≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “भिकूसासेठ…” – संकलन : श्री माधव सावळे ☆ श्री मोहन निमोणकर ☆
श्री मोहन निमोणकर
☆ “भिकूसासेठ…” – संकलन : श्री माधव सावळे☆ श्री मोहन निमोणकर ☆
साधारण वीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. सकाळी साडेसहाची वेळ. मित्राचं पेठेत दुकान आहे. बाबा गावाला जायचे होते म्हणून त्यांना सोडायला, स्टॅन्डवर गेलो होतो. येता येता त्याच्याकडे डोकावलो.
आमचा हा मित्र सकाळी सव्वासहाला दुकान उघडतो. दुकान चालतंय कसलं… पळतय.
नीचे दुकान ऊपर मकान.
जनरल कम किराणा.
दूध, ब्रेड, बटर, अंडी, केक, बिस्कीटं,
घडीच्या पोळ्या घेणारी गिऱ्हाईकं सकाळ पासून गर्दी करायची.
दुकानापाशी पोचलो. दुकानासमोरचा डांबरी रस्ता. तेवढा तुकडा छान झाडून घेतलेला. पायरीपाशी कोपऱ्यात एक स्टीलची रिकामी बादली. मित्रानं पाण्याचा छान सडा घातला होता.
पाण्याचा छान ओलेता वास येत होता.
पायरीसमोर वहिनी छान रांगोळी काढत होती.
मी दुकानात शिरलो. पाठोपाठ वहिनी सुद्धा घरात शिरली. पाच दहा मिनटं गप्पा झाल्या. मग बेल वाजली.
दुकानातला पोरगा वर जाऊन चहाचा ट्रे घेऊन आला. बेल वाजणं म्हणजे चहा तयार आहे.
घुटक घुटक चहा घेत होतो. एवढ्यात एक माणूस दुकानात शिरला. पांढरा शुभ्र पायजमा. पांढरा बंडीसारखा शर्ट.
डोक्यावर गांधी टोपी.
“नमस्कार मालक. कसे आहात ?”
मित्र लगेच उठला. काऊंटरची फळी उघडून त्यांना आत घेतलं. बसायला खुर्ची दिली. पटकन वरची बेल वाजवली.
पाच मिनटात पुन्हा चहा आला. एकंदर बडी आसामी असावी.
“मालक एक विनंती आहे. वहिनी रोज पायरीपुढे रांगोळी काढते. तू देवाला हारफुलं वाहतोस. उदबत्ती लावतोस.
प्रसन्न वाटतं. पन तू रोज बादलीभर पाणी मारतो ना रस्त्यावर. ते नको करत जाऊस बाबा. पाणी वाया जाते अशान्.
पाण्यामदी जीव असतो. पाणी देव हाये आमच्यासाठी. देवाचा अनमान करू नका माऊली… “
पाच दहा मिनटं गप्पा मारून पाहुणे गेले.
” कोण हे ?” मी विचारलं.
‘तू ओळखलं नाहीस ?’
‘नाही बुवा.
‘भिकूसाशेठ. चोपडा ज्वेलर्सचे मालक. एकदम सज्जन माणूस. सचोटीनं धंदा करतोय गेली अनेक वर्ष. शून्यातून उभं केलंय सगळं. एम जी रोडवरची मोठी पेढी. उपनगरातही मोठं दुकान चालू केलंय नुकतंच. घनो चोखो धंदो. पण म्हाताऱ्याला वेड लागलंय. सकाळी सकाळी गावभर हिंडत असतो. कुणी दुकानापुढं सडा घालताना दिसला, की हात जोडून उभा राहतो. पाणी वाया घालवू नका म्हणतो. लोकं तेवढ्यापुरतं ऐकतात.. तो पुढं गेला की रस्ते पुन्हा ओले. आपला गाव कसाय तुला माहित्येय. बहुतेक नळांना तोट्याच नाहीत. पाणी भरून झालं तरी नळ तसेच वाहत असतात. शेकडो लीटर पाणी वाया जातं. भिकूसाशेटच्या चुलतभावाचं हार्डवेअर शाॅप आहे.
शेटच्या हातात एक पिशवी असते.
पिशवीत पान्हा आणि तोट्या. वाहतं पाणी दिसलं की हा तिथं जातो. तोटी लावून देतो. स्वखर्चानं…!! मान्य की पाणी वाया जातं. पण दुकानापुढं पाणी मारलं की धूळ खाली बसते. जरा गारवा वाटतो. हे याला कोण सांगणार? बरं, इथं पाणी वाचलं तरी ते तिकडे दुष्काळी भागात कसं पोचेल?म्हाताऱ्याची सटकलीय, झालं.
“मला हे माहितच नव्हतं. मला यात स्टोरीचा वास आला. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हाताऱ्याला गाठला. तो आणखीन एका दुकानात शिरला होता. ” सकाळी दुकानापुढे पाणी मारू नका हो. “
त्याची आर्जवं, त्याची विनवणी.
त्याच्या हातातली पिशवी, तोट्या.
सगळं रेकाॅर्ड केलं. न्यूज चॅनलला पाठवून दिलं.
पेपरमधे छापून आलं. म्हातारा एका रात्रीत फेमस झाला.
तरीही बदलला नाही. त्याची रोजची प्रभातफेरी चालूच राहिली.
आताशा दुकानदारांना लाज वाटायला लागली. डांबरी रस्त्यांवरचे ओले सडे जवळजवळ बंद झाले. उघड्या नळाचं वाहतं पाणी बंद झालं.
न्यूज चॅनलवाल्यांनी याचं पुन्हा एकदा फीचर केलं. त्याचा छोटासा इंटरव्ह्यू घेतला.
ढसाढसा रडला म्हातारा. म्हणाला,
“‘मारवाडातलं गाव होतं माझं…. पण एकदम कोरडं ठाक!! पाण्यासाठी चार चार किलोमीटर वणवण फिरायची आई माझी. आणि आईबरोबर मीही.
एक एक थेंब प्राण कंठाशी आणायचा.
पाण्यात देव दिसायचा. इथली उधळमाधळ बघितली की जीव तुटतो माझा. मला पता आहे, लोक माघारी माझी टिंगल करतात. पन धापैकी एक मानस तरी ऐकतो. माझा काम झाला की मग…. !!*
त्याचा इंटरव्ह्यू ऐकला आणि मला, त्या म्हाताऱ्यातच देव दिसू लागला.
मागच्या महिन्यात गावी गेलो होतो.
बऱ्याच वर्षांनी. पेठेतल्या मित्राच्या दुकानी पोचलो सकाळी सकाळी.
एकदम आठवण झाली.
“त्या भिकूसाशेटचं काय झालं ?”
“पेठेतलं दुकान बंद झालं त्यांचं. “
“का बरं?”
“झालं म्हणजे त्यानंच बंद केलं. रिटायरमेंट म्हण ना!! उपनगरातलं चाललंय जोरात. ते दुकान पोरं सांभाळतात. कोटी कोटींची उड्डाणं.
म्हाताऱ्यानं त्यातल्या एका पैशालाही हात लावला नाही. डोंगरगावला मोठी टाकी बांधून दिली आईच्या नावानं.
बायाबापड्यांचे ऊन्हाळ्यात फार हाल व्हायचे. तिकडं नळाला पाणी आलं, आणि इकडं म्हाताऱ्यानं डोळे मिटले.. “
दोन मिनटं कुणीच कुणाशी बोललं नाही.
ग्रेट होता भिकूसाशेट.
मी मनातल्या मनात त्याला हात जोडले… आणि निघालो.
कालचीच गोष्ट.
सोसायटीत एक जण रोज गाडी धूतो.
त्याला गाठला. हात जोडून विनंती केली, ” रोज नको, आठवड्यातून एकदा धूत जा “
त्यानं ऐकलं. मी खूष.
एकदम भिकूसा आठवला.
डोंगरगावचा नळ माझ्या डोळ्यातून ठिबकू लागला.
सर्वांना स्पेशल विनंती.. लाईक नाही केलं तरी चालेल पण सध्या उन्हाळा आहे. थोडं पाणी जपून वापरा ही नम्र विनंती…
संकलन : प्रा. माधव सावळे
प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक ‘अग्निसाक्षी’ सैनिक ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ एक ‘अग्निसाक्षी’ सैनिक !☆ श्री संभाजी बबन गायके☆
लेफ्टनंट कमांडर धर्मेंद्रसिंग चौहान
मध्यप्रदेशातील रतलाम नावाचं त्याचं जन्मगाव समुदसपाटीपासून सुमारे ४८० मीटर्स उंचीवर आणि कोणत्याही समुद्रकिना-यापासून शेकडो किलोमीटर्स दूर! पण छोट्या धर्मेंद्रला लहानपणापासूनच समुद्राचं आकर्षण होतं आणि त्यापेक्षा जास्त समुद्रात लाटांवर स्वार होत क्षितीजापर्यंत आणि क्षितीजाच्याही पल्याड जाण्या-या नौकांचं. पावसाळ्यात वाहत्या पाण्यात सोडल्या जाणा-या कागदी होड्या त्याला फारशा भावायच्या नाहीत. उलट इतिहासाच्या पुस्तकातल्या जुन्या लढाऊ जहाजांची मोहिनी त्याला पडली होती. जहाजं एवढी मोठी असतात आणि तरीही ती पाण्यावर सहजपणे तरंगत जातात तरी कशी असा प्रश्न त्याच्या बालमनाला सहज पडत असे.
हे आणि असेच काही प्रश्न मनात घेऊन हा मुलगा इंजिनीअर झाला. अर्थातच उत्तम नोकरी शोधावी आणि गृहस्थाश्रमात पडावं असं त्याला आणि त्याच्या पालकांना वाटणं साहजिकच होतं. पण धर्मेंद्र सिंग यांनी अभियांत्रिकी पदवी मिळवली होती ती सेनादलात जाण्यासाठीच. भारतीय नौदलात नौसैनिक अधिका-यांची भरती निघताच धर्मेंद्रसिंग यांनी आपली सारी बुद्धीमत्ता, शारीरिक क्षमता पणाला लावून भारतीय नौसेनेचा चमकदार सफेद गणवेश अंगावर चढवलाच. त्यांच्या डोक्यावरची नौसेनेची विशिष्ट कॅप त्यांच्या व्यक्तिमत्त्वातल्या तजेलदारपणाला आणखीनच उजाळा देणारी दिसे. वर्ष होतं २०१३.
गावातल्या नदीत, तळ्यात पोहणं, नौकाविहार करणं वेगळं आणि थेट लढाऊ जहाजांवर देशसेवा करायला मिळणं वेगळं. धर्मेंद्र्सिंग आणि समुद्राचं नातं फार लवकर जुळलं आणि अर्थातच लढाऊ जहाज हे त्यांचं दुसरं निवासस्थान बनलं.
त्यांना लाभलेलं पाण्यातलं निवासस्थान काही साधंसुधं नव्हतं. तब्बल बावीस मजली इमारतीएवढी उंची होती या घराची आणि वजन होतं ४४, ५०० टन. लांबी म्हणजे फुटबॉलच्या तीन मैदानं बसतील इतकी आणि रुंदी म्हणाल तर कित्येक लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स सहज मावतील एवढी. आणि नाव होतं आय. एन. एस. विक्रमादित्य! भारताची सर्वांत शक्तिशाली, आधुनिक युद्धनौका. रशियाकडून खरेदी केली गेलेली ही युद्ध नौका सरतेशेवटी अतिशय सुसज्ज होऊन २०१४ मध्ये भारतीय नौदलात प्रवेश करती झाली आणि तिने शत्रूच्या काळजात धडकी भरवली.
युद्धनौकेवर अतिशय उच्च दर्जाचं प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक असतं. विक्रमादित्य वर जवळ जवळ सव्वाशे अधिकारी आणि पंधराशे नौसैनिक कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यास सदैव सज्ज असतात. धर्मेंद्र सिंग साहेबांनी एका नौसैनिकाला अत्यावश्यक असलेली सर्व कौशल्ये अल्पावधीत शिकून घेतली. आण्विक, जैविक आणि रासायनिक युद्धासाठी आवश्यक कौशल्ये शिकण्यात तर त्यांनी उच्च दर्जा प्राप्त केला होता. अग्निप्रतिबंध या विषयात तर त्यांना खूप गती होती.
आय. एन. एस. अर्थात इंडियन नेवल शिप ‘विक्रमादित्य एप्रिल २०१९ मध्ये मित्रराष्ट्रांच्या सोबत मोठ्या युद्धसरावात सहभागी होणार होतं. यासाठी खूप मोठी तयारीही केली जात होती.
महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या करुणा यांचं स्थळ धर्मेंद्र सिंग साहेबांना सांगून आलं होतं. वयाची तिशी आली होती आणि विवाह योग जुळून आला होता. नौसैनिकांना खूप मोठ्या कालावधीसाठी जहाजांवर वास्तव्य करावं लागतं. युद्धनौका म्हणजे एक तरंगतं शहरच जणू. इथं राहण्यासाठी खूप मजबूत मन:शक्ती आणि संयम आवश्यक असतो.
आपलं आवडतं जहाज सरावात सहभागी असणार आणि आपण त्यावर नसू याविचाराने धर्मेंद्र सिंग साहेबांनी आपल्या विवाहानंतर काही तासांतच समुद्राची वाट धरली. विवाहात अग्निला साक्षीला ठेवून त्यांनी सात प्रदक्षिणा घालतानाही त्यांच्या मनात आपलं कर्तव्य असावं. आणि योगायोगानं विक्रमादित्यवरही त्यांना अशीच एक जीवघेणी अग्नि-प्रदक्षिणा घालावी लागेल, असं कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं.
विक्रमादित्य कर्नाटकातील कारवार बंदरात प्रवेश करण्याच्या अगदी बेतात असताना नौकेच्या इंजिनरूम मध्ये आग भडकल्याचं समजलं. नौकेवरची अग्निशमन यंत्रणा सज्ज होतीच आणि नौसैनिक सुद्धा. लेफ्टनंट कमांडर पदावर पोहोचलेले धर्मेंद्रसिंग चौहान साहेब या अग्निशमन मोहिमेचे धडाडीने नेतृत्व करीत होते. या कामात त्यांना उत्तम गती होती. भारताची एवढी मोठी दौलत, सोळाशेच्या वर नौसैनिकांचे भवितव्य पाण्यात लागलेल्या त्या अग्नितांडवात रसातळाला जाण्याची शक्यता नाकारता येणार नव्हती.
धर्मेंद्रसिंग साहेब मोठ्या त्वेषाने धुराने भरलेल्या कक्षामध्ये शिरले. त्यांचा आवेश पाहून इतर नौसैनिकांनाही स्फुरण चढले. आगीवर नियंत्रण मिळण्याची चिन्हे अगदी दृष्टीपथात होती. इतक्यात एक वाफेचा पाईप अचानक फुटला आणि त्यातील अतिशय उष्ण वाफ धर्मेंद्रसिंग साहेबांच्या अंगावर आली आणि ते होरपळून निघाले. नाका-तोंडात आधीच विषारी धूर गेला होताच. समोरचं काही दिसत नव्हतं. पण साहेब मागे हटले नाहीत….. शुद्ध हरपेपर्यंत ते आगीशी सामना करीत राहिले. युद्ध काही मैदानातच लढली जातात असं नव्हे. देशाची संपत्ती जतन करण्यासाठी केलेला संघर्षही युद्धापेक्षा कमी नसतो.
लेफ्टनंट कमांडर धर्मेंद्रसिंग चौहान साहेबांनी विक्रमादित्य आणि त्यावरील सोळाशे सैनिकांचं त्यादिवशी मृत्यूपासून संरक्षण केलं होतं स्वत: अग्निसाक्षी राहून. परिस्थिती नियंत्रणात येताच साहेबांना त्वरीत जवळच्या रुग्णालयात एअरलिफ्ट करून पोहोचवण्यात आलं…. पण अग्निनं डाव साधला होता! चाळीसेक दिवसांपूर्वी विवाहवेदीवर चढलेला तीस वर्षे वयाचा एक उमदा नौसेना अधिकारी आता मृत्यूच्या वेदीवर पहुडला होता. नववधूच्या हातांवरील मेहंदी अजून फिकी पडलेली नव्हती…. मात्र तिच्या सुखी संसाराची नौका मृत्यू नावाच्या खडकावर आदळून अगदी गर्तेत गेली होती… कायमची. आईच्या हृदयचा तर विचार करूनही थरकाप उडावा. मोठ्या सन्मानानं शहीद धर्मेंद्रसिंग साहेबांना रतलामवासियांना अंतिम निरोप दिला. पण भारतीय सैनिकांच्या कुटुंबियांच्या धीरोदात्तपणाची कमाल पहा… काहीच दिवसांत धर्मेंद्र्सिंग साहेबांच्या पत्नीने सैन्यात भरती होण्याची पात्रता पार केली. नौसेनेचा सफेद गणवेश अंगावर परिधान करून प्राणांची बाजी लावलेल्या आपल्या पतील पायदळाचा ऑलिव्ह ग्रीन गणवेश मिळवून श्रीमती करूणा सिंग एक अनोखी भेट देण्यास सज्ज झाल्या. यासाठी झालेल्या मुलाखतीत त्यांनी प्रथम क्रमांकाने बाजी मारली. आणि त्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू झाल्या! सलाम करूणा सिंग मॅडमच्या जिद्दीला. उण्यापु-या पंधरवड्याचा त्यांचा आणि धर्मेंद्रसिंग साहेबांचा सहवास…. पेशाने प्राध्यापिका असलेल्या एका नाजूक तरूणीस थेट सैनिकाचं काळीज देऊन गेला. शहीद सैनिक असेच आपल्या आठवणींतून, कर्तृत्वातून जगाच्या स्मरणपटावर आपली पावलं ठळक उमटवून जातात. यांच्या ऋणातून उतराई होणं कठीण पण त्यांचे स्मरण करणं सहजी शक्य. जयहिंद! जय हिंद की सेना.
सकाळ पासून अनेक मेसेज WA वर येत असतात. बरेचदा आपण वाचतो आणि सोडून देतो. पण काही मेसेजेस विचार करायला लावतात. त्यातलाच हा मेसेज-
‘May it be a Machine or Human Relationship,
Maintenance is always cheaper than repairing. ‘
अगदी खरंय. मशीनची efficiency टिकून राहावी, वाढावी म्हणून आपण नियमितपणे मशीनची देखभाल करतो. कधी थोडेसे जरी दुर्लक्ष झाले तरी मशीन आपल्याला इंडिकेशन द्यायला लागते. तत्परतेने आपण मशीन मधला fault शोधून रिपेअर करतो.
नात्यांचे पण तसेच आहे.
आपल्या अवतीभवती अशी कितीतरी जणं असतात, जी सर्वांच्या नेहमी संपर्कात असतात, आवर्जून फोन करतात, विचारपूस करतात, अधूनमधून प्रत्यक्ष भेटतात सुद्धा. काहींना वाटतं, ही माणसं रिकामी आहेत. त्यांच्याकडे खूप वेळ आहे. तर तसं अजिबात नाही. या व्यक्ती आपल्या रोजच्या व्यापातूनसुद्धा दुसऱ्यासाठी वेळ काढतात. कारण त्यांच्या लेखी नाती महत्त्वाची असतात.
कित्येकांच्या घरी रात्रीचे जेवण घरातील सर्व सदस्यांनी एकत्र घ्यायची प्रथा आहे. मूळ उद्देश हाच की सगळे जण दिवसभरातून एकदा तरी एकमेकांना भेटतात. विचारपूस होते. विचारांची देवाण घेवाण होते. काही समस्या असतील तर त्याचे निराकरण होते. हाच routine maintenance. अशाने नाती टिकून राहतात. एकमेकांबद्दल आदर, प्रेम वाढते. आपली माणसे आपल्यासोबत आहेत, हा विचारसुद्धा खूप महत्त्वाचा असतो.
माझ्या कॉलेज /शाळेच्या ग्रुपमध्ये काहीजण आवर्जून प्रत्येकाच्या वाढदिवशी त्याला फोन करतात. काही जण सोबतचे फोटो शेअर करतात. काही जण कविता किंवा लेख लिहितात.
मला आठवतंय, लहानपणी दर १५ दिवसांनी, महिन्यांनी आजीचे, काकांचे पत्र यायचे, खुशालीचे.
आपल्या पिढीनेही पाहिली असतील पत्रे आलेली. आपणसुद्धा लिहिली आहेत पत्रं. बाहेरगावी किंवा नोकरीच्या ठिकाणाहून.
किती भारी वाटायचं ना पत्र आले की!काळाच्या ओघात पत्रं बंद झाली. आणि त्यांची जागा WA ने घेतली.
कोणी म्हणेल, कशाला करायचा फोन?इथे आपल्याला आपल्या कामाचे व्याप आहेत. आणि मी नाही केला कॉल, मी नाही केली चौकशी तर काय फरक पडणार आहे?
तसे पाहिले तर फरक काहीच पडणार नसतो. पण आपल्या एका फोनने नात्याचे बंध अधिक घट्ट होतात. समोरच्या व्यक्तीच्या आनंदासाठी आपण केलेली कृती म्हणजेच Preventive मेन्टेनन्स.
म्हणूनच Machine सारखाच नात्यांचा Maintenance हवाच.
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : सौ. शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “लामणदिवे” – लेखक : श्री सदानंद कदम ☆ परिचय – सौ. अर्चना मुळे ☆
सौ. अर्चना मुळे
पुस्तकावर बोलू काही
☆ “लामणदिवे” – लेखक : श्री सदानंद कदम ☆ परिचय – सौ. अर्चना मुळे☆
पुस्तक – लामणदिवे
लेखक – श्री सदानंद कदम
प्रकाशक – अक्षर दालन
पृष्ठ संख्या – १४४
मूल्य – रु. २००/-
जेव्हा जेव्हा समाजात अनीती, भ्रष्टाचार फोफावतो तेव्हा तेव्हा समाजाला दिशा देणारा, अंधारात प्रकाश देणारा, छोटीशी ज्योत सतत तेवत ठेवणारा कुणीतरी जन्माला येतो असं म्हटलं जातं. कोणताही काळ मनश्चक्षू समोर आणला तर फक्त एकच सत्य गोष्ट जाणवते, ती म्हणजे सदासर्वकाळ ‘शिक्षक’, ‘गुरु’ हे लोक लहान मुलांवर खरे संस्कार करतात. ही संस्काराची देण दिव्यासम सतत तेवत ठेवतात. हे तेवणारे दिवे मात्र संख्येने नगण्य आहेत हेच खरे.
शाळांमधे मुलाना तोच अभ्यासक्रम सर्जनशील, कृतीशील राहून शिकवणारे, व्यावहारीक ज्ञान देणारे कल्पक शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला आवडले नाहीत तरच नवल! संपूर्ण महाराष्ट्रात असे कितीतरी शिक्षक कार्यरत आहेत. त्यांची माहिती मात्र आपल्यापर्यंत पोहोचत नाही. प्रत्येक पालक अशा शिक्षकांच्या शोधात असतो. पण ते अवलिया शिक्षक हर शाळेत थोडेच असतात. ते असतात लाखात एक! दूरवर!
अशाच शिक्षकांबद्दल भरभरून सांगणारं, त्यांचं कौतुक करणारं आणि त्यांच्या संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचवणारं एक पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय. ‘आयुष्यात अक्षरांची जादू असणार्या सर्व गुरुजनांना सादर… ‘ असं म्हणत लेखकाने सुरुवात केली आहे. लेखकही साधा माणूस. त्याचं साधं वागणं, रांगडी बोलणं, मोकळंढाकळं राहणं याचा लवलेश अधूनमधून पुस्तकात डोकावतो. तो ज्या वाचकाला सापडला त्याला पुस्तकातील सर्व शिक्षक पात्रं नीट समजली असं म्हणता येईल. कारण लेखकाचं भाषेवर कितीही प्रभुत्त्व असलं तरी उगीचंच शब्दांच्या अलंकृतपणाचा आव कुठेही आणला नाही. पुस्तकात शिक्षक – विद्यार्थी, शिक्षक – प्रशासकीय अधिकारी, दोन शिक्षक, शिक्षक – गावकरी यांच्यातील संवाद अगदी सहज, साध्या, सोप्या शब्दात मांडला आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचकांना खिळवून ठेवतं.
हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील १९ अवलिया शिक्षकांची विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवणारी उत्तम प्रयोगशाळा. शिक्षकांचं फक्त कौतुक करायचं म्हणून नाही तर या शिक्षकांनी केलेले प्रयोग अनेक शाळांमधे केले जावेत. मुलांचं शिक्षण आनंददायी व्हावं. मुलांचा आनंद कशात आहे हे लेखकाला चांगलं माहीत आहे कारण तोही एक जिल्हा परिषदेचा या पात्रांसारखा आगळावेगळा शिक्षकच. म्हणून हे पुस्तक महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासात महत्त्वपूर्ण ठरेल यात शंकाच नाही.
प्रत्येक शिक्षकाला लेखकाने जवळून अनुभवलंय. शिक्षकांचं शिकवणं, त्यानी केलेले प्रयोग स्वत: डोळ्यानी बघितलेत. काही अनुभवी शिक्षक सहकार्यांना गुरु मानलंय. त्यानुसार वेगळी, मुलुखावेगळी, तिची कथाच वेगळी, अवलिया, ध्येयवेडा, अंतर्बाह्य शिक्षक, चौसष्ठ घरांचा राजा, स्वप्नं पाहणारं नक्षत्र, विवेकवादाचं झाड, जिद्दी, झपाटलेल्या, सेवाव्रती, कर्मयोगी, कणा असलेले गुरुजी, स्वप्नं पेरणारा माणूस, हाडाचा मास्तर, जंगलातले गुरुजी, मूर्तीमंत आचार्य, मार्तंड जे तापहीन अशा शीर्षकांमधून त्या त्या शिक्षकी सेवेमधील त्यांचं तप दिसतं.
मुलांना मराठी, इंग्लिश, गणित, विज्ञान या सर्व विषयांचं आकलन व्हावं, मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मुलांच्या सर्वोत्तम प्रगतीसाठी झटणार्या या शिक्षकांच्या कार्यकर्तृत्वाला हृदयापासून माझा सलाम!!
महाराष्ट्रातील हे सर्व शिक्षक म्हणजे लेखक सदानंद कदम यांच्या नव्या पुस्तकातील मुलखावेगळे लामणदिवे.
लामणदिवे मधील ही शिक्षक पात्रं कोण आहेत? त्यानी नेमके असे कोणते प्रयोग केले आहेत? ते मुलखावेगळे का ठरले आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या शाळेत हे शिक्षक काम करत आहेत? हे पुस्तक वाचल्यावर यातील पात्राना भेटावसं वाचकाना नक्कीच वाटेल. म्हणून शिक्षकांचे छायाचित्रांसह भ्रमणध्वनी क्रमांक पुस्तकाच्या शेवटी दिले आहेत.
हे पुस्तक म्हणजे पालक शिक्षकांच्या हातातील विद्यापीठ. अक्षरदालन, कोल्हापूर म्हणजे पीठाधिपती. प्रत्येक वाचक हा पुन:श्च असा विद्यार्थी ज्याला वाटेल की असे शिक्षक मला लहानपणी भेटले असते तर… मी वेगळा घडलो असतो.
पालक शिक्षक विद्यार्थी यांच्याबरोबरच समाज विकासाची ज्योत तेवत ठेवण्याची इच्छा बाळगणार्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवं!
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #232 ☆ गुण और ग़ुनाह… ☆ डॉ. मुक्ता ☆
डॉ. मुक्ता
(डा. मुक्ता जीहरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से हम आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का मानवीय जीवन पर आधारित एक विचारणीय आलेख गुण और ग़ुनाह… । यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की लेखनी को इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य # 232 ☆
☆ गुण और ग़ुनाह… ☆
‘आदमी के गुण और ग़ुनाह दोनों की कीमत होती है। अंतर सिर्फ़ इतना है कि गुण की कीमत मिलती है और ग़ुनाह की उसे चुकानी पड़ती है।’ हर सिक्के के दो पहलू होते हैं। गुणों की एवज़ में हमें उनकी कीमत मिलती है; भले वह पग़ार के रूप में हो या मान-सम्मान व पद-प्रतिष्ठा के रूप में हो। इतना ही नहीं,आप श्रद्धेय व वंदनीय भी बन सकते हैं। श्रद्धा मानव के दिव्य गुणों को देखकर उसके प्रति उत्पन्न होती है। यदि हमारे हृदय में उसके प्रति श्रद्धा के साथ प्रेम भाव भी जाग्रत होता है तो वह भक्ति का रूप धारण कर लेती है। शुक्ल जी भी श्रद्धा व प्रेम के योग को भक्ति स्वीकारते हैं। सो! आदमी को गुणों की कीमत प्राप्त होती है और जहां तक ग़ुनाह का संबंध है,हमें ग़ुनाहों की कीमत चुकानी पड़ती है; जो शारीरिक या मानसिक प्रताड़ना रूप में हो सकती है। इतना ही नहीं,उस स्थिति में मानव की सामाजिक प्रतिष्ठा भी दाँव पर लग सकती है और वह सबकी नज़रों में गिर जाता है। परिवार व समाज की दृष्टि में वह त्याज्य स्वीकारा जाता है। वह न घर का रहता है; न घाट का। उसे सब ओर से प्रताड़ना सहनी पड़ती है और उसका जीवन नरक बन कर रह जाता है।
मानव ग़लतियों का पुतला है। ग़लती हर इंसान से होती है और यदि वह उसके परिणाम को देख स्वयं की स्थिति में परिवर्तन ले आता है तो उसके ग़ुनाह क्षम्य हो जाते हैं। इसलिए मानव को प्रतिशोध नहीं; प्रायश्चित करने की सीख दी जाती है। परंतु प्रायश्चित मन से होना चाहिए और व्यक्ति को उस कार्य को दोबारा नहीं करना चाहिए। बाल्मीकि जी डाकू थे और प्रायश्चित के पश्चात् उन्होंने रामायण जैसे महान् ग्रंथ की रचना की। तुलसीदास अपनी पत्नी रत्नावली के प्रति बहुत आसक्त थे और उसकी दो पंक्तियों ने उसे महान् लोकनायक कवि बना दिया और वे प्रभु भक्ति में लीन हो गए। उन्होंने रामचरित मानस जैसे महाकाव्य की रचना की, जो हमारी संस्कृति की धरोहर है। कालिदास महान् मूर्ख थे, क्योंकि वे जिस डाल पर बैठे थे; उसी को काट रहे थे। उनकी पत्नी विद्योतमा की लताड़ ने उन्हें महान् साहित्यकार बना दिया। सो! ग़ुनाह करना बुरा नहीं है,परंतु उसे बार-बार दोहराना और उसके चंगुल में फंसकर रह जाना अति- निंदनीय है। उसे इस स्थिति से उबारने में जहां गुरुजन, माता-पिता व प्रियजन सहायक सिद्ध होते हैं; वहीं मानव की प्रबल इच्छा-शक्ति,आत्मविश्वास व दृढ़-निश्चय उसके जीवन की दिशा को बदलने में नींव की ईंट का काम करते हैं।
इस संदर्भ में, मैं आपका ध्यान इस ओर दिलाना चाहूंगी कि यदि ग़ुनाह किसी सद्भावना से किया जाता है तो वह निंदनीय नहीं है। इसलिए धर्मवीर भारती ने ग़ुनाहों का देवता उपन्यास का सृजन किया,क्योंकि उसके पीछे मानव का प्रयोजन द्रष्टव्य है। यदि मानव में दैवीय गुण निहित हैं; उसकी सोच सकारात्मक है तो वह ग़लत काम कर ही नहीं सकता और उसके कदम ग़लत दिशा की ओर अग्रसर नहीं हो सकते। हाँ! उसके हृदय में प्रेम,स्नेह,सौहार्द,करुणा, सहनशीलता,सहानुभूति,त्याग आदि भाव संचित होने चाहिए। ऐसा व्यक्ति सबकी नज़रों में श्रद्धेय,उपास्य,प्रमण्य व वंदनीय होता है। ‘जाकी रही भावना जैसी,प्रभु तिन मूरत देखी तैसी’ अर्थात् मानव की जैसी सोच,भावना व दृष्टिकोण होता है; उसे वही सब दिखाई देता है और वह उसमें वही तलाशता है। इसलिए सकारात्मक सोच व सत्संगति पर बल दिया जाता है। जैसे चंदन को हाथ में लेने से उसकी महक लंबे समय तक हाथों में बनी रहती है और उसके बदले में मानव को कोई भी मूल्य नहीं चुकाना पड़ता। इसके विपरीत यदि आप कोयला हाथ में लेते हो तो आपके हाथ काले अवश्य हो जाते हैं और आप पर कुसंगति का दोष अवश्य लगता है। कबीरदास जी का यह दोहा तो आपने सुना होगा, ‘कोयला होय न ऊजरा,सौ मन साबुन लाय’ अर्थात् व्यक्ति के स्वभाव में परिवर्तन लाना अत्यंत दुष्कर कार्य है। परंतु बार-बार अभ्यास करने से मूर्ख भी विद्वान बन सकता है। इसलिए मानव को निराश नहीं होना चाहिए और अपने सत् प्रयास अवश्य जारी रखने चाहिए। यह कथन कोटिश: सत्य है कि यदि व्यक्ति ग़लत संगति में पड़ जाता है तो उसको लिवा लाना अत्यंत कठिन होता है,क्योंकि ग़लत वस्तुएं अपनी चकाचौंध से उसे आकर्षित करती हैं–जैसे माया रूपी महाठगिनी अपनी हाट सजाए सबका ध्यान आकर्षित करने में प्रयासरत रहती है।
शेक्सपीयर भी यही कहते हैं कि जो दिखाई देता है; वह सदैव सत्य नहीं होता और हमें छलता है। सो! सुंदर चेहरे पर विश्वास करना स्वयं को छलना व धोखा देना है। इक्कीसवीं सदी में सब धोखा है, छलना है,क्योंकि मानव की कथनी- करनी में बहुत अंतर होता है। लोग अक्सर मुखौटा धारण कर जीते हैं। इसलिए रिश्ते भी विश्वास के क़ाबिल नहीं रहे। रिश्ते खून के हों या अन्य भौतिक संबंध–भरोसा करने योग्य नहीं हैं। संसार में हर इंसान एक-दूसरे को छल रहा है। इसलिए रिश्तों की अहमियत रही नहीं; जिसका सबसे अधिक खामियाज़ा मासूम बच्चियों को भुगतना पड़ रहा है। अक्सर आसपास के लोग व निकट के संबंधी उनकी अस्मत से खिलवाड़ करते पाए जाते हैं। उनकी स्थिति बगल में छुरी ओर मुंह में राम-राम जैसी होती है। वे एक भी अवसर नहीं चूकते और दुष्कर्म कर डालते हैं,क्योंकि उनकी रिपोर्ट दर्ज नहीं कराई जाती। वास्तव में उनकी आत्मा मर चुकी होती है,परंतु सत्य भले ही देरी से उजागर हो; होता अवश्य है। वैसे भी भगवान के यहां सबका बही-खाता है और उनकी दृष्टि से कोई भी नहीं बच सकता। यह अकाट्य सत्य है कि जन्म-जन्मांतरों के कर्मों का फल मानव को किसी भी जन्म में भोगना अवश्य पड़ता है।
आइए! आज की युवा पीढ़ी की मानसिकता पर दृष्टिपात करें, जो ‘खाओ पीयो,मौज उड़ाओ’ में विश्वास कर ग़ुनाह पर ग़ुनाह करती चली जाती है निश्चिंत होकर और भूल जाती है ‘यह किराये का मकाँ है/ कौन कब तक ठहर पायेगा/ खाली हाथ तू आया है बंदे/ खाली हाथ तू जाएगा।’ यही संसार का नियम है कि इंसान कुछ भी अपने साथ नहीं ले जा सकता। परंतु वह आजीवन अधिकाधिक धन-संपत्ति व सुख- सुविधाएं जुटाने में लगा रहता है। काश! मानव इस सत्य को समझ पाता और देने में विश्वास रखता तथा परहितार्थ कार्य करता तो उसके ग़ुनाहों की फेहरिस्त इतनी लंबी नहीं होती। अंतकाल में केवल कर्मों की गठरी ही उसके साथ जाती है और कृत-कर्मों के परिणामों से बचना सर्वथा असंभव है।
मानव के सबसे बड़े शत्रु है अहं और मिथ्याभिमान; जो उसे डुबा डालते हैं। अहंनिष्ठ व्यक्ति स्वयं को श्रेष्ठ और दूसरों को हेय मानता है। इसलिए वह कभी दयावान् नहीं हो सकता। वह दूसरों पर ज़ुल्म ढाने में विश्वास कर सुक़ून पाता है और जब तक व्यक्ति स्वयं को उस तराजू में रखकर नहीं तोलता; वह प्रतिपक्ष के साथ न्याय नहीं कर पाता। सो! कर भला, हो भला अर्थात् अच्छे का परिणाम अच्छा व बुरे का परिणाम सदैव बुरा होता है। शायद! इसीलिए शुभ कर्मण से कबहुं न टरौं’ का संदेश प्रेषित है। गुणों की कीमत हमें आजीवन मिलती है और ग़ुनाहों का परिणाम भी अवश्य भुगतना पड़ता है; उससे बच पाना असंभव है। यह संसार क्षणभंगुर है,देह नश्वर है और मानव शरीर पृथ्वी,जल,वायु, अग्नि व आकाश तत्वों से बना है। अंत में इस नश्वर देह को पंचतत्वों में विलीन हो जाना है; यही जीवन का कटु सत्य है। इसलिए मानव को ग़ुनाह करने से पूर्व उसके परिणामों पर चिन्तन-मनन अवश्य करना चाहिए। ऐसा करने के पश्चात् ही आप ग़ुनाह न करके दूसरों के हृदय में स्थान पाने का साहस जुटा पाएंगे।
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रचना संसार # 7 – नवगीत – प्रभु श्री राम जी की महिमा… ☆ सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’ ☆
सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’
(संस्कारधानी जबलपुर की सुप्रसिद्ध साहित्यकार सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ ‘जी सेवा निवृत्त जिला एवं सत्र न्यायाधीश, डिविजनल विजिलेंस कमेटी जबलपुर की पूर्व चेअर पर्सन हैं। आपकी प्रकाशित पुस्तकों में पंचतंत्र में नारी, पंख पसारे पंछी, निहिरा (गीत संग्रह) एहसास के मोती, ख़याल -ए-मीना (ग़ज़ल संग्रह), मीना के सवैया (सवैया संग्रह) नैनिका (कुण्डलिया संग्रह) हैं। आप कई साहित्यिक संस्थाओं द्वारा पुरस्कृत एवं सम्मानित हैं। आप प्रत्येक शुक्रवार सुश्री मीना भट्ट सिद्धार्थ जी की अप्रतिम रचनाओं को उनके साप्ताहिक स्तम्भ – रचना संसार के अंतर्गत आत्मसात कर सकेंगे। आज इस कड़ी में प्रस्तुत है आपकी एक अप्रतिम रचना – नवगीत – प्रभु श्री राम जी की महिमा…।
रचना संसार # 7 – नवगीत – प्रभु श्री राम जी की महिमा… ☆ सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’
≈ संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकश पाण्डेय ≈
हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – स्त्री ☆ श्री संजय भारद्वाज ☆
श्री संजय भारद्वाज
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
श्री हनुमान साधना – अवधि- मंगलवार दि. 23 अप्रैल से गुरुवार 23 मई तक
श्री हनुमान साधना में हनुमान चालीसा के पाठ होंगे। संकटमोचन हनुमनाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें। आत्म-परिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही। मंगल भव
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
English Literature – Article ☆ – New start at Sixty – ☆ Mr Sunil Deshpande ☆
Mr Sunil Deshpande
☆ Poetry ☆ New start at Sixty- ☆ Mr Sunil Deshpande ☆
हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 363 ⇒ समय पर कविता… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆
श्री प्रदीप शर्मा
(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपकी कविता – “समय पर कविता…“।)
अभी अभी # 363 ⇒ समय पर कविता… श्री प्रदीप शर्मा
मैने कभी कोई काम समय पर नहीं किया,
जब कि मेरे पास पर्याप्त समय था
जिस व्यक्ति ने कभी कविता लिखी ही नहीं,
वह अचानक समय पर कविता लिखेगा,
अगर वह समय पर कविता लिखता,
तो हो सकता है,
आज एक बड़ा कवि होता।
लोग समय पर, जो काम करना है, वह तो करते नहीं,
और बाद में मेरी तरह पछताते हैं।
देर आयद, दुरुस्त आयद। अभी भी समय है।
समय पर कविता लिखने के लिए,
सबसे पहले मैने समय देखा,
समय तो चलायमान है,
मुझे चलते समय पर ही कविता लिखनी पड़ेगी,
मेरे लिए कहां समय ठहरने वाला है। ।
समय पर कुछ पंक्तियां याद आईं,
ये समय बड़ा हरजाई,
समय से कौन लड़ा मेरे भाई।
समय ने मुझे आगाह किया,
तुम मुझ पर कविता लिखना चाहते हो,
अथवा मुझसे लड़ना चाहते हो, व्यर्थ समय मत व्यय करो,
मुझ पर कविता लिखो।
मुझे अच्छा लगा, समय मुझ पर प्रसन्न है,
आज समय मेरे साथ है,
चलो मन लगाकर समय पर कविता लिखें।
कहीं पढ़ा था, समय को शब्द दो।
शायद समय मुझसे शब्द मांग रहा है,
कविता भी शायद वह ही लिख दे।
समय पर क्या स्वयं समय ने कभी कविता लिखी है। अब मैं शब्द कहां से लाऊं।
गूगल शब्दकोश की सहायता लूं
लेकिन मैं जानता हूं, समय इतनी देर ठहरने वाला नहीं
वह मेरी परीक्षा ले रहा है। ।
मैं समय पर कविता लिख रहा हूं या कोई निबंध ? कोई तुक नहीं, मीटर नहीं,
क्या इस तरह सपाट भी कविता लिखी जाती है। समय क्या कहेगा।
फिर खयाल आया,
अकविता और अतुकांत कविता का समय भी तो आया था
कविता में सब चलता है, बस आपका समय अच्छा चलना चाहिए।
जब आज समय मेरे साथ है,
मतलब मेरा समय भी अच्छा ही चल रहा है। साहिर बेवजह ही डरा गए हमको,
आदमी को चाहिए,
वक्त से डरकर रहे।
इतना ही नहीं,
कौन जाने किस घड़ी,
वक्त का बदले मिजाज।
मैने घड़ी की ओर देखा,
मेरा समय ठीक चल रहा था। ।
जब समय का मूड अच्छा हो,
तो आप उससे बेखौफ कुछ भी पूछ सकते हो।
साहिर के बारे में समय ने बताया,
साहिर समय से बहुत आगे का शायर था,
इसीलिए लोग उसे समझ नहीं पाए
साहिर ने कई बार वक्त को मात दी है
तारीख गवाह है।
तुम भी अगर समय की कद्र करते,
समय पर साहिर की तरह कविता लिखते,
तो शायद आज तुम्हारा भी समय होता
लगता है, तुम्हारा समय अभी नहीं आया।
तुमको मैने इतना समय दिया लेकिन तुमने कविता के नाम पर एक शब्द नहीं लिखा
आज तुम्हारा समय समाप्त होता है
फिर जब समय आए, तब मुझ पर कविता लिखने की कोशिश करना।