मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 153 ☆ मज आवडे एकांत… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 153 ? 

☆ मज आवडे एकांत… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

(अष्टअक्षरी…)

मज आवडे एकांत

नको वाटतो लोकांत

वेळ पुरेसा मिळता

होई जप भगवंत.!!

मज आवडे एकांत

कृष्ण देव आठवतो

रूप त्याचे मनोहर

मनी माझ्या साठवतो.!!

मज आवडे एकांत

क्षण माझा मी जोपासे

धूर्त ह्या जगाची कधी

भूल पडे त्याच मिसे.!!

मज आवडे एकांत

शब्दाचे डाव मांडतो

नको कुणा व्यर्थ बोल

मीच मला आवरतो.!!

मज आवडे एकांत

राज हे उक्त करतो

शब्द अंतरीचे माझे

प्रभू कृपेने लिहितो.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माझे मृत्युपत्र… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ माझे मृत्युपत्र… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆ माझे मृत्युपत्र… स्व. वि. दा. सावरकर ☆

[३]

हे मातृभूमी! तुजला मन वाहियेले

वक्तृत्व, वाग्विभवही तुज अर्पियेले

तुतेंचि अर्पिली नवी कविता रसाला

लेखाप्रती विषय तूंचि अनन्य झाला

त्वत्स्थंडिली ढकलले प्रिय मित्रसंघा

केले स्वयें दहन यौवन-देह-भोगां

त्वत्कार्य नैतिक सुसंमत सर्व देवा

त्वत्सेवनीच गमली रघुवीर सेवा

त्वत्स्थंडिली ढकलिली गृहवित्तमत्ता

दावानलात वहिनी नवपुत्रकांता

त्वत्स्थंडिली अतुल-धैर्य वरिष्ठ बंधु

केला हवी परम कारुण पुण्यसिंधु

त्वत्स्थंडिलावरि बळी प्रिय बाल झाला

त्वत्स्थंडिली बघ अतां मम देह ठेला

हे काय, बंधु असतो जरि सात आम्ही

त्वत्स्थंडिलीच असते दिधले बळी मी

संतान या भरतभूमिस तीस कोटी

जे मातृभक्ती-रत सज्जन धन्य होती

हे आपुले कुलहि त्यांमधि ईश्वरांश

निर्वंश होउनि ठरेल अखंड वंश

[४]

कीं तें ठरो अथवा न ठरो परंतु

हे मातृभू, अम्हि असो परिपूर्ण हेतु

दीप्तानलात निज-मातृ-विमोचनार्थ

हा स्वार्थ जाळुनि अम्हि ठरलो कृतार्थ

ऐसें विवंचुनि अहो वहिनी! व्रतातें

पाळोनि वर्धन करा कुल-दिव्यतेतें

श्रीपार्वती तप करी हिमपर्वतीं ती

की विस्तवांत हसल्या बहु राजपूती

तें भारतीय अबला-बलतेज कांही

अद्यापि या भरतभूमिंत लुप्त नाही

हे सिद्ध होइल असेंचि उदार उग्र

वीरांगने, तव सुवर्तन हो समग्र

माझा निरोप तुज येथुनि हाच देवी

हा वत्स वत्सल तुझ्या पदिं शीर्ष ठेवी

सप्रेम अर्पण असो प्रणती तुम्हांते

आलिंगन प्रियकरा मम अंगनेते

कीं घेतले व्रत न हें अम्हि अंधतेने

लब्ध-प्रकाश इतिहास-निसर्ग-मानें

जे दिव्य, दाहक म्हणुनि असावयाचे

बुध्याचि वाण धरिलें करि हे सतीचें

कवी वि दा सावरकर

(शब्दार्थ – स्थंडिल = यज्ञ, होम इ. करिता केलेला एक हात चौरस व चार अंगुळे उंचीचा मातीचा ओटा, यज्ञपात्र, अंगुळ = बोटाच्या रूंदीचे माप)

रसग्रहण

नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांच्या हत्येच्या प्रकरणातील सहआरोपी म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांना १९१० च्या मार्चमध्ये लंडन येथे अटक करण्यात आली. तेथील ब्रिक्स्टन जेलमध्ये असतांना ही कविता सावरकरांनी आपल्या वहिनींना, अंतिम निरोप म्हणून पाठविली होती.

‘विश्वात आजवरी शाश्वत  काय झाले’ या कवितेप्रमाणे ही कविता देखिल ‘वसंततिलका’ या अक्षरगणवृत्तांत निबद्ध आहे. या वृत्ताविषयीची माहिती त्या अंकात आलेली असल्यामुळे द्विरुक्ती टाळून आपण अर्थाकडे वळुया.

या कवितेचे चार भाग असून, ती जवळपास ९५/९६ ओळींची आहे. त्यामुळे आपण त्यातला फक्त तिसरा व चौथा भाग पहाणार आहोत. तथापि पहिल्या दोन भागांचा गोषवारा माहितीसाठी देत आहे.

पहिल्या भागांत कवी आपल्या घराचे वर्णन करून तिथे आजूबाजूचे तरूण, तरुणी कसे जमायचे, वहिनी त्यांना सुग्रास  स्वयंपाक करून कशी जेवायला, खायला द्यायची व नंतर अंगणात बसून पारतंत्र्य, अन्याय, जागतिक  घडामोडी यावर कशी चर्चा व्हायची,  मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी काय केले पाहिजे याविषयी जमलेल्या तरूणांना मार्गदर्शन कसे केले जायचे, वीररसपूर्ण अशा कविता म्हटल्या जायच्या वगैरे गोष्टींचा उल्लेख आहे.

दुसर्‍या भागात आपण केलेल्या प्रयत्नांना केवळ आठ वर्षांतच यश येत असल्याचे पाहून कवी आनंदित आहेत. दीनपणा सोडलेले व वीरश्रीचा संचार झालेले देशातील युवक, युवती स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी सज्ज आहेत. या धगधगत्या यज्ञकुंडात पहिलं बलिदान देण्यासाठी श्रीरामांनी आमंत्रण  दिलेलं असताना, हा बहुमान आपल्या कुटुंबाला मिळावा, ही किती अभिमानाची गोष्ट आहे. ज्या आणाभाका आम्ही घेतल्या, त्याप्रमाणे प्रत्यक्ष वर्तन करून आम्ही कृतार्थ  झालो आहोत. असे वीरश्रीपूर्ण निवेदन करून, सावरकर आपल्या वहिनींनी धैर्यानें अशा प्रसंगांना सामोरं जावं, यासाठी त्याचं मनोबल उंचावत आहेत. ते आठवण करून देतात की आपण हे धगधगते सतीचे वाण, आंधळेपणांने किंवा क्षणिक उत्तेजनाने नाही, तर जाणून बुजून, समजून उमजून हाती घेतले आहे.

तिसऱ्या भागात ते म्हणतात की, मातृभूमीलाच मी माझं मन वाहिले आहे. माझं सारं वक्तृत्व, वाङ्मय तिलाच अर्पण केलय. मी, माझं तारुण्य तसेच सगळ्या देहभोगांचं हवन या स्वातंत्र्य यज्ञामधे केलं आहे. देशकार्य हेच देवकार्य समजून, घरदार, पैसाअडका इतकेच नव्हे तर मित्रपरिवार, वडील बंधू, वहिनी, मुलगा, पत्नी यांनादेखील या यज्ञवेदीवर मी ढकलले आहे. आणि आता त्या वेदीवर आहुती म्हणून बळी जाण्यासाठी माझा देहपण मी ठेवला आहे, आमचा निर्वंश झाला तरी चालेल, पण मातृभूमी स्वतंत्र झाली पाहिजे. आपल्या कुलात नक्कीच  ईश्वरी अंश असला पाहिजे, म्हणूनच आपल्याला हा आहुतीचा मान मिळाला आहे. आम्ही सात बंधू असतो तरी सर्वांनी देशासाठी बलीदान दिले असते. तरी हे वहिनी, जसे पार्वतीने हिमाच्छादित  पर्वतावर तप केलं, जशा हजारो राजपूत स्त्रियांनी हसत हसत अग्निप्रवेश केला, तसेच तुम्ही देखिल या व्रताचे पालन करा. भारतीय स्त्रियांचं तेज लुप्त झालेलं नाही हे दाखवून द्या. इथे कवी, वहिनींना ‘विरांगने’ म्हणून संबोधतात व त्यांना नमन करतात. शेवटी ते पुन्हा एकदा सांगतात की, जर आपण जाणुन बुजून हे सतीचे वाण हातात घेतले आहे, तर अग्नीप्रवेश करण्याची आपली तयारी आहेच. यज्ञवेदीवर चढलो आहोत तर ते हवन होण्यासाठीच!

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मला इतकेच म्हणायचे आहे… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

मला इतकेच म्हणायचे आहे… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

जेंव्हा घरभेदी भिंतीनीच

नात्यागणगोतात भिंती उभ्या

केल्या  . .

कराकरा मिटली निष्ठुर दारं . .

बंदीच झालो घरातल्या –

कारागृहात. .नजरकैद भोगणारे

कैदीच. . .!

खिडकीतल्या गजावर तटतटून

माझे असहाय्य अपयशी हात. .

आणि बाहेर नुसताच काळोख

तेंव्हाही कवितांनीच केली

ना, टकटक . .

आपुलकीची सहिष्णू दस्तक. .

आणि डोळ्यातील ओलीचा –

आश्वासक पाऊस. .

अगदीच एकाकी नसतो आपण. .

मला इतकेच म्हणायचे आहे. .

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दिव्याची कैफियत ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🕯️🪔 दिव्याची कैफियत !  🕯️🪔 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

गरीब बिचारा मी बापुडा

असे वैर माझे अंधाराशी,

पण वाहून गर्वाने समीरा

ज्योत माझी तू विझवशी !

अंधार सारा दूर सारण्या

मी आयुष्य माझे वेचतो,

निष्ठुर असा कसा तू

माझ्या ज्योतीस वेधतो ?

असेल ताकद तुझ्यात

विझवण्या सहस्त्र ज्योती,

पण एकदा कधीतरी

दाव पेटवून एक तू पणती !

दाव पेटवून एक तू पणती !

© प्रमोद वामन वर्तक

सध्या सिंगापूर 9892561086

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– “चालत राहीन असेच आता…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “चालत राहीन असेच आता…” – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

गर्द हिरवाई दोन बाजूंनी

पायाखाली आपली वाट

चालत राहीन असेच आता 

जिथे घडेल त्याची  गाठ ।।

आयष्यातील सुखदुःखाला

सवे घेतले बांघून गाठ

तेच ओझे पाठीवर  घेऊन 

चालत राहीन अशीच ताठ ।।

जन्मासह तो प्रगट जाहला

अंती भेटीचा क्षण ठरलेला

हिरवाई आहे भवती तोवर

भेटावा वाटे आर्त  मनाला ।।

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चयन… ☆ श्री मुबारक उमराणी ☆

श्री मुबारक उमराणी

? कवितेचा उत्सव ?

☆ चयन… ☆ श्री मुबारक उमराणी ☆

काट्याच्या फांदीवरती

रक्तफुले बोलत होती

दु: ख झुल्याचे झेलत

काट्यासवे झुलत होती

 

फुलपाखरु रुतले

निवडुंगी झुडपात

फडफडत पंखात

अंगाई बोले रात

 

नागफणी खोडी काढी

पाल्याची  सळसळ

येता झोका वा-याचा

काटेफांदी सोसे कळ

 

बगळ्याचे चुकले थवे

आसमंती फिरतात

चांदणं झेलत झेलत

फेसाटी झुडूपी शिरतात

 

खळखळ झरा पाण्यात

खेकडे सेना फळतांना

भयभीत मासे कल्लोळी

रातकिडे चित्कार राना

 

पायवाटा फसवतांना

हसतात इवले गवत

रानगाय चरतां चरता

गावताचे करते रवत

 

रक्तफुले सोसता सोसता

टिपकते रक्ताश्रू नयन

शल्य ह्दयी झेलत झेलत

जीवनाचे नसे हाती चयन

© श्री मुबारक उमराणी

राजर्षी शाहू काॅलनी, शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “जेव्हा मी हरते…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “जेव्हा मी हरते…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

जेव्हा मी हरते

क्षणभर थांबते

कुठं मी चुकते

पाहत मग राहते….

 

एकच चूक पुनःपुन्हा करते

स्वतः आधी जगाला पाहते

एकटेपणाला थोडी घाबरते

जगाच्या पसाऱ्यात अडकून पडते…

 

चांगले वाईट अनुभव

वेचत मग बसते

सुख दुःखाचा

न्याय निवाडा करून टाकते…

 

व्यक्ती ,वस्तू ,परिस्थिती

सगळ्यांना दोष दूषणे

यश अपयश यांच्यामुळे

असते का ओ खरे?

 

पुन्हा एक जाणीव

नव्याने होते

आपल्या आयुष्याची जबाबदारी

आपलीच असते…

 

मानले तर जग सारे

आपले असते

नाहीतर कोणी

कोणाचेच नसते….

 

स्व सोबत राहणे

असेल खरे जगणे

जग सारे निमित्त मात्र

त्याच्याशिवाय आयुष्य कसले?

💞शब्दकळी विजया💞

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 201 ☆ अनुभूती ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 201 – विजय साहित्य ?

☆ अनुभूती ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

आई नावातच आहे

ईश्वराचा सहवास

वात्सल्याची अपुर्वाई

आई माहेराचा श्वास..! १

 

आई जगते जन्मते

लेकरांच्या पाठोपाठ

कुटुंबाच्या स्वास्थासाठी

सात जन्म बांधी गाठ..! २

 

आई हाक काळजाची

आई हळवेला‌ सूर

कसा कोण‌ जाणे येतो

झणी आठवांना पूर…! ३

 

आई आशिर्वादी हात

संस्कारांची जपमाला

आई शब्दांचे जीवन

देते विश्व जगायाला..! ४

 

आई अशी आई तशी

औक्षवंत करी बाळा

तिच्या‌ दिठीत भरला

सुख सौभाग्याचा चाळा..! ५

 

आई आहे अनुभूती

ज्याने‌ त्याने जपलेली

भावनांच्या काळजात

सुखेनैव लपलेली…! ६

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः । 

परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ ॥ ११ ॥ 

पुष्टी करावी देवतांची यज्ञ करूनिया

देवतांनी त्या तुष्ट करावे उन्नत करुनीया

निस्वार्थाने पुष्टी करावी तुम्ही परस्परांची 

याद्वारे तुम्हाला प्राप्ती व्हावी परमश्रेयाची ॥११॥

इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः । 

तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः ॥ १२ ॥ 

यज्ञपोषित देवता खचित करितील कृपा इष्टभोगा

चौर्यकर्म अर्पण ना करता त्यांना निज भोगितो भोगा ॥१२॥

यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः । 

भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्‌ ॥ १३ ॥ 

यज्ञशेष अन्नसेवन करुनी साधू पापमुक्त

देहपोषणासाठी अन्न पापांपासुन ना मुक्त ॥१३॥

अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः । 

यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥ १४ ॥ 

सर्व जीव अन्नापासून पर्जन्यापासुन अन्न 

यज्ञकारणे वर्षावृष्टी कर्मापोटी हो यज्ञ  ॥१४॥

कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्‌ । 

तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्‌ ॥ १५ ॥ 

वेदकारणे कर्मोद्भव  परमात्मा वेदांचे कारण

यज्ञात सर्वथा सर्वव्यापि परमात्म्याचे प्रतिष्ठान ॥१५॥

एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः । 

अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ॥ १६ ॥ 

परंपरागत या चक्राला जो ना आचरितो

वासना भोगत इंद्रियांच्या जीवन व्यर्थ जगतो ॥१६॥

यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः । 

आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ॥ १७ ॥ 

रत आत्म्यात आत्मतृप्त  संतुष्ट आत्म्यात

कर्तव्य तयासी काही नाही शेष जीवनात ॥१७॥

नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन । 

न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः ॥ १८ ॥

कर्म करावे वा न करावे नाही प्रयोजन

समस्त जीवांसंगे त्यांचे निस्वार्थी जीवन ॥१८॥

तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर । 

असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ १९ ॥ 

त्याग करिता आसक्तीचा प्राप्ती परमात्म्याची

असक्त राहुनिया निरंतर करी पूर्ति कर्माची ॥१९॥

कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः । 

लोकसङ्ग्रहमेवापि सम्पश्यन्कर्तुमर्हसि ॥ २० ॥ 

जनकादी ज्ञान्यांना परमसिद्धी कर्मप्राप्त

संग्रह करुनीया लोकांचा कर्म करी तू नित्य ॥२०॥

– क्रमशः भाग तिसरा

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्वास… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ श्वास… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

श्वास घेऊनी जन्मा येतो ,

   एक जीव तो जगण्यासाठी!

अखंड त्याची सोबत असते,

   ‘ मी कोण ‘ हे जाणण्यासाठी!….१

 

 जेव्हा कधी  कोंडतो तेव्हा,

  जाणीव  त्याची जगण्यामध्ये!

 विसरलेल्या”श्वासास” शोधतो,

   आपण आपल्या देहामध्ये ….२

 

 पंचप्राण हे चालू रहाती,

   श्वासाचे आंदोलन असे !

 फुकाच आहे देह बापडा,

   श्वासाविण त्या अस्तित्व नसे!…३

 

 दिली बासरी देहाची ही,

   ईश्वराने अपुल्या हाती!

 हवा लागते फुंकायाला,

   तेव्हा होतसे स्वर निर्मिती!….४

 

 स्वर मधुर बासरीचा येई,

  त्या श्वासाच्या हिंदोळ्यातून!

नसते जेव्हा साथ हवेची ,

  श्वास थबकतो अंतरातुन….५

 

 कृपा तुझी ही देवा आगळी,

   एकेका श्वासातून पाझरते !

तूच आधार या देहाचा ,

  सत्य मनास तेव्हाच उमगते !….६

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares