मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #219 ☆ जोखड आहे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 219 ?

जोखड आहे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

जीवन सोपे झालेले पण जगणे अवघड आहे

गायीचा मुडदा पडतो ती होता भाकड आहे

पैशाच्या मोहापायी मज भवती जमले सारे

पण श्वास थांबला नाही दाखवली रोकड आहे

सण आनंदाचा होता उत्साही होते सारे

मी ईद मुबारक म्हणता घाबरला बोकड आहे

खाणीत कोळशाच्या मी अन् तो आहे सोन्याच्या 

मी गुहेत अंधाराच्या का खेळत धुलवड आहे

जीवनदाते जेथे त्या जागेला किंमत येते

श्रावण बाळाच्या हाती सोन्याची कावड आहे

झाडावर जागा होती पिल्लाला रुचली नाही

त्या जुनाट घरट्याचीही झालेली पडझड आहे

शेतात राबतो आहे डोईवर कपास त्याच्या

बैलाच्या खांद्यावरती अजूनही जोखड आहे

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ युगसाक्षी… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ युगसाक्षी… ☆ श्रीशैल चौगुले ☆

(एकाक्षरी यमक.)

थांबूनी घे विसावा मना क्षणभरी

सावली इथे वृक्षाखाली उन जरी.

सहारा माणसा ओळखून घे तरी

थकवा निभावून नेती ही वल्लरी.

बघ सळसळ पाने धैर्य पांघरी

दुपार नत् रणरणती उदरी.

फडफड पंखांची घरट्यात परि

चाहुल पिलांना मानवी वाटे बरी.

सोबतीस क्वचित वार्याची झुंबरी

मनतृप्त सुख क्षणी डोले अंबरी.

बीज अंकुरले शाखेत भरजरी

माणसा तु प्रेम करशी निसर्गावरी.

पांग फेडिल युगायुगांची साक्ष खरी

थांबून घे विसावा मग चाल ती दुरी.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “प्रभातफेरी” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “प्रभातफेरी” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

नुकतीच नववर्षाची सुरवात झाली. नवीन वर्ष तसं काळजीत,संकटाच्या भितीखाली, निराशेचं, गेलं.नवीन वर्ष आले तसे सगळेजणं मनावरील मळभं झटकून नवी आव्हाने स्विकारायला सज्ज झालेत. नवीन योजलेल्या संकल्पांना सुरवात केल्या गेली. मोठ्या हुरुपाने योजलेले संकल्प निदान काही दिवस तरी सुरळीत बिनबोभाट पार पडावेत ही मनोमन ईच्छा बाळगून त्या नुसार आपल्या ईच्छित कार्यक्रमाची रूपरेषा प्रत्येक जण आखायला लागले.

माझा ह्या वर्षीचा संकल्प म्हणजे पहाटेची भटकंती .प्रभातफेरी मारायचा अगदी ठाम निश्चय झाला होता.पहाटे फिरण्याचे फायदे डाँक्टरांनी तसेच नियमीत फिरायला जाणा-यांनी वेगवेगळ्या पध्दतीने समजावून सांगितले होते.त्यामुळे रात्रीच व्यवस्थित दोनदोनदा गजर लावलेला तपासून घेतला.पुलंनी रोजनिशीत लिहील्या प्रमाणे झोपेतच गजर बंद करुन परत झोपणे,उशिरा जागे झाल्यावर लौकर जाग आली नाही ह्या सबबीखाली परत झोपणे असे काहीही करायचे नाही,असे मनाला वारंवार झोपतांना बजावले.रात्रीच फिरायला जायचे शूज,स्वेटर,शाल स्कार्फ  काढून ठेवले .

गजर गजरात वाजला आणि आजपासून रात्र खूपच लहान झाली की काय असा प्रश्न पडला.झोप नीट मनासारखी न झाल्याचं फील आलं.तरीही मनाचा हिय्या करुन उठले.भराभर आपलं आवरून फिरायला जायला बाहेर पडले.

नियमीत फिरायला येणा-या बायका तेरड्याचा रंग तीन दिवस ह्या नजरेने बघताहेत असं उगाचच वाटून गेलं.फिरायला येणाऱ्या मंडळींची बरीच गर्दी रस्त्याने होती.तेव्हा नियमित फिरायला येणाऱ्या काकूंनी ,ही गर्दी पंधरा जानेवारी नंतर आपोआप कमी होईल ही दाव्याने खात्री दिली.ज्या रस्त्याने फिरायला जायचे त्या रस्त्याने रागात,लाडात येणारी कुत्री नाहीत नं ह्याची आधीच खातरजमा करुन घेतली होती.

पहाटेपहाटे मस्त फिरतांना फुललेली फुले,हवेने डोलणारी झाडे,निवांत रवंथ करणारे प्राणी, मंजुळ कलरव करणारे पक्षी बघत बघत सैर करण्यात खूप जम्मत असते हे फक्त ऐकून होते. ऐकलेल्या सगळ्याच गोष्टी ख-या नसतात ह्याची परत एकदा खात्री पटली.माणसांइतकीच कुत्र्यांनाही माणसांच्या संगतीत प्रभातफेरीची गरज असते हे नव्यानेच उमगले.

फिरुन आल्यावर खूप उत्साह वाटतो हे त्रिकालाबाधित सत्य असल्यासारखे ठोकून सांगितलेला ऐकीव दाव्याचा अनुभव तसा आला नाही हे पण नक्की. मग हळूहळू सवय झाल्यानंतर ते फील येत हे नव्याने कळलं.

फिरायला गेल्यानंतर वेगवेगळ्या हिरव्या रंगाची द्रव्ये बाटल्यांमध्ये भरलेली दिसली.उगीचच कडक चहाची आठवण आली आणि त्या रसांकडे बघून ढवळायला लागलं.

अशात-हेने वेगळे अनुभव घेत का होईना प्रभातफेरी सुरू तर केली.काही कालांतराने आवडायला लागेल ह्या अनुभवी महिलांच्या सांगण्यावर विश्वास असल्याने सध्यातरी साखरझोप आठवत आठवतं प्रभातफेरी सुरू ठेवलीय. पण जोक अपार्ट साखरझोेतप कितीही चांगली वाटतं असली तरी पहाटे फिरणं हेच तंदुरुस्त तब्येतीसाठी अत्यावश्यक बिनखर्चिक औषधं आहे हेच खरे.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “क्लिप…” – भाग-3 ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “क्लिप…” – भाग-3 ☆ श्री मंगेश मधुकर 

(पुन्हा पुन्हा फोन वाजत होता. इतक्यात दारावरची बेल वाजली.आईनं दार उघडलं तर समोर…) इथून पुढे — 

आईनं दार उघडलं तर समोर विनीतचे ममी आणि पपा.त्यांना पाहून आईचा पुतळा झाला.ती फक्त एकटक बघतच राहिली.बाबांनी पुढे येऊन परिस्थिती सावरली.त्या दोघांच्या अवेळी,अनपेक्षित येण्यानं नमा,आई-बाबांच्या मनातली धडधड वाढली.

मध्यरात्र उलटून गेली तरी विनीत मोबाईलवर टाइमपास करत होता. तितक्यात मित्रानं  पाठवलेली त्याची अन नमाची क्लिप पाहून विनीतची झोप उडाली. घशाला कोरड पडली. हात-पाय लटपटायला लागले. मित्रांनी कॉल केले परंतु भीतीपोटी रिसिव्ह केले नाही. मेसेजेस वाचून घाम फुटला. अजून टेंशन नको म्हणून फोन स्वीच ऑफ केला. खूप घाबरला. डोक्यात नको त्या विचारांचं थैमान सुरू झालं. बेचैनी वाढली. नक्की काय करावं हेच कळेनासं झालं. येरझरा मारताना स्वतःशीच बोलायला लागला “झक मारली, बागेत गेलो अन नको ते करून बसलो. गावभर बोभाटा झाला. तोंड दाखवायला जागा राहिली नाही. नमा एक्साईट झाली पण मी कंट्रोल करायला हवा होता. इज्जतची माती झाली. ममी-पपांना काय वाटेल. हा कलंक आयुष्यभर सोबत राहणार. ज्यानं क्लिप केली त्याच्या xxx xx, xxxxx, एकदा भेटू दे, क्सक्सक्सक्स ची मजा झाली मी मात्र बरबाद झालो”रा ग अनावर झाल्यानं विनीतला खूप जोरजोरात ओरडावसं, रडावसं वाटत होतं पण तेही जमत नव्हतं. ममी-पपांना सामोरे जायची हिंमत नव्हती म्हणून रूमच्या बाहेर आला नाही. तिकडे क्लिप पाहून ममी-पपांना सुद्धा जबरदस्त धक्का बसला पण त्याहीपेक्षा विनीतच्या विचित्र वागण्यानं दोघं हादरले. दोघांनी खूप समजावलं पण काहीही उपयोग झाला नाही. सैरभैर विनीतला पाहून त्यांचाही धीर सुटत चालला होता त्याचवेळी नमाचा नवीन व्हिडिओ पाहून ममी ताबडतोब विनीतच्या रूममध्ये गेली. (संडे डिश™) 

“विनू,काय रे ही अवस्था.सांभाळ!!”

“ममा,काय करू सुचत नाहीये.डोकं पार आऊट झालंय”

“होऊन गेलेल्या गोष्टीवर जास्त विचार केल्यावर फक्त त्रासच होणार.”

“तोच तर होतोय”

“असं चडफडत स्वतःवर राग काढण्यापेक्षा परिस्थितीला सामोरं जा”

“हिंमत होत नाहीये.लोक काय म्हणतील”

“काहीही केलं तरी लोक बोलणारच.तुलाच यातून बाहेर याव लागेल.किती दिवस लपून बसणार.”

“लपून??ममा,काहीही काय बोलतीयेस.काय सहन करतोय ते माझं मला माहित.”

“आणि आमचं काय?तुझ्या इतकाच त्रास सहन करतोय”

“काहीच्या काही होऊन बसलयं.पार वाट लागली” 

“असं हातपाय गाळून चालणार नाही.तू फक्त स्वतःचा विचार करतोयेस.पुरुष असून तुझे हे हाल तर नमाची काय अवस्था असेल याचा विचार कर.अशा घटनेत जास्त बदनाम बाईच होते.”

“मग पुरुषांचं काय???त्यांना होणाऱ्या त्रासाचा कोणी विचारच करत नाही.माझा त्रास हा सुद्धा जगाच्या दृष्टिनं चेष्टेचाच विषय…”

“नमाशी बोल.याक्षणी तुम्ही एकमेकांच्या सोबत असलं पाहिजे.तू एवढा डिस्टर्ब तर तिचं काय झालं असेल.”

“माझ्यापेक्षा तुला तिचीच काळजी वाटतीय.”

“असं नाहीये.आधी स्वतःची कीव करणं बंद कर.त्याच त्या विचारांच्या रिंगणात गोल गोल फिरतोयेस.दोघांना झटका बसला पण तिनं यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला”.(संडे डिश™)

“म्हणजे,आता तिनं काय केलं”ममीनं नमाचा व्हिडिओ विनीतला दाखवला.त्यानं पुन्हा पुन्हा पाहिला अन अचानक ममीच्या कुशीत शिरून हमसून हमसून रडायला लागला.

“साचलेलं वाहून गेलं.आम्हां बायकांना सहज जमतं पण वाटलं तरी रडता न येणं हाच पुरुषांचा प्रॉब्लेमयं.चल,नमाकडे जाऊ” ममी पाठीवर थोपटत म्हणाली.

विनीत आला पण नमासमोर जायची हिंमत होत नव्हती म्हणून कारमध्येच थांबला.ममी-पपा घरात गेले.सगळे हॉलमध्ये असले पण एकमेकांच्या नजेरेला नजर देणं टाळत होते.काय बोलावं,सुरवात कशी करावी हे कोणालाच सुचत नव्हतं.सगळेच अवघडलेले.विचित्र अशा शांततेत काही क्षण गेल्यावर ममी नमाच्याजवळ बसत म्हणाल्या “तुझं खूप कौतुक.धीराची आहेस.तुझ्या हिमतीमुळे मोठा आधार मिळाला.माझ्या इमोशनल लेकासाठी अशीच बायको पाहिजे.जिंकलंस शाबास सूनबाई!!”नमाच्या डोळ्यात पाणी तरारळं.(संडे डिश™) 

“विचित्र परिस्थितीला आपण सामोरे जातोय.काय करावं सुचत नव्हतं.तुमच्यासारखीच आमची अवस्था.कधी कल्पना केली नाही असे अनुभव आले.व्हिडिओ पाहिला.खूप धैर्य लागतं.तिघांचं कौतुक करायला आलोय.”ममी 

“विनीत कसा आहे”नमा. 

“ठीक!!खाली गाडीत बसलाय.जास्त काही सांगत नाही पण आत्ता त्याला तुझी गरज आहे.”

नमा पार्किंगमध्ये गेली.तिला पाहून विनीत गडबडला.चूळबुळ वाढली. 

“शांत हो.मी भांडायला आली नाहीये.”

“कशीयेस”विनीत

“आय एम ओके,हळूहळू सावरतेय.तुझं काय”

“नॉट ओके,खूप डिस्टर्ब आहे”

“ते लक्षात आलं.फोन अजूनही बंद”

“हो,लोक फार छळतात”

“बिनधास्त फोन चालू कर.डिलिटचं बटण आहे ना.मग कसली काळजी”

“काहीही घाणेरडं लिहितात”

“वाचायचं नाही.काही दिवस चिडवतील नंतर विसरून जातील”

“नाही ती क्लिप म्हणजे परमनंट टॅटु”

“होऊ दे.जे झालं ते झालं.सगळे करतात तेच केलंयं”नमा 

“तुला काहीच वाटत नाही”

“खूप सहन केलं.टोकाचा निर्णय घेतला.सुदैवाने वाचले नंतर ठरवून यातून बाहेर पडले.”

“मी अजूनही तिथेच अडकलोय”

“स्वतः प्रयत्न केल्याशिवाय सुटका होणार नाही.मी केलेला व्हिडिओ पाहिलास”

“येस,त्यामुळेच तर भेटायला आलो.त्यामुळेच उभारी मिळाली.तू खरंच भारीयेस.” (संडे डिश™)

“आता,पुढे काय?”

“म्हणजे समजलं नाही,ए बाई मला सोडून बिडून द्यायचा तर विचार नाहीये ना.” नमा मनापासून हसली.  

“पोलिसांकडे तक्रार करू.सोबत येणार.”

“येस,त्या हलकटाला सोडायचं नाही” 

“असले लोक भेकड,पळपुटे असतात सहजासहजी सापडणार नाहीत तरीही प्रयत्न सोडायचे नाहीत परंतु सगळी शक्ती त्यांना शोधण्यात लावायला नको.आपल्या आयुष्यात अजून खूप चांगल्या गोष्टी आहेत.”

“तुला संकटाच्या वेळी एकटं सोडलं याचा फार मोठा गिल्ट आहे.आय एम रियली सॉरी!!” 

“इट्स ओके,खरं सांगू.मलाही खूप राग आलेला पण वस्तुस्थितीच अशी होती की दोघांची अवस्था सारखीच.असल्या घटनेत बदनामी आणि सहानुभूती ही बाईच्या वाट्याला जास्त येते.पुरुष मात्र दुर्लक्षीला जातो.जो बीत गई,सो बीत गई”

“या क्लिपमुळं आपलं नातं हॅंग झालंय”विनीत भावुक झाला.त्याचा हात हातात घेत नमा म्हणाली “मग रिस्टार्ट करु” (संडे डिश™)

– समाप्त – 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परतीच्या वाटेवर… लेखिका : सुश्री नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆

सौ उज्ज्वला केळकर

??

☆ परतीच्या वाटेवर… लेखिका : सुश्री नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, वर्ष सरत आलेलं पाहून, परतीच्या वाटेवरच्या प्रवासातलं एक “स्टेशन “मागे पडलं ही भावना मनात  येतेच.

सत्तरी पर्यंतच्या प्रवासात, गंतव्य स्थान ठरवून केलेल्या प्रवासाच्या मिश्र आठवणी बरोबर असताना अटळ अशा गंतव्य स्थानाकडे परतीचा प्रवास सुरु झालाय.

यात कुठेही दुःख, खास करून नैराश्य याचा लवलेश ही नाही.

जन्माला आलेला प्रत्येक जण हे मनापासून स्वीकारतो.

तरीही परतीचा प्रवास कसा असावा याचे आडाखे बांधतोच.

वयपरत्वे कमी झालेली शारीरिक क्षमता, आत्मविश्वास आणि स्मरणशक्ती ही इंधनं परतीच्या प्रवासातली गाडी थोडी धिमी करतात. हे हसत मान्य केलं तरी ही इंधनं शेवटपर्यंत संपू नयेत ही  प्रार्थना  मनोमन सतत बरोबरीने चालत असते.

परतीच्या प्रवासात आपली ही “कुडी “derail “(अपंगत्व ) होऊ नये ही तर प्रत्येकाचीच इच्छा असते.

आपल्या मुलांची गाडी सुसाट धावत असते. कौतुक भरल्या अभिमानाने त्या कडे बघत असलो तरी तरी मनात चटकन येऊन जातंच की आपली गाडी त्यांनी “siding “ला टाकू नये.

त्यांचा वेग झेपणारा नाहीये तर आपल्या वेगाशी कुठे तरी जुळवून घेत मधे मधे अशी स्थानक दोघांनी निर्माण करावीत की तिथे ऊर्जा भरून घेता येईल अशी क्षणभर विश्रांती अनुभवता येईल.

या वाटेवरची विधिलिखित  स्टेशन्स तर टाळता येणार नाहीच आहेत. पण प्रवास सुखकर होण्यासाठी ची आगाऊ आरक्षणं तर करूच शकतो.जसे की….

साठी नंतर तब्बेतीविषयी  अधिक जागरूक राहून स्वतः ला fit ठेवणं गरजेचं आहे.

आर्थिक नियोजन चोख करावं…. छंद जोपासत आपला स्वतः चा समवयस्क  गोतावळा, मैत्रीचं कोंडाळ  असावं.

नवीन गोष्टींचं मनापासून स्वागत करावं. पुढच्या पिढी बरोबर कमीत कमी संघर्षाची वेळ यावी या साठी आपली आणि त्यांची मानसिकता प्रयत्न पूर्वक, जाणीव पूर्वक जोपासावी.

मुलांच्या संसाराच्या जबाबदाऱ्या अट्टाहासाने  आपल्यावर ओढवून  घेणं टाळावं.

“आपल्या ” “स्वतः साठी जगण्याच्या महत्वाच्या junction ला आलोय. … आनंदाने राहू या.

आगाऊ आरक्षणाची ही शिदोरी बरोबर घेतलीय, झालाच आत्ता परतीचा प्रवास “सुखकर”, 

असं तर म्हणणंच नाहीये.पण सह्य नक्कीच होऊ शकतो.

शेवटी हा प्रवास ज्याचा त्याचा, ज्याला वाटेल तसा करायचा असतो. शाश्वत आणि इच्छित ही स्टेशन्स बिन थांब्याची निघू शकतात. 

तरीही बा भ बोरकर यांच्या कवितेत सांगितल्याप्रमाणे … 

‘दिवस “जरेचे “आले “जरी “त्या काठ जरीचा ” लावू सुखे ‘ .. म्हणत परतीचा प्रवास आनंदाने, समाधानाने करण्याचा  मानस ठेवूच शकतो आपण…

लेखिका : सुश्री नीलिमा जोशी

प्रस्तुती : सौ उज्ज्वला केळकर

संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पुण्यातल्या काही ऐतिहासिक आठवणी…” – संग्राहक : सुनील इनामदार ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “पुण्यातल्या काही ऐतिहासिक आठवणी…” – संग्राहक : सुनील इनामदार ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

पुण्यातला बाहुली हौद आणि स्त्री शिक्षणाची पहिली बळी …… 

महात्मा जोतिबा फुलेंनी आपल्या पत्नी क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या सोबतीने पुण्यात भिडेवाडा येथे मुलींची शाळा सुरू करून भारतात स्त्री शिक्षणाचा पाया घातला.

त्याकाळी पुणे हे अत्यंत कर्मठ व सनातनी शहर मानलं जातं होतं. जोतिबा आणि सावित्रीबाई यांच्यावर अनेकदा हल्ले झाले. काही वेळा हे हल्ले शारीरिक होते तर काही वेळा मानसिक अत्याचार केला गेला.

याच पुण्यात काहीजण असे होते जे फुले दाम्पत्याच्या पाठीशी खंबीर उभे राहिले. त्यांच्या कार्याला पाठिंबा दिला, इतकंच नाही तर त्यांचा वारसा पुढे नेला.

यातच प्रमुख नाव येते डॉ. विश्राम रामजी घोले यांचे.

गुहागर येथील अंजनवेलच्या किल्लेदार गोपाळराव घोले यांच्या नातवाचा हा मुलगा. घराण्याची ऐतिहासिक परंपरा जपत वडील ब्रिटिश पलटणीमध्ये भरती झाले, सुभेदार झाले.

वडील सैन्यात नोकरीला असल्यामुळे विश्वास घोले यांना शिक्षणाची संधी मिळाली. ते शिकून सर्जन बनले. १८५७ सालच्या बंडात देशभर फिरून जखमी सैनिकांची त्यांनी सेवा केली. ब्रिटिश आमदानीत एक नामवंत शल्यविशारद म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती पसरली. डॉ. घोले यांना गव्हर्नरच्या दरबारात रावबहादूर ही पदवी देण्यात आली होती.

पुण्यात असताना विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यापासून ते लोकमान्य टिळक, आगरकर यांच्या पर्यंत तत्कालीन पुढाऱ्यांशी त्यांची चांगली मैत्री होती पण त्यांना भारावून टाकले महात्मा फुले यांच्या सुधारकी विचारांनी.

सत्यशोधक समाजाचा दुसरा वार्षिक समारंभ 1875 ला साजरा करण्यात आला. त्यावेळेस सत्यशोधक समाजाचे अध्यक्षपद डॉ. विश्राम रामजी घोले यांना देण्यात आले.

महात्मा फुलेंचे विचार सर्वत्र पोहचवेत म्हणून डॉ. घोले प्रयत्नशील होते. उक्ती व कृती मध्ये त्यांनी कधीच अंतर येऊ दिलं नाही. साक्षरतेचा प्रसार केला मात्र सुरवात स्वतःच्या घरापासून केली. आपल्या मुलींना इंग्रजी शिक्षण दिले.

त्यांच्या थोरल्या मुलीचं नाव होतं काशीबाई. सर्वजण तिला लाडाने बाहुली म्हणायचे. या काशीबाईला त्यांनी मुलींच्या शाळेत घातले. जुन्या विचारांच्या अनेकांनी त्यांना विरोध केला, प्रसंगी धमकी दिली.मात्र डॉ. घोले मागे हटले नाहीत.

ही बाहुली शाळेत हुशार व चुणचुणीत होती. दिसायला देखील ती गोड बाहुली सारखी दिसायची. तिचे शाळेत जाणे पहावले नाही. डॉ. घोले यांच्या नातेवाईकांपैकीच कोणी तरी तिला काचा कुटुन घातलेला लाडू खायला दिला. यातच त्या आश्रप मुलीचा मृत्यू झाला.मात्र या घटनेनंतरही विश्राम रामजींनी माघार घेतली नाही. आपली दुसरी मुलगी गंगूबाई हिला त्यांनी जिद्दीने शिकवले. केवळ तिचे शिक्षणच केले नाही तर तिचे लग्नही लहानपणी न लावता वयाची सोळा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच केले. तिचे पती डॉक्टर होते.

आपल्या लाडक्या बाहुलीचा स्मरणार्थ डॉ. घोल्यानी १८८० साली पुण्यात बुधवार पेठेमध्ये आपल्या घरासमोरच हौद बांधला आणि तो सर्व जातीधर्मातील लोकांसाठी खुला ठेवला. कोतवाल चावडी समोर असलेल्या या हौदाचा लोकार्पण सोहळा मातंग समाजातील थोर सुधारक दादा भुतकर यांच्या हस्ते भाऊबीजेच्या दिवशी करण्यात आला.

याच हौदाला बाहुलीचा हौद म्हणून ओळखले जाऊ लागले. हौदावरील उल्लेखानुसार काशीबाईचा जन्म १३ सप्टेंबर १८६९ रोजी व मृत्यू २७ सप्टेंबर १८७७ रोजी झाला होता. तिची एक मूर्ती  या हौदावर उभी केली होती. कात्रजवरून येणारे पाणी या हौदात पाडण्यात येत असे. या अष्टकोनी हौदावर कारंजा देखील होता.

पुढे रस्ता रुंदीकरणामध्ये हा हौद हलवण्यात आला. इथली बाहुलीचा मूर्ती देखील गायब झाली. आता हा हौद फरासखाना पोलिस चौकीच्या हद्दीत सध्याच्या दगडूशेठ दत्त मंदिराजवळ आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती याला “बाहुलीचा हौद गणपती” असेच पूर्वी ओळखले जायचे.

घोलेंनी बांधलेला हौद, तिच्या वरची ती बाहुलीची मूर्ती या जुन्या पुणेकरांच्या आठवणीतच उरला आहे. या ठिकाणी वापरलेला फोटो देखील प्रातिनिधिक नागपूरच्या बाहुली विहिरीचा आहे. स्त्री शिक्षणाचे स्मारक म्हणून काशीबाई घोले यांचे स्मारक जुन्या वैभवात उभे केले.

संग्राहक : श्री सुनील इनामदार

मो.  ९८२३०३४४३४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आयुष्याचा फंडा… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आयुष्याचा फंडा… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

दृष्टिकोन किती महत्वाचा पहा.

गणित तर समजून घ्या. “मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा – एक मजेशीर गणित” पहा, सोडवा किंवा सोडून द्या पण आनंद जरूर घ्या.

आपण असे मानू या की.

A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z = अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26.

म्हणजेच A=1, B=2, C=3 असे

मानले तर माणसाच्या कोणत्या गुणाला पूर्ण शंभर गुण मिळतात हे पाहू या.

आपण असे म्हणतो की, आयुष्यात “कठोर मेहनत / HARDWORK” केले तरच आयुष्य यशस्वी होते.

आपण “HARDWORK चे गुण पाहु या. H+A+R+D+W+O+R+K =

8+1+18+4+23+15+18+11 = 98% आहेत पण पूर्ण नाहीत.

दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे “ज्ञान” किंवा ‘Knowledge’. याचे मार्क्स पाहु या

K+N+O+W+L+E+D+G+E =

11+14+15+23+12+5+4+7+5= 96% हे पहिल्या पेक्षा कमी.

काही लोक म्हणतात “नशिब”/ LUCK हेच आवश्यक. तर लक चे गुण पाहु या.

L+U+C+K = 12+21+3+11 = 47%, “नशिब” तर एकदमच काठावर पास.

काहींना चांगले आयुष्य जगण्या साठी “पैसा /MONEY” सर्व श्रेष्ठ वाटतो. तर आता “M+O+N+E+Y=किती मार्क्स ?

13+15+14+5+25= 72%, पैसा ही पूर्णपणे यश देत नाही.

बराच मोठा समुदाय असे मानतो की, “नेतृत्वगुण / LEADERSHIP” करणारा यशस्वी आयुष्य जगतो.  नेतृत्वाचे मार्क्स =

12+5+1+4+5+18+19+8+9+16= 97%, बघा लीडर ही शंभर टक्के सुखी, समाधानी नाहीत, आनंदी तर अजिबात नाहीत.

मग आता आणखी काय गुण आहे, जो माणसाला १००% सुखी, समाधानी आणि आनंदी ठेऊ शकतो ? 

काही कल्पना करू शकता ?

नाही जमत ?

मित्रांनो, तो गुण आहे, आयुष्याकडे पाहण्याचा “दृष्टिकोन / ATTITUDE” 

आता एटिट्यूड” चे आपल्या कोष्टकानुसार गुण तपासू… 

A+T+T+I+T+U+D+E = 1+20+20+9+20+21+4+5= 100%. पहा आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण करून सुखी, समाधानी आणि आनंदी आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा आहे, ‘आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन’. तो जर सकारात्मक असेल तर आयुष्य  १००% यशस्वी होईल आणि आनंदी ही होईल.

दृष्टिकोन बदला …  आयुष्य बदलेल

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मुंबईची जीवनरेखा… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– मुंबईची जीवनरेखा… – ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

पदोपदी चालतो

जगण्याचा  हा संघर्ष |

धक्काबुक्की खात,

लोटती वर्षामागून वर्षं |

लोकल ट्रेन सेवा,

मुंबापुरीची लाईफ लाईन |

ती आहे म्हणूनच,

कामधंदा चालतो फाईन |

घड्याळाच्या काट्यावर,

मुंबई मेरी जान धावते |

लोकलची वेळ गाठायाला,

मुंबई वायू गतीने पळते |

दिवसागणिक गर्दी तिच्यात,

वाढता वाढत  आहे |

तुडुंब भरलेल्या डब्यात,

चाकरमानी दिवस काढत आहे |

भार तिचा हलका व्हायला,

मोनो-मेट्रो जन्मल्या बहिणी |

दोघींचीही तिच्याचप्रमाणे,

होत चालली आहे कहाणी |

ऑन ड्युटी RPF-स्ट्रेचर हमाल,

कोणीतरी गेला हे ऐकून कळते |

कोणा कुटुंबाचा आधार तुटला,

कुठेतरी मन त्यांच्याप्रती काकूळते |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 170 – दोहे – मीरा ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं  आपका भावप्रवण गीत – क्यों कर पालिश करती हो।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 170 – दोहे  –  मीरा…  ✍

चित्रकार चित्रित करेलिखें ग्रंथ विद्वान

पर मीरा के ‘रहस’ को, कौन सका कब जान॥

पहुंची मीरा द्वारकाथी गिरधर से होड़

पल भर में ही हो गये‘मीरा-मय’ रणछोड़।।

मीरा जन्मी जगत् में, साक्षी सकल समाज

देख न पाये विदाईरहे सभी मुहताज ॥

तुलसी सूर कबीर के, जीवन चरित अनुप

मीरा अपने आप-सी, हो गई श्याम स्वरूप।।

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 169 – “ऑंगन का अपना दुख था…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत  ऑंगन का अपना दुख था...)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 169 ☆।। अभिनव गीत ।। ☆

☆ “ऑंगन का अपना दुख था...” ☆ श्री राघवेंद्र तिवारी

यह भी तो छत की मुँडेर का

अपना अनुभव था ।

उस पर ही बैठेगी चिडिया

कैसे संभव था ॥

 

ऑंगन का अपना दुख था

ना छा पायी बदली ।

अगर कभी उस तरफ मुड़ी

तो भी बदल बदली ।

 

आमों के पेडों के नीचे

छाँव नहीं लौटी ।

मौसम के अपनेपन का

यह कथित पराभव था ॥

 

दीवारें चुपचाप अहंकारी

जैसी दिखतीं ।

दरवाजे, खिड़कियाँ, चौखटें

खिंची खिंची लगतीं ।

 

जिन पर प्रसन्नता का कुछ

कुछ था चढ़ा घमंड रहा ।

यह उनकी निर्वाध सोच का

चिन्तन लाघव था ॥

 

आत्म प्रचारक दिखी पौर,

व चिन्तक दालाने ।

जो अपने वैविध्य समन्वय

की थीं पहचानें ।

 

जो खपरैलों से होकर

सब से बस यह कहतीं ।

यहाँ जिंदगी जीना शायद

बहुत असंभव था ॥

©  श्री राघवेन्द्र तिवारी

20-10-2023

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈
image_print

Please share your Post !

Shares