मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गोड बोलूया..! ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

? कवितेचा उत्सव ?

☆ गोड बोलुया… 🪔 डॉ.सोनिया कस्तुरे ☆

गोड बोलूया..!

गोड तर आपण जरुर बोलूया,

गोड बोलण्याबरोबर

खरं बोलू या…!

 

खरं बोलता येईल इतकं

निर्भीड बनूया…

माणसा-माणसातील भेद

आणि वाद संपवूया,

सत्याच्या पाठीशी उभं राहूया.

गोड तर जरुर बोलूया…!

 

मनातली जळमटं काढून टाकूया…

द्वेषभाव, तिरस्कार

राग, लोभ, मोह,

यांना तिलांजली देऊया.

दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करुया…

लहानथोरांचा सन्मान करुया

एकमेकांना समजून घेऊन

शेष आयुष्य विशेष करुया.

गोड बोलण्याबरोबर

खरं बोलूया…!

 

निसर्गाच्या संक्रमणाबरोबरच

अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाऊया.

अंधःश्रद्धेकडून डोळसपणाकडे

वाटचाल करुया…

अंधारातून प्रकाशाकडे प्रवास करुया…

दारिद्र्याकडून समृद्धीकडे

संक्रमित होण्यास हातभार लावूया…

गोड तर जरुर बोलूया;

गोड बोलण्याबरोबर

खरं बोलूया…!

 

आपली आई, बहीण,

पत्नी, मुलगी यांच्यासमवेत

अखंड स्त्रीवर्गाचा सन्मान करुया…

‘तिला’ खूप सांगतो आपण

‘त्याला’ ही थोडं सांगूया.

बलात्कार, अन्याय, अत्याचार

होणार नाही

असा समाज घडवूया.

थोडं विवेकी होऊया…!

पैशापेक्षा कष्टाचा, माणुसकीचा

सन्मान करुया…

गोड बोलण्याबरोबर खरं बोलूया.

सत्याच्या पाठीशी उभं राहूया…!

गोड तर जरुर बोलूया…!!

 

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 165 ☆ गहन निळे नभ माथ्यावरती ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 165 ?

☆ गहन निळे नभ माथ्यावरती ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

गहन निळे नभ माथ्यावरती

अचल ,आसक्त मी धरतीवरती

त्या चंद्राचे अतिवेड जीवाला

काय म्हणावे या आकर्षणाला

ग्रह ,तारे दूर दूरस्थ आकाशगंगा

मी इवलासा कण कसे वर्णू अथांगा

शशांक म्हणे कुणी “सौदागर स्वप्नाचा”

परी जादूगार तू माझ्या मनीचा

 सोम म्हणू की शशी सुधांशु

चकोर जीवाचा असे मुमुक्षु

किती चांदण्या तुझ्याच भोवती

 गौर रोहिणी अन तारा लखलखती

गहन जरी नभ तू अप्राप्यअलौकिका

कधी बैरागी मन कधी अभिसारिका

कुंडलीतल्या सर्व पाप ग्रहांना

कसे समजावू मला कळेना

अखंड चंद्र तो  कुठे मिळे कुणाला ?

तरी मी चंद्राणी…कसे सांगू जगाला !

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संक्रांत… ☆ सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ संक्रांत ☆ सौ. विद्या पराडकर ☆

नववर्षाच्या प्रारंभी आली संक्रांत राणी

आली बघा चंद्रकला लेवूनी

शुभ्र हलव्याचा करूनी साज

लाजवी मौक्तिक माळेला आज

 

तिळाची स्निग्धता गुळाची गोडी

समरसतेने सजली पहा कशी जोडी

भवसागरातील जणू‌ ही  होडी

कुशलतेने पैलतीरा नेतो परमेश नावाडी

 

प्रेमाचे तीळ घेऊनी

कर्तव्याचा गुळ घालूनी

संयमाचे जायफळ उगाळूनी

शुध्दत्वाची विलायची टाकूनी

 

सुरुची युक्त लाडू वळू या

विशाल दृष्टीचे ‌दान‌ देवू या

एकतेच्या धाग्यात हास्य फुलवू या

संक्रांतीचा नवा अर्थ समजुन या

 

संक्रांत साजरी करू या

संक्रांत साजरी करू या

© सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #171 ☆ प्रेम सिंधू… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 171 ?

☆ प्रेम सिंधू…  ☆

मोगऱ्याचा डाव आहे

हा सुगंधी घाव आहे

 

बेगडी हे हास्य ओठी

आणि खोटा भाव आहे

 

ठेवले मी प्रेम जेथे

कागदाची नाव आहे

 

टांगली झाडास प्रीती

पाहणारा गाव आहे

 

प्रेम कालातीत माझे

शून्य टक्के वाव आहे

 

प्रेम सिंधू भेटुनीही

लागला ना ठाव आहे

 

पंख माझे छाटणारा

सागतो मी साव आहे

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मकर संक्रांत…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “मकर संक्रांत…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

इंग्रजी नवीन वर्ष सुरू झाले की पहिला  येणारा सण म्हणजे मकरसंक्रांत. कुणाच्याही मनात घर करायचं असेल तर त्याचा रस्ता हा आपल्या वाणीमार्फत जातो.तुमच्या वाणीवरच तुमच्याशी जोडल्या गेलेली माणसं ही जुळून राहतात की दुरावतात हे संपूर्णपणे अवलंबून असतं.म्हणून ह्या सणाचा मूलमंत्रच मुळी “तिळगूळ घ्या आणि गोडगोड बोला”असा आहे. ह्या सणाद्वारे गैरसमजाने निर्माण झालेले मनमुटाव,नाराजी क्षणात दूर होऊन निरभ्र आकाशासारखं मनं स्वच्छ होतं. अर्थातच” गोड बोला” हे शब्द अगदी स्वच्छ पारदर्शी मनातून आणि मनापासून सुद्धा उमटले तरच त्याला अर्थ आहे.

पुराणात मकरसंक्रांतीची अशी कथा सांगतात की, संकरासूर नावाच्या राक्षसाला जगदंबेने या दिवशी मारले म्हणून तिला संक्रांतीदेवी असे म्हटले जाऊ लागले.

…हा सण साजरा करण्याच्या पद्धती ह्या प्रांतानुरूप थोड्या बदलतात.मकर संक्रांतीच्या दिवशी समृद्धीचे प्रतीक म्हणून सुगड्यांची पूजा केली जाते. या सुगड्यांना दोरा गुंडाळतात.. त्यानंतर हळद-कुंकू लावून त्यामध्ये ऊसाचे काप टाकले जातात, त्याबरोबरच तीळ गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, बोरं टाकली जातात. यानंतर एका शुभ्र वस्त्राने कपडे झाकून प्रार्थना केली जाते. ही पूजा आटोपल्यानंतर गृहिणी आपल्या सवडीप्रमाणे एकमेकींना भेटण्यासाठी जातात. तीळ गुळ देऊन छोट्या भेटवस्तू देऊन हा सण साजरा करतात. या भेटवस्तूंना वाण देणे म्हणते. नवविवाहित जोडप्याचा दोन्ही घरी संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करतात. एरवी आपण काळा रंग अशुभ मानतो परंतु ह्या संक्रांतीच्या सणाला काळ्या वस्त्रांच महत्त्व असतात त्यामुळे बाजारात ह्या दिवसात काळ्या साड्या व काळे पंजाबी ड्रेसेस खप असल्या कारणाने भरपूर बघायला मिळतात.

मकरसंक्रांतीला उत्तरायण सुरू होते. उत्तरायण हा शुभ काल मानला जातो. याबद्दल अशी गोष्ट आहे की, महाभारतातील कौरव –  पांडवांचे युद्ध चालू होते. अर्जुन भीष्मांशी लढत होता पण ते त्याला जड जात होते. तेव्हा श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून अर्जुनाने शिखंडी ला पुढे उभे केले आणि तो त्याच्याआडून लढू लागला. शिखंडी हा अगोदर अंबा नावाची राजकन्या होता. भीष्मांनी आपल्या सावत्र भावासाठी अंबा, अंबिका व अंबालिका अशा तीन राजकन्या पळवून आणल्या होत्या.

अंबेचे दुसर्‍या राजावर प्रेम होते म्हणून भीष्मांनी तिला त्याच्याकडे पाठवले; पण पळवून नेलेल्या मुलीचा स्वीकार करायला त्याने नकार दिला. ज्या भीष्मांमुळे हे सारे झाले त्यांचा सूड घेण्याचे अंबेने ठरवले. ती तपश्चर्या करून शिखंडी नावाचा पुरुष झाली आणि भीष्मांशी लढायला आली. पण ती पूर्वी स्त्री होती म्हणून भीष्म शिखंडीशी लढेनात. तेव्हा अर्जुनाने शिखंडीच्या आडून सोडलेल्या बाणांनी जखमी होऊन भीष्म कोसळले. त्यांच्या अंगामध्ये इतके बाण घुसले होते की, ते जमिनीवर खाली न पडता बाणांच्याच गादीवर आडवे झाले. तेव्हा दक्षिणायन सुरू होते. पण भीष्म इच्छामरणी होते म्हणून त्यांनी उत्तरायणाचा शुभ काल सुरू होण्याची वाट पाहिली आणि मगच प्राण सोडले.

अशा ह्या स्नेहबंधाचे धागे गुंफणा-या सणाची महती सांगणारी माझी एक रचना  पुढीलप्रमाणे

मकरसंक्रांतीची शिकवण

ह्या सणाला काय महत्त्व सांगतो काटेरी हलवा

तीळ गुळासंगे मुखी ठेऊनी राग मनीचा घालवा

ह्याला काय महत्त्व सांगतात ती आंबटगोड बोरं

मनातील किल्मिष पूर्ण घालवा मनं करा कोरं

ह्याला काय महत्त्व सांगतात गोड ऊसाचे कांडे

गोड बोलून टाळावे जरी लागले भांड्याला भांडे

ह्या सणाला काय महत्त्व सांगतो टप्पोरा तीळ

आढ्यता आता सोडा घालवा मनातील पीळ

ह्याला काय महत्त्व सांगतो पिवळाधम्म गूळ

स्वच्छ निरभ्र करा मनं सोडून गैरसमजाचे खूळ

ह्याला काय महत्त्व सांगते मिश्रडाळीची खिचडी

फटकळ तोंडाळपणा पेक्षा बरी ती लाडीगोडी

काय महत्त्व सांगतात ती लालचुटुक गाजरं,

मनात शिरूर राह्यलं की आयुष्य होतं साजरं

द्वेष आता सोडा माणसं आता  जोडा ,

तीळगूळ घेऊन गोड बोलून गाठ मनीची सोडा.,

गाठ मनीची सोडा…

परत एकदा तीळगूळ घ्या अन् गोडगोड बोला. मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निर्धार… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ निर्धार… ☆  प्रा तुकाराम दादा पाटील ☆ 

धर्म आमचे ध्येय मानुनी

सजवत जावू भाव जुना

राज्य हिंदवी स्मरत जायाचे

मिटवायाला सर्व वेदना

 

समानतेचा हक्क मागते

रयत आमची मराठमोळी

लोक येथले करू म्हणाले

या राज्याला मानवंदना

 

भगवा आहे रंग सांगतो

वैराग्याच्या अध्यात्माला

,महाराष्ट्राच्या जनतेच्या ही

मुखात असते भक्तिभावना

 

सह्याद्रीच्या गडकोटांनी

जपली आहे खरी अस्मिता

या मातीला करती मुजरा

अभिमानाने करत गर्जना

 

तळहातावर मस्तक होते

आक्रमकांना परतवताना

सामर्थ्याची चुणूक दावता

नाही हुकला कधी सामना

 

शिवरायांच्या नियोजनाचा

करत जायचा पाठपुरावा

निधडी छाती संभाजीची

करा सांगते निर्धार पुन्हा

 

वैभव आहे मातृ भुमीचे

तेजा मधल्या सूर्य प्रभेचे

देश धर्म हा जपण्यासाठी

देत राहु या संदेश जना

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 113 ☆ तिळगुळ होताना… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 113 ? 

☆ तिळगुळ होताना…

तिळगुळ एकत्र येतो

एकत्र येऊन समरस होतो

 

समरस होऊन एकमेकांत

प्रेमाचा तो संदेश देतो

  

तीळ तुटतो,गूळ फुटतो

तेव्हाच कुठे गोडवा येतो

 

आपल्यातील अहंकार असाच तुटावा

गोडवा गोडवा आणि गोडवाच रहावा

 

देणाऱ्याने देत जावे

घेणाऱ्याने घेत जावे

 

परंपरेचे भान अन

स्नेह तुषार उडवित जावे

 

ममता आणि सुनम्रता

साधावी ती समर्पकता

 

शेवटी काय हो येईल सोबती

म्हणुनी जपावी प्रेमळ नाती

 

सु-मंगल सु-दिन आज उगवला

तिळगुळ घ्या,गोड गोड बोला

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 44 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 44 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

७८.

विश्वाची निर्मिती नुकतीच झाली होती.

प्रथम तेजात तारका चमकत होत्या.

तेव्हा आकाशात देवांची सभा भरली आणि

ते गाऊ लागले-

“वा!पूर्णत्वाचं किती सुरेख चित्र! निर्भेळ आनंद!”

 

एकजण एकदम ओरडला,

“प्रकाशमालेत कुठंतरी त्रुटी आहे.

 एक तारा हरवलाय!”

 

त्यांच्या वीणेची एक तार तुटली.गीत थांबले.

ते निराशेनं म्हणू लागले,

” हरवलेली ती तारका सर्वात सुंदर होती.

 स्वर्गाचं वैभव होती.”

त्या दिवसापासून सतत शोध चालू आहे.

आणि प्रत्येकजण दुसऱ्याला सांगतो,

” जगातला एक आनंद नाहीसा झाला आहे.”

रात्रीच्या खोल शांततेत तारका हसतात

आणि आपापसात कुजबुजतात,

“हा शोध व्यर्थ आहे,

एकसंध पूर्णत्व संपलं आहे.

 

७९.

या आयुष्यात तुला भेटायचं माझ्या वाट्याला

येणार नसेल तर, तुझ्या नजरेतून

मी उतरलोय असं मला सतत वाटू दे.

मला क्षणभरही विस्मरण होऊ नये.

जागेपणी व स्वप्नातही या दु:खाची टोचणी

सतत मनात राहो.

 

जगाच्या बाजाराच्या गर्दीत माझे दिवस

जात असताना आणि दोन्ही हातांनी

भरभरून नफा होत असताना

मला सतत असे वाटत राहो की मी

काहीच मिळवत नाही.

या दु:खाची टोचणी मला स्वप्नात व

जागेपणी सतत राहावी.

 

दमून भागून रस्त्याच्या कडेला मी बसेन.

धुळीत माझा बिछाना पसरेन तेव्हा,

दीर्घ प्रवास अजून करायचा आहे याची जाणीव

मी क्षणभरही विसरू नये

आणि या दु:खाची टोचणी मला जागृतीत व

स्वप्नातही रहावी.

 

शृंगारलेल्या माझ्या महालात

गाण्याचे मंजूळ स्वर आणि

हास्याचा गडगडाट असावा.

तेव्हा मात्र मी तुला निमंत्रण दिले नाही

या दु:खाणी टोचणी मला जागेपणी

व स्वप्नातही असावी.

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कायदा… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

😞 का य दा ! 😂🖊️ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

कोण हा ?

 

याचा नाही तबल्याशी

संबंध जराही काडीचा,

कोर्ट कचेऱ्या पोलीस

यांना हा फार जवळचा !

 

याचे राज्य असेल जिथे

सुखी असते म्हणे जनता,

पण उल्लंघन याचे करती

सगळेच लोकं येता जाता !

 

सापडू नये कचाट्यात

म्हणून सारे काळजी घेतात,

चुकून कोणी सापडताच

वकीलाकडे धावतात !

 

याची पुस्तके अभ्यासून

वकील यावर पोट भरती,

खोट्याचे खरे ठरवताच

वाढे बघा त्यांची कीर्ती !

 

आहे सगळ्यांना समान

तो पुस्तकात कागदावर,

पण ठराविक ‘स्वयंभू नेते’

घेत नाहीत यास मनावर !

 

आहे जिथे याचे अस्तित्व

तिथेच असतात पळवाटा,

म्हणून न्याय मिळवण्यास

घालाव्या लागती हेलपाटा !

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चाहूल थंडीची… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ चाहुल थंडीची… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

हळवीशी, कोवळीशी

 जाग दंवाला आली

पाने,फुले,विहगांना

चाहूल थंडीची लागली

 

किलबिलही पाखरांची

 का अशी मंदावली

चोच पंखांत लपवूनी

ती ऊब शोधू लागली

 

पाकळ्या फुलांच्याही

 झळकल्या हिऱ्यांपरी

भिनली लयदार झिंग

माझिया अंगावरी

 

शाल लपेटुनी अशी

 मी  धुक्याची अभ्रेस्मी

थंड मदहोश ही हवा

स्पर्श भासतो रेशमी

 

कुंतलातील दंवफुले

सजणाच्या अधरावरी

बाहुपाशात आज त्या

पहाट जाहली रुपेरी

 

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares