आपण जसे आहोत तसा स्वीकार करणे.रंग,रूप,उंची,तब्येत,एकूणच व्यक्तिमत्व यांचा स्वीकार करणे.आपण जरा समाजात बघितले तर बरीच माणसे अशी दिसतात की, आकर्षक अशा बाह्य गोष्टी काहीच नसतात.पण तरीही ती यशस्वी असतात.अगदी बरेच दिव्यांग सुद्धा असे असतात की ते इतरांसाठी काम करतात.मग आपणाच आपल्याला का कमी लेखायचे? या साठी एक उपयुक्त वस्तू आहे. ती प्रत्येक घरात अगदी प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असते.ती म्हणजे आरसा.याचा उपयोग कसा करायचा ते बघू.
मिरर थेरपी
सकाळी उठल्यावर प्रथम स्वतःला आरशात बघावे.आणि सुंदर हसून म्हणावे मी स्वतःचा स्वीकार करत आहे.व स्वतःचे आभार मानवेत.ही कृती दिवसातून शक्य असेल तेवढ्या वेळा करावी.या मुळे काय होते? आपले मन स्वतःचा स्वीकार करते.व तसे मनाचे प्रोग्रॅमिंग होते.आणि तशाच सूचना मिळतात. आपण सगळ्या गोष्टी स्वीकारू लागतो.स्वतःला नावे ठेवणे बंद करतो.आपण बरेचदा दोन चेहरे घेऊन जगत असतो.इतरांसाठी आपला वेगळा चेहरा असतो.आणि स्वतः साठी वेगळा चेहरा असतो.त्या मुळे आपल्यावर ताण येतो. हे कमी करणे आपल्याच हातात असते.स्वतः वर प्रेम करणे व स्वाभिमान,अभिमान वाटणे यात फरक आहे.ज्यावेळी स्वतः वर प्रेम करतो त्यावेळी स्वाभिमान वाटतो.स्वाभिमान वाढला तर त्याचे रूपांतर अभिमान म्हणजे गर्व यात होते.यात खूप पुसट रेघ असते.आपल्याला अभिमान व स्वाभिमान सोडून स्वभान आणायचे आहे. त्या साठी स्वतःचा स्वीकार करून स्वतःवर प्रेम करावे.
स्वतःवर प्रेम केले की आपण आनंदी होतो.खोटा मुखवटा धारण करत नाही.स्वतः कडे साक्षी भावाने बघायला शिकतो.त्या मुळे स्वतः मधील गुण व दोष लक्षात येतात.एकदा हे लक्षात आले की आपण दोष कमी करू शकतो आणि गुणांची वाढ कशी होईल या कडे लक्ष देऊ लागतो.आणि अशी गुणी आनंदी असणारी व दुसऱ्यांना आनंदी करणारी व्यक्ती सर्वांनाच हवीशी वाटते.इथे आपल्या बाह्य रूपाचा काहीही संबंध उरत नाही.
हे सगळे फक्त एका साध्या गोष्टीमुळे घडते.आणि ती गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करणे.
☆ कथा एका पत्राची – भाग २ ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
(मागील भागात आपण पहिले – बापरे. मी दादाकडे धावले. “दादा, रनर गेला?” “अगो , केव्हाच. अजून राहिला जायचा? तुला कशाला हवा तो? खारेपाटणातून काय आणायला सांगायचेय काय? उद्या सांग हो बाबी.” आता इथून पुढे)
“जेवायला ये आता. भुकेजली असशील”. आत्तेला माझी दया आलेली. मी तिला म्हटलं , ” थांब .” नि पुन्हा आल्या वाटेने पत्र शोधायला धावतच निघाले. हातातलं पत्र वाटेत पडलं असलं तर…. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघत बघत मी चालले होते. माकडांचा खेळ चालला होता तिथेपर्यंत आले. गोलगोल फिरून बघितलं. वाऱ्याने उडालं असेल का? म्हणून आणखी लांब फिरले. देसाई भाऊंकडून जिन्नस नेणाऱ्या दोघा-तिघानी विचारलं “काय गो हुडकतंस? पैसे पडले काय साळंत येता जाता? नाय गावूचे.कोणाक सापडले असतील तर तो उचलल्या बिगर कसो -हाव्हतलो? जा घराक. उनातानाची फिरो नको”. त्यांना काय माहिती? पैशापेक्षाही महत्वाची वस्तू हरवली होती.
मी घरी आले. आईने दहीभात कालवून ठेवला होता. तो गपागपा जेवला. पंगतीला हजर नसलं की आई नेहमी असा भात कालवून ठेवायची.
दुपारची शाळा भरण्याची वेळ जवळ आली होती. मी अगदी रडायच्या बेतात होते. पत्राचं काय होणार काही सुचत नव्हतं.
नानू – माझा सातवीतला भाऊ, तो म्हणाला, “काय झालं”?
-त्याला सगळी हकिगत सांगितली.”आता मला गुरुजी मारतील कायरे खूप? खूप भीती वाटतेय.” मी म्हटलं.
“पत्र हरवलेले सांगूच नको. टाकले म्हणून सांग. त्यांना कुठे कळणारे?”
नानूने सांगितलं . त्याच्या सांगण्यामुळे मी अगदी फुशारूनच गेले. भीती पळून गेली. मुलगे मुलींपेक्षा शूर असतात. खात्रीच झाली माझी.
अडीच वाजता दुपारची शाळा भरली. गुरुजीनी विचारलंच. .”टाकलंस का पत्र?”माझ्या गळ्यात आवंढा आला. तरी मी जोरात म्हटलं ” हो.” .आपण खोटं बोलत आहोत हे मनाला सारखं डाचत राहिलं होतं. वरवर मी चेहरा हसरा ठेवला होता. जुगाबाईच्या आणि तिच्या बहिणींच्या डोळ्यांकडे मी मधून मधून बघत होते. मनातल्या मनात त्यांना सांगत होते, ” देव्यानो, मला क्षमा करा. मी खोटं बोलले आहे.”
मराठीचा नवा शिवाजी महारांजाचा धडा गुरुजीनी शिकवला, मोठ्याने कविता म्हणून झाल्या .पाढे म्हटले. पाच गणितं सोडवून झाली. उद्याचा अभ्यास गुरुजीनी फळ्यावर लिहून दिला. मी तो पाटीवर अक्षरं कोरून लिहून घेतला. आता शेवटचा खेळाचा तास.
पहिली ते सातवीची सर्व मुलं मुली मैदानावर जमली. कोणाचा खोखो, कोणाची लंगडी, कोणाचा ‘आईचं पत्र हरवलं, हा खेळ चालू होता. तो बघून मला गुरुजींच्या पत्राची आठवण होत होती. सगळी मुलं आनंदात होती. सगळे गुरुजी खुर्च्यांवर बसून गप्पा मारीत होते. मला मात्र केव्हा एकदा शाळा सुटण्याचा गजर होतो असं वाटत होतं. मी जाताना रस्त्यावर पत्र सापडतं का हे बघणार होते. सोमेश्वर, भरडाई, ह्या देवांचीही मी प्रार्थना करीत होते. पत्र सापडू दे म्हणून.
–आता घरी जायचं होतं. पत्राच्या भानगडीतून सुटले होते. नि एक टोपी घातलेला , पट्ट्याची चड्डी, नि जुनापाना सदरा घातलेला गडी-माणूस मैदानात अवतरला. तो देसाई भाऊंच्या दुकानातला जिन्नस देणारा नोकर होता. आम्हाला वाटलं, देवळात जायला आला असेल. पण तो तर गुरुजींच्या खुर्च्यांपर्यंत पोचला. आमची लंगडी संपली होती. आम्ही बघत राहिलो. नोकराने खिशातून एक पत्र काढलं नि रामगुरुजींच्या हातात दिलं. गुरुजी म्हणाले, “हे काय? पत्र कोणाचं?”
-“त्याचा काय झाला, माकडांचो खेळ इलोलो, दोन गिरायंका बरोबर मी बी ग्येलय बगुक. थयसर ह्या पत्र गावला. माका वाचुक येता पर मी आपला भाऊंकडे दिला. त्येनी बारीक डोळं करून वाचलानी, म्हणाले, अरे ह्ये आजच्या तारकेचा पत्र हा. रामक्रिष्न रामदास गोरे. ही सई हा ह्यावर.. अरे , हये राममास्तरांचा पत्र. ह्ये टाकलानी कसा नाय? त्यां न्हेऊन दे बगुया. असा कसा पडला?कोणी पाडलान?”
गड्याचं सगळं बोलणं मला ऐकू येत होतं , कारण मी जवळच्याच रांगेत उभी होते. माझे पाय थरथरायला लागले होते. मला सीतामाई सारखं धरणीने दुभंगून पोटात घ्यावं असं वाटत होतं. राम गुरुजींचा चेहरा हळूहळू रागाने लालभडक झाला होता. तो माझ्याकडे वळला होता. त्यांनी पत्र हातात घेतलं. बघून खिशात ठेवलं. गड्याच्या पाठीवर थोपटलं नि ते त्याला म्हणाले, ” शाब्बास. देसाई भाऊना म्हणावे, मी तुमचा आभारी आहे. माझे मालवणात पाठवायचे पत्. महत्वाचे आहे. आज स्वत: मीच टाकीन. जा तू.”.
“रानडेबाई , इकडे या.” मी रडायला लागलेच होते . नाक पुसत मी पुढे गेले. गुरुजींच्या हातात छडी होती. मी हात पुढे केले. त्यांनी सटासट चारपाच सणसणीत छड्या हातांवर मारल्या. पायांवर, पाठीवर, डोक्यावरसुद्धा मारल्या. कुठलेच गुरुजी मुलींना हाताने मारीत नसत. पण छड्या काय कमी लागतात? मला इतकं लागलं, इतकं लागलं की श्वास गुदमरल्यासारखं वाटलं. मैदानावरची सगळी मुलं गुरुजींच्या रुद्रावताराकडे घाबरून बघत होती. माझ्या भावानी खाली माना खाली घातल्या होत्या. आता गुरुजी मारायचे थांबले नि त्यांनी छद्मीपणाने बोलणं सुरू केलं.
“-मुलांनो, ही आपल्या शाळेतली एक हुशार मुलगी. पण दीड शहाणी. हिचं नांव सुमन रानडे. पण हिचं मन सुमन नाही. दुर्मन आहे. हिला मी पत्र टाकायचं काम सांगितलं. हिने पत्र पेटीत नाही टाकलं. रस्त्यावर टाकलं. आणि पत्र टाकलं म्हणून खोटं सांगितलं. दोन अपराध. म्हणून उद्या प्रार्थनेच्या वेळी हिचा सत्कार करूया. चला आता घरी. हिच्यासाठी एकदा टाळ्या.” मोठ्या मुलांनी टाळ्या वाजवल्या नाहीत. पहिली दुसरीच्या मुलांनी न कळल्यामुळे वाजवल्या.
मी हमसाहमशी रडत घरी निघाले. माझ्या नली आणि माली या मैत्रिणी माझं दप्तर घेऊन माझ्याबरोबर आल्या. त्या माझ्या पाठीवरून हात फिरवित होत्या. धीर देत होत्या. त्यांनी मला पायंडीतच सोडलं. खोटं बोलणाऱ्या मुलीबरोबर यायची त्यांना लाज वाटत होती वाटतं.
भावांनी सगळी बातमी आई, आजी, आत्ते यांच्यापर्यंत पोचवली होती. आईने मला जवळ घेतलं. “अगो, ताप भरलाय तुला. ” असं म्हणून तिने मला माजघरात माच्यावर निजवलं नि घोंगडी पांघरली. –“बाबा, दादा घरी आले की त्यांना काय सांगायचे नाय हो. नायतर ते आणि पोरीला राघे भरतील. “आजीने मुलांना बजावलं. “रमे, तू आता सैपाकाकडे येऊ नको. तिला काढा करत्ये तो घाल नि निजव “आत्ये आईला म्हणाली. आमच्याकडे सगळ्या एकमेकीशी प्रेमाने वागत.
आई माझी समजूत घालायला लागली. “एवढे मनाला लावून घेऊ नको हो. अगो, सगळी मोठी माणसे लहानपणी खोटे बोललेलीच असतात. क्रिष्ण नाय का म्हणला, ” मै नही माखन खायो.”
माझी आई शिकली नव्हती पण तिने वाचन खूप केलेलं होतं तिने आणखी सांगितलं. “अगो, तुला एक गंम्मत सागत्ये, महात्मा गांधी–ते सुद्धा लहानपणी खोटे बोललेले. त्यांच्या आत्मकथनात त्यानी स्वतःच लिहिले आहे. महाभारतातला धर्म एव्हढा धर्मनिष्ठ पण द्रोणाचार्यांना काय म्हणाला “अश्वत्थामा गेला खरा, पण माणूस किं हत्ती गेला हे मला माहीत नाही. नरो वा कुंजरोवा”. म्हणजे खरे नाहीच ना बोलला? काही वेळा खोटे बोलावे लागते. तसे तू बोललीस.” माझ्या अंगावरून प्रेमाने हात फिरवित आई मला धीर देत होती. तेव्हढ्यात आजी पण माझ्या मदतीला धावली. “अगो, तुझा हा रामगुरुजी, नांव असेल राम, पण सत्यवचनी असेल कशावरून? लहानपणी का होईना खोटे बोलला असेलच. त्याच्या आईलाच विचारत्ये मी.” आत्तेने पण तिला दुजोरा दिला. ” मला ठाऊक आहे. डब्यातला लाडू खाल्लान नि आईला म्हणाला, मी लाडू नाय खाल्ला.” मला कळत होतं ,मला बरं वाटावं म्हणून आत्ते खोटंच बोलत होती. तापाच्या ग्लानीत नि सगळ्यांच्या प्रेमामुळे माझे डोळे गपागप मिटत होते.
चैत्र नवरात्री ,झुल्यावर बसलेली गौर आणि चैत्रातील हळदी कुंकू ,मंतरलेले बालपणीचे दिवस आठवांचे सुंदर हिंदोळे… घरातील साध्या सुध्या ट्रंक ,टेबल स्टूल आणि पारंपरिक गालिचे शेले असे ठेवणीतले सामान घेऊन आणि शोकेस मधील पक्षी प्राणी फुले फुलदाण्या घेऊन सजावटीत सुंदर पितळी झोपाळ्यावर गौर नटून सजून बसे . त्यात आमची पितळी भातुकली मांडली जाई .दारचे मोगऱ्याचे गजरे ,जाई जुईचे हार ,सोंनचाफ्याच्या वेण्या ,आंब्याच्या पानांची तोरणे , बागेतल्या कैऱ्या , आणि इतर उन्हाळी फळे ,कलिंगड ,काकड्या ,टरबूज ,द्राक्षे आंबे अशा रसरशीत फळांच्या सुंदर सजावटीची उतरंड गौरीच्या पायथ्याशी सजवली जात असे . परिसरातील मुबलक पळसाची पाने धुवून पुसून आंब्याच्या डाळीसाठी दिली जात ,कैरीचे गूळ वेलची जायफळ केशर युक्त पन्हे अक्षरशः छोटे पिंप भरून केले जाई ,आदल्या रात्री टपोरे हरभरे भिजवून रोवळी रोवळी भरून उपसले जात . ओल्या नारळाच्या करंज्या ,काही फराळाचे जिन्नस सजावटीत मांडले जात . केशरी भात , पाकातील चिरोटे अशी साधी पक्वान्ने रांधली जात.
दारात सुबक चैत्रांगण रेखत असू त्यावेळी आम्ही…
डाळ पन्हे हरभरे फळे यातील पोषणमूल्ये आणि कॅलरीज यांचा उहापोह न करता सख्यांसाठी हे पाठवत आहे .
आजूबाजूच्या चार पाच वाड्यांमधील बिऱ्हाडातील सख्या, त्यांच्या लेकी बाळी ,अगदी लांबच्या ओळखितील सुद्धा स्त्रिया पारंपरिक ठेवणीतील वस्त्र चार दागिने घालून एकमेकींची चैत्र गौर आवर्जून बघायला जात ,त्या निमित्ताने भेटी गाठी आणि ऐसपैस बोलणे बसणे होई.. सुंदर ताजी हळद ,पिंजर ,वाळ्याचे अत्तर ,गुलाबपाणी शिंपडून स्वागत होई .
बतासा , आंब्याची डाळ ,पन्हे देऊन समारंभ होई ,आणि प्रत्येकीची ओल्या हरभर्याची ओटी भरली जाई….घरी मग चटपटा चना तव्यावर परतला जाई ,त्याची चव खमंग खुमासदार लागत असे.
प्रत्येकीची कैरी डाळ त्याची खुमासदार फोडणी आणि पन्हे अगदी विविध चविंचे पण सुंदर चवीचे असे .
चैत्राची पालवी ,मनामनावर आलेली मरगळ झाकोळ सगळे घालवी आणि वसंताच्या चाहुलीने निसर्गातील चैतन्य पुन्हा सदाबहार होण्यासाठी अनुकूल असे .
हवेतील उष्मा सुसह्य करण्यासाठी पांढरा शुभ्र मोगरा , वाळा ,जाई जुई अशी फुले भरभरून फुलत , आसमंतात कडुलिंबाचा नाजूक फुलांचा मोहोर मधुर गंधाची बरसात करीत असे . उत्साहाची आनंदाची श्रीराम भक्तीची गुढी उभारून चैत्राची सुरुवात होत असे . घरोघरी श्रध्देने जपलेले गीत रामायणाचे सुंदर सूर आवर्जून गुंजत असत.
चैत्राची अशी ही जादू अजूनही मनावर आपला ठसा उमटवून आहेच.
चैत्रातील ही गौर म्हणजे पार्वतीचे माहेरघरी येणे होय. अशा माहेर वाशिणीचे कौतुक चराचराने केले नाही तर नवलच !! वर दिलेले गीत हे कोकणात पारंपरिक गौरीचे गीत म्हणून. गायले जाते. हा चैत्र गौरीचा चंदन झुला अनुभवला असेल त्या प्रत्येकीच्या मनात दर वर्षी नक्कीच झुलत असणार..
इरकली टोप पदरी अंजिरी जांभळ्या काठाची गर्भ नऊवारी साडी ,टपोरी मोत्याची नथ , चार मोजकेच पण ठसठशीत दागिने , आईचा सात्विक चेहरा , कर्तृत्ववान कष्टाळू समाधानी वावर ….आत्ता कळतंय की पार्वती म्हणजे दुसरे तिसरे कोण ….ती आईच….जगन्माता ….आणि प्रत्येकाच्या घराघरात नांदणारी आपापली आईच !!!!
लेखिका : सुश्री रश्मी भागवत
प्रस्तुती : शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ जगातील एकमेव दत्त-हस्त पूजा स्थान… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
जगातील एकमेव दत्त हस्त पूजा स्थान…… इथे आहे श्रीं चा प्रत्यक्ष कृपा हस्त ….
कृष्णा-पंचगंगा परिसरात श्री नृसिंहसरस्वती महाराज १३६४ ते १३७६ या कालावधी दरम्यान वास्तव्यास होते. या पंचक्रोशीत ते भिक्षा मागण्यास जात असत. असेच ते शिरोळ या ग्रामी गंगाधरपंत कुलकर्णींच्या घरी भिक्षेस दुपारी गेले असता ‘ माई भिक्षा वाढा ‘ असे म्हणाले. गृह्स्वमिनीने त्यांना नमस्कार केला व चांगले स्वागत करून म्हटले की, “ गृहधनी बाहेर भिक्षेकरिता गेले आहेत. कृपया थोडे थांबावे. “ कुलकर्णीच्या घरी अठराविश्व दारिद्र्य होते. ‘ मी स्वयंपाक करते ‘ असे त्या म्हणाल्या. त्यांच्या घरी जोंधळ्याच्या कण्यानशिवाय काही शिल्लक नव्हते. त्याच त्यांनी शिजवल्या, पण त्या वाढायच्या कशावर असा प्रश्न होता. साधी व धड पत्रावळ देखील नव्हती.
महाराजांनी त्यांची अंतर अडचण जाणली. जवळचाच एक पाषाण घेऊन त्यावर प्रोक्षण करून त्यांनी त्यावर प्रणवचिन्ह काढले व भिक्षान्न त्यावर वाढण्यास सांगितले. भक्तवत्सल यतींनी मोठ्या प्रेमाने ते अन्न भक्षण केले व तृप्त होऊन त्यांनी तिला जाताना ‘ ह्या पात्राची पूजा करा, ४२ पिढ्यांचा उद्धार होईल, दारित्र्य, दुःख,पीडा नाहीश्या होतील, अन्नपूर्णा सदैव वास करेल ‘ असा आशीर्वाद दिला. थोड्याच वेळात कुलकर्णी घरी आले व त्यांना घडलेला वृतांत कळला. महाराजांचे दर्शन झाले नाही याचे त्यांना वाईट वाटले. परंतू ज्या पात्रावर महाराज जेवले त्याची त्यांनी पूजा केली. त्या पाषाणावर शंख,चक्र,पद्म इत्यादी चिन्हांनी युक्त अशी हाताची पाच बोटे उमटलेली त्यांना आढळली ! हेच ते शिरोळचे भोजनपात्र, या पात्राची पूजा कुलकर्णींच्या घराण्यात वंशपरंपरेने चालत आली आहे. प्रत्येक गुरुवारी पूजा, रात्री श्रीची पालखी, आरती इत्यादी कार्यक्रम होतात. शाही दसरा– महाराजांना ५ तोफांची सलामी दिली जाते व १२ वर्षांतून येणारे कन्यागत महापर्वकाळ वेळी २१ तोफांची सलामी असते. दत्तजयंतीला १० दिवस मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो.
!!जय जय भोजनपात्रा सुपवित्रा
सप्त ही जल चंद्र पूर्णा न कळे तव सुत्रा !!
!!श्री गुरुदेव दत्त!!!!
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
प्रेमाची परिभाषा…प्रेम , विरह, वेड आणि युद्ध यांची एक अतिशय हृदयस्पर्शी कहाणी..” द कोड ऑफ लव्ह ” या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद मेघना जोशी यांनी सहज सोप्या हळूवार शब्दांमध्ये आणला आहे. या पुस्तकाचे मूळ लेखक अँड्रो लिंकलेटर यांनी ही सत्यकथा अतिशय कौशल्याने आणि संवेदनशीलतेने लिहिली आहे. असे हे पुस्तक माझ्या वाचनात आले..
1939 सालचा वसंत ऋतू…सुंदर तरुणी पामेला किराज व देखणा पायलट डोनाल्ड हिल याला भेटते व पाहताच क्षणी कलिजा खलास झाला या उक्तीनुसार ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण दुस-या महायुद्धामुळे त्यांचा विवाह लांबणीवर पडतो. आनंद, दुःख, नैराश्य, चैतन्य अश्या अनेक रूपांमधून तिने प्रेमाचा अनुभव घेतला. पण हे प्रेम मात्रं तिला सहजासहजी मिळाले नाही. पण तिच्या या प्रेमावरच्या एकनिष्ठेनेच त्या एकमेव बंधनाला एक खोली आणि उत्कटता प्राप्त करून दिली. महायुद्धाने त्यांना परस्परांपासून वेगळे केले. त्यांचे युद्धा नंतर परत येणे हेच एवढे वेगळे होते की नंतरच्या पिढीमध्ये अश्या प्रकारचा वेगळेपणा सापडणे केवळ अशक्यच होते. हे स्पष्ट पुस्तक वाचताना जाणवते.
डोनाल्डची नेमणूक हाँगकाँगला होते आणि तेथे भविष्यातला संभाव्य धोका लक्षात घेऊन तो डायरी लिहायला सुरुवात करतो. डायरी मधील सुरुवातीच्या शब्दांमध्येच त्याने स्पष्ट लिहिले आहे की त्याला त्या क्षणांपासून सर्व घटनांची नोंद का ठेवावीशी वाटली? पण त्याने त्यातला मजकूर मात्रं सांकेतिक भाषेत लिहिला आणि ती भाषा मात्र रहस्यमय आकड्यांची असते. डायरी मधील पहिल्याच ओळीमधून डायरी लिहिणा-याची दूरदृष्टी दिसून येते. डोनाल्डचा दृष्टीकोन मात्रं वेगळा होता. त्याच्या बाबतीत जे काही घडेल त्याच्या तो नोंदी ठेवायचा. त्याच्या स्वभावाची आणखी एक खासियत होती ती म्हणजे काही घटना गोष्टी लपवण्याकरता सांकेतिक भाषेची मदत घेतली होती. सुरूवातीला त्याने गुपिते लिहिण्याकरता शाॅर्टहँडचा वापर केला पण काहीच महिन्यानंतर त्याला आपला मजकूर वाचली जाण्याची भीती वाटू लागली तेव्हा त्याने त्यावर सांकेतिक शब्दांचे वेष्टण चढवले व मजकूरा भोवती एक गूढ वलयं निर्माण केलं त्यामुळे तो खूपच गुंतागुंतीचा बनला. फक्त त्याला एकट्यालाच तो वाचणे शक्य होते. पण त्याचे शेवटचे शब्द हे तिच्या नावाभोवतीच गुंफले होते…तर ती होती फक्त आणि फक्तच पामेला..!! ती डायरी म्हणजे त्याचे गुपित..
हाँगकाँगचे युद्ध अश्या प्रकारे सुरू झाले होते की ते फार काळापर्यंत टिकणारेही नव्हते. त्याचे दूरगामी परिणाम डोनाल्डच्या उभ्या आयुष्यावर कायमचे झाले. त्याला प्रत्यक्ष युद्धानंतर युद्ध कैद्यांच्या छावणी मध्ये नेण्यात आले. आणि हा माणूस सर्वच बाबतीत कायमचा आणि पूर्णपणेबदलून गेला. युद्धा पूर्वीचा आणि युद्धा नंतरचा डोनाल्ड यामध्ये एक महत्त्वाचा दुवा होता तो म्हणजे त्याची ती डायरी आणि त्याचे पामेलावरचे प्रेम….या दोन गोष्टी मरेपर्यंत त्याच्या जवळ होत्या..
डोनाल्ड युद्धाहून परत येतो पण युद्ध कैदी असताना त्याचा अतोनात शारीरिक व मानसिक छळ झालेला असतो. त्याचा परिणाम त्याच्या मनावर व आयुष्यावरही होतो. त्या आठवणी आयुष्यभर त्याचा पिच्छा पुरवतात…पामेलाला मनापासून वाटते की डोनाल्डला समजून घेण्यासाठी त्याच्या डायरीतील रहस्ये समजून घेतली पाहिजे. हे रहस्यमय आकडे पामेलाला उलगडता येतील? त्याची सांकेतिक भाषा तिला जाणून घेता येईल?..
आपल्या प्रेमाला जाणून घेण्याची एका शोधाची ही सत्यकथा…त्याच्या या डायरीचे रहस्य त्याच्या मृत्युनंतरही काही वर्षे तसेच होते…!!
डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से हम आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का मानवीय जीवन पर आधारित एक अत्यंत विचारणीय आलेख ख़ुद से जीतने की ज़िद्द। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की लेखनी को इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य # 177 ☆
☆ ख़ुद से जीतने की ज़िद्द☆
‘खुद से जीतने की ज़िद्द है मुझे/ मुझे ख़ुद को ही हराना है। मैं भीड़ नहीं हूं दुनिया की/ मेरे अंदर एक ज़माना है।’ वाट्सएप का यह संदेश मुझे अंतरात्मा की आवाज़ प्रतीत हुआ और ऐसा लगा कि यह मेरे जीवन का अनुभूत सत्य है, मनोभावों की मनोरम अभिव्यक्ति है। ख़ुद से जीतने की ज़िद अर्थात् निरंतर आगे बढ़ने का जज़्बा, इंसान को उस मुक़ाम पर ले जाता है, जो कल्पनातीत है। यह झरोखा है, मानव के आत्मविश्वास का; लेखा-जोखा है… एहसास व जज़्बात का; भाव और संवेदनाओं का– जो साहस, उत्साह व धैर्य का दामन थामे, हमें उस निश्चित मुक़ाम पर पहुंचाते हैं, जिससे आगे कोई राह नहीं…केवल शून्य है। परंतु संसार रूपी सागर के अथाह जल में गोते खाता मन, अथक परिश्रम व अदम्य साहस के साथ आंतरिक ऊर्जा को संचित कर, हमें साहिल तक पहुंचाता है…जो हमारी मंज़िल है।
‘अगर देखना चाहते हो/ मेरी उड़ान को/ थोड़ा और ऊंचा कर दो / आसमान को’ प्रकट करता है मानव के जज़्बे, आत्मविश्वास व ऊर्जा को..जहां पहुंचने के पश्चात् भी उसे संतोष का अनुभव नहीं होता। वह नये मुक़ाम हासिल कर, मील के पत्थर स्थापित करना चाहता है, जो आगामी पीढ़ियों में उत्साह, ऊर्जा व प्रेरणा का संचरण कर सके। इसके साथ ही मुझे याद आ रही हैं, 2007 में प्रकाशित ‘अस्मिता’ की वे पंक्तियां ‘मुझ मेंं साहस ‘औ’/ आत्मविश्वास है इतना/ छू सकती हूं/ मैं आकाश की बुलंदियां’ अर्थात् युवा पीढ़ी से अपेक्षा है कि वे अपनी मंज़िल पर पहुंचने से पूर्व बीच राह में थक कर न बैठें और उसे पाने के पश्चात् भी निरंतर कर्मशील रहें, क्योंकि इस जहान से आगे जहान और भी हैं। सो! संतुष्ट होकर बैठ जाना प्रगति के पथ का अवरोधक है…दूसरे शब्दों में यह पलायनवादिता है। मानव अपने अदम्य साहस व उत्साह के बल पर नये व अनछुए मुक़ाम हासिल कर सकता है।
‘कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती/ लहरों से डर कर नौका पार नहीं होती’… अनुकरणीय संदेश है… एक गोताखोर, जिसके लिए हीरे, रत्न, मोती आदि पाने के निमित्त सागर के गहरे जल में उतरना अनिवार्य होता है। सो! कोशिश करने वालों को कभी पराजय का सामना नहीं करना पड़ता। दीपा मलिक भले ही दिव्यांग महिला हैं, परंतु उनके जज़्बे को सलाम है। ऐसे अनेक दिव्यांगों व लोगों के उदाहरण हमारे समक्ष हैं, जो हमें ऊर्जा प्रदान करते हैं। के•बी• सी• में हर सप्ताह एक न एक कर्मवीर से मिलने का अवसर प्राप्त होता है, जिसे देख कर अंतर्मन में अलौकिक ऊर्जा संचरित होती है, जो हमें शुभ कर्म करने को प्रेरित करती है।
‘मैं अकेला चला था जानिब!/ लोग मिलते गये/ और कारवां बनता गया।’ यदि आपके कर्म शुभ व अच्छे हैं, तो काफ़िला स्वयं ही आपके साथ हो लेता है। ऐसे सज्जन पुरुषों का साथ देकर आप अपने भाग्य को सराहते हैं और भविष्य में लोग आपका अनुकरण करने लग जाते हैं… आप सबके प्रेरणा-स्त्रोत बन जाते हैं। टैगोर का ‘एकला चलो रे’ में निहित भावना हमें प्रेरित ही नहीं, ऊर्जस्वित करती है और राह में आने वाली बाधाओं-आपदाओं का सामना करने का संदेश देती है। यदि मानव का निश्चय दृढ़ व अटल है, तो लाख प्रयास करने पर, कोई भी आपको पथ-विचलित नहीं कर सकता। इसी प्रकार सही व सत्य मार्ग पर चलते हुए, आपका त्याग कभी व्यर्थ नहीं जाता। लोग पगडंडियों पर चलकर अपने भाग्य को सराहते हैं तथा अधूरे कार्यों को संपन्न कर सपनों को साकार कर लेना चाहते हैं।
‘सपने देखो, ज़िद्द करो’ कथन भी मानव को प्रेरित करता है कि उसे अथवा विशेष रूप से युवा-पीढ़ी को उस राह पर अग्रसर होना चाहिए। सपने देखना व उन्हें साकार करने की ज़िद, उनके लिए मार्ग-दर्शक का कार्य करती है। ग़लत बात पर अड़े रहना व ज़बर्दस्ती अपनी बात मनवाना भी एक प्रकार की ज़िद्द है, जुनून है…जो उपयोगी नहीं, उन्नति के पथ में अवरोधक है। सो! हमें सपने देखते हुए, संभावना पर अवश्य दृष्टिपात करना चाहिए। दूसरी ओर मार्ग दिखाई पड़े या न पड़े… वहां से लौटने का निर्णय लेना अत्यंत हानिकारक है। एडिसन जब बिजली के बल्ब का आविष्कार कर रहे थे, तो उनके एक हज़ार प्रयास विफल हुए और तब उनके एक मित्र ने उनसे विफलता की बात कही, तो उन्होंने उन प्रयोगों की उपादेयता को स्वीकारते हुए कहा… अब मुझे यह प्रयोग दोबारा नहीं करने पड़ेंगे। यह मेरे पथ-प्रदर्शक हैं…इसलिए मैं निराश नहीं हूं, बल्कि अपने लक्ष्य के निकट पहुंच गया हूं। अंततः उन्होंने आत्म-विश्वास के बल पर सफलता अर्जित की।
आजकल अपने बनाए रिकॉर्ड तोड़ कर नए रिकॉर्ड स्थापित करने के कितने उदाहरण देखने को मिल जाते हैं। कितनी सुखद अनुभूति के होते होंगे वे क्षण… कल्पनातीत है। यह इस तथ्य पर प्रकाश डालता है कि ‘वे भीड़ का हिस्सा नहीं हैं तथा अपने अंतर्मन की इच्छाओं को पूर्ण कर सुक़ून पाना चाहते हैं।’ यह उन महान् व्यक्तियों के लक्षण हैं, जो अंतर्मन में निहित शक्तियों को पहचान कर अपनी विलक्षण प्रतिभा के बल पर नये मील के पत्थर स्थापित करना चाहते हैं। बीता हुआ कल अतीत है, आने वाला कल भविष्य तथा वही आने वाला कल वर्तमान होगा। सो! गुज़रा हुआ कल और आने वाला कल दोनों व्यर्थ हैं, महत्वहीन हैं। इसलिए मानव को वर्तमान में जीना चाहिए, क्योंकि वर्तमान ही सार्थक है… अतीत के लिए आंसू बहाना और भविष्य के स्वर्णिम सपनों के प्रति शंका भाव रखना, हमारे वर्तमान को भी दु:खमय बना देता है। सो! मानव के लिए अपने सपनों को साकार करके, वर्तमान को सुखद बनाने का हर संभव प्रयास करना श्रेष्ठ है। इसलिए अपनी क्षमताओं को पहचानो तथा धीर, वीर, गंभीर बन कर समाज को रोशन करो… यही जीवन की उपादेयता है।
‘जहां खुद से लड़ना वरदान है, वहीं दूसरे से लड़ना अभिशाप।’ सो! हमें प्रतिपक्षी को कमज़ोर समझ कर कभी भी ललकारना नहीं चाहिए, क्योंकि आधुनिक युग में हर इंसान अहंवादी है और अहं का संघर्ष, जहां घर-परिवार व अन्य रिश्तों में सेंध लगा रहा है; दीमक की भांति चाट रहा है, वहीं समाज व देश में फूट डालकर युद्ध की स्थिति तक उत्पन्न कर रहा है। मुझे याद आ आ रहा है, एक प्रेरक प्रसंग… बोधिसत्व, बटेर का जन्म लेकर उनके साथ रहने लगे। शिकारी बटेर की आवाज़ निकाल कर, मछलियों को जाल में फंसा कर अपनी आजीविका चलाता था। बोधि ने बटेर के बच्चों को, अपनी जाति की रक्षा के लिए, जाल की गांठों को कस कर पकड़ कर, जाल को लेकर उड़ने का संदेश दिया…और उनकी एकता रंग लाई। वे जाल को लेकर उड़ गये और शिकारी हाथ मलता रह गया। खाली हाथ घर लौटने पर उसकी पत्नी ने, उनमें फूट डालने की डालने के निमित्त दाना डालने को कहा। परिणामत: उनमें संघर्ष उत्पन्न हुआ और दो गुट बनने के कारण वे शिकारी की गिरफ़्त में आ गए और वह अपने मिशन में कामयाब हो गया। ‘फूट डालो और राज्य करो’ के आधार पर अंग्रेज़ों का हमारे देश पर अनेक वर्षों तक आधिपत्य रहा। ‘एकता में बल है तथा बंद मुट्ठी लाख की, खुली तो खाक़ की’ एकजुटता का संदेश देती है। अनुशासन से एकता को बल मिलता है, जिसके आधार पर हम बाहरी शत्रुओं व शक्तियों से तो लोहा ले सकते हैं, परंतु मन के शत्रुओं को पराजित करन अत्यंत कठिन है। काम, क्रोध, लोभ, मोह पर तो इंसान किसी प्रकार विजय प्राप्त कर सकता है, परंतु अहं को पराजित करना आसान नहीं है।
मानव में ख़ुद को जीतने की ज़िद्द होनी चाहिए, जिस के आधार पर मानव उस मुक़ाम पर आसानी से पहुंच सकता है, क्योंकि उसका प्रति-पक्षी वह स्वयं होता है और उसका सामना भी ख़ुद से होता है। इस मन:स्थिति में ईर्ष्या-द्वेष का भाव नदारद रहता है… मानव का हृदय अलौकिक आनन्दोल्लास से आप्लावित हो जाता है और उसे ऐसी दिव्यानुभूति होती है, जैसी उसे अपने बच्चों से पराजित होने पर होती है। ‘चाइल्ड इज़ दी फॉदर ऑफ मैन’ के अंतर्गत माता-पिता, बच्चों को अपने से ऊंचे पदों पर आसीन देख कर फूले नहीं समाते और अपने भाग्य को सराहते नहीं थकते। सो! ख़ुद को हराने के लिए दरक़ार है…स्व-पर, राग-द्वेष से ऊपर उठ कर, जीव- जगत् में परमात्म-सत्ता अनुभव करने की; दूसरों के हितों का ख्याल रखते हुए उन्हें दु:ख, तकलीफ़ व कष्ट न पहुंचाने की; नि:स्वार्थ भाव से सेवा करने की … यही वे माध्यम हैं, जिनके द्वारा हम दूसरों को पराजित कर, उनके हृदय में प्रतिष्ठापित होने के पश्चात्, मील के नवीन पत्थर स्थापित कर सकते हैं। इस स्थिति में मानव इस तथ्य से अवगत होता है कि उस के अंतर्मन में अदृश्य व अलौकिक शक्तियों का खज़ाना छिपा है, जिन्हें जाग्रत कर हम विषम परिस्थितियों का बखूबी सामना कर, अपने लक्ष्य की प्राप्ति कर सकते हैं।
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
💥 इस साधना में हनुमान चालीसा एवं संकटमोचन हनुमनाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें। आत्म-परिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही💥
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈