(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “विदुर का साग“।)
अभी अभी # 68 ⇒ विदुर का साग… श्री प्रदीप शर्मा
ईश्वर के जितने भी अवतार होते हैं, वे दुष्टों को मारने और भक्तों को तारने के लिए होते हैं। जब से अवतार अवतरित नहीं हो रहे, दुष्टों को मारने और भक्तों को तारने की प्रक्रिया बंदप्राय ही हो चुकी है। भक्त और भगवान हैं तो सही, लेकिन लगता है मानो एक को दूसरे की तलाश है। मो को कहाँ ढूँढे रे बंदे, मैं तो तेरे पास रे ! जिस तरह हिरण अपने ही अंदर की कस्तूरी से अनभिज्ञ रहता है, लेकिन कस्तूरी की गंध के कारण इधर उधर भागा करता है, बस यही हाल एक भक्त का है। वह कभी भगवान को मंदिर में खोज रहा है, तो कभी कथा, कीर्तन, और तीर्थाटन में, तो कभी किसी कथित अवतारी पुरुष में।
जिस भगवान को हम छप्पन भोग लगाते हैं, जब वह अवतार लेता है, तो कभी शबरी के झूठे बेर खा लेता है, तो कभी सुदामा के मुट्ठी भर चावल। शास्त्रों में, कर्म-कांड में यह साफ साफ लिखा है, कि पहले भगवान को भोग लगाओ, फिर कुछ पाओ। शबरी कहाँ वेद-शास्त्र पुराण पढ़ी थी। जब मंदिर से उठकर भगवान साक्षात प्रकट हो जाता है, तो कर्मकांड वहीं छूट जाता है। भक्त और भगवान की सारी दूरियाँ खत्म हो जाती हैं, मर्यादाएँ टूट जाती हैं। भक्त और भगवान एक हो जाते हैं। विदुर का साग खाने के बाद विदुर, विदुर नहीं रह जाते, शबरी के झूठे बेर खाने के बाद शबरी नहीं रह जाती, सुदामा के चावल खाने के बाद सुदामा, सुदामा नहीं रह जाते। भक्त-भगवान की दूरियाँ मिट जाती हैं, सदा के लिए समाप्त हो जाती हैं। ।
जिस क्षण विदुर नीति के रचयिता धृतराष्ट्र के मंत्री, विदुर ने दंभी दुर्योधन का नमक त्याग, महल से कुटिया की ओर प्रस्थान किया, उसी पल से श्रीकृष्ण की दृष्टि दुर्योधन के मेवे-पकवान से हटकर, महात्मा विदुर के साग पर पड़ गई थी। गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य और भीष्म पितामह दुर्योधन का नमक नहीं छोड़ पाए। जिसका जैसा अन्न खाया, वैसा ही मन पाया और द्रौपदी का चीर-हरण उनकी आँखों के समक्ष होता रहा, वे कुछ न कर सके।
माँगी नाव, न केवट आना ! यह केवट प्रसंग भी अनूठा है। केवट जानता है, जो राम, लखन, सीता, मेरी नाव में पाँव रखने वाले हैं, उन्हीं श्रीराम के चरण रखते ही पत्थर की मूर्ति अहिल्या बन गई थी। कहीं मेरी नाव भी इनके चरण रखते ही स्त्री न बन जाए। ये सब भक्त बिना भेजे वाले होते हैं। एक धन्ना जाट लठ लेकर ठाकुर जी के मंदिर में खड़ा हो जाता है और भगवान को भोग लगाना ही पड़ता है तो एक राम भक्त हनुमान सीता माता के द्वारा उपहार-स्वरूप दिये मोतियों के हार को तोड़, उसमें अपने श्रीराम को ढूँढते नज़र आते हैं। जब सब दरबारी उनकी हँसी उड़ाते हैं, कि यह बंदर मोतियों में अपने आराध्य श्रीराम को ढूंढ रहा है, कैसा मूढ़ भक्त है, तब वानर श्रेष्ठ अपना हृदय चीरकर दिखाते हैं, और उनके आराध्य को वहाँ विराजमान होना ही पड़ता है। ।
इन कथाओं में निहित संदेश बस इतना ही है कि रूढ़ि, परंपरा, अंधविश्वास और कर्म-कांड किसी भक्त को बाँध नहीं सकते। मीरा ने उसे पति-परमेश्वर माना, तो सूरदास ने उनके बाल-स्वरूप को आराधा। हम इधर छप्पन भोग लगाते रह जाएँ, और वह शबरी के झूठे बेर में ही प्रसन्न हो जाएँ।
ऐश्वर्य लुटाने वाले उस परम पिता परमेश्वर के नाम पर कितने भी मंदिर बनाएं, उन्हें रत्न-जड़ित मुकुट पहनाएं, राजभोग कराएं, केवल भाव के भूखे भगवान, मात्र बिल्वपत्र से प्रसन्न हो जाते हैं। वह सुदामा के चावल और विदुर के साग पर अपना सारा ऐश्वर्य लुटाने को तैयार है। वहाँ कोई तीसरा नहीं होता, बस भक्त और भगवान होता है।
(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “# ठहाके लगाओ दोस्तों… #”)
नेहमीच्या सवयीने इस्त्री करणाऱ्या माणसाला फोन करून कपडे घ्यायला येऊ का? कार्यक्रमाला जायचे आहे. कपडे हवे आहेत. असे विचारले. तो त्याच्या नेहमीच्या सवयीने म्हणाला, तयार नाहीत.. अर्ध्या तासात होतील.
फोन बंद करून ठेवला, आणि लगेचच फोन वाजला. नंबरच होता. कोण आहे…….. या विचारातच फोन घेतला……. सध्या मी फोनमध्ये सेव्ह केलेल्या नावापेक्षा इतर नंबरचेच फोन जास्त येतात……… आपले नंबर यांना मिळतात कसे? हा प्रश्न असतोच……
फोनवर मी काही बोलण्याच्या आधीच एका छान आवाजात माहिती देण्याची प्रक्रिया सुरू देखील झाली..………(आता आवाज छान होता म्हटल्यावर ती माहिती नको असताना देखील मी फोन सुरू ठेवला होता हे ओळखले असेलच. त्या आवाजाला उगाचच गोड, मंजुळ अशी विशेषणे लावण्याच्या भानगडीत पडलो नाही.)
सध्या प्रचारात असलेली आणि प्रचलित होणारी ती E जाहिरात होती. या E प्रणालीची सुरुवात कुठून आणि कशी झाली ते सांगता येणार नाही. पण सध्या बऱ्याचशा जाहिराती या अशा E प्रकाराबाबतच असतात, आणि त्यात बहुतांश स्त्रीचाच आवाज असतो. म्हणून ही E स्त्री. कपड्यांच्या इस्त्री चा आणि या E स्त्री चा काहीही संबंध नाही किंवा नव्हता हे आता लक्षात आले असेलच.
साधारणपणे कर्जाने घेतलेले घर, वस्तू यांचा जो एक ठराविक हप्ता असतो त्याला हप्ता ऐवजी E M I म्हणायची सुरुवात झाली आणि तेथूनच पुढे E चा प्रवास आणि प्रसार वाढला असावा.
E पेमेंट, E शिक्षण, यापासून सुरुवात होत E गेम, E सिगारेट, E व्हिकल, E न्यूज पेपर, E बुक्स असे त्यांचे जाळे वाढतच चालले आहे. आणि इंटरनेट वापरत आपणही त्या जाळ्यात पुढे पुढे सरकत आहोत.
प्रत्येक पिढीने काही वाक्ये हमखास ऐकली असतील. ती वाक्ये म्हणजे, सगळं बदलत चालले आहे. किंवा, आमच्या वेळी असले काही नव्हते. इ…… तीच वाक्यं परत आठवली.
अगदी जुन्या काळातील वाक्यांचा संदर्भ आठवला, त्यात (इ)कडून काही निरोप नाही, (इ)कडून काही बोलणे नाही असे इ ने सुरु होणारे शब्द आणि वाक्ये स्त्रियांच्या तोंडी असत. पण त्या इ चा संबंध घरच्या माणसाबद्दल असे. पण आता E स्त्री चा आवाज आला की त्याचा संबंध जाहिरातीशी असतो हे समजले. आणि अशी जाहिरात पैशांच्या गुंतवणूकी पासून वैयक्तिक गुंतागुंत सोडवण्यासाठी सगळ्या बाबतीत असते.
फक्त इस्त्रीच्या कपड्यांवरून नंतर लगेचच आलेल्या फोनमुळे ही जाहिरात करणारी E स्त्री देखील आहे हे लक्षात आले. बाकी काही नाही………
☆ त्या दोघी… लेखिका – सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे ☆
घरचं पटापटा आटपून रेखा कामावर पोहोचली. आज घरी अक्षय्य तृतीयेच्या सणाचा पुरणाचा स्वैपाक होता. शिवाय रोजची कामं होतीच.
कामावरून वेळेवर येऊन आज खरेदीला जायचं होतं. थोरलीचं लग्न पंधरा दिवसांवर येऊन ठेपलं होतं. कपडे, रुखवताची भांडी, सगळ्या सगळ्याची खरेदी अजून राहिली होती. अक्षय्यतृतीयेच्या आजच्या चांगल्या मुहूर्तावर करण्याचं ठरलं होतं.
गावातच राहणारे दीर-जाऊ, शेजारच्या गावातली नणंद खरेदीसाठी येणार होते म्हणून तिला आज जास्तच स्वयंपाक करावा लागला होता.
पहाटे चारलाच उठून तिनं किलोभर पुरण शिजवलं. कटाची आमटी, भात, वांग्याची भाजी, कोशिंबीर, पुरणाच्या पोळ्या नि भजीपापड रांधून ठेवलं नि नऊ वाजताच ती कामावर हजर झाली.
कामावरही आज पुरणाचा स्वयंपाक असणार हे डोक्यात ठेऊन ती लगलगा चालत बंगल्यावर पोहोचली. बंगल्याची झाडपूस तिनं उरकली. मॅडमना स्वयंपाकाचं विचारलं.. आमरस पुरीचा बेत त्यांनी तिला सांगितला तसं तिने मनातून हुश्श केलं..
आमरस, पु-या, कुर्मा, पुलाव नि आंब्याची डाळ असा सुटसुटीत बेत होता. दोन तासांत सगळा स्वयंपाक आवरून तिला घरी जाता येणार होतं.
तिने पु-यांची कणिक मळली.
मोठाले पिकलेले हापूसचे पिवळेधम्म आंबे पाण्यात टाकले. आता ती भाज्या चिरायला बसली.. एवढ्यात दारावरची बेल वाजली. ती दार उघडण्यासाठी उठली..
रेखा एकदा बंगल्यावर आली की ही सगळी कामे तिलाच करावी लागत. या घरात कामाला लागून तिला नाही म्हटलं तरी बारा- पंधरा वर्षं झाली होती.
ती कामाला लागली तेंव्हा हे सधन घर पैशांप्रमाणेच माणसांनी भरलेलं होतं. सर, मॅडम, सरांचे आई-वडील आणि दोन मुले असं गोकुळ नांदत होतं. अचानक हार्टऐटॅकने आजोबा वारले. त्यानंतर दोनच वर्षांनी आजी कॅन्सरचं निमित्त होऊन आजोबांपाठोपाठ निघून गेल्या..
आधी मुलगा नि नंतर मुलगी शिक्षणासाठी परदेशात रवाना झाले.
त्यांची शिक्षणं झाली नि नोकरी पकडून ते दोघे आता तिथेच स्थायिक झाले होते..
रेखाच्या मुलीचं लग्न ठरलं तेंव्हाच नेमकं नेहाचं, म्हणजे मॅडमच्या मुलीचं लग्न ठरलं.. ठरलं म्हणजे तिनेच जमवलं होतं. तिच्याच ऑफिसात तिच्याबरोबर काम करणारा मुलगा होता. परदेशात काम करत असला तरी मुळचा भारतीयच होता..
चार महिन्यांपूर्वी भारतातच बंगल्यावर साखरपुड्याचा कार्यक्रम धुमधडाक्यात झाला होता..
तेंव्हा पुन्हा एकदा घराचं गोकुळ झालं होतं. सहा महिन्यांनंतर महाबळेश्वरमधे मोठ्या पंचतारांकित हॉटेलात लग्न होणार होतं..
रेखाने दार उघडलं. सर आले होते. हातात लाल रंगाची दागिन्याची नवीकोरी पेटी होती..
रेखा पुन्हा स्वयंपाकघरात येऊन कामाला लागली.
सरांनी मॅडमना हाक मारली.. मॅडम नि सर सोफ्यावर बसले.. “सुंदर झालाय नाही का हो नेकलेस ? अगदी घसघशीत दिसतोय.. नेहाच्या गळ्यात शोभून दिसेल नाही ? आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नाच्या खरेदीचा मुहूर्त झाला ते बरं झालं …”
सर नि मॅडम खुशीत दिसत होते.
रेखा स्वयंपाकघरात असली तरी तिचे कान दिवाणखान्यात होते.. नेकलेस पहायची उत्सुकता तिला स्वस्थ बसू देईना. ती सरांना पाणी द्यायचं निमित्त करून हॉलमधे गेली. सरांना पाण्याचा ग्लास दिला.
“नेहाताईंसाठी नेकलेस का मॅडम ?”
“हो गं, आता लग्नाची तयारी सुरू करायला हवी. आठवड्यापूर्वीच करायला टाकला होता. आजच्या चांगल्या मुहूर्तावर सर घेऊन आले.. अगं बघ ना तू पण.” त्यांनी रेखाला नेकलेस दाखवला..
नेकलेसचं देखणं रुपडं डोळ्यात साठवत रेखा पुुन्हा स्वयंपाकघरात निघून गेली. फ्लॉवर, बटाटा, कांदे चिरताना तिचे डोळे कधी पाझरू लागले ते तिलाच कळलं नाही.
लेकीच्या लग्नात तिला एक तोळ्याचा नेकलेस घालायचा, हे तिचं लेक जन्मल्यापासूनचं स्वप्न होतं..
त्याला कारणही तसच होतं.. रेखाचं नि तिच्या जावेचं लग्न एकाच मांडवात झालं होतं. रेखाच्या माहेरची परिस्थिती बेतासबात… कसंतरी तिला उजवून टाकलं होतं. लग्न ठरवताना नवरा मुलगा काय करतो, कसा आहे.. हे न पाहता सासऱ्याची पेन्शन पाहून रेखाला त्या घरात दिलं होतं. फक्त हिरव्या बांगड्यांचा चुडा नि खोटं कानातलं घालून रेखा लग्नाला उभी होती..
जाऊ मात्र बऱ्या परिस्थितीतली..
शाळेत शिक्षक असणाऱ्या दिराशी लग्न लावताना तिला एक तोळ्याचा नेकलेस गळ्यात घालून तिच्या माहेरच्यांनी बोहल्यावर उभं केलं होतं. लग्नाच्या दिवशी नि नंतरही सगळे जावेच्या नेकलेसचं कौतुक करत होते..
रेखा मात्र कानकोंडं होत तो कौतुक सोहळा बघत होती. पण तेंव्हा तिने मनाशी ठरवलं होतं …लेकीला लग्नात तोळ्याचा नेकलेस घालूनच लग्नाला उभं करायचं.. पण गरिबाला ठरवायचा अधिकार नसतो… जे पुढ्यात येईल ते फक्त स्वीकारायचं असतं..
पाठोपाठ झालेल्या तीन मुली, निकम्मा नवरा, मुलींची शिक्षणं, सासऱ्याचं आजारपण, या सगळ्यात दिवसभर कष्ट करूनही एक तोळा सोडा एक ग्रॅम सोनही घेणं तिला जमलं नव्हतं!
लग्न पंधरा दिवसावर आलेलं..
सगळा खर्च सासूच करणार होती.
त्यासाठी रेखाचं सोन्यात गाठवलेलं मंगळसूत्रंही सासूनं गहाण ठेवलेलं होतं. नेकलेसचं रेखाचं स्वप्न स्वप्नच राहिलं होतं. तिच्या सारखीच तिची मुलगीही पार्वतीच्या रुपातच लग्नाला उभी राहणार होती..
आज नेहाचा नेकलेस पाहून तिच्या काळजाला अनंत घरं पडली होती.. भरल्या डोळ्यांनीच तिने स्वयंपाकघरातल्या देवापुढं हात जोडले.. “देवा, पुढच्या जन्मी मला लुळीपांगळी कर पण गरीब ठेऊ नकोस.. फार नको, पण एक तोळ्याचा नेकलेस माझ्या लेकीला घालता येईल, एवढा तरी पैसा मला दे!”
हॉलमधून कसलातरी आवाज आला म्हणून रेखाने डोळे पुसले..
“अगं आई, तू इतकी कशी मागासलेली गं.. अगं सध्या असले कुणी सोन्याचे दागिने घालतं का गं ..ओल्ड फॅशन्ड? प्लॅटिनम नि डायमंडशिवाय कोणी काही घालत नाही सध्या.. तू नाही ते उद्योग मला न विचारता का करतेस? मी हा नेकलेस आजिबात घालणार नाही.. तुला पाहिजे तर तू घाल.. आणि परवाच मी तुला सांगितलं नं मी आणि नीरज भरपूर मिळवतोय. माझे दागिने, कपडे आम्हीच घेऊ.. तू आता त्या तुझ्या जुन्या विचारातून बाहेर ये “…
नेहाने फोन कट् केला असावा.. आता फक्त मॅडमच्या हुंदक्यांचा आवाज ऐकू येत होता.. आमरसाची चव दाखवायला रेखा हॉलमधे गेली तेंव्हा मॅडम डोळे पुसत होत्या नि सर त्यांच्या पाठीवरून हात फिरवीत होते.. रेखाला पाहून त्यांनी स्वत:ला सावरलं..
“तुला खरेदीला जायचय नं लग्नाच्या.. पटपट स्वयंपाक आवर नि निघ. जेवण टेबलावर मांडून ठेव. आम्ही नंतर जेऊन घेऊ…”
मॅडम नि सर खोलीत गेले नि रेखा स्वयंपाकघरात आली.. पुन्हा तिचे डोळे पाझरू लागले.. देवाकडे तोंड करत तिने विचारलं, “देवा, असे खेेळ करायला तुला काय गंमत येते रे ? जिथे उदंड आहे तिथे नकोय आणि जिथे मनापासून हवंय तिथे ते दिसतही नाही… माणसाला सुख मिळूच द्यायचं नाही असा तुझा डाव आहे का? आजवर तुझं खूप केलं. तुझी पूजा, उपवास कधी चुकवला नाही. कधी लबाडी केली नाही. नेकीनं काम केलं, सासुसासऱ्यांची सेवा केली.. पण तू मला काय दिलस?
माझ्यासाठी मी काहीच मागितलं नाही.. पण लेकरासाठीची मागणीही पूर्ण केली नाहीस..
मॅडमचंही तसच.. त्यांनी सगळ्यांचं सगळं केलं नि आज ती नेहा कशी बोलली त्यांना… सणादिवशी आम्हा दोघींच्या डोळ्यात तू आज पाणी आणलस.. आजपासून तुझी माझी कट्टी!”
त्याच तिरिमिरीत तिनं झपाट्यानं काम आवरलं. जेवण टेबलावर ठेवलं. कट्टा स्वच्छ केला. हात धुतले. पदर ठीकठाक केला नि स्वयंपाकघराच्या बाहेर पडली.. एवढ्यात पुन्हा बेल वाजली.
“आता कोण आलं ? पाहुणे असतील तर चहापाणी करायला थांबायला लागणार .”.. ती पुन्हा वैतागलीच… जरा गुश्श्यातच तिने दार उघडलं.. दारात तिची थोरली लेक उभी होती..
“तू कशाला आलीस एवढ्या उन्हाचं ? मी येतच होते की… चल पटकन् घरी जाऊन जेवण करूया नि खरेदीला बाहेर पडूया. काका, आत्या आले का ?” रेखाची डेक्कनक्वीन थांबायचं काही नाव घेईना…
“अगं, आम्ही तिला बोलावलय.”
मॅडम नि सर सोफ्यावर बसत बोलले. “आत या दोघी. रेखा, तुम्हा दोघींसाठी आमरस आण दोन वाट्यांमधून.”
“नको बाई, उशीर होईल घरी जायला.. पुन्हा दुकानात जायचंय.”
“काही उशीर होत नाही.. जा पटकन आण.”
रेखाने आमरस आणला. दोघी मायलेकींनी तो संकोचाने संपवला.
“आता निघू आम्ही ?”
“थांब, आतून कुंकवाचा करंडा घेऊन ये.”
रेखाने कुंकवाचा करंडा आणला. मॅडमनी दोघींना कुंकू लावलं. सरांनी मगाचा नवीन लाल बॉक्स मॅडमच्या हातात दिला. त्यांनी त्यातून नेकलेस हळुवारपणे काढून रेखाच्या लेकीच्या गळ्यात घातला.
“ही लग्नाची आमच्याकडून तुला भेट.”
रेखा बधीर झाली होती. तिचे डोळे वाहू लागले होते..
“अहो ताई, हे काय करताय? आधीच तुमचे फार उपकार आहेत आमच्यावर.. नेहाची वह्या, पुस्तकं, दप्तरं, कपडे यांवरच तर माझ्या लेकी वाढल्या. तुमचा पगार होता म्हणून माझा संसार चाललाय. आणि आता हे ओझं कशाला ?”
“अगं ओझं कसलं ? आम्ही तुझ्यासाठी केलं त्यापेक्षा जास्त तू
आमच्यासाठी केलस.. मी नोकरीला जायचे. मुलांचं खाणपिणं, आजी-आजोबांची आजारपणं मी तुझ्या मदतीनेच निभावली.. धाकट्या बहिणीसारखा आधार वाटतो तुझा मला.. ही मावशीकडून भाचीला दिलेली भेट समज…”
रेखा नि तिच्या लेकीने सर नि मॅडमना वाकून नमस्कार केला.. रेखा लेकीला घेऊन स्वयंपाकघरात गेली नि दोघी देवाच्या पाया पडल्या.. “आहेस रे बाबा तू… आता कट्टी संपली बरं का…”
रेखा नि तिच्या लेकीच्या चेहऱ्यावर फुललेले गुलाब पाहून सर नि मॅडमची उदासीनताही कुठल्याकुठे पळून गेली… शिल्लक राहिला तो फक्त अक्षय्य आनंद!
लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले
सोलापूर
प्रस्तुती : मेघ:शाम सोनावणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
कविश्रेष्ठ इंदिरा संत आणि विदुषी दुर्गाबाई भागवत ही साहित्य क्षेत्रातली दोन उत्तुंग शिखरं ! या दोघींना पाहिलं, की मला नेहमी डॉ. आनंदी गोपाळ जोशी आणि पंडिता रमाबाई यांची आठवण होई. दोघीही तेजस्विनी, प्रखर स्वाभिमानी, ज्ञानी, मनस्वी आणि कर्तृत्ववान स्त्रिया ! परंतु दोघींनाही एकमेकींविषयी प्रचंड प्रेम आणि आदर ! दोघी एकमेकींपासून शरीराने दूर, पण मनाने एकमेकींना भेटण्याची असीम
ओढ ! जीवनाविषयी या दोघींना अपार कुतूहल, उत्सुकता आणि प्रेम !
इंदिराबाई आणि दुर्गाबाई या खरंतर माझ्या आजी शोभतील, अशा वयाच्या. पण या दोघींचा मला स्नेह, सौहार्द, आशीर्वाद लाभला आणि माझं भाग्य मला ऐश्वर्यवंत करून गेलं! इंदिरा आणि दुर्गा लक्ष्मीचीच नावं. दोघी सात्त्विक आणि निर्मळ मनाच्या. साधं असणं, साधं वागणं, साधं बोलणं दोघींची सहजप्रवृत्ती ! या द्वयींच्या सहवासात वाटायचं, जणू प्राजक्ताच्या झाडाखाली मी बसलेय आणि धुंद गंधाच्या प्राजक्ताचा माझ्यावर अभिषेक होतोय ! यांच्याकडून किती टिपू आणि काय काय टिपू असं व्हायचं. ज्ञान टिपून घ्यायच्या बाबतीत दोघींचीही हीच अवस्था….
‘मी भुकेला सर्वदाचा, भूक माझी फार मोठी,
मंदिरी या बैसलो मी, घेऊनिया ताट वाटी
ज्ञानमेवा रोज खातो, भूक माझी वाढताहे
सेवितो आकंठ तरीही, मी भुकेला राहताहे…’
वयाच्या नव्वदीतही, दुर्गाबाई त्यांच्या शरीराला न पेलवणाऱ्या वजनाच्या ग्रंथाचे भाषांतर करण्यात गर्क ! ‘मला अजून भरपूर काम करायचंय’ ही प्रचंड उमेद ! जगातली सर्वांत ‘आनंदयात्री मीच’ ही भावना ! दुर्गाबाई म्हणजे अखंड ज्ञानयज्ञ ! जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा वाढदिवसासारखाच साजरा करावा आणि ‘रिकामा अर्धघडी राहू नको रे’ हे जीवनाचं तत्त्व ! ९०व्या वर्षीही बाईंची बुद्धी तल्लख ! आणीबाणीविरुद्ध जनजागृती करताना, त्यांनी दुर्गेचा अवतार धारण केला होता, हे सर्वश्रुत आहेच. प्रखर सूर्याचं तेज त्यांच्या वाणीत होतं, तर मृदुभाषी इंदिरेच्या लेखनात चंद्रकिरणांकुरांची ‘शांताकार शीतलता’ होती. दोघींच्या नात्याची वीण मात्र जाईजुईच्या गुंफलेल्या गजऱ्यासारखी घट्ट होती !
‘ प्रत्येक साहित्यकृतीच्या निर्मितीत वाचकाचा, मूळ निर्मात्याइतकाच सहभाग असतो,’ अशी दुर्गाबाईंची श्रद्धा होती. ‘ खरी डोळस मेहनत वाया जात नाही. प्रत्येक अभ्यासकाने किंवा संग्राहकाने आपली कुशाग्र बुद्धी पणाला लावून, स्वतःच्या दृष्टिकोनातून आपली कृती साध्य करावी. प्रत्येकाची कुवत मर्यादित असते. पण एखाद्याने ती सीमारेषेपर्यंत ताणली तर स्वतंत्र कृती निर्माण होते आणि कर्त्याला अपार मानसिक समाधान देते;’ असे त्यांना वाटे. दुर्गाबाईंच्या अशा अनुभवांचा मला कविता गायनात खूप उपयोग झाला..
दुर्गाबाईंना कर्मकांडापेक्षा ‘कर्मयोग’ महत्त्वाचा वाटे. ध्यासी हे प्यासी, पर्यायाने कर्मयोगीच असतात. त्यांची पिपासा जगाला कल्याणकारीच असते. आपलं काम निष्ठेनं, भक्तीनं केलं तरी खूप झालं. परखड तसेच विचारपरिप्लुत व लालित्यपूर्ण लेखन करणार्या दुर्गाबाईंनी, आपल्या लेखनात अगदी पाककृतींपासून ते साहित्यसंस्कृती, समाजकारण, वैचारिक लेखन, राजकारण, प्राचीन इतिहास, अशा अनेक प्रांतांत लीलया संचार केला.
दुर्गाबाईंचे स्त्रीविषयक तर्कशुद्ध विचार आजच्या आणि उद्याच्या पिढीलाही मार्गदर्शक ठरू शकतील. त्यांना ‘स्त्रीमुक्ती’ चळवळीचे अतिरेकीपण मान्य नव्हते. एकदा तर त्या मला म्हणाल्या, “अगं पद्मजा, रात्री अपरात्री दार वाजलं तर प्रथम आपण घरातल्या पुरुषासच पुढे पाठवतो ना?” पण स्वतःच्या हिंमतीवर जगणार्या कर्तृत्ववान स्त्रियांबद्दल त्यांना प्रचंड आदर होता. कामाठीपुऱ्यातल्या स्त्रियांसाठी काम करताना अनेकदा त्यांना शिव्याशापांनाही सामोरे जावे लागले. स्त्रीच्या आयुष्यातील निराशा, अडचणी, त्यांनी अचूक हेरल्या होत्या.
इंदिराबाईंनाही स्त्रीची ही व्यथा व्याकूळ करते. एका अल्पाक्षरी कवितेत हे ‘वैश्विक सत्य’ त्या अगदी सहजपणे मांडतात…
‘काय बाई सांगू कथा, क्षण विसावा भेटतो,
गुलबाशीच्या फुलासंगे, पुन्हा दीस उगवतो…
काय बाई सांगू कथा, पाणी आणून डोळ्यांत
एवढेच बोलली ती, घागरीला हात देत….’
इंदिराबाईंच्या मते कविता वाचन म्हणजे पुनःप्रत्ययाचा आनंद लुटणे नव्हे. कविता वाचनात वाचकही निर्मितीक्षम असतो, असायला हवा. तरच त्या कवितेतील सूक्ष्म असलेले, मोलाचे काही उलगडता येईल.
इंदिराबाईंच्या काव्याविषयी कविवर्य ग्रेस यांनी मला एकदा पत्रात लिहिले होते,
‘दिन डूबा, तारे मुरझाए,
झिसक झिसक गई रैन,
बैठी सूना पंथ निहारूँ,
झरझर बरसत नैन…’
मीरेची एकट एकाकी विरही वेदना, मराठीत अस्सल आत्मतत्त्वाच्या करांगुलीवर जर कोणी तोलून धरली असेल तर ती इंदिराबाईंनीच !
‘दुखियारी प्रेमरी, दुखड़ा रो मूल,
हिलमिल बात बनावत मोसो,
हिवडवा (हृदयात) में लगता है सूल.’
“इंदिराबाईंच्या वेदनेचा हा काटा, पद्मजाबाई तुमच्या गळ्याला गायिका म्हणून नक्कीच झोंबला असणार….” — ग्रेस.
“चाकूने किंवा सुरीच्या टोकाने मनगटावर घाव करावेत आणि त्यातून आलेल्या रक्ताच्या थेंबाकडे बघत रहावं, तशा या माझ्या कविता आहेत..” अशी प्रतिक्रिया स्वतःच्या कवितेकडे पाहताना फक्त इंदिराबाईच लिहू शकतात. त्यांची कविता आत्मस्पर्शी व आत्मभान असलेली आहे. ती वाचतानासुद्धा दुर्गाबाईंच्या लेखनासारखी चित्ररूपच कायम डोळ्यांसमोर येते.
इंदिरा अक्कांचं खास वैशिष्ट्य म्हणजे, निसर्गातील कुठल्याही ‘अजीव’ गोष्टीतही त्यांना ‘चैतन्य’ दिसतं. निसर्गावर तर दोघींचंही प्रचंड प्रेम ! दुर्गाबाईंच्या ‘ऋतुचक्र’, ‘निसर्गोत्सव’, ‘दुपानी’ किंवा इतर लेखनातही हा निसर्ग जिवंत उभा राहतो. अक्कांच्या संवेदनशील मनानं ‘वंशकुसुम’ हा संग्रह तर चक्क पारिजातकाच्या फुलाला वाहिलाय. फुलपाखरू जसं अलगद फुलावर बसावं, तशी त्यांची कविता एखाद्या दवबिंदूप्रमाणे तरल आहे. ‘ दवबिंदूला स्पर्श करताच तो फुटून जाईल की काय या भीतीनं कवितेतील ‘कवितापण’ जपायचा मी प्रयत्न करते, कारण प्रत्येक कविता हे कवीचं बाळच असतं.’.. ही त्यांची हळुवार तरल भावना.
पती ना. मा. संत निवर्तल्यावर अक्कांनी व्रतस्थपणे लिहिलेली एक कविता…
‘कसे केव्हा कलंडते, माझ्या मनाचे आभाळ
आणि चंद्र चांदण्यांचा दूर पोचतो ओहळ…
पेट घेई मध्यरात्र, पेटे काळोखाचे जळ
दिवसाच्या राखेमध्ये, उभी तुळस वेल्हाळ….’
यातील ‘तुळस वेल्हाळ’ हे शब्द म्हणजे अक्कांचा ऑटोग्राफच जणू ! अशा या सत्त्वशील योगिनींचा मला सुगंधी सहवास लाभला, हे माझे महत्भाग्यच !
☆ “पलायन…” लेखक : रस्किन बाॅन्ड – अनुवाद – सुश्री निलिमा भावे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
आकाश उजळत होतं, तसतसे पाईन आणि देवदार वृक्ष स्पष्ट दिसायला लागले आणि पक्ष्यांची हालचाल सुरू झाली. सुरुवात दयाळ पक्ष्याने केली. त्याने एक सौम्य, मंद शीळ घातली. त्यानंतर साळुंक्या झुडुपांमध्ये कलकल करायला लागल्या. एक तांबट एका उंच झाडावर बसून कर्कश्यपणे ठक् ठक् आवाज करायला लागला. आकाश जरा आणखी पांढुरकं झाल्यानंतर तजेलदार हिरव्या रंगाचा पोपटांचा थवा झाडाच्या शेंड्यावरून उडत गेला.
पावसाची भुरभुर चालूच राहिली. पूर्वेकडच्या आकाशात तांबूस रंगाचा चमकदार प्रकाश पसरला आणि मग, अगदी अचानकपणे ढगांमधल्या फटीतून सूर्य बाहेर आला. हिरवंगार पावसाचं गवत एकदम उठून दिसायला लागलं. मी आणि दलजीत दोघेही चकित होऊन हे दृश्य पहात होतो. आत्तापर्यंत कधीच आम्ही इतक्या लवकर उठलो नव्हतो. झाडं, झुडुपं, गवत यांच्यामध्ये विणलेल्या एरवी लक्षात न येणार्या कोळ्यांची शेकडो जाळी सोनेरी आणि रुपेरी जलबिंदूंनी नटून लक्ष वेधून घ्यायला लागली. जाळ्याच्या नाजूक रेशमी तंतूंनी सूर्यप्रकाश आणि जलबिंदू यांना तोलून धरलं होतं. प्रत्येक जलबिंदू लहानशा रत्नासारखा चमचमत होता.
पावसात भिजून ओला आणि जड झालेला एक जांभळ्या फुलांचा जंगली डेलिया टेकडीच्या उतारावर पसरला होता आणि पाचूसारखा चमकदार हिरवा गवती किडा त्याच्या एका पाकळीवर पाय पसरून ऊन खात पहुडला होता.
पुस्तक – वावटळ आणि सात कथा
लेखक – रस्किन बॉँड
अनुवाद – सुश्री नीलिमा भावे
संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय डॉ कुन्दन सिंह परिहार जी का साहित्य विशेषकर व्यंग्य एवं लघुकथाएं ई-अभिव्यक्ति के माध्यम से काफी पढ़ी एवं सराही जाती रही हैं। हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहते हैं। डॉ कुंदन सिंह परिहार जी की रचनाओं के पात्र हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं। उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपकी एक अतिसंवेदनशील एवं विचारणीय कहानी ”देशभक्त’ जी का संकट’। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार # 196 ☆
☆ व्यंग्य ☆ ‘देशभक्त’ जी का संकट ☆
भाई रतनलाल ‘देशभक्त’ बहुत परेशान हैं। न दिन को चैन है, न रात को नींद। रात करवटें बदलते गुज़रती है।
‘देशभक्त’ जी राजनीति के पुराने खिलाड़ी हैं। कुछ साल पहले अपने नाम के साथ ‘देशभक्त’ जोड़ लिया, सो अब अपना परिचय उसी नाम से देते हैं।
‘देशभक्त’ जी तीन पार्टियाँ छोड़कर अंतरात्मा की आवाज़ पर चौथी पार्टी में आये हैं। तब यह पार्टी पावर में थी। वे यह सोचकर पार्टी में आये थे कि कोई मलाईदार पद मिल जाएगा, लेकिन हाल ही में पार्टी के कुछ एमैले अंतरात्मा की आवाज़ पर पार्टी छोड़ कर चले गये और सरकार गिर गयी। ‘देशभक्त’ जी के लिए सर मुँड़ाते ही ओले पड़े। अब उनका चैन हराम है।
नई पार्टी ने पावर में आते ही भड़ाभड़ काम करना शुरू कर दिया। बिजली-पानी के शुल्क में छूट दे दी और तेज़ी से स्कूल, अस्पताल, पुल, सड़कें बनने लगे। उनके एमैले दिन भर काम के ठिये पर मुस्तैद दिखायी देने लगे।
लेकिन उनका काम देख कर ‘देशभक्त’ जी के पेट में पानी मचने लगा। ऐसे ही काम होता रहा तो उनकी पार्टी का पचास साल तक पावर में आने का नंबर नहीं लगेगा। पब्लिक खुश रही तो अपना तो बंटाढार ही होना है। फिर चौथी बार दल बदलने के सिवा कोई चारा नहीं रहेगा।
चैन नहीं पड़ा तो अपनी पार्टी के पुराने घाघ गोमती भाई के पास पहुँचे। वे सोफे पर गणेश जी की मुद्रा में बैठे काजू- किशमिश टूँग रहे थे। देखकर देशभक्त जी का माथा और खराब हुआ। बोले, ‘आप यहाँ आराम से बैठे हैं और वहाँ अपना सारा काम खराब हो रहा है।’
गोमती भाई ने पूछा, ‘क्या हुआ? क्या परेशानी है?’
‘देशभक्त’ जी रुआँसे होकर बोले, ‘नयी सरकार इतनी तेजी से काम कर रही है। यही हाल रहा तो आगे हमें कौन पूछेगा? अपनी लुटिया तो डूबी समझो। पचास साल तक सर उठाने का मौका नहीं मिलेगा।’
गोमती भाई परमहंस की नाईं बोले, ‘जनता का भला हो रहा है तो होने दो। जब वे गलती करेंगे तो देखेंगे।’
‘देशभक्त’ जी भिन्ना कर बोले, ‘तो क्या हम उनके गलती करने तक हाथ पर हाथ धरे बैठे रहें? हम कल से उनकी पार्टी के दफ्तर के सामने प्रदर्शन करेंगे, कहेंगे कि हर काम में भ्रष्टाचार और कमीशनखोरी हो रही है। आप अपने चेलों को कह दो कल सवेरे अपनी पार्टी के दफ्तर में झंडे-वंडे लेकर इकट्ठे हो जाएँ। बाकी हम देख लेंगे।’
दूसरे दिन सत्ताधारी पार्टी के दफ्तर के सामने हंगामा शुरू हो गया। पुलिस आ गयी। बैरिकेड लगे थे, उन्हें लाँघने की कोशिशें होने लगीं। पुलिस के साथ झूमा-झटकी होने लगी। ‘देशभक्त’ जी को बैरिकेड से थोड़ी सी खरोंच लग गयी। उन्होंने एक वालंटियर से पट्टी मँगवा कर उस मामूली सी खरोंच पर बँधवा ली और फिर कमीज़ उतारकर, अपने कंधे पर रखकर, चोट की नुमाइश करते घूमने लगे।
प्रदर्शन के बीच में ‘देशभक्त’ जी लाउड-स्पीकर पर भाषण भी दे रहे थे, जिसका लुब्बेलुबाब था कि वर्तमान सरकार महाभ्रष्ट है, हर काम में तीस परसेंट कमीशन बँधा है। जो सड़कें और पुल बन रहे हैं वे एक साल से ज़्यादा नहीं टिकने वाले। स्कूलों-अस्पतालों में काम की क्वालिटी एकदम घटिया है और नई पीढ़ी और मरीज़ों के साथ खिलवाड़ हो रहा है। ‘देशभक्त’ जी बार-बार मुट्ठी उठा कर कहते थे कि वे इस भ्रष्टाचार को नहीं चलने देंगे, भले ही उनको अपने प्राणों की बलि देनी पड़े।
हर बार उनका भाषण ‘बिस्मिल’ के शेर से ख़त्म होता था— ‘सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाज़ुए कातिल में है।’
पहले दिन प्रदर्शन से ‘देशभक्त’ जी अपनी फौज के साथ भारी संतुष्ट होकर लौटे। लगा जीवन को दिशा मिल गयी। अब आराम हराम है। रोज़ प्रदर्शन करना है और पूरा ज़ोर लगा कर सरकारी काम को रोकना है। सरकार काम करने में सफल हो गयी तो अपने भविष्य पर ग्रहण लगना निश्चित है।
अब रोज ‘देशभक्त’ जी चालीस पचास फुरसतिये लड़कों के साथ ‘इंकलाब जिन्दाबाद’ का नारा लगाकर कहीं काम को रोकने निकल पड़ते हैं। फिर दिन भर हंगामा और पुलिस के साथ धक्कामुक्की चलती है। शाम को अपनी दिन भर की उपलब्धि पर गर्वित, सिर ऊँचा किये लौटते हैं। उन्हें भरोसा है कि उनकी कोशिशों से सरकारी काम रुके न रुके, नयी पार्टी में उनका रुतबा ज़रूर बढ़ जाएगा, जिससे आगे कुछ हासिल होने के रास्ते खुलेंगे।