मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ उद्योजक प्रदीप ताम्हाणे … प्रमोद सावंत ☆ संग्राहक मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

उद्योजक प्रदीप ताम्हाणे … प्रमोद सावंत ☆ संग्राहक मंजुषा मुळे ☆ 

“आमच्या तंत्रज्ञानासाठी तुम्हां भारतीयांना आम्ही मागू तेवढे पैसे द्यावेच लागतील”. अमेरिकन बॉसचे ते शब्द प्रदीपच्या कानात शिसे ओतल्यासारखे ओतले गेले. माझ्या देशाला हा कमी लेखतोय या निव्वळ एका भावनेने त्या भारतीय तरुणाने उत्तम पगार, कार, अलिशान घर नोकरी दोन मिनिटात सोडली. या कंपनीचा प्रतिस्पर्धी म्हणून मी उभा राहिन असा मनाशी चंग बांधला. औषधी गोळ्यांना कलरकोटींग करणाऱ्या जगातील ‘त्या’ एकमेव कंपनीला या पठ्ठ्याने स्वत:चा पर्याय उभा केला. गोऱ्या अमेरिकन बॉसचा माज उतरवला.

शांत असणाऱ्या कोणत्याही भारतीयाला जर डिवचले तर तो काय करु शकतो हे संपूर्ण जगाने पाहिले. ही कहाणी त्या जिगरबाज भारतीय तरुणाची. ही कहाणी आहे, विनकोट ही जगातील दुसरी आणि संपूर्णत: भारतीय बनावटीची औषधी गोळ्यांना कलर कोटींग करणाऱ्या कंपनीच्या मालकाची, प्रदीप ताम्हाणेंची.

२६ जानेवारी १९५० साली संपूर्ण भारत देश प्रजासत्ताक झाल्याचा आनंद साजरा करत असतानाच दादर येथील ताम्हाणेंच्या घरी प्रदीपचा जन्म झाला. खरंतर हा योगायोगच म्हणावा लागेल. पोर्तुगीज चर्चजवळील एका मराठी माध्यम शाळेत प्रदीपचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. घरचं वातावरण टिपीकल मध्यमवर्गीय असंच होतं. त्याकाळी टॅक्सीत बसणं म्हणजे मुलांसाठी एक पर्वणीच असायची. वर्षातून दोन-तीन वेळाच टॅक्सीमध्ये बसण्याची संधी मिळे.

दादरच्या किर्ती महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून त्याने पदवी आणि त्यानंतर पदव्युत्तर पदवी देखील संपादन केली. त्याच दरम्यान एका कंपनीत नोकरी मिळाली पगार होता फक्त ८०० रुपये. संशोधनाची आवड असल्याने दुसऱ्या एका कंपनीत संशोधन आणि विकास विभागात ‘कलर इनचार्ज’ म्हणून नोकरी केली.

कालांतराने औषधी गोळ्यांवरील रंगीत आवरण तयार करणाऱ्या एका अमेरिकन कंपनीत प्रदीपला नोकरी मिळाली. या कंपनीची शाखा लंडन मध्ये होती. तिथे प्रदीप काम करायचा. उत्तम पगार, मर्सिडीज कार, राहण्यासाठी अलिशान घर अशा सगळ्याच सुख-सुविधा पायाशी लोळण घेत होत्या. ही कंपनी मुख्यत: रेडीमिक्स पावडर तयार करत असे. सुरुवातीला फक्त १३ किलो पावडर भारतात विकली जायची मात्र प्रदीपच्या तंत्रज्ञानाने काही दिवसांतच हे प्रमाण ५ हजार किलोवर गेले. भारतातील सर्वांत मोठ्या ५ औषधी कंपन्यांना हेच तंत्रज्ञान पुरविले जाई. मात्र त्याची किंमत अफाट होती.

२५०० रुपये किंमतीची ती पावडर २५ ते ३० हजार रुपयांना विकली जाई. इतकी मोठी तफावत असे. ही तफावत या कंपन्यांच्या लक्षात येत होती. या विषयी त्यांनी प्रदीपला सांगितलं देखील. मात्र हे तंत्रज्ञान पुरविणारी ती जगातील एकमेव कंपनी होती आणि तिचा बॉस एक अमेरिकन होता, ज्याच्यासमोर प्रदीपचं काहीच चालत नव्हतं हे त्यांना माहित होतं.

खरंतर हा अमेरिकन बॉस प्रदीपचा चांगला मित्र होता. प्रदीपने शोधून काढलेल्या तंत्रज्ञानावर एके दिवशी एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक देशांतील औषध निर्मिती करणारे उत्पादक, तंत्रज्ञ त्या व्याख्यानास आले होते. ४५ मिनिटाचं ते व्याख्यान त्या सगळ्यांना इतकं आवडलं कि “वेळेची मर्यादा तुम्हांला नाही तुम्ही बोलत रहा असे”, त्या व्याख्यानमालेच्या गोऱ्या अध्यक्षाने प्रदीपला सांगितले. तब्बल साडेतीन तासानंतर व्याख्यान संपले. व्याख्यानास उपस्थित असलेल्या लोकांनी अनेक प्रश्न विचारले.

व्याख्यान संपल्यानंतर प्रदीप कॉफीचा मग घेऊन बॉसच्या बाजूला बसला. बॉसने पण प्रदीपची तोंड भरुन स्तुती केली. ही योग्य वेळ आहे आपल्या भारतीय औषध निर्मात्या कंपन्याच्या व्यथा सांगण्याची, हे हेरुन प्रदीप बॉसला म्हणाला, “आपण भारतात आपलं कलर कोटींगचं तंत्रज्ञान पुरवितो. मात्र त्याचा दर प्रचंड आहे. तो दर कमी…” हे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच त्या साडे-सहा-सात फूट अमेरिकन बॉसने समोरच्या टेबलावर जोराने हात आपटला. आणि प्रदीपच्या अगदी डोळ्याजवळ बोट नेऊन मोठ्याने जवळपास किंचाळलाच. “You have to pay for our technology’’. “तुम्हां भारतीयांना आमचं तंत्रज्ञान आम्ही सांगू त्या किंमतीत घ्यावंच लागेल”.

कोणाही भारतीयाला जिव्हारी लागेल असे ते शब्द ऐकल्यानंतर प्रदीपने २ मिनिटांचा अवधी मागितला. तो शांतपणे रिसेप्शनिस्ट जवळ गेला. तिच्याकडून एक कोरा कागद घेतला. एका ओळीत राजीनामापत्र लिहीले. आपल्या घराची, गाडीची चावी देऊन तो शांतपणे तिथून निघून गेला. मात्र मनाशी एक निश्चय होता. या अमेरिकन कंपनीला टक्कर देणारी स्वत:ची भारतीय कंपनी सुरु करण्याची.

तो भारतात आला. आई, बाबा आणि पत्नीला सारं काही सांगितलं. घरच्यांनी पूर्णत: पाठिंबा दिला आणि घरातल्या किचनमध्येच सुरु झाली प्रयोगशाळा. रात्री सगळ्यांची जेवणे उरकल्यानंतर रात्री ११ ते सकाळी ५ या वेळेत ही प्रयोगशाळा चाले. तब्बल दीड महिन्यांचा अथक संशोधनानंतर यश मिळालं आणि रेडिमिक्स पावडरचं तंत्रज्ञान विकसित झालं.

हे तंत्रज्ञान त्या अमेरिकन औषधाच्या तुलनेत १० पटीने स्वस्त होतं. बाजारपेठेत औषधी कंपन्यासोबत ओळख होतीच. अशाच एका कंपनीच्या मालकाने ताम्हाणेंची ती रेडिमिक्स पावडर पाहिली आणि ताम्हाणेंना मिठीच मारली. एवढ्या स्वस्तात संपूर्ण भारतीय बनावटीची ती रेडीमिक्स कोटींग पावडर म्हणजे अविश्वसनीय बाब होती. त्याने तात्काळ ५ किलो पावडरची ऑर्डर दिली.

मात्र आपल्याकडे एवढी लहान ऑर्डरसुद्धा पूर्ण करण्यासाठी तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाही असं ताम्हांणेंनी सांगितलं. “तुम्ही जर आता ही ऑर्डर पूर्ण नाही करु शकलात तर आयुष्यात पुढे या क्षेत्रात काहीच करु शकणार नाही”. कंपनीच्या त्या मालकाचे शब्द ताम्हाणेंच्या जिव्हारी लागले. त्यांनी चंग बांधला. आणि ती ऑर्डर पूर्ण केली. पहिल्याच वर्षी त्यांची दीड कोटी रुपयांची उलाढाल झाली.

काही दिवसांनी त्यांना एक व्यावसायिक भागीदार मिळाला. खरा तर तो एक विकासक होता आणि त्याला झटपट विक्री करुन पैसे पाहिजे होते. ताम्हाणेंच्या व्यवसायात संशोधन करुन उत्पादन निघण्याची प्रक्रिया होती ज्यास वेळ लागणार होता. तेवढा संयम नसल्याने अर्ध्यातच त्या भागीदाराने सोबत सोडली. कंपनी विकावी लागली.

मात्र ताम्हाणेंनी धीर न सोडता १९९७ साली विनकोट्स कलर्स ऍण्ड कोटींग प्रायव्हेट लिमिटेड नावाची नवीन कंपनी उभारली. अंबरनाथला कारखाना सुरु केला. आज ही कंपनी जगातील ५० हून अधिक देशांमधील औषध निर्मिती करणाऱ्या देशांना उत्पादन पुरविते.

मनुष्यबळाकडे ताम्हाणेंचे विशेष लक्ष असते. कामगार हा कार्यक्षम रहावा यासाठी अंबरनाथ स्टेशन ते कारखाना अशी कामगारांना ने-आण करण्यासाठी रिक्षासेवा त्यांनी चालू केली होती. संध्याकाळी कामाची वेळ संपल्यानंतर कामगाराला एक मिनीट देखील थांबविले जात नाही. त्याने जास्तीत जास्त वेळ कुटुंबियांसोबत घालवला पाहिजे याकडे कटाक्ष असतो. एखादा कामगार अडचणीत असेल तर कंपनी त्याच्यामागे भरभक्कम उभी राहते.

एके काळी पत्र्याच्या घरात राहणारे कामगार स्वत:च्या टूबीएचके फ्लॅटमध्ये राहतात. जवळपास प्रत्येकाकडे किमान मोटरसायकल आणि कार आहेच. ताम्हाणेंकडे आज ५५ कामगार कार्यरत आहेत मात्र ५०० कामगारांच्या दर्जाचे काम करण्याची कार्यक्षमता त्यांनी अंगी जोपासली आहे.

अत्यंत मृदू आवाज, मवाळ प्रकृतीचे प्रदीप ताम्हाणे भारतीयत्वाने पेटून उठले आणि स्वत: मधील कणखर भारतीयाचे जगाला दर्शन घडवित पावडर कोटींगमधील दुसऱ्या क्रमांकाच्या कंपनीची निर्मिती केली. यंदा भारताच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत आहे. प्रदीप ताम्हाणेंसारखे देशभक्त उद्योजक हे खऱ्या अर्थाने भारताचं नाव समृद्ध करत आहेत.

 

– प्रमोद सावंत

८१०८१०५२३२

संग्राहक : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! उर्वशी आणि सज्जन ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? उर्वशी आणि सज्जन ! ? 

“न..म..स्का..र 

पं..त,

हा….

तु..म..चा

पे…प….र !”

“अरे मोऱ्या, एवढी थंडी वाजत्ये तर पेपर न्यायचाच कशाला म्हणतो मी ?”

“त्याच काय आहे ना पंत, तुमचा पेपर वाचल्या शिवाय दिवसाची सुरवातच झाल्या सारखी वाटत नाही बघा मला !”

“म्हणजे रे काय मोऱ्या ? माझ्या पेपरला काय जगा वेगळ्या बातम्या असतात की काय ? मुंबईला ‘अभूतपूर्व थंडी’ ही बातमी माझ्या पेपरात काय, ‘मुंबईत उष्णतेची लाट’ अशी थोडीच छापणार आहेत ?”

“तसं नाही पंत, पण चहा पिता पिता तुमचा पेपर वाचला, की लगेच हेड ऑफिसचा कॉल येतो आणि एकदा का तो कॉल व्यवस्थित पार पडला, की सारा दिवस कसा उत्साहात जातो माझा !”

“अरे गाढवा, पण ज्या दिवशी पेपरला सुट्टी असते तेव्हा काय करतोस रे ?”

“जाऊ दे पंत, त्या विषयी नंतर बोलू ! पण मला एक सांगा, तुम्हांला कशी नाही थंडी वाजत या वयात ?”

“या वयात म्हणजे ? गधड्या आत्ता कुठे माझी सत्तरी आल्ये !”

“हॊ, माहित आहे मला, पण या वयात अंगातलं रक्त कमी होतं आणि त्यामुळे थंडी जास्त वाजते असं म्हणतात, म्हणून म्हटलं !”

“अरे आमची जुनी हाडं पेर ! असल्या बारा अंशाच्या थंडीला ती थोडीच भीक घालणार आहेत !”

“पंत, पण थंडी वाजू नये म्हणून तुम्ही काहीतरी उपाय करतच असणार ना ?”

“हॊ करतो नां! अरे मस्त आल्याचा चहा घेतो दोन तीन वेळेला आणि पाती चहाचा काढा सुंठ, काळी मिरी घालून उकळत ठेवला आहे बायकोने, तो पण घेतो मधून मधून ! मग थंडीची काय बिशाद !”

“अच्छा ! पण पंत तुम्हाला एक सांगू का, आपल्या मायबाप सरकारला यंदा आलेल्या बोचऱ्या थंडीची चाहूल आधीच लागली होती, असं मला आता वाटायला लागलंय !”

“असं कशावरून म्हणतोयस तू मोऱ्या ?”

“अहो पंत असं काय करता, सध्या सगळ्या पेपर मधे एकच विषय तर घटा घटा प्यायला, सॉरी, चघळा जातोय ना, वाईन, वाईन आणि फक्त वाईन !”

“तू म्हणतोयस ते बरोबर आहे रे मोऱ्या. अरे त्या वाईनच्या बातम्यांनी किराणामालाच्या दुकान मालकांचे गल्लेपण गरमा गरम झाले असतील नाही !”

“बरोब्बर पंत !”

“मोऱ्या, पण मला एक सांग, आपल्या चाळीच्या कोपऱ्यावरच्या ‘उर्वशी साडी सेंटर’ मधे सकाळ पासून खरेदीसाठी लाईन कशी काय लागलेली असते हल्ली ? काल परवा पर्यंत त्या दुकानात काळं कुत्र सुद्धा फिरकत नव्हतं रे !”

“अहो पंत तो पण वाईनचाच महिमा !”

“काय सांगतोयस काय मोऱ्या ?”

“अहो पंत, त्या उर्वशी साडी सेंटरच्या मालकाने एक स्कीम चालू केली आहे !”

“कसली स्कीम ?”

“अहो पहिल्या शंभर गिऱ्हाईकांना एका साडीवर एक वाईनची बाटली फुकट ! म्हणून तर सकाळ पासून गर्दी असते तिथे !”

“अरे पण नवीन सरकारी नियमांप्रमाणे साडीच्या दुकानात वाईन विकायला परमिशनच नाही, मग तो …..”

“अहो तो वाईन विकतच नाही, तो साडयाच विकतो ! पण एका साडी खरेदीवर तो एक कुपन देतो ! ते घेवून त्याच्याच भावाच्या किराणा मालाच्या दुकानात जायचं आणि ते कुपन दाखवून वाईनची एक बाटली मोफत मिळते ती घेवून घरी जायचं !”

“हे बरं आहे, म्हणजे साडी खरेदीमुळे बायको खूष आणि वाईन मिळाल्यामुळे नवरा पण खूष !”

“अगदी बरोब्बर बोललात पंत ! पंत,

पण एक विचारू का तुम्हांला ?”

“अरे विचार नां, त्याच्यासाठी परमिशन कसली मगतोयस, बोल ! “

“पंत ह्या ब्यागा कसल्या भरल्येत तुम्ही, कुठे बाहेर जाताय का काकूंच्या बरोबर ?”

“मोऱ्या, अरे पुण्यात जाऊन येतोय दोन तीन दिवस हिच्या भावाकडे !”

“काही खास प्रोग्राम ?”

“काही खास प्रोग्राम वगैरे नाही रे ! तुला तर माहित आहेच, हिचा भाऊ पुण्यात ‘अस्सल पुणेरी अर्कशाळा’ चालवतो ते !”

“हॊ मागे काकूंनी सुनीताला ओव्याच्या अर्काची बाटली दिली होती एकदा !”

“हां, तर त्याच हिच्या भावाने त्याच्या अर्कशाळेत, अथक परिश्रमातून साबुदाण्यापासून बनवलेली, उपासाला चालणारी, ‘सज्जन वाईन’ बनवल्ये आणि त्या वाईनच्या पहिल्या बाटलीच बूच, मी माझ्या हस्ते उघडून त्याच्या या नवीन वाईनच मी उदघाट्न करावं असं माझ्या मेव्हण्याला वाटत, म्हणून चाललोय पुण्याला !”

“धन्य आहे तुमची आणि तुमच्या त्या सज्जन मेव्हण्याची !”

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

ताजा कलम  – या पुढे भविष्यात प्रौढ शिक्षणाच्या मास्तरांनी, ‘झोप’ या विषयाला धरून निबंध लिहायला सांगितला, तरी त्या विषयी आज जागेपणी, काहीही न लिहिण्याचा मी संकल्प करत आहे !

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ करोनाचे धडे…☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ  ज्योती विलास जोशी

?  विविधा ?

☆ करोनाचे धडे… ☆ सौ ज्योती विलास जोशी 

थांब……

तुला शिकवीन चांगलाच धडा…

तुझ्या पापाचा भरलाय घडा….

असं म्हणत कोणीसं आलं… ती नक्कीच फुलराणी नव्हती… पुरुषाच्या आवाजातला राक्षस होता तो! ‘करोना’ नाव त्याच!! ‘ती फुलराणी’ नाटकातील मंजुळेचं फर्मास स्वगत ऐकलेले आम्ही लोक.. या करोनाच्या भयावह स्वगतानं हादरून गेलो. फुलराणी स्वर आणि व्यंजन यांच्या ब्रह्मघोटाळ्यात सापडलेली होती, तर करोनानं आम्हालाच ब्रह्म संकटात टाकलं……

‘ये करो ना’ ‘वो करो ना’ असे धडे देत या अतिसूक्ष्म विषाणूनं आम्हाला हैराण करून टाकलं. फुलराणीनं अशोक मास्तरच्या नावानं जितकी बोटं मोडली नसतील तेवढी आम्ही याच्या नावाने रोज मोडतोय हल्ली… अगदी फसवा आणि मायावी राक्षस आहे हा! आपले अणुकुचीदार दात विचकत आला आणि काही न बाइंच बोलत सुटला….

माणसा रे माणसा तू असा रे कसा?

भोग कर्माची फळं रडत ढसाढसा.

आमचं काय चुकलं म्हणून शाप देतोय हा आम्हाला? हो, आणि हा कोण आमच्याविषयी अभद्र बोलणारा? आमच्या प्रश्नार्थक मुद्रेकडं बघून लगेच म्हणाला, ‘पेराल तसे उगवेल’ आमच्या सगळं डोक्यावरून गेलं. आता त्यांनं आमचा माजच काढला.

माज तुझा उत्तरला तरी अजून तोरा

भिकेला लागशील सुधार जरा पोरा.

एव्हाना आमचा माज उतरला होता.आम्ही त्याला साक्षात दंडवत घातला. गयावया करून हात जोडले. क्षमा मागून, आमचे काय चुकले? असा प्रश्न विचारला. आम्ही शरणागत झालेलं पाहून विजयी मुद्रेनं तो आता गझल गाऊ लागला.

युही बेसबब न फिरा करो

कोई शाम घर मे भी रहा करो

कोई साथ भी न मिलेगा जो गले लगोगे

ये नये मिजाज का शहर है

जरा फासले से मिला करो.

आमच्या घराघरात नांदणारा मना-मनाला दुखवणारा नाती संपुष्टात आणणारा हा राक्षस आणि त्याचा डाव आम्ही ओळखला. तो आम्हाला आमच्या आप्तस्वकीयांना भेटायचं नाही असा कायदा करतोय याचा आम्हाला राग आला त्याचा हा कायदा आम्हाला नामंजूर होता पण काय करणार अडला नारायण….

आता तो निसर्गाचे गुणगान गायला लागला आणि आम्हाला कोसू लागला.

निसर्गाला धरलयंस वेठीला

कंटाळलाय तो तुझ्या अत्याचाराला

कळत कसं नाही तो सूड उगवतोय

कृतघ्न तू तुला धडा शिकवतोय.

निसर्गाला शरण यायला हवं हा धडाच तो शिकवत होता. मनोमन पटलं देखील! निसर्ग  सर्वांना समान वागणूक देणारी सर्वश्रेष्ठ देवता…. आम्ही पुन्हा हात जोडले.

करोना राक्षसाचे आमच्यावरील आरोप म्हणजे जणू एक एक परमाणूच!

माणसानंच माणसाला डंख मारलाय

माणुसकीलाच संपवलस तू .

मोठा समजतोस स्वतःला

असा रे कसा निर्दयी तू?

त्याचा रोख आमच्याच एका प्रजातीकडे आहे हे आम्ही ओळखलं पण त्यात आमचा काय दोष? ओल्याबरोबर सुकंही जळतं म्हणतात ना? तेच खरं.

पहिली लाट माझं येणं

दुसऱ्या लाटेवर स्वार होणं

तिसऱ्या लाटेची भीती असणं

याचं कारण तुझं वागणं

प्रत्येक गोष्टीला तो आम्हाला जबाबदार धरत होता. आम्ही एकमेकाकडे बघू लागलो,स्वतःलाही निरखू लागलो.

शेतकरी तुझा पोशिंदा

शेतात झालाय क्वारनटाईन

निसर्गावर निर्भर तो

झालांय अगदी हवालदिल

खरंच अन्नदाताच तो! त्याला आम्ही कशी वागणूक देतो? त्याच्या अशिक्षित असण्याचा कसा फायदा घेतो? त्याच्या श्रमाची किंमत आम्ही कशी करतो? आम्ही आता लाजून मान खाली घातली.

चंगळवादाचं प्रतीक तू

गरज तुझी संपत नाही

ओरबाडून घ्यायची तुझी वृत्ती

शोषण करायची तुझी प्रवृत्ती

आम्ही गरजेपेक्षा जास्त साठवतो,नासवतो, वाया घालवतो हे आमच्या लक्षात आलंच आहे.आमची झुकलेली मान वर येईचना..

ओढवलेली आर्थिक मंदी

विनाशाची ही तर नांदी

परिस्थिती कोलमडली

मानसिकता बिघडली

आमच्या संसाराचं गणित खरंच बसेना झालंय.ओढाताण व्हायला लागलीये. राक्षस खरंच बोलत होता.

पैसा नाही सर्व काही

माणुसकी असे मोठी

संस्कृती परंपरा प्रथा यांचा

संचय हवा तुझ्या गाठी.

रग्गड पैसा असूनही एकाच तिरडीवर अनेक देह जळत असलेले आम्ही याची देही याची डोळा पाहतो आहोत राक्षस आमचे डोळे उघडू पाहत होता.राक्षसाचा सूर आता समजावणीच्या झाला होता त्यामुळे आमच्याही डोक्यात थोडं थोडं शिरायला लागलं होतं.

आरोग्याला प्रथम मान

अन्नपूर्णेचा करा सन्मान

समतोल आहार नियमित व्यायाम

हाच आहे खरा आयाम

आरोग्याची त्रिसूत्री सांगायलाही तो विसरला नाही आता आम्ही पद्मासन घालून बसलो.

राग लोभ मोह मत्सर

सर्वांना आवर घालून

निर्मळ विचारांना आत घे

मनाचं कवाड उघडून

राक्षस अध्यात्म शिकवू लागला होता.ज्याची आता आम्हाला खरंच गरज होती. आम्ही तल्लीन होऊन ऐकू लागलो.

जान है तो जहान है

मंत्र मोठा या घडीला

डॉक्टर देतात जीवाला जीव

स्वतःचा जीव लावून पणाला

‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ असं ज्यांचं वर्णन करावं ते डॉक्टर रोज संकटयुद्धावर असतात. आम्ही सुरक्षित घरात बसतो. याचा विचार न करता आम्ही जे मारहाणीचे प्रकार अवलंबले आहेत,ते पाप आम्ही कुठे फेडावं? आम्ही दोन्ही गालांवर चापट्या मारून तोबा तोबा केलं.

आत्मनिर्भर तुझ्या देशांनं

सिद्ध केलं स्वतःला

सकारात्मक विचारसरणीचा

धडा दिला महासत्तांना

देशाभिमानाची जाणीव झालेल्या आम्ही मान वर केली. जयहिन्दचा नारा लावला. ऊर भरून आलं आमचं..

तुझा ग तुझा म तुझा भ तुझा न…..

असं म्हणत तो आमच्या भोवती फेर धरून नाचू लागला. तो आता आणखी कोणता धडा शिकवणार याकडं आमचं लक्ष लागून राहिलं होतं

लाव पणाला शास्त्र तुझं सोडून भूक-तहान

लाव सत्कारणी वेळ तुझा द्याया जीवनदान

स्वयंसूचना ऐकून तू वाचव हा जहाँ

दे नारा अभिमानानं मेरा भारत महान

असे अनेक धडे देणारा असा हा करोना राक्षस,’विश्वात शांती नांदावी म्हणून पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वरांना स्मरा’ असं तर सांगत नाही ना?

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चहा – भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

☆ चहा ☕ भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

ओतून दिलेला चहा मोरीत  वाहत होता .पाण्यात मिसळून त्याचा रंग बदलत होता ,मी टक लावून पाहत होतो.पाहता पाहता मी माझ्या बालपणीच्या आठवणीत केव्हा गेलो कळलेच नाही……….

सकाळ झाली की आमचा सर्व भावंडांचा घोळका अंगणातील चुली भोवती जमायचा .लाकडे पेटवून या चुलीवर पाणी गरम करणे,सकाळचा चहा हे सर्व सोपस्कार याच चुलीवर व्हायचे.पण खरं तर या चुलीचा फायदा हिवाळ्यात हात शेकण्यासाठी व चर्चा करण्यासाठी अधिक व्हायचा.कधी कधी याच चुलीवर गोवऱ्यांच्या राखेत  भरतासाठी वांगी किंवा हुरड्याची कणसे भाजली जायची .पण आमच्यासाठी रोजचा आनंददायी प्रसंग म्हणजे सकाळचा या चुलीवर तयार होणारा चहा.आम्ही सात बहीण भाऊ,आत्या आई बाबा आणि वेळेवर येणारा आगंतुक असा दहा बारा लोकांचा चहा आमची आई मांडायची,चहा मांडायची म्हणजे गंजात तितके कप पाणी टाकायची,त्यात रेशन दुकानातून मिळालेली दोन मुठी साखर टाकली जायची. त्यात ब्रुक ब्रँड कंपनीची फुल छाप चहापत्ती टाकली जायची.या चाहापत्तीच्या  दहा पैसे किमतीच्या पुड्या किराणा दुकानात मिळायच्या.शिलाई मशीन द्वारा या पुड्यांच्या माळा कंपनीचं बनवीत असे, दिवाळीतील उटण्याचा पुड्या प्रमाणे त्या दुकानात लटकलेल्या असतं. आमच्या आईचं गणित असे होते की एका वेळेसच्या चहा साठी एक पुडी टाकायची ,असे हे लाल रसायन चुलीवर उकळायचे,लवकर उकळी यावी म्हणून आम्ही भावंडं फुंकनिने फुंकून जाळ वाढविण्याचा प्रयत्न करायचो. उकळी येईपर्यंत चहाकडे पहात राहणे हा आम्हासाठी आनंददायी अनुभव असायचा.सुरवातीला बुडबुडे यायचे नी मागून उकळीचा भोवरा.तो पर्यंत कुणीतरी दहा पैशाचे दूध ग्लासात विकत आणले असायचे ,ते चहाच्या रसायनात टाकले की बस चहा तयार…..चहा तयार झाला की आम्ही भावंडं आपापली भांडी पुढे करायचो.बहुदा त्या मोठ्या वाट्या असायच्या.मोठ्यांना कपबशी भरून चहा दिला जायचा त्याचा आम्हाला हेवा वाटायचा.आम्हाला त्यामुळे कमी चहा मिळेल असे उगीच वाटायचे.आमच्या भांड्यात आईने थोडा जास्त चहा टाकावा म्हणून प्रत्येकाचा प्रयत्न असायचा.त्यात भांडणे व्हायची व एखाद्याचा चहा सांडायचा मग सर्व भावंडं त्याला आपला थोडा थोडा चहा दयायचे.  रात्रीच्या शिळ्या पोळ्या मग आम्ही या चहात तुकडे करून टाकत असू.थोड्या वेळात त्या मस्त नरम होत.त्याचा आस्वाद आम्हाला अमृततुल्य वाटायचा.

चहाचा एक थेंबही वाया जात नसे.भलेही या चहात भरपूर दूध, विलायची,मसाले अद्रकं नसेलही पण आम्हाला फरक पडत नसे.त्यामुळेच कदाचित आज मोरीत टाकलेल्या चाहाबद्दल हळहळ वाटली असावी.पोरांना चहाची खरी किंमत व आनंद कसा कळेल.चूक त्यांची नाही,गरिबी त्यांच्या वाट्याला आलीच नाही.         

समाप्त

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गभस्तिनी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

सौ कुंदा कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ गभस्तिनी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆ 

गभस्तिनी ही महर्षि दधीचि  यांची पत्नी, महर्षी अगस्ती यांची मेहुणी व लोपामुद्राची बहीण होती. उत्तर प्रदेशात नैमिषारण्याजवळ सीतापुर येथे दधीची ऋषींचा आश्रम होता. पतीसमवेत ती आनंदाने रहात होती. आश्रमाजवळ अनेक वृक्ष पक्षी व प्राणी होते. त्यांच्यावर हे पती-पत्नी खूप प्रेम करत. आश्रमात कोणीही आले तरी गभस्तिनी  आनंदाने त्यांचे स्वागत करत असे. दाधीचि ऋषींच्या हाडांमध्ये वज्र तेज होते. वृत्रासुर राक्षसाचा वध करण्यासाठी इंद्रादी देवांनी त्यांना अस्थि दान करण्यास सांगितले. ऋषींनी आनंदाने अस्थिदान केले. कामधेनूने त्यांचे सर्व मांस चाटून टाकले. तिथे फक्त त्यांचे केस आणि त्वचा उरली. त्यावेळी गभस्तिनी गंगा नदीचे पाणी आणण्यासाठी गेली होती. ती परत आल्यावर तिला आपले पती दिसेनात. तिने अग्नीला विचारले माझे पती कुठे आहेत? अग्नीने सर्व प्रसंग सांगितला. तिला खूप वाईट वाटले. ती पतिव्रता होती. मी आता सती जाणार असे तिने सर्वांना सांगितले. परलोकात मला माझे पती भेटतील असे ती म्हणू लागली. इंद्राने खूप समजावण्याचा प्रयत्न केला. तू गरोदर आहेस. तुला सती जाण्याचा अधिकार नाही. पण ती अत्यंत हुशार होती. आपल्या ज्ञानाच्या सहायाने तिने कुणाचीही मदत न घेता स्वतःचा गर्भ स्वतःच बाहेर काढला. व पिंपळाच्या झाडाकडे गेली. खरं तर तिथे खूप वृक्ष होते. पण पिंपळ हा सर्वश्रेष्ठ वृक्ष आहे तो 24 तास प्राणवायू बाहेर टाकत असतो. त्याची पाने फुले फळे खाण्यायोग्य असतात याचे पूर्ण ज्ञान तिला होते. तिने आपला गर्भ पिंपळाला अर्पण केला व सांगितले या माझ्या होणाऱ्या बाळाला भाऊ बहीण नाहीत. तूच त्याचे पालन पोषण आणि रक्षण कर. व तिने अग्नीला वंदन केले. स्वतःच चिता रचली. व पतीचे केस आणि त्वचा यासह तिने अग्निप्रवेश केला. तिची आज्ञा शिरसावंद्य मानून पिंपळ वृक्षाने त्या गर्भाची देखभाल पालन पोषण केले. नऊ महिने होताच त्यातून एक बालक जन्माला आले. पिंपळ वृक्षाची पाने फुले फळे खाऊन ते वाढू लागले. तेच पिप्पलाद ऋषी.

गभस्तिनीला आपले बाळ पाहता आले नाही. पण बाळाच्या जन्माची पालनपोषणाची पूर्ण जबाबदारी पिंपळ वृक्षाकडे सोपवून पतीबरोबर सती जाणे हा पत्नीधर्म तिने  निभावला. आजचे टेस्ट ट्यूब बेबी, सरोगेट मदर, सिझेरियन हे तंत्रज्ञान तिच्या अगाध ज्ञानापुढे फिके आहे. अशी ही न भूतो न भविष्यती आदर्श पत्नी आदर्श माता. कोटी कोटी नमन

 

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गोडी अमृताची, झळाळी सुवर्णाची ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ गोडी अमृताची, झळाळी सुवर्णाची ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

१५ ऑगस्ट १९४७ ‘स्वतंत्र भारता’ ची पहिली पहाट झाली. प्राचीवर केशरी रंगाची उधळण, सूर्यकिरणांची शुभ्र प्रभा आणि स्वतंत्र भूमातेची हिरवाई या सर्वांमध्ये असंख्य स्वातंत्र्यवीरांचे शौर्य, त्याग, बलिदान यांचे पवित्र असे ‘नीलचक्र’ यांच्या संगमातून जणू सर्वत्र भारताचा तिरंगा ध्वज लहरत होता. सर्वत्र आनंदी आनंद भरून वाहत होता. स्वतंत्र भारतात सर्वजण मुक्त श्वास घेत होते. स्वातंत्र्यलढ्यातून स्वातंत्र्यप्राप्तीची यशश्री लाभली होती.

हा लढा सोपा नव्हता. असंख्यांचे अतुलनीय शौर्य, असीम त्याग आणि परम बलिदान यामुळे हा दिवस उजाडला होता. म्हणूनच या सर्वांचे मंगल स्मरण आणि त्यांच्या कार्याचे पावित्र्य राखणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. देशहीत जपणाऱ्या चांगल्या कृतीतून त्यांना आपण मानवंदना दिली पाहिजे.

आज देशाच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी होत आहे. देशाने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. मोठी प्रगती केली आहे. वेगवेगळ्या वाटा चोखाळत यशाची शिखरे गाठली आहेत.

या टप्प्यावर थोडे सिंहावलोकन केले, थोडे सद्य परिस्थितीचे अवलोकन केले तर काही गोष्टींचा आवर्जून विचार करायला हवा हे लक्षात येते.

आपल्या देशाचा प्राचीन इतिहास अतिशय वैभवशाली, समृद्ध असा आहे.नंतर देशाला दीर्घकालीन अशा पारतंत्र्याला तोंड द्यावे लागले. त्यासाठीच दीर्घकालीन स्वातंत्र्यलढा सुरू होता. असंख्य क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी, निस्सीम देशभक्तांच्या परम बलिदानाने, धैर्याने, शौर्याने, त्यागाने देशात स्वातंत्र्याची पहाट उगवली.

स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाही प्रस्थापित झाली. देशाने या दीर्घ कालखंडात अनेक राजकीय स्थित्यंतरे अनुभवली. मत-मतांतरे, विविध वैचारिक धारा यातून देशाला वाटचाल करावी लागली. तरीही देशाने अखंड प्रगतीची वाट सोडली नाही.

मुळामध्ये आपल्याला आध्यात्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, बौद्धिक, वैचारिक बैठक भक्कम लाभलेली आहे. या पक्क्या पायावर प्रगतीचा आलेख चढत गेला आहे. आधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण, विज्ञान, वैद्यकशास्त्र, संरक्षण शास्त्र, दळणवळण अशा कितीतरी क्षेत्रात देशाने प्रगतीची नवी नवी शिखरे गाठलेली आहेत. अणूचाचणी आणि अंतराळ संशोधन क्षेत्रातली प्रगती तर अत्युच्च अशी आहे. संशोधन क्षेत्रातही खूप मोठे काम सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानात तर जगातील अव्वल देशांत आपला समावेश आहे.

आत्ताच्या कोव्हिड -१९ च्या महामारीवर स्वतःची लस तयार करून यशस्वी मात करणे हे तर देशाचे अभूतपूर्व यश आहे. जगाच्या इतर देशांमधील, अगदी प्रगत देशांमधील परिस्थिती पाहिल्यावर आपली कामगिरी अगदी कौतुकास्पद आणि अभिमानाचीच आहे.जगण्याच्या प्रत्येक स्तरावर प्रचंड विभिन्नता असणाऱ्या एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या आपल्या देशाने जिद्द, प्रामाणिक प्रयत्न आणि धैर्याने सामूहिकरित्या संकटांचा यशस्वी प्रतिकार केलेला आहे.

स्वातंत्र्याबरोबरच सदैव धगधगती सीमा सुरक्षा देशाच्या वाट्याला आलेली आहे. देशाने युद्ध, दहशतवादी कारवाया यांचा धैर्याने सामना करीत यशस्वी प्रतिकार केलेला आहे.  आज लष्कराच्या तिन्ही दलांची अद्ययावत बांधणी, प्रभावी शस्त्रसज्जता यामुळे देशाच्या संरक्षणाच्या बाबतीत मजबूत स्वयंपूर्णता आलेली आहे.

या देशात तरुणाईची संख्या खूप मोठी आहे ही आपली मोठी जमेची बाजू आहे. या हुशार, सक्षम तरुणवर्गाला योग्य ध्येय, योग्य मार्गदर्शन आणि योग्य संधी मिळणे खूप आवश्यक आहे. यासाठी जाणकारांनी, ज्येष्ठांनी प्राधान्याने त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे.  अगदी लहान मुलांना चांगले संस्कार,  देशप्रेमाचे धडे योग्य पद्धतीने दिले पाहिजेत. सोशल मीडिया, नव्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर, त्यातील गंभीर धोके समजावून सांगितले पाहिजेत.

आपल्या देशाला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. तिन्ही ऋतू आपल्याकडे समानच असतात. भरपूर पाऊस, खळाळत्या नद्या, स्वच्छ भरपूर सूर्यप्रकाश, भरपूर हिरवी गर्द वनराई ही आपली समृद्धी आहे. पण वाढत्या शहरीकरण, औद्योगिकीकरणाच्या नादात आपले तिकडे दुर्लक्ष झाले आहे. मोठ्या प्रमाणावर जल, वायू प्रदूषण, प्रचंड प्रमाणात वृक्षतोड याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम दिसत आहे. परिणामतः निसर्गाचे चक्र बिघडते आहे. बदलत्या हवामानाने सतत शेती पिकांचे खूप मोठे नुकसान होते आहे. यासाठी निसर्गाला जपले पाहिजे. नदीजोड प्रकल्प प्रत्यक्षात आणले पाहिजेत. शेतकरी वर्गाची परिस्थिती सुधारून शेती व्यवसाय पुन्हा भरभराटीला आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत.

इतरही सर्व गोष्टींमधे देशात सर्व काही चांगलेच, सुरळीत सुरू आहे असे नाही. परकीय शक्तींचे आक्रमण, दहशतवादाचा वाढता धोका या पासून सावध राहायला हवे. मुकाबला करण्यासाठी सतत सज्ज असायला हवे.

इतरही अनेक प्रश्न, अनेक अडचणी आहेत. वाढता भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, धर्मांधता, अज्ञान, दारिद्र्य, कुपोषण, अस्वच्छता, रोगराई अशा कितीतरी गोष्टींवर खूप काम व्हायला हवे. म्हणजे मग समाजाच्या सर्व स्तरातील अंतर कमी होत एकसंध समाज निर्माण होण्यास मदत होईल. या सर्व अभियानांमध्ये प्रत्येकाने सक्रिय सहभागी होत आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे. म्हणजे मग देश नक्कीच प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर राहील यात शंका नाही.

देशाची एवढी प्रचंड लोकसंख्या, इतक्या विविध प्रांतातील नैसर्गिक, सामाजिक वेगळेपण, विभिन्न भाषा, विचारसरणी, राहणीमान यामुळे कोणतीही गोष्ट सहजासहजी साकार होत नाही. राजकीय हेतूने आरोप-प्रत्यारोप, विरोध अडचणी  ठरलेल्या असतात. यातूनही मार्ग काढत कितीतरी चांगल्या गोष्टी देशाने केलेल्या आहेत. व्यापक देशहीताचा विचार करून लोकांनी यासाठी पुढे आले पाहिजे. जबाबदार नागरिक बनून आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत.  भ्रष्टाचार, हिंसाचार, स्त्रीयांवरील अत्याचार, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान असे कुठलेही दुष्कृत्य घडू नये यासाठी जागरूक राहिले पाहिजे. आपल्या घराप्रमाणेच देशाचीही काळजी घ्यायला हवी. दुसऱ्या देशातील चांगल्या गोष्टींचे गोडवे गात न बसता त्याच गोष्टी आधी आपल्या देशात आपण पाळण्याचा निर्धार केला पाहिजे.

आज आपला देश प्रगतीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामे, सुधारणा सुरू आहेत. मोठमोठे प्रकल्प, उद्योगधंदे, तंत्रज्ञानाची मोठी झेप घेत देश जगातल्या प्रमुख देशातला महत्त्वाचा देश नक्कीच बनेल. त्यादृष्टीने देशाची वाटचाल सुरू आहे. हे यश आपणा सर्वांचे असणार आहे. यासाठी सरकार, प्रशासन आणि नागरिक यांच्या छान समन्वयाची वज्रमूठ बांधली गेली तर प्रगतीचा हा  गोवर्धन उचलणे शक्य होणार आहे. शेवटी ही श्रीकृष्णाची भूमी आहे.

स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ साजरा करून’शतक महोत्सवी” वर्षात देश पुन्हा वैभवाच्या शिखरावर असेल हे निश्चित.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चहा – भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

☆ चहा ☕ भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

सकाळची बगीच्यातील रपेट व मित्र मंडळीतील गप्पा आटोपून घरी आलो, घड्याळाकडे नजर टाकली साडेआठ वाजून गेले होते. घरात शांतता पसरली होती,म्हणजे तरुण मंडळींचा दिवस अजून सुरू झाला नव्हता तर,आमच्या सौ. ही दिसत नव्हत्या पण त्या जागृत झाल्याचे पुरावे दिसत होते.बाहेर पडलेले वर्तमानपत्र टीटेबलवर ठेवलेले होते. सोफ्यावर टाककेले कव्हर नीट नेटके केलेले होते,खोलीतील सटर फटर सामान योग्य जागी  पोहोचले होते.देवघरासमोरील पदकात ताजी पारिजात व शेवंतीची फुले वातावरणात प्रसन्नता निर्माण करीत होती.बहुतेक सौभाग्यवती टेरेसवर गार्डन मध्ये झाडांना पाणी टाकत असाव्या,मी नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र उचलले, मुख्य बातम्या वर नजर टाकली व ठेऊन दिले कारण ते माझे दुपारचे बौद्धिक खाद्य होते. सहजच किचन कडे नजर टाकली गॅसवर काहीतरी होते. जवळ जाऊन पाहिले तो चहा होता. बऱ्याच वेळेपूर्वी बनविलेला असावा, पूर्ण थंड झाला  होता. तीन चार कप तरी होताच. बऱ्यापैकी उकळल्या गेल्यामुळे चहाला मस्त रंग चढला होता,दुधात नाममात्र पाणी असावे,त्यात रेड लेबल चहा भरपूर टाकला होता.चार पाच वेलचीच्ये दोडे आणि अद्रकाचे तुकडे त्यात होते, ते माझ्याकडे पाहून हसत आहेत असे मला वाटले. तो चहा पाहून माझी चहाची तलफ जागृत झाली,मी हळूच गॅस सुरू केला समोरच्या कपाटातून घेतलेल्या कपात मी चहा ओतून घेतला, नी पिणार तोच आमच्या सौ.आल्याची चाहूल लागली. पायऱ्यांवर  ती वरून येताना दिसली, अग तू पण घेतेस का चहा, मी सहज विचारले. अहो तो चहा बिलकुल पिऊ नका,किती वेळचा उघडा पडून आहे.सकाळी मुले उठतील आणि कामवाली येईल म्हणून मांडला होता पण कामवाली आली नाही, नी मुले तर अजूनही उठली नाही. मोरीत ओतून द्या तो चहा,दोन तास जुना आहे तो. सौ.ची आदेशवजा सूचना, कानावर पडली पण भरपूर दुधाचा महागडी चाहापत्ती आणि अद्रक विलायची चा तो श्रीमंत चहा मोरीत टाकून देण्याची  इच्छा होत नव्हती,अग काही होत नाही चहाला!  टपरी वाले नाही का दिवस भर चहा विकत राहतात.मी स्वतःचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला.तेव्हड्यात आमचे कन्या पुत्र दोघेही अवतरले,चहा प्रकरण दोघांनी ऐकले,दोघेही मला समर्थन देतील असे वाटले,पण दोघांनी मलाच समजावलं,अहो बाबा जहर असते जुना चहा असे म्हणत आमच्या कन्येने पुरा चहा मोरीत ओतला माझ्या हातातील कपासह.मी पाहतच राहिलो,

 

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अद्भुत मंदीरे… संकलन :- सतीश अलोणी ☆ संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

?इंद्रधनुष्य?

अद्भुत मंदीरे… संकलन :- सतीश अलोणी ☆ संग्राहिका – सौ. स्मिता पंडित ☆ 

जाणून घेऊ या, या काही अदभुत मंदिरांची माहिती.

भारत हा एक असा देश आहे, जिथे लोक विविध रितीभातींना मानतात आणि आपल्या धर्म आणि आस्थानुसार ते मंदिरांत पूजा-पाठ करतात.

अशाच एका मंदिरा बद्दल सांगत आहोत, जिथे देवाची नाही तर प्राण्यांची पूजा करतात. या मंदिरात लोक प्राण्यांना श्रद्धाभाव ने पाहिले जाते. त्यामागे काही आख्यायिका देखील आहे. येथे असणारे प्राणी देखील लोकांना नुकसान पोहोचवत नाही. चला तर मग जाणून घेऊ या, या काही मंदिरांची माहिती.

१) डॉग टेम्पल, कर्नाटक-

हे डॉग टेम्पल कर्नाटकाच्या रामनगर जिल्ह्याच्या चन्नापटना मध्ये स्थित आहे. या मंदिराची निर्मिती वर्ष २०१० मध्ये एक व्यवसायिका द्वारे केली गेली. हा व्यवसायिकाने केम्पम्मा मंदिराची निर्मिती केली , हे मंदिर ग्रामदेवी केम्पम्मा यांना समर्पित आहे.एका आख्यायिकेनुसार, मंदिराची स्थापना होत असताना ग्राम देवी केम्पम्मा यांनी दोन कुत्र्यांना शोधण्याचा आदेश ग्रामस्थांना केला होता, जे पूर्वी गावातून गायब झाले होते, जेणे करून मंदिराला वाईटापासून वाचवता येईल.

ग्रामीणांना ते कुत्रे मिळाले नाही, म्हणून त्यांनी एक मंदिर बनवले आणि मंदिरात दोन कुत्र्यांच्या मुरत्या स्थापित केल्या. एका आख्यायिकेनुसार, ग्रामस्थांनी या डॉग टेंम्पल मंदिराचा निर्माण करून कुत्र्यांची माणसांच्याप्रति एकनिष्ठेच्या भावनेला समर्पित केले आहे.

२) भालू मंदिर –

छत्तीसगढ़- छत्तीसगढ़ मध्ये चंडी माता मंदिर आहे. हे मंदिर बऱ्याच गोष्टींसाठी विशेष आहे. छत्तीसगडच्या या महासमुंदाच्या या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की, या मंदिरात आरतीच्या वेळी काही भालू (अस्वल) येतात आणि इथल्या पुजाऱ्याकडून प्रसाद घेऊन खातात. आणि या मंदिराच्या नऊ प्रदक्षिणा लावून परत निघून जातात. विशेष म्हणजे की, या मंदिरात येणारे भालू कधीही कुणाला त्रास देत नाही. या मंदिरात येणाऱ्या भालूंच्या उपस्थितीमुळे या चंडी माता मंदिराला भालू मंदिर म्हणून देखील ओळखले जाते.

३) मंकी मंदिर –

जयपुर- राजस्थानच्या जयपूरच्या टेकड्यांमध्ये गलताजी यांचे मंदिर आहे. इथे भाविक पवित्र पाण्यात स्नान करण्यासाठी येतात. या परिसरात रामगोपालजी नावाचे मंदिर आहे, या मंदिरात माकड मोठ्या संख्येने येतात. मंदिरात माकडांच्या उपस्थितीमुळे या मंदिराला माकडाचे मंदिर किंवा बंदर मंदिर म्हटले जाते. माकडाला मारुती(हनुमानाचे) रूप मानतात, म्हणून लोक या माकडांना सन्मान देतात.

४) मन्नरसला नागराज मंदिर –

 हरिपद,केरळ -केरळच्या हरिपद येथे मन्नरसला नागराज मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन आहे आणि हे मंदिर नागदेवाला समर्पित आहे. हे मंदिर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. हे मंदिर भारताच्या केरळ राज्यात आपले एकमेव मंदिर आहे. या मंदिरात सुंदर सापाच्या मुरत्या नक्काशी केलेल्या आहेत. मन्नरसाच्या मंदिराच्या वाटेवर आणि झाड्यांवर सापाच्या १००००० नक्काशी कोरलेल्या आहे.

या मंदिराच्या भेटीला दूरवरून भाविक येतात. पण अपत्य प्राप्तीची इच्छा करणारे दाम्पत्य येथे आवर्जून भेट देतात. आणि अपत्यप्राप्तीसाठी पूजा करतात. अपत्यप्राप्ती झाल्यावर ते बाळाला घेऊन येथे येतात आणि सापांच्या मुरत्या इथे प्रसाद स्वरूपात अर्पण करतात.

संकलन : सतीश अलोणी

संग्राहक : स्मिता पंडित 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डाॅ.अनिल अवचट .. एक निखळलेला तारा ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?विविधा ?

☆ डाॅ.अनिल अवचट .. एक निखळलेला तारा ☆ सौ राधिका भांडारकर ☆

कितीतरी तेजस्वी तारे निखळले…

डाॅ.अनिल अवचट हे ही ,पुण्यातील अत्यंत नामांकीत ,साहित्यिक, बहुआयामी व्यक्तीमत्व…!

एक पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ता,प्रतिभावंत कलावंत काळाच्या पडद्याआड गेला….

त्यांची कितीतरी पुस्तकं ..!!

त्यांची पुस्तकं वाचत असताना ,आपल्या मध्यम वर्गीय जगण्याच्या पलीकडे एक जग आहे,याची जाणीव होते..आपल्या सुरक्षित कोषातून बाहेर पडण्याची ऊर्मी त्यातून मिळते…

पूर्णीया  हे त्यांचं पहिलं पुस्तक.आणि माझं आवडतं पुस्तक.त्यांत त्यांनी बिहारचं अंतरंग उलगडलय्.तिथली समाजव्यवस्था,जमीनदारी,अस्पृश्यता,वेठबिगारी,कंगाली यांचं वर्णन वाचून अक्षरश:हादरायला होते.

ते संवेदनशील आणि मनमोकळे होते. लोकांमधे वावरणारे होते. ते नि:संशय मराठीतले महत्वाचे लेखक ठरतात.त्यांनी आयुष्यभर मिशनर्‍यांसारखं, वंचितांचं, गरिबांचं, कष्टकर्‍यांचं, जगणं, समाजासमोर आणण्याचं काम केलं.

आणि हे सर्व लिखाण प्रत्यक्ष बघून,फिरून ,बोलून!लोकांमधे वावरून केलं आहे.त्यामुळे त्यांत रुक्षपणा,बोजडपणा ,अजिबात नाही. जणू वाचकाचं बोट धरून त्यांना काही दाखवावं असं त्यांचं लेखन…मोकळं मुक्त…जसं बोलणं तसं लिहीणं…त्यामुळे अनिल अवचट यांच्याशी प्रत्यक्ष ओळख नसली तरी ते कधीही अनोळखी वाटले नाहीत…

धागे आडवे उभे,वाघ्या मुरळी,प्रश्न आणि  प्रश्न, वेध ,छेद, संभ्रम , कोंडमारा,माणसं ,अशा कित्येक पुस्तकांतून  हा पैलुदार साहित्यिक भेटत राहिला…त्यांच्या विचारातला लवचिक पणा ,तसा ठामपणाही सतत जाणवला.अस्तित्व टिकवणारी साहित्यनिर्मीती असंच मी म्हणेन…

दलीत पँथर, छात्र युवा संघर्ष वाहिनी, भूमीसेना, हमाल पंचायत वगैरेंशी त्यांचे संबंध होते. नामदेव ढसाळ, राजा ढाले, कुमार सप्तर्षी यांसोबत ते काही काळ या चळवळीत राहिले.पण कार्यकर्त्याचा आपला पिंड नाही हे जाणून ते त्यातून बाहेर पडले पण एकाचवेळी लेखनाच्या माध्यमातून जोडलेले ही राहिले.

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र ही त्यांचीमहत्वाची सामाजिक ओळख!या त्यांच्या कार्याला पुलंसारख्या आणि अनेक नामांकीत श्रेष्ठींने हात दिले.गेल्या पस्तीस वर्षात त्यांनी कितीतरी हजार व्यसनी लोकांना व्यसनमुक्त करून त्यांचे पुनर्वसन केले.मात्र याचे सर्व श्रेय त्यांनी आपली पत्नी सुनंदाला दिलं.”मी फक्त व्यसनी लोकांच्या जगण्यावर लिहीण्यापुरता…”असे ते म्हणत.

ओरिगामी या कलाछंदांतून ते जगभरच्या बालविश्वाशीही जोडले गेले. त्यांची कित्येक डिझाईन्स ही स्वनिर्मीत  होती… अनेक रुपातले मोर ,गणपती,पक्षी हत्ती घोडे, विदूषक, सांताक्लाॅज्.. त्यांनी स्वत: कागदातून बनवले..जपानमधे ती कायमस्वरुपी प्रदर्शनातही ठेवली आहेत…

ते सुंदर बासरीही वाजवायचे…चित्र काढायचे..

असा हा बहुयामी ,साहित्यिक कलावंत मुक्त मोकळा आणि एक सच्चा माणूस….आज नाही..

विसर्जीत झाला..

त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर…

कागदावरच्या प्रत्येक ठिपक्यात पारदर्शक विसर्जनाचे क्षण तरंगत असतात.

जंगलात ,ऋतुचक्रात हे सामावलेले असते..

झाडाचे पिकले ,पिवळेपान फांदीवरून निसटते.

हवेत तरंगत,मौनाच्या प्रार्थना सारखे जमिनीवर अलगद टेकते…विसर्जित होते.अगदी हळुवारपणे.विसर्जन ही एक  मौलीक गिफ्ट आहे…!!

साहित्यविश्वातले एक सुवर्णपान गळाले…

ज्यांनी जगणे उजळले…

सर्व साहित्यप्रेमींतर्फे या संवेदनशील व्यक्तीमत्वाला प्रेमपूर्वक वंदन…

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

मनोहर फार्म हाउस आज अगदी गजबजून गेलं होतं. जिव्हाळ्याचे नातेवाईक,  स्नेही-संबंधित जमले होते. गेल्या चार वर्षापूर्वी सुहासने आपल्या शाळेतल्या वर्गमित्राकडून प्रकाशकडून ही जमीन विकत घेतली होती. त्याच्या बायकोला कॅन्सर झाला होता आणि तिच्या उपचारांसाठी बर्‍याच पैशांची आवश्यकता होती. उपचाराच्या दरम्यान घरून येण्यासारखे कोणी नव्हते. तिची देखभाल त्यालाच करणं भाग होतं. त्या सगळ्यात त्याची नोकरीही गेली. पाच वर्षापूर्वी सुहासच्या शाळेतील दहावीच्या बॅचने गेटटूगेदर केलं. तेव्हा सुहासला त्याची परिस्थिती कळली. तो पैशासाठी जमीन विकणार असल्याचे तेव्हा म्हणाला. सारखी रजा घ्यावी लागत असल्यामुळे नोकरी कितपत टिकेल, याचीही त्याला शंका वाटत होती. सुहासने मग त्याची जमीन विकत घेतली. पुढे दोन वर्षांनी तिथे फार्म डेव्हलप केला. फार्म हाऊसही बांधलं. त्या सगळ्या इस्टेटीचा व्यवस्थापक म्हणून त्याने प्रकाशलाच नेमलं. जमिनीतून पालेभाज्या,  फळभाज्या,  फुले वगैरे लावून त्याचे उत्पन्नही प्रकाशने घ्यावे, असे त्याने सुचवले. प्रकाशला देवच मदतीला धावून आल्यासारखे वाटले. त्याच्या बायकोची रश्मीची ट्रीटमेंट झाली. आता तिचा धोका टळलाआहे,  असं डॉक्टर म्हणतात. प्रकाश नेहमी म्हणतो, `कृष्ण सुदामाची कथा आपण वाचली होती. सांगतही होतो लहानपणी. पण प्रत्यक्षात असा कृष्ण आपल्या नशिबात येईल, असं कधी वाटलं नव्हतं.’ आता रश्मीची तब्बेतही सुधारलीय.  ती पण भाजीपाला पिकवण्यात,  फुले, हार करणं,  यासारख्या कामात प्रकाशला खूप मदत करते.  सुहासचा एकेकाळचा जिवाभावाचा मित्र त्याचं फार्म आणि फार्म हाऊसचा व्यवस्थापक बनलाय.. त्याच्यावर विश्वास टाकून सुहास गावोगावी, देशोदेशी जायला मोकळा झालाय ॰.

आताशी नातेवाईक, संबंधित म्हणायला लागले होते, `सुहास, तू फार्म हाऊस बांधलंस म्हणे! एकदा बघायला हवं!’  सुहासच्याही मनात येत होतं,  एकदा कुठल्या तरी निमित्ताने आपल्या सगळ्या जिव्हाळ्याच्या माणसांना तिथे बोलवावं आणि सगळ्यांनी एक दिवस मस्त मजेत काढावा. पण काय निमित्त काढावं?  आणि त्याला एकदम आठवलं,  पुढच्या महिन्यात आप्पांना सत्तर वर्षं पूर्ण होताहेत,  तर वहिनींना साठ. शिवाय त्यांच्या लग्नालाही चाळीस वर्षं होताहेत. त्या निमित्ताने एक झकास गेटटूगेदर करू या. याबद्दल सुहास सुखदाशी बोलला,  तेव्हा ती म्हणाली, ‘`याबद्दल माई-आप्पांशी बोलूयात नको! त्यांना एकदम सरप्राईज देऊयात.’ सुहासला ती कल्पना आवडली. रोज वेगवेगळ्या योजना ठरू लागल्या. मिहीर-मिरालाही त्यांनी बजावलं, `माई-आप्पांना काही कळू देऊ नका. त्यांना एकदम…’

`सरप्राईज’ मुलं ओरडली.

मग मुलं रोज एकमेकांशी कानातल्या कानात कुजबुजू लागली. नेत्रपल्लवी, हातवारे होऊ लागले. घरात काही तरी शिजतय,  हे मालतीच्या लक्षात आलं.

`अग, काय चाललय काय तुमचं?’  मालतीनं न राहवूनविचारलं. `काही नाही ग!’ मिहीर मीराला तोडावर बोट ठेवून खुणा करत म्हणाला नाही तर ती पटकन बोलून गेली असती ना! 

 `ती ना, आमची एक गम्मतआहे.’ मीरा म्हणाली.

`आम्हाला पण कळू दे की तुमची गंमत.’

`अंहं! बाबा म्हणाले, कुण्णाला सांगायचं नाही.’

`आई-आप्पांना तर मुळीच नाही.’

`अरे, आम्हाला पण तुमच्या गमतीत घ्या ना!’

`सांगू का?’ मीरा म्हणाली, तशी मिहीरने तिला डोळ्यांनीच ‘गप्प बस’ म्हणुन खुणावले.

`की नाई, या महिन्यात वीक एंडला आपण फार्म हाऊसवर जाणार आहोत. ‘

`असं का? छान! छान!’

`आपणच नाही काही! काका-काकू,  मामा- मामी आणि खूप खूप लोकांना बोलावणार आहेत बाबा’

`हो का? पण का म्हणे?’

बोलता बोलता  मीरा विसरूनच गेली, की आजी आणि आप्पांना काहीच कळू द्यायचं नाहीये. ती पटकन म्हणूनगेली, ` अग, तुझा आणि आप्पांचा वाढदिवस आहे ना! तुझा साठावा. आप्पांचा सत्तरावा. ‘ आणि मग तिने एकदम जीभ चावली.

‘`काय हे मीरा?  सगळं सीक्रेट तू ओपन केलंस.’

 `सॉरी… सॉरी…’ मीरा कान धरत म्हणाली.

`अग, बाबा म्हणाले, त्या निमित्ताने आपण गेटटूगेदर करू या. ‘ 

संध्याकाळी सुहास घरी आल्यावर मालती म्हणाली, `अरे, कसला घाट घातलायस?’

`घाट? कसला?’

`ते काही तरी गेटटूगेदरम्हणत होते मीरा, मिहीर.’

`हां! ते होय?  अग,  बरेच दिवस सगळे म्हणताहेत, सुहास तुझं फार्म हाऊस बघायचंय.’

`ते ठीक आहे. गेटटूगेदर कर तू! पण ते वाढदिवस वगैरे असलं काही नको हं! वाढदिवस आता मुलांचे साजरे कराययचे?  की आमचे? ‘

`बरोबर आहे. आणि पंचाहत्तरी साजरी करतात. सत्तरी नव्हे. ‘ आप्पा म्हणाले.

`आणि लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजराकरतात. चाळीसावा नव्हे. ‘ मालती म्हणाली.

`आम्ही आणखी पाच -दहा वर्षं जगू की नाही,  अशी शंका नाही ना आली तुम्हाला? ‘ आप्पा हसत हसत म्हणाले.

`मुळीच नाही. आणखी पाच वर्षांनी आपण तुमचा अमृत महोत्सव साजरा करू. दहा वर्षांनी तुमच्या लग्नाचा सुवर्ण महोत्सव नि त्याच्या पुढल्या वर्षी सहस्त्रचंद्र दर्शन.’ इती सुखदा. मालतीची लाडकी सून.

क्रमश:….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print