध्यमवर्गीय स्तरातील कुटुंब होते आमचे.. वडील सरकारी नोकरीत शिक्षण खात्यात होते. आई शिवणकाम करायची, शिवण क्लास घ्यायची आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून आमच्या हौशीमौजी  करायची! त्यामुळे कष्टाचे, वेळेचे महत्व आमच्यावर बालपणापासूनच बिंबवले गेले होते तिच्या कर्तृत्वाने! ती कधी वायफळ गप्पा मारत वेळ घालवत नसे. तिच्या हातात सतत काही ना काही काम असे. संक्रांतीच्या दरम्यान तिच्याकडे खूप शिवणकाम असे, पण त्यातूनच वेळ काढून ती हलवा बनवणे, गुळपोळी करणे, तिळगुळ वड्या करणे, हळदीकुंकू करणे हे सगळं साग्रसंगीत करत असे. वाणासाठी वस्तू घेताना सुध्दा त्याची उपयोगिता आणि किंमत बघून  वस्तू घेतली जाई. तिच्याबरोबर बाजार करायला जाणे म्हणजे एक प्रकारचे शिक्षणच असे. वस्तूचा दर कमी करून घेणे, भाजीपाला घेताना तोही पारखून घेणे, आहे त्या परिस्थितीत कालमानानुसार आमच्यासाठी फळे, भाज्या घेणे, आणि त्यांचे महत्त्व सांगून खायला लावणे हे ती करत असे.रोज दूध देणे जरी परवडणारे नव्हते तरी आम्हाला ती चहा देत नसे. त्या ऐवजी वेगवेगळ्या प्रकारची खीर बनवत असे. गव्हाच्या चिकाची, रव्याची,सातूच्या पिठाची ,

तर कधी तरी खारकेची! ज्यामुळे मुलांना पौष्टिक मिळेल याकडे तिचे लक्ष असे. काजू खायला मिळत नसे, पण शेंगदाणे, हरभरा डाळ रात्री भिजत घालणे आणि सकाळी ते खायला देणे, व्यायाम करायला लावणे यासाठी आई आणि वडिलांचे  लक्ष असे.

ती पूर्वीचे मॅट्रिक होती. तिचे इंग्लिश, अल्जेब्रा- जॉमेट्री, फिजिओलॉजी हायजिन हे विषय चांगले होते.  ती आमचा  अभ्यासही करून घेत असे. वडील एज्युकेशन डिपार्टमेंटला असल्याने महिन्यातील वीस दिवस फिरतीवर असत, त्यामुळे आईच आमच्याकडे सर्वांगीण लक्ष देत असे. अर्थातच वडिलांना घराची काळजी नसे.ती नऊवारी नेसत असे. तिच्याकडे मोजक्याच साड्या असत पण तिचे नेसणे, वापरणे अगदी व्यवस्थित असे.धुतलेल्या साडीची घडी सुद्धा इस्त्री केल्यासारखी नीट करत असे.

माझे लग्न झाल्यावरही ती मला वेळोवेळी मदत करत असे. माझ्यासमोर तिचा चांगला आदर्श असल्यामुळे मी मुलीचे, सुनेचे करताना तिच्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला… तिचे बोलणे सुविचारांनी युक्त असे .म्हणींचा वापर सहजगत्या होत असे. चांगला विचार करायला तिने आम्हा भावंडांना शिकवले .आता मी वयाची सत्तरी गाठली तरी अजूनही तिची मला नेहमीच सोबत वाटते. काही संकट, अडचण आली की आत्ता आई असती तर तिने काय केले असते असा विचार आपोआपच मनात येतो. आई हा घरातील नंदादीप असतो, तो आपल्या मनात नेहमीच तेवत राहतो!  ती कायमच आपल्या सोबत असते..संक्रांतीला तिचा वाढदिवस आम्ही  आनंदात साजरा करत असू..

तिळगुळातील तिळाची उष्णता(ऊब), गुळाचा गोडवा आणि तुपाची स्निग्धता तिच्या स्वभावामध्ये उतरली होती. आईचा हा जन्मदिवस संक्रांत सणाला येत असल्याने माझ्या कायमच स्मरणात राहतो!

प्रत्येकालाच आपली आई ही प्रिय असते… तिचे स्मरण व्यक्त करावे म्हणून हा छोटासा लेख लिहिला आहे ! धन्यवाद !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ४ — ज्ञानकर्मसंन्यासयोग— (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ४ — ज्ञानकर्मसंन्यासयोग— (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ये मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्‌ । 

मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ ४-११ ॥ 

*

भजताती मला पार्था मीही त्यांना भजतो

मनुजप्राणि सर्वथा मम मार्ग अनुसरतो ॥११॥

*

काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः । 

क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ॥ ४-१२ ॥ 

*

मनुष्यलोके कर्मफलाकांक्षी देवतांचे पूजन करती 

पूजन करता देवतांचे होते सत्वर कर्मफल प्राप्ती ॥१२॥

*

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः । 

तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्‌ ॥ ४-१३ ॥ 

*

गुण तथा कर्म जाणुनी चातुर्वर्ण्य निर्मिले मी

कर्ता असुनी त्या कर्मांचा आहे अकर्ताच मी ॥१३॥

*

न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा । 

इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥ ४-१४ ॥ 

*

मला मोह ना कर्मफलाचा त्यात न मी गुंततो

तत्व माझे जाणणारा कर्माशी ना बद्ध होतो ॥१४॥

*

एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः । 

कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्‌ ॥ ४-१५ ॥ 

*

जाणुनिया हे तत्व कर्मे केली मुमुक्षुंनी

तूही पार्था कर्मसिद्ध हो त्यांना अनुसरुनी ॥१५॥

*

किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः ।

तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्‌ ॥ ४-१६ ॥ 

*

कर्माकर्म विवेक करण्या संभ्रमित प्रज्ञावान

उकल करोनी कर्मतत्व कथितो मी अर्जुन 

जाणुन घेई हे ज्ञान देतो जे मी तुजला

कर्मबंधनातून तयाने होशिल तू मोकळा ॥१६॥

*

कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः । 

अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥ ४-१७ ॥ 

*

कर्मगती अति गहन ती आकलन होण्यासी

जाणुन घ्यावे  कर्मासी अकर्मासी विकर्मासी ॥१७॥

*

कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः । 

स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत्‌ ॥ ४-१८ ॥ 

*

कर्मात पाहतो अकर्म अकर्मातही कर्म 

बुद्धिमान योगी जाणावा करितो सर्व कर्म ॥१८॥

*

यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः । 

ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः ॥ ४-१९ ॥ 

*

सकल शास्त्रोक्त कर्मे ज्याची 

कामना विरहित असंकल्पाची

भस्म जाहली जी ज्ञानाग्नीत 

तो ज्ञानी असतो तो पंडित  ॥१९॥

*

त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः । 

कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित्करोति सः ॥ ४-२० ॥ 

*

कर्म कर्मफलाचा असंग सदातृप्त आश्रयरहित

जीवनी करितो कर्म तथापि तो तर कर्मरहित ॥२०॥

– क्रमशः भाग ४ 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मानवांना आलेले एक पत्र… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ मानवांना आलेले एक पत्र… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

प्रिय पृथ्वीनिवासी मानवांनो ,

तुम्ही एकही झाड लावू नका. ती आपोआप उगवतात.तुम्ही फक्त ती तोडू नका.

तुम्ही कुठलीही नदी स्वच्छ करू नका. ती प्रवाही आहे. स्वतः स्वच्छच असते.तुम्ही फक्त तिच्यात घाण टाकू नका.

तुम्ही शांतता प्रस्थापित करण्याच्या नादी लागू नका. सर्वत्र शांतताच आहे. तुम्ही फक्त द्वेष पसरवू नका.

तुम्ही प्राणी वाचवण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही. ती क्षमता निर्सगात आहे. फक्त त्यांना मारू नका आणि जंगले जाळू नका.

तुम्ही माणसं काहीही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू नका. सर्व व्यवस्थितच आहे. फक्त तुम्ही स्वतःच व्यवस्थित राहा.

तुमचा निसर्ग.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ लघुकथा – समाजसेविका… ☆ सुश्री नरेंद्र कौर छाबड़ा ☆

सुश्री नरेंद्र कौर छाबड़ा

(सुप्रसिद्ध हिंदी साहित्यकार सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा जी पिछले 40 वर्षों से अधिक समय से लेखन में सक्रिय। 5 कहानी संग्रह, 1 लेख संग्रह, 1 लघुकथा संग्रह, 1 पंजाबी कथा संग्रह तथा 1 तमिल में अनुवादित कथा संग्रह। कुल 9 पुस्तकें प्रकाशित।  पहली पुस्तक मेरी प्रतिनिधि कहानियाँ को केंद्रीय निदेशालय का हिंदीतर भाषी पुरस्कार। एक और गांधारी तथा प्रतिबिंब कहानी संग्रह को महाराष्ट्र हिन्दी साहित्य अकादमी का मुंशी प्रेमचंद पुरस्कार 2008 तथा २०१७। प्रासंगिक प्रसंग पुस्तक को महाराष्ट्र अकादमी का काका कलेलकर पुरुसकर 2013 लेखन में अनेकानेक पुरस्कार। आकाशवाणी से पिछले 35 वर्षों से रचनाओं का प्रसारण। लेखन के साथ चित्रकारी, समाजसेवा में भी सक्रिय । महाराष्ट्र बोर्ड की 10वीं कक्षा की हिन्दी लोकभरती पुस्तक में 2 लघुकथाएं शामिल 2018)

आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय लघुकथा समाजसेविका।

? लघुकथा – समाजसेविका? सुश्री नरेंद्र कौर छाबड़ा ?

महिला समाजसेवी संस्था ने इस  माह नेत्र चिकित्सा शिविर का आयोजन करने का फैसला किया. यह तय हुआ कि नेत्रों की जांच के साथ-साथ छोटे-मोटे विकारों का भी उपचार किया जाएगा. एक पारिवारिक नेत्र चिकित्सक को आमंत्रित कर उनसे स्वीकृति ली ली गई .

सभा को संबोधित करते हुए संस्था की अध्यक्ष ने सुझाव दिया जिनके पास अतिरिक्त वह बेकार पड़े चश्मे के फ्रेम हों  वे ले आएं ताकि निर्धन लोगों का फ्रेम का खर्च बच जाए. सभी को सुझाव पसंद आया.

 निश्चित दिन शिविर स्थल पर पुराने चश्मों के फ्रेमों  का अच्छा खासा ढेर  लग गया. इतने में ही श्रीमती बंसल पॉलिथीन का बड़ा सा बैग लिए वहां पहुंची .आसपास खड़ी महिलाओं को एक नजर देख अपना प्रभाव जमाने के उद्देश्य से बोली- “ मैंने सोचा चश्मे के फ्रेम तो काफी इकट्ठे हो जाएंगे. क्यों ना मैं मरीजों के लिए दवाइयां, टॉनिक लेती चलूं..”. सभी  की नजरें पल भर के लिए उन पर ठहर गईं .अपनी बात आगे बढाते हुए बोली- “ हमारे एक मित्र मेडिकल रिप्रेजेंटेटिव हैं. अक्सर दवाइयां, टॉनिक के सैंपल देते रहते हैं. ढेर सारी दवाइयां यूं ही पड़ी हैं घर में…. कइयों की तो एक्सपायरी डेट भी निकल चुकी है. अब वे  किस काम की…! मैंने सोचा शिविर में ही दे देती हूं… गरीब लोगों के काम आ जाएंगी…”

© नरेन्द्र कौर छाबड़ा

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # 180 ☆ शोभा सिंधु न अंत रही री… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना शोभा सिंधु न अंत रही री…। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – आलेख  # 180 ☆ शोभा सिंधु न अंत रही री… ☆

वर्तमान कब भूत में बदल जाता है, पता  नहीं चलता पर अभी भी बहुत से लोग पुराना राग अलाप रहे हैं, आज के तकनीकी युग में जब हर पल स्टेटस व डी पी बदली जा रही है तब व्यवहार कैसे न बदले पर कुछ भी हो नेकी व सच्चाई नहीं छोड़नी चाहिए  हम सबको अपने कर्तव्यों के प्रति जागरुक रहना चाहिए।

तेजी से बदलती दुनिया में कुछ भी तय नहीं रह सकता ….

कल के ही अखबार आज नहीं चलते ये बात  सुविचार की दृष्टि से, प्रतियोगी परीक्षार्थी  की दृष्टि से तो सही है परन्तु व्यवहार यदि पल- पल बदले तो उचित नहीं कहा जा सकता है।

खैर जिसको जो राह सही लगती है, वो उसी पर चल पड़ता है। कुछ ठोकर खा कर संभल जाते हैं; कुछ दोषारोपण करके अलग राह पर चल पड़ते हैं। वक्त रेत के ढेर की तरह फिसलता जा रहा है,  कर्मयोगी तो इसे अपने वश में कर लेते हैं परन्तु जो कुछ नहीं करते वे दूसरों के ऊपर आरोप- प्रत्यारोप करने में समय व्यतीत करते रह जाते हैं। इस दुनिया में सबसे मूल्यवान समय है, उसका सदुपयोग आपको रंक से राजा व दुरुपयोग राजा से रंक बनाने की क्षमता रखता है।

आप जिस भी क्षेत्र में कार्य करते हों  वहाँ पर ईमानदारी से अपने दायित्वों का निर्वाहन करें यदि वो भी न बनें तो कम से कम आलोचक न बनें क्योंकि निंदक नियरे राखिए आज भी प्रासंगिक है पर वो  सार्थक तभी होगा जब निंदक ज्ञानी हो, उसमें निःस्वार्थ का भाव हो, सच्ची निंदा ही पथप्रदर्शन का कार्य कर सकती है  और निंदक मार्गदर्शक का।

जब आप किसी के लिए उपयोगी हों तो विरोधी होने पर  भी  लोग आपका  सम्मान करेंगे, मीठे वचनों की शक्ति से तो सभी परिचित हैं। कहावत भी है बातन हाथी पाइए बातन हाथी पाँव  अर्थात आप अपनी अच्छी वाणी के बल पर उपहार में हाथी, धन संपदा, वैभव सब प्राप्त कर सकते हैं जबकि कड़वे वचनों से सजा स्वरूप हाथी के पाँव के नीचे भी  पहुँच सकते हैं।

लोगों का लगाव हमेशा ही अच्छे गुणों से होता है ये ही आपकी सच्ची पूँजी है जो आपके बाद भी लोगों के साथ बनी रहती है। नेकी कभी व्यर्थ नहीं जाती इसका फल मिलता ही है कई गुना वापस होकर तो क्यों न इस पूँजी का संचयन करे अपने व अपनों के लिए।

एक तरफ जहाँ किसी के भी कार्यों का मूल्यांकन बहुत सहज होता वहीं स्वमूल्यांकन अत्यन्त कठिन क्योंकि दूसरों से कार्य करवाने में तो हम सभी माहिर होते हैं, जबकि खुद से कार्य नहीं करवा पाते जो भी लक्ष्य निर्धारित करते हैं उसमें आने वाली बाधाओं से  डर कर  रास्ता बदल देते हैं।

जो कुछ करना चाहता है, उसकी राहें स्वयं बनने लगतीं हैं। हर व्यक्ति अपने अनुसार चलना और चलाना चाहता है पर मजे की बात सामंजस्य नहीं चाहता। ये सब तो चलता रहेगा। अब समय है मर्यादा पुरुषोत्तम के पदचिन्हों पर चलने का। रामलला के विग्रह को देखकर ये पंक्ति जीवंत हो उठती है…

लोचन अभिरामा तनु घनश्यामा

निज आयुध भुज चारी…

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – कथा – वेष की मर्यादा ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – कथा – वेष की मर्यादा ? ?

(‘वह लिखता रहा’ संग्रह से।)

(दैनिक चेतना में 24 जनवरी 2024 को प्रकाशित।)

ठाकुर जी का मंदिर कस्बे के लोगों के लिए आस्था का विशेष केंद्र था। अलौकिक अनुभूति कराने वाला मंदिर का गर्भगृह, उत्तुंग शिखर, शिखर के नीचे उसके अनुज-से खड़े उरूश्रृंग। शिखर पर विराजमान कलश। मंदिर की भव्य प्राचीनता, पंच धातु का विग्रह और बूढ़े पुरोहित जी का प्रवचन..। मंदिर की वास्तु से लेकर विग्रह तक, पुरोहित जी की सेवा से लेकर उनके प्रवचन तक, सबमें गहन आकर्षण था। जिस किसी की भी दृष्टि मंदिर पर जाती, वह टकटकी बांधे देखता ही रह जाता।

मंदिर पर दृष्टि तो उसकी भी थी। सच तो यह है कि मंदिर के बजाय उसकी दृष्टि ठाकुर जी की मूर्ति पर थी। अब तक के अनुभव से उसे पता था कि पंच धातु की मूर्ति कई लाख तो दिला ही देती है। तिस पर सैकड़ों साल पुरानी मूर्ति याने एंटीक पीस। प्रॉपर्टी का डेप्रिसिएशन होता है, पर मूर्ति ज्यों-ज्यों पुरानी होती है, उसका एप्रिसिएशन होता है। मामला करोड़ों की जद में पहुँच रहा था।

उसने नियमित रूप से मंदिर जाना शुरू कर दिया। बूढ़े पुरोहित जी बड़े जतन से भगवान का शृंगार करते। आरती करते हुए उनकी आँखें मुँद जाती और कई बार तो आँखों से आँसू छलक पड़ते, मानो ठाकुर जी को साक्षात सामने देख लिया हो। मूर्ति की तरह ही पुरोहित जी भी एंटीक वैल्यू रखते थे।

आरती के बाद पुरोहित जी प्रवचन किया करते। प्रवचन के लिए बड़ी संख्या में लोग जुटते। उनका बोलना तो इतना प्रभावी ना था पर जो कुछ कंठ में आता, वह हृदय तल से फूटता। सुनने वाला मंत्रमुग्ध रह जाता। अनेक बार स्वयं पुरोहित जी को भी आश्चर्य होता कि वे क्या बोल गए। दिनभर पूजा अर्चना, ठाकुर जी की सेवा और रात में वही एक कमरे में पड़े रहते पुरोहित जी।

इन दिनों वेष की मर्यादा पर उनका प्रवचन चल रहा था।

“…श्रीमद्भागवत गीता का दूसरे अध्याय का 62वाँ और 63वाँ श्लोक कहता है,

“ध्यायतो विषयान् पुंसः सङ्गस्तेषूपजायते। सङ्गात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते॥

क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः।

स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति।

अर्थात विषयों का चिन्तन करनेवाले मनुष्य की उन विषयों में आसक्ति पैदा हो जाती है।  आसक्ति से कामना उत्पन्न होती है। कामना का अर्थ है, वांछा, प्राप्त करने की इच्छा। अतः आसक्ति से विषयभोग की इच्छा प्रबल हो जाती है। प्रबलता भी ऐसी कि विषयभोग में थोड़ा-सा भी विघ्न भी मनुष्य सहन नहीं कर पाता। यह असहिष्णुता क्रोध की जननी है।

क्रोध आने पर मनुष्य का विवेक नष्ट हो जाता है। उसमें सम्मोह (मूढ़भाव) उत्पन्न हो जाता है। सम्मोह से स्मृति में भ्रम हो जाता है। स्मृति में भ्रम हो जाने पर बुद्धि का नाश हो जाता है। बुद्धि का नाश होनेपर मनुष्य कार्य-अकार्य में भेद नहीं कर पाता, सही-गलत का भान नहीं रख पाता। ऐसा मनुष्य अपनी स्थिति से गिर जाता है, उसकी आंतरिक मनुष्यता का पतन हो जाता है।

पूरी प्रक्रिया पर विचार करेंगे तो पाएँगे कि मनुष्यता कहीं बाहर से नहीं लानी पड़ती। सच्चाई, सद्विचार मूल घटक हैं जो हर मनुष्य में अंतर्भूत हैं। ये हैं तभी तो दोपाया, जानवर न कहलाकर मनुष्य कहलाया।

ध्यान रखना, हर मनुष्य मूलरूप से सच्चा होता है। दुनियावी  लोभ, लालच कुछ समय के लिए उसे उसी तरह ढके होते हैं जैसे जेर से भ्रूण। देर सबेर जेर को हटना पड़ता है, भ्रूण का जन्म होता है।

ढकने की बात आई तो वेष की भूमिका याद आई। आदमी की सच्चाई पर उसके वेष का बहुत असर पड़ता है। वह जिस वेष में होता है, उसके भीतर वैसा ही बोध जगने लगता है। सेल्समैन हो तो सामान बेचने के गुर उमगने लगते हैं। शिक्षक हो तो विद्यार्थी को विषय समझाने की बेचैनी घेर लेती है।  चौकीदार का वेश हो तो प्राण देकर भी संपत्ति, वस्तु या व्यक्ति की रक्षा करने के लिए मन फ़ौलाद हो जाता है…।”

…वह पुरोहित जी के वचन सुनता, मुस्करा देता।

आरती और प्रवचन के लिए रोज़ाना आते-आते पुरोहित जी से उसका संबंध अब घनिष्ठ हो चुका था। मंदिर के ताला-चाबी की जगह भी उसे ज्ञात हो चुकी थी। एक तरह से मंदिर का मैनेजमेंट ही देखने लगा था वह।

प्रवचन की यह शृंखला तीन दिन बाद संपन्न होने वाली थी। हर शृंखला के बाद चार-पाँच दिन विराम काल होता। तत्पश्चात पुरोहित जी फिर किसी नये विषय पर प्रवचन आरंभ करते। आज रात उसने अपने सभी साथियों को बता दिया था कि विराम काल में ठाकुर जी का विग्रह कैसे अपने कब्ज़े  में लेना है। कौन सा दरवाजा कैसे खुलेगा, किस-किस दरवाज़े का ताला टूट सकता है, किसकी डुप्लीकेट चाबी वह बना चुका है। आज से तीसरी  रात योजना को सिद्ध करने के लिए तय हुई।

तीसरे दिन प्रवचन संपन्न हुआ। इस बार पुरोहित जी का स्वास्थ्य निरंतर बिगड़ता गया था। आज तो उन्हें बहुत अधिक थकान थी, ज्वर भी तीव्र था। उनका एक डॉक्टर शिष्य आज गाड़ी लेकर आया था। उसने ज़ोर दिया कि इस बार दवा से काम नहीं चलेगा। कुछ दिन दवाखाने में एडमिट रहना ही होगा।

पुरोहित जी, अपने ठाकुर जी को छोड़कर नहीं जाना चाहते थे। डॉक्टर शिष्य, स्थिति की नज़ाकत समझ रहा था, सो पुरोहित जी को साथ लिए बिना जाना नहीं चाहता था। अंतत:  जीत  डॉक्टर की हुई।

गाड़ी में बैठने से पहले पुरोहित जी ने उसे बुलाया। धोती से बंधी चाबियाँ खोलीं और उसके हाथ में देते हुए बोले,…”ठाकुर जी की चौकीदारी की ज़िम्मेदारी अब तुम्हारी। भगवान ने खुद तुम्हें अपना रक्षक नियुक्त किया है। आगे मंदिर की रक्षा तुम्हारा धर्म है।”

उसके बाँछें खिल गईं। उसने सुना रखा था कि ऊपर वाला जब देता है तो छप्पर फाड़कर देता है। सुने हुए को आज फलित होता देख भी रहा था। जीवन में पहली बार उसने मन ही मन सच्चे भाव से भगवान को माथा नवाया।

…रात का तीसरा पहर चढ़ चुका था। वह मंदिर के भीतर प्रवेश कर चुका था। अपनी टोली के आने से पहले सारे दरवाज़े खोलने थे। …अब केवल गर्भगृह का द्वार बाकी था। उसने चाबी निकाली और ताले में लगा ही रहा था कि गाड़ी में बैठते पुरोहित जी का चित्र बरबस सामने घूमने लगा,

“ठाकुर जी की चौकीदारी की ज़िम्मेदारी अब तुम्हारी। भगवान ने खुद तुम्हें अपना रक्षक नियुक्त किया है। आगे मंदिर की रक्षा तुम्हारा धर्म है।”

जड़वत खड़ा रह गया वह। भीतर नाना प्रकार के विचारों का झंझावात उठने लगा। ठाकुर जी के जिस विग्रह पर उसकी दृष्टि थी, उसी को टकटकी लगाए देख रहा था। उसे लगा केवल वही नहीं बल्कि ठाकुर जी भी उसे देख रहे हैं। मानो पूछ रहे हों,….मेरी रक्षा का भार उठा पाओगे न?…

विचारों की असीम शृंखला चल निकली। शृंखला के आदि से इति तक प्रवचन करते पुरोहित जी थे,

“….सम्मोह से स्मृति में भ्रम हो जाता है। स्मृति में भ्रम हो जाने पर बुद्धि का नाश हो जाता है। बुद्धि का नाश होनेपर मनुष्य कार्य-अकार्य में भेद नहीं कर पाता, सही-गलत का भान नहीं रख पाता..।”

उसकी स्मृति पर से भ्रम का कुहासा छँटने लगा था।

“…ध्यान रखना, हर मनुष्य मूलरूप से सच्चा होता है। दुनियावी  लोभ, लालच कुछ समय के लिए उसे उसी तरह ढके होते हैं जैसे जेर से भ्रूण। देर सबेर जेर को हटना पड़ता है, भ्रूण का जन्म होता है ।”

उसके अब तक के व्यक्तित्व पर निरंतर प्रहार होने लगे। भ्रूण जन्म लेने को मचलने लगा। जेर में दरार पड़ने लगी।

तभी दरवाज़ा खुलने की आवाज़ ने उसकी तंद्रा को भंग कर दिया। लाठियाँ लिए उसकी टोली अंदर आ चुकी थी।

“….आदमी की सच्चाई पर उसके वेष का बहुत असर पड़ता है। वह जिस वेष में होता है, उसके भीतर वैसा ही बोध जगने लगता है।”

ठाकुर जी के चौकीदार में बिजली प्रवाहित होने लगी। चौकीदार ने टोली को ललकारा। आश्चर्यचकित टोली पहले तो इसे मज़ाक समझी। सच्चाई जानकर टोली, चौकीदार पर टूट पड़ी।

चौकीदार में आज जाने किस शक्ति का संचार हो गया था।  वह गोरा-बादल-सा लड़ा। उसकी एक लाठी, टोली की सारी लाठियों पर भारी पड़ रही थी। लाठियों की तड़तड़ाहट में खुद को कितनी लाठियाँ लगीं, कितनी हड्डियाँ चटकीं, पता नहीं पर लहुलुहान  टोली के पास भागने के सिवा और कोई विकल्प नहीं बचा।

शत्रु के भाग खड़े होने के बाद उसने खुद को भी ऊपर से नीचे तक रक्त में सना पाया। किसी तरह शरीर को ठेलता हुआ गर्भगृह के द्वार तक ले आया। संतोष के भाव से ठाकुर जी को निहारा। ठाकुर जी की मुद्रा भी जैसे स्वीकृति प्रदान कर रही थी। उसके नेत्रों से खारे पानी की धारा बह निकली। हाथ जोड़कर रुंधे गले से बोला,

“…ठाकुर जी आप साक्षी हैं। मैंने वेष की मर्यादा रख ली।”

कुछ दिनों बाद मंदिर के परिसर में पुरोहित जी की समाधि के समीप उसकी भी समाधि बनाई गई।

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 🕉️ मार्गशीर्ष साधना सम्पन्न हुई। अगली साधना की सूचना हम शीघ्र करेंगे। 🕉️ 💥

नुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

image_print

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ ‘अलिखित…’ श्री संजय भारद्वाज (भावानुवाद) – ‘Unwritten ‘Un’ Dictionary…’ ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of n

ational and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

We present an English Version of Shri Sanjay Bhardwaj’s Hindi poem “अलिखित.  We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji (who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages) for this beautiful translation and his artwork.)

श्री संजय भारद्वाज जी की मूल रचना

? संजय दृष्टि –  अलिखित ? ?

सुनो-

कलरव से

नीरव हो जाने में

समय नहीं लगता

पर नीरव से

कलरव लाने में

बीत जाते हैं युग,

चुक जाती हैं सदियाँ,

उपसर्ग भर बदलने से

कितने बदल जाते हैं शब्द,

उनका अर्थ और

अ-लिखा शब्दकोश!

© संजय भारद्वाज

मोबाइल– 9890122603, संजयउवाच@डाटामेल.भारत, [email protected]

☆☆☆☆☆

English Version by – Captain Pravin Raghuvanshi

? – Unwritten ‘Un’ Dictionary… ??

Listen-

It doesn’t take much

time to go from vivacious

chirping to  stark silence…

But,  centuries  go  by,

Or even it takes many ages

to bring festive liveliness

from sombre lifelessness,

Just imagine how many

words turn topsy-tervy 

just by changing the prefix,

Rewriting their meaning and

creating an ‘un’written dictionary!

~Pravin

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

image_print

Please share your Post !

Shares