(डॉ भावना शुक्ल जी (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान किया है। हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं भावना के दोहे।)
(आदरणीय श्री संतोष नेमा जी कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं.“साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है एक भावप्रवण रचना – उन्हें तसव्वुर हो ना हो मगर। आप श्री संतोष नेमा जी की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)
☆ साहित्यिक स्तम्भ – इंद्रधनुष # 212 ☆
☆ गीत – उन्हें तसव्वुर हो ना हो मगर…☆ श्री संतोष नेमा ☆
☆ दे डाय रिच ! – लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ श्री सुनील देशपांडे☆
(नकोशा मालमत्ता)…
एकीकडे तरुण पिढी स्थावर मालमत्तांपासून दूर चालली आहे, तर दुसरीकडे ज्येष्ठ अजूनही स्थावर मालमत्तामध्ये मनाने गुंतून पडलेले आहेत.
फक्त स्वत:साठीच राहायला घर नव्हे, तर आपल्या मुलांसाठीसुद्धा घरे ज्येष्ठांनी घेऊन ठेवली आहेत.
ज्यांची पुढची पिढी महाराष्ट्राच्याही बाहेर नव्हे तर परराष्ट्रात आहे, अशांसाठीसुद्धा पालकांनी आपल्या आयुष्यातील पै-पै जमवून घरे घेतली आहेत.
त्यांच्यापुढील पिढय़ांना या घरांमध्ये काडीचाही रस नाही. या मालमत्तांकडे बघण्यासाठी वेळ नाही. पुढची पिढी खूप व्यवहारी आहे.
माझे एक अशील वयाच्या पंचाऐंशीव्या वर्षी वारले. पत्नीचे आधीच निधन झाले होते. एक मुलगा लंडनमध्ये आणि दुसरा न्यूझीलंडमध्ये रहातो. त्यांचे त्या देशाचे राष्ट्रीयत्व आहे. दोघांनाही वडिलांनी घेतलेल्या घरामध्ये स्वारस्य नव्हते. वडिलांनी इच्छापत्रानुसार सर्व मालमत्ता दोन्ही मुलांत समप्रमाणात देण्याचे लिहून ठेवले होते. मी इच्छापत्रानुसार व्यवस्थापक होतो. दोन्ही मुलांना सर्व मालमत्ता आपल्या नावावर करून घेण्यास, नंतर विकण्यास वेळ नव्हता. दोघांनी माझ्या नावाने कुलमुखत्यार पत्र (पॉवर ऑफ अॅटर्नी) बनवून दिले. सर्व मालमत्ता विकून येणारे पैसे विशिष्ट खात्यात जमा करून त्यांच्या देशात पाठवण्यास सांगितले.
ज्येष्ठ नागरिक आपल्या वास्तूंमध्ये भावनात्मकदृष्टय़ा गुंतलेले असतात, तशी तरुण पिढी नसते.
एका क्लाएंटने त्यांच्या निवृत्तीपश्चात राहण्यासाठी कोकणात घर बांधले होते. आई-वडिलांच्या पश्चात त्या मालमत्तेच्या सात/बारा उताऱ्यावर नावे लावण्यास मुलांना वेळ नव्हता. खेडय़ात जाऊन सरकारी अधिकाऱ्यांबरोबर कागदपत्रांची पूर्तता करणे कटकटीचे वाटत होते. हे सोपस्कार करून मिळणाऱ्या पशांमध्ये रस नव्हता. कारण त्यांचे उत्पन्न भरपूर होते. म्हणून वडिलांनाच त्यांच्या पश्चात, कोठे आड जागी घर बांधले म्हणून दूषणे देत होते.
आपली पारंपरिक दुसरी गुंतवणूक सोने-नाणे आणि चांदीच्या वस्तूंमध्ये असते. आणि ती सांभाळणे जोखमीचे असल्याने ती बँकेच्या लॉकरमध्ये ठेवली जाते. बँकेत ठेवल्याने त्याचा वापर संपतो आणि लॉकरचे भाडे व लॉकरसाठी द्यावी लागणारी ठेव रक्कम यांनी आपण बँकेला श्रीमंत करत असतो.
आमच्या लहानपणी सोन्याचा भाव अमुक होता. आज तो इतका वाढला, असे आपण म्हणतो. आपण मधली वर्षे मोजत नाही. सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये दीर्घ मुदतीत परतावा फक्त सात टक्के असतो. वस्तू घडणावळ आणि वस्तू मोडताना होणारी घट विचारात घेतल्यास तो अजून कमी होतो.
तसेच होणाऱ्या नफ्यावर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो तो वेगळाच.
सोन्या-चांदीतली गुंतवणूक ही खूपदा भावनात्मक जास्त असते. त्याचा व्यावहारिक विचार केला जात नाही.
मग सोने घेताना शुद्ध सोने घेऊन ठेवण्याऐवजी मुली-सुनांसाठी दागिने किंवा नातवंडांसाठी दागिने या स्वरूपात केली जाते.
खूपदा जुन्या पद्धतीचे दागिने नवीन पिढीस आवडत नाहीत. मग ते मोडून नवीन डिझाइनचे बनविले जातात. यात पुन्हा घट आणि घडणावळ जाते.
आज बाजारांत फेरफटका मारल्यास सर्वात जास्त दुकाने मोबाइलची नंतर सोने-चांदी, कपडेलत्ते, ओषधे, खाण्याचे पदार्थ यांची असतात. त्या तुलनेत वाणसामानाची फार कमी असतात. ज्यात नफा प्रचंड ती दुकाने जास्त. स्वाभाविकपणे त्यात ग्राहकाचा फायदा कमीच होणार.
नवीन पिढी जोखीम नको म्हणून खरे दागिने घालण्यापेक्षा खोटे घालणे पसंत करते. शेवटी खोटे जास्तच चकाकते. 😀
सोन्याची मागणी चीन आणि भारत देशात सर्वात जास्त आहे. इतर देशांत सोने दागिन्यांच्या स्वरूपात फार थोडय़ा प्रमाणात खरेदी केले जाते.
गुंतवणूक म्हणून इतर देशांत सोने शुद्ध स्वरूपात बाळगले जाते. बाजारातील सोन्याच्या भावातील चढ उतारानुसार त्याची खरेदी-विक्री केली जाते.
गुंतवणुकीच्या संकल्पना बदलत चालल्या आहेत. जुन्या योजनांचा परतावा पुढील काळात अजून कमी होण्याची शक्यता आहे. तो वेळीच समजून घ्या व पर्यायी गुंतवणूक योजना निवडणे क्रमप्राप्त ठरेल.
तिसरी भावनात्मक गुंतवणूक मुलांचे उच्चशिक्षण.
मुलांच्या उच्चशिक्षणासाठी आपल्या हौस-मौजेवर काट मारून प्रसंगी कर्ज काढतात. मुलं नोकरीला लागली की ते कर्ज फेडतात. मुलं परदेशात असतील तर हे कर्ज खूपदा आई-वडीलच फेडतात. याच्या पुढे जाऊन काही ज्येष्ठ आपल्या नातवंडांसाठी शिक्षणाची सोय म्हणून आयुर्वमिा पॉलिसी किंवा इतर गुंतवणूक करत असतात.
असेच एका ज्येष्ठ क्लाएंटला गुंतवणूक करताना विचारले,
‘‘काका, मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढले. आता नातवासाठी गुंतवणूक का करता?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस खूप वाढतोय. तेवढीच नातवाच्या शिक्षणासाठी माझी थोडीशी मदत.’’
मी त्यांना म्हटले, ‘‘नातवाच्या शिक्षणासाठी गरज किती रकमेची असेल, याचा अंदाज आहे का? आणि तुमच्या मुलाने नातवाच्या शिक्षणासाठी यापूर्वीच ‘एसआयपी’ गुंतवणूक सुरू केली आहे. ती रक्कम त्याच्या शिक्षणासाठी भरपूर होईल.
नातवाच्या नावाने लाखभर रुपये ठेवण्यापेक्षा तुम्ही दोघे चांगल्या पर्यटनाला जाऊन या.’’
त्यावर ते म्हणाले, ‘‘ही रक्कम नातवाच्या वाढदिवसाची भेट म्हणून आता तरी गुंतवा. नंतरच्या वेळचे नंतर पाहू.’’
आपली मानसिकता कशी आहे. आपल्याला मुलांकडून पसे घ्यायला त्यातसुद्धा लग्न झालेल्या मुलीकडून पसे घ्यायला कमीपणा वाटतो. पण नातवंडांची सोय पाहणे जबाबदारीचे वाटते.
आयुष्यभर मुलांचा विचार केला आणि म्हातारपणी नातवंडांचा विचार करता.
आपले आयुर्मान वाढते आहे. आपले खर्च वाढते आहेत. याचा विचार करा. कायम दुसऱ्यांचा विचार करण्यात स्वत:ची हौस-मौज विसरू नका. आयुष्य स्वत:साठी जगा.
असे म्हणतात की *भारतीय लोक आयुष्यभर गरिबीत (कष्टांत) राहतात आणि पुढल्या पिढीला श्रीमंत करतात..
..”अगं अल्के! तू मला काही विचारू नयेस आणि मी तुला सांगू नये अशी गत झाली आहे बाई अलिकडे माझी… आताच पाहते आहेस ना.. तुझ्या डोळ्यासमोरच त्यांचं काय चाललं आहे ते… अस्सं सारखं दिवसरात्र याचं पिणं चालूचं असतं घरात… जळ्ळा मेला काय तो करोना आला आणि तेव्हापासून माझ्या आयुष्याचं मातेरा करून गेला बघ… त्यावेळेपासून याचं वर्क फ्राॅम होम जे सुरू झालयं ना तेव्हा चोवीस तास त्या लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसतात.. सारखा सारखा दहा दहा मिनिटाला चहाची ऑर्डर सोडत असतात… घर नाही तर कॅन्टीनच करून ठेवलयं त्यांनी.. आणि मला सारखी दावणीला जुंपून ठेवलीय त्यांनी… हक्काची बायको आहे मी त्यांची पण पगारदार मोलकरणीसारखी नाचवत असतात हरकामाला…पूर्वी ऑफिसला जात होते तेव्हा बरं होतं बाई.. आठवड्यातून एकदा सुट्टीच्या वेळेला काय तो पिटृटा पडायचा.. पण आता हा माणूस चौविसतास घरात असतो त्यानं मला अगदी विट आलाय बघ… बाईच्या जातीला थोडा आराम, मनासारखं काही करु म्हटलं तर कसली सोय उरली नाही… हौसमौज तर केव्हाच केराच्या टोपलीत गेली… मगं अती झालं नि हळूहळू आमच्यात तू तू मै मै सुरू झालं…घरं दोघाचं आहे.. जबाबदारी दोघांनी सारखी घेतली पाहिजे असं सगळ्याची समसमान वाटणी करुन घेऊया म्हटलं तर मला म्हणाले , मी इथं असलो तरी ऑफिसात असल्यासारखेच आहे असं समज.. जसा ऑफिसला जात होतो.. उशीराने घरी येत होतो कधी कधी पार्टी करून येत होतो अगदी तसचं वागलं तर मला ऑफिसात काम केल्याचा फिल येईल… त्यावेळी लाॅकडाऊन असल्याने बाहेर जाऊन असले काही थेरं करता येत नव्हती पण जसं लाॅकडाऊन बंद झालं पण ऑफिसने मात्र काॅस्टकटिंगच्या नावाखाली ऑफिसची जागाच विकून टाकली आणि सगळयांनाच वर्क फ्राॅम होम सुरू करायला काय सांगितले… तेव्हा पासून रोजची यांची संध्याकाळ एका पेगने सुरू झाली… आणि हळूहळू हळूहळू आता खंबा पर्यंत पोहचली बघं.. मग कसली शुद्ध राहतेय… रात्रभर पेगवर पेग ढोसणं तोंडी लावायला चणेफुटाणे कधी काही.. आणि मग तर्र झालं कि तसचं लुढकणं.. सकाळी उशिरापर्यंत झोपणं.. हॅंगहोवर झाला कि तोंडाचा पट्टा सुरू करणं कि परत उतारा म्हणून पेग घेणं.. चढत्या क्रमानं वाढतं जातं… तरी बरं घरात आम्ही दोघचं असतो.. मुलबाळं, मोठं कुणी असतं तर शोभायात्राच निघाली असती… अलिकडे या बेसुमार नि बेताल पिण्या पुढे बायको देखील त्यांना ओळखेनाशी होते बऱ्याच वेळेला..कधी कधी अति पिणं झाल्यावर मलाच डोळा मारून सांगतात जानू चल माझ्याघरी… आय लव्ह यू व्हेरी व्हेरी मच… ती घरवाली नुसती कामवाली झालीयं.. तिच्यात तुझ्यासारखा काही चार्म राहिला नाही… असं बरळत असतात… आणि पुढे कुठेतरी सोफ्यावर पडून जातात… असं हे रोजचचं चाललंय बघं… माझा आयुष्याचा तमाशाच झालायं… सुदैव इतकं कि त्यांची नोकरी अजून शाबूत आहे… म्हणून घरं तरी चालतयं.. पण किराणाच्या बिलापेक्षा बाटलीचं बिलं कैकपटीने जास्त येतेयं… बाटल्यांचा हा खच पडतो आठवड्याला… चुकून मागच्या आठवड्यात दोनचार बाटल्या कमी झाल्या असतील नसतील.. तर त्या दिवशी कचरेवाल्यानं विघारलं देखील बाईजी इस हप्ते बाटली बहुत कम दिखती है…साब ने पिना छोड दिया लगता है… अरे ऐसा हमरा नुकसान मत करो भाभी… ‘आता सांग काय म्हणू मी या दुर्देवाला…सगळं ऑनलाईन मिळतं असल्याने बाहेर कुणाला कसलीच शंका येत नाही बघ.. आणि सोसायटीत आता याचंच तेव्हढेच वर्क फ्राॅम होम असल्याने बाकी सगळे ऑफिसला बाहेर जातात…तसं घरीही कुणाचं येणं जाणही नसतचं मुळी..म्हणजे घरी याचचं राज्य..अख्खी सोसायटी यांच्या या सुखी माणसाबद्दल असुयेने बघतात… . आणि त्या शेजारच्या पाजारच्या साळकाया माळकाया तर मला बघून सारखं नाकं मुरडत असतात… काय नशिबं एकेकीचं.. सगळं काही सुपात नि सुखात देतो देव त्यांना नाहीतर आपलं बघा.. मेला हा जन्म नकोसा करून टाकलाय या संसाराने… अगं अल्के तुला सांगते… दिसतं तसं नसतंच मुळीच.. जावं त्याच्या वंशा म्हणजे कळतील त्या यातना… अगं अल्के मला तर बाई घरी कुणाला बोलवायचं म्हटलं तरी अंगावर काटा येतो.. हा माणूस कधी कसा बरळेल काहीही सांगता येत नाही… तरी बरं जास्त पिणं झालं कि यांची जीभ जड होते समोरच्याला त्यांचं बोलणं स्पष्ट कळतं नाही तेच बरं… मला आता त्याची सवय झाली आहे.. त्यामुळे मला सगळं बोलणं कळतं… आता हेच बघ.. इतकं पिणं चाललयं तर मला डोळा मारून सांगतात कि त्या स्विटहार्ट चा मोबाईल नंबर मला देशील काय? म्हणजे तुझा नंबर त्यांना हवा आहे… आता सांग मी हसावं कि रडावं यांच्या पुढे नि माझ्या नशिबापुढे… मला वाटतं तू फार वेळ थांबू नये.. तू आता निघालेलं बरं… माझं कायं रोज मरे त्याला कोण रडे… पण बरं वाटलं बऱ्याच दिवसांनी कोणीतरी माझी आपुलकीने चौकशी केली!…मोहर गळून गेलेल्या वसंत ऋतूतल्या आम्रवृक्षासारखं जिवन झालयं माझं!… कोकिळाच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत विराणी गात बसलेल्या कोकिळेसारखं!. “
(आशाने काकाच्या घरचा दरवाजा खटखटवला, काकीने दरवाजा उघडला, काकीला तिला यावेळी आशा परिस्थितीत पाहून आश्यर्य वाटले.) – इथून पुढे.
काकी –अग, या वेळी.. आणि तूझ्या डोकयातून रक्त येतेय.. आणि जय का रडतोय?
तोपर्यत काका पण बाहेर आले, त्यानी आशाची परिस्थिती पाहिली. त्यांच्या लक्षात आले, घरी मारझोड झाली आहे.
काका –अग तिला आत तर येउदे.
आशा आणि यश आत आले. काकीने तिला पाणी दिले.
काकी –काय झाले ग? मारलं का तुला?
आशा – होय काकी, जावेने काठीने मारले आणि यांनी घरातून बाहेर फेकून दिले. काका, आजची रात्र मला आसरा द्या. उद्या मी विजूआतेकडे जाणार. आजची रात्र मला आसरा द्या.
काका –अग, रहा ना. आसरा कसला? आमची मुलगीच तू.
काकीने दोघांना आत घेतले. चटकन गॅस वर भात ठेवला, दही होतच. दहिभात दोघांना वाढला. कपडे बदलायला दिले.
आशा –काकी, उद्या सकाळच्या गाडीने मी रत्नागिरीला जाते. विजू आतेने मला सांगून ठेवलय, घरात काही त्रास झालं तर आपल्याकडे यायचं. काकी, मला फक्त पन्नास रुपये द्या,S.T तिकिटासाठी.
काकी –काही काळजी करू नकोस. मी इथे राहा पण म्हंटल असत, पण याच गावात राहिलीस तर तूझ्या घरच्यांना कळणार आणि मग मला शिव्या खायला लागणार.
आशा –बरोबर आहें काकी, आणि मला स्वतःच्या पायावर उभ राहायला हवं आणि जयचं पण पुढील आयुष्य आहें, यासाठी रत्नागिरी सारखं शहर हवंच.
त्या रात्री ती आणि जय काकीकडे राहिली, सकाळी लवकर उठून काकांनी दिलेले पाचशे रुपये घेऊन तिने रत्नागिरीला जाणारी बस पकडली.
आशा जयला सोबत घेऊन सकाळच्या गाडीने रत्नागिरीत पोहोचली आणि चालत चालत मधल्या आळीतील विजुआतेच्या घरी आली, विजुआतेचे यजमान जे डॉक्टर होते, ते स्कूटरवर किक मारून दवाखान्यात जाण्यासाठी तयार होते, त्यानी तिला मुलासोबत येताना पाहिले. त्यानी बायकोला हाक मारून सांगितले
” विजू, अग आशा येते आहें जयला घेऊन ‘.
विजआते गडबडीने बाहेर आली. आशा ला पाहून तिला आनंद झाला पण एवढे सकाळीच आलेली पाहून काळजी पण वाटली.
“अग आशु, सकाळीच, ये ये…
विजूआतेला पहाताच आशाच्या गळ्यात कोंडून ठेवलेला हुंदका बाहेर पडला आणि आतेच्या गळ्यात पडली.
“अग अग आशु, काय झालं, तू आत ये पाहू.
तिने तिच्या नवऱ्याला दवाखान्यात जायला सांगितले. आशु आणि जयला घेऊन ती आत आली. प्रथम तिने जयला दूध बिस्किटे दिली आणि आशूला चहा पोहे.
मग आशुने आतेला सर्व हकीकत सांगितली, डोकयावरची खोक दाखवली. आते तिची खोक पाहून हळहळली. आते म्हणाली
“आशु, तू आता आंघोळ कर, जयला आंघोळ घाल, आराम कर. दुपारी हे आले की मग ठरवू काय करायचे ते ‘.
दुपारी डॉक्टर घरी आले, मग सर्वांची जेवणे झाली. आतेने डॉक्टरना आशुची सर्व हकीकत सांगितली. डॉक्टरनी पण आशूला लहानपणा पासून पाहिलेले, तिचे लाड केलेले. तिची अशी अवस्था पाहून त्यांना वाईट वाटले. त्यानी आशूला विचारले.
“आशू, तुला परत त्या घरात जायचे आहें काय? असेल, तर पोलिसांकडे तक्रार करून तुला मानाने घरात प्रवेश मी मिळवून देतो आणि घरातल्या सर्व मंडळींना सक्त सूचना देऊन ‘.
“नाही काका, मला त्या घरात जायचे नाही, नवऱ्याशी संबंध ठेवायचे नाहीत, मला माझ्या पायावर उभे राहायचे आहें, त्यासाठी धंदा, नोकरीं करून जयला मोठं करायचे आहें ‘
“ठीक आहें, तू कष्ट करायची तयारी ठेव, आम्ही तूझ्या पाठीशी आहोत.’
जुलै महिना सुरु होता, डॉक्टरकाकांनी रत्नागिरीच्या फार्मसी कॉलेज मधून D.farm चा फॉर्म आणला आणि आशुचे फार्मसी कॉलेज सुरु झालं. जय आता शेजारच्या बालवाडीत जाऊ लागला होता. विजूआतेचा एकच मुलगा सुनील पुण्यात मेडिकला होता, त्यामुळे रत्नागिरीत आते आणि डॉक्टरकाका दोघेच असायचे. त्यामुळे त्याना पण आशू आणि जय मूळे जाग होती.
आशूकॉलेज मध्ये जाऊ लागली, कॉलेज मधील मूल तिच्यामागून कॉमेंट्स मारत होती, पण कुणाकडेही लक्ष न देता आशूने चिकाटीने फार्मसी कोर्स पुरा केला. काकांचे लक्ष होतेच.
काकांचे मित्र परांजपे डॉक्टर यांचा मुलगा प्रथमेश स्त्री रोग तज्ज्ञ झाला होता आणि रत्नागिरीत हॉस्पिटल काढणार होता. त्याच्या हॉस्पिटलचें काम सुरु होते, त्या हॉस्पिटल मध्ये मेडिकल स्टोअर ची जागा ठेवली होती. डॉक्टरकाकांनी परंजपेना सांगून ती जागा आशू साठी पक्की केली.
दिवाळीत हॉस्पिटलचें उदघाटन झाले आणि त्याच दिवशी डॉक्टरकाका आणि विजआते च्या हस्ते “जय मेडिकल ‘चें उदघाट्न झाले. डॉक्टरकाकांनी स्वतः जामीन राहून आशूला बँक कर्ज मिळवून दिले.
पहिल्या दिवसापासून परांजपे हॉस्पिटलमध्ये गर्दी होऊ लागली आणि त्यामुळे जय मेडिकल मध्ये पण गर्दी होऊ लागली.
हॉस्पिटलच्या आवारात असल्याने तेथल्या नर्सेस आणि इतर स्टाफ तिचा मित्र बनला. त्यामुळे दिवस कसा संपायचा हे तिला कळत नसे. रोज येणारे पेशन्ट औषधं खरेदी करता करता तिला आपल्या घरच्या गोष्टी सांगायचे. औषधं सप्लाय करणारे डिस्ट्रिब्युटर, त्यांचे सेल्समन, मेडिकल रिप्रेझेन्टॅटिव…..
मेडिकल रेप. ची तिला आठवण झाली आणि आशू खुर्चीतून उठली आणि तिच्या बेडरूमला जोडून असलेल्या गॅलरीत आली. तिला शिरीष ची प्रकर्षाने आठवण झाली, कुठे असेल शिरीष? शिरीष गोखले?
मेडिकल सुरु केल्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. आते काकांचा पाठींबा होताच पण परांजपेडॉक्टर मंडळीचा पण होता. तिची संसारातील फारपट त्याना समजली होती. मग डॉ परांजपे यांचे लग्न झाले आणि डॉ समिधा त्या हॉस्पिटल मध्ये आली. समिधा आशुची मैत्रिणच झाली.रिकामा वेळ असेल तेंव्हा समिधा तिच्या मेडिकल मध्ये येउंन बसायची.
आतेकडे येऊन पाच वर्षे झाली होती, या काळात तिच्या सासरच्या मंडळींनी तिची चौकशी पण केली नव्हती.कर्ज फिटले होते, त्यासुमारास रत्नागिरीत प्लॅट सिस्टिम सुरु झाली होती. तिने पण समुद्रा जवळ मोठा प्लॅट बुक केला आणि एका वर्षात ती जय सह तिकडे राहू लागली.
आशुच्या डोळ्यसमोर तो काळ आला. आपण त्या वेळी पस्तीशीच्या होतो. आर्थिक सुबत्तेमुळे आणि सतत चांगल्या लोका मध्ये असल्याने आपण फारच देखण्या दिसत होतो. अचानक शिरीष भेटला.
शिरीष -शिरीष हा एका मोठया औषधं कंपनीचा प्रतिनिधी (M. R), डॉ ना भेटायला रोज किमान सहा सात तरी M.R. यायचे. डॉक्टरना भेटून झाले की ते आपल्या मेडिकल मध्ये येऊन नवीन औषधाची माहिती सांगायचे,ऑर्डर्स घयायचे. शिरीष पण त्यातलाच. तो कोल्हापूर मधून यायचा. दर महिन्याच्या बारा किंवा तेरा तारिखला तो रत्नागिरीत असायचा. त्याच्या व्यक्तिमत्वत काही तरी जादू होती, तो डॉ कॉल ला आला की हॉस्पिटल मधील नर्सेस पण उत्तेजित व्हायच्या, त्यांच्यात नेत्र पल्लवी सुरु व्हायची, डॉ कॉल नंतर तो आपल्या मेडिकल मध्ये यायचा. आत येता येता
“मॅडम, चहा मागवा ‘अस ओरडत यायचा. मी पण पुष्पाला चहा आणायला पाठवायची, तेव्हड्यात माझ्या खुर्ची समोर टेबल घेऊन तो माझ्या डोळ्यात बघत बोलायचा.
“मॅडम, या ड्रेस मध्ये छानदिसताय, आज तुमचा नवरा खूष असणार..’
मी काही बोलण्याचा प्रयत्न करणार तोच तो ऑर्डर बुक काढायचा आणि पेन उघडून ऑर्डर्स साठी वाट पाहायचा. इतरांना कंजुषीने ऑर्डर्स देणारी मी शिरीषला मात्र मोट्ठी ऑर्डर्स दयायचे. मग चहा घेऊन तो निघायचा. निघताना म्हणायचं ” मॅडम,आता पुढील बारा तारीख ‘.
पुढची बारा तारीख कुठली मी दुसऱ्यादिवशी पासून त्याची वाट पहायचे. रोज कॅलेंडर कडे पहात उसासे सोडायचे. मग दहा तारीख.. मग अकरा… मग बारा.. आणि ती मस्त कपड्यात अकराच्या सुमारास यायचा.. माझं मन म्हणायचे, याच लग्न झाले असणार.. याची बायको यांच्यासारखीच सुंदर असेल… किती नशीबवान ती… मग माझी परिस्थिती मला जाणवायची आणि मी उसासे सोडायची.
डिसेंबर महिना आला, मी बारा तारीखची वाट पहात होते, बारा तारिखला छाती धडधडत होती.. शिरीष अकरा वाजता येईल..
पण दुपारचे दोन वाजले तरी तो आला नाही.. दुसऱ्या दिवशी नाही… तिसऱ्या दिवशी नाही. माझ्याकडे to पर्यत लँड लाईन आला होता पण शिरीषचा नंबर कुठे माहित होता?
पंचवीस तारीख पर्यत वाट पाहून शेवटी कोल्हापूर मधून आलेल्या दुसऱ्या कंपनीच्या M. R. कडे मी त्याची चौकशी केली.
☆ कल खेल में हम हो न हो — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
मॉर्निंग वॉक ला गेलो होतो, तळ्याला चार फेऱ्या मारल्यावर बसलो, तेवढ्यात बाजूनी आवाज आला.“काय रे मन्या, आज कवळी विसरलास का रे!”
खणखणीत आवाजातले हे वाक्य ऐकलं आणि गर्रकन मान वळवली. तळ्याच्या काठावर आठ दहा, सत्तर ऐंशीच्या घरातले तरुण बसलेले, आणि बरमुडा आणि टी शर्ट घालून येणाऱ्या मन्याकडे बघून फिदीफिदी हसत होते.
मन्या त्यांना म्हणाला, ” हसा लेको, ज्याची जळते त्यालाच कळते, यु एस ला गेलो होतो, येताना कवळीच विसरलो, पाठवलीय मुलानं कुरियरनी पण अजून आली नाहीये. तीन दिवस झाले पेज खातोय. तुम्हालाकाय होतंय खोटे दात काढायला.”
तेवढ्यात एक लेंगा आणि सदरा घातलेले आजोबा उठले आणि लटक्या रागानं म्हणाले, ” खोटे दात काय रे, हे बघ” म्हणत बोळक उघडलं, तर टेडी बिअर सारखे दोन दात लुकलुकत होते, बाकी सगळं वाळवंट!
“दात दोनच असले तरी कडक बंदीचा लाडू खातो अजून.”
“खातोस की चघळतोस रे”
ख्या ख्या, करून सगळे हसले.
“नान्या चघळतोस तू लेका. काल घरी जाताना चार शेंगदाणे तोंडात टाकलेस, ते संध्याकाळी देवळात आलास तरी चघळतंच होतास. ह्ये ह्ये ह्ये.
“हाट, ते साखर फुटाणे होते देवळातले !”
असे मस्त संवाद चालू होते.
मग नादच लागला मला रोज त्यांच्या गप्पा ऐकण्याचा.
जवळपास पाच सहा महिने झाले असतील मला त्यांच्या गप्पा ऐकता ऐकता. पण कधी कोणाची कुरबुर ऐकली नाही.
फक्त नोटबंदी झाली त्यावेळेस, नाना तावातावाने, भांडले होते.
“शिंच्या त्या मोदिने माझं पितळ उघडे पाडलन, बायको पासून लपवून ठेवलेले दोन हजार रुपये काढायला लाविलें हो ”
“मॅग, लापवायचे कशाला म्हणतो मी! मी बघ निघताना बायको पुढे रोज भिक्षांदेही करतो, ठेवते २०/२५ रुपये हातावर, तेवढीच आपली विडी काडीची सोय! काय?
एक दिवस अचानक सगळा च्या सगळा ग्रुप गैरहजर!
त्यानंतर माझ्या कामामुळे मला दोन तीन दिवस जमलं नाही, चौथ्या दिवशी गेलो तर सगळे हजर!
त्यातल्या तात्यांना विचारलं, “काय हो परवा कोणीच आला नाहीत?”
तर थेट अंतु बर्व्या स्टाईल उत्तर नानांनी दिले.
“अरे, मन्याची ट्रान्सफर झाली ना! त्यालाच सोडायला गेलो होतो”
“कुठे??”
अरे कुठे म्हणून काय विचारतोस, स्वर्गात! ”
त्याच्या महायात्रेला गेलो होतो सगळे!”
“काही म्हणा मन्या भाग्यवान हो! लेक अमेरिकेतून येतो काय, हाटीलात जाऊन पार्टी करतात काय, घरी येऊन झोपतो काय, आणि मुलगा उठवायला गेला तर हा मन्या केव्हाच गेलेला, स्वर्गाचं दार वाजवायला, रंभेच्या मागं!”
बाकी सगळे खिन्नपणे हसले.
मी म्हंटलं, ” तात्या इतकं लाईटली घेताय?”
“अरे तू, आता आलास, आधी आम्ही सव्व्हीस जणं होतो, आता बाराच उरलोय! तेही ऐशी नव्वदीचे! विकेटी पडायच्याच रे. आणि म्हणून रडायचं कशाला, दोन दिवस दुःख वाटतं, पण जन पळभर म्हणतील हाय हाय म्हणून सोडून आपलं रुटीन चालू करायचं!”
एकदम काहीसं आठवून मला म्हणाले,” तू केटरिंग करतोस ना रे! तुझा नंबर दे, मन्याच्या मुलाला देतो, तेराव्याची ऑर्डर देईल तुला!”
मी डोक्याला हात लावला, ते बघून अजून एक आजोबा म्हणाले,” अरे आपल्या सगळ्यांच्याच मुलांना देऊया याचा नंबर, वर्षभरात अजून दोन चार तरी विकेट पडणार!” ख्या ख्या ख्या!
दोन दिवसांनी मी जरा घाईत होतो, तेवढ्यात तात्यांनी हाक मारली,” ओ केटरर जरा इकडे या,आज संध्याकाळची ऑर्डर घेणार का पार्टीची!”
“पार्टी?”
“अरे नान्याच्या सेंच्युरी ला फक्त अकरा वर्ष उरलीत!”
माझा प्रश्नार्थक चेहरा बघून मला म्हणाले,” एवढा कसा बावळट रे, आज नान्याचा एकूणनव्वदावा प्रकटदिन आहे,
फार काही नको, मस्तपैकी लुसलुशीत उपमा, आणि चहा, बारा प्लेट”
“बास एवढंच ना? दिलं!”
“आणि हो, कडक बुंदीचे पाच लाडू! आज बघतोच कसा खातो ते,
आणि हो! उपमा जास्त तिखट नको हो, हिरड्या झोंबतात नंतर, आणि त्यात उडदाची डाळ बिलकुल नको, कवळी खाली जाऊन बसते, मग जीव जातो काढताना!”
संध्याकाळी ऑर्डर द्यायला गेलो आणि चकित झालो, सगळे थट्टा मस्करी करीत बसले होते. मन्याच्या फोटो समोर काही चाफ्याची फुलं होती, आणि मोठमोठ्यांदा गाणं चालू होतं.
“जिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या हो किसने जाना!”
मला बघून सगळे थांबले, तात्या पुढे झाले, उपम्याची मुद एकेका बशीत वाढून घेतली, चहा कपांत ओतला, सगळे उभे राहिले आणि “लॉंग लिव्ह नान्या, थ्री चिअर्स फॉर नाना, हिप हिप हुरर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे! करत चहाचे कप, एकमेकांवर आदळून पुन्हा दुसरं गाणं सुरू!
मी काहीश्या संभ्रमावस्थेत घरी आलो आणि विचार करू लागलो, आज आपण आपल्या कट्ट्यावर भेटतो, पण आपल्या आयुष्याच्या तिन्हीसांजेला असेच हसतमुख, इतकेच जिंदादिल असू का? ह्या म्हाताऱ्यांइतकीच तरुणाई आपल्यात असेल??
असायलाच हवी!
आणि एकदम त्यांच्या पार्टीतलं मी निघतानाचं गाणं ओठावर आलं,
साहित्य संघ मंदिरात ‘नटसम्राट’ चा प्रयोग सुरू होता. आयुष्याचा अखेरचा काळ व्यतीत करणारे, थकलेले, खालावलेले नटश्रेष्ठ नानासाहेब फाटक तेथे आले. तात्यासाहेब शिरवाडकरांना त्यांनी विचारले…
“ डॉ.लागू कुठे आहेत?मला त्यांना सांगायचं…”
“काय”?
” हे नाटक माझे आहे “
आणि हो..खरोखरच हे नाटक त्यांचे होते. कारण अगदी मागच्याच वर्षीची गोष्ट. नानासाहेब फाटक वि.वा शिरवाडकरांना म्हणाले होते..
” आमच्या सारख्या जुन्या नटांना मानवेल असे एखादे नाटक तुम्ही लिहायला हवे “
त्यांनी ‘किंग लिअर’ चे नावही सुचवले होते आणि मग तात्यासाहेबांना जाणवले.. नानासाहेबांसारख्या नटश्रेष्ठांवरच नाटक लिहायला हवे.
तात्यासाहेब म्हणतात…
नानासाहेबांसारखा एक महान म्हातारा नट माझ्या मनात उभा रहात होता.. आणि किंगलिअर चे नायकत्व स्वतःसाठी मागत होता.
त्याचवेळी साहित्य संघात काही नेहमीचीच मंडळी वाद घालत होती.शंकरराव घाणेकर उच्च स्वरात म्हणाले…
” बस्स.. वाद कशाला? तुम्हा नवीन नटांचे सम्राट दाजी भाटवडेकर.. आणि आम्हा जुन्या नटांचे नटसम्राट.. नानासाहेब.”
आणि त्याचवेळी नाटकाचे नाव ठरले. वास्तविक तात्यासाहेबांना नाटकाचे नाव शोधण्यात नेहमीच तकलीफ होत असे. हे असे पहिलेच नाटक की ते लिहिण्यास घेण्यापूर्वी त्यांना त्याचे नाव सापडले.
तात्यासाहेबांनी नाटक लिहायला घेतले. पहिल्या अंकांचे वाचन ‘गोवा हिंदू असोसिएशन’ च्या कार्यकर्त्यांपुढे झाले. मुख्य भुमिका डॉ.श्रीराम लागू आणि शांता जोग यांनी करायचे ठरले.
डॉ.लागू यांनी नाटक वाचायला घेतले.. आणि पहिल्या पाच दहा पानात त्यांना त्याचे वेगळेपण जाणवु लागले. ते म्हणतात….
” पहिल्या अंकातील सुरुवातीचा तो अप्पासाहेबांचा प्रवेश.. निवृत्त झालेला तो वृध्द नटसम्राट.. हजारो प्रेक्षकांसमोर उभा राहुन आपले भरुन आलेले मन अगदी मोकळेपणाने, भाबडेपणाने पण मोठ्या सकस आणि काव्यमय भाषेत रिकामे करतो आहे. नाजूक, सुगंधी फुलांचा सतत वर्षाव व्हावा तसे सारे प्रेक्षक त्या मनोगताच्या आनंदात, कारुण्यात,रागलोभात आणि प्रेमात न्हाऊन चिंब होताहेत असे लोभसवाणे द्रुष्य मी चांगले अर्धा पाऊण तास सर्वांगाने बघत होतो.”
या नाटकाच्या मानधनाबाबत डॉ.लागू यांना विचारले गेले तेव्हा त्यांनी निरोप पाठवला..
‘ शून्य रुपयापासुन..सव्वाशे रुपयापर्यंत कितीही.पण मला हे नाटक करायचेच आहे.’ (त्यावेळी डॉक्टर एका प्रयोगाचे सव्वाशे रुपये घेत)
दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर यांना नागपूर येथील नोकरीतून फक्त महीनाभराची सवड मिळणार होती. पण ते येण्यापूर्वीच डॉ.लागुंनी मनातच तालीम करण्यास सुरुवात केली जवळजवळ संपूर्ण संहिता तालीम सुरू होण्यापूर्वीच त्यांनी पाठ केली.
नागपुराहुन दारव्हेकर मास्तर आले आणि नाटकाच्या तालमी सुरु झाल्या आणि एक दोन मुद्द्यावरून वाद सुरू झाले बऱ्याच जणांचे म्हणणे होते.. सुरुवातीचे जे अप्पांचे भाषण आहे, ते फार लांब आहे. ते कमी केले पाहिजे पण डॉ.लागुंनी ठामपणे विरोध दर्शविला. शेवटी असे ठरले की.. प्रत्यक्ष प्रयोगात ते कसे वाटते ते बघू .. प्रेक्षकांना कंटाळवाणे वाटले तर थोडा भाग कमी करु.
दुसरा वाद होता.. तिसऱ्या अंकातील जंगलातील प्रसंगाचा.दारव्हेकरांना तो अजिबात आवडला नव्हता.
“कुणी घर देता का घर..”
आणि..”जंगलातील जनावरं मोकाट सुटली आहेत..”
पण याही वेळी डॉ.लागूंनी तो भाग हट्टाने नाटकात ठेवायला भाग पाडले.
नाटकाचा पहिला प्रयोग २३ डिसेबल १९७० ला बिर्ला मातोश्री सभागृहात झाला.रंगमंदिर जाणकार प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. नाटकाचा पडदा वर उचलल्यापासुन शेवटपर्यंत नाटक रंगत गेले. प्रयोग सुरेख झाला, आणि…
दुसऱ्याच मिनीटाला विठोबाचे काम करणारे नट..बाबुराव सावंत अचानक कोसळले.. बेशुद्ध झाले लगेचच त्यांना जवळीक बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.. पण तासादोन तासात त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
खरंतर पहिल्या अंकानंतरच बाबुरावांच्या छातीत दुखु लागले होते..घाम येत होता.अधुनमधून झोपून रहात.. गोळ्या घेतला ते कसेबसे काम करत होते.तिसऱ्या अंकातील शेवटच्या प्रवेशात ते म्हणाले देखील.. मी स्टेजवर गेलो नाही तर चालणार नाही का?
पण नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगात अशी परवानगी कोण देणार?
शेवटचा प्रवेश संपेपर्यंत त्यांनी मृत्युला थोपवून धरले आणि मग मात्र त्यापुढे शरणागती पत्करली.
सुरुवातीला नाटकाला प्रेक्षकांचा प्रतिसाद फारसा नव्हता. पण हळूहळू प्रत्येक प्रयोग हाऊसफुल्ल होऊ लागला.
दिल्लीतील एका प्रयोगाच्या वेळी दुसऱ्या अंकानंतर अचानक पं.रवीशंकर पडद्यामागे आले आणि त्यांनी डॉ.लागूंना मिठीच मारली. गदगदल्या स्वरात ते म्हणाले..”you are killing me”
डॉ. श्रीराम लागू म्हणतात..
“या नाटकाने मला खूप काही भरभरून दिले माझ्या लायकीपेक्षा खुपच जास्त दिले माझ्या फाटक्या झोळीला ते सारे पेलले की नाही.. माहीत नाही. मराठी नाट्यरसिकांच्या मानसात,कोपऱ्यात का होईना, एक पाट बसायला दिला आणि कलावंत म्हणून आत्माविष्काराला एक विस्तीर्ण, मुक्त आनंदाने भरलेले अंगण दिले .. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे माझी जीवनाची जण अधिक विस्तीर्ण करणारा सखोल संस्कार दिला. भाषेचे सौंदर्य, तिची अफाट ताकद, शब्दाशब्दाला फुटणारे आशयाचे धुमारे आणि ह्या साऱ्यांनी जीवनाला मिळणारा भरभक्कम आधार दिला.’नटसम्राट’ करण्याच्या आधीचा मी जो होतो त्यापेक्षा नंतरचा मी अधिक बरा ‘माणूस’ झालो.एका नाटकाने माणसाला यापेक्षा जास्त काय द्यावे?कलावंताचे आपण जन्मभर ऋणी रहायचे ते याकरिताच.”
आणि म्हणूनच मराठी नाट्यस्रुष्टीत ‘नटसम्राट’ चे स्थान अत्युच्च आणि अतुलनीय आहे पाश्चात्य रंगभूमीवर प्रत्येक नटाचे अंतिम स्वप्न हे ‘हँम्लेट’ ची भुमिका करण्याचे असते. त्याचप्रमाणे मराठी रंगभूमीवरील नटाचे स्वप्न ‘नटसम्राट’;ची भुमिका करण्याचे असते डॉ.लागु यांच्यानंतर दत्ता भट,सतिष दुभाषी पासून अगदी अलीकडे मोहन जोशींपर्यंत प्रत्येकाने ही भूमिका पेलण्याचे शिवधनुष्य उचलले आहे
‘नटसम्राट’ हे नाटक आता केवळ वि.वा.शिरवाडकरांचे राहिले नाही.. तर अवघ्या मराठी जनांचे झाले आहे ज्याप्रमाणे नानासाहेब फाटक म्हणाले होते..
“हे नाटक माझे आहे”
त्याचप्रमाणे प्रत्येक मराठी माणुस, मग तो कलावंत असो की रसिक.. नेहमीच म्हणत राहील…