☆ ‘महाकवी गुणाढ्यआणि त्याची बड्डकहा ‘. भाग 5 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆
(सातवाहन नरेश गुणाढ्याला व त्याच्या महान कृतीला सन्मानपूर्वक राजधानीत घेऊन आला ).आता पुढे….
मुळ बृहत् कथेबद्दल थोडक्यात आख्यायिका अशी आहे की ती भगवान शंकर देवी पार्वतीला सांगत होते. विश्वातल्या सर्वच्या सर्व कथा-कहाण्या, काव्य, नाटक, आख्यायिका इत्यादी त्यात समाविष्ट होत्या. ती पूर्ण बृहत्कथा शंकराच्या एका गणाने योगाद्वारे गुप्त होउन ऐकली होती. हे लक्षात आल्यावर देवी पार्वतीने त्या गणास, माफी मागणाऱ्या त्याच्या एका मित्रास व एका यक्षास शाप दिला होता. त्यामुळे त्यांना मानव योनीत पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला होता. आणि उःशाप म्हणून जन समुदायापर्यंत बृहत्कथा पोहोचल्यावर त्यांना पुन्हा दिव्य- लोक प्राप्त होणार होता. त्या गणाच्या मित्राचे मानव जन्मातले नाव गुणाढ्य असे होते.
वर, शाप-उःशाप, पूर्वजन्मीचे ज्ञान पुनर्जन्म या गोष्टीवर आपण विश्वास ठेवला नाही तरी ,एका वररुची या व्यक्तीने काणभूतीला व त्याने ही कथा पुढे गुणाढ्याला ऐकवली होती आणि त्याने तिचा जनसामान्यात प्रचार करण्यासाठी ती ‘पैशाची’भाषेत लिहिली या गोष्टीवर आपण विश्वास ठेवू शकतो.
ही पुराणकथा नाहीय. त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. सातवाह वंशाच्या नरेशांचा कालावधी इसवीसनपूर्व २०० ते ३०० वर्षे असा ऐतिहासिक पुराव्या वरून मानला जातो.त्यातील एक शासकाने गुणाढ्याला आपला मंत्री केले होते.
त्याची बड्डकथा मूळ रुपात उपलब्ध नाहीय. पण सन ९३१ मध्ये कवी क्षेमेंद्र ने ७५००श्लोकांचा बृहत्कथा मंजिरी श्लोक संग्रह लिहिला व कवी सोमदेव भट्ट याने १०६३ ते १०८२ या कालखंडात २४०० श्लोकांचा कथासरित्सागर नावाचा ग्रंथ लिहिला. हे ग्रंथ त्यांनी त्यांना उपलब्ध झालेल्या गुणाढ्याच्या एक लाख श्लोकां वरून संस्कृत मध्ये रूपांतरित केले. त्याला गुणाढ्याची बृहत्कथा असेही म्हणतात. बृहत्कथा म्हणजे भारतीय परंपरेचा महाकोष आहे. सर्व प्राचीन आख्यायिका, साहित्याचा उगम बृहतकथेत आहे. बाण, त्रिविक्रम, धनपाल इत्यादी श्रेष्ठ साहित्यकारांनी बृहत् कथेला विस्मयकारक, अत्याधिक सामान्य लोकांचे मनोरंजन करणारा ,उपजीव्य ग्रंथ मानला आहे. तो समुद्रा- सारखा विशाल आहे. हे त्यांनी वर्णन करून सांगितले आहे. त्याच्या थेंबातूनही खूप आख्यायिकाकार व कवींनी आपल्या रचना केल्या आहेत.
वेद ,उपनिषदे, पुराणे इत्यादीतून प्राप्त होणाऱ्या कथा या उच्च वर्गाच्या साहित्य प्रवाहातून भारतीय इतिहासाच्या सांस्कृतिक भूतकाळाशी जोडल्या गेल्या होत्या. त्याला समांतर असा दुसरा एक लोक प्रचलित कथांचा प्रवाह पण आदि काळापासून अस्तित्वात होता.गुणाढ्याने सर्वप्रथम या दुसऱ्या साहित्यप्रवाहाचा संग्रह लोकभाषेत लिहिला.बृहत्कथा सामान्य लोकांच्या जीवनाशी निगडित आहे .समाजातील जुगारी, चोर, धूर्त,लंपट , ठग व्यभिचारी भिक्षु , अधःपतन झालेल्या स्त्रियाअशी कितीतरी पात्रे कथांमधून आहेत. त्यात मिथक आणि इतिहास ,यथार्थ आणि कल्पना लोक,सत्य आणि मायाजाल यांचा अपूर्व संगम आहे.
कादंबरी, दशकुमार चरित्र, पंचतंत्र, तसेच वेताळ पंचविशी,( विक्रम वेताळ कथा) सिंहासनबत्तिशी, शुकसारिका अशी कथा चक्रे, स्वप्नवासवदत्ता प्रतिज्ञायौगंधरायण, आणि अनेक कथा ,काव्य ,नाटक, अख्यायिका, उपअख्यायिका आहेत
त्यामुळे त्यांचे कर्ते बाणभट्ट, भास, धनपाल ,सोंडल, दंडी विशाखादत्त, भास, हर्षआणि अनेक …बृहत कथेचे अर्थात् गुणाढ्याचे ऋणी आहेत. पौराणिक कथा संग्रहाप्रमाणेच लोक कथा संग्रहाला पण असाधारण महत्व प्राप्त आहे. यामुळेच गोवर्धन आचार्यांनी वाल्मिकी आणि व्यासांच्या कालानंतर तिसरी महान कृती मानून गुणाढ्याला व्यासांचा अवतार मानले आहे. लोककथांचे महान संग्राहक गुणाढ्याचे असामान्य महत्त्व यामुळे सिद्ध होते.
☆ ऐसे दास्यत्व पत्करावे ! ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
ऐसे दास्यत्व पत्करावे !
हनुमान म्हणजे रामरायाचा दास! प्रभुरामाच्या चरणी अगदी लीनतेनं बसणारा… आज्ञाधारक, बुद्धिमान, चपळ, साहसी अशी अनेक विशेषणं ल्यायलेला… याच हनुमानाची एक गोष्ट ऐकली जिनं त्याचं महत्त्व माझ्या मनावर बिंबवलं, त्याच्या उपासनेसाठी प्रवृत्त केलं. कीर्तनकार बुवा म्हणाले … हनुमानचं कर्तृत्व इतकं मोठं की त्यानं लक्ष्मणाप्रमाणेच रामाच्या शेजारी असायला हवं. तरीही तो पायाशीच… का… तर दास म्हणून नव्हे; प्रभुश्रीराम म्हणतात की जो कुणी माझ्याकडे मागणं किंवा गाऱ्हाणं सांगताना नतमस्तक होईल. त्याची नजर आधी माझ्या पायाशी असणाऱ्या या धर्मवीर, कर्तव्यदक्ष हनुमंताकडे जाईल. त्यानं हनुमंताची आराधना करावी. तोच तुमचं मागणं मनोवेगे माझ्यापर्यंत पोहोचवेल. दुसऱ्याच्या दुखाःशी समरस होण्यासाठीची भावोत्कटता हनुमानाजवळ प्रचंड आहे. त्यामुळे शक्य झालं तर तोच तुमचं मागणं पूर्ण करेल.’ हे ऐकताच मन हनुमाच्या विचारांत गुरफटलं… खुद्द रामानेच असं म्हणल्यावर हनुमानाशी जरा जास्तच गट्टी झाली.
दास्यत्व पत्करणं या शब्दाला आपल्याकडे एका संकुचित दृष्टीकोनातूनच पाहिलं जातं. पण मनुष्याच्या प्रगतीसाठी दास्यत्व किती महत्त्वाचं आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हनुमानासारखं अद्वितीय उदाहरण नाही.
पुढे कळतेपणी या सगळ्याबद्दल वेगळीच जाणीव झाली. हेच राम आणि हनुमंत वेगवेगळ्या रूपांत दिसू लागले. ‘मन’ म्हणजे हनुमंत आणि ‘बुद्धी’ म्हणजे राम. थोडक्यात बुद्धीपुढं मनानं नतमस्तक व्हावं. कुणीही कितीही नाकारलं तरी आपल्या मनाचे आपण दास असतो हे शंभर टक्के खरं. बुद्धी नेहमी योग्य-अयोग्य जाणून आपल्याला तसा सल्ला देते पण मन… वाहवत जातं… बुद्धीला आततायीपणानं प्रत्युत्तर देतं आणि पस्तावतं. या पस्तावणाऱ्या मनानं हनुमानाचा आदर्श ठेवावा. बुद्धीरुपी रामाचं वेळीच महात्म्य जाणावं. मन चंचल पण सामर्थ्यवान… तर बुद्धी सखोल पण अविचल… आणि जेव्हा या दोन्ही परस्परपूरक गोष्टी एकत्र येऊन काही कार्य घडतं तेव्हा हमखास यश मिळतंच.
अलीकडे तर मन आणि बुद्धी यांची फारच ताटातूट होत आहे. भवताल अस्वस्थ… अनपेक्षित घटनांनी भरलेला… त्यावर कसं व्यक्त व्हावं, त्याच्याशी कसा सामना करावा हे कळणं आकलनापलीकडलं. त्यामुळे मनाची चंचलता इतकी वाढली की बुद्धीलाही भ्रम व्हावा. अशावेळी मनानं दास्यत्व पत्करावं. स्वतःच्या विवेकबुद्धीवर विश्वास ठेवून तिला सहकार्य करावं. कारण संकट येतं ते मनाच्या कमकुवतपणामुळे आणि परतवलं जातं तेही मन कणखर झाल्यावरच. जिथं राम आणि हनुमान एक होऊन लढतात तिथं संकट एकटं असो की दशमुखी त्याचा नाश होणारच. म्हणूनच या भवतालातून तारून जाण्यासाठी हनुमानाची उपासना करावी. कारण जिथं रावण नसेल तिथं प्रभूराम असेलच असं नाही पण जिथं भक्त हनुमान असेल तिथं प्रभूराम असणारच.
आज ताईच्या ‘भक्तीचाच ठेवा’ या संगीत कार्यक्रमाचा शंभरावा प्रयोग होता. त्या निमीत्ताने पात्रेसरांनी ताईच्या सत्काराप्रती एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. सभागृह प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. अलीकडे हा अनुभव प्रत्येकच प्रयोगाच्या वेळी येतोच.
आज या कार्यक्रमाची भूमिका , संकल्पंना, प्रेरणा याविषयी ताईच्या संगीत गृपमधील मान्यवर बोलणार होते. ताईही तिचे मनोगत व्यक्त करणार होतीच.
मंचावर सुंदर सजावट केलेली होती. फुलांची आकर्षक आरास होती. ऊदबत्त्यांचा दरवळ होता. समयांचा मंद,मंगल प्रकाश होता. वाद्यांचा जुळलेला मेळ होता. खरोखरच सारं वातावरण संगीतमय, मंगल, पवित्र वाटत होतं. वातावरणात मंद यमन रागाची धून वाजत होती. सुरावटीतील कोमल शांत सूर मनावर तरंगत होते.
ताईच्या मनातआनंद, समाधान, होतच पण पपांची खूप आठवण येत होती.
आज पपा हवे होते..!!
त्यांच्या बाबीचा हा सोहळा बघून ते खूप भरुन पावले असते. त्यांचे तेज:पूंज डोळे पाणावले असते. त्यांच्या अश्रुंच्या थेंबांतून अनेक आशीर्वाद झरले असते.
शाळेतच होती ताई. लहान होती. तसं गाणारं घरात कुणीच नव्हतं. मात्र पपांना संगीताची उत्तम जाण होती.त्याहूनही भारतीय शास्रीय संगीताची मनापासून आवड होती. सुरेल होता त्यांचा आवाज. पहाटे पहाटे ते अभंग, ओव्या गात. ते ऐकत रहावेसे वाटे. शिवाय रात्री झोपताना आकाशवाणीवरची संगीत सभा ऐकतच निद्राधीन व्हायचं, हा शिरस्ता.
एक दिवस ताई सकाळी ऊठली आणि सहजच भूप रागातीलसरगम गाऊन गेली.आणि पपा म्हणाले, “वाह! बाबी, कमाल संगीत आहे तुझ्यात. “
“काहीतरीच काय पपा? मी आपलं सहजच गुणगुणले.बाकी माझा हा जाडा आवाज,मी काय गाणार?”
“अग! मग पेटी वाजवायला शिक.सतार वाजव.”
ताई ठासून म्हणाली ,
“पपा ,भलती सलती स्वप्ने पाहू नका. आणि मला वाद्य संगीतापेक्षा गायककीच आवडते. पण माझा हा घोगरा आवाज…?जाऊदे! गाणं ऐकण्याची मजा मला पुरेशी आहे.स्वत: गायलाच कशाला हवं.?”
पपांना फार वाईट वाटायचं. ताईमध्ये असलेला न्यूनगंड कसा दूर होईल याचा ते सदैव विचार करायचे.
नकोनको म्हणत असतानाही पपांनी एक छान पेटी तिच्यासाठी आणली.पण ताईने त्या पेटीला कधी हातही लावला नाही. एक दिवस पपांनीच एक अभंग पेटीचा सूर धरून गायला.
चाले हे शरीर कोणाचिये सत्ते
कोण बोलाविते हरीविण।।
।देखवी दाखवी एक नारायण।
।तयाचे भजन चुको नका।।
पुढचा एक अभंग ताईने उत्स्फूर्तपणे सूरात सूर पकडून गायला. घरात जणू एक छोटीशी भक्तीमैफलच रंगली.
मग ताईने हळूहळू पेटीला जवळ केले.पपांनी काही नोटेशन्सची अगदी प्राथमिक पुस्तकेही आणली. त्या नोटेशन्सवरुन तिने भूप,काफी ,दुर्गा रागाच्या काही बंदीशी ही बसवल्या. सुरांवरची तिची पकड मूळातच पक्की होती. ऊपजत होती.
☆ गावठी गिच्चा…. श्री सचिन पाटील ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार ☆
गावठी गिच्चा: लेखनभान जपणाऱ्या संयमित कथा – सौ. सुचित्रा पवार
नुकताच ‘गावठी गिच्चा’ हा सचिन पाटील यांचा कथासंग्रह वाचून झाला. एकूणच पूर्वापार शंकर पाटील ग्रामीण कथेचा बाज असणाऱ्या, लेखनभान जपणाऱ्या संयमित अशा एकूण बारा कथा या कथासंग्रहात आहेत. कोणत्याही बड्या लेखकाची प्रस्तावना न घेता लेखकाने स्वतः ‘गावातून फेरफटका मारण्यापूर्वी…’ या शिर्षकाखाली कथासंग्रहाची निर्मिती प्रक्रिया व आज-कालच्या गावाचा आढावा घेतला आहे. ‘गावठी गिच्चा’ म्हणजे हिसका किंवा खोड मोडणे या अर्थाचे संग्रहाचे शिर्षकच ठसकेबाज आहे.
प्रत्येक कहाणीचे आशय अन् विषय वेगवेगळे आहेत, तसेच प्रत्येक कथा ग्रामीण जीवनाचे प्रत्यक्ष दर्शन घडवते. आता गावाचे स्वरूप बदलत असले तरी माणसांच्या मनोवृत्ती मात्र बदलल्या नाहीत असेच काहीसे ग्रामीण वास्तव चित्र आहे.
या कथासंग्रहातील ‘उमाळा’ या कथेतील फटकळ असणारी पुष्पाआक्का रागेरागे भावाकडे येते, शरीराने ती भावाकडे आलीय पण तिचे मन मात्र तिच्या घरातच रेंगाळत आहे, म्हणूनच नातवाची आठवण येताच नातवाच्या काळजीने तिचे मन घराकडे ओढ घेतेय आणि ती लगेचच घरी परतते. बहिणीची तऱ्हा भावाला मात्र न कळल्याने तो चक्रावून जातो पण विहिरीला लागलेला ‘उमाळा’ मात्र आक्काचा पायगुणच समजतो. बहीण-भावाच्या प्रेमाचे दुर्मीळ चित्र उमाळा कथेत आपल्याला दिसते.
‘दंगल’ या कथेत दंगल असूनही आपल्या जीवावर उदार होऊन वेळप्रसंग पाहून अवघडलेल्या रेशमाला आपल्या रिक्षातून शहराकडे सुखरूप बाळंतपणाला नेणारा जेकब रिक्षावाला अनोख्या माणुसकीचे दर्शन घडवतो.
ऊस फडावरील खोपटात रात्रभर अब्रूच्या भीतीने गांगरलेली सुली प्रत्येक चाहुलीला घाबरते पण एका क्षणात वीज तळपल्याप्रमाणे तिला स्वतःच शील जपण्यासाठी ‘कोयता’ जवळ आहे याची जाणीव होते व तिची भीती कुठल्या कुठं पळून जाते.
विज्ञानयुग असलं तरी अजून खेडोपाडी करणीबाधेच्या भुताचा लोकांच्या मनावर पगडा आहे. त्यातूनच ‘करणी’ मधील विठाई आपल्या म्हशीची दुरावस्था बघून अंदाजाने, संशयाने आसपासच्या लोकांना शिव्या घालते पण प्रत्यक्ष मात्र तिच्याच मुलाने गोठ्यात मारलेल्या कीटकनाशकाचा अंश म्हशीच्या पोटात गेलेला असतो हे गुपितच रहाते.
अचानक नवरा मेलेली तरुण सुंदर सविता उर्फ सवी पतसंस्थेच्या कर्जाच्या विळख्यातून अब्रूसह चातुर्याने निसटते याचे वर्णन लेखकाने ‘डोरलं’ कथेत तंतोतंत केले आहे. इकडे आड तिकडे विहीर अशा द्विधा मनःस्थितीत अडकलेली सवी आपलं डोरलं अर्थात मंगळसूत्र विकून आपला शब्द पाळते व शीलही वाचवते.
‘गावचं स्टँड’ आणि ‘तंटामुक्ती’ या दोन्ही कथा विनोदनिर्मिती करणाऱ्या असल्या तरी त्यातील कथानक हे ग्रामीण भागातील उपहासात्मक वास्तव आहेत.
‘उपास’ या कथेत ज्ञानू पैलवानाची मटण खायची तल्लफ बायकोच्या संकष्टीच्या उपवासाने न भागताच दिवसभर त्याला कसा उपास घडतो आणि रात्री मात्र राग विसरून तो परत बायकोला माफ करून आनंदाने कसा शाकाहार करतो याचे रसभरीत चित्रण आहे. मात्र मटण न करता शाकाहारी जेवण करून पैलवनाची बायको रत्ना नवऱ्याची समजूत का काढू शकत नाही त्याला उपास का घडवते? हे मात्र कळलेलं नाही.
‘सायेब’ या कथेत लेखकाच्या मित्राच्या जीवनाला एका नापास शिक्क्याने कशी कलाटणी मिळाली याचे वास्तव चित्रण आहे. परंतु कथेचा आशय आजच्या शिक्षण पद्धतीला सुसंगत वाटत नाही.
‘चकवा’ या कथेतील बज्याच्या डोक्यात भुताचा विचार आल्याने प्रत्यक्ष हव्याहव्याशा माणसाबरोबर बोलायची, एकांत सहवासाची संधी येऊन सुद्धा मनातलं गुपित मनातच ठेवून बाजाराचे सामान देखील कसे रस्त्यातच सोडावे लागते याची सुरस कथा आहे.
अनेक एफ.एम.वर सध्या सुरू असलेल्या फोनइन कार्यक्रमाची खिल्ली ‘टोमॅटो केचप’ या कथेत अगदी रास्त उडवली आहे. कारण खेडोपाडी रेंज नसताना, महत्त्वाचं काम असताना हा रेडिओवाला काळ-वेळ-प्रसंग न बघता समोरच्या माणसाची फिरकी घेतो पण लोक वैतागतात आणि ही फिरकी त्यांना किती महागात पडू शकते याचे ज्वलंत उदाहरण सतीश चव्हाण या व्यक्तीरेखेतून कळते.
रुसलेल्या बायकोने आपली आज्ञा पाळली नाही म्हणून तिची खोड गमतीदार पद्धतीने मोडणारा शिवा ‘गावठी गिच्चा’ मध्ये आपल्याला भेटतो. नवरा-बायकोतले किरकोळ वाद तिथेच सोडून दिले तरच संसार गोडी-गुलाबीने होतो हे सूत्र या कथेतून लेखक अलवार गुंफतो.
एकंदरीत ‘गावठी गिच्चा’ मधील सर्व कथा ग्रामीण जीवन डोळ्यांसमोर ठेवण्यात यशस्वी झाल्या आहेत आणि त्या वास्तव जीवनाशी निगडित आपल्या आसपास असणाऱ्या सा…
पुस्तकावर बोलू काही
‘गावठी गिच्चा’ लेखक श्री सचिन पाटील
अभिप्राय – सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से हम आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का वैश्विक महामारी और मानवीय जीवन पर आधारित एक अत्यंत विचारणीय आलेख ग़लत सोच : दु:खों का कारण। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की लेखनी को इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य # 128 ☆
☆ ग़लत सोच : दु:खों का कारण ☆
ग़लत सोच के लोगों से अच्छे व शुभ की अपेक्षा-आशा करना हमारे आधे दु:खों का कारण है, यह सार्वभौमिक सत्य है। ख़ुद को ग़लत स्वीकारना सही आदमी के लक्षण हैं, अन्यथा सृष्टि का हर प्राणी स्वयं को सबसे अधिक बुद्धिमान समझता है। उसकी दृष्टि में सब मूर्ख हैं; विद्वत्ता में निकृष्ट हैं; हीन हैं और सर्वश्रेष्ठ व सर्वोत्तम हैं। ऐसा व्यक्ति अहंनिष्ठ व निपट स्वार्थी होता है। उसकी सोच नकारात्मक होती है और वह अपने परिवार से इतर कुछ नहीं सोचता, क्योंकि उसकी मनोवृत्ति संकुचित व सोच का दायरा छोटा होता है। उसकी दशा सावन के अंधे की भांति होती है, जिसे हर स्थान पर हरा ही हरा दिखाई देता है।
वास्तव में अपनी ग़लती को स्वीकारना दुनिया सबसे कठिन कार्य है तथा अहंवादी लोगों के लिए असंभव, क्योंकि दोषारोपण करना मानव का स्वभाव है। वह हर अपराध के लिए दूसरों को दोषी ठहराता है, क्योंकि वह स्वयं को ख़ुदा से कम नहीं समझता। सो! वह ग़लती कर ही कैसे सकता है? ग़लती तो नासमझ लोग करते हैं। परंतु मेरे विचार से तो यह आत्म-विकास की सीढ़ी है और ऐसा व्यक्ति अपने मनचाहे लक्ष्य की प्राप्ति कर सकता है। उसके रास्ते की बाधाएं स्वयं अपनी राह बदल लेती हैं और अवरोधक का कार्य नहीं करती, क्योंकि वह बनी-बनाई लीक पर चलने में विश्वास नहीं करता, बल्कि नवीन राहों का निर्माण करता है। अपनी ग़लती स्वीकारने के कारण सब उसके मुरीद बन जाते हैं और उसका अनुसरण करना प्रारंभ कर देते हैं।
ग़लत सोच के लोग किसी का हित कर सकते हैं तथा किसी के बारे में अच्छा सोच सकते हैं; सर्वथा ग़लत है। सो! ऐसे लोगों से शुभ की आशा करना स्वयं को दु:खों के सागर के अथाह जल में डुबोने के समान है, क्योंकि जब उसकी राह ही ठीक नहीं होगी; वे मंज़िल को कैसे प्राप्त कर सकेंगे? हमें मंज़िल तक पहुंचने के लिए सीधे-सपाट रास्ते को अपनाना होगा; कांटों भरी राह पर चलने से हमें बीच राह से लौटना पड़ेगा। उस स्थिति में हम हैरान-परेशान होकर निराशा का दामन थाम लेंगे और अपने भाग्य को कोसने लगेंगे। यह तो राह के कांटों को हटाने लिए पूरे क्षेत्र में रेड कारपेट बिछाने जैसा विकल्प होगा, जो असंभव है। यदि हम ग़लत लोगों की संगति करते हैं, तो उससे शुभ की प्राप्ति कैसे होगी ? वे तो हमें अपने साथ बुरी संगति में धकेल देंगे और हम लाख चाहने पर भी वहां से लौट नहीं पाएंगे। इंसान अपनी संगति से पहचाना जाता है। सो! हमें अच्छे लोगों के साथ रहना चाहिए, क्योंकि बुरे लोगों के साथ रहने से लोग हमसे भी कन्नी काटने लगते हैं तथा हमारी निंदा करने का एक भी अवसर नहीं चूकते। ग़लती छोटी हो या बड़ी; हमें उपहास का पात्र बनाती है। यदि छोटी-छोटी ग़लतियां बड़ी समस्याओं के रूप में हमारे पथ में अवरोधक बन जाएं, तो उनका समाधान कर लेना चाहिए। जैसे एक कांटा चुभने पर मानव को बहुत कष्ट होता है और एक चींटी विशालकाय हाथी को अनियंत्रित कर देती है, उसी प्रकार हमें छोटी-छोटी ग़लतियों की अवहेलना नहीं करनी चाहिए, क्योंकि इंसान छोटे-छोटे पत्थरों से फिसलता है; पर्वतों से नहीं।
‘सावधानी हटी, दुर्घटना घटी’ अक्सर यह संदेश हमें वाहनों पर लिखित दिखाई पड़ता है, जो हमें सतर्क व सावधान रहने की सीख देता है, क्योंकि हमारी एक छोटी-सी ग़लती प्राण-घातक सिद्ध हो सकती है। सो! हमें संबंधों की अहमियत समझनी चाहिए चाहिए, क्योंकि रिश्ते अनमोल होते हैं तथा प्राणदायिनी शक्ति से भरपूर होते हैं। वास्तव में रिश्ते कांच की भांति नाज़ुक होते हैं और भुने हुए पापड़ की भांति पल भर में दरक़ जाते हैं। मानव के लिए अपेक्षा व उपेक्षा दोनों स्थितियां अत्यंत घातक हैं, जो संबंधों को लील जाती हैं। यदि आप किसी उम्मीद रखते हैं और वह आपकी उम्मीदों पर खरा नहीं उतरता, तो संबंधों में दरारें पड़ जाती हैं; हृदय में गांठ पड़ जाती है, जिसे रहीम जी का यह दोहा बख़ूबी प्रकट करता है। ‘रहिमन धागा प्रेम का, मत तोरो चटकाय/ टूटे से फिर ना जुरै, जुरै तो गांठ परि जाए।’ सो! रिश्तों को सावधानी-पूर्वक संजो कर व सहेज कर रखने में सबका हित है। दूसरी ओर किसी के प्रति उपेक्षा भाव उसके अहं को ललकारता है और वह प्राणी प्रतिशोध लेने व उसे नीचा दिखाने का हर संभव प्रयास करता है। यहीं से प्रारंभ होता है द्वंद्व युद्ध, जो संघर्ष का जन्मदाता है। अहं अर्थात् सर्वश्रेष्ठता का भाव मानव को विनाश के कग़ार पर पहुंचा देता है। इसलिए हमें सबको यथायोग्य सम्मान ध्यान देना चाहिए। यदि हम किसी बच्चे को प्यार से आप कह कर बात करते हैं, तो वह भी उसी भाषा में प्रत्युत्तर देगा, अन्यथा वह अपनी प्रतिक्रिया तुरंत ज़ाहिर कर देगा। यह सब प्राणी-जगत् में भी घटित होता है। वैसे तो संपूर्ण विश्व में प्रेम का पसारा है और आप संसार में जो भी किसी को देते हो; वही लौटकर आपके पास आता है। इसलिए अच्छा बोलो; अच्छा सुनने को मिलेगा। सो! असामान्य परिस्थितियों में ग़लत बातों को देख कर आंख मूंदना हितकर है, क्योंकि मौन रहने व तुरंत प्रतिक्रिया व्यक्त न करने से सभी समस्याओं का समाधान स्वतः निकल आता है।
संसार मिथ्या है और माया के कारण हमें सत्य भासता है। जीवन में सफल होने का यही मापदंड है। यदि आप बापू के तीन बंदरों की भांति व्यवहार करते हैं, तो आप स्टेपनी की भांति हर स्थान व हर परिस्थिति में स्वयं को उचित व ठीक पाते हैं और उस वातावरण में स्वयं को ढाल सकते हैं। इसलिए कहा भी गया है कि ‘अपना व्यवहार पानी जैसा रखो, जो हर जगह, हर स्थिति में अपना स्थान बना लेता है। इसी प्रकार मानव भी अपना आपा खोकर घर -परिवार व समाज में सम्मान-पूर्वक अपना जीवन बसर कर सकता है। इसलिए हमें ग़लत लोगों का साथ कभी नहीं देना चाहिए, क्योंकि ग़लत व्यक्ति न तो अपनी ग़लती से स्वीकारता है; न ही अपनी अंतरात्मा में झांकता है और न ही उसके गुण-दोषों का मूल्यांकन करता है। इसलिए उससे सद्-व्यवहार की अपेक्षा मूर्खता है और समस्त दु:खों कारण है। सो! आत्मावलोकन कर अंतर्मन की वृत्तियों पर ध्यान दीजिए तथा अपने दोषों अथवा पंच-विकारों व नकारात्मक भावों पर अंकुश लगाइए तथा समूल नष्ट करने का प्रयास कीजिए। यही जीवन की सार्थकता व अमूल्य संदेश है, अन्यथा ‘बोया पेड़ बबूल का, आम कहां से खाए’ वाली स्थिति हो जाएगी और हम सोचने पर विवश हो जाएंगे… ‘जैसा बोओगे, वैसा काटोगे’ का सिद्धांत सर्वोपरि है, सर्वोत्तम है। संसार में जो अच्छा है, उसे सहेजने का प्रयास कीजिए और जो ग़लत है, उसे कोटि शत्रुओं-सम त्याग दीजिए…इसी में सबका मंगल है और यही सत्यम्, शिवम्, सुंदरम् है।
(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री हरभगवान चावला जी की अब तक पांच कविता संग्रह प्रकाशित। कई स्तरीय पत्र पत्रिकाओं में रचनाएँ प्रकाशित। कथादेश द्वारा लघुकथा एवं कहानी के लिए पुरस्कृत । हरियाणा साहित्य अकादमी द्वारा श्रेष्ठ कृति सम्मान। प्राचार्य पद से सेवानिवृत्ति के पश्चात स्वतंत्र लेखन।)
आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय लघुकथा मसीहा ।)
☆ लघुकथा – मसीहा ☆ श्री हरभगवान चावला ☆
पीढ़ियों से प्रजा मसीहाओं के भरोसे रहती आई थी। हर राजा में प्रजा ने मसीहा देखा और हर बार छली गई। प्रजा अकर्मण्य नहीं थी ,पर ‘कर्म करो और फल की चिन्ता मत करो’ के सिद्धांत में उसकी गहरी आस्था थी। प्रजा कर्म करती, फल राजा या दरबारी भोग लेते। अब हालत यह थी कि भूख थी, खेत बंजर हो गये थे। प्यास थी, नदियों में पानी नहीं था। हाथ थे, हाथों के लिए कोई काम नहीं था। लोग बिना किसी पवित्र उद्देश्य के मर रहे थे। प्रजा सदा की तरह मसीहे की प्रतीक्षा कर रही थी।
ऐसी निराशा के बीच प्रजा ने अपने नये राजा में भी मसीहे को देखा। प्रजा का दृढ़ विश्वास था कि यह सचमुच का मसीहा साबित होगा। उसकी वाणी में ओज था, चेहरे पर आत्मविश्वास। वह शेर की तरह चलता था, बाज़ की तरह देखता था, कृष्ण की तरह वस्त्र धारण करता था। प्रजा नये मसीहे की पूजा करने लगी। मसीहे का हर झूठ प्रजा को सच से भी ज़्यादा विश्वसनीय तथा मोहक लगता। हर मसीहे की तरह नया मसीहा भी जानता था (बल्कि औरों से कहीं बेहतर जानता था) कि जैसे प्यार हर व्यक्ति के भीतर सहज ही उपस्थित रहता है, ठीक वैसे ही प्यार से कई गुणा अधिक घृणा भी सहज ही उपस्थित रहती है। उसने पहले प्रजा के भीतर गौरव जगाया कि उसकी प्रजा सर्वश्रेष्ठ है। प्रजा को अपनी क़ीमत समझ में आई। फिर मसीहे ने उनके भीतर की घृणा को कुरेदकर उसमें आग लगा दी। चूँकि घृणा सृष्टि की सर्वाधिक विस्फोटक सामग्री है, सो जल्दी ही आग पूरी रियासत में फैल गई। अब प्रजा रक्त से फाग खेलती है। उसे न रोटी चाहिए, न पानी, न काम। प्रजा ख़ून देखकर अट्टहास करती है और मसीहे की जय-जयकार करती है। उसका दृढ़ विश्वास है कि रक्त की नींव पर जल्दी ही उसके स्वर्णिम भविष्य की भव्य इमारत बनने वाली है।
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆