मराठी साहित्य – विविधा ☆ हनुमंत आमुची कुळवल्ली ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

हनुमंत आमुची कुळवल्ली ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

रामायणात हनुमंताची भूमिका फार मोलाची राहिली आहे. रामाच्या कार्यात अग्रभागी आणि अतितत्पर कोण असेल तर तो एकमेव  हनुमंत किंवा हनुमान. हनुमंताच्या अंगी अनेक गुण होते आणि त्याचा उपयोग त्याने कधीही स्वतःसाठी केला नाही तर तो केला फक्त एका रामासाठी. हनुमंताच्या रामभक्तीच्या अनेक कथा प्रसिध्द आहेत. बुद्धीवंतामध्ये वरिष्ठ, अतिचपल, कार्यतत्पर, कुशल नेतृत्व, संघटन कौशल्य, संभाषण चतुर, उत्तम सेवक, सर्व शक्तिमान, (बुद्धी आणि शक्ती एकत्र असणं अतिदुर्मिळ! ) असे हनुमंताचे अनेक गुण सांगितले जातात. रामायणात वर्णन केल्याप्रमाणे हनुमंताची आणि रामाची भेट तशी उशिरा म्हणजे सिताहरण झाल्या नंतरची आहे. पण पहिल्या भेटीतच हनुमंताचे वाक्चातुर्य पाहून प्रभू श्रीराम प्रसन्न झाले तसेच प्रथमच रामाचे दर्शन होऊन हनुमंत रामाचा कायमचा दास झाला. जिवाशिवाचे मिलन झाल्याचा तो अमृतक्षण होता. पण एकदा रामाची भेट झाल्यावर मात्र हनुमंतानी कधीच रामास अंतर दिले नाही. तो रामाचा एकनिष्ठ सेवक बनला. आपल्या असामान्य आणि अतुलनीय भक्तीने हनुमंताने नुसते देवत्व ( रामतत्व) प्राप्त केले नाही तर जिथे जिथे रामाची पूजा केली जाते तिथे हनुमंताची पूजा व्हायला लागली. रामाचे अनंत भक्त आहेत पण राम पंचायतनात मात्र फक्त हनुमंताचा समावेश आहे. आज सुद्धा जिथे जिथे रामकथा ऐकली जाते, सांगितली जाते तिथे तिथे हनुमंतासाठी मानाचे आसन ठेवलेले असते.

पूर्वी आपल्याकडे अध्ययन आणि अध्यापन हे मौखिक पद्धतीने म्हणजे पाठांतर रूपानेही केले जात असे. लिखीत स्वरूपात अध्ययनाची पद्धती त्यामानाने अलीकडील आहे. याचा एक दुष्परिणाम असा झाला की बराचसा इतिहास आपल्याकडे लिहिला गेला नाही आणि जो लिहिला गेला तो परकीय प्रवाशांनी किंवा आक्रमकांनी. स्वाभाविकपणे तो त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिला. त्यांच्या हिताच्या गोष्टी त्यांनी लिहिल्या. यातून एक गैरसमज पसरविला गेला की रामायणात जे वानर होते ते (व्वा!) नर  नसून ती फक्त ‘माकडं’ होती. ही आपल्या पराक्रमी आणि विजयी इतिहासाची जगाने केलेली क्रूर चेष्टा आहे, असेच म्हणावे लागेल. रामायणात असे वर्णन आहे की किष्किंधा राज्य हे सुग्रीवाच्या अधिपत्याखाली होते. त्या राज्याचा सेनापती होता केसरी. आणि ह्या केसरीचा पुत्र हनुमंत. सध्याची दक्षिणेकडील चार राज्यं म्हणजे त्याकाळातील किष्किंधानगरी. सात मजली सोन्याचे महाल असल्याचे वर्णन रामायणात आहे. आजच्या काळात एखाद्या राज्याच्या मंत्र्याची संपत्ती किती असते आपल्याला कल्पना आहे, मग या चार एकत्रित राज्याचा सेनापती किती श्रीमंत असेल. असा हा भावी सेनापती हनुमंत रामाचा दास होतो, नुसता कागदोपत्री दास न होता तो कायमचा रामदास होतो यातच त्याच्या भक्तीचे ‘मर्म’ सामावले आहे.

महारुद्र जे मारुती रामदास।

कलीमाजि जे जाहले रामदास।।

असे ज्याचे वर्णन करण्यात येते ते समर्थ रामदास यांना सुरुवातीपासूनच हनुमंताबद्दल तीव्र ओढ, श्रद्धा, भक्ती होती. प्रभुश्रीरामानी दृष्टांत दिल्यापासून समर्थानी ‘समर्थ’ होईपर्यंत आणि पुढे कार्यसमाप्तीपर्यंत हनुमंताची अखंडित साधना केली. त्याचे यथायोग्य परिणाम आपण शीवकाळात अनुभवले.

शक्तीने मिळती राज्ये | युक्तीने येत्न होतसे | शक्ती युक्ती जये ठाई | तेथे श्रीमंत धावती ||”

समर्थ रामदास

यासमर्थ वचनाची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे. तो काळ मोगलांच्या आक्रमणाचा होता. टोळधाड यायची, घरावर नांगर फिरवला जायचा, आपलीच माणसे क्षुल्लक ‘वतनां’साठी, जहागीरीसाठी आपल्याच माणसांना मारायची. स्वाभिमान नष्ट झाला होता, समाजाला एक  प्रकारचे सामूहिक नपुंसकत्व प्राप्त झाले होते. समाज आपले शौर्य, वीर्य, धेर्य विसरला होता. कोणीतरी ह्या सर्वावर बसलेली काजळी झटकण्याची गरज होती. अशा अस्वस्थ मनाचा अभ्यास करून समर्थानी हनुमंताची मंदिरे स्थापन करून बलोपासनेस सुरुवात केली. तरुण बलवान  व्हायला लागले आणि विविध मठांतून शक्ती आणि बुद्धियुक्त असे नवीन तरुण घडू लागले आणि त्याचा उपयोग छत्रपतींना स्वराज्य स्थापनेसाठी झाला.

रामदास स्वामीनी पूर्ण विचार करून आपल्या आराध्य देवतेची निवड केली. आपल्याकडे गुरुशिष्य परंपरा खुपच पुरातन आहे. शिष्य साधनेतून इतका ‘तयार’ होतो की शिष्याचे नुसते विचार बदलत नाहीत तर त्याची कुडी सुद्धा गुरुसारखी किंवा उपास्यदेवतेसारखी होते. आपला समाज हनुमंतासारखा बलवान, बुद्धिमान, सर्वगुंणसंपन्न व्हावा म्हणून हनुमंताची मंदिरे आणि मठ स्थापन करण्यात आले. उपास्य देवतेची निवड करतानाही समर्थांनी कोंदंडधारी रामाची निवड केलेली आहे. आपल्या पत्नीला रावणाने पळवून नेल्यावर रामाने आयोध्येला निरोप पाठवून सैन्य मागविले नाही, तर स्वतः उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीच्या आधारे, तेथील सामान्य मनुष्यांच्या (वानराच्या) साह्याने लंकेवर स्वारी करून आपल्या पत्नीला सोडवून आणले. ह्यासर्व कार्यात हनुमंत एकनिष्ठेने रामकार्यात कटिबद्ध होता. हनुमंताने जेंव्हा सिताशोधनासाठी लंकेत गेला, सितामाईला भेटला आणि म्हणाला की तुम्ही माझ्या सोबत चला, मी आपल्या मुलासमान आहे, आपण माझ्या माताच आहात. पण ती पतिव्रता म्हणाली की स्वतः प्रभू राम इथे येतील, ज्याने मला पळवून आणले त्याचा नाश करतील तेंव्हाच मी त्यांच्या सोबत येईन. ह्याला म्हणतात निष्ठा!.

अशा या हनुमंताची समर्थांनी उपासना केली आणि समाजाकडून कडून करवून घेतली. त्याकाळात रूढ झालेल्या क्षुद्र देवतांची पूजा, उपासना समर्थांनी बंद पाडली आणि तीही हनुमंताची उपासना सुरु करून. योग्य असा पर्याय उपलब्ध करून समर्थानी समाजाच्यातील भक्तीला आणि शक्तीला जागृत केले. ‘आधी केलं आणि मग सांगितले’ या उक्तीस जागून स्वतः समर्थ रोज एक हजार सूर्य नमस्कार घालायचे. त्या काळात आणि आज सुद्धा स्वतः व्यायाम करणारा संत पाहायला मिळणं हे दुर्मिळच!. समाजाची दुखरी नस काय आहे हे जाणून त्यानुसार उपचार करण्याचं काम समर्थानी केलं. एखाद्या मनुष्याला साधना करून मुक्ती मिळण्यापेक्षा संपूर्ण समाज एक पायरी उन्नत झाला तर ती प्रगती जास्त चांगली, हे सूत्र उरात ठेऊन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी समर्थानी अवघे जीवन खर्च केले. स्वतः लौकिक अर्थाने कधीही प्रपंच न करणारा हा रामदासी संतपुरुष लोकांनी ‘प्रपंच नेटका करावा’ असे सांगत होता. प्रपंच नेटका करण्यासाठी काय करावे लागेल हे सुद्धा त्यांनी सूत्रबद्ध रीतीने दासबोधात लिहून ठेवलेआहे.

सर्वसामान्य मनुष्य (समाजपुरुष ) हा लहान मुलाप्रमाणे वागतो. तो आदर्श जीवन जगायचं प्रयत्न करेलच असे नाही पण तो लहान मूलाप्रमाणे अनुकरणशील मात्र नक्कीच असतो. एखादया लहान मुलांचे वडील सैनिक असतील तर त्या लहान मुलास आपण सैनिक व्हावेसे वाटते, एखाद्याचे वडील डॉक्टर  असतील तर त्याला आपण डॉक्टर व्हावेसे वाटते. हे अगदी स्वाभाविक आहे. त्या मूलासमोर जो आदर्श प्रस्तुत केला जातो , तसे होण्याचा ते मूल प्रयत्न करतं, म्हणून समर्थांनी समाजापुढे हनुमंत हा आदर्शांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून प्रस्तुत केला. हनुमंताचा आणिक एक विशेष गुण आहे. हा हनुमंत उपजत देव म्हणून जन्माला आलेला नाही, तर आपल्या भक्तीने, नराचा नारायण व्हावा त्याप्रमाणे भगवंताची (रामाची ) नित्य सेवा करून देवत्वास पोचलेला आहे. हनुमंत कर्तव्यतत्पर, प्रयत्नवादी आहे. व.पु. काळे म्हणतात त्याप्रमाणे मोटर सायकल वरून प्रभात फेरफटका (morning walk) करणाऱ्यांना हनुमंत कधीच उमगणार नाही. सर्व सैन्याला खांद्यावर बसवून लंकेत नेणं हनुमंताला अवघड नव्हतं, पण सामान्य मनुष्यात स्वाभिमान जागृत होण्यासाठी त्याला लढायला लावणं जास्त गरजेचं होतं आणि म्हणून सर्व वानरांच्या साह्याने रामसेतू बांधून लंकेत जाऊन युद्धात रावणांचा पराभव करून, त्याला मारून रामानी सितामाईला परत आणली.

आपल्या कुळातील पूर्वजांची माहिती कोणी आपल्याला विचारली तर आपण फारतर तीन किंवा चार पिढ्यांची नावे सांगू, पण त्या आधीच्या पिढ्यांची नावे सांगता येतीलच असे नाही, पण आपण हनुमंताच्या कुळातले आहोत, रामकृष्णाच्या वंशातले आहोत, छत्रपतींच्या वंशातले आहोत, असं नुसतं म्हटलं तरी आपले रक्त तापते, छाती गर्वाने फुगते आणि आपल्या अंगात आपसूक वीरश्री संचारते. ज्यांना आपला इतिहास वैभवशाली होता हे माहित असतं त्यांचा भविष्यकाळ सुद्धा उज्ज्वल असतो अशा प्रकारचे एक  वचन आहे. आपल्या बाबतीत ते नितांत खरे आहे. जिजाबाईंनी शिवबाला रामायणातील, महाभारतातील विजयाचा इतिहास शिकविला, अन्याय सहन करायचा नसतो, तर त्याविरुद्ध लढून न्याय मिळवायचा असतो हे शिकविले आणि मग चार इस्लामी पातशाह्यांच्या छाताडावर उभे राहून छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले.

आज आपण आपल्या मुलांना हिंदुस्थानच्या पराजयाच्या आणि युरोपीय देशांच्या विजयाचा इतिहास शिकवीत आहोत, त्यामुळे आपली तरुण पिढी परकीय देशांच्या विकासासाठी परदेशी जात आहे, आपण सर्वच बाबतीत त्याचे अंधानुकरण करीत आहोत. आपण जन्माने हिंदू आणि आचरणाने ख्रिश्चन/मुस्लिम बनत आहोत. ह्याला एकाच कारण आहे ते म्हणजे आपण आपलो ‘कुळवल्ली’ विसरलो आहोत किंवा जाणीवपुर्वक विसरले जावी म्हणून समाजात विविध दुष्ट शक्ती कार्यरत आहेत. आपण वेळीच सावधान होण्याची गरज आहे. लौकिक अर्थाने परंपरा न पाळता जरा जागरूक राहून , ‘धर्म’ सजगतेने समजावून घेऊन आचरणात आणण्याची गरज आहे. छत्रपती जन्माला येतीलही पण त्याआधी मावळे मात्र आपल्याला आपल्या घरातच घडवावे लागतील. असे आपण करू शकलो किंवा प्रयत्न चालू केला  तर हनुमंत आमुची कुळवल्ली असे म्हणून घेण्यास आपण पात्र होऊ.

 जय जय रघुवीर समर्थ।

।श्रीराम।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बापू … ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

??

☆ बापू … ☆ श्री सुनील शिरवाडकर

आज बापू  पुन्हा दिसला. त्याच गल्लीतून बाहेर पडत होता. मागच्या आठवड्यात मी या भागातुन चाललो होतो. टु व्हिलरवरून. तेव्हा तो दिसला. पण मी घाईत होतो. त्यामुळे थांबू शकलो नाही. आज पुन्हा इकडे या भागात आलो..पुन्हा बापू दिसला.. हो तो बापूच होता.कितीतरी वर्षांनी दिसला होता.

मलाही वेळ होता.एकदम त्याच्या पुढ्यातच गाडी थांबवली. बापू  दचकला.. माझ्याकडे जरा रागानेच त्यानं पाहीलं..पण मग मला ओळखल्यावर एकदम दिलखुलास हसला.काही  बदल नव्हता त्याच्या त्या हसण्यात..आणि दिसण्यातही.गोरटेलासा..उंचीने जरा कमी..कुरळे केस..

बापूचं हे असं हसणंच मला खूप आवडायचं.आम्ही दोघे शाळकरी मित्र.दोन वर्ष तर एकाच बाकावर बसायचो.त्याची माझी मैत्री खुप पटकन जमली.

“काय बापू ..इकडे कुठे?”

 मी विचारले.

“अरे,कांता किती वर्षांनी भेटतो आहेस..”

“हो ना.मागच्या आठवड्यात पण मी तुला पाहीलं.याच गल्लीतुन येताना. इकडे काय कोण रहातं का?”

“नाही रे..इकडे एक उदबत्तीचा कारखाना आहे. मी तिथेच नोकरी करतो.”

बापू  ही अशी नोकरी करतो याचा मला जरा धक्काच बसला. कारण बापुची खुप मोठी स्वप्नं होती.बापुचे वडील पेपर विकायचे.पहाटे उठून पेपरचे गठ्ठे आणायचे.. घरोघर ते टाकायचे.आणि मग त्यांच्या घराच्या पुढे एक टेबलवर स्टॉल लावायचे.मी कधी शाळेत जातांना बापुला बोलवायला जायचो.बापु तिथेच स्टॉलवर बसलेला असायचा. एका खुर्चीवर. एक लोखंडी घडीची खुर्ची. निळ्या रंगाची. बापु त्यावर मोठ्या ऐटीत बसायचा.एखाद्या बादशहा सारखा. एक पाय खाली सोडलेला,आणि दुसरा पाय त्यावर आडवा..सतत  हलणारा….. मला त्याची ही पोज खुप आवडायची.

मी आलो की बापू उठायचा.आत घराकडे बघुन त्याच्या वडिलांना हाक मारायचा. ते आले की बाजुला ठेवलेलं दफ्तर उचलायचा.आणि मग आम्ही शाळेकडे जायचो.

त्या लोखंडी घडीच्या खुर्चीत बसुन बापु स्वप्नं रंगवायचा.त्याला मोठं झाल्यावर डॉक्टर बनायचं होतं.आपला एकदम पॉश दवाखाना असेल..मोठ्ठं टेबल..आणि त्यामागे आपली खुर्ची. गोल गोल फिरणारी..खाली छोटे चाकं असणारी.

कधी त्याला वाटायचं..आपण बँकेतला साहेब व्हावं..आपल्याला छानसं केबिन असेल..बाहेर दरवाज्यावर नावाची पाटी असेल.. आणि आपल्या साठी खास खुर्ची.. अशीच.. गोल गोल फिरणारी.

वेळोवेळी त्याची स्वप्नं बदलायची.. पण एक गोष्ट मात्र कॉमन.. ती त्याची खुर्ची.

शाळा सोडल्यानंतर बापु  आज प्रथमच भेटत होता.मधली बारा पंधरा वर्षं कशी झरकन गेली होती.त्याला पाहीले..अन् मला हे सगळं आठवलं.बापुच्या त्या डॉक्टर बनण्याच्या स्वप्नांचं..मोठा अधिकारी बनण्याच्या स्वप्नाचं पुढं काय झालं ते मी विचारुच शकलो नाही.त्याच्या एकंदरीत अवसानावरुन.. त्याच्या नोकरीवरून मला त्याच्या परीस्थितीचा अंदाज आला.

पण मग गप्पा मारताना त्यानेच सगळं सांगितलं.शाळा सुटली..मार्क जेमतेमच.अकरावीला कॉलेजमध्ये पण गेला.आणि अचानक त्याचे वडील वारले.घरची जबाबदारी त्याच्यावर पडली.कॉलेज सोडुन तो पेपर स्टॉलवर बसु लागला.पण त्याला त्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता.

कोणाच्या तरी ओळखीने त्याला ही नोकरी मिळाली होती.

“तु बघ कांता.. मला आता या उदबत्तीच्या धंद्याची बरीचशी माहिती झाली आहे.अजुन फारतर दोन तीन वर्षे..मग..”

“..मग..काय?” मी विचारलं.

“मीच एक उदबत्तीचा कारखाना टाकणार आहे.मुंबईहुन कच्चा माल आणायचा.. दहा बारा बायका..मुलं कामाला ठेवायची.आपण फक्त लक्ष ठेवायचं..गोल गोल फिरणाऱ्या खुर्चीत बसुन..”

गोल गोल फिरणाऱ्या खुर्चीचं वेड काही त्याच्या डोक्यातुन गेलं नव्हतं.

त्यानंतर मात्र बापुची भेट नाही.मधल्या काळात असाच एकदा रस्त्यानं जात असताना एक भंगारवाल्याची गाडी दिसली.त्यावर एक जुनी खुर्ची ठेवलेली होती.. उलटी करुन.तुटकी चाकं अशी वरती दिसत होती.ती खुर्ची बघुन मला एकदम बापुची आठवण आली.

मग एकदा वेळ काढून मी बापुकडे गेलोच.तो तिथेच रहात होता अजुन.पत्र्याच्या खोलीत.पेपर स्टॉलमागेच त्यांचं घर होतं.आता तो रस्ता खुपच रहदारीचा झाला होता.

दार वाजवलं.एका विशीच्या मुलानं दार उघडलं.बापूचा मुलगाच असावा तो.दिसायला साधारण बापुचाच तोंडावळा.

“कोण आहे रे..”

म्हणत बापु बाहेर आला.त्याचं हे असं भेटणं मला एकदमच अनपेक्षित होतं.बापु खुर्चीत बसला होता.. चाकाच्या खुर्चीत..पण..

..पण ती व्हिल चेअर होती.दोन्ही हातांनी चाकं फिरवत तो बाहेर आला.त्याचा एक पाय प्लास्टरमध्ये होता.

मला बघताच बापुला खुप आनंद झाला.बापुला भेटुन मलाही बरं वाटलं.नुकताच त्याचा एक छोटा अपघात झाला होता ‌काही दिवसांसाठी पाय प्लास्टरमध्ये ठेवला होता.म्हणुन त्याच्या मुलानं ही खुर्ची आणली होती.

गप्पा मारताना आम्ही जरा भुतकाळात हरवलो.. आणि मला आठवलं ते बापुचं स्वप्न.

आणि मग बापुच म्हणाला..

“तुला आठवतं..माझं एक स्वप्न होतं ते? चाकाच्या खुर्चीच? ते पुर्ण झालं बघ.बसलो आहे चाकाच्या खुर्चीत.”

बापू हसला.पण त्यांचं ते हसणं कसंतरीच होतं.नेहमीचं नव्हतं.मलाच वाईट वाटलं.त्याला समजावलं.

“अरे आत्ता महिनाभरात ही खुर्ची सुटेल तुझी.चांगला हिंडायला फिरायला लागशील.”

मग आम्ही विषय बदलला ‌त्याच्या त्या जुन्या खुर्चीची आठवण झाली.बापुनं ती अजुन जपुन ठेवली होती.बापाची आठवण म्हणुन.पोराला सांगुन त्यानं ती खुर्ची आतल्या खोलीतून मागवली.गंजली होती..पण बाकी तशीच होती.निळ्या रंगाची..पांढर्या पाईपची.थोडा रंग उडाला होता इतकंच.

मी उठून ती खुर्ची उघडली.करकर आवाज करत ती उघडली.त्यात बसलो.अगदी बापुच्याच थाटात.

“तुला सांगतो कांता..मला अजुनही वाटतं कधी कधी..माझं ते स्वप्न पुर्ण होणार आहे.चाकाच्या खुर्चीचं..गोल गोल फिरणार्या   खुर्चीचं.”

बापुचं ते वाक्य ऐकुन मला बरं वाटलं.पुन्हा जुना बापु दिसला मला.त्याचं ते अधुरं स्वप्न त्याच्या मनातुन गेलं नव्हतं.अशी स्वप्न पहाण्याची क्षमता असणारी माणसं एका अर्थानं मला ग्रेट वाटतात.खरंच..बापु बदलला नव्हता.बापुचं  ‘बापुपण’ हे त्याच्या ह्या स्वप्नाळू व्रुत्तीमध्ये होतं.

_____________________

बापुंचं पाठवलेलं निमंत्रण माझ्यासमोर पडलं होतं.बापुच्या मुलानं दुकान टाकलं होतं.आणि त्यांचं हे निमंत्रण होतं.

संध्याकाळी मी गेलो.बापुच्या त्या जुन्या घराशेजारीच एक नवीन बिल्डिंग झाली होती.तेथेच एका गाळ्यात बापुच्या मुलानं दुकान सुरू केलं होतं.ते एक जनरल स्टोअर होतं.छान नवीन फर्निचर.. फुलांच्या माळा…बाहेर मंडप टाकला होता.बोर्डवर लाईटस्  माळा होत्या.मुलगा आत काउंटरवर होता.

आणि कडक पांढर्या  सफारीतला बापु इकडुन तिकडे फिरत होता.कोण कोण येतंय.. कुणाला डिश मिळतेय की नाही यावर लक्ष देऊन होता.

मला बघताच बापु धावत आला माझा हात हातात घेतला.आणि मला घेऊन आत गेला.दुकानच्याच एका भागात एक छोटं केबीन बनवलं होतं.एक टेबल.. आणि एक खुर्ची ‌तीच..बापुला हवी होती तशीच.बापु टेबलच्या मागे गेला.. आणि त्या खुर्चीत बसला.अतीव आनंदाने त्याने एक गोल गिरकी मारली.

“बघ..झालं की नाही माझं स्वप्न पुर्ण? मग? माझ्या पोरांनं खास माझ्यासाठी ही केबीन आणि खुर्ची बनवुन घेतलीय”

बापुला त्या खुर्चीत बसलेलं बघताना मला खुप आनंद झाला.. खुप बरं वाटलं.जसं काही माझंच स्वप्न पुर्ण झालं होतं.

बोलत बोलत आम्ही बाहेर आलो.प्रसाद घेतला,डिश घेतली.

शेजारीच त्यांचं ते जुनं घर होतं.अजुनही तसंच..पत्र्याचं.

दार नुसतंच लोटलेलं होतं.बापु आत गेला.आणि दोन खुर्च्या घेऊन बाहेर आला.मी एका खुर्चीत बसलो.बापु त्याच्या खुर्चीत बसला.तीच खुर्ची.. लहानपणापासून बघत आलो ती‌.पाठीमागच्या निळ्या पत्र्यावर बापुनं करकटने त्यांचं नाव कोरलेले.. शाळेत असतानाचं.त्यावरुन त्यानं बापाचा मारही खाल्लेला.

आता ती चेपली होती.जराशी डुगडुगत पण होती‌.बापु त्या खुर्चीत बसला होता.. तस्साच..एक पाय खाली सोडलेला.. दुसरा त्यावर आडवा..हलत रहाणारा.आणि चेहर्यावरचे भाव जग जिंकल्याचा.खर्याखुर्या 

बादशहा सारखा..

.. आणि मग आमच्या गप्पा रंगतच गेल्या.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्मिता मांजरे-कोल्हे – लेखिका : डॉ. रमा दत्तात्रय गर्गे ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ स्मिता मांजरे – कोल्हे – लेखिका : डॉ. रमा दत्तात्रय गर्गे ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर

स्मिता मांजरे नावाची एक मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंबातील मुलगी. बारावी झाल्यावर तिला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते. पण घर थोडे जुन्या वळणाचे, काय करायचे मुलीला इतके शिकवून, असा विचार करून जवळच्याच कॉलेजमध्ये तिला बीए साठी प्रवेश घेऊन दिला. या युवतीला थोडे वाईट वाटले, पण आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचे आणि पुढे जायचे हा तिचा मूळ स्वभाव!! बीए करतांना भरपूर वेळ मिळायला लागला . अभ्यास थोडासा असायचा, त्यातून मग खेळाची आवड निर्माण झाली. सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. अभाविप, छात्र युवा संघर्षवाहिनी यांचे आंदोलने कार्यक्रमा यात ती सहभागी होऊ लागली.पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर काहीतरी व्यवसायाभिमुख शिक्षण घेतले पाहिजे असे तिच्या मनात आले. त्यानुसार एलएलबी ला प्रवेश घेतला. पण मनातली वैद्यकीय शिक्षणाची इच्छा परत जागृत झाली आणि मग दहावीच्या गुणपत्रिकेवर तिने डीएचएमएस या होमिओपॅथीच्या पदविकेसाठी पण प्रवेश घेतला! कालानुक्रमे दोन्ही शिक्षणे पूर्ण केली आणि वकिली आणि डॉक्टरी अशा दोन्ही व्यवसायाभिमुख पदव्या स्मिताताईंनी मिळवल्या. त्यानंतर आवडीप्रमाणे नागपुरात स्वतःचा दवाखाना टाकला. तो चांगलाच चालू लागला.डॉ. स्मिताच्या हाताला चांगला गुण होता. भरपूर पेशंट येत असत. त्या आणि त्यांची असिस्टंट दवाखाना संपल्यावर सगळे पैसे मोजत बसायच्या. स्वतःचा दवाखाना झाला, दुचाकी आली आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळाले.यामुळे डॉक्टर स्मिता मांजरे यांना एक वेगळाच आत्मविश्वास मिळाला.

यादरम्यान घरात लग्नाचे वारे वाहू लागले. त्या काळात म्हणजे १९८० च्या दशकात चहा पोहे आणि मुलगी पाहणे असे कार्यक्रम सर्रास होत असत. पण स्मिता ताईंनी एक-दोन कार्यक्रम झाल्यानंतर हे दाखवून घेणे काही बरे नाही, असे वाटून त्यांनी ते थांबवले. 

या दिवसांत त्यांच्या हातामध्ये विनोबा भावे यांचे ‘गीता प्रवचने’ हे पुस्तक पडले.जसजशा स्मिताताई हे पुस्तक वाचत होत्या तसतसे त्या अंतर्मुख होत गेल्या. त्यामध्ये सांगितलेली ‘जीविका आणि उपजीविका’ यांचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. ‘माझा स्वधर्म काय आहे’या विचाराने त्यांना भंडावून सोडले. अंगावर ल्यायला उत्तम कपडे, दाग दागिने, फिरण्यासाठी गाडी , चांगली कमाई हे सगळं असूनही काहीतरी अनुपस्थित आहे , असे व्याकुळ असमाधान या युवतीला जाणवू लागले.

त्याच भागात एक ध्येयवेडा तरुण डॉक्टर एम डी पूर्ण करत होता. एमबीबीएस झाल्यावर तो बैरागड या मेळघाट जिल्ह्यातील गावी जाऊन राहिलेला होता.त्याच लोकांसाठी अधिक शिक्षण घेऊ या हेतूने तो पदव्युत्तर शिक्षण घेत होता. या डॉक्टरचे नाव होते रवींद्र कोल्हे !! बैरागड येथील आदिवासी जनजाती लोकांना आरोग्य सेवा द्यायची हे ध्येय ठरवून बसलेला हा तरुण सुयोग्य जीवनसाथीच्या शोधात होता. यादरम्यान स्मिताताईंचे परिचित सुभाष काळे यांनी ताईंना हे स्थळ सुचवले. पण त्याचबरोबर मुलाच्या वेगळ्या चार अटी सांगितल्या.या अटी काय होत्या 

१) महिन्याला चारशे रुपयांमध्ये संसार करावा लागेल

२) चाळीस किलोमीटर पायी चालता आले पाहिजे 

३) लोकांसाठी समाजासाठी भिक्षा मागण्याची तयारी असली पाहिजे 

४) कोर्ट मॅरेज करावे लागेल.

सुभाष काळेंनी सहजच सुचवले होते. कारण त्यावेळची स्मिताताईंची राहणी ही उच्चभ्रू प्रकारातील होती. जेव्हा या अटी कळाल्या तेव्हा आपण चारशे रुपयांची साडी नेसत होतो, गाडीवरून नागपुरात आरामात फिरत होतो आणि आपली कमाई पण भरभक्कम होती असे स्मिताताई एका मुलाखतीत सांगतात.

मात्र जसजसा त्या या अटींचा विचार करू लागल्या तसतसे त्यांना गीता प्रवचने वाचल्यापासून ज्या असमाधानाने अस्वस्थ केले होते ते असमाधान दूर होऊ लागले असा प्रत्यय आला. त्यांना या अटींमध्येच आपला स्वधर्म आहे, आपले जीवन ध्येय आहे याची आंतरिक जाणीव झाली.आणि मग दोघे भेटले १९८८ साली या ध्येयवेड्यांनी विवाह बंधन स्वीकारले.डॉ.स्मिता मांजरे डॉक्टर स्मिता रवींद्र कोल्हे म्हणून सातपुडा पर्वतरांगातील अरण्यात असलेल्या बैरागडला आली.लग्न कोर्ट पद्धतीने झाल्यामुळे सप्तपदी झाली नाही .मात्र नवऱ्याच्या घरी जाण्यासाठी नव्या नवरीला तालुक्याच्या ठिकाणापासून बैरागड पर्यंत ३५ किलोमीटर चालत जावे लागले.लग्न ठरल्यानंतर स्मिताताईंनी दवाखाना बंद केला. आपले साठवलेले सगळे पैसे त्यांनी बँकेत एकरकमी डिपॉझिट करून ठेवले. स्वस्तातल्या साड्या खरेदी केल्या. महाग महाग साड्या मैत्रिणी आणि बहिणींना दिल्या. उंची सॅंडल्स, पर्सेस, प्रसाधने सारे काही वाटून टाकले आणि खऱ्या अर्थाने नवजीवनचा प्रारंभ केला !

डॉक्टर रवींद्र कोल्हे पूर्वीपासूनच तेथे आरोग्य केंद्र चालवत होते. ते एक रुपया इतकीच फी दवाखान्यात घेत असत. औषधांसाठी शहरातील धनिक लोकांना विनंती करून आदिवासी लोकांना जमतील तितकी औषधेही ते उपलब्ध करून देत. स्मिता ताईंनी जेव्हा बैरागड मध्ये पाऊल टाकले तेव्हा त्यांची स्वतःची झोपडी देखील नव्हती. आजूबाजूच्या जनजाती लोकांनी लाकडे कुडे आणि गवताने साकारलेली झोपडी तयार करण्यासाठी त्यांना मदत केली. सतत शहरी वातावरणात राहिलेल्या स्मिताताईंचा एक वेगळाच प्रवास सुरू झाला. वीज नाही, नळ नाही, पिठाची गिरणी नाही, जवळपास दुकाने नाहीत असा नन्नाचा पाढा सगळीकडे दिसत होता. त्यातच आजूबाजूला दारिद्र्याने गांजलेली आजाराने ग्रस्त आणि अज्ञानी अशी आदिवासी जनजाती कुटूंबे. त्यांची भाषा वेगळी चालीरीती वेगळ्या.किर्र अरण्याचा एक वेगळाच गंध, शहरी सुरक्षिततेची उब नाही अशा सगळ्या गोष्टी त्यांना नव्याने जाणवू लागल्या. पण एकदा मनापासून कार्य स्वीकारले की समस्या भेडसावत नाहीत .थोड्याच दिवसात विहिरीवरून पाणी भरणे, शेण गोळा करून आणणे, घर सारवणे, जात्यावर दळणे ही सगळी कामे त्यांच्या अंगवळणी पडली. नवीन शिकण्याची आवड त्यांना येथे कामाला आली. 

एका मोठ्या लोक वस्तीला एकच डॉक्टर असल्याने कोल्हेना अक्षरशः श्वास घ्यायला फुरसत नसे. खरं म्हणजे स्मिताताईंना पण आपण आरोग्यसेवा द्यावी, पेशंट तपासावे असे वाटत असे. पण सुरुवातीला आदिवासी लोकांचा एक स्त्री डॉक्टर असू शकते यावर विश्वासच नव्हता. त्यांना तेथील लोक कोल्लं आणि कोल्लाणी म्हणत .

एक  घटना घडली आणि लोकांनी कोल्लाणीला वैद्यकीय ज्ञान आहे हे स्वीकारले!!.वाघाने अक्षरशः फाडलेला एक पेशंट आला आणि त्यावेळी  स्मिताताईंना जवळपास ४०० टाके घालावे लागले.अत्यंत चिकाटीने त्यांनी ते काम पूर्ण केले आणि तो पेशंट  वाचला!! काही दिवसांत बरा झाला.नंतर तो चालत दवाखान्यात आला आणि डॉक्टर बाईंना नमस्कार करून गेला!. तेव्हापासून आदिवासी जनजाती लोकांनी ताईंना डॉक्टर म्हणून सहर्ष स्वीकारले!!मग मात्र तपासायला ताईच हव्या अशी आग्रही मागणी पण सुरू झाली!!

मेळघाटात कुपोषणाचे बळी जात असतात. आत्ताही जातात. पण आता प्रमाण कमी आहे. त्यावेळी रवींद्र कोल्हेंनी एमडीला हाच विषय घेऊन प्रबंध लिहिला. त्यांच्या मते हा प्रकार उपासमारीमुळे अर्थात अन्न कमी पडल्यामुळे, पोटाची खळगी न भरल्यामुळे घडतो.त्यांनी नंतर अशाच प्रकारच्या मृत्यूची बातमी एका वृत्तपत्राच्या बातमीदाराला दिली. छोट्या चौकटीतील त्या बातमीने दिल्ली मुंबई हादरली. कारण आपल्या संविधानानुसार ”स्टारव्हेशन कोड” म्हणजे ‘भूकबळी’ हा शासनाचा गुन्हा मानला जातो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत हा विषय गाजला.दिल्ली मुंबईत सूत्रे हलली. घाईघाईने सारे मंत्री, सरकारी अधिकारी मेळघाटामध्ये येऊन पोहोचले.त्यांनी चर्चा केली. स्मिताताई आणि रवींद्र कोल्हे यांनी तेथील भीषण अन्नटंचाई आणि त्यामुळे घडणारे बालमृत्यू मातामृत्यू यांची माहिती दिली.मात्र या मृत्यूना ‘उपासमारीचे बळी’ असे न म्हणता ‘कुपोषणाचे बळी’ असे म्हणावे अशी शासकीय यंत्रणेने विनंती केली. सर्व प्रकारची मदत शासकीय यंत्रणा करणार आहे या गोष्टीमुळे स्मिताताई आणि रवींद्र कोल्हे यांनी देखील तसे म्हणण्याचे मान्य केले आणि मग एकेकाळी १००० मागे २००मुले दगावत ते प्रमाण खूप कमी होत गेले . शासनाच्या मोठ्या यंत्रणेचा अशिक्षित गरीब लोकांना लाभ मिळवून देणे हे आपले ध्येय आहे.शासनाला समांतर कार्य यंत्रणा उभी करणे हे नव्हे , हे दोघही पती-पत्नींनी ठरवलेले होते.

आपल्या सोबतच्या या रान सवंगड्यांना प्रेरणा मिळावी , अन्नटंचाईला तोंड द्यावे लागू नये म्हणून स्मिता आणि रवींद्र यांनी सुधारित शेतीचे प्रयोग केले. स्वतः दुबार पिके काढून दाखवली. खते बियाणांची माहिती दिली  रेशन धान्याचे दुकान टाकले. कोल्हेंच्या दुकानांमध्ये तीस तारखेपर्यंत धान्य मिळत असे. आजही हे दुकान दिमाखात चालू आहे 

आपले कार्य , त्याच्या मागची प्रेरणा ही पुढच्या पिढीत रुजवण्यातही स्मिताताई आई म्हणून यशस्वी ठरल्या! त्यांचा मोठा मुलगा रोहित सुधारित शेती करतो.त्याचे प्रशिक्षण देतो. तर धाकटा मुलगा राम एमबीबीएस एमडी सर्जन होऊन मेळघाट  बैरागड येथेच वैद्यकीय सेवाकार्य करतो. खास वैदर्भीय शैलीतील आघळपघळ बोलणे, पण आवश्यक तिथे ठामपणे उभे राहणे आणि निर्भयता हे दोन महत्त्वाचे गुण स्मिताताईंच्या अंगी आहेत. नामदार नितीन गडकरी हे त्यांचे एकेकाळचे अभाविप मधले सहकारी कार्यकर्ते! त्यांच्या प्रयत्नांमुळे आज मोठ्या नाल्यांवर मोठमोठे पूल झाले आहेत, बरेच ठिकाणी रस्ते देखील आले आहेत. पण म्हणून प्रश्न सुटलेले नाहीत.

नागपुरातील मध्यमवर्गीय घरातील ही कन्या आता आदिवासी बंधू भगिनींची आई झाली आहे. एखादे व्रत घेणे सोपे पण  सातत्यपूर्ण आचरण अत्यंत कठीण असते. म्हणूनच पद्मश्री डॉक्टर स्मिता कोल्हे आणि पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे यांच्यासारख्या तेजस्वी दीपांचे महत्व असते.

लेखिका : डॉ रमा दत्तात्रय गर्गे

प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आनंद लांबणीवर टाकणारी माणसं… लेखक :श्री एकनाथ वाघ ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आनंद लांबणीवर टाकणारी माणसं… लेखक :श्री एकनाथ वाघ ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

बेल वाजली म्हणून दरवाजा उघडला.

दारात शिवराम.

शिवराम आमच्या सोसायटीतल्या लोकांच्या गाड्या-बाईक्स धुवायचं काम करतो.

‘साहेब, जरा काम होतं.’

‘पगार द्यायचा राहिलाय का माझ्याकडून ?’

‘नाय साहेब, तो केवाच भेटला. पेढे द्यायचे होते. पोरगा धाव्वी झाला.’

‘अरे व्वा ! या. आत या.’

आमच्या दाराचा उंबरठा शिवराम प्रथमच ओलांडत होता.

मी शिवरामला बसायला सांगितलं. तो आधी ‘नको नको’ म्हणाला. आग्रह केला, तेव्हा बसला. पण अवघडून.

मीही त्याच्या समोर बसताच त्याने माझ्या हातात पेढ्यांची पुडी ठेवली.

 

‘किती मार्क मिळाले मुलाला ?’

‘बासट टक्के.’

‘अरे वा !’ त्याला बरं वाटावं म्हणून मी म्हटलं.

हल्ली ऐंशी-नव्वद टक्के ऐकायची इतकी सवय झाल्ये की तेवढे मार्क न मिळालेला माणूस नापास झाल्यासारखाच वाटतो. पण शिवराम खूश दिसत होता.

 

‘साहेब, मी जाम खूश आहे. माझ्या अख्ख्या खानदानात इतका शिकलेला पहिला माणूस म्हणजे माझा पोरगा !’

‘अच्छा, म्हणून पेढे वगैरे !’

शिवरामला माझं बोलणं कदाचित आवडलं नसावं. तो हलकेच हसला आणि म्हणाला,

‘साहेब, परवडलं असतं ना, तर दरवर्षी वाटले असते पेढे. साहेब, माझा मुलगा फार हुशार नाही, ते माहित्ये मला. पन एकही वर्ष नापास न होता दर वर्षी त्याचे दोन दोन, तीन तीन टक्के वाढले – यात खुशी नाय का ? साहेब, माझा पोरगा आहे म्हणून नाही सांगत, पन तो जाम खराब कंडीशनमधे अभ्यास करायचा. तुमचं काय ते – शांत वातावरन ! – आमच्यासाठी ही चैन आहे साहेब ! तो सादा पास झाला असता ना, तरी मी पेढे वाटले असते.’

 

मी गप्प बसल्याचं पाहून शिवराम म्हणाला, ‘साहेब सॉरी हां, काय चुकीचं बोललो असेन तर.

माझ्या बापाची शिकवन. म्हनायचा,

‘आनंद एकट्याने खाऊ

नको सगल्य्यांना वाट !’

हे नुसते पेढे नाय साहेब

हा माझा आनंद आहे !’

 

मला भरून आलं. मी आतल्या खोलीत गेलो. एका नक्षीदार पाकिटात बक्षिसाची रक्कम भरली.

आतून मोठ्यांदा विचारलं, ‘शिवराम, मुलाचं नाव काय ?’

‘विशाल.’ बाहेरून आवाज आला.

मी पाकिटावर लिहिलं – ‘प्रिय विशाल, हार्दिक अभिनंदन ! नेहमी आनंदात राहा – तुझ्या बाबांसारखा !’

‘शिवराम हे घ्या.’

‘साहेब हे कशाला ? तुम्ही माझ्याशी दोन मिन्टं बोल्लात, यात आलं सगलं.’

‘हे विशालसाठी आहे ! त्याला त्याच्या आवडीची पुस्तकं घेऊ देत यातून.’

शिवराम काहीच न बोलता पाकिटाकडे बघत राहिला.

‘चहा वगैरे घेणार का ?’

‘नको साहेब, आणखी लाजवू नका. फक्त या पाकिटावर काय लिहिलंय ते जरा सांगाल ? मला वाचता येत नाही. म्हनून…’

‘घरी जा आणि पाकीट विशालकडे द्या. तो वाचून दाखवेल तुम्हाला !’ मी हसत म्हटलं.

माझे आभार मानत शिवराम निघून गेला खरा, पण त्याचा आनंदी चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता.

खूप दिवसांनी एका आनंदी आणि समाधानी माणसाला भेटलो होतो.

हल्ली अशी माणसं दुर्मिळ झाली आहेत. कोणाशी जरा बोलायला जा, तक्रारींचा पाढा सुरु झालाच म्हणून समजा.

नव्वद, पंच्याण्णव टक्के मिळवूनसुद्धा लांब चेहरे करून बसलेले मुलांचे पालक आठवले.

आपल्या मुलाला / मुलीला हव्या त्या कॉलेजात प्रवेश मिळेपर्यंत त्यांनी आपला आनंद लांबणीवर टाकलाय, म्हणे.

 

आपण त्यांना नको हसूया. कारण आपण सगळेच असे झालोय- आनंद ‘लांबणीवर’ टाकणारे !

माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, स्पर्धेत टिकाव कसा लागेल, आज पाऊस पडतोय, माझा मूड नाही !’ – आनंद ‘लांबणीवर’ टाकायच्या या सगळ्या सबबी आहेत आहेत हे आधी मान्य करू या.

काही गोष्टी करून आपल्यालाच आनंद मिळणार आहे – पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय ! Isn’t it strange ?

 

मोगऱ्याच्या फुलांचा गंध घ्यायला कितीसा वेळ लागतो ?

सूर्योदय-सूर्यास्त पाहायला किती पैसे पडतात ?

आंघोळ करताना गाणं म्हणताय, कोण मरायला येणारे तुमच्याशी स्पर्धा करायला ?

पाऊस पडतोय ? सोप्पं आहे. मस्त चिंब भिजायला जा !

अगदी काहीही न करता गादीत लोळत राहायला तुम्हाला ‘मूड’ लागतो ?

माणूस जन्म घेतो, त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात.

खरं तर एका हाताच्या बंद मुठीत ‘आनंद’ आणि दुस-या हाताच्या बंद मुठीत ‘समाधान’ सामावलेलं असतं.

माणूस मोठा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबर ‘आनंद’ आणि ‘समाधान’ कुठे कुठे सांडत जातं.

आता ‘आनंदी’ होण्यासाठी ‘कोणावर’ तरी, ‘कशावर’ तरी अवलंबून राहावं लागतं.

कुणाच्या येण्यावर-कुणाच्या जाण्यावर. कुणाच्या असण्यावर-कुणाच्या नसण्यावर.

काहीतरी मिळाल्यावर-कोणीतरी गमावल्यावर. कुणाच्या बोलण्यावर- कुणाच्या न बोलण्यावर.

खरं तर, ‘आत’ आनंदाचा न आटणारा झरा वाहतोय. कधीही त्यात उडी मारावी आणि मस्त डुंबावं.

इतकं असून… आपण सगळे त्या झऱ्याच्या काठावर उभे आहोत – पाण्याच्या टँकरची वाट बघत !

जोवर हे वाट बघणं आहे तोवर ही तहान भागणं अशक्य !

इतरांशी तुलना करत आणखीपैसे, आणखी कपडे, आणखी मोठं घर, आणखी वरची ‘पोजिशन’, आणखी टक्के…!

या ‘आणखी’ च्या मागे धावता धावता त्या आनंदाच्या झऱ्यापासून किती लांब आलो आपण !

लेखक – श्री एकनाथ वाघ

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हिंदुस्थानवालो, अब तो मुझे पहचानो ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

☆ हिंदुस्थानवालो, अब तो मुझे पहचानो ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

हिंदुस्तानवालों! अब तो मुझे पहचानो!

८१ वर्षांनंतरही हे शब्द अगदी समर्पक आहेत, असे म्हणावे लागेल. १९४३ ते २०२४ हा सुमारे ८१ वर्षांचा कालखंड. या सर्व वर्षांतला एकही दिवस असा नसेल की एक आवाज कुठे ऐकला गेला नसावा. मास्टर विनायक (अर्थात विनायक दामोदर कर्नाटकी. मागील काळातील प्रसिद्ध अभिनेत्री नंदा यांचे वडील) यांनी एक चित्रपट काढण्याचा प्रयत्न केला होता ‘गजाभाऊ’. चित्रपट जरी मराठी भाषेत काढला जात असला तरी यातलं एक गाणं हिंदीत होतं…कवी होते पंडित नरेंद्र इंद्रा. आणि गाणं होतं या लेखाचं शीर्षक. दुर्दैवाने हा चित्रपट आणि गाणं कुठंही उपलब्ध नाही. या चित्रपटात लता दीनानाथ मंगेशकर ही चौदा पंधरा वर्षांची मुलगी निव्वळ आई,भावंडांचा उदरनिर्वाह होण्यास दोन पैसे मिळावेत म्हणून अभिनय करीत होती. त्याकाळी पार्श्वगायन फारसे प्रचलित झालेले नव्हते. कलाकार आपापली गाणी स्वत:च गात (खरे तर म्हणत!) असत. यासाठी अभिनयासोबत गाणंही येणं आवश्यक असे. आणि हा योग काही फारसा जुळून येत नसे. लतादीदींना आवडत नसतानाही अभिनय शिकावा लागला होता आणि गाणं आवडत असूनही तोपर्यंत तशी संधी मिळत नव्हती. त्यामुळेच लतादीदींनी हे गाणं अगदी पोटातून, अतिशय समरसून गायले असावे, यात शंका नाही.

लता दीनानाथ मंगेशकर नावाच्या एक अलौकिक व्यक्तिमत्वाचा १९४३ पासून सुरू झालेला जीवनप्रवास सुमारे आठ दशके सुरू राहिला. दीदींचा हा प्रवास म्हणजे एक इतिहासच म्हणाव. दुर्दैवाचे सर्व अवतार जवळून पाहिलेल्या या शूर स्त्रीने आपल्या उपजत गानकलेने गायन क्षेत्रातील सम्राज्ञीपदाला गवसणी घातली हाही इतिहासच.

गायन,अभिनयासोबतच ज्योतिषाचा उत्तम अभ्यास असलेल्या मास्टर दीनानाथांनी आपल्या या लेकीच्या गळ्यात जसा गायनाचा उज्ज्वल भविष्यकाळ पाहिला होता तसा तिच्या ललाटावरील कर्माचा लेखही वाचला होता. त्यांनी दीदींना त्यावेळी असे सांगितल्याचं वाचनात येतं की, “लता, तु फार मोठी गायिका होशील. तुझे हे यश पहायला मी या जगात नसेन. आणि तुझे लग्न होणार नाही!” पहिल्या दोन भविष्यवाणींप्रमाणेच तिसरीही भविष्यवाणी अप्रिय असली तरी खरी ठरली याला दैव असं नाव आहे! कदाचित दैवाला दीदींना त्यांच्या त्यावेळी खूप संकटात असलेल्या कुटुंबासाठी आणि कोट्यवधी कानांना तृप्त करण्याची अपार शक्ती असलेल्या गायनकलेसाठी अधिक वेळ द्यायचा असावा! तसंच तर झालं किंबहुना तसंच केलं दीदींनी…हा इतिहास आहे!

आयुष्यात खूप नंतरच्या काळात त्यांनी असं म्हटलं होतं…पुन्हा जन्म नाहीच मिळाला तर बरेच आहे…पण पुनर्जन्म मिळालाच तर तो लता मंगेशकर म्हणून नको! लता मंगेशकर बनना आसान नहीं!

अगदी कोवळ्या वयातच आपल्या आईची आणि चार भावंडाची आई होण्याची जबाबदारी स्वत:हून पत्करणं आणि ती अखेरपर्यंत निभावून नेणं हे जावे त्याच्या वंशा तेंव्हाच कळू शकेल! सामाजिक व्यवहारातला त्यांचा करारी बाणा त्यांनी भोगलेल्या परिस्थितीतून आला असावा असं समजण्यास पूर्ण वाव आहे. ‘बहोत लोगों ने मेरे पैसे खाये!” असं एका मुलाखतीत दीदींना हसत सांगितलं आहे. आणि या बुडव्यांची नावे न उघड करण्याचा दिलदारपणाही त्यांनी दाखवला!

गाण्याचं ध्वनिमुद्रण करायला कक्षात जाताना आपली पादत्राणे त्या बाहेरच काढीत असत हे सर्वांनी पाहिलं आहे. कला ही देवता आणि कलाकार भक्त हा विचार त्यामागे होताच शिवाय ज्यामुळे पोटाला दोन घास मिळतात त्या कलेप्रती आदर व्यक्त करण्याची त्यांची ती पद्धत होती. सार्वजनिक जीवनात एका प्रसिद्ध स्त्रीने,त्यातून अविवाहीत स्त्रीने कसे वागावे याचा वस्तुपाठ म्हणजे दीदी. व्यवसायानिमित्त पुरूषांच्या गराड्यात राहणे अपरिहार्य असताना त्यातील प्रत्येकला दीदी म्हणावंसं वाटावं यासाठी सर्वोत्तम चारित्र्य आणि प्रचंड इच्छाशक्ती असावी लागते.

सामान्य माणूस म्हणूनच जन्माला आलेल्या व्यक्तीला त्याने असामान्यत्वाची पायरी गाठेपर्यंत अडचणी,समस्या,नैमित्तिक प्रलोभनं,मानवी स्वभावातील गुणदोष यांच्याशी संघर्ष करावा लागतोच. किंबहुना असामान्य होण्यापूर्वी माणूस सामान्यच असतो. या सर्वच अनुभवांतून तावून सुलाखून निघालेल्या दीदींनी स्वत:च्या वैय्यक्तिक आयुष्यात कुणालाही डोकावू दिले नाही. आणि यामुळे लोक काय आणि किती काय काय म्हणतील याची पर्वा केली नाही. जसा अंगभर पदर तसेच संपूर्ण आयुष्य नीटसपणे झाकून घेतलेले. एकतर गद्यात बोलणं अगदी नेमके आणि गाण्यासारखेच मधुर. शब्द अतिशय निगुतीने निवडलेले आणि उत्तरादाखल केलेल्या स्मितहास्यात माझे अबोलणेही विपरीत होत आहे अशी अवस्था अजिबातच नसे.

जगाच्या शब्दशस्त्राने क्लेश झाले नसतील असं नाही. पण जग होता वन्ही…संते आपण व्हावे पाणी हे त्यांनी माऊलींकडूनच शिकलेले असावे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात कुठेही आक्रस्ताळेपणा जाणवला नसावा. सत्य असत्यासी मन केले ग्वाही…नाही मानियेले बहुमता हे तुकोबारायांचे शब्दही त्या जगत राहिल्या. जगाला सातत्याने ऐंशी वर्षे तोंड देत राहणे हे सामान्य जीवाचे कामच नव्हे, हेच खरे! दीदींच्या मौनात सर्व मिटून गेले आणि आता तर त्याही अंतर्धान पावल्या आहेत.

हिंदी-इंग्लिश वृत्तपत्रे,हल्लीच्या दूरचित्रवाहिन्यांमध्ये प्रसिद्ध झालेल्या सर्वच ब-यावाईट बाबींकडे दीदींनी अतिशय प्रयत्नपूर्वक दुर्लक्ष केले. मराठी वृत्तपत्रे आणि दृकश्राव्य वाहिन्यांनी मात्र दीदींच्या बद्द्ल कधी वावगे लिहिले,बोलल्याचे आढळत नाही….याला दीदींचे असाधारण व्यक्तिमत्व कारणीभूत आहे! भगवदगीता ध्वनिमुद्रित करण्याआधी पहाटे लवकर शुचिर्भूत होऊन दोन तीन तास श्लोक बिनचूक म्हणण्याचा सराव करणा-या आणि मगच ध्वनिमुद्रणासाठी जाणा-या दीदी, अत्यंत पीडादायक शारीरिक व्याधी असतानाही संत मीराबाईंची भजने ध्वनिमुद्रित करण्यासाठी तासनतास उभे राहणा-या दीदी,परदेशात शेकडो कार्यक्रम करून भारताचे नाव जगभर पोहोचवणा-या दीदी, ऐ मेरे वतन के लोगों गाण्यातील भावना चिरंजीव करून ठेवणा-या दीदी, १९८३ चा क्रिकेट विश्वचषक जिंकून आलेल्या खेळाडूंना मानधन देण्यासाठी गाण्यांचा कार्यक्रम करणा-या दीदी…अशा शेकडो गोष्टी आहेत आणि सामान्यांना अज्ञात अशा अनेक गोष्टीही असतीलच.

स्वत: कुठला मानसन्मान मिळवण्याचा प्रयत्न न करणा-या लतादीदींनी आपल्या वडिलांच्या मास्टर दीनानाथांच्या स्मृती जतन करण्याचा मनोभावे आणि यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यांच्या हयातीतच त्यांच्याच नावाचा पुरस्कार दिला जाणं हे ही मोठेपणाचंच द्योतक. असो. लिहावं तेवढं कमीच आहे आणि आजवर अक्षरश: शेकडो लोकांनी दीदींबद्दल लिहिले आहे.

गेल्या काहीवर्षांत प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट काढले गेले. आणि त्यात वावगे काहीच नाही. यामुळे या मोठ्या लोकांच्या आयुष्यात लोकांना डोकावता येते. परंतू, जेंव्हा जेंव्हा लतादीदींच्या आयुष्यावरील चित्रपटाचा विषय निघाला तेंव्हा तेंव्हा दीदींनी स्पष्ट नकार दिला. तरीही काही लोकांनी त्यांच्या आयुष्याशी साधर्म्य असणा-या कथा लिहून त्यावर चित्रपट काढला. साज (साझ) नावाचा एक चित्रपट आला होता. त्यात शबाना आझमी प्रमुख भूमिकेत होत्या. मेरी आवाजही पहचान है नावाची एक दूरदर्शन मालिकाही येऊन गेली. लतादीदींच्या आयुष्यावर (अनाधिकाराने) भाष्य करणारे युट्यूब विडीओज विशेषत: हिंदीत अनेक दिसतात. पण मंगेशकर कुटुंबियांनी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत या गोष्टींना अजिबात महत्त्व दिले नाही.

दीदींच्या हयातीत त्यांना त्यांच्या बायोपिक (चरित्रचित्रपट) विषयी अनेकांनी विचारणा केलेली होती. पण त्यांनी स्पष्ट शब्दांत नकारच दिला होता. त्यांच्या मृत्यूनंतर तर याबाबत खूपच जोरात प्रयत्न झाले असतील. कारण लता मंगेशकर हा विषयच अत्यंत वेगळा आहे. पण एरव्ही काहीही माहित नसताना दीदींबद्दल विविध गोष्टी सांगत आणि पसरवत बसलेल्या व्यावसायिक लोकांकडून लता या विषयाला कितपत न्याय मिळाला असता हा ही प्रश्नच आहे.

एका खाजगी वृत्तवाहिनीने नुकत्याच घेतलेल्या एका मुलाखतीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनीही अशा चित्रपटास परवानगी देण्याचे स्वच्छ शब्दांत नाकारले आहे. दीदींच्या प्रतिमेला न्याय देऊ शकेल असं कुणी असावं असं त्यांना वाटत नाही. समाजानेही त्यांच्या या भूमिकेला न्याय दिला पाहिजे. पण लतादीदींचे आयुष्यही लोकांना समजणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी हृदयनाथ मंगेशकर यांच्यापेक्षा पात्र अन्य कुणी व्यक्ती नाही. आठ दशके हृदयनाथ आणि दीदी सातत्याने एकत्र राहिलेत. हृदयनाथ स्वत: दीदींबद्द्ल लिहित आहेत. इतर कोणत्याही लेखकापेक्षा त्यांचे लेखन जास्त विश्वसनीय आहे यात दुमत नसावं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आजवर त्यांनी प्रकृती अत्यंत नाजूक असतानाही साडे तीनशे पाने मजकूर लिहिला असून आणखी तितकीच पाने भरतील एवढ्या आठवणी,गोष्टी त्यांच्या स्मरणात आहेत. आणि हृदयनाथांची लेखनशैली सुद्धा अतिशय उच्चदर्जाची आहे. यापैकी आरंभीचे तीन लेख दैनिक सकाळच्या सप्तरंग पुरवणीत प्रसिद्ध झाले आहेत. कदाचित आणखीही होतील. बाळासाहेबांनी अर्थात हृदयनाथ मंगेशकर यांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे,या लेखांचे पुस्तक निघावे अशीच रसिकांची इच्छा आहे. कारण तेच हे काम योग्य पद्धतीने पूर्ण करू शकतील! कारण हिंदुस्थानवालों, अब तो मुझे पहचानो असे सुरूवातीलाच म्हणून गेलेल्या लता मंगेशकर नावाच्या भारतरत्न स्वरचमत्काराला अजून हिंदुस्तानाने नेमके ‘पहचानलेले’ आहे, असे म्हणता येत नाही. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या या मनोवांच्छित कार्यास शुभेच्छा!

(मनातले सर्वच लिहिता येते असे नाही. अनेक बाबी निसटून जातात लिहिता लिहिता. पण तरीही एक प्रयत्न. संभाजी बबन गायके.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आनंद…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “आनंद” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

दोघी बहिणी तीन दिवसांच्या ट्रीपला निघाल्या.

 पहिला दिवस मजेत …आता उद्या सकाळी नऊला निघायचे आहे .टूर लीडरने सांगितले.

दोघी रूमवर आल्या फ्रेश झाल्या

” उद्याचा ड्रेस काढून ठेवते ” धाकटी म्हणाली.

“थांब एक गंमत दाखवते…. उद्या आपण हे घालायचं आहे…”

“काय ग..”

“हे घे…” .. धाकटीने घडी उलगडली. आणि बघतच राहिली…

ते फ्रॉक सारखं होतं…. पण त्याचा घेर मोठा होता.

“नविन वेगळच दिसतय ..काय म्हणतात ग “

“अग दुकानदारानी काहीतरी नाव सांगितलं  बाई..पण मी गेले विसरून आपण पूर्वी फ्रॉक घालायचो त्याच्यासारखंच आहे ना हे…”

“हो ग किती छान आहे ग…”

 

धाकटीने लगेच घालून बघितला .. ती सुखावलीच..

“ताई किती मस्त आहे ग… आईच्या फ्रॉकचीच आठवण आली उंची जरा जास्त आहे आणि घेरही मोठा आहे एवढाच फरक पण किती कम्फर्टेबल आहे..”

त्याचा गुलाबी रंग एम्ब्रॉयडरी लेस… धाकटी हरखुनच गेली.

“अग ताई याला एक खिसा  हवा होता.अजून मज्जा आली असती”

“आवळे चिंचा ठेवायला?”

…. दोघी मनमुराद हसल्या….

 

“अगं दुकानात हे बघितलं आणि आईची आठवण आली.

ती कापड आणून  साधे फ्रॉक शिवायची दोघींचे एकसारखे. फॅशन काही नाही..

शाळेत अकरावीत साडी कंपल्सरी मग आजीने फ्रॉक घालूच दिला नाही

तेव्हा तिची ती मतं….”

“तू गप्प बसायचीस पण मला राग यायचा. किती बावळट होतो अस आता वाटतं”

“जाऊ दे ..आपलं ठरलं आहे ना…. मागचं काढून उगीच गळे काढून रडायचं नाही..आनंदानी पुढे चालायचं …. म्हणून दुकानात हे दिसलं आवडलं की घेतलं…. .. “समजूतदार शहाणी ताई धाकटीला सांगत होती…

 

दोघी सकाळी ते फ्रॉकसारखं घालून तयार झाल्या….. मैत्रिणी बघायलाच लागल्या..

“ए किती मस्त आहे ग….. कुठून घेतलं.?….. काय म्हणतात..?”

 

सगळ्यांना  तो प्रकार आवडला.

“ए मला पण आवडेल हे घालायला “

दुकानदाराला दाखवायला  तीनी फोटोही काढला..

 

फ्रॉकचा विषय निघाला आणि एकेकीचं मन उलगडायला लागलं……. 

 

“नहाण आलं आणि माझा तर फ्रॉक बंदच झाला.”

“माझ्या आईकडे फॅशन मेकर होतं ती वेगवेगळे डिझाईनचे फ्रॉक शिवायची..”

“माझी मावशी मुंबईला रहायची तिथुन नविन फॅशनचे आणायची”

“एकदा फ्रॉक ची उंची कमी झाली होती ….तर बाबा आईला खूप रागावले होते..”

“माझा लाल लेस वाला फ्रॉक मला फार आवडायचा..”

“मला कायम मोठ्या बहिणीचा जुना मिळायचा….”

….. प्रत्येकीकडे फ्रॉकची एक तरी आठवण होतीच..

खरंतर फ्रॉक एक निमित्त होतं आईची आठवण सुखावत होती…

 लहानपणी तिच्याभोवतीच तर सगळं जग होत….हो की नाही…

तुम्हाला आली का तुमच्या फ्रॉकची आठवण…..

 

मैत्रिणींनो आता आपली छान गट्टी जमली आहे ना….

मग एक सांगते ते ऐका..

 

जे घालावं असं वाटतंय ते खुशाल घाला….

कोण काय म्हणेल ?

कोणाला काय वाटेल…

याचा विचार करू नका .

कोणी इतकं तुमच्याकडे निरखून बघत नसतं….

कोणी आणून देईल याची पण वाट बघू नका..

तुम्हीच जा आणि घेऊन या..

….. आनंदाची परिस्थिती आपली आपणच निर्माण करायची असते हे लक्षात ठेवा…

“काय म्हणतेस तूच धाकटी आहेस

अगं मग ताई साठी तूच घेऊन ये…..”

मजेत आनंदात राहा…

तुमचा नवीन ड्रेस घालून काढलेला फोटो मला जरूर पाठवा

वाट बघते….

 

सुखाची गुरुकिल्ली आपल्याच हातात असते…

ती कशी कुठे लावायची हे समजले की आयुष्यच बदलते..

….. ती  किल्ली अजून कुठे कुठे लावता येईल याचाही विचार करा….

हेच तर  तुम्हाला सांगायचं होतं…… मैत्रिणींनो  मजेत राहा…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अविस्मरणीय दरबारा सिंग साहेब ! ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

? इंद्रधनुष्य ?

अविस्मरणीय दरबारा सिंग साहेब ! ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

१९७७-८० या काळात मी NDA मध्ये होतो. तेथे असलेल्या अनेक ड्रिल इंस्ट्रक्टर्सपैकी, आम्हाला विशेष प्रिय असलेले (तत्कालीन) सुभेदार दरबारा सिंग यांची आज प्रकर्षाने आठवण झाली.

कोणाही सेनाधिकाऱ्याला विचारून पहा. ट्रेनिंग अकादमीमधील अनुभव, आणि विशेषतः तेथील ‘ड्रिल उस्ताद’, यांना तो कधीच विसरू शकत नाही. कारण, गाळलेल्या घामाच्या एकेक थेंबागणिक कॅडेट्सची शारीरिक आणि मानसिक जडण-घडण होत असते. आणि ड्रिल उस्तादही त्या घडणीचा एक शिल्पकार असतो.  

ज्यांनी-ज्यांनी NDA ची ‘पासिंग आऊट’ परेड पाहिली आहे त्यांना त्या सोहळ्यामागच्या कष्टांची जाणीव नक्की झाली असेल. अक्षरशः तासंतास परेड ग्राऊंडवर पाय आपटत आम्ही सराव करायचो. आम्हा कॅडेटसची कवायत पाहून प्रेक्षक उत्स्फूर्तपणे टाळ्याही वाजवायचे. पण आमच्याहूनही अधिक मेहनत घेणारे आमचे उस्ताद मात्र पडद्याआडच राहत असत. 

संपूर्ण सरावादरम्यान, परेड करणाऱ्या कॅडेट्सच्या पुढून, मागून, आणि दोन्ही बाजूंनी ड्रिल उस्तादांना बारीक नजर ठेवावी लागे. कुणाची चूक झाल्यास ती तात्काळ दुरुस्त करावी लागे. कारण एखाद्याच्या चुकीमुळे संपूर्ण परेडची लय बिघडणे हे अक्षम्य असे. त्यामुळे, सगळे उस्ताद पायाला भिंगरी लावल्यागत संपूर्ण ग्राउंडभर सतत थिरकत असायचे. एखादा सराव मनाजोगता न झाल्यास संपूर्ण परेड पुन्हा पहिल्यापासून सुरु करावी लागे. अशा वेळी दमल्या-भागलेल्या कॅडेट्सना हुरूप देत, त्यांना पुन्हा एकदा सरावासाठी उभे करणे सोपे काम नसे. 

आम्हाला प्रोत्साहित करण्याची दरबारा सिंग साहेबांची शैली खास होती. “बस एक और रिहर्सल, आपके उस्ताद के नाम!” इतकेच  म्हणणे अनेकदा पुरेसे असे. पण तेवढे बोलून थांबतील तर ते दरबारा सिंग कसले! 

“भरतनाट्यम का एक ‘शो’ करने के बाद हेमा मालिनी भी वन्स मोअर नही करती, लेकिन मेरा कॅडेट जरूर करेगा!” असे त्यांनी म्हटले की आम्ही पोट धरून हसत पुन्हा परेडसाठी तयार असायचो! 

आमच्या चुका काढतानाही ते असेच काहीतरी विनोदी बोलायचे, “कॅडेट बापट, ढीला क्यों पड गया? खटमल खुजली कर रहा है क्या ?” असे म्हणून “लेफ्ट-राईट” च्या ऐवजी “खटमल-खुजली, खटमल-खुजली” असे म्हणत ते आमच्या बाजूने चालायचे. अशा वेळी हसू दाबत-दाबतच, पण नव्या जोमाने आम्ही टाचा आपटायचो. 

पुढे सुभेदार मेजर या हुद्द्यावर बढती मिळून, दरबारा सिंग साहेब NDA मध्ये बरीच वर्षे पोस्टिंगवर राहिले. आम्ही पास आऊट झाल्यानंतरच्या काळातला एक प्रसंग काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आला होता. 

पासिंग आऊट परेडचा सराव चालू होता. कॅडेट्स दमलेले होते. कदाचित NDA च्या सिनेमागृहातल्या ‘शो’ची वेळही होत आली असेल. मनाजोगती परेड न झाल्यामुळे आणखी एक सराव करायचा आदेश मिळाला होता. त्या जास्तीच्या सरावादरम्यान हजार-दीड हजार कॅडेट्सची आपसात कुजबूज आणि धुसफूस चाललेली होती. 

परेडच्या शेवटी, NDA चे ‘निशाण’, म्हणजेच राष्ट्रपतींनी प्रदान केलेला मानध्वज सन्मानपूर्वक घेऊन जाण्याची वेळ झाली. त्या कारवाईदरम्यानही कॅडेट्सची कुजबूज थांबलेली नव्हती.

एरवी सदैव हसतमुख असणाऱ्या दरबारा सिंग साहेबांना ‘निशाण’चा अवमान मात्र सहन झाला नाही. ताड-ताड चालत ते मंचावर जाऊन उभे राहिले. त्यांचा अवतार पाहून कॅडेट्सची कुजबुज काहीशी कमी झाली. 

महत्प्रयासाने राग आवरत दरबारा सिंग बोलू लागले. “कॅडेट्स, मी दोनच मिनिटात तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. आपल्या NDA मध्ये ‘Hut of Remembrance’ नावाची जी वास्तू आहे, त्यामध्ये गेल्या तीन वर्षात मी फक्त एकदाच गेलो आहे. त्या वास्तूमध्ये अखंड तेवत असलेल्या ज्योतीच्या आजूबाजूला जी नावे सुवर्णाक्षरात कोरलेली आहेत, ते सगळे तुमच्यासारखेच NDA कॅडेट होते. त्यामध्येच एक नाव आहे लेफ्टनंट योगराज पलटा, वीर चक्र.”

एक दीर्घ श्वास घेऊन दरबारा सिंग पुढे म्हणाले, “१९६२ साली चीन युद्धाच्या वेळी शीख रेजिमेंटची नववी बटालियन अरुणाचल प्रदेशमधील तवांग येथे तैनात होती. बटालियनच्या एका चौकीवर युद्धासाठी सज्ज असलेल्या तुकडीमध्ये मीदेखील होतो. साधारण माझ्याच वयाचे एक तरुण अधिकारी आमचे कमांडर होते. ते म्हणजे, हेच लेफ्टनंट योगराज पलटा. 

१५ नोव्हेंबर १९६२ रोजी आमच्या चौकीवर चिन्यांनी हल्ला चढवला. चिनी सैन्य आमच्यापेक्षा कैक पटींच्या संख्येने, आणि भरपूर शस्त्रे आणि दारुगोळ्यासह आले होते. पलटासाहेब आम्हाला प्रोत्साहित करत स्वतःदेखील गोळीबार करीत होते. ‘शेवटची गोळी, आणि रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक असेपर्यंत आपण लढायचं आहे’, हेच ते आम्हाला सतत सांगत होते.”

परेडमधल्या सगळ्याच कॅडेट्सना जाणवले की दरबारासिंग साहेबांचा आवाज आता जड झाला होता. 

भरल्या कंठानेच ते पुढे बोलत राहिले, “मी आणि लेफ्टनंट पलटासाहेब शेजारी-शेजारीच होतो. एका क्षणी मॉर्टरचा एक गोळा आला आणि थेट पलटा साहेबांच्या चेहऱ्यावर लागला. त्यांचे शीर धडापासून वेगळे झाले आणि त्यांचे निष्प्राण कलेवर माझ्या अंगावर पडले. क्षणार्धात माझी पगडी, दाढी,आणि छाती त्यांच्या रक्ताने चिंब झाली. 

माझ्या अंगावरून त्यांचा देह उचलण्याचाही अवधी मला मिळेस्तोवर चिनी सैनिक आमच्या चौकीमध्ये घुसले. एका मृतदेहाखाली रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला मीदेखील मेलेलोच आहे असे समजून, दिसेल त्या सैनिकाला भोसकत ते क्षणार्धात आमच्या अंगावरून पुढे गेले.” 

आता मात्र NDA च्या परेड ग्राउंडवर अक्षरशः स्मशानशांतता पसरलेली होती. महत्प्रयासाने अश्रू आवरत असलेल्या दरबारा सिंग साहेबांकडे सर्व कॅडेट अविश्वासाने पाहत होते. 

सद्गदित आवाजात दरबारा सिंग म्हणाले, “सर्वप्रथम जेंव्हा मी ‘Hut of Remembrance’ मध्ये पलटासाहेबांचे नाव वाचले तेंव्हा मी नखशिखांत थरारलो होतो. अचानक माझ्या आयुष्यातली २०-२५ वर्षे गळून गेली आणि माझ्या दाढीवर आणि छातीवर गरम रक्त वाहत असल्याचा भास मला झाला. त्यानंतर पुन्हा कधीच मी तिथे गेलो नाही. पण, पलटासाहेबांसारख्या अनेक NDA कॅडेट्सच्या सर्वोच्च बलिदानाचा सन्मान म्हणून, माननीय राष्ट्रपतींनी दिलेला हा ध्वज जेंव्हा-जेंव्हा परेडवर आणला किंवा नेला जातो तेंव्हा माझी छाती अभिमानाने भरून येते. माझा हात आपोआप सलामीसाठी उचलला जातो.”

“लक्षात ठेवा कॅडेट्स, त्या वीरांची आठवण आपल्याला करून देणारे हे ‘निशाण’ आहे. जे त्याला निव्वळ एक रंगीबेरंगी कापडाचा तुकडा समजतात त्यांच्यासारखे करंटे तेच !”

कसेबसे एवढेच बोलून, पुन्हा ताड-ताड चालत दरबारा सिंग साहेब परेडवरून निघून गेले. त्यापुढील कैक मिनिटे संपूर्ण परेड हतबुद्ध होऊन तिथेच उभी होती. 

अशा आमच्या अविस्मरणीय दरबारा सिंग साहेबांनी अगदी परवाच, म्हणजे ११ ऑक्टोबर २०२२ रोजी या इहलोकातून कूच केले! 

“सुभेदार मेजर व ऑनररी कॅप्टन दरबारा सिंग साहेब, आज १४ ऑक्टोबर २०२२ रोजी तुमच्या गावी, तुमच्यासाठी ‘अंतिम अरदास’ आयोजित केलेला आहे. तुम्हाला मानवंदना देण्यासाठी मी प्रत्यक्ष हजर राहू शकत नाही. म्हणून इथूनच तुमच्या कॅडेटचा तुम्हाला कडक सॅल्यूट!”

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “फसले गं बाई मी फसले…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“फसले गं बाई मी फसले…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

फसले गं बाई मी फसले… कायमची फसले…प्रेमविवाह का म्हणूनी केला… त्याच्या दिलेल्या शपथा, आणा भाका प्रीतीच्या अनुनायाच्या होत्या त्या सगळ्याच भुलथापा… कशी कळेना कुठल्या धुंदीत मी त्याला हो म्हणूनी बसले.. अन आता लग्नानंतर डोळे ते उघडले… होता तो आभास सारा  माझ्या मनी सत्यचं  भासला… पण वेळ गेल्यावर लक्षात आले… फसले गं बाई मी फसले… कायमची फसले… जानू तुला काय हवं ते मी दयायला तयार आहे… गाडी,बंगला, सोनं नाणं, नोकर चाकर, बॅंकेत बिग बॅलन्स.. सारं सारं काही तयार आहे…या खेरीज अजुन तुला काही हवं असेल तर हा चाकर आणायला एका पायावर उभा आहे.. अगदी आकाशीचा चंद्र, तारे हवे असल्यास ते सुद्धा मी तुझ्या ओंजळीत आणून टाकतो… पण पण.. आपण आता लग्न मात्र लवकरच करूया… माझ्या घरचे सारखे मला टोचत असतात  वश्या तुझ्या प्रितीचा मोहर तर कधीचा बहरलाय आता त्याला फळं कधी दिसणारं… आम्ही बाबा आता थकलोय बघ.. घरात आम्हाला निदान पाणी पिण्यास देणारी सुन लवकरच आण… या घराची घेउन टाकू दे सगळीच जबाबदारी एकदा म्हणजे आमच्या जिवाला स्वस्थता लाभेल आमच्या… असं त्याचं  त्यावेळी च्या भेटीत सारखं सारखं टुमणं असायचं… मग मीही मनांत म्हटलं.. नाहीतरी असं चोरुन चोरुन किती दिवस बाहेर भेटायचं.. कधीतरी त्याच्या अंतरंगात आणि आपल्या हक्काच्या घरात नि माणसात राजरोसपणे कधी राहयाचं.. विचार केला पक्का आणि माझ्या घरच्यांनीही त्यावर मारला होकाराचा शिक्का..एका क्षणात मी मिस ची मिसेस झाले आणी आणि..हवा भरलेले फुगे फुटत जावेत तसे नशिबाचे फुगे फुटू लागले… मी बरचं काही मिस केलेली मिसेस झालीयं असं लक्षात आलं… आणि याचा राग कधीतरी काढायचा असं मनाशी ठरवलं… होयं हो माझंही त्याच्यावर खरंखुरं प्रेम असल्यानं मलाही आता हे सारं निभावून नेणं भाग होतचं.. खऱ्या प्रेमाची किंमत मोजणं सुरू झालं होतं.. त्यालाही कळावी  प्रेमात लबाडी केलेली किंमत  काय असते ती… शाॅंपिग माॅलच्या भरमसाठ खरेदीसाठी त्याचा खिसा पाकिटाचा, एटीएम चा खुर्दा सुफडा साफच करून टाकण्यासाठी.. खरेदीची बाडं ची बाडं दिली त्याच्याकडे सांगितलं  हे तुला निट सांभाळून घरी न्यायचं बरे…तु त्यावेळी मला दिलेल्या भुलथापांची शिक्षेचा हा ट्रेलरचं दाखवला आहे बरं… आता इथून पुढे मेन पिक्चर सुरु होईल आपल्या संसारात आणि तो खरा खराच असेल… आपल्या प्रिती मधे आता खोट्याला कधीच थारा नसेल… पाहिलासं का तो आकाशीचा चंद्र कसा हसतोय गालफुगवून लबाड पाहतोय आपल्या कडे कसं बनवलं तुला म्हणून चिडवतोय मला… मला तो चंद्र देखील हवायं तू मारे त्यावेळी म्हणाला होतास तुझ्यासाठी हवा तर आणून देतो मग आता का मागे सरकतोस… अरे बोलना काहीतरी मगापासून मीच बोलतेय आणि तु ढिम्मच आहेस कि.. जानु माझ्यावर रागावलास..

.. नाही जानु तुझ्यावर आता रागावणार नाहीच मुळी… रागावलोय फक्त मी माझ्यावर.. त्यावेळी काहीही करून तुला लग्न करून घरी आणायची हाच उद्देश होता माझ्यापुढे.. म्हणून तुला बोलून दाखवत होते आभासाचे पाढे… त्यावेळी मी बोलत होतो नि तू ऐकत होतीस.. सारं काही मनात साठवतं होतीस.. भावी जीवनाचं चित्रं पाहात होतीस… अगदी मनासारखं घडेल हेच तुला वाटतं असे… नशिबाने लग्न लवकरच झाले नि आणि चित्र सारे फिरले…भ्रभाचा भोपळा तो फुटला… आणि मला दिले बारा मुलूख तोफेच्या तोडांला… काय करतो बिचारा केलेल्या चुकांची किंमतच आहे एव्हढी जबरी चुकवता चुकवता आयुष्य येई जेरी…बोलून सांगू कुणाला… कळा या लागल्या जीवा… आता तू बोलतेस… बोलत राहतेस आणि मी फक्त ऐकण्याचचं काम करतो…भारवाही हमालं बनलोय..दाबून मुक्याचा मार सोसतोय… त्यावेळी दिलेल्या खोट्या नाट्या शपथा, आणा भाकांची किंमत आता आयुष्यभर मोजत बसणार… त्याला माझी ना कधीच असणार नाही… पण पण जानू आता तो आकाशीचा चंद्र काही माझ्या कडे मागू नकोस.. झाल्या या खरेदीलाच माझा सुफडा साफ झाला… खिशात आता दिडकीही शिल्लक उरली नाही गं… थोडसं ठेवं शिल्लक पुढच्या खेपेला… आधीच खांदा नि हात भाराने गेलेत अवघडू दुखायला… नि डोकं लागलयं गरगरायला… माझं काही म्हणणं नाही  हा बंदा गुलाम आहेच सदैव तुझ्या सेवेला… आणि आणि तो  तसाच हवा असेल तर… घरी गेल्यावर   तुझ्या नाजूक हाताने बाम चोळून देशील माझ्या   डोक्याला… जमलं तरं पहाशील.. तसं माझं आता तुझ्याकडे काहीचं मागणं… म्हणणं नाही.. तसचं काही नाही…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – “नाही वहिनी. आम्ही आणि डॉक्टरांनी काहीच केलेले नाही. आम्ही फक्त निमित्त होतो. बाळ वाचलंच नाहीय फक्त तर ते ‘वर’ जाऊन परत आलंय.” लेले काका सांगत होते,”आत्ता पहाटे आम्ही इथे आलो ते मनावर दगड ठेवून पुढचं सगळं अभद्र निस्तरण्याच्या तयारीनेच आणि इथे येऊन पहातो तर हे आक्रित! दादा, तुम्हा दोघांच्या महाराजांवरील अतूट श्रद्धेमुळेच या चमत्कार घडलाय.बाळ परत आलंय.”

या आणि अशा अनेक अनुभवांचे मनावर उमटलेले अमिट ठसे बरोबर घेऊनच मी लहानाचा मोठा झालोय.सोबत ‘तो’ होताच…!)

पुढे तीन वर्षांनी बाबांची कुरुंदवाडहून किर्लोस्करवाडीला बदली झाली ते १९५९ साल होतं. कुरुंदवाड सोडण्यापूर्वी आई न् बाबा दोघेही नृसिंहवाडीला दर्शनासाठी गेले.आता नित्य दर्शनाला येणं यापुढे जमणार नाही याची रुखरुख दोघांच्याही मनात होतीच. आईने दर पौर्णिमेला  वाडीला दर्शनाला येण्याचा संकल्प मनोमन सोडून ‘माझ्या हातून सेवा घडू दे’ अशी प्रार्थना केली आणि प्रस्थान ठेवलं!

किर्लोस्करवाडीला पोस्टातल्या कामाचं ओझं कुरुंदवाडपेक्षाही कितीतरी पटीने जास्त होतं.पूर्वी घरोघरी फोन नसायचे.त्यामुळे ‘फोन’ व ‘तार’ सेवा पोस्टखात्यामार्फत २४ तास पुरवली जायची.त्यासाठी पोस्टलस्टाफला दैनंदिन कामांव्यतिरिक्त जादा

रात्रपाळीच्या ड्युटीजनाही जावे लागायचे. त्याचे किरकोळ कां असेनात पण जास्तीचे पैसे मिळायचे खरे, पण ती बिले पास होऊन पैसे हातात पडायला मधे तीन-चार महिने तरी जायचेच. इथे येऊन बाबा अशा प्रचंड कामाच्या दुष्टचक्रात अडकून पडले.त्यांना शांतपणे वेळेवर दोन घास खाण्याइतकीही उसंत नसायची. दर पौर्णिमेला नृसिंहवाडीला दत्तदर्शनासाठी जायचा आईचा नेम प्रत्येकवेळी तिची कसोटी बघत सुरू राहिला होता एवढंच काय ते समाधान. पण तरीही मनोमन जुळलेलं अनुसंधान अशा व्यस्ततेतही बाबांनी त्यांच्यापध्दतीने मनापासून जपलं होतं. किर्लोस्करवाडीजवळच असलेल्या रामानंदनगरच्या आपटे मळ्यातल्या दत्तमंदिरातले नित्य दर्शन आणि सततचे नामस्मरण हा त्यांचा नित्यनेम.कधीकधी घरी परत यायला कितीही उशीर झाला तरी त्यांनी यात कधीही खंड पडून दिला नव्हता!

मात्र बाबांच्या व्यस्ततेमुळे घरची देवपूजा मात्र रोज आईच करायची. माझा धाकटा भाऊ अजून लहान असला तरी त्याच्यावरच्या आम्हा दोन्ही मोठ्या भावांच्या मुंजी नुकत्याच झालेल्या होत्या. पण तरीही आईने पूजाअर्चा वगैरे बाबीत आम्हा मुलांना अडकवलेलं नव्हतं. या पार्श्वभूमीवरचा एक प्रसंग…

पोस्टलस्टाफला किर्लोस्कर कॉलनीत रहायला क्वार्टर्स असायच्या. आमचं घर बैठं,कौलारू व सर्व सोयींनी युक्त असं होतं. मागंपुढं अंगण, फुलाफळांची भरपूर झाडं, असं खऱ्या ऐश्वर्यानं परिपूर्ण! आम्ही तिथे रहायला गेलो तेव्हा घरात अर्थातच साधी जमिनच होती. पण कंपनीतर्फे अशा सर्वच घरांमधे शहाबादी फरशा बसवायचं काम लवकरच सुरू होणार होतं. त्यानुसार आमच्याही अंगणात भिंतीना टेकवून शहाबादी फरशांच्या रांगा रचल्या गेल्या.

त्याच दिवशी देवपूजा करताना आईच्या लक्षात आलं की आज पूजेत नेहमीच्या दत्ताच्या पादुका दिसत नाहीत. देवघरात बोटांच्या पेराएवढ्या दोन चांदीच्या पादुका होत्या आणि आज त्या अशा अचानक गायब झालेल्या!आई चरकली.अशा जातील कुठ़ न् कशा?तिला कांहीं सुचेचना.ती अस्वस्थ झाली. तिने कशीबशी पूजा आवरली. पुढची स्वयंपाकाची सगळी कामंही सवयीने करीत राहिली पण त्या कुठल्याच कामात तिचं मन नव्हतंच. मनात विचार होते फक्त हरवलेल्या पादुकांचे!

खरंतर घरी इतक्या आतपर्यंत बाहेरच्या कुणाची कधीच ये-जा नसायची. पूर्वीच्या सामान्य कुटुंबात कामाला बायका कुठून असणार?

धुण्याभांड्यांसकट सगळीच कामं आईच करायची. त्यामुळे बाहेरचं कुणी घरात आतपर्यंत यायचा प्रश्नच नव्हता. आईने इथं तिथं खूप शोधलं पण पादुका मिळाल्याच नाहीत.

बाबा पोस्टातून दुपारी घरी जेवायला आले. त्यांचं जेवण पूर्ण होईपर्यंत आई गप्पगप्पच होती. नंतर मात्र तिने लगेच ही गोष्ट बाबांच्या कानावर घातली.ऐकून बाबांनाही आश्चर्य वाटलं.

“अशा कशा हरवतील?”

“तेच तर”

“सगळीकडे नीट शोधलंस का?”

“हो..पण नाही मिळाल्या”

आई रडवेली होऊन गेली.

“नशीब, अजून फरशा बसवायला गवंडीमाणसं आलेली नाहीत.”

“त्यांचं काय..?”

“एरवी त्या गरीब माणसांवरही आपल्या मनात कां होईना पण आपण संशय घेतलाच असता..”

त्या अस्वस्थ मनस्थितीतही बाबांच्या मनात हा विचार यावा याचं त्या बालवयात मला काहीच वाटलं नव्हतं,पण आज मात्र या गोष्टीचं खूप अप्रूप वाटतंय!

नेमके त्याच दिवशी गवंडी आणि मजूर घरी आले. पूर्वतयारी म्हणून त्यांनी जमीन उकरायला सुरुवात केली. त्यानिमित्ताने घरातले सगळे कानेकोपरेही उकलले गेले. पण तिथेही कुठेच पादुका सापडल्या नाहीत. पूजा झाल्यानंतर आई ताम्हणातलं तीर्थ रोज समोरच्या अंगणातल्या फुलझाडांना घालायची. ताम्हणात चुकून राहिल्या असतील तर त्या पादुका त्या पाण्याबरोबर झाडात गेल्या असायची शक्यता गृहीत धरून त्या फुलझाडांच्या भोवतालची माती खोलवर उकरून तिथेही शोध घेतला गेला पण पादुका मिळाल्याच नाहीत.

मग मात्र आईसारखेच बाबाही अस्वस्थ झाले. नेहमीप्रमाणं रोजचं रुटीन सुरू झालं तरी बाबांच्या मनाला स्वस्थता नव्हतीच.कुणाकडूनतरी  बाबांना समजलं की जवळच असणाऱ्या पलूस या गावातील सावकार परांजपे यांच्या कुटु़ंबातले एक गृहस्थ आहेत जे पूर्णपणे दृष्टीहीन आहेत.ते केवळ अंत:प्रेरणेने हरवलेल्या वस्तूंचा माग अचूक सांगतात अशी त्यांची ख्याती आहे म्हणे.बाबांच्या दृष्टीने हा एकमेव आशेचा किरण होता! बाबा स्वत: त्यांनाही जाऊन भेटले. आपलं गाऱ्हाणं आणि मनातली रूखरूख त्यांच्या कानावर घातली. त्यांनीही आपुलकीने सगळं ऐकून घेतलं. काहीवेळ अंतर्मुख होऊन बसून राहिले.तोवरच्या त्यांच्या चेहऱ्यावरच्या शांतपणाची  जागा हळूहळू काहीशा अस्वस्थपणानं घेतलीय असं बाबांना जाणवलं. त्यांची अंध,अधूदृष्टी क्षणभर समोर शून्यात स्थिरावली आणि ते अचानक बोलू लागले.बोलले मोजकेच पण अगदी नेमके शब्द!

“घरी देवपूजा कोण करतं?” त्यांनी विचारलं.

“आमची मंडळीच करतात”

बाबांनी खरं ते सांगून टाकलं.

” तरीच..”

“म्हणजे?”

” संन्याशाची पाद्यपूजा स्त्रियांनी करून कसं चालेल?”

“हो पण.., म्हणून..”

” हे पहा ” त्यांनी बाबांना मधेच थांबवलं.” मनी विषाद नको, आणि यापुढे हरवलेल्या त्या पादुकांचा शोधही नको. त्या कधीच परत मिळणार नाहीत.”

” म्हणजे..?”

” त्या हरवलेल्या नाहीयत. त्या गाणगापूरच्या पादुकांमध्ये विलीन झालेल्या आहेत.”

बाबांच्या मनातली अस्वस्थता अधिकच वाढली.कामात मनच लागेना ‘घडलेल्या अपराधाची एवढी मोठी शिक्षा नको’ असं आई-बाबा हात जोडून रोज प्रार्थना करीत विनवत राहिले.भोवतालच्या मिट्ट काळोखातही मनातला श्रध्देचा धागा बाबांनी घट्ट धरुन ठेवला होता. कांहीही करून हरवलेल्या त्या पादुका घरी परत याव्यात एवढीच त्यांची इच्छा होती पण ती फरुद्रूप होण्यासाठी कांहीतरी चमत्कार होणं आवश्यक होतं!आणि एक दिवस अचानक……?

क्रमश: दर गुरुवारी

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डिटॅचमेंट… भाग – 2 ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

? मनमंजुषेतून ?

☆ डिटॅचमेंट… भाग – 2 ☆ डॉ. शैलजा करोडे 

‘तदेव लग्नं सुदिनं तदेव । ताराबलं चंद्रबलं तदेव ।’ ……. म्हटल्याबरोबर माझं घर दुरावलं . मी परकी झाले . पाहुणी झाले . आयुष्याच्या या वळणावरील ही डिटॅचमेंट मला खूप हळवी करणारी होती .पण दुरावलेल्या या माया बंधनांची हुरहुर मनी असली तरी नवीन नात्यांची गुंफणही मनाला दिलासा देत होती .सून , वहिनी , जाऊ , पत्नी या नात्यांनी तर समृद्ध  केलंच होतं  पण एक सर्वोच्च नातं माझ्या कुशीत आलं होतं .मला मातृत्व पद बहाल केलं होतं.माझी छकुली , माझी सावली , माझा काळीज तुकडा , त्रिभुवनाचं सुख मला यापुढे थिटं वाटू लागलं आणि मुली माहेर सोडून सासरी का येतात या प्रश्नाचं गमक मला कळालं.

निसर्गकन्या बहिणाबाईंनी आपल्या योगी आणि सासुरवाशीण कवितेत हेच तर मांडलं.

” देरे देरे योग्या ध्यान

ऐक काय मी सांगते

लेकीच्या माहेरासाठी

माय सासरी नांदते “

या डिटॅममेंटला अशी ही गोड अँटॅचमेंट होती .

पुढे आयुष्यात असेही वळण आले आणि एकएक करत आई बाबांनी इहलोकीची यात्रा संपविली . हा माझ्यावर कुठाराघात होता .माझी मायेची माणसं , माझं हळवंपण जाणणारी आई , माझ्यावर अतोनात प्रेम करणारे बाबा निघून गेले , मला पोरकं करुन गेले . उत्तरकार्य संपल्यावर मी माझ्या घरी निघाले तेव्हा माझा भाऊ गळ्यात पडून रडला होता . ” ताई , आई बाबा गेले म्हणजे माहेर संपलं असं समजू नकोस . हा तुझा भाऊ आहे अजून , केव्हाही हक्काने येऊन राहात जा .मला भेटत जा . आईनंतर आता तूच माझी आई आहेस ग . तुझ्या मायेची पखरण होऊ देत जा माझ्यावरही .आणि लाभू दे तुझ्या प्रेमाची श्रीमंती मलाही .” या डिॅचमेंटलाही किती सुंदर अँटॅचमेंट होती . ” आई , तू रडत आहेस ” माझी छकुली मला विचारत होती , ” नाही बाळा “, मी तिला कुशीत घेतलं . आई गेल्याचं दुःख तर होतंच पण मी सुद्धा कोणाची आई आहे हे विसरुन चालणारं नव्हतं .

छकुली आणि तिच्यानंतर आलेला चिंटू . चौकोनी कुटुंबात विसावलेली मी . मुलांचं संगोपन शाळा , शिक्षण , काळ द्रुतगतीनं कधी पुढे सरकला कळलेही नाही . मुलांना पंख फुटले , भरारी घेण्यास सज्ज झाले ,आणि माझे मन कातर झाले .छकुलीचं कन्यादान करतांना मला माझं लग्न आठवलं आणि आयुष्यातलं एक वर्तुळ आज पूर्ण झालं होतं .

चिंटूने खूप प्रगती केली व एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या द्वारे अमेरिकेला गेला आणि पुढे तिथलाच झाला . ” चिंटूसाठी मी स्थळं शोधू लागले . निदान मुलगी भारतीय असावी , आपले संस्कार येणार्‍या पिढीवर व्हावे ही  माझी भोळी आशा . मी चिंटूला म्हणाले पुढच्या महिन्यात येतोच आहेस तर मुलगी पाहाण्याचा कार्यक्रम उरकवून टाकू या “.

” आई तुला हा त्रास कशाला , मी शोधलीय तुझी सून . नॅन्सी खूप गुणी मुलगी आहे .” 

माझं स्वप्न भंगलं , पण मुलाच्या स्वप्नाला महत्व देणं गरजेचं असल्यानं मी हा दुःखावेगही सोसला .

मुलं घरट्यात विसावली , उरलो आम्ही दोघेच.सुधीरची साथ असल्याने मला जीवन जगणं सोप झालं .

” अगं , सुनीता जेवायचं नाही काय आज ?. चल मलाही वाढून दे आणि तुझंही वाढून घे . चल लवकर , जाम भूक लागलीय मला ” ” होय चला , जेवण करून घेऊ या . “

सुनीता रिलॅक्स , अगं वाटेल दोन चार दिवस मनाला रुखरुख  , रोजचं जीवनचक्र बदललं कि होतो हा त्रास. सेवानिवृत्त झालं म्हणजे आपण निकामी झालो असं नाही . उलट आता आपला हा वेळ स्वतः साठी ठेवायचा .स्वतःसाठी जगायचं .आपल्या इच्छा पूर्ण करायच्या , आपले छंद जोपासायचे “Life begins at sixty my dear “.

दुपारच्या वामकुक्षीसाठी मी विसावले . झोप येत नव्हती म्हणून टी. व्ही . लावला . कोणत्यातरी चॅनेलवर आध्यात्मिक प्रवचन सुरू होते ” हा संसार मोह मायेने व्यापलेला आहे .या मायाजालातच माणूस फसत जातो व हे माझं , हे माझं ची वीण घट्ट होत जाते . माणसानं प्रेम करावं किंबहुना हे जग प्रेमानंच जिंकता येतं पण प्रसंगी कठोर निर्णयही घ्यावे लागतात . जवळकीतूनच दुरावा निर्माण होतो . म्हणून कोठे थांबायचं हा निर्णय घेता आला पाहिजे . साधं पक्ष्यांचंच उदाहरण बघा ना , पिल्लं मोठी झाली , भरारी घेतली कि स्वतंत्र होतात .तसंच माणसांचंही आहे . वानप्रस्थाश्रम ही संकल्पना हेच तर सुचविते .

नवीन पिढीला त्यांचं स्वातंत्र्य मिळायलाच हवं . वृद्धांनीही आपली मते त्यांना द्यावीत पण लादू नयेत.नवीन बदल , नवीन विचारांना संमती आनंदाने द्यावी.निसर्गाचं चक्रही हेच सांगतं . शिशिरात पानगळ होणारचं . जर पानगळ झालीच नाही तर नवपल्लवी फुटणार कशी ? माणूसही यापेक्षा वेगळा नाही .वृद्ध , जर्जर शरीर जीर्ण पानासारखं गळून पडणारचं. पंच तत्वानं भरलेलं हे शरीर शेवटी पंचतत्वात सामावून मोक्षाला जाणारचं .वेळीच ही अलिप्तता ज्याला कळली तो भाग्यवानच ,.कारण मायेच्या , मोहाच्या जाळ्याला त्यानं भेदलेलं असतं .सर्व येथे सोडून वैकुंठागमन करणं सोपं होतं मग “

“होय आता आपणही अलिप्त झालं पाहिजे .निरोगी तनाबरोबरच निरोगी मनासाठी हलकासा व्यायाम , निसर्गात रमणं , आपले छंद जोपासणं आणि संवाद साधत माणसं जोडणं कितीतरी गोष्टी आहेत करण्यासारख्या या जगात .” नकळत माझ्या ओठांवर हास्य आलं होतं . आरशात डोकावले तर चेहरा प्रफुल्लित झाला होता . चित्तवृत्ती फुलल्या होत्या .

— समाप्त — 

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print