मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ।। गोष्ट अधल्यामधल्याची।। — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

।। गोष्ट अधल्यामधल्याची।। — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

(मी तुमच्यातलाच एक आहे,पण बाई म्हणून नाही जगणार !”) — इथून पुढे —

लक्ष्मी आणि इतर बायका बघतच बसल्या. “ अरे, तुला टोचा मारून मारून दुनिया जगू देणार नाही पोरा ! तुझ्यावर कधीतरी बलात्कार होणार, असे घाणेरडे आंबट शौकी लोक आहेत बाबा दुनियेत !”  

“ मावशी, तुम्ही वाचवाल ना मला? तुमच्यातला एक काहीतरी वेगळं करू बघतोय, तर मला द्या ना संधी. नाहीच जमलं तर आहेच, भीक मागत फिरणं हो.” लक्ष्मी, शबनम गहिवरल्या. त्यांनी श्यामची अलाबला घेतली. “ कर पोरा काय हवं ते ! आहे आमची वस्ती तुझ्यामागं. चला ग ! ए पोरा, लक्ष आहे आमचं तुझ्यावर. मोकळा सोडणार न्हाय.  न्हाय जमलं तर यावच लागलं झक मारत ! चला गं !’

श्यामने सुटकेचा निश्वास टाकला. सगुणा घाबरून त्या सगळ्यांकडे बघत होती. “ लेकरा,ह्याला मी जबाबदार आहे ! का घेतली मी असली औषधं आणि तुझा नाश केला रे.”

“ आई,असं म्हणू नको ! माझ्याच नशिबात हे होतं. एवढं होतं तर त्याच वेळी मारून टाकायचस गं. तुम्ही आणि मी सुटलो असतो.” उद्वेगाने श्याम म्हणाला. “ काय ग हे माझं आयुष्य. खेचराची जात आमची. धड  बाई नाही की धड पुरुष नाही. काय आहे ग मला भावी आयुष्य?”

 शामचा तोल सुटला. तो हुंदके देऊन रडायला लागला. “ आई,मी बाहेर शांत असतो, पण आत शंभर मरणं मरत असतो. मला लोकांसारखे साधे सरळ आयुष्य नाही. मरण सुद्धा नाही ग माझं नॉर्मल. कशाला मला जिवंत ठेवलंस? त्याच वेळी मारून टाकायचं ना!”

सगुणाने त्याला मिठीत घेतले. “नको लेकरा असं बोलू. कोणी नसेल तर मी जिवंत असेपर्यंत तुला आधार देईन. मला असं त्या लक्ष्मीसारख्या लोकांत नाही रे जाऊ द्यायचा तुला पोरा. निदान देवानं कला दिलीय हातात, तर उपयोग कर बाळा त्याचा. “

श्याम हळूहळू शांत झाला. त्याने डोळे पुसले, आणि कॉलेजला निघून गेला. श्याम सगळ्या परीक्षा उत्तम श्रेणीने पास झाला. त्याच्या हातात स्वयंपाकाची दैवदत्त कला होती. त्याने केलेले केक्स आणि त्याची डेकोरेशन्स भल्याभल्याना तोंडात बोट घालायला लावत.

अशीच शेवटच्या वर्षी  कुकिंगची स्पर्धा होती. दिल्लीहून मोठे मास्टरशेफ आले होते.

सर म्हणाले, “ श्याम, तू का भाग घेत नाहीस? तुला नक्की बक्षीस मिळेल. नाही मिळाले तर निदान या मोठ्या लोकांशी ओळखी तर होतील ना? आता हे शेवटचे वर्ष तुमचे ! भविष्याचा विचार करायला हवा तुम्ही मुलांनी.”

श्याम खिन्न हसला.म्हणाला, “ सर,तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घेतलेत हेच खूप आहे हो माझ्यासाठी.. माझी टवाळी,कुचेष्टा नाही झाली आपल्या कॉलेज मध्ये.” 

सरांना भरून आले. “ श्याम,तू माझ्यासाठी एन्ट्री दे. कोणी काही का म्हणेनात. लक्षात ठेव, परीक्षकसुद्धा तुला हिणवतील, कुचेष्टा करतील, पण तू हरु नकोस. तुझ्या बोटातली जादू  येऊ दे जगासमोर ! “

वर्गातील मुलांनीही आग्रह केला आणि श्यामने घाबरत एन्ट्री फॉर्म भरला. त्याच्या वर्गातली टॉपर  शलाकाही होती  फॉर्म भरायला. “ श्याम, तू भरलास फॉर्म म्हणजे मी कसली येणार रे फायनल राऊंड पर्यंत !”

श्याम निष्पापपणे म्हणाला, ” शलाका, मी नको का भरू फॉर्म? तुला पुढे खूप चान्सेस आहेत ग ! माझं काय, मला अंधारच आहे बघ सगळा.”

शलाकाने त्याचे डोळे पुसले.” वेड्या, सहज कौतुकाने म्हणाले रे मी ! तू जिंकतोस की नाही बघच ही स्पर्धा. मी आहे की तुझ्याबरोबर! “ 

श्यामची प्राथमिक फेरीत निवड झालीच. त्याने केलेले दोन पदार्थ केवळ लाजवाब होते. त्याला सिलेक्ट केले तिथल्या तिथे. श्यामची खरी स्पर्धा सुरू झाली. कधी नावे सुद्धा न ऐकलेले पदार्थ आणि त्या कृती. वर प्रात्यक्षिक चालू असताना, धैर्य खच्ची करणाऱ्या परीक्षकांच्याच कॉमेंट्स. 

फिनालेपर्यंत पोचला श्याम. एव्हाना, टीव्हीवर बघणाऱ्या प्रेक्षकांना चांगलाच माहीत झाला होता श्याम.त्याचे उत्कृष्ट पदार्थ तर त्यांना  आवडूच लागले. कोणालाही सुचणार नाहीत असे पदार्थ तो दिलेल्या मोजक्या  सामानात आणि वेळात सहज करून दाखवी.

हळूहळू चेष्टा करणाऱ्या परीक्षकांचाही आवडता झाला श्याम. शेवटच्या तीन स्पर्धकात शलाकाही पोचली होती.

आज चार स्टार असलेल्या मिशेलिन शेफ कुणाल ने केलेला चार  मजली केक करून दाखवायचा होता. ५० मिनिटात कुणालने तो करून दाखवला. सामान, कृती आजीबात लिहिलेली नव्हती. सगळे नुसते लक्षात ठेवूनच ९० मिनिटात, पॅन्ट्रीतून सामान आणण्यापासून सर्व काही करायचे होते. 

 

बेल वाजल्याबरोबर सगळे धावत सुटले आणि सामान घेऊन आले. श्यामनेही कामाला सुरुवात केली. 

शेफ कुणाल जवळ आले, म्हणाले, “ काय श्याम ! इथपर्यंत मजल मारली खरी,पण बाकीचे दोन कॉम्पिटीटर कमी नाहीत बरं का. जरा चूक झाली तर घरी जायचे लगेच !”

श्याम शांतपणे  काम करत होता.

शेवटच्या पंधरा मिनिटात, मोठे मोठे शेफ स्पर्धा बघायला आमंत्रित केले होते. सगळीकडे बातमी पोचली होती —  एक तृतीयपंथी मुलगा फायनलपर्यंत पोचलाय. कौतुकमिश्रित कुतूहलाने सगळे वरच्या गॅलरीतून तिघांचे फायनल टचेस बघत होते.

तिघांच्यात शलाकाचा केक केवळ अप्रतिम झाला होता. लोकांना खात्री होतीच, शलाकाच विनर होणार म्हणून.

फायनल आईसिंग करताना शलाकाच्या लक्षात आले की,आपण आईसिंग शुगर विसरलोय. ती हताश झाली.  टीव्हीवर  लाइव्ह प्रोग्रॅम दाखवत होते. श्यामने कुणाल सरांना विचारले “ सर माझं सगळं काम झालंय. मी देऊ का उरलेली शुगर त्यांना?”

कुणाल हसले. म्हणाले, ” नो.इथे कोणी कोणाचे नसते श्याम ! अशी मदत  केलेली चालत नाही दुसऱ्या  कँडीडेटला. सो स्वीट आर यू डिअर.”

वेळ संपल्यावर तिघांचेही केक ट्रॉलीवरून नेऊन  परीक्षकांना दाखवले गेले. तीनही परीक्षकांनी  खाऊन बघितले आणि  कुणाल उठून उभे राहिले. ” श्याम मी कबूल करतो, तू आज हा केक माझ्यापेक्षा उत्तम करून दाखवला आहेस. तू जन्मजात शेफ आहेस खरा.” 

तिन्हीही परीक्षकांनी  एकमुखाने  शामचा केक उत्कृष्ट ठरवला. होताच तो सर्वोत्तम. श्यामला मास्टरशेफचा मानाचा कोट कुणालने चढवला. पंचवीस लाख रुपये आणि एक टीव्ही शो असे भव्य  प्राइझ त्याला मिळाले.

श्याम  हुंदके देऊन रडायला लागला. त्याची खेडवळ आई, वडील, भाऊ, सगळे  घाबरून,अंग चोरून प्रेक्षकांत बसले होते. 

श्याम म्हणाला, ” मी तृतीयपंथी आहे, हे मी कधीही लपवून  ठेवले नाही. देवाने आमच्यावर  फार मोठा अन्याय केलाय, पण मी त्याला कधी दोष  दिला नाही. आज त्याच देवाने, ही कला माझ्या हातात ठेवली आणि तुमच्यासारख्या लोकांनी माझे कौतुक केले. मला दुसरे काही नको. हे श्रेय माझ्या आईला देईन मी.  मला ती लहानपणापासून बरोबर स्वयंपाक करायला न्यायची. माझी आई अतिशय सुगरण आहे. कदाचित त्याचमुळे मी केटरिंग करायचा निर्णय घेतला असावा. आणि सर्वात महत्वाचे, शेफ नेहमी हॉटेलमध्ये आत असतो, लोकांसमोर थोडाच येतो?  मला  लोकांसमोर यावे लागणार नाही आणि मी असा असल्याने सतत किचन मधेच असेन –  हाही एक फायदाच की !”

 साधा सरळ श्याम लोकांना मनापासून आवडला. शामच्या आईची पण एक मुलाखत घेतली गेली. तेव्हा तर ती रडलीच. म्हणाली, “ या माझ्या लेकराने लई सोसलय हो लोकानो. किती अपमान, किती चेष्टा. शाळेतून पळून यायचं पोरगं. इथपर्यंत तुम्ही मायबापानी आणलं. असंच लक्ष राहू द्या.”

 श्यामचं नाव एका रात्रीत जगभर झालं. एक तर तो खरोखरच या सन्मानाला पात्र होता. आणि दुसरं म्हणजे, तृतीयपंथी लोकांप्रमाणे सहज हार न मानता, जिद्दीने त्याने कॉलेजशिक्षण  पुरे केले होते. 

—- आज ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला तृतीयपंथी होता.  

आज श्याम भारतात रहात नाही. त्याला मास्टरशेफ किताब  मिळाल्यावर देशोदेशी बोलावणी आली. श्यामने बँकॉक पसंत केले, जिथे त्याच्यासारख्या तृतीयपंथीयांना समाजात हीन लेखत नाहीत.

आज श्यामचे बँकॉकला मोठे स्टार हॉटेल  आहे, आणि त्यात मॅनेजरपासून ते वेटरपर्यंत फक्त आणि फक्त तृतीयपंथी लोकच काम करतात.

—  बँकॉकमधले अतिशय नावाजलेले अप्रतिम हॉटेल !! “ श्याम’स् हॉटेल !!!” 

— समाप्त —  

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -1 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?मनमंजुषेतून ?

☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -1 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

बर्‍याच दिवसांनी आम्ही सख्ख्या मैत्रिणी एकत्र जमलो होतो. गप्पांना रंग चढला होता. किती बोलू आणि काय बोलू, असं प्रत्येकीला झालं होतं. बोलता बोलता विषय निघला, ‘आपल्यावर कुठल्या व्यक्तीचा विशेष प्रभाव पडलाय?’

मी एकदम म्हंटलं, ‘मला वाटतं, माझ्यावर माझ्या सासुबाईंचा प्रभाव आहे.’ सगळ्या जणी काहीशा चकित मुद्रेने माझ्याकडे बघू लागल्या. कारण सासू-सुनेचे भावबंध तसे जगजाहीरच. जुन्या बायकांनी तर ओव्या-बिव्यातून ते शीलालेखासारखे शाश्वत केलेले. गाऊन जगजाहीर केलेले. त्यांनी म्हणूनच ठेवलय, ‘माय म्हणता म्हणता ओठालागी ओठ मिळे’ इती वर्षा. ‘आणि सासू म्हणता म्हणता काय ग?’ शुभदाची तत्पर विचारणा. ‘सासू म्हणता म्हणता ओठातून जाई वारे.’ वर्षाचं प्रत्युत्तर.

त्यातून माझ्या सासूबाई जुन्या पिढीतल्या. सोवळ्या. दोन पिढ्यात असावं, तेवढं आमच्यात अंतर. त्यातही त्या श्रद्धाळू. अगदी अंधश्रद्ध म्हणाव्या, इतक्या पराकोटीच्या सश्रद्ध, तर मी आगदी पराकोटीची तर्कवादी. त्यामुळे मैत्रिणींना आश्चर्य वाटणं स्वाभाविक होतं. मग मी म्हणाले, ‘सासू’ जर ‘माय’ झाली, तर ओठाला ओठ जुळतीलच ना! आणि ओठाला ओठ जुळल्यावर मायेचे भावबंदही तसेच घट्ट होतील! मग भले तोंडाने ‘माय’ म्हणून हाक थोडीच मारली पाहिजे? माझं लग्नं झालं, तेव्हा हल्लीसारखी सासूला ‘आहो आई’ असं म्हणायची पद्धत नव्हती. पण ही पद्धत मात्र चांगली आहे. त्यामुळे भावनिकदृष्ट्या  सासू-सून जास्त जवळ येत असतील, असं वाटतं.

‘मला असं वाटतं, माझे विचार,व्यवहार, वर्तन, दृष्टिकोन यावर माझ्या सासुबाईंचा खूप प्रभाव आहे. माझ्या लेखनावरही आहे, असं म्हंटलं, तर चूक ठरणार नाही. कारण लेखकाला काही लिहिताना व्यक्तींना खूप समजून उमजून घ्यावं लागतं. मग त्या प्रत्यक्षातल्या असोत किंवा  मनाने सृजित केलेल्या असोत. व्यक्तीचं अंतरंग जाणून घेण्याची माझ्या सासुबाईंची शक्ती अजोड होती. अंतरंग जाणून त्यातील, ’सत्व ते घ्यावे, फोल टाकोनी द्यावे.’ या वृत्तीने त्या जागल्या, बोलल्या.

माझ्या सासुबाईंचं नाव लक्ष्मी. जुन्या पिढीतील थोर लेखिका लक्ष्मीबाई केळकर यांच्याशी नामसाम्य. माझ्या सासुबाईंनी लेखन केलं असतं, तर ‘माणुसकीचे गहिवर’ सारखं पुस्तक हातून लिहून झालं असतं.

‘ऐसी कळवळ्याची जाती । लाभावीण करी प्रीती।।’ या तुकोबांच्या वचनाचं मूर्त रूप म्हणजे माझ्या सासुबाई. त्यातही त्यांचा ‘प्रीती’ करण्याचा परीघ घरातल्या माणसांपुरता मर्यादित नव्हता. सगळे जवळचे, दूरचे नातेवाईक, परिचयातले, गावातले असा तो व्यापक होता.

माझं लग्न १२ मे १९६५ ला झालं. माझे पुतणे-पुतण्या सासुबाईंना आजी म्हणत. होता होता माझे दीर – जाऊबाई, यजमान सगळेच त्यांना आजी म्हणू लागले. मग मीपण त्यांना आजीच म्हणू लागले. नाही तरी त्यांची नात यमुताई, त्यांच्या मोठ्या मुलीची, अक्काची मुलगी माझ्यापेक्षाच नव्हे, तर यांच्यापेक्षाही मोठी होती. म्हणजे तसा विचार केला, तर आमच्यात दोन पिढ्यांचं अंतर होतं. म्हणजे नात्याने नसेना का, पण वयाच्या अंतराने मी त्यांच्या नातीसारखीच झाले होते आणि त्यांनीही तशीच माया माझ्यावर केली. त्यामुळे या पुढील लेखात मी काही वेळा त्यांचा उल्लेख सासुबाई असा न करता ‘आजी’ असाच केला आहे.

माझं लग्न झालं आणि मी माधवनगरला केळकरांच्या घरात आले, तेव्हा केळकरांचं खातं-पितं घर ‘सुशेगात’ नांदत होतं. पण कधी काळी, अल्पकाळ का होईना, या घराने दारिद्रयाचे चटके सोसले होते. विपत्तीचा अनुभव घेतला होता. सासुबाईंचे यजमान गेल्यावर त्यांना आणि त्यांच्या मुलांना  गरिबीत दिवस काढावे लागले होते.

माझ्या सासुबाईंना कुणी वय विचारलं की त्या सांगत , ‘साल तितकं वय’. माझे सासरे १९४१ साली निवर्तले. म्हणजे त्या अवघ्या ४१ वर्षाच्या होत्या तेव्हा. सासर्‍यांना घरात नाना म्हणत आणि ते गावात नारायणभट म्हणून ओळखले जात. ते गेले, तेव्हा सासुबाईंच्या पदरात तीन मुली आणि दोन मुले होती. मोठ्या मुलीचे म्हणजे आक्कांचे तेवढे लग्न झाले होते. त्यांचीही परिस्थिती म्हणजे ‘एकादशीच्या घरी शिवरात्र’ अशीच. नाना सांगली संस्थानच्या गणपती पंचायतनातील विष्णु मंदिराचे पुजारी होते. त्यांची भिक्षुकी वृत्ती ( व्यवसाय) होता.

नानांचे बिर्‍हाड सांगलीच्या गावभागातील तात्या केळकरांच्या वाड्यात होते. आता सात माणसांचे कुटुंब आणि आला-गेला सांभाळत असणार्‍या एखाद्या भिक्षुकाची मिळकत किती असणार? त्यात शिल्लक किती उरणार? आक्कांच्या पाठचे दादा. ते तेव्हा दहावीत शिकत होते. त्यानंतर सुशीला, कुसुम, उषा या बहिणी, नंतर माझे यजमान अनंत. त्यांना सगळे बाळू म्हणत. ते अवघे तीन वर्षाचे होते तेव्हा. आता पुढे काय? हा प्रश्न स्वाभाविकपणे पुढे आला. ‘ आता गंगाधराने (दादांनी) शिक्षण सोडून भिक्षुकी करावी,  असेच अनेकांचे म्हणणे पडले. माझ्या सासुबाईंनी मात्र, ‘मुलाला भिक्षुक करायचे नाही. सध्या या व्यवसायाला मान-प्रतिष्ठा राहिली नाही,’ असे ठामपणे सांगितले. तरीही १० वी आणि ११वी अशी दोन वर्षे शिकत असताना दादांनी दोन देवळातली पूजा केली. देवळातला प्रसाद म्हणून दोन ताटातून भरपूर जेवण घरी यायचे. घरच्यांची एक वेळच्या का होईना, पण जेवणाची सोय व्हायची. नानांनी थोडी जमीन घेतली होती आणि ती खंडाने दिली होती. खंडाचा धान्य घरी यायचं. त्यावेळच्या रीतीप्रमाणे सासुबाईंचं केशवपन झालं. त्याबद्दल मी पुढे केव्हा तरी दादांना विचारलं, ‘तुम्ही कसं होऊ दिलत केशवपन?’ त्यावर दादा म्हणाले, ‘ तो आजींचा स्वत:चा निर्णय होता.’ कदाचित त्यांच्यावर झालेले संस्कार, तो काळ, गावातलं वातावरण, सासरे करत असलेला व्यवसाय याचा तो एकत्रित परिणाम असेल.

‘कसं चाललं होतं तुमचं तेव्हा?’ मी एकदा आमच्या कुसुमवन्संना विचारलं होतं. ‘अपरंपार कष्ट आणि अपार काटकसर या दोन चाकांवर आमचा गाडा तेव्हा चालत होता.’ त्या म्हणाल्या.

त्यावेळी कुसुमताई दहा वर्षाच्या होत्या. सुशीताई बारा वर्षाच्या असतील. कुसुमवन्स पुढे म्हणाल्या होत्या,  ‘शेजार्‍या-पाजार्‍यांच्या रेशनचं धान्य आम्ही आणून देत असू. त्यांच्या रेशनवरची बाजारी आम्ही घेत असू. आमच्या रेशनवरची बाजरीही आम्ही घेत असू. बाजरी उष्ण. त्यामुळे घरात आम्ही कुणी ती खात नसू. आमचे चुलत भाऊ गणुदादा यांना आम्ही ती देत असू. त्या बाजरीवर ते रुपयाला दहा आणे कमिशन देत असत. इतरांचं शिवण शिवून शिलाईचे पैसेही आम्ही मिळवत असू. प्रत्येक फ्रॉकला चार आणे शिलाई मिळायची. संध्याकाळी बाजार उठायच्या वेळी आई बाजारात जाई. खंडून भाजी आणे. त्याचे वाटे घालत असू. शेजारी-पाजारी विकत देत असू. त्यातच आमची भाजी सुटायची. त्या काही वर्षात आम्ही तांदूळ घरात आणलाच नाही. रेशनवर कण्यांचं पोतं मिळे. कण्यांचाच भात घरात होई.’

क्रमशः …

© सौ उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गौरव गाथा श्वानांची… भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

☆ गौरव गाथा श्वानांची… भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

इंग्लंड मधील एका खेड्यातील घडलेली घटना. मध्यरात्री पोलीस गस्त घालत होते. बरोबर  ‘ एरडेल  टेरियर’, जातीचा ‘ ब्रूस ‘ हा  कुत्रा होता. अचानक थांबून तो गुरगुरायला लागला . हुकूम मिळताच, तो जवळच्या झुडूपात गडप झाला. काही क्षणातच, एक माणूस डोक्यावर हात घेऊन ‘ ब्रुस ‘च्या पुढे आला. चपळाईने त्या माणसाने, खिशातून पिस्तूल काढले . ‘ ब्रूसच्या ‘  धोका लक्षात आला. आणि त्याने पटकन, माणसाचा पिस्तूल धरलेला हात पकडला. पिस्तूल गळून पडले त्याच्या हातातून !.आणि अखेर तो पकडला गेला. घरफोडीची बरीच हत्यारे त्याच्याजवळ सापडली. आणि अनेक गुन्हेही उघडकीस आले. ‘ ब्रूस ‘चे सर्वांनी कौतुक केले.

ग्वाटेमालाला बऱ्याच वर्षांपूर्वी रात्रीच्या वेळी मोठा भूकंप झाला. दिवस उजाडताच, पडलेल्या घरांखालील माणसे शोधायला सुरुवात झाली. तेव्हा लक्षात आले की, गावातली सगळी कुत्री गावाबाहेर पळून गेली होती. ती नंतर परत आली . आणि कुत्र्यांनीच मृत आणि जिवंत माणसांना शोधून काढले. लोकांना समजेना की, सगळी कुत्री गावाबाहेर कशी गेली? कुत्र्यांना भूकंपाची जाणीव अगोदर होते .आणि  ती दूर दूर जाऊन भुंकत राहतात. नुकत्याच  सीरिया आणि तुर्कीच्या भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताने इतर मदतीबरोबरच डॉग स्काँडही पाठवले आहे.

दुसऱ्या महायुद्ध काळात, जर्मन विमाने लंडनवर बॉम्ब वर्षाव करीत होती. अनेकदा इमारती कोसळून अनेक जण त्याखाली गाडले जात होते. अशावेळी ‘ जेट ‘ नावाच्या कुत्र्याने अनेक जणांना वाचवले. एकदा एका ठिकाणी, ‘आता येथे कोणी सापडणार नाही’ असे म्हणून,’ जेटला ‘ घेऊन पोलीस परत निघाले. पण ‘जेट ‘ परत जायला तयार होईना. एका ठिकाणी उकरून भुंकायला लागला. पोलिसांनी तेथे जाऊन आणखी थोडे उकरून पाहिले तर, एका तुळईखाली बरेच जण बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार झाले .आणि सर्वजण शुद्धीवर आले .डोळ्यात पाणी आणून सर्वांनी ‘जेटचे ‘ खूप खूप कौतुक तर केलेच ,पण  त्याचे आभार कसे मानावेत, यासाठी त्यांना शब्द सुचेनात. ‘ जेट ‘ सर्वांचा प्राण दाता ठरला.

‘रॉक अँड रोल ‘, संगीताचा भारलेला काळ होता तो. ते संगीत म्हणजे अक्षरशः वेड लावणारे होते.  लंडनमध्ये सिनेमा पाहून झाल्यानंतर प्रेक्षक रस्त्यावर, मोठमोठ्याने ओरडून नाचत सुटले .जमाव बेभान झाला. जमावाने शोकेसेस आणि दुकाने फोडायला सुरुवात केली . स्कॉटलंड यार्डचे पोलीस कुत्र्यांना घेऊन आले. कुत्र्यांना  जमावाच्या अंगावर सोडणे शक्य नव्हते. पण केवळ कुत्र्यांना पाहताक्षणीच जमाव शांत झाला. केवळ  कुत्र्यांच्याच्या हजेरीने जमावावर केवढा परिणाम झाला पहा बरं ! किमयागार म्हणावे का त्याला?.

मुंबईच्या लोकलमध्ये, एका तरुण मुलीची, दागिन्यांसाठी हत्या झाली. कळवा स्टेशनवर गाडी थांबताच काही तरुण डब्यातून उतरून गेले. पोलिसांना पत्ता लागत नव्हता. कळवा स्टेशनवर एका झाडाखाली त्यांना एक चप्पल रोड दिसला. त्यावर खाऱ्या चिखलाचे थर होते. शोध आणि तपास घेण्यासाठी पुण्याहून ‘राणी ‘ या डॉबरमन कुत्रीला आणले. तिची मदत घेतली. कळवापासून जवळच दिवा गावाजवळ असा चिखल होता. पोलीस गावात चौकशी करू लागले. ‘राणी ‘ कुत्रीला पाहून तरुण आरोपी गडबडला. घाबरला. आरोपी हा पोलिसांपेक्षा कुत्र्याला जास्त घाबरतो. त्याप्रमाणे तो पकडला गेला. त्या मुलीचे दागिने त्याने घराच्या छपरात लपवून ठेवले होते. पुढे तो आणि त्याचे साथीदारही पकडले गेले .आणि त्यांना दीर्घ मुदतीच्या शिक्षा झाल्या. राणी कर्मयोगी झाली म्हणायची ना!.

सहारा विमानतळावर हेरॉईन, अफू, ब्राऊन शुगर अशी मादक द्रव्ये प्रवासी लपवून आणतात. ज्या बॉक्समध्ये अशी द्रव्ये असतात , तो बॉक्स पाहताच  ‘हीरो’,  हा निष्णात कुत्रा पेटीकडे पाहून मोठमोठ्यांना भुंकायला लागायचा. अशा द्रव्यांचा वास त्याला कसा येतो ? ही गोष्ट कस्टम अधिकाऱ्यांनाही समजत नसे. त्याच्या आठ नऊ वर्षांच्या कारकिर्दीत ‘ हिरोने ‘, 200 कोटी रुपयांची मादक द्रव्ये शोधून काढून आपल्या  ‘ हिरो ‘ या नावाचे सार्थक करून दाखवले.

अगदी अलीकडची गोष्ट. अगदी अभिमान वाटावा अशी. जम्मू कश्मीरमधील, बारामुल्ला भागात आतंकवाद्यांना पकडण्यासाठी जवानांच्या बरोबर आणखी एक जवान  ( झूम नावाचा श्वान ) काम करीत होता. आतंकवादी एका घरात लपले होते . ‘ झूम ‘ च्या गळ्यातल्या पट्ट्यावर चीप बसविली होती. आतंकवाद्यांची माहिती घेण्यासाठी, प्रथम ‘ झूम ‘ला पाठवले गेले . जेणेकरुन ‘ झूम ‘ कोठे आहे ,हेही पट्ट्यावरील चीपमुळे कळणार होते. ‘ झूमने ‘ दोन आतंकवाद्यांना  बरोबर ओळखले .आणि त्यांच्यावर हल्ला केला . त्यांना अगदी जेरीस आणले. आतंकवादी पकडले गेले. पण प्रतिकार करताना ,एका आतंकवाद्याने  ‘ झूम ‘ वर गोळ्या झाडल्या . त्याला गोळ्या लागल्या. तरीही तो न हरता, आतंकवाद्यांशी झटतच राहिला. जखमी झाला. “. बचेंगे तो और भी लढेंगे ” असे जणू आपल्या कृतीने तो सांगत होता. त्याला श्रीनगरच्या व्हेटरनरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आठ दिवस तो उपचारांना हळुवार प्रतिसाद देत होता. पण अखेर एक ज्वलंत देशभक्त मृत्यूच्या स्वाधीन झाला. अनंतात विलीन झाला. शहिद झाला. त्याला सन्मानाने निरोप दिला.  

२६ नोव्हेंबर २००८च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात, अतिरेक्यांनी फेकून दिलेला जिवंत हॅन्ड ग्रेनेड पोलीस टीमने  “मॅक्स ” या कुत्र्याच्या साहाय्याने शोधून काढला .आणि हजारो लोकांचे प्राण वाचविले. २६/११ च्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी, त्याने बरीच थरारक कामे केली होती. हॉटेल ‘ताज ‘ च्या बाहेर तब्बल आठ किलो आरडीएक्सचा आणि २५ हँड ग्रेनेडचा शोध त्याने  घेतला होता. आणि अनेक नागरिकांचे प्राण वाचवले होते. ११ जुलै २०११ रोजी झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटादरम्यान झवेरी बाजार येथील जिवंत बॉम्ब शोधून  त्याने उल्लेखनीय असे कर्तव्य बजावले होते . सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या हस्ते ‘ मॅक्स ‘चा गौरव केला गेला. पोलीस दलातील प्रत्येकालाच ‘ मॅक्स ‘ चा लळा लागलेला होता. लाडक्या ‘ ‘मॅक्स ‘ च्या निधनाने पोलीस दलही खूप हळहळले .सर्वांनाच वाईट वाटले .

 —क्रमशः भाग पहिला

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ खोट्या गोष्टी… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ खोट्या गोष्टी… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

निरनिराळ्या लोकांनी सांगितलेल्या खोट्या गोष्टी

१) जिवलग मित्राने सांगितलेली खोटी गोष्ट- ती तुझ्याकडेच बघतेय.

२) बस कंडक्टर ने सांगितलेली खोटी गोष्ट- मागची गाडी रिकामी आहे, त्यात बसा.

३) आईबाबांनी सांगितलेली खोटी गोष्ट- फक्त दहावीपर्यंत अभ्यास कर, नंतर मज्जाच मज्जा.

४) सर्वांनीच सांगितलेली खोटी गोष्ट- घर, गाडी आपण एकदाच घेतो, त्यामुळे पैशाचा विचार करू नको.

६) नव्याने नोकरीला लागलेल्या मित्राने सांगितलेली खोटी गोष्ट- पगार कमी आहे, पण शिकायला खूप मिळतं.

७) बॉसने प्रमोशन नाकारताना सांगितलेली खोटी गोष्ट- मी तुझ्यासाठी खूप भांडलो, पण काही उपयोग झाला नाही.

८) मुलगी बघायला गेल्यावर सासरच्यांनी सांगितलेली खोटी गोष्ट- आमची मुलगी खूप शांत स्वभावाची आहे.

९) मुलाने लग्नाआधी मुलीला सांगितलेली खोटी गोष्ट- मी Occasionally ड्रिंक्स घेतो.

१०) पारितोषिक वितरणाच्या वेळी परीक्षकांनी सांगितलेली खोटी गोष्ट- माझ्यासाठी सर्वच जण विजेते आहेत.

११) कपड्याच्या दुकानातील सेल्समनने सांगितलेली खोटी गोष्ट- हा रंग तुमच्यावर उठून दिसतो.

१२) “टेबल पार्टनर” ने सांगितलेली खोटी गोष्ट- बिअर म्हणजे दारू नव्हे.

आणि सर्वात कळस म्हणजे

१३) नवर्‍याने बायकोला सांगितलेली खोटी गोष्ट

– तू माहेरी गेलीस की मला मुळीच चैन पडत नाही.

सर्वच खोटं ..पण खरंय..

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ झाला फांदीचा चमचा… ☆ श्री प्रमोद जोशी ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  झाला फांदीचा चमचा…  ?  श्री प्रमोद जोशी ☆

झाला फांदीचा चमचा,

नवनीत झाले ढग!

अशा लोण्याच्या ओढीने,

झाले बालकृष्ण जग!

कृष्ण रांगत येणार,

आली चमच्या पालवी!

अशा चित्रामुळे कळे,

जग कन्हैय्या चालवी!

निळ्या अनंतासमोर,

असे दिसताच लोणी!

सांगा बालकृष्णाविणा,

दुजे आठवे का कोणी?

चराचर बघे वाट,

कुठुनही यावा कान्हा!

निळ्या निळ्या आकाशाला,

पुन्हा पुन्हा फुटो पान्हा!

धुके लावी विरजण,

वारा घुसळतो दही!

निळ्या कागदावरती,

फांदी..ईश्वराची सही!

लोण्यावर किरणांची,

आहे नजर तेजस्वी!

वाट पहात कान्ह्याची,

त्यांची प्रतिक्षा ओजस्वी!

अनंताच्या भुकेसाठी,

घास व्यापतो आकाश!

सूर्य निरांजन होतो,

मग सात्विक प्रकाश!

चित्रकारा नमस्कार,

त्याची दृष्टी शोधी दिव्य!

साध्या फांदी नि ढगाना,

गोकुळाचे भवितव्य!

© श्री प्रमोद जोशी

देवगड.

9423513604

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आतिश का तरकश #177 – 63 – “हमने तो शिद्दत से निभाए तुमसे रिश्ते…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी  ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं ।प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकशआज प्रस्तुत है आपकी ग़ज़ल “हमने तो शिद्दत से निभाए तुमसे रिश्ते…”)

? ग़ज़ल # 63 – “हमने तो शिद्दत से निभाए तुमसे रिश्ते…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ?

जब मुलाकात हुई तो की बेकार की बात,

कर लेते तुम हमसे थोड़ी प्यार की बात।  

क्यों बदलती इश्क़ की तासीर मौसम जैसी,

कभी इनकार की तो कभी इकरार की बात।

पास आकर बैठो कभी तो फ़ुरसत से तुम,

ताज़ा कर लें हम पहले इज़हार की बात।

हमने तो शिद्दत से निभाए तुमसे रिश्ते,

हमेशा परवान चढ़ी है दिलदार की बात।

मेरी बातें तुम अक्सर क्यों भूल जाते हो,

मगर याद रहती तुम्हें रिश्तेदार की बात। 

कीमतें चीजों की यूँ ही नहीं गिरती-चढ़तीं,

सियासत तय करती शेयर बाजार की बात।

फ़कत वादों के दम पर ज़िन्दगी नहीं चलती,

आतिश अक्सर सच लगी मयख्वार की बात।

© श्री सुरेश पटवा ‘आतिश’

भोपाल, मध्य प्रदेश

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – कथा-कहानी ☆ अतीत की खिड़की से रुपहली धूप – भाग – 2 ☆ डॉ अमिताभ शंकर राय चौधरी ☆

डॉ अमिताभ शंकर राय चौधरी

(डॉ अमिताभ शंकर राय चौधरी जी एक संवेदनशील एवं सुप्रसिद्ध साहित्यकार के अतिरिक्त वरिष्ठ चिकित्सक  के रूप में समाज को अपनी सेवाओं दे रहे हैं। अब तक आपकी चार पुस्तकें (दो  हिंदी  तथा एक अंग्रेजी और एक बांग्ला भाषा में ) प्रकाशित हो चुकी हैं।  आपकी रचनाओं का अंग्रेजी, उड़िया, मराठी और गुजराती  भाषाओं में अनुवाद हो  चुकाहै। आप कथाबिंब ‘ द्वारा ‘कमलेश्वर स्मृति कथा पुरस्कार (2013, 2017 और 2019) से पुरस्कृत हैं एवं महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा द्वारा “हिंदी सेवी सम्मान “ से सम्मानित हैं।)

☆ कथा-कहानी ☆ अतीत की खिड़की से रुपहली धूप – भाग – 2 ☆ डॉ अमिताभ शंकर राय चौधरी

दो चार चिठ्ठिओं के बाद एक और चिठ्ठी पूर्णिमा पढ़ रही थी …‘‘यह भी कैसी विडंबना है! सारा किया कराया मेरा है, मगर सारी मुसीबतें तुम्हें झेलनी पड़ रही है। अकेले। तुम्हें उल्टी करते देख मैं तो घबड़ा ही गया था। कहीं पीलिआ सिलिया न हो जाए! मगर भाभी ने मुझे चिकोटी काटते हुए कहा था,‘‘यह रोग तो तुम्हीं ने लगाया है।’’ अब कैसी हो? वहाँ जाकर क्या ऐसे ही सब ठीक हो गया? अच्छा, तो हमारे ही यहाँ तुमको जितनी तकलीफें हैं? मायका तो स्वर्ग का और एक नाम है – क्यों? अच्छा, मुन्ना होगा तो उसका नाम क्या रखोगी ?और अगर बेटी हुई तो? दोनों नाम सोच कर रखना …।’’

धूप के साथ छाँव, तो सुख के साथ दुख भी। अम्माजी की एक चिठ्ठी में कुछ वैसी ही बातें-। ‘‘अब इसमें मेरा क्या दोष है? मिथलेश चाची मुझे ही कोस रही थी ‘‘बहू आयी, साल बीता नहीं कि लगी लगायी नौकरी छूट गयी।’’ ‘‘मेरी ही किस्मत फूटी है, तो मैं क्या करूँ?’’

इसके जवाब में हृदयनारायण -‘‘लो, उस दिन तो तुम अपनी किस्मत पर रो रही थी। अब? वो नौकरी गयी, तभी न मैं एड़ी चोटी एक करके यहाँ से वहाँ दौड़ता रहा। देखो, पाँच महीने के अंदर मुझे लेक्चरर का पोस्ट मिल गया। अब मैं शान्ति से डाक्टरेट भी पूरा कर लूँगा। तो?

अब पूर्णिमा चिठ्ठिओं को सहेजने लगी।

‘‘क्या कर रही हो दीदी?’’

‘‘कहीं बाबूजी अम्माजी वापस आ जायें तो -?’’

‘‘चोरी तो नहीं की है, डाका तो नहीं डाला। हंगामा है क्यूॅ ?’’अनामिका खिलखिलाने लगी,‘‘बस, प्रेमपत्र ही तो पढ़ रही हूँ -’’

‘‘यह चोरी नहीं तो और क्या है?’ ’चॉदनी ने उसे कसके चिकोटी काट दी।

‘‘ऊफ् माँ! दीदी, दीदी जरा देखो न अम्माजी के मधुशाला में और कितना नशा है? इसे – इसे पढ़ो !’’

कई साल के अन्तराल के बाद की चिठ्ठी थी। तीनों संतानें हो गई थीं …….

‘‘देखिए, जल्दी जल्दी में मैं मुन्नी का फ्राक उतार ले आना भूल ही गई। छत पर पड़ा है। बंदर फाड़ न दे। मिठाई से कह कर बच्चों का ड्रेस इस्तिरी करवा दीजिएगा …’’

‘‘लो, चिठ्ठी में बंदर से लेकर धोबी सबका जिक्र है। मगर -’’अनामिका के अरमान का गुब्बारा फुस्स् हो गया, ‘‘आगे क्या है?’’

‘‘भूलिएगा नहीं। बाबूजी की दवा रात में दे दीजिएगा। और अम्माजी रोज रोज पूड़ी कचौड़ी न बनायें। अब इस उमर में बाबूजी के लिए ये सब ठीक नहीं हैं। वैसे आपका मना करना भी तो शोभा नहीं देगा। लगेगा मैं सीखा पढ़ा कर आयी हूँ। मगर ख्याल रहे उनको दिल की बीमारी है। ….’’

‘‘दिल का हाल सुने दिलवाला -उसका क्या होगा, नायिके ?’’

‘‘कल सारी रात छुटकी रोती रही -’’दोनों भाभिओं ने ननद की ओर देखा -‘‘शायद पेट में दर्द हो रहा था। पेट में गैस वैस हो गया था -’’

‘‘छिः!’ ’सशक्त विरोध पक्ष में चाँदनी -‘‘अब यह सब नहीं पढ़ना है। वह मेरे पेट में दर्द था या कान में – कैसे मालूम ?’’

‘‘हाँ, हाँ, तुझे तो आज तक सब याद है!’’ बड़ी भाभी ने ननद की खिंचाई की।

‘‘बन्दर और दवा से लेकर गैस तक सब हैं। मगर -‘दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा….’। कहाँ सोचा था ‘फूलों के रंग से दिल की कलम से कुछ बातें लिखीं होगी…’’

इतने में बेल बजी। तीनों चोर जोर से चौंक गयीं -‘‘अरे बापरे! कितना बजा? अल्मारी बन्द कर।’’ दोनों देवरानियॉ जल्दी जल्दी चिठ्ठियॉ सहेजने लगीं।

चाँदनी ने बरामदे से देखा, ‘‘अम्मा और बाबूजी आये हैं।’’

पूर्णिमा ऑचल के नीचे एक पुलिंदा दबा कर भागी नीचे – दरवाजा खोलने। इसके पास मानिनी की चिठ्ठियां थीं।

उधर अनामिका के हिस्से में हृदयनारायण की पत्रावली आ गयीं। उन्हें सिल्क के कपड़े में लपेट कर झट से अपने बिस्तर के नीचे दबा दिया।

दो तीन दिन ऐसे ही बीत गये…। फिर एक दिन शाम की चाय के बाद तीनों की महफिल जम उठी। चोरी करना आसान है। मगर चोरी का सामान लौटाना सचमुच मुश्किल काम होता है। अब चिठ्ठिओं को यथास्थान यथावत् रखना भी तो था। सबने सोचा अम्माजी जब बाथरुम जायेंगी तो सबकी पुनः स्थापना कर दी जायेगी। तभी अनामिका ने पूछा, ‘‘दीदी, तुमने भी अम्माँजी की बाकी चिठ्ठियॉ पढ़ ली कि नहीं ?’’

‘‘हाँ, कुछ कुछ……’’

‘‘देखो न, बुआजी की शादी के समय अम्मां को शायद एक नीले रंग की पटोला साड़ी बहुत ही पसन्द आ गयी थी। मगर इतने ढेर सारे खर्च को देखते हुए बेचारी ने मन की साध मन में ही दबा ली। बाबूजी को किसी से पता चल गया था। एक चिठ्ठी में उसी बात का अफसोस कर रहे थे कि मैं तुमको वह साड़ी पहना न सका। उसके बाद भी इतनी सारी चीजें खरीदी गयीं – उससे महॅँगी भी – मगर गृहस्थी के बजट में उसका फिर नाम न आया। बाबूजी माताजी को वही साड़ी पहनाना चाहते थे।’’

‘‘हाँ रे! उसी तरह माताजी की एक चिठ्ठी में भी है’’

जब चाँदनी के भैया लोग छोटे थे, तो इन्हें और दादा दादी को लेकर बाबूजी और अम्मां केदारनाथ बद्रीनाथ की यात्रा पर गये थे। पर गौरीकुंड पहुंचकर दादी की तबिअत काफी खराब हो गई। सो बाबूजी वहीं बैठे माँ की सेवा करते रहे। मजबूरन अम्माजी को बच्चों को लेकर दादाजी के साथ आगे चले जाना पड़ा। बस, वही बात अम्मांजी को सालती रही कि जिसकी इच्छा इतनी थी वही जा न सका। फिर दोबारा उधर का कार्यक्रम बन भी न सका।’’

तीनों चुप बैठी कुछ सोच रही थीं ……

आखिर पूर्णिमा बोली,‘‘क्यों रे छोटी, हम भी तो अपने सास ससुर के लिए कुछ कर सकती हैं। क्यों न बाबूजी और अम्माजी को एकसाथ फिर वहीं ले चलें। आज ही मैं तेरे बड़े भैया से बात करती हूँ।’’

‘‘हाँ, दीदी, और मैं अम्मा के लिए वही पटोला सिल्क की साड़ी खरीदूँगी। नीले रंग की।’’

अचानक चाँदनी उठ खड़ी हुई और दोनों भाभिओं के गाल चूम लिये …

कुछ दिनों बाद…

रेल टिकट को देख कर हृदयनारायण हॅँसने लगे, ‘‘यह तो मेरी कब की इच्छा थी। चलो, बेटे बहुओं ने पूरी कर दी। मैं तो भाई भाग्यवान हूँ -’’

‘‘और अम्मां, आप यही साड़ी पहन कर दर्शन करने जाइयेगा!’’ अनामिका ने सास के हाथों में वह साड़ी रख दी।

‘‘अरे! यह तू कैसे ले आई? सालों पहले ऐसी ही एक साड़ी पर मेरा मन आ गया था। मगर तेरे बाबूजी क्या करते? वो हो नहीं पायी। फिर भी, अब इस उमर में इसे पहनूँ ? छिः! लोग क्या कहेंगे?’’

‘‘नहीं अम्माँजी, आपको पहननी पड़ेगी! मन की साध अधूरी क्यों रहे? पूरी कर लीजिए …!’’

अचानक हृदयनारायण कुछ सोचने लगे, ‘‘मुन्ने की अम्मां, यह बताओ हम दोनों की असाध एक साथ इन्हें कैसे मालूम पड़ गयीं ? तुमने तो कभी कुछ नहीं बताया?’’

‘‘पागल हैं क्या? मैं क्यों बताने गयी?’’

‘‘तो?’’ हृदयनारायण दोनों बहुओं की ओर एकटक देखने लगे, ‘‘तुम लोगों को कैसे मालूम हुआ -?’’

दोनों अपराधी ऑँचल से मुँह दाब कर हॅँस रही थीं। चाँदनी ने ऑँखें नीची कर ली।

मानिनी के मन में क्या हुआ कि अचानक उठ कर गयीं और अपनी ड्रेसिंग टेबुल की अल्मारी को खोल कर उन्होंने देखा। बस, उल्टे पाँव सिर पीटते हुए वापस आ गयीं, ‘‘छिः! सत्यानाशी! तुम दोनों ने हमारी चिठ्ठी पढ़ी थी?’’

‘‘जाकर थाने में खबर करो!’’ हृदयनारायण चिल्लाकर बेटे को बुलाने लगे, ‘‘मुन्ना !जरा छत से बन्दर भगानेवाली लाठी तो लेते आ -’’

दोनों चोर घूँघट में मुँह छुपा कर हँसते हुए भाग खड़ी हुईं…।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© डॉ. अमिताभ शंकर राय चौधरी

नया पता: द्वारा, डा. अलोक कुमार मुखर्जी, 104/93, विजय पथ, मानसरोवर। जयपुर। राजस्थान। 302020

मो: 9455168359, 9140214489

ईमेल: [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – सदाशिव ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ आपदां अपहर्तारं ☆

आज महादेव साधना महाशिवरात्रि तदनुसार 18 फरवरी को सम्पन्न होगी।

💥 इस साधना में ॐ नमः शिवाय का मालाजप होगा, साथ ही गोस्वामी तुलसीदास रचित रुद्राष्टकम् का पाठ भी करेंगे 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

? संजय दृष्टि – सदाशिव ??

🕉️ ई-अभिव्यक्ति के सभी पाठकों को महाशिवरात्रि की हृदय से मंगलकामनाएँ। इस निमित्त आज प्रस्तुत है, ‘संजय उवाच’ के एक आलेख का पुनर्पाठ। 🙏

एक बुजुर्ग परिचित का फोन आया। बड़े दुखी थे। उनके दोनों शादीशुदा बेटे अलग रहना चाहते थे। बुजुर्ग ने जीवनभर की पूँजी लगाकर रिटायरमेंट से कुछ पहले तीन बेडरूम का फ्लैट लिया था ताकि परिवार एक जगह रह सके और वे एवं उनकी पत्नी भी बुढ़ापे में सानंद जी सकें। अब हताश थे, कहने लगे, क्या करें, परिवार में सबकी प्रवृत्ति अलग-अलग है। एक दूसरे के शत्रु हो रहे हैं। शत्रु साथ कैसे रह सकते हैं?

बुजुर्ग की बातें सुनते हुए मेरी आँखों में शिव परिवार का चित्र घूम गया। महादेव परम योगी हैं, औघड़ हैं पर उमापति होते ही त्रिशूलधारी जगत नियंता हो जाते हैं। उनके त्रिशूल में जन्म, जीवन और मरण वास करने लगते हैं। उमा, काली के रूप में संहारिणी हैं पर शिवप्रिया होते ही जगतजननी हो जातीहैं। नीलकंठ अक्षय चेतनतत्व हैं, गौरा अखंड ऊर्जातत्व हैं। परिवार का भाव, विलोम को पूरक में बदलने का रसायन है।

शिव परिवार के अन्य सदस्य भी इसी रसायन की घुट्टी पिये हुए हैं। कार्तिकेय बल और वीरता के प्रतिनिधि हैं। वे देवताओं के सेनापति हैं। श्रीगणेश बुद्धि के देवता हैं। बौद्धिकता के आधार पर प्रथमपूज्य हैं। सामान्यत: विरुद्ध गुण माने जानेवाले बल और बुद्धि, शिव परिवार में सहोदर हैं। अन्य भाई बहनों में देवी अशोक सुन्दरी, मनसा देवी, देवी ज्योति, भगवान अयप्पा सम्मिलित हैं पर विशेषकर उत्तर भारत में अधिकांशत: शिव, पार्वती, श्रीगणेश और कार्तिकेय ही चित्रित होते हैं।

अब परिवार में सम्मिलित प्राणियों पर भी विचार कर लेते हैं। महाकाल के गले में लिपटा है सर्प। गणेश जी का वाहन है, मूषक। सर्प का आहार है मूषक। सर्प को आहार बनाता है मयूर जो कार्तिकेय जी का वाहन है। महादेव की सवारी है नंदी। नंदी का शत्रु है गौरा जी का वाहन, शेर। संदेश स्पष्ट है कि दृष्टि में एकात्मता और हृदय में समरसता का भाव हो तो एक-दूसरे का भक्ष्ण करने वाले पशु भी एकसाथ रह सकते हैं।

एकात्मता, भारतीय दर्शन विशेषकर संयुक्त परिवार प्रथा के प्रत्येक रजकण में दृष्टिगोचर होती रही है। पिछली पीढ़ी में एक कमरे में 8-10 लोगों का परिवार साझा आनंद से रहता था। दाम्पत्य, जच्चा-बच्चा सबका निर्वहन इसी कमरे में। स्पेस नहीं था पर सबके लिए स्पेस था। जहाँ करवट लेने की सुविधा नहीं थी, वहाँ किसी अतिथि के आने पर आनंद मनाने की परंपरा थी, पर ज्यों ही समय ने करवट बदली, परिजन, स्पेस के नाम पर फिजिकल स्पेस मांगने लगे। मतभेद की लचीली बेल की जगह मनभेद के कठोर कैक्टस ने ले ली। रिश्ते सूखने लगे, परिवारों में दरार पड़ने लगी।

सूखी धरती की दरारों में भीतर प्रवेश कर उन्हें भर देती हैं श्रावण की फुहारें। न केवल दरारें भर जाती हैं अपितु अनेक बार वहीं से प्राणवायु का कोश लेकर एक नन्हा पौधा भी अंकुरित होता है।…श्रावण मास चल रहा है, दरारों को भरने और शिव परिवार को सुमिरन करने का समय चल रहा है। यह शिव भाव को जगाने का अनुष्ठान-काल है।

भगवान शंकर द्वारा हलाहल प्राशन के उपरांत उन्हें जगाये रखने के लिए रात भर देवताओं द्वारा गीत-संगीत का आयोजन किया गया था। आधुनिक चिकित्साविज्ञान भी विष को फैलने से रोकने के लिए ‘जागते रहो’ का सूत्र देता है। ‘शिव’ भाव हो तो अमृत नहीं विष पचाकर भी कालजयी हुआ जा सकता है। इस संदर्भ में इन पंक्तियों के लेखक की यह कविता देखिए,

कालजयी होने की लिप्सा में,

बूँद भर अमृत के लिए

वे लड़ते-मरते रहे,

उधर हलाहल पीकर

महादेव, त्रिकाल भए..!

शिव भाव जगाइए, सदाशिव बनिए। नयी दृष्टि और नयी सृष्टि जागरूकों की प्रतीक्षा में है।

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ “श्री हंस” साहित्य # 55 ☆।।सच्चा रिश्ता एक अनमोल अमानत  होता है।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस”☆

श्री एस के कपूर “श्री हंस”

(बहुमुखी प्रतिभा के धनी  श्री एस के कपूर “श्री हंस” जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त अधिकारी हैं। आप कई राष्ट्रीय पुरस्कारों से पुरस्कृत/अलंकृत हैं। साहित्य एवं सामाजिक सेवाओं में आपका विशेष योगदान हैं।  आप प्रत्येक शनिवार श्री एस के कपूर जी की रचना आत्मसात कर सकते हैं। आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण मुक्तक ।। सच्चा रिश्ता एक अनमोल अमानत  होता है।।)

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ “श्री हंस” साहित्य # 55 ☆

☆ मुक्तक  ☆ ।। सच्चा रिश्ता एक अनमोल अमानत  होता है।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस” ☆ 

[1]

सच्चे  रिश्तों  के  लिए एहसास जरूरी  है।

हर   रिश्ते  को  मानना  खास  जरूरी  है।।

दिल   से  दिल  का  तार   मिला कर चलो।

रिश्तों में और कुछ नहीं विश्वास जरूरी है।।

[2]

दोस्ती  का  अपना  एक  अंदाज  होता  है।

हर  सवाल का  देना      जवाब  होता  है।।

दोस्ती खून का नहीं  है यकीन का रिश्ता।।

ये एक रिश्ता हर एक से लाजवाब होता है।।

[3]

कभी अपने के आंख में आंसू न आने देना।

कभी किसी दोस्त को यूं मत गवानें देना।।

प्रेम की  नाजुक डोरी बहुत  होती मजबूत।

कभी  इस पर कोई दाग मत लगाने देना।।

[4]

सच्चा रिश्ता प्रभु की दी हुई नियामत होता है।

आपकी  खुशियों  की  वह  जमानत होता है।।

दोस्ती  कभी   टिकती  नहीं बिना निभाने के।

रखना संभाल कि अनमोल अमानत होता है।।

© एस के कपूर “श्री हंस”

बरेली

ईमेल – Skkapoor5067@ gmail.com

मोब  – 9897071046, 8218685464

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ काव्य धारा # 119 ☆ ग़ज़ल – “दिखते जो है बड़े उन्हें वैसा न जानिये…” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध

(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी  द्वारा रचित एक ग़ज़ल – “दिखते जो है बड़े उन्हें वैसा न जानिये…” । हमारे प्रबुद्ध पाठकगण  प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी  काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे।) 

☆ काव्य धारा #119 ☆  ग़ज़ल  – “दिखते जो है बड़े उन्हें वैसा न जानिये…” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

अब आ गई है दुनिया ये ऐसे मुकाम पै

जो खोखला है, बस टिका है तामझाम पै।।

दिखते जो है बड़े उन्हें वैसा न जानिये

कई तो बहुत ही बौने हैं पैसे के नाम पै।।

युनिवर्सिटी में इल्म की तासीर नहीं है

अब बिकती वहाँ डिग्रियाँ सरेआम दाम पै।।

आफिस हैं कई काम पै होता नहीं कोई

कुछ लेन देन हो तो है सब लोग काम पै।।

बाजारों में दुकानें है पर माल है घटिया

कीमत के हैं लेबल लगे ऊँचे तमाम पै।।

नेता है वजनदार वे रंगदार जो भी है

रंग जिनका सुबह और है, कुछ और शाम पै।।

तब्दीलियों का सिलसिला यों तेज हो गया

विश्वास बदलने लगे केवल इनाम पै।

सारी पुरानी बातें तो बस बात रह गई

अब तो सहज ईमान भी बिकता है दाम पै।।

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

ए २३३ , ओल्ड मीनाल रेजीडेंसी  भोपाल ४६२०२३

मो. 9425484452

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares
image_print