हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ साहित्य निकुंज #159 ☆ भावना के दोहे ☆ डॉ. भावना शुक्ल ☆

डॉ भावना शुक्ल

(डॉ भावना शुक्ल जी  (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान  किया है। हम ईश्वर से \प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत है “भावना के दोहे।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ  # 160 – साहित्य निकुंज ☆

☆ भावना के दोहे ☆

मोहन राधा से कहे,क्यों बैठी हो मौन।

सोच में किसके डूबती ,बतला दो है कौन।।

🌹

प्यारे तेरे केश हैं,  प्यारे तेरे बोल।

मन मोहन की राधिका,तू तो है अनमोल।।

❤️

मोहन तुझको देखकर, कटते है दिन रात।

तुझ बिन ब्रज सूना लगे, कौन करे अब बात।।

🌹

मोर मुकुट धारण करें, न्यारी छबि के लाल।

तुझे निहारु दरपण से,राधा के गोपाल।।

❤️

सुंदर छबि है आपकी, मन – मोहन का राग।

ओ प्यारे ओ साँवरे, राधा का अनुराग।।

🌹

© डॉ भावना शुक्ल

सहसंपादक… प्राची

प्रतीक लॉरेल, J-1504, नोएडा सेक्टर – 120,  नोएडा (यू.पी )- 201307

मोब. 9278720311 ईमेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ इंद्रधनुष #146 ☆ मन पर दोहे ☆ श्री संतोष नेमा “संतोष” ☆

श्री संतोष नेमा “संतोष”

(आदरणीय श्री संतोष नेमा जी  कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप  कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं. “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है  “मन पर दोहे। आप श्री संतोष नेमा जी  की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)

☆ साहित्यिक स्तम्भ – इंद्रधनुष # 146 ☆

☆ मन पर दोहे ☆ श्री संतोष नेमा ☆

तन का राजा मन सदा, जिसके हैं नवरंग

उसके ही आदेश से, करें काम सब अंग

 

मन टूटा तो टूटता, अंदर का विश्वास

रखें सुद्रण मन को सदा, मन से बंधती आस

 

मन चंचल मन वाबरा, मन की गति अंनत

पल में ही वह तय करे, जमी-गगन का अंत

 

जो अंकुश मन पर रखे, मन पर हो असवार

उसका जीवन है सफल, रखे शुद्ध आचार

 

रखें साथ तन के सदा, मन को भी हम साफ

तभी बढेगा जगत में, स्वयं साख का ग्राफ

 

ध्यान योग अभ्यास से,मन पर रखें लगाम

तभी मिलेगी सफलता,बनते बिगड़े काम

 

मन रमता संसार में,मन माया का दास

मन के घोड़े भागते,लेकर लालच,आस

 

दूर करें मन का तिमिर,मन में भरें उजास

रोशन हों सुख-दुख सभी,अंतस प्रभु का वास

 

मन को निर्मल राखिए,कभी जमे नहिं धूल

मन मैला तो कर्म भी,बनें राह के शूल

 

जीवन के सुख-दुख सभी,मन के हैं आधार

छिपे न मन से कुछ कभी,मन के नैन हजार

 

मन के पीछे भागकर,खोएं मत “संतोष”

तभी मिलेगी सफलता, रखें ज्ञान का कोष

 

© संतोष  कुमार नेमा “संतोष”

सर्वाधिकार सुरक्षित

आलोकनगर, जबलपुर (म. प्र.) मो 9300101799

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कवडसा… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

सौ.मंजुषा सुधीर आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ कवडसा… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

कवडसा असा

“तो” धावत  येई

सायं-संध्या त्यास

किती, घाई घाई

 

देव्हाऱ्यात देव

भेटता लोळण

चरण स्पर्शूनी

गोड आळवण

 

तेजाळती क्षण

भारावले मन

नेत्र ही दिपले

ओजस हा दिन

 

गवसला सूर

तृप्तीत सुखाचा

सृजन सोहळा

अजब सृष्टीचा

 

“देव” ही हसले

भाग्य उजळले

नतमस्तक मी

निःशब्द बोलले

 

आशीर्वाद मज

द्यावा हो सत्वर

सुख शांती नांदो

इथे निरंतर

 

सेवा कामी तन

सतत झिजावे

इतुकेच आता

मनात ठसावे.

 

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #152 ☆ चालक तूं ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 152 – विजय साहित्य ?

☆ चालक तूं ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

दत्त दत्त कृपा निधी

वेद चारी तुझ्या पदी..

गोमाताही देवगणी

दत्तात्रेय नाम वदी..१

 

गुरुदेवा दिगंबरा

सत्व रज तम मूर्ती..

निजरुपे लीन होऊ

द्यावी चेतना नी स्फूर्ती..२

 

अनुसूया अत्रीऋषी

जन्म दाते त्रैमुर्तीचे..

ब्रम्हा विष्णू आणि हर

तेज आगळे मूर्तीचे..३

 

दत्त दत्त घेता नाम

भय चिंता जाई दूर

लय, स्थिती नी उत्पत्ती

कृपासिंधु येई पूर..४

 

अवधुता गुरू राया

तुझ्या दर्शना आलो‌ मी..

काया वाचा पदी तुझ्या

आनंदात त्या न्हालो मी..५

 

हरी,हर नी ब्रम्हा तू

साक्षात्कारी पालक तू

ज्ञानमूर्ती पीडाहारी

संसाराचा चालक तू..६

 

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बदल… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ बदल…  ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

एका प्रसिद्ध टीव्ही  मालिकेतील नायिका सोज्वळ आहे. जुन्या काळातील नायिकांसारखी ती दोन वेण्या घालते. अलीकडं कोणी वेण्या घालत नाहीत. आंबाडा, एक वेणी या हेअरस्टाईल्स तर कालबाह्य झाल्या आहेत. पॉनिटेल फक्त मध्यमवयीन महिलांनी घातलेला दिसतो. तरूणी, नवयौवना यांच्या हेअरस्टाईलनं क्रांतिकारक बदल केलेला दिसतो. खरं तर या नवयुवती हेअरस्टाईल करतच नाहीत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण या सगळ्या आजकाल केस बांधतच नाहीत. केस मोकळे सोडणं हीच सध्याची फॅशन आहे.

एक काळ असा होता की केस मोकळे सोडणं असभ्य मानलं जाई. आंबाडा, एक वेणी, दोन वेण्या एवढेच पर्याय उपलब्ध असत. पोनीटेल ची फॅशन ही लहान केस असणाऱ्यांसाठी वरदान ठरली. ज्या मुलींचे केस खरोखरच टेल सारखे, शेपटी सारखे लहान होते त्या मुली एक आडवी क्लिप लावून पोनी बांधू लागल्या. मानेच्या नाजूक झटक्यानं ही पोनी डौलदार झोका घेऊ लागली. आकर्षक दिसणं कोणाला नको असतं बरं? ही स्टाईल वेगानं समस्त महिला वर्गानं उचलून धरली. लांब केसांचा आता कंटाळा येऊ लागला. वेळ वाचतो या नावाखाली लहानथोर सगळ्याच महिला पोनी बांधण्यासाठी केसांची लांबी मर्यादित ठेवू लागल्या. वेणी घालणं ही जुनाट फॅशन झाली. काकूबाई स्टाईल म्हणून ओळखली जाऊ लागली. आणि काकूबाई म्हणवून घेणं कोणाला चालेल, हो ना?

मधल्या काळात साधना कट, बॉबकट, बॉयकट अशा काही कटस्टाईल्स लोकप्रिय झाल्या. पण त्यांची लोकप्रियता फारशी मोठी नव्हती. बघता बघता हिंदी सिनेमा, टीव्ही मालिकांतील नायिका केस मोकळे सोडून फिरू लागल्या. ग्लॅमरस लूक मिळवण्यासाठी आमच्या मुली, सुना देखील मुक्त केस आणि मुक्त मनानं मोकळ्या ढाकळ्या बिनधास्त जगू लागल्या. स्वच्छता, हायजिन साठी घातलेली बंधनं या मुलींनी झुगारून दिली. घरभर केस पडू नयेत म्हणून एका जागी बसून केस विंचरणं, स्वयंपाक करताना, घरकाम करताना ते बांधून ठेवणं हे नियम जाचक वाटू लागले. मोकळे केस हे मुक्त जगण्याचं, मुक्त विचारांच प्रतीक ठरलं. इथंपर्यंत थोडं ठीक आहे असं वाटतंय तोच कुरळे केस नकोसे वाटू लागले. स्ट्रेट, स्मूथ, सिल्कि केस पसंतीची पावती मिळवू लागले.त्यासाठी महागड्या ट्रिटमेंटस् केल्या जाऊ लागल्या. पण केसांची नवी मुक्त स्टाईल वाऱ्याच्या वेगानं पसरली.

मुक्तांगण कितीही प्रिय असलं तरी वैविध्यपूर्ण केशरचना देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत असं दिसतं. फ्रेंच रोल, हाय बन, लो बन आणि अगणित हेअरस्टाईल्स सण समारंभ, लग्न मुंजीत मानाचा मुजरा घेतात.

चांगलं दिसणं, आधुनिक राहणं, काळाबरोबर चालणं जमायल हवंच. तो आपला हक्कच आहे. फॅशन करताना स्थळकाळाचं भान मात्र असायला हवं. आपण कुठं आहोत, कोणत्या समारंभाला जाणार आहोत, आजूबाजूला कोणत्या वयोगटातील लोक आहेत, अशा काही गोष्टींचा विचार करावा इतकंच. स्वयंपाक करताना बांधलेले केस कामात अडथळा आणत नाहीत . शिवाय ते हायजेनिक आहे.

पूजा असेल, धार्मिक विधी असतील तर बांधलेले केस बरे. आजूबाजूला पणत्या,दिवे,समया असतील तर मोकळे केस धोकादायक ठरू शकतात. वयस्कर किंवा आदरणीय मोठी माणसं आजूबाजूला असतील तर केस मोकळे सोडू नयेत. ते छानसे बांधावेत.अशा वागण्यातून आदर, नम्रता व्यक्त होते. आधुनिकपणाचा स्वीकार करताना तारतम्य ठेवायला हवंच.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाटीवर मांडलेली नाती – भाग 2 (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ पाटीवर मांडलेली नाती – भाग 2 (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे  

(अप्पासाहेबांनी अगदी हौसेने त्याला लागून पार बांधला होता. आम्ही हळूहळू चालत त्या पारावर जाऊन बसलो.)  इथून पुढे —

‘‘ तुझ्या वहिनीने दीपकला पैशांची जमवाजमव करायला सांगितली होती. तुला कदाचित्  माहिती नसेल, पण रिटायर झाल्यावर मिळालेल्या सात लाखांपैकी दोन लाख रुपये मी घरावर खर्च केले होते… अर्धा प्लॉट रिकामाच होता, त्यावर बांधकाम करून घर आणखी वाढवलं होतं, आणि चार लाख रुपये दीपकला दिले होते.”

‘‘ चार लाख? इतकी मोठी रक्कम त्याला देऊन टाकलीत तुम्ही?”

“ हो ना. काय झालं… एम्.ई. झाल्यानंतर सूरजला कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून नोकरी मिळाली. त्यामुळे त्याच्याबद्दलची काळजी मिटली. पण बी.ई. झाल्यावर दीपकला नोकरी मिळत नव्हती. तो तर एम्.बी.ए. पण झालेला आहे. पण तरीही कितीतरी दिवस त्याला नोकरी मिळाली नाही. मग आता त्याने एम्.आय्.डी.सी. मध्ये स्वत:चं एक प्रॉडक्शन युनिट सुरू केलंय. बँकेकडून त्याने थोडं कर्ज घेतलं, आणि चार लाख मी दिले.”

‘‘ बरं. पण मग आता पैसे देण्याबद्दल काय म्हणाला तो?”

‘ म्हणाला… की आत्ता दोन लाख रुपयांची सोय करणं त्याला शक्य नाहीये… ‘ अजून माझा व्यवसाय नवा आहे. आणि दरमहा बँकेच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठीच खूप आटापिटा करावा लागतोय् अजून मला.’ ”

‘‘ अरे बापरे… मग सूरज…?”

‘‘ सूरजने तर आधीच सांगून टाकलं होतं, की त्याने त्याच्या सोसायटीकडून आणि प्रॉव्हिडंड फंडातूनही कर्ज काढलं, तरी पन्नास हजार रुपये मिळणंही कठीण आहे.”

‘‘ पण अप्पासाहेब, मी तर तुम्हाला आधीच सांगून ठेवलंय ना, की पैशांचा काही प्रश्न असेल तर मला सांगा म्हणून. नोकरीत असतांना तुम्ही इतक्या संस्थांना मदत केली आहेत, की तुमचं नुसतं नाव सांगितलं तर तीन लाख रुपये सहज गोळा होतील. फक्त सांगायचाच अवकाश…”

‘‘ ही गोष्ट तुझ्या वहिनीने जेव्हा सुचवली, तेव्हा दोन्ही मुलं आणि सुना केवढे संतापले… म्हणाले की, तुमच्या उपचारांसाठी तुम्ही अशा प्रकारे वर्गणी गोळा करुन या शहरात, समाजात आमची बदनामी करू बघताहात.”

‘‘ त्यांचं बोलणं सोडून द्या अप्पासाहेब. मी आजच काही सोसायट्यांच्या प्रमुख अधिका-यांची मिटिंग बोलावतो, आणि त्यांच्याशी चर्चा करून आठवड्याभरात तीन लाख रुपये उभे करून दाखवतो.”

‘‘ अरे अजून माझं बोलणं संपलं नाहीये रवी. हे बघ, मी एका दिवसात फक्त तीनच नाही, तर तीस लाख रुपये उभे करु शकतो. फक्त सांगायचाच् अवकाश… कुणीही या घराचे एका तासात तीस लाख रूपये देऊन जाईल… पण…”

‘‘ माफ करा अप्पासाहेब, पण खरं सांगतो, तुमची मुलं इतकी अविचारी असतील यावर माझा विश्वासच बसत नाहीये.”

‘‘ नाही रवी, ते अविचारी नाहीयेत्. पण ते जेवढा विचार करतात, तेवढा विचार आपण आयुष्यात कधीही केला नाही. रात्री तुझ्या वहिनीने दोन्ही मुलांना समोर उभं करून इतकं कठोरपणे काय काय सुनावलं, आणि घर विकून माझ्यावर उपचार करण्याबाबत सांगितलं, तेव्हा सूरज काय म्हणाला माहिती आहे?”

‘‘ काय म्हणाला?”

‘‘ म्हणाला, ‘ येऊन-जाऊन एवढं एक घर तर आहे आपल्याकडे. आता त्याच्यावरही डोळा आहे का तुमचा? बाबांच्या हाताखाली काम करणा-यांकडे लाखोंची संपत्ती आहे आज. पण बाबा?… आयुष्यभर फक्त प्रामाणिकपणा आणि ईमानदारी, यांचेच गोडवे गात राहिले… बाकी काहीच केलं नाही. आज जर बँकेत त्यांचे पाच-दहा लाख रूपये शिल्लक असते, तर उपयोगी नसते पडले का अशावेळी? डॉ. अख्तर यांचं वीस दिवसांचं बील पन्नास हजार झालं होतं… तिथेच आमची पास-बुकं रिकामी झाली. आता घर विकलं तर आपण सगळेच उघड्यावर येऊ.’– हे ऐकून तुझी वहिनी गप्पच झाली. सूरज आणखी असंही म्हणत होता की, ‘ मम्मी तू तुझ्या स्वत:चाही विचार करायला हवास. माझा पगार इतका कमी आहे, की मी माझ्या कुटुंबाचाच खर्च कसा तरी भागवतो आहे. आभाची नोकरी तर पार्टटाईमच आहे… आणि आज आहे… उद्या असेल की नाही सांगता येत नाही. तुम्हा दोघांनाही बहुतेक माहिती नसावं की, या नोकरीसाठी मला कॉलेजच्या मॅनेजमेंटला रोख चाळीस हजार रुपये द्यावे लागले होते…’ सूरजचं समर्थन करणं चालूच होतं, इतक्यात दीपकही बोलायला लागला. ‘ मम्मी, मी बाबांच्या ऑपरेशनबद्दल माझ्या डॉक्टर मित्रांचंही मत घेतलंय. त्यांचं मत असं पडलं की, बाय-पास् जरी केली, तरी ते ऑपरेशन नक्की यशस्वी होईल, असं खात्रीने सांगता येणार नाही. उपचार पद्धती आता खूपच प्रगत झाल्या आहेत असं आपण कितीही ठामपणे म्हणत असलो, तरी आजही ५०% ऑपरेशन्स अयशस्वी ठरताहेत. असं असतांना, हे ऑपरेशन अयशस्वी ठरलं, तर बाबांच्या नशिबात जे घडायचं असेल, ते घडेलच… पण तीन लाख रुपये मात्र उगीचच वाया जातील.’  सूरजने पण दीपकच्या म्हणण्याला दुजोरा दिला. वर असंही म्हणाला की, ‘ जरी ऑपरेशन यशस्वी झालं, तरी बाबा अजून किती वर्षं जगतील?… दोन वर्षं, चार वर्षं… फार फार तर दहा वर्षं. त्यामुळे आता असा विचार करायला पाहिजे की ज्या माणसाने त्रेसष्ठ वर्षं हे जग पाहिलंय्, तो आणखी दहा वर्षं जगला, म्हणून असा काय मोठा फरक पडणार आहे त्याच्या आयुष्यात? मुख्य म्हणजे ऑपरेशननंतर बाबा काही कामही करू शकणार नाहीत. कुठली धावपळ सुद्धा करू शकणार नाहीत. उलट तुलाच एखाद्या लहान मुलासारखी त्यांची सतत काळजी घेत बसावं लागेल. अशा व्यक्ती साठी आज तीन लाख रुपयांवर पाणी सोडणं, हा कोणता शहाणपणा आहे? आमचं तर अजून सगळं आयुष्य बाकी आहे. तेच पैसे आम्हालाच कशासाठी तरी उपयोगी पडतील मम्मी. विचार कर जरा.’… हे सगळं बोलणं मी ऐकलं होतं. म्हणूनच तुझी वहिनी जेव्हा नंतर माझ्या खोलीत आली, तेव्हा तिने काही सांगायच्या आधीच, मी माझा निर्णय तिला सांगून टाकला… ‘ हे बघ… ऑपरेशनचं नुसतं नाव ऐकूनच प्रचंड भीती वाटायला लागली आहे मला. त्यामुळे, मी अजिबात ऑपरेशन करून घेणार नाही… आणि हा माझा ठाम निर्णय आहे. देवाची जशी मर्जी असेल, तसं जाईल माझं पुढचं आयुष्य.’ “

… हे सगळं बोलताना कितीतरी वेळा अप्पासाहेबांच्या पापण्या फडफडत होत्या… आणि तितके वेळा डोळ्यातलं पाणी तिथेच थोपवलं गेलं होतं हे माझ्या नजरेतून सुटलं नव्हतं. विषय बदलायचा म्हणून मी विचारलं…

‘‘ मग वहिनी काय म्हणाल्या? ”

‘‘ काय म्हणणार?… काहीच बोलली नाही. रात्रभर तिची उशी मात्र ओली होत राहिली होती. सकाळी उठून पाहिलं तर काय… तिचा सगळा दिनक्रमच बदलून गेलेला दिसला. तिने किचन आपल्या ताब्यात घेतलं…. देवघरही आधीच स्वच्छ करून ठेवलं होतं. मी दिसताच मला बजावून सांगितलं… “ आजपासून अंघोळ झाली की आधी पूजा करत जा तुम्ही .” तिचं ऐकावं लागलं… आणि आत्ता देवघरात देवासमोर बसून, जीवनाचं हे गणित त्याच्याकडून समजावून घेत होतो… तू मला माफ करशील, अशी आशा करतो मी रवी.”

—अप्पासाहेब दोन्ही हात जोडून माझ्यासमोर उभे आहेत. त्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी एक शब्दही सापडणं अशक्य वाटतंय् मला. गळा इतका दाटून आलाय्… काहीच बोलूही शकत नाहीये मी. उठून त्यांना नमस्कार करत मी माझ्या घरी परत चाललो आहे… विचारात पडलो आहे की नात्यांना आकडे समजून, त्यानुसार मांडलेली फायद्या-तोट्याची गणितं, कुठल्याही पाटीवर मांडली, तरी उत्तरं एकसारखीच तर असणार ना….  

— समाप्त —

मूळ हिंदी  कथा – ‘स्लेट पर उतरते रिश्ते’ –  कथाकार – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆  पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे.!  – लेखक – श्री प्रसाद शिरगांवकर☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

❤️ मनमंजुषेतून ❤️

☆ पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे.!  – लेखक – श्री प्रसाद शिरगांवकर☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित  ☆

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. खिशात भरपूर पैसा असल्यावर आपण आनंदी असण्याची काहीही शाश्वती नसते. पण जवळ पुरेसा पैसा नसला की दुःख ग्यारंटेड असतं !! याची उप-गंमत म्हणजे ‘पुरेसा’ म्हणजे काय हे आयुष्यात कधीही समजत नाही… उप-उप-गंमत अशीये की पुरेसा म्हणजे किती हे ठरवलं आणि तेवढा मिळवलाच तरी तो ‘पुरत’ नाही आणि ‘पुरेसाची’ व्याख्या पुन्हा बदलते ! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. आपल्याला आपल्या शिक्षण, लायकी आणि कष्टांच्या मानानी कमीच मिळतो आहे असं वाटत असतं. आपल्यापेक्षा कमी शिक्षण किंवा लायकी असलेल्या आणि नगण्य कष्ट करणाऱ्यांना खूप जास्त मिळतोय असं वाटत असतं. आपल्याला जो मिळतो तो टिकत नाही, इतरांकडे मात्र टिकतो असं वाटत असतं. आपल्याला बेसिक गरजांनाही पुरत नाही, इतरांकडे अफाट उधळपट्टी करायला असतो असं वाटत असतं. आणि हे असं म्हणजे असंच सगळ्या सगळ्यांनाच वाटत असतं ! इतरांच्या तूलनेत आपला पैसा ही फार म्हणजे फार गंमतशीर गोष्ट आहे !! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. तो एका दरवाज्यानं येतो आणि हजार खिडक्यांवाटे पसार होतो ! आला की खूप छान, भारी, मस्त, बरं वगैरे वाटतं. पण तो नुसताच येऊन थांबल्यानं आणि घरात साचून राहिल्यानं त्यातून काही म्हणजे काही मिळत नाही. म्हणजे आपल्याकडे खूप पैसा आलाय हे भारी वाटलं तरी त्यानं पोटही भरत नाही आणि इतर सुखंही मिळत नाहीत. पोट भरायचं आणि इतर काही मिळवायचं तर त्याला अनंत खिडक्यांमधून बाहेरच जाऊ द्यावं लागतं. पैसा आल्यामुळे मिळणारं सुख मोठं? की खर्चल्यामुळे मिळणारं? हे ठरवता येत नाही, कारण पैसा अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे ! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ‘दैव देतं आणि कर्म नेतं’ ही म्हण पैशाला लागू होत नाही. पैसा कष्ट केल्यानं, म्हणजे ‘कर्मानं’च मिळतो. क्वचित कधी दैवामुळंही मिळू शकतो, लॉटरी वगैरे लागल्यावर, पण तो काही शाश्वत मार्ग नाही. रेग्युलर, नियमित वगैरे पैसा मिळवायचा तर अफाट कष्ट पडतात, ‘कर्म’ करावं लागतं. पण ‘कर्मानं’ मिळालेला पैसा ‘दैवा’मुळे एका क्षणात नाहीसा होऊ शकतो. चोरी म्हणू नका, टॅक्स म्हणू नका, आजारपणं म्हणू नका, अपघात म्हणू नका, भूकंप म्हणू नका… काय वाट्टेल ते ‘दैव’ किंवा योगायोग समोर उभे ठाकतात आणि कर्मानं कमावलेल्या पैशाचं क्षणार्धात होत्याचं नव्हतं होऊ शकतं… ‘कर्म कमावतं अन दैव हिसकावतं’ ही पैशाच्या बाबतीतली म्हण असायला हवी !! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. दुसऱ्याकडून उधार घेतलेला पैसा कधीच लक्षात रहात नाही आणि दुसऱ्याला उधार दिलेला पैसा कधीच विसरला जात नाही !! जे उधारीचं तेच मदतीचं, तेच दान-धर्माचं, तेच खर्चाचं वगैरे. आपल्याला मिळालेलंही आपलंच आणि आपण दिलेलंही आपलंच हे फक्त पैशाच्या बाबतीत घडतं, कारण पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे !! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ज्याच्याकडे नाही त्याला कमवावासा वाटतो. ज्याच्याकडे आहे त्याला अफाट कमवावासा वाटतो आणि ज्याच्याकडे अफाट आहे त्यालाही अजून जास्त अफाट कमवावासा वाटतो. माझ्याकडे आहे तेवढा पुरेसा आहे, मला अजून जास्त पैसा नको, असं कोणी म्हणजे कोणी म्हणत नाही. 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ‘पैशापाशी पैसा जातो!’ जिथे ऑलरेडी खूप पैसा आहे तिथे अजून अजून पैसा जात रहातो. जिथे खूप कमी पैसा आहे तिथून पैसा जमेल तेवढ्या लवकर कल्टी मारत रहातो. 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे . पैसा मिळवण्यासाठी आयुष्यभर आपण खपतो. मग एक दिवस आपण ‘खपल्यावर’, आपण निघून जातो, पैसा इथेच रहातो !! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे.!

लेखक : – प्रसाद शिरगांवकर

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित. 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – यात्रा-संस्मरण ☆ ग्रॅंड कॅनियनला भेट…भाग – 4… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? यात्रा-संस्मरण ?

☆ ग्रॅंड कॅनियनला भेट…भाग – 4… ☆ सौ राधिका भांडारकर

आजची सफरही वैशिष्ट्यपूर्ण होती. Lower Antelope canyon ..

आम्ही अँन्टीलोप कॅन्यन व्हीजीटींग सेंटरपर्यंत फ्लॅगस्टाफहून कारने आलो. जवळ जवळ अडीच तासाचा ड्राईव्ह होता. ही जागा नोवाहा कम्युनिटीच्या राज्यात येते.

अॅन्टीलाॅप  कॅन्यनचे दोन भाग आहेत. खालचा आणि वरचा..

वरचा अँन्टीलाॅप २००मीटर आहे आणि खालचा भाग ४०७ मीटर (१३३७फूट)  पसरलेला आहे.आठ ते साठ मिलीअन वर्षांचे ते आहेत. आम्ही खालच्या अँन्टीलाॅप ला भेट दिली.

व्हीजीटींग सेंटर पासूनच प्रत्यक्ष टूरला सुरवात होते. ज्योतिकाने आधीच टुर बुक केली होती. सेंटरवर तिने  तिचे बुकींग दाखवले.

आमचे तिघांचे बुकींग होते. मात्र जी सेंटरवरची मदतनीस होती ती म्हणाली,। इथे दोघांचच बुकींग दिसतय्” .सायराचे नावच नव्हते.  ज्योतिकाला इंटरनेट मिळत नव्हते. त्यामुळे तिला कंपनीशी संपर्क साधता येत नव्हता. शेवटी तिने सायराचे तिथल्या काउंटरवरच परत तिकीट काढले. आॅनलाईनपेक्षा इथले तिकीट थोडे कमीही होते. टेक्नॉलॉजीचे जसे फायदे तसे तोटेही…असो!

साधारण एक तासाची ही भूगर्भीय सफर होती. आम्हाला दुपारी सव्वा बाराची वेळ मिळाली. इथेही वेळेत एक तासाचा फरक आहे. एक तासाने हा परिसर मागे आहे.

आम्ही तिथल्या गिफ्ट शॉपमध्ये काही खरेदी करण्यात वेळ घालवला.

ही सफर अवघड,साहसी असणार याची कल्पना  होतीच.

संपूर्ण पायी सफर होती. आमच्याबरोबर टुर  गाईड होता.

आम्हाला सफरपूर्वी अनेक सूचना दिल्या गेल्या. कुठल्याही सॅक्स,काठी कॅमेरा बरोबर नेता येणार नव्हत्या.मोबाईलला परवानगी होती. 

आमचा दहा बारा जणांचा गृप होता. काही वृद्ध ही होते.

अमेरिकन, जपानी चायनीज सारेच होते. मी सर्वात ज्येष्ठ असेन. पण ही सारी मंडळी अतिशय सहकार्य देणारी होती.

सर्वांच्या मनांत एकच स्वप्न होतं,या जमीनीच्या  पोटात दडलंय् तरी काय? हे बघण्याचं..

अक्षरश: आम्ही  धरतीच्या उदरात चाललो होतो. अतिशय सरळ अशा शिड्या होत्या.सांभाळून उतरावे लागत होते.

असे सहा टप्पे आम्ही ऊतरलो. सातवा फारच कठिण होता. भूमिकन्या सीतेची मला आठवण झाली. धरतीने तिला जसे कुशीत घेतले तसे ती आम्हालाही घेत होती.

आता आम्ही प्रत्यक्ष कॅन्यनजवळ पोहचलो. आणि जे नजरेला दिसलं ते या दोन डोळ्यात मावणारं नव्हतंच.अरुंद,चढउताराची,वालुकामय अशी पायवाट तुडवत आम्ही त्या भूगर्भातल्या खिंडीत चालत होतो.

कुंभाराने बनवलेल्या मडक्यासारखं ते अनंत आकार घेउन पसरलेलं होतं.  धरतीच्या वर एका बाजूला या कॅन्यनचं उघडं द्वार होतं. तितपर्यंत आम्हाला जायचं होतं.बाहेर येण्याचा रस्ता फक्त तोच होता. आता no come back.

चालायचे. वळसे घेत .बघत बघत. वरुन सूर्यकिरण पाझरत होते. छाया प्रकाशाचा अत्यंत मनोरम खेळ आम्ही पहात होतो. त्या दगडांमध्ये शार्क,ईमो,सी हाॅर्सचे आकार दिसत होते. एक लेडी विथ द विंड नावाचंही शिल्प तयार झालं होतं.तिचा चेहरा आणि तिचे उडणारे केस .हे सगळं आमच्या नजरेसमोर आमचा टूर गाईड आणण्यास मदत करत होता. आणि मग “अय्या! खरंच” “ओह माय गॉड” सारखे  ऊद्गार उत्स्फूर्तपणे बाहेर पडत होते.ज्या वाटेने आम्ही चाललो होतो त्या वाटेवरुन पावसाळ्यात पाण्याचा

प्रचंड लोट वाहतो. सगळी वाळु वाहून जाते.तेव्हां ही सफर बंद ठेवावी लागते.इथे मन्सुन एप्रील ते जुनपर्यंत असतो.

आणि तसंही पावसाचा नेम नसतोच. आमचे भाग्य म्हणून आम्हाला हे पहायला मिळाले. आतमध्ये चालत असताना मधून मधून आम्हाला वाळुतला ओलसरपणा जाणवतही होता.

जवळ जवळ एक दीड तासाने आम्ही धरतीच्या उदरातून बाहेर आलो. सूर्यप्रकाशात आलो. आता आम्ही जमिनीवर होतो.डोक्यावर रणरणतं ऊन होतं. पण हवेत सुखद गारवा होता.

जे पाहिलं,अनुभवलंं ते वर्णनातीत होतं.

निसर्गासमोर माणूस म्हणून जगताना मी फक्त एक कण आहे असेच वाटले.

मनोमन त्या किमयागाराला मनापासून वंदन केले.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संवाद # 107 ☆ लघुकथा – क्या था यह ? ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

डॉ. ऋचा शर्मा

(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में  अवश्य मिली है  किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में  प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है एक विचारणीय लघुकथा ‘क्या था यह ?’। डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को इस लघुकथा रचने  के लिए सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद  # 106 ☆

☆ लघुकथा – क्या था यह ? — ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

अरे !  क्या हो गया है तुझे ? कितने दिनों से अनमयस्क – सा  है ?  चुप्पी क्यों साध ली है तूने। जग में एक तू ही तो है जो पराई पीर समझता है। जाने – अनजाने सबके दुख टटोलता रहता है। क्या मजाल की तेरी नजरों से कोई बच निकले। तू अक्सर बिन आवाज रो पड़ता है और दूसरों को भी रुला देता है। कभी दिल आए तो  बच्चों सा खिलखिला भी उठता है। तू तो कितनों की प्रेरणा  बना और ना जाने  कितनों के हाथों की धधकती मशाल। अरे! चारण कवियों की आवाज बन तूने ही तो राजाओं को युद्ध में विजय दिलवाई। कभी मीरा  के प्रेमी मन की मर्मस्पर्शी आवाज बना, तो कभी वीर सेनानियों के चरणों की धूल। तूने ही सूरदास  के वात्सल्य को मनभावन पदों में पिरो दिया  और  विरहिणी नागमती की पीड़ा को कभी काग, तो कभी भौंरा बन हर स्त्री तक पहुँचाया। समाज में बड़े- बड़े बदलाव,  क्रांति कौन कराता है? तू ही ना!

देख ना, आज  भी कितना कुछ घट रहा है आसपास तेरे। ऐसे में सब अनदेखा कर मुँह सिल लिया है या गांधारी बन बैठा। मैं जानता हूँ तू ना निराश हो सकता है न संवेदनहीन। तूने ही कहा था ना – ‘नर हो ना निराश करो मन को’। तुझे चलना ही होगा, चल उठ, जल्दी कर। मानों किसी ने कस के झिझोंड़ दिया हो उसे। कवि मन हकबकाया  – सा इधर – उधर  देख रहा था। क्या था यह ? अंतर्मन की आवाज या सपना?

©डॉ. ऋचा शर्मा

अध्यक्ष – हिंदी विभाग, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर. – 414001

संपर्क – 122/1 अ, सुखकर्ता कॉलोनी, (रेलवे ब्रिज के पास) कायनेटिक चौक, अहमदनगर (महा.) – 414005

e-mail – [email protected]  मोबाईल – 09370288414.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ लघुकथा – “तू किस मिट्टी की बनी है माँ?” ☆ डॉ कुंवर प्रेमिल ☆

डॉ कुंवर प्रेमिल

(संस्कारधानी जबलपुर के वरिष्ठतम साहित्यकार डॉ कुंवर प्रेमिल जी को  विगत 50 वर्षों  से लघुकथा, कहानी, व्यंग्य में सतत लेखन का अनुभव हैं। अब तक 350 से अधिक लघुकथाएं रचित एवं ग्यारह  पुस्तकें प्रकाशित। 2009 से प्रतिनिधि लघुकथाएं (वार्षिक) का सम्पादन एवं ककुभ पत्रिका का प्रकाशन और सम्पादन।  आपकी लघुकथा ‘पूर्वाभ्यास’ को उत्तर महाराष्ट्र विश्वविद्यालय, जलगांव के द्वितीय वर्ष स्नातक पाठ्यक्रम सत्र 2019-20 में शामिल किया गया है। वरिष्ठतम  साहित्यकारों  की पीढ़ी ने  उम्र के इस पड़ाव पर आने तक जीवन की कई  सामाजिक समस्याओं से स्वयं की पीढ़ी  एवं आने वाली पीढ़ियों को बचाकर वर्तमान तक का लम्बा सफर तय किया है,जो कदाचित उनकी रचनाओं में झलकता है। हम लोग इस पीढ़ी का आशीर्वाद पाकर कृतज्ञ हैं।  आपने लघु कथा को लेकर कई  प्रयोग किये हैं। आज प्रस्तुत है  आपकी एक लघुकथा ‘‘तू किस मिट्टी की बनी है माँ?’’)

☆ लघुकथा – “तू किस मिट्टी की बनी है माँ?” ☆ डॉ. कुंवर प्रेमिल 

“मेरी जुराबें कहां हैं माँ?”

“मेरी गणित की किताब नहीं मिल रही है माँ.”

“मेरा टिफिन लगा दिया न माँ!”

“दूध वाला गेट पर खड़ा है माँ?”

“पापा, कच्छा-बनियान ढूंढ़ रहे हैं माँ.”

“चाय-बिस्कुट कब दोगी माँ?”

“ऑटो आ गया है. हम स्कूल जा रहे हैं. गेट बंद कर देना माँ.”

“आज महरी नहीं आयेगी. इतने सारे बर्तन कैसे मांजोगी माँ?”

“गैस आयी, दरवाज़ा खोलिए न माँ.”

“शाम को मेरे दोस्त आयेंगे, कुछ अच्छा-सा बना दोगी न माँ.”

“दादा-दादी के लिए गरम-गरम चपातियां बना दो न माँ.”

“मां आज स्कूल की फीस चाहिए, फीस के अलावा कुछ अतिरिक्त पैसे भी दे दिया करो न माँ.”

“मां बनिया सामान नहीं देता, पिछली उधारी मांगता है माँ.”

“मां सबकी तीमारदारी करती हो, तुम कभी बीमार नहीं पड़ती क्या माँ?”

“पापा भी तुम्हें कभी-कभी डांटते हैं. फिर मुस्कुरा कैसे लेती हो माँ?”

“मां, तू सोती कब है, उठती कब है, तू किस मिट्टी की बनी है माँ?”

“सारी विपत्तियां झेलने के लिए एक अकेली ही क्‍यों जिंम्मेवारी निभाती हो मां… सिर्फ मेरी ही नहीं, कभी-कभी तो तुम पूरे परिवार की ही बन जाती हो माँ.”

(कथा बिंब, हरिगंधा से साभार)

© डॉ कुँवर प्रेमिल

संपर्क – एम आई जी -8, विजय नगर, जबलपुर – 482 002 मध्यप्रदेश मोबाइल 9301822782

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares
image_print