मराठी साहित्य – विविधा ☆ माझी मराठी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

☆ माझी मराठी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

मराठीचा उगम आणि इतिहास –

पुर्वीच्या काळी मानव जेव्हापासून समुह करून राहू लागला तेंव्हा आपले विचार ,भावना समोरच्या पर्यंत पोहचविण्याकरिता विशिष्ठ हावभाव , कृती, बोली यांचा वापर करू लागला. यातूनच पुढे भाषेचा उगम झाला. अशीच आर्य समाजाची भाषा म्हणजे आपली मुळ मराठी. संस्कृत भाषेच्या प्रभावातून निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्र या बोलीभाषेतून मराठी भाषेचा उदय झाला. प्रदेशानुसार संस्कृत भाषेचा अपभ्रंश होऊन नविन भाषांनी जन्म घेतला त्यातील एक म्हणजे आपली मातृभाषा मराठी आहे. तसे पाहता मराठी भाषेचा इतिहास हजारों वर्षापूर्वीचा मानला जातो. संस्कृत भाषेला मराठी भाषेची जननी मानले जाते. मराठी भाषेतील पहिले वाक्य ‘श्रवणबळ येथील शिलालेखावर ‘ सापडले . तसेच ज्ञानेश्वरांना मराठीतील आद्यकवी मानले जातात. त्यांनी भगवदगीता सर्वसामान्य मराठी माणसाला कळावी यासाठी तिचे मराठीत रूपांतर केले. ती ज्ञानेश्वरी म्हणून हजारों लोक आजही वाचतात.

मराठीचा प्रवास –

आपल्या मराठी भाषेला सुसंस्कृत ,समृद्ध  ,आणि श्रीमंत मानले जाते. कितीतरी कोटी लोक आज मराठी भाषा बोलतात. मराठी ही महाराष्ट्रातील संस्कृतीचा जणू मुकूटच आहे.  देशाच्या उत्तरेकडील प्रदेशात अस्तित्वात आलेली ही बोली आज सातपुडा पर्वत ते कावेरी प्रांत आणि दक्षिणेकडील गोवा इथपर्यंत मराठी भाषा बोलली जाते. आणि तिचा विकास झाला आहे. मराठी भाषेत  कोकणी मराठी  ,ऐराणी मराठी ,घाटी मराठी,  पुणेरी मराठी,  विदर्भ- मराठवाड्यात बोलली जाणारी मराठी असे बरेच पोटप्रकार आहेत. म्हणतात ‘ मराठी ही अशी बोली आहे ती प्रत्येक दहा मैलावर बदलते.’ संत ज्ञानेश्वर यांना मराठीतील पहिले आद्यकवी मानले जाते. त्यानंतर चक्रधर स्वामींनी लिळाग्रंथ हा पहिला पद्य चरित्रग्रंथ लिहला. तेथून पुढे पद्य लिखाणास सुरुवात झाली. त्यानंतर संत एकनाथ, संत तुकाराम याच्यापासून ते आतापर्यंतच्या अनेक लेखक आणि कवींनी त्यांचे कितीतरी लिखाण मराठी साहित्याला बहाल केले आहे.संत ज्ञानदेव, संत तुकाराम ,संत एकनाथ त्यानंतर ग.दि.मा.,कुसुमाग्रज  ,पु.ल देशपांडे, प्र.के. अत्रे इत्यादि व आताचे सर्व जेष्ठ साहित्यीक यांनी मराठी भाषेलाअलंकारीक करून अधीक समृद्ध केली आहे. मराठी भाषेचा उत्कर्ष आणि विकास होण्यास या सर्वांचे मोलाचे योगदान आहे.  संतानी आपल्या माय मराठीचे बीज रूजविले . तिचा वटवृक्ष करण्याचे काम ग.दि.मा. ,कुसुमाग्रज ,पु.ल देशपांडे ,प्र. के. अत्रे

बालकवी,वि.स.खांडेकर इत्यादि नामांकित साहित्यीक व आताचे जेष्ठ आणि नवोदित साहित्यीक यांनी केले आहे. या सर्वांनी आपल्या साहित्याचा ठसा मराठी मनात रूजविला आहे. अनेक ग्रंथ  ,कथासंग्रह ,नाट्यसंग्रह ,काव्यसंग्रह यातून  ‘माय मराठीचे ‘बीज रूजविले आहे आणि आजही ते कार्य चालूच आहेत. विशेष म्हणजे अनेक लोकगीते,कोळी गीते ,लावण्या हे तर आपल्या मराठी संस्कृतीचे खास आकर्षण ठरले आहे. सर्वच साहित्यातून मराठी संस्कृतीचे दर्शन , जडण-घडण ,आणि वारसा अखंडितपणे पुढे चालत आहे. काळाप्रमाणे पाहिले तर मराठीचा उगम ते आतापर्यंतचा मराठीचा प्रवास खूपच चांगला चालला आहे. मराठी भाषा ही मराठी माणसाचा अभिमान  आणि ओळख आहे.

माय मराठीची सद्यस्थिती आणि भविष्य

अनेक साहित्यीकांच्या अमुल्य योगदानातून मराठी भाषेची मुळे खुपच खोलवर गेली आहेत. पण येणाऱ्या मराठी भाषिकांच्या आणि नवोदित साहित्यीकांच्या मराठी बद्दलची भावना व प्रेम यातूनच तिची खोलवर गेलेली मुळे तग धरून राहतील. तसे पाहिले तर आज नवोदितांचे लिखाण पण मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. छोट्या-मोठ्या खेड्यातून सुध्दा  ‘ मराठी साहित्य संमेलन ‘आयोजित केली जात आहेत. मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा मानली जाते. आज सर्वच शाळांतून सुध्दा मराठी भाषा हा सक्तीचा विषय केला जात आहे आणि तो असावाच. त्यामुळे बालवयापासूनच मुलांच्या मनावर मराठी रूजत आहे . मराठी भाषेला अखंडित आणि माय मराठीची ज्योत सदैव तेवत ठेवण्याचे काम हे मराठी साहित्यिक आणि प्रत्येक मराठी माणसाचे आहे. आणि  ‘महाराष्ट्राला अखंडित ठेवण्याचे बळ हे माय मराठी बोलीतच आहे ‘  मराठी भाषा ही भारतात तिसर्‍या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे.  माय मराठी भाषा महान ,अधिक दर्जेदार व्हावी  हे प्रत्येक मराठी साहित्यीकाचे आद्यकर्तव्य आहे. मराठी वाचकांनी चांगला प्रतिसाद देऊन मराठी भाषा टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे. आपल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक पिढीला मराठी भाषेचे ज्ञान अवगत असावे. आपल्या माय मराठीचा वारसा त्यांनी सहजतेने जपला जावा याकरिता आपण माय मराठीचा जागर सदैव चालू ठेवावा. मराठी भाषेचे मानाचे स्थान सुनिश्चित व चिरकाल टिकून रहावे याकरिता प्रत्येक मराठी माणसाने सदैव प्रयत्नशील रहावे.  ‘आपल्या मराठीच्या वटवृक्षावर बांडगुळ म्हणून वाढणाऱ्या परप्रांतीय भाषांना महत्त्व न देता , मी महाराष्ट्राचा आणि मराठी बोलीचा ‘हेच तत्व अंगीकारावे. आज महाराष्ट्रा बाहेर सुध्दा अनेक मराठी साहित्य संमेलन घडून येतात ही महाराष्ट्रासाठी गौरवास्पद गोष्ट आहे. महाराष्ट्राला अखंडित ठेवण्याकरिता चला मराठी बोलूया  ,चला मराठी गावूया  ,चला मराठी जगूया आणि चला मराठीला जगवूया.

“सह्याद्रीच्या रांगांमधून

नाद घुमावा मराठी बोलीचा

महाराष्ट्राच्या मनामनातून

शब्द रूजावा माय मराठीचा “

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा, जि. सांगली, दुरभाष्य क्रमांक-९९२२७३०८१५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

“माझा मराठी चा बोल कौतुके।

परि अमृताते  ही  पैजा जिंके।

ऐसी अक्षरे रसिके।

मेळवीन ।।”

(ज्ञानेश्वरी-अध्याय सहावा)

नमस्कार मैत्रांनो,

२७ फेब्रुवारी हा मराठी भाषेला गौरवान्वित करणारा सुवर्णदिन! २०१३ पासून हा दिवस ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जात आहे. विष्णू वामन शिरवाडकर उर्फ तात्यासाहेब शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ – १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती, ही एकुलती एक बहीण सर्व भावांना जीव की प्राण सर्वांची लाडकी, म्हणून कुसुमचे अग्रज   अर्थात  ‘कुसुमाग्रज’ असे नाव त्यांनी धारण केले.समाजाभिमुख लेखन करणाऱ्या मराठी लेखकांमधील हे शिखरस्थ नाव! बहुउद्देशीय आणि बहुरंगी लेखनकलेचे उद्गाते असे कुसुमाग्रज जितक्या ताकदीने समीक्षा करीत इतक्याच हळुवारपणे कविता रचित. रसिकांच्या मनात ज्या नाटकाचे संवाद घर (उदाहरण द्यायचे तर ‘कुणी घर देता का घर) करून आहेत, असे ‘नटसम्राट’ नाटक, ज्याच्या लेखनाने कुसुमाग्रज ज्ञानपीठ विजेते (१९८७) ठरले! शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे केल्या गेले आहे. वि.स. खांडेकर (त्यांना ययाती कादंबरीकरता हा १९७४ मध्ये हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला) यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. संतसाहित्यात तर संत ज्ञानेश्वरांनी (१२९०) वरीलप्रमाणे मऱ्हाटी भाषेचे केलेलं हे कौतुक! आपली मराठी भाषासुंदरी म्हणजे ‘सुंदरा मनामधिं भरलि’ अशी रामजोशींच्या स्वप्नातील लावण्यखणीच जणू! अमृताहुनी गोड अशा ईश्वराचे नामःस्मरण करतांना मराठीची अमृतवाणी ऐकायला आणि बोलायला किती गोड, बघा ना: ‘तिन्ही लोक आनंदाने आनंदाने भरुन गाउ दे रे, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे रे!’    

या महाराष्ट्रात निर्माण झालेले साहित्य म्हणजे साक्षात अमृत ठेवाच! ज्या महाराष्ट्रात गर्भश्रीमंत सुविचारांची अन अभिजात संस्कारांची स्वर्णकमळे प्रफुल्लित आहेत, जिथे भक्तिरसाने ओतप्रोत अभंग अन शृंगाररसाने मुसमुसलेली लावण्यखणी लावणी ही बहुमोल रत्ने एकाच इतिहासाच्या पेटिकेत सुखाने नांदतात, तिथेच रसिकतेच्या संपन्नतेचे नित्य नूतन अध्याय लिहिले जातात. या अभिजात साहित्याचे सोने जितके लुटावे तितके वृद्धिंगत होणारे! म्हणूनच प्रश्न पडतो की मराठीला ‘अभिजात भाषा’ म्हणून सरकारदरबारी मान्यता मिळायला आणखी किती समृद्ध व्हावे लागेल? पैठणीसारखे महावस्त्र नेसल्यावर आणखी कुठले वस्त्र ल्यायचे तिने?

मराठी भाषेचे पोवाडे गायला, तिच्या लावण्याच्या लावण्या गायला आणि तिच्यावरील भक्ती दर्शवण्याकरता अभंग म्हणायला मराठीच हवी. तिचे स्तवन, कीर्तन, पूजन, अर्चन इत्यादी करणारे महान साहित्यिकच नाही तर सामान्य माणसे कुठे हरवली? शब्दपुष्पांच्या असंख्य माळा कंठात लेऊन सजलेली आपली अभिजात मायमराठी आज आठशे खिडक्या नऊशे दारं यांतून कुठं बरं बाहेर पडली असावी? ‘मराठी इज अ व्हेरी ब्युटीफुल ल्यांगवेज!’ असे कानावर पडले की संस्कृतीचे माहेरघर अशी मराठी असूनही, तिच्या हृदयाला घरे पडतील अशी मराठी ऐकून! सगळं ‘चालतंय की’ असे म्हणत म्हणत ‘ती मराठी’ शासकीय आदेशांत बंदिस्त झाली. 

‘मी मराठी’ चा गजर करणारे आपण मराठी साहित्य विकत घेऊन मुलांना ते वाचण्याकरिता किती प्रवृत्त करतो? मराठी सिनेमे घरीच बघत का आनंद मानतो? मराठी नाटकसुंदरीची खरी रंगशोभा रंगमंचावर! कुठलीही भाषा शिकण्याचा प्रारंभ पाळण्यातून होतो. (गर्भसंस्कार विचारात घेतले तर गर्भावस्थेतच) बाळ जन्माला आल्यावर त्याच्या कणावर जे पडते ते अति महत्वपूर्ण शिक्षण! हे बाळ भाषेचा पहिला उच्चार ‘आई’ म्हणून करते का ‘मम्मी’ म्हणून? थोडा मोठा झाला की ते ‘nursary rhymes’ शिकते की रामरक्षा अथवा शुभंकरोती?

बरे, मराठी माध्यमात आपल्या मुलांना शिकवण्याची उर्मी कुणात आहे? मराठी माध्यमातील शाळेत मुलाने जावे हे बऱ्याच पालकांना पटणार नाही. मात्र एक भाषा म्हणून मराठीची निवड करणे अत्यावश्यक आहे. सरकारी पातळीवर हे कार्य सुरु आहेच. मराठी भाषेची गोडी निर्माण होईल असे मराठी भाषेतील साहित्य, नाटके, सिनेमे पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांना उपलब्ध करून द्यावेत. मला याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा असा वाटतो की, पालक, आजी, आजोबा आणि शिक्षकांनी यांनी मुलांशी मराठी भाषेतून संवाद साधावा. प्रत्येक मराठी घराघराने किमान एक तास आपल्या भाषेला समर्पित करावा. त्यात अस्खलित मराठी बोलणे, अभिजात मराठी साहित्य वाचणे, सुंदर मराठीत जे असेल ते श्राव्य साहित्य ऐकणे, हे उपक्रम राबवावेत. यात टी व्ही/ ओ टी टी या माध्यमातील मराठी सिरीयल/ सिनेमे इत्यादींचा समावेश नसावा. रोज रोज ती भाषा कानावर पडल्यावर अथवा नजरेखालून गेल्यावर मुलांना आपोआपच ‘मराठी भाषेतून विचार करण्याची’ सवय लागेल. मराठी शुद्धलेखन शिकायचे तर कुठल्याही (शाळेतील पाठ्यक्रम सोडून) अवांतर विषयावर मुलांनी रोज पानभर मजकूर लिहावा किंवा रोजनिशी लिहिण्यास मराठीचा वापर करणे अत्युत्तम!

मात्र यात पालक कुटुंबातील सदस्य, समाजातील व्यक्ती आणि महाराष्ट्र सरकार, या सर्वांच्या सहकार्याशिवाय मराठी भाषेचे संस्कार मुलांवर होणार नाहीत. यासाठी हृदयातून साद यायला हवी ‘माझी माय मराठी!’

या लेखाची सांगता कविवर्य सुरेश भटांच्या प्रेरणादायी मराठी गौरव गीताने करते.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी,

आमुच्या मनामनात दंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी,

आमुच्या उरा उरात स्पंदते मराठी, आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी, आमुच्या लहानग्यात रांगते मराठी

आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी, आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी, येथल्या फुलाफुलात हासते मराठी

येथल्या दिशादिशात दाटते मराठी, येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी, येथल्या वनावनात गुंजते मराठी

येथल्या तरुलतात साजते मराठी, येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी, येथल्या पिकांमधून डोलते मराठी

येथल्या नद्यांमधून वाहते मराठी, येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी

हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

सुरेश भट

प्रिय वाचकांनो, मराठी भाषेच्या अभिजात सौंदर्याला नटवणाऱ्या आणि सजवणाऱ्या काना, मात्रा अन वेलांट्यांची शप्पथ, माझी अमृताहुनी गोड मराठी मला अतिप्रिय आणि तुम्हाला? 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

दिनांक – २७ फेब्रुवारी २०२४

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ आला किनारा… कुसुमाग्रज ☆ रसग्रहण – सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? काव्यानंद ?

☆ आला किनारा… कुसुमाग्रज  ☆ रसग्रहण – सौ.मंजिरी येडूरकर ☆

२७ फेब्रुवारी, कुसुमाग्रज यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने

कुसुमाग्रज म्हणजे शब्दांची, कल्पनांची मुक्त उधळण करणारा अवलिया! मराठी वरचं प्रेम, देशावरचं प्रेम, समाजावरचं प्रेम, निसर्गावरचं प्रेम अशा अनेक अंगांनी वाहणारा कवितांचा अखंड झरा! समाजातील विषमता, जाती – जातीतले भेद, अस्पृश्यतेचा कलंक यावर कवितांतून कोरडे ओढणारा समाजवादी! हा तर सरस्वतीच्या मुकुटातला लखलखणारा हिरा!

अशा या शब्दप्रभू च्या स्मृती जागविण्याचा आजचा दिवस! अर्थात कधी एखाद्या दिवसासाठी सुध्दा विस्मरणात जावा, असा हा माणूसच नाही.किमान पक्षी रोज त्यानं पाठीवर हात ठेऊन “लढ” म्हणावं, असं तरी प्रत्येकाला वाटतंच. मी आज त्यांच्या विस्मरणात चाललेल्या सुंदर कवितेची आठवण करून देणार आहे.विस्मरणात चाललेली असं म्हणायचं एकच कारण, मला ही कविता गुगल गुरू कडे मिळाली नाही, त्यावरचा एकही लेख, आठवण काहीही मिळालं नाही. आठवणीतील गाणी यावर सुध्दा मिळाली नाही. शेवटी ती मला टाईप करावी लागली.

मी कधीच ही कविता विसरू शकणार नाही. आम्ही मैत्रिणी सांगलीतील गायिका स्मिता कारखानीस यांच्याकडे गाण्याच्या क्लासला जात होतो.रिटायरमेंट नंतर सुचलेली कला असल्यामुळे त्या सोपी सोपी गाणी शिकवतील आणि निदान गुणगुणण्या एवढं तरी गाणं यायला लागेल अशी माफक अपेक्षा होती. त्या जरा धाडसी शिक्षिका निघाल्या. त्यांनी आम्हाला ही कुसुमाग्रजांची कविता, आम्ही कुठेही कधीही न ऐकलेली, त्यांनी स्वतः चाल लावलेली, शिकविली.तशी चाल अवघड होती, त्यामुळं गाणं चांगलं म्हणायला जमलं नाही, पण इतकी सुंदर कविता कळली, गुणगुणता आली, त्यामुळे पाठ झाली, याचा प्रचंड आनंद होता. त्यासाठी स्मिताला मनापासून  धन्यवाद!

कुसुमाग्रज हे स्वातंत्र्य संग्रमाचा दाह सोसलेले आणि नंतर स्वातंत्र्याचा आनंद अनुभवलेले होते. त्यांच्या बऱ्याच कविता या विषयावरच्या आहेत. त्यांनी हताश होवून सुवर्ण महोत्सवाच्या वेळी लिहिलेली ‘स्वातंत्र्य देवीची विनवणी ‘ ही कविता आज अमृत महोत्सव साजरा झाला असला तरी वर्तमानाला साजेशीच वाटते. कवितेमधून सत्य परखडपणे मांडण्याचं कसब आणि तो सच्चेपणा त्यांच्यात होता.

मी घेतलेली आजची कविता स्वातंत्र्य संग्रामाशी निगडित असली तरी आनंद घेऊन आली आहे. ज्या क्षणाची सगळे वाट पहाट होते तो क्षण जवळ येऊन ठेपला आहे, हे सांगणारी ही कविता आहे.भारतमातेच्या सुपुत्रानी एक खूप मोठ्ठं स्वप्न पाहिलं. त्याच्या पूर्ततेसाठी लाखो लोकांनी अनेक तपे अथक परिश्रम केले. या मार्गात असंख्य अडचणी, अगणित वेदना आहेत हे ठाऊक असूनही, मार्ग सोडला नाही. कारावास भोगला, प्राणांची आहुती दिली, कुटुंबाची होळी केली. जीवाची पर्वा न करता या खवळलेल्या सागरात उडी घेऊन आयुष्य पणाला लावलं. आता किनारा जवळ आला आहे, तो स्वप्नपूर्तीचा क्षण जवळ आला आहे. आता सगळे श्रम संपणार आहेत. ज्यांच्या समर्पणाने आजच्या या क्षणाला आकार दिला त्यांच्या स्मृतीला गौरवाने वंदन करुया आणि किनाऱ्यावर जयाचे झेंडे उभारुया. या अर्थाची सुंदर कविता तुम्हाला स्मिताच्या You tube channel वर त्यांच्या गोड आवाजात ऐकायला मिळेल.

निनादे नभी नाविकांनो इशारा,

आला किनारा, आला किनारा

*

उद्दाम दर्यामध्ये वादळी,

जहाजे शिडावून ही घातली

जुमानित ना पामरांचा हाकारा

आला किनारा, आला किनारा

*

सरायास संग्राम आला आता

तपांची समोरी उभी सांगता

युगांच्या श्रमांचा दिसे हा निवारा

आला किनारा, आला किनारा

*

प्रकाशे दिव्यांची पहा माळ ती

शलाका निळ्या लाल हिंदोळती

तमाला जणू अग्निचा ये फुलोरा

आला किनारा, आला किनारा

*

जयांनी दले येथ हाकारली

क्षणासाठी या जीवने जाळली

सुखेनैव स्विकारुनि शूल – कारा

आला किनारा, आला किनारा

*

तयांच्या स्मृती गौरवे वंदुनी

उभे अंतीच्या संगरा राहुनी

किनाऱ्यास झेंडे जयाचे उभारा

आला किनारा, आला किनारा

*

अशा या शब्दप्रभूला त्रिवार वंदन!!!

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ किंमत – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ किंमत – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

(नशिबाने शेठजींना दुसरा माणूस मिळाला.पण तो चार हजार पगारावर अडून बसला.शेवटी राजूशेठना त्याचं ऐकावं लागलं.येत्या सोमवारपासून तो कामावर येणार होता.) – इथून पुढे 

सोमवार उजाडला.शेठजी दुकानात आले.अजून ग्राहकांची वर्दळ सुरु व्हायची होती.प्रदीपला दुकानात पाहून त्यांना आश्चर्य वाटलं

“काय रे विचार बदलला की काय तुझा?”

प्रदीप हसून म्हणाला

“नाही शेठजी.या नवीन दादांना काम समजावून सांगायला आणि सगळ्यांना शेवटचं भेटून घ्यायला आलोय”

“बरं बरं” 

प्रदीप आणि तो नवीन माणूस आत गेला.शेठजी खुर्चीवर बसत नाही तो एक आलिशान कार दुकानासमोर उभी राहिली.आजची सकाळ एका दांडग्या ग्राहकाने सुरु होणार याचा शेठजींना आनंद झाला.

” बोला साहेब “ती व्यक्ती आत आल्यावर शेठजी म्हणाले

” प्रदीपला घ्यायला आलोय”

शेठजींनी एकदा कारकडे पाहिलं.एका मामुली सफाईकामगाराला घेण्यासाठी हा देखणा माणूस एवढी आलिशान कार घेऊन यावा याचं त्यांना आश्चर्य वाटलं.या माणसाकडे तर प्रदीप कामाला लागला नाही?

“प्रदीप कोण आपला?”त्यांनी साशंक मनाने विचारलं

” प्रदीप मुलगा आहे माझा”

“काय्यsssप्रदीप तुमचा मुलगा?”

तेवढ्यात प्रदीप बाहेर आला.आल्याआल्या त्याने वेगाने धावत जाऊन त्या माणसाला मिठी मारली

” पप्पाsss” असं त्याने म्हणताच 

त्या माणसाने त्याला मिठीत घेतलं आणि तो ढसाढसा रडू लागला.सगळे सेल्समन,नोकर जमा झाले.प्रदीपही रडत होता.हे काय गौडबंगाल आहे हे कुणाला कळेना.थोडा वेळाने प्रदीप जरा बाजुला झाला तसा तो माणूस म्हणाला.

” शेठजी मी ओंकारनाथ.माझी धुळ्यात चटईची फँक्टरी आहे.दोन इंडस्ट्रीयल वर्कशाँप आहेत.अगोदर मीही एक कामगार होतो.मेहनतीने आणि देवक्रुपेने फँक्टरीचा मालक झालो.मी गरीबी पाहिली आहे.कित्येक दिवस उपाशी राहून आयुष्य काढलं आहे.पण आमची मुलं तोंडात चांदीचा चमचा घेऊन आली आहेत.त्यांना पैशाची,श्रमाची,माणसांची किंमत नाही.हा माझा अति लाडावलेला मुलगा माझ्या फँक्टरीत यायचा.तिथल्या कामगारांवर रुबाब करायचा.लहानमोठा बघायचा नाही.वाटेल ते बोलायचा.माझ्या कानावर आलं होतं पण एकूलत्या एक मुलावरच्या प्रेमापोटी मी चुप बसायचो.एक दिवस त्याने लिमीट क्राँस केली. आमच्या सफाई कामगाराला वाँशरुम नीट साफ केलं नाही म्हणून सगळ्या कामगारांसमोर शिव्या दिल्या.साठी उलटलेला तो माणूस.त्याच्या मनाला ते लागलं.तो माझ्याकडे रडत आला आणि “माझा हिशोब करुन टाका.मला आता इथे रहायचं नाही “असं म्हणू लागला.माझं डोकं सरकलं.मी याला बोलावलं.म्हाताऱ्याची माफी मागायला लावली तर हा आपल्या मस्तीत.सरळ माफी मागणार नाही म्हणाला.मी उठून त्याच्या मुस्काटात मारली आणि त्याला म्हणालो की तुझ्यात एवढी मग्रुरी आहे ना तर तू मला महिनाभर सफाईचं काम करुनच दाखव.त्याने माझं चँलेंज स्विकारलं पण आपल्याच फँक्टरीत सफाई करण्याची त्याला लाज वाटत होती.मला म्हणाला मी जळगांवला जातो आणि तिथे काम पहातो.मीही संतापात होतो म्हणालो तू कुठेही जा.पण हेच काम करायचं आणि महिन्याने मला सांगायचं कसं वाटतं ते!त्याचा एक गरीब शाळकरी मित्र जळगांवच्या समता नगरात रहातो.त्याच्याकडे तो आला.तुमच्या दुकानात कामाला लागला.मला फोन करुन त्याने हे सांगितलं. मला वाईट वाटलं.शेवटी बापाचं मन ते.पण म्हंटलं उतरु द्या याची मस्ती.अशीही त्याला सुटीच होती.रिकाम्या टवाळक्या करण्यापेक्षा आयुष्य किती खडतर आहे हे तरी शिकेल.म्हणून मी काहीही चौकशी केली नाही.मागच्या आठवड्यात त्याचा फोन आला खुप रडला.म्हणाला ‘मी आता खुप सुधारलो आहे.मी आठवड्याने परत येतो घरी’ मी म्हंटलं ‘मीच येतो.बघतो तुझं दुकान आणि तू कायकाय काम करत होतास ते’ म्हणून आज मी ते बघायला आणि त्याला घ्यायला आलोय”

राजूशेठ ते ऐकून अवाक झाले. म्हणाले

” तरीच मला वाटत होतं की हा मुलगा सफाईच्या कामाला योग्य नाहिये.पण हा काम तर छान करत होता”

प्रदीप हसला

“नाही शेठजी.मला सुरवातीला काम जमत नव्हतं पण या सगळ्या काकांनी मला खुप मदत केली.मी डबा आणत नव्हतो कारण मित्राची आई खरंच आजारी असायची पण महिनाभर यांनी त्यांच्या घासातला घास मला भरवला.माझ्याकडून खुप चुका व्हायच्या पण ते माझ्यावर कधी रागावले नाहीत.मला त्यांनी खुप सांभाळून घेतलं”

प्रदीप परत रडायला लागला तसं भास्करने त्याला जवळ घेतलं.

“अरे बेटा आपण सगळेच पोटापाण्यासाठी नोकरी करतो ना?मग आपण एकमेकांना सांभाळून घ्यायला नको?”

” हो काका.पण मला हे समजत नव्हतं.आता ते कळायला लागलं.पप्पा तुम्ही मला म्हणत होते ना की मला पैशाची, श्रमांची किंमत नाही म्हणून.मला इथं आल्यावर मेहनतीची ,पैशांची,माणसांची,अन्नाची सगळ्यांची किंमत कळायला लागलीये.पप्पा शेठजींची तीन मोठी दुकानं आहेत जळगांवात, पण त्यांना कसलाही गर्व नाही.ते कुणाशीच कधीही वाईट वागले नाहीत.कारण त्यांना माणसाच्या कष्टाची जाणीव आहे.त्यांच्या घरी काहीही कार्यक्रम झाला की ते दुकानात सगळ्यांना मिठाई वाटायचे.कधीही गरीब -श्रीमंत असा भेदभाव त्यांनी केला नाही “

“बेटा हेच मला हवं होतं.तुला ते शेवटी कळलं यातच मला समाधान वाटतंय” 

” चला साहेब तुम्हांला दुकान दाखवतो” राजूशेठ प्रदीपच्या वडिलांना म्हणाले “आणि भास्कर जरा सगळ्यांसाठी मिठाई घेऊन यायला सांग.आज एक बिघडलेला मुलगा माणसात आलाय याचा मलाही खुप आनंद होतोय” 

ते तीन मजली भव्य दुकान पाहून प्रदीपच्या वडिलांना प्रदीपच्या मेहनतीची कल्पना आली.त्यांचे डोळे भरुन आले.आलेली मिठाई खाऊन झाल्यावर ते म्हणाले.

“चला मंडळी.आता निघायची वेळ आली.तुम्ही सर्वांनी माझ्या या नाठाळ मुलाला सांभाळून घेतलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.आणि हो पुढच्या महिन्यात प्रदीपचा वाढदिवस आहे.तुम्ही सगळ्यांनी धुळ्याला पार्टीला जरुर यायचं आहे.गाडी करुनच या सगळे.खर्चाची काळजी करु नका.गाडीचा खर्च मी करेन.”

प्रदीप उठला .सगळ्या सेल्समन आणि नोकरांच्या पाया पडला.मग शेठजींकडे आला तसं शेठजी त्याला जवळ घेऊन म्हणाले

“बेटा तुझ्या वडिलांनी आणि तु ही नव्या पिढिसाठी एक आदर्श घालून दिलाय”

प्रदीप आणि त्याचे वडील गाडीत जाऊन बसले तसे सर्वजण त्यांना निरोप द्यायला बाहेर आले.गाडी निघाली.निरोपाचे हात हलले.

प्रत्येकजण आत येऊन आपापल्या कामाला लागला.शेठजींना काऊंटरवर  बसल्यावर आपल्या अशाच बिघडलेल्या मुलाची आठवण झाली. सध्या तो पुण्यात इंजीनियरींग करत होता.तो करत असलेले रंगढंग,त्याला लागलेली व्यसनं त्यांच्या कानावर आली होती.त्याला सुधारण्यासाठी प्रदीपसारखं काही करता येईल का याच्या विचारात ते गढून गेले.

– समाप्त – 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मराठी पुराण — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ मराठी पुराण — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आज मराठी भाषा दिन. त्या निमित्ताने मराठीचे अवलोकन करताना त्यातील बाराखडी व मुळाक्षरांच्या वेगवेगळ्या दर्शनानी भावली आणि मराठी असल्याचा आनंद झाला. पहा तुम्हालाहि मिळ्तोय का? आणि खरच आवड्ल्यास कॉमेन्ट्स द्यायला,शेअर करायला,लाईक करायला विसरू नका.

ऐका मंडळी सुजाण। मराठीचे हे पुराण।वर्षा तुम्हा समजावूनी सांगतसे॥

मराठी भाषेसी ना तोड। तया नाही कशाची जोड।अमृताहूनी गोड, देववाणी॥

३६ मुळाक्षरांची मुळे। बाराखडीची बारा पाने।हलवूनी कल्पवृक्ष साकार होई॥

आता सारे आपण। बाराखडीचे करू अवलोकन।ठेवूनी ध्यान,कान देऊनी ऐका॥

अ असे निराकार। आत्मा होई मिळता आकार। इजा बिजेने भेटा ईश्वरासी॥

उल्हास मनी दाटे। ऊठोनी मन पळू लागे। एकदा तरी धागे ऐसे जुळावे॥

ओज येता भुईवर। औटघटकाभर। अंबराकडे पाहून अः म्हणा॥ 

मुळाक्षरांकडे आता। नजर आपली करू चला।किती संत अन् देवांनी ही भारली असे॥

 

‘क’ असे विठ्ठल। ठेऊनी ऊभा कटेवरी कर। त्यात  तयाचे रूप दिसतसे॥

‘ख’ असे एकमेव। एकत्र येती दोन जीव। जीव-शीव दर्शन घडतसे॥

‘ग’ वाटे गजानन। पहा जरा देऊन ध्यान। सोंड वळवून बसला असे॥

‘घ’ म्हणजे रिद्धि-सिद्धी। तयार  गणेश सेवेसी। चवरी घेऊन, वारा घालती॥

‘ङ’ म्हणजे लक्ष्मी माता। सजली पहा दागिण्यांनी आता। हिरा तिच्या नथणीचा चमकतो॥

‘च’ कडे जाता नजर।साई मज दिसे सत्वर।हात पसरूनी बसला असे॥

‘छ’ म्हणजे छत्रपती।घोड्यावर बसले तलवार हाती।अन्याय मुळीना खपतसे॥

‘ज’ वाटती गाडगेबाबा।गाडगे हाती घेऊनी ऊभा। स्वच्छता सकला मागतसे॥

‘झ’ वाटतो अर्जून। उभा धनूष्य ताणून । मनोवेध अचूक साधतसे॥

‘ञ’ म्हणजे समर्थ रामदास। दंडूका तयांचा हा खास। मनोभावे त्यास करू वंदन॥

‘ट’ म्हणजे कालीमाता।असूरांचा करी वध आता। चरणावरी माथ टेकवू चला॥

‘ठ’ म्हणजे वाटे जनी। तिचे ते जाते असे बाई।पिठ त्यातून दळू चला॥

‘ड’ म्हणजे असे नारद। उभा दारी शेंडी वर।नारायण जप करीतसे॥

‘ढ’ म्हणजे गोराकुंभार।चाक त्याचे अन् माती त्यावर।आकार मडक्यास देत असे॥

‘ण’ म्हणजे बालाजी रूप। गंध त्याचे सुखवी खूप। श्रीमंतीही वाढवू चला॥

‘त’ म्हणजे देवराज ईंद्र। ऐरावताची ती सरळ सोंड। ऐश्वर्य पाहू डोळाभरी॥

‘थ’ म्हणजे हनूमान।बसला चरणी गदा घेऊन। स्वामीभक्तासही नमू आपण॥

‘द’ असे कोणी योगी। तपश्चर्या करी एका पायावरी। सिद्धी तयास मिळोनी जावो॥

‘ध’ असे हो एकवचनी राम।सज्ज बाण भाता घेऊन। पुन्हा रामयूग मागू चला॥

‘न’ म्हणजे बटू कोणी। आला याचक होऊनी।दान तयास देऊ चला॥

‘प’ म्हणजे सावतामाळी मळ्यातील मचाणावर बसोनी तो राखी मळा॥

‘फ’ म्ह्णजे धन्वंतरी । एका हाती कलश घेऊनी। आरोग्य दान करीतसे॥

‘ब’ म्हणजे तुकाराम। उभे गळ्यात एकतारी घालून । विठ्ठल नाम सदा मुखी॥

‘भ’ म्हणजे बलराज भीम। खांद्यावरी ती गदा घेऊन।शक्तीने तो विजयी होई॥

‘म’ म्हणजे कार्तीकेय। मयूरावर बसून। विश्व प्रदक्षिणेस निघाला॥

‘य’ म्हणजे मीरा भोळी।एकतारी करी घेऊनी।एक पाय्वर घेऊनी बसली असे॥

‘र’ म्हणजे पार्वती देवी।सड्पातळ अन गौर वर्णी।तिजलाही वंदन आता माझे॥

‘ल’ असे हो विष्णूदेव।कमल पुष्पावरी स्वार।तिन्ही लोकांचे नियंत्रण करी॥

‘व’ असेहो सूर्य देव। ऊगवे तो क्षितीजावर।चराचरा चैतन्य देई॥

‘श’ असती विवेकानंद।ऊभे फेटा बांधून।हाताच्या घडीसह चिंतन करती॥

‘ष’ असे सरस्वती देवी।मांडीवरती वीणा ठेऊनी।गान मराठीचे गात असे॥

‘स’ वाटे राधाकृष्ण। ऊभा पाय दुमडून। खांद्यावरी राधा विसावतसे॥

‘ह’ म्हणजे पवनदेव।जोराने ती ऊठे वावटळ।परी सकल विश्व व्यापलेसे॥

‘ळ’ म्हणजे ज्ञानेश्वर।बसले पद्मासन घालून।पसायदान मागती हे॥

‘क्ष’ म्हणजे शंकरदेव।उभे ते डमरू घेऊन।एका हाती त्रिशूळ असे॥

‘ज्ञ’ म्हनजे महिषासूर मर्दिनी।पायी महिषासूर, हाती त्रिशूळ घेऊनी।सकल जनास शांती देई॥

ऐसी सर्व मुळाक्षरे वसती पहा मराठी गृही।बाराखडी सवे त्यास सजवावे॥

करावा त्यांचा आदर।शब्दांस द्यावा आधार।शब्दांगण फुलोनी जाई॥

अक्षरांपासून शब्द बनती।शब्द काव्य अथवा लेखन साकारती।तयातून ग्रंथभांडार निर्मीतसे॥

म्हाणोनी घ्यावी शपथ।वर्णमालेसी कंठात घालेन।तिजला सांभाळेन जन्मभरी॥

उतू नये मातू नये। घेतला वसा टाकू नये।मराठीस करावे आपलीशी॥

प्रसार हिचा करू चला।घट्ट वीण गुंफू चला।मराठीस वंदू मनोभावे॥

बोला पुंडलीक वरदा हारी विठ्ठल।श्री ज्ञानदेव तुकाराम।

पंढरीनाथ महाराज की जय।मराठी माऊलीचा जय॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आज आमचा नंबर आहे … पण उद्या ?” – लेखक : डॉ. प्रकाश कोयाडे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “आज आमचा नंबर आहे … पण उद्या ?” – लेखक : डॉ. प्रकाश कोयाडे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

गेल्या दोन दिवसांपासून आमचं कुटुंब एका विचित्र परिस्थितीमधून जात आहे. हे फार गंभीर आहे आणि तुमच्या सोबत हे घडू नये म्हणून हे इथं मांडतोय… २९ तारखेला दुपारी ३.२० वाजता माझ्या बायकोच्या व्हाट्सअपवर एक मेसेज आला ! 

मी ड्युटीवर होतो म्हणून डिटेल्स काही न सांगता ती एवढंच म्हणाली की, ‘ लवकर घरी या फार महत्त्वाचं बोलायचं आहे.’ चार वाजता घरी आलो तर तिने रडायला सुरुवात केली. आधी तिला समजावून सांगितले, शांत केलं आणि काय झालं आहे याबद्दल स्पष्ट विचारलं तेव्हा जे समजलं ते मलाही शॉकिंग होतं. कुठल्यातरी अनोळखी नंबर वरून तिला पैशाच्या मागणीसाठी मेसेज आला होता,  ज्यामध्ये —  

‘तुमचा आठशे रुपयांचा EMI बाकी आहे आणि तो भरा अन्यथा तुमचा फोटो व्हायरल करु’ अशी धमकी होती. 

आधी बायकोला पैसे मागितले तेव्हा त्यात काही वाटलं नाही पण समोरच्या व्यक्तीने एक मॉर्फ केलेला फोटो पाठवला. तेव्हा मात्र तिने एका सेकंदात तो फोटो डिलीट केला आणि तो नंबर ब्लॉक करून डिलीट केला.

पॅनिक न होता हे प्रकरण हाताळणं आवश्यक होतं, तिला धीर देणं त्याक्षणी सर्वात महत्वाची गोष्ट होती. समाधानाची गोष्ट हीच होती की, घाबरून जाऊन बायकोने समोरच्या व्यक्तीला पैसे पाठवले नव्हते!

आम्ही सायबर क्राईम ऑफिसला जाऊन कंप्लेंट केली. तसेच एक कंप्लेंट जवळच्या पोलिस स्टेशनलाही केली. तसं पाहिलं तर पोलिसांसोबत संपर्क रोजचाच पण आजचं कारण वेगळं होतं. त्यांनी फार शांतपणे सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या आणि समजावून सांगितल्या. काहीही झालं तरी पॅनिक व्हायचं नाही आणि कोणालाही पैसे पाठवायचे नाहीत हे सांगितले… अर्थात आम्ही तेवढे स्ट्रॉंग होतोच! 

काल दुपारी आणखी एका नंबरवरून साडेतीन हजार रुपयांची मागणी केली. तसेच ‘तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील प्रत्येकाला फोन/मेसेज करून पैसे मागू’ अशी धमकी दिली. तो नंबर आणि डिटेल्सही पोलिसांना पाठवले. आणखी आठ दहा दिवस हे होतच राहणार आहे. बायकोने याबद्दल व्हाट्सअपवर स्टेटस ठेवलं आणि संपर्कातील जवळपास सर्वांना स्वतः सांगितलं जेणेकरून त्यांनाही याबाबत कळावं, त्यांना काही अडचण येऊ नये. 

तिने कोणतंही लोन ऍप्लिकेशन डाऊनलोड केलेलं नव्हतं. एक गोष्ट मात्र नक्की की, मोबाईल वापरतेवेळी तिच्याकडून कुठेतरी चूक झाली होती, एखाद्या अनोळखी लिंकवर क्लिक झालेलं असणार आहे.

आम्हाला हेही माहीत नाही की, समोरील व्यक्ती पुरुष आहे की स्त्री! बिहार, झारखंड या भागातील लोक असावेत. पोलिसांनी सांगितलं की दिवसाला किमान चार ते पाच केस आपल्याकडं अशा दाखल होत आहेत. सध्या याचं खूप प्रमाण वाढत आहे.

या प्रकरातून एक गोष्ट तर समजली आहे की, ते लोक माईंड गेम खेळत असतात. आपलं घाबरून जाणं हे त्यांचं भांडवल असतं. आपला मेंदू या गोष्टींसाठी तयार नसतो, बदनामीची भीती असते. हे लोक याच गोष्टींचा फायदा घेतात. जे लोक कोणाला याबाबत बोलत नाहीत, गोष्ट लपवून ठेवतात ते आणखी अडकत जातात. एका पोलिस मित्राच्या म्हणण्यानुसार काही प्रकरणं आत्महत्येपर्यंत सुद्धा पोहोचली आहेत. 

व्हाट्सअपवर स्टेटस ठेवलेलं बघून माझ्याच ओळखीच्या दोघांनी त्यांच्याबद्दल घडलेले असेच किस्से सांगितले. त्यापैकी एका मुलीने एका मेसेज मुळे घाबरून जाऊन पंचवीस हजार रुपये समोरच्याला दिले होते.

हे सर्व इथं का लिहितोय तर त्याला दोन कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आमचा संदर्भ देऊन कोणी पैसे मागत असेल, धमकी देत असेल तर कोणी लक्ष देऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कोणासोबत असं घडू नये आणि समजा घडलंच तर त्या जाळ्यात अडकू नये!

‘जमतारा’ ही वेब सीरीज ज्यांनी पाहिली असेल त्यांना माहीत असेलच हे सर्व. सीरीजच्या नावातच त्यांनी लिहिलं आहे… सबका नंबर आयेगा ! आपल्या मोबाईलमधली माहिती सुरक्षित नाही. कोणतंही ऍप्लिकेशन घेताना, काहीच न वाचता आपण ‘I Agree’ करतो. कोणत्याही लिंक नकळत उघडतो आणि हे चक्र सुरू होतं. 

आज आमचा नंबर आहे उद्या कोणाचाही असू शकतो… so be careful!

लेखक : डॉ.प्रकाश कोयाडे

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जोडणारा” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “जोडणारा” – लेखक :  अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

एका गावात एक शेतकरी राहत होता.रोज सकाळी तो झऱ्यातून स्वच्छ पाणी आणण्यासाठी दोन मोठ्या घागरी घेऊन जात असे. तो त्या  खांबाला बांधून खांद्याच्या दोन्ही बाजूला लटकवत असे .त्यापैकी एकीला कुठेतरी तडा गेला होता. ती फुटलेली होती आणि दुसरी धड,परिपूर्ण होती .अशाप्रकारे तो दररोज घरी पोहोचेपर्यंत शेतकऱ्याकडे फक्त दीड घागरी पाणी उरत असे .

उजव्या घागरीला अभिमान होता की ती सर्व पाणी घरी आणते आणि तिच्यात कोणतीही कमतरता नाही. दुसरीकडे,फुटलेली घागर घरापर्यंत फक्त अर्धेच पाणी पोहोचवू शकत होती  आणि शेतकऱ्यांची मेहनत व्यर्थ, वाया जात होती.या सगळ्याचा विचार करून ती फुटलेली घागर खूप व्यथित व्हायची. एके दिवशी तिला ते सहन झाले नाही.ती शेतकऱ्याला म्हणाली, “मला माझी लाज वाटते. मला तुमची माफी मागायची आहे.”

शेतकऱ्याने विचारले,”का? तुला कशाची लाज वाटते?”

तुटलेली घागर म्हणाली , “कदाचित तुम्हाला माहीत नसेल; पण मी एका ठिकाणी फुटले आहे आणि गेल्या दोन वर्षांपासून मी जेवढे पाणी घरी आणायला हवे होते,त्यातील निम्मेच पाणी आणू शकले आहे.ही माझ्यातली मोठी कमतरता आहे आणि त्यामुळे तुमची मेहनत वाया गेली आहे.”

घागरीबद्दल ऐकून शेतकरी थोडासा दुःखी झाला आणि म्हणाला,”काही हरकत नाही. आज परत येताना तू वाटेत पडलेली सुंदर फुले पाहावीस , अशी माझी इच्छाआहे.” तुटलेल्या घागरीने तसे केले.तिला वाटेत सुंदर फुले दिसली.असे केल्याने तिचे दुःख काही प्रमाणात कमी झाले; पण घरी पोहोचेपर्यंत अर्धे पाणी सांडले होते.निराश होऊन ती शेतकऱ्याची माफी मागू लागली .

शेतकरी म्हणाला,”कदाचित तुझ्या लक्षात आलं  नाही.वाटेत सगळी फुलं होती.ती फक्त तुझ्या बाजूने होती . घागरीच्या उजव्या बाजूला एकही फूल नव्हते. कारण तुझ्यातला दोष मला नेहमीच माहीत होता आणि मी त्याचा फायदा घेतला.तुझ्या दिशेच्या वाटेवर मी रंगीबेरंगी फुलांच्या बिया पेरल्या होत्या.

तू त्यांना दररोज थोडे थोडे पाणी पाजलेस आणि संपूर्ण मार्ग इतका सुंदर बनवलास .आज तुझ्यामुळेच मी देवाला ही फुले अर्पण करू शकलो आणि माझे घर सुंदर करू शकलो.

जरा विचार कर, ‘तू जशी आहेस तशी नसतीस,तर मी हे सर्व करू शकलो असतो का?’

आपल्या प्रत्येकामध्ये काही उणिवा असतात,पण या उणिवा आपल्याला अद्वितीय बनवतात.म्हणजे तुम्ही जसे आहात तसेच राहा.त्या शेतकऱ्याप्रमाणे आपणही सर्वांना तो जसा आहे, तसा स्वीकारला पाहिजे.त्याच्या चांगुलपणाकडे लक्ष दिले पाहिजे.जेव्हा आपण हे करू तेव्हा तुटलेली घागरही चांगल्या घागरीपेक्षा अधिक मौल्यवान होईल.

लेखक:अज्ञात

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ एक धागा अंतरीचा गाभा… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री आशिष बिवलकर आणि श्री ए के मराठे ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  एक धागा अंतरीचा गाभा… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री आशिष बिवलकर आणि श्री ए के मराठे ☆

श्री आशिष बिवलकर   

? – एक धागा अंतरीचा गाभा– ? ☆ श्री आशिष बिवलकर ☆

( १ )

गुंफल्या या मूक कळ्या 

गजऱ्याची झाल्या शोभा |

शल्य ना मनी कशाचे,

एक धागा अंतरीचा गाभा |

एक एक कळी गुंफली 

एकमेकींचे वाढवले सौंदर्य |

क्षणभंगुर या जीवनात,

जोपासले आनंदाचे औदार्य |

रंग रूप गंध लाभे,

एक दिवसाचा साज |

सुकता कुणी न पाहे,

आनंदे जगून घेती आज |

गजरा म्हणून एक ओळख,

कोणाचे कुंतल सजवती |

हातात कुणाच्या बांधून ,

मैफलीत गंध दरवळती |

प्रारब्ध होई धागा,

गुंफतो आपल्या कर्माच्या माळा |

क्षण क्षण सत्कारणी लावावा,

सार्थ करावा जीवनाचा सोहळा |

आनंद या जीवनाचा,

सुगंधापरी दरवळावा |

सार लाभल्या आयुष्याचा,

कळ्यांना पाहून ओळखावा |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

श्री ए के मराठे

? – एक धागा अंतरीचा गाभा… – ? ☆ श्री ए के मराठे ☆

( २ )

कळ्या निमूट ओवून घेतात

गजऱ्यामधे स्वतःला

दोष देत बसत नाहीत

सुईला वा सुताला ll

कारण त्यांना माहीत असतं

हेच त्यांचं काम आहे

क्षणभंगुर मिळालेलं आयुष्य

जगण्यामधेच राम आहे ll

रूप,रंग एका दिवसाचा

गंधही उद्या राहणार नाही

फुल होऊन कोमेजल्यावर

ढुंकूनही कुणी पाहणार नाही ll

म्हणून म्हणतो जसं,जेवढं

मिळालंय जीवन जगून घ्यावं

विषालाही अमृत समजून

हसत हसत चाखून प्यावं ll

कवी : श्री ए के मराठे

कुर्धे, पावस, रत्नागिरी

मो. 9405751698

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 178 – गीत – मैं तुमसे नाराज नहीं…. ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं  आपका एक अप्रतिम गीत – मैं तुमसे नाराज नहीं।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 178 – गीत  – मैं तुमसे नाराज नहीं…  ✍

सच कहता हूँ बोलूँगा,

मैं तुमसे नाराज नहीं।

खामोशी का शाल ओढ़कर, तुम बैठी हो कोने में

बाँच रही हो सुधि की पाती, कितना पाया खोने में।

बिखरे बिखरे केश तुम्हारे मुख पर ऐसे झूम रहे

जैसे चंदा के दरवाजे, आवारा घन घूम रहे।

और तुम्हारी सौंधी अँगुली कुछ लिखती है धूल में।

शब्द होंठ में ऐसे बन्दी जैसे भँवरा फूल में।

बिछल गया माथे से आँचल किस दुनिया में खोई हो

लगता है तुम आज रातभर चुपके चुपके रोई हो।

रोना तो है सिर्फ शिकायत, इसकी उम्रदराज नहीं

टूट टूट कर जो न बजा हो, ऐसा कोई साज नहीं।

ओ पगली, नाराज कहीं करता है कोई अपनों को

दुनिया कितना चाहा करती सुबह सुबह के सपनों को

 *

जो शब्दों में प्रकट हुआ वह पाप भले हो प्यार नहीं

मेरा प्यार पाप बन जाये, यह मुझको स्वीकार नहीं।

शबनम की शहजादी का भी प्यार नहीं सरनाम हुआ

जिस बादल ने आँसू गाये, सिर्फ वही घनश्याम हुआ।

तुझे चाहता हूँ मैं कितना, पूछ न अब मेरे मन से

कोई कितनी प्रीति करेगा, खुद ही अपने जीवन से।

मेरे मन के शीश महल सा वह यमुना का ताज नहीं

शाहजहाँ से मैं ज्यादा हूँ, तू बढ़कर मुमताज कहीं।

 

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 178 – “सिकुड़ते सब्यसाचियों के…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत  सिकुड़ते सब्यसाचियों के...)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 178 ☆।। अभिनव गीत ।। ☆

☆ “सिकुड़ते सब्यसाचियों के...” ☆ श्री राघवेंद्र तिवारी

ऐसे कोहरे में ठिठुरन से

सूरज भी हारा

दिन के चढ़ते चढ़ते कैसे

लुढ़क गया पारा

 

जमें दिखे गाण्डीव

सिकुड़ते सब्यसाचियों के

धुंध लपेटे शाल, उलहने

सहें चाचियों के

 

चौराहे जलते अलाव भी

लगते बुझे बुझे

और घरों की खपरैलें

तक लगीं सर्वहारा

 

हाथ सेंकने जुटीं

गाँव की वंकिम प्रतिभायें

जो विमर्श में जुटीं

लिये गम्भीर समस्यायें

 

वृद्धायें लेकर बरोसियाँ

दरवाजे बैठीं

शांति पाठ के बाद पढ़

रहीं ज्यों कि कनकधारा

 

लोग रजाई कम्बल

चेहरे तक लपेट निकले

लगें फूस से ढके फूल के

हों सुन्दर गमले

 

आसमान से नीचे तक

है सुरमई अँधियारा

धुँधला सूरज दिखता

नभ में लगे एक तारा

©  श्री राघवेन्द्र तिवारी

06-02-2024 

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares
image_print