मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक पिल्लू, बारा अंडी… लेखिका : सुश्री भाग्यश्री बारलिंगे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ एक पिल्लू, बारा अंडी… लेखिका : सुश्री भाग्यश्री बारलिंगे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

एका पिल्लासमोर त्याच्याइतकीच निरागस दिसणारी बारा अंडी सुबकपणे एग कार्टन मध्ये ठेवली होती. पिल्लू माणसाचं होतं, अंडी कोंबडीची होती. पिल्लानं प्रथम काही वेळ ह्या नवीन खेळण्याकडे पाहिलं; नंतर आपल्या छोट्या बोटांनी त्यांना चाचपून बघितलं आणि ग्रीक तत्ववेत्त्याच्या अभिनिवेशानं एक अंडं जमिनीवर टाकलं. त्याचा आवाज, त्याचं फुटणं, त्यातला बलक जमिनीवर पसरणं ह्या सगळ्यांची नोंद घेतली गेली – अगदी क्लिनिकल डिटॅचमेंटने ! उरलेल्या अकरा अंड्याचं स्टॅटिस्टिकस होण्याच्या आत त्या प्रयोगात यशस्वी रित्या व्यत्यय आणण्यात आला आणि पिल्लू वाटी-चमच्यातून निर्माण होणाऱ्या संगीताचा अभ्यास करायला लागलं.

पिल्लाला माणसाच्या जमातीत जन्मल्यामुळे एक नांव ठेवण्यात आलं आणि त्याच्या गोंडस शरीरावर तऱ्हेतऱ्हेचे कपडे घालण्यात आले. स्वतःच्या नावातील ‘र’ म्हणता येण्याआधी पिल्लाला आपल्या अंगातले कपडे काढता यायला लागले. आणि खेळण्यांच्या पसाऱ्यात बसलेलं आणि स्वतःच्या कपड्यांनी जमीन पुसणारं बाळ बघून हसू, वैताग, लोभ अश्या मिश्र भावनांचे तरंग घरात उमटू लागले. घराच्या भिंतींमध्ये एक कोवळीक आली-वेलींची टेन्ड्रिल्स भिंतीचा आधार शोधत वरवर झेपावायला लागलीत की भिंती अश्याच कोवळ्या होत असतील का ?

घरात वाटी-चमच्याचं तर बागेत लॉरेलच्या खुळखुळणाऱ्या शेंगाचं संगीत ! राजानं हत्तीवर (!) बसून प्रजेची खबरबात घ्यावी तशी आजीच्या कडेवर बसून झाडांशी मूक संवाद करणं, हे एक आवडतं काम-आर्याचं आणि आजीचंही ! फुल ही एक स्वतंत्र, संपूर्ण चीज आहे हे कळायला वेळ लागला. पानं आणि पाकळ्या यात जास्त रस. कदाचित पाकळ्या, पानं, आकाशाकडे झेपावणारं बाकीचं झाड आणि त्यानंतर सुरु होणारं आकाश यातील भेद करणाऱ्या रेखा तिला दिसत नसाव्यात. त्याचं प्रतिबिंब तिच्या चित्रकलेत दिसायचं. रुक्ष नजरेच्या वडीलधाऱ्यांना ती गिचमिड दिसायची. हळूहळू ती रेषा आणि आकार काढायला लागली. ह्या रेषा बेदरकारपणे, प्रसिद्ध कलाकाराच्या आत्मविश्वासाने लेदर फर्निचरवर, भिंतींवर उमटायला लागल्या. आपल्या आईकडून भिंती रंगवण्याचं जीन तिनं मिळवलं असणार याची खात्री असल्यामुळे वॉशेबल क्रेयॉन्स आधीच आणून ठेवले होते. या आणि अश्या, फक्त आजी लोकात वावरणाऱ्या जमातीला प्राप्त होणाऱ्या शहाणपणामुळे एग कार्टनमधली अनेक अंडी वाचवली गेली.

ही प्रक्रिया आयुष्यात परत परत होत राहते का ? कुठल्याही नवीन जागी, नवीन देशात-प्रदेशात गेल्यावर प्रथम सगळी गिचमीडच असते आणि नंतर त्यातून आकार उमटायला लागतात. या गिचमिडीचा अर्थ लावायचा असेल तर त्याचा तटस्थपणे अभ्यास करावा लागतो; असा प्रोग्रॅम या पिल्लाच्या हार्ड ड्राइव्हवर आधीच टाकलेला आहे, अशी कौतुक-आश्चर्य मिश्रित जाणीव अनेकदा झाली.

(पण माझ्या हार्ड ड्राइव्हवर असलेल्या या प्रोग्रॅमचं काय झालं? काळाच्या वाळवीनं ग्रासला की काय?)

तटस्थपणा हा अभ्यासू नजरेचा भाग झाला; सतत काहीतरी नवीन शोधण्यासाठी धडपडणाऱ्या शरीराचा नव्हे, याची प्रचिती दिवसभरात अनेकदा यायला लागली. माणूस दोन पायांवर चालू लागेपर्यंत ज्या टप्प्यांमधून जातो त्या टप्प्यांमधून जाताना आर्याची आडनावं बदलत गेली – उदाहरणार्थ, झोपेश्वर, कडपालटे, पालथे, रांगणेकर, बैस, (उभं राहायला लागल्यावर) राजकारणे, आणि धावायला लागल्यावर -चोरे ! या सर्व स्थितीतून जाताना जमीन, पाय, डोळे, यांच्यात बेबनाव झाल्यामुळे डोक्याची आणि गुडघ्याची नारळं आपटून जे संगीत निर्माण झालं, ते ध्वनिमुद्रित करून संकलित केलं असतं तर वादनाचा एक नवीन प्रकार निर्माण झाला असता, यात शंका नाही. पडणे-दुखापती ह्यांचा मनावर व्रण उमटू नये अशी काही तरी पूर्वनिर्धारित योजना असावी; त्यांचे शिकवणारे, शहाणपण देणारे अनुभव झाले. त्यामुळे चालणं, धावणं थांबलं नाही.

ही वृत्ती जन्मभर माणसात टिकती तर कित्येक मनःस्वास्थ्याच्या समस्या उपजल्याच नसत्या.

मनात एक सतत वाहत असणारा, नवीन अनुभवासाठी पाटी सतत कोरी ठेवणारा चैतन्याचा धबधबा

असावा का? हा प्रवाह थांबला की अनुभवांचा ताजेपणा जातो, साचलेपण येऊन सर्व इन्द्रियातून जमा होणाऱ्या माहितीची पुटं जमत राहतात -शेवाळासारखी!

माणसाचं पिल्लू धडपड करत दोन पायावर चालायला लागलं की लगेच त्याच्या गतीत वाऱ्याची गती मिसळावी म्हणून घरातील लहान मुलाला त्याची पहिली सायकल घेऊन देण्यात येते; ही घटना सोन्याचा दागिना घेऊन देण्याइतकीच महत्त्वाची ! ही सायकल सगळं जग पादाक्रांत (चाकाक्रांत!) करू शकते. ही जादू सायकल चालवणाऱ्या मध्येच असते. अंगणाच्या एका टोकाला फीनिक्सच्या आजीचं ( खरं )घर असतं आणि दुसऱ्या टोकाला अहमदाबादच्या(हेमडाबॅडच्या) आजीचं ! मध्येच कुठेतरी डेकेयर (ढे खेय्य), सुपरमार्केट

(छुप्प मारक्के) ही ठिकाणं लागतात. रस्त्यावर दिसणाऱ्या (खरोखरीच्या) झाडांची फुलं तोडून (बुरुन) सायकलच्या बास्केटमध्ये टाकली जातात-आजी, फुयी (गुजरातीत आत्या) इत्यादी प्रेमाच्या लोकांना देण्यासाठी!

रस्त्यात पोलीस थांबवतो-वायुवेगानं सायकल चालवल्याबद्दल ! ( अमेरिकेत रेसिडेन्शिअल एरियातली स्पीड-लिमिट फॉल मध्ये (शरद ऋतूत) गळणाऱ्या पानांच्या गती इतकीच असावी असा अलिखित नियम आहे. ) डझनभर अंड्यांपैकी फक्त एक अंडं आतापर्यन्त फोडून बघितलेलं हे माणसाचं पिल्लू सहर्षपणे पोलिसाकडे पाहातं. बागेतील सर्व कळ्यांमध्ये असणारा निरागसपणा आणि वाऱ्याबरोबर डुलणाऱ्या फांद्यांमधला खेळकरपणा,

नियम तोडणाऱ्याच्या चेहेऱ्यावर ओसंडून वाहत असतो. ते पाहून पोलीस क्षणभर आपलं काम विसरतो. सायकलच्या घंटीचा आवाज ऐकून भानावर येत पोलीस म्हणतो, “मिस त्रिवेदी, तुम्ही खूप वेगानी सायकल चालवता आहात, म्हणून तुम्हाला पन्नास डॉलर्स पेनल्टी. ” गुन्हेगार गोड हसत (आपल्या आईसारखं)

“आय सी (छी)”असं म्हणतो आणि नसलेल्या खिशातले पैसे काढून पोलिसाला देतो. पोलीस पैसे मोजायला लागतो. गुन्हेगार म्हणतो, ” डू यू वॉण्ट मोअर ?” पोलीस अजून पैसेच मोजत असतो. तो नैतिकेतचा आदर्श असल्यामुळे मानेनं नकार दर्शवत “यू कॅन गो नाऊ” असं म्हणतो.

गुन्हेगार थोडा पुढे जातो आणि जाहीर करतो की आता तो टीचर आहे. क्षणात पोलिसाचं गुन्हेगारात रूपांतर होतं कारण त्यानी क्रेयॉन्स शेयर केलेले नसतात. त्याला “टाईम आउट” असं म्हणून कठोरपणे छोट्या छोट्या हातांनी एका कोपऱ्यात ढकललं जातं. पण टाईम आउट मध्ये असलेली व्यक्ती सकाळच्या चहाबरोबर घेतलेला नैतिकतेचा डोस विसरून थकलेल्या आणि चिडचिड करणाऱ्या टिचरला अॅपलची लाच देते आणि घरात नेते. थोडंसं अॅपल पोटात गेल्यावर टीचर हुंहू किंवा अहं किंवा हंहं असं म्हणताना मान कुठल्या दिशेने हलवली की त्याचा काय अर्थ होतो याचं गहन असं ज्ञान देते. तोपर्यंत तिच्या आईवडिलांची चाहूल तिला लागते, डोअर बेल वाजते, घरातला कुत्रा पोटतिडकीनं भुंकत दाराच्या दिशेनं पळायला लागतो. आर्या त्याच्यामागे वारा कानात गेल्यागत धावायला लागते आणि “आजही उरलेली अकरा अंडी कशी वाचवली” हा विचार मनात येऊन मी खुसूखुसू हसत त्यांच्यामागे दार उघडायला जाते. तेव्हा अंगणातली सायकल आणि वारा, झाडं आणि वेली, कळ्या आणि फुलं सगळेजण तिच्यावर मायेचे पाश टाकून “खेळायला परत ये, परत ये” असं गुणगुणत असतात.

…. ते सगळ्यांना ऐकू येतं.

लेखिका : सुश्री भाग्यश्री बारलिंगे

मेसा, ॲरिझोना

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२० ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२० ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

देवळांच्या नावांची गंमत…

श्रीजोगेश्वरी आईच्या अगदी समोरून रस्ता जातो ना, तो दातार व दीक्षित वाड्यावरून फरासखान्यापर्यंत पोहोचतो. पुढे एक सुंदर हौद होता तिथे शंकराची मूर्ती व शिवलिंग होत. मध्यभागी असलेली ऐटदार बाहुली तिच्या डोक्यावरचा डेरेदार घडा त्यातून उसळणार, चमचमणारं कारंज आणि हौदातले सूळकन सटकणारे मासे हे आम्हा मुलांचं प्रचंड आकर्षण होत. तिथेच आता दगडूशेठ गणपती विराजमान झाले आहेत. तसेच दगडूशेठ यांच्या नावाचं दत्त मंदिर बाबुगेनू चौकाजवळ आपल्याला दिसतं. अप्रतिम तेजस्वी अतिशय देखणे दत्तगुरु पाहतांना भान हरपून जात. गणपती शेजारी मजूर अड्डा, फरासखाना आणि हुतात्मा भास्कर दा. कर्णिक यांचा स्मृती स्तंभ अजूनही जुन्या स्मृती जागवत ठामपणे उभा आहे. पुढच्या बेलबाग चौकात सिटी पोस्ट, नगर वाचन मंदिर, कोपऱ्यावरचं स्वस्त आणि मस्त बायकांचं आकर्षण ठरलेल साड्यांचे दुकान ‘मूळचंद क्लाथ ‘अजूनही आपलं नांव राखून आहे. या चौकात आल्यावर पुण्याबाहेरच्या लोकांचे पाय फडणीसांच्या बेलबागे कडे हमखास वळतात. अजूनही पूर्वजांचा अभिमान बाळगणारे फडणीसांचे वंशज तिथे राहतात. श्रीविष्णू दर्शनाबरोबर मोरांची भुरळ लोकांना पडते. बाहुलीच्या हौदा कडून डावीकडच्या रस्त्याने शनिवार वाड्याचे बुरुज, पेशवे कालीन श्री गणेश देऊळ, आणि प्रचंड दरवाजाचा शनिवार वाडा पर्यटकांना साद घालतो. तिथलं विस्तीर्ण मोकळं पटांगण म्हणजे आमची सायकल प्रॅक्टिसची हमखास जागा होती. जोगेश्वरी जवळच्या ‘कुलकर्णी अँड सन्स’ मधून एक आणा तासाने भाड्याची सायकल घेऊन आम्ही सीटवर न बसता नुसती सायकल चालवत शनिवारवाडा गाठत होतो. आप्पा बळवंत चौकात फारशी गर्दी नसायची. पण प्रचंड भीतीमुळे पायडल वरचा पाय जमिनीवरच पडायचा. एकदा वसंत टॉकीजला ‘मेरी झाशी नही दूँगी’ हा सिनेमा बघितला. झाशीची राणी डोक्यात शिरली. बाहू स्फुरायला लागले, मग ठरवलं जोगेश्वरी पासून एकदम सीटवर बसूनच सायकलवर स्वार व्हायचं. झाशीच्या राणीचा प्रभाव दुसरं काय! ☺️जिद्दीने चंद्रबळ आणून वळण पार करून प्रभात टॉकीज जवळ आलो. समोर हेsss भल मोठ्ठ नवीन सिनेमाचं पोस्टर लागल होत, त्यात सायकल वरून बागेत फिरणारा नट्यांचा घोळका होता. पोस्टरवर आम्हीच असल्याचा भास झाला, आणि काय सांगू!ते स्वप्न रंगवताना आम्ही एका सायकल स्वाराला धडक दीली. एक सणसणीत शिवी आणि” मरायचंय का?” हे शब्द कानावर पडता क्षणी स्वप्न तुटलं ” घूम जाव” म्हणत चपळाईने मागे वळलो आणि काय सांगायचं तुम्हाला? अहो!नंतर कितीतरी दिवस सायकलिंग बंद पडलं. सासरी केल्यावर मात्र धुळ खात पडलेली सायकल चकचकीत केली. रेल्वे क्वार्टर गावाबाहेर असल्यामुळे मुलांना डबल सीट शाळेत सोडणं, महिन्याचा किराणा भाजी आणण हा पराक्रम सायकलवर बसून करता आला. कारण शनिवार वाड्यासमोरच्या मोकळ्या पटांगणातल्या बटाट्या मारुतीला लहानपणी नवस केला होता ना!नवल वाटलं नां नांव वाचून? हो बटाट्या मारुतीच होता तो. लोखंडी लांबलचक सळ्यांच्या भिंतीच ते छोटसं टुमदार मारुती मंदिर होत. भांग्या मारुती झाला, गावकोस मारुती झाला, आणि हो भाऊ महाराज बोळाजवळचा जिलब्या मारुती पण कळला. परमराम भक्त मारुतीराया तुला आमचा शिरसाष्टांग नमस्कार.

– क्रमशः… 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक गमतीदार प्रवास ☆ सौ.अंजली दिलीप गोखले ☆

सौ.अंजली दिलीप गोखले 

🪷 मनमंजुषेतून 🪷 

☆ एक गमतीदार प्रवास ☆ सौ.अंजली दिलीप गोखले ☆

काही दिवसापूर्वी आम्ही दोघी मैत्रिणी कामासाठी बेळगावला सकाळी जाऊन संध्याकाळी परत आलो. जाताना लवकरच निघालो. स्टेशनवर जाऊन तिकीटे काढली समोरच जोधपूर बेंगलोर एक्सप्रेस लागलेली दिसली.

२-३ बोगीमध्ये चढून पाहिले भरपूर गर्दी. कोठेच बसायला जागा सापडेना. पुनः खाली उतरून दुसऱ्या बोगीत शोध! आमची धावपळ बघून इडल्या विकणाऱ्या भैयाने सांगितले, “बहेनजी, जल्दी बैठो कही भी गाडी छुटने वाली है। भीड तो है ही।” पटदिशी आम्ही चढलो. आत गच्च गर्दी. गर्दीतच सरको सरको म्हणत कशातरी टेकलो तोच गाडी सुटली.

हुश्य करून नजर फिरवली तर बापरे. सगळीकडे बिहारी बसलेले. त्यांचे ते अवतार, नजरा बघून सकाळच्या थंडीत घाम फुटला. महिलांसाठी सेपरेट जागा असते तशी ही बोगी पुरुषासाठी राखीव का आहे असेच वाटले. त्यांचे खोकणे शिंकणे पाहून आम्ही पर्स मधून मास्क काढून आमची सुरक्षा वाढवली.

लोकांची सारखी ये जा सुरु होती. कडेला बसल्यामुळे धक्के खावेच लागत होते तेवढ्यात ढोल घुंगरू वादन सुरुझाले. बरोबरची डोक्यावरून पदर लपेटलेल्या बाईने रामाचा धावा भसाड्या आवाजात सुरु केला. एक हात पुढे पसरून पैसे मागणे सुरु. नेमके आमच्याकडे सुटे पैसे सापडेना. दहाची नोट दिल्या शिवाय गत्यंतर नव्हते.

आम्ही दोघी शेजारी खेटून बसूनही बोलायला काही मिळेना. चहा वाले, इडली वडा यांची ये जा तर अखंड!

बाहेर हिरवीगार शेती डोळ्याला दिलासा देत होती. निसर्ग मुक्तपणे आपले सौंदर्य उधळत होता. ते पाहून मात्र मन प्रसन्न झाले. शेतात ऊस डोलत होता. हिरवीगार पालेभाजी मनाला तजेला मिळवून देत होती.

स्टेशनवर आणखीन प्रवासी चढतच होते उतरायचे मात्र कोणीच मनावर घेत नव्हते. कसे तरी अडीच तास गेले आणि बेळगावच्या खुणा दिसायला लागल्या. मनोमन हुश्य झाले पण हाय! मध्येच रेल्वे थांबली ते थांबलीच. का तेही समजेना. बिहारी चे आवाज वाढले. गप्पा वाढल्या. खाण्याचे डबे उघडून खाणे सुरु झाले आम्हाला तर हालताही येत नव्हते. कुणीकडून आज चाललोय प्रवासाला असेच वारंवार मनात येत होते.

अर्ध्या तासाने एकदाचा प्रवास पुनः सुरु झाला. गाडीच्या दोन्ही बाजूंना आता घरे सुरु झाली. इतकी जवळ घरे की आतले सगळे दिसत होते. लहान मुले हात वर करून खदा खदा हसत होती. बायका बाहेरच भांडी घासत होत्या. दोन्ही कडच्या घरांमधून गाडी सुसाट धावत होती.

अखेर एकदा बेळगाव स्टेशन आले. हुश्य करून खाली उतरलो. बेळगाव स्टेशन छान स्वच्छ आहे.

काम झाले की आम्हाला लगेचच परतायचे होते. पुढचा परतीच्या प्रवासाचीच धास्ती होती. आमचे तिथले काम अपेक्षेपेक्षा खूपच पटकन झाले. रेल्वे पकडायची म्हंटले तर ३-४ तास उगीचच थांबायला लागणार होते म्हणून एस. टी. चा प्रयत्न करायचे ठरवले.

कर्नाटक मध्ये आलोय म्हणजे डोसा तर खायलाच पाहिजे. म्हणून त्यावर ताव मारला आणि बेळगाव एस टी स्टँडवर आलो. अपेक्षेपेक्षा जास्त स्वच्छ आहे फार गर्दीपण नव्हती.

आता मात्र आमचे लक जबरदस्त होते. मिरजला जाणारी बस स्टँडवर तयारच होती. आम्ही पटकन चढलो. बसमध्ये बसायला छान जागा मिळाली.

पाच मिनीटांत बस सुटली. आम्ही महाराष्ट्री असल्यामुळे आम्हाला पूर्ण तिकीट काढावे लागले आणि पुढे खरी गम्मत सुरु झाली बस हायवे वरून जाणार नव्हती. छोट्या छोट्या गावांचे स्टॉप घेणार होती.

पहिला स्टॉप आल्या बरोबर कर्नाटकी महिलांची झुंड दारापाशी धावत आली आणि बसमध्ये मोर्चा आल्या सारख्या महिला अक्षरशः घुसल्या. टिपिकल साड्या, डोक्यात गजरा, नाकात चमकी. गळाभरून मोत्याच्या माळा, घसघशीत मंगळसूत्र आणि कन्नड बोलणे. बघता बघता बस खचाखच भरली. ड्रायव्हर कंडक्टर आणि जेमतेम सहा सात पुरुष प्रवासी. बाकी सगळ्या महिला. सगळ्याजणी कुठल्याशा यात्रेला चालल्या होत्या.

येताना रेल्वे मध्ये आम्ही दोनच महिला आणि आता कसे बसे बिचारे ७-८ पुरुष. तिकडे महिलांना बसप्रवास पूर्ण मोफत त्यामुळे ता आनंदात सगळ्या यात्रेला चालल्या होत्या. कंडक्टरचे काम पैसे घेऊन तिकीटं काढणे नाही तर त्यांचे आधारकार्ड तपासणे. तो आपले प्रत्येकीचे कार्ड नुसते बघूनच परत करत होता. बिचारा गर्दीमध्ये घामेघूम झाला होता.

पुढचे स्टॉप आले की बायका अजूनच येत होत्या. एक सिट कशीबशी रिकामी झाल्यावर दुसऱ्या बाईने पटकन बसकण मारली आणि झाले, खिडकी शेजारची बाई डोळे वटारून तिच्या दंडाला ढकलायला लागली. तोंडाने डब्यात दगड खडबडल्या सारखी बडबड सुरु होती. बसलेली बाई पण कमी नव्हती. तिचाही जोरजोराने बड बड करत हातवारे करून ड्रामा सुरु झाला. दोघीही थांबायला तयार नव्हत्या. दोघीचे आवाज टिपेला पोहोचले. ढकलाढकली सुरु झाली. कंडक्टरने बेल वाजवून बस थांबवली.

आता इतर बायकांचा गलका वाढला. कंडक्टर जोरात ओरडला. त्यातला पोलीस शब्द तेव्हढा कळाला. बापरे ! पुढे काय होणार म्हणून आमच्याच पोटात गोळा आला.

पण त्या वाक्याचा अर्थ कळाल्यामुळे बसमध्ये एकदम सन्नाटा पसरला आणि कंडक्टरने डबल बेल मारली. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.

छोटी छोटी गावं येत होती. चार महिला उतरल्या की दहा घुसत होत्या. गावाची नावपण आम्हाला समजत नहती कारण सगळी कन्नड मध्ये. थोड्या वेळाने एक मोठे गाव आले एका दुकानाच्या बोर्डवर इंग्रजी नाव दिसले : हुकेरी !

इथेही स्टॅडवर गर्दी ! दोन जाडजुड राजस्थानी लमाण्या वाटाव्या अशा महिला सगळ्याना ढकलत आत चढण्यात यशस्वी झाल्या. यानी आमच्या सारखेच फुल तिकीट काढले. त्या दोघीमुळे कंडक्टरलाच जागा राहिली नाही. बस इतकी गच्च भरली होती पण ड्रायव्हर सराईतासारखा जोरात गाडी हाणत होता.

कर्नाटकात बस फुकट शिवाय प्रत्येकीला २००० रु दर महिना मिळतात म्हणे त्यामुळे शेतात काम करायला कोणी तयार नाही. पुरुषांना घरी बसवून बायका सतत फिरत रहातात असे ऐकले.

पूर्वीचे घर, चूल आणि मूल हे या महिलांनी कधीच झिडकारलय. आता पुरुष बिच्चारे झालेत कारण त्यांना काम ही करावे लागते, पैसाही मिळवावा लागतो आणि अशा वांड बायकाना सांभाळत संसार करावा लागतो.

भावाना बहिणींचा फारच पुळका आलाय खरं पण पुढे काय वाढून ठेवलय परमेश्वर जाणे !

आमचा स्टॅण्ड आल्यावर हुश्य करून उतरलो आणि बेळगावच्या बसला टाटा करून घरची वाट धरली.

© सौ. अंजली दिलीप गोखले

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत !” –  भाग- २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत !” –  भाग- २   ☆ श्री संभाजी बबन गायके 

नायब सुभेदार संतोष राळे

(प्रचंड गोळीबारामध्ये आपल्या सैनिकांनी जड युद्ध साहित्य जीवाचा धोका पत्करून पोहोचवण्याची कामगिरी यशस्वी केली.) – इथून पुढे 

हे पथक एक डोंगर चढू लागले. अंधारले होते… संतोष यांना हलकीशी चाहूल लागली… समोरून डोंगरउतारावरून कुणी तरी येत होते! सर्वांनी त्वरीत पवित्रा घेतला. संतोष साहेबांना त्यांना वाटले की हे आपलेच जवान असण्याची शक्यता आहे. काहीवेळा आपलेच जवान स्थानिक लोकांच्या वेशात त्या भागात फिरून माहिती घेत असतात. त्या दोघांकडे काही शस्त्रेही दिसत नव्हती. संतोष साहेबांनी आपल्याजवळील walki-talkie वरून त्या तिघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला… पण फ्रीकेव्न्सी जुळली नाही! तेंव्हा मागे असलेल्या वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला… काही तरी निर्णय घेणे गरजेचे होते. म्हणून संतोष यांनी सावधपणे त्या दोघांकडे जाण्याचा निर्णय घेतला… त्यांनी सहकारी जवानांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आणि ते पुढे निघाले… एवढ्यात त्यांच्या दिशेने एक गोळी फायर झाली… ती गोळी संतोष यांच्या डोक्याच्या अगदी जवळून मागे गेली आणि दगडावर आदळली… साहेब अगदी थोडक्यात बचावले होते…. सावध असलेल्या संतोष यांच्या एके-४७चा रोख त्या तिघांवर होताच.. त्यांनी एक जोरदार फैर अचूक झाडली… ते तिघेही त्या टेकडीवरून गडगडत खाली आले ते अगदी संतोष साहेब जिथे बसले होते त्याजागेच्या अगदी जवळ…. त्या तिघांच्या हातांतली शस्त्रे ते टेकडीवर खाली गडगडत येताना टेकडीवरच पडली होती… संतोष यांनी तीन अतिरेकी ठार मारले होते! 

संतोष साहेबांनी खबरदारी म्हणून या तिघांच्याही मृतदेहांच्या टाळक्यात एक एक गोळी घालण्याचे आदेश त्यांच्या सहका-याला दिले. ते तिघे एकमेकांशेजारीच जणू एका ओळीत पडलेले होते… आपल्या जवानाने पहिल्याच्या डोक्यात एक गोळी घातली…. दुस-याच्याही डोक्यात एक गोळी घातली… त्याच्या डोक्यातील मेंदू बाहेर पडून तिस-याच्या डोक्यावर जाऊन पडला!… जवानाला त्या गडबडीत असे वाटले की तो तिसराही अतिरेकी खलास झालेला आहे.. आता परत गोळी मारण्याची गरज नाही! तो तिसरा जिवंत राहिलेला होता!….. आणि दुर्दैवाने हे लक्षात आले नव्हते! 

हे तिघे अतिरेकी जिथून आले तिथेच आणखी काही अतिरेकी लपून बसलेले होते. जोजन साहेबांच्या सोबत झालेल्या चकमकीत त्यांच्यापैकी काहीजण जबर जखमी होते, शिवाय त्यांच्याजवळचा दारूगोळाही बहुदा संपुष्टात आला असावा. या अतिरेक्यांच्या शोधात संतोष आणि त्यांचे पथक पहाड चढू लागले. एकेठिकाणी शंका आली म्हणून ते दोन मोठ्या पत्थरांच्या आडोशाला बसले… अंदाज घेण्यासाठी जरासे डोके वर काढले तेंव्हा एकाचवेळी तीन बाजूंनी जबरदस्त फायरिंग सुरु झाले. संतोष यांनी ताबडतोब जमिनीवर लोळण घेतली… अतिरेकी त्यांच्या वरच्या बाजूला होते.. त्यांना अचूक नेम साधता येत होता… त्यांनी संतोष यांच्यावर फायर सुरु केला… त्यांच्या मस्तकाच्या अगदी वरून गोळ्या सुसाट मागे जात होत्या… माती डोळ्यांत उडत होती… इतक्यात तिथल्या एका झाडाची वाळलेली फांदी साहेबांच्या डोक्यावर पडली! तशाही स्थितीत त्यांनी जवाबी फायरींग जारी ठेवले… त्यातले काही जण बहुदा मागे पळाले असावेत.. एका अतिरेक्याच्या रायफलची magazine तुटली… तो एका झाडाच्या आड ती magazine बदलण्याच्या प्रयत्नात उभा होता… त्याची रायफल कोणत्याही क्षणी गोळीबारास सुरुवात करणार होती…. संतोष यांनी त्याला आपल्या जीवाची पर्वा न करता दुस-या बाजूने जात जबरदस्त ठोकला… त्याचे हात, पाय वेगवेगळ्या दिशेला उडाले…. कोथळा बाहेर पडला… ! आधीचे तीन आणि आता हा चौथा बळी मिळवला होता संतोष यांनी. त्याचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देऊन मग संतोष साहेब खाली आधीच्या जागेपर्यंत आले. रात्री ठार मारलेल्या तिघांपैकी एकाचा मुडदा तिथून गायब होता. रात्री अंधारामुळे काहीसा गोंधळ उडाला असावा… दोनच अतिरेकी असावेत असा समज झाला.. पण तेवढ्यात संतोष यांना तेथील एका झाडामागे काही हालचाल दिसली… तर रात्री ‘मरून’ पडलेला अतिरेकी चक्क जिवंत होता… त्यांना स्वत:ची स्वत: मलमपट्टी केलेली होती! साहेबांनी त्याला लांबूनच आवाज दिला आणि वरिष्ठ अधिका-यांच्या मेसेज नुसार त्याला शरण येण्यास फर्मावले. संतोष साहेबांनी त्याला त्याच्या अंगावरचे सर्व कपडे काढून टाकून पुढे यायला सांगितले..

पण त्याला यांची भाषा काही समजेना. मग वरिष्ठ साहेबांनी एक दुभाषी तिथे धाडला. त्या अतिरेक्याने त्या दुभाषामार्फत सांगितले की तो जखमी असल्याने चालू शकत नाही.. एक पाय निकामी झाला आहे… त्यामुळे कपडे काढणे शक्य नाही… जवळ कुठलेही हत्यार नाही! संतोष यांनी त्या अतिरेक्याजवळ जाण्याचा निर्णय घेतला….. पण सहकारी जवानाला त्याच्यावर नेम धरून बसायला सांगितले.. जरासा जरी हलला तरी लगेच ठोक! संतोष साहेब त्या अतिरेक्याच्या जवळ जात असताना त्याने त्याच्या कपड्यात लपवलेला हातागोळा काढला आणि त्याची पिन उपसून तो साहेबांच्या अंगावर फेकला… पण त्या फेकण्यात विशेष जोर नव्हता… संतोष साहेबांनी त्वरीत जमिनीवर लोळण घेतल्याने त्यांना त्या फुटलेल्या गोळ्याचा काही उपद्रव झाला नाही…. तो गोळा त्या अतिरेक्याच्या अगदी जवळच फुटल्याने आणि त्यात आपल्या जवानाने अचूक निशाणा साधल्याने तो आता मात्र कायमचा गेला! आधीच मेलेल्या दोघांचे मृतदेह तिथून हलवताना साहेबांनी काळजी घेतली… हे अतिरेकी मरताना त्यांच्या जवळचा हातागोळा अंगाखाली लपवून ठेवतात… त्यांचा देह उचलायला जाताच तो गोळा फुटेल अशी व्यवस्था करून ठेवतात. उत्तम प्रशिक्षण घेतलेल्या संतोष यांनी त्यांचा हा डाव ओळखला…. अतिरेक्यांच्या बुटाला दोरी बांधून ती जंगली कुत्री मागे ओढली…. हातगोळ्यांचे स्फोट अतिरेक्यांच्या शरीरांना आणखीनच क्षतविक्षत करत गेले! 

आधी डोंगरावर मारल्या गेलेल्या एकाचा साथीदार दुस-या मार्गाने आपल्या मागे असलेल्या तुकडीच्या दिशेने निघाला होता. पण एका प्रामाणिक खबरीने वेळेत सूचना दिल्याने त्याचाही आपल्या जवानबंधूनी खात्मा केला…. सर्वांनी मिळून सहा दिवसांत एकूण अठरा अतिरेक्यांना कंठस्नान घडवले होते.

त्यावेळी हवालदार पदावर कार्यरत असलेले श्री. संतोष राळे यांना पुढे नायब सुबेदार म्हणून बढती मिळाली. नंतर त्यांना लेबानन या आफ्रिकी देशात शांतीसेनेत काम करण्याची संधीही मिळाली! 

१८ अतिरेक्यांच्या निर्दालनात सहभागी होण्याची ही अतुलनीय कामगिरी बजावून संतोष साहेब गावी आले… हा मराठी मातीतला रांगडा गाडी…. अगदी down to earth! त्यांनी घरी काहीही सांगितले नव्हते. देशासाठी लढण्याचे आणि शत्रूला ठार मारण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान त्यांच्या हृदयात होते.. ये दिल मांगे मोअर… ही त्यांची इच्छा होती. आता पुढची लढाई कधी याची ते वाट पहात होते. आणि आपण काही फार मोठी कामगिरी केली आहे याचा साधा लवलेशही त्यांच्या बोलण्यात, वागण्यात दिसत नव्हता… आणि आजच्या घडीलाही दिसत नाही.

त्या दिवशी त्यांच्या गावातल्या शाळेत प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम होता. नायब सुबेदार संतोष राळे साहेब या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यादिवशीच्या वर्तमानपत्रात बातमी होती…… आपले सुपुत्र श्री. संतोष राळे यांना अशोक चक्रानंतर दुसरे स्थान असलेले कीर्ती चक्र जाहीर झाले आहे! गावकरी लोकांनीच त्यांना ही खबर दिली… त्यादिवशी दूरदर्शनवरही बातमी दिसली… संतोष साहेबांनी फोन करून खात्री करून घेअली… तेंव्हा त्यांना खरे वाटले… कारण एवढा मोठा पुरस्कार मिळेल असे त्यांना वाटलेही नव्हते. उलट आपले मोठे अधिकारी आणि जवान गमावल्याचे दु:ख त्यांना होते! 

२९ मार्च २००९ रोजी भारताच्या तिन्ही सेनादलांच्या सुप्रीम कमांडर तत्कालीन महामहीम राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते कीर्ती चक्र स्वीकारताना नायब सुबेदार श्री. संतोष तानाजीराव राळे यांची छाती अभिमानाने फुलून आली होती… आईच्या गर्भात शिकलेली झुंजाराची रीत त्यांनी प्रत्यक्षात रणभूमीवर उपयोगात आणली होती!

(ही शौर्यगाथा काश्मीरमधील मच्चील सेक्टर, नारनहर नावाच्या ओढ्याच्या परिसरात घडलेली असल्याने त्याला ऑपरेशन नारनहर असे नाव आहे. सदर माहिती मी राळे साहेबांच्या अनेकांनी घेतलेल्या मुलाखती, बातम्या इत्यादी मधून संकलित केली आहे. कर्नल त्यागवीर यादव साहेबांनी संतोषजी यांची मुलाखत खूप छान घेतली आहे.)

– समाप्त –

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “साडेसाती…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ “साडेसाती…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

एका मैत्रिणीने संदेश पाठवला, “कोणताही बाष्कळपणा न करता, जरा गंभीरपणाने साडेसातीवर लेख लिहिशील का?”

मी, “तुला साडेसाती सुरू झालीय का?” असे विचारले.

त्यावर ती म्हणाली, “नवऱ्याला साडेसाती सुरू झाली आहे. “

मी म्हंटले, ” मग तू कशाला काळजी करतेस? त्याला आतापर्यंत सवय झाली असेल. “

त्यावर ती खळखळून हसली, म्हणाली, “झाला तुझा वाह्यातपणा सुरू?”

विनोदाचा भाग सोडला तर गेल्या महिन्याच्या अखेरीस शनीने घर बदलले आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली….

कोणाची संपली?

कोणाची सुरू झाली?

काय म्हणून काय विचारता महाराजा, “साडेसाती”!

मकर, कुंभ आणि मीन या तीन राशींना सध्या साडेसाती सुरू आहे.

शनी ज्या राशीत असेल त्या राशीला साडेसात वर्ष काही अप्रिय घटना आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो असे समजले जाते, म्हणून त्या कालावधीला साडेसाती असे नाव पडले. ती येऊ नये असे प्रत्येकाला वाटत असेल तरी ती कोणालाही टाळता येत नाही. ज्योतिष मानत नाही, असे कितीही म्हंटले तरी प्रत्येक माणूस मनातून साडेसातीला थोडातरी घाबरतो.

एक गोष्ट आहे…..

शनी आणि लक्ष्मी दोघांनी विष्णूला विचारले की “आमच्यातले कोण छान दिसते?”

प्रसंगावधानी, हजरजबाबी विष्णू भगवान म्हणाले,

“लक्ष्मी येताना छान दिसते

आणि

शनी महाराज जातांना चांगले दिसतात. “

शनी परीक्षक आहे. शाळेत अभ्यास किंवा ऑफिसमध्ये ऑडिट असते, तशी साडेसाती असते. चोख वागेल त्याने घाबरायचे काहीच कारण नाही.

दर तीस वर्षांनी भेट देऊन साडेसात वर्ष मुक्काम करत असल्याने प्रत्येकाला आयुष्यात दोन ते तीन वेळा साडेसातीला सामोरे जावे लागते.

देशपांडे नावाचे माझे सहकारी साहेबांनी बोलावले की…

“मी सरांशी गप्पा मारून आलोच” असे सांगून जायचे. आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरून साहेब काय बोलले असावे याचा अंदाज येत नसे.

एकदा त्यांना विचारले,

“तुम्हाला सर ओरडत नाहीत का? चुका काढत नाहीत का?”

देशपांडे म्हणाला, “ओरडतात. “

मी: ” तुम्हाला वाईट वाटत नाही का?”

देशपांडे: “वाटतं… , मीही माणूस आहे. मी मन लावून काम करतो त्यामुळे कौतुक व्हावं, अशी मला अपेक्षा असते… पण एका साहेबांनी मला सांगितले, ते मी लक्षात ठेवलं आहे. “

मी: “काय?”

देशपांडे: “एकदा साहेब मला ओरडले म्हणून मी खूप नाराज झालो. ऑफिसची वेळ संपली तरी रागाने काम करत बसलो. साहेब घरी निघतांना त्यांना मी दिसलो. ते मला म्हणाले, “देशपांडे चला, चहा पिऊ. “

चहा पितांना ते म्हणाले,

“देशपांडे, तू लहान आहेस म्हणून सांगतो. जो माणूस कौतुक करतो तो आवडतो, जो चुका दाखवतो त्याचा राग येतो. हा मनुष्य स्वभाव आहे. घरी वडील आणि ऑफिसमध्ये साहेब काहीही बोलले तरी राग धरायचा नाही. त्यात आपले भले असते. आपण मानत नसलो तरी त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतं. त्यांना जे माहित आहे ते त्यांनी सांगितले नाही तर आपल्याला कळणार कसे? गोड बोलून जी कामे होत नाहीत ती कडक वागण्याने लवकर होतात. वडिलांना मुलांचे भले व्हावे असे वाटत असते, साहेबांनाही सहकाऱ्यांचे चांगले व्हावे, काम उत्तम व्हावे असेच वाटते. त्यांची खुर्ची त्यांना लोकांमधे फार मिसळू देत नाही, आणि त्यांना फार गोड बोलता पण येत नाही. “

शनी महाराज असेच असतात. पितृतुल्य मायेने धाकात ठेवतात. ते शत्रू नाहीत, ते करतील त्यात माणसाचे शंभर टक्के हित असते. ते मनाविरुद्ध असल्याने माणूस नाराज होतो, त्यात शनीचा दोष नाही.

शनीसारखी निष्ठा असावी, वाईटपणा येऊनही तो त्याचे काम चोख करतो.

साडेसातीत माणूस कमी कालावधीत खूप शिकतो, दृष्टिकोन बदलतो, माणसे ओळखायला लागतो, स्वतःच्या क्षमता जाणतो, शिस्त अंगी बाणते. माणूस घाबरला, विरोधात गेला तर त्रास होतो कारण व्हायचे ते होतेच. कष्टाची, बदलाची, लीनतेची तयारी ठेवली तर माणूस यातून सहजपणे पार होतो. कोणत्याही कल्पना, तक्रारी केल्या नाहीत तर हा काळ खूप प्रगतीचा ठरतो, जातांना खूप संधी, अनुभव, शहाणपण देऊन जातो. या काळाकडे कसे बघतो, कसे सामोरे जातो त्यावर होणारा त्रास अवलंबून असतो.

टिळक, सावरकर यांनी तुरुंगवासातही उत्तम साहित्य निर्माण केले. संधीचा फायदाच नाही तर त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मार्ग शोधला… अशी जिगर हवी. ओझे घेऊनच चढावे लागणार असेल तर खाऊ आणि पाणी घेऊन चढण्याचे प्रसंगावधान हवे. कधी कधी अचानक पाऊस येतो, जवळ छत्री, रेनकोट काहीच नसते. पाऊस पडणे कोणाच्याच हातात नसते, त्यामुळे न चिडता थांबायचे किंवा भिजायचे, हे दोनच पर्याय असतात. वेळ नसेल तर भिजत जायचे, वेळ असेल तर थांबायचे, ही निर्णयक्षमता साडेसातीत येते. चिडचिड करून त्रास करून घ्यायचा नाही, हे शहाणपण येते. भिजत जातांना किंवा वाट बघतांना चहा, भजी, कणीस असे काही खायचे, हे कळते.

चांगल्या वाईट घटना आयुष्यभर घडत असतात. कधी इतरांची साथ मिळते, कधी नाही. आपला आनंद आपण मिळवायचा, आपली वाट आपण आत्मविश्वासावर चालायची, कुबड्या घेऊन चालायचे नाही हे माणूस शिकतो. मला वाटले, माझ्या लक्षात आले नाही, इतकं चालतं, अशी वाक्ये मनात आणायची नाहीत. नाही तर महाराज पिच्छा पुरवतात.

शरण जाणे, हा सोपा मार्ग आहे, पण अहंकार आड येतो. अहंकार मनात धरून मारुती, पिंपळ, कोणालाही फेऱ्या मारून उपयोग होत नाही. अंगी नम्रता असेल तरच शांत राहता येते. गुरूला शरण जाणे, हा सर्वात उत्तम मार्ग आहे. गुरूकडे गेलं की बरीचशी तयारी गुरू करून घेतात.

शाळेत असताना शिकवणी लावून अभ्यास करा किंवा आपापला करा, अभ्यास करावा लागतो, परीक्षा नको, अभ्यास नको असे म्हणून चालत नाही.

हॉटेलमध्ये खाल्लं की बिल द्यावे लागते, नाहीतर भांडी घासावी लागतात.

डोकं शांत, मन प्रसन्न, काम चोख असेल तर काय चुकतंय, काय करायला हवं हे लक्षात येतं.

स्वतः च्या चुका ऐकूनही घेत नाही म्हणून माणसात सुधारणा होत नाही. कोणी सांगितले तरी माणूस चुका स्वीकारत नाही आणि सुधारतही नाही. चूक मान्य केली तर सुधारायची थोडी तरी शक्यता असते.

…. घाबरावे असे शनी काही करत नाही.

आरोग्य आणि अध्यात्म या दोन गोष्टीचे माणसाला महत्त्व पटवण्याचे आणि पैसा, संपत्ती, मीपणा यावरचे लक्ष कमी करण्याचे काम शनी महाराजांकडे सोपवले आहे. त्यांचा अनुभवावर, कृतीवर, शिस्तीवर भर आहे, समजवण्यावर नाही, ते उपदेश करत नाहीत, थेट अनुभव देतात.

माणसाला असणारी धुंदी / गुर्मी उतरवण्याचे काम शनी महाराजांना दिले आहे.

गीतेत कर्मण्येवाधिकारस्ते असे सांगितले आहे, त्याचा वस्तुपाठ शनी करून घेतात.

गीता, एकंदरीत संतसाहित्यात असलेला उपदेश शनी प्रत्यक्ष कृतीत आणायला लावतो.

ज्या माणसांना कष्ट, शिस्त, नम्रपणा आवडत नाही त्यांना साडेसातीत त्रास होतो. खरं तर राग आणि अहंकाराने माणसाचे पूर्ण आयुष्यच खडतर जाते, त्रास होतो. अतीचिकित्सा न करता काही गोष्टी सोडून देतात ती माणसे समाधानी, आनंदी असतात.

आयुष्य पूर्ण चांगले किंवा पूर्ण वाईट कधीच नसते… साडेसातीत नाही तर एकूण आयुष्यातच…

मी म्हणेन ते, मी म्हणीन तसे, मी म्हणीन तेव्हा…. असे वागणाऱ्या माणसांना मानसिक त्रास जास्त होतो.

माणूस जे ठरवतो ते होतेच असे नाही,

होईल ते त्याच्या मनाप्रमाणे असते असे नाही,

तो करेल त्याचे श्रेय त्याला मिळते असेही नाही,

तो ज्यांना आपले समजतो ते त्याच्याशी आपलेपणाने वागतील असे तर मुळीच नाही.

एका मुलाला त्याची आई स्वतःची कामे कर असे सांगत असते. आई एकदा त्याला कपडे धुवायला सांगते. तो कसेतरी धुतो. आई कपडे मातीत टाकून परत धुवायला लावते.

‘तू नीट कपडे धुतलेस तरच जेवायला मिळेल, ’ असे सांगते. मुलगा कपडे नीट धुतो, पण वाळत कसेतरी घातले म्हणून आई ते कपडे परत धुवायला लावले…..

त्या मुलाने नंतर आयुष्यभर कपडे स्वच्छ धुतले आणि नीट वाळत घातले.

ही सत्यघटना आहे. याला शिस्त म्हणणार की छळ? हे वळण / शिस्त वाटत असेल तर शनी वाईट वागवतो असे वाटणार नाही. चूक न सुधारता नुसती सांगून उपयोग नाही.

साडेसाती ही माणसाला सुधारण्यासाठी दिलेली संधी असते, त्या संधीचे सोने करावे.

ज्ञानी, कर्तव्यकठोर, शिस्तप्रिय, धीरगंभीर शनी महाराज माणसाला खंबीर बनवतात. काहीही आयते देत नाहीत. काही मिळवायचे असेल तर कष्ट करायला लावतात.. माहिती हवी असेल तर अभ्यास करावा लागतो, आराम करून चालत नाही.

… साडेसाती म्हणजे नुसता त्रास नसतो, त्याची रसाळ फळे नंतर नक्की मिळतात.

साडेसातीसाठी आध्यात्मिक उपाय या लेखात नाहीत, तो उद्देशही नाही. साडेसातीमागची मनोभूमिका मांडली आहे. आहे त्या परिस्थितीला सामोरे जाणे उत्तम.

मग आता सांगा बरं, साडेसाती चांगली की वाईट????

शुभं भवतु !

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संवाद # 149 ☆ लघुकथा – आस ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

डॉ. ऋचा शर्मा

(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में  अवश्य मिली है  किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में  प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है एक हृदयस्पर्शी एवं विचारणीय लघुकथा ‘आस। डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद  # 149 ☆

☆ लघुकथा – आस ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

“सर! अनाथालय से एक बच्ची का प्रार्थना पत्र आया है।”

“अच्छा, क्या चाहती है वह?”

“पत्र में लिखा है कि वह पढ़ना चाहती है।”

यह तो बड़ी अच्छी बात है। क्या नाम है उसका?

रेणु।

“रेणु? अरे! वही जो अभी तक स्कूल आने के लिए तैयार ही नहीं थी ? कितना समझाया था हम लोगों ने उसे लेकिन वह पढ‌ना ही नहीं चाहती, स्कूल आना तो दूर की बात है। हम सब कोशिश करके थक गए पर वह बच्ची टस से मस नहीं हुई। अब अचानक वह स्कूल आने के लिए कैसे मान गई , ऐसा क्या हो गया? — वह अचंभित थे।”

“सर! आप रेणु का यह प्रार्थना- पत्र पढ़िए” – स्कूल की शिक्षिका ने पत्र एक उनके हाथ में देते हुए कहा।

“टीचर जी! मुझे बताया गया है कि विदेश से कोई मुझे गोद लेना चाहते हैं| मुझे मम्मी पापा मिलने वाले हैं| मुझे अंग्रेजी नहीं आएगी तो मैं अपने मम्मी पापा से बात कैसे करूंगी ? कब से इंतजार कर रही थी मैं उनका, मुझे उनसे बहुत सारी बातें करनी हैं ना! मुझे स्कूल आना है, खूब पढ़ना है।”

——

© डॉ. ऋचा शर्मा

प्रोफेसर एवं अध्यक्ष – हिंदी विभाग, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर. – 414001

संपर्क – 122/1 अ, सुखकर्ता कॉलोनी, (रेलवे ब्रिज के पास) कायनेटिक चौक, अहमदनगर (महा.) – 414005

e-mail – [email protected]  मोबाईल – 09370288414.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # 236 ☆ हाथों में ले हाथ… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना हाथों में ले हाथ। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – आलेख  # 236 ☆ हाथों में ले हाथ…

स्नेह शब्द में इतना जादू है कि इससे इंसान तो क्या जानवरों को भी वश में किया जा सकता है। मेरी  सहेली रमा  जब भी  मुझसे मिलती यही कहती कि कोई मुझे स्नेह  नहीं करता,  मैंने उससे कहा सबसे पहले तुम खुद से प्यार करना सीखो,  जो तुम दूसरों से चाहती हो वो तुम्हें खुद करना होगा  सबसे पहले खुद को व्यवस्थित रखो,  स्वच्छ भोजन,  अच्छे कपड़े, अच्छा साहित्य व सकारात्मक लोगों के साथ उठो- बैठो। जैसी संगति होगी वैसा ही प्रभाव  दिखाई देता है।  जीवन में एक लक्ष्य जरूर होना चाहिए जिससे उदासी हृदय में घर नहीं करती।  हृदय की शक्ति बहुत विशाल है यदि हमने दृढ़ निश्चय कर लिया तो किसी में हिम्मत नहीं कि वो हमारे  फैसले को बदल सके।

कोई भी कार्य शुरू करो तो मन में तरह- तरह के विचार उतपन्न होने लगते हैं क्या करे क्या न करे समझ में ही नहीं आता। कई लोग इस चिंता में ही डूब जाते हैं कि इसका क्या परिणाम होगा बिना कार्य शुरू किए परिणाम की कल्पना करना व भयभीत होकर कार्य की शुरुआत  न करना।

ऐसा अक्सर लोग करते हैं,  पर वहीं कुछ  ऐसे लोग भी होते हैं जो अपने लक्ष्य के प्रति सज़ग रहते हैं और सतत चिंतन करते हैं जिसके परिणामस्वरूप उनकी सकारात्मक ऊर्जा में वृद्धि होती रहती है।

द्वन्द हमेशा ही घातक होता है फिर बात  जब अन्तर्द्वन्द की हो तो विशेष ध्यान रखना चाहिए क्या आपने सोचा कि जीवन भर कितनी चिन्ता की और इससे क्या  कोई लाभ मिला?

यकीन मानिए इसका उत्तर शत- प्रतिशत लोगों का  नहीं  होगा।  अक्सर हम रिश्तों को लेकर मन ही मन उधेड़बुन में लगे रहते हैं कि सामने वाले को मेरी परवाह ही नहीं जबकि मैं तो उसके लिए जान निछावर कर रहा हूँ ऐसी स्थिति से निपटने का एक ही तरीका है आप किसी भी समस्या के दोनों पहलुओं को समझने का प्रयास करें। जैसे ही आप  हृदय व सोच को विशाल  करेंगे सारी समस्याएँ स्वतः हल होने लगेंगी।

सारी चिंता छोड़ के,  चिंतन कीजे नाथ।

सच्चे  चिंतन मनन से,  मिलता सबका साथ।।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

 

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – शब्दकोश ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – शब्दकोश ??

वह लिखती रही विरह,

मैं बाँचता रहा मिलन,

चलो शोध करें,

दृष्टि बदलने से

शब्द का अर्थ

बदल जाता है क्या?

…और पता नहीं कैसे

मेरे पास बदले अर्थों का

एक शब्दकोश

संचित हो गया है..!

?

© संजय भारद्वाज  

11:07 बजे , 3.2.2021

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 15 मार्च से आपदां अपहर्तारं साधना आरम्भ हो चुकी है 💥  

🕉️ प्रतिदिन श्रीरामरक्षास्तोत्रम्, श्रीराम स्तुति, आत्मपरिष्कार मूल्याकंन एवं ध्यानसाधना कर साधना सम्पन्न करें 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ ‘“अभिमन्यु ” श्री संजय भारद्वाज (भावानुवाद) – ‘Abhimanyu…’ ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

We present an English Version of Shri Sanjay Bhardwaj’s Hindi poem “अभिमन्यु.  We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji (who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages) for this beautiful translation and his artwork.)

English Version by – Captain Pravin Raghuvanshi

?~ Abhimanyu… ~??

I am indebted to  those

who wove an intricate web,

— a Chakravyuh, the

proverbial labyrinth

around me

to hold me back…!

For, in doing so,

unwittingly, they forged

the indomitable

Abhimanyu inside me…!!

♥ ♥ ♥ ♥ ♥

~ Pravin Raghuvanshi

24 February 2025

♥ ♥ ♥ ♥ ♥

श्री संजय भारद्वाज जी की मूल रचना

? संजय दृष्टि – अभिमन्यु  ? ?

कृतज्ञ हूँ

उन सबका,

मुझे रोकने

जो रचते रहे

चक्रव्यूह..,

और परोक्षतः

शनैः- शनैः

गढ़ते गए

मेरे भीतर

अभिमन्यु..!

?

♥ ♥ ♥ ♥

© संजय भारद्वाज  

मोबाइल– 9890122603, संजयउवाच@डाटामेल.भारत, [email protected]

☆☆☆☆☆

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ चुभते तीर # 44 – सरकारी फाइलों का महाप्रयाण ☆ डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ ☆

डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’

(डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ एक प्रसिद्ध व्यंग्यकार, बाल साहित्य लेखक, और कवि हैं। उन्होंने तेलंगाना सरकार के लिए प्राथमिक स्कूल, कॉलेज, और विश्वविद्यालय स्तर पर कुल 55 पुस्तकों को लिखने, संपादन करने, और समन्वय करने में महत्वपूर्ण कार्य किया है। उनके ऑनलाइन संपादन में आचार्य रामचंद्र शुक्ला के कामों के ऑनलाइन संस्करणों का संपादन शामिल है। व्यंग्यकार डॉ. सुरेश कुमार मिश्र ने शिक्षक की मौत पर साहित्य आजतक चैनल पर आठ लाख से अधिक पढ़े, देखे और सुने गई प्रसिद्ध व्यंग्यकार के रूप में अपनी पहचान स्थापित की है। तेलंगाना हिंदी अकादमी, तेलंगाना सरकार द्वारा श्रेष्ठ नवयुवा रचनाकार सम्मान, 2021 (तेलंगाना, भारत, के मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव के करकमलों से), व्यंग्य यात्रा रवींद्रनाथ त्यागी सोपान सम्मान (आदरणीय सूर्यबाला जी, प्रेम जनमेजय जी, प्रताप सहगल जी, कमल किशोर गोयनका जी के करकमलों से), साहित्य सृजन सम्मान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के करकमलों से और अन्य कई महत्वपूर्ण प्रतिष्ठात्मक सम्मान प्राप्त हुए हैं। आप प्रत्येक गुरुवार डॉ सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ जी के साप्ताहिक स्तम्भ – चुभते तीर में उनकी अप्रतिम व्यंग्य रचनाओं को आत्मसात कर सकेंगे। इस कड़ी में आज प्रस्तुत है आपकी विचारणीय व्यंग्य रचना सरकारी फाइलों का महाप्रयाण )  

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ चुभते तीर # 44 – सरकारी फाइलों का महाप्रयाण ☆ डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ 

(तेलंगाना साहित्य अकादमी से सम्मानित नवयुवा व्यंग्यकार)

पुरानी तहसील की वह धूल भरी अलमारी वर्षों से इतिहास का बोझ उठाए खड़ी थी। उसमें रखी फाइलें बूढ़ी हो चली थीं, जैसे सरकारी बाबू के बुढ़ापे का प्रतीक। लाल फीते से बंधी हुई, कुछ को दीमक चाट चुकी थी, तो कुछ को समय की मार ने जर्जर बना दिया था। मगर फाइलें थीं कि आज भी अपने अस्तित्व के लिए संघर्ष कर रही थीं। मानो किसी वृद्धाश्रम में फेंक दिए गए बुजुर्गों की तरह, जिन्हें देखने वाला कोई नहीं। बस, आदेश आते रहे, चिट्ठियां बढ़ती रहीं, और इन फाइलों की किस्मत सरकारी टेबलों के बीच कहीं खो गई। 

तभी एक दिन एक अफसर आया, जो फाइलों की सफाई करने का कट्टर समर्थक था। उसने आदेश दिया—”पुरानी फाइलें रद्दी में बेच दो।” अफसर की आवाज सुनकर फाइलों में हलचल मच गई। “हमारा क्या होगा?” एक फाइल ने कांपते हुए पूछा। “कहीं कचरे में तो नहीं फेंक दिया जाएगा?” दूसरी फाइल सुबक पड़ी। वर्षों तक सरकारी आदेशों की साक्षी रही वे फाइलें, जो कभी महत्वपूर्ण दस्तावेजों की रानी थीं, आज कबाड़ में बिकने वाली थीं। यह लोकतंत्र का कैसा न्याय था? 

एक चपरासी आया, उसने एक गठरी उठाई और बाहर ले जाने लगा। फाइलें बिलख उठीं। “अरे, हमें मत ले जाओ! हमने तो वर्षों तक सरकार की सेवा की है!” मगर चपरासी कौन-सा उनकी आवाज सुनने वाला था! वह तो बस सोच रहा था कि कबाड़ बेचकर कितने पैसे मिलेंगे और उन पैसों से कितने समोसे खरीदे जा सकते हैं। अफसर अपनी कुर्सी पर मुस्कुरा रहा था—”समाप्त करो इस फाइल-राज को!” जैसे कोई अत्याचारी सम्राट अपनी प्रजा पर कहर बरपा रहा हो। 

फाइलों की अंतिम यात्रा शुरू हो चुकी थी। सड़क किनारे एक कबाड़ी की दुकान पर उन्हें फेंक दिया गया। वहां पड़ी दूसरी फाइलें पहले ही अपने भविष्य से समझौता कर चुकी थीं। एक फाइल, जिसमें कभी किसी गांव को जल आपूर्ति देने का आदेश था, कराह उठी—”जिस पानी के लिए मैंने योजनाएं बनवाई थीं, आज मेरी स्याही भी सूख गई!” दूसरी फाइल, जो कभी शिक्षा विभाग से संबंधित थी, बुदबुदाई—”जिस ज्ञान के लिए मुझे बनाया गया था, आज मैं ही कूड़े में पड़ी हूं!” 

कबाड़ी ने उन फाइलों को तौलकर अपने तराजू में रखा। हर किलो पर कुछ रुपये तय हुए। “ये तो अच्छी कीमत मिल गई!” उसने खुशी से कहा। वहीं पास में खड़ा एक लड़का पुरानी कॉपियों से नाव बना रहा था। अचानक एक पन्ना उठाकर बोला, “अरे, देखो! इस पर किसी मंत्री का दस्तखत है!” मगर अब उस दस्तखत की कीमत नहीं रही थी। जो कभी सरकारी आदेश था, वह अब एक ठेले पर रखी रद्दी थी। 

बारिश शुरू हो गई। बूंदें उन फाइलों पर गिरने लगीं। जिन कागजों ने कभी लाखों के बजट पास किए थे, वे अब गलकर नाले में बह रहे थे। यह सरकारी दस्तावेजों का महाप्रयाण था! “हमने बड़े-बड़े घोटालों को देखा, बड़े-बड़े अफसरों की कुर्सियां हिलते देखीं, मगर अपनी ही विदाई का ऐसा दृश्य कभी नहीं सोचा था!” एक आखिरी फाइल ने कहा और पानी में घुल गई। सरकारी फाइलों की उम्र खत्म हो चुकी थी, मगर घोटाले अब भी नए-नए फाइलों में जन्म ले रहे थे!

© डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’

संपर्क : चरवाणीः +91 73 8657 8657, ई-मेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares