मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 101 – कळेना मानवा तुजला ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 101 – कळेना मानवा तुजला

जरा परमार्थ जीवाचा, रुचेना मानवा तुजला।

कसा बाजार मोहाचा, कळेना मानवा तुजला।

 

अती धुंदीत पैशाच्या, विसरला माय बापाला।

निरागस भाव प्रेमाचा ,पचेना मानवा तुजला।

 

नको धावू जगी मृगजळ मना भुलवी दिखावा हा।

असा का शोध सत्याचा, लागेना मानवा तुजला।

 

जरी खडतर मनी भासे असा हा मार्ग सौख्याचा।

नसे कष्टाविना प्राप्ती वळेना मानवा तुजला।

 

दिसे सत्ता किती लोभस, मनाला ओढती फासे।

कसे हे पाश मोहाचे, तुटेना मानवा तुजला

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वनौषधी संरक्षण…एक आव्हान आणि उपाय – भाग -2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ वनौषधी संरक्षण…एक आव्हान आणि उपाय – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(ऋग्ण सेवा प्रकल्प तर्फे झालेल्या निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला लेख.)

वनौषधी संरक्षण – एक आव्हान आणि उपाय.      

 पैशाच्या लोभापायी झालेली वृक्षतोड, हा फार मोठा शाप त्याला लागलेला आहे.

दीड-दोनशे वयाची वड पिंपळाची झाडे काही वेळातच बिनधास्त तोडली जात आहेत. नव्हे त्यांची कत्तल होते आहे. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे “ही तुकोबांची उक्ती विसरत चालली आहे. त्यांच्या आधाराने राहणार्या पशु पक्षांची संख्या प्रमाणाबाहेर घडायला लागली आहे. अमृतासारखी कॅन्सर वर उपयुक्त औषध असणारी वनस्पतीची तस्करी व्हायला लागली आहे. चंदनाच्या बाबतीत तर काय सांगावे, त्याचा सुगंध हाच त्याचा शाप ठरला आहे. रक्तचंदन तर त्याहूनही दुर्मिळ होत चालले आहे. पुढील पिढ्यांना चंदन चित्रातच पहायला मिळते की काय, असं वाटायला लागलं आहे. चाळीस वर्षात औद्योगीकरण वाढलं. धूर, धूळ यामुळे प्रदूषणात प्रचंड वाढ झाली. 35 ते 40 टक्के जंगलक्षेत्र असायला हवे. पण ते फक्त 15 टक्केच उरलेले आहे. हे सँटेलाइट वरून स्पष्ट दिसते. निसर्ग साखळीच तुटायला लागली आहे. सोमवल्ली सारखी वनस्पती, आज फक्त केरळ व हिमाचलमध्ये आणि तीही अगदी अल्प प्रमाणात शिल्लक आहे. कमी अधिक प्रमाणात सगळ्याच वनौषधींची तस्करी व्हायला लागली आहे. हळदीसारख्या रोजच्या वापरातील गोष्टी बद्दल काय सांगायचे? तर अमेरिकेने त्याचे पेटंट मिळवले आणि खेदाची आणि निराशाजनक गोष्ट म्हणजे आपण सगळं निवांतपणे पहात बसलोय. नुसतच भुई थोपटत बसण्यात अर्थ नाही. वनऔषधी टिकवणं हे आपलं अत्यंत महत्त्वाचं आणि आद्यकर्तव्य आहे.

वनौषधींचा संरक्षण देणं इतकं महत्त्वाचं आहे की, ते आहे म्हणून आपलं अस्तित्व आहे विकास करताना, विनाश होत नाही ना तिकडे पहायला हवं. प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर पडायचं असेल तर, वैश्विक उपक्रम घेऊन जंगलांची वाढ करायला हवी. वृक्ष मोठ्या प्रमाणावर लावायला हवेत. वनस्पतींच्या विज्ञानाच्या अभ्यासाचा प्राचीन ठेवा तळागाळापर्यंत पोचवायला हवा.   

मूल ब्रम्हा, तवचा विष्णूः, शाखायश्च महेश्वराः।

पत्रे पत्रे च देवानाम वृक्षराज नमोस्तुते।।

अशा तऱ्हेने वनस्पतींना देव मानण्याची प्राचीन संस्कृती जपायला हवी. वाहनांचे उपयोग कमी करुन सायकलचा वापर व पायी जास्त जावे. शालेय स्तरापासून शिक्षणात वेगवेगळ्या वनस्पतीं बद्दल माहिती करून  द्यावी. पर्यावरणासारखा विषय चार भिंतीत न शिकविता, नद्या, डोंगर, समुद्र, चांदणे प्रत्यक्ष दाखवत शिकवला तर विद्यार्थ्यांना तो एक वेगळा आनंद मिळेल. सौर शक्तीचा वापर जास्तीत जास्त केल्यास, तीच वीज दुसऱ्या कारणासाठी वापरता येईल. झाडांची कत्तल करणाऱ्यांना कडक शिक्षा द्यायला हव्यात. रस्त्यावर झाडे लावताना त्या त्या भागातील लोकांना त्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी द्यायला हवी. आणि स्वयंप्रेरणेने बाकीच्यांनीही ती स्वीकारायला हवी. प्रत्येक कुटुंबाने आपल्याकडे जागा नसली तरी, कुंडीमध्ये का होईना पण तुळस गवती चहा पुदिना अशी छोटी रोपे लावायला काहीच हरकत नाही. प्राणी-पक्ष्यांच्या अभयारण्या प्रमाणे वनौषधींसाठीही  राखीव जागा ठेवायला हव्यात. मोठमोठी प्रदर्शने भरवून सर्वसामान्यांना त्याची ओळख  व उपयोग सांगितले जावेत. इस्राईल सारख्या देशात कमी पाण्यावर केली जाणारी शेती पाहिली की, आश्चर्याने तोंडात बोट घालावे असे वाटते. त्याचा अभ्यास करून ते तंत्रज्ञान आपण स्वीकारायला हवे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांना त्याचे महत्त्व, तंत्रज्ञान आणि महत्त्वाचं म्हणजे हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली तर, शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. नवनवीन संशोधनातून, उत्तम बी बियाणे तयार करून, त्याची लागवड करायला हवी. आज बालाजी तांबे, रामदेवबाबा यांची उत्पादने लोक मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर युरोप, अमेरिकेत दरवर्षी आयुर्वेदिक कॉन्फरन्स घेतली जातात. त्याद्वारे या वनौषधींचा आणखी प्रचार होत आहे. युरोपमध्येही लागवडी केल्या जात आहेत. भारत, युरोप अमेरिका सर्वांनी मिळून नव नवीन संशोधन चालू केले आहे. अलीकडं वाचनात आलं की, साध्या रेल्वेच्या परीक्षा ऑनलाइन घेतल्या  त्यामुळे चार लाख  झाडे आणि 319 कोटी कागदांची बचत झाली. असेच उपक्रम जास्तीत जास्त क्षेत्रात व्हायला हवेत. अनेक ठिकाणी “मियावाकी” जंगलेही केली जात आहेत. सर्व बाजूंनी प्रयत्न चालू आहेत. पण त्याला अजून वेग द्यायला हवा. या आदर्शाचा नवीन पिढी निश्चित आदर करेल. ही जबाबदारी एकट्याची नसून, प्रत्येक नागरिकाच्या अविश्रांत आणि उत्स्फूर्त परिश्रमाची गरज आहे.

समाप्त

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गीतांजली… ☆ सौ. मुग्धा रवींद्र कानिटकर

?  विविधा ?

☆गीतांजली… ☆ सौ. मुग्धा रवींद्र कानिटकर ☆ 

(रवींद्रनाथ टागोर जयंतीनिमित्त लेख)

रवींद्रनाथ टागोर हे जगप्रसिद्ध भारतीय  कवी, गीतकार, कादंबरीकार, कथाकार,  संगीतकार,  कलावंत, तत्त्वचिंतक, शिक्षणतज्ज्ञ,नाटककार, चित्रकार, नट,  निबंध लेखक आणि समीक्षक होते. त्यांच्या काव्याप्रमाणेच त्यांच्या कथा हे बंगाली साहित्याचेच नव्हे, तर भारतीय साहित्याचे अमूल्य धन आहे.  रवींद्रनाथ टागोर अनुभूती शब्दात पेरतात. बालपणी ते लिहितात..

..जाॅल पाॅडे पाता नाॅडे…  (म्हणजे-पाणी पडे-पान झुले)…

‘अभिलाष’ ही  कविता ,१२व्या वर्षी त्यांनी लिहिली आणि प्रसिद्ध झाली. या कवीचे प्राण्यांवर अतिशय प्रेम होते.  मूकजनावरांमधील स्वाभिमान आणि शांतीने त्यांना प्रेरणा मिळाली . बर्फाच्या कणांबरोबर सुद्धा त्यांचे तादात्म्य पावून  “छोटयाशा गोष्टी सुद्धा जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतात” अशा आशयाची एक सुंदर कविता त्यांच्या कडून लिहिली गेली.

निसर्गतःच त्यांना रूपसौंदर्य लाभलं.तसेच त्यांना मधुर आवाजाची देणगी होती.त्यांनी रचलेल्या शेकडो गीतांत चालीची विविधता आढळून येते.रवींद्रनाथ टागोर हे नाव ‘ रवींद्र संगीत’ म्हणून सुद्धा सुप्रसिद्ध आहे.

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची मातृभाषेत बांग्ला भाषेत रचित, अखिल विश्वाकडून प्रशंसित झालेली,सर्वाधिक वाचली गेलेली, गेयात्मक,पद्यात्मक, साहित्यकृती म्हणजे नोबेल पुरस्काराने सन्मानित अशी ‘गीतांजली’ . गीतांजली स्वतंत्र कलाकृती आहे. गीतांजली हा काव्यसंग्रह आशावादी आहे.रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमेची साक्ष देणारी सर्जनशील निर्मिती म्हणजे गीतांजली हे काव्य.यात त्यांचं भाषाप्रभुत्व , परमेश्वर प्राप्तीची ओढ,उत्कट इच्छा काव्य रसिकांच्या अंतःकरणाला हात घालते.१९१३ साली महाकवी रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली ‘ ह्या काव्यसंग्रहाला आशियातील पहिले नोबेल पारितोषिक मिळाले. या संग्रहामध्ये गीतांजली,गीतिमाल्य, नैवेद्य,शिशू, चैताली,स्मरण, कल्पना,उत्सर्ग,अचलायतन या काव्यसंग्रहातून घेतलेल्या निवडक कवितांचा समावेश आहे.

रवींद्रनाथ टागोर यांच्या साधारण १०४ सर्वोत्कृष्ठ कलाकृतींचे संकलन गीतांजली रूपाने काव्यरसिकांना अनमोल भेट मिळाली आहे.

आपल्या देशबांधवांमधील अज्ञान,निरक्षरता, फूट,आळस आणि संकुचित वृत्ती पाहून टागोर अस्वस्थ होत. हा कवी विचारवंत तसेच दार्शनिक असल्याने आपल्या   राष्ट्राला स्वातंत्र्याच्या स्वर्गात नेण्यासाठीच वैविध्यपूर्ण अशा असंख्य साहित्यकृती त्यांनी निर्माण केल्या आहेत असे वाटते.  डिसेंबर १८८६ मध्ये कलकत्ता येथे राष्ट्रीय सभेच्या दुसऱ्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी ‘आमरा मिले छि आज मात्र डाके’ ह्या कवितेचे लेखन आणि गायन ही केलं होतं.

१८९०साली ”विसर्जन’ या नाटकाचे लेखन आणि प्रयोग केले.१८९६ ला कलकत्ता येथे काॅंग्रेस अधिवेशनात बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या ‘वंदेमातरम्’ या देशभक्तीपर गीताला चाल लावली आणि त्यांनी स्वतः ते गायले.१९११च्या राष्ट्रीय सभेच्या वेळी ‘जन गण मन’  हे गीत लिहून संगीतबद्ध केले. स्वतः ते  त्यांनी गायले . पुढं हे गीत स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आहे.

१९०१ मध्ये त्यांनी’ शांतिनिकेतन, आश्रम शाळा’ स्थापन केली. या अभिनव प्रयोगाने जीवनशिक्षण कार्य सफल करून दाखवले.

तसेच १९१८ला ‘  यत्र विश्वं भवत्येक नीडम्’ या भावनेने त्यांनी ‘ विश्वभारती’ संस्थेची पायाभरणी केली.

ब्रिटिश सरकारने दिलेला ‘ सर’ हा किताब  प्रखर देशभक्त अशा टागोरांनी १९१९ ला  परत दिला.

आशा-निराशेवर हिंदकळणारं टागोरांचे मन  कवितांमधून प्रकट होते.काही कविता  वाचकांना गूढ वाटतात.

काव्यामध्ये रस व गती असणाऱ्या प्रत्येकाला गीतांजली रूपी काव्यचंद्राचे कधी ना कधी दर्शन घ्यावे असे वाटतेच.

‘ चित्त जेथा भयशून्य उच्च जेथा शिर ‘ …
(या सदा मुक्त स्वर्गात माझ्या देशाला जागृत होऊ दे..)

ही त्यांची सुप्रसिद्ध प्रार्थना सारे जीवन समजावून घेण्याचा ध्येयवाद प्रकट करते.

या काव्यसंग्रहातून एक हळुवार कवी,नितळ मनाचा माणूस उलगडत जातो.टागोरांची वैविध्यपूर्ण शैली, विविध विषय, असंख्य प्रसंग आणि मनोभाव यांचा यथार्थ परिचय या दिव्य , अलौकिक कलाविष्काराच्या माध्यमातून वाचकांना होतो.यातील काव्यरचनांचे भाषांतर अनेक अभ्यासकांनी  त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेत  केले आहे .

‘जाबार दिने एई कथाटि बोले जेनो जाई।’ या कवितेतील आरंभिक पंक्तिंचे हिंदी रूपांतर  – ‘जाने के दिन यह बात मैं कहकर जाऊं। यहां जो कुछ देखा-पाया, उसकी तुलना नहीं। ज्योति के इस सिंधु में जो शतदल कमल शोभित है, उसी का मधु पीता रहा, इसीलिए मैं धन्य हूं।’ असं वाचताना प्रत्येकाच्या मनात सकारात्मक विचारांना चालना मिळते.

समर्पक शब्दांत जीवनविषयक मांडलेले तत्वज्ञान,प्रतिमांचा समर्पक वापर,सहज सुलभ भावाविष्कार अशा वैशिष्ट्यांसह टागोरांची कविता व्यक्त होते.

गीतांजली हा १५६ ते१५७ मूळ बंगाली कवितांचा संग्रह , त्यांनी इंग्रजी मध्ये Songs of Offspring असं केलेलं भाषांतर काव्य रसिकांना खुप भावले.पहिल्या महायुद्धाच्या काठावर उभ्या असलेल्या पाश्चात्य कवींना ऐन अशान्त युगात शीतरस  देणारा हा कवी काही अपू्र्वच वाटला.गीतांजली कविता वाचकाला वेगळ्याच भावविश्वाची सफर घडवून आणते.टागोरांची कविता वाचल्यावर एक प्रकारची शांती दरवळत राहते.

‘गीतांजली’ तील कविता या ईश्वराबद्दलच्या कविता नाहीत तर ‘ईश्वरपणा’ बद्दलच्या आहेत.एझ्रा पाउंड ला गीतांजली मधील अपूर्व अशी मनस्थिती आवडली.त्यामुळेच  तो म्हणतो,” There is in Tagore the stillness of nature.” सर्व जगात आधुनिक तरीही ऋषितुल्य कवी म्हणून त्यांना गौरविण्यात आले आहे.

गीतांजलि’ च्या कवितांचं क्षेत्र खुप विस्तृत आहे. त्यांत प्रेम, शांति  आहे. दलितांच्या विषयी  ‘अपमानित’ शीर्षक असलेली कविता सुद्धा आहे. ‘अपमानित’ में रवींद्रनाथांनी जातिगत भेदभावाचा तीव्र प्रतिकार केला आहे – ‘हे मोर दुर्भागा देश, जादेर करेछ अपमान, अपमानेर होते होबे ताहादेर सबार समान।’ ‘ ‘अपमानित’ सारख्या कविता लिहून रवींद्रनाथ दलितांच्या प्रति उच्च  जातिंना  संवेदनशील बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर ‘भारत तीर्थ’ या कवितेत रवींद्रनाथ सांगत आहेत कि भारताचा  समस्त मानव समाज एक कुटुम्ब,  एक शरीरा सारखं आहे.  -‘आर्य, अनार्य, द्रविड़, चीनी, शक, हूण, पठान, मुगल सर्व इथं एका देहात लीन झाले आहेत.हा देहच भारतबोध आहे.’
१९४० ला रवींद्रनाथ टागोरांना ‘डाॅक्टरेट’ पदवी प्रदान करून आॅक्सफर्ड विद्यापीठाकडून सन्मानित करण्यात आले.

“तू सतत माझ्याबरोबर असतोस. मला नवजीवन देतोस. माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझ्या समवेत असतोस. मला आशा देतोस. माझ्या अस्तित्वाच्या प्रत्येक कणासाठी मी तुझा आभारी आहे.” …असं म्हणत .

१९४१ ला ‘  जन्मदिने ‘ हा त्यांचा शेवटचा कविता संग्रह प्रकाशित करण्यात आला.

७आॅगस्ट१९४२ या दिवशी आपल्या जीवन देवतेला गुरुदेव रवींद्रनाथ  टागोर यांनी दिलेले हे शेवटचे अर्घ्य कृती आणि उक्ती यातील अद्वैत आचरणातून सिद्ध करणाऱ्या उपनिषदांच्या अभ्यासाला अनुसरून पिंडी ते ब्रम्हांडी पाहणाऱ्या साहित्य, संगीत, कला आणि विचारांचे बहुविध आणि बहुमोल भांडार अवघ्या मानवतेला देणाऱ्या या विश्वकवीची प्राणज्योत मावळली.

जीवनमूल्यांचा ऱ्हास, असुरक्षितता आणि स्पर्धा यांच्या अंधारात भरकटलेल्या समाजासाठी ‘गीतांजली’ तील प्रेम, सत्यम्, शिवम्,  सुंदरम् वरील श्रद्धा व मानवी जीवनाला अर्थ असतो, हा विश्वासच मला दीपस्तंभ वाटतो.

© सौ. मुग्धा रवींद्र कानिटकर

सांगली

फोन 9403726078

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परवड… भाग – 1 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

? जीवनरंग ❤️

☆ परवड… भाग – 1 ☆ सौ. सुचित्रा पवार

गोदूबाई गेल्या शेवटी ! आयुष्याच्या सर्व कटकटीतून, दुर्भाग्यातून सुटका झाली अखेर !

गोदूबाई !गावातीलच दामाजी बुवाना दिली होती. दामाजीबुवा वारकरी – माळकरी – भजन कीर्तन पंढरीची वारी चुकायची नाही म्हणून सगळेजण बुवाच म्हणत त्याला. तरतरीत नाक, उंच -धिप्पाड शरीर , दररोज पांढरीशुभ्र परिट घडीची खळखळीत कपडे, जमीनजुमला  चिक्कार, गोठ्यात बैलजोडी, दुभती जनावरं, सोप्यात धान्याच्या थप्पी, एकूण खातं -पितं घर ; एकुलता एक पोरगा, आईवडील बस्स! एव्हढंच मर्यादित कुटुंब ;जास्त काही बघायची गरज नव्हती. खात्या पित्या घरात लेक पडत्या ना ? बास ! गोदाबाईच्या घरातल्याना तेवढंच बास होतं ; शिवाय लेक गावातच हाकेच्या अंतरावर नजरेसमोर रहाणार होती. गोदाबाई निरक्षर, कृश पण काटक देहाची, साधीभोळी, घरदार, गुरे ढोरं शेतातली कष्टाची कामे कशातच मागं नव्हती  ; हीच आपल्या लेकाचा  परपंच चांगला सांभाळील म्हणून दामाजी बुवाच्या आई वडिलांनी गोदूबाईला मागणी घातली.

लगीन हून गोदाबाई सासरी आली, गावातच सासर असल्यानं रुळायला वेळ नाही लागला. गोदुबाईंनी घराचा ताबा लगेचच घेतला  दिवसभर सारवण -पोतेरा, स्वयपाक, भांडी -धुण, दळण -जळण शेतातल्या मालाची उगानिगा गोदुबाईला काही सांगावे लागायचे नाही. घरादारात अंगणात गोदूबाईचा हात सतत हालत रहायचा, सासुसासरे खुश!

बघता बघता वर्ष दोन वर्षे गेली आता नातवंडांचं तोंड बघायचं आणि पंढरीची वारी धरायची म्हणून आस लागली पण दोन म्हणता चार वर्षे झाली तर गोदूबाईच्या पदरात देवाने काही दान दिलं नाही. त्या काळी डॉक्टर दवाखाने औषध असलं काही नव्हतं, गावातच झाडपाला, नवस, देवर्षी बघून झालं, काही उपाय चालला नाही. गोदाबाईला पण काळजी लागली होती पण तिला आशा होती ;तिच्या खानदानात कोणीच वांझोट नव्हतं सगळ्यांनाच डझनान पोरं होती. पण भावकीतल्या आया बाया गोदूच्या सासूला दबक्या आवाजात बोलू लागल्या, “येशे, ल्योक म्हातारा हुस्तोवर नातवाची वाट बघतीस का ? वाणी तिणीचा एकच हाय एकाच चार हूं देत बाई , लेकाचं दुसरं लगीन कर. “

आतापर्यँत यशोदाबाईला असलं काय सुचलं नव्हतं पण बायकांनी कान भरवल्यावर रात्रनदीन यशोदाबाईला जिथं तिथं नातवंड दिसू लागली, ‘घराचं गोकुळ व्हाया होवं ‘असं वाटू लागलं अन मग अशी कोण बरं आणावी ? म्हणून मनात खल सुरु झाला. गोदू रानात गेल्याचं बघून तिनं नवऱ्याच्या कानावर ही गोष्ट घातलीच. ल्योक तर थोडाच मर्जीभाईर होता ? दुपारच्या जेवणाला यशोदा बाई लेकाला  म्हणलीच, “आरं बुवा आमी थकत चाललो बग, तुझ्या पोटी एखादं मूल झालं की आमी काशीला जायाला बरं ! गुदीला काय आता मूल व्हायचं न्हाई तवा. . . दुसरी बायकू आणाया पायजे, तू वाणीवाणीचा योकच, एकाच दोन झालं मजी आमचं डोळ मिटलं तर चालंल. आणि आपल्याला काय कमी रं ?एक घर सांभाळल आन एक श्यात !कसं ? तू होय म्हण. ” बुवाला पण आळीत, चौकात लोकं ईचारायचीच ! बुवाच्या मागण लगीन झालेल्याना कुणाला दोन कुणाला तीन झाली होती, बुवान होकार देऊन टाकला . यशोदाबाई चा आनंद गगनात मावेना ! बुवाचा पाय हुंबऱ्यातन बाहेर पडुस्तोवर यशोदाबाई लगोलग  जावंच्या कानी लागली, “आग चम्पे ऐकलंस का ?बुवाच दुसरं लगीन करायचं म्हणतो तुज्या बघण्यात एकांदी हाय का गं ? धनधापुस नाकी डोळी नीट असली म्हंजी झालं. ” उंदरावर टपून बसलेल्या मांजरागत चंपाबाई जणू वाटच बघत होती, ती लगोलग म्हणाली, “एकांदी कशाबाय ? माज्या थोरल्या भावाची गेल्यासाली उरसाला आल्याली धुरपा काय वंगाळ हाय गं ? परक्याची आपल्या घरात घुसवण्यापेक्षा आपल्यात आपलं काय वाईट गं ?वाटीतलं ताटात सांडलं तर काय बिगाडलं ? आणि माझ्या नदरखाली पोरगी चांगली नांदल. बगा बाई, तुमचा समद्याचा इचार करून सांगा. “

क्रमशः…

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “कुतूहलापोटी” – डॉ. अनिल अवचट ☆ परिचय – सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

 

? पुस्तकावर बोलू काही ?

☆“कुतूहलापोटी” – डॉ. अनिल अवचट ☆ परिचय – सौ.अस्मिता इनामदार ☆ 

कुतूहलापोटी

पुस्तकाचे नाव … कुतूहलापोटी

लेखक … डॉ. अनिल अवचट

प्रकाशन:  समकालीन प्रकाशन 

पृष्ठे         २००

किंमत      रु  २००/—  

अवचटांचे प्रत्येक पुस्तक म्हणजे विचारांचा खजिनाच असतो. डॉक्टरकी बाजूला ठेऊन इतर गोष्टींत मनापासून रमणारा असा हा अवलिया आहे. नुकतेच त्यांचे मी एक पुस्तक वाचले जे नावापासून आगळे वेगळे आहे. “कुतूहलापोटी” या नावाचेच कुतूहल वाटून मी ते पुस्तक वाचायला घेतले आणि शेवटपर्यंत वाचूनच खाली ठेवले. तस पाहिलं तर या नाहीत कथा ना लेख. पण मांडणी इतकी सुरेख केली आहे की आपल्याच कुतूहलाचे निराकरण कुणीतरी लगेचच केले आहे असे वाटते

यातले प्रत्येक लेख हा लेखकाच्या कुतूहलाचा अनोखा पैलू दाखवतो. रोजच्या जीवनात आपण खूप गोष्टी अनुभवत असतो पण त्या बद्दल आपल्याला कधीच कसले कुतूहल वाटतं नाही.

या पुस्तकात एकूण ११ लेख आहेत, ज्याचे विषय आपण कधीच विचारात घेतलेले नाहीत. निसर्गातल्या गोष्टी मागचे विज्ञान आणि आपले जीवन याची सांगड लेखकाने कशी घातलीय हे समजून घेताना खूप मनोरंजक माहिती आपल्याला मिळते.

फंगस, बॅक्टेरिया, साप, आपले भाऊ म्हणजे निरनिराळे कीटक, मधमाशा, पक्षी, आपले शरीर, रक्त, पॅंक्री (पॅंक्रिआस), कॅन्सर, जन्म रहस्य यावरचे लेख वाचताना अक्षरशः आपण कधीही न केलेल्या विचारांवरचे विवेचन लक्षात येते.

प्रत्येक लेखाचे असं थोडक्यात वर्णन नाही करता येणार, त्यासाठी हे पुस्तकच वाचायला हवे. ती कल्पना येण्यासाठी या पुस्तकाचा ब्लर्ग मी देते म्हणजे या पुस्तकाची रूपरेषा लक्षात येईल.

आपल्या सभोवतालच्या प्रत्येक सजिवात किती आश्चर्य दडलेली आहेत बघा. पक्ष्यांच्या हलक्या मऊसूत पिसांमध्ये मैलोनमैल उडण्याची ताकद कुठून येते ? मधमाशा मधावर अशी कोणती प्रक्रिया करतात ज्यातून हजारो वर्ष टिकू शकणारा मध तयार होतो ? कुण्या एका किटकाची अंडी वीस वर्षे सुप्तावस्थेत कशी राहू शकतात ? माणसाला अजूनही न जमलेले सेल्युलोज चे विघटन बुरशी कसं करते ? आपल्या शरीराचेही तसेच. मेंदू पासून र्हृदयापर्यंतच्या लाखो गुंतागुंतीच्या यंत्रणा सुरळीत कशा चालतात हे एक कोडेच आहे.  

या आणि अशा प्रश्नांची कोडी लेखकाला पडली आणि लागले की ते त्यांच्या मागे. तज्ञ गाठले, पुस्तकं पालथी घातली, आणि ही कोडी सहज सोप्या भाषेत उलगडून आपल्या समोर ठेवली.

सजीवांच्या जीवन क्रियांविषयी कुतूहलापोटी घेतलेला हा शोध वाचाल तर थक्क व्हाल. !!

परिचय – अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #131 ☆ मनन व आनंद ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं  माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं।  साप्ताहिक स्तम्भ  “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक  साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का  वैश्विक महामारी और मानवीय जीवन पर आधारित एक अत्यंत विचारणीय आलेख मनन व आनंद। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन।  कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 131 ☆

☆ मनन व आनंद

‘मन का धर्म है मनन करना; मनन से ही उसे आनंद प्राप्त होता है और मनन में बाधा होने से उसे पीड़ा होती है’ रवीन्द्रनाथ ठाकुर की यह उक्ति विचारणीय है, चिंतनीय है, मननीय है। मन का स्वभाव है– सोच-समझ कर, शांत भाव से कार्य करना व ऊहापोह की स्थिति से ऊपर उठना। दूसरे शब्दों में हम इसे एकाग्रता की संज्ञा दे सकते हैं। चित की एकाग्रता आनंद-प्रदायिका है। उस स्थिति में मन अलौकिक आनंद की दशा में पहुंच जाता है तथा स्व-पर व राग-द्वेष से ऊपर उठ जाता है। यदि इस स्थिति में कोई विक्षेप होता है, तो उसे अत्यंत पीड़ा होती है और वह उस लौकिक जगत् में लौट आता है।

ग्लैडस्टन के मतानुसार ‘बहुत ही तथा बड़ी ग़लतियाँ किए बिना मनुष्य बड़ा व महान् नहीं बन सकता’– उक्त तथ्य को उद्घाटित करता है कि इंसान जीवन भर सीखता है तथा जो जितनी अधिक ग़लतियाँ करता है; उतना ही महान् बन जाता है। वास्तव में वही व्यक्ति सीख सकता है, जिसमें अहं भाव न हो; जो ज़मीन से जुड़ा हो; जिसके अंतर्मन में विद्या, विनय, विवेक व विनम्रता भाव संचित हों। वह सकारात्मक सोच का धनी हो और उसके हृदय में दया, माया, ममता, करुणा, सहानुभूति, सहनशीलता आदि दैवीय भावों का आग़ार हो। ऐसा व्यक्ति अपनी ग़लती को स्वीकारने में तनिक भी संकोच व लज्जा का अनुभव नहीं करता, बल्कि भविष्य में उसे न दोहराने का संकल्प भी लेता है। सो! ऐसा व्यक्ति महान् बन सकता है।

‘दातापन, मीठी बोली, धैर्य व उचित का ज्ञान– यह चारों स्वाभाविक गुण हैं, जो अभ्यास से नहीं मिलते।’ चाणक्य की यह उक्ति मानव को आभास दिलाती है कि कुछ गुण प्रभु-प्रदत्त होते हैं तथा वे प्रतिभा के अंतर्गत आते हैं। लाख प्रयास करने पर भी व्यक्ति उन्हें अर्जित नहीं कर सकता। वे उसे पूर्वजन्म के कृत-कर्मों के एवज़ में प्राप्त होते हैं। कुछ गुण उसे पूर्वजों द्वारा प्रदत्त होते हैं, जिसके लिए उसे परिश्रम नहीं करना पड़ता तथा वे पीढ़ी-दर-पीढ़ी हस्तांतरित होते हैं। ‘करत-करत अभ्यास के जड़मति होत सुजान’ के संदर्भ में कबीरदास जी का यह संदेश अत्यंत सार्थक है कि निरंतर अभ्यास द्वारा मूर्ख भी विद्वान बन सकता है। इसके द्वारा हम ज्ञान तो प्राप्त कर सकते हैं, परंतु उससे स्वभाव में परिवर्तन आना संभव नहीं है।

गीता में भगवान श्रीकृष्ण मानव को मन-तुरंग को वश में करने की सीख देते हैं, क्योंकि मन बहुत चंचल है। वह पल भर में तीनों लोकों की यात्रा कर लौट आता है। सो! एकाग्रता व ध्यान के लिए मन को नियंत्रण में रखना आवश्यक है। जैसे-जैसे हमारा चित एकाग्र होता जाता है, हमारी भौतिक इच्छाओं, आकांक्षाओं, तमन्नाओं व वासनाओं पर अंकुश लग जाता है और हम अनहद नाद की स्थिति को प्राप्त हो जाते हैं। हमें शून्य में केवल घंटों की अलौकिक ध्वनि सुनाई पड़ती है। हमारे आसपास क्या घटित हो रहा है; हम उससे बेखबर रहते हैं। वास्तव में यही मानव का अंतिम लक्ष्य है। मानव लख चौरासी के बंधनोंसे मुक्ति पाना चाहता है और कैवल्य- प्राप्ति ही मानव जीवन का अंतिम लक्ष्य है। यह प्रवृत्ति मानव में चिन्तन-मनन से जाग्रत होती है। इस स्थिति में हमारा अंतर्मन अपरिग्रह की प्रवृत्ति में विश्वास करने लगता है और गुरू नानक की भांति तेरा-तेरा में विश्वास करने लगता है। परिणामत: हृदय में करुणा व विनम्रता जैसे दैवीय भाव संचित हो जाते हैं और वाणी-माधुर्य स्वयंमेव प्रकट होने लगता है; औचित्य- अनौचित्य का ज्ञान हो जाता है, जो हमें दूसरों से वैशिष्टय प्रदान करता है। उस स्थिति में हम मित्रता व शत्रुता के भाव से ऊपर उठ जाते हैं और केवल सत्कर्म करने लगते हैं।

भरोसा उस पर करो, जो तुम्हारी तीन बातें समझ सके–मुस्कुराहट के पीछे का दर्द, गुस्से के पीछे का प्यार व चुप रहने के पीछे की वजह। इनके माध्यम से मानव को हर इंसान पर भरोसा न करने की सीख दी जाती है, क्योंकि सच्चा साथी आपके हृदय की पीड़ा, करुणा व वेदना को अनुभव करता है तथा आपकी मुस्कुराहट के पीछे के दर्द को समझ जाता है। यदि आप उस पर क्रोधित भी होते हैं, तो वह उसमें निहित प्रेम की भावना को समझ जाता है, क्योंकि वह उस तथ्य से बखूबी अवगत होता है कि आप जो भी करेंगे; उसके हित में ही करेंगे तथा कभी भी उसका बुरा नहीं चाहेंगे। इतना ही नहीं, यदि आप किसी कारणवश मौन हो जाते हैं, तो वह उसकी वजह जानना चाहता है। ऐसी विषम परिस्थिति में भी वह आपसे कभी दूरी नहीं बनाता, बल्कि चिंतन-मनन करता है तथा सच्चाई को जानने का प्रयास करता है। वास्तव में यही जीवन का सार व जीने का अंदाज़ है। मानव को कभी भी तुरंत प्रतिक्रिया नहीं देनी चाहिए तथा अकारण क्रोधित होना भी कारग़र नहीं है। उसे सदैव शांत भाव से कारण जानने का प्रयास  करना चाहिए, ताकि समस्या का निदान संभव हो सके। सो! मानव को निर्णय लेने से पूर्व समस्या के दोनों पक्षों पर विचार करना आवश्यक है, क्योंकि चिंतन-मनन करने से जीवन में ठहराव आता है और वह उपहास का पात्र नहीं बनता। उसके कदम कभी भी ग़लत दिशा की ओर अग्रसर नहीं होते। दूसरे शब्दों में यह अलौकिक आनंद की स्थिति है, जिसमें मैं और तुम व अपने-पराये का भाव समाप्त हो जाता है तथा ‘सर्वे भवंतु सुखीन:’ की भावना प्रबल हो जाती है और सारा संसार उसे अपना कुटुंब नज़र आने लगता है। इसलिए हृदय में चिंतन-मनन की प्रवृत्ति को संपोषित व संग्रहीत करें, ताकि चहुंओर आनंद की वर्षा हो सके।

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

#239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ लघुकथा – शत्रु ☆ श्री हरभगवान चावला ☆

श्री हरभगवान चावला

(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री हरभगवान चावला जी की अब तक पांच कविता संग्रह प्रकाशित। कई स्तरीय पत्र पत्रिकाओं  में रचनाएँ प्रकाशित। कथादेश द्वारा लघुकथा एवं कहानी के लिए पुरस्कृत । हरियाणा साहित्य अकादमी द्वारा श्रेष्ठ कृति सम्मान। प्राचार्य पद से सेवानिवृत्ति के पश्चात स्वतंत्र लेखन।) 

आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय लघुकथा शत्रु।)

☆ लघुकथा – शत्रु ☆ श्री हरभगवान चावला ☆

 (कविता के ऐसे तमाम शत्रुओं से क्षमा सहित)

– एक कवि आपसे मिलने के लिए द्वार पर हाथ बाँधे खड़ा है, आज्ञा हो तो उसे दरबार में आने दिया जाए ।

– कवि!! हमसे मिलने के लिए आया है, आश्चर्य! ये कवि कहे जाने वाले प्राणी तो जैसे पैदा ही राजाओं की निंदा के लिए हुए हैं ।

– पर यह कवि वैसा नहीं है ।

– कवि तो है न! तुम क्या नहीं जानते कि हम कवियों से और कवि हमसे कितना चिढ़ते हैं । कितने कवि हमारे कारागार में बंद हैं, कितनों पर मुकद्दमें चल रहे हैं, कितनों से हमारे दरबारी अपने स्तर पर लड़ रहे हैं ।

– जानता हूँ महाराज, पर इस कवि ने आपकी प्रशस्ति में कई चालीसे लिखे हैं, अब महाकाव्य लिखने की तैयारी में है । इस कवि ने प्रजा के बीच आपको अवतार के रूप में स्थापित करने का प्रण किया है ।

– अच्छा, उसका हमसे मिलने का प्रयोजन क्या है?

– वह आपको अपनी लिखी कविता की किताबें भेंट करना चाहता है ।

– किताबें! हा…हा…हा…हमने कभी कोई किताब पढ़ी है आज तक? और कविता के तो हम घोषित शत्रु हैं ।

– कविता का शत्रु तो वह भी है महाराज, अघोषित ही सही ।

©  हरभगवान चावला

सम्पर्क –  406, सेक्टर-20, हुडा,  सिरसा- 125055 (हरियाणा) फोन : 9354545440
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – सृष्टि ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

? संजय दृष्टि – सृष्टि  ??

तुम समेटती रही

अपनी दुनिया और

मुझ तक आकर ठहर गई,

मैं विस्तार करता रहा तुम्हारा

और दुनिया तुममें

सिमट कर रह गई,

अपनी-अपनी दृष्टि है प्रिये!

अपनी-अपनी सृष्टि है प्रिये!

© संजय भारद्वाज

(सुबह 10.25 बजे, 17.6.19)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ साहित्य निकुंज #130 ☆ लघुकथा – समय की धार ☆ डॉ. भावना शुक्ल ☆

डॉ भावना शुक्ल

(डॉ भावना शुक्ल जी  (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान  किया है। हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं एक विचारणीय लघुकथा  “समय की धार।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ  # 130 – साहित्य निकुंज ☆

☆ लघुकथा – समय की धार ☆

इंदु की बाहर पोस्टिंग हो जाने बाद आज उसका फोन आया. वहां के सारे हालचाल सुनाए और निश्चितता से कहा बहुत मजे से जिंदगी चल रही है.

हमने ना चाहते भी पूछ लिया अब शादी के बारे में क्या ख्याल है यह सुनते ही उसका गला भर आया.

उसने कहा..”माँ  बाबूजी भी इस बारे में बहुत फोर्स कर रहे हैं लेकिन मन गवाही नहीं दे रहा कि अब फिर से वही जिंदगी शुरू की जाए. पुराने दिन भुलाए नहीं भूलते।”

हमने समझाया ” सभी एक जैसे नही होते, हो सकता है कोई इतना बढ़िया इंसान मिले कि तुम पुराना सब कुछ भूल जाओ।”

“दी कैसे भूल जाऊं वह यादें… ,कितना गलत था मेरा वह निर्णय, पहले उसने इतनी खुशी दी और उसके बाद चौगुना दर्द, मारना -पीटना, भूखे रखना. उसकी माँ जल्लादों जैसा व्यवहार करती थी।”

“माँ बाप की बात को अनसुना करके बिना उनकी इजाजत के कोर्ट मैरिज कर ली और हमारे जन्म के संबंध एक पल में टूट गये।”

“देखो इंदु , अब तुम बीती बातों को भुला दो और अब यह आंसू बहाना बंद कर दो।”

“दी यह मैं जान ही नहीं पाई कि जो व्यक्ति इतना चाहने वाला था वह शादी के बाद ही गिरगिट की तरह रंग कैसे बदलने लगा।”

“इंदु अब तुम सारी बातों को समय की धार में छोड़ दो।”

“नहीं दी यह मैं नहीं भूल सकती, मैंने अपने माता पिता को बहुत कष्ट दिया, इसका उत्तर भगवान ने हमें दे दिया.”

“इंदु एक बात ध्यान रखना माता-पिता भगवान से बढकर है, वे अपनी संतान को हमेशा मांफ कर देते है।”

© डॉ भावना शुक्ल

सहसंपादक… प्राची

प्रतीक लॉरेल, J-1504, नोएडा सेक्टर – 120,  नोएडा (यू.पी )- 201307

मोब. 9278720311 ईमेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ इंद्रधनुष #120 ☆ नीको लगे यह ब्रज हमारो ☆ श्री संतोष नेमा “संतोष” ☆

श्री संतोष नेमा “संतोष”

(आदरणीय श्री संतोष नेमा जी  कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप  कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं.  “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में प्रस्तुत हैं  भावप्रवण रचना “नीको लगे यह ब्रज हमारो। आप श्री संतोष नेमा जी  की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)

☆ साहित्यिक स्तम्भ – इंद्रधनुष # 120 ☆

☆ नीको लगे यह ब्रज हमारो 

कन कन में बसते मन मोहन, मोहक राज दुलारो

ब्रज की रज चंदन सी महके, वृंदावन है प्यारो

जित बसते हों राधेरमना, सुख मिलतो है सारो

रहे  कबहुँ न दुख को अंधेरों, पास रहे उजियारो

ब्रज की बोली बड़ी रसीली, प्रेम पाग उचारो

ब्रज की रज “संतोष” लपेटें, कहते प्रभु अब तारो

© संतोष  कुमार नेमा “संतोष”

सर्वाधिकार सुरक्षित

आलोकनगर, जबलपुर (म. प्र.) मो 9300101799
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares
image_print