सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

 

☆ “वळीव —” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

घन घनदाट की दाटे मळभची

धरित्रीच्या जे आर्त मनातील

वणवा वैशाखी जाळतसे

जाळे किंवा ग्रीष्म मनातील….

*

काहूर माजे मनात त्याला

एकलीच मी कशी शांतवू

तहानले मन पावसास त्या

त्याला परि कैसे बोलावू ?….

*

आले जणू पाडाला ढग हे

सुचवून जाई रेघ विजेची

घेऊन या हो कुणी आता ती

मस्त धुंद सय मृद् गंधाची….

*

सोसेना मुळी ताण आता हा

घन हे तांडव नाचू लागले

बघता बघता बेबंदपणे

आर्तताच नी बरसू लागले….

*

वाहून गेले मळभही सारे

झंकारे अन् तार तृप्तीची

मनमोरांना नवे पिसारे

टपटपतांना सर वळवाची……

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments