हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य#113 – लघुकथा – *अभिलाषा * ☆ श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’

श्रीमती  सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’

(संस्कारधानी जबलपुर की श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’ जी की लघुकथाओं, कविता /गीत का अपना संसार है। साप्ताहिक स्तम्भ – श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य  शृंखला में आज प्रस्तुत है अपने कर्मफलों से जीवन में पश्चात् पर आधारित एक विचारणीय लघुकथा “ *अभिलाषा *”। इस विचारणीय रचनाके लिए श्रीमति सिद्धेश्वरी सराफ जी की लेखनी को सादर नमन।) 

☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी  का साहित्य # 112 ☆

? लघु कथा ? *अभिलाषा *? ?

कामता प्रसाद अस्पताल के चक्कर लगा लगा कर थक चुके थे। नौकरी भी जाती रही। भाई भतीजे ने अपना मुंह मोड़ लिया था। पत्नी बेचारी दिनभर उनके साथ लगी रहती।

कामता प्रसाद को जीने की बहुत इच्छा थी। मन में कई सवाल थे, जिनका उनके पास कोई उत्तर नहीं था। जीवन की घटनाओं को लेकर बेटी को बोझ समझ उसे अनाथालय में डाल बेटे की चाहत से सदा सदा के लिए कुछ कारणवश संतान विहीन हो चुके थे। मां ने बड़े प्यार से उस समय उसे अभिलाषा नाम रख छोड़ा था।

कभी-कभी वह अनजान बन उसे अन्य बच्चों की तरह मिल-देखकर, कुछ देकर चली आती। जिसकी कामता प्रसाद को खबर नहीं थी।

दिल पर पत्थर रखकर जीवन को जी रही थी। समय पंख लगा कर चला। मेडिकल स्टाफ नर्स बन चुकी थी अभिलाषा। और बार-बार इस औरत को अपने पास आकर देखने से उसके मन में भी चाहत और एक अपनेपन की भावना बढ़ चुकी थी। पर समझ नहीं पाई कि वह उसकी अपनी मां हैं।

कई वर्षों बाद आज अचानक उसके हॉस्टल के सामने रोते रोते बेसुध हो आवाज लगा रही थी…. अभिलाषा, अभिलाषा। वार्डन कहा जो इच्छा दीदी है मुझे भुला दो।

मां ने  बेटी को कसकर गले लगा लिया और बोली… आज पिता तुल्य इंसान का जीवन तुम्हारे हाथों है बचाओ बेटी। इच्छा हैरानी से बोली… बताइए तो सही क्या बात है। मां ने सारी कहानी एक ही सांस में रोते हुए कह सुनाई और बोली दोनों किडनी खराब हो चुकी है और जीने की बहुत ही इच्छा है।

कोई भी किडनी देने को तैयार नहीं है और ना हमारी सामर्थ है। तुम ही कर सकती हो। सांत्वना देकर उसे जाने को कह वह सोचने लगी।

डॉक्टर से कार्यवाही शुरु कर अपनी ही एक किडनी देने को तैयार हो गई। ये जीवन तो पिता जी ने पहले ही खतम कर चुके हैं। आपरेशन के बाद एक बेड पर  पिताजी और दूसरे बेड पर बेटी। ठीक होने पर कामता प्रसाद ने इच्छा से कहा…. मेरे जीवन की अभिलाषा बनकर क्या मुझे माफ नहीं कर सकोगी बेटी??

अभिलाषा अनजान बन अपना रास्ता चलते बनी जैसे कभी कुछ हुआ और देखा सुना ही नहीं।

कामता प्रसाद के आंखों से खून के आंसू बहने लगे क्या?? ये जीना भी कोई जीना होगा?

 

© श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’

जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 124 ☆ गळ्यातला फास ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 124 ?

☆ गळ्यातला फास ☆

मी साधा कागद

कुणी लिहितो चार शब्द

माझ्या काळजावर

त्याच्या काळजातल्या संवेदनांचे

आपल्याच प्रियेसाठी

काळजातले ते कोरडे शब्द

त्यालाच भावत नाहीत

मग

राग निघतो माझ्यावर

माझा देहाचा चोळामोळा करून

टाकतो डस्टबिनमध्ये

आणि घेतो दुसरा कागद…

 

बालमित्रा तू तर

खूप मोठं काम केलंस

फक्त दोन काड्या जोडून

मला पार आकाशात नेलंस

भाताने चिटकवल्यास

कागदावर काड्या

वापरला होतास

साधा पुड्यांचा दोरा

आज आहेस निरागस

उद्या होशील मोठा

पतंग छाटण्याच्या नादात

वापरशील नायलॉन दोरा

मला वरती उडताना पाहून

पाहिजे तेवढा हास

फक्त होऊ नकोस रे

कुणाच्या गळ्यातला फास

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाग ३  – बालमानस -१ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३  – बालमानस -१ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

[भारतीय संस्कृतीतमध्ये आपल्या जीवनात असणार्‍या गुरूंना अर्थात मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तिंना अत्यंत महत्वाचे स्थान आहे, हे महत्व आपण शतकानुशतके वेगवेगळ्या पौराणिक, वेदकालीन, ऐतिहासिक काळातील अनेक उदाहरणावरून पाहिले आहे. आध्यात्मिक गुरूंची परंपरा आपल्याकडे आजही टिकून आहे. म्हणून आपली संस्कृतीही टिकून आहे.

एकोणीसाव्या शतकात भारताला नवा मार्ग दाखविणारे आणि भारताला आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहात आणणारे, भारताबरोबरच सार्‍या विश्वाचे सुद्धा गुरू झालेले स्वामी विवेकानंद.

आपल्या वयाच्या जेमतेम चाळीस वर्षांच्या आयुष्यात, विवेकानंद यांनी  गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करून जगाला वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची शिकवण दिली आणि धर्म जागरणाचे काम केले, त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि प्रसंगातून स्वामी विवेकानंदांची ओळख या चरित्र मालिकेतून करून देण्याचा हा प्रयत्न आहे.] 

लहान मुलांचे मानसशास्त्र हा मोठा अभ्यासाचा विषय आहे. बाल वयात ते आपले आई वडील,    

घरातील लहान मोठे आणि संपर्कातील माणसे यांचे निरिक्षण करीत असतात. ते काय बोलतात ते   

नीट ऐकून मनात साठवत असतात. ते मूल जिज्ञासू असेल तर विचारायलाच नको. कारण या

बालवयात होणारे संस्कार त्याला आयुष्यभर पुरत असतात.

नरेंद्र असाच सर्वांपेक्षा वेगळा. त्याला प्रत्येक गोष्टींचे कुतूहल असे. दुपारच्या वेळी कुटुंबातल्या सर्व स्त्रिया एकत्र जमून रामायण महाभारताचे वाचन करीत असत. त्या कथा नरेंद्रला फार आवडत, रामायणाच्या तर विशेष आवडत. श्रीराम आणि सीता यांच्या विषयी तर नरेंद्रच्या मनात अपार श्रद्धा व भक्ति उत्पन्न झाली होती. एव्हढी की त्यांच्या मूर्ति आणून त्याने खोलीत ठेवल्या आणि त्याची रोज पुजा पण होऊ लागली. एकदा राम कथेच्या कीर्तनात त्याने ऐकले की हनुमंत केळीच्या वनात असतो. त्या बालबुद्धीला खरेच वाटले. कीर्तनकारांना त्याने विचारले, की मला हनुमंत त्या वनात भेटेल का ? कीर्तनकाराने  समजूत काढायची म्हणून, हो म्हटले. आणि नरेंद्र हनुमंताला भेटण्यासाठी  त्या केळीच्या वनात गेला,  खूप वेळ बसला तरी त्याची भेट झाली नाही. निराश होऊन तो परत आला आणि आईला संगितले .आईने “ प्रभु रामाचंद्राने काहीतरी काम सांगितलं असेल म्हणून तो तिकडे गेला असणार अस सांगून बालमनाची समजूत काढली खरी. आणखी एकदा असाच अनुभव त्याला आला.

त्यांच्याकडे नोकर चाकर होते ते अदबीने वागत बोलत. प्रेमळ होते ते. त्यांच्या मुलांशी गप्पा ही होत असत. एकदा नरेंद्रशी बोलत असताना एका नोकराने म्हटले, “विवाह किती वाईट गोष्ट आहे” तर प्रपंचत किती कटू अनुभव येतात तेही त्याने नरेंद्रला संगितले. या बोलण्याचा नरेंद्रवर इतका खोलवर परिणाम झाला की त्याल वाटले, राम आणि सीता या देवतांना आपण मानतो. पण त्यांचा विवाह झाला आहे आणि त्या क्षणीच प्रभू रामचंद्र नरेंद्रच्या मनातून उतरले, त्याने आईकडे धावत जाऊन हे संगितले. पण ती माऊली या बालमानला काय समजवणार? भुवनेश्वरी देवी म्हणल्या. “तू असं कर, श्रीरामांच्या ऐवजी शिवाची पुजा कर. हे म्हणणे पटले. अर्थातच नरेंद्रला हे माहिती नसावे की शिव पार्वती यांचा ही विवाह झालेला आहे म्हणून. त्या बालबुद्धीने लगेच वर खोलीत जाऊन राम -सीतेच्या मूर्ति काढून टाकल्या आणि शिवाची मूर्ती आणून त्याची स्थापना केली. मोठा होई पर्यन्त शिवाची पुजा चालू होती.

असे घडत असते बालमन. बालवयात मुलांना घडवताना त्यांची जिज्ञासा, त्यांचे कुतूहल पूर्ण करताना आईवडिलांनी आणि मोठ्यांनी खूप विचार पूर्वक उत्तरे दिली पाहिजेत. आपण स्वताही वागताना नीट काळजी घेतली पाहिजे.

क्रमशः …

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – संस्मरण ☆ लेखांक # 9 – मी प्रभा… मैत्रबन ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? आत्मकथन ?

☆ लेखांक# 9 – मी प्रभा… मैत्रबन ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

मी अशा काळात आणि समाजात जन्माला आले जिथे बायकांना मित्र नसतात पण लहानपणापासून मला खूप चांगले मित्र मिळाले आहेत, मी पाचवीत असताना, दिलीप मैंदर्गी आणि राजेंद्र किल्लेदार या मित्रांबरोबर शाळेत जात असे.

पुण्यात पाचवी सहावीत शिकत असताना हे दोनमित्र !….नंतर सातवीत असताना शिरूरला गेले, शाळा मुलामुलींची असली तरी मुलंमुली बोलत नसत! त्या शाळेत असताना अनेक मैत्रीणी मिळाल्या, राणी गायकवाड, सरस बोरा, उज्वल धारिवाल, निर्मल गुंदेचा, संजीवनी कळसकर इत्यादी !

नववीत असताना मी आणि राणी गायकवाड एकाच बाकावर बसत असू आणि शाळेत ही बरोबरच येत जात असू,

नववीत असताना आमच्या आयुष्यात अशी घटना घडली की,आयुष्यभर त्या घटनेचे पडसाद येत राहिले, एका काॅलेज मधल्या मुलाने आमच्या दोघींच्या नावे एक पत्र लिहिले होते, मी तुमच्याशी मैत्री करायचे ठरविले आहे….वगैरे !

माझ्या मैत्रीणीला तो मुलगा आवडला होता, म्हणजे प्रेमप्रकरण नाही पण ते एकमेकांकडे पहात असत,हसत असत, मी एकदा  तिच्या घरी गेले असताना तिने तिच्या खिडकीतून रस्त्याच्या पलिकडे उभा असलेला तो मुलगा दाखवला आणि म्हणाली, तो रोज संध्याकाळी इथे उभा असतो,मी या कशातच नव्हते, त्या काळात आमच्या भावांना कोणी सांगितलं की एखादा मुलगा आमच्या मागे आहे की त्या मुलाची चांगलीच पिटाई होत असे.तशी त्या मुलाचीही झाली,त्या मुलाचे नाव वसंत पाचरणे !

काॅलेजमधे गेल्यावर खूपच विचित्र योगायोगाने मी वसंत पाचरणेशी बोलायला लागले.त्याने मला “कुसुमानील” हे कुसुमावती देशपांडे आणि कवी अनिल यांच्या पत्रांचा संग्रह असलेलं पुस्तक वाचायला दिलं,त्यानंतर मी अनिल, बी,बोरकर, पद्मा गोळे,भा.रा.तांबे यांचे कविता संग्रह वाचले, वसंत पाचरणेची मैत्री माझ्या आयुष्यातला टर्निंगपाॅईंट ठरली आहे.

संशयास्पद ठरली तरी ती निखळ, स्वच्छ मैत्री होती, वयाची पासाष्टी ओलांडल्यानंतर स्वतःकडे तटस्थपणे पहाताना हेच जाणवतं काॅलेज मधल्या त्या मैत्री मुळेच पुढील आयुष्यात माझ्या जाणिवा प्रगल्भ झाल्या !

प्रतिकुल परिस्थितीतून बाहेर पडून काव्यक्षेत्रात पाय ठेवता आला,काव्यक्षेत्रात अनेक चांगले मित्रमैत्रीणी मिळाल्या, सगळ्यांचीच नावं घेणं शक्य नाही नाहीतर हा लेख म्हणजे केवळ नामावलीच होईल!

या लेखात मी फक्त मित्र हाच विषय घेतला आहे,वर उल्लेख केलेल्या मैत्रीणी ज्या काळात होत्या तेव्हा कुणीही मित्र नव्हता!

काव्यक्षेत्रातला विशेष उल्लेखनीय  मित्र म्हणजे अॅडव्होकेट प्रमोद आडकर रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष, रंगत संगत या संस्थेशी १९९३ पासून निगडित आहे.या संस्थेत सूत्रसंचालनाच्या अनेक संधी मिळाल्या,साहित्य, नाट्य,कला क्षेत्रातील अनेक मातब्बर लोकांना भेटता आलं! अनेक कविसंमेलनाच्या  आयोजनात सहभागी होता आलं!

रंगत संगत ची कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिले,एकूण ही कारकीर्द समाधान कारक!

या सात आठ वर्षांत व्हाॅटस् अॅप ग्रुप मुळे शाळेत असताना वर्गातील न बोलणारी मुलं आता चांगले मित्र झाले आहेत, पन्नालाल कोठारी,दीपक भटेवरा,सुभाष जैन, दिलीप बोरा, धरमचंद फुलफगर, राजू वाघ डाॅ ढवळे इत्यादी अनेक चांगले मित्र  व्हाॅटस अॅप मुळे मिळालेले !

आणखीन एका मित्राचा उल्लेख  मला करायचा आहे, मी त्यांना भाईसाब म्हणते आणि आमची अजूनही प्रत्यक्ष भेट झालेली नाही,पण खूप चांगली दखल घेऊन मला सतत लिहितं ठेवणारे ईअभिव्यक्ती चे संपादक श्री.हेमंत बावनकर हे सुद्धा एक चांगले मित्र आहेत.

माझ्या आयुष्यात मैत्रीणींचं स्थानही खूप महत्वाचं आहे. ही “सहेलियोंकी बाडी” ही खूप संपन्न आहे पण मैत्रबनात मला मुख्यत्वेकरून मित्रांचाच उल्लेख करायचा होता कारण स्त्रीपुरूष मैत्री कडे अजूनही दुषित नजरेने पाहिले जाते !

स्री च्या आयुष्यात बाप, भाऊ,नवरा, प्रियकर या नात्यांइतकंच मित्र हे नातं महत्त्वाचं आहे……या निखालस  नात्याचे नितांत सुंदर अनुभव मी घेतले आहेत.

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 76 – दोहे ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र”

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपके अप्रतिम कालजयी दोहे।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 76 –  दोहे ✍

चटकाते चप्पल फिरे, फिर चुनाव की दौड़ ।

मंत्री पद पर बैठकर, जोड़े पांच करोड़।।

 

पावन गांधी नाम को, इतना किया खराब।

 नाम रखा उस मार्ग का, बिकती जहां शराब।।

 

चादर गांधी नाम की, ओढ़े फिरें जनाब ।

मांसाहारी आचरण, जमके पियें शराब।।

 

सत्याग्रह के अर्थ को, क्या समझेंगे आप ।

भ्रष्ट आचरण युक्त हैं, सारे क्रियाकलाप।।

 

तख्तनशीनी  हुई तो, हुए दूधिया आप ।

बदली सारी व्यवस्था, छिपा लिए सब पाप।।

 

© डॉ राजकुमार “सुमित्र”

7/2/22

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव-गीत # 76 – “उधर पिलाती-दूध विमाता ….” ☆ श्री राघवेंद्र तिवारी

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा ,पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित । 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है।  आज प्रस्तुत है एक भावप्रवण अभिनवगीत – “उधर पिलाती-दूध विमाता …।)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 76 ☆।। अभिनव-गीत ।। ☆

☆ || “उधर पिलाती-दूध विमाता …” || ☆

बैल गाड़ियों की सँध में

जो रोटी  का टुकड़ा ।

पड़ा हुआ है,देख रहा वह,

रामदीन-कुबड़ा ।।

 

उधर पिलाती-दूध विमाता,

छोटे भाई को।

और,देख भौंचक रमदिनवा

बडी  बिलाई को ।

 

दूर खड़ा भागीरथ काना

माँ को ताके है ।

दूध पिलाती सुखिया के

यौवन को आँके  है ।

 

अपनी-अपनी सब जुगाड़-

 में,पायेगा केवल-

इन लोगों के क्षुधा-युद्ध में

जो होगा तगड़ा ।।

 

राम दीन भी सरक रहा है

लक्ष्य बना रोटी ।

बिल्ली लगी हुई फिट

करने में अपनी गोटी ।

 

सोच रही माँ इस काने की

तनिक निगाह हटे ।

मिल जाए वह रोटी का

टुकड़ा बिन राम रटे ।

 

सारे लोग व्यस्त अपनी

केवल इस चिंता में ,

” ईश्वर  बिनती सुने हमारी

निपट जाए झगड़ा ।।”

 

©  श्री राघवेन्द्र तिवारी

06-07-2022

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ व्यंग्य # 123 ☆ “लोक-लुभावन बजट” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय

श्री जय प्रकाश पाण्डेय

(श्री जयप्रकाश पाण्डेय जी   की पहचान भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी के अतिरिक्त एक वरिष्ठ साहित्यकार की है। वे साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। उनके  व्यंग्य रचनाओं पर स्व. हरीशंकर परसाईं जी के साहित्य का असर देखने को मिलता है। परसाईं जी का सानिध्य उनके जीवन के अविस्मरणीय अनमोल क्षणों में से हैं, जिन्हें उन्होने अपने हृदय एवं साहित्य में  सँजो रखा है।आज प्रस्तुत है  एक विचारणीय व्यंग्य ।“लोक-लुभावन बजट”।)  

☆ व्यंग्य # 123 ☆ “लोक-लुभावन बजट” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय

“लोक-लुभावन बजट”

जनता का बजट है, जनता के लिए बजट है,पर सरकार कह रही है कि ये फलांने साब का लोकलुभावन बजट है।खूब सारे चेहरों को बजट के बहाने साब की चमचागिरी करने का चैनल मौका दे रहे हैं। विपक्ष विरोध कर रहा है या विपक्ष अपना धर्म निभा रहा है ये तो पता नहीं, पर जनता को कुछ लोग बता रहे हैैं कि विपक्ष भी होता है,जो बजट के समय बोलता है।

छकौड़ी दो दिन से खाद लेने की लाइन में लगा रहा खाद नहीं मिल पायी तो भूखा प्यासा टीवी पर बजट देखने लगा। उसने देखा एक  चमचमाते माॅल में बजट बाजार  ।इस बजट में खाद मिलने की उम्मीद। उसने देखा बेरोजगार बेटे के लिए 60लाख रोजगार का सपना। उसने देखा माल के दुकानदार निकल निकल कर हंस रहे हैं, एक सजी धजी लिपिस्टिक लगी एंकर चिल्ला रही है,बजट में गांव की आत्मा दिख रही है, माॅल के कुछ लोग तालियां बजाने लगे।

छकौड़ी का भूखा पेट गुड़गुड़ाहट पैदा कर रहा है, गैस बन रही है, माॅल में जो दिख रहा उसे देखना मजबूरी है। एकदम से चैनल पलटी मार कर इधर लंच के दौरान बजट पर चर्चा पर आकर रुकता है, पार्टी के बड़े पेट वाले और कुछ बिगड़े बिकाऊ पत्रकार भी बैठे हैं, लाल परिधान में लाल लाल ओंठ वाली बजट के बारे में बता रही है, सबके सामने थालियां सज गयीं हैं, थाली में बारह तेरह कटोरियों में पानी वाली सब्जियां डालीं जा रहीं हैं, दो दुबले-पतले खाना परोसने वाले मास्क लगाकर खाना परोस रहे हैं, इतने सारे बड़े पेट वाले बिना मास्क लगाए, स्वादिष्ट व्यंजन सूंघ रहे हैं, बजट पर चर्चा चल रही है, कुछ लोग खाने के साथ बजट खाने पर उतारू हैं। कोरोना दूर खड़ा हंस रहा है। 

भूखा प्यासा छकौड़ी जीभ चाटते हुए सब देख रहा है। साब बार बार प्रगट होकर कहते हैं  बजट की आत्मा में गांव है और गांव के किसान के लिए ही बजट है। बजट तुम्हें बधाई। बजट तुम्हें सुनने में खूब मजा आया, अंग अंग रोम रोम रोमांचित हो गया, अंग अंग कान बन गए, सपनों के गांव में  उम्मीद के झूले झूलने का अलग सुख है।

 

© जय प्रकाश पाण्डेय

416 – एच, जय नगर, आई बी एम आफिस के पास जबलपुर – 482002  मोबाइल 9977318765

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी #66 ☆ # तुम क्यों उदास रहती हो‌ ?# ☆ श्री श्याम खापर्डे

श्री श्याम खापर्डे

(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “# तुम क्यों उदास रहती हो‌ ? #”) 

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 66 ☆

☆ # तुम क्यों उदास रहती हो‌ ? # ☆ 

तुम क्यों उदास रहती हो ?

दिल की बात खुल के

क्यों नहीं कहती हो ?

घुट घुट के जीना भी है

कोई जीना ?

उन्मुक्त नदी सा क्यों नहीं

बहती हो?

 

उड़ते पंछियों को देखो

कब पिंजरे में बंद रहते है

नापते है आसमां की उंचाई

चांद तारों को

मात करते है

तुम आजादी का पाठ

इनसे क्यों नही

सीखती हो ?

तुम क्यों उदास रहती हो ?

 

तुम्हारे भी कितने सपने होंगे

तुम्हारे भी कितने अपने होंगे

कोई तो होगा दिल के करीब

दिल के जज्बात

जिससे कहने होंगे

प्यार छुपाने की जरूरत क्या है ?

अपने महबूब से

 क्यों नहीं कहती हो ?

तुम क्यों उदास रहती हो?

 

जिंदगी में किस्मत से

प्यार मिलता है

चाहने वाला सच्चा

दिलदार मिलता है

थाम लो तुम हाथों में

हाथ उसका

वरना जीवन भर का

सिर्फ इंतजार मिलता है

प्यार इबादत है,

दुनिया से क्यों डरती हो ?

तुम क्यों उदास रहती हो ? /  

© श्याम खापर्डे 

फ्लेट न – 402, मैत्री अपार्टमेंट, फेज – बी, रिसाली, दुर्ग ( छत्तीसगढ़) मो  9425592588

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 68 ☆ आयुष्य अष्टाक्षरी…. ☆ महंत कवी राज शास्त्री

महंत कवी राज शास्त्री

? साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 68 ? 

आयुष्य अष्टाक्षरी…. ☆

कसे असावे आयुष्य

याचा विचार करावा

शांत वृत्ती मन शुद्ध

संग चांगला असावा…!!

 

संग चांगला असावा

क्षण इथे महत्वाचा

वेळ थांबत नाहीच

घ्यावा माग अनेकांचा…!!

 

घ्यावा माग अनेकांचा

दृष्टी असावी सोज्वळ

मित भाष्य प्रेमभाव

मनी नसावा कश्मळ…!!

 

मनी नसावा कश्मळ

स्नेह भावना जपावी

घ्यावा निरोप सप्रेमे

अशी तयारी असावी…!!

 

अशी तयारी असावी

राज माझ्या मनीचे

उक्त केले सहज मी

जपा बंध जीवनाचे…!!

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देव तारी त्याला…. ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

डॉ. ज्योती गोडबोले

 

? मनमंजुषेतून ?

☆ देव तारी त्याला…. ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

देव तारी त्याला।

सत्य हे कल्पिता पेक्षा अद्भुत असते, याचा अनुभव आम्ही डॉक्टर मंडळी, रोजच्या आयुष्यात घेतच असतो.

काहीवेळा छातीठोकपणे सांगितलेले  अंदाज सपशेल चुकतात आणि काहीवेळा हताश होऊन सोडून दिलेले निदान साफ चुकते आणि रुग्ण खडखडीत बरे होतात.

माझ्या हॉस्पिटलमध्ये एक रात्री अचानक एक patient प्रसूतीसाठी आली. तिने नावनोंदणीही केलेली नव्हती.

 दुसरीच माझी patient तिला घेऊन आली होती.

मी  patient ला टेबलवर घेतले,तपासले.

तरुण मुलगी होती ती.

खूप रक्तस्त्राव झाला होता आणि जेमतेम सातवा महिना असेल नसेल.

प्रश्न विचारत बसण्याची ती वेळच नव्हती.

मी सर्व उपचार लगेच सुरू केले तिच्या नवऱ्याला रक्तपेढीत रक्त  आणायला पाठवले.पैसेही मीच दिलेत्याला. होते कुठे त्याच्या जवळ काहीच.

तिला saline लावले,योग्य ते उपचार सुरू केले.तोपर्यन्त त्याने रक्ताची  बाटलीही आणली होती.

तिला चांगल्या वेदना सुरू झाल्या आणि ती सुखरूप प्रसूत झाली.

मी ते मूल जेमतेम बघितले आणि त्या बाईंचे bp नीट आहे ना,रक्तस्त्राव कमी झालाय ना यात गुंतले ते मूल आमच्या  नर्सबाईने नीट गुंडाळून ठेवले. क्षीण आवाजात त्याने आपण आहोत ही ग्वाही दिली मीत्याच्या कडे वळले मुलगा होता तो.वजन 1000 ग्रॅम.

अगदी अपुरी,,वाढ आणि  बिचारे ते बाळ धाप लागली म्हणून कण्हत होते.

मी बाहेर आले,तिच्या नवऱ्याला म्हटले तुमची बायको वाचलीय पण हे एव्हढेसे अपुऱ्या दिवसाचे बाळ जगणे फार अवघड आहे हो तुम्ही त्याला आमच्या बाळाच्या डॉक्टर च्या हॉस्पिटल मध्ये दाखल करा तरच काही आशा आहे याची.

त्यांनी   आपापसात चर्चा केली.

बाई आमच्याकडे एवढे पैसे नाहीत त्याला काचेच्या पेटीत ठेवावं लागंल ना.

मी  आता मात्र चिडले आणि म्हणाले या मुलीची हेळसांड केलीतच पण आता हे बाळ तरी वाचवायचा  प्रयत्न नको का करायला.

कसली हो माणसे आहात तुम्ही आत्ता लगेच दाखल करा याला ते जगायची शक्यता अगदी थोडी आहे पण तरीही न्या त्याला मग ते त्याला घेऊन गेले आणि  बाळाच्या हॉस्पिटल मध्ये ते मूल भरती झाले मला लगेच आमच्या बालरोगतज्ञांचा फोन.

अग बाई, हे किती गंभीर स्थितीतले बाळ आहे कल्पना दिली आहेस ना, की हे वाचण्याचे  चान्सेस 10 टक्के पण नाहीत.

मी हो म्हणाले,त्यांनीही सर्व परिस्थितीची कल्पना नातेवाईकांना दिली, आणि उपचार सुरु झाले.

ते मूल 3 आठवडे तिकडे होते.आमचे बाळाचे डॉक्टर म्हणाले जगणार बर का ते मूल पण मंद बुद्धी होतेय की काय अशीही भीती असतेच ,या केसेस मध्ये

तशी स्पष्ट कल्पना दिलीय मी त्याच्या आईवडिलांना.

 या गोष्टीला खूप वर्षे झाली.निदान पंचवीस तरी.

किती तरी घडामोडी झाल्या आमच्याही आयुष्यात.

माझी मोठी मुलगी लग्न होऊन परदेशी गेली बाळाच्या डॉक्टरांचा मुलगाही डॉक्टर झाला.

एक दिवस माझ्या दवाखान्यात, एक पोलीस जीप थांबली झाले..दवाखान्यासमोर गर्दीच झाली.

बाईंच्या दवाखान्यात पोलीस कसे?

मीही घाबरूनच गेले, की काय बुवा भानगड झाली.. जीप मधून एक उमदा पोलीस इन्स्पेक्टर उतरला.

आत येऊ का बाई?

होहो या ना. मी म्हटले बसा, बसा.

माझ्याकडे काय काम काढले.

हे बघा,भीतीच वाटते बर का पोलिस बघितले की.

आम्ही डॉक्टर असलो तरी,एक ठोका चुकतोच.

तो हसला,आणि बाहेर जमलेल्या गर्दीला क्षणात  पिटाळून लावले.  आत आला आणि चक्क माझ्या पाया पडला. अहो अहो, हे काय करताय प्लीज असे नका करू, मी ओळखत नाही तुम्हाला.

बाई ,तुमचा पत्ता शोधत आलोय बघा माझ्या आईने मला पाठवलंय तुम्हाला आठवतंय का, त्या एका तरुण मुलीला तुम्ही वाचवले आणि ते  बाळ दुसऱ्या  दवाखान्यात पाठवले?

आता मला आठवले,होय हो,आठवले तर.

काय हो ते मूल. कोबीच्या गड्ड्या एवढे होते हो चिमुकले.पण त्याचे,आता काय?

तो हसला आणि म्हणाला,तोच कोबीचा   गड्डा तुमच्या समोर उभा आहे.

तुम्ही आणि त्या डॉक्टर साहेबानी वाचवलेले ते मूल म्हणजे मीच.

तुम्ही मला जीवदान दिलेत बाई.

माझी आई रोज तुमची आठवण काढते म्हणते, तुझा बाप  तयारच नव्हता  तुला ऍडमिट करायला.

ती बाई देवासारखी उभी राहिली खूप रागावली तुझ्या आजीला,बापाला मग केले तुला ऍडमिट नाहीतर कसला जगणार होतास  रे तू बाळा.

बाई,तुमचा पत्ता शोधत आलो.

खूप हाल काढले हो आम्ही मी आणि आईनी.

बाप मी लहान असताना  शेतात साप चावून वारला.

माझ्या आईने लोकांची धुणीभांडी करून मला मोठाकेला.

मी बीकॉम झालो,आणि मग  mpsc पास केली तुमच्या कृपेने पोलीस इन्स्पेक्टर झालो मी तर अवाकच झाले हे ऐकून.

म्हटले,अहो,मी काय केलेय सगळे कष्ट तुम्हा माय लेकराचे आहेत हो आणि बाळा,तूजगलास,  ती त्या परमेश्वराचीच कृपा.

माझ्या डोळ्यातून आणि त्याच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले म्हणाला,माझे लग्न आहे पुढच्या महिन्यात आई म्हणाली बाईना आणि बाळाच्या डॉक्टरांना अवश्य बोलवायचे.

त्यांनी दुनिया दाखवली तुला बाबा.

बाई,गावाला लग्न आहे.

मी जीप पाठवीन  तुम्ही ,आणि ते डॉक्टर यायलाच  पाहिजे माझ्या हातात मोठी पेढ्याची बॉक्स आणि एक भारी साडी ठेवून तो निघून गेला.

मी आणि  आमचे मुलांचे डॉक्टर, मुद्दाम त्याच्या लग्नाला,आवर्जून गेलो.

त्याच्या आईला ,आम्हाला बघून आभाळ  ठेंगणे झाले .

आम्हालाही खूप  आनंद झाला ते लक्ष्मी नारायणा सारखे जोडपे बघून आम्हाला गहिवरूनच आले.

मुलांचे डॉक्टर मला  म्हणाले, अग, या  पोरा बरोबरच एक चांगले 8 पौंडी मूल  ऍडमिट झाले होते.

ते काहीही कारण नसताना दगावले बघ.

आणि देवाचे तरी आश्चर्य बघ हे आपण आशा सोडलेले पोर, आज किती मोठे झाले.

देवाची लीला अगाध आहे हेच खरे ग बाई.  त्या दोघांना  आशीर्वाद देऊन, ते नकोनको म्हणत असतानाही भरपूर आहेर,करून आम्ही परतलो.

 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares