मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कुणाच्या खांद्यावर… — भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

कुणाच्या खांद्यावर… — भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(आधीच आजी सतत म्हणत असते, “ बघ, तुझी आई तुला टाकून गेली. मी सांभाळलं नसतं तर काय केलं असतंस रे तू? कठीणच होतं बरं बाबा तुझं.”) – इथून पुढे — 

“मावशी, हे सतत ऐकून माझा कॉन्फिडन्स शून्यावर आलाय. सगळा खर्च हल्ली आजी माझ्यावरच लादते. अगं नुसत्या स्वयंपाकीण बाईना आठ हजार पगार देते आजी. मला हे दिसतं पण मला बोलता येत नाही ग. पण मी जर या वयात आजीला सोडून गेलो तर तो कृतघ्नपणा होईल. तीही म्हातारी होत चाललीय ना?”

“चिन्मय, असा वेडेपणा करू नकोस राजा. आजी ही तुझी जबाबदारी नाही. आम्ही तिच्या तीन मुली आहोत. जरी तुझ्या आईने टाळले तरी मी आणि अमला मावशी तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. तुला तुझं आयुष्य आहे ना? हक्क आहे तुला ते आनंदात जगायचा. तू असा आजीत गुंतून राहू नकोस. सरळ बँकेचे कर्ज काढून छानसा फ्लॅट घे. मिळेल ना तुला कर्ज? ”.. आरती त्याला समजावत म्हणाली.

“हो मिळेल मावशी. पण मग आजीचं काय? “

“ते मी बघते. बोलते आईशी दोन दिवसात. ” … पण आरती विचारात पडली. हा गुंता कसा सोडवावा याचा तिने खूप विचार केला.

दुसऱ्या दिवशी तिने रजनी ताईंजवळ हा विषय काढला… “ आई, चिन्मयच्या लग्नाचं काय करायचं आपण?”

रजनीताई म्हणाल्या, “ करू दे की खुशाल. आहे का हिम्मत वेगळं घर घ्यायची? मी म्हणून दिलाय बरं थारा. ”

आरतीला हे ऐकून अत्यंत चीड आली.

“आई, अग काय बोलते आहेस हे तू? त्या बिचाऱ्या चिन्मयचे आयुष्य तू स्वतःला जखडून टाकलं आहेस. पार घरगडी करून टाकला आहेस तू त्याला. किती करतोय तो तुझ्यासाठी हे समजत नाही का तुला? सतत हुकूम करत असतेस त्याला आणि राबवून घेत असतेस. आणि खुशाल म्हणतेस हो ग, आहे का हिम्मत त्याच्यात ? हे बघ.. नक्कीच आहे त्याच्यात हिम्मत. तो बँकेचे कर्ज काढून फ्लॅट घेऊ शकतो. लग्न करू शकतो. तू त्याला अशी जखडून ठेवू नकोस. गुणी मुलगा आहे ग तो. आई, आम्ही तीन मुली आहोत तुला. तू ही आमची जबाबदारी आहेस, त्या चिन्मयची नाही. अशी स्वार्थीपणाने वागू नकोस ग. हे बघ. मी सांगते ते ऐक. बघ पटतं का. मी आणि अमला सुदैवाने उत्तम आर्थिक परिस्थितीत आहोत. अलका तर एक नंबरची स्वार्थी आणि अप्पलपोटी निघाली. तिला आम्ही आमची बहीण मानतच नाही. तर, हा तुझा फ्लॅट तू एकट्या चिन्मयच्या नावावर कर. तू इच्छापत्र कर आणि हे घर चिन्मयला दे. तो तर हे न घेता सुद्धा कायम तुझ्याजवळ राहील.. पण त्याच्या चांगुलपणाचा आपण किती फायदा घ्यायचा? मी आणि अमला तुझी सेवा, देखभाल करायला येणं अशक्य आहे ग. आणि आम्हाला तुझ्या इस्टेटीतलं खरोखर काहीही नको. पण हा आपला चिन्मय सज्जन आहे, तुझ्याबद्दल किती माया आहे त्याच्या पोटात. तू आता त्याचाही विचार कर. उद्या त्याचं लग्न होईल. त्याची बायको का म्हणून तुझ्या घरात नोकरासारखी राहील? तू तिलाही असे वागवायला कमी करणार नाहीस. मी ओळखून आहे तुला. तर हे पटतंय का बघ. दोन दिवस विचार कर. पण मी चिन्मयचं आयुष्य मार्गी लावल्याशिवाय यावेळी जाणार नाही हे नक्की. त्याला आधार नको का? उद्या तू त्याला हाकलून दिलंस तर तो कुठे जाईल? नीट विचार कर. शेवटी तरी तू हे घर आम्हा मुलींना देणार. पण जर ते आम्हालाच नकोय तर ते तू चिन्मयला द्यावेस. तो तुला कधीही अंतर देणार नाही ही मला खात्री आहे. ” अतिशय गुणी गरीब मुलगा आहे तो. हे मी अमलाशीही फोनवर बोलले आहे. तिलाही हे अगदी मान्य आहे. उद्या मला विचार करून सांग. आणि मी आत्ता म्हणतच नाहीये की तू त्याला आत्ताच हा फ्लॅट देऊन टाक… मला कळतंय, तुलाही नक्की वाटत असणारच, की जर चिन्मयने नाही विचारलं तर आपलं काय होईल? म्हातारपण वाईट असतं बरं. हे मलाही माहीत आहेच ग. पण हे तू तुझ्या पश्चात करायचे आहे. आत्ता कोणालाच हा फ्लॅट द्यायचा नाही. बघ पटतंय का… आणि हो… आणखी एक. चिन्मय ठराविकच रक्कम तुला देईल. तू वाटेल तसा खर्च करायचा नाहीस. तुझ्या डॉक्टरचा खर्च, औषधपाणी सर्व खर्च यापुढे तूच करायचा. चिन्मय करणार नाही. किती ओरबाडून घेशील ग त्याला आई? कमाल आहे तुझी. तुझा खर्च तूच करायला हवास. त्याचा अंत बघू नकोस. नाही तर चिन्मय स्वतःचा फ्लॅट घेईल आणि निघून जाईल. आम्ही दोघी सतत अजिबात येऊ शकणार नाही तुझ्यासाठी. मग नाईलाजाने वृद्धाश्रम हाच पर्याय उरतो आमच्याजवळ. बघ…. विचार कर आणि सांग मला. त्याप्रमाणे निर्णय घेऊन मगच मी लंडनला जाईन. ”

… अत्यंत परखडपणे आरती हे रजनीताईंशी बोलली. कोणीतरी हे बोलायला हवंच होतं.

दुसऱ्या दिवशी रजनीताई म्हणाल्या, ”आरती, तू म्हणतेस ते बरोबर आहे. मी खूप स्वार्थीपणे वागले सगळ्यांशी. पण पटलं मला तुझं. मी चिन्मयच्या नावावर हा फ्लॅट माझ्या मृत्युपत्राद्वारे करते. तू चांगला वकील शोध. आपण माझं मृत्युपत्र रजिस्टर करू म्हणजे चिन्मयला माझ्या पश्चात अडचणी येणार नाहीत. शिवाय मी माझ्या अकाउंटमधून सगळा खर्च करत जाईन. ठेवून तरी काय करायचा तो पैसा? माझं खरंच चुकलं ग वागायला चिन्मयशी. करू दे लग्न तो एखाद्या चांगल्या मुलीशी आणि दोघेही इथेच आनंदात राहू देत. मी सगळ्या कामाला बाई ठेवीन म्हणजे कोणालाच त्रास होणार नाही. ”

आपल्या आईचे हे बोलणे ऐकून आरतीच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं रजनीताईंना मिठी मारली.

“आई, किती चांगली आहेस तू. वेळेवर स्वतःची चूक कबूल करायलाही मोठं मन लागतं ग. मी मुलगी आहे तुझी. तुझ्यावरही अन्याय होऊ देणार नाही आणि चिन्मयवरही नाही. ”

आरतीने चार दिवसात वकील बोलावले आणि रजनीताईंचं मृत्युपत्र रजिस्टर केलं सुद्धा. याही गोष्टीला बरेच दिवस होऊन गेले. चिन्मय – विदिशाचं लग्न झालं. दोघे आजीच्या घरात आजीबरोबर सुखात राहू लागले. रजनीताई विदिशाशी अतिशय छान वागू लागल्या.

हा त्यांच्यात झालेला बदल किती सुखावह होता. ! विदिशा तर लाघवी होतीच. तिनेही आजी आजी करत त्यांना जिंकून घेतलं.

आरतीचा निर्णय अगदी शंभर टक्के खरा ठरला.

आज रजनीताई या जगात नाहीत. पण आरतीच्या सल्ल्याप्रमाणे ते रहातं घर, बँकेतली शिल्लकही चिन्मयला देऊन आणि चिन्मय आणि विदिशाचा सुखी संसार बघूनच त्यांनी डोळे मिटले.

– समाप्त – 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ ≈ मॉरिशस से ≈ – प्रतिवाद – ☆ श्री रामदेव धुरंधर ☆

श्री रामदेव धुरंधर

(ई-अभिव्यक्ति में मॉरीशस के सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री रामदेव धुरंधर जी का हार्दिक स्वागत। आपकी रचनाओं में गिरमिटया बन कर गए भारतीय श्रमिकों की बदलती पीढ़ी और उनकी पीड़ा का जीवंत चित्रण होता हैं। आपकी कुछ चर्चित रचनाएँ – उपन्यास – चेहरों का आदमी, छोटी मछली बड़ी मछली, पूछो इस माटी से, बनते बिगड़ते रिश्ते, पथरीला सोना। कहानी संग्रह – विष-मंथन, जन्म की एक भूल, व्यंग्य संग्रह – कलजुगी धरम, चेहरों के झमेले, पापी स्वर्ग, बंदे आगे भी देख, लघुकथा संग्रह – चेहरे मेरे तुम्हारे, यात्रा साथ-साथ, एक धरती एक आकाश, आते-जाते लोग। आपको हिंदी सेवा के लिए सातवें विश्व हिंदी सम्मेलन सूरीनाम (2003) में सम्मानित किया गया। इसके अलावा आपको विश्व भाषा हिंदी सम्मान (विश्व हिंदी सचिवालय, 2013), साहित्य शिरोमणि सम्मान (मॉरिशस भारत अंतरराष्ट्रीय संगोष्ठी 2015), हिंदी विदेश प्रसार सम्मान (उ.प. हिंदी संस्थान लखनऊ, 2015), श्रीलाल शुक्ल इफको साहित्य सम्मान (जनवरी 2017) सहित कई सम्मान व पुरस्कार मिले हैं। हम श्री रामदेव  जी के चुनिन्दा साहित्य को ई अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों से समय समय पर साझा करने का प्रयास करेंगे। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय एवं मनोवैज्ञानिक लघुकथा “– प्रतिवाद –” ।

~ मॉरिशस से ~

☆ कथा कहानी ☆ — प्रतिवाद — ☆ श्री रामदेव धुरंधर ☆

मेरे गाँव के वयोवृद्ध बालकिसुन दादा अपने दिल से विद्वान थे। वही विद्वता उनके ओठों से प्रस्फुटित होती थी। वे मुझसे बोले थे अमेरिका ने गिन लिया आकाश में कितने तारे हैं। दादा एक दिन तो बोले भारत अब इतना बलवान हो गया है कि सब देशों को नचा नचा कर मार सकता है। उनकी मृत्यु होने पर मैं सोच रहा था क्या मैंने कभी उनसे प्रतिवाद किया होगा? मैं उनके सामने पल कर बड़ा हुआ था।

***

© श्री रामदेव धुरंधर
09 – 12 – 2024

संपर्क : रायल रोड, कारोलीन बेल एर, रिविएर सेचे, मोरिशस फोन : +230 5753 7057   ईमेल : [email protected]

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कुणाच्या खांद्यावर… — भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

कुणाच्या खांद्यावर… — भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

आईला थोडे बरे नाही हे समजल्यावर आरती लंडनहून नोकरीतून रजा काढून मुंबईला आली.

आरतीच्या आई रजनीताई  म्हणजे एक बडे प्रस्थ होते… दिसायला सुंदर,शिकलेल्या,त्या काळात कॉलेजमध्ये नोकरी करणाऱ्या. त्यांचे यजमान रमेशराव सुद्धा खूप श्रीमंत घराण्यातले. गावाकडे पिढीजात जमिनी वाडे असे  वैभव असलेले. 

एका समारंभात त्यांनी रजनीला  बघितलं आणि मागणी घालून ही मध्यमवर्गातली मुलगी करून घेतली. रजनी होतीच कर्तृत्ववान. मध्यमवर्गातून आल्यावर हे सासरचे वैभव बघून डोळे दिपले नाहीत तरच नवल. 

आपल्या पगारातून रजनी वाट्टेल तसा खूप खर्च करत असे. कोणीही विचारणारे नाही आणि  रमेशरावांना एवढा वेळही नसे. बँकेत शिल्लक टाकावी, सेव्हिंग करावे असं रजनीला कधी वाटलंच नाही. 

रजनी स्वार्थी होती आणि तिचा हा स्वभाव तिची आई जाणून होती. रजनीचे आपल्या आईवडिलांशी तरी कुठे पटायचे ? मग भावंडे तर दूर राहिली… .. आणि श्रीमंत सासर मिळाल्यावर तर रजनीने आपल्या बहिणी आणि भावाशी संबंधच ठेवले नाहीत. भारी साड्या, दागिने, पार्ट्या,  सतत श्रीमंत मैत्रिणीत वावरणे हे रजनीचे आयुष्य बनून गेले. कॉलेजची नोकरी झाली की तिला वेळच वेळ असे रिकामा.

लागोपाठ तीन मुली झाल्या तरीही रजनीने नोकरी न सोडता त्यांना छान वाढवलं.  घरात खूप नोकरचाकर, हाताशी भरपूर पैसा, रजनीला काहीच जड गेलं नाही. 

रजनीबाईनी मुलींना चांगलं वाढवलं. मुली छान शिकल्या. दरम्यान लहानश्या आजाराने रमेशराव अचानकच वारले. रजनीने तिन्ही मुलींची लग्ने थाटात करून दिली. दोघी लगेचच परदेशात गेल्या.  

रजनीताईना आता एकाकीपण जाणवायला लागले   .त्यांची नोकरीही संपली होती  .  खाजगी कॉलेजात नोकरी असल्याने त्यांना  पेन्शन पण नव्हते. गावाकडचे वाडे जमिनी भाऊबंदकीत हातातून निसटून गेल्या. पण तरीही रमेशरावांनी ठेवलेलं काही कमी नव्हतं.

दरम्यान बऱ्याच गोष्टी घडल्या . रजनीताईंची मोठी मुलगी अलका अगदी आईसारखीच होती स्वभावाने.तिला एक  मुलगा झाला . तिचा नवरा अचानकच एक्सीडेंटमध्ये गेला. अलकाने लगेचच कोणताही विचार न करता , आईलाही न विचारता आपला आठ वर्षाचा मुलगा चिन्मय आईकडे आणून टाकला.

”आई , मी दुसरं लग्न करतेय आणि तो आपल्या जातीचा नाहीये. तो चिन्मयला संभाळायला तयार नाही.

मी त्याच्याबरोबर दुबईला जाणार आहे.

रजनीताईंची संमती आहे का नाही हे न विचारताच अलका आली तशी निघून गेली. बिचारा चिन्मय घाबरून आजीकडे बघत राहिला. रजनीताईंचं मन द्रवलं. त्यांना या पोरक्या मुलाचं फार वाईट वाटलं.त्यांनी चिन्मयला पोटाशी धरलं आणि म्हणाल्या,

”  घाबरू नको चिन्मय. मी आहे ना? तू रहा माझ्याकडे हं. आपण चांगल्या शाळेत  घालू तुला.” रजनीबाईनी चिन्मयला चांगल्या नावाजलेल्या शाळेत घातलं. 

अलकाला फोन केला आणि सांगितलं. “ हे बघ अलका.तुझा मुलगा ही तुझी जबाबदारी आहे. त्याच्या खर्चाचे, फीचे सगळे पैसे जर देणार नसलीस तर त्याला मी मुळीच संभाळणार नाही. आई आहेस का कोण आहेस ग तू? माझी इतका भार सहन करण्याची ऐपत आणि ताकदही नाही. जर वर्षभराचे पैसे चार दिवसात जमा झाले नाहीत तर मी त्याला अजिबात संभाळणार नाही. येऊन घेऊन जा तुझा मुलगा.” 

चिडचिड करत अलकाने मुकाट्याने पैसे  रजनीताईंच्या खात्यात जमा केले.

ती कधीही बिचाऱ्या चिन्मयला भेटायलाही यायची नाही. 

बाकीच्या तीन मुलींपैकी एकटी आरती सहृदय आणि शहाणी होती.रजनीताईंशी तिचं चांगलं पटे. या सगळ्या गोष्टी रजनीताई आरतीच्या कानावर घालत. 

मधली अमला तर असून नसल्यासारखी होती.    

जमीनदारांच्या घरी तिला दिली होती खरी, पण तिच्या हातात काडीची सत्ता नव्हती.पार कर्नाटकातील ते खेडं आणि सतत देवधर्म कुलाचार यातच बुडलेली.दोनदोन वर्षं तिला माहेरी यायला जमायचं नाही. आपल्या आईचं बहिणींचं काय चाललंय याची तिला दखलही नसे. ती कधी माहेरीही यायची नाही आणि कोणाला आपल्या घरी बोलवायचीही नाही.  

नशिबाने चिन्मय बुद्धीने चांगला निघाला.  कोणाचाही आधार नसताना तो चांगल्यापैकी मार्क्स मिळवून पास होत गेला.

रजनीताई आता थोड्या थकायला लागल्या. चिन्मयला नाही म्हटलं तरी आजीचं प्रेम लागलं होतं. तिच्याशिवाय त्याला जगात होतंच कोण?

पण सतत  आजी जवळ राहून चिन्मय एकलकोंडा झाला होता.ना त्याचे मित्र घरी येत,ना तो कधी त्यांच्याकडे खेळायला जात असे. 

चिन्मय आता   एम कॉम झाला.त्याला बँकेत नोकरीही लागली.   रजनीताईंनी त्याला जवळ बसवून सांगितलं,”हे बघ चिन्मय.तू आता मिळवायला लागलास .आता तुझ्या खर्चाचे  पैसे मला दरमहा देत जा. 

निमूटपणे चिन्मय आजीला पैसे देऊ लागला.कोणालाही विरोध करण्याची ताकद त्याच्यात निर्माणच झाली नव्हती. सतत त्याच्या मनात एक  कमीपणाची भावना असे. 

सगळ्या बहिणींनी आपली आई म्हणजे जणू चिन्मयचीच जबाबदारी असेच गृहीत धरले होते.

बिचाऱ्या चिन्मयला स्वतःचे आयुष्यच उरले नव्हते.सतत आजीला डॉक्टरकडे ने, तिची औषधे आण, तिला फिरायला ने हेच आयुष्य झाले चिन्मयचे.

ना कधी त्याच्या आईने त्याला फोन केला की कधी कौतुकाने पैसे पाठवले. बँकेत मान खाली घालून काम करणे आणि घर गाठणे हेच आयुष्य झाले होते चिन्मयचे.

आरती पुण्यात आली तेव्हा  माहेरी,रजनीताईंकडेच उतरली होती.

त्यांना बरं नाही म्हणून तिला त्यांनी बोलावून घेतलं खरं पण चांगल्या मस्त तर होत्या त्या.

आरतीला सगळं चित्र लख्ख दिसलं.

बिचारा चिन्मय आजीकडे भरडून निघतोय हेही तिला दिसलं.दोन दोन मिनिटांनी त्याला हाका मारणारी आणि राबवून घेणारी आपलीच आई तिने बघितली. 

“चिन्मय, उद्या माझी  डॉक्टरकडे अपॉइंटमेंट आहे,  लक्षात आहे ना?लवकर ये ऑफिसमधून.नंतर मग लगेच ते सांगतील त्या तपासण्याही करून टाकू.”

चिन्मयच्या कपाळावरच्या आठ्या आरतीला बरंच काही सांगून गेल्या.

आरती तेव्हा काही बोलली नाही.

नंतर चिन्मयला म्हणाली,”उद्या माझ्याबरोबर बाहेर चल चिन्मय.उद्या रविवार म्हणजे सुट्टी असेल ना तुला?आई, तू उद्या आपली जेवून घे ग.मी आणि चिन्मय बाहेर जाऊन कामे करून जेवूनच येऊ .”

रजनी ताईंच्या कुरकुरीकडे लक्षच न देता आरती चिन्मयला घेऊन बाहेर पडली.

एका छानशा हॉटेलमध्ये आरती चिन्मयला घेऊन गेली.”तुला काय आवडतं ते मागव चिन्मय.मला हल्ली फारसं तुम्हा नव्या मुलांना काय आवडतं ते समजत नाही”आरती हसत हसत म्हणाली. 

चिन्मय हळूहळू  आरती मावशी जवळ मोकळा होत गेला. या भिडस्त आणि पडखाऊ मुलाचं तिला फार वाईट वाटलं.

चिन्मय,कोणी मैत्रीण मिळालीय की नाही,  बँकेत किंवा आणखी कुठे?”

आरतीने गमतीने विचारलं.  मावशी, आहे ग माझ्याच बँकेतली  विदिशा माझी चांगली मैत्रीण. पणअजून लग्नाचं विचारलं नाही मी तिला.कोणत्या तोंडानं विचारू ग?

आधीच आजी सतत म्हणत असते, “ बघ, तुझी आई तुला टाकून गेली. मी सांभाळलं नसतं तर काय केलं असतंस रे तू? कठीणच होतं बरं बाबा तुझं.” 

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोघी — हिरवा चुडा… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ हिरवा चुडा… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

आंब्याची पान तोडून त्याची सुंदर तोरणं दारावर छान शोभत होती,… दारं जरी जुनाट असली तरी त्याला रंगवून त्यावर नक्षी काढून रेवाने ती छान सजवली होती,… स्वतःच नवरी असली, तरी हौसेने आणि उत्साहाने कामं पेलत होती ती,… अगदी सडा रांगोळी, दारातली प्राजक्ताची फुलं जमवून देवघरातल्या देवीसाठी सुंदर हार बनवून ठेवला,.. सगळी लगबग सुरूच. ते बघून जमलेल्या मावश्या, आत्या म्हणत होत्या… “पोरगी जाईल तर अवघड होईल ग बाई ह्या घराचं,…. झालं आज देव ब्राह्मण परवा सुनं होईल अंगण,… ” 

आईची साधारण साडी घालूनच रेवा देवब्राह्मणाच्या पुजेला बसली,… आपल्या आईबाबांच्या परिस्थितीला ओळखुन कधीही हट्ट न करणारी हि रेवा,… एका शाळेत नोकरी पण करत होती,…. मिळेल तो पगारही घरी देत होती,.. हाताशी आलेला पोरगा आजारानं गमावला होता त्यात होतं नव्हतं ते सगळं गेलं होतं,… ह्या दोन खोल्याच घर आणि हे अंगणातलं किराणा दुकान ह्यावर सगळं सुरू होतं,…

दूरच्या नात्यात एका लग्नात रेवाला सासरच्यांनी बघितल्यापासून हा योग जुळून आला होता,… दाराशीच लग्न करायचं ठरलं होतं,… पण बैठकीत तीन तोळ्याच्या पोहे हारावरून मोडायला आलं होतं,… पण कोणीतरी मध्यस्थी करून दोन तोळ्यावर जमवलं होतं,… तेव्हा मात्र रेवा म्हणाली होती,… ” मला पोहे हार नको. त्या ऐवजी दोन सोन्याच्या बांगडया करू,… ” हिरव्यागार चुडयासोबत पिवळ्याधमक सोन्याच्या बांगड्या तिनी आपल्या सगळ्या मैत्रिणींच्या हातात पहिल्या होत्या.. तिला फार इच्छा होती तश्या घालण्याची,… ही अशी बैठक ठरून दोन महिने झाले आणि आज लग्न येऊन ठेपलं होतं,…

बारीक सनई सुरू होती, जातं, माठ, दारातला मांडव सगळं सजलं होतं,… चला नवरीने चुडा भरून या आधी,… गुरुजींनी सांगितलं,… सगळ्या बायकांच्या घोळक्यात ती येऊन बसली,… आत्या म्हणाली, “अग तुझ्या बापाने सोन्याच्या बांगडया केल्या ना तुला… त्या मागे घाल मग चुडा काढता येणार नाही,….

तसं तिला धस्स झालं,… ती म्हणाली हो आलेच घालून,… ती स्वयंपाक घरात गेली, “ आई माझ्या बांगडया दे ना,… ” आईने अवंढा गिळत तिच्याकडे बघितलं,..

त्याक्षणी तिला आई अधिकच केविलवाणी वाटली,… आईने डबी लपवत हळूच फक्त बांगड्या दिल्या,… ती घाबरतच बसली चुडा भरायला,… आजूबाजूचे हात तिच्या सोन्याच्या बांगड्या बघत होते,… “जास्तच पिवळं दिसतंय सोनं,.. ” कोणी म्हणे दोन तोळ्याच्या नसतील ग… जास्त लागलं असेल सोनं,.. कोणत्या सोनाराकडे केल्या,… ?

ती अगदी कावरीबावरी झाली सगळ्या प्रश्नांनी,… तेवढ्यात गुरुजींनी हाक मारली, आणि ती सुटका झाल्यासारखी पळाली,… नाजुक गोऱ्या हातावर चुडा अगदी सुंदर दिसत होता,… स्वतःच काढलेली मेंदी,… त्या मेंदीचा सुंदर सुगंध,… पण ह्या पिवळ्या बांगड्या ती अस्वस्थ होत होती,… कसं होईल लग्नानंतर?…… आपल्याला कोणी बांगड्यांच विचारलं तर, ?… तिला मध्येच घाम फुटायचा,… आई बाबा दोघेही अपराधी असल्यासारखे बघायचे एकमेकांना,…

आज ती खुप सुंदर दिसत होती,… स्वतः बनवलेलं रुखवत. सगळी बारीक सारीक तयारी,…

“सोन्यासारखं आहे ग बाई लेकरू,… पुण्यवान आहेत लोकं,… त्यांना म्हणा काय करता खऱ्या सोन्याला??? “ आजीचं असं वाक्य ऐकताच माय लेकींनी एकमेकांना बघितलं,… फक्त आपल्या तिघात असलेलं गुपित आजीला कळलं की काय,… असं जर तिकडे काही कळलं, तर वरात परत जाईल,… बापाला पण धस्स झालं,..

… पण आजी पुढे म्हणाली, “आजकाल असे समजुतदार लेकरं राहिले नाही,.. म्हणून म्हणते सोनं काय करायचं?अशी सुन मिळाली त्यांना,.. “

आजीचं वाक्य पूर्ण होताच सुटकेचा श्वास सोडला तिघांनी,.. , मुहूर्त घटिका आली आणि रेवाच्या डोक्यावर अक्षता पडल्या,.. दिवसभर सगळी लगबग सुरू होती,… नंदा, जावा जवळ येऊन बघु नवरीचा चुडा म्हणत त्या पिवळ्या बांगडया बघुन जात होत्या,… त्या प्रत्येक क्षणी हिच्या काळजाचा ठेका चुकत होता,… निघण्याची वेळ आली,… आई बाबांच्या गळ्यात पडून मनसोक्त रडून झालं,… देवघरातल्या देवीला नमस्कार करून निघताना देवीला ठेवलेला चुडा पाहून ती म्हणाली,… “आता ह्या चुड्याची लाज तुलाच,… सांभाळ आई जगदंबे, “.. ती वळून बघत होती,… आपलं गरीब माहेर,… सुंदर प्राजक्ताखाली सजलेला मंडप,… नक्षीदार लाकडी दरवाज्यात केविलवाणे, अपराध्यासारखे उभे हतबल असलेले आपले आई वडील,… ती परत माघारी पळत आली दोघांना घट्ट धरलं,… ” माझी चिंता करू नका मी बघेल सगळं,… निश्चिंत रहा…” 

सगळे विधी झाले. त्याने रात्री तिला जवळ ओढलं,… “ मला तुझे हे मेंदी भरले हिरव्यागार चुड्याचे हात बघू दे जर मनसोक्त,… जादू आहे तुझ्या हातात,… ” त्याने ते हात निरखले आणि ओठावर ठेवले तशी ती शहारली आणि मनातून घाबरलीही,… “ चुड्याचे हात बघताय कि सोन्याच्या बांगडीचे हात बघताय,… ?”

तो म्हणाला, “ चुड्याचेच गं,… किती छान दिसतो हिरवा रंग तुझ्या हातावर आणि मुळात तुझं सगळं कष्टमय आयुष्य मला माहित आहे,.. आईबाबांना सावरून धरणारे हे हात फार सुंदर आहेत ते माझं आयुष्य सावरायला आलेत हे भाग्यच ना माझं,… ” 

तिला जाणवलं हे बांगडयाच दडपण आता नाही पेलू शकणार आपण,… तिला एकदम रडूच आलं,… त्याला कळेना काय झालं एकाएकी,…

तीच बोलायला लागली,… “ तुम्ही रागावणार नसाल तर सांगते,… आम्ही सोन्याच्या बांगडया घेऊन घरी आलो,… पण दुसऱ्या दिवशी बँकेवाले हजर. दादाच्या आजारात काही कर्ज उचललं होत आम्ही,… घरावर जप्ती आणतो म्हणाले,… मला बांगडया मोडाव्या लागल्या,… आई बाबाला माझं लग्न करणं मुश्किल होतं,.. पण ते पेललं कसंबसं पण हे बांगड्याचं ओझं नव्हतं पेलण्यासारखं,… ”

त्याने पिवळ्या बांगडयाला हात लावला,… “ मग ह्या बांगड्या?? “ 

ती म्हणाली “ खोट्या आहेत,… आणि हे खोटं मला मनात त्रास देतंय,… खरं ते तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही ठरवा मला नांदवायचं की नाही,… तशी शाळेशिवाय शिकवण्या घेऊन पैसे कमावून लवकर करेल मी बांगडया पण तुम्हाला असं फसवलं आहे आम्ही,…. ” 

तो म्हणाला, ” मग तर पोलिसच बोलवायला हवे मला पकडायला. कारण एवढ्या हुशार हातांना मी सोन्याच्या बांगड्यांची लाच मागितली – हे तर हातच सोन्याचे आहेत…“

तिने एकदम चमकून त्याच्याकडे बघितलं,… त्याने तिचे डोळे पुसले,.. “ अग वेडाबाई… असं म्हणतात पहिल्या रात्री काहीतरी भेट द्यावी एकमेकांना. चल उद्या जाऊन अश्याच डिझाईनच्या बांगडया करून घेऊ अगदी गुपचूप आणि तू मला काय गिफ्ट दे सांगू,… “

ती म्हणाली “ काय,.. ?”

तो म्हणाला.. “असाच हिरव्यागार चुडयासारख्या बांगडया भरलेले हात नेहमीसाठी,… माझ्या गळ्यात जे किणकिण वाजत प्रेमाच्या गोष्टी बोलत जातील माझ्याशी,… चालेल ना,.. “

ती लाजून गोरीमोरी झाली.. आता सारख्या त्या हिरव्या बांगडया तिला प्रेमाची आठवण तर देतात, पण त्या मागच्या सोन्याच्या बांगड्या मात्र सोन्यासारखं माणूस आयुष्यात आलं ह्याची सतत जाणीव देतात,… आणि मग तिचे हात आणखीनच खुलुन दिसतात…

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “अन्याभाई” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “अन्याभाई” ☆ श्री मंगेश मधुकर

मध्यरात्र उलटून गेलेली, सगळी सोसायटी चिडीचूप. भटक्या कुत्र्यांचा आवाज सोडला तर एकदम शांतता. इतक्यात मोठमोठ्यानं हॉर्न वाजवत तीन कार वेगानं गेटच्या आत येऊन थांबल्या. त्यातून उतरलेल्या दहा बारा तरूणांनी आरडा ओरडा करत फटाक्यांची मोठी लड लावली. पुढची दहा एक मिनिटं फक्त आणि फक्त आवाज. सगळी सोसायटी जागी झाली. बेधुंद नाचणाऱ्या पोरांकडं वैतागलेले, हतबल सोसायटीकर असहाय्यपणे पाहत होते. त्यांच्यातच ‘शुभा’ सुद्धा होती. सगळ्यांना वाटत होतं पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची हिंमत नव्हती. शुभाला राहवलं नाही. दोन जिने उतरून ती गेटजवळ गेली. पाठोपाठ नवरा होताच.

“ए, बंद करा. अकला नाहीत का. किती वाजले ? ” शुभा किंचाळली पण परिमाण शून्य. मग शुभानं थेट स्पीकरचं बंद केला तेव्हा एकजण ओरडला “ओ बाई, हे काय, कुणाला इचरून बंद केलं”

“वेळ काळ समजते का”

“का? काय झालं”

“वर तोंड करून मलाच विचार”

“इथ दुसरं कोणये? ज्याला इचरू” बोलणारा खी खी करत हसला.

“लोकांना त्रास होतोय.. हा धांगडधिंगा बंद करा”

“आमी आमचा एंजॉय करतोय. कुणाला त्रास देत नाहीये. ”

“सगळ्यांची झोप मोड झाली. इतक्या रात्री धिंगाणा कशासाठी?”

“बड्डे सेलिब्रेशन”

“कोणाचा”

“अन्याभाईचा”

“मग त्याचा त्रास दुसऱ्यांना का? घरी जाऊन सेलिब्रेट करा. फुकटचा तमाशा कशाला?”

“बाई, जरा नीट बोला. सोसायटीत नवीन दिसताय. ”

“महिना झालाय. ”

“तरीच इतकं बोलण्याची डेरिंग करताय”

“तू काय धमकी देतोयेस. ”

“ही सोसायटीच अन्याभाईची आहे”

“असेल मी काय करु. गप घरी जा. आता आवाज नको”

“अजून केक कापायचा नंतर फॅन्सी फटाके.. फुल टू एंजॉय” 

“पुन्हा सांगते. घरी जा”

“बाई, ऐकून घेतो म्हणून जास्त बोलू नका. महागात जाईल”

“सस्ती चिजो का शौक मुझे नही”हिंदीत सुरू झालेली शुभा नवऱ्यानं खांद्यावर थोपटल्यावर गप्प झाली. तेव्हा पोरं चेकाळली आणि जास्तच आरडाओरडा करायला लागली. शुभाचा संताप अनावर झाला. “वा रे वा, एका बाईला गप्प केलं म्हणून एवढी खुशी !!”

“बाई!! काय प्रॉब्लेम आहे ”.. कारच्या बाजूनं आवाज आल्यावर पोरं एकदम गप्प झाली. जवळपास सहा फुट ऊंची, कमावलेलं आडदांड शरीर, लांब उभट चेहरा त्यावर झुपकेदार मिशी, लिननचा पांढरा शर्ट, जीन्स, स्पोर्टस बूट घातलेला एकजण पुढे आला. “मी अन्याभाई !!, काय अडचण आहे. ”अन्याभाईला पाहून शुभा प्रचंड घाबरली पण चेहऱ्यावर उसनं आवसान आणित म्हणाली “नमस्कार दादा”

“हा नमस्कार, मघाशी जे बोलला ते परत एकदा ऐकायचंय”

“जाऊ द्या ना. या पोरांना बोलत होते. तुम्हांला नाही”

“मला का नाही”अन्याभाईच्या अनपेक्षित प्रश्नानं शुभा गोंधळली.

“तुम्हांला कोण बोलणार?”

“का?मला शिंग आहेत”भाईच्या जोकवर पोरं मोठ्यानं हसली.

“हे बघा. रोज रात्री इथं येऊन नाचत नाही. आज बड्डे म्हणून पोरं एंजॉय करतायेत. त्रास होत असेल तर कानात कापूस घालून बसायचं. एक दिवस सहन करा. परत सांगणार नाही. समजलं. चला गुड नाइट!!”अन्याभाईचं प्रेमळ बोलणं शुभाला नेमकं समजलं. पोरं परत नाचायला लागली. फटक्याची लड पुन्हा लावली. बिल्डिंगच्या दाराशी गेलेली शुभा परत फिरली आणि अन्याभाई समोर जाऊन उभी राहिली.

“काय पोलिसाना बोलवायचं”

“नाही हो. तुम्ही असताना पोलिस कशाला?”

“मग काय!!एकदा सांगितलं सहन करा. आता जा”

“एक बोलायचं होतं. चिडणार नसाल तर बोलू”शुभा.

“बिनधास्त, आज आपला स्पेशल दिवस आहे”

“तेच तर सांगायचं होतं. तुमचा वाढदिवस आणि लोकं शिव्या घालतायेत”

“एवढी कुणाची हिंमत, नाव सांगा”

“तोंडावर कुणी बोलणार नाही पण इतक्या रात्री झोपमोड झाल्यावर कुणी कौतुक तर नक्कीच करत नसणार. ”

“बाई, नक्की काय म्हणायचंय”दारूचा वास येऊ नये म्हणून अन्याभाई लांबूनच शुभाशी बोलत होता.

“कसं य दादा, दरवर्षी वाढदिवस असाच साजरा करता. ”

“असाच म्हणजे”

“हेच धिंगाणा, आरडाओरड, चार पाच केक कापणे, फटाके, दारू, मटन वगैरे”

“मग बड्डे अजून कसा साजरा करतात. ”

“एक विनंती आहे. उद्या माझ्या घरी जेवायला या. छान स्वैपाक करते. तुम्हांला काय आवडतं. ”

शुभाचं बोलणं ऐकून अन्याभाई एकदम गडबडला. नक्की कसं रिअॅक्ट व्हावं हेच समजत नव्हतं. खरंतर इतक्या प्रेमानं आतापर्यंत कोणीच बोललं नव्हतं. भाई चक्क इमोशनल झाला. पोरांसाठी हे सगळे फारच नवीन होतं. सगळे एकदम गप्प झाले.

“पाच मिनिटांत आले”म्हणत शुभा धावतच घरी गेली. काय चाललयं कोणालाच काही कळत नव्हतं. जो तो एकमेकांकडे पहायला लागला इतक्यात शुभा परत आली तिच्या हातात ओवाळणीचं ताट होतं.

“हे काय”.. अन्याभाई 

“दादा, वाढदिवस आहे म्हणून तुम्हांला ओवाळते. आपली परंपरा तीच आहे ना”

अन्याभाईनं लगेच डोक्यावर रुमाल ठेवला. शुभानं ओवाळलं तेव्हा गॅलरीत, खिडकीतून पाहणाऱ्यांनी टाळ्या वाजवून शुभेच्छा दिल्या तेव्हा अन्याभाईनं सगळ्यांना हात जोडून नमस्कार केला. बदललेली परिस्थिती पाहून सगळी पोरं एकेक करून निघून गेली. पुन्हा एकदा जेवायचं आमंत्रण देऊन घरी आलेल्या शुभानं काही वेळानं खिडकीतून पाहिलं तर मंदिराच्या पायरीवर एकटाच बसलेला अन्याभाई शर्टाच्या बाहीनं डोळे पुसत होता. ते पाहून शुभाला गलबलून आलं.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आपली माती, आपली माणसं – ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ आपली माती, आपली माणसं — ☆ श्री प्रदीप केळूसकर

 सतीश जनाबाईला सांगत होता “सुरेशचो फोन इल्लो, दहा तारखेक तो मुंबईत उतारतलो, दोन दिवस तेची मुंबईत कामा करून बारा तारखेक चिपी विमानतळावर उतरून हय येतलो, मग परत पंधरा तारखेक परत तुका घेऊन चिपी वरुन मुंबई आणि त्याच रात्री अमेरिकेक जाऊची तिकिटा काढल्यानं तेनी. ”

जनाबाईने डोक्याला हात लावला.

“आता या वयात माका अमेरिकेक न्हेता, माका प्रवास जमतलो रे.. माजी ऐशी सरली ‘

“पण तू हय एकटी रावतास, तेची काळजी वाटता तेका आते..

“अरे पण मी तुज्याकडे रवलंय असतंय, तुजा घर म्हणजे माजा माहेर न्हय… आणि माजो भाऊस म्हणजे तुजो बापूस अजून हयात आसा मा.

 “होय गे आते, पण सुरेश ऐकणा नाय.. मी आणि बाबांनी तेका किती सांगलंय, जनीआते हय रवात.. तेचा माहेर आसा ह्या.. आमच्याबरोबर पेजपाणी खायत.. पण तो ऐकणा नाय, तेचा म्हणणा माजी मुला आता एक आणि तीन वर्षाची आसत, तेंका आजी कशी गावतली आणि आईक पण नातवंडाचे लाड करुषे वाटतले नाय..

नातवंडाचा विषय निघताच जनीबाई गप्प झाली. कल्पनेने तिच्या डोळयांसमोर सुरेशची मुले आली… काय नाव ठेवली.. ती आठवू लागली.. जतीन आणि छोटी जुलिया. जुलियाचे फोटो सुनेने.. कल्पनाने सुरेशच्या मोबाईलवर पाठविलेले.. गोबऱ्या गालाची गोरी गोरी आपली नात.. तिला वाटतं होते.. तिला उचलून घ्यावे.. तिची पापी घ्यावी.. तिला मांडीवर झोपवावं.. तिच्यासाठी अंगाई म्हणावी आणि तीन वर्षाचा नातू.. बूट घालून खेळायला जातो.. त्याला जवळ घ्यावं.. त्याला रामाची, अर्जुनाची, शिवाजी महाराजांची गोष्ट सांगावी. एवढ्या एकाच कारणासाठी तिला अमेरिकेला जावे, असे वाटतं होते.

ठरलेल्या प्रोग्रामप्रमाणे सुरेश आला. मग ती दोघ तिच्या माहेरी भावाला, भावजयला, भाच्याना.. सुनेला.. त्यान्च्या छोटयाना भेटून आली. माहेरहून बाहेर पडताना जनीला रडू कोसळलं… आता कदाचित ही शेवटची भेट.. तिचे भाऊ, वहिनी, भाचा पण रडू लागला. जड पायानी तिने माहेरच्याना निरोप दिला.

दुसऱ्या दिवशी सुरेश आईला घेऊन प्रथम मुंबईला आणि रात्रीच्या विमानाने अमेरिकेस रवाना झाला.

जनीबाईने विमानाचा प्रवास प्रथमच केला, सुरवातीला ती घाबरली.. पण विमान उडू लागताच ती तिची श्रद्धा असलेल्या वेतोबाचे नाव घेत होती.. मग हळूहळू तिची भीती कमी झाली आणि मग तिला झोप लागली.

जनी अमेरिकेत पोहोचली. तिच्या मुलाचे सुरेशचे मोठे घर होते.. आजूबाजूला जमीन.. भरपूर पाणी. तिने नातवंडांना जवळ घेतले. छोटया जुलीयाला ती आंघोळ घालू लागली.. तिला पावडरकुंकू लावू लागली. तिला झोपवू लागली. जतीन थोडा मोठा. त्याला थोडंथोडं मराठी येत होतं.. ती नातवाला गाणी म्हूणन दाखवू लागली, शिवाजीमहाराजांच्या गोष्टी सांगू लागली. थोडया दिवसात मुलांना आजीचा लळा लागला. आता मुलं आजीसोबत झोपू लागली. तिची सून कल्पना पण प्रेमळ, ती पण खूष झाली. तिलापण आपले संस्कार करणारे हवे होते. एकांदरीत आई अमेरिकेत आल्याने कुटुंब आनंदित झाल्याचे सुरेशच्या लक्षात आले.

जनीबाईने मुलाला भाजीची बियाणी आणायला सांगितली. सुरेशने सुपरमार्केट मधून आणुन दिली. सासूसुनेने मिळून भाजी घातली, त्या सुपीक जमिनीत भाजी तरारून वर आली. जनीबाईने फुलझाडे लावली. काही दिवसात ती पण जगली.

 सुरेशची बायको कल्पना गुणी स्त्री होती, तशी ती त्यान्च्याच नात्यातील. ती नोकरीं करत नव्हती, त्यामुळे जेवण, भांडीकुंडी सर्व करत होती. मुलं थोडावेळ आईकडे पण जास्त आजीसोबत असायची.

सुट्टीच्या दिवशी सुरेश आई, बायकोमुलांना घेउंन लांब फिरायला न्यायचा. जनीबाई एवढ्या वर्षात फिरली नव्हती, तेवढी चार महिन्यात फिरली.

सुरेश आणि कल्पनाच्या लक्षात येत होते, आईला अमेरिकेची हवा मानवली, गावात ती सतत उन्हात कामात असायची किंवा एकटीच असल्याने जेवण करायला टाळाटाळ करायची. पण इथे नेहेमी थंडहवामान आणि पौष्टीक जेवण शिवाय नातवंडांची साय, त्यामुळे उजळली होती. सुरेश आणि कल्पना मनात म्हणत होती, आता आईला इथेच ठेवायचे, घरात कोणी मोठे असले की आपल्याला आणि मुलांना पण आनंद होतो.

जनीबाई पण खूष होती, मुलाच्या सुनेच्या घरात कसलाच त्रास नव्हता पण तिला आपल्या घरची आठवण येई, आपल्या नवऱ्याने स्वतः कष्ट करून बांधलेले घर, आजबाजूची झाडें, घरातील देव.. जोडलेली माणसे.. नातेवाईक.. भाऊ वहिनी भाचा, त्याची मुले आणि तिची श्रद्धा असलेला देव वेतोबा.. ती सकाळी जाग आली की डोळ्यसमोर वेतोबा आणि त्याला नमस्कार करी. पण आपले थोडे दिवस राहिलेत, याची तिला कल्पना होती, शेवटचे दिवस मुला-सुनेसोबत नातवंडासोबत काढावेत, असे मनाला बजावत ती जगत होती.

आणि एका दिवशी ती सकाळी उठली, तेंव्हा तिचा मुलगा सुरेश घराच्या काचेतून बाहेर पहात होता, कल्पना पण त्याच्यासमवेत होती. सुरेश कुणाबरोबर इंग्लिशमध्ये मोठ्याने बोलत होता. कल्पना काळजीत दिसत होती.

सुरेशचे फोनवरील बोलणे संपल्यावर जनीबाईने विचारले “काय झाला रे?

सुरेश म्हणाला “या शेजारच्या बंगल्यातील रुसेलची मम्मी वर गेली, रुसेल बाहेरगावी गेलोवा, तो रात्रीपर्यत येतोलो.

“अरे बापरे, म्हणजे तोपर्यत सगळ्यांका वाट बघुक होयी.

“छे, अमेरिकेत कोण कुणाची वाट बघणत नाय, रुशेलने म्युनिसिपलतिक फोन केल्यानं, तेंची ऍम्ब्युलन्स येतली आणि बॉडी घेऊन जातली ‘.

“अरे मग जाळतले खय?

“इकडे जाळनत नाय, पुरतत.. ता काम म्युनिसिपलटी करता.

“अरे मग आमच्या देशातील लोक या देशात वर गेलो तर?

“तर तेका विद्युतवाहिनी असता, म्हणजे आत ठेवला आणि बटन दाबला की शरीराची राख होता.

“मग ह्या देशात लाकडा मिलनात नाय जाळूक?

“तेची बंदी आसा. या देशात कोणी मेलो तर या देशाचे नियम पाळूक लागतात. आपल्या भारत देशासारख्या नाय..

जनीबाईच्या डोक्यात गोंधळ उडाला. तिने तिच्या जन्मापासून मेलेल्या माणसाला जाळताना पाहिले होते. या देशात हे सर्व नवीनच, तिच्या पदरी पडणारे नव्हते.

थोडयावेळाने तिने मुलाला विचारले “मग तेचे अस्थी कसे गावातले?

“इकडे अस्थी वगैरे काय नसता गे, अस्थी वगैरे आपल्या देशात. माणूस मेलो काय संपलो.

“मग तेचा पुढचा सुतक.. ?

“या देशात सुतक कोण नाय पाळणा. कोणाक वेळ नसता.. जो तो कामात.

“मग अकराव्या.. बाराव्या?

“ते विधी भारतात.. आपल्या देशात, या देशातील लोक असला काय मानीत नाय.. ”

“मग त्या रुशेलची बाकी नातलगा? भाऊ, बहीण, आते, मामा मामी भाचे ते येतले मा भेटुक?

“सगळे फक्त प्रार्थना करतले चर्चमध्ये. आणि मेसेज पाठवतले दुःखाचे..

एकएक गोष्टी ऐकून जनीबाई आश्चर्य करीत राहिली.

या देशातील काय ह्या पद्धती? आपल्या देशापेक्षा एकदम उलट?

मग तिने सुरेशला विचारले “तू त्या रुशेल, भेटाक जातलंस मा?

“छे, मी मेसेज पाठवलंय कंडोलन्स चो, म्हणजे आपण श्रद्धांजली म्हणतो तस. ”

“बस एवढाच. ?

हे म्हणत असताना शेजारी ऍम्ब्युलन्स आली, त्यातील चार माणसे खाली उतरली, त्यानी घरात जाऊन बॉडी उचलली, दरवाजा उघडून आत ठेवली आणि ऍम्ब्युलन्स आवाज करत निघून गेली.

जनाबाई हादरली, अमेरिकेत मरण आलं तर? आपलं वय झालेलं, कधीही वर जायची तयारी हवी आणि मी मेल्यानंतर मला म्युनि्सिपलटीचे लोक ऍम्ब्युलन्स मधून घेऊन जाणारं आणि मला त्या शेगडीत घालणार? आणि माझे अस्थी? त्याचा विसर्जन… काही नाही.. कोणी तरी गोणीत भरून नदीत टाकणार? माझा मुलगा तरी असेल काय अंतिम कार्याला? माझी सून.. नातवंडे.. कोणी नाही.. माझा भाऊ.. भावजय.. भाचा.. सून. शेजारीपाजारी? कोणी म्हणजे कोणी नाही? मी गेल्यानंतर कोण रडणार नाही.. कोण कोणाला भेटायला येणार नाही.. सांत्वन करायला कोण नाही? नुसते मेसेज दुःखाचे.. कसले मेले कोरडे मेसेज?

छे छे.. माझ्या अस्थी मी या देशात टाकणार नाही.. माझ्या अस्थी माझ्या मातीत.. माझ्या देशाच्या मातीत -माझ्या माणसात…”

जनीबाई अस्वस्थ होऊ लागली, तिला झोप येईना, जेवण गोड लागेना, नातवंडांना जवळ घेऊन ती शून्यात पाहू लागली, शेवटी तिने धीर करून सुरेशला सांगितले 

“सुरेश, माझा वय झाला, आता केव्हाय वर जाऊची तयारी करूंक व्हयी, पण ह्या देशात मराची माझी तयारी नाय.

“अगे आई, काय बोलतस तू? आमी आसवं मा तुझ्यासोबत?”

“जिता आसय तोपर्यत तुमी आसात, मी मेल्यावर तू म्युनि्सिपलटीक फोन करून सांगतलंस, ही बॉडी घेऊन जावा म्हणून… त्या रुशेलच्या आईक नेला तसा.. माका आसा बेवारशी मराचा नाय आसा.. माका माझ्या माणसात मराचा आसा.. माजे अस्थी भोगव्याच्या कोंडीत पडात होयेक.. थयसून देवबागच्या संगमात विरघळूक होयेत.. “

“आई, काय तरी तुजा? तू एवढ्यात कशाक वाईट गोष्टी बोलत? तुका मोठा आयुष्य आसा?”

“नाय बाबा, माजी खात्री नाय, तू माका माज्या भावाकडे पोचव… मी थय आनंदान रवान.. मग मेलंय तरी हरकत नाय.. माज्या देशात माज्या मातीत.. माज्या माणसात..

सुरेश आणि कल्पनाने खुप समजावण्याचा प्रयत्न केला, पण जनीबाई काही ऐकेना.

आई जेवायची पण बंद झाली हे पाहून सुरेशने मामांना फोन लाऊन सर्व सांगितले, त्यानी तिला आनंदाने इथे घेऊन ये म्हणून कळविले.

सुरेश आईला घेऊन मामाकडे आला. या घरातील सर्वांनी तिला खुप प्रेम दिले, सुरेशच्या मुलांना आजीची सवय झाली होती, त्यामुळे दरवर्षी ती चौघे भारतात येऊन राहू लागली.

जनीबाई पुढे पाच वर्षे जगली. लहानश्या आजाराचे निमित्त होऊन ती गेली. सर्वजण तिच्यासाठी रडली. तिच्या भाच्याने सतीशने तिला अग्नी दिला. अनेक नातेवाईक, शेजारी, गाववाले भेटून गेले. पाचव्या दिवशी सुरेश, कल्पना अमेरिकेहून आली, तिच्या अस्थी तिच्या इच्छेप्रमाणे भोगव्याच्या कोंडीत सुरेशने विसर्जित केल्या. तिचे अकरावे, बारावे सुरेशने केले…

आणि तिच्या पिंडाला कावळा पटकन शिवला…

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कृतज्ञता… लेखिका – सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ कृतज्ञता… लेखिका – सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

टिना दिवसभर काम करून दमली होती. टेक्सासची अति गरम हवा, दिवसभरचा शीण आणि चालत घरी जाण्यास लागणारा वेळ या तिन्ही गोष्टी तिची दमणूक अजून वाढवत होत्या! 

खरतर ती घराजवळच्या मेकडॉनल्डस मध्ये नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात होती पण तिला तिथे नोकरी मिळाली नाही. पण त्याचाच भाऊ असलेल्या बर्गर किंग या बऱ्याच लांब असलेल्या रेस्टॉरंटमध्ये गाडीतून ड्राईव्ह थ्रु मधे येणाऱ्या गिर्हाईकांकडून ॲार्डर घेऊन ती भरून देण्याची नोकरी मिळाली होती.

तिशीच्या घरातील टिना, तिचा नवरा व तीन मुले टेक्सासमधील एका लहान गावात रहात होते. नवऱ्याला डायबेटिस होता. लहान मुले, नवऱ्याचा आजार व प्रपंचाचा खर्च चहू बाजूंनी वाढतच होता. काही ना काही करून घरखर्चाला मदत करावी म्हणून मिळेल ती नोकरी तिने पत्करली होती. बर्गर किंग हे रेस्टॉरंट मात्र तिच्या घरापासून खूप लांब असल्याने रोजच्या चालत येण्याजाण्यात बराच वेळ जात होता. गाडी विकत घ्यावी अशी परिस्थिती नव्हती. हळूहळू पैसे जमा करून प्रथम गाडी विकत घेण्याची जरूर होती.

टिनाबरोबर वाढलेली गावातील इतर मुले उत्तम पगाराच्या नोकऱ्या मिळवून बसली होती. तिच्या घरची परिस्थिती अगदी बेताची असल्याने टिनाला कॉलेजला जाता आले नव्हते. आपण लोकांना बर्गर आणि कॅाफी विकत बसतो आणि आपल्या बरोबरची मुलं केवढी पुढे जात आहेत याची खंत होती पण इलाज नव्हता.

एक दिवस सकाळी ती नेहमीप्रमाणे बर्गर किंग मधे पोचली. कमरेला अॅप्रन लावून तिनं बर्गर, सॅंडविचेस, चहा, कॅाफीची तयारी सुरू केली. ड्राईव्ह थ्रू मधून दिसलेला गाड्यांची लांब रांग बघून तिचे हात वेगाने हलू लागले. क्रसांट या लांबट फ्रेंच ब्रेडवर अंड्यांचं ॲाम्लेट व चीज बसवून त्यावर दुसरा क्रसांट ठेऊन ती क्रसांटविच भराभर तयार करत होती. गिऱ्हाईकाच्या ॲार्डर हसऱ्या चेहऱ्याने पुरी करत होती.

ड्राईव्ह थ्रू मधील पुढची गाडी माईक जवळ आली.

Welcome to Burger King. May I help you? तिने विचारले.

तिकडून काही आवाज आला नाही. समोरच्या कॅमेऱ्यात तिला गाडीत बसलेली बाई दिसत होती.

ती परत म्हणाली, ”M’am, can I help you ?”

“ Ya.. Yess.. “ ती बाई बोलतच नव्हती. मागे गाड्यांची रांग खोळंबली होती..

“M’am, are you okay?” टिनाने काळजी वाटून विचारलं.. What’s your name?”

“Rebecca… I have diabetes… I.. I want to … order…” असं काहीतरी बोलून ती बाई परत बोलेनाशी झाली.

डायबिटीस आहे हे ऐकताच टिनाच्या डोक्यात प्रकाश पडला. तिनं भरकन एका उंच कपात आईसक्रिम भरले. रेस्टॉरंट मधून बाहेर पडून सुसाट धावत.. पळत.. गाड्यांच्या रांगेतून मार्ग काढत ती त्या बाईच्या गाडीजवळ पोचली. तिने भराभर दोन तीन चमचे आईस्क्रीम त्या बाईला भरवले. ते खाताच त्या बाईच्या नजरेत थोडा सावधपणा दिसू लागला..

“रिबेका, गाडी साईडला बरोब्बर माझ्या खिडकीसमोर पार्क कर व हे सर्व आईस्क्रीम संपव. ते संपल्यावर मी जा म्हणेपर्यंत कुठेही जायचं नाही. गाडीतच बसून राहायचं. OK? मी जाते आत पुढच्या ॲार्डर घ्यायला. ” टिना धावत आत गेली.

ॲार्डर्स घेताना आणि त्या भरताना तिचं त्या बाईकडे सतत लक्ष होतं. जरूर पडल्यास 9-1-1 ला फोन करून ॲम्ब्युलन्स बोलवायचा विचार करत ती काम करत होती. आता त्या बाईला आईस्क्रीम खाऊन मधे चाळीस मिनिटे गेली होती.

ती बाई गाडीतून उतरली व चालत आत गेली. ती टिनाला म्हणाली, “मी रिबेका बोनिंग. ” व तिने टिनाला मिठी मारली.

ती म्हणाली, “ टिना, तू आज वाचवलस मला ! मी हायवेवर गाडी चालवत कामाच्या मिटिंगसाठी निघाले होते. अचानक मला कसंतरी व्हायला लागलं. माझी ब्लड शुगर नक्की ड्रॉप झाली असणार कारण माझे हात पाय थरथरू लागले.. दरदरून घाम येऊ लागला.. हृदयाची गती खूपच वाढली होती. या सर्व लो ब्लडशुगरच्या खुणा आहेत हे मला माहित होते. तेवढ्यात हे बर्गर किंग दिसलं म्हणून मी इथे आले. एकसष्ट वर्षं वय आहे माझं.. पुढे काय झाले फारसे आठवत नाही. मागे एकदा असं झालं होतं.. मी काही ॲार्डर केलं का?”

“नाही.. तुला बोलता येत नव्हतं.. माझ्या नवऱ्याला पण डायबिटीस आहे. त्याची ब्लडशुगर ड्रॉप झाली की त्याला पण धड वाक्य पूर्ण करता येत नाहीत.. अशा वेळी पटकन शुगर द्यावी लागते त्यामुळे मला हा प्रकार चांगलाच माहित आहे. तेवढच मी केले.. विशेष काही नाही. ” टिना मनापासून म्हणाली.

आपल्याला असणाऱ्या माहितीचा एका व्यक्तीला डायबेटिक कोमामधे न जाऊ देण्यास उपयोग झाला म्हणून टिना आनंदात घरी आली.. घरी नवरा नैराश्यात बसला होता.. आपला काही उपयोग नाही कुणाला ही भावना हल्ली त्याला सतावत होती.

टिनानं त्याचे हात पकडले व ती म्हणाली, “ हनी, तुला वाटतं ना आपला काही उपयोग नाही? मग ऐक. तुझ्यामुळे आज एक व्यक्ती जगली आहे !” तिने सारी हकिकत त्याला सांगितली..

“आपण पैसे जमवून नक्की गाडी घेऊ. मी तुला कामावर पोचवून मग माझ्या कामाला जाईन म्हणजे तुला चालत जावं लागणार नाही.. तू काळजी करू नको ” म्हणत तिने एक अगदी जुनी गाडी फेसबुक मार्केटप्लेस वरून त्याला दाखवली.

“ममा, तू आम्हाला गाडीतून शाळेत पोचवशील?” मुलांनी विचारले. त्यांना नक्की पोचवेन म्हणत ती स्वयंपाकाला लागली.

दोन आठवड्यांनी एक दिवस सकाळी टिना कामाला जाण्यास निघाली. घराबाहेर पडताच अंगणात रिबेकाला बघून ती थक्क झाली. रिबेका एका नव्या चकचकीत गाडीत बसून आली होती.. त्या गाडीवर लाल रिबनचा बो लावला होता. अगदी गाड्याच्या शोरूममधून थेट टिनाकडे ती गाडी आली होती.

रिबेकाने गाडीच्या किल्ल्या टिनाच्या हातात दिल्या..

“टिना, ही आहे तुझी नवी गाडी ! तू मला ज्या दिवशी डायबेटिक कोमामध्ये जाण्यापासून वाचवलंस त्या दिवशी मी सोशल मिडियावर हा अनुभव शेअर केला.. माझ्याजवळ तुझ्यासाठी नवी गाडी घेण्याएवढे पैसे नव्हते म्हणून मी वाचकांना, तुझ्यासारख्या व्यक्तीला आपण गाडी देऊ शकतो का, विचारले आणि त्यांनी भरभरून देणग्या दिल्या ! त्या पैशातून तुला गाडी घेतली. तुझे आभार कसे मानायचे कळत नव्हते.. या गाडीच्या रूपाने मी माझी कृतज्ञता व्यक्त करत आहे ! या माझ्या पोस्टला ४८८, ००० लाइक्स आणि २०७, ००० शेअर आले होते ! 

टिना, तिचा नवरा आणि तीन मुले अवाक होऊन त्या चकचकीत नव्या गाडीकडे बघत होते ! एक स्वप्न साकार झालं होतं ! 

स्वतःचा काहीही फायदा नसताना केले गेलेले सत्कर्म कधीही वाया जात नाही. अगदी साध्या नोकरीमध्ये सुद्धा आपण एखाद्याचे भले करू शकतो कारण No job is too small !

आपले जीवन समृद्ध करणारे असे अनेक जीव जगात आहेत.. त्यांना धन्यवाद देण्याचा हा आठवडा आहे !

Happy Thanksgiving to all my readers!

लेखिका – सुश्री ज्योती रानडे

(दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील शेवटच्या गुरुवारी अमेरिकेत “कृतज्ञता दिवस ” (Thanks-giving Day) साजरा केला जातो. आपले आयुष्य समृद्ध करणाऱ्या व्यक्ती, घटना, अन्न, पाणी, निवारा अशा अनेक गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आपल्या आयुष्यात असे काही लोक येतात जे आपल्या ओळखीचे नसतात पण ते आपले आयुष्य बदलून टाकतात. कोविड काळात ईश्वराच्या वेशात आलेले डॉक्टर, नर्स, ॲम्ब्युलन्स-चालक वगैरेना कोण विसरेल? टिना हार्डी ही एक सामान्य मुलगी आहे. तिची आजची गोष्ट ही खरी घडलेली गोष्ट आहे.) 

प्रस्तुती –  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ घर दोघांचं… ☆ सौ.प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ घर दोघांचं… ☆ सौ.प्रभा हर्षे

संंध्याकाळी फिरून आले तो सात वाजले होते..

आज उशीर झाला असं म्हणत म्हणत कॉफी ठेवली गॅसवर. आत्ता येइल सुमा, पर्स फेकेल आणि जोरात आवाज देइल ‘ मी आले ग ! ‘ फ्रेश होऊन कॉफीचा घोट घेईल आणि आनंदात ओरडेल.. “ बेस्ट ! मला शिकव न अशी कॉफी करायला !” 

मी रोज तिच्याकडे अचंब्याने पहाते. गॅस जवळही न जाता ही कशी कॉफी करायला शिकणार आहे. मात्र सकाळचा नाश्ता ती अगदी सुंदर बनवते म्हणून हा गुन्हा माफ !

ही सुमा माझी भाची ! अगदी लाडकी भाची ! तीन वर्षांपूर्वी दादाने अगदी हौसेने लग्न करून दिले. पण सासरी गेलेली सुमा सहा महिन्यात परत आली ती अगदी रया गेलेली मुलगी होऊन ! तिची ही अवस्था पाहून दादाने तर हाय खाल्ली आणि हार्टचे दुखणे घेऊन बसला. मी सुमाला बदल म्हणून माझ्याकडे घेऊन आले. पोस्ट ग्रॅज्युएशन करायला लावले. पोरगी हुशार. कँपसमध्ये सिलेक्शन होऊन नोकरीला पण लागली. आता दादा वहिनी मागे लागले.. ‘ परत लग्नाचे बघुया का म्हणून !’ पण अं हं ! सुमा लग्नाचे नाव काढू देत नाही.

माझ्याकडच्या या साडेतीन वर्षांत सुमाने मला कधीही आपल्या सासरी काय बिनसलं आणि आपण का परत आलो याबद्दल एक शब्दही सांगितला नाही. कधी मी विचारले तर ती म्हणायची, “आत्तु, ती दोन वर्ष मी माझ्या आयुष्यातून काढून टाकली आहेत. ” 

पण आज अघटितच घडले…. कॉफीचा मग खाली ठेऊन सुमा स्तब्ध बसून राहिली. डोळ्यात पाणी तरळतय असं मला उगाच वाटल.

तिच्या हाताला स्पर्श करत मी विचारले, “ का गं ! बरं नाही वाटत का ? काही होतंय का ? ऑफिसमध्ये काही झालं का ?” 

सुमा काहीच बोलली नाही. पाच मिनिटे अशीच शांततेत गेली

आणि मग हलक्या आवाजात तिने सांगितले, “ आज तनय आला होता ऑफिसमध्ये. ”

“ तुला भेटायला ?” मी आश्चर्यचकित होऊन विचारले

“ नाही, अगदी तसंच नाही, पण मी तिथे भेटीन अशी कल्पना असावी त्याला. ”

“ बरं, पण म्हणाला काय ? ” 

“ घरी येतो म्हणाला. तुझा पत्ता दिलाय. ” 

“ अगं पण तुमचे काय बिनसलंय याची मला काहीच कल्पना तू कधी दिली नाहीस. मी असं करते, थोडा वेळ बाहेर जाते. ” 

“ नको नको आत्तु ! तूच माझी या सगळ्यातून सुटका करशील. ” 

मी कॉफीचे मग उचलता उचलताच बेल वाजली. दारात तनय उभा !

“ ये ना आत ! “ – तो सोफ्यावर टेकला, मात्र अवघडून बसला. मला कससंच झालं, कुठे तो हसरा उमदा मुलगा आणि कुठे हा नाराज, खांदे पाडलेला, अकाली पोक्त झालेला जावई !

“ ऑफिस मधून परस्पर आलास का !”.. कोणी तरी सुरवात करायला पाहिजे म्हणून मी विचारले. त्याची मान होकारार्थी हलली.

“ हा घे टॉवेल ! बेसीनवर फ्रेश हो ! मी कॉफी करते.. का चहा करू ?” मी विचारले.

“ कॉफीच करा आत्या !” 

मी कॉफी करायला वळले आणि सुमा आत आली. तेवढ्यात तिने ड्रेस चेंज केला होता. मलाही बरं वाटलं. ‘चला, कॉफी जरा जास्त वेळ लावून करावी. ’…..

हॉलमध्ये चाललेले संभाषण थोडे थोडे कानावर येतच होते.

“ अरे, किती मी माझे मन मारायचे ? त्याला काही सुमार ? तुला चांगला पगार, सुख सुविधा मिळतात हे तुझ्या आईला आवडत नाही याचं खरंच आश्चर्य वाटतं मला… पण ठीक आहे. पण त्याचा राग माझ्यावर का काढायचा त्यांनी ? तू सांग, त्यांचे माहेर गरीब म्हणून माझ्या आई वडिलांनी मला काहीही द्यायचे नाही, माहेरी बोलवायचे नाही.. असं कुठे असतं का ? मी साधी कॉफीही घ्यायची नाही. का? तर घरात फक्त चहाच आणला जाईल म्हणून ! इतकी मन मारायची मला नाही रे सवय ! मग खायला काही बनवायचे वगैरे तर स्वप्नात पण शक्य नाही. मी खरंच तुमच्या घरी राहू शकत नाही. माझा जीव घुसमटतो. सकाळी सातला केलेली भाजी रात्री आठला जेवायला माझ्या नाही घशाखाली उतरत ! हे बघ.. मला त्यांचा अनादर नाही करायचा. पण मन मारत जगण्यापेक्षा मी माझा स्वतंत्र मार्ग निवडला. मला तुझी अवस्था कात्रीत सापडल्यासारखी करायची नाहीये.. खरंच सांगते. म्हणून मी तुझ्याकडे डायव्होर्स मागितला नाही. मला आशा आहे, कधीतरी ही परिस्थिती बदलेल, तुला माझी बाजू पटेल. मला तुझ्या बरोबर संसार करायचाय तनय ! हो …. पण मोलकरीण म्हणून तुमच्या घरात राहून नाही, तर कुटुंबातील एक सदस्य म्हणून रहायचंय मला ! “ 

…… सुमा बांध फुटल्यासारखी बोलत होती. तनयही शांतपणे ऐकत होता. मीही ऐकत होते. किती ओझं मनावर ठेवलं होत पोरीने मुकाट्याने ! हीच तिच्या समंजसपणाची पावती होती.

मी कॉफी टिपॉयवर ठेवली.

“ जरा ऐक ना माझे ! “ आता बोलायची पाळी तनयची होती.

“ मी तुझे सगळे ऐकतोय. तुझ्या परीने तू बरोबर पण आहेस. पण ते माझे आईवडील आहेत. असं अचानक मी त्यांना सोडू नाही शकत. ही बघ… नवीन ब्लॉकची कागदपत्रे. मी मागच्या आठवड्यात आपल्यासाठी घर शोधलंय. एक तारखेला पझेशन मिळेल. जुन्या घराचे सर्व कर्ज फेडून मगच मी फक्त आपल्यासाठी हे घर घेतलंय… आणि तुला परत बोलवायला आलोय. आपण तुझ्या आईबाबांना हे सर्व सांगू. आणि आपल्या घरी जाऊ. आता मला अजून वाट बघायला लावू नकोस गं … तुझ्या इतकाच मीही विरहात कसेतरी दिवस काढतोय गं सुमा ! “ 

बोलता बोलता तनयने सुमाचे दोन्ही हात घट्ट पकडले….. शब्दापेक्षा स्पर्श नेहेमीच अधिक बोलका असतो ना … 

सुमाचा आणि तनयचा खुललेला चेहरा पाहून मी पण अगदी खूष झाले. जिंकलं बरं पोरीने !!

सुश्री प्रभा हर्षे

 ९८६०००६५९५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ व्यवहारापलीकडचं नातं… भाग – २ – लेखिका – सुश्री मिताली वर्दे ☆ प्रस्तुती – सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ?

☆ व्यवहारापलीकडचं नातं… भाग – १ – लेखिका – सुश्री मिताली वर्दे ☆ प्रस्तुती – सौ राधिका भांडारकर ☆

(मी तिला विचारले, ‘तू पासबुक का भरून घेतलं नाहीस?, वेळेत पासबुक भरलं असत तर तेव्हाच समजलं असत. ते वाचून ती रडायला लागली. पैसे भरलेली रक्कम थोडीथोडकी नाही तर सव्वा लाख रुपये एवढी होती.) – इथून पुढे 

तिने मला तिची कहाणी सांगितली. तिचा नवरा दहा वर्षांपूर्वी मलेरियाने वारला. तो मुन्सिपाल्टीच्या शाळेत शिक्षक होता. घरी गरिबी असली तरी वातावरण शिस्तीचं आणि सचोटीच होत. मुलगा दहावीत शिकत होता. शिकायला बरा होता. नवराच त्याचा अभ्यास घेत असे. नवऱ्याच्या मृत्यूनंतर, त्याच्या येणाऱ्या तुटपुंजा पेन्शनवर तिने आपल्या एकुलत्या एक मुलाला वाढवला… “ मुलगा इंजिनिअर असून बंगलोर येथे आपल्या बायको मुलांबरोबर राहतो. त्याने स्वतःच लग्न जमवलं. मी त्याच्या घरी सहा वर्ष मोलकरणीसारखी राहिले. अगदीच सहन झालं नाही म्हणून आमच्या घरी परत आले. आता आमचा संबंध नाही. नवऱ्याचं पेन्शन मला पुरतं. पण हे पैसे माझ्या नवऱ्याचे कष्टाने कमावलेले होते. तो नोकरीनंतर शिकवण्या करीत असे व दर महिन्याला मी ते पैसे खात्यात भरत होते. मी परत आल्यावर मला मी भरलेल्या पैशाची आठवण झाली. मी गेली तीन वर्ष बँकेत खेपा घालत आहे, कोणीही माझं म्हणणं ऐकून घेतलं नाही व मला वेड्यात काढलं. “

“तुम्ही मला पुरावा आणायला सांगितला आणि मी घर धुंडाळल, तेव्हा जुन्या हिशोबाच्या वहीत मला ह्या पावत्या मिळाल्या. आता माझे पैसे मला मिळवून द्या. मी तिला स्पष्टच सांगितलं मला पंधरा दिवसाची मुदत हवी, मला प्रथम त्या शहा नावाच्या इसमाला शोधायला लागेल. नंतर त्याने दहावर्षांनंतर तुझे पैसे दिले तर बरच आहे. कुलकर्णी बाईंनी डोळ्यात प्राण आणून माझ्याकडे बघितले व हात जोडून मला म्हणाली मॅडम काहीतरी करा, मी तुमच्याकडे खूप आशेने आले आहे. ”

माझ्या रोजच्या कामात मला एक नवीन काम मागे लागलं. मी शहांच्या पत्यावर दहिसरला माणूस पाठवला. शहा फॅमिली ते घर विकून मोठ्या घरात कांदिवली येथे राहायला गेली होती. माझ्या मनात आलं, दहिसर येथून हा माणूस मुलुंडला बँकेत का येत असावा? ‘शोधा म्हणजे सापडेल’ या उक्ती प्रमाणे त्याचं ऑफिस मुलुंड येथे आहे हे समजलं. माहिती काढली असता तो माणूस मुलुंड येथील ऑफिसात मोठ्या हुद्यावर आहे व तो काही महिन्यात रिटायर होणार आहे असे समजले. आता मात्र मला लवकरात लवकर स्वतःच शहाची भेट घ्यावी लागणार होती. मी एकदा दुपारी लंच टाइममध्ये त्याच्या ऑफिसात गेले. रिसेप्शनिस्टला मी बँकेतून आले असे सांगून शहांची भेटीची वेळ मागितली. शहांनी चार दिवसांनी मला संध्याकाळी सहा वाजताची वेळ दिली. त्यांना भेटणार कधी व मी मुलुंहून मालाडला माझ्या घरी पोचणार कधी हा विचार माझ्या मनात आला.

चार दिवसांनी गुरुवारी मी त्यांना भेटायला गेले. मला बघितल्यावर ते म्हणाले, “ मी तुमच्या बँकेतील खाते कधीच बंद केले आहे, पण तुम्ही स्वतः आलात म्हणून मी तुम्हाला वेळ दिली, ”.. मी त्यांना थोडक्यात सगळ्या परिस्थितीचा अंदाज दिला, त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी बँकेच्या हलगर्जीपणावर ताशेरे ओढले. ‘बरं झालं मी असल्या बँकेतील खात बंद केलं ‘ असं देखील ते म्हणाले. त्यांनी दुसऱ्याचे पैसे त्यांना मिळाले ही गोष्ट अमान्य केली. ते म्हणाले “ माझ्या खात्यात लाखोने रुपये पडून असतात. ठराविक रक्कम सोडली तर मी पैशाला हात देखील लावत नाही. माझा प्युन पासबुक भरून आणून माझ्या खणात ठेवतो. माझे हे एकच खाते नाही. माझी वेगवेगळ्या बँकेत चार खाती आहेत. आमचे किराणामालाचे दुकान आम्ही भाड्याने चालवायला दिले आहे. त्याचे पैसे कोणी इथे भरत असेल. मी पैशाचे व्यवहार फारसे बघत नाही. दहा वर्षापूर्वी माझ्या सीएने सुद्धा ह्या छोट्या रकमांवर आक्षेप घेतला नाही. मला कसं समजणार हे माझे पैसे नाहीत ते. ही संपूर्ण बँकेची चूक आहे. ” 

मी सुद्धा मुरलेली होते. मी त्यांच्या खात्याचं स्टेटमेंट घेऊन गेले होते. मी त्यांना कुलकर्णीबाईंनी दिलेल्या पैसे भरलेल्या पावत्यांची झेरॉक्स कॉपी दाखवली. त्या बाईचे आणि तिच्या सद्यःपरिस्थितीचे वर्णन केले व तुमच्या सद्सदविवेक बुद्धीला पटेल तेच करा असे सांगून सात वाजता त्यांच्या ऑफिसातून निघाले. घरी जाताना माझ्या डोळ्यासमोर कुलकर्णीबाईचा चेहेरा उभा राहिला. पै पै साठवून चुकीचा खाते नंबर घालणारी ती बाई दोषी, की भरमसाट पैसे मिळवूनदेखील फारशी व्यवहारी वृत्ती नसलेले, बँकेचे खाते न तपासणारे हे शाह दोषी, की दहा वर्षांपूर्वी चुका करणारे बँक कर्मचारी व ऑफिसर दोषी.

दुसऱ्या दिवशी मी कुलकर्णीबाईला मी शहांना भेटल्याचे सांगितले. पुढे काय करायचे ते नंतर बघू म्हणून फोन ठेऊन दिला. पंधरा दिवसांनी दिवाळी होती. बँकेने कार लोनसाठी नवीन ड्राइव्ह काढली होती. कमी इंटरेस्ट रेट ठेऊन नवीन ग्राहक शोधा असा बँकेचा आदेश होता. कमीतकमी पाच कार आणि पन्नास लाख रुपयाचे लोन डिसबर्स करावे असे बँकेने फर्मान काढले होते. बॅंकभर लोनचे पोस्टर लावले होते. दारातच कार लोनच्या जाहिरातीचा स्टँडही होता. मी सहा कारसाठी लोन दिले पण लोनची रक्कम पंचेचाळीस लाख होती. मी सुद्धा खूप धावपळीत होते. एक पाच लाखाचं लोन डिसबर्स केलं की माझं टार्गेट होणार होत. अजून दोन दिवस माझ्या हातात होते.

या गडबडीत ग्राहकांचा वेळ संपला. बँकेचं शटर बंद केलं व आम्ही सगळे डबा खायला बसलो. तेवढ्यात गुरखा सांगायला आला, एक माणूस तुम्हाला भेटायला आला आहे. गाडीत बसला आहे. मी डबा बंद केला आणि त्या इसमास आत पाठवायला सांगितले. दोन माणसांनी त्या इसमास उचलून आणून माझ्या समोरच्या खुर्चीत बसवले. त्या माणसाच्या पायात ताकद नव्हती, ते नुसतेच लोमकळत होते. जवळ आल्यावर लक्षात आलं पाय नाही तर घातलेल्या पँटचे पाय लोमकळत होते. त्या माणसाला पायच नव्हते. ते दुसरे तिसरे कोणी नसून शहा होते. त्या दिवशी तर मला त्यांना पाय नाहीत हे समजलच नव्हतं. मी त्यांना पाणी दिलं. त्यांच्यासाठी चहा मागविला. मला काय बोलावं ते क्षणभर सुचलंच नाही. ते का बरं आले असतील? ह्याचा मी विचार करू लागले. त्यांनी खिशातून एक लाख पंचाहत्तर हजाराचा चेक काढून दिला. खात्यातील एक लाख पंचवीस हजार आणि दहा वर्षाचं त्यांनी पैसे वापरले त्याचे मूल्य म्हणून पन्नास हजार. चेक सीमा कुलकर्णीच्या नावाने होता. शहा म्हणाले मी आजच रिटायर झालो. काल रात्री मला झोप आली नाही. अनावधानाने का होईना मी दहा वर्ष कोणाचे तरी पैसे वापरले ह्याचे मला वाईट वाटले. तुम्ही बाईचे केलेले वर्णन ऐकून तिला पैशाची किती निकड असेल आणि हे तिचे हक्काचे पैसे आहेत. हा चेक तुम्ही तिला द्या. त्यांचे पाय ऍक्सीडेन्ट मध्ये कापावे लागले असे त्यांनी सांगितले. चहा पिताना ते ब्रँचमधील पोस्टर न्याहाळत होते.

“ही माझी गाडी ऑफिसची आहे. मी दहा लाखाची नवीन गाडी बुक केली आहे. नोकरीत असतो तर तुमच्याकडून लोन घेतलं असत “ असं ते म्हणाले. मी म्हणाले “ तुम्ही दहा लाखाचं फिक्स्ड डिपॉझिट माझ्या बँकेत ठेवलं तर मी दहा लाखाचं लोन तुम्हाला स्पेशल केस म्हणून सॅंक्शन करून देईन. तुम्ही ते लोन तीन वर्षात फेडा. तुमची रिसीट बँकेकडे सिक्युरिटी म्हणून राहील. ” शहा लगेच तयार झाले. सगळ्या फॉर्मॅलिटी पटापट झाल्या. माझे पाच कार व पन्नास लाख लोन हे टार्गेट पूर्ण झाले. शहांचे नवीन खाते उघडून घेतले. शहासारख्या निर्मळ मनाच्या माणसाची ओळख झाली.

दुसऱ्या दिवशी मी कुलकर्णीबाईला बोलावून घेतले. तिच्या हातात मी एक लाख पंचाहत्तर हजाराचा चेक ठेवला. तिला झालेला आनंद वर्णनातीत होता. आज ती आनंदाने रडत होती. तिचे डॉरमन्ट झालेले खाते मी सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण करून नॉर्मल केले, जेणेकरून ती तो चेक तिच्या खात्यात भरू शकणार होती.

दोन दिवसाने दिवाळी होती. ब्रँच कंदील लावून व दिव्यांची रोषणाई करून सजवली. दिवाळीच्या दिवशी आम्ही सगळे जण नटून थटून ब्रँचमध्ये आलो होतो. सालाबादप्रमाणे ग्राहक मिठाईचे बॉक्स आणि भेटवस्तू आणून देत होते. साधारण बारा वाजत कुलकर्णीबाई आली. आज ती क्रीम कलरची सिल्कची साडी नेसली होती. डोक्यात गुलाबाचे फुल होते. गळ्यात मोत्याची माळ होती. छान प्रसन्न दिसत होती. मला म्हणाली “मुलाकडून आल्यापासून तीन वर्षांनी माझ्या घरी तुमच्यामुळे दिवाळी साजरी झाली. हे घ्या बक्षीस “ म्हणून तिने एक छोटीशी भेटवस्तू माझ्या हातात दिली आणि आली तशीच ती निघून गेली. मी ती भेटवस्तू बाजूला ठेऊन दिली. निघताना सगळ्या भेटवस्तू तश्याच ठेऊन कुलकर्णीबाईने दिलेली भेटवस्तू मी घरी घेऊन गेले. घरी जाऊन वरील पेपर काढल्यावर आतमध्ये पितळेचा छोटासा पेढेघाटी डबा होता. त्यात पाच बेसनाचे लाडू होते. आत एक चिट्ठी होती… ‘ माझी दिवाळी आनंदी केल्याबद्दल प्रेमपूर्वक भेट ‘. आता डोळ्यात पाणी यायची वेळ माझी होती. मला आतापर्यंतच्या दिवाळीत मिळालेली ही सर्वात मौल्यवान भेट होती.

माझं आणि कुलकर्णी बाईचं आणि माझं आणि शहांचं व्यवहारापलीकडचं नातं निर्माण झालं होतं.

— समाप्त —

लेखिका : सुश्री मिताली वर्दे 

प्रस्तुती : सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ व्यवहारापलीकडचं नातं… भाग – १ – लेखिका – सुश्री मिताली वर्दे ☆ प्रस्तुती – सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ?

☆ व्यवहारापलीकडचं नातं… भाग – १ – लेखिका – सुश्री मिताली वर्दे ☆ प्रस्तुती – सौ राधिका भांडारकर ☆

भर पावसाळ्यात जून महिन्यात सारिकाची बदली मुलुंड येथे ब्रँचमॅनेजर म्हणून झाली. पावसाची रिपरिप, ट्रेनमधील गर्दी याने सारिका त्रासून गेली. कशीबशी वेळेत बँकेत पोचली. ब्रँचला गेल्यावर ग्राहकांची ओळख, कर्मचाऱ्यांची ओळख, कामाचे हॅण्डओव्हर यात जेवणाची वेळ कधी झाली हे तिला समजलेच नाही. तिने डब्बा आणलाच होता. आधीचे ब्रँचमॅनेजर, श्री गोरे ह्यांच्याबरोबर ती डब्बा खायला बसली. ग्राहकांची गर्दी ओसरली. आता दरवाजात फक्त ‘ती’ एकटी उभी होती. लक्ष जावं किंवा लक्षात राहावी अशी ती नव्हतीच. लांबूनच ती सारिकाला न्याहाळत होती. शेवटी शटर बंद करायची वेळ अली तेव्हा ती निघून गेली. ती कोण? हे सुद्धा सारिकाने विचारलं नाही, इतकी ती नगण्य होती. चार दिवसांनी गोरे सर गोरेगाव ब्रँचला, जिथे त्यांची बदली झाली होती, तेथे निघून गेले. ‘काही अडलं तर नक्की फोन करा’ असं सांगून गेले. जाताना एवढेच म्हणाले ‘त्यादिवशी ती दरवाजात उभी राहून तुमच्याकडे बघत होती, त्या बाईला उभी करू नका. तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. कुठचे तरी जुने पैसे मागत असते व त्रास देते’. मी सुटलो. सारिकाने फक्त ‘हो’ म्हंटल.

दुसऱ्या दिवशी पासून सारिकालाच ब्रॅन्चचे व्यवहार बघायचे होते. पावसामुळे जून, जुलै महिना कंटाळवाणा गेला. ग्राहक आणि बँकेचा धंदा दोन्ही कमीच होत. मात्र झोनची मिटिंग होऊन ब्रॅन्चच टार्गेट दिल गेलं. सारिकाने मार्केटिंग साठी वेगळी टीम बनवली आणि कामाला सज्ज झाली. आठ दिवस लख्ख ऊन पडलं. सारिका एका कर्मचाऱ्याला घेऊन काही मोठ्या ग्राहकांना भेटून आली. अशारितीने कामाला सुरवात झाली. ह्या ब्रॅन्चमध्ये स्त्री कर्मचारी जास्त होत्या. त्यामुळे साड्या, दागिने, ड्रेस, मुलबाळ हे विषय सतत चालू असायचे.

सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या गणपतीसाठी बऱ्याच कर्मचाऱ्यांनी रजेचे अर्ज दिले. ते समोर ठेऊन काम कोणाला वाटून द्यायची ह्याचा सारिका विचार करत असताना कोणीतरी धाडकन दार उघडून आत आलं आणि धप्पकन समोरच्या खुर्चीवर बसलं. सारिकाने मानवर करून बघितलं तर ती ‘तीच’ होती. पाहिल्या दिवशी दाराकडे उभं राहून सारिकाला न्याहाळणारी. सारिकाने तिला नीट निरखून बघितलं. ती शरीराने कृश, काळीसावळी, गालावर देवीचे खडबडीत व्रण, चेहेर्यावर उदासीनतेची छटा असा तिचा चेहेरामोहरा होता. तिने पांढऱ्या केसांची बारीकशी वेणी घातली होती. वेणीला काळी रिबीन बांधली होती. अंगावर कॉटनची विटकी पण स्वच्छ क्रीम रंगाची साडी, काळ्या रंगाचा ढगळ ब्लाउज व पायात रबरी चप्पल असा एकंदरीत तिचा अवतार होता. तिला अशी अचानक केबिन मध्ये घुसलेली पाहून सारिका म्हणजे मी दचकलेच. बाहेरून सगळे कर्मचारी माझ्याकडे पाहत होते आणि आपापसात कुजबुजत होते. मी अनिच्छेनेच तिला विचारले काय काम आहे? ती म्हणाली ‘माझे हरवलेले पैसे पाहिजेत’. मला काहीच समजेना. पैसे कधी हरवले? किती पैसे हरवले? पैसे कोणी हरवले? असे प्रश्न मी तिला पटापट विचारले. ती म्हणाली दहा वर्षांपूर्वी मी भरलेले पैसे बँकेने हरवले. मी तिला सांगितले पुरावा घेऊन ये आणि माझ्या कामाला लागले. ती तशीच बसून राहिली. मी तिला परत विचारले, आता काय राहील? पुरावा मिळाला की बँकेत ये. तिच्याकडे काहीही पुरावा नव्हता. बँकेचे पासबुक देखील नव्हते. मी तिला सांगितले बँकेचे पासबुक घेऊन ये मगच आपण बोलू आणि आता तू निघू शकतेस, मला खूप काम आहे. ती निराश होऊन निघून गेली. मी तिचे नाव माझ्या डायरीत लिहून घेतले. पासबुकच नसेल तर मी देखील काय करणार होते.

घरोघरी गणपती उत्सव दणक्यात पार पडले. सर्व कर्मचारी सुट्या संपवून कामावर रुजू झाले. कामाने जोर धरला. पंधरा दिवसात मागच्याच प्रसंगाची पुनरावृत्ती झाली ती बाई धाडकन दार उघडून आत आली आणि धप्पकन माझ्या समोरच्या खुर्चीवर बसली. हातातली विटक्या कापडाची पिशवी तिने माझ्या समोर उपडी केली. त्यात बऱ्याचशा पैसे भरलेल्या पावत्या होत्या व एक फाटके आणि भिजून पुसट झालेले पासबुक होते. माझ्या महत्वाच्या कामाच्या मध्येच या बाईने हा पसारा घातला होता. ती बाई मला म्हणाली घरात होत ते सगळं मी शोधून आणलं आहे. आता माझे पैसे द्या. मी चिडलेच, मी तिला म्हणाले, तू हे सगळं इकडेच ठेऊन जा. मला वेळ मिळाला की मी बघीन, ती बाई हुशार होती मला म्हणाली, ‘मला याची पोचपावती द्या’. मी तिला सांगितलं, ‘ह्या चिठ्या उचल, एका कागदावर सगळं व्यवस्थित लिही. त्याची एक प्रत काढून मला दे, मग मी त्या प्रतीवर तुला बँकेच्या शिक्यासह पोचपावती देते. शेवटी ती तो पसारा तसाच टाकून निघून गेली. ह्या वेळी आठवणीने मी तिचा मोबाईल नंबर घेतला. तिच्याकडे असलेला जुना मोबाईल मी पिशवीतले जिन्नस माझ्या टेबलावर ओतताना टेबलावर पडलेला बघितला होता.

मी त्या पावत्या एका लोनच्या रिकाम्या डॉकेट मध्ये भरल्या आणि त्यावर त्या बाईचे नाव लिहून ते डॉकेट मी माझ्या खणात ठेऊन दिले. आठ दिवस मी त्या डॉकेट कडे ढुंकून देखील बघितले नाही. पण का कोण जाणे मला त्या बाईची रोज एकदा तरी आठवण येत असे. एका शनिवारी ग्राहकांची वर्दळ बंद झाल्यावर मी ते डॉकेट खणातून वर काढून टेबलावर ठेवले. कर्मचाऱ्यांना घरी जायला अजून एक तास होता. एका कर्मचाऱ्याला माझ्या केबिन मध्ये बोलावले. मी प्रथम त्या सगळ्या पावत्या डॉकेट मधून टेबलावर ओतल्या. मी आणि त्या कर्मचाऱ्याने त्या तारखे प्रमाणे लावून घेतल्या. ह्या पावत्या दहा वर्षा पूर्वीच्या होत्या. आमच्या ब्रान्चला एवढा जुना डेटा नव्हता. कर्मचाऱ्याने सरळ हात वर केले. ‘मॅडम एवढा जुना डेटा अकौंट्स डिपार्टमेंटला ट्रान्स्फर झाला आहे. आता हे काही मिळणार नाही. त्या दिवशी इथेच ते काम थांबलं.

सोमवारी बँकेत आल्यावर मी अकौंट्स डिपार्टमेंटला फोन लावला. त्यांना सगळी केस सांगितली. मी तारखे प्रमाणे पावती वरील रक्कम एका कर्मचाऱ्याकडून टाईप करून घेतली. दुसऱ्या दिवशी तो कागद मी अकौंट्स डिपार्टमेंटला पाठवून दिला व काहीही झालं तरी ह्या पैशाच्या एन्ट्री शोधायला सांगितल्या. त्या बाईला फोन करून तुझं काम चालू आहे असा निरोप दिला. आता मी निवांत झाले. माझी जबाबदारी मी पार पाडली होती.

माझ्या लक्षात आलं पूर्वीच्या ब्रँच मॅनेजरने एवढे सुद्धा कष्ट घेतले नव्हते आणि त्या बाईला सगळ्यांनी वेडी ठरवलं होत. आठ दिवसाने मला अकाउंट्स डिपार्टमेंटहून एक मेल आलं. त्यात म्हंटल होत. या बाईचा खात नंबर ५००१ आहे आणि या बाईने सगळे पैसे ५०१० या खात्यात भरले आहेत. सगळ्या पावत्यांवर खाते नंबर ५०१० असा घातला असून नाव सीमा कुलकर्णी असं घातलं आहे. ते खाते तर शहा नावाच्या माणसाचं आहे. या शहाने हे पैसे दहा वर्षांपूर्वीच काढून घेतले आहेत आणि खात बंद केलं आहे. मी शहांचा पत्ता पाठवत आहे तुम्ही ब्रान्चला हे प्रकरण सोडवा. अशारितीने अकौंट्स डिपार्टमेंटने हात झटकले.

मला एकदम वैताग आला. या प्रकरणात हात घातला व डोक्याला भलताच ताप झाला. एक मन म्हणाल, ‘तिचीच चूक आहे. खाते क्रमांक चुकीचा का घातला?’ दुसरं मन म्हणाल ‘कर्मचाऱ्याने आणि चेकिंग करणाऱ्या ऑफिसरने देखील का बघितलं नाही?’, त्रास मात्र माझ्या डोक्याला झाला होता.

मी प्रथम कुलकर्णी बाईला बोलावून घेतलं. आज सुद्धा ती त्याच साडीत, तशीच गबाळी आली होती. आज प्रथमच मी तिच्या डोळ्यात माझ्या बद्दलचा विश्वास बघितला. मी तिला अकौंट्स डिपार्टमेंटच लेटर प्रिंट काढून वाचायला दिल.. मी तिला विचारले, ‘तू पासबुक का भरून घेतलं नाहीस?, वेळेत पासबुक भरलं असत तर तेव्हाच समजलं असत. ते वाचून ती रडायला लागली. पैसे भरलेली रक्कम थोडीथोडकी नाही तर सव्वा लाख रुपये एवढी होती.

– क्रमशः भाग पहिला 

लेखिका : सुश्री मिताली वर्दे 

प्रस्तुती : सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares