मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ बालदिन… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

? कवितेच्या उत्सव ?

☆ बालदिन … ☆ सौ. जयश्री पाटील ☆

पहिले पंतप्रधान स्वतंत्र भारताचे

प्रभावी वक्ते आणि दूत होते शांतीचे

 

हसरा टपोरा गुलाब शोभे त्यांच्या कोटावर

खूप खूप प्रेम करत ते लहान मुलांवर

 

मुलांना पण होता फारच लळा त्यांचा

लाडाने हाक मारत त्यांना नेहरू चाचा

 

रात्रंदिवस स्वप्न पाहायचे ते शांतीचे

न भांडता भविष्य उज्वल बनविण्याचे

 

त्यांचे स्वप्न आपल्याला खरं खरं करायचंय

म्हणून तर अभ्यास नी योग्य ते करायचंय

 

वाढदिवस त्यांचा करतो आपण साजरा

बालदिन म्हणूनच आवडतो मुलांना खरा

 

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…5 – वसंतसेना ☆ डॉ मेधा फणसळकर ☆

डॉ मेधा फणसळकर

? विविधा ?

☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…5 – वसंतसेना ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

हल्लीच काही दिवसांपूर्वी “गंगुबाई काठियावाडी” चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात गंगुबाईच्या तोंडी एक वाक्य आहे. ती म्हणते, “ वेश्यांशिवाय स्वर्गसुद्धा अधुरा आहे.” शाश्वत सत्यच तिच्या तोंडून सांगितले आहे असे मला वाटते. कारण वास्तविक ज्या वेश्यासमाजाला आपल्या संस्कृतीत एका वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते त्या समाजमुळेच पांढरपेशा समाज सुदृढ आहे. त्यामुळे तो चित्रपट पाहताना मला ‛शुद्रक’ या संस्कृत नाटककाराने लिहिलेल्या ‛मृच्छकटिक’ या नाटकाची आठवण झाली.

या मृच्छकटिक नाटकाची नायिका ‛वसंतसेना’ हीसुद्धा एक गणिका असते आणि थोड्याफार फरकाने समाजाचा अशा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोनही तोच आहे. फक्त त्या काळी गणिका आणि वेश्या यांच्यात किंचित फरक असा होता की गणिका केवळ नृत्य- संगीत या माध्यमातून पुरुषांचे मनोरंजन करत असत. आणि वेश्या शरीरविक्रय करत असत.

संतसेना आणि चारुदत्त यांच्या प्रेमाची ही कहाणी आहे. याशिवाय अनेक सामाजिक- राजकीय संदर्भ या नाटकात आहेतच. चारुदत्त हा एक अतिशय श्रीमंत ब्राह्मण असतो. पण आपल्या अति परोपकारी स्वभावाने आपली सर्व संपत्ती गमावून बसतो. याउलट वसंतसेना गणिका असूनही अतिशय श्रीमंत असते आणि सुखासीन आयुष्य जगत असते. चारुदत्ताच्या निर्व्याज स्वभावामुळे ती त्याच्याकडे आकर्षित होते आणि चारुदत्तही तिच्या प्रेमात पडतो. वास्तविक चारुदत्ताचे लग्नही झालेले असते आणि त्याला एक लहान मुलगाही असतो. परंतु त्या काळात पुरुषांनी असे गणिकांशी संबंध ठेवणे अयोग्य मानले जात नसावे. त्यामुळे चारुदत्ताची पत्नीही वसंतसेनेशी मित्रत्वाच्या नात्याने वागत असते.

एकदा काही गुंड मागे लागल्याने अचानक वसंतसेना चारुदत्ताच्या घरी येऊन लपते. तिला ते चारुदत्ताचे घर आहे हे माहीत नसते. पण त्याचवेळी अंगणात खेळणारा चारुदत्ताचा मुलगा आपल्या दासीकडे खेळण्यासाठी सोन्याची गाडी दे म्हणून हट्ट करत असतो. त्याच्या मित्राची तशी गाडी असते. म्हणून त्याला हवी असते. पण विपन्नावस्था प्राप्त झालेल्या चारुदत्ताकडे मुलाला द्यायला सोनेच नसते. त्यामुळे ती दासी त्या बालकाची समजूत काढत त्याला मातीची गाडी खेळायला देते. हा सर्व प्रसंग पाहणारी लपलेली वसंतसेना त्यावेळी लगेच बाहेर येते व आपले सर्व दागिने काढून त्या खेळण्याच्या गाडीत ठेवते.  ते बघून तो बालक अतिशय खुश होतो. वसंतसेनेमध्ये असलेली सहृदयता यात दिसून येतेच. पण धनाविषयी असणारी तिची अनासक्तीही यातून दिसून येते. धनापेक्षाही एखाद्याच्या भावना श्रेष्ठ आहेत असे मानणारी वसंतसेना म्हणूनच अधिक भावून जाते. 

वसंतसेना जरी गणिका असली तरी तिलाही स्त्रीसुलभ भावना होत्याच. कलेच्या माध्यमातून पुरुषांचे मनोरंजन करणे  हा तिचा व्यवसाय असला तरी मनाने ती चारुदत्तावर प्रेम करत असते. आणि आपले हे प्रेम चारुदत्ताकडे व्यक्त करण्याचे धाडसही ती दाखवते. शिवाय एकदा ती आणि चारुदत्त भेटण्याचे ठरलेले असते. पण प्रचंड वादळ होत असतानाही केवळ चारुदत्तावरील प्रेमापोटी ती त्या वादळातही त्याला भेटायला बाहेर पडते. यातून तिची साहसी वृत्ती दिसून येते.

वसंतसेनेशी आई थोडी लोभी असते. त्यामुळे काही धनाच्या बदल्यात ती राजाच्या मेहुण्याला आपली मुलगी द्यायला तयार होते. हे वसंतसेनेला कळल्यावर ती त्यासाठी स्पष्ट नकार देते व आईला सांगते की “जर तू मला जिवंत पाहू इच्छित असशील तर पुन्हा कधीही असे काम करणार नाही.” यातून वसंतसेनेचा निग्रही स्वभाव दिसून येतो. त्याचबरोबर अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्तीही दिसून येते.

तिला नाईलाजाने हा व्यवसाय निवडावा लागलेला असतो. वास्तविक आपले घर, संसार, मुले यामध्ये रममाण होऊन सामान्य स्त्रियांप्रमाणे संसार करण्याची तिची इच्छा असते. तिची ही इच्छा कितपत पूर्ण होईल हे तिला माहीत नसते. पण जेव्हा तिची दासी एका तरुणावर प्रेम करते हे तिला समजते तेव्हा ती तात्काळ तिला दास्यत्वातून मुक्त करते आणि तिला आनंदाने सुखाचा संसार करण्यास मदत करते. आपल्याला असे सुख मिळेल की नाही याची शाश्वती नसतानाही दुसऱ्याच्या सुखात आपले सुख शोधणारी वसंतसेना त्यामुळे अधिक श्रेष्ठ ठरते.

अशाप्रकारे समाजातील एका वेगळ्या स्तरातील स्त्रीचे चित्रण शुद्रकाने या नाटकात केले आहे. अतिशय वेगळ्या संस्कारात वाढलेली असूनही तितकीच सुसंस्कृत, उत्तम नर्तिका, उत्तम गायिका आणि सौंदर्यवती असणारी वसंतसेना म्हणूनच नारीशक्तीचे एक वेगळेच रूप आहे.

© डॉ. मेधा फणसळकर

सिंधुदुर्ग.

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ती साडी… – भाग-१ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ ती साडी… – भाग-१ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

आर्ट कॉलेजची मुलं, मुली नामवंत चित्रकार रेणूजी यांच्या घरातून रागारागानंच बाहेर पडली. त्या आपल्या गावात सेटल झाल्यात याचं त्यांना खरं तर मोठं कौतुक होतं. त्यांना भेटावं… आपली पेंटिंग्ज दाखवावीत… त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा ,म्हणून मोठ्या उत्साहाने त्यांनी त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्या बंगल्यात पाऊल टाकलं होतं.

पण एका तुसड्या, घमेंडी, माणूसघाण्या महिलेशी आपली गाठ पडेल असे त्यांना वाटलेच नव्हते.

” काय त्यांची अरेरावी… आपल्या पेंटिंग्जकडे बघून शंभर चुका काढणे…. त्याला टाकाऊ म्हणणे….छीऽऽ ती बाई माझ्या डोक्यात गेलीय यार.” एक जण म्हणाली. “कलाकार लहरी असतात असा एक समज आहे, आपण पण नवोदित कलाकारच आहोत .आपल्या रेषा पण बोलक्या आहेत. इतके टाकाऊ तर आपण निश्चितच नाही आहोत.”दुसरा एकजण पोट तिडकीने म्हणत होता. “आपण आहोत का असे लहरी ,बेछूट?” आणखी एक जण म्हणाली. तिच्यावर वेगवेगळ्या कॉमेंट पास करत सगळे युवा आपला राग व्यक्त करत तिच्या बंगल्यातून बाहेर पडले.

त्या विद्यार्थ्यांचे म्हणणे खरेच होते. खरेच रेणुने आजवर कधीच कोणाची पर्वा केली नव्हती. आपण किती महान आहोत हे दाखवायचा नेहमीच तिचा प्रयत्न असायचा.” ओ शिट्,” माझा किती टाइम वेस्ट केला या नवशिक्यांनी!” बडबडत ती आपल्या वरच्या मजल्यावरच्या स्टुडिओत गेली… आणि आपल्या कामात बुडून गेली.’थोड्या पेंटिंग्जवर काम करणं बाकी आहे. ते झालं की मुंबईत एक्झिबिशनला पेंटिंग्ज पाठवायला आपण मोकळ्या.’काम झाल्यावर  आळोखे पिळोखे देत रेणू विचार करत होती. ‘चला आता उद्या तयार झालेले कॅनव्हास खाली.. ड्रॉईंगरूममध्ये आशा मावशीं कडून ठेवून घ्यावेत’ आपल्या कलाकृती न्याहाळत न्याहाळत ती खाली आली.

संध्याकाळची वेळ….हातात ड्रिंकचा ग्लास घेऊन… मनपसंत म्युझिक लावून त्याच्या तालावर ती थिरकू लागली.

फोन वाजला…चंदनचा तर सकाळीच येऊन गेला… ‘आता कोण?’मनात म्हणत तिने फोन उचलला.’ ओऽह,चंदनची आई!’….कपाळावर आठ्यांचं जाळं झालं, “हॉं ऑन्टी बोला…” सासूला उद्देशून ती म्हणाली. बोलणं संपलं तशी तिने फोन सोफ्यावर भिरकावून दिला. विचार चक्र चालूच होतं ‘ट्रेनमध्ये बसल्यावर फोन केलाय म्हातारीने ….उद्या सकाळी  इथे येऊन धडकेल ती. चंदन इथं नाही हे माहीत असून सुद्धा येतेय. लग्न केलं तेव्हाच आपण हे सगळ्यांना सांगून टाकलतं की चंदन व्यतिरिक्त त्याच्या इतर कोणत्याही नातेवाईकांशी आपले कोणतेही नातं नसणार आहे…. तरीही येतेय… स्टुपिड!’ “छट्, माझा सगळा मूडच घालवून टाकला हिनं”पुटपुटत ती टीव्ही समोर बसून राहिली. बराच वेळ…. सकाळी सासूबाई समोर दिसल्या तशी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून रेणू वरच्या मजल्यावर निघून गेली… त्या क्षणीच सासूबाईंचा चेहरा पडला. त्यांचा  खूप विरस झाला होता. पण समोरूनच, सगळं घर पुढाकार घेऊन सांभाळणाऱ्या मेड्-आशा मावशींना- लगबगीने येताना पाहून त्या जरा सावरल्या. आशा मावशींनी त्यांच्या हातातली बॅग घेऊन, गेस्ट् रूमध्ये ठेवून, त्यांच्या चहा नाश्त्या बद्दल विचारणा केली.  “नको, खरं तर आता एकदम जेवेनच. “सासूबाई म्हणाल्या.

आज जरा लवकरच त्या जेवायला बसल्या. रेणू रोजच्या वेळी खाली उतरली.अन् टेबलावर सज्ज असलेलं आपलं डाएट फूड खाऊ लागली. जशी ती पुन्हा वरच्या मजल्यावर जायला वळली तशी सासूबाई म्हणाल्या,” थांब रेणू, पुढच्या आठवड्यात मी युएस ला नंदूकडे जातेय.मुलाची मुंज  करतोय ना तो तिकडे. तुला चंदनने सांगितलंच असेल. तो पण… त्या दिवसात ….तिकडेच असणारेय.तू पण आलीस तर सगळ्यांना छानच वाटेल. ह्या बघ तुम्हा दोघी जावांसाठी एक सारख्या साड्या घेतल्यात.त्यातली तुला कोणती आवडलीय ते सांग,अन् काढून घे . आठ आठ हजाराची एक साडी. बघ टेक्श्चरआणि कलर कॉम्बिनेशन चांगलंआहे ना. तुझी कलाकारची नजर.”… त्या आपलेपणानं बोलत त्याची किंमत पण सांगून गेल्या.

रेणूच्या कपाळावरील आठ्यांचं जाळं त्यांना दिसलंच नाही .तिने एक साडी उचलली तशी त्या खुश झाल्या. तोवर तिचे पुढचे शब्द त्यांच्या कानावर पडले,” मी साडी कुठे नेसते?… हॉं , कधीकधी खास प्रसंगी नेसते….ती पण पंचवीस तीस हजारांच्या खालची नसते. ही चिप साडी….ओऽह नो!..”

सासुबाईंना खूप अपमानित झाल्यासारखं वाटलं…. त्यांचे डोळे भरून आले. पण तोवर एकदम अंगात कसला तरी झटका आल्यागत रेणू मागे फिरली. स्वत: खाली फेकलेली साडी तिने उचलली. घडी मोडून त्याच्या नि-या करून तिने हाक मारली, “आशा मावशीऽ”त्यांना समोर बघून ती साडी तिनं त्यांच्या खांद्यावर टाकली,”ही घ्या आजीच्या नातवाच्या मुंजीची  साडी”एवढे दात कटकट करत  बोलून ती तेथून निघून गेली.

क्रमशः …

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कालबाह्यतेचा सापळा.. लेखक – अज्ञात ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ कालबाह्यतेचा सापळा.. ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

जानेवारी १९२५…

स्वित्झर्लॅंडच्या जिनिव्हा या शहरामध्ये एक खास उद्योगसमूहाने एक गुप्त सभा आयोजित केली गेली होती.

विजेवर चालणारे प्रकाशदिवे (बल्ब) बनवणारे सर्व आघाडीचे उत्पादक त्या मिटींगमध्ये सहभागी झाले होते.

बल्बचा शोध लागून एव्हाना नव्वद वर्ष झाली होती. सुरुवातीच्या काळातले बल्ब अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि अल्पायुषी होते पण त्यात प्रचंड सुधारणा होत गेल्या. १९२० पर्यंत तब्बल अडीच हजार तासांचे आयुष्य असणारे दर्जेदार आणि दिर्घायुषी बल्ब बाजारात उपलब्ध व्हायला लागले होते. जनता बल्बवर खूश होती.  पण कोणालातरी बल्बचे इतके दीर्घजीवी असणे खटकत होते.

ते कोण होते?—-

साक्षात बल्ब उत्पादक…

कारण त्यांना वाटत होते की प्रत्येक आवृतीनंतर बल्बचे आयुष्य वाढत जाणे हे त्यांच्या धंद्याच्या दृष्टीने धोक्याचे आहे.

जिनिव्हाच्या त्या मिटींगमध्ये इंटरनॅशनल जनरल इलेक्ट्रिक,ओसराम, फिलिप, टंगस्राम, असोसिएटेड इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज, या सर्व जागतिक आघाडीच्या बल्बनिर्मात्यांनी एक गुप्त करार केला.—- ‘ आपल्या दीर्घकालीन हितासाठी आणि येणाऱ्या काळात भरघोस नफा मिळवण्यासाठी ते सर्वजण मिळून निकृष्ट दर्जाच्या अल्पायुषी बल्बचीच निर्मिती करतील.’ —–

त्या सर्वांनी या कराराचे इमानेइतबारे पालनही केले. पूर्वी अडीच हजार तास चालणारे बल्ब बाजारातून नामशेष झाले.

१९२५ नंतर बाजारात येणारे बल्ब फक्त एक हजार तास चालू लागले. आयुष्य घटले आणि साहजिकच बल्बची मागणी वाढली. खप वाढला. निकृष्ट दर्जाचे बल्ब आधीच्या किंमतीत विकून कंपन्यांनी ग्राहकांना मनसोक्त लूटले होतेच. आता आयुष्यमान कमी झाल्यामुळे विक्रीही दुप्पट तिप्पट झाली. बल्ब विक्रेत्यांची चांदीच चांदी झाली.

उत्पादनाचा दर्जा घसरवूनही पैसे कमवता येतात हे नवेच गुपित उद्योगजगताला माहीत झाले. बल्ब कंपन्यांच्या त्या एकत्र येऊन सापळा रचणाऱ्या कंपन्यांना ‘ फिबस कार्टेल ‘  या नावाने ओळखले जाऊ लागले. वस्तूंचा दर्जा घसरवून पैसे कमवण्याच्या त्यांच्या क्लूप्तीला म्हणतात— “ प्लॅन्ड ओबसोलेसेंस.’ 

खरंतर हा सापळा आहे. मराठीत याला ‘ नियोजित अप्रचलन ‘ असे म्हणता येईल.— सोप्या शब्दात एखादी वस्तू लवकर कालबाह्य करुन ग्राहकाला पुन्हा एक नवी खरेदी करायला भाग पाडणे असे याचे वर्णन करता येईल.

दहा पंधरा वर्षापूर्वीचे मोबाईल फोन चांगले पाच पाच वर्ष चालायचे. हल्ली मात्र कितीही भारीचा घेतला तरी एक स्मार्टफोन दोन तीन वर्षापेक्षा जास्त टिकूच शकत नाही—- कारण तेच—– नियोजित अप्रचलन.

जाणून बुजून फोनची रचनाच अशी केली जाते की तीन चार वर्षात फोन निकामी व्हावा. जुने उत्पादन टिकाऊ असेल तर कंपनीने निर्माण केलेले नवे उत्पादन कोण घेईल?— लाखो कोटी रुपयांचा बिजनेस हवा असेल तर पूर्वीच्याच ग्राहकांना पुन्हा खरेदी करायला भाग पाडले पाहिजे.

आजची बहूतांश उत्पादने याच धर्तीवर बनवली जातात. पूर्वीचे टीव्ही वीस वीस वर्ष चांगले चालायचे. आताच्या एल ई डी मधे पाच सात वर्षात पट्ट्यापट्ट्या दिसायला लागतात.

१००० वेळा पुन्हा पुन्हा दाढी करता येईल आणि स्वच्छ करुन पुन्हा पुन्हा वापरता येतील अशा टिकाऊ ब्लेड बनवण्याचे तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे. पण कोणतीही नामांकित कंपनी तशा प्रकारच्या ब्लेड बनवण्यात पुढाकार घेत नाही.—- कारण मग सोन्याची अंडी देणारा बिजनेस कायमचा बसेल.

लहानपणी पेनमधील शाई संपली की नवी रिफील घ्यायची प्रथा होती. आता पेन कचऱ्यात फेकून नवीन पेन घ्यायची प्रथा रुजली आहे. आजही जेव्हा पेनच्या रिफीलचा शोध घेतो तर बहुतांश पेनच्या रिफीलच मिळत नाहीत.—- 

कारण तेच—- मग दुप्पट किंमतीला विकले जाणारे नवे पेन कोण विकत घेईल?

या नियोजित अप्रचलन नावाच्या विकृत व्यापार फंड्यामुळेच “ वापरा आणि फेका “ नावाचा भस्मासुर जन्माला आला.

सुंदर निसर्गाचे एका विशाल कचराकुंडीत रुपांतर व्हायला लागले—-

—कपडे विटले, फेकून द्या— शुज उसवले, फेकून द्या— लॅपटॉप खराब झाला, दुरुस्तीऐवजी नवाच घ्या— इस्त्री चालेना झाली, नवीन घ्या— मिक्सर बिघडला, नवीन घ्या — वॉशिंग मशीन खराब झाली, नवे मॉडेल घ्या.

—पंधरावीस वर्षांखालच्या गाड्यांचे स्पेअरपार्ट मिळत नाहीत, आणि उपभोक्ता कंटाळून गाडी कवडीमोल भावात विकून नवी गाडी घेण्याच्या तयारीला लागतो.

—एकदा माऊस कीबोर्ड खराब झाला की फेकून द्यावा लागतो.

—लाईटच्या माळा, चार्जर, हेडफोन इत्यादी  इलेक्ट्रीक उपकरणांना दुरुस्त करणे ही संकल्पनाच आता मोडकळीला आलेली आहे.

फुटबॉल किंवा क्रिकेटमध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक संघामध्ये नव्या प्रकारच्या जर्सीची ब्रॅंड न्यू  डिझाईन लॉंच केली जाते.

—संघ तोच — खेळाडू तेच — प्रत्येक मौसमात अवतार मात्र नवा असतो.— कारण प्रेक्षकांना शर्टपॅंटचे नवे जोड विकायचे आहेत— चाहत्यांना सामन्याला जाताना मागच्या वेळीचा शर्ट घालताना लाज वाटते — सर्वजण त्यांच्याकडे गरीब आहे असा दृष्टिकोन टाकतील म्हणून तो आपल्या आवडत्या संघासाठी नवी जर्सी आनंदाने खरेदी करतो.

भारतात कमी असले तरी विदेशांमध्ये ही क्रेझ मोठ्या प्रमाणात दिसते.

नियोजित अप्रचलनाचा आणखी एक छोटा भाऊ आहे. —- तो म्हणजे ‘ समंजस अप्रचलन ‘ (पर्सिव्हड ऑबसोलेसेंस).—–

—–यामध्ये तुमची कार आता जुनी झाली आहे, पर्यायाने तुम्ही आऊटडेटेड झाले आहात, असे तुमच्या मनावर बिंबवण्यात येते.

—-जाणूनबुजून आणि प्रयत्नपूर्वक तुमच्या वापरात असलेल्या जुन्या वस्तूंविषयी तुमच्या मनात उदासीनता आणि न्यूनगंड निर्माण केला जातो.

—–एखादी वस्तू विकत घेतली नाही तर तुमचे व्यक्तिमत्व अधुरे अपूर्ण आहे असे जाहिरातींच्या माध्यमातून सुप्त मनावर पुन्हा पुन्हा ठसवले जाते.

—-साधे भोळे लोक खोट्या प्रतिष्ठेपायी या चतुर लोकांनी रचलेल्या जाळ्यात अलगद अडकतात.

—-स्वतःला उच्चशिक्षित मानणारा सुजाण श्रीमंत वर्ग या कंपन्यांच्या तावडीत सापडतो आणि आवश्यकता नसताना कधी मजबुरीने नवी खरेदी करतो.

—-त्यांना वारंवार सांगितल्या गेलेल्या उत्पादनांची ते आज्ञा पाळल्यासारखी निमूटपणे खरेदी करतात.

—- कधी दिखावा करण्यासाठी, कधी छाप पाडण्याच्या नावाखाली, कधी स्वतःचा अहं पोसण्यासाठी, कधी स्टेटस मेंटेन करण्याच्या नावाखाली अव्याहत खरेदी सुरूच असते. कोणतीही नवी खरेदी करण्याआधी ‘ मला या वस्तूची खरंच तीव्र गरज आहे का ‘  याचा समग्र विचार करण्याची त्यांची आकलनशक्तीच त्यांनी हळूहळू गमावलेली असते.

लठ्ठ पगार कधीही एकटा येत नाही. येताना तो चंगळवादालाही सोबत घेऊन येतो. नवश्रीमंतांच्या बाबतीत तर हे हमखास घडते—- महागड्या ठिकाणी पार्ट्यांना जाणे.— आधी भरपूर वाढून घेणे आणि नंतर जात नाही म्हणून ताटात तसेच अन्न टाकून देणे ही याचीच लक्षणे असतात.

——आर्थिक सुबत्ता असूनही ज्याने संयम गमवला नाही आणि जो सत्व पाळू शकला तोच खरा भाग्यवान. 

——वस्तूंना रुपयां-पैशात तोलणारी माणसं खरी कर्मदरिद्री. ती बनवण्यासाठी लागणारी साधनसंपत्ती, त्याच्या निर्मितीसाठी घेतले गेलेले कष्ट या सर्वांचे मोल ज्याला समजले तो खरा सुजाण…

बिजनेस माईंडच्या चतुर पण मुठभर लोकांनी पर्यावरणाचा बट्ट्याबोळ केला आहे. स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी उभ्या जनतेला आणि त्यासोबत निसर्गाला त्यांनी स्वतःच्या दावणीला बांधले आहे. श्रीमंत लोकांच बरं आहे.

ते फक्त पैसे देऊन किंमत चुकवतात.—– पण गरीब लोक आपलं आयुष्य देऊन अप्रचलनात बळी जातात.

जल-प्रदूषण, भू-प्रदूषण आणि हवा-प्रदूषणाचे सर्वात गंभीर परिणाम त्या देशातील दारिद्र्यरेषेवर झगडणाऱ्या नाजूक नाशवंत लोकसंख्या घटकावरच होतो.

हे बदलायला हवे.—-

—तुम्ही तयार आहात का? प्रत्येक खरेदी सजगपणे करा— वापरा आणि फेकाच्या गोंडस सापळ्यात अडकू नका.

अप्रचनलाचे नवे बळी बनू नका…!!

लेखक :  अज्ञात 

संग्राहिका : सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तक्रारपेटी… प्रा.विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ तक्रारपेटी… प्रा.विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

( सुखी व्हायचे असेल तर ! )

समोरच्या व्यक्तीच्या वागण्यावर जर तुमचा आनंद अवलंबून असेल तर तुम्ही कधीच आनंदी होऊ शकणार नाही

आपलं सुख , आपला आनंद समोरचा व्यक्ती कसा वागतो यावर depend असणं हेच माणसाच्या दुःखाचं मूळ कारण असतं

त्यामुळे आपला आनंद दुसऱ्याच्या हातात देऊ नका !

आपल्या आनंदाची , सुखाची , समाधानाची सांगड ज्यांना स्वतःच्या कृतीशी निगडित ठेवता येते तीच माणसं थोड्या फार प्रमाणात खुश राहू शकतात !

 

किती दिवस झाले मला त्यांनी फोनच केला नाही , अरे मग तू फोन कर !

मी त्यांच्याकडे गेलो तर मला ते बोललेच नाहीत , अरे मग तू बोल !

त्यांनी मला फोटो काढतांना बोलावलंच नाही ,  मग तू त्यांना बोलव !

खरं सांगू का अशा तक्रार करण्याच्या स्वभावातून तात्काळ बाहेर पडा !

 

आयुष्य म्हणजे तक्रारपेटी नाही !

नियतीने आपल्याला जीवन हे जगण्यासाठी दिलेले आहे , तक्रार करत सुटण्यासाठी नाही !

हा माणूस किंवा ही बाई नेहमी कुणाची न कुणाची तक्रार करत राहते असा शिक्का जर तुमच्यावर बसला तर तुम्हाला कोणीही जवळ करणार नाही !

म्हणून सुखी व्हायचं असेल , आनंदी रहायचं असेल तर Complain box होऊ नका !

आपले विचार दुसऱ्यावर लादायचे नाहीत आणि दुसऱ्याचे विचार लादून घेऊन आपल्या मनाविरुद्ध वागायचं नाही हे साधं सूत्र ज्याला अंमलात आणता येतं तोच व्यक्ती आनंदी , हसतमुख राहू शकतो !

आनंद किंवा सुख ही काही वस्तू नाही , त्यामुळे आपण त्याची खरेदी करू शकत नाही !

जी गोष्ट बाजारात उपलब्धच नाही , त्या गोष्टीचा खरेदीविक्रीशी काही संबंधच नसतो !

 

याचाच अर्थ आनंद , सुख , समाधान , शांती या गोष्टींचा आणि आपण गरीब श्रीमंत असण्याचा काहीही संबंध नाही !

 

दैनंदिन जीवनातील छोट्या मोठ्या गोष्टीने disturb होऊन दुःखी होऊ नका !

 

एखाद्या वेळेस ऑफिस मधली तुमच्या हाताखालची माणसं तुमचं ऐकतील , कारण तुम्ही त्यांचे ” साहेब ” असता !

ऐकणाऱ्याचं भलं किंवा नुकसान करण्याची क्षमता तुमच्या हुद्याने तुम्हाला दिलेली असते , हे ही एक कारण असू शकते !

Where as घरातली माणसं तुमचं ऐकतीलच असं नाही , कारण घरी आपण एकमेकांचे नातेवाईक असतो , साहेब किंवा चपराशी नाही !

त्यामुळे घराचे ऑफिस आणि ऑफिसचे घर करण्याचा प्रयत्न करू नका !

जीवन खूप सोप्प आहे , जगणं खूप सुंदर आहे 

फक्त दुःखाचा पाढा वाचायचा नाही आणि सुखाचा पेढा नेहमी अपेक्षित करायचा नाही , एवढंच  !

 

लेखक : प्रा.विजय पोहनेरकर, औरंगाबाद

9420929389

संग्राहक – अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मला फक्त मज्जा हवीये… ☆ संग्राहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆

सौ. अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ मला फक्त मज्जा हवीये… ☆ संग्राहिका – सौ. अंजली दिलीप गोखले  ☆

तुमच्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे? 

—प्राचीन काळी “ज्ञानप्राप्ती आणि परमार्थसाधना” हे उदात्त उत्तर मिळत असे. अर्वाचीन काळी “प्रापंचिक सुख” हे व्यवहारात बसेल इतपत उत्तर देत असत. आत्ता काल-परवा ” पैसा, समाधान, शांती ” हे शब्द ऐकू यायचे. 

हल्ली थेट विकेट पडते – “मला फक्त मज्जा करायचीये”. विषय संपला. 

 ” मज्जा केलीच पाहीजे ” ही बळजबरी माणसं एकमेकांच्या उरावर पांघरू लागलीयेत.

इथे “मज्जा” ही निवडीची गोष्ट राहिली नाहीये; ती ” निकड ” झालीये —  केली गेलीये. मज्जा कशी करायची हे निवडण्याचंही स्वातंत्र्य नाही. ती समाजातल्या “मॉडर्न” शहाण्यांनी (!) आखून दिलेल्या पद्धतीनेच व्हायला हवी. 

तशी ती नाही केली म्हणजे फालतू आहात तुम्ही, हे तुमच्या तोंडावर फेकून मारलं जातंय. म्हणजे पहा –

—-“बर्थडे सेलिब्रेशन घरात? शी…” — “पार्टी नाही? शी…”

—-“फ्रायडे नाईट, आणि तू घरी आहेस? शी… पथेटिक…”

—-तुम्ही घरी स्वयंपाक वगैरे करून खाता विकेंडला!? फारच बोरिंग ….

—-“तू आजवर कधी पबमध्ये गेलीच नाहीस? काय काकूबाई आहेस गं…”

—-” वेलेन्टाईन डे; आणि नो रोजेस? शी, बोअर…”

—-” डेटवर चाललायस? आणि हातात नो गिफ्ट्स? So sad…”

—-” वीकेन्ड घरच्यांबरोबर? नो फ्रेन्ड्स? नो आऊटिंग? शी…”

यात नफ्याची आर्थिक गणितं ठासून भरलेली आहेत. नव्वदच्या दशकात ग्लोबलायजेशन आपल्यावर येऊन आदळलं; आणि त्या नवश्रीमंतीच्या लाटेवर अनेकजणांनी विचार-विवेक गहाण टाकले. 

तसे त्यांनी ते टाकावेत, जास्तीत जास्त मासे या भोगवादात सापडावेत, यासाठी (त्यातल्या त्यात पाश्चात्य) कॉर्पोरेट कंपन्यांनी मार्केटिंगची जाळी मस्तपैकी सर्वदूर फेकली होतीच. TV, सिनेमा, सततच्या जाहिरातींच्या भडिमाराने आमचा सुरेख ब्रेन वॉश केला. न्युरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग तंत्राच्या वापराने, ध्वनी व दृश्य या दोघांनी आमचे कान आणि डोळे स्वप्नांत गुंतवले. मध्यमवर्गीय काटकसरीने म्हातारपणाच्या चिंता सोडून “आजचं बघा ” हा अमेरिकन मंत्र स्वीकारला. मग अचानक वाढदिवसाला निरांजनांच्या ओवाळणी backward झाल्या; वीस-पंचवीस हजारांचं हॉटेलवालं सेलिब्रेशन रीतीचं झालं. सी सी डी अन् बरिस्तामधल्या दोनशे रुपयाच्या कॉफ्या आम्हाला स्वस्त वाटू लागल्या.  “अनलिमिटेड बुफे” च्या नावाखाली बार्बेक्यूंच्या भट्टीत पगार जाळून घेणं हे “त्यात काय एवढं?” असं झालं.

जीन्स पाचशेच्या पाच हजार झाल्या. पुर्वी कुत्रा कोण ज्या कॉटनला विचारत नव्हतं, तेच कॉटन “लिनन”च्या रुपात थेट स्टेटस सिम्बॉल बनलं. एक दिवसाचं मराठी लग्न पाच दिवसांचं “big fat पंजाबी वेडिंग” झालं. घराच्या हॉलमधले साखरपुडे नि टिळे हे फाईव स्टारवाले “इवेंट्स” झाले. 

मज्जा, आनंद, आपल्या आत निर्माण करायचा असतो म्हणताय? तुमची संस्कृती तसं सांगते? हड. चुलीत घाला तुमची संस्कृती.—– आमचं Grand Live life kingsize उधळणं घ्या. बायकोला सोन्या-चांदीतून बाहेर काढा; हिरे नि प्लेटिनम मध्ये तिला बुडवून काढा.—-  तुमच्या पोराला गर्लफ्रेन्ड नि पोरीला बॉयफ्रेन्ड असलाच पाहीजे. त्यांच्या “प्रेमाचं” मूल्यमापन गिफ्टच्या किमतीवर ठरेल. 

कमवा— आणि उडवा.—-

तुम्ही तुमच्या नवाबज़ाद्यांकडे पाहा बघू. लिव Macho !! भले तुम्ही स्टायपेन्डवाले ट्रेनी इंजिनिअर असा. 

विषय इतपत येऊन थांबलेला नाही. दारू नि सिगरेटचं उदात्तीकरण तर आता जुनं झालं. आता त्याच्यापुढे सर्वसामान्य मराठी मध्यमवर्गीय पोरांच्या तोंडीही ” वीड “, ” ग्रास ” हे शब्द येऊ लागलेत. 

यांचे अर्थ माहितीयेत? गांजासारख्या भयानक नशील्या पदार्थांची अमेरिकेतून उचललेली बोली भाषेतली नावं आहेत ही. या घाणीची जाहिरात थेट करता येत नाही; पण त्यासाठी आमचे नव्याने पैदास झालेले “रॉकस्टार्स” आणि “rap singers” आहेत ना ! त्यांच्या गाण्यांतून या अमली विकृतीची भलावण रोजच्या रोज होतेय. ” मनाली ट्रान्स ” म्हणे. शोधा गुगलवर लिरिक्स. शब्दांना जोड दृश्यांची. दृश्यांत ठासून भरलेला सेक्स. अनिर्बंध, अमर्याद आणि मुद्दाम चाळवण्याऱ्या अनैतिक नात्यांचा, अगदी घरच्या अंतर्गत नात्यातही तो  मुक्तहस्ते सपोर्ट करणारा !!! एकेक वेब सिरिज मनोरंजन कमी, आणि पोर्नोग्राफी जास्त – इतपत मज्जेच्या डेफिनेशन्स गेलेल्या !!! तरुणांना नाद लावायला तेवढं पुरतं. —- चील… एंजॉय… पार्टी चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग.— मग मेलात तरी चालेल. 

आपण ठरवलेलं उद्दिष्ट हे प्रत्यक्षात आपण स्वत: निवडलेलं नसून, ते आपल्याला गंडवून आपल्याकडून निवडून घेतलं गेलंय, हे लक्षात येतंय आपल्या?

चंगळवाद हा एक कॉर्पोरेटधार्जिणा पंथ झालाय. पंथामध्ये विचार आणि आचार निवडीचं स्वातंत्र्य नसतं. कुणीतरी महाभागाने सांगितलेलं तत्वज्ञान तो महापुरूष आहे असं सगळे म्हणतात म्हणून, मुकाट्याने नाकासमोर धरून चालणं, हे पंथाचं आचारशास्त्र असतं. तेच चंगळवादाचं आहे. “आम्ही कित्ती आनंदात आहोत “, “आमचं कित्ती मस्त चालू आहे “, “आम्ही कित्ती एंजॉय करतोय “, हे दुसऱ्याला दाखवणं, हा चंगळवादाचा अट्टहास असतो. 

ते दुसऱ्याने सत्य म्हणून मान्य केलं, तर चंगळवादाचा विजय असतो. आणि आपण ओढवून घेतलेल्या पद्धतीचा दुसऱ्याने स्वीकार केला, तर तो चंगळवादाचा दिग्विजय असतो. 

मुद्दा हा आहे, की या झुंडीत सामील झाल्यावर आपण किती “cool” आहोत, याच्या देखाव्यांचं एक compulsion असतं ना;  त्यात बऱ्याच जणांचा श्वास कोंडला जातो. तो देखावा न करणाऱ्यांना पाखंडी समजून झुंडीबाहेर फेकलं जातं.—- मुळात जे झुंडीत कधी सामील झालेच नाहीत, किंवा आर्थिक कारणांमुळे होऊ शकले नाहीत, त्यांच्याकडे आगाऊपणाने “सो पथेटिक” म्हणून नकारात्मकतेने पाहिलं जातं; त्यांच्या मनात स्वत:बद्दल न्यूनगंड निर्माण होईल याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू होतात. 

गंमत म्हणजे, चंगळवादाचे पुरस्कारकर्ते व्यक्तिस्वातंत्र्याच्या गप्पा मारतात; पण हीच सोंगं आयुष्य आनंदाने जगण्याचे प्रत्येकाचे स्वतंत्र वेगळे मार्ग असू शकतात, हे साधं सत्य दुसऱ्याला नाकारतात. त्यावेळी आपण त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करतोय, हे यांच्या गावीही नसतं. म्हणूनच मग ” तुम्ही दारू पिऊन पार्ट्या करत नाही, म्हणजे आयुष्य कसं एंजॉय करायचं ते तुम्हाला माहीतच नाही “, अशी बिनडोक तर्कटं मांडली जातात; जी हास्यास्पद ठरतात. 

हेअर जेल, मेक अप आणि ब्रांडेड कपड्यात आम्ही  बिनधास्त आहोत हे दाखवत राहण्याची केविलवाणी धडपड नजरेत लपत नसते. ब्रांडेड आयुष्यातल्या पोकळ्या वेडावतातच. 

जागे होऊया रे.—- स्वत्व नको विकूया आपण.— दुनियेतल्या प्रत्येकाला आपण आवडलोच पाहिजे, हा मूर्ख विचार सोडूया; आणि करूया हिंमत स्वत:चा स्वतंत्र जीवनभाव निवडण्याची. सेलिब्रेशन्स मिळकतीची होऊ देत; आणि ती नजाकतीची होऊ देत !!  

उधळण्याच्या फुलबाज्या क्षणभरच चमकतात; स्वतंत्र विवेकाचा सूर्य अनंत चमकतो. आपण सूर्य निवडू या.

संग्राहिका : अंजली दिलीप गोखले 

मो ८४८२९३९०११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक२८ – भाग २ – राणी सातपुड्याची आणि राणी जंगलची ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २८ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ राणी सातपुड्याची आणि राणी जंगलची  ✈️

जबलपूरहून कान्हाला जाण्याआधी थोडी वाट वाकडी करून घुघुआ येथील जीवाश्म राष्ट्रीय उद्यान पाहिले. इथल्या म्युझियममध्ये वनस्पती व प्राणी यांचे जीवाश्म ठेवले आहेत. प्राणी अथवा वनस्पती मृत झाल्यानंतर सर्वसाधारण परिस्थितीमध्ये त्यांचे विघटन होते पण एखाद्या आकस्मिक घटनेमध्ये उदाहरणार्थ भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, अशा वेळी झाडे, प्राणी क्षणार्धात गाडली जातात. त्यावेळी ऑक्सिजन व जीवजंतूंच्या अभावी कुजण्याची क्रिया न होता त्या मृत अवशेषांमध्ये हळूहळू खनिज कण भरले जातात. कालांतराने तो जीव, वनस्पती यांचे दगडामध्ये परिवर्तन होते. यालाच जीवाश्म असे म्हणतात अशी माहिती तिथे लिहिली होती. येथील जीवाश्मांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यात आला आहे. म्युझियममध्ये अशी दगडी झाडे, डायनासोरचे अंडे, इतर शास्त्रीय माहिती, नकाशे आहेत. बाहेरील विस्तीर्ण वनामध्ये रुद्राक्ष, निलगिरी, फणस, आंबा, जांभूळ, आवळा, रानकेळी या वृक्षांचे जीवाश्म बनलेले बघायला मिळाले. संशोधनामध्ये या जीवाश्मांचे वय साडेसहा कोटी वर्षे आहे असा निष्कर्ष निघाला आहे. काही कोटी वर्षांपूर्वी आफ्रिका, भारतीय द्विपखंड, ऑस्ट्रेलिया हे सर्व एकमेकांना जोडलेले होते व हा भाग गोंडवन म्हणून ओळखला जात असे. कालांतराने हे भाग विलग झाले. बहुरत्ना वसुंधरा राणीचा हा अद्भुत खजिना पाहून कान्हाकडे निघालो.

प्रवासाच्या आधी जवळजवळ चार महिने आम्ही मुंबईहून बुकिंग केले होते. त्यामुळे प्रत्यक्ष कान्हाच्या अरण्यातील मध्यप्रदेश पर्यटन मंडळाचे किसली येथील गेस्ट हाऊस राहण्यासाठी मिळाले होते. दिवसभर प्रवास करून कान्हाला पोहोचलो तर जंगलातला निःशब्द अंधार दाट, गूढ झाला होता. गेस्ट हाऊस थोडे उंचावर होते. पुढ्यातल्या लांब- रुंद अंगणाला छोट्या उंचीचा कठडा होता. त्यापलीकडील मोकळ्या जंगलात जाण्यास प्रवाशांना मनाई होती कारण वन्य जीवांच्या जाण्या- येण्याचा तो मार्ग होता. जेवून अंगणात खुर्च्या टाकून बसलो. रात्रीच्या निरभ्र आकाशात तेजस्वी गुरू चमकत होता. थोड्याच वेळात झाडांच्या फांद्यांमागून चांदीच्या ताटलीसारखा चंद्रमा वर आला. उंच वृक्षांच्या काळोख्या शेंड्यांना चांदीची किनार लाभली.

दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता जंगल सफारीला निघालो तेव्हा पिवळसर चंद्र मावळत होता आणि शुक्राची चांदणी चमचमच होती. तिथल्या शांततेचा भंग न करता भोवतालचे घनदाट विशुद्ध जंगल बघंत जीपमधून चारी दिशा न्याहाळत होतो. साल, साग, करंजा, सिल्वर ओक, महानिंब, ओक, पाईन अशा प्रकारचे अनेक  वृक्ष होते.  ‘भुतांची झाडं'(ghost trees) होती. या झाडांचे बुंधे सरळसोट व पांढरे स्वच्छ असतात. काळोखात ते बुंधे चमकतात. म्हणून त्यांना ‘घोस्ट ट्रिज’ असे म्हणतात. तेंदू पत्ता, शिसम, महुआ, मोठमोठ्या बांबूंची दाट वने आणि उंच गवताळ सपाट प्रदेश, वेगवेगळे जलाशय यांनी हे जंगल समृद्ध आहे. कळपांनी फिरणाऱ्या, पांढऱ्या ठिपक्यांच्या  सोनेरी हरिणांचा मुक्त वावर होता. मोर भरपूर होते. लांडगा दिसला. गवा होता. झाडाच्या फांद्यांसारखी प्रत्येक बाजूला सहा सहा शिंगे असलेला बारशिंगा होता. निळकंठ, सुतार , पॅरकिट असे  पक्षी होते. एका झाडाच्या ढोलीत घुबडाची दोन छोटी गोजिरवाणी, वाटोळ्या डोळ्यांची पिल्ले स्तब्ध बसलेली दिसली. मुख्य प्रतीक्षा होती ती वाघोबांची! वनराजांचा माग काढत जीप जंगलातल्या खोलवर गेलेल्या वाटा धुंडाळत होती. अचानक सात- आठ जंगली कुत्रे दिसले. सभोवती चरत असलेला हरिणांचा कळप उंच कमानीसारख्या उड्या मारत विद्युत् वेगाने तिथून दूर निघून गेला. जीवाच्या आकांताने केकाटत मोरांनी उंच उड्या मारून झाडांचा आसरा घेतला. आणि एक बिचारे भेदरलेले हरिणाचे पिल्लू उंच गवतात आसरा घेऊ बघत होते तोपर्यंत त्या जंगली कुत्र्यांनी त्याला घेरले. आठ दहा मिनिटात त्या हरिण बाळाचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला. कावळे आणि गिधाडे वरती घिरट्या घालू लागले. कुत्र्यांची टोळी आणखी सावज शोधायला निघून गेली. सृष्टीचा ‘जीवो जीवस्य जीवनम्’ हा कायदा अनुभवून आम्ही तिथून निघालो.

मध्यप्रदेश– राणी जंगलची भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 59 – मनोज के दोहे… ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है “मनोज के दोहे… । आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 59 – मनोज के दोहे… 

1 अवसर

प्रभु देता अवसर सदा, रखिए इसका  ध्यान।

चूक गए तो फिर नहीं, मिल पाता सम्मान।।

2 अनुग्रह

हुआ अनुग्रह राम का, पूर्ण हुए सब काज।

विश्व पटल पर छा गया, भारतवंशी राज।।

3 आपदा

करें प्रबंधन आपदा, संकट से हो मुक्ति।

बड़े बुजुर्गों से सदा, मिली हमें यह युक्ति।।

4 प्रशस्ति

सद्कर्मों का मान हो, स्वागत मिले प्रशस्ति

बदले मानव आचरण, यही देश की शक्ति।।

5 प्रतिष्ठा

बढ़े प्रतिष्ठा देश की, मिलकर करें प्रयास।

मतभेदों को भूलकर, फसल उगाएँ खास।।

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)-  482002

मो  94258 62550

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक की पुस्तक चर्चा # 125 – “पारा पारा” (उपन्यास) – सुश्री प्रत्यक्षा ☆ चर्चाकार – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’’☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

(हम प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’जी के आभारी हैं जो  साप्ताहिक स्तम्भ – “विवेक की पुस्तक चर्चा” शीर्षक के माध्यम से हमें अविराम पुस्तक चर्चा प्रकाशनार्थ साझा कर रहे हैं । श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी, जबलपुर ) पद से सेवानिवृत्त हुए हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। उनका दैनंदिन जीवन एवं साहित्य में अद्भुत सामंजस्य अनुकरणीय है। इस स्तम्भ के अंतर्गत हम उनके द्वारा की गई पुस्तक समीक्षाएं/पुस्तक चर्चा आप तक पहुंचाने का प्रयास  करते हैं।

आज प्रस्तुत है श्री कुमार सुरेश जी द्वारा लिखी कृति  “व्यंग्य राग” पर चर्चा।

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक की पुस्तक चर्चा# 125 ☆

☆ “पारा पारा” (उपन्यास) – सुश्री प्रत्यक्षा ☆ चर्चाकार – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’’ ☆

पारा पारा (उपन्यास )

लेखिका.. प्रत्यक्षा

राजकमल पेपरबैक्स

संस्करण २०२२

मूल्य २५०रु

पृष्ठ २३०

चर्चाकार… विवेक रंजन श्रीवास्तव, भोपाल

उपन्यास यहाँ से प्राप्त करें 👉 amzn.to/3R4eQmP  या व्हाट्सएप करें 👉 9311397733

“मैं इन्हीं औरतों की कड़ी हूँ। मुझमें मोहब्बत और भय समुचित मात्रा में है। मैं आज़ाद होना चाहती हूँ, इस शरीर से, इस मन से, मैं सिर्फ़ मैं बनना चाहती  हूँ, अपनी मर्जी की मालिक, अपने फ़ैसले लेने की अधिकारी, चाहे ग़लत हो सही, अपने तरीके से जीवन जीने की आज़ादी । किसी भी शील से परे। किसी में टैग के परे । मैं अच्छी औरत बुरी औरत नहीं बनना चाहती। मैं सिर्फ़ औरत रहना  चाहती हूँ, जीवन शालीनता से जीना चाहती हूँ, दूसरों को दिलदारी और समझ देना चाहती हूँ और उतना ही उनसे लेना चाहती हूँ। मैं नहीं चाहती कि किसी से मुझे शिक्षा मिले, नौकरी मिले, बस में सीट मिले, क्यू में आगे जाने का विशेष अधिकार मिले। मैं देवी नहीं बनना चाहती, त्याग की मूर्ति नहीं बनना चाहती, अबला बेचारी नहीं रहना चाहती। मैं जैसा पोरस ने सिकन्दर को उसके प्रश्न “तुम मुझसे कैसे व्यवहार की अपेक्षा रखते हो” के जवाब में कहा था, “वैसा ही जैसे एक राजा किसी दूसरे राजा के साथ रखता है, ” बस ठीक वैसा ही व्यवहार मेरी आकांक्षाओं में है, जैसे एक पुरुष दूसरे पुरुष के साथ रखता है जैसे एक स्त्री दूसरी स्त्री के साथ रखती है, जैसे एक इनसान किसी दूसरे इनसान के साथ पूरी मानवीयता में रखता है। मैं दिन-रात कोई लड़ाई नहीं लड़ना चाहती। मैं दिन-रात अपने को साबित करते रहने की जद्दोजहद में नहीं गुजारना चाहती। मैं अपना जीवन सार्थक तरीक़े से अपने लिए बिताना चाहती हूँ, एक परिपूर्ण जीवन जहाँ परिवार के अलावा ख़ुद के अन्तरलोक में कोई ऐसी समझ और उससे उपजे सुख की नदी बहती हो,  कि जब अन्त आए तो लगे कि समय जाया नहीं किया, कि ऊर्जा व्यर्थ नहीं की, कि जीवन जिया। मैं प्रगतिशील कहलाने के लिए पश्चिमी कपड़े पहनूँ, गाड़ी चलाऊँ, सिगरेट शराब पियूं देर रत आवारागर्दी करुं  ऐसे स्टीरियो टाइप में नहीं फसंना चाहती।“

… पारा पारा से ही न्यूयार्क में भारतीय एम्बेसी  में  प्रभा खेतान फ़ाउंडेशन और झिलमिल-अमेरिका द्वारा आयोजित कार्यक्रम में अनूप भार्गव जी के सौजन्य से पारा पारा की लेखिका प्रत्यक्षा जी से साक्षात्कार करने का सुअवसर मिला। नव प्रकाशित पारा पारा पर केंद्रित आयोजन था. पारा पारा पर तो  बातचीत  हुई ही  ब्लॉगिंग के प्रारम्भिक दिनो से शुरू हो कर  प्रत्यक्षा के कविता लेखन, चित्रकारी,  कहानियों और उनके पिछले उपन्यासो पर भी चर्चा की। 

समीक्षा के लिए  प्रभा खेतान फ़ाउंडेशन के सौजन्य से पारा पारा की प्रति प्राप्त हुई। मैनें पूरी किताब पढ़ने का मजा  लिया।  मजा इसलिए लिख  रहा हूँ क्योंकि  प्रत्यक्षा की भाषा में कविता है। उनके वाक्य विन्यास, गद्य व्याकरण की परिधि से मुक्त हैं।  स्त्री विमर्श पर मैं लम्बे समय से लिख  पढ़ रहा हूँ, पारा पारा में लेखिका ने शताब्दियों का नारी विमर्श, इतिहास, भूगोल, सामाजिक सन्दर्भ, वैज्ञानिकता, आधुनिकता, हस्त लिखित चिट्ठियो से  ईमेल तक सब कुछ काव्य की तरह सीमित शब्दों में समेटने में सफलता पाई है। उनका अध्ययन, अनुभव, ज्ञान परिपक्व है।  वे विदेश भ्रमण के संस्मरण, संस्कृत, संस्कृति, अंग्रेजी, साहित्य, कला सब कुछ मिला जुला अपनी ही स्टाइल में पन्ने दर पन्ने बुनती चलती हैं।   

उपन्यास के कथानक तथा  कथ्य मे  पाठक वैचारिक स्तर पर कुछ इस तरह घूमता, डूबता  उतरता रहता है, मानो हेलोवीन में  घर के सामने सजाये गए मकड़ी के जाले में फंसी मकड़ी हो।  उपन्यास का भाषाई प्रवाह, कविता की ठंडी हवा के थपेड़े देता पाठक के सारे बौद्धिक वैचारिक द्वन्द को पात्रों के साथ सोचने समझने को उलझाता भी है तो धूप का एक टुकड़ा नई वैचारिक रौशनी देता है, जिसमे स्त्री वस्तु नहीं बनना चाहती, वह आरक्षण की कृपा नहीं चाहती, वह सिर्फ स्त्री होना चाहती है । स्त्री विमर्श पर पारा पारा एक सशक्त उपन्यास बन पड़ा है। यह उपन्यास एक वैश्विक  परिदृश्य उपस्थित करता है।  इसमें १८७४ का वर्णन है तो आज के ईमेल वाले ज़माने का भी।  स्त्री की निजता के सामान  टेम्पून का वर्णन है तो रायबहादुर की लीलावती के जमाने और बालिका वधु नन्ना का भी। रचना में कथा, उपकथा, कथ्य,वर्णन, चरित्र, हीरो, हीरोइन, रचना विन्यास, आदि उपन्यास के सारे तत्व प्रखरता से  मौजूद मिलते हैं। प्रयोगधर्मिता है, शैली में और अभिव्यक्ति में, लेखन की स्टाइल में भाषा और बुनावट में ।

मैंने उपन्यास पढ़ते हुए कुछ अंश अपने पाठको के लिए अंडरलाइन किये हैं जिन्हें यथावत नीचे उदृत कर रहा हूँ। 

“….. और इस तरह वो माँ पहले बनीं, बीवी बनने की बारी तो बहुत बाद में आई । विवाह के तुरंत बाद किसी ज़रूरी मुहिम पर राय बहादुर निकल गए थे। किसी बड़ी ने बताया था किस तरह रोता बालक बहू की गोद में चुपा गया था। इस बात की आश्वस्ति पर तसल्ली कर वो निकल पड़े थे। घर में मालकिन है इस बात की तसल्ली।”

“…… एक बार उसने मुझे कहा था-

 “To take a photograph is to align the head, the eye and the heart. It’s a way of life.” वो सपने में हमेशा मुस्कुराते दिखते हैं। तस्वीरों में नहीं।

अच्छी तस्वीर लेना उम्दा ज़िन्दगी जीने जैसा है दिल-दिमाग़ और आँख सब एक सुर में…वो सपने में ऐसे ही दिखते हैं। हँसते हुए भी नहीं, उदास भी नहीं और थोड़ा गहरे सोचने पर, शायद मुस्कुराते हुए भी नहीं । “

इन पैराग्राफ्स मे आप देख सकते हैं कि प्रत्यक्षा के वाक्य गद्य कविता  हैं।  उनकी अभिव्यक्ति में नाटकीयता है , लेखन  हिंदी अंग्रेजी सम्मिश्रित है। 

इसी तरह ये अंश पढ़िए। …

“ मैं निपट अकेली अपने भारी-भरकम बड़े सूटकेस और डफल बैग के साथ सुनसान स्टेशन पर अकेली रह गई थी, हिचकिचाहट दुविधा और घबड़ाहट में।

लम्बी फ़्लाइट ने मुझे थका डाला था और रात के ग्यारह बज रहे थे। सामान मेरे पैरों के सामने पड़ा था और मुझे आगे क्या करना है की कोई ख़बर न थी। मैं जैसे गुम गई थी। अनजान जगह, अनजान भाषा किस शिद्दत से अपने घर होना चाहती थी अपने कमरे में। एक पल को मैंने आँखें मूँद ली थीं। अफ्रीकी मूल के दो लड़के मिनियेचर एफिल टावर बेच रहे थे, की-रिंग और बॉटल ओपनर और तमाम ऐसी अल्लम-गल्लम चीजें जो टूरिस्ट न चाहते हुए भी यादगारी के लिए ख़रीद लेते हैं। अचानक मुझे किसी दोस्त की चेतावनी याद आई, ऐसे और वैसे लोगों से दूर रहना, ठग ली जाओगी। या रास्ते की जानकारियाँ सिर्फ़ बूढ़ी औरतों से पूछना और अपने वॉलेट और पासपोर्ट को पाउच में कपड़ों में छुपाकर चलना । मैं यहाँ अनाथ थी। कोई अपना न था, मेरे सर पर कोई छत न थी। “

भले ही प्रत्यक्षा  ने पारा पारा को हीरा, तारा, लीलावती, कुसुमलता, भुवन, जितेन, निर्मल, तारिक, नैन, अनुसूया वगैरह कई कई पात्रों  के माध्यम से बुना है, और  हीरा उपनयास की मुख्य पात्र हैं।  पर जितना मैंने प्रत्यक्षा को  थोड़ा बहुत समझा है मुझे लगता है कि  यह उनकी स्वयं की कहानी भले ही न हो पर पात्रों  की अभिव्यक्ति मे वे खुद पूरी तरह अधिरोपित हैं।  उनके  व्यक्तिगत अनुभव् ही उपन्यास  के पात्रों के माध्यम से सफलता पूर्वक सार्वजनिक हुए हैं।  लेखिका के विचारों का, उनके अंतरमन  का ऐसा साहित्यिक लोकव्यापीकरण ही रचनाकार की सफलता है.

उपन्यास के चैप्टर्स पात्रों  के अनुभव विशेष पर हैं। मसलन “दुनिया टेढ़ी खड़ी और मैं बस उसे सीधा करना चाहती थी। .. हीरा  “ या   “ नील रतन  नीलांजना.. नैन“. स्वाभाविक है कि उपन्यास कई सिटिग में रचा गया होगा, जो गहराई से पढ़ने पर समझ आता है। 

पुराने समय मे ग्रामीण परिवेश में खटमल, बिच्छू, जोंक, वगैरह प्राणी उसी तरह घरों में मिल जाते थे जैसे आज मच्छर या मख्खी, एक प्रसंग में वे लिखती हैं “तुम्हारे पापा का नसीब अच्छा था, बिच्छू पाजामें से फिसलता जमीं पर आ गिरा “ यह उदृत करने का आशय मात्र इतना है की प्रत्यक्षा का आब्जर्वेशन और उसे उपन्यास के हिस्से के रूप मे पुनर्प्रस्तुत करने का उनका सामर्थ्य परिपक्वता से मुखरित हुआ है।  १९९२ के बावरी विध्वंस पर लिखते हुये एक ऐतिहासिक चूक लेखिका से हुई है वे लिखती हैं कि हजारों लोग इस हिंसा की बलि चढ़ गए जबकि यह आन रिकार्ड है की बावरी विध्वंस के दौरान १७ लोग मारे गए थे, हजारों तो कतई नहीं।

मैं उपन्यास का कथा सार बिलकुल उजागर नहीं करूंगा, बल्कि मैं चाहूंगा कि आप पारा पारा खरीदें और स्वयं पढ़ें।  मुझे भरोसा है एक बार मन लगा तो आप समूचा उपन्यास पढ़कर ही दम लेंगे, प्रेम त्रिकोण में नारी मन की मुखरता से नए वैचारिक सूत्र खोजिये। नारी विमर्श पर बेहतरीन किताब बड़े दिनों में आई है और इसे आपको पढ़ना चाहिए।

चर्चाकार… विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

वर्तमान मे – न्यूजर्सी अमेरिका

ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, ४६२०२३

मो ७०००३७५७९८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – पुनर्पाठ- वह निर्णय ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ मार्गशीष साधना🌻

आज का साधना मंत्र  – ॐ नमो भगवते वासुदेवाय

आपसे विनम्र अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

? संजय दृष्टि – पुनर्पाठ- वह निर्णय ??

स्मृतियों की स्क्रीन पर अबाध धाराप्रवाह चलते रहनेवाला धारावाहिक होता है बचपन। आँखों की हार्ड डिस्क में स्टोर होता है अतीत और विशेषता यह कि डिस्क हमारी कमांड की गुलाम नहीं होती। आज कौनसा महा एपिसोड चलेगा, इसका निर्णय आँख का मीत मन करता है।

एकसाथ कुछ एपिसोड सामने आ रहे हैं। दो तो ट्रेलर हैं, एक मुख्य एपिसोड है। पुणे में चौथी कक्षा में पढ़ने का चित्र घूम रहा है। कमांड हॉस्पिटल के रेजिमेंटल स्कूल की पिद्दी-सी कैंटीन में मिलनेवाली टॉफी की गंध आज भी नथुनों में बसी है। बहुत हद तक पारले की आज की ‘किस्मी’ टॉफी जैसी। सप्ताह भर के लड़ाई-झगड़े निपटाने के लिए शनिवार का दिन मुकर्रर था। शनिवार को स्कूल जल्दी छूटता। हम सब उस दिन हंटर (उन दिनों हम छात्रों में बेल्ट के लिए यही शब्द प्रचलित था) लगाकर जाते। स्कूल से कुछ दूर पर पेड़ों की छांव में वह जगह भी तय थी जहाँ हीरो और विलेन में भिड़ंत होनी होती। कभी-कभी टीम बनाकर भी भव्य (!) युद्ध होता। विजेता टीम या नायक की वीरता की चर्चा दबी ज़ुबान में सप्ताह भर कक्षा के लड़कों में होती। हाँ, आपसी समझदारी ऐसी कि सारी मार-कूट शनिवार तक ही सीमित रहती और सोमवार से शुक्रवार फिर भाईचारा!

दूसरा ट्रेलर लखनऊ का है। पिता जी का पोस्टिंग आर्मी मेडिकल कोर्प्स के सेंटर, लखनऊ आ गया था। हम तो वहाँ पहुँच गए पर घर का लगेज संभवत: चार महीने बाद पहुँचा। मालगाड़ी कहाँ पड़ी रही, राम जाने! माँ के इष्ट हनुमान जी हैं (हनुमान जी को पुरुषों तक सीमित रखनेवाले ध्यान दें)। हमें भी उन्होंने हनुमान चालीसा और संकटमोचन रटा दिये थे। मैं और बड़े भाई मंगलवार और शनिवार को पाठ करते। उसी दौरान माँ ने बड़े भाई को ‘हरहुँ नाथ मम संकट भारी’ की जगह ‘करहुँ नाथ मम संकट भारी’ की प्रार्थना करते सुना। माँ को दृढ़ विश्वास हो गया कि लगेज नहीं आने और तत्सम्बंधी अन्य कठिनाइयों का मूल इस निष्पाप और सच्चे मन से कहे गये ‘ करहुँ नाथ..’ में ही छिपा है!

अब एपिसोड की बात! सैनिकों के बच्चों की समस्या कहिये या अवसर कि हर तीन साल बाद नई जगह, नया विद्यालय, नये मित्र। किसी के अच्छा स्कूल बताने पर ए.एम.सी. सेंटर से लगभग दो किलोमीटर दूर तेलीबाग में स्थित रामभरोसे हाईस्कूल में पिता जी ने प्रवेश दिलाया। लगभग साढ़े ग्यारह बजे प्रवेश हुआ। स्कूल शायद डेढ़ बजे छूटता था। पिता जी डेढ़ बजे लेने आने की कहकर चले गए। कपड़े के थैले में कॉपी और पेन लिए मैं अपनी कक्षा में दाखिल हुआ। कॉपी के पहले पृष्ठ पर मैंने परम्परा के अनुसार श्री गणेशाय नमः लिखा था। विशेष याद ये कि बचपन में भी मैंने पेंसिल से कभी नहीं लिखा। जाने क्या था कि लिखकर मिटाना कभी रास नहीं आया। संभवतः शिक्षित पिता और दीक्षित माँ का पाठ और किसी जन्म का संस्कार था कि ‘अक्षर, अक्षय है, अक्षर का क्षरण नहीं होता’ को मैंने लिखे को नहीं मिटाने के भाव में ग्रहण कर लिया था।

कुछ समय बाद शिक्षक आए। सुलेख लिखने के लिए कहकर चले गए। साथ के छात्र होल्डर से लिख रहे थे। मैंने जीवन में पहली बार होल्डर देखा था। शायद अक्षर सुंदर करने के लिए उसका चलन था। मैंने पेन से सुलेखन किया। लगभग एक बजे शिक्षक महोदय लौटे। हाथ में एक गोल रूलर या एक-डेढ़ फीट की बेंत भी कह सकते हैं, लिए कुर्सी पर विराजे। छात्र जाते, अपनी कॉपी दिखाते। अक्षर सुंदर नहीं होने पर हाथ पर बेंत पड़ता और ‘सी-सी’ करते लौटते। मेरा नम्बर आया। कॉपी देखकर बोले,‘ जे रामभरोसे स्कूल है। इहाँ पेन नाहीं होल्डर चलता है। पेन से काहे लिखे? हाथ आगे लाओ।’ मैंने स्पष्ट किया कि डेढ़ घंटे पहले ही दाखिला हुआ है, जानकारी नहीं थी। अब पता चल गया है तो एकाध दिन में होल्डर ले आऊँगा।…‘बचवा बहाना नहीं चलता। एक दिन पहिले एडमिसन हुआ हो या एक घंटे पहिले, बेंत तो खाना पड़ेगा।’ मैंने बेंत खाने से स्पष्ट इंकार कर दिया। उन्होंने मारने की कोशिश की तो मैंने हाथ के साथ पैर भी पीछे खींच लिए। कपड़े का बैग उठाया और सीधे कक्षा से बाहर!..‘कहाँ जा रहे हो?’ पर मैं अनसुनी कर निकल चुका था। जिन्होंने एडमिशन दिया था, संभवतः हेडमास्टर थे, बाहर अहाते में खड़े थे। अहाते में छोटा-सा गोल तालाब-बना हुआ था, जिसमें कमल के गुलाबी रंग के फूल लगे थे। प्रवेश लेते समय जो परिसर रम्य लगा था, अब स्वाभिमान पर लगी चोट के कारण नेत्रों में चुभ रहा था। हेडमास्टर अपने में ही मग्न थे, कुछ बोले नहीं। शिक्षक महोदय ने भी अब तक कक्षा से बाहर आने की जहमत नहीं उठाई थी। हो सकता है कि वे निकले भी हों पर हेडमास्टर कुछ पूछते या शिक्षक महोदय कार्यवाही करते, लम्बे डग भरते हुए मैं स्कूल की परिधि से बाहर हो चुका था।

एक और संकट मुँह बाए खड़ा था। स्कूल से घर का रास्ता पता नहीं था। पिता जी के साथ दोपहिया पर आते समय थोड़ा अंदाज़ा भर आया था। मैंने उसी अंदाज़े के अनुसार कदम बढ़ा दिये। अनजान शहर, अनजान रास्ता पर अनुचित को स्वीकार नहीं करने की आनंदानुभूति भी रही होगी। अपरिचित डगर पर लगभग एक किलोमीटर चलने पर ए.एम.सी. सेंटर की कम्पाउंड वॉल दिखने लगी। जान में जान आई। चलते-चलते सेंटर के फाटक पर पहुँचा। अंदर प्रवेश किया। शायद डेढ़ बजने वाले थे। पिता जी आते दिखे। मुझे घर के पास आ पहुँचा देखकर आश्चर्यचकित हो गए। पूछने पर मैंने निर्णायक स्वर में कहा,‘ मैंने ये स्कूल छोड़ दिया।’

बाद में घर पर सारा वाकया बताया। आखिर डी.एन.ए तो पिता जी का ही था। सुनते ही बोले, ‘सही किया बेटा। इस स्कूल में जाना ही नहीं है।’ बाद में सदर बाज़ार स्थित सुभाष मेमोरियल स्कूल में पाँचवी पढ़ी। छठी-सातवीं मिशन स्कूल में।

आज सोचता हूँ कि वह स्कूल संभवतः अच्छा ही रहा होगा। शिक्षक महोदय कुछ गर्म-मिज़ाज होंगे। हो सकता है कि बाल मनोविज्ञान के बजाय वे अनुशासन के नाम पर बेंत में यकीन रखते हों। जो भी हो, पिता जी के पोस्टिंग के साथ स्कूल बदलने की परंपरा में किसी ’फर्स्ट डे-फर्स्ट शो’ की तरह पहले ही दिन डेढ़ घंटे में ही स्कूल बदलने का यह निर्णय अब भी सदा याद आता है।

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
image_print

Please share your Post !

Shares