मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॲडॉल्फ हिटलर — ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? इंद्रधनुष्य ?

☆ ॲडॉल्फ हिटलर ☆ श्री प्रसाद जोग

ॲडॉल्फ हिटलर —

आत्महत्या :  ३० एप्रिल, १९४५

हा जर्मनी देशाचा हुकूमशहा होता. नाझी पक्षाच्या या नेत्याचे नाव त्याच्या क्रूरपणा व ज्यूंच्या कत्तलीकरता कुप्रसिद्ध आहे. तो नाझी जर्मनीचा प्रमुख होता. दुसरे महायुद्ध सुरू होण्यामागे असलेल्या प्रमुख कारणांत हिटलरची गणना होते.

ॲलॉइस व क्लारा (तिसरी पत्नी) हिटलर या दांपत्याचा हिटलर  (चौथा) मुलगा होता. आपल्या संघर्षकाळात याने काहीकाळ व्हिएन्नामधे हस्तचित्रे विकून रस्त्यावरील बर्फ साफ करुन, घरांना रंग देऊन करुन उपजिविका चालवली. त्याने पहिल्या महायुद्धात सैनिक म्हणून काम केले. फलस्वरूप त्याला शिक्षा देखील झाली तुरुंगामध्ये असताना १९२३ साली माईन काम्फ (माझा लढा) या आत्मकथेच्या लिखाणाला त्याने सुरवात केली आणि त्याचा लेखनिक होता त्याचा सहकारी रुडाल्फ हेस.

जर्मनीचा हुकूमशहा अडाॅल्फ हिटलरची स्वाक्षरी असलेली आत्मकथा ‘माईन काम्फ’ (माझा लढा) ची विक्री झाली. अमेरिकेत ८. ३२  लाखांना लिलावात ही प्रत विकली गेली आहे.

या आत्मकथेच्या पहिल्या पानावर हिटलरची स्वाक्षरी आहे. या स्वाक्षरीखाली ‘ युद्धामध्ये फक्त महान व्यक्तीच जिवंत राहतील. ’ 

१८ ऑगस्ट, १९३० 

“अडाॅल्फ हिटलर”  —- असं वाक्यही दस्तरखुद्द हिटलरने लिहिलंय.

पुढे थोड्याच वर्षांत याने बुद्धिमंतांच्या देश म्हणून ओळखल्या गेलेल्या जर्मनीची सत्ता हस्तगत केली. पुढे आपल्या बुद्धिचातुर्याच्या आणि अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर तो जर्मनीचा हुकूमशहा झाला. त्याने जर्मनीच्या विकासाला चालना दिली. जर्मनीला जगातील सगळ्यात शक्तिशाली देश बनवण्याचे त्याचे स्वप्न होते, त्यासाठी त्याने प्रचंड प्रयत्न केले. त्याने सक्तीचे लष्करी शिक्षण सुरू केले. लष्कर व नौदलात वाढ केली. शक्तिशाली विमानदल उभारले. इटली व जपान या दोन देशांशी मैत्रीचा करार करून आपले हात मजबूत करून घेतले.

हिटलर हा एक महत्त्वाकांक्षी तसेच मुत्सद्दी नेता होता. ‘एक राष्ट्र, एक आवाज, एक नेता, एक ध्वज’ हे त्यांचे घोषवाक्य होते. आर्यन संस्कृतीमधील शुभ चिन्ह मानले गेलेल्या स्वस्तिकचा समावेश त्याने ध्वजामध्ये केला.

राईश साम्राज्य एक हजार वर्षे टिकेल असे त्याचे म्हणणे होते, प्रत्यक्षात १ सप्टेंबर १९३९ रोजी सुरु झालेले महायुद्ध हिरोशिमा, नागासाकी वरील अणुबॉम्बच्या हल्ल्यानंतर १९४५ सालीया  सहा वर्षातच संपुष्टात आले.

सुरवातीला त्याच्या सैन्याने प्रचंड मुसंडी मारून मोठमोठे विजय मिळवले होते, एक वेळ अशी आली होती की रशियाचा पाडाव होत होता, आणि हिटलर हे संपूर्ण युद्ध जिंकत होता, परंतु निसर्ग देखील त्याच्या विरोधात गेला आणि प्रचंड बर्फ वृष्टी झाली आणि जर्मन सैन्य जागीच अडकून पडले, इथूनच त्याच्या ऱ्हासाला सुरवात झाली आणि शेवटी त्याचा पराभव झाला.

दुर्दम्य आत्मविश्वासाचे प्रतीक बनलेल्या इंग्लंडच्या पंतप्रधानांचे “विन्स्टन चर्चिल” यांचे वक्तृत्व लंडनवर होत असलेल्या बॉम्बफेकीच्या वेळी जनतेला धीर देत होते. त्यांचे म्हणणे होते “आम्ही जमिनीवर लढू, समुद्रात लढू, आकाशात लढू आणि अंतिम विजयी होऊ. वेगवेगळ्या आघाड्यांवरील छोट्या मोठ्या लढाया दोस्त राष्ट्रे हरत होती, त्या वेळी सैन्याला धीर देताना ते म्हणाले होते,

“Though we loose the battle we will conquer the war”

त्यांच्या जादुभऱ्या शब्दांनी सैनिक प्राणपणाने लढत राहिले. जपान्यांनी पर्ल हार्बरवर हल्ला केला आणि अमेरिका युद्धात उतरली. अल्बर्ट आईन्स्टाईन च्या अणुबॉम्बच्या शोधाने या युद्धाला कलाटणी मिळाली, आणि शेवटी नाझी जर्मनी आणि हिटलरचा शेवट झाला.

२० एप्रिल, त्याच्या ५६ वाढदिवसाच्या दिवशी हिटलर भूमिगत बंकर मधून बाहेर आला, हे त्याचे लोकांना झालेले शेवटचे दर्शन.

२३ एप्रिल, १९४५ लाल सैन्याने बर्लिन, वेढले होते. होते. २९ एप्रिल रोजी मध्यरात्री नंतर, हिटलरच्या बंकर मध्ये एक लहान समारंभात त्याने इव्हा ब्राऊन या त्याच्या सखीबरोबर विवाह केला. त्याच्या मॅरेज सर्टिफिकेटवर जोसेफ गोबेल्स आणि मार्टिन बोरमान यांनी सह्या केल्या. हे सर्टिफिकेट इंटरनेट वर डिजिटली बघायला उपलब्ध आहे. इव्हा ब्राऊन या त्याच्या प्रेयसीने त्याला शेवटपर्यंत साथ दिली. हिटलर नसलेल्या जगात तिलाही जिवंत राहायचे नव्हते म्हणून तिनेही हिटलर सोबत जीवनाचा अंत करून घेतला.

“युद्धामध्ये फक्त महान व्यक्तीच जिंवत राहतील !” असे लिहिणारा हिटलर जिवंत राहू शकला नाही. ही त्याची शोकांतिका. ३० एप्रिल, १९४५ रोजी त्याने डोक्यात गोळी मारून घेतली आणि जीवन संपवले.

तीनेक वर्षांपूर्वी माझ्या वाचण्यात अगदी वेगळे पुस्तक आले होते. लेखक आहेत पराग वैद्य आणि पुस्तकाचे नाव आहे ॲडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध सत्य आणि विपर्यास. या पुस्तकात त्यांनी इतिहास जेते लिहितात आणि जितांची बाजू कधी समोर येत नाही असे म्हटले आहे. त्यांच्या लिखाणाचा अर्थ हिटलर तसा नव्हता. त्याला जगाने निष्कारण वाईट क्रूरकर्मा ठरवले असा आहे.

वाईटात वाईट व्यक्तींमध्ये सुद्धा काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. हिटलरची काही वचने वाचली की याची प्रचिती येते. यात मला हिटलरचे उदात्तीकरण अजिबात करायचे नाही.

  1. “If you win, you need not have to explain… If you lose, you should not be there to explain!”
  2. “Do not compare yourself to others. If you do so, you are insulting yourself. ”
  3. “if you want to shine like a sun, first you have to burn like it. ”
  4. “Think Thousand times before taking a decision, But – After taking a decision never turn back even if you get thousand difficulties!!”
  5. “When diplomacy ends, War begins. ”
  6. “Words build bridges into unexplored regions. ”
  7. “To conquer a nation, first disarm its citizens. ”
  8. “I use emotion for the many and reserve the reason for few. ”
  9. “The man who has no sense of history, is like a man who has no ears or eyes”

शेवटचे जे फारच महत्वाचं आहे. आणि सध्याच्या परिस्थितीला लागू पडते

  1. “If you tell a big enough lie and tell it frequently enough, it will be believed. ”

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मदारी… एक बोधकथा…” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? इंद्रधनुष्य ?

☆ “मदारी… एक बोधकथा…☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

एक मदारी असतो. तो आपल्या माकडाला घेऊन गावोगावी फिरायचा, माकडाचे खेळ करून दाखवायचा आणि त्यातून येणाऱ्या पैशातून आपला उदरनिर्वाह करायचा.

ते माकड सुद्धा अगदी छान काम करायचे. कोलंट्या उड्या मारायचे, पाणी आणून द्यायचे आणि मालक सांगेल तसे सगळे काम करायचा. त्याने त्या माकडाचे नाव रघुवीर ठेवले होते.

सगळे त्याला म्हणतात अरे याचे नाव रघुवीर का ठेवलेस? हे तर श्री रामांचे नाव आहे ना? याचे नाव हनुमान, मारुती असे काही तरी ठेव.

यावर त्या मदाऱ्याने खूप छान उत्तर दिले. तो म्हणाला कामात राम असतो. मग माझे माकडाचे खेळ करून दाखवणे हे काम म्हणजे रामाचे झाले ना? दुसरे असे की त्या निमित्ताने माझ्या तोंडून श्रीरामाचे नाव दिवसातून 1000 वेळा तरी घेतले जाते. तेवढाच रामाचा जपही होतो आणि श्रीरामाचे स्मरणही होते.

मग श्रीरामाचे स्मरण करणारा मीच हनुमान होतो. मग मला आठवतात हनुमंताच्या लीला आणि त्या लीला मी माझ्याशी पडताळून पहातो.

मग हनुमानाने सीता माईने घातलेल्या मोत्याच्या माळेत श्री राम आहेत का ते बघितले होते तसे मी या रघुवीरला सांगितलेल्या कामात राम शोधतो आणि मला तो गवसतो. जर गवसला नाही तर मग माझे काही चुकले आहे असे मला समजते आणि मी ते सुधारतो आणि मग मला माझा राम सापडतो.

हनुमानाने आपली छाती फाडून तेथे श्री राम वास करत असल्याचे दाखवले होते. मला खात्री आहे मी माझ्या कामाप्रती श्रद्धा ठेवली असल्याने आणि माझे काम हे ईश्वराचे काम मी मानत असल्याने माझ्याही ह्रदयात श्रीराम वास नक्कीच आहे.

हनुमंताने श्रीरामाची सेवा मनोभावे केली तशी मी माझ्या या रघुवीरची करतो. त्याने दिवसभर माझे काम केले असले तरी मी रात्री त्याचे पाय चेपतो, त्याला चांगले न्हाऊमाखू घालतो आणि हो मला स्वतःला मी कपडे नाही घेतले तरी मी नेहमी याच्यासाठी नवे कपडे घेतो. अशी मी त्याची सेवा माझा राम म्हणून करतो.

मला खात्री आहे की तुम्ही कोणतेही काम करत असाल तर ते काम ईश्वराचे काम समजून केले, आपल्या कामाबद्दल निष्ठा आणि श्रद्धा ठेवली, आपल्या मालकावर पूर्ण विश्वास ठेवला तर कोणत्याही कामात सफलता मिळाल्या शिवाय राहणार नाही. तुमच्या बाबतीत चांगले घडल्या शिवाय राहणार नाही.

श्रद्धा असेल तर भक्ती नकळत होते आणि अशी निस्वार्थ, निष्काम भक्ती केली तर तुमचे चांगलेच होणार.

आयुष्यात राम मिळावा असे वाटत असेल तर तुम्ही हनुमान व्हायला पाहिजे.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘वाळवी‘ – लेखक : श्री सतीश वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

‘वाळवीलेखक : श्री सतीश वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

एकदा एका ग्रंथालयाला लागली वाळवी..

ती ” ती ” होती म्हणून तिला खायची खूप सवय, दिसेल ते खाsss त सुटली.

कथा, कादंबऱ्या, नाटकं, कविता संग्रह, स्फुट लेखन, इथं पासून ते महाकाव्या पर्यंत सगळं तिने खाल्लं. व. पु. , पु. ल. , ना. धो. , चिं. त्र्यं. , अहो तिने सगळं खाल्लं, मग मात्र तिचं पोट लागलं दुखायला.

मग ती मेडिकल ची पुस्तकं खायला लागली.

तिला त्याच्यात पोटदुखीवरचे इलाज सापडायला लागले.

” ए, तू कुठं आहेस आत्ता ? ” वाळवीने विचारलं, वाळवा म्हणाला, “वस्त्रहरण”

” बरोबर, मला वाटलंच होत कि, तू आधी वस्त्रहरण च खाणार ” वाळवी उत्तरली, ” पुरुष सगळे सारखेच, महाभारतात पुरुषांच्या दृष्टीने महत्वाचं फक्त वस्त्रहरण, ” 

” अग बाई, पण वस्त्रहरणाच्या वेळी कृष्णानेच साड्या पुरवल्या ना ? बरं तू काय खातेस ? ” 

” मी आत्ता कर्णाची कवच कुंडलं ! ” ” वा !म्हणजे तू आता अजरामर व्हायचा विचार करतेस कि काय ? ” ” अरे बाबा, कर्ण कवच कुंडलामुळे अजरामर होणार असता, तर कवच कुंडलं व्यासांनी आपल्या जवळच नसती का ठेवली ? “

आत्ता मात्र वाळव्याच्या एक गोष्ट लक्षात आली कि ह्या वाळवीने, गुन्हेगारी कथा आधीच हजम केलेल्या आहेत.

महाभारत खाता खाता दोघांनाही थोडी झोप लागली, आणि अचानक एका पुस्तकातून आवाज यायला लागला. वाळवा म्हणाला, ” ए काही घाबरायचं कारण नाहीये ते पुस्तक  धारपांचं आहे, थोडी भुतं असतील अजून जिवंत तीच बडबडत असतील ! बराच वेळ महाभारत खाऊन सुस्तावलेले दोघं विचार करत होते, की महाभारतात लिहिलंय तेच आत्ता सगळीकडं घडतंय – का जे घडणार आहे ते महाभारतात लिहिलंय ? स्त्रियांची विटंबना आजही होतेच आहे की !

” ए, तू विनोदी खाल्लंयस कधी ? “वाळव्यानं विचारलं, ” अरे बाबा हल्ली विनोदी कुठं मिळतंय खायला, त्यालाच जास्त डिमांड आहे. त्रासलेले सगळे लोक विनोदी वाचूनच आपलं आयुष्य सुखी बनवताहेत. सामाजिक साहित्य हल्ली कुणी वाचतच नाही, त्यामुळे ते खूप मिळतं  खायला, पण चव नाहीरे त्याला. ” ते तुझं खरंय ग, पण मला सध्या डॉक्टरांनी विनोदी काही खाऊ नका म्हणून सांगितलंय. ” रोमॅंटिक, विनोदी, गुन्हेगारी, मला सगळं वर्ज्य आहे.

” ए, बाय द वे, तुला खरंच मनापासून कुणाला खायला आवडतं ? ” वाळवा, वाळविला विचारत होता. पण वाळवीचं लक्षच नव्हतं ती आपली मस्त, व. पु. मध्ये दंग होती. बहुतेक वपुर्झा असावं. ” काय रे सारखं सारखं डिस्टर्ब करतोस, छान चव लागली होती मला आत्ता, ” वाळवी ओरडली.

व. पु. वाचणाऱ्यांचं पण असंच होत असेल नाही ? कुणी डिस्टर्ब केलं कि लगेच राग येत असेल ? तो पर्यंत वाळवा भाऊंच्या पुस्तकात घुसला होता.

तो लगेचच वॅक वॅक करत उलट्या करतच बाहेर आला. ” अरे अरे कुठल्याही पुस्तकात घुसताना जरा , प्रस्तावना तरी वाचत जा !”  वाळवी ओरडली. तुला हे असलं पचणाऱ नाही बाबा ! वाळवी ओरडली.

एक दिवस वाळवा सकाळपासूनच हातात, झेंडा घेऊन ओरडत फिरत होता, तेंव्हा वाळवीच्या लक्षात आलं, ती मनातल्या मनात पुटपुटली. बहुतेक विद्रोही साहित्य संमेलनातील पुस्तकांचा स्टॉक आलाय…

इकडे वाळवीला कोरड्या उलट्या व्हायला लागल्या आणि तिने ते वाळव्याला सांगितलं, तसा तो हसत हसत म्हणाला ”  म्हणून मी तुला सांगत होतो, ती पक्वान्न रेसिपिची पुस्तकं खाऊ नको, ऐकलं नाहीस माझं, आता जा तिकडे शेवटच्या कपाटात आणि ” कुठलाही आजार दोन मिनिटात पळवा ” ह्या पुस्तकाची दोन पानं खाऊन ये, बरं वाटेल तुला !”

पण वाळवी लाजत लाजत त्याला म्हणाली, अहो वाळवेश्वरराव तुम्ही आता बाप होणार आहात !

आणि वाळवा उडाला, तो मनात विचार करायला लागला ” मी तर नियमितपणे संतती नियमनाच्या पुस्तकाची रोज दोन पानं खातो तरी असं कसं काय झालं ? “

पण नंतर त्याच्याच लक्षात आलं आपण परवा, ” डे ” काकूंच्या गार्डनची थोडी चव घेतली होती आणि नंतर वाळवी कडे गेलो होतो.

नंतर  वाळविला यथावकाश दिवस गेले, एक दिवशी ती हटूनच बसली ” मला वैभव आणि संदीपच्या कविता पाहिजेत ” वाळवा म्हणाला ” अगं बाई, ते दोघं सध्या आघाडीचे कवी आहेत, त्यांच्या कवितांच्या पुस्तकांच्या इतक्या आवृत्त्या खपाखप खपताहेत त्या कशा तुला मिळतील, त्या अजून लोकांनाच मिळत नाहीत, अजून आपल्या लायब्ररीमधे ती पुस्तकं आलेलीच नाहीत “

तुला नवकवींची पुस्तकं देऊ का ? ती बरी असतात, चविष्ट नसतात पण हल्ली आपल्याला फार चमचमीत परवडत पण नाही.

” त्यापेक्षा तु एक काम कर, सरळ राजकारण्यांची आत्मचरित्र वाचत जा, म्हणजे आपली पोरं सगळं काही शिकतील, कारण हल्ली एकमेकाच्या तोंडावर, न बोलता थेट आत्मचरित्रात कथन करण्याची चढाओढ सुरू आहे.

” शि ssss काय हो, तसली पुस्तकं खाऊन पोरांना कशाला बिघडवायचं ? त्यापेक्षा ” वृत्तपत्र ” बरी, आता या यू ट्यूबच्या जमान्यात, पुस्तकांची आवक जरा कमीच झालीय, जो तो येतो आणि ” नमस्कार ! मी….. बोलतोय, तुम्ही बघत आहात….. असं म्हणून सुरू करतो. आपल्याला पुढे अन्नाचा तुटवडा भासणार आहे बरं का ! आपल्या पोरांना सुद्धा फार फालतु आणि निकृष्ट दर्जाचं साहित्य खावं लागणार आहे.

पुढे कालांतराने मेडिकलच्या पुस्तकात वाळवीची डिलिव्हरी झाली आणि त्यांची पुढची पिढी अजस्त्र संख्येने बाहेर पडली, पण त्यांना हे साहित्य फारच बेचव वाटायला लागलं, आणि ती पिढी ह्या आपल्या आई बापाना जुन्याच साहित्याच्या वृद्धाश्रमात सोडून, संगणकाच्या मागे लागली. तिथे त्यांना गुगल बाबाच्या आश्रमात ” बग्ज ” नावाने प्रसिद्धी मिळाली, ते मोठे मोठे ” हॅकर ” म्हणून प्रसिद्ध झाले. पूर्वीची वाळवी आता व्हायरस झाली आणि लाखोच्या संख्येने त्यांनी  ॲटॅक सुरू केले.

आज जागतिक पुस्तक दिवसाच्या निमित्ताने पुस्तकांच्या विषयावर लिहावं असं वाटलं आणि डोक्यातल्या वाळवीने माझं डोकं खात खात, बोटांच्या माध्यमाने ते मोबाईलवर उतरवलं, तेच तुमच्या समोर ठेऊन  जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा देतो – – खास जागतिक पुस्तक दिनानिमित्त !

धन्यवाद !

लेखक : श्री सतीश वैद्य

(खास जागतिक पुस्तक दिना निमित्त !) 

 मो 9373109646

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गोधन…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “गोधन– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

घेऊन  सूर्य  शिंगांमध्ये

नदीकाठावर उभी गाय

भुकेलेल्या वासराला

पान्हा सोडीतसे माय

*

 बंधनरूपी गळ्यात अडणा 

 स्त्रीत्व म्हणूनी का या खुणा?

 ताबा मिळणे सोपे जावया

 अडण्याचा हा असे बहाणा !

*

 कुठेही जावो चरावयाशी

 सांजवेळी परतते  घराशी

 दूध दुभत्याची रेलचेलही

 गोधन असता नित हाताशी

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संस्मरण – मेरी यादों में जालंधर – भाग-16 – दिल को छू लेती है आज भी मासूम हंसी! ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ संस्मरण – मेरी यादों में जालंधर – भाग-16 – दिल को छू लेती है आज भी मासूम हंसी! ☆ श्री कमलेश भारतीय ☆

(प्रत्येक शनिवार प्रस्तुत है – साप्ताहिक स्तम्भ – “मेरी यादों में जालंधर”)

यादों का यह सिलसिला जालंधर से शुरू होकर, न जाने किस तरफ अपने आप ही मोड़ ले लेता है और मित्रो मैं कोई नोट्स लेकर किसी तयशुदा मंजिल की ओर नहीं चल रहा । आज सोचता हूँ कि राजीव भाटिया और वंदना भाटिया के बहाने चंडीगढ़ के कुछ और रंगकर्मियों को याद करूँ पर उससे पहले पंजाब के अभी तक छूट रहे रंगकर्मी ललित बहल को याद कर लूँ! ललित बहल का मैं फैन हो गया था उनकी दूरदर्शन के लिए बनाई फिल्म, शायद उसका नाम ‘चिड़ियां दा चम्बा’ ही था, जिसमें एक ही दामाद ससुराल की बाकी लडकियों के साथ भी संबंध ही नहीं बनाता बल्कि सबको नर्क जैसा जीवन देता है। ‌ललित की पत्नी नवनिंद्र कौर बहल ने भी इसमें भूमिका निभाई थी! इसके साथ ही ललित बहल का लिखा ‘कुमारस्वामी’ नाटक न जाने कितनी बार यूथ फेस्टिवल में देख चुका हूँ। ‌अब बता दूँ  कि ललित बहल भी कपूरथला से संबंध रखते थे। मेरी इनसे एक ही मुलाकात हुई और वह भी यमुनानगर के यूथ फेस्टिवल में, जिसमें हम दोनों नाटक विधा के निर्णायक थे! उस रात हमें एक गन्ना मिल के बढ़िया गेस्ट हाउस में अतिथि बनाया गया। ‌जैसे ही खाना खाया तब हम दोनों सैर के लिए निकले! मैंने पूछा कि ललित! आखिर ‘कुमारस्वामी’ लिखने का आइडिया कहां से और कैसे आया?

पहले यह बता दूं कि ललित बहल ने इसकी पहली प्रस्तुति चंडीगढ़ के टैगोर थियेटर में दी थी , जिसमें राजीव भाटिया ने भी एक भूमिका निभाई थी और सभी चरित्र निभाने वालों को अपने सिर बिल्कुल सफाचट करवाने पड़े थे और‌ इन सबका एक फोटो एकसाथ ‘ट्रिब्यून’ में आया था, जो आज तक याद है! यह साम्प्रदायिक दंगों को केंद्र में रखकर लिखा गया है, जिसमें दो सम्प्रदाय आपस में अपने सम्प्रदाय को बड़ा मानते हुए लड़ मरते हैं और जबरदस्ती एक संत को अनशन पर बिठा दिया जाता है जबकि उसके ही बड़े महंत उसकी रात के समय हत्या करवा कर दूसरे सम्प्रदाय पर सारा दोष मढ़ देते हैं और‌ ये हत्या होती है ‘कुमारस्वामी’ की जो धर्म का मर्म सीखने आया है!

ललित बहल ने बताया कि आपको संत सेवा दास की याद है? मैंने कहा कि हां, अच्छी तरह! कहने लगे कि हमारे कपूरथला के दो चार युवा नेता चाहते थे कि हाईकमान के आगे उनका नाम हो जाये, तो उन्होंने संत सेवा दास को आमरण अनशन के लिए तैयार कर लिया ! अब आमरण अनशन पर उन‌ दिनों मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल ने सीआईडी तैनात कर दी कि संत सिवाय पानी के कोई चीज़ चोरी चुपके  से भी न खा सके! तीसरे दिन तक सेवा दास की टैं बोल गयी और उन्होंने युवा नेताओं को कहा कि मैं तो यह आमरण अनशन नहीं कर पाऊंगा लेकिन वे नहीं माने और‌ आखिरकार‌ सेवा दास रात के समय चुपके से अनशन तोड़ कर भाग निकला ! दूसरे संत फेरुमान रहे, जिन्होंने आमरण अनशन नहीं छोड़ा और प्राण त्याग दिये ! इन दोनो को मिला कर ‘कुमारस्वामी’ लिखा गया! अब मैं यूथ फेस्टिवल में लगातार चौदह वर्ष तक थियेटर की विधाओं में निर्णायक बनाये जाने वाले रंगकर्मी व कुरूक्षेत्र विश्वविद्यालय के सांस्कृतिक विभाग के निदेशक अनूप लाठर को याद कर रहा हूँ । उन्होंने हरियाणवी की आज तक सर्वाधिक लोकप्रिय फिल्म ‘ चंद्रावल’ में चंदरिया का रोल निभाया था और उन्होंने मुम्बई न जाकर दूसरे तरीके से हरियाणवी का विस्तार किया ! विश्वविद्यालय के निदेशक होने के चलते ‘रत्नावली’ जैसा उत्सव दिया जिसकी लोकप्रियता इतनी बढ़ गयी है कि हर साल नवम्बर में कलाकार इसकी प्रतीक्षा करते हैं! बूढ़े बुजुर्ग भी देर रात तक सांग प्रतियोगिता देखने कम्बल ओढ़ कर बैठे रहते हैं और अनूप हर वर्ष एक न एक नयी विधा इसमें जोड़ते चले गये! ‘हरियाणवी आर्केस्ट्रा’ अनूप लाठर की ही देन है। इसके पीछे उनकी सोच यह रही कि हरियाणवी साजिंदों को काम मिले! खुद अनूप लाठर ने नाटक और संगीत पर पुस्तकें लिखीं हैं। ‌मेरी कहानी ‘ जादूगरनी’ इतनी पसंद आई कि उस पर नाटक बनाने की सोची! इसी तरह पंजाब विश्वविद्यालय, चंडीगढ़ के मोहन महर्षि ने भी डाॅ वीरेंद्र मेहंदीरता के घर आयोजित ‘ अभिव्यक्ति’ की गोष्ठी में मेरी इस कहानी को सुनकर नाटक बनाने की सोची थी कि मेरी ट्रांसफर हिसार हो जाने पर यह मामला बीच मंझधार में ही रह गया! इसी तरह अनूप लाठर की रिहर्सल के दौरान जादूगरनी का रोल‌ निभाने वाली महिमा व जौड़े के मामा के बेटे का रोल‌ निभाने वाले कैंडी का सचमुच आपस में प्यार हो गया और कैंडी रोज़ी रोटी के लिए नोएडा चला गया। ‌दोनों को मेरी कहानी ने मिला दिया और‌ मैं आज भी महिमा को जादू ही कहता हूँ और‌ कैंडी मेरे मित्र व हरियाणा के चर्चित लेखक दिनेश दधीचि का बेटा है और अच्छा संगीतकार है। ‌अनूप लाठर ने साहित्यिक कार्यशाला भी शुरू कीं जो आज तक चल रही हैं और इसके माधयम से भी रोहित सरदाना जैसा तेज़ तर्रार एंकर निकला और अफसोस कि कोरोना ने उसे लील गया! आजकल अनूप लाठर दिल्ली विश्वविद्यालय में पी आर का काम देखते हैं और पिछले वर्ष पुस्तक मेले पर इनकी संगीत पर लिखी किताब के विमोचन पर प्यारी सी मुलाकात हुई और‌ वे वैसी ही निर्मल हंसी के साथ मिले कि दिल को छू गये! फिर भी एक मलाल है उन्हें कि हरियाणा की किसी सरकार ने सम्मानित नहीं किया!

आज बस इतना ही! क्या क्या आगे लिखूंगा आज की तरह कल भी नहीं जानता!

क्रमशः…. 

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ ≈ मॉरिशस से ≈ – थपेड़े – ☆ श्री रामदेव धुरंधर ☆

श्री रामदेव धुरंधर

(ई-अभिव्यक्ति में मॉरीशस के सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री रामदेव धुरंधर जी का हार्दिक स्वागत। आपकी रचनाओं में गिरमिटया बन कर गए भारतीय श्रमिकों की बदलती पीढ़ी और उनकी पीड़ा का जीवंत चित्रण होता हैं। आपकी कुछ चर्चित रचनाएँ – उपन्यास – चेहरों का आदमी, छोटी मछली बड़ी मछली, पूछो इस माटी से, बनते बिगड़ते रिश्ते, पथरीला सोना। कहानी संग्रह – विष-मंथन, जन्म की एक भूल, व्यंग्य संग्रह – कलजुगी धरम, चेहरों के झमेले, पापी स्वर्ग, बंदे आगे भी देख, लघुकथा संग्रह – चेहरे मेरे तुम्हारे, यात्रा साथ-साथ, एक धरती एक आकाश, आते-जाते लोग। आपको हिंदी सेवा के लिए सातवें विश्व हिंदी सम्मेलन सूरीनाम (2003) में सम्मानित किया गया। इसके अलावा आपको विश्व भाषा हिंदी सम्मान (विश्व हिंदी सचिवालय, 2013), साहित्य शिरोमणि सम्मान (मॉरिशस भारत अंतरराष्ट्रीय संगोष्ठी 2015), हिंदी विदेश प्रसार सम्मान (उ.प. हिंदी संस्थान लखनऊ, 2015), श्रीलाल शुक्ल इफको साहित्य सम्मान (जनवरी 2017) सहित कई सम्मान व पुरस्कार मिले हैं। हम श्री रामदेव  जी के चुनिन्दा साहित्य को ई अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों से समय समय पर साझा करने का प्रयास करेंगे। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय लघुकथा  थपेड़े ।) 

~ मॉरिशस से ~

☆  कथा कहानी ☆ – थपेड़े – ☆ श्री रामदेव धुरंधर ☆

आकाश प्रेम से देखता था, चाँद आत्मीयता से तकता था, पृथ्वी खुशी से स्पंदित होती थी। यह एक बालक के जन्म का उत्सव था। अच्छा करने में बालक की अद्भुत लगन थी। पर बालक बड़ा होने की प्रक्रिया में परिवर्तित दिखायी दिया। तब तो आकाश, चाँद और पृथ्वी का उत्सव शिथिल पड़ गया। बालक पूर्व जन्म से कुछ ले कर धरती पर आया था जिसे जमाने के थपेड़ों ने नष्ट करके उसे अपने धरातल पर खड़ा कर लिया था।
***

© श्री रामदेव धुरंधर

17– 04 – 2024

संपर्क : रायल रोड, कारोलीन बेल एर, रिविएर सेचे, मोरिशस फोन : +230 5753 7057   ईमेल : [email protected]

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – विभाजन ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – विभाजन ? ?

यथा-तथा

किंतु-परंतु

अगर-मगर

ओह-पर

फ़सादी ़ज़बान

उन्मादी माहौल

सर्वदा जन्म देते हैं

विभाजन को..,

 

रेल ढोती है लाशें

छतों पर होती हैं जच्चा

सीमाओं की जंग में

जनती हैं बच्चा..,

मुझे लगता है,

विभाजन के दंश

सबसे ज्यादा

भोगती-सोखती है औरत,

घर,परिवार, बच्चों और

बारबार अपनी देह पर..,

 

इस ओर का बीज उस ओर,

उस ओर का बीज इस ओर,

लाशों से भरी रेलों में

प्राण का संवाहक होती है औरत..!

 

औरत की कोख में दबा

यहाँ का बीज पनपता है वहाँ,

वहाँ का बीज पनपता है यहाँ..,

 

भविष्य में यही बीज

उठ खड़े होते हैं

एक-दूसरे के विरुद्ध

और अपने नये खेमे से

फूँकते हैं शंख

अपनी ही धरोहर के विरुद्ध..,

 

धरती पर खड़े कर

कँटीले तार

शासक बाँट लेता है सीमाएँ

पर माँ बच्चों को बाँट नहीं पाती..,

 

सुनो विभाजन के पक्षधरो!

गुरुत्वाकर्षण केवल

धरती में होता है

इसके अभाव में

अंतरिक्ष में पैर धरातल पर

टिक नहीं पाते,

औरत धरती होती है,

धरतीवासियो! सोचो

अगर धरती नहीं होती तो..?

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 श्री हनुमान साधना – अवधि- मंगलवार दि. 23 अप्रैल से गुरुवार 23 मई तक 💥

🕉️ श्री हनुमान साधना में हनुमान चालीसा के पाठ होंगे। संकटमोचन हनुमनाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें। आत्म-परिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही। मंगल भव 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आतिश का तरकश #235 – 122 – “कोई किसी का नहीं होता जहाँ में…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी  ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं ।प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकशआज प्रस्तुत है आपकी भावप्रवण ग़ज़ल कोई किसी का नहीं होता जहाँ में…” ।)

? ग़ज़ल # 120 – “कोई किसी का नहीं होता जहाँ में…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ?

मैं चाहूँ तुझे ये मेरी फ़ितरत है,

ना चाहे तू मुझे मेरी क़िस्मत है,

*

तेरे लिए मैं बेमतलब ही तो हूँ,

तुझ पे मरना तो मेरी सूरत है।

*

देखकर छुप जाना छुपकर देखना,

ये ऑंख मिचौली बेजा हरकत है।

*

कोई किसी का नहीं होता जहाँ में,

शायद वो मेरा हो जाए मुरव्वत है। 

*

है  मेरी  दौलत  तेरी  ही चाहत,

मेरे जीवन की यही बस हसरत है।

*

मुझे  तरसाना  खूब  उसे  आता है,

तग़ाफ़ुल में उसको हासिल महारत है।

*

तेरी फुरकत में आह भरता आतिश,

तेरी आह दिल में बसाना मुहब्बत है।

© श्री सुरेश पटवा ‘आतिश’

भोपाल, मध्य प्रदेश

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ “श्री हंस” साहित्य # 113 ☆ मुक्तक – ।। आपकी ऊंगली छाप से संभव होते देश के ख्वाब ।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस” ☆

श्री एस के कपूर “श्री हंस”

☆ “श्री हंस” साहित्य # 113 ☆

☆ मुक्तक – ।।आपकी ऊंगली छाप से संभव होते देश के ख्वाब।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस” ☆

[1]

मत आँकों वोट की कीमत कम सुई नहीं तलवार है।

एक एक वोट से मिल कर  ही  बनती सरकार है।।

यह भीषण समर  और     है यह    पावन पर्व भी।

बाहर निकल कर वोट   देना   समय की दरकार है।।

[2]

ऊंगली नहीं यह तो तेरे हाथ में जैसे एक हथियार है।

हटा सकते हो तुम कि अगर कोई खोटी सरकार है।।

तेरे वोट की सही दिशा निश्चित करती देश की दशा।

उचित दृष्टि से देखें तो जनता देश की रचनाकार है।।

[3]

हमारा मत बदल   सकता   हवा का गलत रुख है।

हमारे वोट से ही निश्चित होता देश का दुख सुख है।।

वोट करता बहुत चोट   हटा सकते जिसमें है खोट।

सही मतदान करने से मिलता मन को संतोष सुख है।।

[4]

मतदान करके हम स्वयंऔर राष्ट्र पर करते उपकार।

हम चाहते जैसी सरकार करें वैसा  ही मताधिकार।।

वोट डाल कर राष्ट्रधर्म का निर्वहन सबको है करना।

भूमिका रहे न आपकी अधूरी आप भी बने भागीदार।।

© एस के कपूर “श्री हंस”

बरेलीईमेल – Skkapoor5067@ gmail.com, मोब  – 9897071046, 8218685464

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 358 ⇒ गमले में गिलहरी… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “गमले में गिलहरी…।)

?अभी अभी # 358 ⇒ गमले में गिलहरी? श्री प्रदीप शर्मा  ?

कुछ शीर्षक बड़े विचित्र लेकिन असाधारण होते हैं। धर्मवीर भारती ने एक बर्फ वाले को ठेले पर बर्फ की सिल्लियां ले जाते देखा, और अनायास ही उन्हें अपनी कहानी का शीर्षक सूझ गया, ठेले पर हिमालय। मैने जब एक गिलहरी को भरी दुपहरी में, एक गमले के पौधे में आराम फरमाते देखा तो आश्चर्यचकित रह गया, गमले में गिलहरी !

इंसान के अलावा कुछ ऐसे मूक पशु पक्षी भी होते हैं, जिनसे हमें अनायास ही लगाव हो जाता है। बिना संवाद के भी भावनाओं का आदान प्रदान संभव है, अगर एक दूसरे के लिए आकर्षण है। गाय, भैंस के अलावा पालतू कुत्ते बिल्ली और कुछ पक्षी भी इसी श्रेणी में आते हैं। लेकिन आसमान में स्वच्छंद उड़ने वाला पक्षी और पेड़ पौधों पर निवास करने वाले कुछ प्राणी इतनी आसानी से हमारे करीब नहीं आते।

शायद उनमें यह अज्ञात भय व्याप्त हो, यह इंसान हमें मार डालेगा, पिंजरे में बंद कर देगा, अथवा खा जाएगा।।

कुछ लोग पक्षियों को नियमित दाना डालते हैं तो कुछ गर्मी में उनके लिए पीने के लिए पानी का इंतजाम करते हैं। अगर इस दुनिया में नेकी ना हो, तो क्या कोई पक्षी इतना निर्भीक हो, आसमान से उड़कर आपके आंगन में उतर पाएगा। एक दूरी बनाते हुए, वह मूक पक्षी आपको करीबी का अहसास देता है।

मैने ना तो कभी चिड़ियों को दाना डाला और ना ही किसी उड़ती चिड़िया को मैने पिंजरे में बंद करने की कोशिश ही की। मुझे देखते ही चिड़िया फुर्र से उड़ जाती है, मानो मैं उसे खा जाऊंगा, मुझे बहुत बुरा लगता है।।

घर के बाहर की ओपन गैलरी मैने कुछ गमलों में पौधे लगा रखे थे, नीचे आंगन और हरा भरा बगीचा था। कुछ पेड़ों पर गिलहरियों का नियमित निवास था। वे दिन में चोरी से मेरी गैलरी में आती, और बारह रखी खाने लायक चीजों पर हाथ साफ करती, लेकिन मुझे देख, जल्दी से छुप जाती।

धीरे धीरे उसे स्वादिष्ट पदार्थों का स्वाद लग गया, और लालच स्वरूप वह घर में भी प्रवेश करने लगी। लेकिन सब कुछ चोरी छुपे। मेरी निगाह पड़ते ही, यह जा, वह जा। गुस्सा भी आता और प्यार भी। लेकिन इतनी लाजवंती, कि आप उसे कभी छू भी ना पाओ।

इंसानों जैसे बैठकर, जब आगे के दोनों पंजों से मूंगफली छीलकर खाती है, तो बड़ा अचरज होता है।

मैने गिलहरी को अक्सर पेड़ पर चढ़ते उतरते और डाली डाली डोलते देखा है। पक्षियों के बीच रहने से, इसकी आवाज भी कुछ कुछ चिड़ियों जैसी ही हो गई है। जहां थोड़ा भी खतरा नजर आया, यह फुर्ती से पेड़ पर चढ़ जाती है।।

एक बार भरी दोपहर में मुझे बाहर गैलरी में रखे गमले में कोई जानवर बैठा नजर आया, पहले लगा, शायद कोई बिल्ली का बच्चा हो। पास जाकर देखा, तो गिलहरी महारानी गमले की ठंडी मिट्टी में आंखें मूंदे, निश्चिंत हो, आराम फरमा रही हैं, मैंने उसकी नींद में खलल डालना उचित नहीं समझा और चुपचाप अंदर चला आया। मेरी इस छूट का उसने भरपूर फायदा उठाया, और भविष्य में, जब मन करता, गर्मी से राहत पाने के लिए, निश्चिंत हो, गमले में आराम फरमाती।

आप इसे क्या कहेंगे, चोरी चोरी माल खाना, और बाद में निश्चिंत हो, गमले की ठंडी मिट्टी में घोड़े बेचकर सो जाना, लेकिन मुझे रत्ती भर घास नहीं डालना, क्या यह चोरी और सीना जोरी नहीं। कोई दिनदहाड़े हमें लूट रहा है, फिर भी हम उस पर फिदा हैं, और उस ज़ालिम को कुछ पता ही नहीं। क्या जीवन का यह सात्विक सुख, आध्यात्मिक सुख नहीं, क्या ईश्वर भी हमारे साथ कुछ ऐसी ही लीला नहीं कर रहा, हो सकता है, यह गिलहरी ही हरि हो ;

तेरे मेरे बीच में

कैसा है ये बंधन अनजाना

मैने नहीं जाना

तूने नहीं जाना।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares