मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माय मराठी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ माय मराठी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

 जन्म कुसुमाग्रजांचा ,

  सौभाग्य महाराष्ट्रा चे!

 लाभे कृपा शारदेची ,

   भाग्यवंत आम्ही येथे !

 

 माय मराठी रुजली,

  अमुच्या तनामनात!

 दूध माय माऊलीचे,

  प्राशिले कृतज्ञतेत !

 

साहित्य अंकी खेळले,

 लेख, कथा अन् काव्य!

माऊलीने उजळले ,

 ज्ञानदीप भव्य- दिव्य!

 

घेतली मशाल हाती ,

 स्फुरे महाराष्ट्र गान !

भक्तीचे अन् शौर्याचे,

 राखले जनी हे भान!

 

 ज्ञानेश्वरी ज्ञानयाची,

  सोपी भाषा तुकयाची!

 मराठी रामदासांची ,

   समृद्धी माय मराठीची!

 

 सौंदर्यखनी मराठी,

  कौतुक तिचे करू या!

 मी महाराष्ट्रीय याचा,

  अभिमान बाळगू या!

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #164 ☆ मौलिक आधार ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 164 – विजय साहित्य ?

☆ मौलिक आधार ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

(अष्टांक्षरी रचना…)

एक धागा सुखाचा रे

पदोपदी गुंफलेला

आठवांच्या मागावर

ताना बाना सांधलेला,..! १

 

बाल तारूण्य वार्धक्य

एक धागा जरतारी

वस्त्र तीन रंगातले

आत्मरंगी कलाकारी…! २

 

आठवांचे मोरपीस

बंध हळव्या शब्दांचे

भावनांचे कलाबूत

हार काळीज फुलांचे…! ३

 

सुख नाही रे जिन्नस

त्याचा नसावा व्यापार

काळजाच्या वेदनेला

सुख मौलिक आधार…! ४

 

एक धागा सुखमय

ठेवी नात्यांना बांधून

स्वभावाचे दोष सारे

घेती आयुष्य सांधून…! ५

 

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ज्योती कलश छलक… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ ज्योती कलश छलक… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे  

पूर्वी दूरदर्शनवर राष्ट्रीय साक्षरता मिशन या कार्यक्रमाच्या प्रचारार्थ एक गाणं दाखवलं जायचं. मला ते फार आवडायचं. ते गाणं होतं ‘ पूरब से सूर्य उगा, फैला उजियारा , जागी हर दिशा दिशा , जागा जग सारा. ‘ त्या गाण्यात सकाळच्या सूर्याचा सोनेरी प्रकाश,छोट्या मुलांचं पाटीवर मुळाक्षरं गिरवणं , त्या वृद्ध आजोबांचा हसतमुख चेहरा, त्यांचं दाढी करताना साबणाचा फेस त्या छोट्या मुलाच्या चेहऱ्याला लावणं, नंतर त्या मुलाच्या चेहऱ्यावरून हात फिरवणं, त्या मुलाचा विलक्षण हास्याने उजळलेला चेहरा, त्याचं निरागस हास्य या गोष्टी मनाला खूपच स्पर्शून जात होत्या. काही काही गोष्टी अशा चिरकाल स्मरणात राहून जातात. तसेच ते ‘ मिले सूर मेरा तुम्हारा ‘ हे गाणं . भारतातील विविध भाषा, विविध भागातील प्रादेशिक प्रथितयश कलाकार आणि गायक आणि विविध नयनरम्य दृश्ये यामुळे ते गाणं अमर झालं आहे. भारतातील विविधतेतील एकतेच दर्शन घडवण्यात त्या गाण्याचा दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.

तसेच ज्योती कलश छलके हे गाणं . सूर्य उगवल्यानंतरच्या दृश्याचं मनोरम वर्णन त्या गाण्यात आहे. अशी खूप गाणी आहेत. जी सकाळची वेळ दाखवतात. सूर्य उगवला आहे, आणि त्याबरोबर सारी सृष्टी कशी चैतन्यात न्हाऊन निघाली आहे हे बहुतेक गाण्यातून दाखवले आहे. अशी मन प्रसन्न करणारी भक्तिगीते तर भरपूर आहेत. गणपतीला भूपाळी म्हणताना ‘ तुझ्या कांतीसम रक्त पताका पूर्वदिशी फडकती, अरुण उगवला, प्रभात झाली , उठ महागणपती. ‘ किती सुंदर वर्णन हे ..! शब्दातलं सौंदर्य बघा. गणपतीचा वर्ण लाल, आरक्त. तशीच पूर्व दिशा सकाळच्या वेळी लाल, आरक्त झाली आहे. जणू रक्त पताका म्हणजे लाल रंगाच्या पताका पूर्व दिशेला सूर्यदेवाच्या आगमनाने फडकत आहेत.

तर दुसऱ्या एका अवीट गोडीच्या भक्तिगीतात श्रीरामाला जागवताना, ‘ उठी श्रीरामा, पहाट झाली, पूर्वदिशा उजळली, उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माऊली ..’ त्याच गाण्यात पुढे ‘ चराचराला जिंकून घेण्या अरुणप्रभा उगवली.. ‘ असे शब्द आहेत. खरोखर सूर्योदय झाला की त्याची प्रभा, प्रकाश जणू चराचर जिंकून घेतो. चराचरात चैतन्य आणतो. धरतीवरच निद्रिस्त जीवन जागृत होतं . फुलं उमलतात, पक्षी गाऊ लागतात. देवळातल्या घंटा निनादू लागतात. काही काळापूर्वी सगळीकडे पसरलेलं अंधाराचं साम्राज्य कुठे नाहीस होत ते कळत नाही. ‘ फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश..’ दरीखोऱ्यात मग सगळीकडे प्रकाशच प्रकाश भरून राहतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते म्हणजे तो सोबत येतांना नव्या दिवसाबरोबर नव्या आशा घेऊन येतो. नव्या आशा, नव्या दिशा आणि जीवनाचे नवे गाणे.

वसंतराव देशपांडेंनी गायलेलं ‘ तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज..’ हे गाणं मनाला स्पर्शून जातं .  कट्यार काळजात घुसली या नाटकातलं हे पद पुरुषोत्तम दारव्हेकरांनी लिहिलं आणि त्याला संगीतसाज चढवला आहे जितेंद्र अभिषेकी बुवांनी. ललत पंचम रागातील हे गीत कधीही ऐकलं तरी आनंद देणारं . हा तेजोनिधी एकदा आकाशात प्रकटला की अवघे भुवन म्हणजे जग त्याच्या दिव्य स्पर्शाने झगमगून जातं .

आपण भारतीय किती भाग्यवान आहोत, याची तुम्हाला कदाचित कल्पना नसेल. जगातील अनेक देशात फार कमी मिळणारा सूर्यप्रकाश आमच्या देशात जवळपास बारा महिने  मुबलक उपलब्ध आहे. हे आमचे केवढे भाग्य आहे. आणि आता तर उन्हाळा सुरु झाला आहे.  आम्ही सूर्योपासनेच्या बळावर कोरेनासारख्या  संकटाचा यशस्वी मुकाबला करू शकलो. सूर्यनमस्कारासारखा व्यायाम आम्हाला शक्ती देईल. आमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल. कोवळ्या सूर्यप्रकाशात फिरायला जाणे आमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरेल.

 सूर्य हा अनंत काळापासून आपला शक्तीदाता आहे, बुद्धिदाता आहे, आरोग्यदाता आहे. तो आहे तर पृथ्वीवर जीवन आहे. म्हणूनच तो खऱ्या अर्थाने ‘ मित्र ‘ आहे. सकाळी उठल्यावर प्रकाशमान, चैतन्यदायी असं काही आपल्याला दिसत असेल, तर ते म्हणजे पूर्वेला उगवलेला सूर्य. केवढ्या तेजानं ती पूर्व दिशा उजळली असते..! अशा वेळी आपणही त्या तेजाचं दर्शन घ्यावं. त्या तेजात न्हाऊन घ्यावं. त्याला थोडी प्रार्थनाही करावी. की बाबा, या तुझ्या विलक्षण तेजातला काही अंश तरी आम्हाला दे. आमचेही अंतर असेच उजळू दे. त्यातील अमंगल, वाईट विचार, निराशा यांचा अंध:कार तुझ्या तेजात नष्ट होऊ दे. आम्हाला आरोग्य प्रदान कर. रोगराई नष्ट होऊ दे. सर्वांचं मंगल कर, सर्वांचं कल्याण कर.

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा.)

 ©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अम्मी आणि मम्मी – भाग 2 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? जीवनरंग ?

☆ अम्मी आणि मम्मी – भाग २ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

डॉ हंसा दीप

(मागील भागात आपण पहिले – “तुला माहीत नाही का, हे खुनी आपलं आणि पाकिस्तानचं नातं कधी धड होऊ देत नाहीत ते!” आता इथून पुढे )

मम्मी पण ते सगळं ऐकून कावरी-बावरी झालेली होती, पण आधी आजीला शांत करणं गरजेचं होतं. अमेरिकेत असे फुटीरतावादी विचार घेऊन कसं रहाता येईल! आत्ता तर आलोय इथे, अजून धड जम पण बसलेला नाही. आजीच्या या विरोधाला, रागाला इथेच आळा घालणं आवश्यक होतं.

“इथे सगळ्यांचा धर्म वेगवेगळा आहे सासूबाई, सगळे मांस मटण खातात. कोणा-कोणापासून दूर राहील ही?”

“बाकी कोणापासून दूर राहो, न राहो, त्या पाकिस्तान्यांपासून मात्र दूर राहू दे हिला!”

“हे बघ, तीप्पी, तू तिथून आलीस की आंघोळ करत जा. आणखी ऐक, त्यांच्या फ्रीजमधलं काहीही खात जाऊ नको. तिथे जास्त थांबायचं पण नाही. या लोकांचं काही सांगता येत नाही, प्राणी मारून, कापून हात सुद्धा धूत नसतील हे लोक.”

आणखीही बरंच काही बोलत होती आजी, कोण जाणे काय-काय! या वयात, या अनोळखी देशात येऊन रहावं लागण्याची निराशा पण तिच्या या रागामधून बाहेर पडत असावी बहुधा! मम्मीने तृपितला खुणेनेच  तिच्या खोलीत जायला सांगितलं. तिला आजीचा हा तिरस्कार कसा काय समजणार होता? तिच्या काकाच्या मृत्युच्या वेळी ती खूपच लहान होती, आणि या आधी अशा काही गोष्टींचा उल्लेखही तिच्यासमोर कोणी केलेला नव्हता.

ती तर वर्तमानातच जगत होती. शाळेतून घरी येता-जातानाचा वेळ हा त्या दोघींसाठी दिवसातला सर्वात चांगला वेळ असायचा, तेंव्हा दोघी जणू एकमेकींची सावली बनून रहात असत. दोन्ही घरातलं वातावरण जवळ जवळ एकसारखंच होतं. सोफ्यावर टाकलेली कशिद्याची कव्हर्स सुद्धा सारखीच होती. घरात शिरल्यावर येणारा वास सुद्धा जवळजवळ सारखाच असायचा. स्वयंपाकघरातून रोटी भाजल्याचा जो सुवास यायचा, त्यामुळे ते घर आपल्या घरासारखंच वाटायचं

आजीच्या या आरड्या-ओरड्याचा त्यांच्यावर काही विशेष परिणाम झाला नाही. अम्मी आणि मम्मी दोघीही आपापल्या मुलींबरोबरच त्यांच्या मैत्रिणीवर पण तसंच प्रेम करायच्या. दोघी दिसायच्याही सारख्याच. लांब केस आणि चमकदार डोळे! अम्मी काही नोकरी वगैरे करत नसल्यामुळे कायम घरातच असायची. शाळेतून परतताना तहरीमच्या घरी गेलं, की अम्मी तृपितवर पण प्रेमाचा वर्षाव करायची. मम्मी दिवसभर कामावर जाऊन घरी आली की तहरीमची चौकशी करायची. तहरीम आणि तृपितची मैत्री त्यांना समाधान द्यायची. तहरीमशी मैत्री झाल्यापासून तृपित परत पूर्वीसारखी झाली होती. इथे आल्यापासून तिचा खोडकरपणा आणि चंचलता नाहीशीच झाली होती, ती आता परत पूर्ववत झाली होती. तृपितला आता शाळेत जाण्याचा त्रासही होत नव्हता, या गोष्टीनंही तिच्या घरच्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता. मम्मीला पाकिस्तानी आंबे आणि नाजूक कशिदाकारी केलेले कपडे खूप आवडत असत. गच्च भरलेले, गडद रंगाचे, आणि गोड असे सिंध्री व चौंसा जातीचे आंबे दर आठवड्याला घरी यायचे आणि अगदी आवडीने खाल्ले जायचे. मम्मीने आजीला, हे आंबे पाकिस्तानी असल्याचं कधीच सांगितलं नाही, नाहीतर आजीनं त्या आंब्यांना हातसुद्धा लावला नसता. आजी अगदी मिटक्या मारत हे आंबे खायची, आणि वर म्हणायची – “आपल्या देशात असताना कधी असे आंबे खायला मिळाले नाहीत. हे लबाड लोक सगळ्या चांगल्या गोष्टी निर्यात करत असतात!

मम्मी हसायची. तिला माहित होतं, की आजीच्या मनात पाकिस्तानबद्दल जो तिरस्कार होता, तो काकाच्या मृत्यू नंतर अधिकच दृढ झालेला होता. सीमेवर ज्या क्रूरपणे त्याला मारलं गेलं होतं, त्यासाठी ती आजही प्रत्येक पाकिस्तानी माणसाला जबाबदार मानायची. त्यांच्या झाबुआ गावातून जी पहिली व्यक्ती सैन्यात भरती झाली, ती म्हणजे तिचा लाडका धाकटा मुलगा होता. तो दिवस तिच्या आयुष्यातला सर्वात चांगला दिवस होता. अगदी अभिमानाने ती सगळ्या नातेवाईकांना त्याचे तिकडचे किस्से सांगत असायची. मग ती आपल्या लाडक्या लेकाच्या लग्नासाठी मुलगी शोधायला लागली तोच त्याचं पोस्टिंग सीमेवर झाल्याची खबर आली, आणि पाठोपाठ एक दिवस हाहाकार माजवणारी ती वाईट बातमी आली! शत्रूचा सामना करताना तिचा लाडका मुलगा हुतात्मा झाला! त्याचं प्रेत सुद्धा मिळालं नाही. त्या आईचं काळीज दगडाचं होऊन गेलं. अनेक दिवसांच्या मौनानंतर, कधीही पाकिस्तानचं नाव ऐकलं की शिव्याशाप सुरु होत असत, नालायक, खुनी लोक

ज्या दिवशी तहरीम पाकिस्तानी आहे हे सगळ्यांना कळलं होतं, त्याच दिवसापासून  दोन्ही मुलींच्या मैत्रीला ग्रहण लागलं होतं. सध्या तर दोन्ही देशांमध्येही तणाव सतत वाढतच चालला होता. तिरस्कार, द्वेष फैलावत चालला होता. दररोज नवीन काहीतरी समस्या निर्माण होत होती. भारताने सर्जिकल स्ट्राईक केली. पाकिस्तानने संतापून आपल्या देशाच्या आकाशातून भारताच्या विमानांना जायला बंदी घातली. त्यामुळे तिकिटाची किंमत दुप्पट झाली होती. आजीचे शिव्याशाप सुरु झाले – “या कर्मदरिद्री लोकांनी आकाशाचा रस्ता बंद करून प्रवाशांची लूट चालवली आहे. काय मिळतंय ह्यांना त्यातून? जमिनीवर कब्जा करतात ते करतात, आता आकाशावर पण कब्जा करायला लागलेत!”

तिकिटांच्या किंमती वाढल्यामुळे त्यांची भारतात जाण्याची इच्छा मनातच राहिली. भारतीय लोक तर धावून – धावून आपल्या देशात जात होते, पण पाकिस्तानी लोकांच्या मनात भीति होती, की एकदा तिकडे गेलो, तर अमेरिकन सरकार परत इकडे घुसू देणारं नाही! हां, तहरीमचे मामा सरकारी दौरा काढून यायचे, आणि येताना आपल्याबरोबर भरपूर कपडे पण आणत असत. तहरीम मोठ्या आवडीने ते कपडे घालत असे आणि कित्येक वेळा तृपित साठी पण घेऊन यायची, की तिने पण घालून बघावे. शरारा ड्रेस तर तिचा जीव की प्राण होता. या सगळ्या निर्बंधांचा तहरीम आणि तिच्या कुटुंबावर फारसा परिणाम झाला नाही. हं, झालाच तर एवढाच, की तिच्या मामांचं येणं जाणं जवळ जवळ बंदच झालं होतं. ते जेंव्हा यायचे तेंव्हा सगळ्यांसाठी ढीगभर भेटी घेऊन यायचे, ते कमीच होत गेलं.

ज्या वयात या दोघींचं इथे अमेरिकेत पालन-पोषण होत होतं, ते वय असं होतं, की त्यांना आपापल्या देशांबद्दल फारसं प्रेम राहिलं नव्हतं. नवीन देशात, नवं वातावरण आपलंसं करणं सुरु केल्यानंतर मागे वळून बघण्याचा प्रश्नच नव्हता. पण, इथल्या आपल्या घराबद्दल बोलणं होत असे. अम्मी लक्षात ठेऊन ईदच्या दिवशी शेवयांची खीर नक्कीच पाठवायची. मम्मी पण दिवाळीच्या वेळी मिठाई पाठवत असे. अशा तऱ्हेने दोघी आया आपापल्या मुलींच्या आनंदाचा विचार करत असत.

आजीला जर कळलं, की हे तहरीमच्या अम्मीनं पाठवलेलं आहे, तर ती सरळ ते उचलून कचऱ्याच्या डब्यात फेकत असे. मुलाच्या मृत्युचं ते दुःख कधी कधी तहरीमला बघून असं उसळून यायचं, की आवरताच येत नसे. त्या मुलीचा चेहरा बघितला, की आपल्या हुतात्मा झालेल्या मुलाचीच आठवण यायची तिला. आपल्या तिप्पीला हे लोक काहीतरी करतील अशी भीति तिच्या मनात होती.

आजीच्या या द्वेषाचा या दोन्ही मुलींना काही पत्ताच नव्हता. त्या दोघींच्या ज्या गप्पा चालत, त्याला काही अंतच नसायचा! तिथे देश आणि देशांच्या सीमा नसायच्या, फक्त त्या दोघींमध्ये असलेलं प्रेमाचं नातं असायचं. एकूण काय, तर त्या दोघी दोन्ही देशांच्या मिश्र संस्कृतीच्या वाहक होत्या. अम्मीचा अ, म मधे बदलून मम्मी म्हणायला तहरीमला आवडत असे, तर तृपितला अम्मी म्हणायला आवडायचं. जेंव्हा अम्मी  सलामवालेकुम म्हणत आपला हात तिच्या डोक्यावर फिरवत असे, तेंव्हा तिच्या केसांमधून हिच्या मम्मीच्या केसांसारखाच सुगंध येत असे. तेच केस हातात पकडून ही दूध पिऊन गाढ झोपी जात असे.

इथे या मुली आपल्या आयांच्या सुगंधात हरवून जात आणि तिकडे दोन्ही देशांच्या सीमांवर दारुगोळ्याचा धूर आपला वास पसरवत दाट होत जात होता. खूप काही घडत होतं. सर्जिकल स्ट्राईक नंतर जोरदार गोळीबार आणि नेत्यांच्या बोलण्याच्या उष्णतेत मानवता भाजून निघत होती. यू. एन.मधे कोलाहल, टी. व्ही. वर एकमेकांवर केलेले वार, आरोप-प्रत्यारोप हे सगळं कमी होतं, म्हणून की काय, पाकिस्तानने कॅ. अभिनंदन ना पकडलं. आता मात्र अगदी हद्द झाली! दोन्ही मुलींच्या घरच्यांनी कडक पावले उचलली. तृपित आणि तहरीमचं एकमेकींशी बोलणं बंद करून टाकलं. कडक आज्ञा दिली गेली, की आपापल्या कामाशी काम  ठेवा, सरळ घरून शाळा आणि शाळा ते घर! एकमेकींशी बोलताना दिसलात, तर तुमचं काही खरं नाही!

क्रमश: भाग २

मूळ हिंदी कथा – अम्मी और मम्मी – मूळ लेखिका – डॉ  हंसा दीप, कॅनडा

मराठी भावानुवाद  –  सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मला भावलेलं इंग्लंड” ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? मनमंजुषेतून ?

☆ “मला भावलेलं इंग्लंड” ☆ श्री मोहन निमोणकर ☆

मागच्या वर्षी मी आणि बायको संजीवनीची इंग्लंडला जायची तिसरी वेळ होती. मुलगा आशिष फिजिओथेरपीमध्ये एम.एस. करून तिथं नोकरी करतोय, तर सून निवेदिताही तिथंच वैद्यकीय क्षेत्रात नोकरी करते. दोघांनी तिथं नवीन संसार सुरु केल्यानं त्यांचं कौतुक करायला आणि चिरंजीव अभिनवला भेटायला आम्ही इंग्लंड गाठलं.

इंग्लंडमध्ये भौगोलिकदृष्ट्या पाहण्यासाठी ब-याच गोष्टी आहेत. पण यंदा आम्हाला तिथल्या सामाजिक आणि सार्वजनिक गोष्टी खूपच भावल्या. किंबहुना याच तिथलं वेगळेपण सिध्द करायला पुरेशा ठरल्या. एखाद्या देशाची ठरलेली जीवनशैली आणि स्वभाव असतो, यामध्ये इंग्लंड खरंच चारचौघांपेक्षा भिन्न ठरतो.

इंग्लंडमध्ये ढोबळमानानं चार ऋतू आहेत. समर, ऑटम, विंटर आणि स्प्रिंग. समरमध्ये पहाटे पाच वाजताच उजाडतं आणि रात्री १० वाजता अंधार पडतो. ऑटम, विंटर आणि स्प्रिंगमध्ये उशीरा उजाडतं आणि अंधारही लवकर म्हणजे दुपारी चार वाजताच पडतो. विंटरमध्ये तापमान सर्वात जास्त म्हणजे पाच ते सहा अंश तसंच कमी म्हणजे उणे असतं. इंग्लंड उत्तरध्रुवाजवळ असल्यानं तिथं खूप थंडी असते. समरमध्ये मात्र तापमान १८ अंश झालं, तरी लोकांना उष्णतेची लाट आल्यासारखं वाटतं. आम्हाला इथं एक गोष्ट नवीन वाटली. ती म्हणजे, दिवस लवकर वा उशीरा उजाडण्याचा, मावळण्याचा दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये म्हणून वर्षातून दोनदा घड्याळ ऍडजस्ट केलं जातं. मार्च महिन्याच्या शेवटच्या रविवारी घड्याळ एक तास मागं करतात. सार्वजनिक बागांमध्येही बागा उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या वेळा उजेडानुसार बदलतात. तशा प्रत्येक महिन्याच्या वेळांचा बोर्ड आगाऊच लावलेला असतो. वर्षभरात पाऊस कधीही येतो; परंतु वेगळा असा पावसाळा हा ऋतू इथं नाही.

इंग्लंडची वाहतूक व्यवस्था जगातील उत्तम व्यवस्था म्हणावी लागेल. महाग आहे; पण अतिशय उत्तम. रेल्वेचं नेटवर्क हे खाजगी कंपन्यांकडे सोपवलंय. त्या कंपन्या म्हणजे सदर्न रेल, साउथ इस्टर्न रेल्वे, नॉर्दन रेल, ग्रेट वेस्टर्न रेल्वे आणि व्हर्जिन रेल्वे. या पाच खाजगी कंपन्या सर्व युकेचा रेल्वेचा प्रवास सांभाळतात. रेल्वे डब्यांची स्थिती अतिशय उत्तम. दारं आपोआप उघड-बंद होतात. त्यामुळे पळत येऊन गाडीला लटकत गाडी पकडणं हा प्रकार नवीन नाही. याव्यतिरिक्त लंडन ट्यूब रेल्वेही म्हणजे ‘ट्रान्सपोर्ट फॉर लंडन’ इतर कंपन्यांचा भार हलका करते. ‘ट्रान्सपोर्ट फॉर लंडन’ ही खाजगी कंपनी इंग्लंडमधील बसवाहतूक सांभाळते. बसमध्ये लहान मुलांच्या बाबा गाड्यांनाही प्रवेश प्राधान्यानं असतो. चढण्या-उतरण्याचे मार्ग वेगवेगळे असतात, शिवाय उतरण्याचा आपला स्टॉप येण्यापूर्वी आपल्या सीटजवळील बटण दाबलं, की ड्रायव्हरला मेसेज जातो आणि तो बस स्टॉपवर थांबवतो. ड्रायव्हरच तिकिटं पाहतो आणि काढतोही.

रेल्वे आणि बसच्या तिकिटांचे दर हे वेळेनुसार (गर्दीच्या) कमी-जास्त असतात. तसंच, शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी कमी असतात. एखादी ट्रेन रद्द झाली आणि रात्रीनंतर ट्रेन नसेल, तर पर्यायी व्यवस्था स्टेशनबाहेर केलेली असते. नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत वा-यावर सोडलं जात नाही. शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये पादचा-यांना फार महत्त्व दिलं आहे. रस्ता क्रॉस करण्यासाठी ‘सेल्फ ऑपरेटेड सिग्नल्स’ आहेत. या गोष्टी आम्हाला खूपच भावल्या. एखाद्याला कार रिव्हर्स घ्यायची असेल आणि तो रस्ता कितीही वाहता असेल, तरी त्याचं रिव्हर्स घेणं पूर्ण होईपर्यंत सर्व गाड्या थांबतात आणि कुणीही हॉर्न वाजवत नाहीत, हे विशेष. रस्ते आपल्याएवढेच, तरीही लहान-मोठी वाहनं बिनबोभाट जा-ये करत होती. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी कठीण अशा परीक्षेला सामोरं जावं लागतं. पहिल्या फटक्यात लायसन्स मिळणारा अगदी विरळाच.

आपल्या घराबाहेर रस्त्यावर गाडी पार्क करायलाही वर्षाला ४० पौंड द्यावे लागतात. ठिकठिकाणी पार्किंगच्या सोयी केल्या आहेत. गर्दीच्या वेळी पैसे आणि एरवी फुकट! वीज आणि गॅस वापरण्यासाठी बिलिंगची पध्दत नाही, तर एक प्रीपेड कार्ड असतं आणि त्यात जेवढा टॉप अप तुम्ही केला असेल तेवढीच वीज आणि गॅस तुम्हाला वापरता येतो. केंटमधल्या ग्रेव्हज् एंड इथं आमचं वास्तव्य होतं. लंडनपासून रेल्वेनं एक ते दीड तासाच्या अंतरावर दक्षिणेला हे ठिकाण आहे. त्या शहरात कचरा संकलनाची अतिशय उत्तम सोय आहे. प्रत्येक भागासाठी आठवड्यातून एक ठराविक वार कचरा संकलनासाठी ठरवलेला असतो. दोन मोठ्या पेट्या त्यासाठी कौन्सिलतर्फे पुरवल्या जातात. एकात रिसायकल होणारा आणि दुस-यात रिसायकल न होणारा असं एकआड एक दर आठवड्यानं असं कचरा संकलन केलं जातं. रिसायकल होणा-या गोष्टींची आणि न होणा-या गोष्टींची यादी कौन्सिलतर्फे वेळोवेळी प्रसिध्द केली जाते.

इथं दैनंदिन जीवनातल्या ब-याच गोष्टी स्वत:च्या स्वत:ला कराव्या लागतात. नोकर-चाकर, मोलकरीण कुणी ठेवत नाहीत. कुणी ठेवलीच, तर त्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. त्यामुळे भांडी घासणं, घराला रंग देणं, सायकलचं पंक्चर काढणं, सायकल आणि कारमध्ये हवा भरणं इत्यादी गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. एवढंच काय, तर पेट्रोल पंपावर पेट्रोलही आपल्यालाच भरायला लागतं. नंतर बिल दुकानात नेऊन द्यायचं. आशिषनं कार खरेदी केल्यावर दुस-याच दिवशी तो आणि निवेदिता पंपावर जाऊन पेट्रोल कसं भरायचं हे शिकून आले होते. घरात पाहुणे आल्यावर, आपल्याला जेवणानंतर भांडी घासताना पाहून तेही पहिल्या दिवसानंतर आपल्याला आपोआप मदत करू  लागतात.

इंग्लंडमधील अशा ब-याच गोष्टी आपल्याला भावतात. त्यांचं अप्रुप आपल्याला वाटतं. तरीही अखेर आपलं आपल्या मातीशी असलेलं घट्ट नातंच वरचढ ठरतं. तीन महिन्यातच आपल्याला मायदेशातील घराची आठवण येते आणि सहा महिने काढायचे असले, तरी काऊंटडाऊन तेव्हाच सुरु होतं, परतण्यासाठी ..…

         

 ©️ श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ SSLV-D2 प्रक्षेपणाचा आँखो देखा हाल – भाग-3 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ SSLV-D2 प्रक्षेपणाचा आँखो देखा हाल – भाग-3 ☆ श्री राजीव गजानन पुजारी

(मी रांगेत जाऊन मसाला डोसा घेतला व एका टेबलावर येऊन खायला सुरुवात केली.) इथून पुढे —-

माझ्या शेजारीच शार मध्ये काम करणारे एक गृहस्थ, त्यांची पत्नी व त्यांची छोटी मुलगी येऊन बसले. आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली. त्यांचे नाव संग्राम असून ते मूळ ओरिसाचे आहेत. त्यांना उत्तम हिंदी येते. ते SHAR मध्ये VAB(vehicle assembly building) मध्ये कामाला आहे व इस्त्रो क्वार्टर्स मध्ये राहतात. मी महाराष्ट्रातील सांगलीहून निव्वळ लाँच बघायला आलोय याचे त्यांना फार कौतुक वाटले. मी एकटाच आलोय म्हटल्यावर त्यांच्या पत्नीने ‘परत आला तर पत्नीला घेऊन या व आमच्याच घरी उतरा’ असे सांगितले. ओळख पाळख नसतांना एवढे अगत्यपूर्ण आमंत्रण ओरिसातील माणसेच करू जाणोत. ओरिसाच्या आदरतिथ्याचा अनुभव मी कासबहाल येथे ट्रेनिंगला गेलो असताना अनुभवला होता. त्यावेळी ट्रेनिंग दरम्यान दिवाळी आली होती व आमच्या एका प्रोफेसरनी आम्हा सर्वांना त्यांच्या घरी अगत्याने फराळाला बोलावले होते. असो. मसाला डोसा खात असताना स्वयंपाक घरातील एक डिलिव्हरी देणारा माणूस मला हुडकत आला व माझ्यासमोर आणखीन एक मसाला डोसा ठेवून गेला. तो काय बोलला ते मला कळलं नाही. पण संग्राम म्हणाले, ” तुम्ही दोन रोटींची ऑर्डर दिली होती. ती कॅन्सल केल्यावर आणखी दहा रुपयांचे कुपन तुम्हाला दिले. एक मसाला डोसा पन्नास रुपयांना मिळतो. तुम्ही एकच डोसा घेऊन आलात म्हणून हा माणूस दुसरा डोसा घेऊन आला आहे. मला हसावे कि रडावे ते कळेना. नाईलाजास्तव दुसरा डोसा पण खावा लागला. मसाला डोशाची भाजी आपल्याकडे असते तशी सुक्की नसते तर आपण कांदा बटाटा रस्सा करतो तशी पण जरा घट्ट अशी असते. संग्राम यांच्याशी बोलल्यावर कळलं की तुम्हाला फक्त रोटी किंवा चपातीचे कुपन मिळते, त्याचे बरोबर भाजी व आमटी मिळतेच. कुपनावर त्याचा उल्लेख नसतो. शेजारच्या टेबलावर एक मुलगा भाजीबरोबर चपाती खात होता. बघतो तर आपण घरी करतो तशीच चपाती होती. असो. त्या दिवशी दोन मसाला डोसा खाण्याचा योग होता हेच खरे. जेवून उठताना श्री संग्राम यांनी आवर्जून माझा फोन नंबर घेतला व त्यांचा मला दिला. ती छोकरी पण ‘बाय अंकल’ म्हणाली. जेवण करून रूमवर आलो थोडा वेळ टी.व्ही. बघून झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी माझी ट्रेन होती (पिनाकिनी एक्स्प्रेस) मी साडेनऊ वाजता लॉज सोडले व रिक्षाने स्टेशनला आलो. वेळ होता म्हणून फिरत फिरत तेथून जवळच असलेल्या एस्. टी. स्टॅन्डला गेलो व शारला जायला इथून एस्. टी. ची सोय असते का याची चौकशी केली; तर तशी कांही सोय नसते व आपणास रिक्षाने जावे लागते असे कळले. परत स्टेशनवर आलो. गाडी पाऊणतास लेट होती. ती बाराला आली. गाडीत एक आय.टी. इंजिनियर व त्यांचा आठ वर्षाचा मुलगा असे माझ्यासमोरील सीटवर बसले होते. माणूस आय.टी. इंजिनियर असूनही विजयवाडा येथे कॉलेजमध्ये शिकविण्याचे काम करत होता. ती त्यांची आवड होती. ते दोघे शेगांव येथे एका लग्नासाठी चालले होते. घरी लहान बाळ असल्याने पत्नी घरीच थांबली होती. मी त्यांना गजानन महाराजांच्या समाधी विषयी माहित आहे का असे विचारले. त्यांना त्या भागाची काहीच माहिती नव्हती. मग मी त्यांना गजानन महाराजांविषयी माहिती सांगितली व समाधी मंदिराचे नक्की दर्शन घ्या असे सांगितले. शेगांव कचोरी पण आवर्जून टेस्ट करा असेही सांगितले.   झालेला बराचसा उशीर गाडीने भरून काढला व एकच्या ऐवजी सव्वाला गाडी चेन्नई सेंट्रलला पोहोचली. माझे पुढची ट्रेन शताब्दी एक्सप्रेस संध्याकाळी साडेपाचला होती चेन्नई सेंट्रलला एक सोय चांगली आहे ती म्हणजे सर्व प्लॅटफॉर्म्स समपातळीत आहेत, त्यामुळे जिने चढउतार करावे लागत नाहीत. मी वेटिंग हॉलमध्ये ‘इंडिया टुडे’ चाळत असतांना एक युवक माझ्या शेजारी येऊन बसला व मला विचारले ‘तुम्ही केरळचे का?’  मी म्हटलं, ‘नाही, पण आपण असे का विचारत आहात?’ तो म्हणाला, ‘तुम्ही केरळी दिसता म्हणून विचारलं.’ चला, मला माझ्याविषयी एक नवीनच माहिती मिळाली. नंतर मी त्याला त्याची माहिती विचारली. तो केरळचा असून त्याने गेल्याच वर्षी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते व तो नोकरीच्या शोधात होता. अनेक ठिकाणी प्रयत्न करून सुद्धा त्याला नोकरी मिळत नव्हती. मी त्याला त्याची आवड विचारली. तो म्हणाला, ‘ मला फॅब्रिकेशन विषयी आवड आहे.’ मी त्याला सुचवलं, ‘मग तू एखादे फॅब्रिकेशन शॉप का सुरू करत नाहीस? तसंही कोरोनानंतर बांधकाम व्यवसायात तेजी आली आहे, आणि बांधकाम म्हटलं कि, ग्रील, खिडक्या वगैरे आलंच.’ तो म्हणाला,’भांडवलाचं काय?’ मी म्हटलं, ‘हल्ली बँकांच्या कर्जपुरवठ्याच्या चांगल्या योजना आल्या आहेत. तू पण चौकशी कर.’ त्याचा चेहरा उजळलेला दिसला. मला पण बरं वाटलं. नंतर मी लंचसाठी प्लॅटफॉर्मच्या बाजूला

‘ए टू बी म्हणून लंच हाउस होते तेथे गेलो. तेथे रांग होती. रांगेत उभेराहून चपाती,भाजी व शिरा यांचे कुपन घेतले. ऑर्डर सर्व्ह करणाऱ्याने एका डिस्पोजिबल प्लेटमध्ये सर्व वाढून दिले. बाजूला कट्ट्यावर ताट ठेवून उभेराहून खायचं. खरंतर मला हे असे उभेराहून वचा वचा खाणे आवडत नाही. खाणे कसे व्यवस्थित बसून असावे. पण साउथ मध्ये जास्त करून अशा पद्धतीने खायची पद्धत आहे. ‘व्हेन इन रोम वन मस्ट डू ॲज द रोमन्स डू’ असे म्हणून मी समाधान मानले व सव्वा पाचला ट्रेनमध्ये जाऊन बसलो. ट्रेनमध्ये  बरेच विद्यार्थी व विद्यार्थिनी होत्या. ते सर्व बेंगलोरला उतरून पुढे पुण्याला जाणार होते. ती सर्व मुले VIT कॉलेज वेल्लूरची होती. त्यांच्या टीवल्या बावल्या चालल्या होत्या, ते अनुभवण्यात वेळ छान गेला. साडेदहाला बेंगलोर आले. ईशा व योगेश स्टेशनवर आले होते. गाडीत भरपेट नाश्ता झाल्याने दूध पिऊन झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला ईशाने उप्पीट केले होते. जेवायला पोळी भाजी व जिरा राईस होते. बऱ्याच दिवसांनी पोळी भाजी खाल्ल्याने बरे वाटले. रात्री आठच्या कोंडुस्कर स्लीपरचे रिझर्वेशन होते. ईशा व योगेश सोडायला आले होते. सकाळी साडेआठला सांगलीला पोहोचलो. एका स्वप्नाची इथे कर्तव्यता झाली.

नोंद :- 

१)श्रीहरीकोट्याला जाण्यासाठी मी मला सोयीचे म्हणून बेंगलोरला जाऊन चेन्नईला गेलो होतो.  काहीजणांना थेट चेन्नईला जाणे सोयीचे असेल तर तसं करायला हरकत नाही.

२) सुलुरूपेटा लॉजचा पत्ता – श्री लक्ष्मी पॅलेस, c/o लक्ष्मी थिएटर, शार रोड, सुलुरूपेटा -५२४१२१। जिल्हा -तिरुपती (आंध्र प्रदेश) प्रोप्रायटर – श्री दोराबाबू , फोन – 9985038339.

— समाप्त — 

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पंगत आणि पार्टी… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ पंगत आणि पार्टी… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

पंगत म्हणजे डिसीप्लीन- शिस्त.

पार्टी म्हणजे धांगडधिंगा… 

 

पंगत म्हणजे सहभोजन.

पार्टी म्हणजे स्वभोजन… 

 

पंगत म्हणजे बैठक ठोकून जेवावे.

पार्टी म्हणजे उभ्याउभ्यानेच हादडावे… 

 

पंगत म्हणजे शारिरीक मानसिक आणि आध्यात्मिक साजशृंगार

पार्टी म्हणजे सामाजिक दिखाऊपणाचा अधिभार… 

 

पंगत म्हणजे हवं तेवढं जेवा.

पार्टी म्हणजे हवंतर जेवा… 

 

पंगत म्हणजे उदबत्यांचा घमघमाट.

पार्टी म्हणजे बाटल्यांचा खणखणाट…

 

पंगत म्हणजे श्लोक म्हणायची घाई

पार्टी म्हणजे मोठ्या आवाजाची महागाई … 

 

पंगत म्हणजे एका रेषेत ताटे वाढलेली

पार्टी म्हणजे रांग लावून अन्न घेतलेली … 

 

पंगत म्हणजे ताटाला काढलेली रांगोळी

पार्टी म्हणजे रिकाम्या वाट्यांची रोषणाई … 

 

पंगत म्हणजे मिळते पावती तृप्तीची 

पार्टी म्हणजे गोष्ट कोल्हा करकोच्याची

कोल्ह्याला बाटलीतून दिलेल्या खिरीची…

 

पंगत म्हणजे हर हर महादेवा !

पार्टी म्हणजे डान्सचा जलवा… 

 

पंगत म्हणजे जय जय रघुवीर समर्थ !

पार्टी म्हणजे डीजे ,नाय तर सगळं व्यर्थ… 

 

पंगत म्हणजे निकोप स्पर्धा खाण्याची,

पार्टी म्हणजे भीती उपाशी राहण्याची… 

 

पंगत म्हणजे सत्व रजाची आरास..

पार्टी म्हणजे रज तमाची नुसती रास…

 

संग्रहिका – सौ अंजली दिलीप गोखले 

मो 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ काटा रूते कुणाला… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ काटा रूते कुणाला… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

.. अग थांब चारूलते! तो मनोहारी भ्रमर ते कुमुदाचे कुसुम खुडताना उडून गेला पण माझं लक्ष विचलित करून गेला. त्याकडे पाहता पाहता नकळत माझं पाऊल बाभळीच्या कंटकावर की गं पडले… आणि तो कंटक पायी रूतला.. एक हस्त तुझ्या स्कंधावरी ठेवून पायीचा रूतलेला कंटक चिमटीने काढू पाहतेय.. पण तो कसला निघतोय! अगदी खोलवर रुतून बसलाय.. वेदनेने मी हैराण झाले आहे बघ… चित्त थाऱ्यावर राहिना… आणि मला पुढे पाऊल टाकणे होईना.. गडे वासंतिका, तू तर मला मदत करतेस का?..फुलं पत्री खुडून जाहली आणि आश्रमी परतण्याच्या मार्गिकेवर हा शुल टोचल्याने विलंब होणारसे दिसतेय… तात पूजाविधी करण्यासाठी खोळंबले असतील..

.. गडे चारुलते! अगं तरंगिनीच्या पायी शुल रुतूनी बसला.. तो जोवरी बाहेर निघून जात नाही तोवरी तिच्या जिवास चैन पडणार कशी?.. अगं तो भ्रमर असा रोजचं तिचं लक्ष भुलवत असतो.. आणि आज बरोबर त्यानं डावं साधला बघ… हा साधा सुधा भ्रमर नव्हे बरं. हा आहे मदन भ्रमर . तो तरंगिनीच्या रूपावरी लुब्ध झालाय आणि आपल्या तरंगिनीच्या हृदयात तोच रुतलाय समजलीस… हा पायी रूतलेला शुल पायीचा नाही तर हृदयातील आहे… यास तू अथवा मी कसा बाहेर काढणार? त्याकरिता तो ऋषी कुमार, भ्रमरच यायला हवा तेव्हा कुठे शुल आणि त्याची वेदना शमेल बरं… आता वेळीच तरंगिनीच्या तातानां हि गोष्ट कानी घालायला हवी…आश्रम प्रथेनुसार त्या ऋषी कुमारास गृहस्थाश्रम स्वीकारायला सांगणे आले नाही तर तरंगिनीचे हरण झालेच म्हणून समजा. 

गडे तंरगिनी! हा तुला रूतलेला मदन शुल आहे बरं तू कितीही आढेवेढे घेतलेस तरी आम्हा संख्यांच्या लक्षात आलयं बरं.. तो तुझ्या हृदय मंदिरी रुतून बसलेला तो ऋषी कुमार रुपी भ्रमराने तुला मोहविले आहे आणि तुझे चित्त हरण केलयं… हि हृदय वेदना आता थोडे दिवस सहन करण्याशिवाय गत्यंतर नाही.. पाणिग्रहण नंतरच हा दाह शांत होईल.. तो पर्यंत ज्याचा त्यालाच हा दाह सहन करावा लागतो.. 

.. चला तुम्हाला चेष्टा सुचतेय नि मला जीव रडकुंडीला आलाय… अश्या चेष्टेने मी तुमच्याशी अबोला धरेन बरं.. 

हो हो तर आताच बरं आमच्याशी अबोला धरशील नाहीतर काय.. त्या भ्रमराची देखील चेष्टा आम्ही करु म्हणून तूला भीती वाटली असणारं… आता काय आम्ही सख्खा परक्या आणि तो परका ऋषी कुमार सखा झालायं ना.. मग आमच्याशी बोलणचं बंद होणार… 

.. चला पुरे करा कि गं ती थट्टा..आश्रमाकडे निघायचं पाहताय की बसताय इथंच . .. 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संवाद # 112 ☆ लघुकथा – अब अहिल्या को राम नहीं मिलते ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

डॉ. ऋचा शर्मा

(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में  अवश्य मिली है  किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में  प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है  स्त्री विमर्श आधारित एक विचारणीय लघुकथा ‘अब अहिल्या को राम नहीं मिलते’। डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद  # 112 ☆

☆ लघुकथा – अब अहिल्या को राम नहीं मिलते ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

पुलिस की रेड पड़ी  थी। इस बार वह पकड़ी  गई। थाने में महिला पुलिस फटकार लगा रही थी – ‘ शर्म नहीं आती तुम्हें शरीर बेचते हुए? औरत के नाम पर कलंक हो तुम। ‘ सिर नीचा किए सब सुन रही थी वह। सुन – सुनकर पत्थर- सी हो गई है। पहली बार नहीं पड़ी थी यह लताड़, ना जाने कितनी बार लोगों ने उसे उसकी औकात बताई है। वह जानती है कि दिन में उसकी औकात बतानेवाले रात में उसके दरवाजे पर खड़े होते हैं पर —।

महिला पुलिस की बातों का उसके पास कोई जवाब नहीं था। उसे अपनी बात कहने का हक  है ही कहाँ? यह अधिकार तो  समाज के तथाकथित सभ्य समाज को ही है। उसे तो गालियां ही सुनने को मिलती हैं। वह एक कोने में सिर नीचे किए चुपचाप बैठी रही। बचपन में  माँ  गौतम ऋषि की पत्नी अहिल्या की कहानी सुनाती थी। एक दिन जब ऋषि  कहीं बाहर गए हुए थे तब इंद्र गौतम ऋषि का रूप धरकर उनकी कुटिया में पहुँच गए। अहिल्या  इंद्र को अपना पति ही समझती रही। गौतम ऋषि के वापस आने पर  सच्चाई पता चली। उन्होंने गुस्से में अहिल्या को शिला हो जाने का शाप दे दिया। पर अहिल्या का क्या दोष था इसमें? वह आज फिर सोच रही थी, दंड तो इंद्र को मिलना चाहिए? 

उसने जिस पति को जीवन साथी माना था, उसी ने इस दलदल में ढ़केल दिया। जितना बाहर निकलने की कोशिश करती, उतना धँसती जाती। अब जीवन भर इस शाप को ढ़ोने को मजबूर है। सुना है अहिल्या को राम के चरणों के स्पर्श से मुक्ति मिल गई थी। हमें मुक्ति क्यों नहीं मिलती? उसने सिर उठाकर चारों तरफ देखा। इंद्र तो बहुत मिल जाते हैं जीती-जागती स्त्री को बुत बनाने को, पर कहीं कोई राम क्यों नहीं मिलता? 

©डॉ. ऋचा शर्मा

प्रोफेसर एवं अध्यक्ष – हिंदी विभाग, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर. – 414001

संपर्क – 122/1 अ, सुखकर्ता कॉलोनी, (रेलवे ब्रिज के पास) कायनेटिक चौक, अहमदनगर (महा.) – 414005

e-mail – [email protected]  मोबाईल – 09370288414.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ लघुकथा – पगडंडी ☆ श्री हरभगवान चावला ☆

श्री हरभगवान चावला

(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री हरभगवान चावला जी की अब तक पांच कविता संग्रह प्रकाशित। कई स्तरीय पत्र पत्रिकाओं  में रचनाएँ प्रकाशित। कथादेश द्वारा  लघुकथा एवं कहानी के लिए पुरस्कृत । हरियाणा साहित्य अकादमी द्वारा श्रेष्ठ कृति सम्मान। प्राचार्य पद से सेवानिवृत्ति के पश्चात स्वतंत्र लेखन।) 

आज प्रस्तुत है आपकी – लघुकथा – पगडंडी)

☆ कथा कहानी ☆  लघुकथा – पगडंडी ☆ श्री हरभगवान चावला ☆

एक लम्बी सड़क में से थोड़ी-थोड़ी दूरी में कई पगडंडियांँ निकलती थीं। एक दिन एक पगडंडी ने सड़क से कहा – तुम्हारे तो मज़े होंगे बहन! कहीं खेत, कहीं पहाड़, कहीं नदी, कहीं झील, कहीं बाग़। तुम तो रोज़ नए नजारे देखती हो। और फिर तुम्हारी देह पर कितनी सुन्दर-सुन्दर गाड़ियांँ दौड़ती हैं- काली, सफ़ेद, लाल, नीली, पीली और उन गाड़ियों में सुन्दर चेहरे, ख़ुशबू, संगीत हंँसी… मज़ा आ जाता होगा। नहीं? एक मैं हूंँ। कभी-कभी कोई आता है। आता भी कौन है – बैलगाड़ी, ऊंँटगाड़ी, कंधे पर हल लादे किसान – दलिद्दर जिनके चेहरों से टपकता है, सिर पर लकड़ियों या घास के गट्ठर लादे औरतें या दिशा-मैदान जाते ऊंँघते से आदमी… फ़क़त!

सड़क ने एक ठंडी सांँस ली – शुक्र कर कि तू सड़क नहीं है। हर रोज़ दुर्घटनाओं में लोगों को मरते देखती हूंँ, परिजनों की चीख़ों से दिल दहल जाता है। कभी अलग-अलग समुदायों के लोग मेरी छाती पर चढ़कर आपस में मारकाट करने लगते हैं। कभी मेरी देह पर धरना देते मजदूरों या छात्रों पर लाठियां गोलियांँ बरसने लगती हैं। मैं ख़ून से सन जाती हूंँ। अभी पिछला ख़ून सूखता नहीं कि एक और झरना फूट पड़ता है। हर समय अपनी देह को ख़ून से लिथड़े देखना कितना वीभत्स है, तुम क्या जानो। काश मैं पगडंडी होती!

©  हरभगवान चावला

सम्पर्क – 406, सेक्टर-20, हुडा,  सिरसा- 125055 (हरियाणा) फोन : 9354545440

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares
image_print