मराठी साहित्य – विविधा ☆ सर्व अंधश्रद्धांविरूद्ध लढणारा झुंजार योद्धा – जेम्स रँडी – भाग-२ – लेखक – डाॅ प्रदीप पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

🔆 विविधा 🔆

सर्व अंधश्रद्धांविरूद्ध लढणारा झुंजार योद्धा – जेम्स रँडी – भाग-२ – लेखक – डाॅ प्रदीप पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

(त्याच्या या कामाची दखल घेऊन त्याला मॅक आर्थर फाउंडेशनचा प्रतिष्ठित पुरस्कार व फेलोशिप जरी मिळाली तरी त्याचे वेगवेगळ्या चाचण्या व प्रयोग करणे काही थांबले नाही. बायोरिदम या खूळाच्या त्याने मजेशीर चाचण्या घेतल्या. सेक्रेटरीचा चार्ट एका बाईस देऊन नोंदी ठेवायला सांगितल्या आणि त्या बाईने तो तिचा चार्ट समजून ऍक्युरेट नोंदीचा निर्वाळा दिला !!)

क्रमशः…

जेम्स रँडीने वैद्यकीय क्षेत्रातल्या ‘हम्बग्ज’चाही चांगलाच समाचार घेतला. ब्राझील-फिलिपिन्समधील स्वयंघोषीत डाॅक्टर आरिगो मुळे प्रसिद्ध पावलेल्या ‘सायकिक सर्जरी’ या प्रकारात कोणतेही शस्त्र न वापरता शस्त्रक्रिया केली जाते असा दावा होता… पण ती चलाखीची शस्त्रक्रिया ज्याला तो हस्तक्रिया असे म्हणायचा, ती कशी होती हे फिलिपिन्समध्ये जाऊन रँडी ने दाखविले. ऑपरेशनच्या वेळी अरिगो व त्याच्यासारख्या इतर अनेकांनी सायकिक सर्जरीचा दावा करणाऱ्या लोकांनी ऑपरेशन नंतर दाखविलेले रक्त व मांस हे बोकडाचे किंवा गाईचे असायचे हे रिपोर्ट सहित दाखविले.

व्हाईट हाऊस मध्ये बेटी फोर्ड या बाईं समोर अतींद्रिय शक्तीचे तथाकथित पण साधार प्रयोग दाखविणारा जेम्स रँडी हा एकमेव विज्ञानवादी होय.

कॉर्नेल, हॉर्वर्ड, एम.आय.टी, ऑक्सफर्ड, प्रिन्स्टन, येल अशा अनेक विद्यापीठात जेम्सने व्याख्याने दिली. चलाखी व विज्ञान यांच्यावर चर्चासत्रे घडवीत एक्सॉन रिसर्च लॅब पासून नासा, नॅशनल जिओग्राफिक सोसायटी पर्यंतच्या अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये व्याख्याता म्हणून जाऊनही सामान्यातल्या सामान्य भोंदूच्या चाचण्या घेण्यास जेम्स रँडी कचरला नाही. तो या चाचण्या अतिशय हुशारीने, गूढ अतिंद्रिय दाव्यासाठी, वेगवेगळ्या तयार करीत असे.

कॅलिफोर्निया हुन आलेल्या विन्स वायबर्ग या पाणाड्याने ‘डाऊझिंग’ म्हणजे काठी घेऊन विशिष्ट पद्धतीने जमिनीतील अचूक पाणी दाखवण्याचा दावा केला तेव्हा त्याने जमिनीखाली पाण्याच्या पाईप टाकून काही मधून पाणी जाणारे पाईप्स शोधून काढण्याच्या तयार केलेल्या चाचणीची तर खूपच प्रशंसा झाली. विन्स अर्थातच दावा हरला. स्यू वॅलेस नावाची पिरॅमिड व चुंबक विकणारी तरुणी मानवी रोगांचे निदान मॅग्नेट थेरपीने करीत असे. रँडीने तिच्या दाव्यांची डबल ब्लाइंड, कंट्रोल टेस्ट घेऊन तिचा चुंबकोपचाराचा दावा फोल कसा आहे हे दाखवून दिले.

1978 मध्ये ‘सायकिक न्यूज’ नावाच्या मासिकाने जाहीर केले की बिंगो स्वान हा सर्व ग्रहांवर सूक्ष्म देह आधारानं जाऊन आला आहे व मरिनर 10 आणि पायोनियर 10 या कृत्रिम उपग्रहांनी गुरु ग्रहाची माहिती जी नंतर दिली ती स्वानने पूर्वीच दिली आहे, हे दावे जसेच्या तसे एडगर मिशेल या अंतराळवीराने मान्य केले आहेत,.. याही दाव्यांची खोलवर छाननी करून रँडीने त्याच्या दाव्यांची व वैज्ञानिक दाव्यांची तुलना केल्यावर आलेल्या निष्कर्षांची जी माहिती दिली आहे ती वैज्ञानिक चाचण्या कशा कराव्यात याचा सुरेख नमुना आहे.

रँडी चा प्रोजेक्ट अल्फा नावाचा अतिंद्रिय बुवा-महाराज-परामानसशास्त्री यांची परीक्षा घेणारा आराखडा खूपच गाजला आहे.

विसाव्या शतकातील असामान्य नास्तिक म्हणून ‘दि कमिटी फॉर द सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन ऑफ क्लेम्स ऑफ द पॅरानॉर्मल’ तर्फे वैज्ञानिक व नास्तिक विचारवंत यांची यादी करून निवड करण्यास सांगितली असता कार्ल सेगन, मार्टिन गार्डनर, पॉल कुर्टझ,  रे हॅमन, अल्बर्ट आईन्स्टाईन, बर्ट्रांड रसेल, फिलीप क्लास, कार्ल पॉपर, रिचर्ड डॉकिन्स अशा दिग्गजांनाही मागे सारून जेम्स रँडी सर्वाधिक मते घेऊन प्रथम क्रमांकावर राहिला होता ते केवळ तो कार्यकर्त्यांच्या अभिनिवेशाने सर्वत्र आव्हाने देत राहिल्याने. प्रबोधनाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा रँडी हा अंधश्रद्धांच्या विरोधी लढाई करणारा खरातर योद्धाच!

रँडीने लिहिलेल्या तेरा पुस्तकांपैकी एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रसिद्ध लेखक आर्थर क्लार्क म्हणतो, ” रँडीची ही पुस्तके म्हणजे पुस्तक दुकानातून हजारोंचे मेंदू सडविणाऱ्या अवैज्ञानिक गोष्टींना योग्य मार्गावर घेऊन जाणारे दीपस्तंभ आहेत”

धर्माचा आधार घेऊन प्रचंड शोषण व फसवणूक चाललेल्या पीटर पॉपहॉफ सारख्या ख्रिस्तोपदेशकाचे बिंग  फोडताना व्यथित झालेला रँडी म्हणतो…

‘मानवाचे शहाणपण, पैसा आणि कधीकधी जीवसुद्धा हिरावून घेणाऱ्या अवैज्ञानिक अतिंद्रिय गुढ गोष्टींची हकालपट्टी केली पाहिजे.’

यावर वॉशिंग्टन स्टार या दैनिकाने टीका करून हे सारे अस्तित्वात कुठे आहे असे विचारले. तेव्हा रँडीने फटकारले…..

“लिहिणाऱ्याने त्या गरीब पालकांचे चेहरे पाहिले नाहीयेत ज्यांची मुले गूढ संप्रदायामध्ये सामील होऊन वहावत गेली आहेत…त्याने अशी माणसे पाहिली नाहीत ज्यांनी शापाचा धसका घेऊन जीव घालविला… अशी स्त्री पाहिली नाही की ज्या स्त्रीने धर्म बैठकातुन प्रियकराचा धावा केला पण ती तेथेच लुटली गेली… महाशय जा त्या गयानात जेथे 950 मुडदे केवळ रेव्हरंड जिम जोन्स मुळे हेवन गेट कडे गेलेत…!! उकरून काढाल ते मुडदे?”

20 ऑक्टोबर 2020 ला रँडी विश्वात विलीन झालाय.

आतड्याच्या कॅन्सरशी झुंज देत 92 वर्षांपर्यंतच्या प्रवास करणे सोपे नसते..10 वर्षापूर्वी तो म्हणाला होता..” मृत्यू कधीतरी येणार आहेच. या पृथ्वीने मला प्राणवायू एवढी वर्षे पुरवलाय हेच खूप नाही का?….!”

डाॅ.  प्रदीप पाटील

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मधुरोत्सव… ☆ श्री मनोज मेहता ☆

श्री मनोज मेहता

? मनमंजुषेतून ?

☆ मधुरोत्सव… ☆ श्री मनोज मेहता 

आपल्या हिंदू धर्मात व्रत-वैकल्य करायला वर्षभर वेगवेगळे सण येतात, त्यांच्या वेगळेपणाने सर्वांना मजाही येते.

सौ. मधुरा मनोज मेहता गेली २७ वर्षे अनेक आजारांशी झगडतेच आहे. प्रत्येकवेळी ती हसत – हसत त्यातून बाहेर पडते, हे तिचं कसबच म्हणावं लागेल. मधुराची नक्की मणक्याचीच शस्त्रक्रिया झाली की मेंदूची ? कारण २०१७ च्या मोठया शस्त्रक्रियेनंतर काही वेगळीच ऊर्जा तिला मिळाली की काय ? असा प्रश्न पडलाय मला !  

व्यक्तिगत पत्र-लेखनाने याची सुरुवात झाली. मग हळूहळू ती कविता व चारोळ्याही करू लागली. अनोख्या पाककलेची तर ती सॉल्लिड, खिलाडी होतीच, आता तर अष्टपैलूच झाली. लॉकडाऊन पासून तर तीची गाडी सुसाटच सुटली आहे, अन् वेगवेगळे पदार्थ करून त्याचे फोटो काढायची मला सरळ अहो ऑर्डरच द्यायची आणि माझ्या पोटोबालाही ती जणू खुराकच देत आलीय. असो…

श्रावण महिना हा अनेक सणांची नांदी घेऊन येतो. आमच्या अमेरिकेत असलेल्या मुलीचे १ मे २०२१ ला virtual लग्न अमेरिकेत झाले. कोविडमुळे आम्ही जाऊ शकलो नाही, तिचा पंचमीचा सणही करू शकत नाही. त्यासाठी काही हटके  करायचं, सौ. मधुरानं ठरवलं. 

ती श्रावण महिन्यात रोज एका सवाष्णीला फोन करून संवाद साधत होती. त्यात तिच्या बहिणी, आई, मैत्रिणी, आमच्या दोनही मुली व माझ्या मित्रांच्या सौ. ही आल्या.

यावर्षी नवरात्रीला तर मधुराने कमालच केली. घटस्थापनेच्या दिवशी घरच्या देवीची ओटी भरून झाल्यावर, सकाळी व्हाटस्अपवर रोज त्या त्या देवीची माहिती सौ. मधुरा स्वतःच्या आवाजात म्हणून तिच्या निरनिराळ्या ६०/७० मैत्रिणींना पाठवत होती. नंतर दिवसभरात रोज नऊ मैत्रिणींना, त्यात २७ वर्षांपासून ते ८७ वर्षांच्या आजींपर्यंत फोनवरून संवाद साधत होती. प्रत्येकीशी संवाद साधत असताना, तिला त्यांचा चेहरा दिसत नसला, तरी दोघींच्या संवादातून होणारा आनंद, मी कधी – कधी हळूच अनुभवत होतो.

या नऊ दिवसात आमच्या घरी येणाऱ्या सौभाग्यवतीची ओटी भरायची. या वर्षी, नवमीच्या दिवशी उद्यापन रस्त्यावर कचरा गोळा करणाऱ्या, घरकाम करणाऱ्या स्त्रिया, ज्या आपल्या संसाराला हातभार लावून तो टिकवण्यासाठी धडपडत असतात, त्यांना वाण देऊन, आनंदोत्सव साजरा करताना मधुराचा चेहरा काय फुलून गेला होता ना, त्याला तोड नाही ! मनांत म्हटलं देवानू, माझ्या मधुराला अशीच कायम आनंदी ठेवा रे !

“आजची तरूण पिढी ऑनलाईन कामात किंवा कामावर असूनही व्यग्र असलेल्या, तर ज्येष्ठ मंडळी घरात कोणी एकटे अथवा आपल्या कुटुंबासह असायचे, अशावेळी सर्वांच्या वेळा सांभाळून, घरातील ज्येष्ठ व तरुण सौभाग्यवतींना सौ. मधुराचा अवचित आलेला फोन हा नक्कीच त्यांना आनंदून गेला असेल. तिला प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नसल्याने स्वतः फोन करून सर्वच पिढ्यांशी तिने संवादाचा सेतू बांधला. नाहीतरी आपले ‘सण-उत्सव’ साजरे करण्यामागे हाच तर हेतू आहे ना !

सर्व सौभाग्यवती मैत्रिणींना फोन करणे शक्य नाही, पण पुढच्या वेळी नक्की हं, असं मला हळूच कानात सांगितलं हो… 

असा अनोखा व भन्नाट उपक्रम तिच्या कल्पनेतून आज साकार झाला, म्हणून तिच्यासाठी खास सप्रेम…

खरं तर देव माणसातच आहे, तो शोधण्याच्या तिच्या या अफलातून आयडियेच्या कल्पनेला मनापासून सलाम !

“…हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हीच अमुची प्रार्थना…

© श्री मनोज मेहता

डोंबिवली  मो ९२२३४९५०४४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “असाही एक तुरुंग अधिकारी…” – लेखक : संपत गायकवाड ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “असाही एक तुरुंग अधिकारी…” – लेखक : संपत गायकवाड ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

असाही एक तुरुंग अधिकारी—  

मानवतेचा पुजारी असणारा, रत्नागिरी विशेष जिल्हा कारागृहाचा तुरूंग अधिकारी अमेय मिलिंद पोतदार…  

अमेयची बदली झाली तर आम्हीही त्यांच्यासोबत त्यांच्याच जेलमध्ये जाणार अशी मागणी कैदी करतात. असा हा महाराष्ट्रातील सर्वात Youngest जेलर.

लहानपणी दहावीत असताना आजीला मुंबईला  जाण्यासाठी रात्री सोडण्यास गेला असता कोंडाळ्यात वयोवृद्ध स्त्री अन्न शोधून खात होती हे विदारक दृष्य पाहून अस्वस्थ होतो. आईकडून पैसे घेतो व धावत पळत बिस्किटचे पुडे आणून त्या स्त्रीला देतो. ती ते पुडे अघाशासारखे खात असताना त्याला आजीने दिलेला मसाले भाताचा डबाही तो त्या वृद्ध स्त्रिला खायला देतो. लहान वयातील हा माणुसकीचा गहिवर तुरूंगाधिकारी झाल्यावरही ज्याच्याकडे कायम राहिला तो म्हणजे  अमेय होय.

विनोबा भावे, सानेगुरूजी, बाबा आमटे आणि मदर तेरेसा यांच्याकडे समाजाप्रती असणारी करुणा अमेयकडे बालपणापासून चरित्र वाचनातून व शिक्षिका असणाऱ्या आईकडून अंगी बाणली. कोल्हापुरात जि.प.व म.न.पा.शाळेत मराठी माध्यमात शिकलेला अमेय MPSC मधून तुरूंग अधिकारी म्हणून रत्नागिरी येथे रूजू झाला.

जन्मजात कोणी गुन्हेगार नसतो. सर्वांत मोठा अधिकार सेवेने व प्रेमाने प्राप्त होतो याची जाणीव अमेयला होती. गुन्हेगारामध्येसुद्धा माया, ममता, आपुलकी,आत्मियता, आपलेपणा असतो यावर विश्वास असणारा अमेय…. रत्नागिरी कारागृहात खतरनाक बंदीजनांसोबत राहून त्यांच्यात परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो आहे. माणूसपण जपले की कैदी मनाने मोकळे होतात. जमिनीवर पाय ठेवून काम केले की लोकांना आपलेपणा वाटतो. हे लक्षात घेऊन काम केल्याने बंदीजनांना अमेय आपला सखा, मित्र,  सोबती वाटू लागला आहे. मन समजून घेता आले तर मनास जिंकता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमेय. आकाशसारखे अनेक खतरनाक कैदी अमेयच्या इतके प्रेमात पडले आहेत की तुमच्या बदलीनंतर आम्ही काय वाटेल ते करून तुमच्याच जेलमध्ये येऊन उर्वरीत शिक्षा पूर्ण करणार असा आग्रह धरतात. याला काय म्हणावे? यापूर्वी हे शिक्षकांच्या वाट्याला यायचे पण तुरूंगाधिकारी यांच्यासाठी असे होते तेव्हा देशाचे भविष्य उज्ज्वल आहे असे दिसते. (पूर्वी ‘ दो आँखे बारह हाथ ’ या सिनेमासारखा जेलर व कैदी असतील तर किती बरे होईल असे वाटायचे. आता ते सत्यात येत आहे. महामहीम किरण बेदी यांनी तिहार जेल बदलवला होता.  अमेय तसाच प्रयत्न करत आहे.)

आपल्या वाट्याला आलेले काम समाजासाठी, राष्ट्रासाठी उपयुक्त  करून आवडीने, प्रामाणिकपणे व मनोभावे करणे म्हणजेच राष्ट्रभक्ती हे अमेयला ठाऊक आहे. तारूण्याचा काळ म्हणजे जीवनाचा रचनाकाळ असतो. म्हणून अमेयने नवनवीन चॅलेंज स्वीकारली. अमेयला त्याचे दैवत असणाऱ्या वीर सावरकर यांचे वास्तव्य असणारी कोठडी व त्यांच्या वापरातील साहित्य व अभिलेख केवळ ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करून ठेवल्याचे दिसून आले . अमेयने उपलब्ध साधनसामुग्रीतून नूतनीकरण करून ही वास्तू ‘स्मृतिभवन‘ म्हणून विकसित केली. वीर सावरकर  यांचा जीवनपट सदर कक्षात पोस्टरच्या स्वरूपात, तसेच छानशा लघुपटाद्वारे भेटीस येणाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला. ऐतिहासिक वारसा अभिनव पद्धतीने जतन करण्यासाठी वरिष्ठांनी अमेयच्या अथक प्रयत्नांचे खूप कौतुक केले. केवळ वास्तू न  बघता अमेय जेव्हा प्रचंड वाचन, अमोघ वक्तृत्व , ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास या जोरावर पर्यटकांना वा महनीय व्यक्तींना वीर सावरकरांचा इतिहास सांगतो, तेव्हा लोक भारावून जातात. त्यांच्या अश्रूंचा अभिषेक कोठडीस होतो.

अमेयकडे समाजभान  असल्यामुळे त्याने स्वत:च्या लग्नातील २५ किलो अक्षता पक्षीमित्रांसाठी दिल्या . लग्नात अंगावर टाकून त्या वाया घालविल्या नाहीत.  रत्नागिरी कारागृहाकडे १५ एकरपैकी १२ एकर पडून असणाऱ्या  जागेवर विविध फळझाडे (आंबा व नारळाची खूपच झाडे) लावली आहेत. बागायत शेती विकसित केली आहे. बंदीजनांना विश्वासात घेतले तर नरकाचे नंदनवन होते हे सिद्ध केले आहे. राज्यात काही कारागृहात घेतलेला मधमाशी पालन  प्रकल्प रत्नागिरी येथे सुरू केला आहेे. मधाचे ” मका” नावाने ब्रॅडिंग होणार आहे. मधमाशी पालन प्रकल्पामुळे मधाबरोबर परागीकरणाचा फायदा शेती उत्पादन वाढीसाठी होईल हा अमेयला विश्वास आहे. महाराष्ट्र टाईम्सच्या वतीने त्याने ‘ पक्षी वाचवा मोहिम ‘  कारागृहात सुरू केली. पक्ष्यांसाठी कारागृह परिसरात घरटी व पाण्याची भांडी ठेवण्यात आली. स्वत:च्या लग्नातील अक्षता व दुकानात  पडलेले धान्य यांचा वापर केला. आज विविध पक्षांचे आनंदाचे व सुरक्षित आश्रयस्थान म्हणजे कारागृहाची शेती झाली आहे. जागतिक दृष्टी दिनानिमित्य अंध मुलांना सन्मानाने बोलावून त्यांच्या हस्ते कारागृह परिसरात  वृक्षरोपण केले. मुलांसाठी हा अनोखा कार्यक्रम ही पर्वणीच होती.                       

बंदीजनांच्या कुटुंबांची सार्वत्रिक गळाभेट घडवून आणणे , एकत्रित भोजन करणे, एकमेकांना डोळ्यांत साठविणे आणि मुलांना ‘ खूप शिका, आईचे ऐका, खूप मोठे व्हा.आईची काळजी घ्या. माझी काळजी करू नका ‘ हे संवाद ऐकताना कारागृहात अश्रूंचे सिंचन होते हा अनोखा..  भावनेने ओथंबलेला, कारागृह गहिवरून टाकणारा अनुभव अमेयने घेतला.                     .        

 २००५ पासूनच्या बंदीजनांची माहिती PRISMS या प्रणालीमध्ये विहीत कालावधीत उत्कृष्टरित्या पूर्ण करण्याचे कठीण काम अमेयने करून दाखवून वरिष्ठांची वाहवा मिळविली . संगणकीकृत प्रणालीमध्ये, असणाऱ्या २४ मोड्यूलपैकी २१ मोड्यूल चालू करण्यात खूप मोठे योगदान अमेयचे होते.                        .      

बाबा आमटे नेहमी म्हणत, ” मी माणसांना माणसात आणण्याचे काम करतो “. अमेय हेच काम पुढे चालवत आहे. विनाशकारी शक्तीचे रूपांतर कल्याणकारी शक्तीत करण्याचे काम संस्काराद्वारे,आचरणाद्वारे अमेय करतो आहे.  बंदीजन जेव्हा शिक्षा संपून जातात तेव्हा अमेयची भेट सासरी जाणाऱ्या मुलींसारखी असते. आपला तुरूंगाधिकारी आपण जाताना गहिवरतो, त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात…  हे पाहिल्यावर बंदीजन बाहेर माणुसकीने, चांगुलपणाने वागण्याची हमी देऊन जातात, तेव्हा या बापाचा जीव भांड्यात पडतो. कसलं नातं??? 

आई- बाप हेच त्याचे दैवत. तुरूंगाधिकारी झाल्यावरही ‘हॉटेलमधील प्लेटमध्ये राहिलेली भाताची शिते पुसून घे’ म्हणणारा बाप अमेयला भेटला. ‘मोठ्या माणसांच्या पायाला युनिफॉर्मवरही असताना हात लाव’ असे शिकविणारी आई. ‘भ्रष्टाचाराच्या वाऱ्यालासुद्धा उभा राहू नकोस. हरामाचा पैसा विषासारखा असतो.’ हे तत्वज्ञान रुजविणारे आई- बाप असतील तर अमेयसारखा मुलगा घडू शकतो. चांगुलपणावर विश्वास ठेवून चाकोरीबाहेर जाऊन काम करणारे अमेयसारखे अधिकारी प्रत्येक क्षेत्रात थोडे का असेना आहेत. म्हणून तर देशाचा भविष्यकाळ उज्वल आहे.                      .         

“अमेय, तू हाताखालील कॉन्स्टेबल, हवालदार, लिपीक व परिचर यांच्यावरही जीव लावला आहेस. माझ्यासारखा केवळ वयाने खूप मोठा माणूस असूनही तुला वंदन करून सलाम करतो.    

…  बाळ, खूप खूप शुभेच्छा व अनेक शुभाशिर्वाद.” 

लेखक : श्री संपत गायकवाड.

माजी सहाय्यक शिक्षण संचालक

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गरज… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ गरज… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

एका मैत्रिणीच्या आईचे परवा 95 व्या वर्षी निधन झाले. वडील आधीच निवर्तले होते. 65 वर्षांच्या त्यांचा सहजीवनातला संसार आणि विस्तार म्हणजे तीन लेकी, दोन लेक, आठदहा खोल्यांचा प्रशस्त बंगला, प्रत्येकाचे स्वतंत्र शयनकक्ष, कपाटे, तेवढे कपडे, कार्यप्रसंगी 100 माणसे जेवू शकतील एवढी भांडी, फर्निचर, बाग, हौसेमौजेने तीर्थयात्रा, पर्यटन करून आणलेल्या शोभेच्या वस्तू, प्रचंड माळे, आधीच्या दोन पिढ्यांचे ऐवज, वस्तू, सामान…पण आता सर्व मुलेबाळे स्वतंत्र व स्वतःच्या कार्यक्षेत्रांत मग्न, यशस्वी व अत्यंत व्यस्त जीवनक्रम असलेली !

आईपश्चात वर्षभर रिकामे, प्रचंड घर आवरायला कुठून सुरुवात करावी हा यक्षप्रश्नच !!

कपाटातल्या पाचशेच्या वर साड्या आता कुणीही घेऊ इच्छित नाही, 100 माणसांच्या स्वयंपाकाची घरात कुणीही उस्तवार आता करणार नाही, जुने अवाढव्य फर्निचर आता कुणाच्याच घरात मावणार नाही, शोभेच्या वस्तूंकडे निगराणी करण्यास वेळ नाही, मोठाले खरे दागिने बाळगून किंवा घालून मिरवणे सुरक्षित नाही, बाग मेंटेन करायला मनुष्यबळ नाही, अडगळी साफ करायला कष्टांची शारीरिक क्षमता नाही…असे अनेक नकार व फुल्या मारल्यावर मग जेवढे चांगले व शक्य तेवढे गरजू संस्था व संसार असलेल्या लोकांना देण्यात आले, आठवण म्हणून आईची एक साडी घेण्यात आली. असे करता करता त्या घराची सात दशकांची घडी मिटवण्यात आली !

या उस्तवारीत प्रचंड मनस्ताप, कठोर निर्णय, नकार, उस्तवार आणि शारीरिक व मानसिक कष्ट तसेच थकवा आणि ताण मुलांना सोसावा लागला. या सगळ्यांपेक्षा सर्वाधिक मौल्यवान असा त्यांचा वैयक्तिक वेळ त्यांना वाया गेल्याची भावना निर्माण झाली. ज्या पिढीने हे सगळे जमवण्याचा अट्टाहास करण्यासाठी कष्ट झेलले ती पिढी काळाच्या पडद्याआड गेली. हे सर्व सांगतांना ‘ती’ मैत्रीण खरेच दुःखी, खिन्न व अंतर्मुख झाली होती.

यातून काही बोध घ्यावा असे वाटले तो म्हणजे…

१) गरजा कमी हीच आनंदाची हमी.

२) घर हे माणसांचे वसतिस्थान आहे, वस्तूंची अडगळ नव्हे.

३) आपल्यासाठी वस्तू आहेत, वस्तूंसाठी आपण नाही… नाहीतर अवघे आयुष्य साफसफाई करण्यात आणि वस्तू राखण्यात जाते.

४) प्रवासात फक्त सुंदर क्षणांचा संचय करा, शोभेच्या वस्तूंचा नव्हे.

५) जितकी अडगळ कमी तेवढा तुमचा आत्मशोध सुलभ.

६) विकत घ्यायच्या आधी ‘का’, ‘कशाला’, ‘हवेच का ?’चा माप दंड लावावा.

७) साधेपणा, सुसंगतता आणि सुयोजकता हे नियम पाळावेत.

८) दान हे संचय करण्यापेक्षा कधीही श्रेष्ठच मानावे.

९) आजचा संचय उद्याची अडगळ.

१०) दुसऱ्यांना प्रभावित करण्यासाठी स्वतःच्या कष्टाचे पैसे अजिबात खर्चू नयेत.

११) जेवढ्या वस्तू कमी तितके घर मोकळा श्वास घेते, माणसे शांत व समाधानी असतात, मानसिक विकार व नैराश्य येत नाही.

१२) सुटसुटीत, मोकळे घर म्हणजे पैशाची, मनुष्यबळ ऊर्जेची व वेळेची बचतच.

हा वेळ तुम्ही परस्पर मानवी संबंध, सुसंवाद, छंद जोपासणे, व्यायाम, आरोग्य सुधारणे यासाठी देऊ शकता.

१३) किमान गरजा ही lजीवनशैली काळानुसार अत्यावश्यक गरज ठरणार आहे.

१४) शाश्वत सुखाचा राजमार्ग हा ‘समाधान’ नावाच्या गावातूनच जात असतो.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # 89 – प्रमोशन… भाग –7 समापन किश्त ☆ श्री अरुण श्रीवास्तव ☆

श्री अरुण श्रीवास्तव

(श्री अरुण श्रीवास्तव जी भारतीय स्टेट बैंक से वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी हैं। बैंक की सेवाओं में अक्सर हमें सार्वजनिक एवं कार्यालयीन जीवन में कई लोगों से मिलना   जुलना होता है। ऐसे में कोई संवेदनशील साहित्यकार ही उन चरित्रों को लेखनी से साकार कर सकता है। श्री अरुण श्रीवास्तव जी ने संभवतः अपने जीवन में ऐसे कई चरित्रों में से कुछ पात्र अपनी साहित्यिक रचनाओं में चुने होंगे। उन्होंने ऐसे ही कुछ पात्रों के इर्द गिर्द अपनी कथाओं का ताना बाना बुना है। आज से प्रस्तुत है आलेखों की शृंखला “प्रमोशन…“ की समापन कड़ी।

☆ आलेख # 89 – प्रमोशन… भाग –7 समापन किश्त ☆ श्री अरुण श्रीवास्तव ☆

रिजल्ट आने वाला है की खबर कुछ दिनों से ब्रांच में चल रही थी या फिर फैलाई जा रही थी. हर खबर पर मि.100% का दिल धक-धक करने लगता. फिर शाखा में उनके एक साथी भी थे जिनका प्रमोशन से कोई लेना देना नहीं था पर इनकी लेग पुलिंग का मज़ा लेने में उनसे कोई भी मौका नहीं छोड़ा जा सकता था. रोज सामना होते ही “मिठाई का आर्डर क्या आज दे दें” सुन-सुन कर 100% बेचैन होते-होते पकने की कगार पर आ गये थे. जो बाकी चार थे उनका जवाब हमेशा यही रहता कि “आर्डर कर दो उसमें क्या पूछना. हम लोग तो पैसे देने वाले नहीं हैं. आखिर वो दिन आ ही गया जब रिजल्ट आने की शत प्रतिशत संभावना थी क्योंकि ये खबर हेड ऑफिस के किसी परिचित ने शाखा प्रबंधक को फोन पर कहा था.

उस दिन जो कि शनिवार था, मि. 100% के घर में बहुत सारी काली चीटियां अचानक न जाने कहाँ से निकल आईं. मिसेज़ 100%की दायीं आंख फड़क रही थी और वो भ्रमित थीं कि दायीं आंख का फड़कना शुभ होता है या बाईं आंख का. उस जमाने में गूगल,  इंटरनेट, कंप्यूटर मोबाइल नहीँ होता था कि कनफर्म किया जाय कि कौन सी आंख का फड़कना शुभ समाचार लाता है. जो भी गूगल थे वो पड़ोसी थे और उनसे ये सब शेयर करना घातक हो सकता था. मि. 100% के पास एक ही दिल था और वही धड़क रहा था जोर जोर से. खैर उनके द्वारा हनुमानजी के दर्शन करते हुये शाखा में उपस्थिति दर्ज की गई.

शनिवार पहले हॉफ डे हुआ करता था तो काउंटर पर भीड भाड़ सामान्य से ज्यादा थी. पर अधिक काम होने के कारण रिजल्ट के तनाव से मन हट गया था. ठीक दो बजे जब हॉल पब्लिक से खाली हुआ तो फोन की लंबी घंटी बजी. सब समझ गये कि ये तो लोकल कॉल नहीं है. शाखा प्रबंधक महोदय ने लोकल सेक्रेटरी को बुलाया और दोनों के बीच गंभीरतापूर्वक वार्तालाप हुआ. सभी प्रत्याशियों सहित सभी की उत्सुकता चरम पर पहुँच गई. ब्रांच का रिजल्ट परफारमेंस 80% था और जो सिलेक्ट लिस्ट में नहीं थे, वो थे मिस्टर 100%.

हॉल में बधाइयों की हलचल से भारी थी मिस्टर 100% के “पास “नहीं होने की खामोशी, आश्चर्य और खबर पर अविश्वास. पर सूचना को चुनौती कोई भी नहीं दे पा रहा था. लोकल सेक्रेटरी का बाहर निकल कर उन्हें बाईपास करते हुये बाकी चारों से मिलकर बधाई देना और स्टाफ की भेदती नजरों से मि.100% समझ गये कि वे यह टेस्ट पास नहीं कर पाये. निराशा से ज्यादा शर्मिंदगी उन्हें खाये जा रही थी और वे भी सोच रहे थे कि काश ये धरती याने शाखा का फ्लोर फट जाये और वे करेंट एकाउंट डेस्क से सीधे धरती में समा जायें. रामायण सीरियल को वह दृश्य उनके मन में चल रहा था जब सिया, अपने राम को छोड़कर धरती में समा गईं थीं. ये पल सम्मान, इमेज़, आत्मविश्वास, कर्तव्य निष्ठा सब कुछ हारने के पल थे.

शाखा में चुप्पी थी, जश्न का माहौल नदारद था, ठिठोली करने वाले खामोश थे और शाखा प्रबंधक गंभीर चिंतन में व्यस्त. शाखा की सारी हलचल हॉल्ट पर आ गई थी. मि. 100% का मन तो कर रहा था शाखा प्रबंधक कक्ष में जाने का पर छाती हुई घोर निराशा उन्हेँ रोक रही थी.

लगभग आधा घंटे बाद हॉल की खामोशी को चीरती फिर लंबी घंटी बजी. शाखा प्रबंधक इस कॉल पर कुछ देर बात करते रहे और फिर उन्होंने इस बार लोकल सेक्रेटरी को नहीं बल्कि मिस्टर 100% को बुलाया. सिलेक्ट लिस्ट में कोई चूक नहीं हुई थी, दरअसल मिस्टर 100%, लीगली रुके हुये प्रशिक्षु अधिकारी के टेस्ट में पास हुये थे. इस जीत का “हार” बड़ा था, पुरस्कार बड़ा था जो उनके 100% को साकार कर रहा था.

और फिर शाखा के मुख्य द्वार से सेठ जी अपने प्रशिक्षु पुत्र के साथ लड्डू लेकर पधारे. इस बार ये लड्डू उनके खुद की नहीं बल्कि शाखा की खुशियों में शामिल होने का संकेत थे.

विक्रम बेताल के इस प्रश्न का उत्तर भी बुद्धिमान पाठक ही दे सकते हैं कि मि. 100% एक टेस्ट में फेल होकर दूसरे टेस्ट में कैसे पास हो गये जबकि दूसरे टेस्ट में प्रतिस्पर्धा कठिन और चयनितों की संख्या कम होती है.

इतिश्री

अरुण श्रीवास्तव

ये मेरी कथा, कौन बनेगा करोड़पति के विज्ञापन से प्रभावित है, जो डब्बा की उपाधि से प्रचलित अभय कुमार की कहानी है. विज्ञापन के विषय में ज्यादा लिखना आवश्यक नहीं है क्योंकि ये तो प्राय: सभी देख चुके हैं. गांव के स्कूल के जीर्णोद्धार के लिये 25 लाख चाहिये तो गांव के मुखिया जी के निर्देशन में सारे मोबाइल धारक KBC में प्रवेश के लिये लग जाते हैं, किसी और का तो नहीं पर कॉल या नंबर कहिये लग जाता है “डब्बा” नाम के हेयर कटिंग सेलून संचालक का जो प्राय: अशिक्षित रहता है. तो पूरे गांववालों द्वारा माने गये इस अज्ञानी को करोड़पति कार्यक्रम के लिये तैयार करने की तैयारी के पीछे पड़ जाता है पूरा गांव. ये तो तय था कि एक अल्पज्ञानी को करोड़पति कार्यक्रम जिताने के लिये असंभव प्रयास किये जा रहे थे, किसी चमत्कार की उम्मीद में, जो हम अधिकांश भारतीयों की आदत है. पर जब परिणाम आशा के अनुरूप नहीं मिला तो सारे गांववालों ने डब्बा को उठाकर कचरे के डब्बे में डाल दिया. ये हमारी आदत है चमत्कारिक सपनों को देखने की और फिर स्वाभाविक रूप से टूटने पर हताशा की पराकाष्ठा में टूटे हुये सपनों को दफन कर देने की. गांव का सपना उनके स्कूल के पुनरुद्धार का था जो वाजिब था, केबीसी में कौन जायेगा, जायेगा भी या नहीं, चला भी गया तो क्या पच्चीस लाख जीत पायेगा, ये सब hypthetical ही तो था. पर यहां से डब्बा के घोर निराशा से भरे जीवन में उम्मीद की एक किरण आती है उसके पुत्र के रूप में जो हारे हुये साधनहीन योद्धा को तैयार करता है नये ज्ञान रूपी युद्ध के लिये. ये चमत्कार बिल्कुल नहीं है क्योंकि अंधेरों के बीच ये रोशनी की किरण हम सब के जीवन में कभी न कभी आती ही है और हम इस उम्मीद की रोशनी को रस्सी की तरह पकड़ कर, असफलता और निराशा के कुयें से बाहर निकल आते हैं. वही चमत्कार इस विज्ञापन में भी दिखाया गया है जब डब्बा जी पचीस लाख के सवाल पर बच्चन जी से फोन ए फ्रेंड की लाईफ लाईन पर मुखिया जी से बात करते हैं सिर्फ यह बतलाने के लिये कि 25 लाख के सवाल का जवाब तो उनको मालुम है पर जो मुखिया जी को मालुम होना चाहिये वो ये कि उनका नाम अभय कुमार है, डब्बा नहीं.

हमारा नाम ही हमारी पहली पहचान होती है और हम सब अपनी असली पहचान बनाने के लिये हमेशा कोशिश करते रहते हैं जो हमें मिल जाने पर बेहद सुकून और खुशियां देती है. सिर्फ हमारे बॉस का शाम को पीठ थपाथपा कर वेल डन डियर कहना इंक्रीमेंट से भी ज्यादा खुशी देता है. लगता है कि इस ऑफिस को हमारी भी जरूरत है. हम उनकी मजबूरी या liability नहीं हैं.

विज्ञापन का अंत बेहद खूबसूरत और भावुक कर देने वाला है जब इस विज्ञापन का नायक अभय कुमार अपने उसी उम्मीद की किरण बने बेटे को जिस स्कूल में छोड़ने आता है उस स्कूल का नाम उसके ही नाम अभय कुमार पर ही होता है. ये अज्ञान के अंधेरे में फेंक दिये गये, उपेक्षित अभयकुमार के सफर की कहानी है जो लगन और सही सहारे के जरिये मंजिल तक पहुंच जाता है जो कि उसके गांव के स्कूल का ही नहीं बल्कि उसका भी पुनरुद्धार करती है. ये चमत्कार की नहीं बल्कि कोशिशों की कहानी है अपनी पहचान पाने की.

© अरुण श्रीवास्तव

संपर्क – 301,अमृत अपार्टमेंट, नर्मदा रोड जबलपुर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सर्व अंधश्रद्धांविरूद्ध लढणारा झुंजार योद्धा – जेम्स रँडी – भाग-१ – लेखक – डाॅ प्रदीप पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

🔆 विविधा 🔆

सर्व अंधश्रद्धांविरूद्ध लढणारा झुंजार योद्धा – जेम्स रँडी – भाग-१ – लेखक – डाॅ प्रदीप पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

युरी गेलर नावाच्या इस्त्रायल मधील तेल अविव गावच्या माणसाने 1973 मध्ये केवळ मनशक्तीने चमचा वाकविण्याचा चमत्कार अमेरिकेत केला आणि सगळीकडे अतिंद्रिय दाव्यांची सिद्धता मिळाल्याचे पडघम वाजू लागले! केवळ चमचाच नव्हे तर युरिने लोकांच्या घरातील घड्याळं बंद पाडली आणि जमिनीखालचे पाणी मनशक्तीने सांगण्याचा सपाटा लावला. मनो सामर्थ्य हा अतींद्रिय शक्ती चा प्रकार आजवर सिद्ध झालेला नव्हता. तो युरीने सिद्ध केला असे सांगत जगन्मान्य ‘नेचर’ मासिकात युरी वरील संशोधन प्रबंध ही प्रसिद्ध झाला. ‘सायंटिफिक अमेरिकन’, ‘टाईम’ इत्यादींनी त्याची गंभीर दखल घेतली आणि….

युरी गेलरचा अतिंद्रिय दाव्यांचा फुगलेला फुगा फोडला जेम्स रँडी ने. एक जादूगार. कॅनडातील टोरंटो येथे 1928 मध्ये जन्मलेल्या जेम्स रँडीने कॉलेजला जाऊन शिक्षण घेतले नाही की कोणती वैज्ञानिक संशोधनासाठी पीएचडी केली नाही.. आपल्याकडे असलेल्या गाडगेबाबांसारखेच आहे हे ! चलाखीने चमत्कार करण्यात अपूर्व हातखंडा असलेला रँडी जेव्हा अमेरिकेत पोहोचला तेव्हा तेथे दूरसंवेदन,( टेलीपथी ) पासून टीव्हीवरून ख्रिस्तोपदेशकांचे चमत्कार दाखविण्यापर्यंत ,ज्यांना एव्हांजेलिस्ट असे म्हणतात अशा सर्व अंधश्रद्धांचा सुळसुळाट चालूच होता. युरी गेलरच्या अतींद्रिय दाव्या मागील हातचलाखी दाखवून व बिंग फोडूनच जेम्स रँडी थांबला नाही तर गेलरचा संपूर्ण जीवन आलेख लोकांच्या समोर मांडून त्यातील फोलपणा  दाखवून दिला. टाईम मासिकाचे ज्येष्ठ संपादक लिओन जेराॅफ यांच्या उपस्थितीत रँडीने गेलरची चलाखी पहिल्यांदा स्पष्टपणे ओळखली. डॉ. अंडरिझा पुहारिश यांनी युरी चा शोध लावला आणि अमेरिकेतील स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्यूट मधील दोन वैज्ञानिक हेरॉल्ड पुटहाॅफ ( विशिष्ट प्रकारच्या लेसर चा शोधक ) आणि रसेल टर्ग ( मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी प्लाझमा ओसीलेटर चा शोधक)  हे यूरी गेलरच्या चमत्काराने प्रभावित का झाले याचा रँडीने शोध घेतला. पुटहाॅफ हा सायंटॉलॉजी नावाच्या स्वर्ग-सुपरपॉवर मानणार्या पंथात होता तर टर्ग हा गूढ पुस्तक विक्रेत्याचा मुलगा. टर्ग-पुटहाॅफ यांनी स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये गेलरची चाचणी घेऊन ऑक्टोबर 1974 च्या नेचर मध्ये प्रबंध प्रसिद्ध केला. परामानसशास्त्र किंवा ढोंगी मानसशास्त्रास ‘नेचर’ मध्ये स्थान नसताना तो छापला गेल्यावर गेलरची प्रचंड प्रसिद्धी झाली आणि त्याचा भरपूर प्रचार टर्ग-पुटहाॅफनी केला. तेव्हा रँडीने ‘नेचर’ च्या त्या अंकातील डेवीस यांच्या संपादकीयात अपुरा, अव्यवस्थित आणि ‘रॅगबॅग ऑफ पेपर’ हा शेरा उघडकीस  आणून  ‘नेचर’ ने हा प्रबंध प्रकाशित करण्याचा उद्देश फक्त आज परामानसशास्त्राच्या चाचण्या कशा घेतल्या जातात हे दाखविण्यासाठीच होता, हे रँडीने दाखवून दिले. ‘न्यू सायंटिस्ट’चे संपादक बर्नार्ड डिक्सन यांनीही त्यास दुजोरा दिला.

गेलरच्या हातचलाखीस टर्ग- पुटऑफ हेच वैज्ञानिक फसले होते असे नव्हे तर अनेक वैज्ञानिक फसले होते. लंडनच्या बायोफिजिकल लॅबोरेटरी मध्ये 1971 मध्ये जेंम्स  रँडी ने युरी गेलरच्या जादू दाखविल्या तेव्हा ‘न्यू सायंटिस्ट’ च्या जो हॉनलॉन  बरोबर होते नोबेल पारितोषिक विजेते डी.एन. ए. आराखड्याचे शोधकर्ते डॉक्टर मॉरीस विल्किंस. त्यांचीही दिशाभूल युरी गेलरमुळे झाली होती. ते जेम्स रँडीस म्हणाले, परामानसशास्त्राच्या किंवा पॅरासायकॉलॉजीच्या चाचणीसाठी वैज्ञानिकांची गरज असते हे चूक असून चांगल्या जादूगाराचीही तेवढीच गरज असते!

रँडीने हेच ठळकपणे समोर आणले. वैज्ञानिक हे वैज्ञानिक चाचण्यात मुरलेले असतात. त्यांना हातचलाखी, जादुगिरी याची भाषा अवगत नसते. त्याचा फायदा परामानसशास्त्रज्ञ-बुवा-महाराज घेतात. हे युरी गेलर प्रकरणात रँडी ने दाखवून दिले आणि रँडी ने वैज्ञानिक चाचण्या बरोबर जादुगिरी, चलाखी शोधणे अशी जोड देऊन अतींद्रिय शक्तीचे दावे, चमत्कार, आत्मे- भुते यांच्या अस्तित्वाचे दावे, छद्म विज्ञान किंवा स्युडोसायन्स इत्यादी गोष्टींचा भांडाफोड केला. आणि त्याने अनेक वैज्ञानिक व विज्ञान नियतकालिकांना जादूगाराची मदत घेणे हे कसे योग्य आहे हे समजावून सांगितले. त्याने मग अश्या गोष्टींच्या सायकिक टेस्ट करण्यासाठी चार नियम मांडले. साध्या चलाखीचा वापर करणे, फसवणूक हाच उद्देश, परिणामकारक चलाखीचे प्रदर्शन, संशय घेणाऱ्या व्यक्तींच्या उपस्थितीत चलाखी कोलमडणे, हे सायकिक असे 4 अवगुण उघडे करण्यासाठी रँडी ने एक नियमावली तयार केली. सुमारे 17 नियम असलेली ही नियमावली आजही सर्वच भ्रमांचा वेध घेण्यासाठी उपयुक्त ठरत आली आहे. वैज्ञानिक चाचणी बरोबर या चाचण्यांनाही तेवढेच महत्त्व प्राप्त करून देण्यात हॅरी हुदिनी या प्रख्यात जादूगाराच्याही दोन पावले पुढे जाऊन रँडी ने मोठे यश मिळविले. त्याहीपुढे जाऊन त्याने अतिंद्रिय शक्ती, खोटे मानसशास्त्र, गुढ-चमत्कारी गोष्टी सिद्ध करण्यासाठी दहा हजार डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले. जवळपास सहाशे पन्नास जणांनी हे आव्हान स्वीकारले. त्यापैकी फक्त 54 जणांनी टेस्ट दिल्या आणि आव्हान कुणीच जिंकू शकले नाहीत आजवर! आज त्याच्या नावाने स्थापन झालेल्या जेम्स रँडी एज्युकेशनल फाऊंडेशनने ही रक्कम एक लाख डॉलर्स केली आहे.

जादू आणि चलाखी यांच्या व्याख्या त्याने स्पष्ट केल्या. विशिष्ट मंत्र आणि तांत्रिक विधी यांनी चमत्कार करणे म्हणजे मॅजिक व कौशल्य वापरून चमत्कार करणे म्हणजे चलाखी किंवा कॉन्ज्युरिंग असे त्याने स्पष्ट केले.

या गदारोळात सोसायटी ऑफ अमेरिकन मॅजिशियन्स व इंटरनॅशनल ब्रदरहुड ऑफ मॅजिशियन्स इत्यादी संघटनांनी रँडीवर जादू उघडे करण्याचा आक्षेप घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या ‘मॅजिक’ या मासिकातून जेम्स रँडीच्या विरोधात सूर उमटू लागला..

त्यावर रँडीने म्हंटले,

‘जेव्हा वैज्ञानिक एखाद्या परामानसशास्त्रज्ञांची चलाखी ओळखू शकत नाहीत तेव्हा आपणच त्या विरोधात ठामपणे उभे राहायला हवे. कारण सामान्य जनांची फसवणूक आणि शोषण यांचा आपण विचार करायलाच हवा.. हाच मानवतावाद आहे.’

जेम्स रँडीने केलेल्या या कार्याची पावती म्हणून वैज्ञानिक वर्तुळात त्यास मानाचे स्थान प्राप्त झाले. कमिटी फॉर द सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन ऑफ ऑफ द पॅरानॉर्मल या संस्थेचा तो सन्माननीय सदस्य बनला. या समितीत प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ कार्ल सेगन, विज्ञान लेखक आयझॅक असीमोह,  रे हॅमन, रिचर्ड डॉकिन्स, मार्टिन गार्डनर अशी फेमस वैज्ञानिक मंडळी त्यावेळी होती. 

1988 मध्ये फ्रेंच होमिओपॅथ जॅकस बेनव्हेनिस्ते याने ‘नेचर’ मध्ये होमिओपॅथीच्या सिद्धतेचा पुरावा म्हणून शरीरातील पाण्यात होमिओपॅथिक औषधांची स्मृति राहते असा प्रबंध लिहिला. त्याची छाननी करण्यासाठी ‘नेचर’ तर्फे गेलेल्या त्या पॅनेलमध्ये संपादक जॉन मेडाॅक्स व इतरांबरोबर जेन्स रँडीही होता आणि या पॅनेलने होमिओपॅथी विषयी चा दावा फेटाळून लावला.

रँडीची ही वाटचाल जादूगिरीपासून वैज्ञानिक वृत्तीच्या विज्ञानवाद्यापर्यंत घडत गेली ती वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारल्या मुळेच. त्याचा परिणाम असा झालाकी जगभर हिंडत असताना अनेक अंधश्रद्धांचा, भ्रमांचा भेद त्याने कौशल्याने आणि पुराव्यासहित केला. थायलंडमधील कागदा आधारे बुवाबाजी करणाऱ्या विणकाम्याची जादू, सर आर्थर कॉनन डायलच्या फेअरी टेल्स मधील एल्सी आणि फ्रान्सिस यांच्या छोट्या छोट्या परी कन्या व राक्षस यांच्याबरोबरच्या फोटोतील बनवाबनवी, या परी कन्यांचे प्रिन्सेस मेरीज गिफ्ट बुक या पुस्तकांमधील हुबेहूब चित्रे शोधून दाखविलेले साम्य (ज्यावर ऑलिव्हर लॉज व विलियम कृक्स या वैज्ञानिकांचाही विश्वास होता ती ही बनवाबनवी), महर्षी महेश योगीच्या ‘महर्षी इफेक्ट’मुळे आयोवा व व इतर प्रांतातील ठिकाणी गुन्हेगारी कमी झालेल्या खोट्या रिपोर्ट चा समाचार… एरिक व्हॉन डॅनिकेन या स्विस लेखकाने चारियाटस् ऑफ गॉड्स व इतर चार पुस्तकातून परग्रहातून आलेल्या लोकांची छापलेली चित्रे ही कशी बनवाबनवी होती, या सर्व प्रकरणातील चलाखी व लबाडी त्याने पुराव्यासहित दाखवून दिली.

त्याच्या या कामाची दखल घेऊन त्याला मॅक आर्थर फाउंडेशनचा प्रतिष्ठित पुरस्कार व फेलोशिप जरी मिळाली तरी त्याचे वेगवेगळ्या चाचण्या व प्रयोग करणे काही थांबले नाही. बायोरिदम या खूळाच्या त्याने मजेशीर चाचण्या घेतल्या. सेक्रेटरीचा चार्ट एका बाईस देऊन नोंदी ठेवायला सांगितल्या आणि त्या बाईने तो तिचा चार्ट समजून ऍक्युरेट नोंदीचा निर्वाळा दिला !!

क्रमशः…

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अन्न सोहळा… लेखक : श्री सतीश बर्वे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? मनमंजुषेतून ?

☆ अन्न सोहळा… लेखक : श्री सतीश बर्वे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे 

त्या आडवाटेवर आमची गाडी अचानक बंद पडली होती. सूर्यास्त होण्याच्या मार्गावर होता. ड्रायव्हर निष्णात मेकॅनिक देखील होता त्यामुळे काळजीचं कारण नव्हतं. फक्त जास्त अंधार व्हायच्या आत आमचा पुढचा प्रवास सुरु होणं गरजेचं होतं.

दूरवर नजर टाकली तेव्हा तिथे  टपरीवजा छोटंसं हाॅटेल दिसलं  मला. बुडत्याला काडीचा आधार तसं उपासमार होणार नाही इतपत समाधान मला होते. ड्रायव्हरला सांगून मी आणि माझे दोन सहकारी टपरीच्या दिशेने चालायला लागलो.

टपरीवर पोहोचल्यावर वेगळंच दृश्य पाहायला मिळाले. दोन चार टेबलं आणि बाकडी ठेवली होती. त्यावर बसून गावातली माणसं डाळभात खात होती. त्यांच्या पोशाखावरून त्यांच्या कष्टकरी आयुष्याचा अंदाज येत होता. वाढलेला डाळभात खाऊन पत्रावळी उचलून रस्त्यालगत ठेवलेल्या मोठ्या डब्यात टाकून ती मंडळी टपरी बाहेर पडत होती. सगळं कसं शिस्तबद्ध पद्धतीने सुरू होतं. ते बघून मला आश्चर्य वाटलं.

आम्हाला बघून एक मुलगा पुढे येत आम्हाला म्हणाला, “काय खाणार साहेब? भजी, मिसळपाव, वडापाव, भुर्जी पाव. गरमागरम मिळेल सगळं.” हे ऐकून माझ्या जीवात जीव आला.

साहेब तुम्ही तिथे टेबल खुर्ची ठेवली आहे तिथे बसा. त्याने बोटाने दाखवलेल्या ठिकाणी आम्ही बसलो. आधी दोन प्लेट मिक्स भजी मागवली. ती खाताना माझी नजर सारखी डाळभात खाणाऱ्या लोकांच्या टेबलावर जात होती. शेवटी न राहवून मी खुर्चीवरून उठून तिथे पोहोचलो.

“काय झालं साहेब?” तो मघाचाच मुलगा पुढे येत मला विचारु लागला. 

“ही डाळभात खाणारी माणसे कोण आहेत?” 

“ते माझा बा तुम्हाला सांगेल” असं म्हणून त्या मुलाने त्याच्या वडिलांना बोलावून घेतले आणि मी काय विचारतोय ते त्यांना सांगितले.

एक साधारण पन्नाशीच्या आसपासचा माणूस आमच्या जवळ आला आणि मला म्हणाला, “राम राम साहेब. तुम्हाला जे बघून आश्चर्य वाटलं तो अन्न सोहळा रोज इथे सकाळ संध्याकाळ सुरू असतो. 

“ ए आतून दोन तीन चांगल्या खुर्च्या आण बरं.” त्याने टपरीच्या दिशेने आवाज दिला. आतून आलेल्या खुर्चीवर आम्ही दोघे बसलो आणि तो माणूस सांगायला लागला.

” माझा जन्म इथूनच आत ४-५ किलोमीटर वर असलेल्या गावात झाला. माझे आई वडील कोण ते आठवत देखील नाही मला. उघड्यावरच जगायचो. कोणी चार घास दिले तर ते खायचो. नाहीतर पाणी पिऊन दिवस काढायचो. 

माझ्या बा ला ह्या टपरीवर कोणीतरी हाताशी पाहिजे होतं. त्याने मला गावातून उचलून इथे आणला. त्या दिवसापासून तो माझा बा झाला. पडेल ते काम मी करायचो. पुढे पुढे किचनचं काम शिकून घेतले. माझ्या हाताला चव होती. सुरवातीला फक्त भजी आणि चहा विकणारा आबा नंतर मिसळपाव, वडापाव, भुर्जी पाव, नेसकाॅफी ठेवायला लागला. 

इथे आसपास खाणीत आणि उसाच्या मळ्यात काम करणारे पुष्कळ कामगार आणि ट्रकवाले, ट्रॅक्टरवाले इथे यायला लागले. टपरी चोवीस तास उघडी असायची. 

बा ला नंतर चांगले दिवस दिसले. माझं लग्न लावून दिलं त्यानं. बाने खुप गरीबी आणि उपासमारी बघितली. चांगले दिवस आल्यावर त्याने हा अन्न सोहळा सुरू केला. रोज सकाळी आणि संध्याकाळी इथे गरिबांना डाळभात आणि लोणचं देतो आम्ही खायला. त्याचे पैसे घ्यायचे नाहीत असं बा ने शिकवलंय मला.

‘आपल्यातले चार घास उपाशी माणसाला द्यावे हे बा ने शिकवलं मला. असं केल्याने आपण काही मरत नाही पण दुसऱ्याला जगण्याची ताकद मिळते’ असं समजावून सांगायचा मला तो. तो आजारी झाल्यावर माझ्याकडून वचन घेतले त्यांनी हा अन्न सोहळा पुढे चालू ठेवण्याचं. 

आता मी आणि माझा मुलगा ही परंपरा पुढे चालवत आहोत.

बा म्हणायचा ‘नुसतं गोणीभर जमवून काही उपयोग नसतो. तर त्या पैशातून गरिबांना मदत करायला हवी आपण. देवाचं लक्ष्य असतं सगळ्यांकडे. आपण गरिबांना जमेल तेवढे सुखी ठेवलं की देव आपल्याला पण सुखी ठेवतो. एका हाताने दिलं की दुसऱ्या हाताने देव देऊन आपला तोल जाऊ देत नाही. नुसतं गोणी भरत गेलो की पैशाला पाय फुटतात आणि नको त्या रस्त्यावर आपण कधी जाऊन पोहोचतो ते आपल्याला कळत नाही. ज्या मातीशी आपण इमान राखत नाही त्याच मातीत आपलं जीवन आपण आपल्याच हाताने उद्ध्वस्त करतो.’ 

बा शिकला नव्हता. पण जगण्याच्या शाळेचा तो मास्तर मात्र होता. त्याने सुरू केलेला हा अन्न सोहळा जीवात जीव आहे तोपर्यंत मी चालू ठेवणार आणि माझ्या नंतर माझा मुलगा…. नंतर माझा नातू…..

गाडी दुरुस्त झाल्याचा निरोप आला. त्या माणसाचा निरोप घ्यायची वेळ आली. पाकिटातून हाताला लागल्या तेवढ्या नोटा काढून मी त्याच्या हातात ठेवल्या.

“साहेब हे काय?”

“अरे माझ्या कडून छोटीशी भेट तुझ्या अन्न सोहळ्याला. आज तु मला काहीतरी चांगलं शिकवून गेलास. जगण्याची किंमत त्यालाच जास्त चांगली माहीत असते ज्याला उद्या काय होणार ह्याची चिंता सतावत असते. 

हा सोहळा तुझ्या हातून अखंड सुरू राहो हीच देवा जवळ प्रार्थना मी दररोज करीन. हे माझं कार्ड आहे. चुकून कधीतरी समजा वेळ आलीच ह्या सोहळ्यात खंड पडण्याची तर मला अवश्य फोन कर. मी असेन तुझ्यासोबत जमेल तेवढा हातभार लावायला.”

त्याने पाया पडून माझा आशीर्वाद घेतला आणि मी माझ्या सहकाऱ्यांसोबत गाडीच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली.

लेखक : श्री सतीश बर्वे

लेखक – श्री संदीप काळे

मो. 9890098868

प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आपल्या हळदीसाठी लढाई करणारा मराठी शास्त्रज्ञ – लेखन व माहिती संकलन : रत्नाकर सावित्री दिगंबर येनजी ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ आपल्या हळदीसाठी लढाई करणारा मराठी शास्त्रज्ञ – लेखन व माहिती संकलन : रत्नाकर सावित्री दिगंबर येनजी ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

हळदीघाटमध्ये १८ जून १५७६ साली मेवारचे राजे महाराणा प्रतापसिंग प्रथम व दिल्लीचे सम्राट अकबर यांच्या सैन्यामध्ये जी लढाई झाली होती, ती लढाई हळदीघाटची लढाई या नावाने प्रसिध्द आहे. या घाटाचा भौगोलिक गुणधर्म म्हणजे त्याठिकाणी असलेली नरम पिवळी माती. या पिवळया मातीमुळेच या भागाला हळदीघाट असे नामाभिधान झाले आहे. जशी सोळाव्या शतकात हळदीघाटची लढाई दोन तुल्यबळ राजांनी आपसात केली होती, तशीच हळदीच्या पेटंटसाठी लढाई विसाव्या शतकात झाली होती. आणि ही लढाई आपल्या भारत देशातील एका शास्त्रज्ञाने अमेरिकेतील US पेटंट आणि ट्रेडमार्क ऑफिस विरुध्द केली होती.

डॉक्टर रघुनाथराव अनंत माशेलकर (आपल्या हळदीसाठी लढाई करणारा मराठी शास्त्रज्ञ)

त्याचे असे झाले. भारतीय वंशाचे दोन अमेरिकन संशोधक, मिसिसिपी युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपी मेडिकल सेंटरचे सुमन के. दास आणि हरी हर पी. कोहली या दोघांनी हळदीचे बरे करण्याचे गुणधर्म शोधून काढल्याचा दावा US पेटंट आणि ट्रेडमार्क ऑफिसकडे केला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांना मार्च १९९५ मध्ये तुम्हाला आणि आमच्या आयुर्वेदाला शतकानुशतके माहीत असलेल्या गोष्टीसाठी पेटंट देण्यात आले. जखम झाल्यावर त्यावर हळद लावण्याचा रामबाण उपाय भारतात पूर्वापार वापरला जातो आहे; असे असतांना, एक दिवस सकाळी पेपर वाचत असतांना, एका विचित्र बातमीकडे आपल्या जगप्रसिद्ध भारतीय डॉक्टर माशेलकरांचे लक्ष गेले. अमेरिकेने हळदीच्या औषधी वापरावर आपले हक्क असल्याचे त्या बातमीत म्हटले होते. थोडक्यात अमेरिकेने हळदीचे पेटंट घेतले होते. बातमी वाचताच माशेलकर बेचैन झाले. नुसते बेचैन न होता आता त्यांची चांगलीच सटकली. आपल्या भारतीयांकडे अनेक पिढया चालत आलेले हे ज्ञान, कोणीतरी स्वतःचे असल्याचा राजरोस दावा करतो आहे, हे योग्य नव्हे. यावर अमेरिकेशी न्यायालयीन लढाई करून आपले हक्क आपण राखले पाहिजेत, असा पक्का विचार करून डॉक्टर माशेलकर कामाला लागले. जोरदार न्यायालयीन लढाई झाली. हळदीचे गुणधर्म सांगणारे अनेक संस्कृत श्लोक, पाली भाषेत हळदीबद्दल लिहिले गेलेले संदर्भ, अनेक कागदपत्रे जमा करून, त्या सर्वांचा रितसर अभ्यास करून, डॉक्टर माशेलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही अमेरिकेविरुद्धची हळदीघाटची लढाई जिंकली. यातून दोन चांगले परिणाम झाले. एक तर आपल्या ज्ञानाचे हक्क आपल्याकडे राहिले आणि दुसरा दूरगामी फायदा झाला, तो असा की आपल्या पारंपरिक ज्ञानाची किंमत आपल्याला आणि साऱ्या जगाला कळली. अमेरिकेसारख्या बलाढय राष्ट्राला भारतीय ज्ञानाचे महत्त्व कळले आणि आपण दुसऱ्यांच्या पेटंट नसलेल्या पारंपरिक ज्ञानावर आपला हक्क सांगायचा नाही हा धडाही मिळाला. अमेरिकेसारख्या बलाढय राष्ट्रा विरुध्द हळदी साठी स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या शस्त्रासह एकाकी लढाई देणारे आपले डॉक्टर माशेलकर यांचे सपुर्ण नाव डॉक्टर रघुनाथराव अनंत माशेलकर. जन्म १ जानेवारी १९४३. मुळचे गोव्यातील माशेल येथील. माशेल सारख्या टुमदार गावात निसर्गरम्य खेडेगावात त्यांचे बालपण गेले. परंतु त्यांच्या वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले.आईने मोठ्या धीराने त्यांचे संगोपन व आणि पालनपोषण केले. त्यांना चांगले शिक्षण घेता यावे यासाठी त्यांच्या त्या माऊलीने माशेल सारख्या लहान खेडेगावातून सरळ मुबंईसारख्या मोठ्या शहरात येण्याचा निर्णय घेतला. आईने घेतलेला हा निर्णय रघुनाथरावांनी सार्थ ठरविला. मुबंईत ती दोघं खेतवाडीत डाँक्टर देशमुख गल्लीसमोरच्या चाळी मध्ये राहु लागली. त्यावेळेस त्यांची परिस्थिती अतिशय बिकट होती. सातवी इयत्ते पर्यंत त्यांचे शिक्षण मुबंईत पालिकेतील शाळेतच झाले. या शाळेतल्या शिक्षकांनी सुरुवातीस भरपुर सहकार्य केल्याने माशेलकरांचे आयुष्य घडले गेले.

७ वी इयत्ता यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, आता मुंबईच्या युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश घेणार होते. मात्र, डाँक्टर माशेलकर यांच्या आईला प्रवेशासाठी २१ रुपयांची व्यवस्था करणे कठीण झाले होते. पण आईच्या ओळखीत असलेल्या एका मोलकरणी कडून कर्ज घेऊन अडथळे दूर केले गेले, त्या मोलकरणीने आपली संपूर्ण बचत उधार दिली जेणेकरून रघुनाथ शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट होऊ शकेल! युनियन हायस्कूलमध्ये, तरुण रघुनाथचे शिक्षक श्री. भावे यांनी त्यांची प्रतिभा केव्हाच ओळखली होती. आणि सूर्याची किरणे एकाग्र करू शकणार्‍या बहिर्गोल भिंगाचे उदाहरण वापरून त्यांना जीवनात लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त केले. याच उल्लेखनीय उदाहरणाने रघुनाथला शास्त्रज्ञ बनण्याची प्रेरणा दिली. त्या काळात घरात वीज नसल्यामुळेच रस्त्यावरील दिव्याच्या उजेडात अभ्यास करूनही त्यांनी बोर्डाच्या म्हणजेच शालान्त परीक्षेत उत्तीर्ण होताना महाराष्ट्रात ११ वा क्रमांक मिळवला!

तरुण रघुनाथच्या मनात जिज्ञासा इतकी अतृप्त होती की तो अनेकदा गिरगावच्या मॅजेस्टिक बुकस्टॉलबाहेर बसून नवीन पुस्तके वाचत असे आणि पटकन परत करत असे कारण त्याच्याकडे विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. डाँक्टर माशेलकर यांनी पुण्यातील पिंपरी येथील केलेल्या भाषणात म्हणाले.

‘‘बालवयापासूनच मला वाचनाची गोडी लागली. शालेय जीवनातही मी प्रचंड वाचन केले. त्याचा मला पुढील आयुष्यात मोठा फायदा झाला. आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी वाचत राहीन. तुलनेने लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. मात्र, सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी आयुष्याच्या शेवटापर्यंत साधना केली पाहिजे,’’

बोर्डाच्या परीक्षेनंतर त्यांनी आर्थिक अडचणींमुळे पुढील शिक्षण सोडण्याचा विचार केला पण माशेलकर यांच्या आई, हे त्यांचे प्रमुख प्रेरणास्थान होते. शिवणकाम किंवा मिळेल ते काम करून त्यांच्या आई काही कमाई करत असत. एकदा त्या गिरगावातल्या काँग्रेस भवनात काम मागण्या साठी गेल्या. संबंध दिवस तिथे उभे राहूनदेखील त्यांना काम दिले गेले नाही याचे कारण त्या कामासाठी तिसरी उतीर्ण असणं आवश्यक होते आणि माशेलकरांच्या आईंचे तेवढे शिक्षण नव्हते. खोटे बोलून त्यांना कदाचित ते काम मिळवता आले असतेही. पण तसे न करता, त्यांनी स्वतःच्याच मनाशी निर्धार केला – आज माझे शिक्षण नाही म्हणून मला काम मिळाले नाही, पण माझ्या मुलाला मात्र मी जगातले सर्वोच्च शिक्षण देईन. हा निर्धार पुरा करण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले.

तथापि, त्यांच्या आईचे प्रोत्साहन आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या आर्थिक पाठिंब्यामुळे त्यांना मुबंईतील प्रतिष्ठित जय हिंद महाविद्यालयात प्रवेश मिळण्यास मदत झाली. नेहमीप्रमाणे, त्याने कठोर परिश्रम केले आणि आंतरराज्य परीक्षेत २ रे आले. म्हणूनच नंतर , २००३ साली जय हिंद कॉलेजने त्यांना सर्वात प्रतिष्ठित माजी विद्यार्थी म्हणून सन्मानित केले.

भारतातील रासायनिक उद्योगाच्या उज्ज्वल भविष्यामुळे प्रेरित होऊन, त्यांनी केमिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त करण्यासाठी मुंबईतील पूर्वीची UDCT व आताची रासायनिक तंत्रज्ञान संस्था ( ICT Institute of Chemical Technology) या संस्थेत प्रवेश घेतला. पदवी प्राप्त केल्यानंतर, त्याच्याकडे शिष्यवृत्तीसह पुढील पदव्युत्तर पदवी मिळविण्यासाठी परदेशात जाण्याचा पर्याय होता. त्याऐवजी, त्यांनी रासायनिक अभिक्रियांमध्ये ( Chemical engineering) मास ट्रान्सफरच्या क्षेत्रामध्ये प्रो. एम.एम. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर म्हणून UDCT मध्ये त्यांचे काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. प्रो. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएचडी पूर्ण केली आणि अवघ्या तीन वर्षांत त्यांचा प्रबंध पूर्ण केला. १९६९ साली मुंबई विद्यापीठाच्या रसायन अभियांत्रिकी विभागाच्या तत्कालीन संचालक प्रा. एम्‌. एम्‌ शर्मा या अत्यंत सृजनशील संचालकाच्या मार्गदर्शनाखाली, माशेलकरांनी आपली पी.एच.डी.ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी युरोपमधील सल्फोर्ड विद्यापीठात जाऊन पोस्ट डॉक्टरल संशोधनही केले.

डॉ. माशेलकर यांनी २३व्या वर्षी पीएच.डी. मिळवून नॉन न्यूटोनियन, फ्लुइड मेकॅनिक्स, जेल विज्ञान आणि पॉलिमर अभिक्रिया अशा मूलभूत संशोधनांद्वारे वेगळी वाट चोखाळणाऱ्या माशेलकरांना ६० पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत. जानेवारी २०१८पर्यंत ३८ डॉक्टरेट मिळाल्या आहेत, आणि ३९वी डॉक्टरेट फेब्रुवारी २०१८मध्ये मिळाली. ३८हून ही अधिक संस्थांच्या संचालक मंडळांवर त्यांची निवड झाली आहे. जेव्हा रघुनाथ माशेलकर हे सी.एस.आय.आर.चे प्रमुख झाले होते त्यावेळी सी.एस.आय.आर.मध्ये २८,००० लोक काम करत होते. देशभर जागोजागी प्रयोगशाळा वसवल्या होत्या. परंतु त्या अपेक्षितपणे काम करत नव्हत्या. माशेलकरांनी व्हिजन नावाची योजना आखली. चाळीस प्रयोगशाळांचे समांतर चालणे थांबवून, त्यांना एका ध्येयाने आणि काम करण्याच्या एका विशिष्ट पद्धतीने बांधले आणि मग त्यातून भारतीय वैज्ञानिक संशोधनाचे एक अचाट पर्व निर्माण झाले.

२३५हून अधिक शोध निबंध, १८हून अधिक पुस्तके आणि २८हून अधिक पेटंटे त्यांच्या नावावर आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर, ते १९९८ मध्ये रॉयल सोसायटीचे फेलोशिप २००५ मध्ये नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्स (यूएसए) चे फॉरेन असोसिएट, २००३ मध्ये यूएस नॅशनल ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे फॉरेन फेलोशीप, रॉयल अकादमीचे फेलोशीप म्हणून निवडले गेले. १९९६ मध्ये ईजिंनिअरींग आणि २००० मध्ये वर्ल्ड ॲकॅडमी ऑफ आर्ट अँड सायन्स (यूएसए) चे फेलोशीप. १९९८ मध्ये जेआरडी टाटा कॉर्पोरेट लीडरशिप अवॉर्ड जिंकणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते आणि २००५ मध्ये बिझनेस वीक (यूएसए) स्टार ऑफ एशिया अवॉर्ड जिंकणारे पहिले आशियाई शास्त्रज्ञ होते, त्यांना हा पुरस्कार अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश Snr यांच्याकडून मिळाला होता. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समित्यांच्या सदस्यत्वाद्वारे त्यांचे ज्ञान आणि कौशल्य देखील मोठ्या प्रमाणात सामायिक केले गेले आहे.

आयुष्यातली कमीतकमी १२ वर्षं तरी अनवाणी पायांनी चालणारे, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारे माशेलकर हे, पुढे इंग्लंडमध्ये ज्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला त्या आयझॅक न्यूटनने ज्या पुस्तकात सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय आहेत याचा आपणास नेहमीच गौरव वाटत राहील.

लेखन व माहिती संकलन : रत्नाकर सावित्री दिगंबर येनजी

संग्राहिका  : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ न्यूट्रल थिंकिंग… लेखिका : डॉ. स्वाती गानू ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ न्यूट्रल थिंकिंग… लेखिका : डॉ. स्वाती गानू ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

‘There are always flowers who want to see them’ असं म्हणतात. आठ दिवसांपूर्वी जेव्हा बारा वर्षांचा सारंग खोली न आवरता, आलेल्या मित्रांशी बोलत होता तेव्हा त्याच्या अव्यवस्थितपणाचा आईला खूप राग आला होता.तो मात्र अनभिज्ञ होता यापासून. आपलं त्या विषयावरचं मत मुद्देसूदपणे पटवून देत होता मित्रांना.ती टक लावून त्याच्याकडे पाहत होती अगदी न्यूट्रल होऊन.जणू तो अनोळखी होता. तिला वाटलं आपल्या माणसाकडे असं न्यूट्रल होऊन पाहण्यात काही वेगळंच फीलिंग आहे.आपण नेहमी हक्काने ‘तुझं कसं चुकलंय,तू हे असं बोलायला हवं होतंस,अशा पद्धतीने करायला पाहिजे होतं,या प्रकारे वागायला हवं होतं,’ असं सहज बोलून जातो,अपेक्षा करतो.जजमेंटल होतो.लेबलिंग करुन मोकळं होतो.आज जेव्हा आईने आपल्याच मुलाबद्दल वेगळा विचार केला, तेव्हा तिला सारंगची चांगली बाजूही दिसली.असं न्यूट्रल होऊन बघण्यात एक वेगळीच मजा आली.ताटावर बसल्या क्षणी पहिल्याच घासाला ‘काय केलंय आज भाजीचं, बघू या’ म्हणणारे सासरे त्यांच्या असिस्टंटला पत्राचा मसुदा सांगताना आई परत न्यूट्रल झाली आणि ऐकू लागली. त्यांची कायद्यातील जाण,ज्ञान, त्यांचं ड्राफ्टिंग पाहून ती थक्कच झाली.मोठी मुलगी अरुणिमा, चहाचा मग तासनतास थंड करुन पिते आणि तो स्वयंपाकघरात आणायला विसरते,कधी कधीतर तो तिच्या कपाटात सापडतो.आईला भयंकर संताप येतो. संध्याकाळी ती जेव्हा चित्रा सिंगची गझल गात होती, तेव्हा तिच्या सुरातली आर्तता मनाला भिडून गेली.नवरोबा सलील त्याला ओपन डोअर सिन्ड्रोमच आहे.सगळ्या खोल्यांचे, कपाटाचे दरवाजे नेहमी उघडे ठेवतो.याचं काय करावं?नुसती चिडचिड होते.त्याची ऑनलाईन काॅन्फरन्स सुरु होती.युरोपियन स्टुडंट्ससमोर बिहेवियरल थेरपीचं त्याचं विश्लेषण कमाल होतं.पुन्हा ती न्यूट्रल झाली. तिला ओपन डोअर सिन्ड्रोमचं हसू आलं.तिने आणलेल्या भाजीला नावं ठेवणा-या सासूबाईंचं कुठली भाजी आणल्यावर समाधान होईल, या विचाराने ती वैतागून जायची. पण गीतेचा भावार्थ समजावताना तिला त्या गार्गी,मैत्रेयीच वाटायच्या.आज हा नवाच खेळ ती आपल्या मनाशी खेळली.

आपल्या माणसांबरोबर आपण दिवस रात्र, चोवीस तास असतो,मित्रमैत्रिणींबरोबर ,नातेवाईकांबरोबर कधीकधी वेळ घालवतो.लक्ष बहुतेकवेळा निगेटिव्ह गोष्टी दोष,वीक एरियांजवर चटकन जातं.’घर की मुर्गी दाल बराबर ‘ या उक्ती प्रमाणे आपण घरच्यांबद्दल विचार करताना प्रेज्युडाईज अर्थात पूर्वग्रहदूषित दृष्टीने पाहत असतो.ते अगदी ऑबव्हियस आहे. कारण तुम्हाला रोज त्यांच्याशी डील करावं लागतं.पण न्यूट्रल होऊन या नात्यांकडे पाहिलं, तर नवं असं काही सापडायला लागतं.प्रत्येकात त्याचं स्वतःचं असं काही युनिक असतंच. फक्त ते आपल्याला शोधता यायला हवं.ही विजन जाणीवपूर्वक तयार करावी लागते.एखादी व्यक्ती आपल्याला खटकते, ते खरं म्हणजे त्या व्यक्तीबद्दलचा राग नसतो, तर त्या व्यक्तीच्या सवयी,वृत्ती,स्वभावाचा तो राग येत असतो. पण हे आपल्या लक्षात येत नाही.म्हणूनच न्यूट्रल होऊन माणसांकडे अधूनमधून पाहिलं, की ‘दूध का दूध और पानी का पानी ‘ दिसायला लागतं.हे परस्पेक्टिव्ह एक आणखी गोष्ट तयार करते ती म्हणजे स्वतःकडे पाहण्याचा न्यूट्रल दृष्टिकोन.तुम्हाला वाटतं की मी सर्वगुणसंपन्न. माझं कधी काही चुकतच नाही.पण हा न्यूट्रल गेम स्वतःशी खेळताना आपले आपणच सापडायला लागतो.ते ॲक्सेप्ट करणं, स्वतःकडे असं पाहता येणं हे जमायला हवं.स्वतःच्या गुणदोषांचा असा त्रयस्थ म्हणून विचार करता येणं हे विवेकाचं लक्षण आहे.

नाती गुंतागुंतीची असतात.ती सांभाळणं तारेवरची कसरत असते.अशावेळेस न्यूट्रल गेम  खेळलो म्हणजेच त्रयस्थ होऊन व्यक्ती, वस्तू,नाती,

परिस्थिती,प्रसंग यांच्याकडे पाहणं यातून आपलीच माणसं आपल्याला कळायला लागतात.शिवाय आपला दृष्टिकोनही बदलायला लागतो.आपण मॅच्युअर्ड होतो.माणूूस म्हणून समृद्ध होण्याची प्रक्रिया यातूनच पुढे जात असते.पॅाझिटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह थिंकिंग यासारखाच तिसरा प्रकार आहे न्यूट्रल थिंकिंग. जे असतं जजमेंटल फ्री, रॅशनल, चांगल्या गोष्टींवर फोकस करायला शिकवणारं .कोच हे प्लेअर्सकरता, बिझिनेसमन हे एम्प्लॉईजकरता वापरतात आणि त्यातून जर त्यांचा परफॅार्मन्स सुधारत असेल तर आपण हा प्रयत्न जरूर करुन पहायला मुळीच हरकत नाही.

I think one can enjoy this Neutral Thinking Game and understand other persons better!

लेखिका:डॉ. स्वाती गानू

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एक सुंदर अनुभव – मनातल्या घरात –  श्री विकास शहा ☆ प्रस्तुती – सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

🔆 विविधा 🔆

☆ एक सुंदर अनुभव – मनातल्या घरात –  श्री विकास शहा ☆ प्रस्तुती – सौ. जयश्री पाटील ☆

मनातल्या घरात (Self – Introspection)

आपण मनातल्या घराला कधी भेट दिली आहे कां ??? 

एका ठिकाणी बसून करमत नाही. मग उगाच आपण, इथे तिथे फिरायला जातोच की !!! मग ती  पर्यटन स्थळ असतील किंवा कोणाच्या तरी घरी !!! याच्या त्याच्या घरी, या ना त्या कारणाने आपण पाहुणा म्हणून जातोच. मग मी ठरवले, कां नाही आपण आपल्याच मनाच्या घराचा पाहुणचार घेऊन यावा ???

हो, हो, चक्क स्वतःच्याच मनाच्या घरचा पाहुणचार !!! आपणच आपल्या मनाच्या  घराला भेट द्यावी म्हंटले, बघावे तरी काय आणि कसं ठेवलंय हे मनाचे घर !!! कोण, कोण रहातात तिथे ???  कसे स्वागत होत ते ???

ठरल्याप्रमाणे मनाच्या घराच्या दारापर्यंत पोहचलो. अगदी छोटेसे होते, पण छान होते !!! आत काय असेल, या उत्सुकतेने दार वाजवले, तर आतून आवाज आला, “कोण आहे ???? काय पाहिजे ????” असा प्रश्न आतून विचारला जाईल याची कल्पना नव्हती पण खरंच आपण कोण आहोत, हे त्याला सांगितल्या शिवाय तो आपल्याला आत तरी कसा घेणार ???

मी ही सांगितले, “मी *स्व  आहे रे !!! ज्याचे तू कध्धी ऐकत नाही. ज्याच्याशी तू सतत वाद घालत असतोस, ज्याच्याशी तू दिवस रात्र गप्पा मारत असतो तो मी !!!”

आतून आवाज आला, ” बरं…. बरं…उघडतो दार !!!” दार उघडल्या नंतर आत पाहिले, तर गडद अंधार होता. म्हणून मी विचारले, ” कां रे एवढा अंधार ???” तेव्हा तो म्हणाला, ” तुमच्याच कृपेने !!! मी म्हंटले, ” माझ्या कृपेने ??? तर तो म्हणाला, “हो !!! तुझ्याच कृपेने !!! कारण इथे उजेड तेव्हा पडेल, जेव्हा तू सकारात्मक विचारांचे दिवे लावशील.”

मी ही जरा ऐटीतच म्हणालो, “ठीक आहे… ठीक आहे !!! लावतो दिवे” म्हणत, पुढे सरकलो. थोडं पुढे चाचपडत गेलो तर काय !!! तिथं असंख्य खोल्या होत्या. अगदी कोंदट वातावरण होते. मी त्याला पुन्हा विचारले, “काय रे, त्या खोल्यात काय दडलंय ???”

तो पुन्हा म्हणाला, ” बघ की उघडून एक एक खोली, कळेल काय आहे ते.” मग मी हळूच एका खोलीचे दार उघडले.  आणि…फडफड करत अनेक रागीट चेहरे समोर आले. जणू काही ते मला गिळंकृतच करणार आहेत. मी पटकन दार लावले. तेव्हा तो म्हणाला, ” काय झालं ??? दार कां लावले ???” मी म्हंटले, ” कसले भयानक होते रे ते !!! ” तर तो पुन्हा हसत म्हणाला, ” तुम्हीच गोळा केले आहेत ते !!! तुम्ही ज्यांचा ज्यांचा तिरस्कार करता, ज्यांचा राग करता, त्यांची संख्या किती आहे ते कळलं कां ??? तुम्हीच केलेली मेगा भरती आहे ती !!!”

हुश्श…अरे बापरे !!! पुढचं दार उघडायचे धाडसच होईना, पण म्हंटले आता आलोच आहे तर उघडावे. तिथे ज्या काही घटना पहिल्या त्याने तर घामच फुटला. तो पुन्हा मिस्कीलपणे म्हणाला, ” काय, काय झालं…??? मी म्हंटले, “अरे बाबा, हे काय ??? तो पुन्हा म्हणाला, ” तू तुझ्या आयुष्यात सतत दुःखद आठवणीच गोळा करीत गेलास, त्याला मी तरी काय करणार ??? आता तर साठवून ठेवायला या खोल्यासुद्धा अपुऱ्या पडत आहेत.”

तिथं अशा किती तरी खोल्या होत्या, ज्यांना उघडायच धाडस माझं झालं नाही. मग त्याने त्या उघडून दाखवल्या, ही भीतीची खोली, ही द्वेष, ईर्षा, वाईट विचारांची, मतभेदांची, गैरसमजांची खोली अशा अनेक खोल्या पाहिल्या, सर्वच्या सर्व अंगावर येत होते.

आता मात्र माझं डोकं गरगरायला लागले, अस्वस्थता वाढली होती. किती भयावह होत ते सर्व !!! त्यामुळे पुढं काय आहे, हे बघण्याची इच्छाच होत नव्हती. हे सारं भयाण बघून अंगाला काटा आला होता. स्वतःचाच तिरस्कार वाटत होता.

मी त्याला म्हंटले, “मी जातो आता. मला काही बघायचं नाही आता.” तो म्हणाला, ” थोडं…थांब, आलाच आहेस तर हे पण बघून जा.”

थोडी हिंमत दाखवत आम्ही पुढच्या दिशेने निघालो….तिथं संपूर्ण जाळ लागलेला होता…मग थोडं पुढे गेलो आणि पाहिलं तर काय….आहा…..हा हा…स्वर्ग सुख मिळावं असं वातावरण होत, तिथं प्रेम होतं, तिथं माया होती, तिथं आनंद होता, उत्साह होता, नवीन नवीन कल्पनांचा बाजार होता. सुख, समाधान शांती ने भरलेले, अगदी नयन दिपून टाकेल असं सर्व काही होते.

मी म्हंटले, “काय रे हे इतकं सुंदर आहे, हे तू मला आधी कां नाही दाखवलं ???” तर तो मिस्कील पणे हसत म्हणाला, ” अहो, तुमचं मनातलं खरं घर तर हेच आहे.” मग मी म्हणालो, ” जे आधी पाहिलं, ते काय होतं ???” तो पुन्हा हसत म्हणाला, ” त्या…त्या…तुम्ही अतिक्रमण करत वाढविलेल्या खोल्या आहेत. तुम्ही केलेला राग, इर्षा, द्वेष, भीती, नावडती माणसं, नावडत्या आठवणी याची जी साठवणूक केली, ती या सुंदर घराच्या प्रवेशद्वारा पुढे पहारेकरी बनून बसले आहेत, जे तुम्हाला इथं पर्यंत येण्यास अडवत आहेत.”

आम्ही वर्तमान काळात सजग नसतो, त्या वेळी आमच्या स्वभावाची नशा असते, आणि नंतर कळते तेंव्हा पञ्चाताप झालेला असतो…

क्षणभर विचार केला, खरंच की आपणच आपल्या सुख, आनंदाच्या कडे जाणारा रस्ता, या नकारात्मक गोष्टींची साठवणूक करून अडवलेला आहे. मनाच्या घराचा पसारा आवरायला वेळ लागणार होता पण ठरवलं की, आता या अडथळा बनून बसलेल्या खोल्यांची साफसफाई करायची. तिथं सकारात्मक विचारांचे दिवे लावायचे आणि सुख समाधान, शांती कडे जाणारा मार्ग सोपा करायचा.

बरं झालं. आज मनाच्या घरात फिरून आलो, नाहीतर आपल्या मनावर नकारात्मक विचारांचे अतिक्रमण झालेले आहे हे कळलंच नसतं.

मनाच्या घरचा पाहुणचार खूप काही शिकवून गेला. आपल्या मनाचं घर, दुसऱ्याच्या हातात द्यायचं नाही. स्वतःच्या घराची साफसफाई स्वतःच करायची.

साफसफाई करायची म्हणजे काय तर स्व दर्शन म्हणजे ध्यानावर यावे लागेल त्यासाठी ध्यान करावे लागेल…

मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो.. तुम्ही तुमच्या मनाच्या घराला कधी भेट देत आहात ???

आपण सुरुवात छान केलेली आहे..

BE POSITIVE… BE HAPPY

सकारात्मक रहा.. आनंदी रहा..

पत्रकार श्री विकास शहा, तालुका प्रतिनिधी दैनिक लोकमत , शिराळा ( सांगली )

प्रस्तुती – सौ.जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print