मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बस, तुम कभी रुकना मत! ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ बस, तुम कभी रुकना मत! ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

आज आजी उदास आहेत, हे आजोबांच्या लक्षात आलं.”काय झालं ग?” आजोबांनी विचारलं. आजी म्हणाल्या, “अहो, आता थकवा येतो. आधीसारखं राहिलं नाही.आता गडबड,तडतड सहन होत नाही.कुठे जायचं  म्हटलं तर जास्त चालवत नाही.आॕटोमध्ये चढताना त्रास होतो . कधी भाजीत  मीठ टाकायला विसरते,तर कधी जास्त पडतं. कशाकरिता हे एवढं आयुष्य देवाने दिलं आहे, माहीत नाही.”

आजोबा म्हणाले, “देवाचा हिशोब मला माहीत नाही.आणि त्याच्या निर्णयात आपण ढवळाढवळ करू शकत नाही. त्याच्या planning मध्ये  एक क्षणाचाही बदल करणे, आपल्या हातात नाही. जे आपल्या हातात नाही, त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या हातात काय आहे, त्याचा विचार करावा. अग ,वयानुसार हे सर्व होणारच.  आधीचे दिवस आठव ना. किती काम करायचीस! पूर्ण घर तू खूप छान सांभाळलेस. मला कशाची काळजीच नव्हती कधी.आता  वयोमानाप्रमाणे हे सर्व होणारच.  पण त्यातूनच मार्ग काढायचा असतो. आलेला दिवस आनंदात काढणे,आपल्या हातात आहे. जीवनाच्या प्रत्येक फेजमध्ये थोडे शारीरिक बदल होतातच.थोडे आपल्याला करायचे असतात.आपली  lifestyle reorganize करायची ,म्हणजे ,

आयुष्याची घडी, परिस्थिती प्रमाणे बदलायची असते.कळलं का ? “

आजोबा पूढे म्हणाले,

“चल, आज सायंकाळी बाहेर जाऊ  या  आपण.ती छान  नारंगी साडी नेस.  बाहेरच जेवू .  आजोबा संध्याकाळी आजींना घेऊन बाहेर पडले. जवळच असलेल्या  बसस्टाॕप वर जाऊन बसले. दोघे बराच  वेळ तेथेच  गप्पा मारत बसले . आजोबा आजींना म्हणाले,” अगं, पाय दुखत असतील  तर, मांडी घालून बस छान.”नंतर , ‘गणेश भेळ ‘खाऊनच दोघं घरी परतले. अगदी वयाला व तब्येतीला  शोभेसे  outing  होते आज दोघांचे . आजींची उदासी मात्र कुठे पळाली, हे त्यांना कळलेच नाही.अगदी ‘refresh’ झाल्या .

आज आजोबांनी आजीसाहेबांसाठी  on line ‘Mobile stand’ मागवला. मोबाईल पकडून आजींचा खांदा दुखतो ना म्हणून .

आज आजींनी तर आजोबांना सकाळीच  सांगून  टाकलं,” मी आज सायंकाळी स्वयंपाक करणार नाही. काही तरी चमचमीत खायला  घेऊन या”. आजोबांनी आनंदाने समोसे, ढोकळा, खरवस, दोन पुरण पोळ्या आणून आजींची इच्छा पूर्ण केली. ते बघून आजी म्हणाल्याच, “अहो, केवढं आणलंत?” “अग, आज आणि उद्या मिळून संपेल की.” आज आजी-आजोबांची पार्टी छान  झाली.

कोणी तरी खरंच  खूप छान म्हटलं आहे •••

 ” खुशियां बहुत सस्ती हैं इस दुनिया में ,

हम ही ढूंढते फिरते हैं, उसे महँगी दुकानों में”।”

आजोबा बऱ्याच वेळापासून एका बाटलीचे झाकण उघडायचा प्रयत्न करत होते. ते पाहून अजय म्हणाला , “द्या, आजोबा. मी उघडून देतो”. तेव्हा आजोबा म्हणाले, “अरे, नको. मी उघडतो. आता आम्हाला प्रत्येक  कामात वेळ लागतोच . हे natural आहे . पण काही हरकत नाही. जोपर्यंत करू शकतो, तोपर्यंत काम करायचे, हे मी ठरवलं आहे.  रोज फिरायला जाणे, भाजी आणणे, dusting करणे, भाजी  चिरणे, washing machine मधे धुतलेले कपडे वाळत घालणे‌, कपड्यांच्या घड्या घालणे ,अशा बऱ्याच कामांची जबाबदारी मी घेतली आहे. तुझ्या आजीला मदत होते. व माझापण वेळ जातो. Something new and different. I am enjoying it. And I feel good.

तो तुमचा actor आहे ना, अक्षयकुमार? त्याने एका advertisement मध्ये म्हटले आहे,

“बस, तुम कभी  रुकना मत.”

अक्षय कुमारने  म्हटलेले हे वाक्य मला खूप आवडलं.

एक  छोटंसं वाक्य. मोजक्या शब्दात.

पण किती अर्थपूर्ण .जेवढ्यांदा वाचावे, तेवढाच त्याचा अर्थ परत दर परत उघडत जातो .एक छोटासा उपदेश जीवनाला वेगळ्याच दिशेने वाटचाल करायची  स्फुर्ती  देतो. विचारांत परिवर्तन  आणतो .

तो म्हणतो, “कधीही थांबू नका,चालत रहा.

म्हणजेच  ‘active’ रहा.  ‘मनाने आणि शरीराने .’ 

वाहतं पाणी बघताना,  एक वेगळीच उर्जा  निर्माण होते.’ धारा ‘ म्हणजे पुढे पुढे जाणारी, वाहणारी .तेच  जमलेलं  पाणी म्हणजे अनेक रोगांचा उगम. म्हणून    पाण्याला जमू देत नाही आपण.  जमलेल्या पाण्यात मच्छर किडे पडतात .पाण्याला  वास येतो.डेंग्यू पसरतो.

आयुष्याचे पण तसेच आहे. शक्य तेवढं active राहणे ही प्रत्येकाचीच आवश्यकता असते.जसं जमेल ,जे जमेल, जे आवडेल ,जे झेपेल, ते करत रहाणे गरजेचे आहे.

चलती का नाम ही तो  जिंदगी है ।”

आपल्या पिढीने तरूणपणी एकमेकांचे हात हातात घेतले नाहीत /नसतील  .पण वयाच्या या टप्प्यावर, एकमेकांचा हात प्रेमाने, काळजीने, विश्वासाने , हातात घेणे  ही काळाची गरज आहे .

“कुछ लोग हमेशा खुश और संतुष्ट रहते हैं !

इसलिए नहीं की उनके जीवन में  सबकुछ ठीक होता  है!

बल्कि इसलिए की उनकी सोच हर हाल में सकारात्मक होती है”!!!

“ना  थके  कभी  पैर

ना कभी हिम्मत हारी है।

जज्बा  है परिवर्तन का जिंदगी में,

इसलिये सफर जारी  है।”

“प्रत्येक दिवस उत्सव म्हणून साजरा करा.”

“बस , तुम कभी  रुकना मत

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भूत आणि गाढव… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ भूत आणि गाढव… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री दीप्ती गौतम ☆

घटनाक्रम लक्षात घ्या…

एका कुंभाराने आपले गाढव दोरीने खुंट्याला बांधून ठेवले होते. रात्री एका भूताने दोरी कापून गाढवाला मोकळे केले.

त्या गाढवाने एका शेतकऱ्याच्या शेतातील ज्वारीचे पीक नष्ट करून टाकले.

हे पाहून चिडलेल्या शेतकऱ्याच्या बायकोने भला मोठा दगड घालून गाढवाला ठार केले.

गाढव मेल्यामुळे कुंभार उध्वस्त झाला.

प्रत्युत्तरादाखल कुंभाराने त्याच दगडाने शेतकऱ्याच्या बायकोची हत्या केली.

बायकोच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने कुऱ्हाडीचे सपासप वार करून कुंभाराचं डोकं धडावेगळे केलं.

कुंभार मेल्याचे बघून कुंभाराच्या बायको व मुलाने शेतकऱ्याच्या घराला आग लावली.

हे पाहून क्रोधित झालेल्या शेतकऱ्याने कुऱ्हाडीचे घाव घालून कुंभाराच्या बायको व मुलाला ठार केले…

शेवटी जेव्हा शेतकऱ्याला पश्चात्ताप झाला, तेव्हा तो त्या भूताला म्हणाला, “तुझ्यामुळे माझी पत्नी, कुंभार, कुंभाराची बायको व मुलगा मेले अन् माझ्या घराची राखरांगोळी झाली. तू असं का केलंस?”

त्यावर भूताने शांतपणे उत्तर दिले… “मी कुणालाही ठार केले नाही, मी फक्त ‘दोरीने बांधलेले गाढव’  सोडले !!”

– तात्पर्य – 

आज माध्यमं (WhatsApp, Facebook, Instagram, Twitter, Print Media, News Channel etc.) भूतासारखी झाली आहेत. ते रोज नवनवीन गाढवांच्या दोऱ्या सोडतात आणि लोकं कसलाही विचार न करता, सत्यासत्यता न पडताळता उलट – सुलट प्रतिक्रिया देतात आणि एकमेकांशी भांडतात, एकमेकांची मने दुखावतात. माध्यमं मात्र तमाशा घडवून आणतात आणि बक्कळ पैसा कमावतात… आपले मित्र, नातेवाईक, हितचिंतक आणि सहकारी यांचेशी असलेले संबंध जपण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे.

सतर्क राहा… सुरक्षित राहा…

लेखक – अज्ञात 

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मैत्रिणी… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ मैत्रिणी… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी⭐

मैत्रिणी हा श्वास  असतो ,

मैत्रिणी हा ध्यास  असतो

 

 एखादी चंचल असते ,

तर एखादी शांत असते ,एखादी बोलकी तर एखादी अबोल

 

 एखादीचं हास्य  स्मित असतं तर एखादीचं हास्य  खळखळून असतं

 

 एखादीला साडीच आवडते तर कोणाला ड्रेस, तर कोणाला Western Outfit

 

 एकत्रित  जेवायला जातील ,पण घरातील  सगळ्यांचं खाण्याचं करून निघतील .

 सगळ्याच एकमेकीस  सांगतील, “आज मी निवांत  ताव मारणार  आहे” ,

पण गप्पाटप्पांच्या नादात  थोडेच  खातील

 

कोणी धैर्यवान  असतात तर कोणी भागूबाई असतात

 

 कोणी नोकरीत,कोणी  व्यावसायिक.

 

कोणी छान  गृहिणी ,

कोणी तानसेन

तर कोणी कानसेन.

 

 आवड प्रत्येकाची वेगवेगळी

 

आनंद घेतात क्षणभर

अन दुःख विसरतात मणभर

 

जीवन रुपी प्रवासात गरज असते मैत्रिणींच्या कळपाची

कारण त्यांच्या सहवासात ऊब मिळते माहेरच्या माणसांची

 

संग्राहिका: सौ. शशी नाडकर्णी-नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 44 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 44 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

७८.

विश्वाची निर्मिती नुकतीच झाली होती.

प्रथम तेजात तारका चमकत होत्या.

तेव्हा आकाशात देवांची सभा भरली आणि

ते गाऊ लागले-

“वा!पूर्णत्वाचं किती सुरेख चित्र! निर्भेळ आनंद!”

 

एकजण एकदम ओरडला,

“प्रकाशमालेत कुठंतरी त्रुटी आहे.

 एक तारा हरवलाय!”

 

त्यांच्या वीणेची एक तार तुटली.गीत थांबले.

ते निराशेनं म्हणू लागले,

” हरवलेली ती तारका सर्वात सुंदर होती.

 स्वर्गाचं वैभव होती.”

त्या दिवसापासून सतत शोध चालू आहे.

आणि प्रत्येकजण दुसऱ्याला सांगतो,

” जगातला एक आनंद नाहीसा झाला आहे.”

रात्रीच्या खोल शांततेत तारका हसतात

आणि आपापसात कुजबुजतात,

“हा शोध व्यर्थ आहे,

एकसंध पूर्णत्व संपलं आहे.

 

७९.

या आयुष्यात तुला भेटायचं माझ्या वाट्याला

येणार नसेल तर, तुझ्या नजरेतून

मी उतरलोय असं मला सतत वाटू दे.

मला क्षणभरही विस्मरण होऊ नये.

जागेपणी व स्वप्नातही या दु:खाची टोचणी

सतत मनात राहो.

 

जगाच्या बाजाराच्या गर्दीत माझे दिवस

जात असताना आणि दोन्ही हातांनी

भरभरून नफा होत असताना

मला सतत असे वाटत राहो की मी

काहीच मिळवत नाही.

या दु:खाची टोचणी मला स्वप्नात व

जागेपणी सतत राहावी.

 

दमून भागून रस्त्याच्या कडेला मी बसेन.

धुळीत माझा बिछाना पसरेन तेव्हा,

दीर्घ प्रवास अजून करायचा आहे याची जाणीव

मी क्षणभरही विसरू नये

आणि या दु:खाची टोचणी मला जागृतीत व

स्वप्नातही रहावी.

 

शृंगारलेल्या माझ्या महालात

गाण्याचे मंजूळ स्वर आणि

हास्याचा गडगडाट असावा.

तेव्हा मात्र मी तुला निमंत्रण दिले नाही

या दु:खाणी टोचणी मला जागेपणी

व स्वप्नातही असावी.

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ऋषितुल्य वैज्ञानिक – डॅा.रघुनाथ माशेलकर… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ ऋषितुल्य वैज्ञानिक – डॅा.रघुनाथ माशेलकर… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

अमिताभ बच्चनजी ८० वर्षांचे झाले तरी अजूनही काम करतात, म्हणून बातमी होते. देव आनंदच्या चिरतरुण देहबोली वर मासिकांची कितीतरी पाने भरलेली असतात. हेमामालिनी या वयातही किती सुंदर दिसते, यावर जवळपास सगळी चॅनेल्स चर्चा करतात. रेखाच्या उतारवयातील देखणेपण जपण्यावर सोशल मिडियावर तुफान चर्चा होते.

आपण फिल्मी सिताऱ्यांत इतके गुरफटून गेलो आहोत की त्यापलीकडे बरेचदा बहुसंख्य लोकांना, इतर क्षेत्रात योगदान करणारे महर्षी दिसतच नाहीत. फार थोडे भारतीय अशा महान पण दुर्लक्षित लोकांची दखल घेतात हे लिहिण्यामागचे कारण म्हणजे डॅा.रघुनाथ माशेलकर.  १ जानेवारी २०२३ रोजी ते ८१ वर्षाचे झाले.

शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी लागणारी जुजबी फी भरण्याची ऐपत नसलेले माशेलकर महापालिकेच्या दिव्याखाली अभ्यास करून दहावीला संपूर्ण महाराष्ट्रात दुसरे आले, तर बारावीला बोर्डात ११ वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले. बारावीपर्यंत अनवाणी चालणारा हा माणूस न्यूटनने सही केलेल्या रजिस्टरवर सही करणारा पहिला महाराष्ट्रीयन ठरला.

तब्बल ६० पेक्षा अधिक पुरस्कार, ३९ डॅाक्टरेट, २८ च्या आसपास पेटंटस्, २६५ शोध निबंध अशा अफाट बुध्दिसंपदेचा मालक असलेला हा महामानव.

हळद आणि तांदूळ यांची पेटंट लढाई जिंकून भारताला पेटंटविषयी नवी दिशा देणारा भारताचा सुपुत्र. २८००० तज्ञांसह ४० प्रयोगशाळा संचलित करणारी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR) ही  आकारानेच एवढी मोठी असलेली संस्था यश व किर्तीरुपाला आणणारा हा कर्मयोगी.

२३ व्या वर्षी रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पी एच डी मिळविणारे माशेलकर जेल रसायनशास्त्र, पॅालिमर रिअॅक्शन, फ्लुईड मेकॅनिक या विषयातील नावाजलेले तज्ञ आहेत. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे तीन पुरस्कार प्राप्त.म्हणजे फक्त भारतरत्न बाकी.

असा ऋषितुल्य भारतीय ८१ व्या वयात पदार्पण करताना अजूनही आपल्या क्षेत्रात कार्यरत आहे. याची दखल म्हणावी अशी कुणी घेत नाही हे भारतीयांचे करंटेपण म्हणावे लागेल असो.

या महान वैज्ञानिकाला ८१ व्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

लेखक :अज्ञात

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मन… ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ मन… ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

मन

मन म्हणजे काय हो ? ,

त्याला कोणी पाहिलं नाही ,

कसं असते ते माहीत नाही,

पण त्याला खूप मानसन्मान असतो.

कधी ते लिक्विड असतं, 

“मन भरलं नाही” असं म्हणतो आपण,

कधी ते सॉलिड असतं, “मनावर खूप ओझं आहे”

कधी ते घर होतं, “मेरे मन में रहने वाली”,

कधी ते तहानलेल असतं,  “मेरा मन तेरा प्यासा” 

कोणी त्याला मोराची उपमा देतं, “मन मोराचा कसा पिसारा फुलला”

असं हे मन आयुष्यभर आपल्याला झुलवत ठेवतं ,

कधी स्वतःच्या मनाने तर कधी दुसऱ्याच्या मनाप्रमाणे आपण वागत असतो

हे “मन” कधीच स्थिर का बरं नसतं ?

ते कधी प्रेयसीच्या तोंडातून मंदिररूप धारण करतं

आणि ती म्हणते “मन में तुझे बिठाके …”

काही जण असतात की त्याच्या “मनात”काही रहात नाही तर काही “मनकवडे” असतात. 

मन दिसत तर नाही

… पण त्याने ठरवले तर ते हरवून टाकतं

तर कधी शक्ती नसताना जिंकून ही देतं.

“मनात आणलं तर काहीही होऊ शकतं ..”

जरी त्याला कोणी पाहिलेले नाही तरी ते जर चांगलं असेल तर आपण आनंदी राहतो ,

दुसऱ्याचं भलं करतो,  म्हणुन म्हटलं जातं, “मन चंगा तो ..”

कधी मन खूप डेंजर असतं ,

स्वतःकडे राग तिरस्कार साठवून ठेवतं आणि “मनातील” राग दुसऱ्याचं नुकसान करतं .

याचा वेग मोजण्याचं यंत्र अजून अस्तित्वात आलेलं नाही, 

तरी लोक म्हणतात,  “मनाचा ब्रेक , उत्तम ब्रेक”.

“मन” दिसत नसलं तरी तेच आपणाला घेऊन फिरत असतं , कधी घरी , कधी डोंगरदऱ्यांत, कधी आकाशात

पण ते निर्मळ असतं, पारदर्शक  असतं.

म्हणूनच आपण म्हणू शकतो की “मोरा मन दर्पण कहलाये.”

अशा या न  दिसणाऱ्या पण सर्वस्व असणाऱ्या  “मनाला” काबूत ठेवण्याचा अनेकजण प्रयत्न करतात !

पण “मनाप्रमाणे” जगता आलं नाही तर

त्याला काही अर्थ आहे का ?

मग …

“मनसोक्त” जगा ! ! आणि त्यासाठी ”मनापासून” शुभेच्छा!

संग्राहिका  : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सखी — ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सखी — ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

सखी… कोण सखी?                   

जिची साथ सुखावते…ती सखी?

आनंद साजरा करण्यासाठी पहिली हाक जिला जाते…ती सखी?

की दुखावलेल्या श्रांत मनासाठी जी शीतल श्रावणधारा होते……ती सखी?

रोज नियमाने GM-GN चे मेसेज किंवा डझनावारी emoji चा रतीब न  घालताही,  जी आपल्यासाठी सतत connected mode मध्ये असते…..ती सखी?

जिच्याशी बोलताना किती सांगू नि किती नको असं होतं…..ती सखी?

की जिला मौनाची भाषा अवगत आहे, अवाक्षरही न बोलता-जसा की शब्देविण संवादु-आपलं मन जी सहज वाचू शकते…..ती सखी?

प्रवासात असताना मधल्या स्टेशनवर चहा-नाश्ता (चहात आलं घालायला विसरु नकोस ग!…) घेऊन येण्यासाठी जिला हक्काने सांगता येतं, प्रत्येक वेळी प्लीज-थॅंक्यू म्हणण्याची कसरत न करता…..ती सखी?

जिच्या सहवासात असताना आपल्याला कोणताही मुखवटा चढविण्याचा व्यायाम करावा लागत नाही,आपण आरस्पानी, जेव्हा जसे आहोत तसे– नाठाळ, खट्याळ,आनंदी,उदास,

बिनधास्त,घाबरट,आग्रही..जी सहजतेने स्वीकारते…..ती सखी?

वाचाळ व्याख्यानी भाषा न वापरताही , आपल्या एखाद्या achievementचं कौतुक जिच्या नजरेतून ओसंडताना दिसतं…..ती सखी?

की हक्काने कान पकडून जी आपली चूक-उणीव दाखवून देत असतानाही आपला एरवी एवढ्या-तेवढ्याने फडा वर काढणारा ego आता अजिबात मान वर करीत नाही….ती सखी?

एखाद्या वैतागवाण्या गुंत्यात नाहक गुरफटायला होत असताना, जिच्या आश्वासक आधाराने आपण अलगद आपला पाय आणि श्वास मोकळा करून घेतो… त्याला तणावाचे व्यवस्थापन-भावनिक समुपदेशन अशी भारी भारी नावं (आणि भारी-भक्कम फी!) न देता….ती सखी?

जन्मजात आणि जुळलेल्या नात्यांच्या अपेक्षांचे कंगोरे जेव्हा कधी काचू लागतात, तेव्हा नात्याचे कोणतेही लेबल न लावता, जिच्या निरपेक्ष जवळीकीचे दार आपल्यासाठी नेहमीच खुलं असतं……ती सखी?

ठाशीव ठिपक्यांनी मांडलेल्या, रेखीव रेघांनी जोडलेल्या आणि सप्तरंगी छटांनी सजवलेल्या अंगणातील रांगोळीचे आमंत्रण जसे सुखद, तसेच जिचे व्यक्तिमत्त्व लोभस…..ती सखी?

होय,ही सगळी तर सखीची नानाविध विलोभनीय रूपे आहेतच,पण सखीत्व नेहमीच त्यापेक्षाही ओंजळभर अधिकच राहणार आहे ! कारण सखी म्हणजे केवळ व्यक्ती नसते,तर वृत्ती असते!!आणि ही वृत्ती सदाच वय,लिंग, भौगोलिक-आर्थिक-सामाजिक अंतर इ. निकषांच्या अतीत असते, स्वयंभू असते.(शक्य आहे,कदाचित् काहींना ही वृत्ती व्यक्ती ऐवजी एखाद्या पाळीव प्राण्यात,निसर्गात, पुस्तकांत सुद्धा सापडू शकेल !)

असं काही घडतं की, माणसांच्या आणि वस्तूंच्या या अपार कोलाहलात अवचित एक संवादी सूर ऐकू येऊ लागतो आणि मग त्या सुराशी असे लयदार सख्य जुळून येते की, आयुष्य म्हणजे एक जमलेली  सुरेल मैफलच होऊन जाते! निरपेक्ष ,अयाचित दान देणाऱ्या प्राजक्तासारखी परिमळणारी ! …..म्हणूनच राधा कृष्णाची सखी होऊ शकते आणि कृष्ण द्रौपदीचा सखा !!   

कविवर्य ग्रेस यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, असे सखीत्व म्हणजे

‘ सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला  !’

ज्यांना आयुष्यात असा सखीपणाचा आपापला    ‘राघव शेला  ‘ सापडला आहे, त्यांनी तो खूप निगुतीने सांभाळावा,हीच एका सखीची अपेक्षा!!

संग्राहिका – सौ. राधा पै 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ घाई — ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ घाई — ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

फार घाई होते हल्ली…

प्रत्येक क्षणावर कशाची तरी मोहर उमटलीच पाहिजे म्हणून घाई…

क्षण फुकट वाया गेला म्हणून…

लगेच गळे काढायची पण घाई…

 

माझ्याजवळ काही आलंय की जे अजून मलाही नीट नाही उमगलंय…

ते पटकन जगाला दाखवायची घाई….

जगापर्यंत ते पोहचलंय की नाही हे आजमावायची घाई…

पोहचलं असेल तर त्याचे निकष जाणून घ्यायची घाई….

 

गर्भातल्या श्वासांना डोळे भरुन बघायची घाई….

व्हेंटिलेटरवरच्या श्वासांना निरोप द्यायची घाई….

 

मुखातून पडलेला शब्द अवकाशात विरायच्या आधी पकडायची घाई…

 

विचारांना अविचाराने बाजूला सारायची घाई….

नजरेत दृश्य येताक्षणी कॅमेऱ्यात बंद करायची घाई…

 

विचाराचा कोंब फुटता क्षणी,कृतीत उतरायची घाई…

फळाफुलांना हंगामाआधी पिकवण्याची घाई….

 

बोन्सायच्या टोपीखाली निसर्ग दडवायची घाई….

मेमधला गोडवा जानेवारीतच चाखायची घाई…

 

बोबड्या बोलांना इंग्रजीत ठासून बसवायची घाई…

चिमखड्या आवाजांना लता/किशोर व्हायची घाई…

 

बालांना किशोर व्हायची घाई…

किशोरांना यौवनाची चव चाखायची घाई तर..

काल उंबरा ओलांडून आलेल्या मुलीला सगळे अधिकार हातात घ्यायची घाई….

 

तिन्हीसांजेच्या परवच्याला नृत्य/लावणीची घाई…

दिवसभराच्या बुलेटिनला जगाच्या घडामोडी कानावर ओतायची घाई…

 

प्रसंग टेकताक्षणी शुभेच्छा द्यायची घाई…

श्वास थांबता क्षणी श्रद्धांजली वाहायची सुद्धा घाई…

मुक्कामाला पोहचायची घाई….

कामावरुन निघायची घाई…

सिग्नल संपायची घाई….

 

पेट्रोल/डिझेलच्या रांगेतली अस्वस्थ घाई…

सगळंच पटकन उरकायची घाई…

 

आणि स्वातंत्र्यावर थिरकायची घाई…

आठ दिवसांत वजन कमी करायची घाई…

 

महिनाभरात वजन वाढवायची देखील घाई….

पाच मिनिटांत गोरं व्हायची घाई…

 

पंधरा मिनिटांत केस लांब व्हायची घाई…

 एक मिनिटात वेदना शमवायची घाई…

 

एनर्जी ड्रिंक पिवून वडीलधाऱ्यानां दमवायची घाई…

साऱ्या या घाईघाईने जीव बिचारा दमुन जाई…

 

भवतालचा काळ/निसर्ग गालात हसत राही….

मिश्कीलपणे माणसाच्या बुद्धीला सलामी देई…!!!

 

घाईघाईने मारलेल्या उड्या

कमी कर रे माणसा थोड्या

बुद्धी पेक्षा ही आहे

काळ मोठा

कधीतरी जाण वेड्या…

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ श्री शंकर महाराजांनी सांगितलेला पत्त्यांच्या खेळातील मथितार्थ… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ श्री शंकर महाराजांनी सांगितलेला पत्त्यांच्या खेळातील मथितार्थ… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ⭐

महाराजांना पत्त्यांचा छंद होता. त्यांना खेळायची लहर आली की ते भेटायला आलेल्या माणसाला पत्ते खेळायला बसवीत. असेच एकदा कोराड मास्तर, श्री. भस्मेकाका आणि रघू यांच्याबरोबर महाराजांनी पत्त्यांचा डाव मांडला होता.

खेळता खेळताच रघूच्या मनात आलं, ‘पत्ते खेळणं काही फारसं चांगलं नाही. मग महाराज का खेळतात ?’

महाराज रागावतील म्हणून त्याने हा  प्रश्न मनातच ठेवला. परंतु त्याच वेळी महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. ते किंचित हसले. त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाले, “हा पत्त्यांचा डाव वाईटच. होय ना रे ? पण तो त्याचा अर्थ न कळणाऱ्यांना.”

‘अर्थ ? पत्त्यांना कसला अर्थ असणार?’ असा विचार रघू करतो आहे,  तोच महाराज पुढे म्हणाले, “अरे बाबा, याचा अर्थ गूढ आहे.”

महाराजांनी एकेक पान समोर ठेवीत म्हटलं –

“ही दुर्री = म्हणजे पृथ्वी आणि आकाश.

तिर्री = ब्रह्मा, विष्णू, महेश.

चौकी = चार वेद.

पंजी = पंचप्राण.

छक्की = काम, क्रोध हे सहा विकार.

सत्ती  = सात सागर.

अठ्ठी = आठ सिद्धी.

नव्वी = नऊ ग्रह.

दश्शी = दहा इंद्रिये, पाच कर्मेंद्रिये + पाच ज्ञानेंद्रिये.

गुलाम = आपल्या मनात येणाऱ्या वासना, इच्छा. माणूस त्यांचाच गुलाम होऊन राहतो.

राणी = माया.

राजा = या सर्वांवर स्वार होऊन त्यांना चालवणारा.

आणि एक्का = विवेक. माणसाची सारासार बुद्धी. या सर्व खेळाला स्वाधीन ठेवणारा.

काय रे ? डोक्यात शिरलं का काही?”

आता या लहानग्याला काय कळणार ? त्यानं गोंधळून एकदा होकारार्थी मान हलवली. एकदा नकारार्थी मान हलवली.

महाराज हसले. मास्तरांना म्हणाले, “तुम्ही सांगा याची फोड करून!”

“मला सुद्धा नीटसं नाही सांगता यायचं. पण प्रयत्न करतो. दश्शीवर दबाव असतो गुलामाचा. वासनाच इंद्रियांना नाचवते. वासना उत्पन्न होते मायेमुळे, तिच्या नादानं वाहावत जातं ते माणसाचं मन. माणूस. तो राजा, पण या राजालाही मुठीत ठेवू शकतो, त्याला अंकुश लावू शकतो तो विवेक- हुकुमाचा एक्का म्हणजेच सदगुरू!”

“बरोबर.” महाराज म्हणाले, “समोरचा भिडू म्हणजे प्रारब्ध ! त्याच्या हातातले पत्ते आपल्याला माहीत नसतात. पण त्याच्या मदतीने आपण डाव जिंकण्याचा प्रयत्न करतो. जीवन जगतो.”

संग्राहिका : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ४ पैसे कमवणे म्हणजे काय ? ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ ४ पैसे कमवणे म्हणजे काय ? ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

मुलाने काही कमावले तर ४ पैसे घरात येतील

किंवा

४ पैसे मिळवण्यासाठी माणूस रात्रंदिवस काम करतो.

मग या तथाकथित पैशांमध्ये केवळ ४ पैसे का ?

३ किंवा ५ पैसे का नाहीत हा प्रश्न आहे..?

चला तर मग वडीलधाऱ्यांकडून  तपशील जाणून घेऊन ४ पैसे कमवा ही म्हण समजून घेऊ या.

पहिला पैसा

विहिरीत टाकण्यासाठी.

 दुसऱ्या पैसा

कर्ज फेडणे.

तिसऱ्या पैसा

पुढचे देणे भरणे

चौथा पैसा

भविष्यासाठी जमा करणे

या प्रकरणाची गुंतागुंत सविस्तरपणे समजून घेऊ या.

१.  विहिरीत एक पैसा टाकणे.

म्हणजे – स्वतःच्या कुटुंबाची आणि मुलांची पोटे भरण्यासाठी वापरणे.

२. कर्ज फेडण्यासाठी दुसरा पैसा वापरा.

 आई-वडिलांच्या सेवेसाठी..,

 ते ऋण फेडण्यासाठी त्यांनी आमची काळजी घेतली, आमचे पालनपोषण केले आणि मोठे केले.

३. पुढील (मुलांचे) कर्ज फेडण्यासाठी तिसरा पैसा वापरणे.

तुमच्या मुलांना शिक्षित करा, त्यांच्या उच्च शिक्षणासाठी पैसे मोजा.

 (म्हणजे – भविष्यातील कर्ज)

४.  चौथा पैसा पुढील (पुण्य) ठेवीसाठी वापरणे.

म्हणजे – शुभ प्रसंग, अशुभ प्रसंग, परोपकाराच्या अर्थाने,  गरजवंतांची सेवा करणे आणि असाहाय्यांना मदत करणे, या अर्थाने..!

 तर.. ही ४ पैसे कमावणारी गोष्ट आहे.  आपल्या प्राचीन कथांमध्ये किती उच्च विचार आहेत..!

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares