अगदी लहानपणापासून कानावर पडत गेलाय हरीपाठ. आजी रोज रात्री झोपताना हरीपाठ म्हणायची. त्यामुळे ‘हरीमुखे म्हणा.. हरीमुखे म्हणा.. ‘हे शब्द ओळखीचे झाले होते.
काही वर्षांनी बाबामहाराज सातारकरांच्या कैसेटस् आल्या. हरीपाठाच्या. खुपच सुश्राव्य होत्या. टाळ, म्रुदुंगाच्या तालावर म्हटलेला हरीपाठ आता गुणगुणु लागलो.
काही काळाने अगदी अथपासून इतिपर्यंत हरीपाठ वाचायची सवय लागली आणि मग तो एक नित्यनेमच होऊन गेला.
तसं पाहिलं तर ज्ञानेश्वरकालीन मराठी म्हणजे प्राकृत मराठी. सगळीच आपल्याला समजते असं नाही. हरीपाठामधल्या सगळ्याच पदांचा अर्थ समजतो असं नाही. काहींचा आशय समजतो. त्यात मुख्यतः हरीनामाचा महिमा वर्णन केला आहे. हरीचे.. नारायणाचे.. म्हणजेच विष्णुचे नामस्मरण सतत करत रहा हेच हरीपाठात सांगितले आहे.
विष्णुविणे जप.. व्यर्थ त्याचे ज्ञान
रामकृष्णी मन नाही ज्याचे.
असं सांगुन माऊली म्हणतात..
हरी उच्चारणी अनंत पापराशी
जातील लयासी क्षणमात्रे
अशी खुप साधी सोपी पदे आहेत. समजायला सोपी.. हरीनामाचा महिमा सांगणारी..
एक तत्व नाम द्रुढ धरी मना
हरीसी करुणा येईल तुझी
ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद
वाचेसी सद्गद जपे आधी
यात ज्ञानेश्वर महाराज नामाचा महिमा सांगतान अजून एक मोलाचा संदेश देतात.
सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी
रिकामा अर्धघडी राहु नको
हे खुप महत्वाचं आहे. ‘रिकामं बसु नको. सतत काहीतरी करत रहा.’
(whatsapp, facebook बघणं म्हणजे सुध्दा एका अर्थी रिकामं बसणंच ना!)
ज्ञानेश्वर महाराजांच्या हरीपाठात अवीट गोडवा आहेच. पण एकनाथ महाराज आपल्या हरीपाठात म्हणतात.. —
किती सुंदर संदेश दिला आहे. या संतांचे सांगणे एकच आहे.. देवाचा जप करा.. ध्यान करा.. हात जोडुन आग क्षणभर का होईना देवासमोर उभे रहा. ते रुप डोळ्यात साठवा. त्यातुन तुम्हाला खुप काही मिळेल.
पुण्यात तुळशीबागेत रामाचे मंदिर आहे. खुप सुंदर मुर्ती आहे रामाची. गोड भाव आहेत चेहर्यावर. दर्शन घेऊन झाल्यावर प्रदक्षिणा घालत होतो. तर या प्रदक्षिणा मार्गावर अगदी अरुंद बोळात एक ओटा आहे. मंदिराचाच एक भाग असलेला. अगदी गुळगुळीत झालेला जेमतेम दोन तीन जण बसु शकतील एवढा. दर्शन झाल्यावर अगदी थोडावेळ का होईना.. देवाच्या दारी बसावं असं म्हणतात. आणि तसं बसण्यासाठी म्हणुन ही जागा. खास बनवलेली.
एका शहरात लहानाची मोठी झालेली, सुसंस्कृत, सुशिक्षित, सधन घरातील एक मुलगी होती. सुयोग्य शिक्षण झाले आणि सरकारी नोकरीत छान स्थिरावली, बढती घेत मोठी झाली, सर्वार्थाने. पक्षी निरीक्षण, गिर्यारोहण, सामाजिक काही उपक्रम आवडीने जोपासत होती. सख्यांसह त्याचा आनंद उपभोगत होती. पारमार्थिक बैठक निश्चित असावी आतून, ती तोवर दृगोचर झाली नव्हती. एकदा दोन जिवाभावाच्या मैत्रिणींसह नर्मदा परिक्रमेला जायचे ठरवते. संपूर्ण चालत प्रदक्षिणा. नेत्रचक्षू आणि अंतर्चक्षू दोन्ही सजग ठेवून परिक्रमा करताना, मैयाचा भक्तिभाव मनात असताना तिच्या लक्षात येते आजूबाजूची वास्तविकता. परिक्रमा करणाऱ्या लोकांची सेवा करणारे सामान्य जन, त्यांचा सेवाभाव, प्रचंड गरिबी, अभावातील त्यांचे जगणे पाहताना या मुलीच्या मनाला चटका लावून गेले ते तेथील मुलांचे भविष्याचे विचार. एकतर शाळेत जातच नसणारी आणि जात असली तरी अक्षर ओळखही नसणारी ही मुले. यांचे भविष्य काय असेल? कशी जगतील ही? प्रश्न तर मोठेच पडले. साधारणपणे परिक्रमा, यात्रा वगैरे करताना असे विचार बरेच जण करत असतील. परंतु स्मशान वैराग्य जसे अल्पकालीन असते तसे हे विचारही आपल्या आपल्या पूर्वायुष्यात आल्यावर सहज उडून जातात. हा स्वानुभव ही आहे.
ही मुलगी याला अपवाद ठरली. उचललेली परिक्रमा पूर्ण करून आपल्या शहरात परत येईपर्यंत एक निश्चित विचार हिच्या मनात तयार झाला होता. आल्यावर आधी नोकरीचा राजीनामा दिला. त्याची सर्व नियमानुसार पूर्तता केली. बाकी घरची व्यवस्था लावली आणि दोन कपडे आणि अगदीच आवश्यक गोष्टी बॅगेत टाकून ही मुलगी मध्यप्रदेश मधील लेपा मध्ये येऊन पोहोचली. कोणतीही पूर्व यथायोग्य व्यवस्था नव्हती, कोणी खंबीर आधार नव्हता केवळ आणि केवळ अंतर्मनाच्या हाकेला ओ देऊन ती इथे आली.
अतिशय लहानसे खेडे, तिथे राहून काय काय या मुलीने केले, स्थानिक लोकांच्या मनात स्वतः बद्दल कसा विश्वास निर्माण केला, किती काय कसे प्रयत्न केले हे सगळे प्रत्येकाने निदान जाणून घ्यावे, वाचावे एव्हढे नक्की. तर या अथक प्रयत्नातून उभे राहिले “नर्मदालय”.
आज दीडशे मुले तिथे राहत आहेत. त्यांचे संगोपन ही मुलगी करते आहे. या जगावेगळ्या मुलीचे नाव आहे पूर्वाश्रमीची भारती ठाकूर आणि संन्यास स्वीकारल्यानंतर “परिव्राजिका विशुध्दानंदा”.
या नर्मदालयात फेब्रुवारी महिन्यात नर्मदा जयंतीनिमित्त नर्मदा महोत्सव असतो. भारती ताईची पुस्तके वाचल्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष जावे अशी इच्छा मनात जागी झाली होती. या कारणाने तिकडे जायचे ठरवले. प्रख्यात विदुषी धनश्री ताई लेले यांच्याशी एक स्निग्ध नाते जुळले आणि त्यांच्या निमित्ताने छान सुहृद मंडळी आयुष्यात आली. माझे आजवरचे जगणे एका वेगळ्याच टप्प्यावर गेले असे मी आनंदाने म्हणेन. अशा पंधरा सोळा जणांच्या गोतावळ्यासोबत प्रस्थान ठेवले.
जरी पुस्तक वाचले होते तरी येणाऱ्या दोनतीनशे पाहुण्यांची व्यवस्था कशी काय होईल याबाबत मन साशंक होतेच. नर्मदालयात रोज राहणारे दीडशे आणि हे पाहुणे. पाहू आता जे जसे होईल तसे चालवू, असाच विचार करून आले मी. रात्री नऊच्या नंतर आम्ही बसने पोहोचलो. व्यवस्थित रजिस्ट्रेशन काउंटर होता. तिथे नोंदणी करून सुरुवात होणार होती, पण चला आता आधी गरम जेवा, मग करा हे काम असा प्रेमळ आग्रह झाला. भव्य मंडपात ओळीने भोजनाची सुरेख व्यवस्था होती. टेबल खुर्च्या, स्वच्छ मांडणी आणि साधे स्वादिष्ट जेवण. सलामीच अशी दणदणीत झाली. आजूबाजूला आपोआप बघत होतो. मंडपा समोर सुरेख इमारत. त्याच्या अंगणात खुर्चीवर भारतीताई खुद्द जातीने व्यवस्थेवर लक्ष ठेवून होत्या. आलेले सर्वच त्यांना भेटायला जात होते. आपुलकीने चौकशी होत होती. प्रत्येकजण भारावून जाताना पुढील चार दिवस मी रोज पाहिला. चारही दिवस तिन्ही त्रिकाळ खानपान व्यवस्था उत्तम होती.
रजिस्ट्रेशन करताना प्रत्येक अभ्यागताला बिल्डिंग आणि खोली नंबर दिला गेला. ओळखपत्र मिळाले. आमच्या खोलीत पोहोचल्यावर पंधरा जणांची छान सोय दिसली. प्रत्येकी कॉट, गादी, उशी आणि मध्यप्रदेशच्या थंडीत निभाव लागेल अशी ब्लँकेटस, चार्जिंग पॉइंट्स, पंखे अगदी विचारपूर्वक केलेली व्यवस्था. इतकी खरंच अपेक्षाच केली नव्हती. शेजारी स्वच्छ बाथरूमस्.
दुसऱ्या दिवशी पासून असणाऱ्या कार्यक्रमांचे वेळापत्रक रूम बाहेर दर्शनी होते. कुठेही गोंधळ नाही. नाश्ता करून सत्र सुरू होत. तीनही दिवस धनश्री ताई लेले, शरद पोंक्षे, उदय निरगुडकर, ऐवज भांडारे अशा मातब्बर व्यक्तींची भाषणे/ कीर्तन होते. आपापल्या विषयातील उत्तम अनुभव त्यांनी आम्हाला घडवला. घडवला असेच म्हणेन कारण उदाहरणार्थ सांगायचे झाले तर नामदेव यांच्याविषयी धनश्री ताई अशा समरसून बोलल्या की खरंच मुक्ताबाई सूनावते आहे त्यांना आणि नामदेव विठ्ठलाच्या पायाशी जाऊन बसलेत, दिसूच लागले जणू. चांगदेव महाराजांना, ” अजून गेलाच नाही का रे भेद तुझ्या मनातला?” विचारणारी धिटुकली, ज्ञानी मुक्ती भिडलीच आम्हाला. हे सगळे होतेच तिथे. त्याचा सर्वोत्तम आनंद घेतलाच पण त्याशिवाय जे मिळाले ते शब्दात पकडण्याचा प्रयत्न करते आहे.
– क्रमशः भाग पहिला
लेखिका : वर्षा कुवळेकर
संग्राहिका : डॉ. शुभा गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
☆ “वंगण…” – लेखिका: श्रीमती मनस्वी समीक्षा ☆ प्रस्तुती – श्रीमती राधा पै ☆
सकाळच्या गडबडीत नेमकी ट्राँली बाहेर ओढताना अडकली.
धड ना आत धड ना बाहेर.
वैतागच!
नेमके चहा साखरेचे डबे आत अडकले!
आतल्याआत चडफड नुसती. आता सुतार बोलवावा लागणार.
एवढ्याशा कामाकरता तो आढेवेढे घेणार. नाहीतर बजेट वाढवून
या कशा मोडीत काढायला झाल्यात याची गाथा वाचणार. ‘आजकाल मॉड्यूलर किचन कसं जोरात चाललंय. माझी इकडे कामं आणि तिकडं कामं… ‘ सगळं क्षणात मनात आणि डोळ्यांसमोरुन तरळूनच गेलं.
जोर देऊन जरा ओढून बघितलं तर कड्कट् आवाज काढलाच तिने.
लादी पुसायला आलेल्या मावशी म्हणाल्या, खोबरेल तेलाचं बोट फिरवा ताई.. कडेच्या पट्टीवर. सरकेल. तात्पुरते तरी निभावेल.
चांगली आयडिया! मी पटकन तेलाचं बोट फिरवलं.
दोन मिनिटांनी ट्रॉली मऊसरपणे आतबाहेर डोकावली. कसलं भारी काम झालं एकदम!
मी एकदम आनंदाने तिला धन्यवाद देत म्हटलं, ” बरं झालं बाई वेळेत आलीस. नाहीतर
चहा पावडर विकत आणावी लागली असती. “
ती हसली, “वंगण लागतंय, ताई. थेंबभर पुरतं. पण लागतं कधीमधी. ते मिळालं की सगळं सुरळीत होऊन जातं बघा क्षणात!”
खरंच. वंगण लागतं!
फक्त मशीन, वस्तूंनाच नाही, तर माणसालाही.
त्याच्या देहाइतकंच मनालाही. अगदी नात्यांनाही वंगण अवश्यक आहे.
चार चांगल्या शब्दांचं, आश्वासक स्पर्शाचं, सदिच्छांचं, विचार वाचनाचं, सूरमैफिलींचं, श्रद्धा-भक्तीचं, नजरेतल्या भावाचं, योगनिद्रेचं, कलाकल्पनेचं!
की जे मनाला मोडकळीस येण्यापासून वाचवतं. मरगळ येउन कोरड्या ठक्क पडलेल्या वृत्तीवर हे वंगण पुर्ववत जगण्याकडे अलगद घेऊन जातं.
लहानपणी आजी सगळ्या नातवंडांना ओळीत बसवून चहाबरोबर एरंडेल पाजायची.
प्यायचं म्हणजे प्यायचं.
कितीही आदळाआपट केली तरी ती तिचा हेका सोडायची नाही. पोट- आतड्याचं ते वंगणच आहे. महिना दोन महिन्याने एकदा घेतलं की पोटाचं काम निर्धोक चालू राहतं. आणि तुम्ही मग आबरचबर हादडायला मोकळे.
कानात तेल, नाकात दोन थेंब तूप, डोक्यावर बुधलीभर कोमट तेल शनिवारी रात्रीचा हमखास वंगणाचा कार्यक्रम कित्येक वर्षे आमच्या पिढीने खरं तर अनुभवला.
रात्री झोपल्यावर कधीतरी काशाच्या वाटीने तळपाय घासून द्यायची. शरीरातल्या उष्णतेवरचं तिचं ते वंगण होतं.
खरं तर जन्मापासून हे वंगण वेगवेगळ्या रुपात आपली सोबत करत राहतं.
आपले शारीरिक, आर्थिक, मानसिक मार्ग निर्धोक करत राहतं, कारण स्निग्धता हा भाव ओतप्रोत या वंगणात भरलेला आहे.
जाईल तेथे मऊपण पेरणं, कोरडेपण, गंज मिटवणं आणि पूर्वस्थितीत आणून सोडणं.
हा (स्व)भावच आहे वंगणाचा!
क्षमा, सोडून देणं, माघार घेणं, प्रसंगानुरूप मदतीला जाणं, हळुवार फुंकर घालणं, स्वच्छ शुद्ध अंतःकरणाने समोरच्याच्याशी शांतपणे बोलणं, हेही नाती जपण्यासाठी लागणारं एक प्रकारचे वंगणच आहे.
वंगण नसतं तर जगात फक्त खडखडाटच ऐकू आला असता, असं मला नेहमी वाटतं.
जीवनातले स्निग्धांश संपले तर फक्त कोरडेपण उरेल.
आणि कोरडेपण क्षणात भस्मसात होउन जातं!त्यामुळे जगण्यात येणारे हरएक प्रकारचे वंगण जपणे आणि प्रसंगी ते वापरणे फार आवश्यक आहे.
निर्जीव मशीनसामुग्रीला जिथं त्याचं महत्त्व समजतं तिथं तुमच्याआमच्यासारख्या जिवांनी ते जाणलंच पाहिजे. त्याचं जतन केलंच पाहिजे.
तरच जगणं लयीत, सुसह्य होत राहील! हो ना?
लेखिका : श्रीमती मनस्वी समीक्षा
प्रस्तुती :श्रीमती राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “अंतर्नाद ” – (कविता संग्रह)- कवयित्री : सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तक : अंतर्नाद (कविता संग्रह)
कवयित्री : मंजुषा मुळे
पृष्ठे : १११
मूल्य : रु. १००/-
प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे.
परिचय : श्री सुहास रघुनाथ पंडित
सौ. मंजुषा सुनीत मुळे
सौ. मंजुषा मुळे यांचा ‘अंतर्नाद’ हा कविता संग्रह नुकताच वाचनात आला. त्यांचा हा पहिलाच कविता संग्रह. त्याला श्री. प्रवीण दवणे यांच्यासारख्या ज्येष्ठ कवीची प्रस्तावना. त्यातून कविता हा आवडीचा विषय. त्यामुळे हा कविता संग्रह वाचून काढणे अगदी स्वाभाविक होते. काही कविता वाचल्यावर लक्षात आले की हा संग्रह फक्त पाने उलटवण्यासाठी नाही, तर लक्षपूर्वक वाचण्यासाठी आहे. मग त्या दृष्टीने अभ्यासच सुरू झाला आणि आता खूप छान छान कविता वाचायला मिळाल्या याचा आनंद आहे. तो आनंद सर्वांना वाटावा म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न !
विषयांची कमालीची विविधता असलेल्या या काव्यसंग्रहाची सुरुवातच सौ. मंजुषा मुळे यांनी एका जीवनविषयक कवितेने केली आहे. शब्द, हास्य, अश्रू यातून जीवनाचा अर्थ शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. स्वतःला माणूस म्हणवून घेण्यासाठी शब्द कसे असावेत, हास्य कसे असावे हे सांगताना नात्यांचं नंदनवन फुलवता यावं अशी अपेक्षा त्या व्यक्त करतात.
जगातील स्वार्थीपणाचे अनुभव “ चंद्र “ या कवितेतून चंद्राकडूनच वदवून घेणे ही वेगळीच कल्पना फार भावते.
जगण्याच्या प्रवासात आपली साथ कधीही सोडत नाही ते म्हणजे आपलं मन. या मनाचं आणि घनाचं असलेलं अतूट नातं त्यांच्या ‘वळीव’ या कवितेतून त्यांनी सुंदरपणे विशद केलं आहे.. मनाची होणारी फसगत पाखराच्या रूपातून पहायला मिळते.
असं हे त्यांचं कविमन प्रेमरसात नाही भिजून गेलं तरच नवल ! ‘आतुर’ आणि ‘येई सखी’ यासारख्या प्रेमकविता लिहिताना त्यांची लेखणी मृदू होते. खरं प्रेम म्हणजे काय हे त्या ‘प्रेम’ या कवितेतून स्पष्ट करतात. निसर्गातील सुंदर प्रतिकांचा वापर कवितेचे सौन्दर्य वाढवतो. — ‘ नाही आडपडदे, नाही आडवळणं…. नितळ निर्मळ झऱ्यासारखं सतत झुळझुळत असतं…… ’ ही निखळ प्रेमाची व्याख्या फार बोलकी आहे.
तर प्रेमभंगाच्या दु:खात होरपळत असतांनाही ‘ आपल्या प्रीतीचे निर्माल्य झाले ‘ ही कल्पना प्रेमाचे पावित्र्य उच्च पातळीवर नेऊन ठेवते.
स्त्री सुलभ वात्सल्य भावना त्यांच्या ‘हुरहूर’ या कवितेतून दिसून येते. पिल्ले घरातून उडून गेल्यावर ‘ मनी दाटे हुरहूर | रीत वाटे ही उलटी | पिल्लू भरारे आकाशी | घार व्याकुळे घरटी ||’ ही एका आईची भावना मनाला भिडलीच पाहिजे अशी.
स्त्री जीवनाविषयी भाष्य करताना ‘जातकुळी’ या कवितेत त्यांनी आकाशातील चांदण्यांचा दाखला दिला आहे. आजूबाजूला माणसांचा, सख्यांचा गोतावळा असला तरी स्त्रीचे विश्व हे तिच्यापुरते, तिच्या कुटुंबापुरते मर्यादित असते. ‘आखला परीघ भवती, तितुकेच विश्व आम्हा’ अशी खंत त्या व्यक्त करतात. याचबरोबर ‘ मी कोण ‘ या स्वतःला पडलेल्या प्रश्नाचं अगदी मार्मिक उत्तरही त्यांनी अगदी सोप्पं करून टाकलेलं आहे.
‘पूजा’ ही कविता म्हणजे भक्तीचा नेमका मार्ग दाखवणारी कविता असेच म्हणावे लागेल. पंढरीच्या वारीचे वर्णन करणारी, भक्तांच्या मनातील भाव व्यक्त करणारी अशा दोन कविता त्यांनी लिहिल्या आहेत. परमेश्वर हा आपला सखा आहे, पुत्र आहे की भाऊराया आहे असा प्रश्न त्यांना पडतो. देवाकडे त्यांनी मागितलेले एक वेगळंच ‘ मागणं ‘ त्यांच्या वैचारिक वेगळेपणाचं द्योतक आहे.
त्यांच्या वैचारिक आणि चिंतनात्मक कवितांचा विचार केला तर अनेक कवितांचा उल्लेख करावा लागेल. या कविता गंभीर प्रकृतीच्या, विचार करायला लावणा-या असल्या, तरी भाषेची कोमलता, चपखल प्रतिकांचा वापर, कल्पना आणि काव्यात्मकता यामुळे बोजड वाटत नाहीत.
‘वास्तव’ या रुपकात्मक, लयबद्ध कवितेतून सध्या सर्वांच्याच आयुष्यात घडणारे वास्तव त्यांनी अतिशय उत्तम अशा उदाहरणांनी समजावून दिले आहे. गंध म्हणजे फुलाचे मूल. गंध फुलापासून दूर जातो. फूल तिथेच असते. गंध फुलाकडे म्हणजे स्वतःच्या घराकडे कधीच परतून येत नाही. फूल मात्र त्याच्यासाठी झुरत असते. कर्तृत्वाचे पंख लावून लांबवर उडणारी चिमणी पाखरं घराकडे परततच नाहीत, तेव्हा घरातील थकलेल्या त्या जीवांचे काय होत असेल हे सांगण्यासाठी यापेक्षा सुंदर दुसरे कोणते उदाहरण असेल?
माणसाची संपत्तीची हाव संपता संपत नाही. पण इथून जाताना काहीही घेऊन जाता येत नाही हे त्यांनी साध्या सोप्या शब्दात ‘हाव’ या कवितेतून सांगितले आहे. ‘भान ‘ या आणखी एका कवितेत त्यांनी दिलेला उपदेशात्मक संदेशही तितकाच मोलाचा आहे. ‘घरटे अपुले विसरू नको’ किंवा ‘मातीला परी विसरू नको’ यासारखी सुवचने त्या सहज लिहून जातात.
‘अंधाराला उजेडाचे कोंब फुटावे, तसे मातीच्या गर्भातून उजळू पहाणारे नवचैतन्याचे अंकूर ‘ ही ‘आषाढमेघ ‘ कवितेतील कवीकल्पना मनाला भावून तर जातेच, पण त्यांच्या आशावादी मनोवृत्तीवर प्रकाश टाकते. जगण्याचे चक्रव्यूह भेदत असताना आपल्या वाट्याला आपले स्वतःचे असे किती क्षण येतात?अशा वेगळेपणाच्या संजीवक क्षणांची कवयित्री वाट पहात असते. कारण हे ‘ क्षण ‘च वादळवा-यात तेवत राहण्याचे बळ देत असतात.
जगणं सुसह्य होण्यासाठी त्या वेळीच सावध करतात आणि जगताना स्वतःला कसं सावरलं पाहिजे हे ‘सावर रे’ या कवितेतून सांगून जातात. जगतानाची अलिप्तता ‘उमग’ या कवितेतून दिसून येते.
देवाच्या हातून घडलेल्या चुका दाखवण्याचे धाडसही त्यांनी ‘चूक’ या कवितेतून केले आहे.. चूक देवाची दाखवली असली तरी कविता माणसांविषयी, त्यांच्या गुणदोषांविषयीच आहे. ‘गती’ या कवितेतून त्यांनी केलेले मार्गदर्शन खूप मोलाचे आहे. ‘ संसाराच्या खोल सागरी, अलिप्त मन अन् मती ‘ यासारख्या अर्थपूर्ण काव्यपंक्ती यात वाचायला मिळतात. आयुष्याचे केलेले उत्तम परिक्षण त्यांच्या ‘श्वास’ या चिंतनात्मक कवितेतून वाचायला मिळते. ‘अश्रूं’वरील त्यांचे चिंतन हे खूपच वेगळे पण वैशिष्ट्यपूर्ण आहे……. एकूणच त्यांच्या चिंतनात्मक कविता वाचल्यावर त्या आयुष्याकडे किती गंभीरपणे आणि वेगवेगळ्या नजरेने पाहतात हे समजून येते. म्हणून तर त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी ‘आपली मती वापर ‘अशी कळकळीची विनंती त्या करतात.
कलावंताची आत्ममग्नता त्यांच्या ‘चांदणे’ या कवितेत अनुभवायला मिळते. जगाची पर्वा न करता स्वतःच्याच धुंदीत जगणारी कवयित्री या चांदण्यात चमकताना दिसते.
अशी आत्ममग्नता असली तरी वास्तवाचा स्वीकार करताना त्यांची लेखणी काहीशी उपरोधिक बनते. मनाला मनातून हद्दपार केल्याशिवाय जगणं शक्य होणार नाही याची जाणीव करून देऊन फाटलेलं आभाळ पेलायचं रहस्यही त्या सांगून जातात. ही ‘समज’ त्यांना अनुभवातून आणि आयुष्याच्या निरीक्षणातूनच आली आहे.
त्यांच्यातील वैचारिक गांभीर्यामुळे त्यांच्या हातून सामाजिक आशयाच्या अनेक कविता लिहून झाल्या आहेत. ‘गर्दी’ सारखी कविता आधुनिक समाजाचे दर्शन घडवते. ‘वृद्धाश्रम’ मधून त्यांनी वृद्धाश्रमाचे केलेले चित्रण आणि वृद्धांची मानसिक अवस्था लक्ष वेधून घेते. — “ अन्नासाठी जगणे की ही जगण्यासाठी पोटपूजा ? मरण येईना म्हणून जिते हे.. जगण्याला ना अर्थ दुजा “ हे शब्द मनाला फारच भिडतात.
’त्याने ‘ मांडलेल्या ‘ खेळा ‘ चे वर्णन करतांना जगातील उफराटा न्याय त्या सहज शब्दात दाखवून देतात. माणसाकडून चाललेल्या वसुंधरेवरील अन्यायाचे ‘कारण’ शोधण्याचा त्या प्रयत्न करतात. निसर्गातले दाखले देत देत त्या एकीकडे ढोंगीपणाचा निषेध करतात तर दुसरीकडे सकारात्मकतेतून ‘सुख’ शोधण्याचा मार्ग दाखवतात. ‘आमचा देश’ किंवा ‘जयजयकार’ या सारख्या कवितेतून भ्रष्टाचारग्रस्त समाजाचे चित्रण पहावयास मिळते. हे चित्र बदलून समानतेची, मानवतेला शोभेल अशी ‘दिवाळी’ यावी अशी अपेक्षा त्यांना आहे. स्वराज्यातून सुराज्याकडे जाण्यासाठी समाजाला त्या आवाहन करतात. ” मर्कट हाती कोलीत तैसा, स्वैराचारा जणू परवाना | दुर्दशेस या आम्हीच कारण, उठवू न शकतो निद्रिस्त मना ” हे त्यांचे शब्द फार अर्थपूर्ण आहेत.
‘कारागीर’ ही एक उत्तम रूपकात्मक कविता वाचायला मिळते. स्वतःला सर्वशक्तीमान समजणा-या मानवाची अवस्था काय झाली आहे हे आपण अनुभवतो आहोत. शेवटी शरणागती पत्करुन पश्चात्ताप करण्याची वेळ आलेलीच आहे. हेच अत्यंत प्रभावी शब्दात कवयित्रीने व्यक्त केले आहे. ‘राष्ट्र… पण कुणाचे?’ किंवा ‘साठी’ या सारख्या विडंबनात्मक कविताही त्यांनी लिहिल्या आहेत. ‘ कळा ‘ या एकाच शब्दातून ध्वनित होणारे विविध अर्थ सांगतांना ‘ चंद्राच्या कला ‘ असा उल्लेख थोडा खटकतो.
याबरोबरच त्यांच्या निसर्गकविताही उल्लेखनीय आहेत. ‘सांजसकाळ’ या कवितेतून निसर्गात दररोज घडणा-या घटनांचे त्यांनी खूप वेगळ्या नजरेने पाहून नाट्यमय रितीने वर्णन केले आहे. पावसाच्या धारांमध्ये लपलेलं संगीत त्यांनी इतक्या सुंदर शब्दात ऐकवलंय की ही मैफिल संपूच नये असं वाटतं, पण ‘पाऊस’च ही मैफील संपवतो आणि आपण मात्र त्या श्रवणीय सूरांत हरवून जातो. लयबद्ध, गेय अशा भावगीताच्या वळणाने जाणारी ‘ साक्षात्कार ‘ कविता वाचतांना आपल्यालाही कृष्णसख्याचा साक्षात्कार घडून जातो. ‘ धुके ‘ ही कविता म्हणजे कल्पनाविलासाचा उत्तम नमुनाच आहे.
बालपणापासून मनाच्या कोप-यात लपून बसलेली कविता, संधी मिळताच डोके वर काढीत होती. शब्दांचा तो नाद मनाला ऐकू येत होता. मनातल्या भावना शब्दबद्ध करून सर्वांसमोर आणाव्यात असं वाटत होतं. या सा-याचं फलित म्हणजे ‘अंतर्नाद’ हा कविता संग्रह ! त्यांचा अंतर्नाद आता रसिक वाचकांच्या हृदयाला हात घालत आहे. आत्मचिंतन करून मुक्तपणे मांडलेले विचार, जीवनाविषयी दृष्टीकोन मांडतानाच निसर्गाशी असलेलं नातं जपणं, आस्तिकता जपतानाच सामाजिक जाणिवांचे भान असणं, जे जे वाईट आहे त्याची चीड येऊन त्याविषयी आपला संताप आक्रस्ताळेपणा न करता व्यक्त करणं, कधी उपहासाचे चिमटे काढणं तर कधी स्वप्नात रंगून जाणं…. अशा विविधांगांनी नटलेल्या कवितांचे दर्शन त्यांच्या या पहिल्याच काव्यसंग्रहात होते. त्यामुळे त्यांनी नकळतपणे रसिकांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. त्यांच्या हातून अशाच कितीतरी उत्तमोत्तम रचनांची निर्मिती होत राहो या सदिच्छा.
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(डा. मुक्ता जीहरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से हम आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का मानवीय जीवन पर आधारित एक विचारणीय आलेख बहुत तकलीफ़ होती है… । यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की लेखनी को इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य # 228 ☆
☆ बहुत तकलीफ़ होती है… ☆
‘लोग कहते हैं जब कोई अपना दूर चला जाता है, तो तकलीफ़ होती है; परंतु जब कोई अपना पास होकर भी दूरियां बना लेता है, तब बहुत ज़्यादा तकलीफ़ होती है।’ प्रश्न उठता है, आखिर संसार में अपना कौन…परिजन, आत्मज या दोस्त? वास्तव में सब संबंध स्वार्थ व अवसरानुकूल उपयोगिता के आधार पर स्थापित किए जाते हैं। कुछ संबंध जन्मजात होते हैं, जो परमात्मा बना कर भेजता है और मानव को उन्हें चाहे-अनचाहे निभाना ही पड़ता है। सामाजिक प्राणी होने के नाते मानव अकेला नहीं रह सकता और वह कुछ संबंध बनाता है; जो बनते-बिगड़ते रहते हैं। परंतु बचपन के साथी लंबे समय तक याद आते रहते हैं, जो अपवाद हैं। कुछ संबंध व्यक्ति स्वार्थवश स्थापित करता है और स्वार्थ साधने के पश्चात् छोड़ देता है। यह संबंध रिवाल्विंग चेयर की भांति अस्थायी होते हैं, जो दृष्टि से ओझल होते ही समाप्त हो जाते हैं और लोगों के तेवर भी अक्सर बदल जाते हैं। परंतु माता-पिता व सच्चे दोस्त नि:स्वार्थ भाव से संबंधों को निभाते हैं। उन्हें किसी से कोई संबंध-सरोकार नहीं होता तथा विषम परिस्थितियों में भी वे आप की ढाल बनकर खड़े रहते हैं। इतना ही नहीं, आपकी अनुपस्थिति में भी वे आपके पक्षधर बने रहते हैं। सो! आप उन पर नेत्र मूंदकर विश्वास कर सकते हैं। आपने अंग्रेजी की कहावत सुनी होगी ‘आउट आफ साइट, आउट ऑफ मांइड’ अर्थात् दृष्टि से ओझल होते ही उससे नाता टूट जाता है। आधुनिक युग में लोग आपके सम्मुख अपनत्व भाव दर्शाते हैं; परंतु दूर होते ही वे आपकी जड़ें काटने से तनिक भी ग़ुरेज़ नहीं करते। ऐसे लोग बरसाती मेंढक की तरह होते हैं, जो केवल मौसम बदलने पर ही नज़र आते हैं। वे गिरगिट की भांति रंग बदलने में माहिर होते हैं। इंसान को जीवन में उनसे सदैव सावधान रहना चाहिए, क्योंकि वे अपने बनकर, अपनों को घात लगाते हैं। सो! उनके जाने का इंसान को शोक नहीं मनाना चाहिए, बल्कि प्रसन्न होना चाहिए।
वास्तव में इंसान को सबसे अधिक दु:ख तब होता है, जब अपने पास रहते हुए भी दूरियां बना लेते हैं। दूसरे शब्दों में वे अपने बनकर अपनों से विश्वासघात करते हैं तथा पीठ में छुरा घोंपते हैं। आजकल के संबंध कांच की भांति नाज़ुक होते हैं, जो ज़रा-सी ठोकर लगते ही दरक़ जाते हैं, क्योंकि यह संबंध स्थायी नहीं होते। आधुनिक युग में खून के रिश्तों पर भी विश्वास करना मूर्खता है। अपने आत्मज ही आपको घात लगाते हैं। वे आपको तब तक मान-सम्मान देते हैं, जब तक आपके पास धन-संपत्ति होती है। अक्सर लोग अपना सब कुछ उनके हाथों सौंपने के पश्चात् अपाहिज-सा जीवन जीते हैं या उन्हें वृद्धाश्रम में आश्रय लेना पड़ता है। वे दिन-रात प्रभु से यही प्रश्न करते हैं, आखिर उनका कसूर क्या था? वैसे भी आजकल परिवार के सभी सदस्य अपने-अपने द्वीप में कैद रहते हैं, क्योंकि संबंध-सरोकारों की अहमियत रही नहीं। वे सब एकांत की त्रासदी झेलने को विवश होते हैं, जिसका सबसे अधिक ख़ामियाज़ा बच्चों को भुगतना पड़ता है। प्राय: वे ग़लत संगति में पड़ कर अपना जीवन नष्ट कर लेते हैं।
अक्सर ज़िदंगी के रिश्ते इसलिए नहीं सुलझ पाते, क्योंकि लोगों की बातों में आकर हम अपनों से उलझ जाते हैं। मुझे स्मरण हो रहे हैं कलाम जी के शब्द ‘आप जितना किसी के बारे में जानते हैं; उस पर विश्वास कीजिए और उससे अधिक किसी से सुनकर उसके प्रति धारणा मत बनाइए। कबीरदास भी आंखिन-देखी पर विश्वास करने का संदेश देते हैं; कानों-सुनी पर नहीं। ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना।’ इसलिए उनकी बातों पर विश्वास करके किसी के प्रति ग़लतफ़हमी मत पालें। इससे रिश्तों की नमी समाप्त हो जाती है और वे सूखी रेत के कणों की भांति तत्क्षण मुट्ठी से फिसल जाते हैं। ऐसे लोगों को ज़िंदगी से निकाल फेंकना कारग़र है। ‘जीवन में यदि मतभेद हैं, तो सुलझ सकते हैं, परंतु मनभेद आपको एक-दूसरे के क़रीब नहीं आने देते। वास्तव में जो हम सुनते हैं, हमारा मत होता है; तथ्य नहीं। जो हम देखते हैं, सत्य होता है; कल्पना नहीं। ‘सो! जो जैसा है; उसी रूप में स्वीकार कीजिए। दूसरों को प्रसन्न करने के लिए मूल्यों से समझौता मत कीजिए; आत्म-सम्मान बनाए रखिए और चले आइए।’ महात्मा बुद्ध की यह सीख अनुकरणीय है।
‘ठहर! ग़िले-शिक़वे ठीक नहीं/ कभी तो छोड़ दीजिए/ कश्ती को लहरों के सहारे।’ समय बहुत बलवान है, निरंतर बदलता रहता है। जीवन में आत्म-सम्मान बनाए रखें; उसे गिरवी रखकर समझौता ना करें, क्योंकि समय जब निर्णय करता है, तो ग़वाहों की जरूरत नहीं पड़ती। इसलिए किसी विनम्र व सज्जन व्यक्ति को देखते ही यही कहा जाता है, ‘शायद! उसने ज़िंदगी में बहुत अधिक समझौते किए होंगे, क्योंकि संसार में मान-सम्मान उसी को ही प्राप्त होता है।’ किसी को पाने के लिए सारी खूबियां कम पड़ जाती हैं और खोने के लिए एक ग़लतफ़हमी ही काफी है।’ सो! जिसे आप भुला नहीं सकते, क्षमा कर दीजिए; जिसे आप क्षमा नहीं कर सकते, भूल जाइए। हर क्षण, हर दिन शांत व प्रसन्न रहिए और जीवन से प्यार कीजिए; आप ख़ुद को मज़बूत पाएंगे, क्योंकि लोहा ठंडा होने पर मज़बूत होता है और उसे किसी भी आकार में ढाला नहीं जा सकता है।
यदि मन शांत होगा, तो हम आत्म-स्वरूप परमात्मा को जान सकेंगे। आत्मा-परमात्मा का संबंध शाश्वत् है। परंतु बावरा मन भूल गया है कि वह पृथ्वी पर निवासी नहीं, प्रवासी बनकर आया है। सो! ‘शब्द संभाल कर बोलिए/ शब्द के हाथ ना पांव/ एक शब्द करे औषधि/ एक शब्द करे घाव।’ कबीर जी सदैव मधुर वाणी बोलने का संदेश देते हैं। जब तक इंसान परमात्मा-सत्ता पर विश्वास व नाम-स्मरण करता है; आनंद-मग्न रहता है और एक दिन अपने जीवन के मूल लक्ष्य को अवश्य प्राप्त कर लेता है। सो! परमात्मा आपके अंतर्मन में निवास करता है, उसे खोजने का प्रयास करो। प्रतीक्षा मत करो, क्योंकि तुम्हारे जीवन को रोशन करने कोई नहीं आएगा। आग जलाने के लिए आपके पास दोस्त के रूप में माचिस की तीलियां हैं। दोस्त, जो हमारे दोषों को अस्त कर दे। दो हस्तियों का मिलन दोस्ती है। अब्दुल कलाम जी के शब्दों में ‘जो आपके पास चलकर आए सच्चा दोस्त होता है; जब सारी दुनिया आपको छोड़कर चली जाए।’ इसलिए दुनिया में सबको अपना समझें; पराया कोई नहीं। न किसी से अपेक्षा ना रखें, न किसी की उपेक्षा करें। परमात्मा सबसे बड़ा हितैषी है, उस पर भरोसा रखें और उसकी शरण में रहें, क्योंकि उसके सिवाय यह संसार मिथ्या है। यदि हम दूसरों पर भरोसा रखते हैं, तो हमें पछताना पड़ता है, क्योंकि जब अपने, अपने बन कर हमें छलते हैं, तो हम ग़मों के सागर में डूब जाते हैं और निराशा रूपी सागर में अवगाहन करते हैं। इस स्थिति में हमें बहुत ज़्यादा तकलीफ़ होती है। इसलिए भरोसा स्वयं पर रखें; किसी अन्य पर नहीं। आपदा के समय इधर-उधर मत झांकें। प्रभु का ध्यान करें और उसके प्रति समर्पित हो जाएं, क्योंकि वह पलक झपकते आपके सभी संशय दूर कर आपदाओं से मुक्त करने की सामर्थ्य रखता है।
(ई-अभिव्यक्ति में मॉरीशस के सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री रामदेव धुरंधर जी का हार्दिक स्वागत। आपकी रचनाओं में गिरमिटया बन कर गए भारतीय श्रमिकों की बदलती पीढ़ी और उनकी पीड़ा का जीवंत चित्रण होता हैं। आपकी कुछ चर्चित रचनाएँ – उपन्यास – चेहरों का आदमी, छोटी मछली बड़ी मछली, पूछो इस माटी से, बनते बिगड़ते रिश्ते, पथरीला सोना। कहानी संग्रह – विष-मंथन, जन्म की एक भूल, व्यंग्य संग्रह – कलजुगी धरम, चेहरों के झमेले, पापी स्वर्ग, बंदे आगे भी देख, लघुकथा संग्रह – चेहरे मेरे तुम्हारे, यात्रा साथ-साथ, एक धरती एक आकाश, आते-जाते लोग। आपको हिंदी सेवा के लिए सातवें विश्व हिंदी सम्मेलन सूरीनाम (2003) में सम्मानित किया गया। इसके अलावा आपको विश्व भाषा हिंदी सम्मान (विश्व हिंदी सचिवालय, 2013), साहित्य शिरोमणि सम्मान (मॉरिशस भारत अंतरराष्ट्रीय संगोष्ठी 2015), हिंदी विदेश प्रसार सम्मान (उ.प. हिंदी संस्थान लखनऊ, 2015), श्रीलाल शुक्ल इफको साहित्य सम्मान (जनवरी 2017) सहित कई सम्मान व पुरस्कार मिले हैं। हम श्री रामदेव जी के चुनिन्दा साहित्य को ई अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों से समय समय पर साझा करने का प्रयास करेंगे। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय लघुकथा “– बागडोर –”।)
~ मॉरिशस से ~
☆ कथा कहानी ☆ – बागडोर – ☆ श्री रामदेव धुरंधर ☆
युद्ध में पराजय का लक्षण देख कर राजा ने भागते – भागते अपने सैनिकों से कहा, “जयी हो कर लौटना।” राजा अपने महल में छिप कर युद्ध का हाल जानने की कोशिश करता रहा। पराजय की सूचना पर वह देश छोड़ कर भागने वाला था। उसकी सेना जयी हो कर लौटी। पर सैनिकों ने अपना राजा चुन लिया था। वह जमाना ही ऐसा था कायर और अवसरवादी के हाथ में भूल से भी सत्ता की बागडोर छोड़ी नहीं जाती थी।
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
श्रीरामनवमी साधना पूरा करने हेतु आप सबका अभिनंदन। अगली साधना की जानकारी से शीघ्र ही आपको अवगत कराया जाएगा।
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
(Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Ministser of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.)
We present his awesome poem Conundrum…. We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji, who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages for sharing this classic poem.
(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “आचार्य देवो भव…“।)
अभी अभी # 344 ⇒ आचार्य देवो भव… श्री प्रदीप शर्मा
संस्कृत में आचार्य को गुरु भी कहते हैं। तब गुरुकुल होते थे, आज संकुल होते हैं। आचार्य का संबंध शिक्षा से है। आज की भाषा में हम इन्हें शिक्षक, टीचर, प्रोफेसर, डॉक्टर और रीडर भी कह सकते हैं।
मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव, अतिथिदेवो भव। यानी माता को देवता समझो, पिता को देवता समझो, आचार्य को देवता समझो, अतिथि को भी देवता समझो। माता पिता और आचार्य तक तो ठीक है, लेकिन अतिथि को भी देवता समझना, कुछ हजम नहीं होता।।
जहां जहां भी देव और असुर आमने सामने हुए हैं, असुरों के गुरु शुक्राचार्य जरूर बीच में आए हैं। द्वापर में कौरव पांडव दोनों के गुरु द्रोणाचार्य ही थे। जो आचार्य अमात्य होते थे, वे राजाओं के सलाहकार होते थे। आज वे ही मंत्री कहलाते हैं। जो शिक्षा प्रदान करे वह शिक्षक यानी आचार्य और जो नीति बनाए, वह अमात्य अर्थात् मंत्री।
शिक्षा और साहित्य के क्षेत्र में आचार्यों की कोई कमी नहीं। आचार्य रामचंद्र शुक्ल, आचार्य हजारीप्रसाद द्विवेदी, और सर्व श्री आचार्य नंददुलारे बाजपेई, जैसे विद्वान साहित्यकारों ने अगर साहित्य की विधा को संपन्न किया है तो वल्लभाचार्य, निंबाकाचार्य ने पुष्टिमार्ग और द्वैताद्वैत मार्ग का प्रतिपादन किया। आदि शंकराचार्य और आज के शंकराचार्यो की यशकीर्ति से कौन परिचित नहीं।।
शिक्षा के क्षेत्र में आज आपको आचार्य ही नहीं प्राचार्य भी नजर आ जाएंगे। आचार्यों में भी विशेषज्ञ होते हैं ; मसलन, आयुर्वेदाचार्य, व्याकरणाचार्य और ज्योतिषाचार्य। योगाचार्य, धर्माचार्य तो एक ढूंढों हजार मिलेंगे। याद आते हैं आचार्य कृपलानी जैसे लोग। मंगल कार्य संपन्न करवाने वाले भी पहले आचार्य और जोशी ही कहलाते थे। पंडित, पुजारी शब्द में वह गरिमा कहां, जो आचार्य शब्द में है।
जब से उपाधियों का अलंकरण होने लगा है, लोग डॉक्टर, प्रोफेसर और साहित्यरत्न कहलाना अधिक पसंद करने लगे हैं। कहीं आचार्य नाम के आगे शोभायमान है तो कहीं पीछे। आज आपको डा .भोलाराम आचार्य भी नजर आ जाएंगे और योग गुरु आचार्य बालकृष्ण भी।
कुछ आचार्य बिना पेंदे के लोटे की तरह भी होते हैं।।
(डॉ भावना शुक्ल जी (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान किया है। हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं भावना के दोहे।)