☆ मी प्रवासिनी क्रमांक- १३ – भाग ५ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
लक्षद्वीपचा रंगोत्सव – भाग १
अथांग अरबी सागरात ‘कवरत्ती’ नावाची आमची पाच मजली बोट नांगर टाकून उभी होती. समोर दिसत असलेल्या मिनीकॉय बेटावर नारळाची असंख्य हिरवीगार झाडं वाऱ्यावर डुलत होती. आता आमच्या बोटीतून छोट्या यांत्रिक बोटीत उतरण्याची कसरत करायची होती. वाऱ्यामुळे, लाटांमुळे आमची बोट आणि छोटी यांत्रिक बोट, दोन्ही झुलत होत्या. या दोघींची भेट झाल्यावर बोटीच्या दारात उभा असलेला बोटीचा स्टाफ आम्हाला दोन्ही दंडाना धरून छोट्या बोटीमध्ये अलगद उतरवत होता.( लहानपणी केळशीला जाताना हर्णै बंदरातून किनाऱ्यावर पोचायला हाच उद्योग करावा लागत असल्याने त्याची प्रॅक्टिस होतीच)
लक्षद्वीप द्वीपसमूह हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून साधारण चारशे किलोमीटर दूर असलेला छत्तीस बेटांचा समूह आहे. यापैकी फक्त अकरा बेटांवर मनुष्यवस्ती आहे. केंद्रशासित असणाऱ्या या बेटांवर जाण्यासाठी केरळमधील कोची (कोचिन /एर्नाकुलम) इथून ठराविक दिवशी बोटी सुटतात.
समुद्रावरील ताजा, मोकळा वारा भरभरून घेत मिनीकॉयवर उतरलो. साधारण ११ किलोमीटर लांबीचं, अर्धवर्तुळाकार पसरलेलं हे बेट, लक्षद्वीप द्वीपसमूहातील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचं बेट आहे. (आकाराने पहिला क्रमांक ऍड्रॉथ या बेटाचा लागतो.) नारळीच्या दाट बनातून आमची गाडी दीपगृहाजवळ पोहोचली. ब्रिटिश काळात १८८५ साली बांधलेल्या या भक्कम दीपगृहाच्या २२० अर्धगोलाकार पायऱ्या चढून गेल्यावर अफाट, निळ्या- निळ्या सागराचं नजर खिळवून ठेवणारं दर्शन घडतं. तिथून रिसॉर्टला पोहोचल्यावर सर्वांचं शहाळ्याच्या मधुर पाण्याने, त्यातल्या कोवळ्या, गोड खोबर्याने स्वागत झालं. पारदर्शी, स्वच्छ, नितळ निळा समुद्र सर्वांना साद घालत होता. सेफ्टी जॅकेट्स चढवून डुंबण्यासाठी सज्ज झालो. (समुद्रातील पोहणं, कयाकिंग, स्नॉर्केलिंग वगैरे साऱ्या गोष्टींसाठी सेफ्टी जॅकेट व पायात रबरी बूट, चपला घालणं बंधनकारक आहे. नाहीतर पाण्यातून चालताना धारदार कोरल्समुळे जखम होण्याची शक्यता असते.) समुद्रावर अनेक प्रशिक्षित ट्रेनर्स आपल्या मदतीसाठी सज्ज असतात.
किनाऱ्यावरील पाण्यात अलगद बसण्याचा प्रयत्न केला. पण लाटांनी वर ढकलून दिलं. शेवटी धबाकन फतकल मारुन बसलो. अंगावर झेपावणाऱ्या थंड लाटांनी छान समुद्रस्नान झालं. आजूबाजूला हात घातला की तरतऱ्हेचे कोरल्स हातात येत .काहींचा आकार झाडांचा तर कांहींचा आकार फुलांचा, पानांचा, पक्ष्यांचा. कुणाला गणपती सुद्धा सापडले. तासाभराने उठलो तेव्हा जमविलेल्या कोरल्सची संपत्ती ‘समुद्रार्पणमस्तु’ म्हणून समुद्रालाच परत केली.(कुठच्याही प्रकारचे कोरल्स लक्षद्वीपहून आणणं हा दंडनीय अपराध आहे.)
मदतनिसाबरोबर कयाकिंगला गेले. मजबूत प्लास्टिकच्या लांबट, हलक्या होडीतून वल्ही मारत जाण्याचा अनुभव खूप वेगळा होता. आकाशाच्या घुमटातून परावर्तित होणारे ढगांचे विविध रंग, पारदर्शी निळ्या पाण्यात उतरत होते. निळा, जांभळा, पिवळा, केशरी, गुलाबी असे अनंत रंग पाण्यात तरंगत होते. हेमगर्भ सौंदर्य आणि गूढरम्य सुशांतता यांचा अपूर्व मिलाप झाला होता. अथांग पाणी आणि असीम क्षितिज यांच्या शिंपल्यात आपण अलगत शिरत आहोत असा एखाद्या परीकथेतल्याप्रमाणे आभास झाला. मदतनिसाने परतण्यासाठी कयाक वळविली तेव्हा भानावर आले.
मिनीकॉयपासून १०० किलोमीटर्सवर मालदीव बेट आहे. अर्थातच मालदीवला जाण्याची सोय किंवा परवानगी नाही. जेवण व थोडी विश्रांती झाल्यावर दुपारी आम्हाला तिथल्या एका गावात नेण्यात आलं. ११००० लोकसंख्या असलेल्या मिनीकॉय बेटावर छोटी छोटी ११ गावे आहेत.मुखिया म्हणजे गावप्रमुख एकमताने निवडला जातो. ग्रामपंचायत आहे. प्रत्येक गावात सार्वजनिक वापरासाठी एक मध्यवर्ती जागा ठेवलेली असते. गावातल्या कुठच्याही घरी काहीही कार्य असलं तरी प्रत्येकाने मदत करायची पद्धत आहे. आम्हाला ज्या गावात नेलं होतं ते तीनशे वर्षांपूर्वी वसलेलं गाव आहे.चहा, समोसा आणि नारळाची उकडलेली करंजी देऊन तेथील स्त्रियांनी आमचं स्वागत केलं. पांढऱ्याशुभ्र वाळूवर दोन लांबलचक होड्या सजवून ठेवल्या होत्या.दर डिसेंबरमध्ये तिथे नॅशनल मिनिकॉय फेस्ट साजरा होतो. शर्यतीसाठी प्रत्येक बोटीमध्ये वीस जोड्या वल्हव़त असतात. या बेटावर ट्युना कॅनिंग फॅक्टरी आहे. ट्युना माशांना परदेशात खूप मागणी आहे. त्यांची निर्यात केली जाते. इतर साऱ्या बेटांवरील बोलीभाषा, मल्याळम् असली तरी या बेटावर ‘महल'(Mahl) नावाची भाषा बोलली जाते.
(सुश्री नीलम सक्सेना चंद्रा जी सुप्रसिद्ध हिन्दी एवं अङ्ग्रेज़ी की साहित्यकार हैं। आप अंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय /प्रादेशिक स्तर के कई पुरस्कारों /अलंकरणों से पुरस्कृत /अलंकृत हैं । सुश्री नीलम सक्सेना चंद्रा जी का काव्य संसार शीर्षक से प्रत्येक मंगलवार को हम उनकी एक कविता आपसे साझा करने का प्रयास करेंगे। आप वर्तमान में एडिशनल डिविजनल रेलवे मैनेजर, पुणे हैं। आपका कार्यालय, जीवन एवं साहित्य में अद्भुत सामंजस्य अनुकरणीय है।आपकी प्रिय विधा कवितायें हैं। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “रास्ता”। )
आप निम्न लिंक पर क्लिक कर सुश्री नीलम सक्सेना चंद्रा जी के यूट्यूब चैनल पर उनकी रचनाओं के संसार से रूबरू हो सकते हैं –
ई- अभिव्यक्ति में संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी का हार्दिक स्वागत है। हम अपने प्रबुद्ध पाठकों के लिए आदरणीय श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी का साप्ताहिक स्तम्भ ” मनोज साहित्य “ प्रारम्भ कर रहे हैं। अब आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।
(संस्कारधानी जबलपुर की श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’ जी की लघुकथाओं, कविता /गीत का अपना संसार है। । साप्ताहिक स्तम्भ – श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य शृंखला में आज प्रस्तुत है गरीबी से संघर्ष करते परिवार की एक संवेदनशील लघुकथा “टुकिया का झूला”। इस विचारणीय लघुकथा के लिए श्रीमति सिद्धेश्वरी सराफ जी की लेखनी को सादर नमन। )
☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य # 97 ☆
लघुकथा – टुकिया का झूला
साइकिल की आवाज सुन कर वह बाहर निकली। टुकिया रोज की तरह अपने बाबा को दौड़ कर गले लगा, उनकी बाहों में छुप जाना चाहती थी।
पांच साल की टुकिया परंतु आज बाबा ने न तो टुकिया को गोद लिया और न ही उसके लिए जलेबी की पुड़िया दी। टकटकी लगाए हुए पापा की ओर देखने लगी।
परंतु उसे क्या मालूम था कि बाबा ऐसा क्यों कर रहे हैं। पापा अंदर आने पर अपनी पत्नी से पानी का गिलास लेकर कहने लगे… अब मैं बच्ची को उसकी इच्छा के अनुसार पढ़ाई नहीं करवा पाऊंगा। उसकी यह इच्छा अधूरी रहेगी, क्योंकि आज फिर से काम से निकाल दिया गया हूँ।
तो क्या हुआ बाबा… गले से झूलते हुए बोली… बाबा हम आपके साथ सर्कस जैसा काम करेंगे। हमारे पास खूब पैसे आ जाएंगे। बाबा को अपने पुराने दिन याद आ गए । उन्होंने बिटिया का माथा चूम लिया।
शाम ढले दो बांसों के बीच रस्सी बांध दिया गया। टुकिया चलने लगी सिर पर मटकी और मटकी पर जलता दिया।
दिए की लौ से प्रकाशित होता पूरा मैदान। टुकिया चलते जा रही थी, बाबा का कलेजा फटा जा रहा था। बच्चीं ने रस्सी पार कर कहा… बाबा हमें जीत मिल गई अब हम रस्सी पर खूब काम करेंगे। और देखना एक दिन आपको हवाई जहाज में घुमाएंगे।
बाबा ने सोचा क्या गरीबी का बोझ हवाई जहाज उड़ा कर ले जा सकेगी? टुकिया रस्सी पर कब तक चलेगी।
सिक्के और रुपए उसकी थाली पर गिरते जा रहे थे। तालियों की गड़गड़ाहट में उसकी सिसकियां कहाँ सुनाई देती?
☆ ‘कोरडा भवताल’ – श्री आनंदहरी ☆ परिचय – श्री रमेश नागेश सावंत☆
कवितासंग्रह – कोरडा भवताल
लेखक : आनंदहरी
प्रकाशक : प्रभा प्रकाशन, कणकवली
पृष्ठसंख्या : ८४
कोरडा भवताल —- जगण्याच्या मुळाशी भिडणारी कविता
कवी आनंदहरी यांच्या ‘ कोरडा भवताल’ या नव्या कवितासंग्रहातील कविता भवतालात घडणा-या घटितांवर लक्ष्यवेधी भाष्य करतात. आनंदहरी यांच्या संवेदनशील दृष्टीला जाणवलेले जगण्याचे भान त्यांच्या कवितांतून संयत भाषेत व्यक्त झाले असले तरी या कविता वाचकाच्या संवेदनशील मनाच्या तळाचा ठाव घेणा-या आहेत. ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ.गोविंद काजरेकर यांनी त्यांच्या विश्लेषक प्रस्तावनेत नमूद केले आहे की कवी आनंदहरी समकाळाची स्पंदने टिपण्यात यशस्वी झाले आहेत. आपला भवताल कोरडा असल्याची कवीची जाणीव ही अभावाची आहे आणि त्यामुळे त्यांच्या कवितेतून जगण्यातील अर्थशून्यता निदर्शनास येते. म्हणूनच सामान्य माणसाच्या जीवनसंघर्षाचा वेध घेणारी ही कविता वर्तमान काळाचा अवकाश व्यापून टाकणारी आहे. कवी आत्मनिष्ठ कवितेच्या दिशेने वाटचाल करत असताना त्याच्या कवितेचा सूर सामाजिक निष्ठेकडे वळलेला दिसून येतो. ‘मी साधेच शब्द लिहिले’ या पहिल्याच कवितेत अव्यक्त राहिलेल्या माणसांबद्दल कविला वाटणा-या सहसंवेदनेची ही जाणीव तीव्रतेने प्रकट झाली आहे.
“फक्त लागावा असा लळा
की ज्याला व्यक्त होता येत नाही त्याच्यासाठीच
माझ्या कवितेचे शब्द बोलत राहावेत
आयु्ष्यभर”
समकालीन मराठी कवितेत रुजलेला सामाजिक जाणिवेचा स्वर कवी आनंदहरी यांच्या कवितेतूनही प्रखरतेने उमटतो. ‘दिशा ‘ या कवितेत कविच्या सामाजिक अनुभूतीचे व्यामिश्र रंग उमटले आहेत.
भिरभिरलो दाहीदिशी आणि उतरलो धरेवर
सारा आसमंत कवेत घेऊन
आणखी कुणाच्याही दिशा
हरवून जाऊ नयेत म्हणून
कवीला त्याच्या आसपास दिसणा-या ‘ कोरड्या भवताला’ बद्दल वाटणारी संवेदना ‘आजचा काळ’, ‘वेदनेचे उठत राहतात तरंग’, ‘उपासमार’, ‘वासुदेव’, ‘मला माणूस म्हणू्न जगयाचंय’ या कवितांतून प्रकट झाली आहे. ‘आजचा काळ’ या कवितेतून कवीने सध्याच्या काळात मानवजातीवर घोंघावत असलेल्या असहिष्णुतेच्या वादळावर अतिशय मार्मिक शब्दांत आघात केला आहे.
वादळ कधीच करत नाही भेद
पाहत नाही रंग झाडापेडांचा, घरादाराचा आणि माणसांचाही
आजचा काळ असाच तर आहे असहिष्णुतेचा !
कोणत्याही कवीला शब्दांचा, प्रतिमांचा आणि प्रतिकांच प्रचंड सोस असतो. परंतु अल्प शब्दांत नेमक्या प्रतिमा वापरून आशयघन कवितेचे बिंब तयार करण्याचे कसब कवी आनंदहरी यांना जमले आहे. ‘ उपासमार ‘ या कवितेतून त्यांच्या काव्यगत प्रतिभेचे प्रत्यंतर येते.
तरीही मी राखलंय बियाणं शब्दांचं
रूजवू पाहतोय मनाच्या शेतात
निदान उद्या तरी डवरतील
शब्दांची कणसं
साध्या आणि सरळ भाषेत व्यक्त होतानाही मोठा आशय मांडणारी ही कविता थेट वाचकांच्या काळजालाच हात घालते. ‘ बांद’ या बोली भाषेत लिहिलेल्या गावरान बाजातल्या कवितेत ग्रामीण जीवनाचे चित्र कवीने आत्मीयतेने साकारले आहे. या कवितेतील ‘ बाप ‘ आणि ‘ आजा ‘ वाचकांना भावूक करून आठवणी चाळवणारा आहे.
आनंदहरी यांच्या कवितेची भाषा जितकी सहज, स्वाभाविक तितकीच त्यांची काव्यशैली देखील चिंतनशील प्रवृत्तीची आहे. त्यांच्या कविता जगण्याच्या मुळाशी भिडणा-या असून कविच्या भावना हळुवार शब्दांतून व्यक्त करतात. ‘ ऊनही आताशा’ या कवितेत एकीकडे निराशा आणि कोरडेपणा यांचे चित्रण करताना कविचा सूर भरपूर आशादायी असल्याचे जाणवते.
आशेची पाखरं
अवचितच झेपावतात आकाशात
आकाश पंखात घेण्यासाठी
रणरणत्या टळटळीत दुपारीही!
‘मला माणूस म्हणून जगायचं आहे’ या कवितेतून समाजातील दांभिक प्रवृत्तींचा वेध घेताना कवीने असामाजिक तत्वांवर शाब्दिक कोरडे ओढले आहेत. कवीचा आंतरिक आक्रोश हा जनमानसाचा प्रातिनिधिक आक्रोश आहे. सांप्रत काळात समाजमनावर पडलेला धर्माचा अतिरेकी प्रभाव आणि धर्माचे बदलते स्वरूप याबाबत कविने ‘ धर्म ‘ या कवितेतून प्रश्न उपस्थित केले आहेत. मुक्त छंदातील अशा सामाजिक भान प्रकट करणा-या कवितांबरोबरच ‘ मन वारकरी झाले’ , ‘ माझ्या देहाचे रे झाड’, ‘जन्म तुझा होता बाई’ , या अष्टाक्षरी कविता तसेच ‘ सुने झाले गाव’, ‘ दाटते मनात भय’, ‘लखलाभ तुम्हाला’ या गजला कविच्या बहुपेडी प्रतिभेची जाणीव करून देतात.
या कवितांतून सामाजिक जाणीव व्यक्त करताना कवीने स्त्रियांच्या व्यथा मांडण्याचे भानही जागृत ठेवले आहे. ‘ उसन्या अवसानाने ‘ आणि ‘ नि:शब्द कविता ‘ या कवितांतून पुरूषी अहंकाराची दासी झालेली आधुनिक स्त्री, ‘ ‘तोड’ या कवितेत दारि्द्यावर घाव घालणारी ग्रामीण स्त्री, आणि ‘ती म्हणाली, ‘ शेवटी तू ही पुरूषच’ , या कवितेतील मुक्तीसाठी आसुसलेली स्त्री, अशा स्त्रियांच्या नानाविध रूपांचे वेधक दर्शन कवी आनंदहरी यांनी घडविले आहे. या कवितासंग्रहातील कवितांचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये पाहता समकालीन मराठी कवितेच्या क्षेत्रात कवी आनंदहरी यांच्या कवितेची योग्य दखल घेतली जाईल ही आशा बळावली आहे.
प्रस्तुति – श्री रमेश नागेश सावंत
मुंबई
संपर्क – 9821262767
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ राजकुमार “सुमित्र” जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया। वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपके अप्रतिम कालजयी दोहे।)
(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी हिन्दी, दूर शिक्षा ,पत्रकारिता व जनसंचार, मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित । 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘जहाँ दरक कर गिरा समय भी’ ( 2014) कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है एक भावप्रवणअभिनवगीत – “लो सिमटने लग गईं….”। )