श्री प्रसाद जोग

? इंद्रधनुष्य ?

☆ ॲडॉल्फ हिटलर ☆ श्री प्रसाद जोग

ॲडॉल्फ हिटलर —

आत्महत्या :  ३० एप्रिल, १९४५

हा जर्मनी देशाचा हुकूमशहा होता. नाझी पक्षाच्या या नेत्याचे नाव त्याच्या क्रूरपणा व ज्यूंच्या कत्तलीकरता कुप्रसिद्ध आहे. तो नाझी जर्मनीचा प्रमुख होता. दुसरे महायुद्ध सुरू होण्यामागे असलेल्या प्रमुख कारणांत हिटलरची गणना होते.

ॲलॉइस व क्लारा (तिसरी पत्नी) हिटलर या दांपत्याचा हिटलर  (चौथा) मुलगा होता. आपल्या संघर्षकाळात याने काहीकाळ व्हिएन्नामधे हस्तचित्रे विकून रस्त्यावरील बर्फ साफ करुन, घरांना रंग देऊन करुन उपजिविका चालवली. त्याने पहिल्या महायुद्धात सैनिक म्हणून काम केले. फलस्वरूप त्याला शिक्षा देखील झाली तुरुंगामध्ये असताना १९२३ साली माईन काम्फ (माझा लढा) या आत्मकथेच्या लिखाणाला त्याने सुरवात केली आणि त्याचा लेखनिक होता त्याचा सहकारी रुडाल्फ हेस.

जर्मनीचा हुकूमशहा अडाॅल्फ हिटलरची स्वाक्षरी असलेली आत्मकथा ‘माईन काम्फ’ (माझा लढा) ची विक्री झाली. अमेरिकेत ८. ३२  लाखांना लिलावात ही प्रत विकली गेली आहे.

या आत्मकथेच्या पहिल्या पानावर हिटलरची स्वाक्षरी आहे. या स्वाक्षरीखाली ‘ युद्धामध्ये फक्त महान व्यक्तीच जिवंत राहतील. ’ 

१८ ऑगस्ट, १९३० 

“अडाॅल्फ हिटलर”  —- असं वाक्यही दस्तरखुद्द हिटलरने लिहिलंय.

पुढे थोड्याच वर्षांत याने बुद्धिमंतांच्या देश म्हणून ओळखल्या गेलेल्या जर्मनीची सत्ता हस्तगत केली. पुढे आपल्या बुद्धिचातुर्याच्या आणि अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर तो जर्मनीचा हुकूमशहा झाला. त्याने जर्मनीच्या विकासाला चालना दिली. जर्मनीला जगातील सगळ्यात शक्तिशाली देश बनवण्याचे त्याचे स्वप्न होते, त्यासाठी त्याने प्रचंड प्रयत्न केले. त्याने सक्तीचे लष्करी शिक्षण सुरू केले. लष्कर व नौदलात वाढ केली. शक्तिशाली विमानदल उभारले. इटली व जपान या दोन देशांशी मैत्रीचा करार करून आपले हात मजबूत करून घेतले.

हिटलर हा एक महत्त्वाकांक्षी तसेच मुत्सद्दी नेता होता. ‘एक राष्ट्र, एक आवाज, एक नेता, एक ध्वज’ हे त्यांचे घोषवाक्य होते. आर्यन संस्कृतीमधील शुभ चिन्ह मानले गेलेल्या स्वस्तिकचा समावेश त्याने ध्वजामध्ये केला.

राईश साम्राज्य एक हजार वर्षे टिकेल असे त्याचे म्हणणे होते, प्रत्यक्षात १ सप्टेंबर १९३९ रोजी सुरु झालेले महायुद्ध हिरोशिमा, नागासाकी वरील अणुबॉम्बच्या हल्ल्यानंतर १९४५ सालीया  सहा वर्षातच संपुष्टात आले.

सुरवातीला त्याच्या सैन्याने प्रचंड मुसंडी मारून मोठमोठे विजय मिळवले होते, एक वेळ अशी आली होती की रशियाचा पाडाव होत होता, आणि हिटलर हे संपूर्ण युद्ध जिंकत होता, परंतु निसर्ग देखील त्याच्या विरोधात गेला आणि प्रचंड बर्फ वृष्टी झाली आणि जर्मन सैन्य जागीच अडकून पडले, इथूनच त्याच्या ऱ्हासाला सुरवात झाली आणि शेवटी त्याचा पराभव झाला.

दुर्दम्य आत्मविश्वासाचे प्रतीक बनलेल्या इंग्लंडच्या पंतप्रधानांचे “विन्स्टन चर्चिल” यांचे वक्तृत्व लंडनवर होत असलेल्या बॉम्बफेकीच्या वेळी जनतेला धीर देत होते. त्यांचे म्हणणे होते “आम्ही जमिनीवर लढू, समुद्रात लढू, आकाशात लढू आणि अंतिम विजयी होऊ. वेगवेगळ्या आघाड्यांवरील छोट्या मोठ्या लढाया दोस्त राष्ट्रे हरत होती, त्या वेळी सैन्याला धीर देताना ते म्हणाले होते,

“Though we loose the battle we will conquer the war”

त्यांच्या जादुभऱ्या शब्दांनी सैनिक प्राणपणाने लढत राहिले. जपान्यांनी पर्ल हार्बरवर हल्ला केला आणि अमेरिका युद्धात उतरली. अल्बर्ट आईन्स्टाईन च्या अणुबॉम्बच्या शोधाने या युद्धाला कलाटणी मिळाली, आणि शेवटी नाझी जर्मनी आणि हिटलरचा शेवट झाला.

२० एप्रिल, त्याच्या ५६ वाढदिवसाच्या दिवशी हिटलर भूमिगत बंकर मधून बाहेर आला, हे त्याचे लोकांना झालेले शेवटचे दर्शन.

२३ एप्रिल, १९४५ लाल सैन्याने बर्लिन, वेढले होते. होते. २९ एप्रिल रोजी मध्यरात्री नंतर, हिटलरच्या बंकर मध्ये एक लहान समारंभात त्याने इव्हा ब्राऊन या त्याच्या सखीबरोबर विवाह केला. त्याच्या मॅरेज सर्टिफिकेटवर जोसेफ गोबेल्स आणि मार्टिन बोरमान यांनी सह्या केल्या. हे सर्टिफिकेट इंटरनेट वर डिजिटली बघायला उपलब्ध आहे. इव्हा ब्राऊन या त्याच्या प्रेयसीने त्याला शेवटपर्यंत साथ दिली. हिटलर नसलेल्या जगात तिलाही जिवंत राहायचे नव्हते म्हणून तिनेही हिटलर सोबत जीवनाचा अंत करून घेतला.

“युद्धामध्ये फक्त महान व्यक्तीच जिंवत राहतील !” असे लिहिणारा हिटलर जिवंत राहू शकला नाही. ही त्याची शोकांतिका. ३० एप्रिल, १९४५ रोजी त्याने डोक्यात गोळी मारून घेतली आणि जीवन संपवले.

तीनेक वर्षांपूर्वी माझ्या वाचण्यात अगदी वेगळे पुस्तक आले होते. लेखक आहेत पराग वैद्य आणि पुस्तकाचे नाव आहे ॲडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध सत्य आणि विपर्यास. या पुस्तकात त्यांनी इतिहास जेते लिहितात आणि जितांची बाजू कधी समोर येत नाही असे म्हटले आहे. त्यांच्या लिखाणाचा अर्थ हिटलर तसा नव्हता. त्याला जगाने निष्कारण वाईट क्रूरकर्मा ठरवले असा आहे.

वाईटात वाईट व्यक्तींमध्ये सुद्धा काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. हिटलरची काही वचने वाचली की याची प्रचिती येते. यात मला हिटलरचे उदात्तीकरण अजिबात करायचे नाही.

  1. “If you win, you need not have to explain… If you lose, you should not be there to explain!”
  2. “Do not compare yourself to others. If you do so, you are insulting yourself. ”
  3. “if you want to shine like a sun, first you have to burn like it. ”
  4. “Think Thousand times before taking a decision, But – After taking a decision never turn back even if you get thousand difficulties!!”
  5. “When diplomacy ends, War begins. ”
  6. “Words build bridges into unexplored regions. ”
  7. “To conquer a nation, first disarm its citizens. ”
  8. “I use emotion for the many and reserve the reason for few. ”
  9. “The man who has no sense of history, is like a man who has no ears or eyes”

शेवटचे जे फारच महत्वाचं आहे. आणि सध्याच्या परिस्थितीला लागू पडते

  1. “If you tell a big enough lie and tell it frequently enough, it will be believed. ”

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments