मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्मिता अशोक झगडे – श्री सुहास मुकुंद मोरे ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

 

? इंद्रधनुष्य ? 

☆ स्मिता अशोक झगडे – श्री सुहास मुकुंद मोरे ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे ऑफिसची गाडी बंद पडली. त्यामुळे संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर कालिना ते सायन स्टेशनपर्यंत ऑटोने यावे लागले.

पावसाची रिपरिप थोडीशी चालूच होती. तोंडावर मास्क, त्यामुळे डोळ्यावर असलेल्या चष्म्यावर धुकं जमलेलंं… घाईघाईत ऑटोतून उतरतानाच टॅक्सी स्टँडवर असलेल्या एका टॅक्सीकडे हात दाखवत सवयीप्रमाने मोठ्याने विचारले, “बरकत अली नाका चलोगे क्या?”

त्याच वेळी ड्रायव्हर सीटच्या बाजूचा दरवाजा उघडत एक हसऱ्या डोळ्यांचा चेहरा बाहेर डोकावत बोलला, “कुठे…?”

तोवर माझ्या चष्म्याची काच क्लीअर झाली होती. आता मला स्पष्ट दिसले… ती एक महिला होती !

मी थोडा गोंधळलो…मागे फिरणारच होतो, इतक्यात पुन्हा प्रश्न आला, “कुठे जायचेय?”

मी गोंधळलेल्या चेहऱ्याने कसेतरी हसत (मास्कमुळे न दिसलेले) मराठीत बोललो, “बरकत अली नाका, वडाळा.”

त्या म्हणाल्या, “बसा सर.”

मी आणि आझे एक सहकारी दोघे आत बसलो. नवीकोरी टॅक्सी, कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून पुढच्या आणि मागच्या सीटमध्ये प्लास्टीकचा पारदर्शक पडदा.

टॅक्सी स्टार्ट करून त्यांनी विनंती केली, ” सर, मला रस्ता गाईड करा प्लीज.” मी हो म्हणालो.

असे विचारणारा ड्रायव्हर नवा असतो हे सांगायला नको.

सरदार नगर, सायन कोळीवाडा येथे माझे सहकारी उतरले.

महिला टॅक्सी ड्रायव्हर, विशेष म्हणजे आपली मराठी महिला, असलेल्या टॅक्सीत मी प्रथमच प्रवास करत होतो…

त्यांच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा झाली. त्यांचा प्रतिसाद कसा असेल याचा विचार करत होतो.

बरकत अली नाक्यापर्यंत प्रवासात त्यांच्याशी बोलावे म्हणून विचारले,

” किती वर्षं झाली टॅक्सी चालवता? “

” एक महिना झाला..”

त्यांचे उत्तर आणि माझे प्रश्न असा प्रवास चालू होता..

काळाचौकी येथे राहणाऱ्या या धाडसी महिलेचे नाव स्मिता अशोक झगडे.

लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विस्कटलेली…..चिंचपोकळी येथील प्रसिद्ध शोरूम लॉकडाऊनकाळात बंद असल्याने तिथली नोकरी नसल्यातच जमा……  कुटुंबाची जबाबदारी, वाढत्या महागाई मध्ये पती पत्नी दोघेही कमावते असले तरच निभाव लागेल अशी परिस्थिती….  हाताला काम नाही….

ड्रायव्हींग लायसन्स २०१२ ला बनवून घेतले होते.

मग डोक्यात विचार आला, खचून न जाता नव्या क्षेत्रात धाडस करायचे.

एका महिलेने टॅक्सी चालवणे हा विचार तसा सहजासहजी कोणालाही न पटणाराच.

पाय ओढणाऱ्या आपल्याच लोकांचा नेहमीचा बुरसटलेला प्रश्न तयार होताच,

” लोकं काय म्हणतील??”

पण हे अपेक्षित होतेच.

काठावर बसून बुडणाऱ्याची मजा पाहणाऱ्या लोकांची पर्वा न करता स्वाभिमानाने जगण्यासाठी स्वत:च्या आवडीचे क्षेत्र निवडता येणे हीच मोठी गोष्ट.

स्मिता झगडे यांनी घरातल्यांच्या पाठबळावर टॅक्सी चालवायचा निर्णय घेतला…!

स्मिता झगडे यांना रोज वेगवेगळे अनुभव येतात. पण इतरांना वाटते तशी आमची_मुंबई वाईट नाही याचा त्यांना विश्वास वाटतो.

ड्रायव्हिंग करत असताना मुंबईच्या रस्त्यांची पुरेशी माहिती नसते, तेव्हा प्रवाश्यांनाच  विनंती करण्याची त्यांची तयारी असते. प्रवाश्यांशी वागताना सौजन्य हा महत्त्वाचा गुणधर्म त्यांच्या अंगी जाणवला. विशेष म्हणजे त्यांनी भाडे नाकारले नाही. (भाडे नाकारणे हा इथल्या टॅक्सीचालकांचा जन्मसिध्द अधिकार आहे की काय असे वाटते.)

प्रवाश्यांच्या प्रतिक्षेत असताना ड्रायव्हर सीटवर महिला पाहून कधी कधी लोकं न विचारताच पुढे जातात. बरेचदा लोकांना कुतुहल वाटते. महिलांना असे काही वेगळे करताना पाहण्याची सवय नसल्याचा हा परिणाम असेल.

स्मिता झगडे यांच्याशी बोलताना एक गोष्ट सतत मनात येत होती…यांच्या धाडसाची दखल माध्यमांनी घेतली पाहीजे. महिला सबलीकरणाच्या फक्त गप्पा मारून चालणार नाही. अशा वेगळ्या वाटा निवडणाऱ्या हिरकणींना प्रोत्साहन दिलेच पाहीजे. स्मिता झगडेसारखी परिस्थितीवर मात करू पाहणारी स्त्री इतर स्त्रियांसाठी उदाहरण असते.

कोणतेच काम लहान मोठे नसते.  तुमची मानसिकता आणि स्वत:ला स्वयंप्रकाशित करण्याची जिद्द  तुमच्या कामाचा दर्जा ठरवते. परिस्थितीपुढे हतबल होणारे, खचून जाणारे समाजाचे आदर्श होऊ शकत नाहीत. समाजाचे खरे आदर्श असतात ते स्मिता झगडे यांच्यासारखी सामान्यांतली असामान्य माणसं !

अशा धाडसाला हवी असते ती प्रोत्साहनाची शाबासकी, आत्मविश्वास वाढवणारे दोन शब्द. त्यांची लढाई ते लढत असतात. आपण फक्त लढ म्हटले तरी त्यांना हत्तीचे बळ मिळते.

मी असेच त्यांच्या धाडसाला प्रोत्साहन दिले. बरकत अली नाका आल्यावर एक फोटो काढू का विचारले तेव्हा त्यांनी लगेच होकार दिला. मास्क घातलेला एक फोटो क्लिक केल्यावर त्यांनीच मास्क बाजूला करून दुसरा फोटो काढायची परवानगी दिली. नंतर माझा मोबाईल नंबर मागून घेतला. त्यांचे नाव पत्ता दिला.

मुंबई सारख्या ठिकाणी २५-३० मिनिटांच्या प्रवासातल्या ओळखीत आपल्यावर कोणी असा विश्वास दाखवते, ते ही एक महिला, तेव्हा एक सुजाण नागरिक म्हणून आपली जबाबदारी नक्कीच वाढलेली असते.

स्मिता अशोक झगडे यांची मुंबईतल्या प्रवासात कधी कुठे भेट झाली तर त्यांना प्रोत्साहन द्यायला विसरू नका…!

Don’t Underestimate The Power Of Women !

 

– सुहास मुकुंद मोरे

संग्राहक –  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आम्ही वाचनवेड्या ☆ सुश्री स्नेहलता गाडगीळ

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

??

☆ अशी झाले मी उद्योजिका ☆ सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆ 

साधारण एक वर्षापूर्वी माझी भाची सौ मेधा सहस्रबुद्धे, जी स्वतः उत्तम शिक्षिका आहे, तिने कल्पना मांडली की आपल्याकडे इतकी छान छान पुस्तके आहेत, तर आपण ती एकत्रितपणे वाचूया का? 

माझी नणंद विमल माटेने ती कल्पना उचलून धरली.

माझ्या पतिराजांना पुस्तक म्हणजे जीव की प्राण  .त्यामुळे घरात कपड्याच्या कपाटापेक्षा पुस्तकाची कपाटे मोठी. त्यांचे नुकतेच निधन झाल्याने ही त्यांना खरी आदरांजली, असेही वाटून गेले आणि मग एके दिवशी आम्ही एक ग्रुप फॉर्म केला त्याला नाव दिले” संवादिनी “.

माझी मोठी नणंद म्हणजे मेधाची आई सुध्धा लगेच आमच्या ग्रुपला जॉईन झाल्या.

मग आम्ही पहिले पुस्तक गुगलमीट वरून  सुधा मूर्तींचे ‘ wise  and otherwise ‘ वाचायला सुरू केले. वाचनाबरोबर रोज त्यावर चर्चा करता करता आमच्यासारखे पुस्तक वेडे एक एक करून ग्रुप ला जॉईन झाले. पहिल्या दिवशी आम्ही चौघी आणि मृदुला अभंग आणि मंजिरी अदवंत  आल्या.

‘समानशीले व्यसनेषु सख्यं ’ ह्या उक्तीप्रमाणे हळूहळू आमचा ग्रुप खूप मोठा झाला. आमच्या ग्रुप मध्ये ८६ वर्षापासून  पन्नाशीच्या अलीकडे पलीकडे असणाऱ्या  सर्वजणी तितकाच इंटरेस्ट घेऊन ऐकतात आणि वाचतात. एका सदस्याचे ९२ वर्षाचे वडीलसुद्धा  खूप आवडीने सहभागी झाले होते  तिच्याकडे होते त्यावेळेस.

गुगलमीटमुळे एकाच वेळी पुणे, सांगली, मुंबई, कोल्हापूर, बडोदा इथल्या सगळ्या एकत्र वाचन करतो. एक मैत्रीण परदेशी आहे, पण तीही जमेल तसे जॉईन होते.

हा उपक्रम जवळ जवळ एक वर्ष चालू आहे आणि आत्तापर्यंत आम्ही २५ पुस्तके वाचली आहेत .ह्याच वाचन कट्टयावर सावरकरांचे जीवन ह्याचे सार्थ चित्रण डोळ्यासमोर उभे करणाऱ्या मुग्धा पंडितना ऐकायला मिळाले. बनारसला जाऊन शिवतांडव म्हणून आलेल्या वैजयंती आसलेकर- कडून अस्खलितपणे तितक्याच ताकदीने म्हटलेले शिवतांडव ऐकायला मिळाले. करोनामुळे प्रत्यक्ष एकत्र येणे मागील काळात शक्य नव्हते. पण आम्ही इ-कोजागिरी साजरी केली. प्रत्येक सदस्याला त्यात भाग घेता आला आणि काहीतरी सादर करायला मिळाले. सूत्र संचालन सुद्धा ऑफ लाईन प्रोग्रामसारखे झाले. असा एक आगळा वेगळा प्लॅटफॉर्म खूप काही देऊन गेला. कोरोनाने आलेले नैराश्य कुठल्या कुठे पळून गेले.

आजकाल आपण म्हणतो की मुलांना वाचनाची गोडी नाही. मराठी भाषा ही त्यांना अगम्य.  पण तितकी चांगली पुस्तके एकत्र येऊन वाचली तर मुलंही लक्ष देवून ऐकतात हे आमच्या लक्षात आले.

त्यामुळे त्यांच्यासाठीही  एक दिवस मराठी भाषेतील हा खजिना त्यांच्या पुढे उघडावा असे आम्ही ठरवले आहे.

आत्तापर्यंत वाचलेली पुस्तकं फक्त मराठी अशी नव्हती. सर्व भाषांमधील भाषांतरित केलेली पुस्तकेही वाचली . तसेच ‘ महामुनी व्यास ‘ हे हिंदीमधले पुस्तकही तितक्याच कौतुकाने वाचले. आमच्या मामी सौ.उज्वला केळकरही आमच्या ग्रुपच्या सदस्य आहेत. त्या स्वतः ही उत्तम लेखिका आहेत, आणि त्यांची ६५ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पण त्याही वाचनात समरस होतात.

अतिशय समृद्ध अशी आपली भाषा आता  टीव्ही मोबाईल संस्कृतीमुळे पुस्तकांपुरतीच सीमित राहिली आहे. अर्थात डीजीटलाइझेशनमुळेच एकत्र वाचनाचा आनंद घेता येतो. पण ती लपलेली संपदा अश्या व्यासपीठांवर ठळक पणे उपलब्ध झाली. आम्ही सगळ्या मैत्रिणी चातकासारखी वाचनाची वाट पाहतो आणि आमची पुस्तकाची तहान भागवतो. आमच्या एक सदस्या सौ मृदुला अभंग हिने सर्व वाचलेल्या पुस्तकांची यादी लेखकांच्या नावासहीत ग्रुपवरती पाठवली आहे.

असा आहे आमचा वाचन ग्रुप “ संवादिनी “, जो सतत नवनवीन  प्रकाशित पुस्तकांच्या माध्यमातून एकमेकींशी संवाद साधतो.

© सुश्री स्नेहलता गाडगीळ

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – संस्मरण ☆ लेखांक # 7 – मी प्रभा… अभिमंत्रित वाटा ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? आत्मकथन ?

☆ लेखांक# 7 – मी प्रभा… अभिमंत्रित वाटा ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आयुष्य खूप सरळ साधं होतं, वीस वर्षाची असताना लग्न, बाविसाव्या वर्षी मुलगा, घर..संसार इतकंच आयुष्य !

पण वयाच्या चौदाव्या वर्षीच माझ्या आयुष्यात “ती ” आली होती, तिच्या विषयी मी असं लिहिलंय, 

ही कोण सखी सारखी,

माझ्या मागे मागे येते

हलकेच करांगुली धरूनी

मज त्या वाटेवर नेते —–

मला त्या अभिमंत्रित वाटेवर नेणारी माझी सखी म्हणजे माझी कविता!

कविता करायची उर्मी काही काळ थांबली होती, कालांतराने…कविता  सुचतच होती,  त्या मासिकांमध्ये प्रकाशित होत होत्या. १९८५ बहिणाई मासिकाने आयोजित केलेल्या कविसंमेलनात कविता वाचली.त्या संमेलनाचे अध्यक्ष होते कविवर्य वसंत बापट !ते “कविता छान आहे” म्हणाले, सर्वच नवोदितांना वाटतं तसं मलाही खूप छान वाटलं ! 

त्यानंतर अनेक काव्यसंस्था माहित झाल्या. काव्य वाचनाला जाऊ  लागले. एका दिवाळी अंकाचं काम  पहायची संधी अचानकच मिळाली, साहित्यक्षेत्रात प्रवेश झाला. लग्नाच्या  आधी मी कथा, कविता लिहिल्या होत्या ! लेखन हा माझा छंद होताच पण लग्नानंतर मी काही लिहीन असं मला वाटलं नव्हतं ! पण पुन्हा नव्याने  कविता कथा लिहू लागले !

या अभिमंत्रित वाटेवर चालताना खूप समृद्ध झाले. अनेक साहित्यिक भेटले. स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. लेखनाचा आनंद वेगळाच असतो. मी चांगलं लिहिते याची नोंद इयत्ता दहावीत असताना हिंदीच्या जयंती कुलकर्णी मॅडमनी घेतली होती, माझ्या सहामाही परिक्षेत लिहिलेल्या “फॅशन की दुनिया” या निबंधाचं त्यांनी भरभरून कौतुक केलं होतं.

पण भविष्यात मी लेखिका, कवयित्री, संपादक होईन असं मला वाटलं नव्हतं ! मी अजिबातच महत्वाकांक्षी नव्हते….नाही ! घटना घडत गेल्या आणि मी घडले . कदाचित पुण्यात असल्यामुळेही असेल ! कविसमुदायात सामील झाले,काव्यक्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख मिळाली !

वेगळं जगता आलं,हीच आयुष्यभराची कमाई ! मी शाळेत असताना शैलजा राजेंच्या खूप कादंब-या वाचल्या होत्या. लग्नानंतर त्या रहात असलेल्या सोमवार पेठेत रहायला आले. त्यांना जाऊन भेटले. पुढे त्यांनी माझ्या दिवाळी अंकासाठी कथाही पाठवली. मी “अभिमानश्री” या स्वतःच्या वार्षिकाचे जे चार अंक काढले,ते संपादनाचा चौफेर आनंद देऊन गेले.

अनेक साहित्यिक कलावंत भेटले, मुलाखती घेतल्या….कवितेचे अनेक कार्यक्रम केले.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग नोंदवला! गज़ल संमेलनातही !

माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला खूप श्रीमंत अनुभव या साहित्य क्षेत्रानेच मिळवून दिले…दोन नामवंत काव्य संस्थांवर पदाधिकारी म्हणून काम पहाता आलं, साहित्य विषयक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवतात आला !

खूप वर्षांपूर्वी कवयित्री विजया संगवई भेटल्या अचानक, टिळक स्मारक मंदिरात.  नंतर तिथल्या पाय-यांवर बसून आम्ही खूप गप्पा मारल्या. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, “आपण कवयित्री आहोत हे किती छान आहे, आपल्या एकटेपणातही कविता साथ देते,आपण स्वतः मधेच रमू शकतो “. ते अगदी खरं आहे !

नियतीनं मला या अभिमंत्रित वाटेवर आणून सोडल्याबद्दल मी खरंच खूप कृतज्ञ आहे…

अल्प स्वल्प अस्तित्व मज अमूल्य वाटते

दरवळते जातिवंत खुणात आताशा

अशी मनाची भावावस्था होऊनही बराच काळ लोटला…….

या वाटेवर मनमुक्त फिरताना उपेक्षा, कुचेष्टा, टिंगलटवाळीही वाट्याला आली, पण जे काही मिळालं आहे, त्या तुलनेत हे अगदीच नगण्य !

सांग “प्रभा” तुज काय पाहिजे इथे अधिक?

रिक्त तुझ्या या जीवनात बहरली गज़ल

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 74 – दोहे ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र”

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपके अप्रतिम कालजयी दोहे।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 74 –  दोहे ✍

कुर्सी कुर्सी विराजे, नेता बंदर छाप।

खाना-पीना, उछलना इनके क्रिया कलाप।।

 

आएगा, वह आएगा, राह देखते नित्य ।

कहां न्याय का सिंहासन कहां विक्रमादित्य।।

 

अंधे गूंगे बधिर जो, थामें हाथ कमान ।

फर्क नहीं उनके लिए, मरे राम- रहमान।।

 

मेहनतकश भूखा मरे, अवमूल्यित विद्वान।

हर लठैत ने खोल ली, भैंसों की दुकान।।

 

प्रजातंत्र के पहरुए, पचा गए चौपाल ।

अटकी हो तो दौड़िये, दिल्ली या भोपाल।।

 

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव-गीत # 74 – “कैसे रहें सुर्खियों में” ☆ श्री राघवेंद्र तिवारी

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा ,पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित । 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है।  आज प्रस्तुत है एक भावप्रवण अभिनवगीत – “कैसे रहें सुर्खियों में।)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 74 ☆।। अभिनव-गीत ।। ☆

☆ || “कैसे रहें सुर्खियों में” || ☆

ऊँचे भवनों में रह कर के

सिर्फ गरीबी पर लिखना ।

ऐसे गीतों से हट कर कुछ

नया -नया भैया लिखना।।

 

रेशम ही जब बना तुम्हें तो

चमक दिखा करअपनीभी।

शिफ्टकरोअपनी किस्मत को,

ले जुगाड़ वाली चाभी।

 

कभी कभार पाँचतारा में-

फटी जीन्स में भीदिखना।।

 

गया ट्रेंड होरी धनियां का

“कैसे रहें सुर्खियों में।”

सारी दुनियाँ घूम रही है

सन्शोधनी चर्खियों में।

 

इसी विषय पर अपनी प्रतिभा

के मीठे फल को चखना।।

 

यह भी नया ट्रेंड है आया

सरकारों में घुस जाओ।

लिखा भूख या खून पसीने

पर जो तुमने, मिटवाओ।

 

अपने संरक्षण को मन्त्री

स्तर का नेता रखना ।।

 

©  श्री राघवेन्द्र तिवारी

20-01-2022

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈
image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – जर्जर ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

? संजय दृष्टि –जर्जर ??

कौन कहता है

निर्जीव वस्तुएँ

अजर होती हैं,

घर की कलह से

घर की दीवारें

जर्जर होती हैं!

©  संजय भारद्वाज

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

बाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ काव्य धारा 65 ☆ अनुपम वीर सुभाष ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी  द्वारा रचित एक भावप्रवण  कविता  “अनुपम वीर सुभाष”। हमारे प्रबुद्ध पाठक गण  प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी  काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे। ) 

☆ काव्य धारा 65 ☆ अनुपम वीर सुभाष ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

जिसके गौरव से गौरवांवित भारत का इतिहास है

उन महान पुरुषों में से एक अनुपम वीर सुभाष हैं ।

 

एक चरित्र अनोखा ऐसा जिसके प्रखर प्रकाश में

सभी दूसरे तारे धूमिल से दिखते आकाश में ॥

 

जिसे गृहस्थी , सुख – सपना सब लगता था जंजाल सा

या ऊँची शिक्षा भी जिसने रखी न वैभव लालसा ॥

 

उपन्यास सी जिसकी जीवन – गाथा कई आयाम की

जिसने कभी न की आकांक्षा कहीं , किसी आराम की ॥

 

दृष्टि रही पाने स्वदेश की आजादी का रास्ता

लक्ष्य एक ही रहा , रखा न अधिक किसी से वास्ता ॥

 

दल के भीतर भी विरोध का गरल पान कर शांति से

होकर दूर भ्रांति से नाता जोड़ा निश्चित क्रांति से ॥

 

अपना दर्शन और दिशा ले आगे बढ़ते शान से

अमर आज भी जो जग में है , जन मन में सम्मान से ॥

 

छोड़ा हिन्द , हिन्द के सुख हित नूतन सैनिक वेश ले

“ तुम दो खून मुझे , मैं दूंगा आजादी ‘ का संदेश दे ॥

 

एक धारणा , एक साधना , चिन्ता गहन , समान नित

नारा था ‘ जयहिन्द ‘ शपथ थी मर मिटने की देश हित

 

था मन अनुरंजित भारत माँ के सच्चे अनुराग से

कभी न दम ली रहा खेलता जीवन भर बस आग से ॥

 

गठित फौज आजाद हिन्द कर , खुद उसका नेतृत्व कर

आजादी की विजय पताका , लाते अपने साथ घर

 

अकथ परिस्थितियों में बेबस बढ़ते निज अभियान में

हुआ लुप्त , लग गई आग थी कहते उनके यान में ॥

 

उस महान की याद सँजोये दुखी बहुत इतिहास है

क्योंकि आज भी ‘ कहाँ गया वह ? ‘ कोई प्रमाण न पास है ।

 

वर्षों बाद आज भी उसकी स्मृति में सम्मान से

भारत में ‘ जयहिन्द ‘ का नारा गूँज रहा अभिमान से ॥

 

स्वाभिमान , संकल्प , कर्म पर थी सुभाष की आस्था

जो मानव की कीर्ति भवन तक पहुँचाने का रास्ता ॥

 

उसके पावन देशप्रेम को , साहसमय अभियान को

आओ सब मिल नमन करें , हम वीर सुभाष महान को ॥

 

तेइस जनवरी आज जन्मतिथि उस भारत के लाल की

जिसकी प्रेरक जीवन यात्रा पावन याद उभारती ॥

 

इस दिन ने ही भारत माँ को दिया सपूत सुभाष था

जिस पर भारत जन मानस का अडिग अमर विश्वास था ।

 

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ 

ए २३३ , ओल्ड मीनाल रेजीडेंसी  भोपाल ४६२०२३

मो. 9425484452

[email protected]

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ समय चक्र # 94 ☆ वीर सुभाष – जन्मदिवस पर विशेष ☆ डॉ राकेश ‘चक्र’

डॉ राकेश ‘ चक्र

(हिंदी साहित्य के सशक्त हस्ताक्षर डॉ. राकेश ‘चक्र’ जी  की अब तक शताधिक पुस्तकें प्रकाशित हो चुकी हैं।  जिनमें 70 के आसपास बाल साहित्य की पुस्तकें हैं। कई कृतियां पंजाबी, उड़िया, तेलुगु, अंग्रेजी आदि भाषाओँ में अनूदित । कई सम्मान/पुरस्कारों  से  सम्मानित/अलंकृत।  इनमें प्रमुख हैं ‘बाल साहित्य श्री सम्मान 2018′ (भारत सरकार के दिल्ली पब्लिक लाइब्रेरी बोर्ड, संस्कृति मंत्रालय द्वारा  डेढ़ लाख के पुरस्कार सहित ) एवं उत्तर प्रदेश हिन्दी संस्थान द्वारा ‘अमृतलाल नागर बालकथा सम्मान 2019’। आप  “साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र” के माध्यम से  उनका साहित्य आत्मसात कर सकेंगे । 

आज प्रस्तुत है  आपकी एक भावप्रवण  रचना “वीर सुभाष – जन्मदिवस पर विशेष”. 

☆ साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र – # 94 ☆

☆ गीत – वीर सुभाष – जन्मदिवस पर विशेष ☆ 

 

आकर वीर सुभाष गर्व से

वंदे मातरम गा जाओ।

वतन याद कर रहा आपको

सरगम तान सुना जाओ।।

 

कतरा – कतरा लहू तुम्हारा

काम देश के आया था

इसीलिए तो आजादी का

झंडा भी फहराया था

गोरों को भी छका- छका कर

जोश नया दिलवाया था

ऊँचा रखकर शीश धरा का

शान – मान करवाया था

 

सत्ता के भूखे पेटों को

कुछ तो सीख सिखा जाओ।

वतन याद कर रहा आपको

सरगम तान सुना जाओ।।

 

नेताजी उपनाम तुम्हारा

सब श्रद्धा से लेते है

नेता आज नई पीढ़ी के

बीज घृणा के बोते हैं

डूबे नाव वतन की लेकिन

अपनी नैया खेते हैं

स्वार्थ में डूबे हैं इतने

दुश्मन लगें चहेते हैं

 

नेताजी के नाम काम की

आकर लाज बचा जाओ।।

वतन याद कर रहा आपको

सरगम तान सुना जाओ।।

 

जंग कहीं है कश्मीर की

कहीं सुलगता राजस्थान

आतंकी सिर उठा रहे हैं

कुछ कहते जिनको बलिदान

कैसे न्याय यहाँ हो पाए

सबने छेड़ी अपनी तान

ऐक्य नहीं जब तक हो पाए

कैसे गूँजें मीठे गान

 

भेदभाव का जहर मिटाकर

सबमें ऐक्य करा जाओ।।

वतन याद कर रहा आपको

सरगम तान सुना जाओ।।

 

लिखते – लिखते ये आँखें भी

झरने-सी हो जाती हैं

आजादी है अभी अधूरी

भय के दृश्य दिखाती हैं

अभी यहाँ कितनी अबलाएं

रोज हवन हो जाती हैं

दफन हो रहा न्याय यहाँ पर

चीखें मर – मर जाती हैं

 

देखो तस्वीरें गौरव की

कुछ तो पाठ पढ़ा जाओ।।

वतन याद कर रहा आपको

सरगम तान सुना जाओ।।

 

कहाँ चले तुम, कहाँ खो गए

ये अब तक भी भान नहीं

किसकी चालें, किसकी घातें

ये भी हमको ज्ञान नहीं

कौन मिला था अंग्रेजों से

कोई यह बतलाएगा

उनके पार्थिव तन को लेकर

आज मुझे दिखलाएगा

 

मेरे प्रश्नों के उत्तर भी

आकर के तुम दे जाओ।।

वतन कर रहा याद आपको

सरगम तान सुना जाओ।।

© डॉ राकेश चक्र

(एमडी,एक्यूप्रेशर एवं योग विशेषज्ञ)

90 बी, शिवपुरी, मुरादाबाद 244001 उ.प्र.  मो.  9456201857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी #64 ☆ # सर्द मौसम # ☆ श्री श्याम खापर्डे

श्री श्याम खापर्डे 

(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “# सर्द मौसम #”) 

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 64 ☆

☆ # सर्द मौसम # ☆ 

ठिठुरन भरी रात है

बदले हुए हालात हैं

मौसम ने अंगड़ाई ली

बिन बादल बरसात है

 

सर्द हवाएं चल रही है

अंगीठियाँ घर घर जल रही है

गर्म कपड़ों की निकली बारात है

जैसे ही यह शाम ढल रही है

 

पकोड़ो का मौसम है आया

हर किसी ने मज़े ले ले कर खाया

मूंग बड़े और मिर्ची भजिया

हर शख्स को खूब है भाया

 

यह देखो तोता और मैना

सुंदर जोड़ी का क्या कहना

आगोश में डूबे हैं दोनों

चुप है पर बोल रहे हैं नैना

 

चारों तरफ अलाव जल रहे हैं

प्रेम बीज हृदय में पल रहे हैं

हो तरूण या वृद्ध हो

प्रेम में डूबे खेल चल रहे हैं

 

यूं ही रंगीन मौसम आता रहे

दिल को धीमे धीमे सुलगाता रहे

पिघल जाये हिमखंड आगोश में

उन्मुक्त झरना सदा बहता रहे/   

© श्याम खापर्डे 

फ्लेट न – 402, मैत्री अपार्टमेंट, फेज – बी, रिसाली, दुर्ग ( छत्तीसगढ़) मो  9425592588

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

image_print

Please share your Post !

Shares

सूचनाएँ/Information ☆ ☆ मण्डला जिले के गौरव सुप्रसिद्ध शिक्षाविद डॉ राम कृष्ण पाण्डेय नहीं रहे ☆ ☆

स्व डॉ राम कृष्ण पाण्डेय

  ? मण्डला जिले के गौरव सुप्रसिद्ध शिक्षाविद डॉ राम कृष्ण पाण्डेय नहीं रहे ?

उन आँखों में झांक के देखो तो सही ,
प्यार झलकता है की नहीं ।
एक कदम बढ़ा के देखो तो सही ,
राह मिलती है की नहीं ।
– श्री जय प्रकाश पाण्डेय 

(यह अत्यंत दुख की बात है कि श्री जय प्रकाश पाण्डेय जी, संपादक ई-अभिव्यक्ति (हिन्दी) के बड़े भाई साहब आदरणीय डॉ राम कृष्ण पाण्डेय जी का कल हृदयघात से विगत दिवस निधन हो गया।)

अद्वितीय प्रतिभा के धनी डॉ राम कृष्ण पाण्डेय जी का जन्म भीखमपुर (निवास) में जन्म हुआ था। जीवन के प्रारम्भ से ही संघर्षरत रह कर वे न केवल आगे बढ़े अपितु कई लोगों के प्रेरणास्रोत भी रहे। आपने अपने समय में मेट्रिक में मेरिट लिस्ट में आकार मंडला जिले का नाम रोशन किया था।

आपने जबलपुर विश्वविद्यालय से एम.ए. में स्वर्ण पदक प्राप्त करने के पश्चात ‘महात्मा गांधी जी के निजी सचिव’ एवं पूर्व सांसद डॉ महेश दत्त मिश्र जी के निर्देशन में “भारतीय संसदीय प्रणाली” में पी एच डी की उपाधि प्राप्त किया। तत्पश्चात “इंडियन प्राइम मिनिस्टर थ्योरी एंड प्रेक्टिस” पर डी लिट की उपाधि प्राप्त किया। बाद में प्रधानमंत्री के विशेष राजनैतिक सलाहकार  रहे। कम्युनिकेशन आफ इंडिया के निदेशक रहे। देश भर के आकाशवाणी केन्द्रों के लिए प्रोग्राम पालिसी बनाने वाले विभाग “श्रोता अनुसंधान” में डिप्टी डायरेक्टर से रिटायर हुए। रिटायर होने के बाद एल.एल.बी. एवं एल एल एम में स्वर्ण पदक प्राप्त किया। साथ ही बतौर गाइड कई छात्रों को पी.एच.डी. करायी।

रिटायर होने के बाद छत्तीसगढ़ कालेज, रायपुर में वरिष्ठ प्रोफेसर के रूप में काम करते हुए लोगों को निशुल्क कानूनी सलाह देते रहे। रिटायर होने के बाद भी अध्ययन करते हुए “सूचना के अधिकार” पर ऐतिहासिक पी.एच.डी की, जो अपने आप में एक रिकॉर्ड है। उन्होंने पिता की तरह अपने परिवार की जिम्मेदारी का निर्वहन किया जो अनुकरणीय है।

? ई-अभिव्यक्ति परिवार की ओर से परम आदरणीय डॉ राम कृष्ण पाण्डेय जी को सादर नमन एवं विनम्र श्रद्धांजलि। ॐ शांति! शांति! ?

 

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

image_print

Please share your Post !

Shares