मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कितीदा नव्याने तुला आठवावे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “कितीदा नव्याने तुला आठवावे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

भूरभूर …भूरभूर पाऊस सुरू झाला. मी लगेच गॅलरीत गेले. समोरच्या घरातली छोटी मुलं बाहेर येऊन 

“येरे येरे पावसा तुला देतो पैसा” म्हणत नाचायला लागली.

पाऊस वाढला. मुलं आत गेली.बराच वेळ पाऊस पडला. अंगणात पाणी  साठलं  होतं .थोड्या वेळाने पाऊस थांबला. मुलं आता काय करतील? कदाचित पावसाच्या साचलेल्या पाण्यात होड्या सोडतील..

“पाऊस आला धो धो

पाणी व्हायलं सो सो सो

पाण्यात बोट सोडली सोडली

हातभर जाऊन बुडली बुडली”

बोट बुडणार हे माहीत असलं तरी बोट सोडायचा मोह होतोच…

माझं मन माझ्या लहानपणात गेलं. त्या मुलांवरून आठवले शाळेचे दिवस.. नवीन रेनकोट घेतलेला. नेमका शाळेत जायच्या आणि यायच्या वेळी पाऊस पडायचाच नाही. कोरडा रेनकोट दप्तरातून न्यायचा आणि परत आणायचा. कंटाळून एके दिवशी रेनकोट घरीच ठेवला .त्या दिवशी शाळा सुटायच्या वेळी धुवांधार पाऊस सुरू झाला. भिजत घरी यायला आवडायचं पण त्यापेक्षा आपण आज नेमका रेनकोट घरी ठेवला याचं दुःख वाटत होतं. तेवढ्यात  शाळेच्या गेटपाशी हातात रेनकोट घेतलेली आई दिसली .. रेनकोट घालून मिरवत घरी येता आलं..

किती  किती आनंद झाला होता..

शाळेतला मराठीचा तास. त्यादिवशी पाऊस खूप जोरात येत होता बाई वर्गात आल्या आल्या म्हणाल्या

“आज आपण फक्त कविता म्हणू” तासभर कवितांनी वर्ग चिंब भिजला. दिवस सुगीचे सुरू झाले, उघड पावसा ऊन पडू दे, ने मजसी ने परत मातृभूमीला ,ऐल तटावर पैल  तटावर एकामागोमागे कविता म्हटल्या….  शेवटी बाईंनी “बाई या पावसान…” हे गाणं म्हटलं .बाईंचा आवाज किती गोड आहे हे तेव्हा कळलं. बाईंचं तेव्हा नुकतंच लग्न झालं होतं .त्या गाण्यातील ..”जीवलग कोठे बाई पडे अडकून नच पडे चैन “..ही ओळ आठवली.. त्यावेळी बाईंनी ते गाणं का म्हटलं.. ते आज  इतक्या वर्षानंतर समजलं.

शाळेनंतर कॉलेजमध्ये प्रवेश केल्यावर वेगळीच दुनिया समोर आली. त्यात पहिल्या ट्रीपचा अनुभव तर  कितीतरी आठवणी देऊन गेला.. लोणावळा ते खंडाळा पायी जायची ट्रीप .वर्गातल्या तरुण मुलांबरोबर बाहेर पडायची आयुष्यातली पहिली वेळ.. गप्पा ,गाणी ,खोड्या आणि वरून पाऊस ..

हळूच कोणीतरी दोघे मागे रेंगाळायचे. हातात हात घालून झाडाखाली उभे राहायचे .खुळ्यासारखा कोणाचा तरी कुणावर जीव जडायचा.. कॉलेज पुरती नाती ..अशा हळव्या पावसात ट्रीपला जी मजा येते ती आयुष्यात परत कधी येत नाही. हुरहुरती मनं घेऊन   ट्रिपहून  परत यायचं असतं… खरं म्हणजे तसं फारसं काही घडलेलं नसतं …पण म्हटलं तर खूप घडलेले  असतं..

कॉलेजच्या त्या रमणीय  जगातून बाहेर यावं लागतं. कॉलेजातले मित्र तेवढ्यापुरतेच असतात . एखाद दुसरा जवळचा होतो इतकंच..

नवरा मात्र दुसराच कोणीतरी होतो. तोही खूप आवडतो .लग्नानंतर वेगळे जग सुरू होतं .हातात हिरव्या बांगड्या आणि गळ्यात काळेमणी आले की गृहिणी  दिसायला होतं.. अल्लडपणा हरवतो.  मंगळवारी मंगळागौरीचा मोठा थाट आईने मांडलेला असतो. सगळी जय्यत तयारी झालेली असते. पूजेला  आठ मुली येणार आहेत. अस आई घोकत असते .त्याच दिवशी धुवांधार पाऊस येतो. मुली  येतात की नाही? पूजा होते की नाही? अशी आईला काळजी असते. पण भर पावसात मुली येतात आईचा जीव भांड्यात पडतो.

“जय देवी मंगळागौरी ” ही आरती म्हणताना आईचा तो नथ घेतलेला सात्विक चेहरा कृतकृत्य झालेला असतो. पाऊस म्हटलं की आईचा तो चेहरा आठवतो…

संसारचक्र पुढे जात राहते. बाकी काही असलं तरी नवऱ्याबरोबर पावसाची मजा मात्र  लुटता येत नाही. तो  बिचारा कर्तव्य तत्पर जबाबदार माणूस असतो. दोघे बाहेर फिरायला जातात. अचानक आभाळ भरून येते. वारा सुटतो.. पाऊस येणार ..असं वाटतं आता पावसात दोघांनी हातात हात घेऊन मस्त भिजत घरी यावं वगैरे रोमँटिक कल्पना आपल्याला सुचायला लागतात .आपलं लक्ष जमिनीवर नसतच …तेवढ्यात नवरा चटकन रिक्षा नाहीतर टॅक्सी थांबवतो .आपण काही न बोलता चढून बसतो.. शाहण्या बाईसारख्या..

बाहेर धो धो पाऊस सुरू असतो अंग जरा ही ओलं न होता भर पावसात आपण कोरडे घरी येतो. पण त्यातही आनंद वाटायला लागतो .कारण आता संसारात मनापासून रमायला झालेलं असतं.

बाहेर पाऊस कोसळायला लागल्यावर नवरा मुलं घराच्या चार भिंतीत सुरक्षित असले की हायसं वाटतं .त्या क्षणी बाहेर पाऊस बघायला जायला वेळ नसतो. सगळ्यांसाठी  खायला काहीतरी  गरम करून देण्यात आनंद असतो. आता आईची जागा आपण घेतलेली असते . 

घराच्या गॅलरीत खुर्चीवर अनेक  पावसाळे पाहिलेले दोन जीव सासू-सासरे बसलेले असतात .गतजीवनाच्या  कितीतरी आठवणी त्यांच्यासोबत असतात. त्यांचीच त्यांना साथ असते.

कधी कधी ते दोघे एकमेकांशी बोलतही नाहीत.  नुसते पावसाकडे बघत बसतात…

पावसाकडे बघतात का अजून काही बघतात कळत नाही…

एक खुर्ची रिकामी झाल्यावर सासूबाईंचा एकटा जीव निःशब्द होऊन जातो. त्यांच्याकडे बघता बघता आपल्या डोळ्यात पाऊस उतरतो.

” पुढचा पावसाळा मी पाहीन असं वाटत नाही “असं म्हणत पावसाकडे बघत बसलेल्या त्या आठवतात.. खरंच पुढच्या पावसाळ्यात दुसरी खुर्ची ही रिकामी होते. गॅलरी उदास सुनी सुनी होऊन जाते..

मनात विचार येतो.. आपलेही बरेच पावसाळे पाहून झाले .अजून किती आहेत कोण जाणे ?

पावसाचे हे असंच आहे .त्याच्याकडे बघताना आठवणींच्या सरी धावून यायला लागतात… भावनांनी भिजवून टाकतात ..डोळे ओलावतात..

पावसाळ्यात कधीतरी असा एखादा दिवस येतो.. खिडकीतून ,गच्चीतून, गॅलरीतून ,दारातून कुठूनही आपण पाऊस बघत असतो. अशावेळी आपण एकटे असलो तर  कुठली तरी आठवण मनात येतेच…

डोळे भरून येतात. मन कातर होतं वेडबागडं होतं .. भूतकाळाचे दरवाजे उघडतात …आणि अनाकलनीय अशा आठवणीत आपण हरवून जातो जरा वेळाने आपणच आपल्याला सावरतो.

म्हणूनच पावसाळ्यात एकदा तरी मनाला असं जरा वेळ भटकू द्यावं..स्वैर सोडावं  आणि त्याचा मनसोक्त आनंद घ्यावा..

काहीही म्हणा पण हिवाळे,उन्हाळे येतात आणि जातात….. हा पावसाळा मात्र आर्त करून जातो….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १० — विभूतियोगः — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १० — विभूतियोगः — (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः । 

नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ॥ ११ ॥

*

अंतःकरणी त्यांच्या वसुनी ज्ञानदीप तेजवितो

अंधकार त्यांचा अज्ञानज मी ज्ञाने नष्ट करितो ॥११॥

अर्जुन उवाच 

परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान्‌ । 

पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम्‌ ॥ १२ ॥ 

*

आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा । 

असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे ॥ १३ ॥

कथित अर्जुन 

परब्रह्म परमधाम परमपावन तुला जाणती

सनातन ऋषी दिव्यपुरुष तव वर्णन करती

अजन्मा तू आदिदेव सर्वव्यापि तुज म्हणती

ब्रह्मर्षि नारद असित देवल महर्षि व्यास सांगती ॥१२,१३॥

*

सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव । 

न हि ते भगवन्व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः ॥ १४ ॥

*

तव लीला  वा तव स्वरूपा  ना जाणत दानव देव

ज्ञान मला जे दिधले ते मज शिरोधार्य केशव ॥१४॥

*

स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम । 

भूतभावन भूतेष देवदेव जगत्पते ॥ १५ ॥

*

तुम्हीच तुम्हा पूर्ण जाणता पुरुषोत्तम देवा

जीवोत्पत्ती तुमचे कार्य जीवेश्वर देवाधिदेवा ॥१५॥

*

वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः ।

याभिर्विभूतिभिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ॥ १६ ॥

*

आत्मविभूती योगे दिव्य सर्व लोक व्यापिले

विशद करणे दिव्य विभूति कार्य मात्र आपले ॥१६॥

*

कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन्‌ । 

केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ॥ १७ ॥

*

चिंतन विद्या  योगेश्वरा करावी मजला कथन 

कैशा भावे निरंतर चिंतन करावे मी भगवन ॥१७॥

*

विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन । 

भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मेऽमृतम्‌ ॥ १८ ॥

*

विभूति तथा योगाचे मज कथन करा पुनरपि

आर्तता मम अतृप्त सतत श्रवण्या अमृतवचन ॥१८॥

श्रीभगवानुवाच 

*

हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः । 

प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ॥ १९ ॥

कथित श्रीभगवान

कथितो तुजला माझ्या दिव्य विभूती प्रमुख

 विस्ताराला माझ्या  पार्था काहीच नसे अंत ॥१९॥

*

अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः । 

अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च ॥ २० ॥

*

आत्मा मी तर भूतांचा सकल त्यांच्या हृदयात

सर्व जीवांचा गुडाकेशा मीच आदी मध्य अंत ॥२०॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “तळ्यातला गणपती” – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “तळ्यातला गणपती” – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

सारसबागेतील गणपती मंदिराला आज २४० वर्षे पूर्ण झाली. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात बांधलेले हे मंदिराला तळ्यातला गणपती या नावाने प्रसिद्ध आहे. सारस बागेतील…. ‘तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’ आहे. 

नामांकित शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे ‘विद्येचे माहेरघर’ मानले जाते. परंतु नवसाला पावणाऱ्या ‘तळ्यातला गणपती’ ने पुणेकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अगदी आत्तापर्यंत हे ठिकाण “तळ्यातला गणपती” याच नावाने ओळखले जायचे. 

पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या या बागेतील गणपती पेशव्यांचे पूजास्थान होते. पुण्याची वाढती पाण्याची गरज पाहून श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी १७५४ साली आंबील ओढ्याच्या प्रवाह बदलून मोठे तळे बांधले. या तलावाचे काम १७५० ते १७५३ या कालावधीपर्यंत चालले होते. त्या तलावाचे क्षेत्र अंदाजे २५ एकर एवढे विस्तीर्ण होते. या तलावाचा उपयोग नौकाविहारासाठी करण्यात येत होता. या तलावात ‘सारस पक्षी’ सोडले होते. तलावाच्या कामाची खोदाई करीत असताना तलावामध्ये अंदाजे २५००० चौरस फुटाचे बेट तयार करून ते मंदिर व बाग – बगीचा तयार करण्याकरिता राखून ठेवण्यात आले. त्या नंतर बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेचे काव्यात्मक ‘सारस बाग’ असे नामकरण केले. 

हैदरअली वर स्वारी करायला जाण्यापूर्वी येथील तळ्यात श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी १७८४ साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली. साहजिकच पर्वती, सारस बाग आणि तलाव ही पुणेकरांची फिरावयास येण्याची व देवदर्शनाची ठिकाणे झाली. 

स्वातंत्र्यपूर्व काळात १८६१ च्या सुमारास शहरातील अनेक जागा पुणे नगरपालिकेकडे देण्यात आल्या. त्यावेळी गणपती मंदिराचे बेट सोडून तलावाची जागा मुंबई सरकारने पुणे नगरपालिकेकडे हस्तांतरित केली. मंदिराची सर्व व्यवस्था देवदेवेश्वर संस्थान पाहते. सारसबाग हे उद्यान व तेथील गणपती पुण्यातील एक महत्त्वाचे पर्यटक आकर्षण आहे.

माहिती संकलक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘अनासायेन मरणं’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘अनासायेन मरणं’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनम्।

देहांते तव सान्निध्यम् , देहि मे परमेश्वर:।।

माझे सासरे रोज पुजा झाल्यावर हा श्लोक म्हणतात. कधीकधी त्यांचा गळासुद्धा भरून येतो हे म्हणताना.

त्यांची पूजेची वेळ आणि माझी स्वयंपाकाची वेळ बहुधा एकच असते. मला पण छान वाटतं. असं वाटतं की माझ्या स्वयंपाकावर अनायासे संस्कार होत आहेत.

पूर्ण पूजा झाल्यावर जेव्हा ते हात जोडून हा आशीर्वाद देवाकडे मागतात, तेव्हा तो क्षण मी माझ्या मनात फार जपून ठेवते.

त्यांची पाठमोरी आकृती, देवाजवळ तेवणारी शांत समई आणि निरांजन, उदबत्तीचा सुवास आणि नुकतेच चंदनाच्या उटीने आणि झेंडूच्या किंवा तत्सम फुलांनी सजलेले माझे छोटेसे देवघर.

शुद्ध अंतःकरणाने देवाला काय मागायचे तर,

अनायासेन मरणं :

मृत्यू तर आहेच पण तो कसा हवा तर अनायासेन – सहज.

विनादैन्येन जीवनं :

जीवन असं असावं जिथे आपण कुणावर अवलंबून नको, उलट कोणाचातरी आसरा बनता यावे.

देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर:

मृत्यूनंतर कोणाचं सानिध्य लाभावे तर ‘हे परमेश्वरा तुझेच’.

पण हे सगळं व्हायला आपलं जीवनक्रमण तसेच झालेले हवे, तरच हे शेवटचे दिवस समाधानाचे जातील.

इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले

गोविन्द नाम लेकर, फिर प्राण तन से निकले

 

हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा

न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा

काय मागणे आहे ना. रोज जर तुमच्या घरात ह्या सगळ्याचा गजर झाला, तर कुठल्या दुसऱ्या संस्कारवर्गाची गरज भासेल का?

परवा एका मैत्रिणीशी गप्पा मारत होते. दोन नवतरुणांच्या आयांची जी ओरड तोच विषय आमचापण होता.

हल्ली संस्कार कमी पडतात. बोलता बोलता ती म्हणाली, “आता काय गं आपली मुलं मोठी झाली. संस्कार वगैरे ह्या सगळ्याच्या पलीकडे, आता ती घडली. आता परिवर्तन होणार नाही.”

मला तेव्हा सांगावंस वाटलं तिला, ‘संस्कार काय १०वी-१२वी किंवा पदवीधर असं नाही गं.

आता १३ वर्षाचा कोर्स पूर्ण झाला, आता काही होणार नाही, असं नसतं.

संस्कार तुमच्या मनाची जडण-घडण आहे. ती एकदा करून चालत नाही, सतत मनाची मशागत करत राहावी लागते. ‘

माझीपण मुलगी आता मोठीच झाली आहे. पण जोपर्यंत ती घरात रोज हे बघेल, ऐकेल, तिच्या मनावर त्याचे संस्कार होतच राहतील.

आज कदाचित त्याचं महत्त्व तिला कळणार नाही. पण जेव्हा ती तिच्या आयुष्याची सुरुवात करेल, आपलं विश्व निर्माण करेल, त्यावेळी ही ‘संस्कार शिदोरी’ तिला उपयोगी पडेल.

देवासमोर हात जोडताना ‘नवस’ बोलण्यापेक्षा ‘दिलेल्या जीवनाबद्दल आभार’ मानणे, ह्यावर विश्वास ठेवणारी आपली संस्कृती. 

आपल्या जीवनाची  ‘जबाबदारी’ जोपर्यंत आपण घेत नाही, तोपर्यंत ‘ती अगाध शक्ती’सुद्धा आपल्याला मदत करणार नाही आणि ज्या क्षणी आपण आपल्या जीवनाची जबाबदारी घेतो त्याक्षणी आपले ‘मागणेच बदलते’.

अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनम्।

देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर:।।

लेखक  :अज्ञात

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # 201 ☆ सुषुम सेतु पर खड़ी… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना सुषुम सेतु पर खड़ी। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – आलेख  # 201 ☆ सुषुम सेतु पर खड़ी

अहम,वहम, सहम, रहम और हम के बीच में उलझा हुआ इंसान सही गलत के बीच अंतर को अनदेखा करता है। सभी का मूल्यांकन एक न एक दिन अवश्य होता है, कोई देखे या न देखे हमें सत्य के मार्ग का चयन करना चाहिए। अपने तय किए गए रास्ते पर चलते हुए मंजिल की ओर जाना आसान होता है। अक्सर देखने में आता है कि बच्चे डिजिटल दुनिया से सब कुछ सीखने का प्रयास करते हैं। यहाँ उन्हें एक क्लिक पर बिना रोकटोक, बिना किचकिच प्रश्नों के उत्तर आसानी से मिलते हैं। पर माता- पिता की सशंकित नजर हमेशा घबराती है। बच्चों के भटकने का डर स्वाभाविक है। लगभग सभी माँ अपने बच्चे से कहती हुई मिलेंगी…

कितनी बार कहा कि इस आकर्षण से निकलो ये तुम्हें कहीं का नहीं छोड़ेगा, इस इंटरनेट की चमक – दमक भरी दुनिया से सिवा धोखे के कुछ नहीं मिलने वाला विनीता ने अपनी बेटी से कहा।

इस पर उसकी बेटी नैना ने कहा माँ ऐसी बात नहीं है। जिस तरह एक सिक्के के दो पहलू होते हैं वैसे ही इस डिजिटल दुनिया से लाभ और हानि दोनों हैं। आज के समय में केवल किताबी ज्ञान से काम चलने वाला नहीं है, हमें समय के साथ तेजी से भागना होगा और उपयोगी व अनुपयोगी वस्तुओं के बीच अंतर भी सीखना होगा।

विनीता ने धीरे से सहमति की मुद्रा में सिर हिलाते हुए कहा वो तो ठीक है बेटा पर माँ का मन है हमेशा इसी चिन्ता में लगा रहता है कि कहीं तुम भटक न जाओ। अच्छी आदतों को सीखने में वक्त लगता है पर बुरी आदतों का मोहजाल ऐसा भयानक होता है कि उसकी गिरफ्त में कोई कब आ जाए कहा नहीं जा सकता।

नैना ने विनीता की आँखों में झाँकते हुए कहा आप की बात एकदम सही है, जब आप मेरे साथ साये की तरह हो तो मुझे घबराने की कोई जरुरत ही नहीं है जहाँ भी ऐसा लगे कि मैं अपने लक्ष्य से भटक रहीं हूँ तो अवश्य टोक दीजियेगा।

हाँ, ये तो है बेटा, जब लक्ष्य निर्धारित हो और उसे पाने के लिए परिश्रम की राह चुन ली गयी हो तो भटकने का खतरा बहुत कम हो जाता है, तथा व्यक्ति अनावश्यक के आकर्षण से भी स्वतः बच जाता है।आज आवश्यकता है सजग रहने की तो जागिए और जगाइए साथ ही डिजिटल दुनिया की ओर कदम से कदम मिलाते हुए आगे बढ़िए।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, chhayasaxena2508@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ लघुकथा – “सरकार के कान में” ☆ डॉ कुंवर प्रेमिल ☆

डॉ कुंवर प्रेमिल

(संस्कारधानी जबलपुर के वरिष्ठतम साहित्यकार डॉ कुंवर प्रेमिल जी को  विगत 50 वर्षों से लघुकथा, कहानी, व्यंग्य में सतत लेखन का अनुभव हैं। क्षितिज लघुकथा रत्न सम्मान 2023 से सम्मानित। अब तक 450 से अधिक लघुकथाएं रचित एवं बारह पुस्तकें प्रकाशित। 2009 से प्रतिनिधि लघुकथाएं  (वार्षिक)  का  सम्पादन  एवं ककुभ पत्रिका का प्रकाशन और सम्पादन। आपने लघु कथा को लेकर कई  प्रयोग किये हैं।  आपकी लघुकथा ‘पूर्वाभ्यास’ को उत्तर महाराष्ट्र विश्वविद्यालय, जलगांव के द्वितीय वर्ष स्नातक पाठ्यक्रम सत्र 2019-20 में शामिल किया गया है। वरिष्ठतम  साहित्यकारों  की पीढ़ी ने  उम्र के इस पड़ाव पर आने तक जीवन की कई  सामाजिक समस्याओं से स्वयं की पीढ़ी  एवं आने वाली पीढ़ियों को बचाकर वर्तमान तक का लम्बा सफर तय किया है, जो कदाचित उनकी रचनाओं में झलकता है। हम लोग इस पीढ़ी का आशीर्वाद पाकर कृतज्ञ हैं। आज प्रस्तुत हैआपकी  एक विचारणीय लघुकथा – “सरकार के कान में“.)

☆ लघुकथा – सरकार के कान में ☆ डॉ कुंवर प्रेमिल 

‘अरे बाबा क्यों इतने जोर शोर से चिल्ला रहे हो?’ कबाड़ी से एक बुजुर्ग ने पूछा.

‘आपके गेट के सामने बोर्ड जो लगा है – गेट के बाहर से चिल्लाएं. कबाड़ी फेरी वालों का अंदर आना मना है.’

‘वह तो ठीक है पर इतने जोर से चिल्लाने के लिए थोड़े ही लिखा है. ससुरे कान बज उठे.’

‘अरे आपके कान कच्चे हैं तो हम का करें. ई सड़क पर तो हम जुलूस बनाकर भी चिल्लाएं तो भी ससुरी ई सरकार के कान में जूं नहीं रेंगती.’

‘एक कान आपके हैं, एक कान सरकार के, दोनों के कान में कितना अंतर है जी-‘ कहकर फेरीवाला आगे बढ़ गया. बुज़ुर्गवार उसे ठगे से खड़े देखते रह गए.

– अप्रैल-जून २०११ छै शब्द से साभार

❤️

© डॉ कुँवर प्रेमिल

संपादक प्रतिनिधि लघुकथाएं

संपर्क – एम आई जी -8, विजय नगर, जबलपुर – 482 002 मध्यप्रदेश मोबाइल 9301822782

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – पात्र ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि –  पात्र  ? ?

(लघु कविता संग्रह – चुप्पियाँ से)

मेरे शब्द

चुराने आये थे वे

चुप्पी की मेरी

अकूत संपदा देखकर

मुँह खुला का खुला

रह गया,

मेरी चुप्पी के

वे भी पात्र हो गए!

© संजय भारद्वाज  

प्रातः 8:07 बजे

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ 💥 श्री हनुमान साधना सम्पन्न हुई। अगली साधना की जानकारी आपको शीघ्र ही दी जाएगी। 💥 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ – Lonesome Heart… – ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.)

We present his awesome poem ~ Lonesome Heart… ~We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji, who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages for sharing this classic poem.  

☆ ~Lonesome Heart…  ~? ☆

O’ Dear! Must you play the

sombre songs of the love now,

The pervading tonality of mood

isn’t in resonance with the life

*

I do agree that I couldn’t make

the land bloomingly prosper

Atleast I removed the thorns,

whichever way I passed by

*

I’ve no regrets for my total

devastation caused by you

I appreciate that atleast you

remained faithful to someone

*

Infact, you are the one who’s truly

responsible for my ruination,

But it’d be much better if someone

else gets blamed to save you

*

Actually, for no rhyme or reason

the heart kept crying desolately

But it made your memory to be the

scapegoat for its forlorn charade!

~ Pravin Raghuvanshi

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ चुभते तीर # 10 – चौथे माले की चाय ☆ डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ ☆

डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’

(डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ एक प्रसिद्ध व्यंग्यकार, बाल साहित्य लेखक, और कवि हैं। उन्होंने तेलंगाना सरकार के लिए प्राथमिक स्कूल, कॉलेज, और विश्वविद्यालय स्तर पर कुल 55 पुस्तकों को लिखने, संपादन करने, और समन्वय करने में महत्वपूर्ण कार्य किया है। उनके ऑनलाइन संपादन में आचार्य रामचंद्र शुक्ला के कामों के ऑनलाइन संस्करणों का संपादन शामिल है। व्यंग्यकार डॉ. सुरेश कुमार मिश्र ने शिक्षक की मौत पर साहित्य आजतक चैनल पर आठ लाख से अधिक पढ़े, देखे और सुने गई प्रसिद्ध व्यंग्यकार के रूप में अपनी पहचान स्थापित की है। तेलंगाना हिंदी अकादमी, तेलंगाना सरकार द्वारा श्रेष्ठ नवयुवा रचनाकार सम्मान, 2021 (तेलंगाना, भारत, के मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव के करकमलों से), व्यंग्य यात्रा रवींद्रनाथ त्यागी सोपान सम्मान (आदरणीय सूर्यबाला जी, प्रेम जनमेजय जी, प्रताप सहगल जी, कमल किशोर गोयनका जी के करकमलों से), साहित्य सृजन सम्मान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के करकमलों से और अन्य कई महत्वपूर्ण प्रतिष्ठात्मक सम्मान प्राप्त हुए हैं। आप प्रत्येक गुरुवार डॉ सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ जी के साप्ताहिक स्तम्भ – चुभते तीर में उनकी अप्रतिम व्यंग्य रचनाओं को आत्मसात कर सकेंगे। इस कड़ी में आज प्रस्तुत है आपकी विचारणीय व्यंग्य रचना चौथे माले की चाय)  

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ चुभते तीर # 10 – चौथे माले की चाय ☆ डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ 

(तेलंगाना साहित्य अकादमी से सम्मानित नवयुवा व्यंग्यकार)

एनईईटी परीक्षा का नाम सुनते ही एक शानदार नाटक का दृश्य आंखों के सामने आ जाता है। ये नाटक नहीं, बल्कि एक महाभारत है, जिसमें हर पात्र अपनी जगह पर एक महत्वपूर्ण भूमिका निभा रहा है। परीक्षा का उद्देश्य है डॉक्टर बनना, पर इसमें डाकुओं की तरह नकल करने वालों का भी हिस्सा है। मेहनत करने वाले बेचारे कौरवों की तरह नक्कलचियों के सामने हार मान लेते हैं।

ग्रेस अंकों का नाटक ग्रेस अंकों की कहानी भी किसी टीवी सीरियल के ट्विस्ट से कम नहीं है। मानो परीक्षार्थियों की मेहनत पर एक तमाचा मारते हुए ये अंक उनके माथे पर लगते हैं। “मेहनत करने वाले तो बेवकूफ होते हैं,” ऐसा नारा लगाने वाले लोग शायद नहीं जानते कि असली ‘ग्रेस’ तो नकल के बहादुरों में होती है। जिनकी किस्मत अच्छी हो, वे ही ग्रेस अंकों के नाटक में अव्वल आते हैं। मेहनत की क्या जरूरत, जब चाय पीते-पीते ग्रेस अंक मिल जाएं।

नकल का रोमांच एनईईटी परीक्षा की नकल के बारे में पूछना, मानो मुहावरों में चाय की पत्ती डालना हो। परीक्षा से पहले की रात को परीक्षार्थी नकल के सुपरहीरो बनने के सपने देखते हैं। इंटरनेट से लेकर कोचिंग सेंटर तक, हर जगह नकल के नए-नए तरीके ढूंढे जाते हैं। आखिर, मेहनत क्यों करें जब नकल करके टॉप किया जा सकता है? परीक्षा हॉल में नकल करते समय दिल की धड़कनें बढ़ जाती हैं, जैसे किसी एक्शन फिल्म का क्लाइमेक्स हो।

एनटीए और चौथे माले की चाय जो लोग नीट परीक्षा की चोरी के बारे में पूछते हैं, उन्हें एनटीए के चौथे माले पर चाय पीने के लिए बुलाया जाता है। एनटीए के अधिकारी, जो चाय की प्याली में सुकून ढूंढते हैं, नकल के सवाल सुनते ही मुस्कुरा देते हैं। वे सोचते हैं, “ये बेचारे भी क्या समझेंगे, मेहनत और नकल का फर्क।” चौथे माले की चाय, जहां नकलचियों के राज़ खुलेआम बताये जाते हैं, मेहनत करने वालों के लिए सिर्फ एक सपना बनकर रह जाती है।

मेहनत और बेवकूफी मेहनत करने वाले तो बेवकूफ होते हैं, यही तो परीक्षा का असली मंत्र है। जो रात-रात भर जागकर पढ़ाई करते हैं, वे समझते नहीं कि मेहनत का फल सिर्फ किताबों में ही मीठा होता है। असल जिंदगी में, नकल करने वाले ही असली हीरो होते हैं। मेहनत की चक्की में पिसने वाले ये समझ नहीं पाते कि परीक्षा बेवकूफों के लिए नहीं, बल्कि नकलचियों के लिए है।

व्यंग्य का पंच इस व्यंग्य में एक ही पंचलाइन है: मेहनत का फल बेशक मीठा हो, पर नकल का स्वाद चौथे माले की चाय से भी ज्यादा लाजवाब होता है। इसलिए, मेहनत करने वालों को चाहिए कि वे भी इस नाटक का हिस्सा बनें और नकल के गुर सीखें। आखिर, जब तक नकल का खेल चलता रहेगा, मेहनत की किताबें सिर्फ अलमारियों में सजी रहेंगी।

तो दोस्तों, अगली बार जब आप एनईईटी परीक्षा के बारे में सोचें, तो मेहनत और नकल के इस महाभारत को जरूर याद रखें। क्योंकि, मेहनत करने वाले तो बेवकूफ होते हैं, और असली खिलाड़ी तो वही हैं जो नकल के खेल में माहिर होते हैं।

© डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’

संपर्क : चरवाणीः +91 73 8657 8657, ई-मेल : drskm786@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 396 ⇒ कीट नियंत्रण – (Pest Control) ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “कीट नियंत्रण – (Pest Control)।)

?अभी अभी # 396 कीट नियंत्रण – (Pest Control) ? श्री प्रदीप शर्मा  ?

तब हमने ना तो स्वच्छ भारत अभियान का नाम सुना था और ना ही पेस्ट कंट्रोल जैसी बीमारी का नाम। शाम होते ही अचानक मोहल्ले में भगदड़ मच जाती, धुंए वाली मशीन आ रही है, खाने का सामान ढांककर रख दो, अपने मुंह पर कपड़ा बांध लो। और थोड़ी ही देर में एक वाहन वातावरण में धुंआ फैलाता गुजर जाता। डीडीटी की बदबू सांसों में भर जाती, आंखों के आगे अंधेरा छा जाता।

तब कहां घर घर कमोड था, खुली नालियां थीं, और घरों में डब्बे वाले शौचालय थे, पीछे गली रहती थी, और इंसान सिर पर मैला ढोता था। तब और अब में जमीन आसमान का अंतर है, लेकिन मक्खी, मच्छर और काक्रोच आज भी अपना अस्तित्व बनाए हुए हैं।।

स्वास्थ्य और हाइजीन के प्रति आम नागरिक और प्रशासन कल की तुलना में आज बहुत अधिक मुस्तैद और जागरूक है, स्वच्छ भारत अभियान अपनी बुलंदियों पर है और घर घर हार्पिक, एसिड, डेटॉल और लायज़ॉल की खुशबू से घर महकता रहता है। मच्छरों के लिए ऑल आउट और काला हिट, काला जादू का काम करता है। फिर भी सावधानी के लिए समय समय पर घरों में पेस्ट कंट्रोल की सलाह दी जाती है।

एक तरह का व्हाइट वाॅश ही तो होता है पेस्ट कंट्रोल। घर के कोने कोने में कीट प्रजाति के प्राणियों को जड़ से खत्म किया जाता है। एक तरह से उनके वंश का नाश किया जाता है। किसे पसंद है उनका मधुर संगीत, और वह भी रात के अंधेरे में।।

बारिश के आते ही, सड़कों पर और मैदानों के ठहरे हुए पानी में मेंढक अपना राग अलापना शुरू कर देते हैं, एक अदबी महफिल शुरू हो जाती है, जो खत्म होने का नाम ही नहीं लेती। लगते होंगे किसी को दूर के ढोल सुहाने, लेकिन इस तरह का गीत जब बज रहा हो, और आपके घर में गायक झींगुर महोदय स्वयं उपस्थित हों, तो आप क्या करेंगे ;

सुनो तो ज़रा, झींगर बोले चीकीमीकी चीकीमीकी रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिए …

भाई साहब, हमसे तो कंट्रोल नहीं होता और हम एक पेस्ट कंट्रोल वाले को फोन लगा ही देते हैं। उधर पेस्ट कंट्रोल वाले आते हैं और इधर कोई परिचित मेहमान फोन द्वारा टपकने की सूचना देते हैं। फोन धर्मपत्नी उठाती है, और उन्हें साफ मना कर देती है, सभी घर में गेस्ट कंट्रोल चल रहा है, आप बाद में पधारिए। भले ही जबान अनजाने में फिसली हो, गेस्ट को नाराज तो होना ही था।

आप पेस्ट कंट्रोल करवाएं, ना करवाएं, लेकिन ये सामान्य सावधानियां तो रख ही सकते हैं ;

खुद करें घर में पेस्ट कंट्रोल

रात को जूठे बरतन सिंक में न छोड़ें. इस से कौकरोच और चींटियों को खाना मिलता है. …

बचे खाने को फ्रिज में रखें. …

डस्टबिन ढकी होनी चाहिए.

कमरे के फर्श को दिन में 1 या 2 बार साबुन के पानी से साफ करें.साबुन के घोल में हमने केंचुए को मरते देखा है।

बाथरूम और किचन की नियमित सफाई करें.

भीगे कपड़ों को बाथरूम में अधिक देर तक न रखें।।

विज्ञान और माइक्रोबायोलॉजी जिन्होंने पढ़ी है, वे जानते हैं, मक्खी जहां बैठती है, वहीं अंडे दे देती है। बरसात में धूप के अभाव में मक्खी हमारे आसपास अधिक घूमती है। हमारे पहले वह कहां कहां आसन जमाकर आई होगी, कौन जानता है।

जब वह मेरी नाक पर बैठती होगी तो वहां भी अवश्य अंडे देती होगी।

जनसंख्या नियंत्रण जब होगा तब होगा, अपने घर और परिवार को स्वस्थ व तंदुरुस्त रखने के लिए अपने स्तर पर कीट नियंत्रण अर्थात् पेस्ट कंट्रोल तो आपको करना ही होगा। इसी बहाने कुछ समय के लिए गेस्ट कंट्रोल भी अपने आप ही हो जाएगा। कृपया मेहमान बुरा ना मानें।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares