मराठी साहित्य – विविधा ☆ जागतिक टपाल दिन…! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? विविधा ? 

☆ जागतिक टपाल दिन…! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

टपाल आणि माझं नातं कधी जुळलं ते आठवत नाही. पण गावात जुन्या ग्रामपंचायतीच्या बाहेर पोस्टाची लाल टपाल पेटी अडकवलेली होती.शाळेला जाता जाता आम्ही मारुतीच्या मंदिरात खेळायला थांबायचो. कुतुहल म्हणून शेजारच्या ग्रामपंचायतीच्या व्हरांड्यातील खिडकीला अडकवलेली टपाल पेटी न्याहाळायचो कुणीतरी खिडकीवर चढून पेटीचे झाकण उघडझाप करायचं.कुणीतरी आत हात घालून काय आहे का पहायचं.कधी हात पेटीत अडकवून घ्यायचो.कुणी ती पेटी वाजवायची.कुणीतरी ओरडलं तर धूम ठोकायची.असा खेळ सुट्टीत नेहमीच चालायचा.यात महत्वाची कागदं येतात जातात असं कुणीतरी सांगून जायचा. मग हळूहळू थोडी माहीती होत गेली.

…आमच्या वाड्यातला गोरापान आणि घाऱ्या डोळ्याचा बापू तात्या(बापू वाघमारे) सायकलीला पिशवी अडकवून दररोज सकाळी करगणीला जायचा आणि काही तासानं परत यायचा. असं नेमानं घडायचं. त्याची जायची आणि यायची वेळ एकच असायची. शाळेपुढून त्याचं जाणं येणं असायचं. त्यामुळं बापू तात्या करगणीतून रोज पिशवीतून काहीतरी आणतो आणि घेऊन जातो याचंही कुतुहल असायचं. बापू तात्या करगणीतून आलेला दिसला की पत्रं आली असं ऐकायला मिळायचं.

गावात पाटलाच्या वाड्याजवळ असणाऱ्या अत्ताराच्या घरात पोस्ट ऑफिस होतं. तिथं हुसेन अत्तार पोस्टमास्तर म्हणून असायचे. त्यांच्याच घरातल्या एका खोलीत पोस्ट असायचं. उंचपुरा,मोठ्या डोळ्यांचा,खड्या आवाजाचा आणि हसऱ्या चेहऱ्याचा हुसेनभई आजही डोळ्यापुढून हटता हटत नाही. हुसेनभई नेहमी पोस्टाची महत्वाची पत्रे न चुकता बापू तात्यांकडून गावातल्या वाड्यावस्त्यावर पोहचवायचे. कुणाला नोकरीचा कॉल आला,कुणाची मनीऑर्डर आली सगळी खबर पोस्ट मास्तर जवळ असायचीच. पोस्टानं आमचं महत्वाचं यायचं आहे,आलं म्हणजे सांगा -असं अवर्जून तरुण पोरं हुसेन मास्तरला आठवणीनं सांगत रहायची. रोज बापू तात्यालाही विचारत रहायची. पोस्ट असलेल्या या खोलीत आलेल्या पोस्टावर जाडजुड असा शिक्का काळ्या शाईत बुडवून मारलेला आवाज बाहेर ऐकू यायचा. त्यावेळी १५ पैशाचं जाड पोस्टकार्ड मिळायचं त्यावर रुबाबदार पट्टेरी वाघाचं चित्र असायचं.

चौथी पाचवीत होतो तेव्हा सावंताची बायना काकू तिच्या मुंबईतल्या पोरीकडं साधं पोस्टकार्ड लिहून पाठवायला सांगायची. ती बरीच लांबड लावत लिहायला सांगायची पण पत्रावर थोडंच लिहायला जागा असायची. पत्ता लिहून पोस्टात टाकायला द्यायची. कधी मुंबईहून पोरीचं पत्र आलं की वाचून दाखवायला हाक मारून बोलवायची.

खरंतर इथूनच असं पोस्टाचं नातं जुळत गेलं.मी ही माझ्या मुंबईच्या मोठ्या आत्त्याबाईला पत्र पाठवायचो. गावाकडची ख्यालीखुशाली कळवायचो. तिचंही पत्र यायचं. पाचवीत असताना माझ्या मुंबईच्या याच इंदिरा आत्याने पोस्टाने जाड  आणि मजबूत असे पाठीवर अडकवायचे कापडी दफ्तर पाठविले होते. ते दफ्तर पाठीवर घेऊन किती मिरवलं होतं मी.

ती कधी कधी मनीऑर्डर करून पैसेही पाठवायची. पैशातून पाटी-पुस्तकं-कपडे घ्यायला सांगायची. खूप शिक म्हणायची. तिचा आणि माझा पोस्टामुळंच हा दुवा जुळत राहीलेला. ती आता नाही पण तिच्यामुळंच खरंतर शिक्षणाची गोडी लागली होती. तिनं रुजविलेल्या शिक्षणाच्या जिद्दीमुळंच मी शिक्षण घेत राहीलो. माझी तीन पुस्तके प्रकाशित झाली. M.Ed., SET, झालो. आणि चार विद्यापिठाच्या Ph.D.साठी निवडलोही गेलो. माझ्या बालपणीच्या प्रत्येक आठवणीत पोस्टाचा आणि मुंबईच्या आत्याबाईचा ठेवा चिरंतन आहे. माझ्या निंबवड्याच्या रेखा आत्यालाही मी साधं पोस्टकार्ड लिहून पाठवायचो.

कधी लाल शाईनं लिहलेला कागद बापूतात्या घेऊन यायचा. ती तार असायची. लाल अक्षरातलं पत्र बघितलं की बायकांची रडारड सुरू व्हायची. गलका व्हायचा. कुणीतरी गेल्याची खबर असायची. कुणीतरी शिकलं सवरलेलं ती तार वाचून दाखवायचं. तार आलीय म्हंटलं की सगळे धसका घ्यायचे.

मी सातवीत असताना एकदा गावात येणाऱ्या पेपरमधले कोडे सोडवून पोस्टाने पाठवले होते. काही दिवसांनी बापूतात्याने पार्सल आले आहे,पोस्टातून सोडवून घ्या- म्हणून निरोप दिलेला. बक्षीसाचा रेडीओ पोस्टाने माझ्या नावे आला होता. त्याचं भारी कौतुक माझं मलाच वाटलं होतं. हुसेनभईने दीडशे का दोनशे रुपये भरून तो सोडवून घ्यायला सांगितले होते. पण तेवढे पैसे नव्हते. आमच्या आप्पाने कुणाकडून तरी पैसे गोळा करून दोन दिवसांनी तो रेडीओ सोडवून घेतला होता. ‘खोक्यात काहीही असेल,अगदी दगडंही,आमची जबाबदारी नाही’ असं हुसेनभईने अगोदरच सांगून बक्षीसाची हवाच काढून घेतली होती. पण खोक्यात चांगला मर्फी कंपनीचा रेडीओ आला होता. सेल घालून सुरुही झालेला. केवढा आनंद झाला होता. रेडीओ सुरु करून गावातनंही मिरवला होता. आप्पा सकाळ संध्याकाळ मोठ्या आवाजात तो रेडीओ लावून घराबाहेरच्या दिवळीत ठेवायचा. पुढं कितीतरी दिवस तो साग्रसंगीत सोबत वाजत राहीलेला.

पुढं हळू हळू काही पुस्तकं पोस्टानं मागवू लागलो. रंगपेटीही एकदा पोस्टाने आली होती. दिवाळीच्या वेळी पोस्टकार्डवर आकर्षक ग्रिटिंग कार्ड रंगवून ते मित्र व नातेवाईकांना पाठवलेली अजूनही आठवते. पुढं कॉलेजला असताना घरून मनीऑर्डर यायची. शिक्षणासाठी तोच आधार असायचा. आईआप्पाला पत्रातून ख्यालीखुशाली पाठवायचो. गावाकडून माझे दोस्त कधी गुंड्या,कधी रावसाहेब पत्र पाठवायचे. शाळेतला दोस्त मधू पुकळे काम शोधण्यासाठी मुंबईला गेला होता तेव्हा आठवणीनं पत्र मुंबईतनं पाठवायचा. पिक्चरमधल्या गोविंदाला भेटलेला किस्सा पत्रातून त्याने कळवला होता. रक्षाबंधनाच्या दोन तीन दिवस आधी मुंबईच्या अंजूताईच्या राख्या न चुकता पोस्टाने येत रहायच्या.जवळच्या कितीतरी ज्ञात अज्ञातांनी पोस्टाने नोटस्,पुस्तके आणि मैत्रीची पत्रे पाठवलेली अजूनही आठवतात.नोकरीचा कॉलही पोस्टाने आलेला आजही मी जतन करून ठेवलाय. सिने अभिनेते स्व.दादा कोंडके यांना पाठवलेले पत्र अजूनही लक्षात आहे. ते पत्र त्यांना मिळालं का नाही काहीच कळलं नाही. कॉलेज जीवनात कॉलेजमधल्या एका मैत्रीणालाही पाठवलेले पत्रही तिला पोहचले का नाही काहीच कळलं नाही. ‘आमचा बाप आणि आम्ही ‘या पुस्तकाचे लेखक डॉ.नरेंद्र जाधव यांना माझे

‘काळजातला बाप ‘ पुस्तक दोनवेळा पाठवले होते. दोन्ही वेळा चुकीचा पत्ता म्हणून परत आलेले ते पार्सल मी अजूनही तसेच पॅकिंगमध्ये जपून ठेवलंय.

…अशा कितीतरी आठवणीं पोस्टाशी नाते घट्ट करणाऱ्या.. आजही त्या मनाच्या पोस्ट पाकीटात जतन करून ठेवल्यात पोस्टातल्या बचत खात्यासारख्या…!

आज पोस्ट खात्यात बरेच बदल झालेत पण पोस्टाशी असलेला आठवणींचा सिलसिला अजूनही माझ्या गावातल्या पोस्टमन बापू तात्या आणि हुसेन मास्तरच्या भोवती स्पीड पोस्ट सारखा पिंगा घालत राहतो…!

(आगामी संग्रहातून..)

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर

मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

९४२११२५३५७…

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ निश्चयाचे बळ— ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ निश्चयाचे बळ— ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆ 

“जाड्या,किती वाजता येतो आहेस रे?”  रोहनचा सेल  खणखणला. शेजारी रिद्धी उभी होती. 

“आई बघ बघ. याला नाही तुम्ही कोणी बोलणार. मुलगा आहे ना. मला मात्र कधीही रात्री मैत्रिणीकडेही रहायला जाऊ देऊ नका.” 

“रिद्धी,जलो मत . मॉम, पाचसो रुपये दे तो.आज बाहर खाना खाएंगे… “

आईने कौतुकाने 500 रु रोहन ला दिले.

“आई, अग किती डोक्यावर बसवशील ग. केवढा झालाय लठ्ठया बघ की. अग ११०  किलो क्रॉस केले या गाढवाने.” 

रोहन कॅन्टीनमध्ये मित्रांबरोबर होता… “  जाड्या, आयआयटी entrance दिलीय ना “ काय निघणार score? 

करणार का crack ?” सुहासने चेष्टेने विचारले.

रोहन हुशारच होता. आत्ताही पेपर्स मस्त गेले होतेच. पण काय सांगावे– “ रोहन काहीच बोलला नाही.

शेजारी केतकी बसली होती. केतकीनेही आयआयटी  entrance दिली होती. शाळेपासून ते कॉलेजपर्यंत केतकी रोहनची प्रतिस्पर्धी होती. जी जी परीक्षा रोहनने दिली, त्यात त्याच्यापेक्षाही  जास्त यश मिळवून केतकी  पुढे जात असे.

कुचेष्टेने रोहन म्हणाला, “ काय बाबा, आपल्या कॉलेजमध्ये आहेत की अतिरथी महारथी.” 

केतकी काहीच बोलली नाही. तिला मजा वाटायची. वाटायचं ‘ हा मुलगा शाळेपासूनच आपला हेवा का करतो,

कधीही निखळ मनाने कौतुक तर सोडाच, पण याने कधी अभिनंदनही केले नाही आपले.’ .. 

आयआयटी  entrance  चा result लागला. केतकीची ४००, तर रोहनची ८०० वी रँक आली. 

केतकीचे पवईच्या आयआयटी मध्ये  पहिल्याच लिस्टमध्ये नाव आले आणि तुला तिथे सहज प्रवेश मिळाला. रोहनला मिळाले खरगपूर आयआयटी . 

कुत्सितपणे रोहन म्हणाला, “ आता काय… पवई म्हणजे आकाशाला हात लागले.” 

केतकी म्हणाली,” तुझे मनापासून अभिनंदन रोहन.. खरगपूर iit सुरेखच झालं. “ 

ती आपल्याला खिजवते आहे असेच रोहनला वाटले.

नंतर कितीतरी महिने केतकीला पुण्याला यायला जमलेच नाही. मग एकदा तिला रोहन भेटला.

“ केतकी कॉफी  प्यायला जाऊ या ?” 

“ चल की जाऊ ” –केतकीने आमंत्रण स्वीकारले.

“ कसं काय चाललंय तुझे रोहन ?” तिने विचारलं. 

“ कॉलेज चांगले आहे ग. पण मला फार  ragging होतेय. मला  लठ्ठया,जाड्या,गवा हिप्पो अशी नावे ठेवलीत सगळ्यांनी. मला तर हे सोडूनच द्यावे असे वाटू लागलेय. माझे नाही लक्ष लागत अभ्यासात. मला जबरी इनफीरिओरिटी कॉम्प्लेक्स आलाय. “ आयुष्यात प्रथमच रोहन तिच्याशी इतका  उदास होऊन बोलत होता.

– “ ही सगळी माझीच चूक आहे केतकी. आजी आई आजोबांनी  मुलगा मुलगा म्हणून माझे फाजील लाड केले.कधी पोहायला जाऊ दिले नाही. कधी ग्राउंडवर गेलो नाही. तू बघ ना कशी सडसडीत आहेस. मला आठवतंय तू रोज पोहायला जायचीस. आणखी काय करतेस ग तू ?” 

“ रोहन, मी रोज निदान १ तास जिममध्ये घाम गाळते. मला लठ्ठपणा आवडत नाही. अरे रुप आपल्या हातात नसतं ,

पण  शरीर प्रमाणबद्ध ठेवणं तर असतं नं आपल्या हातात. हे बघ. एवढा निराश नको होऊस. तिकडे एखादी जिम शोध.  इथे आणखी किती दिवस आहेस? “ 

“ आहे की अजून एक महिना.” 

“ अरे वा. मग हे बघ, माझी एक dietician मैत्रीण आहे. घेतोस का तिचा  सल्ला ? बघ हं, म्हणजे माझी तुझ्यावर अजिबात बळजबरी नाही. “ 

रोहन लगेच म्हणाला, “ केतकी, घे तिची अपॉइंटमेंट. मला या दुष्ट चक्रातून बाहेर यायचंय. लाज वाटते ग माझ्या मापाचे टी शर्टस मिळत नाहीत हे सांगायची. “

“ चिल रोहन. मनापासून ठरवले आहेस ना, मग जमेल तुला. करशील तू. आपण एकत्र वाढलोय रोहन. आठवतंय, मी खूप वेळा तुला सांगायचा प्रयत्न केला होता, पण प्रत्येक वेळी तू माझी हेटाळणीच केलीस. अरे, खरे बोलणारे मित्र कमी असतात रोहन. पण असं विचार तू कधी केलाच नाहीस. “ 

“ केतकी खरंच सॉरी. खूपदा मी वाईटच वागलो तुझ्याशी. पण तू ते  मनात नाही ठेवलंस. त्याबद्दल मनापासून थॅंक्स . 

“ चला मग – आता नक्की  मिशन ‘ weight loss ‘ सुरू ?” 

रोहन केतकीच्या मैत्रिणीला भेटला.

“ हे बघ रोहन,मी सांगते तसेच follow करणार असलास तरच मी तुला guide करीन. मी cheat day देणार नाही.

किमान पूर्ण एक वर्ष तुला स्वतःसाठी द्यावे लागेल. मला दर वीकला तुझे वजन, आणि फोटो मिळाला पाहिजे. आणि इथे आलास की न चुकता भेटणार आहेस तू मला. ठीक आहे ?”

रोहनने सगळे मान्य केले, आणि वजन कमी करण्याचे अगदी मनापासून ठरवले. 

हॉस्टेलवर अपेक्षेप्रमाणेच स्वागत झाले— “ आलात का जाडोबा ? आणखीच जाड होऊन आलात की काय ?” 

रोहन काहीच बोलला नाही. नहमीसारख चिडलाही नाही. 

त्याचा रूम पार्टनर सचिन त्याचा सच्चा मित्र होता. “ सचिन,मला एखादी चांगली जिम सांग ना. 

मी खरंच आता मनावर घेतलंय. माझं हे अस्ताव्यस्त वजन आता माझ्याच डोळ्यांना खुपायला लागले रे.. “ 

“ शाब्बास रे दोस्ता. आता सगळं तुझ्या मनासारखंच  होईल बघ. उद्याच जाऊ या आपण जीमला. ‘ 

“ सचिन,पण प्लीज हे कोणालाही सांगू नकोस हं.” 

“ अरे नाही रे दोस्ता. नाही सांगणार. आता तू  करूनच दाखव मेरे यार.” 

रोहनने जिममध्ये वेगळी फी भरून पर्सनल ट्रेनर लावला.

ते ट्रेनर त्याला म्हणाले, “ हे बघ, मी अतिशय वाईट टीचर आहे. माझे ऐकले नाही तर मी चक्क तुला झोडून काढेन.” 

“ चालेल सर. पण मी आता मागे नाही हटणार.”

रोहनची जिम सुरू झाली… 

डायटीशीयन ऋचाने  सांगितलेले क्रॅश डाएटही सुरू झाले. पहिल्याच महिन्यात रोहनचे ५ किलो वजन कमी झाले.

“ हुरळून जाऊ नका. नंतर ते मुळीच  कमी होत नाही बरं “ सर जरा कडक शब्दातच म्हणाले.

ऋचा सतत संपर्कात होतीच.

“ रोहन, तू आता सकाळी किंवा रात्री– जेव्हा वेळ होईल तेव्हा walk करायचा आहे. रोज निदान ६ मैल. कसंही करून हे जमवायचंच.” 

रोहनने रात्री  brisk walk घ्यायला सुरुवात केली. कारण त्याला त्याच्या अतिशय व्यग्र दिनक्रमात सकाळी त्यासाठी वेळ देणे अशक्य होते.  रोहनचे टार्गेट ७५ किलो होते. ६ महिन्यात रोहन ८८ किलो वर आला. 

आता हॉस्टेलची मुले म्हणू लागली–“ आगे बढो ,जाड्या. मस्त चाललंय की. अरे हो, आज रात्री feast आहे बरं का. गुलाबजाम आणि दहिवडे करणार आहे अण्णा. येतो आहेस ना ? “.

रोहन काहीच बोलला नाही. “ नको येऊ रे बाबा.”– टवाळ शब्द त्याला ऐकू आल्याशिवाय राहिले नाहीत. 

एकदा ग्राफिक्सच्या  सरांनी विचारलं, “ रोहन, कसा आहेस. झेपतंय ना सगळं तुला? नाही, जरा अशक्त दिसतो आहेस म्हणून विचारतो आहे.” 

“ हो सर, झेपतंय ना.. मी मस्त आहे.” 

रोहनला खरोखरच व्यायामाची गोडी लागली होती. सुट्टीत घरी गेला तेव्हा तर आजी आजोबा बघतच राहिले–

“अरे काय रे हे? किती  वाळला आहेस…. आता इथे आहेस तर छान भरपूर खा पी. काय हे तुझे शरीर… “ 

“आजी, प्लीज मला भरीला पाडू नकोस. मी अजिबात  काहीही खाणार नाही.” त्याने बजावूनच टाकलं. 

तो लगेच ऋचाला भेटायला गेला. 

“व्वा रे पठ्ठे. मस्त दिसतोय की अगदी. पण तरी अजून १३ किलो कमी व्ह्यायला हवेत. सोडू नको हं  जिम, आणि डाएट प्लॅन.” 

“नाही ग बाई, अजिबात सोडणार नाही. आता मलाच आवडत नाही असंतसं काही खायला. कसा होतो ना गं मी  पूर्वी….. शी….. पण आता मी XL size पर्यंत आलो आहे. पूर्वी मला प्लस size च शोधावा लागायचा. माझी मलाच लाज वाटायची बघ. तुला मनापासून थँक्स ऋचा आणि केतकीलाही.” 

आता बघताबघता रोहनचे वजन २२ किलो कमी झाले. तो खूपच हँडसम आणि फिट दिसायला लागला होता .

– ५`१०” इंच उंची आणि  ७२  किलो वजन… म्हणजे एकदम परफेक्ट शरीरयष्टी….. 

बरोबर एक वर्षानंतर केतकीने  त्याला बघितले, आणि …..”  Oh My my!!! मी नक्की रोहनलाच बघतेय ना !

काय हा सुंदर बदल रे! वावा!! so proud of you यार… “ 

 रोहन छानसं हसला…. “ केतकी,अगं या वजनाने स्वतःबरोबर माझा माज पण उतरवला बघ. मी पूर्वीचा रोहन नाही राहिलोय आता. आणि याचे सगळे श्रेय तुला, ऋचाला, आणि जीमला बरं का… I must accept … चल, कॅफेत  जाऊ या ? आणि आता मला पूर्वीसारखी गोड कॉफी अजिबात नको. मीही तू कायम घेतेस तो ग्रीन टीच घेईन. केतकी…my guide..  गुरू.. आणि फिलॉसॉफर सुद्धा ….खरंच थँक्स ग. “ 

आणि दोघेही हसत हसत कॅफे कडे वळले.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘रंग माझा वेगळा….’ – सुश्री सुलभा गुप्ते ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘गोष्ट खूप छोटी असते….’ – अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

रंगात रंग तो गुलाबी रंग

मला बाई आवडतो श्री रंग ॥

छेः छेः ! गैर समज करून घेऊ नका . माझे नाव गुलाबी नाही आणि मी हा नवऱ्याच्या नावाचा उखाणाही घेतलेला नाही, त्याचे नाव पण श्रीरंग नाही. कोणी म्हणेल लेखिकेच्या मनात आधीच होळीचे रंग भरलेत , तसे पण नाही.

इंद्रधनुष्याचे सात रंग सर्वज्ञात आहेत —- ” ता ना पि हि अ नि जा “

असे इंद्रधनूचे रंग लक्षात ठेवण्याचे सोपे सूत्र शाळेत आम्हाला शिकवले होते . तसेच हे सात रंग एकत्र येतात तेव्हा इंद्रधनुष्य तयार होते , जे फक्त आकाशात दिसते, ही निसर्गाची किमया . आणि ते बघायला आबालवृद्ध सगळेच धावतात कारण हे अद्भुत बघून खूप आनंद होतो.

माणसाच्या आयुष्यात देखील हे सात रंग कधी ना कधी डोकावून जातात—-

केशरी रंग  त्यागाचा

पांढरा रंग शांतीचा

हिरवा भरभराटीचा

गुलाबी रंग प्रेमाचा

लाल रंग रक्ताचा

काळा म्हणजे निषेध !

—अशा सर्व संमत कल्पना आहेत.

माझ्या मनात मात्र प्रत्येक रंगाच्या वेगळ्या कल्पना आहेत. रंगांशी निगडित आपल्या भावना, अनुभव असतात. तो तो रंग बघून त्या भावना जागृत होतात.

केशरी म्हटले की डोळ्यांसमोर उभा राहतो , डौलाने डुलणारा , शिवाजी महाराजांचा ” भगवा ” –मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक, महाराष्ट्र धर्माची, हिंदू धर्माची शान, देवळांच्या शिखरांवर शोभणारे केशरी ध्वज ! विजय पताका !

पांढरा रंग म्हणताच मला आठवतात  हिमालयाची उंच उंच बर्फाच्छादित शिखरे . त्यागाचे प्रतीक . उन्हातान्हाची पर्वा  न करता वर्षानुवर्षे उभे राहून सीमेचे रक्षण करणारा, आपल्या उंचीने भारताची शान उंचावणारा नगाधिराज हिमालय.  – मनात अभिमान उत्पन्न करणारा !

पांढरा रंग आणखी एक आठवण करून देतो — – सर्वसंग परित्याग करून पांढरी वस्त्रे  परिधान करणारे श्वेतांबर जैन साधू ! आपोआप आदराने आपण नतमस्तक होतो .

हिरवा रंग तर सृष्टीचा—

” हिरवे हिरवेगार गालिचे । हरित तृणांच्या मखमालीचे ” 

बारकाईने विचार केला तर निसर्गात हिरव्या रंगाची लयलूट आहे . गवत हिरवे , इवल्या रोपट्यांची पाने हिरवी, वृक्षलतांची पाने हिरवी . झाड लहान असो की मोठे, पाने मात्र हिरवीच !

मातृत्वाची चाहूल लागलेल्या तरुणीसारखी, हिरव्या रंगाने नटलेली सृष्टी ! काय विलोभनीय रूप तिचे !

लाल रंग आणि रक्ताचे जवळचे नाते . माझ्या डोळ्यांसमोर येथे युद्ध भूमीवर सांडलेले सैनिकांचे रक्त आणि जीव वाचवण्यासाठी केलेले रक्तदान . रक्तच ! पण एक मातृभूमीसाठी सांडलेले आणि दुसरे कुणा अनोळखीचा जीव वाचवण्यासाठी केलेले रक्तदान

काळा रंग निषेधाचा ! मोर्चामध्ये वापरतात काळे झेंडे. पण माझ्या मनात चित्र उभे रहाते – पावसाळ्यातले ते काळे ढग – पावसाच्या आगमनाची शुभवार्ता घेऊन येणारे दूतच ते ! बळीराजाला आनंद देणारे, ग्रीष्माच्या उन्हाने तापलेल्या तृषार्त भूमीला शांती संदेश घेऊन येणारे !

आता मुख्य माझा आवडता रंग – – अहो कोणता काय ? ?? –अर्थात गुलाबी .

नवजात बालकाच्या ओठांचा गुलाबी–प्रेयसीच्या ओठांचा गुलाबी–लज्जेने प्रियेच्या गालांवर फुलणारा गुलाबी–

मधुर , औषधी गुलकंद बनवावा असा गुलाबांचा गुलाबी–आपल्या उमलण्याने आसमंत दरवळून टाकणारा सुंदर गुलाब , रंग गुलाबी—- हे सर्व तर अर्थात मोह पाडतातच पण मुख्य म्हणजे —

लहानपणापासून ऐकलेले, वाचलेले, फोटोत पाहिलेले – सावळ्या घननीळाचे गुलाबी पदकमल —-

कमलपुष्प अधिक गुलाबी– की भगवान श्रीकृष्णाची सुकुमार पावले अधिक गुलाबी ? मनात नेहमीच संभ्रम निर्माण होतो . 

पण म्हणूनच माझा आवडता रंग  – श्रीरंग ! भक्ति- प्रेमाचा रंग श्री रंग .

आठवा रंग . श्री रंग. 

लेखिका : सुलभा गुप्ते, सिडनी .

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पालक स्वतःचीच… लेखिका :उषा फाटक ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ पालक स्वतःचीच… लेखिका :उषा फाटक ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

मी. वय ७४ ….पालक स्वतःचीच !!

पंचवीस वर्षापूर्वी माझी दोन्ही मुलं घर सोडून बाहेर गेली.

प्रथम शिक्षणासाठी, मग नोकरी साठी.

आधी देशात, नंतर परदेशात.

त्याच वेळी मनाशी खूणगाठ बांधली की आता यापुढे आपणच आपल्या साठी. (खरंतर ही खूणगाठ मुलं जन्माला आली तेव्हाच बांधली होती, की वीस पंचवीस वर्षांनी पाखरं घरटं सोडून उडून जाणार).

एकदा मनाची तशी धारणा झाल्यावर पुढचं फार सोपं होतं. आपली सर्व कामे आपणच करायची.

शक्यतो कुणावर अवलंबून रहायचं नाही. एकदा करायला लागलं की सगळं जमतंच !!

त्या काळात हा शब्द नव्हता पण ‘आत्मनिर्भर’ झाले.

घरात कंप्यूटर असून कधी हात न लावणारी मी, पन्नासाव्या वर्षी क्लासला जाऊन कंप्यूटर शिकले. मुलांना मेल करु लागले. पुढे फेसबुक, व्हाट्सअँप, स्काईप, व्हिडिओ कॉल …टेक्नॉलॉजी बदलत गेली तसं मीही सगळं वापरायला शिकले. मुलं पुढे पुढे धावताहेत… आपण थोडं चालायला तरी हवं. नाहीतर आपल्यातलं अंतर वाढतच जाईल.

केल्याने होत आहे रे….. आधी केलेची पाहिजे !!

आत्मविश्वास वाढत गेला. आता कोविडच्या काळात ऑनलाईन व्यवहार सोपे झाले. खरेदी, बँकेचे व्यवहार ऑनलाईन करायला शिकले. काही अडले, तर विनासंकोच कुणाला विचारते.

आता मी एकटी रहाते. मुलांशी संपर्क असतोच. आपली आई चांगली खंबीर आहे, हा विश्वास मुलांनाही आहे.

सुदैवाने प्रकृती चांगली आहे. लहानपणापासून केलेला व्यायाम आणि संतुलित आहार-विहार यामुळे हे साध्य झाले आहे.

नातेवाईक, शेजारी यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत. मित्रमंडळी आहेत, स्वतःचे छंद आहेत. वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच कधी पडत नाही.

एक गोष्ट नक्की…. आपण दुसऱ्यासाठी होईल तेव्हढे करत रहावे… आपल्यावर वेळ आली तर कोणीतरी नक्की धावून येतील. आधी प्रेम द्यावे आणि मग प्रेम घ्यावे…

“एकमेका करू सहाय्य” हा आजच्या जगण्याचा मूलमंत्र आहे.

आज तरुण असलेल्या पिढीलाही मी हेच सांगेन…  म्हातारपणासाठी जशी आर्थिक तरतूद करता, तशी शारीरिक आणि मानसिक तरतूदही करा. शारीरिक फिटनेससाठी व्यायाम  आणि मानसिक फिटनेससाठी आवडीचा छंद जोपासा… स्वतःचे विश्व निर्माण करा….आणि मुख्य म्हणजे झाल्यागेल्याची खंत करणे सोडून द्या. वृत्ती समाधानी ठेवा.

आणि हो, हे सर्व एका दिवसात निर्माण होत नाही. तरुण वयातच याची सुरुवात करावी लागते. तरच म्हातारपण सुखाचे होईल !

लेखिका :उषा फाटक

संग्राहिका: मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आतिश का तरकश #161 – 47 – “वो जो चले गए और भी याद आने लगे…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी  ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं ।प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकशआज प्रस्तुत है आपकी ग़ज़ल “वो जो चले गए और भी याद आने लगे …”)

? ग़ज़ल # 47 – “वो जो चले गए और भी याद आने लगे…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ?

भूलता नहीं शमशान का ख़ौफ़नाक मंजर भुलाने से,

वो जो चले गए और भी याद आने लगे भुलाने से।

कमरा वीराँ हो गया, फ़क़त इक तस्वीर हटाने से,

दिल आबाद कहाँ रह पाया, उनकी याद भुलाने से।

घुट-घुट कर मरना लिखा था उनकी क़िस्मत में,

अब कहाँ लौट कर आएँगे वे बदनसीब बुलाने से।

हर शहर हर गाँव हर नगर में हाहाकर मच रहा,

एम्बुलेंस डॉक्टर दवा कोई नहीं आया बुलाने से।

भ्रष्टाचार कालाबाज़ारी खेला खुलेआम नंगा नाच,

अखंड राष्ट्र विश्वगुरु ठेकेदार सहमे कुलबुलाने से।

© श्री सुरेश पटवा ‘आतिश’

भोपाल, मध्य प्रदेश

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ “श्री हंस” साहित्य # 38 ☆ मुक्तक ।। तेरी ही दी खुशियां, आती दुगनी वापिस होकर ।।☆ श्री एस के कपूर “श्री हंस”☆

श्री एस के कपूर “श्री हंस”

(बहुमुखी प्रतिभा के धनी  श्री एस के कपूर “श्री हंस” जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त अधिकारी हैं। आप कई राष्ट्रीय पुरस्कारों से पुरस्कृत/अलंकृत हैं। साहित्य एवं सामाजिक सेवाओं में आपका विशेष योगदान हैं।  आप प्रत्येक शनिवार श्री एस के कपूर जी की रचना आत्मसात कर सकते हैं। आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण मुक्तक ।।तेरी ही दी खुशियां, आती दुगनी वापिस होकर।।)

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ “श्री हंस” साहित्य # 38 ☆

☆ मुक्तक ☆ ।। तेरी ही दी खुशियां, आती दुगनी वापिस होकर ।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस” ☆ 

[1]

ख़ुशियाँ हर मोड़ पर कि, चाहो तो मौज मिलती है।

बात नहीं एक दिन की, ढूंढो तो रोज़ मिलती है।।

खुशी बसती नहीं कहीं दूर, बहुत ऊपर आसमान में।

तेरे भीतर बसेरा इनका, खोज वहीं पर मिलती है।।

[2]

बहुत आसान इन खुशियों, से रोज़ मुलाकात करना।

बांटते रहो फिर इन्हें, अपनों में आबाद  करना।।

यही छोटी मोटी खुशियां, लौट कर आती बड़ी होकर।

फिर इन खुशियों को तुझ, को ही है प्राप्त करना।।

[3]

मत ढूंढता रह हमेशा धन, दौलत की सौगातों  को।

निकाल कर ला हर बात, में खुशी की अफरातों  को।।

तेरी ही खुशी जान ले कि, दुगनी होकर आती वापिस।

बस अहसास कर महसूस, कर इन मुस्कराहटों को।।

© एस के कपूर “श्री हंस”

बरेली

ईमेल – Skkapoor5067@ gmail.com

मोब  – 9897071046, 8218685464

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – तट ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ श्रीमहालक्ष्मी साधना 🌻

दीपावली निमित्त श्रीमहालक्ष्मी साधना, कल शनिवार 15 अक्टूबर को आरम्भ होकर धन त्रयोदशी तदनुसार शनिवार 22 अक्टूबर तक चलेगी।इस साधना का मंत्र होगा-

ॐ श्री महालक्ष्म्यै नमः।

आपसे विनम्र अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

? संजय दृष्टि – तट ??

भीतर तूफान के थपेड़े,

बाहर सैलानियों के फेरे..,

आशंका-संभावना में

समन्वय साधे रखता है,

कितने अंतर्विरोधों को

ये तट थामे रखता है..!

© संजय भारद्वाज

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ काव्य धारा # 104 ☆’’हे सदा शिव शंभु शंकर, दुखहरण मंगल करण…” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध

(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी  द्वारा श्री गणेश चतुर्थी पर्व पर रचित एक रचना “हे सदा शिव शंभु शंकर, दुखहरण मंगल करण…”। हमारे प्रबुद्ध पाठकगण  प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी  काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे।) 

☆ काव्य धारा #104 ☆’’हे सदा शिव शंभु शंकर, दुखहरण मंगल करण…” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

हे सदा शिव शंभु शंकर, दुखहरण मंगल करण

सुख, विभव, आनंद-दायक, शांति प्रद प्रभु तव चरण।।

 

कामना तव कृपा की ले नाथ हम आये शरण

आशुतोष अपारदानी कीजिये सब दुख हरण।।

 

हृदय की सब जानते हो भक्त के, भगवान तुम

तुम्हीं संरक्षक जगत के प्राणियों के प्राण तुम।।

 

विधि न मालूम अर्चना की भावना के हैं सुमन

नेह आलोकित हृदय है, धवल हिम सा शुद्ध मन।।

 

तमावृत हर पथ जगत का मोह के अंधियार से

बढ़ रहे हैं कष्ट नित नव स्वार्थ के विस्तार से।।

 

है भयावह रात काली, कहीं न दिखती है किरण

तव कृपा की कामना ले हैं बिछे पथ में नयन।।

 

दीजिये वर अब हो सत्यं शिवं शुभ सुंदरम

मन में करूणा का उदय हो, क्लेश, प्रभु हो जायें कम।।

 

अश्रु- जल कर सके उठती द्वेष- लपटों का शमन

विनत तव चरणों में शंकर हमारा शत शत नमन।।

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

ए २३३ , ओल्ड मीनाल रेजीडेंसी  भोपाल ४६२०२३

मो. 9425484452

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ आशीष का कथा संसार # 111 – पाप का भागी कौन—पाप किसने किया? ☆ श्री आशीष कुमार ☆

श्री आशीष कुमार

(युवा साहित्यकार श्री आशीष कुमार ने जीवन में  साहित्यिक यात्रा के साथ एक लंबी रहस्यमयी यात्रा तय की है। उन्होंने भारतीय दर्शन से परे हिंदू दर्शन, विज्ञान और भौतिक क्षेत्रों से परे सफलता की खोज और उस पर गहन शोध किया है। 

अस्सी-नब्बे के दशक तक जन्मी पीढ़ी दादा-दादी और नाना-नानी की कहानियां सुन कर बड़ी हुई हैं। इसके बाद की पीढ़ी में भी कुछ सौभाग्यशाली हैं जिन्हें उन कहानियों को बचपन से  सुनने का अवसर मिला है। वास्तव में वे कहानियां हमें और हमारी पीढ़ियों को विरासत में मिली हैं। आशीष का कथा संसार ऐसी ही कहानियों का संग्रह है। उनके ही शब्दों में – “कुछ कहानियां मेरी अपनी रचनाएं है एवम कुछ वो है जिन्हें मैं अपने बड़ों से  बचपन से सुनता आया हूं और उन्हें अपने शब्दो मे लिखा (अर्थात उनका मूल रचियता मैं नहीं हूँ।”)

☆ कथा कहानी ☆ आशीष का कथा संसार #111 🌻 पाप का भागी कौन—पाप किसने किया? 🌻 ☆ श्री आशीष कुमार

एक ब्राह्मण ने बगीचा लगाया। उसे बड़े मनोयोग पूर्वक संभालता, पेड़ लगाता, पानी देता। एक दिन गाय चरती हुई बाग में आ गई और लगाये हुए कुछ पेड़ चरने लगी। ब्राह्मण का ध्यान उस ओर गया तो उसे बड़ा क्रोध आया। उसने एक लट्ठ लेकर उसे जोर से मारा। कोई चोट उस गाय पर इतने जोर से पड़ी कि वह वहीं मर गई। गाय को मरा जानकर ब्राह्मण बड़ा पछताया। कोई देख न ले इससे गाय को घसीट के पास ही बाग के बाहर डाल दिया। किन्तु पाप तो मनुष्य की आत्मा को कोंचता रहता है न। उसे संतोष नहीं हुआ और गोहत्या के पाप की चिन्ता ब्राह्मण पर सवार हो गई।

बचपन में कुछ संस्कृत ब्राह्मण ने पढ़ी थी। उसी समय एक श्लोक उसमें पढ़ा जिसका आशय था कि हाथ इन्द्र की शक्ति प्रेरणा से काम करते हैं, अमुक अंग अमुक देवता से। अब तो उसने सोचा कि हाथ सारे काम इन्द्र शक्ति से करता है तो इन हाथों ने गाय को मारा है इसलिए इन्द्र ही गोहत्या का पापी है मैं नहीं?

मनुष्य की बुद्धि की कैसी विचित्रता है, जब मन जैसा चाहता है वैसे ही हाँककर बुद्धि से अपने अनुकूल विचार का निर्णय करा लेता है। अपने पाप कर्मों पर भी मिथ्या विचार करके अनुकूल निर्णय की चासनी चढ़ाकर कुछ समय के लिए कुनैन जैसे कडुए पाप से सन्तोष पा लेता है।

कुछ दिनों बाद गौहत्या का पाप आकर ब्राह्मण से बोला— मैं गौहत्या का पाप हूँ तुम्हारा विनाश करने आया हूँ।

ब्राह्मण ने कहा—गौहत्या मैंने नहीं की, इन्द्र ने की है। पाप बेचारा इन्द्र के पास गया और वैसा ही कहा। इन्द्र अचम्भे में पड़ गये। सोच विचारकर कहा— ‛अभी मैं आता हूँ।’ और वे उस ब्राह्मण के बाग के पास में बूढ़े ब्राह्मण का वेश बनाकर गये और तरह−तरह की बातें कहते करते हुए जोर−जोर से बाग और उसके लगाने वाले की प्रशंसा करने लगा। प्रशंसा सुनकर ब्राह्मण भी वहाँ आ गया और अपने बाग लगाने के काम और गुणों का बखान करने लगा। “देखो मैंने ही यह बाग लगाया है। अपने हाथों पेड़ लगाये हैं, अपने हाथों से सींचता हूँ। सब काम बाग का अपने हाथों से करता हूँ। इस प्रकार बातें करते−करते इन्द्र ब्राह्मण को उस तरफ ले गये जहाँ गाय मरी पड़ी थी। अचानक उसे देखते इन्द्र ने कहा। यह गाय कैसे मर गई। “ब्राह्मण बोला—इन्द्र ने इसे मारा है।”

इन्द्र अपने निज स्वरूप में प्रकट हुआ और बोला—‟जिसके हाथों ने यह बाग लगाया है, ये पेड़ लगाये हैं, जो अपने हाथों से इसे सींचता है उसके हाथों ने यह गाय मारी है इन्द्र ने नहीं। यह तुम्हारा पाप लो।” यह कहकर इन्द्र चले गये। गौ हत्या का पाप विकराल रूप में ब्राह्मण के सामने आ खड़ा हुआ।

भले ही मनुष्य अपने पापों को किसी भी तरह अनेक तर्क, युक्तियाँ लगाकर टालता रहे किन्तु अन्त में समय आने पर उसे ही पाप का फल भोगना पड़ता है। पाप जिसने किया है उसी को भोगना पड़ता, दूसरे को नहीं। यह मनुष्य की भूल है कि वह तरह−तरह की युक्तियों से, पाप से बचना चाहता है। अतः जो किया उसका आरोप दूसरे पर न करते हुए स्वयं को भोगने के लिए तैयार रहना चाहिए।

© आशीष कुमार 

नई दिल्ली

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ न्यू जर्सी से डायरी… 20 ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’
(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है।आज प्रस्तुत है आपकी विदेश यात्रा के संस्मरणों पर आधारित एक विचारणीय आलेख – ”न्यू जर्सी से डायरी…”।)

? यात्रा संस्मरण ☆ न्यू जर्सी से डायरी… 20 ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ?

यहां की प्रायः बिल्डिंग्स की बाहरी दीवारों पर अतफर में लटकी सीढियां देख चौंकिए मत । दरअसल यहां भवन की दीवार, फ्लोर प्रमुखता से लकड़ी के बोर्ड से बने होते हैं ।
कालम, बीम, प्रमुखता से स्टील सेक्शन गर्डर, होते हैं । जो नट बोल्ट से कसे हुए होते हैं । यही कारण है की एम्पायर स्टेट बिल्डिंग के बनने का समय बेहद कम था । समूचा न्यूयार्क मेड आफ स्टील कहा जा सकता है । सौ बरस से पहले बनाए गए “सब वे” जिन पर जमीन से चार पांच मंजिल नीचे तक ट्रेन दौड़ रही हैं , हडसन नदी पर बने ब्रुकलिन ब्रिज सहित पुल , टनल में ओवर सेक्शन स्टील का प्रयोग दिखता है ।

स्टील के साथ लकड़ी ही दूसरा बड़ी मात्रा में प्रयुक्त बिल्डिंग मैटेरियल है। आजकल बन रही बिल्डिंग्स में प्रारंभिक तीन चार मंजिले कंक्रीट की दिखती हैं , उससे ऊपर की मंजिलों में लकड़ी ही प्रयुक्त की जाती है। नीचे की मंजिलों में भी ठंड से बचाव के लिए वुडन फ्लोर होते हैं । इसलिए आग का खतरा ज्यादा होता है। फायर ब्रिगेड का तगड़ा नेटवर्क है ,और सेफ्टी रूल्स बेहद सख्त हैं ।

सभी तरह की इमरजेंसी के लिए नंबर 911 है ।

अग्नि दुर्घटनाओं से बचाव के लिए ही प्रायः भवनों की बाहरी दीवारों पर पहली मंजिल तक अतफर में लोहे की सीढियां फिट की जाती हैं , जिससे किसी दुर्घटना की स्तिथि में लोग आउटर वाल से फटाफट स्केप कर सकें ।

बाहर से सीधे कोई चढ़ एन सके इस सुरक्षा के दृष्टिगत पहली मंजिल से नीचे की लेडर फोल्डेड होती है।

मतलब हमारी फिल्मों के मजनू जी को सेनेटरी पाइप से चढ़कर प्रेमिका के कमरे तक पहुंचने की जरूरत नहीं, बाकायदा सीढी से चढ़ कर पधारा जा सकता है।

विवेक रंजन श्रीवास्तव, न्यूजर्सी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares
image_print