मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘ऋणमुक्त’ – भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ ‘ऋणमुक्त’ – भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये

बेलीफचं ते चार ओळींचं पोस्टकार्ड माझ्या उत्साहावर विरजण ओतायला पुरेसं होतं. एका हुकूमनामा मिळालेल्या कर्जखात्यातील जामिनादारावर अटक वाॅरंट बजावण्यासाठी बॅंकेमार्फत मला केळघर ग्रामपंचायतीत हजर रहायला सांगणारं ते पत्र!

कामाच्या घाईगर्दीतला एक अख्खा दिवस कर्जवसुलीची कांहीही आशा नसलेल्या एका खात्यासाठी  फुकट घालवायचा ही कल्पना मनाला पटणारी नव्हतीच. पण कायद्याचा एकदा उगारलेला बडगा कोणत्याही आदेशाविना शेवट गाठण्याआधी केवळ माझ्या इच्छे न् मतानुसार आवरणं बँकेच्या नियमात बसणारं थोडंच होतं?

मला जाणंच भाग होतं.   

बेलीफच्या पत्रानुसार मी दहा वाजता ग्रामपंचायतीच्या ऑफिसमधे हजर रहाणं आवश्यक होतं. पण मी गेलो साडेनऊ वाजताच. कारण ‘बेलीफ’या व्यक्तीपासून मी आधीपासूनच सावध रहायचं ठरवलं होतं.  त्याला कारणही तसंच होतं.  जिथे जायचं त्यांना आधीच भेटून, वर्दी देऊन त्यांच्याकडून बक्षिसी उकळायचं त्यातील काहींचं तंत्र आणि कसब राष्टीयकृत बॅंकेचा मॅनेजर म्हणून मला ऐकून माहिती होतं. आज इथेसुध्दा संशयाला जागा होतीच. कारण माझ्या आधीच बेलीफ हजेरी लावून कामानिमित्त बाहेर गेल्याचं ग्रामपंचायतीच्या ऑफिसमधून मला समजलं आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात जाऊन भिनली.  सहजासहजी आपली अशी फसवणूक करायचा त्याचा प्रयत्न असल्याचा संशय मला तिडीक यायला पुरेसा होता. पण डोक्यात राख घालून चालणार नव्हतं.  मी शांत रहायचं ठरवलं.  आता एक तर पुरेसा पुरावा नसताना चिडून संतापून उपयोग नव्हताच.  त्यामुळे त्याच्या कलाने घेणे माझ्या दृष्टीनं सोयीचंच नव्हे तर

आवश्यकसुद्धा होतंच. पाच-दहा रुपयांसाठी स्वत:चं इमान विकायचीही तयार असणाऱ्या या माणसाची मला आता किंव वाटू लागली.

पुढे अर्ध्या-पाऊण तासानंतर बेलीफ आला.

धोतर, वर पांढराच पण मळकट शर्ट,डोक्यावर कळकट टोपी,तोंडात पानाचा तोबरा, ओबडधोबड मातकट चेहऱ्यावरचे दाढीचे खुंट,आणि हातात लोंबती पिशवी. तो माझ्याकडेच पहात थोडा घुटमळलाय हे लक्षात येताच सावध अंदाजानेच त्याच्याकडे पाहून मी ओझरता हसलो.

“मॅनेजर सायब का ?”

“हो. तुम्ही बेलीफ?तुम्ही तर मघाशीच आला होतात ना?”

“हां.. म्हंजी.. तुमच्या म्होरं घटकाभर आधी तर आलोतो.. पन.. ”  

“मग गावात गेला होतात कां?”

तो बावचळला.

“हा़.. म्हंजी काम हुतं वाईच”

“नाना कुलकर्ण्यांकडे ?” मी वर्मावर बोट ठेवल्यासारखं तो दचकलाच एकदम.. थुंकायचं निमित्त करून मला नजर द्यायचं टाळत त्याने मान वळवली.

“म्हंजे त्ये मास्तर व्हय. ? अवं तेंच्याकडं आत्ता तुमच्यासंगट जायचं नव्ह का.. “तो सव्वाशेर निघाला होता. मी स्वतःशीच हसलो. गप्प बसलो. रस्त्यातून जाताना मी विचारलेल्या प्रश्नांना तो न अडखळता मुद्देसूद उत्तरे देत होता.

“नाना कुलकर्णी असतील, भेटतील का हो घरी?”

“व्हय तर. जात्यायत कुटं?हांतरुन सोडता याय नगं?”

“म्हणजे?”

“अवं समद्या हातापायाच्या काटक्या झाल्यात. वाळून कोळ झाल्यालं म्हातारं मानूस त्ये. दिस मोजत पडून आसतंय. “

“अस्सं? मग त्याना अटक कशी करायची. ?”

“आता कायदा म्हणतोय न्हवं अटक करा म्हणून..  आपण करायची. अवं ही काय फौजदारी अटक हाय का ?सादी शिव्हील अटक ही. ततं जायाचं. त्येना म्हनायचं,’मी बेलीफ. ह्ये बॅंकेचं सायब. आन् ह्ये कोरटाचं वारंट. नाना भिकू कुलकरनी , आमी तुमाला अटक केलीय. ‘ त्ये व्हय म्हनतील. पन त्यो वाळका ओंडका उचलून न्याचा कसा न् ठिवायचा कुटं?म्हनून मंग अटकंचा पंचनामा करायचा. त्येचा कोर्टात रिपूर्ट लिवायचा. मंग कोर्ट नोटीस काढंल,पुलीस धाडंल. त्ये समद त्येंचं काम.  कोर्टात हजर नाही झालं तर  पुलीस त्यांना बेड्या घालून नील. त्ये समदं त्येंचं काम. आपनाकडं त्येचं काय नाय. “

मी ऐकत होतो. कायदा कोळून प्यालेला तो बेलीफ किती निर्विकारपणानं सांगत होता सगळं! माझ्या नजरेसमोर अंथरुणाला खिळलेली,शेवटच्या घटका मोजणारी, नाना भिकू कुलकर्णींची कृश मूर्ती नकळत तरळून गेली… माझ्याकडे केविलवाण्या नजरेने पहाणारी.. दयेची भीक मागणारी..

“हं.., चला हतंच. “

एका पडक्या वाड्यापुढे आम्ही उभे होतो. अवशेषांच्या रुपात डुगडुगत कसाबसा उभा असणारा दिंडीदरवाजा.. वाळवीनं पोखरलेलं त्यावरचं नक्षीकाम..  पुढचा कोंदट अरुंद बोळ..  वाटेतला गंजका नळ..  धुण्याच्या दगडाजवळची सुकलेली केळ.. वाळून गेलेला आळू..  जांभळाचं वाळत चाललेलं म्हातारं झाड..

भुसभुशीत भिंतीच्या आधारानं कसंबसं तग धरुन उभ्या असणाऱ्या दारांच्या चौकटीला धक्का न लावता, बेलीफ अलगद आत शिरला.  मी घुटमळत बाहेरच उभा राहिलो.

“साहेब, या..आत या” बेलीफ म्हणाला. मी आत गेलो.. पण त्या टिचभर खोलीत टेकायला जागाच नव्हती.. !

क्रमशः…

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ … माणसाळलेली चाळ … सुश्री नीलिमा जोशी ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

 ☆ … माणसाळलेली चाळ … सुश्री नीलिमा जोशी ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

नेहाशी, फोन  वर  बोलत  होते. “आई, तुम्ही सांगितलं तश्या  कापसाच्या गाद्या बनवून  घेतल्या हं.”

“बरं केलंत… इतक्या लहान  वयात  कसली  ती पाठदुखी आणि कंबरदुखी.!!”””मी म्हटलं..

इकडचं तिकडचं बोलून मी फोन  ठेवला—-

—-आणि  त्या कापसाच्या सुतावरून चक्क आमच्या चाळीत पोहोचले .

मला  तो खांद्यावर  काठी  टाकून धनुष्यासारखी  दोरी ताणत  “एक विशिष्ट  टिंग टिंग “आवाज  करीत  चाळीत  शिरणारा लखन आठवला … कापूस पिंजून गाद्या शिवून  देणारा. शिवाजी  पार्कच्या १३० बिऱ्हाडं असलेल्या चाळीत  तो रोज यायचा . एकही दिवस  असा नाही जायचा  की त्याला काम नाही मिळालं…

.. माझ्या चाळीतल्या आठवणी  “चाळवल्या  “गेल्या… 

कित्ती लोकं यायची सकाळपासून !!!!

आता सोसायटी किंवा कॉम्प्लेक्समधेही  सकाळपासून माणसं येत असतात. पण ती “स्विगी” ची, नाही तर  “झोमॅटो”ची.  नाहीतर  “amazon, myntra, etc. ची.   कुठल्याही वेळी आणि बिन चेहऱ्याची , अनोळखी माणसं..

खरं  तर  इमाने इतबारे, कष्टाने  इकडची  वस्तू तिकडे “पोचवण्याचं  ” काम करीत  असतात बापडी.

पण मनात  “पोहोचू  “शकत  नाहीत.

याउलट  साठ सत्तरच्या दशकात चाळीत बाहेरून येणारी माणसं कधी आपलीशी  होऊन मनापर्यंत  पोहोचली  कळलंच  नाही.

सकाळची  शाळा असायची. रेडिओ  वर मंगल  प्रभात सुरू असायचे . त्याच वेळी हातात झांजा आणि चिपळ्या घेतलेल्या “वासुदेवाची ” Entry व्हायची. तेव्हढ्या ” घाईतही  त्याला दोन पैसे  द्यायला धावायचो ..

रोज नाही यायचा  तो. पण त्याच्या विचित्र पोशाखाचं  आणि गाण्याचं वेड होतं आम्हाला…

कधी  एक गृहस्थ  यायचे . भगवी  वस्त्र ल्यायलेले. हातात कमंडलू असायचं. तोंडाने “ॐ, भवती  भिक्षां देही “असं म्हणत  सगळ्या चाळीतून  फिरायचे, कोणाच्याही दारात थांबायचे नाहीत की काही मागायचे ही नाहीत.

मी आईला  कुतूहलाने विचारायचे, “ ह्यांचाच  फोटो असतो का रामरक्षेवर ? “

आठवड्यातून  एकदा घट्ट  मुट्ट, चकाकत्या  काळ्या रंगाची  वडारीण  यायची . “जात्याला, पाट्याला टाकीय,…”

अशी  आरोळी  ठोकत . जातं नाही तरी  पाटा घरोघरी  असायचाच . त्यामुळे दिवसभर  तिला काम मिळायचंच .

तिची  ती विशिष्ट पद्धतीने  नेसलेली साडी.. अंगावर  blouse  का घालत  नाही याचं आमच्या  बालमनाला  पडलेलं कोडं असायचं. (हल्लीची  ती कोल्ड shoulder आणि  off shoulder ची  फॅशन  यांचं  चित्र बघून आली  की काय?)

हमखास  न चुकता  रोज येणाऱ्यांमध्ये मिठाची  गाडी असायची . “मिठ्ठाची  गाडी आली , बारीक मीठ,

दहा  पैसे  किलो, दहा  पैसे  “!!!!  ही त्याची हाक ऐकली  की आम्ही पोरं उगीच त्याच्या गाडीमागून फिरायचो. 

तसाच  एक तेलवाला यायचा . कावड  असायची  त्याच्या खांद्यावर . दोन बाजूला दोन मोठ्ठे डबे . एकात खोबरेल  तेल एकात गोडं तेल. घाणीवरचं.. तेलाच्या घाणी एवढाच  कळकटलेला  आणि  तेलकट.. ढोपरापर्यंत  घट्ट  धोतर ., कधीकाळी पांढरं असावं, वर बंडी आणि काळं जॅकेट ..त्याची मूर्ती इतक्या वर्षानंतरपण माझ्या डोळ्यासमोर  येते.

अशा  तेलवाल्याकडून, पॅकबंद नसलेलं तेल खाऊन अख्खी चाळ  पोसली. हायजीनच्या कल्पनाही  घुसल्या नव्हत्या डोक्यात.

सकाळची  लगबग, गडबड  आवरून घरातल्या  दारात गृहिणी  जरा  निवांत गप्पा मारायला बसल्या की हमखास  बोवारीण यायची . मुळात कपड्यांची चैन होती कुठे  हो. पण त्यातल्यात्यात जुने कपडे  देऊन, घासाघिस  करून, हुज्जत घालून घेतलेल्या भांड्यावर  चाळीतले  अनेक संसार  सजले  होते.

हे सगळं सामूहिक चालायचं हं . जी बोवारणीला कपडे  देत असायची  तिच्या घरात  गंज  आहे  का, परात  आहे  का, “लंगडी “आहे  का हे तिच्या शेजारणींना माहित असायचं.

अशाच  दुपारी कधी  कल्हई वाला यायचा. त्याची ती गाडी ढकलत  तो फणसाच्या  झाडाखाली  बस्तान बसवायचा .

त्याचा तो भाता, नवसागराचा  विशिष्ट धूर  आणि वास..कळकटलेली  भांडी, पातेली, कापसाचा बोळा  फिरवून चकचकित  झालेली पहिली  की आम्हाला काहीतरी  जादू केल्यासारखं वाटायचं. मग ते भांडं पाण्यात टाकल्यावर येणारा चूर्र आवाज . तो गेल्यावर ते बॉलबेअरिंग्ससारखे  छोटेछोटे  मातीत पडलेले गोळे गोळा करायचे… 

कशातही  रमायचो  आम्ही. 

संध्याकाळी मुलांच्या खेळण्याच्यावेळी कुरमुऱ्याच्या पोत्याएवढाच जाडा– पांढराशुभ्र  लेंगा सदरा  घातलेला  कुरमुरेवाला यायचा . खारे  शेंगदाणे, चणे, कुरमुरे  हा त्या वेळचा  खाऊ …जो घेईल  तो एकटा नाही खायचा –  वाटून खायचा . चाळीचा  संस्कार होता तो.- “sharing is caring ” हे शिकवायला नाही लागलं आम्हाला..

घंटा  वाजवत , रंगीबेरंगी  सरबताच्या  बाटल्यांनी भरलेली  बर्फाचा  गोळा विकणारी गाडी चाळीच्या गेटसमोर  रस्त्यावर उभी  राहायची . महिन्यातून एखादेवेळी खायला आम्हाला परवानगी  मिळायची . १३० बिऱ्हाडातली कमीत कमी  दिडेकशे  पोरं तो बर्फाचा  गोळा कधी ना कधी खायची,  पण कोणी आजारी  पडल्याचं मला  तरी  आठवत  नाहीये..

संध्याकाळी सात वाजेपर्यंत  पटांगणात धुमाकूळ  घालून , गृहपाठ , परवचा, म्हणून गॅलरीमधे कोण आजोबा  आज  गोष्ट सांगणार म्हणून वाट बघत  असायचो .

उन्हाळ्याच्या सुट्टीत रात्र झाली की “कुल्फीय..” ओरडत  डोक्यावर ओला पंचा  गुंडाळलेला मटका  घेऊन  कुल्फी विकणारा यायचा ..चाळीत  तेव्हा तरी  कुल्फी खाणं ही चैन होती. नाही परवडायची  सहसा . पहिला  दुसरा नंबर आला तर  क्वचित मिळायची ..

अशी  ही बाहेरून येणारी सगळी  माणसं “आमची  “झाली होती.

शेजाऱ्यापाजाऱ्यांचे नातेवाईकही “आपले “वाटायचे …

या सगळ्यांमुळे एकही पैसा न मोजता आमचा  व्यक्तिमत्व विकास होत राहिला.

माझ्या पिढीतल्या लोकांच्या चाळीच्या आठवणी  आजही अधूनमधून अशा “चाळवतात” .

पु. लं च्या बटाट्याच्या चाळीने  “चाळ  संस्कृती  “घराघरात “पोहोचवली.

आमच्या चाळीने  मात्र ती आमच्या  “मनामनात  “रुजवली …

लेखिका – सुश्री नीलिमा जोशी 

प्रस्तुती – श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ १ जून राष्ट्रीय वाढदिवस दिन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ १ जून राष्ट्रीय वाढदिवस दिन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

⭕ आज राष्ट्रीय वाढदिवस दिन !

⭕ पु.ल. नेहमी म्हणायचे,

“जवळ जवळ निम्मा महाराष्ट्र जूनमध्येच जन्माला आला आहे आणि तोही गुरुजींच्या पुण्याईमुळे !”

वाढदिवस म्हटलं की लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वांनाच हवाहवासा वाटणारा दिवस. 

जन्माला आल्यापासून आपल्या शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक वाढीचे आकडेवारीत मोजमाप करणारा दिवस म्हणजेच वाढदिवस. 

‘सोळावं वरीस धोक्याचं,

 ‘वीस वर्षांचा घोडा झालास तरी कळत नाही का ?’,

 ‘वयाची पन्नाशी गाठली आता रिटायर व्हा’ 

अशी आपल्याला मिळणारी सारी शाब्दिक आभूषणे आपल्याला वाढत्या वयाची जाणीव करून देत असतात.

 अर्थात प्रत्येकाचा वाढदिवस वेगवेगळ्या तारखेला साजरा होत असतो. 

काही वेळेला आपल्या फ्रेंड सर्कल मधल्या दोघा तिघांची, चार पाच जणांची जन्म तारीख एकच असू शकते, नव्हे ती असतेच.

पण १ जून हा असा दिवस आहे की,

 चाळीस पन्नास वयाच्या घरात असलेल्या थोडेथोडके नाही तर किमान ५० ते १०० जणांचे वाढदिवस १ जूनलाच असतात. 

असं काय आहे की ?—- 

१ जून हा दिवस चाळीशी पन्नाशी उलटलेल्या प्रत्येकाचाच वाढदिवस असतो.

 १ जूनचे वाढदिवसाचे गणित, संख्याशास्त्राला चक्रावून टाकणारे. 

सदर काळातील जनगणना हा तर मोठा विनोद ठरावा.

 एकाच दिवशी एक नव्हे तर अनेक गावांमधील अनेक बालके १ जूनला जन्माला यावी, यासारखे प्रशासकीय सत्य.  त्या काळातील  ‘आदर्श’ प्रकरणाचं उत्तर शोधलं असता एक इंटरेस्टिंग माहिती समोर आली.

साधारण चाळीस पन्नास किंवा त्यापूर्वी खेड्यापाड्यामध्ये सुरक्षित प्रसूतीची सोय नव्हती. सर्व काही अनुभवी सुईणीच्या हातात असायचं.

 शिक्षण सुद्धा कमी असल्याने जन्मलेल्या बाळाची जन्मवेळ तर सोडाच पण जन्मतारीख सुद्धा काही लोकांना माहित नसायची. 

मग ज्यावेळी शाळेत प्रवेश घ्यायची वेळ यायची, तेव्हा मुलाच्या पालकांना अचूक तारीख सांगता यायची नाही. 

त्यामुळे जन्मतारीख कोणती असा प्रश्न विचारला तर, तारखेच्या नजीकची एखादी घटना, एखादा सण असे ठोकताळे सांगितले जायचे. 

पण गुरुजींना exact तारीख हवी असायची..,आणि ती काही पालकांना सांगता यायची नाही.

 मग काय शाळा सुरु होण्याच्या आठ दहा दिवस आधीची तारीख गुरुजीच मुलाच्या नावापुढे लिहायचे, 

ती शाळा प्रवेशाची तारीख म्हणजेच १ जून आणि त्यापूर्वी ५-६ वर्ष हे जन्म वर्ष म्हणून लिहिलं जाऊ लागलं आणि बऱ्याच जणांना १ जून ही जन्मतारीख चिकटली. 

अगदी एका घरातल्याच सर्व भावडांची जन्मतारीखही १ जून असल्याचं दिसून येतं. 

अर्थात गेल्या तीस चाळीस वर्षात परिस्थतीत खूप बदल झाला आहे.

 जन्माच्या नोंदी सरकारी दप्तरी होऊ लागल्या आहेत. 

पण चाळीस पन्नास वर्षांपूर्वी १ जून हीच सर्वांसाठी जन्मतारीख होती.  त्यामुळेच आज बरेच जण आपला वाढदिवस या दिवशी साजरा करताहेत.

⭕ राष्ट्रीय वाढदिवस दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

प्रस्तुती — श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ यम सुद्धा परत गेला — ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ ☆ यम सुद्धा परत गेला — ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

गुरूजींना न्यायला आलेला यम सुध्दा परत गेला…!!

 

काल आमच्या शाळेत वेगळंच प्रकरण घडलं,

गुरुजींना न्यायला देवानं यमाला अर्जंट धाडलं.

 

न विचारताच यम घुसला डायरेक्ट गुरुजींच्या वर्गात,

चला गुरुजी आपल्याला जायचं आहे स्वर्गात.

 

एका मिनीटात तुम्हाला येणार आहे अटॅक,

तुमचा जीव माझ्या मुठीत येईल मग फटॅक.

 

यमाचं बोलणं ऐकून गुरुजी लागले रडू,

खूप दिवसांनी घेतलाय रे यमा हाती खडू.

 

कोरोनाने पोरांची शाळा होती बंद,

आजच्या दिवस घेऊ दे त्यांना शिकण्याचा आनंद.

 

फक्त एक कविता दाखवतो त्यांना गाऊन,

मग जा खुशाल तू माझे प्राण घेऊन.

 

ठीक आहे म्हणत यम वर्गाबाहेर बसला,

गुरुजींचा डान्स पाहून तोही फार हसला.

 

यमालाही आठवलं त्याचं बालपण,

दाटून आला गळा त्याचा, गहिवरलं मन.

 

आजच्या दिवस एक्स्ट्राचा घ्या म्हणला जगून,

उद्या येतो म्हणत यम गेला आल्या पावली निघून.

 

दुसऱ्या दिवशी सकाळीच यम झाला हजर,

गुरुजींचीही पडली त्याच्यावरती नजर.

 

काहीही म्हण यमा अर्जंट आहे काम,

केंद्रावर जाऊन येतो तोवर जरा थांब.

 

सर्वेक्षणाची फाईल साहेबांस येतो देऊन,

किरकोळ रजेचा अर्जही येतो जरा ठेवून.

 

करायच्या आहेत अजून तांदळाच्या प्रती,

पोरांचीही काढायची आहेत बँकेमधे खाती.

 

आकारिकचं काम पण घेतलंय काल हाती,

डोक्यामध्ये नुसती गणगण, काय आणि किती?

 

शेवटचे हे आठ दिवस थांब यमा मित्रा,

तोवर माझ्या मिटवतो भानगडी ह्या सतरा.

 

शेवटची ही संधी गुरुजी आज नक्की देईन,

पुढच्या सोमवारी प्राण घ्यायला मी पुन्हा येईन.

 

गुरुजींच्या डोक्याला आलं कुटुंबाचं टेन्शन,

आपण गेलो तर काय होईल? आपल्याला नाही पेन्शन.

 

म्हणता म्हणता उगवला शेवटचा तो सोमवार,

शाळेकडे गुरुजी झाले स्कूटरवरती स्वार.

 

तेवढ्यात गुरुजींच्या आलं काहीतरी ध्यानात,

गुरुजी थेट घुसले एका कपड्याच्या दुकानात.

 

यम म्हणाला, गुरुजी आज इकडं कसं काय?

तेवढ्यात गुरुजींनी धरले यमाचे ते पाय.

 

गणवेषाचं तेवढं लावू दे आज मार्गी,

आजचा दिवस थांब, उद्या जाऊ आपण स्वर्गी.

 

काय राव गुरुजी तुम्ही रोजच आहे बिझी,

तुमच्या अशा वागण्यानं ड्युटी धोक्यात येईल ना माझी.

 

आजच्या दिवस यमा, घे रे गड्या समजून,

किर्द दुरुस्ती, दाखल्याचेही काम आहे पडून.

 

उदयापासून सुरु आहे CO साहेबांचा दौरा,

कामाभोवती फिरतोय बघ गुरुजी नावाचा भोवरा.

 

परवापासून खेळायची आहे टॅगची पण इनिंग,

पुढच्या आठवड्यात घ्यायचं आहे गणित पेटीचं ट्रेनिंग.

 

नंतर करायची आहे स्कॉलरशिपची तयारी,

लसीकरणाचीही पार पाडायची आहे जबाबदारी.

 

पोरांच्या परीक्षा, मग तपासायचे पेपर,

नवोदय मधे पोरं करायची आहेत टॉपर.

 

कामाच्या हया ताणाची डोक्यात झालीय भेळ,

आमच्याकडं नाही यमा मरायलाही वेळ..

 

खूप वाटतं फुलवावा ज्ञानाचा हा मळा,

कांदा मुळा भाजी आमची, खडू आणि फळा.

 

पोरांमधे जीव ओतून करतो आम्ही काम,

त्यांच्यामधेच दिसतो रहीम, त्यांच्यामधेच राम.

 

फुकट पगार म्हणणार्‍यांची वाटते भारी कीव,

हरकत नाही, आज माझा घेऊन टाक जीव.

 

यमाला आलं गलबलून सारं काही ऐकून,

तुम्हाला न्यायला गुरुजी आता येणार नाही चुकून.

 

वाटेल तेव्हा या गुरुजी उघडेन स्वर्गाचं दार,

सुंदर करा भारत आणि पोरं करा हुशार.

 

टाटा बाय बाय करत करत यम गेला निघून,

परत येण्याआधी तो घ्या ना छान जगून.

 

जगणं मरणं म्हणजे नाही काही वेगळं,

नरक आणि स्वर्ग इथंच आहे सगळं.

 

कामाशी काम करून घडवा नवा भारत,

कामाशिवाय इथं कुणी अमर नाही ठरत…!

 

— समस्त शिक्षक वर्गाला सविनय समर्पित —

 

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 91 – गीत – एक लहर कह रही कूल से ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपका एक अप्रतिम गीत – एक लहर कह रही कूल से।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 91 – गीत – एक लहर कह रही कूल से✍

एक लहर कह रही कूल से बँधे हुए हैं क्यों दुकूल से।

एक किरन आ मन के द्वारे अभिलाषा की अलग सँवारे

संभव कहां अपरिचित रह ना बार-बार जब नाम पुकारे।

सोच रहा हूं केवल इतना, क्या मन मिलता कभी भूल से।

इसी तरह के वचन तुम्हारे अर्थ खोजते खोजन हारे

मौन मुग्ध सा अवश हुआ मैं शब्दवेध की शक्ति बिसारे।

सोच रहा हूं केवल इतना, प्रश्न किया क्या कभी फूल से

भ्रमर बँधे हैं क्यों दुकूल से।

एक लहर कह रही कूल से बने हुए हो क्यों दुकूल से ?

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव-गीत # 93 – “आँखों के झरने सब…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा,पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है।  आज प्रस्तुत है एक भावप्रवण अभिनवगीत –आँखों के झरने सब…”।)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 93 ☆।। अभिनव-गीत ।। ☆

☆ || “आँखों के झरने सब”|| ☆

उतरे तपेदिक जो

सूख गये हाड़ से

छोड़ूँ तब झाँकना

हिलगे  किबाड़  से

 

कितने क्या मास-बरस

गुजर गये-बीत गये

आँखों के झरने सब

सूख गये-रीत गये

 

पलकें मलते-मलते

मेंहदी व आलते

बहे सभी पानी में

आँसू की बाढ़ से

 

इधर तेज धूप कभी

तुमने न पहचानी

ग्रीष्म की शिराओं में

बहे पीर अनजानी

 

और धमनियों में भी

रक्त की हरारत का

नमक बहा जाता है

पहले आषाढ़ से

 

पूर्वज,पुराणों में

कहते यही आये

धीरज के फल सबने

मीठे यहाँ पाये

 

संयमित रहो और

चाल समय की देखो

निकलेंगे फूल सदृश

दिन ये पहाड़  से

 

©  श्री राघवेन्द्र तिवारी

03-06-2022

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – पर्यावरण दिवस की दस्तक ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

? संजय दृष्टि – पर्यावरण दिवस की दस्तक  ??

(विश्व पर्यावरण दिवस पर श्री संजय भारद्वाज जी की इस  प्रासंगिक और विचारणीय रचना का कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी द्वारा अंग्रेजी भावानुवाद आप इस लिंक पर क्लिक कर पढ़ सकते हैं  👉 ☆ पर्यावरण दिवस की दस्तक – श्री संजय भरद्वाज ☆ English Version by Captain Pravin Raghuvanshi, NM ☆)

लौटती यात्रा पर हूँ। वैसे ये भी भ्रम है, यात्रा लौटती कहाँ है? लौटता है आदमी..और आदमी भी लौट पाता है क्या, ज्यों का त्यों, वैसे का वैसा! खैर सुबह जिस दिशा में यात्रा की थी, अब यू टर्न लेकर वहाँ से घर की ओर चल पड़ा हूँ। देख रहा हूँ रेल की पटरियों और महामार्ग के समानांतर खड़े खेत, खेतों को पाटकर बनाई गई माटी की सड़कें। इन सड़कों पर मुंबई और पुणे जैसे महानगरों और कतिपय मध्यम नगरों से इंवेस्टमेंट के लिए ‘आउटर’ में जगह तलाशते लोग निजी और किराये के वाहनों में घूम रहे हैं। ‘धरती के एजेंटों’ की चाँदी है। बुलडोजर और जे.सी.बी की घरघराहट के बीच खड़े हैं आतंकित पेड़। रोजाना अपने साथियों का कत्लेआम खुली आँखों से देखने को अभिशप्त पेड़। सुबह पड़ी हल्की फुहारें भी इनके चेहरे पर किसी प्रकार का कोई स्मित नहीं ला पातीं। सुनते हैं जिन स्थानों पर साँप का मांस खाया जाता है, वहाँ मनुष्य का आभास होते ही साँप भाग खड़ा होता है। पेड़ की विवशता कि भाग नहीं सकता सो खड़ा रहता है, जिन्हें छाँव, फूल-फल, लकड़ियाँ दी, उन्हीं के हाथों कटने के लिए।

मृत्यु की पूर्व सूचना आदमी को जड़ कर देती है। वह कुछ भी करना नहीं चाहता, कर ही नहीं पाता। मनुष्य के विपरीत कटनेवाला पेड़ अंतिम क्षण तक प्राणवायु, छाँव और फल दे रहा होता है। डालियाँ छाँटी या काटी जा रही होती हैं तब भी शेष डालियों पर नवसृजन करने के प्रयास में होता है पेड़।

हमारे पूर्वज पेड़ लगाते थे और धरती में श्रम इन्वेस्ट करते थे। हम पेड़ काटते हैं और धरती को माँ कहने के फरेब के बीच शर्म बेचकर ज़मीन की फरोख्त करते हैं। मुझे तो खरीदार, विक्रेता, मध्यस्थ सभी ‘एजेंट’ ही नज़र आते हैं। धरती को खरीदते-बेचते एजेंट। विकास के नाम पर देश जैसे ‘एजेंट हब’ हो गया है!

मन में विचार उठता है कि मनुष्य का विकास और प्रकृति का विनाश पूरक कैसे हो सकते हैं? प्राणवायु देनेवाले पेड़ों के प्राण हरती ‘शेखचिल्ली वृत्ति’ मनुष्य के बढ़ते बुद्ध्यांक (आई.क्यू) के आँकड़ों को हास्यास्पद सिद्ध कर रही है। धूप से बचाती छाँव का विनाश कर एअरकंडिशन के ज़रिए कार्बन उत्सर्जन को बढ़ावा देकर ओज़ोन लेयर में भी छेद कर चुके आदमी  को देखकर विश्व के पागलखाने एक साथ मिलकर अट्टहास कर रहे हैं। ‘विलेज’ को ‘ग्लोबल विलेज’ का सपना बेचनेवाले ‘प्रोटेक्टिव यूरोप’ की आज की तस्वीर और भारत की अस्सी के दशक तक की तस्वीरें लगभग समान हैं। इन तस्वीरों में पेड़ हैं, खेत हैं, हरियाली है, पानी के स्रोत हैं, गाँव हैं। हमारे पास अब सूखे ताल हैं, निरपनिया तलैया हैं, जल के स्रोतों को पाटकर मौत की नींव पर खड़े भवन हैं, गुमशुदा खेत-हरियाली  हैं, चारे के अभाव में मरते पशु और चारे को पैसे में बदलकर चरते मनुष्य हैं।

माना जाता है कि मनुष्य, प्रकृति की प्रिय संतान है। माँ की आँख में सदा संतान का प्रतिबिम्ब दिखता है। अभागी माँ अब संतान की पुतलियों में अपनी हत्या के दृश्य पाकर हताश है।

और हाँ, पर्यावरण दिवस भी दस्तक दे रहा है। हम सब एक सुर में सरकार, नेता, बिल्डर, अधिकारी, निष्क्रिय नागरिकों को कोसेंगे। कागज़ पर लम्बे, चौड़े भाषण लिखे जाएँगे, टाइप होंगे और उसके प्रिंट लिए जाएँगे। प्रिंट कमांड देते समय स्क्रीन पर भले पर शब्द उभरें-‘ सेव इन्वायरमेंट। प्रिंट दिस ऑनली इफ नेसेसरी,’ हम प्रिंट निकालेंगे ही। संभव होगा तो कुछ लोगों खास तौर पर मीडिया को देने के लिए इसकी अधिक प्रतियाँ निकालेंगे।

कब तक चलेगा हम सबका ये पाखंड? घड़ा लबालब हो चुका है। इससे पहले कि प्रकृति केदारनाथ के ट्रेलर को लार्ज स्केल सिनेमा में बदले, हमें अपने भीतर बसे नेता, बिल्डर, भ्रष्ट अधिकारी तथा निष्क्रिय नागरिक से छुटकारा पाना होगा।

चलिए इस बार पर्यावरण दिवस पर सेमिनार, चर्चा वगैरह के साथ बेलचा, फावड़ा, कुदाल भी उठाएँ, कुछ पेड़ लगाएँ, कुछ पेड़ बचाएँ। जागरूक हों, जागृति करें। यों निरी लिखत-पढ़त और बौद्धिक जुगाली से भी क्या हासिल होगा?

30 मई 2017 को  मुंबई से पुणे लौटते हुए लिखी पोस्ट 🙏🏻🌿✍️

© संजय भारद्वाज

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Articles – ☆ World Environment Day Special – पर्यावरण दिवस की दस्तक – श्री संजय भरद्वाज ☆ English Version by Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.)

We present an English Version of Shri Sanjay Bhardwaj’s Hindi article 👉 पर्यावरण दिवस की दस्तकpublished today on the eve of World Environment Day.  We extend our heartiest thanks to the learned author  Captain Pravin Raghuvanshi Ji (who is very well conversant with Hindi, Sanskrit,  English and Urdu languages) for this beautiful translation.)

श्री संजय भारद्वाज जी की मूल रचना

? पर्यावरण दिवस की दस्तक  –  श्री संजय भरद्वाज ??

(विश्व पर्यावरण दिवस पर श्री संजय भारद्वाज जी की एक प्रासंगिक और विचारणीय रचना साझा कर रहा हूँ। साथ में संलग्न है मेरा एक अंग्रेज़ी में अनुवाद प्रयास,अहिन्दी भाषियों और विदेशी  समुदाय हेतु – कैप्टेन प्रवीण रघुवंशी )

लौटती यात्रा पर हूँ। वैसे ये भी भ्रम है, यात्रा लौटती कहाँ है? लौटता है आदमी..और आदमी भी लौट पाता है क्या, ज्यों का त्यों, वैसे का वैसा! खैर सुबह जिस दिशा में यात्रा की थी, अब यू टर्न लेकर वहाँ से घर की ओर चल पड़ा हूँ। देख रहा हूँ रेल की पटरियों और महामार्ग के समानांतर खड़े खेत, खेतों को पाटकर बनाई गई माटी की सड़कें। इन सड़कों पर मुंबई और पुणे जैसे महानगरों और कतिपय मध्यम नगरों से इंवेस्टमेंट के लिए ‘आउटर’ में जगह तलाशते लोग निजी और किराये के वाहनों में घूम रहे हैं। ‘धरती के एजेंटों’ की चाँदी है। बुलडोज़र और जे.सी.बी की घरघराहट के बीच खड़े हैं आतंकित पेड़। रोजाना अपने साथियों का कत्लेआम खुली आँखों से देखने को अभिशप्त पेड़। सुबह पड़ी हल्की फुहारें भी इनके चेहरे पर किसी प्रकार का कोई स्मित नहीं ला पातीं। सुनते हैं जिन स्थानों पर साँप का मांस खाया जाता है, वहाँ मनुष्य का आभास होते ही साँप भाग खड़ा होता है। पेड़ की विवशता कि भाग नहीं सकता सो खड़ा रहता है, जिन्हें छाँव, फूल-फल, लकड़ियाँ दी, उन्हीं के हाथों कटने के लिए।

मृत्यु की पूर्व सूचना आदमी को जड़ कर देती है। वह कुछ भी करना नहीं चाहता, कर ही नहीं पाता। मनुष्य के विपरीत कटनेवाला पेड़ अंतिम क्षण तक प्राणवायु, छाँव और फल दे रहा होता है। डालियाँ छाँटी या काटी जा रही होती हैं तब भी शेष डालियों पर नवसृजन करने के प्रयास में होता है पेड़।

हमारे पूर्वज पेड़ लगाते थे और धरती में श्रम इन्वेस्ट करते थे। हम पेड़ काटते हैं और धरती को माँ कहने के फरेब के बीच शर्म बेचकर ज़मीन की फरोख्त करते हैं। मुझे तो खरीदार, विक्रेता, मध्यस्थ सभी ‘एजेंट’ ही नज़र आते हैं। धरती को खरीदते-बेचते एजेंट। विकास के नाम पर देश जैसे ‘एजेंट हब’ हो गया है!

मन में विचार उठता है कि मनुष्य का विकास और प्रकृति का विनाश पूरक कैसे हो सकते हैं? प्राणवायु देनेवाले पेड़ों के प्राण हरती ‘शेखचिल्ली वृत्ति’ मनुष्य के बढ़ते बुद्ध्यांक (आई.क्यू) के आँकड़ों को हास्यास्पद सिद्ध कर रही है। धूप से बचाती छाँव का विनाश कर एअरकंडिशन के ज़रिए कार्बन उत्सर्जन को बढ़ावा देकर ओज़ोन लेयर में भी छेद कर चुके आदमी  को देखकर विश्व के पागलखाने एक साथ मिलकर अट्टहास कर रहे हैं। ‘विलेज’ को ‘ग्लोबल विलेज’ का सपना बेचनेवाले ‘प्रोटेक्टिव यूरोप’ की आज की तस्वीर और भारत की अस्सी के दशक तक की तस्वीरें लगभग समान हैं। इन तस्वीरों में पेड़ हैं, खेत हैं, हरियाली है, पानी के स्रोत हैं, गाँव हैं। हमारे पास अब सूखे ताल हैं, निरपनिया तलैया हैं, जल के स्रोतों को पाटकर मौत की नींव पर खड़े भवन हैं, गुमशुदा खेत-हरियाली  हैं, चारे के अभाव में मरते पशु और चारे को पैसे में बदलकर चरते मनुष्य हैं।

माना जाता है कि मनुष्य, प्रकृति की प्रिय संतान है। माँ की आँख में सदा संतान का प्रतिबिम्ब दिखता है। अभागी माँ अब संतान की पुतलियों में अपनी हत्या के दृश्य पाकर हताश है।

और हाँ, आज पर्यावरण दिवस है। हम सब एक सुर में सरकार, नेता, बिल्डर, अधिकारी, निष्क्रिय नागरिकों को कोसेंगे। कागज़ पर लम्बे, चौड़े भाषण लिखे जाएँगे, टाइप होंगे और उसके प्रिंट लिए जाएँगे। प्रिंट कमांड देते समय स्क्रीन पर भले पर शब्द उभरें-‘ सेव इन्वायरमेंट। प्रिंट दिस ऑनली इफ नेसेसरी,’ हम प्रिंट निकालेंगे ही। संभव होगा तो कुछ लोगों खास तौर पर मीडिया को देने के लिए इसकी अधिक प्रतियाँ निकालेंगे।

कब तक चलेगा हम सबका ये पाखंड? घड़ा लबालब हो चुका है। इससे पहले कि प्रकृति केदारनाथ के ट्रेलर को लार्ज स्केल सिनेमा में बदले, हमें अपने भीतर बसे नेता, बिल्डर, भ्रष्ट अधिकारी तथा निष्क्रिय नागरिक से छुटकारा पाना होगा।

चलिए इस बार पर्यावरण दिवस पर सेमिनार, चर्चा वगैरह के साथ बेलचा, फावड़ा, कुदाल भी उठाएँ, कुछ पेड़ लगाएँ, कुछ पेड़ बचाएँ। जागरूक हों, जागृति करें। यों निरी लिखत-पढ़त और बौद्धिक जुगाली से भी क्या हासिल होगा?

☆ पर्यावरण दिवस की दस्तक – श्री संजय भरद्वाज ☆

☆  English translation by Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

After a trip, I am on my return journey! But, this too is an illusion, since journey never returns, it’s only the man who returns…! D’you really think man ever returns exactly the same way? No, never!

Anyways… Whatever distance I’ve traversed in a direction since morning, the same is being traversed back after the U-turn… Witnessing the fertile land along the railway track and the highways; and the landfill to make these pathways. The bevy of middlemen roam in private sedans and hired-cars from Mumbai, Pune and some upcoming cities, eyeing to grab the land in the “Outskirts” to make a fresh-killing…! These “Dalals”– the Land-agents,  reap the fat-profits! Land-sharks buying-selling the land!

Between the deafening noise of bulldozers and JCBs are standing these terrorized-trees, cursed to witness the massacres of their friends everyday… Even fresh drizzle this morning fails to uplift their sagging spirits…As the adage goes: Even the snakes desert the place where their meat is eaten…But helpless trees can’t even run away; forcing them to remain rooted  wherever they are…only to be chopped off by those, whom they give shade, fruits and the wood…!

Premonition about the death makes a person freeze like an inanimate object…Innately, he doesn’t want to do anything, infact he cannot as he is rendered incapable… Contrary to mankind, an about-to-be-chopped tree gives life-giving oxygen, flowers & fruits and shade till last moment…Even if being trimmed or chopped off, then also tree tries to give new life through its remaining branches…

Our ancestors used to plant trees and invest their hard labour in the land…

Now, the man shamelessly engages himself in buying-selling-trading the land, while remaining in between  felling the trees and calling it: ‘Mother earth’! I find these buyers, sellers, middlemen, as the “Agents” only… Cruelly buying-selling the mother-earth! Inevitably feel as if, the nation has become the “Agent-hub” in the name of development!

Intriguingly, I think how can the development of human race and the annihilation of the nature be a complementary to each other? Mocking at the so-called ever-increasing IQ level of the ‘Shekh Chilli’ — the bufooned-nature man, who takes the life of the life-giving trees!

Killing sun-protecting-shades and piercing ozone-layer through harmful carbon dioxide by excessive use of air-conditioning, makes even all the lunatics of all the mental asylums guffaw at the mankind…

The true picture of today’s ‘Protective Europe’,  selling the dream of ‘Global-village’ to villages, and the images of India of 1980’s decade are almost similar. The pictures depict lush green trees, sources of water, villages! Now, we have waterless lakes, dried up ponds, buildings on the reclaimed water-bodies standing tall on death-defining foundations, absent greenery, dying cattles for the want of fodder; and, converting-fodder into money-grazing beastly humans.

It is believed that human is the dearest child of the ‘Mother-nature’! One always sees the reflection of her child in the eyes of the mother….Cursed mother is shockingly despondent to see the murder of herself in the iris of her own offspring!

And yes, today is World Environment Day. We all will collectively curse the government, politicians, builders,  officials and the inert public. Sheets of papers will be inked with lectures, they will get typed and printed. Though, while printing the monitor will be adorned with: “Save environment. Print this only if necessary!” Nevertheless, disregarding this, we will take out the prints. Possibly, we will make even more printouts, especially, to give it to our media-friends!

How long will this hypocrisy go on? Water is flowing above the nose! Before the nature converts the trailer of Kedarnath disaster into large scale cinemascopic film, we must get rid of the politician, builder, corrupt official and the inert countryman residing within us…

This time, lets pledge ourselves that along with the seminars and discussions, we will pick up spades, hoes, shovels; plant a few trees; and, more importantly, save them. Incidentally, what will we truly gain by writing-printing and so called intellectual ruminations??

~Pravin

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈  Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कविता # 140 ☆ मन की बात ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

श्री जय प्रकाश पाण्डेय

(श्री जयप्रकाश पाण्डेय जी  की पहचान भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी के अतिरिक्त एक वरिष्ठ साहित्यकार की है। वे साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। उनके  व्यंग्य रचनाओं पर स्व. हरीशंकर परसाईं जी के साहित्य का असर देखने को मिलता है। परसाईं जी का सानिध्य उनके जीवन के अविस्मरणीय अनमोल क्षणों में से हैं, जिन्हें उन्होने अपने हृदय एवं साहित्य में  सँजो रखा है।आज प्रस्तुत है आपका एक विचारणीय कविता “मन की बात”।)  

☆ कविता # 140 ☆ मन की बात ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय

मन तुम्हें इसलिए 

मिला है कि

मन भर के खाओ,

मन भर के मौज उड़ाओ, 

मन मन  भर के बन जाओ,

मन से मन भर बात करो,

मन के रंग हजार बनाओ,

मन भर का दर्द मन से हटाओ,

मन के हजार नैन से देखो, 

और मन ही मन में मुस्कराओ,

© जय प्रकाश पाण्डेय

416 – एच, जय नगर, आई बी एम आफिस के पास जबलपुर – 482002  मोबाइल 9977318765

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 84 ☆ # धूप-छांव # ☆ श्री श्याम खापर्डे ☆

श्री श्याम खापर्डे

(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “# धूप-छांव #”) 

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 84 ☆

☆ # धूप-छांव # ☆ 

तुम्हारी मुस्कान के पीछे

कितने ग़म है

लबों पर हंसी

पर आंखें कितनी नम है

 

पलकों में छिपे समंदर को

मन कैसे रोक पाएगा

जरा सी ठेस पहुंचेगी

तो सैलाब आ जाएगा

 

तुम इन आंसुओं को

खुलकर बहने दो

सीने मे छिपे दर्द को

बहते बहते कहने दो

 

इस गुलशन में

फूल भी है, भंवरे भी है

महकते पराग के संग

कलियों के पहरे भी हैं

 

तुम्हारे आँसू पोछकर

तुम्हें सब हंसना सिखाएँगे

बालों में सजेंगे जब गजरे

सारे दुःख भूल जाएंगे

 

कलियों की तरह खिलखिलाएं

फूलों की तरह महकों

भंवरों के संग संग

प्रेम रस में बहकों

 

जीवन में दु:ख-सुख

धूप और छांव  है

जीवन के डोर से बंधे

हम सब कें पांव है /

© श्याम खापर्डे 

फ्लेट न – 402, मैत्री अपार्टमेंट, फेज – बी, रिसाली, दुर्ग ( छत्तीसगढ़) मो  9425592588

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares
image_print