श्री अमोल अनंत केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ तक्रारपेटी… प्रा.विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

( सुखी व्हायचे असेल तर ! )

समोरच्या व्यक्तीच्या वागण्यावर जर तुमचा आनंद अवलंबून असेल तर तुम्ही कधीच आनंदी होऊ शकणार नाही

आपलं सुख , आपला आनंद समोरचा व्यक्ती कसा वागतो यावर depend असणं हेच माणसाच्या दुःखाचं मूळ कारण असतं

त्यामुळे आपला आनंद दुसऱ्याच्या हातात देऊ नका !

आपल्या आनंदाची , सुखाची , समाधानाची सांगड ज्यांना स्वतःच्या कृतीशी निगडित ठेवता येते तीच माणसं थोड्या फार प्रमाणात खुश राहू शकतात !

 

किती दिवस झाले मला त्यांनी फोनच केला नाही , अरे मग तू फोन कर !

मी त्यांच्याकडे गेलो तर मला ते बोललेच नाहीत , अरे मग तू बोल !

त्यांनी मला फोटो काढतांना बोलावलंच नाही ,  मग तू त्यांना बोलव !

खरं सांगू का अशा तक्रार करण्याच्या स्वभावातून तात्काळ बाहेर पडा !

 

आयुष्य म्हणजे तक्रारपेटी नाही !

नियतीने आपल्याला जीवन हे जगण्यासाठी दिलेले आहे , तक्रार करत सुटण्यासाठी नाही !

हा माणूस किंवा ही बाई नेहमी कुणाची न कुणाची तक्रार करत राहते असा शिक्का जर तुमच्यावर बसला तर तुम्हाला कोणीही जवळ करणार नाही !

म्हणून सुखी व्हायचं असेल , आनंदी रहायचं असेल तर Complain box होऊ नका !

आपले विचार दुसऱ्यावर लादायचे नाहीत आणि दुसऱ्याचे विचार लादून घेऊन आपल्या मनाविरुद्ध वागायचं नाही हे साधं सूत्र ज्याला अंमलात आणता येतं तोच व्यक्ती आनंदी , हसतमुख राहू शकतो !

आनंद किंवा सुख ही काही वस्तू नाही , त्यामुळे आपण त्याची खरेदी करू शकत नाही !

जी गोष्ट बाजारात उपलब्धच नाही , त्या गोष्टीचा खरेदीविक्रीशी काही संबंधच नसतो !

 

याचाच अर्थ आनंद , सुख , समाधान , शांती या गोष्टींचा आणि आपण गरीब श्रीमंत असण्याचा काहीही संबंध नाही !

 

दैनंदिन जीवनातील छोट्या मोठ्या गोष्टीने disturb होऊन दुःखी होऊ नका !

 

एखाद्या वेळेस ऑफिस मधली तुमच्या हाताखालची माणसं तुमचं ऐकतील , कारण तुम्ही त्यांचे ” साहेब ” असता !

ऐकणाऱ्याचं भलं किंवा नुकसान करण्याची क्षमता तुमच्या हुद्याने तुम्हाला दिलेली असते , हे ही एक कारण असू शकते !

Where as घरातली माणसं तुमचं ऐकतीलच असं नाही , कारण घरी आपण एकमेकांचे नातेवाईक असतो , साहेब किंवा चपराशी नाही !

त्यामुळे घराचे ऑफिस आणि ऑफिसचे घर करण्याचा प्रयत्न करू नका !

जीवन खूप सोप्प आहे , जगणं खूप सुंदर आहे 

फक्त दुःखाचा पाढा वाचायचा नाही आणि सुखाचा पेढा नेहमी अपेक्षित करायचा नाही , एवढंच  !

 

लेखक : प्रा.विजय पोहनेरकर, औरंगाबाद

9420929389

संग्राहक – अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments